Skip to main content

विचार

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

Published on 14/11/2015 - 14:15 प्रकाशित मुखपृष्ठ
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

याद्या 35398

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

Published on 13/11/2015 - 15:20 प्रकाशित मुखपृष्ठ
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद. पहिलं अर्धशतक सायकल! एक साधी वस्तु. २००३ मध्ये आयुष्यातून सायकल निघून गेली. कॉलेजमध्ये शिकत असताना काही दिवस सायकलीचा वापर केला. पण मोठ्या शहरामधील गर्दीमध्ये सायकल चालवू शकलो नाही आणि २००३ मध्ये सायकल सुटली. पण त्याच आयुष्याने परत एकदा सायकलीला समोर आणलं- २०१३ मध्ये!

याद्या 12839

'भडास (कादंबरी)' वरील साहित्यिक प्रतिक्रीयांची ज्ञानकोशीय दखल घेण्याच्या दृष्टीने एक उहापोह

Published on 11/11/2015 - 14:01 प्रकाशित मुखपृष्ठ
या वर्षीच्या एका ऑनलाईन दिवाळी अंकाने नव्वदोत्तरी साहित्य अशा स्वरूपाची थीम त्यांच्या दिवाळी अंकासाठी निवडली. या धागालेखाचा उद्देश नव्वदोत्तरी साहित्याचीपर्यंतचा मर्यादीत नाही, (लेखविषयात नमुद 'भडास (कादंबरी)' मात्र नव्वदोत्तरी साहीत्यातील महत्वाची कादंबरी असल्याच्या किमान काही प्रमाणावर साहित्यिक प्रतिक्रीया असाव्यात.

याद्या 2244

निरीक्षण शब्दांच्या अपभ्रंशाचे

Published on 11/11/2015 - 13:58 प्रकाशित मुखपृष्ठ
"सचीन शतकांसाठीच खेळायचा" कपील पा जी म्हणाला,"त्याच्यातल्या क्षमतेला अल्पसंतुष्टवृत्तीमुळे न्याय मिळाला नाही". मी वेगळाच विचार करत होतो. बंगाली साहित्यातून सुंदर नावं आली आहेत,मूळ शची +इंद्र =शचींद्र असावे ,मग उच्चाराला सोपे करण्यासाठी जसा देवेंद्रचा देवेन होतो तसा शचींद्रचा शचीन व पुढे सचीन झाला असावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2323

कुत्रे (निबंध)

Published on 07/11/2015 - 20:02 प्रकाशित मुखपृष्ठ
कुत्रे सगळीकडे सापडतात. ते सहसा एकेकटे येत नाहीत झुंडीने येतात .समोरच्यावर भुंकून भुंकून हैराण करतात . मग त्यांच्या कंपू प्रमुखाला हुक्की येते चावायची . मग सगळे चावू लागतात . बिचाऱ्या भक्षाचा प्रतिकार अपुरा पडतो. लचके तोडून तोडून जीव घेतात . आणि मग एकमेकांची पाठ थोपटतात . एकमेकांना चाटायला लागतात . लाळ गाळायला लागतात . गल्लीत नवीन आलेला माणूस यांचं आवडत खाद्य . यातून तावून सुलाखून निघणारा क्वचितच. बाकी बिचारे गल्ली सोडून तरी जातात किंवा खालमानेने गुपचूप राहू लागतात . गल्ली म्हणजे आपलच राज्य ही घमंड त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत असतो .
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 9519

असचं काहीतरी

Published on 03/11/2015 - 11:19 प्रकाशित मुखपृष्ठ
पप्पूने इन्फ़िल्ड ला किक मारली ,नारायण पेठेतली एवढीशी गल्ली,इफील्डचे इंजिन रोंरावू लागले  मग फिल्मी स्टाईल ने पाय फिरवून पप्पू गाडीवर बसला, नेहमीप्रमाणे आपली सर्व समावेशक नजर अवतीभवती टाकली  रजनीकांत सारखा गोगल डोळ्यासमोर धरून त्यातल्या प्रतीबिम्बातून पाठीमागे काय चाललाय ते पाहिले, मग सर्र कन फिरवून डोळ्यावर चढवला, दारातून आत नजर  फेकली तर आजी काहीतरी बडबड करत धडपडत येतांना दिसली .  आजी काय म्हणतेय ते गाडीच्या फायरिंग मध्ये काहीच कळेना.मग चावी फिरवून इंजीन बंद केले.  "काय म्हणतेस, आजी .
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2193

तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?

Published on 01/11/2015 - 18:50 प्रकाशित मुखपृष्ठ
आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले…. त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 57222

कोवळ्या वयातलं व्यसन

Published on 01/11/2015 - 16:25 प्रकाशित मुखपृष्ठ
आपल्या आयुष्यात अशा किती घटना किती प्रसंग येतात जेव्हा आपण वहावत वाईट मार्गाला लागू शकतो. तसे झाले असते तर आज आपली अवस्था काय असती; आहे यापेक्षा चांगली असती कि वाईट असती? माझ्या घरापासून शाळा ४-५ किलोमीटर अंतरावर होती. शाळेतली शेवटची ३ वर्षे म्हणजे ८ वी, ९ वी आणि १० वी मी सायकलने ये जा केली. रोज जाता येता बरेच मित्र सोबत असायचे आणि गप्पा मारत जायला यायला मजा यायची. विषय पण १४-१५ वर्षाच्या मुलांच्या नेहमीच्या विषयांसारखेच असायचे; म्हणजे अभ्यास, शाळा, सर, मॅडम, सायन्स ईतर शाखांपेक्षा किती भारी आहे, कॉम्पुटर गेम्स, मुली वगैरे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 21793

राष्ट्रीय पुरस्कार आणि आम्ही

Published on 31/10/2015 - 21:19 प्रकाशित मुखपृष्ठ
शीर्षक पाहून धागा जरी राजकारणाशी संबधित वाटत असला तरी तो नाही --------------------------------------------------------------------------------------------------------- काल ख्वाडा पाहिला , प्रदर्शनापूर्वीच काही चित्रपटांना खूप पुरस्कार मिळतात त्या पैकीच हा १ चित्रपट. तसं पाहिलं तर गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकण्याचा सपाटाच लावलाय , माफ करा मी अजूनही राष्ट्रीय पुरस्काराचा विचार करतोय ..
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1082

महाभारत व रामायणातील अतिशयोक्ती

Published on 26/10/2015 - 17:36 प्रकाशित मुखपृष्ठ
महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते. 1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही. 2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला. 3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले. 4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. 5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली. 6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे. 7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला. 8.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 40948