Skip to main content

विचार

दिल दोस्ती डिकन्स्ट्रक्शन

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 02/03/2017 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
दिल दोस्ती Deconstruction सध्या भारतात D-construction किंवा बुद्धिभ्रम करणार्‍यांची चलती आहे. जे जे प्रचलित आहे त्याच्या नेमके उलट काहीतरी बोलायचे. समाजात जे शिष्ट संमत आहे त्यावर प्रश्न उपस्थित करायचे आणि फक्त प्रश्नच उपस्थित करायचे. उत्तरे शोधण्याची जबाबदारी मात्र नाही घ्यायची असे सुरु आहे. समाज दुर्गेला मानतो का, मग आम्ही महीषासूराची पूजा करणार. समाज लग्न संस्थेला मानतो का मग आम्ही लिव्ह इन रिलेशनचा पुरस्कार करणार.

जागतिक मराठी भाषा गौरव दिन २०१७: बोलीभाषा सप्ताह समारोप

लेखक पैसा यांनी मंगळवार, 28/02/2017 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
1 . नमस्कार मंडळी! आपल्या मिपावर जागतिक मातृभाषा दिनाला म्हणजे २१ फेब्रुवारीला बोलीभाषा सप्ताह या आपल्या मातृभाषेच्या उत्सवाची सुरुवात झाली. वटवृक्षाच्या पारंब्याप्रमाणे असलेल्या तिच्या अनेक बोली लेख, कविता, कथांच्या स्वरूपात आपल्यापुढे येत गेल्या. जागतिक मराठी दिनाला म्हणजे २७ फेब्रुवारीला या उत्सवाची सांगता होत आहे. समारोप म्हणवत नाही, कारण ही अखंड तेवावी अशी ज्योत आहे. मिपावर बोलीभाषा सप्ताहच करायचा असे का ठरले?

भिल्ल भारत

लेखक मिडास यांनी सोमवार, 27/02/2017 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
काळाच्या कसोटीला पुरून उरणारी कलाकृती म्हणून आज महाभारताचा उल्लेख करू शकतो. मानवी स्वभावाचे अनेक ज्ञात अज्ञात कंगोरे आपल्याला महाभारतात आढळून येतात. प्रत्येक संस्कृतीने महाभारताकडे स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. या कॅलिडोस्कोप ने प्रत्येकाला वेगळे आकार वेगळे रंग दाखवले. असाच एक वेगळा रंग मला दिसला तो भिल्ल भारतामध्ये. हे महाभारत ज्याला रूढार्थाने आदिवासी म्हणता येईल अश्या आदिम संस्कृतीमध्ये स्वतःचा वेगळा बाज धरून उभे राहिले आहे. मुळात आदिवासी समाज हा कैक पटीने आपल्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाज पेक्षाही सुसंस्कृत आहे.

मराठी; समस्येची पाळंमुळं

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 26/02/2017 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
जुना, बराच चर्चिलेला विषय आहे, त्यामुळे संपादकांना वाटल्यास धागा अप्रकाशित करू शकता. मराठीदिनानिमित्त टाकावा वाटलं, म्हणून. सदर लेख लोकमत वृत्तपत्राच्या हॅलो ठाणे पुरवणीत २५-०२-२०१७ रोजी प्रकाशित झाला असून त्याची विस्तारित आवृत्ती या ब्लॉग पोस्ट मधे देत आहे. प्रकाशनाबद्दल #लोकमत चे आभार. लोकमत मधील लेख चेहरा, नाव यानंतर एखाद्या व्यक्तीची ओळख म्हणून जर कुठली तिसरी गोष्ट गणली जाऊ शकत असेल तर ती त्या व्यक्तीची भाषा असते.

एस्कीमो

लेखक वडगावकर यांनी शनिवार, 25/02/2017 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
काल दुपारची गोष्ट.... साधारण साडेतीन चार..... आळशीपणाची दुलई अंगावर पांघरून मस्तपैकी पुस्तक वाचत लोळत पडलो होतो.... आज आंघोळ होणार आहे की नाही?....कमरेवर दोन्ही हात ठेऊन मान तिरकी करत तिने विचारलं खरं म्हणजे तो प्रष्ण नव्हता.... ती धमकी होती..... काळ आंघोळ केली होती ना!...आज नाही केली तर नाही चालणार का? काल जेवण केलं होतं ना,मग आज केलं नाहीतर चालणार नाही का?...हातात टॉवेल कोंबत तिने विचारलं मी आता पुढच्या जन्मी एस्कीमोच होणार आहे....मी हसत म्हणालो काहो बाबा?...एक्सिमो कशाला?...छोटे नवाब का एंट्री के साथ सवाल....

पौगंडावस्थेतील मुला-मुलींच प्रेम

लेखक वसुधा आदित्य यांनी गुरुवार, 23/02/2017 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
'पौगंडावस्थेतील मुला-मुलींच प्रेम' हा आई-बाबांसाठी काळजीचा विषय. मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडलेत हे कळल्यानंतर, 'हे वय आहे का प्रेम करण्याचं?' ह्या वाक्यापासून सुरुवात होते. प्रेमावर मग बंधनं घातली जातात. 'पुन्हा त्याला भेटलीस तर बघ', अशा धमक्या दिल्या जातात. प्रेमात पडण, अफेअर असणं म्हणजे वाया जाणं, असा समज असतो. म्हणूनच मुलांच्या प्रेमात पडण्याने आई-बाबा हवालदिल होतात. आपली मुलगी किंवा आपला मुलगा चुकीच्या माणसाच्या प्रेमात वाहवत जाऊ नये, ह्याची काळजी वाटणं ती घेणं पालक म्हणून खूप गरजेचं असतं. पण त्रागा हा त्यावर उपाय नाही.

तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 22/02/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड! कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते. अशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत. पुस्तके,टिव्ही,इंटरनेट याद्वारे तमिळ शिकणारे काहीजण इथे एकत्र येत आहेत.प्रत्येकाची याबाबत प्रगती निरनिराळी!

मानसिकता

लेखक प्रविण गो पार्टे यांनी सोमवार, 20/02/2017 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
कमाल आहे बुआ आपल्या भारतीय मानसिकतेची... ब्रिटीशांनी स्वार्थासाठी बांधलेले इमले आज World Heritage म्हणून मिरवत आहेत.. आणि माझ्या शिवबाने रयतेच्या कल्यानासाठी बांधलेले गडकील्ले मात्र अंधार कोठडिचे जीवन जगत आहे.. बहुदा यालाच भारतीय अस्मिता म्हणत असतील राव.....

कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे संपत्तीकडे

लेखक लीना कनाटा यांनी मंगळवार, 14/02/2017 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या निवडणुकांमुळे वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांचे उत्पन्नाचे आकडे वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळत आहेत. त्यात देखील जे आधी पासूनच मान्यवर (?) आहेत त्यांच्या संपत्तीमध्ये गेल्या कार्यकाळात झालेली वाढ हि विशेषत्वाने नोंद घेण्यासारखी आहे. केवळ पाच वर्षातील हि प्रचंड वाढ बघता हि सगळी मंडळी कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊन वेगाने संपत्तीकडे झेपावत आहेत असे दिसून येते. जेव्हा तुमच्या आमच्या सारखी सामान्य जन मंडळी (संक्षींच्या भाषेत ईएमआयग्रस्त) जेमतेम उत्पन्न मिळवत असताना या मान्यवर मंडळींची संपत्ती मात्र वाढता वाढता वाढे भेदिलें टॅक्स मंडळा अशी कित्येक पटीनी कशी काय वाढत आहे?

अल्पसंख्यांकांचा प्रश्न! भाग१

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 12/02/2017 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
(संदर्भ ग्रथ- अखंड भारत का नाकारला?-शेषराव मोरे, छायाप्रकाश,अन्वय, आकलन- नरहर कुरुंदकर, महात्मा गांधी- धनंजय कीर, अब्राहम लिंकन- फाळणी टाळणारा महापुरुष- वि. ग. कानिटकर, अल्पसंख्यांक वाद – मुझफ्फर हुसेन ) कोणतीही लोकशाही शासनव्यवस्था ज्या लोकांचे ती प्रतिनिधित्व करते. त्यांच्या विकासासाठी, त्यांना विकासासाठी समान संधी आणि त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी तत्वत: तरी बांधील असते . पण त्याच बरोबर ज्या देशात ती आहे त्या देशाचे सार्वभौमत्व, अखंडत्व ह्याला हि तितकीच किंवा कांकणभर अधिकच बांधील असते.