Skip to main content

विचार

आईवडिलांबद्दल पुस्तके लिहिणे

लेखक वृंदा१ यांनी मंगळवार, 27/12/2016 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच जाणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईवडिलांची भूमिका फार फार महत्वाची असते. आयुष्य चालत राहतं,काळ वाहत राहतो आणि एक दिवस आपल्याला आई किंवा वडिलांचा कायमचा वियोग सहन करावा लागतो.

धावते विचार :)

लेखक मन यांनी सोमवार, 26/12/2016 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
---------काल गावाकडून पुण्याकडे एशियाड्मधून येत होतो. तेव्हाचं डोक्यातलं विचारचक्र ------ पंधरा नम्बरची सीट मिळालेये मस्त.अगदि मध्यभागी बसच्या.शिवनेरी वॉल्वो ऐवजी ह्यावेळी एशियाड घेउन किती स्मार्टपणा केलाय बॉस मी. संध्याकाळची वेळ. मस्त आल्हाद गारवाय हवेत. वाहती हवा. अगदि गरमी म्हणावी अशीही हवा नाही, आणि अगदि गारठून वैतागावे अशीही थंडी नै. मी स्वतःवरच खुश. आपण किती स्मार्ट आहोत त्याबद्दल. एरव्ही खूपदा शिवनेरीने जातो असह्य उकाडा वाटला तर. साडे तीनशे ऐवजी ऑल्मोस्ट सातशे रुपये पडतं भाडं इन द्याट केस. . . एशियाडच्या साडे तीनशे ऐवजी जवळपास दुप्पट... म्हंजे सातशे रुपये भाडं शिवनेरीचं.

जाणता राजा

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 26/12/2016 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
गाव : विदर्भातलं एक खेड वेळ : सकाळची , स्थळ : गावाची चावडी पात्र : रामराव आणि शामराव, वय : ५५-६० च्या आसपास. रामराव : "राम राम ओ शामभौ कुटी चालले इतक्या घाई मदी." शामराव : "राम राम, ते शेतात गेल्तो जरा सोयाबीन ले पानी द्याचं व्हतं, तुमाले मालूम नाई का रातीची इज देतात ना ते MSEB वाले." "न आता जरा उमरावातीले जाऊन येतो, ते मावा पडलाय सोआयबीन वर त्यासाठी कीटकनाशक घेऊन येतो जरा.

सद्गुरू आणि स्मोकिंग!

लेखक आदित्य कोरडे यांनी बुधवार, 14/12/2016 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
(Disclaimer- खालील लेख वाचण्यापूर्वी जे लोक शंकर महाराजांचे किंवा अन्य कोणत्याही महाराजांचे निस्सीम वगैरे उपासक आहेत त्यांनी तो वाचू नये किंवा आपल्या जबाबदारीवर वाचवा. भावना वगैरे दुखावल्यास अस्मादिक जबाबदार नाहीत.) हे फेसबुक, whats app, वगैरे सोशल नेट्वर्किंग च्या चलती मुळे आमची आणि आमच्या सारख्या सश्रद्ध लोकांची पुण्यार्जनाची भलतीच सोय होऊन राहिली आहे.

संवाद

लेखक भावना कल्लोळ यांनी सोमवार, 12/12/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या इंग्लिश मिड डे या वर्तमानपत्रात एक पुर्ण पानभर मुंबईच्या विविध भागात घडलेल्या तीन घरातल्या बातम्या आल्या आहेत. त्यात २ बातम्या मध्ये शाब्दिक वादामुळे संतापाच्या भरात नवऱ्याने बायकोला जीवे मारले तर एका मध्ये कौटुंबिक वादामुळे वेगळे झालेल्या नवऱ्याला आपल्या मुलांना भेटु न दिल्याने नवऱ्याने घेतलेला स्वतःचा जीव. आपल्यासाठी तरी हि नुसतीच बातमीच, वाचावी आणि सोडुन द्यावी. पण थोडे लक्ष दिले तर लक्षात येईल या तिनी बातमी मध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे कुटुंब- नवरा आणि बायको. एका दिवसात तीन कुटुंब उध्वस्त झाली. त्या तीन कुटुंबातल्या लहानग्याचे पुढे काय? हे एक यक्ष प्रश्न असेल आता.

पुरोगामी - प्रतिगामी

लेखक संदीप ताम्हनकर यांनी रविवार, 11/12/2016 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
पुरोगामी - प्रतिगामी मराठीतील एका वृत्तपत्राने आपल्या अग्रलेखातून एकंदरीत पुरोगाम्यांवर दुगाण्या झाडल्या. त्यामुळे खरंतर मी हे लिखाण केले. पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतीवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी नसतात, मनुवादी नसतात, धर्मवादी नसतात, कर्मविपाकसिद्धांतवादी नसतात, शब्दप्रामाण्यवादी नसतात, कट्टर धार्मिक नसतात.

माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian?

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 11/12/2016 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
शाकाहार मांसाहार असे म्हटले कि लगेच माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian? हा प्रश्न लोक विचारू लागतात. आणि त्यावर आपापली मतही अभिनिवेशाने मांडू लागतात. आता Non Vegetarian चं भाषांतर अ-शाकाहारी असे काहीतरी होईल, मांसाहारी नाही म्हणून मुद्दाम वरच्या प्रश्नात तसे लिहिलेले आहे.आम्ही पूर्ण पणे Vegetarian आहोत असे म्हटले तर मग दुध, तूप, लोणी, मध असे प्राणीजन्य पदार्थ खाण टाळावे लागेल. आश्चर्य म्हणजे आपल्या धर्मात ह्या गोष्टी उपासाला देखील चालतात. (मला कधी कधी कळतच नाही आपल्या धर्माचं, म्हणजे एकादशी,चतुर्थीला भाज्या पण चालत नाहीत पण हे उपरोल्लेखित प्राणीजन्य पदार्थ चालतात.

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४

लेखक अबोली२१५ यांनी शनिवार, 10/12/2016 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
या फोन नंतर मी माझ्या नवऱ्याशी बोलली काय वाटतंय तुला. तर तो बोलला कि Mr. परेश फक्त आणि फक्त पैसे आणा एवढच बोलत होता. त्याने मला समजेल असं काहीही सांगितलं नाही आहे. त्याला पैशाची घाई लागलीय. मला पटायला लागलं होत. या वर तुझ्या मित्र राजकारणात आहे त्याला Mr. परेशी माहिती काढायला सांग असं सुचवलं. मी त्याला सांगितलं कि तो लोढा ग्रुप मध्ये civil engineer आहे , आणि तो आपल्या गल्लीतच्या जवळच राहतो. यावर नवऱ्याने शांत राहणे पसंत केलं ;) काही काही ऑफिस मध्ये सॅलरी स्लिप देत नाहीत त्या काही ऑफिस मधल माझं ऑफिस आहे.

कॅशलेस

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 05/12/2016 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
‘देशभक्‍ताची व्याख्या’ या ब्लॉगचा ताजा कलम: - डॉ. सुधीर रा. देवरे 1975-77 च्या आसपासचा काळ. तेव्हाही माझ्या लहानपणी आमचं गाव बर्‍यापैकी कॅशलेस होतं. दुकानात कोणाला काही घ्यायला जायचं असलं की घरातलं धान्य- बाजरी, गहू, नागली, हरभरा, मका असं दुकानात घेऊन जायचं. दुकानदार तो त्याच्या मापाने मोजायचा. माप भरून भरपूर धान्य खाली पडू द्यायचा. आणि त्याच्या हिशोबाने सांगायचा, ‘इतके इतके पैसे झाले. काय देऊ?’ मग रोज लागणार्‍या जिनसा गुळ, दाळ, चहा, साखर, तेल असं थोडं थोडं खरेदी करायचं.

घर

लेखक नकुल पाठक यांनी रविवार, 04/12/2016 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
एक घर असतं. अगदी नेहमीच्या घरांसारखं. खिडक्या, भिंती, कुंपण असणारं. बाहेरून जरी बाकीच्या घरांसारखं दिसत असलं तरी आतून मात्र अगदी वेगळं. कोणतीही वस्तु नाही किंवा सामान नाही. आणि घरात कोणी माणसंही नाहीत. फक्त खूप खोल्या. काहींमध्ये भीती निर्माण करणारा अंधार तर काहींमध्ये डोळे दिपवणारा उजेड आणि काहींमध्ये आल्हाददायक मिणमिणता प्रकाश. घराच्या खिडकीतून फुलांचे काटे दिसतात तर कधी घनदाट झाडांमध्ये अदृश्य होणारी वहिवाट. ह्याला समजुतीची बाजू घेणारा गार वारा आणि घणाघाती घाव घालणाऱ्या कटू विजांची साथ. घरातलं वातावरणही काहीसं तसंच. प्रत्येक खोली मधून एक विशिष्ठ सूर असलेलं.