लाईन कथा : स्वामी तिन्ही जगांचा, आटा बिना उपाशी

लेखनविषय:
लेखनप्रकार
(गेल्या काही दिवसांपासून कमरेचे जुणे दुखणे वाढल्यामुळे, टंकन करणे संभव होत नव्हते, पण आज सकाळी राहवले नाही, एवढे सर्व समोर घडत असताना डोक्यात सुपीक विचार येणारच). सध्या सौ. बाहेर गावी अर्थात महाराष्ट्रात सॉरी विदर्भात गेलेली आहे. डोक्यावरचे केस पांढरे झाले असले तरीही या वयात मजबूरी में पुन्हा एकदा लाईनीत उभे राहण्याची वेळ आली. शांतपणे बँकेच्या लाईनीत उभा झालो. बँकेच्या लाईनीत उभे असलेले अनेक तरुण जीव अधीर आणि तणावग्रस्त दिसले. बहुतेक त्यांची रांगेत उभे राहण्याची पहलीच वेळ असेल. बालपणाचे राशनच्या लाईनीतले किस्से सांगून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करू लागलो.

नोटबंदी आणि विवेकाचा दुष्काळ!

लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या जळी स्थळी काष्ठी पाषाणी( म्हणजे T.V. आणि सोशल मिडीयावर) आम्हाला फक्त एकच गोष्ट दिसून/ डाचून राहिली आहे. ती म्हणजे नोटाबंदी. काय अभूतपूर्व परिस्थिती, दिवाळी नंतर शिमगा लगेचच यावा आणि सर्वत्र धुळवड साजरी व्हावी असे चित्र. महामहीम पंतप्रधान मोदीशेठ ह्यांचे परम भक्त आणि परम शत्रू, सगळेच डोके गमावलेल्या मुरार बाजी प्रमाणे थैमान घालताना दिसताहेत. बरे दोघांना हि सर्वसामान्य जनतेच्या हालाची, तिच्या देशभक्तीची, उद्याच्या उज्ज्वल भवितव्याची कोण काळजी?

कुंती, द्रौपदी आणि सीता... काळ आणि परिस्थिती

लेखनविषय:
लेखनप्रकार
(पिशी अबोली यांचा लेडी सीमोर- कुंती, द्रौपदी आणि सीता हा लेख वाचला आणि मनात आले की रामायण आणि महाभारत काळातील रूढी, प्रचलित कथा आणि कल्पना इथे मांडाव्यात. लेडी सीमोर यांचे आयुष्य संघर्षमय आणि शारीरिक आणि मानसिक दुःखमय गेले. पण तरीही त्यांनी जिद्दीने आपली बाजू समाजापुढे मंडळी... ही खरच मोठी गोष्ट आहे. प्रस्तुत लेखात कुंती, द्रौपदी आणि सीता यांच्याबद्दल मी आजवर जे वाचले आहे ते लिहिले आहे. हा धागा लिहिण्याचा उद्देश इथे चांगली चर्चा व्हावी एवढाच आहे. जर वाचकांकडे काही वेगळी माहिती असेल तर मला समजून घ्यायला नक्की आवडेल.) दुर्वासांची सेवा केल्याने त्यांनी कुंतीला एक वरदान दिले.

पुरुषांचाही विनयभंग होतो!!!!!?

लेखनविषय:
लेखनप्रकार
२०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भयाच्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर देश ढवळुण निघाला.स्त्री सुरक्षे विषयक कायदे कडक केले गेले.देशात स्त्रीयांना भोगायल्या लागणार्या छेडछाड ,विनयभंग ,बलात्कार इत्यादी प्रश्नावर मंथन झाले ,चालू आहे.स्त्री सुरक्षा आपली सर्वांची प्रार्थमिकता असायला हवी या बाबतीत दुमत नाहीच.पण पुरुषांच्याही काही लैंगिकतेच्या अनुषंगाने सामाजिक समस्या असु शकतात याविषयी मात्र ब्र देखिल उच्चारला गेला नाही.प्रत्येकवेळी पुरुषच शोषणकर्ता असतो असा एकांगी विचार मांडायला गेलो तर योग्य होणार नाही. बायकाही पुरुषांचे लैंगिक शोषण करतात /करु शकतात असे गृहीतक जर कुणी मांडले तर ते एकतर खोटे आहे अथ

देशभक्‍ताची व्याख्या!

लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी देशाच्या नागरिकांना उददेशून केलेल्या भाषणात ‘1000 आणि 500 च्या नोटा आता कागदाचे तुकडे झाल्या’ची घोषणा केली. पण नागरिकांना आपल्याकडचे हे चलन बदलायला पन्नास दिवसांची मुदत दिल्याने सर्वत्र आनंद झाला. त्यांच्या या निर्णयाचे देशभर स्वागत झाले. निर्णयावर टीका केली तर आपण काळा पैसा बाळगणारे आहोत असा संदेश जाईल की काय या भीतीनेही बरेच लोक निर्णयाचे स्वागत करू लागले. आपण अर्थतज्ञ नाही. चलनवाढ, काळापैसा, स्मगलींग, नकली नोट यातले आपल्याला काही कळत नाही.

एक पणती माझीही!!

लेखनविषय:
लेखनप्रकार
"अरे सहाब क्यू इतना झंझट करवाते हो आप? कौन जायेगा बँक में घडी घडी लाईन लागाने को?. मेरा तो अकाउंट भी नही है बँक में, आप मेरे को कॅशहि दे दो." साधारण सहा महिन्यापूर्वीचं आमच्या नवीन बंगाली कामवाली बाईचं हे वाक्य. नवरा पुराणिक बिल्डर्सच्या कन्स्ट्रक्शन साईटवर मजूर, आणि हि त्याच कॉम्प्लेक्समधे धुणी-भांडी, जेवण बनवण्याचं काम करते. कॉलेजात शिकत असलेली दोन मुलं शिकण्यासाठी कोलकातामधे. नवऱ्याच्या पगारात दोघे भागवतात आणि तिचा सगळा पगार मुलांच्या शिक्षणासाठी पाठवते. मी :- आपका बँक अकाउंट नाही है? तो आप पैसा कैसे भेजती हो हर महिने? ती :- एक पहचान का आदमी है वो भेजता हैं.

आजकाल...

लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळी उठल्यावर आवराआवर ही सगळ्यांची नित्याची सवय. मग office, collage, शाळा, काम, इत्यादी गोष्टींसाठी धावणे सुरु होते. ह्या सगळ्या व्यापात दिवस कसा जातो हे काळतच नाही. थकुन भागुन घरी आल्यावर घरची कामे, कर्त्तव्य हयात वेळ जातो. मग तोपर्यंत रात्रीच्या जेवाणाची वेळ होते. उरला सुरला वेळ हा tv पाहण्यात जातो. मग तोपर्यंत उद्याची तयारी bag अवरुन ठेवणे, कपड़े इस्त्री करून ठेवणे, इत्यादि... तोपर्यंत झोपायाचि वेळ येतेच् मग काय झोपा. सकाळ झाली की परत तेच चालू... असे दिवसा मागे दिवस निघुन जातात. ह्या सगळ्यात आपण स्वतःसाठी जगायाच विसरुनच जातो. आजकाल स्वतःसाठी जगण सगळे विसरलेत बहुतेक.

ग्रामीण साहित्यातील 'आनंद’ गेला.

लेखनप्रकार
ग्रामीण साहित्यातील 'आनंद’ गेला. सकाळीच डॉ.आनंद यादव गेल्याच्या बातमीने धक्काच बसला. डॉ आनंद यादव खूप वर्षापूर्वी औरंगाबादला आले तेव्हा आमच्या मराठवाडा साहित्य परिषदेत त्यांची भेट झाली होती. मिसळपाववर मी आनंद यादवांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या अभिनंदनाचा धागा काढला होता. डॉ. आनंद यादव यांच्या भेटीत फ़ारशी ओळख नसतांनाही काही लेखक मंडळींच्या आणि त्यांच्या गप्पाही रंगल्या होत्या आम्हीही त्यात होतो तेव्हा 'वाचत राहा' हा सल्ला त्यात होता. त्यांच्या गप्पांच्या आठवणींनी आज आत जरा जरा गलबलून आलं होतं.

(फक्त) ऑफिस ला पर्याय...

नमस्कार मिपाकरहो ! कृपया मला कुणी (फक्त) ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का? अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना तिथे काम करणे आवडत नाही आणि उपाशी राहणेही योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे. धन्यवाद.
Subscribe to विचार