Skip to main content

विचार

जाऊ शकते-तीच जात!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 16/03/2017 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
म. टा. व्रुत्ता प्रमाणे एक नवीन कायदा येतोय.. 'अंतर्जातीय विवाहितांच्या संरक्षणाचा'. सदर कायदा हा आमच्या मते अतिशय कौतुकास्पद निर्णय आहे. https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17310118_1814617218860381_2113214286324950828_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=dd09ddc726cae9ec913d2f3f4c972085&oe=59586BDB पण.....

रैना

लेखक arunjoshi123 यांनी मंगळवार, 14/03/2017 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
ईश्वरानं तसं काही सूचित केलेलं नसतानाही काही शब्दांच्या माथी अकारण काळिमा आलेला आहे. त्यातला एक शब्द काळा रंग. तिच्या काळ्या रंगाशिवाय रात्रीचं रात्रपण अपूर्ण आहे. निरपराध असताना देखील रात्रीनं, आपल्या सख्याचा दोषापराध, काळ्या रंगाचा तो कलंक,अल्पांशानं आपल्या अंगावर घेतला आहे. आपण नाही का म्हणत - दिवसाढवळ्या अमका अमका अत्याचार झाला. म्हणजे जणू काही रात्री हलकी फुलकी पापं चालून जावीत. भरबाजारात, भररस्त्यात, दिवसाच्या लख्ख उजेडात, चारचौघांसमोर कोणी डोळाही ओलावू नये; मात्र रात्रीच्या अंधारात, घराच्या कोण्या कोपर्‍यात, जीव दाटून आलेलं विशेष काही नसावं.

नवीन नियमावली

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी मंगळवार, 14/03/2017 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रशासनातर्फे नवीन नियमावली जारी करण्यात येत आहे. ती वाचून ध्यानात घ्यावी. काही अडचण, शंका असल्यास या धाग्यावर चर्चा करावी. बदलत्या काळात टिकून रहायचं असेल, प्रगती साधायची असेल तर बदल आवश्यक असतात. आजकाल सगळ्याच क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत, जुन्या कार्यपद्धती मागे पडून नवनवीन संकल्पना समोर येत आहेत. म्हणून आपणहीआपल्या जुनाट कार्यपद्धतींमध्ये सुधारणा करत आहोत. १. सबंध भारतात झाडांची संख्या कमी होत चालली आहे. त्यातल्या त्यात आपल्या बांधवांना प्रिय वड, पिंपळ, चिंच अशी झाडे तर दुर्मिळच म्हणावी लागतील. त्यामुळे निवाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिपा शिमगा २०१७ : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 13/03/2017 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, सर्व मिपाकरांना, वाचकांना, मालकांना, तंत्रज्ञ आणि मिपा व्यवस्थेतील सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....! *आम्हाला कामधामं सोडून मिपाचा नाद लावणा-या मिपा मालक नीलकांतसेठच्या नावाने रे .....भो.....बो बो बो बो. *मिपावर काटछाट करणार्‍या पण सध्या मोकळेपणाने वावरु देणार्‍या संपादकांच्या नावाने रे भो...! *खरडफळा लेखकांच्या नावाने रे भो.... बो बो बो बो बो. *मिपाच्या बॅनर बनविणार्‍याच्या नावाने रे हो.... बो बो बो बो. * काथ्याकूटून वात आणना-या फिलॉसॉफर चे रे...भो.... बोबोबोबो. * साहित्य संपादकांच्या वात आणनार्‍या उपक्रमांचा रे भो... बोबोबोबो.

होळीच्या निमित्ताने

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 12/03/2017 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
आपण आजवर अनेक कथा एकल्या आणि वाचल्या आहेत होळी सणासंदर्भात! त्यातली सर्वसाधारणपणे सर्वांनाच माहित असणारी कथा म्हणजे  दुष्ट हिरण्यकष्यपू राजाची! हिरण्यकश्यपू राजाने आपला मुलगा प्रल्लाद श्रीविष्णूचा भक्त आहे हे समजल्यानंतर त्याला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे अग्नीमध्ये न जळण्याचा वर मिळालेल्या होलिकेला त्याने प्रल्लादकडे पाठवले. होलीकेने प्रल्लादाला आपल्या मांडीत बसवले आणि चारही बाजुने अग्नी प्रज्वलित करून घेतला. प्रल्लादाने डोळे मिटून श्रीविष्णूची प्रार्थना करायला सुरात केली आणि आपल्या भक्ताची हाक एकून श्रीविष्णूने होलिकेचे दहन केले.

पत्र व्यवहार ... एक दुर्मिळ होत चाललेलं काम , कौशल्य ...काय म्हणाल ?

लेखक १००मित्र यांनी रविवार, 12/03/2017 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी (रविवार) जुन्या गोष्टी हाताळत असताना एक जुनं पोष्ट-कार्ड (हो हो पो”ष्ट” च) हाती लागलं. फार जुनं नाही , १० एक वर्षांपूर्वीचं. पण “दुर्मिळ” वाटावं इतकी ही पत्र लिहिण्याची-पाठविण्याची सवय पार भूतकाळात गेल्यासारखी वाटतीये आता. ह्या पत्रामुळे अनेक गोष्टींची विचार शृंखला जागृत झाली, शिवाय रविवार असल्याने विचारांना पसरायालाही मी भरपूर वावही दिला. आता खरं म्हणजे इतरही वार मला असा वेळ नक्कीच देवू शकतात बरंका. पण “रविवार” डोस्क्यात बसलाय , तो त्याचं एक विशिष्ट स्थान घेवून.

खन्त

लेखक प्रविण गो पार्टे यांनी शुक्रवार, 10/03/2017 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली.. एकाचवेळी दोन प्रतिक्रिया मनात उमटत होत्या. शिवाजी महाराजांचा पराक्रमाचे प्रतीक पाहून अभिमानाने छाति भरून यत होती तर दुसर्‍याच वेळी किल्ल्याची झालेली द्यनीय अवस्था पाहून लाजेने मान खाली झुकत होती. काय रुबाब होता एक वेळ सिंधुदुर्गाचा!!! अरबी समुद्राच्या लाटेला न जुमनता थेट परकीय जुलमी राजवटीला आव्हान देत मराठ्यांचे समुद्रावर वर्चस्व निर्माण करणारा आज तोच त्या समुद्राच्या लाटांमधे स्वतहाचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतोय.

आवाज: स्त्रीमुक्तीचा

लेखक सचिन तालकोकुलवार यांनी बुधवार, 08/03/2017 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही महिलांना आपल्या स्वातंत्र्यासाठी, समानतेसाठी झगडावे लागत आहे. हि अत्यंत खेदाची बाब आहे. स्त्रियांच्या या स्तिथीमागे हजारो वर्षांपासूनची गुलामगिरीची परंपरा आहे. खरे तर जेव्हा महिलांना आर्थिक व्यवहारातून वगळण्यात आले व त्यांचे उत्पन्नाचे स्रोत नाकारण्यात आले तेव्हापासून महिला पुरुषांवर अवलंबित ठेवून पुरुषसत्तेचे गुलाम म्हणून ठेवण्यात आले. त्यानंतर स्त्रियांना शिक्षणापासून वंचित करण्यात आले व निर्णय घेण्याचे हक्क पुरुषांना मिळाला.

असं का?

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 07/03/2017 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या आठ मार्च.... त्या निमित्ताने परत एकदा स्त्रीच्या अस्तित्वाचं... तिच्या त्यागाचं... तिच्या संसारासाठी झिजण्याचं आणि झटण्याच.... ती करत असलेल्या सर्वांच्या सेवेचं.... खूप कौतुक होईल! आणि अर्थात ते झालच पाहिजे. Because she deserves it! Rather its her right. पण आपण हे अस स्त्रीच्या स्त्रीत्वाच कौतुक करून तिने कायम सगळ्यांच सगळ केलच पाहिजे ही अपेक्षा करायला मोकळे होतो का? आज एक व्हिडीओ whatsapp वर मला आला. किशोरी शहाणे आणि सचिन खेडेकर दोघे आहेत यात. १ मिनित ४० सेकंदाचा व्हिडीओ आहे. पण त्यात खूप सुंदर गोष्ट इतक्या कमी वेळात चित्रित केली आहे.

स्मरणचित्रं - गाण्यांमधला देव आनंद!

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 04/03/2017 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
देव आनंद हा आपला अत्यंत आवडता हिरो!( आपला म्हणजे माझा …हल्लीच्या पिढीमध्ये (म्हणजे सुद्धा माझ्याच पिढीमध्ये …मी काही ७० वर्षांचा म्हातारा नाहीये) देव आनंद काही फारसा कुणाला आवडत नाही …एक तर तो चेष्टेचा विषय आहे किंवा अगदी त्याच्याबद्दल काही मत असावं इतका तो हल्लीच्या पिढीतल्या लोकांना महत्वाचा वाटत नाही … तो अगदी विस्मृतीत गेला नाही एवढंच …तर ते एक असो ) …म्हणजे मला त्याचा एकदम fan म्हणा हवं तर.आता देव आनंद काही फार ग्रेट अभिनेता वगैरे नव्हता. त्याच्या संपूर्ण करिअर मध्ये त्याने फार चांगला अभिनय केला आहे असं काही कुठे आपल्याला फारसं दिसलेलं नाही.