Skip to main content

प्रकटन

मनाच्या कुपीतले-समाजवाद, भांडवलवाद का ईश्वरवाद ?

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 08/01/2009 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो, मनाच्या कुपीतले या सदरातला हा दुसरा लेख..... (सुचना- या लेखात जेथे जेथे इश्वरवाद हा शब्द आलेला आहे त्या ठिकाणी नास्तिकानी निसर्गवाद हा शब्द वाचावा कारण तो मुद्दा फक्त त्याच द्रुष्टीने घेतला असुन त्याचा कोणत्याही धार्मीक भावनेशी काडीमात्र संबंध नाही.)
समाजवाद, भांडवलवाद का ईश्वरवाद ?
आज एकूणच मानवजात, समाज एका विशिष्ठ परिस्थितीस येऊन पोहोचला आहे. आज, समाजाला निर्णय घ्यायची गरज आहे. गेली 10-15 वर्षे, विशेषत: गेली 3-4 वर्षे समाज विविध विचारप्रवाहांमध्ये अडकलेला आहे.

लाखचं घर

लेखक अनामिक यांनी बुधवार, 07/01/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
लाखचं घर म्हणजे लाख रुपयांच घर नाही... लाख हे माझ्या आजोबांच्या (आबांच्या) गावाचं नाव. 'लाख' - यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातलं, दिग्रसपासून जवळ-जवळ १५-२० किमी अंतरावर असलेलं एक खेडेगाव. आबा मी लहान असतानाच वारल्याने या घराशी माझा जास्त संबंध आलाच नाही, त्यामुळे खूप आठवणी आहेत असं म्हणू शकत नाही. पण तरीही या घराचं माझ्याशी असलेलं नातं वेगळंच आहे... कुठंतरी खोल खोल रुजलेलं! माझे काका दिग्रसला राहतात त्यामुळे आम्ही सगळे (भावंडं) सुट्या लागल्या की काकाच्या घरीच जास्त राहायचो.

फर्निचर

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 07/01/2009 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
तुमचे कधी फर्निचर होते का? परवा घाजीनी बघितला. क्निव्नियंट अम्नेशिया बद्दल मला संपुर्ण माहिती आहे. रोज बघतो. टेंपररी अम्नेशिया सुद्धा माहित असावा. त्याची गरज पण होती. एकुलती एक प्रेमळ बायको तीची आई आली रे आली की फितुर का होते हह्याचे उत्तर गेल्या २३ वर्षात मिळालेले नाही. आणि ते आता मिळेल असे वाटत नाही. तसे सासु आल्यावर जेवणाची अंमळ चंगळ असते. पण तेवढेच. कायम केंद्रबींदु रहाण्याची सवय तशी वाईटच. सासरची माणसे घरी आल्यावर मी एकदम नॉर्मल रहातो. पण ते'जावई' 'भावोजी' 'मान' वगैरे बगैरे ची सवय त्यांना मोडवत नाही. मी कितीही सांगितले तरी. त्यामुळे घरात घुसल्यावार अगदी खडे तालीम असते.

असाच एक सुंदर दिवस

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 06/01/2009 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
तस पाहील तर समुद्राच आकर्षण अस मला फारस कधी जाणवलच नव्हत. कदाचित मुंबईचा बरबटलेला समुद्र किनारा आणि गलिच्छ पाणी त्याला कारणीभूत असेल. ती माणस वहावणारी गर्दी अगदी नकोशी वाटायची. मला बघून मुंबईचा समुद्रा केविलवाण हसायचा. म्हणायचा- तरूणपणी माझा रूबाब तू बघायला हवा होतास. किंवा कदाचित माझे गोव्या- कोकणातले भाऊबंद तरी बघायला हवेस तू. आणि असाच एक दिवस अचानकच कोकणात जाण्याचा योग आला. माझ्या आईच आजोळ वेंगूर्ल्याच, तिथेच जवळ उभ्यादांड्याला वडिलोपार्जीत घर. घर म्हणजे अगदी परीकथेच मॉडेल समोर ठेवूनच बांधलेल. समोरच सुंदर सुंदर झाड. आणि परसाच्या बाजूला समूद्र किनारा.

देव पावला!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 05/01/2009 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर महागड्या वस्तू वापरायची आपली लायकी नाही. दुसरं म्हणजे, लहानपणापासून कधी तशी सवय नाही. स्वस्तातल्या वस्तू घ्यायच्या, म्हणजे त्या संख्येनं जास्त घेता येतात, असेच बाळकडू. त्यामुळं आयुष्यात पहिल्यांदा, वयाच्या तेविसाव्या वर्षी स्वतःच्याच पैशांनी सहाशे रुपयांची कॉटन पॅंट घेतली, तेव्हा केवढं अप्रूप वाटलं होतं मला स्वतःलाच! घड्याळं, पेनं, कुठलीच वरच्या श्रेणीतली गोष्ट घ्यायची सवय नव्हती. नाही म्हणायला, अलीकडे, विशेषतः लग्नानंतर बायकोच्या आग्रहाला, हट्टाला बळी पडून कधीमधी अशा खरेद्या करू लागलो होतो. नवीन घड्याळ घ्यायचं बरेच दिवस मनात होतं. पण पुढे ढकलत होतो.

हरीश्चंद्र्गड [१२-१४ डिसेंबर]

लेखक संताजी धनाजी यांनी सोमवार, 05/01/2009 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी नुकताच हरीश्चंद्र्गडावर जाऊन आलो. हा गड माळशेज घाटाजवळ आहे. खरेतर ह्या गडावर मी तिसर्र्‍यांदा जात आहे. परंतु ह्या वेळी तीन दिवसांचा ट्रेक केल्यामुळे गड नीट पाहता आला. खुप मजा आली :) ब्लॉगस्पॉट्वर ब्लॉगही लिहीला आहे. तो इथे वाचा. फक्त छायाचित्रे जूलै मध्ये रतनगडावर जाऊन आलो होतो. रतनगड भंडारदर्‍याजवळ आहे.

कमाल आहे!

लेखक शशिधर केळकर यांनी शनिवार, 03/01/2009 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
(मित्रहो, ही खरेतर स्मृतीतील एक कथा. केव्हा कुठे वाचली, ते लक्षातही नाही. पण कथा मात्र विसरली नाही. अशा कथा खरेतर तुमच्या आमच्या सर्वांच्याच वाचनात येतात. कोणाला हिचा खरा आणि मूळ लेखक आणि मूळ कथा माहीत असेल, तर जरूर सांगावे! कारण हा कथाविषय माझा नाही. जमले आणि लोकाना आवडले, तर अशा कितीतरी स्मृतीआडच्या कथा मिपावर लिहाव्यात असा मानस आहे) तात्याबा भर दुपारी शेतावर काम करत होते. नेहमीचीच संवय त्यांची. दुपारची शिदोरी आटपून विश्रांती वगैरे भानगडीत न पडता कामाला लागावे हाच नेम. विठाबाई कातावून म्हणे, "अहो वयाकडे लक्ष द्यावं जरा.

अण्णांना मानवंदना..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 03/01/2009 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांना मानवंदना..! इच्छुकांनी वरील संस्थळावर येऊन अण्णांना लेखी मानवंदना देण्याचे करावे.. राष्ट्रपतींच्या हस्ते अण्णांना भारतरत्न हा किताब मिळाल्यावर वरील मानवंदनांचे संकलन करून त्या पुस्तकरुपाने अण्णांना देण्याची सदर संस्थळ चालकांची योजना आहे.. आपला, (भीमसेनभक्त) तात्या.

मनाच्या कुपीतले-कोऽहमचा पुकारा

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 01/01/2009 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो नववर्षाच्या शुभ प्रसंगी आपणा सर्वाना वास्तवदर्शी शुभेच्छा देणारा हा लेख . हे लिखाण थेट मनाच्या कुपीतुन उतरलेले.
कोऽहमचा पुकारा
3........ 2......... 1 .......... आणि 2008 साल संपले. वर्तमानातून इतिहासात गेलं. नव्या कॅलेंडरसोबत सर्वांनी नव्या आवेशाने, उमेदीने, जिद्दीने नवे आयुष्य जगायला सुरूवात केली आणि या सालाचा श्री गणेश करताना बहुतेक जण भूतकाळात डोकावले. भूतकाळातल्या घटना भविष्य घडवतात हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच वर्षाअखेरीला घेतल्या जाणाऱ्या या आढाव्याला महत्व आहे.