Skip to main content

प्रकटन

उद ग अम्बे उद ! उद !!

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 14/10/2010 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्र म्हणजे नऊ दिवस देवांनी त्यांच्या सेनेला दिलेलं पृथ्वीच राज्य. माझ्या घरी घट बसवला जायचा, अजूनही बसवला जातो. लहाणपणी ती कापसाची वळलेली नऊ मुठ वात, खास नवरात्रासाठी काढलेला लामण दिवा, या साऱ्याच फार अप्रूप वाटायचं. घटस्थापणे दिवशी संध्याकाळी देवघरात , (आम्ही देव खोली म्हणतो, ही एक छोटीशी देवांची खोली आहे) सारवलेल्या जमिनीवर पत्रावळ मांडली जायची. त्या पत्रावळीवर माती चा छोटासा ढीग रचला जायचा. त्या मातीत वेगवेगळी धान्य पेरून वर पाण्याचा मातीचा घट रोवायचा. ही घट स्थापना. मग वरच्या खुंटीला रोज एक झेंडूच्या फुलांची माला टांगून आज कितवी माळ हे ध्यानात ठेवायचं.

चवींचा "जिव्हा" ळा...... माझ्या मनातला!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी मंगळवार, 12/10/2010 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी लेकीला मस्त भुक लागली होती. कूकर नुकताच झाला होता. पटकन तिला तूप मेतकूट भात कालवून द्यावा असं वाटलं. म्हणून कूकर उघडला..आहाहा...मस्त आंबेमोहोर चा जिवघेणा गंध नाकात शिरला. (उपासाच्या वेळी असले वास जरा जास्तच जिवघेणे वाटतात) तिच्या नेहमीच्या प्लेट मध्ये काढला.त्यावर भरपूर साजुन तुप ओतले.साधारण ४-५ चमचे.मग तो आं.मो.चा गंध अधिकच गहिरा झाला .....त्यात साजुक कणीदार तूप अस मस्त शिरत होतं....आणि त्या तुपाचा रवाळपणा पहिल्या वाफेच्या भाताच्या ताज्या ताज्या गरम पणामुळे असा प्रेमानं विरघळत होता.......आहाहा.... चवीपुरतं मीठ घातलं आणि मेतकूटाची बरणी(आईने दिलेली) काढली.

पुस्तक परिक्षण : "पार्टनर" व.पु. काळे

लेखक सागर यांनी शनिवार, 09/10/2010 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यातच वपुं चे 'पार्टनर' सुन्न मनाने वाचून काढले. भन्नाट पुस्तक आहे. मी खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या शालेय जीवनात वाचली होती. तेव्हाही 'पार्टनर' मस्त वाटली होती. पण त्यातील दाहकता जाणवली नव्हती. काही संदर्भ, अर्थ व भूमिका कळण्यासाठी लग्नाचा अनुभव गाठीशी (किंवा किमान तेवढी मॅच्युरिटी) असल्याशिवाय 'पार्टनर'मधील दाहकता जाणवणे शक्य नाही. पहिल्या ११ पानांतच मी 'पार्टनर' मध्ये गुरफटलो. कुठे मनसोक्त हसलो ... तर कुठे मनसोक्त रडलोही... होय खोटे कशाला सांगू? 'पार्टनर' वाचल्यामुळे असेल कदाचित पण त्यातील रोखठोक पार्टनर चे विचार जळजळीत असले तरी प्रामाणिकपणे पटले.

***जगदंबा ***

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 09/10/2010 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज ठाण्याच्या टेंभी नाक्याला असणार्‍या देवीच्या दर्शनाला जाउन आलो, आणि देवीची प्रसन्न आणि मोहक मुद्रा टिपुन आलो... :) विशेष :--- हा धागा गणपा शेठला समर्पित केला आहे, कारण मी त्याला सांगितले होते की जेव्हा केव्हा मला शक्य होईल तेव्हा मी या देवीचे फोटो जरुर काढीन...आज तो योग आला.

कोहम! कोहम!

लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 09/10/2010 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीत असताना टायटॅनिक पाहिला होता, ईंग्रजी अ‍ॅक्सेंट तेव्हा तेवढा कळत नव्हता, पण आज पुन्हा अचानक पाहिला. मनात अनेक विचार उठले, कल्लोळ जाहला... माजला.... डोकं काम करेनासं झालं... का? कुणास ठाउक... काही काही वाक्ये मनाला स्पर्शुन नाही तर घासुन गेली.. ओरखडली.. इतके विचार कल्लोळ माजवुन गेले.. त्यातलाच एक विचार. (he exists in my memories).. अप्रतिम. त्यावरुन सुचलेलं काहीसं. माणसं... एखादी कुत्री मांजरी मेली तर कदाचित दुख: होणार नाही, पण एखादा रोज दिसणारा भिकारी अचानक गेला तर मनाला हुरहुर लागते. का? कितीही वाईट असो, मित्र, नातेवाईक कोणीही, पण एक नातं असतं जे ओढतं, जवळीक साधतं ते का?

कुल-२

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 08/10/2010 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
पेरेंट ऑफ द इयर ह्या परिक्षेत भाग घ्याल का? हा प्रश्न मी मिपावरील काही असलेल्या,होउ घातलेल्या, नुकत्याच झालेल्या पालकांना विचारला. उतरः नाही.(कारणे वेगवेगळी दिली पण नकार हा कॉमन फॅक्टर होता) ----------------------------------------------------------------------------------------- खालील प्रकटनातले प्रश्न पालकांना विचारले जातात. काही खाजगी शाळातुन तर अगदी 'कठीण' प्रश्न विचारले जातात. 'कठीण' प्रश्न विचारणार्‍या शाळांची फी सुद्धा जरा कठीणच असते.त्यातील काही पालकांना असे प्रश्न विचारले गेले नाही तर आपली फी वसुल झाली नाही असे वाटते.

कुल

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 07/10/2010 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
" द बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर प्राइझ गोज टू मिस...... टाळ्यांच्या कड्कडात 'ग्रे' ने आपले बक्षिस स्विकारले. लेट अस नॉट फर्गेट द पेरेंट्स हु मेड धिस पॉसिबल.....

कधी कधी

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 06/10/2010 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी आयुष्यातल्या दिवसांचे गणित कळतच नाही. कधी कधी सगळं कसं एकाच धाग्यात गुंफल्यासारखं घडत असतं किंवा कधी कधी काहीच घडत नाही बरेच दिवस; नुसतेच दिवस पळत असतात. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे कॅलेंडरची पाने बदलावीत त्याप्रमाणे दिवस उडत असतात. देवासमोरच्या आरतीच्या ताटात कापराच्या वड्या भर्रभर्र जळाव्यात आणि काही क्षणांतच तिथे फक्त काळपट काजळी रहावी किंवा गॅसवर ठेवलेल्या कढईतले पाण्याचे थेंब काही क्षणातच नाहीसे व्हावेत तसं काहीतरी आयुष्यातल्या दिवसांचं होतं कधी कधी. कधी कधी काही दिवस उगीच सगळं बिघडत जातं. अगदी साध्या-साध्या गोष्टी डोक्याला ताप देतात.

मला हे प्रश्न पडतात

लेखक शुचि यांनी बुधवार, 06/10/2010 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
मॉंटेसरीत असताना होळीच्या भूतांना घाबरले होते. तोंडे रंगवलेले, मुखवटे घातलेले लोक, लहान मुलं पाहून मागे मागे जात गेले अन खरोखरच तारेच्या काटेरी कुंपणावर पडले. बरच ओरखडलं होतं, धनुर्वाताची लस टोचून घ्यावी लागली होती. तेव्हा कितीही सांगीतलं असतं की ती भूतं खोटी असतात तरी बालमनाला पटलं नसतं. त्या क्षणापुरता त्यांची विद्रूप, भडक रूपं हेच वास्तव होतं. ___ भविष्यविषयक चिंता , असुरक्षितता मग ती वित्तीय असो वा आरोग्यविषयक या भूतांसारख्याच असतात का? आपलं उरलं सुरलं मानसिक स्वास्थ्य नष्ट करणार्‍या.