Skip to main content

प्रकटन

डोंबिवली कट्टा...भाग २....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 20/05/2013 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बरीच चर्चा आणि व्य.नी.तून असे समजले की, डोंबिवली कट्टा करायला काहीच हरकत नाही.ठरल्याप्रमाणे आपला डोंबिवली कट्टा होणारच. वेळ : संध्याकाळी ७:३० स्थळ : नंदी पॅलेस कसे यायचे : डोंबिवली स्टेशन वरून रिक्षा मिळतात.साधारण ४०रु. होतात.रात्री १२ वाजेपर्यंत नंदी पॅलेस ते डोंबिवली स्टेशन पर्यंत रिक्षा सुरु असतात. खर्चाचा अंदाज : साधारण, दर माणशी ५००ते ६०० रु. येईल. प्रतिसाद देतांना क्रुपया खालील माहिती नक्की द्या.. १. कुठून येणार? (एकाच गावातून येणार असाल तर सोबत मिळू शकते) २.

बालक पालक आणि मी

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 17/05/2013 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
बाप हे दोन प्रकारचे असतात...!! एक बाप तो असतो जो घरी यायची वेळ होताच मुले त्याच्या धाकाने खेळमस्ती दंगागाणी बंद करून अभ्यासाचे पुस्तक उघडून बसतात. तर एक बाप तो असतो जो घरात शिरताक्षणीच त्याची मुले आनंदाने नाचत बागडत येऊन त्याला बिलगतात. शेवटी आपले स्वत:लाच ठरवायचे असते की आपल्याला यातला कोणता बाप बनायचे आहे....!! .............मी एका तत्ववेत्याचा आव आणत, सहा घरची पोरे सांभाळली आहेत अश्या आविर्भावात बायकोला प्रवचन देत होतो. मात्र तिला माझी ही बकबक नाही तर माझ्या तोंडून माझे लहाणपणीचे किस्से ऐकायचे होते. चूक माझीच होती.

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !

लेखक जॅक डनियल्स यांनी शुक्रवार, 17/05/2013 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
(मी पुण्यात असताना, सर्पोद्यानचे सहा वर्ष काम केले, तेंव्हाचे अनुभव संघटीत करून लिहित आहे. हा लेख पूर्वी (दोन वर्ष) माझ्याच कट्ट्यावर (ब्लॉग) प्रकाशित झाला होता, त्यानेच मी या अनुभवांची सुरुवात करत आहे.) आत्ता अमेरिकेमध्ये मला कोणी नवीन पुण्याचे भेटले की माझा त्यांना ठरलेला प्रश्न असतो "तुम्ही पुण्यात कुठे राहतात?" तुम्हाला वाटेल काय साधा प्रश्न आहे . पण तसं नाही. ते जेंव्हा उत्तर देतात तेंव्हा मी त्यांच्या शब्दांबरोबर पुण्याच्या रस्यावर फिरत असतो.

कसं सुचतं हे सगळं ? अहो, ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यातून.

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 15/05/2013 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ' मारा डंख मारा डंख मारा बिछुवा' या धाग्याच्या एका प्रतिसादात 'ढालगज भवानी' यांनी " कसं सुचतं हे सगळं ? असा प्रश्न केला होता, त्याचं उत्तर " अहो, ब्रह्म मुहूर्तावर जाग येण्यातून" असं आहे. कसं, ते सांगतो. 'ब्रम्ह मुहूर्त' ज्याला म्हणतात, त्याची नेमकी अशी काही वेळ (पंचांगातील सूर्योदयाच्या नियत वेळेसारखी) असेल, असे वाटत नाही (असल्यास सांगावे). साधारणत: पहाटे तीनच्या सुमाराची वेळ म्हणजे 'ब्रम्ह मुहूर्त' असे म्हटले जाते. पण मुळात त्या वेळेला 'ब्रम्हमुहूर्त' असे का म्हणायचे ? ब्रम्हदेव हा सृष्टीचा निर्माता. सृजनाचा देव.

एक प्रेम दोन प्रेम तीन प्रेम चार!

लेखक इनिगोय यांनी बुधवार, 15/05/2013 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं शिडीवर चढता चढता सापानं गिळायचा गेम असतं. याच नावाने प्रदर्शित झालेला मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा या विकांताला अखेर पाहिला. गेल्या काही काळात आलेला वैवाहिक नातेसंबंधावर उत्तम भाष्य करणारा हा दुसरा मराठी सिनेमा. . ही अनुश्री, केदार, डॉक्टर रोहित आणि प्रज्ञा या चौघांची गोष्ट आहे.

आपला जल्मोजल्मी ऋणी आहे

लेखक देशपांडे विनायक यांनी मंगळवार, 14/05/2013 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
मोठ्या ,प्रसिद्ध ,VIP अशा लोकांचा परिचय वाचताना ते लोक किती DOWN TO EARTH आहेत याचा उल्लेख येतोच . ही व्यक्ती विशेष नसून त्यांच्या गुणांनी नम्र आहे हे दाखविण्याचा तो एक जाणीवपूर्वक प्रयत्न असतो . मध्यम वर्गातील माणूस विशेष कोणीतरी बनण्याचे गुण अंगी असूनही आहे तसाच राहिलेला दिसतो . मध्यम वर्गात जन्म घेतलेला ,मध्यम वर्गाचे संस्कार पाळणारा माणूस विशेष कसा बनणार ?तो तसाच राहणे हे खरे मध्यमवर्गीय संस्कार लक्षण .

मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 13/05/2013 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
"ओ मारा डंख मारा डंख मारा बिछुवा… तोहरे प्यारके जहर चढे मितवा…" 'अपनीही मस्तीमे झूमते हुए' का काय म्हणतात तसा, आपल्याच धुंदीत, द्रुतगतीनं पायडिलं हाणत, गाणं म्हणत मी घराकडे सायकलत होतो.पोटात भूक खवळली होती आणि केंव्हा घरी पोचून वेगवेगळ्या मस्त रेसिप्या हाणतो, असं झालं होतं. आजची संध्याकाळ माझ्यासाठी 'ये शाम मस्तानी मदहोश किये जा… ' अशी ठरली होती.… दुपारी मला जेंव्हा बायकोनं सांगितलं की "अहो, आज संध्याकाळी पाच ते साडेआठ तुम्ही कुठेतरी एकटेच फिरायला जाउन या" तेंव्हा मी आश्चर्यानं विचारलं, "का गं, आज अचानक एवढी मेहेरबान कशी झालीस माझ्यावर?

मामाचं गाव (आजोबा)

लेखक दशानन यांनी सोमवार, 13/05/2013 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
वाड्याबाहेरील जग सुट्टीमध्ये फक्त कोणी मोठं सोबत असेल तरच पाहता यायचे एवढे कडक निर्बंध लहान मुलांच्यावर होते. रोज संध्याकाळी व्हासा झाल्यावर आजोबा आपली छडी घेऊन बाहेर पडत. ती छडी म्हणे त्यांनी पार्श्वनाथजीला* जाऊन ११ वेळा भगवान पार्श्वनाथ यांचे दर्शन घेतले म्हणून तेथील महाराजांनी भेट दिली होती. आजोबा वाड्यातून बाहेर पडायला लागले की जे कोणी लहान जवळ असेल, मग अक्का असो, सन्मती असो, सरु असो की मी असो. त्यातील एकाला सोबत घेऊन जात. त्यांचा हा रिवाज माहीत असल्यामुळे ते व्हासा करायला बसले की मी त्यावेळे पासून ते बाहेर पडण्यासाठी मोठ्या दरवाजाजवळ येवू पर्यंत मी त्या दरवाज्या जवळच घुटमळत असे.

रंगोली

लेखक सचिन कुलकर्णी यांनी रविवार, 12/05/2013 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहानपणी दूरदर्शनवर रंगोली नेमाने बघायचो. तेव्हा केबल TV हा प्रकार अस्तित्वात नव्हता. नंतर तो कार्यक्रम रटाळ व्हायला लागला (छायागीत आणि चित्रगीत प्रमाणेच). आणि दरम्यान केबल TV चे आगमन झाले. केबलचे आगमन झाल्यावर रविवारचे रंगोली पूर्णपणे सुटले.. (एक अरसे बाद ) ऐन (गद्धे) पंचविशीत माझ्या आयुष्यात एक मुलगी आली. गर्लफ्रेंड का काय म्हणतात तशी. त्यांच्या घरी केबल नव्हते. ती रंगोली नेमाने बघायची आणि तिचा तो favorite कार्यक्रम होता. (तोवर गुणवत्ता परत सुधारली होती कार्यक्रमाची - चांगली गाणी, आपकी फर्माईष,वैगेरे). तिच्या नादाने मी रंगोली परत बघायला लागलो.

मग पुन्हा सामसूम...!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 09/05/2013 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी निवांत, निर्मनुष्य ठिकाण..निवांत पहुडलेल्या रेल्वे लाईनी... त्यांचा एकमेकींशीही काही संवाद नाही.. दिसभर बोलणार तरी काय एक-दुसरीशी आणि किती? एकाकीपणा.. अगदी तासंतास...! आणि मग अचानक एक उत्साहानं भरलेलं धावतं विश्व येतं.. विलक्षण उत्साह.. विलक्षण गती.. ! नानविध लोकांनी भरलेलं, गजबजलेलं एक धावतं विश्व.. कोण आहेत ही नानविध लोकं? ती द्योतक आहेत..