Skip to main content

प्रकटन

त्रैराशिक

लेखक सदस्यनाम यांनी रविवार, 26/07/2015 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर. इथल्या शतशतशब्द कथा वाचून मला पण काही लिहावसं वाटलं. त्यात त्रिशतशब्दकथा असा प्रयोग केलाय. व्याकरणाच्या चुकाबद्दल क्षमस्व. पहिल्या लेखनाचे स्वागत कराल अशी अपेक्षा. ________________________________________________________________________ ह्यालो बोल ग हिरॉईन आयक की रव्या. मला कनाय राव्हल्या भेटला होता. तूच बोंबलत गेली आसचील. आता म्या नाहीना गावात. काय भरोसा नाय तुझा. हा. तू लै शिटीत सवळाच राह्यलास जनू. मी हाय म्हनून नायतर छप्पन्न फिरतेत माझ्यमागं. हा म्हैते लै फेरनलवलीची औलाद. ते जौ दे. पह्यले मला सांग किती मरतोस माझ्यावर? म्या व्हय? समज बत्तीस जीबी तर आसंन.

रीत

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 26/07/2015 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
शहरात राहून आपण आपल्या जाणिवा विसरलोय, वगैरे उगाच लंब्याचौड्या उच्चभ्रू बाता मी मारणार नाही. पण शहरात राहून मी गावातल्या जीवनापासून युगानुयुगांच्या अंतराइतका दूर आहे हे मात्र नक्कीच. अर्थात, हे साहजिकच आहे. त्यात काही फार चांगलं किंवा फार वाईट असं नाहीच. पुण्यात राहून अमेरिकेतलं जीवन अनोळखी आहेच की. अडीचशे किलोमीटरवर असलेलं माझ्या वाडवडीलांचं गावसुद्धा आता मला अनोळखीच. (अमेरिकाच जवळची तुलनेने.) मागच्या आठवड्यात गावाला जायचा योग आला. रस्त्यात असताना एका मित्राबरोबर व्हॉट्सपवर काही तरी टिवल्या बावल्या चालू होत्या. गावात कसं सगळं इनोसंट, छान छान असतं असा काहीसा सूर त्याने लावला होता.

( स्टार्कची लेकरे )

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 23/07/2015 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यात राजसिंहासन-क्रिडा* शी संबंधित, दिव्यपटलावर काही दृष्टांत बघत होतो. (*ह.ब.ओ.उक्त राजसिंहासन प्राप्त्यर्थम्, प्राप्तसिंहासन चीरकाल संरक्षणार्थम्, अंतर्बाह्यरिपू नाशार्थम् पातकक्रिडा. इतिः हिम अग्नी सुगमगीत ) जाणकारांमध्ये विंटरफेलचा सुभेदार, उत्तरदिगरक्षक स्वामी एडार्ड स्टार्कच्या लेकरांसंदर्भात बरेच मतभेद असले तरी एका बाबतीत एकवाक्यता आढळते की जॉन स्नो हा स्टार्क वंशाशी संबंधित होता. राजसिंहासन-क्रिडा* मुळात वास्तवात घडले की नाही ही चर्चा आपण तुर्तास बाजुला ठेउयात.

आमची(ही) निष्काम साहित्यसेवा : पूर्वप्रकाशित

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 17/07/2015 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक झुक्याच्या थोबडापुस्तकाने दोन-तीन वर्षांपूर्वी लिहीलेल्या एका लेखाची आठवण करून दिली. हा लेख त्यावेळी देवकाकांच्या होळी विशेषांकासाठी लिहीला होता. त्यामुळे तो अंक आनि माझा ब्लॉग सोडला तर इतरत्र कुठेच प्रकाशित केल्याचे आजतरी आठवत नाहीये. म्हणून हा जुनाच लेख आज पुन्हा मिपाकरांसाठी इथे पोस्ट करतोय. कोणी आधी वाचला असेल तर क्षमस्व ! ************************************************************************** लिहायला सुरूवात करून आता बरीच वर्षे झाली. आधी आम्ही काय लिहीतोय हे कुणालाच कळायचं नाही…..(कधी कधी आम्हालाही नाही)! कारण आमचे लेखन नेहमीच कधी चि.वि., कधी द.मा.

चाळीतील आठवणी: भाग दुसरा

लेखक भिंगरी यांनी गुरुवार, 16/07/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीतील आठवणी जलाविभाग आणि बांधकाम विभाग असे आम्ही राहत असलेल्या बी.एम.सी. वसाहतीचे दोन भाग होते. माझे वडील जल विभागात होते. ह्या विभागात साहेबासाठी (इंजिनियर) एक भव्य ब्रिटिशकालीन बंगला होता व कर्मचार्‍यांसाठी दोन चाळी होत्या. एकूण १० कुटुंबे ह्या विभागात होती. बांधकाम विभाग मोठा होता व त्यात २५-३० इंजिनीअर व कर्मचारी होते. जल विभागात कार्यालय व कर्मशाळा आमच्या चाळीला लागूनच होत्या. तानसा व वैतरणा जलाशयातून मुबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भल्या मोठ्या जलवाहिन्यांची देखभाल करणारे कामगार वसाहतीच्या २-३ कि मी.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … ३ (अंतिम )

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 16/07/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ (अंतिम ) भाग १ भाग २ २०१५ आज ३२ वर्षानंतरही संस्था वाढवण्याची स्पर्धा कमी होत नाही. कापड गल्लीत अजून एक कापडाचं दुकान चालतंच ! किंवा अजून थोडं वेगळं उदाहरण. एखाद्या मंदिरात जत्रेनिमित्य लाखोंची गर्दी होणार, आणि येणारा प्रत्येकजण एक प्रसादाचा नारळ घेणार असेल तर नारळाची भरपूर दुकाने निघणारच. काहीजण चार दुकाने टाकणार तर कुणी फक्त भांडवल टाकून दुकान दुसऱ्याला चालवायला देणार. विशिष्ठ लोकेशनच्य दुकानाचे अन ओरडणाऱ्याचे जास्त नारळ खपणार.

साहित्य संपादकीय आवाहन

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी बुधवार, 15/07/2015 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मित्रमैत्रिणींनो,
साहित्य संपादक मंडळाची स्थापना काही विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. त्यामधले महत्त्वाचे उद्देश म्हणजे नव्या मंडळींना मिसळपाव वर स्वतःचं लेखन करायला प्रोत्साहन देणे आणि त्यासंदर्भात लागेल ती मदत करणे हे होत. इथल्या नव्या आयडींनी मोडकं-तोडकं का होईना पण लेखन करायला सुरुवात करावी अशी अपेक्षा आहे. तुमच्या चुका सुधारून घ्यायला आणि तुम्हाला मदत करायला दोन्ही संपादक मंडळं तयार आहेतच.

आयटीने काय(काय) दिले

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 14/07/2015 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
“तुम्हा आयटीवाल्यांनी महागाई वाढवून ठेवली आहे” आयटीवाले लोक शनिवारी रिकामेच असतात असा पक्का समज करुन आमच्या सोसायटीतले काका मला फाइलवर घेत होते. आयटीवाल्यांनी महागाई वाढवली हे माझ्यासाठी नवीनच होते. मी आपला समजत होतो की तो राजन ते Repo rate, CRR या न समजनाऱ्या इंग्रजी शब्दांत जो काही खेळ करतो त्यानेच महागाई वाढते किंवा कमी होते. “तसे नाही हो काका महागाई मागणी पुरवठ्याने वाढते. आयटी तर आताच आली महागाई तर केंव्हापासून वाढतच आहे.” “तुम्ही नका कबूल करु पण महागाई वाढली ती तुम्हा आयटीच्या लोकांमुळेच. तुम्ही आयटीवाले दोघेही नोकरी करनारे.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … २

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 14/07/2015 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ २००० मागील भागात पाहिलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी तंत्रशिक्षणाचा हळूहळू दर्जा खालावत गेला. पण सगळं वाईटच आहे का? तर नाही. म्हणजे बऱ्याच अंशी चांगल्या संस्थांची गरज होती. पण चांगल्या चार- पाच आणि वाईट पन्नास असं झाल्यानं हे सगळे क्षेत्रच वाईट असा समज झाला. काय निवडावं लोकांना कळेनासं झालं. गावातलं कॉलेज - राहायचा खर्च नको व्हायला म्हणून जवळ प्रवेश घेतला तर स्पर्धेत मागे पडतो आणि पुण्यात जाउन घ्यावं तर अतिसुमार ठिकाणी मिळते आणि हे नंतर कळते! अशा पेचात ग्रामीण भागातली मुलं फ़सतात.