श्रीगणेश लेखमाला ६ : कथा एका आयुर्वैद्याची (संवादमालिका)
काळ - वर्ष १९९२
(ट्रींग ट्रींग! ट्रींग ट्रींग!!)
"हॅलो! नमस्कार!"
"अरे मी अरुण बोलतोय. काय म्हणतायत चिरंजीव? काल बारावीचा रिझल्ट लागला ना?"
"हो ना! रिझल्ट चांगला आहे पण नेहमीप्रमाणे अडनिडा आहे..."
"अडनिडा? का रे? पास झालाय ना? किती टक्के मिळालेत?"
"पास झालाय रे. टक्केही चांगलेच आहेत, पण मेडिकलची अॅडमिशन हुकतेय. त्यासाठी थोडे टक्के कमी पडतायत."
"मग आता विचार काय आहे?"
"तशी त्याला नाशिकच्या फार्मसी कॉलेजात अॅडमिशन मिळालीय. उद्या सकाळी तो आणि मी निघतोय नाशिकला जायला."
"अच्छा, पण मला सांग, त्याला मेडिकलला जायचंय ना?"
"त्याला जायचं असून काय उपयोग?
मिसळपाव