श्रीगणेश लेखमाला १० : कंपनी सेक्रेटरी
मी वाणिज्य शाखेत पदवी घेणार, हे मी आठवी-नववीत असताना मला कळून चुकले होते आणि सी.एस. करणार हे अकरावीमध्येच कळले होते; त्याचे कारण माझे नियोजन खूप सुबद्ध होते आणि ध्येय खूप उत्तुंग होते आणि त्याच्याकडे मी खूप आधीपासून वाटचाल सुरू केली होती, असे लिहिण्याचा मला खूप मोह होतो आहे. पण प्रत्यक्षात तसे काही नव्हते. खरी गोष्ट अशी आहे की आठवी-नववीतच माझ्या गणितातले भ्रमांचे भोपळे फुटायला लागले (म्हणजे उत्तर पत्रिकेवर भोपळ्यांची संख्या लक्षणीय असायची) आणि पट्टीच्या साहाय्यानेसुद्धा एक सरळ रेष काढताना नाकी नऊ यायचे. त्यामुळे गणिताची गरज असणारे इंजीनियरिंग आम्ही आयुष्यातून वजा केले.
मिसळपाव