लाज कुणाला
शतशब्दकथा-- वेल्लाभटांच्या "थक्क करणारी एक घोडदौड" धाग्याला प्रतिसाद देताना सुचलेली(सत्यकथा)
माझ्याकडे तब्येत बरी नाही म्हणून आलेला एक माणूस. वय वर्षे ५७. करत काहीच नाही.
पूर्वी काय करत असे सुतार काम. आजकाल काम झेपत नाही. केंव्हापासून १२ वर्षेपासून.
कारण?
बायको म्हणाली त्यांची तब्येत बरी नसते ना?
तब्येत बरी नसते म्हणजे काय?
मी त्याच्या दहा वर्षात झालेल्या सर्व तपासण्याचे बाड अथपासून इतिपर्यंत पाहिले.
कुठेच काही नव्हते.
आमच्या आईच्या शब्दात -- त्याचे "सुख" दुखत होते.
याला दोन मुली कमावतात आणी बापाला पोसतात.
बापाने मुलीना सांगितलेले तुमच्या लग्नाचे तुम्ही पहायचे.
मिसळपाव
कृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो.
तुम्ही आंबा कसा खाता?
आंबा घातलेल्या इतक्या पाक्रु बोर्डावर आल्यात की आता पब्लिक नुसता आंबा कसा खातात असे प्रश्न विचारायला लागली.मन एकदम गावच्या आठवणीत रमले आणि जिलबी पाडायचे ठरवले :)
आंबा हे इतके प्रिय फळ आहे की ते वर्षभर का मिळत नाही, ह्याची नेहमी हुरहुर लागून राहते.त्यात आंब्याच्या इतक्या जाती की बघायला नको. कोकणात आंब्याची नावे पण विचित्र असतात.