Skip to main content

माहिती

महेश लंच होम..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 28/10/2011 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
महेश लंच होम हा मुंबईतला एक बर्‍यापैकी जुना ब्रँड आहे. मुंबईत फोर्टात ७७ साली पहिलं महेश लंच होम निघालं आणि तेव्हापासून जुहू सेंटॉरला लागून, अंधेरीला साकीनाक्याजवळ, ठाणे आणि पुणे अशा अजून चार ब्रांचेस त्यांनी काढल्या. एकदोनवेळा यातल्या ठाणे ब्रांचमधे गेलो होतो. पण तब्ब्येतीत नीट खाण्याचा योग आला नव्हता. म्हणून मग पाचसात मित्रलोकांनी कुठे जायचं असा चॉईस आला तेव्हा मी "महेश लंच होम" असं नाव घेतलं. आता "महेश लंच होम" या नावावरुन साधारण एक खानावळवजा थाळी हॉटेल डोळ्यासमोर येईल की नाही? पण हे त्याच्या अगदी विरुद्ध आहे. एकदम हाय-फाय.

मराठी विज्ञान परिषद - निमंत्रण

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 26/10/2011 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजच एक स्नेह्यांकडून हे खालील निमंत्रण मिळाले. मराठी विज्ञान परिषदेकडून आलेले असल्याने मराठी बाण्यावाल्या आपल्या मिपाकरांना हे पाठवत आहे. जर अधिक माहिती साठी तुम्हाला निमंत्रण पत्रिका (पीडीएफ) हवी असेल तर मला खरडीवर/व्यनिने कळवा आणि मी तो संदेश आपल्या पत्त्यावर ढकलून देईन. ----आलेला निरोप येथे सुरु----- नमस्कार, ४६ व्या अ. भा. विज्ञान अधिवेशनाचे निमंत्रण सोबत पाठवत आहे. आपण या कार्यक्रमास जरुर यावे. आपल्याला शक्य असेल तर पुर्णवेळ प्रतिनिधी म्हणून नोंदणी करावी ही विनंती. -विनय र. र.

अक्साई चीन्

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 25/10/2011 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्यांदा "अक्साई चीन" हा शब्द वाचला-ऐकला होता तेव्हा एक परिचित "हा चीनने भारताचा ढापलेला प्रदेश आहे" अशी माहिती मला तावातावाने देत होते. अर्थातच या भागाबद्दल बाकी कोणतीही माहिती न देता सदर परिचितांच्या चर्चेची गाडी नेहरूंवर घसरली आणि जणू काही नेहरू नसते तर अक्साई चीन आपल्याकडून सुटला नसता अश्या आविर्भावात ते तावातावाने बोलत होते. त्यांच्या भावना प्रामाणिक होत्या मात्र त्या इतक्या खोलापर्यंत पोचल्या होत्या की त्यांच्या लेखी सत्य काय हे जाणण्यापेक्षा तत्कालीन राजकारण्यांवर राग व्यक्त करण्याचे साधन इतकेच महत्त्व 'अक्साई चीन' चे राहिले होते.

आदित्य : युद्ध अंधाराविरुद्ध

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी सोमवार, 24/10/2011 13:51 या दिवशी प्रकाशित केले.

आदित्य ही कादंबरी मी सर्वप्रथम ऑक्टोबर २००० मध्ये वाचली. अरूण हेबळेकर यांच्या अनेक कथा कादंबर्‍या मी त्यापूर्वी वाचल्या होत्या आणि त्यानंतरही वाचल्या आहेत. त्यापैकी जवळपास सर्वच रंजक आहेत पण आदित्यचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे की त्यानंतर गेल्या अकरा वर्षांमध्ये मी ही कादंबरी एकूण बारा वेळा वाचून काढली आहे. या कादंबरीत असे काय आहे? म्हंटले तर विशेष काही नाही. म्हणजे खटकेबाज संवाद, रोमांचक मारामारीची वर्णने, बोजड तत्वज्ञान, रोमॅंटिक / श्रुंगारिक वर्णन करणारी वाक्ये ही सहसा यशस्वी कादंबर्‍यांमध्ये आढळणारी वैशिष्ट्ये; पण आदित्य मध्ये यातले काहीच नाही.

जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक - "दीपज्योती २०११"

लेखक सुहास झेले यांनी शुक्रवार, 21/10/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बनलेला, जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक, ’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे असे आम्ही जाहीर करत आहोत...खालील दुव्यावर तो आपल्याला वाचता येईल. http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html काय आवडलं/नावडलं, काय चुकलं/काय बरोबर आहे, ते नि:संकोचपणे सांगा.

माळशेज - शिवनेरी सहल. सप्टेंबर २०११

लेखक कौन्तेय यांनी रविवार, 16/10/2011 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
माळशेज - शिवनेरी सहल. सप्टेंबर २०११ रामराम! सप्टेंबरात मिपा.करांकडून माझ्या माळशेज सहलीबाबत कौल मागितला होता ( http://www.misalpav.com/node/19017 ). त्यावेळी शैलेन्द्र, अजितजी, वल्ली, विक्षिप्त अदिती, योगप्रभू, परीकथेतील राजकुमार नि सुनील यांच्या उद्बोधक तर बाकी बऱ्याच जणांचा रंजक प्रतिक्रीया आल्या. त्यां सगळ्यांवर विसंबूनच आमची सहल सुरू केली आणि सुफ़ळ संपूर्णही झाली. सर्वांना धन्यवाद! मुंबई - नाणेघाट रस्त्यावरचा जलविहार - माळशेज - मुक्काम - शिवनेरी - माळशेज - विश्रांती - मुंबईप्रस्थान असा कार्यक्रम केला.