Skip to main content

माहिती

"द जर्नी होम - ऑटोबायोग्राफी ऑफ अ‍ॅन अमेरिकन स्वामी"

लेखक प्रास यांनी बुधवार, 02/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
तसं मी फारसं इंग्रजी वाचन करत नाही. वाचनाचा वेग कमी पडतो हे कदाचित कारण असेल पण मुद्दाम इंग्लिश साहित्याचं वाचन होत नाही हेच खरं.

येद्या मुग्या

लेखक भास्कर केन्डे यांनी मंगळवार, 01/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य टिळकांच्या झंझावाताने देश प्रेरीत झाल्याचा तो काळ होता. १९१७-१९१९ याकाळात कधितरी लोकमांन्यांचा मराठवाड्याचा दौरा होता. त्यात काही दिवस त्यांनी बीड जिल्ह्याला दिले. बीडजवळील महुज या गावी लोकांना मार्गदर्शन करुन टिळक लोकांशी संवाद साधत होते. त्या दरम्यात भारावलेले दोन तरुण त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी. त्या तरुणांची नावे येदू/यदुनाथ (आडणाव, बहुतेक खाडे) व मुग्या (याचे नाव खूप जणांना विचारले पण कुणी सांगू शकले नाही; आडनाव बहुतेक थोरात असावे). असे म्हणतात की भेटीत टिळकांनी या दोन रांगड्या तरुणांना शोषित-पिडीत समाजासाठी कार्य करायचा सल्ला दिला.

राजकीय द्रुष्टीकोन

लेखक राजघराणं यांनी मंगळवार, 01/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : विनोद वाचून सोडून द्यावा. कुणीही भावना दुखावून घेउ नये. आटपाट नगर होतं तिथं चार भाउ आपल्या आई वडिलांबरोबर सुखाने राहत होते. होत्याचं न्हवतं झाल. वडिलांच निधन झाल. वडिलांकडे होत्या दोन गायी ..... भाउ चार.... बहुत नाइंन्साफी..... प्रकरण पेटलं.. सरकारात गेलं.. सरकारी निवाडा दिला - मोठ्या भावाला एक गाय .. उरलेल्या तिन भावांना मिळून .. एक गाय. सगळ्यांनी गुण्या गोविंदानि रहावं !............... (नारायण ... नारायण....वरतुन मुनी सारं पहात होते.... अजब हा न्याय ? नारायण ... नारायण... ही काय न्यायाची रीति ? नारायण ... नारायण... उठा मालक ऊठा ...नारायण ... नारायण... """" सारख उठा ऊठा करू नको रे । मला आवडत नाही तो शब्द । """" नारायण ... नारायण... ह्यापेक्षा कलियुग परवडले म्हणायचे... सरकारी निर्णय आवडला नाही तर सरकार बदलायचं स्वातंत्र्य आहे तिथे... वेगवेगळे पक्ष .. त्यांची वेगवेगळी विचारसरणी .... आइकलं का महाराज ? ""''''' कटकट पुरे । मुद्द्यावर ये । """" नारायण ... नारायण... आमुचा तिन्ही लोकी तिन्ही काळी संचार.... नारायण ... नारायण... थांबा.. थांबा... कलियुगातल्या भारतवर्षात्ल्या प्रत्येक पक्षाने हा गायींचा निवाडा कसा केला असता... ते ऐकवतोच तुम्हाला .... )

रस्सा.. मराठमोळी मेजवानी !!

लेखक सुहास झेले यांनी सोमवार, 31/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
गविंनी खादाडी पोस्टचा सपाटा लावल्याने, त्यात अजुन एक भर.... ;) मुंबई पश्चिम उपनगरात मराठमोळी खाण्याची ठिकाणे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच... त्यात आणखी एक भर म्हणजे हे हॉटेल. पाच तरुण मराठी मुलांनी एकत्र येऊन केलेला हा प्रयत्न. हॉटेलचं नाव हे या पाच मुलांच्या नावाच्या आद्याक्षारांपासून बनले आहे.... रस्सा...!! मराठमोळी मेजवानी चारकोप, कांदिवली (पश्चिम) येथे.. PF ऑफिसच्या बाजूला हे छोटेखानी हॉटेल आहे. शाकाहारी आणि मांसाहारी, असं दोन्ही प्रकारचं उत्तम जेवण इथे मिळतं. चिकन थाळी, सुरमई थाळी, वांग्याचे भरीत, झुणका निव्वळ अफलातून... इथे पदार्थांचे खूप कमी फोटो दिले आहेत...

सुगरण..

लेखक गवि यांनी सोमवार, 31/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दोनतीन हॉटेलं वाईट निघाल्यामुळे आता पुढचं किमान बरं निघावं अशी इच्छा होती. लाऊंज, बिस्त्रो, फाईन डाईन, कॅफे अशा टाईपच्या हॉटेलिंगमधून ब्रेक घेऊन एखाद्या झणझणीत आणि खानावळवजा ठिकाणावर धाड टाकायची ठरवली. कुठेतरी ऐकलेल्याच्या आठवणीवरून पुण्यात पेरुगेट पोलीस चौकीजवळ असलेलं सुगरण गाठायचं ठरवलं आणि गल्ल्या शोधत तिथे पोहोचलोसुद्धा.. एका गाळ्याएवढा एंट्रन्स दिसत होता. माझ्यासारख्या प्रशस्त माणसाला बसायलातरी पुरेशी रुंदी असलेली जागा आत असेल का असं वाटत वाटत आत शिरलो. वरती बोर्ड लावला होता त्यावर "सुगरन्स कोल्हापुरी नॉनव्हेज" असं लिहिलं होतं.

होमी जहांगीर भाभा

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 30/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आज, ३० ऑक्टोंबर रोजी, होर्मसजी जहांगीर भाभा यांचा जन्मदिवस आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर यांसारख्या भारतातील अग्रगण्य संशोधन संस्थांचे ते संस्थापक होते. त्या संस्थांमध्ये आजही हा दिवस ’फाऊंडर्स डे’ म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. भाभांना भारतीय अणुऊर्जेचे जनक मानले जाते.

नावडतीचे मीठ अळणी!

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 29/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नावडतीचे मीठ अळणी!
‘नावडतीचे मीठ अळणी’ म्हण सहज आठवली... पुरुषांना एक आवडती तर दुसरी नावडती असे असते. निदान खाण्याच्या बाबतीत तरी. एक आई व दुसरी पत्नी. पैकी कोणीतरी आवडते असेल तर दुसरे नावडते ठरते. एकीचा स्वैपाक मिळमिळीत तर दुसरीचा चवदार वाटतो. नावडतीने कितीही मनलाऊन पदार्थ बनवला तरी त्यात काहीतरी उणे काढले जाते असे म्हण सुचवते. असो. तीच गोष्ट अन्य ठिकाणीही लागू होते असे व्यवहारात दिसते. एखाद्या गोष्टीचा तिटकारा निर्माण झाला की त्याला नावे ठेवण्यासाठी मनात कल्पना विस्तार सुरू होतो. नाडी ग्रंथांना असेच नावडतेपण सहन करावे लागते.

महेश लंच होम..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 28/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
महेश लंच होम हा मुंबईतला एक बर्‍यापैकी जुना ब्रँड आहे. मुंबईत फोर्टात ७७ साली पहिलं महेश लंच होम निघालं आणि तेव्हापासून जुहू सेंटॉरला लागून, अंधेरीला साकीनाक्याजवळ, ठाणे आणि पुणे अशा अजून चार ब्रांचेस त्यांनी काढल्या. एकदोनवेळा यातल्या ठाणे ब्रांचमधे गेलो होतो. पण तब्ब्येतीत नीट खाण्याचा योग आला नव्हता. म्हणून मग पाचसात मित्रलोकांनी कुठे जायचं असा चॉईस आला तेव्हा मी "महेश लंच होम" असं नाव घेतलं. आता "महेश लंच होम" या नावावरुन साधारण एक खानावळवजा थाळी हॉटेल डोळ्यासमोर येईल की नाही? पण हे त्याच्या अगदी विरुद्ध आहे. एकदम हाय-फाय.