Skip to main content

माहिती

आमंत्रण - जीवनशाळांचा बालमेळा!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 11/01/2012 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनशाळांच्या मुलांचं दरवर्षी एखादं संमेलन भरत असतं. त्याला नाव असतं 'बालमेळा'. त्यात या शाळेतील मुलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. त्याजोडीनेच त्यांचा क्रीडामहोत्सवही असतो. यंदा हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी येथे, गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१२ ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवसात होणार आहे. या निमित्ताने नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सर्वच सुहृदांना आमंत्रण दिले आहे.

‘निया’ मधल्या लाकडी पाट्या

लेखक ए.चंद्रशेखर यांनी बुधवार, 11/01/2012 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
सातव्या शतकाच्या सुरूवातीला (602-664) होऊन गेलेला ह्युएन त्सांग (Xuenzang) हा प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्कू आणि पर्यटक बहुतेक सर्वांना माहीत आहे. 17 वर्षाच्या कालखंडात त्याने भारतभर केलेला प्रवास आणि बौद्ध धर्माच्या सूत्रांच्या प्रती काढण्यासाठी त्याने केलेले परिश्रम हेही प्रसिद्धच आहेत. त्याने आपल्या प्रवासाचे अत्यंत बारकाईने केलेले वर्णन हा त्या काळच्या भारतातील परिस्थितीचे ज्ञान करून घेण्याचा एक सुलभ मार्ग मागची 1400 वर्षे जसा होता तसा आजही आहे. हा बौद्ध भिक्कू चीनहून खुष्कीच्या मार्गाने भारतामधे आला, फिरला व चीनला परत गेला.

चित्रपट ओळख - द लास्ट सामुराई

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 11/01/2012 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
इशारा : या लेखात चित्रपटाच्या शेवटाबद्दल माहिती कळू शकते. *** They say Japan was made by a sword. They say the old gods dipped a coral blade into the ocean and when they pulled it out, four perfect drops fell back into the sea. And those drops became the islands of Japan.

नृपशंभू- छत्रपती संभाजी !

लेखक मालोजीराव यांनी मंगळवार, 10/01/2012 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यातील अनेक पैलूंपैकी एक म्हणजे त्यांच्यात दडलेला 'साहित्यिक' , त्यांच्या परमप्रतापी कारकीर्दीमुळे असेल,त्यांच्या छत्रपती असण्यानी असेल किंवा इतिहासकार,नाटककारांनी त्यांच्यावर जी गरळ ओकली त्यामुळे असेल... त्यांच्यातला साहित्यिक फारसा लोकांपुढे आला नाही. ८-१० लाखांच्या मोगली सैन्याशी लढा देणाऱ्या या छत्रपतीने 'बुधभूषण' हा संस्कृत तर सातसतक,नखसिख आणि नायिकाभेद हे ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिले. यापैकी बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ आहे, यामध्ये राज्य

चितळेबाबा सांगतायत स्वरक्षणाच्या युक्त्या

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 07/01/2012 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, पुज्य चितळेबाबांच्या गिरनारची यात्रा आपण वाचलीत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू सादर करत आहे. दरवर्षी चितळेबाबा आमच्याकडे गणेशोत्सवात आरास व मुर्तीच्या दर्शनाला येतात. २०११ मधील उत्सवात, त्यावेळी आमच्या सुनबाईंनी नुकत्याच सजवलेल्या हॉलची पहाणी करायला बाबा आवर्जून आले होते.

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (श्रावणबेळगोळ) भाग - ४

लेखक दशानन यांनी शनिवार, 07/01/2012 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागात आपण बेल्लुर पाहिले. आता म्हैसूरपासून ९०-९५ कि.मी. दूर असलेल्या विंध्यगिरी पर्वतावर जैनधर्मियांचे मोठे तिर्थक्षेत्र आहे श्रावणबेळगोळ. मराठी माणसाला श्रावणबेळगोळ व तेथील गोमटेश्वराची मुर्ती माहिती असण्याचे कारण म्हणजे त्या मुर्तीच्या पायथ्यावर मराठीमध्ये केलेले शिलालेखन. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांना ही माहिती सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचा मान जातो.

महात्मा गांधी.. एक विचार

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 06/01/2012 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
नोट : सदर लेखन हे माझे नसुन माझा नेट फ्रेंड 'दिपक साळुंखे' याचे आहेत. हे लेखन येथे देण्याचे कारण फक्त येव्हडेच आहे कीहे लेखन वाचुन कोणा एकाच्या जरी विचारात बदल झाला तर या धाग्याचे उद्दीष्ट्य साध्य होयील. तसेच मागे एकदा सांगितल्या प्रमाणे गांधीजींच्या बद्दल असणारा विचार माण्डणार असे बोलण्याने हा धागा देत आहे. पार्श्वभुमी : मी अगोदर गांधीजींचा उल्लेख आजचे कित्येक तरुण मंडळी करतात तसाच "टकल्या" म्हणुन करायचो. तेव्हा "मी नथुराम गोडसे बोलतोय.." नाटक पाहिलं होतं आणि त्याच्या प्रचंड प्रभावाखाली होतो.