Skip to main content

माहिती

कर्नाटक सरकारचा भानामतीचा ‘बुद्धिवादी शोध’ विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण ८. ---

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 17/02/2012 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, विवेक खोतांनी करणी / भानामती असा धागा काढून त्यांना आलेला विलक्षण अनुभव सादर केला. त्यानंतर अनेकांनी आपापल्या अनुभवांची त्यात भर घातली. त्यावर नेहमीप्रमाणे उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. त्यात गविंनी त्यांना सुचवले, “आपण करणी वा भानामती खरी असते असे न बिचकता खणखणीतपणे म्हणा व त्यावर चर्चा करायला टाका”. आत्मशून्यांनी म्हटले, “भानामती /करणीचा तर स्वतःला मला अनुभव नाही पण लोकांचे किस्से जबरदस्त बुचकळ्यात पाडतात”.

पोथ्यांचा अमूल्य खजिना

लेखक निनाद यांनी गुरुवार, 16/02/2012 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
पोथ्यांचा अमूल्य खजिना एचपीटी कॉलेजमधील भाऊसाहेब वर्तक ग्रंथालयात असा जतन केले आहे हे वाचून अतिशय आनंद झाला. आंतरजालावर शोध घेतांना मला हा दुवा आढळला. ही माहिती इतरांनाही व्हावी म्हणून दुवा आणि लेख येथे देत आहे. अभ्यासकांना त्याची मदत होईल अशी आशा आहे. लेखाच्या शेवटी लेखिकेचा संपर्कही आहे. (श्री शरद यांनी मागे काजळाची शाई वापरून पाण्यातही अभंग सुरक्षित ठेवण्याचा प्रयोग केला होता. त्या प्रयोगाशी हे सुसंगत असल्याने यांना हा दुवा पाठवला होता. त्यांनी तो सर्वांनाच उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले म्हणून देत आहे.

मेमरी कार्ड वापरता ? .......हे माहित आहे का?

लेखक कोल्हापुरवाले यांनी बुधवार, 15/02/2012 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या पैकी असे बरेच लोक आहेत जे मेमोरी कार्ड वापरतात. आज काल बर्याच प्रमाणात ओंनलाइन शॉपिंग केलं जात. बऱ्याच वेब साईट्स वर कमी किमती मध्ये अशी उत्पादने विकली जातात. जेव्हा आपण कार्ड विकत घेत असतो तेव्हा फक्त "किमंत" हा निकष लावला जातो. पण बर्याच लोकांना हे कदाचित माहित नसाव कि जे कार्ड आपण वापरतो त्याचे बरेच प्रकार असतात. मेमरी कार्ड चे वेगवेगळे क्लास असतात तुम्हाला असा जाणवलं आहे का तुम्ही घेतलेलं नाव कोर कार्ड खूप स्लो आहे.? फोटो काढला तरी सेव व्हायला खूप वेळ लागतो? या सगळ्याला १ गोष्ट जबाबदार असते ती म्हणजे मेमोरी कार्ड चा क्लास. आता म्हणाल त्याचा आणखी कसला क्लास ?

ईश्वरवाद्यांची ‘अंधश्रद्धा’ आणि बुद्धिवाद्यांचा ‘डोळसपणा’ - प्रकरण 7

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 12/02/2012 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन - प्रकरण 7
ईश्वरवाद्यांची ‘अंधश्रद्धा’ आणि बुद्धिवाद्यांचा ‘डोळसपणा’
ज्ञान तपस्वी प्रा.

फुलांची महामंडई-मार्केट यार्ड-पुणे

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 11/02/2012 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
मार्केट यार्ड...पुणे हे एक संपुर्ण वेगळं जग आहे...त्या विषयीचा लेख लिहायचा म्हणजे कमितकमी तिथला १वर्षाचा(१२महिने/२४तसाचा) परिपुर्ण अनुभव हवा...पण आज आपण जी सचित्र ओळख करुन घेणार आहोत तो या अ-खंड मार्केटयार्डचा शतांश आहे असं मानलं तरी चालेल...हे आहे फुलांचे मार्केट ऊर्फ फुलांची महामंडई(माझा या अफाट जगाताशी संमंध आला,तो या फुलांच्या रांगोळीच्या वेडापायी..)---तर चला मग मारायचा फेरफटका....१)हे कॉमन पेड पार्किंग..हा फटू टाकण्याचं कारण...ही सामान्य दिवशी असलेली वाहन गर्दी आहे,,फुल्ल सिझनला इथे खरच गाडी ठेवायला सुद्धा जागा नसते..

छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य : नरहर कुरुंदकर

लेखक सागर यांनी शुक्रवार, 10/02/2012 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
Kurundkar आजच नरहर कुरुंदकरांचे 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' हे अवघे साठ पानांचे पुस्तक वाचून पूर्ण केले. नरहर कुरुंदकरांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त या पुस्तकाचे वाचन माझ्याकडून घडावे हा एक योगच म्हणावा लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या छोट्याशा पुस्तकाचे वर्णन करता येईल.

मेघा रे... मेघालय !

लेखक चिगो यांनी मंगळवार, 07/02/2012 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: धमु आणि माझी खवखव च्यायला, तू एक काम का नाही रे करत. ते लाईन आणि फोन वरुन आठवलं. इशान्य भारताबद्दल एकुणच लोकांचं अज्ञान अगाऽढ असतंय. तिथल्या पध्दती, जिवनमान, जगण्याची धडपड आणि सरकारी प्रयत्न ह्यावर का नाही लिहित काही? खूप चांगली आणि माहितीपुर्ण लेखमाला होईल...शिवाय पुर्णतः दुर्लक्षित म्हणवल्या जाणार्या भागाची माहितीही होईल लोकांना. ************************************************************** तर आमच्या ह्या दोस्ताच्या विनंतीवजा ऑर्डरीने मी हा लेख लिहतोय..

सरस्वती.. एक लोकमाता

लेखक शरद यांनी मंगळवार, 07/02/2012 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
सरस्वती ... एक लोकमाता सरस्वती लुप्त होऊन हजारो वर्षे झाली. हिमालयात उगम पावून हरियाना, पंजाब, राजस्थान,गुजराथ मधून वहात जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळणारी सरस्वती, ऋग्वेदात जिचे रम्य वर्णन केले आहे, एके काळी जिचे पात्र ८-१० किलोमीटर रुन्द होते, जिच्या काठावर भारतातील सर्वात पुरातन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत , अशी सरस्वती आज मात्र तुम्हाला पहावयासही मिळत नाही. तिच्या पाण्यावर आज तुम्ही शेती करू शकत नाही. तिच्या लेकरांची तहानभूक ती आज भागवू शकत नाही. भूगर्भातील उत्पातामुळे तिचे पात्र आटले पण तिचे प्रेम मात्र आजही आटलेले नाही. आजही ती भारताला सुजलाम्-सुफलाम् करावयास आसुसलेली आहे.