Skip to main content

लेख

प्रतिमा जपायची आहे

Published on 01/11/2020 - 16:05 प्रकाशित मुखपृष्ठ
- डॉ. सुधीर रा. देवरे साहित्यिक, कलावंत वा संवेदनाशील व्यक्‍तींना ‍जीवनात हटके अनुभव घ्यायला आवडतात. पण असे अनुभव घेतांना काही चटके बसणंही अपरिहार्य असतं. हे चटके सोसण्याची ताकद प्रत्येकात असतेच असं नाही. उलट परिणाम उद्‍भवले की व्यक्‍ती गांगरून भीतीने थरथरते. आपण ज्या सामाजिक चौकटीत वावरतो त्या जनमानसात आपल्या प्रतिमेला तडा जाऊ नये असं वाटणं स्वाभाविक आहे. आपल्या मूळ स्वरूपाहून केवळ आपली प्रतिमा उत्कट करण्याच्या अट्टहासामुळे, माणूस हटके अनुभव घेण्यासाठी आपणहून साहस करत नाही. पचेल, परवडेल, समाजात चुकीचा संदेश जाणार नाही असा मोजून मापून आपण अनुभव घेतो. परिणाम उलटा होताच हादरून जातो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4121

सत्यमेव जयते.

Published on 01/11/2020 - 09:22 प्रकाशित मुखपृष्ठ
सत्यमेव जयते. प्राध्यापक जगदीश कदमांना एकदम दचकून जाग आली . कोणी तरी त्यांचे पाय हलवत होते .. “ ओ ..साहेब .. जरा उठा ..आम्हाला जरा बसायला जागा द्या…” एक क्षण भर त्यांना आपण कुठे आहोत हेच आठवेना ..मग हळू हळू त्यांच्या मेंदूवरचा झोपेचा पडदा अलगद सरकला ,आणि त्यांना आठवले कि आपण कोल्हापूरला जाणाऱ्या एक्सप्रेस मध्ये आहोत आणि कुणी तरी आपल्याला अगदी माजोर पणे उठवत आहे. त्यांनी नीट डोळे उघडून पाहिले . मग उशाशी असलेला चष्मा आपल्या डोळ्यांना लावला. त्यांना आता नीट दिसले तीन चार जण ते झोपले होते त्या बर्थ पाशी उभे होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 22773

जीवन के सफर मे

Published on 28/10/2020 - 12:02 प्रकाशित मुखपृष्ठ
जीवन के सफर मे राही जीवन के सफर मधे चालताना ,कुठे ना कुठे कुणी ना कुणीभेटतच असते।आपण विसरून ही जातो । बिल्लू बाल्मिकी ,असे नावधारण केलेला,उत्तराखंड मधील मसुरीच्या  रस्त्यावर दोनच मिनिटे भेटलेला माणूस आठवणीत राहाण्याचे काही कारण नाही। पण राहिला ।त्याची ही, म्हटलं तर ,गोष्ट। हिमालयाच्या कुशीतील सगळी ठिकाणं काय किंवा निसर्गाने निर्माण केलेली कुठलीही ठिकाणे  नुसती पाहाण्या पेक्षा, निवांतपणे अनुभवायची आहेत,हे अनुभवांती पटलंय। दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर च्या तिसऱ्या आठवड्यातअतिशय आल्हाददायक निवांत वातावरणात, रमणीय स्थळांमधे उत्तराखंडात । पण गावे निवांत नव्हती। कारण, स्थानिक स्वराज्य
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4303

स्मरण रंजन

Published on 27/10/2020 - 10:47 प्रकाशित मुखपृष्ठ
"आवाज के दुनिया का दोस्त " संगीत ,सर्व प्रकारचे संगीत,लोकप्रिय होण्यात ,त्याचा प्रसार ,प्रचार होण्यात रेडीओ चा फार मोलाचा वाटा । हिंदी चित्रपट संगीताची वाटचाल किंवा घोडदौड तर मुख्यत्वेया माध्यमाच्या पाठीवरूनच झाली । आपला शेजारी देश,सिलोन(श्रीलंका )रेडीओ वर हिंदी सिनेगीतासाठी वेगळे केंद्रच (श्रीलंकाब्रॉडकॉस्टिंग कंपनीचे )आहे । बहुतेक आपणा सगळ्यांचे आवडते स्टेशन। तिथे ऐकलेल्या असंख्य गाण्यांनी वेड लावले । सर्व कार्यक्रमाचा सरताज म्हणजे "बिनाका गीतमाला""। बुधवार केव्हा येतो ,रात्रीचे आठ केव्हा वाजतात अन , #भाईयो और बहनो 'अशी साद घालत आवाज की दुनिया के दोस्तों को साद घालणारा एक सुपरिचित ,सुप्रस
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1003

विजयादशमी..!!

Published on 25/10/2020 - 11:19 प्रकाशित मुखपृष्ठ
विजयादशमी...!! मस्त आरामात पेपर वाचत असतानाच, चिरंजीव वही घेऊन आले. बाबा मला विजयादशमीचा निबंध सांगा. "अरे..आईला विचार रे राजा.." मी प्रामाणिक प्रेमाने म्हटले. अहो, दुसरीतच आहे तो.. पी.एच.डी.चा निबंध सांगत नाहीये. तेवढं जमेल तुम्हाला... माझ्या अस्मितेला लागलेला धक्का सावरत, मी 'हो' म्हटलं.. जुजबी माहिती सांगत लेकाचा पानभर निबंध पूर्ण झाला.. पण पुन्हा मात्र पेपर वाचनात मन रमेना. अरे, हे माझं सुट्टीच्या दिवशीचं वाचनाचं सुख हिरावून कोण घेतंयं..? रामदास स्वामींची आठवण झाली. जगी सर्व सुखी, असा कोण आहे.. आणि त्यांची गंमत वाटली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3309

ती वाचली असती (कथा)

Published on 24/10/2020 - 21:22 प्रकाशित मुखपृष्ठ
बैलगाडी संथगतीने गावाच्या दिशेने जात होती. सूर्य मावळतीला जात होता. मावळतीची शांतता, सूर्याचा तांबूस प्रकाश आजूबाजूला पसरला होता. सगळे अवतीभोवतीचे वातावरण  एका लयीत शांत शांत भासत होते. परतीचे पाखरे अधून मधून नजरेस पडत होते. बैलगाडीचा तो खडs खडss आवाज, या अशा वातावरणात मजेशीर वाटत होता. ते तिघेजण गाडीत शांतपणे बसून, त्या आजूबाजूच्या वातावरणाची शांतता कायम ठेवत होते. गाव साधारणता अजून, सहा मैल बाकी असेल. खरंतर त्यांनी गावात पोहोचायला घाई करायला हवी होती. कारण रात्र लवकर सुरू होणार होती. रात्रीचा तो काळाकुट्ट अंधार, आजूबाजूला पसरणार होता. पण त्यांची ती संथ चाल आहेत तशीच कायम होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2569

सीमोल्लंघन...!!

Published on 24/10/2020 - 13:34 प्रकाशित मुखपृष्ठ
सीमोल्लंघन..!! नुकताच एम.बी.बी.एस. चा रिझल्ट लागला होता, आणि शशी खूप आनंदात होती... पण ह्या इंटर्नशिपच्या काळात प्रयत्न केले तर, लग्न लवकर ठरेल. या आई-बाबांच्या निश्चयापुढे ती हतबल ठरली. वर्षभरातच तिचं दिवाकर बरोबर लग्न झालं आणि मध्यमवर्गीय मातापित्यांनी कृतार्थ होऊन सुखाचा श्वास घेतला... शशी आणि दिवाकर एकुलते एक असल्याने, तिला कुटुंब पद्धतीत फार बदल जाणवला नाहीच. तिघांचं छोटेखानी, पण उच्च मध्यमवर्गीय कुटुंब.. दिनकर थोडा अबोल होता आणि नावाप्रमाणे वैशाखाच्या सूर्यासारखा थोडा तापट होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1283

प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका

Published on 24/10/2020 - 10:54 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका आजच्या ऑनलाईन वर्तमानपत्रांत "नेमाडे-पठारेंसह 2 हजार मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले समर्थनाचे पत्र, (मंदीरे उघडण्याबाबतीत) श्रद्धांशी खेळणाऱ्या राजकारणावर घेतला आक्षेप" अशा अर्थाच्या बातम्या आलेल्या आहेत.

याद्या 26967