Skip to main content

लेख

माझा डबा

लेखक VRINDA MOGHE यांनी रविवार, 11/10/2020 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझा डबा आपलं बायकांचं कसं असतं ना..अपल्या घरातल्या चमच्यांपासून डबे, वाट्या, ताटं, ताटल्या सगळ्यांत जीव  गुंतलेला असतो. त्यातून सगळं स्वतः घेतलेलं असलं तर जास्तच आणि माहेरहून मिळालेलं असेल तर मग विचारायलाच नको. आणि ह्यातलं काही कोणाला दिलं गेलं तर परत मिळेपर्यंत जीव कित्ती कासावीस झालेला असतो नाही? झालं असं.. आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती. थोडक्यातच करायची, म्हणून जवळचेच मित्र मैत्रिणी बोलावले होते.  सगळं व्यवस्थित पार पडलं. मैत्रिणीच्या मुलाला शिरा खूपच आवडतो म्हणून तीने  माझ्या अत्यंत लाडक्या अशा थोड्याशा वेगळ्या आकाराच्या डब्यात भरून नेला.

घरटं

लेखक VRINDA MOGHE यांनी रविवार, 11/10/2020 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
घरटं त्या दिवशी खिडकीतुन बाहेर सहज लक्ष गेलं तेव्हा जाणवलं...समोरच्या झाडावर फांद्यांच्या बेचक्यात घरटं दिसतय कोणाचंतरी..मोठ्या खोल बशीसारखं होतं ते वाळलेल्या काड्या- कुड्यांचं. दिवसभरात मुद्दाम अधुनमधून बघितल्यावर एक-दोनदा कावळा (किंवा कावळी) त्या घरट्यावर बसलेला दिसला. म्हणजे या वेळी कावळ्याने बांधलं वाटतं घरटं..चिमण्यांची असतातच घरटी, एक-दोनदा बुलबुल आणि सूर्यपक्ष्याचं पण घरटं होतं या झाडावर. चला म्हणजे आता एक छान चाळा मिळाला . अधुनमधून निरिक्षण करण्यात छान वेळ जाईल. उन्हाच्या शांत दुपारी हा निरीक्षणाचा छंद खुप आनंद देतो मनाला.

गंप्या ची वसाहत

लेखक राजा सोवनि यांनी बुधवार, 07/10/2020 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
गंप्या ची वसाहत गंप्या ची शहराजवळ वडिलोपार्जित शेती होती शहर वाढत गेल्यानेजमीनीच्या किमती वाढल्या होत्या.गंप्याने आपल्या मित्रां सोबत शेतीच्या जागी वसाहत करण्या चे ठरवले. जमीनी जवळून एक नदि वाहत होती,काठावर बरीच झाडे,हिरवळ होती,जमीनी चा एक भाग खडकाळ, टेकडी सारखा होता. गंप्या ने त्याच्या ईंजीनियर मित्रा कडून संपूर्ण जमीनी चा नकाशा तयार करवून घेतला व,वेगवेगळ्या आकाराचे प्लॉट पाडले. आपली वसाहत नाविंन्यपूर्ण असावी म्हणून, प्लॉट फक्त मराठी लोकांनाच त्यांच्या आडणावा प्रमाणे द्यायचे ठरले भरपूर झाडी गवताळ भागाचे प्लॉट मोरे,साळुंके,कोकीळ,,पारवे गरूड तसेच लांडगे,कोल्हे,हरणे वाघ तर नदि काठचे,मगर,हंस,बग

चुकलेला नेम - अंतिम भाग

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 07/10/2020 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
"भारत माता की जय ..." "भारत माता की जय " कचेरीच्या चारी बाजूने लोक गोळा झाले होते. क्षणाक्षणाला गर्दी आणि त्याचे रौद्ररूप वाढत चालले होते. जॉर्जचा एक शिपाई आधीच मरून पडला होता. त्याच्या मरणाला कारणीभूत ठरलेला दगड त्याचाच बाजूला रक्ताने लडबडलेला होता. कचेरीच्या मुख्य दरवाज्यावर लाथाडलेल्याचा आवाज येत होता. जॉर्जची नजर त्या दरवाज्यावर खिळून होती. शिपायांनीही आपापल्या बंदूका दरवाज्याकडे रोखल्या. अखेरीस तो दरवाजा तुटतो न तुटतो तोवर लोकांचा एक गट आत घुसला आणि शिपायांनी नेम साधला. शिपाई बंदूक पुन्हा तयार करेपर्यंत लोकांचा दुसरा गट आत घुसला. त्यांनी त्या शिपायांच्या बंदुका हुसकावल्या.

चुकलेला नेम

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 07/10/2020 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
झोपाळ्याचा कुरकुरणारा आवाज अजूनही अंगणातून येत होता. मध्यानापासून आता सांजवेळ होत आली तरी गोपाळराव अजूनही झोपाळ्यावर तसेच बसले होते. झोपाळ्याच्या नक्षीदार लाकडी खांबावर मुंग्यांची रांग थबकत चालत होती. गोपाळराव मात्र आपल्या धोतराकडे रोखून बघत बसले होते.धोतरावरचा परवाचा दौतीचा निळा डाग अजूनही तसाच होता. त्या डागाशेजारीच आज नवीन डाग पडला होता. गर्द लाल रंगाचा तो उठून दिसत होता. खांबावरची एक मुंगी गोपाळरावांच्या हाताला डसली आणि त्याची तंद्री मोडली. हाताशेजारच्या पिस्तूलकडे त्यांचे लक्ष गेले.

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २)

लेखक दुर्गविहारी यांनी बुधवार, 07/10/2020 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
अफझलखानः- अफझलखान हा मुळचा अब्दुल्लाखान.एका भटारीण बाईचा मुलगा.पण आपल्या अंगभुत गुणाने आणि पराक्रमाने तो मोठा झालेला होता. अफझलखान हि त्याला विजापुर दरबाराने दिलेली पदवी होती. स्वभावाने अत्यंत क्रुर असा हा ईसम.कपट आणि दगाबाजी हि त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्येच होती.

दोन घडीचा डाव.....!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी मंगळवार, 06/10/2020 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
*दोन घडीचा डाव...* *"जीवनात ही घडी अशीच राहू दे"* .. सुखा-समाधानाच्या प्रसंगात, आनंदाच्या लाटांवर तरंगत असताना, प्रत्येकाला अगदी असचं वाटत असतं. पण *"घडीने घडी काळ आयुष्य नेतो.."* या कटू सत्याचं भान मात्र आपल्याला कधीच नसतं. त्यामुळे बरेचदा जीवनात अचानक नैराश्य येतं. एकाकी अन् असहाय्य वाटतं, आणि आपलं जीवन व्यर्थ आहे की काय...? असे विचार मनात रुंजी घालू लागतात. त्यासाठी हे सिंहावलोकन किंवा एक विचार मंथन.....!!! चौ-यांशी लक्ष योनीतून प्रवास झाल्यावर म्हणे हा मनुष्याचा जन्म येतो. ती आपली सर्वात मोठी देणगी असते. हे आपण कालौघात विसरतो.

बळी तो कान पिळी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/10/2020 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे एवढ्यात तीन बातम्या ऐकण्यात आल्या. दर्जेदार वृत्तपत्र आणि राष्ट्रीय चॅनलवरुन या बातम्या ऐकल्या असल्याने या अफवा नसाव्यात, त्यांत तथ्य जरुर असावं : बातमी क्रमांक एक : ‘तयार होऊ घातलेली करोनाची लस (अनेक असल्या तरी) जगातल्या काही श्रीमंत देशांनी आधीच बुक करुन ठेवल्या. म्हणून अशा काही लसींना अधिकृत मान्यता मिळताच त्या श्रीमंत देशांना आधी पुरवल्या जातील.’ विसनशील आणि गरीब देशांपर्यंत ही लस पोचायला म्हणून खूप उशीर होणार आहे. तोपर्यंत अनेक लोक आपला प्राण गमावू शकतात.

पेटता दिवा (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी गुरुवार, 01/10/2020 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
जंगलाच्या वेशीबाहेर ते दोघे उभे होते. केशव आणि राघव. दोन्ही हात कमरेवर ठेवून, ते आत खोलवर जंगलाकडे बघत होते. जंगलाच्या खोलीचा, घनतेचा अंदाज घेत होते. आज त्यांनी पैज लावली होती होती. आणि ती आजच पूर्ण करायची होती. शाळा नेमकीच सुटल्याने, ते लगबगीने जंगलाकडे आले होते. कोणी आपल्याला पाहिले नाही ना? याची भिती होती. परंतु तसे काही झाले नव्हते. ते दोघे त्या जंगलाच्या वेशीबाहेर उभे होते. सूर्य मावळतीला आला होता. डोंगराआड जाण्याची त्याची लगबग सुरू झाली होती. कोणत्याही क्षणी, तो त्या मोठ्या डोंगराआड अदृश्य झाला असता.

मावळतीला

लेखक Pratham यांनी मंगळवार, 29/09/2020 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस मावळतीकडे झुकताना सावल्या अदृश्य होऊ लागतात.मनात एक हुरहूर लागून राहते.ती हुरहूर आपल्याला नेमक्या शब्दांत व्यक्त करता येत नाही,हवीहवीशी तरीही नकोशी.एक वेगळीच भावना असते ती.चार भिंतीमध्ये बसून राहिले तर मन उदासीन होते तेच जर मोकळ्या हवेत गेले तर एकदम शांत वाटते,अस्तित्वाची जाणीव होते.सूर्य मावळतानाचे दृश्य खूप सुखद वाटते.सूर्य हळूहळू कलत असतो,आकाशात तांबड्या-केशरी रंगाची उधळण असते.एखाद्या तळ्या किनारी मावळतीचे दृश्य भलतेच सुंदर दिसते.पाण्यावर सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असते,आकाश लाल रंगात न्हाहून गेलेले असते,पक्षी दिवसभर अन्नासाठी भटकून परतताना दिसतात.झुंडीने ते एका संथ लयीत उडत असतात.पाण्य