मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

प्रश्नांत खरोखर जग जगते

अरुण मनोहर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एकदा अघटीत घडले. देवाच्या असंख्य न उमगणार्‍या लीलांपैकी एक लीला. माणसांना प्रश्न पडायचेच थांबले. कोणी कुणाला काहीच विचारेना. आपणा स्वतःला नाही. आई वडिल मुलांना नाही. मुले शिक्षकंना नाही. मालक नोकराला नाही. जनता राजकारण्याला नाही. कोणाच्या मनांत काहीच प्रश्न उरले नाहीत. मग विचारणार काय? सगळे कसे स्वच्छ माहीत आहे. प्रत्येक जण माहीत असलेल्या ज्ञानाच्या आधारे काम करू लागला. नवीन आलेला कोणी, प्रश्न विचारत न बसता, इतरांचे पाहून तसेच करू लागला. नवीन जन्माला आलेल्या बाळासारखा. जर अनुकरण करून, किंवा पाहणी करून काय करायचे ते कळले नाही, तर फारच सोपे. काहीच करायचे नाही.

जाने तु या जाने ना....

सौरभ वैशंपायन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एप्रिल मध्ये हा लेख मला सुचला होता. तसं याला काय नाव द्यावं ते सुचत नव्हतं, आधी याचं नाव "दिल हि दिल मै!" असं होतं. मात्र सध्या "जाने तू..." गाजतोय, आणि त्याची थीम दे़खिल याला साजेशीच निघाली हा योगायोग आहे. हि २ जणांची पत्र आहेत. दुसरं पत्र उत्तर म्हणुन लिहिलय. काय आहे ते वाचुनच बघा आवडतं का ते! कदाचित एखाद्याच्या आयुष्यात असं झालहि असेल.....किंवा होईल हि. ---------------------------------------------------------------------------------------------- १. Hi Dear!!!!!! कशी आहेस? काय चालु आहे सध्या? अभ्यास कसा चालंलाय? नीट अभ्यास कर! सहा महिन्यांनी M.B.A. ची परीक्षा असेल ना?

नाहि चिरा...नाहि पणती....

सौरभ वैशंपायन ·
लेखनविषय:
सैनिक स्वत: स्वतंत्र विचार करत नाहि. त्याने तो करावा अशी अपेक्षाहि नसते. तो शिस्त पाळतो, सज्ज राहतो. काहि ठराविक शब्दांचा उच्चार झाला कि तो यंत्रवत काम करतो. पण त्याचे मन सुद्धा यंत्राप्रमाणेच निर्विकार असेल का? नक्किच नाहि! युद्धाच्यावेळी त्याचा विचारांवर ताबा नसतो, शत्रुला मारायचे या एकाच विचाराने तो पिसाट झाला असतो. पण शीतयुद्धासारख्या परीस्थितीत वर्षानुवर्षे सतत दक्ष अवस्थेत त्याला ’तिष्ठत’ रहावे लागते. कधी आसामच्या किर्र जंगलात, कधी चटके लावणार्‍या थर किंवा कच्छच्या वाळवंटात आणि कधी-कधी सियाचीनसारख्या जगातल्या सर्वात उंच रणभूमीवर हाडं गोठवणार्‍या बर्फाळ थंडीत, तो सज्ज असतो.

प्रति(मा)भा उरी धरूनी तू काव्य करीत रहावे

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"हो मी तुझी कविता ब्लॉगवर आली रे आली की प्रथम वाचतो.पण शरद ह्यावेळची तुझी कविता खूपच दुःखी होती.तुझ्या कवितेचा संग्रह पाहिला तर जास्त करून त्या दुःखी असतात.एखाद्दया कवीला दुःखाशिवाय कविता लिहायला विषय़च नसतो का रे?" काल शरद मला चौपाटीवर भेटला.थोडी दाढी वाढलेला चेहरा,खाली लेंगा,वरती झुळझुळीत पैरण,पायात चप्पल असा पेहराव करून सकाळीच समुद्राच्या दिशेने क्षितीजाकडे टक लावून उभा होता.माझी खात्री होई पर्यंत मी त्याचा जवळ गेलो आणि हा शरदच आहे असं पाहिल्यावर म्हणालो, "अरे, काय तुझी ही दशा करून घेतली आहेस,मला तू शरद असशिल याची खात्रीच नव्हती." हंसायला पाहिजे म्हणून हंसल्याचा अविर्भाव करून मला म्हणाला

बर्ट्रांड रसल, माझा सर्वात आवडता लेखक

३_१४ विक्षिप्त अदिती ·
लेखनप्रकार
डिस्क्लेमर> बर्ट्रांड रसल (Bertrand Russell) हा माझा सर्वात आवडता लेखक असल्यामुळे माझी मतं आत्यंतिक (चांगली) असण्याची शक्यता वाढते. मला संदर्भ म्हणून हा लेख लिहायचा नाही, तर फक्त एक ओझरती ओळख म्हणून! माहितीजालावर त्याच्याबद्दल खूप जास्त माहिती अर्थातच आहे आणि अनेक मिपाकरांना रसल आधीच माहित असेल. तर हा लेख त्यांच्यासाठी ज्यांना रसलबद्दल माहिती नाही, किंवा फक्त नावच ऐकून आहेत. थोडी माहिती या माणसाबद्दल आणि थोडी त्याच्या काही पुस्तकांबद्दल!

मंदाची बाईआज्जी

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक्दा गप्पा रंगल्यानंतर कुठचा विषय कसा येईल, आणि त्यावरची चर्च्या कुठे पोहोचेल हे सांगणं कठीण. असच आम्ही एकदा गच्चीवर गप्पा मारत बसलो होतो.का कुणास ठावूक विषय काय होता आणि मंदाने तो कुठे नेला.विषय होता त्यावेळची जुनी माणसं आणि त्यांच्या संवयी बद्दल.मधेच कुणीतरी कोकणातल्या समुद्राचा विषय काढला,आणि त्यावर आणखी काही सांगण्य़ापुर्वीच मंदाचा हुंदका ऐकला. मंदाला तिच्या आजीची आठवण येवून ती थोडी भावनावश झाली.तिला आजीचा विषय घेवून काही तरी सांगायचं होतं. म्हणाली, "माझ्या आजीला आम्ही बाईआजी म्हणायचो.विणकाम आणि शिवणकामात बाईआजीचा हातखंडा होता.