मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

आपण प्रत्येक जण आपआपल्यापरीनेच वेगळे असतो.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.उन्हाळ्याची सुट्टी असल्याने त्यांचा नातू पण घरी आला होता.बरोबर त्याचा रुम-मेट पण थोडे दिवस त्याच्या बरोबर राहायला पण आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर आमच्या थोड्या गप्पा पण झाल्या.त्याच्याशी खूप बोलावसं वाटण्यासारखा त्याचा स्वभाव वाटला.मी त्याला गप्पा मारायला आपण तळ्यावर भेटू असं सांगून घरी परतलो. संध्याकाळी तळ्यावर त्याला एकटाच येताना पाहिलं.जवळ आल्यावर म्हणाला, "भाऊसाहेब आणि सर्व मंडळी देवळात गेली आहेत.मला पण बोलवत होती.पण मी तुम्हाला अगोदरच तळ्यावर भेटू म्हणून प्रॉमीझ दिलं होतं,म्हणून मी देवळात न जाता तुम्हालाच भेटायचं ठरवलं. सकाळच्याच गप्पाचा

"जीवन मे एक बार आना वेगुर्ला."

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वेंगुर्ले या शब्दाचा अर्थ "वेंगेत मारून उरले ते वेंगुर्ले". वेंग म्हण्जे "कंबर".म्हणजेच "कंबरेवर ठेऊन उरले ते" प्रेक्षणीय स्थळं पहाण्याची ज्याना आवड आहे त्यानी वेंगुर्ल्याला अवश्य भेट द्यावी.

मलेशियातील माझ्या घरचा गणेशोत्सव

वैशाली हसमनीस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतातून मलेशियात येताना लवकर परत न येण्याची खात्री असल्यामुळे,टिटवाळ्याला जाऊन फायबरची सुबक,सुंदर गणेशमूर्ति विकत घेऊनच(गणपतिची किंमत पैश्यात करणे अशक्य म्हणून सांगत नाही) विमानांत बसलो.मलेशिया मुस्लिम देश असल्यामुळे थोडी भीती वाटत होतीच.पण त्या गणेशानेच सारे कांही निभावून नेले.कस्टम अधिकार्‍याने आमच्याकडे लक्षसुध्दा दिले नाही.उलट टॅ़क्सी मिळवून दिली.गणेशकॄपा !

भाली नावाचा असाच एक सडेफटिंग

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
खरं म्हणजे आम्ही त्यांना भाली म्हणत असलो तरी त्यांच खरं नांव भालचंद्र रेडकर.भाली तसे दिसायला स्मार्ट होते.तरतरीत नाक,गोल चेहरा, गुबगुबीत शरिरयष्टी अणि अतिशय लाघवी स्वभाव त्यांचा.आयुष्यभर भाली ब्रम्हचारी राहीले. आणि त्याला एक कारण होतं.गावात जेव्हा देवीची लागण होती तेव्हा भालीच्या नशिबी आजारपण आलं.सर्व आंगावर देवीचे व्रण उठले आणि त्यांचा चेहरा त्या व्रणानी भरला.त्यामुळे एखाद्दया पितळीच्या अथवा तांब्याच्या कळशीवर जशी ठोकणं दिसतात अगदी तशीच ठोकणं त्यांच्या चेहऱ्यावर आली होती.आणि " ह्या विद्रुप चेहऱ्याच्या मला कोण मुलगी देणार?

आमचाही छोटेखानी मिपा कट्टा,:)

स्वाती दिनेश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
युरोपातला उन्हाळा आल्हाददायक असतो. २२ ते २५ अंश से तापमान,सूर्याचा ढगांशी लपंडाव आणि मध्येच एखादी हलकीशी सर असा 'श्रावण' उन्हाळाभर चालू असतो. साहजिकच ह्या वातावरणाचा जास्तीत जास्त उपयोग सगळे करून घेत असतात कारण त्यानंतर येणारी पानगळ दिवस लहान करते आणि तिच्यापाठोपाठची बोचरी थंडी सोबतीला करड्या संध्याकाळी आणते.त्यामुळे उन्हाळ्यात मौजमजेचे जास्तीत जास्त प्लान केले जातात्.व्हरांड्यात,गच्चीत,अंगणात केलेले बार्बेक्यू हे त्यात अग्रभागी असतात.अशा हवेत आम्हाला एकत्र काहीतरी करण्याची सुरसुरी न आली तरच नवल! त्यात आणि तात्याने अचानक छोटेखानी मिपा कट्टा!

सारोजनीक गनपती उत्सव - खारपाडा

ब्रिटिश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मांगच्या सालची गोस्ट सांगतय कमीटीची मीटींग झाल्ती मीटींगमदी ठरला क ह्ये गनपती उत्सवान गावचा नाटक बसवाचा. पन ईशय कोन्ता ? कूनी म्हनालं सामाजीक ठीवा, त कुनी म्हनल सांस्क्रुतीक , त कुनी आनकी कसला चीक्कार भांडना झायली पन कुन्याव कई बी आयकना. तवा काश्या (माजा बा मंडली, काशिनाथ भोईर, पन तेला सगलीजना काश्या म्हनुनच वलीकतान. आवराच नाय तो सोता पन काशिनाथ म्हुन हाक दील्ली क पाच मिन्ट ईचार करुन ओ देतं) उबा राह्यला न म्हनला "यंदा आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. क र मास्तर ?" मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं. "व्हय व्हय ! आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा.

सोन्याचं परिवर्तन

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गावात आमच्या घराच्या बाजूला महारवडाची आळ होती.गरिब महार आणि चांभार जातीचे लोक बारिकबारिक धंदे करून आपली गुजराण करीत असत.त्यांची लहान लहान मुलं त्या आळीच्या बाहेर येवून मधल्या एका मोठ्या मैदानात खेळायला येत असत.आम्ही पण त्याच मैदानात क्रिकेट खेळत असूं.बाउंडरीवर बॉल मारला की लहान लहान मुलं बॉल परत फेकायची.अशा तर्‍हेने आमची ह्या मुलांशी दोस्ती झाली होती.सोन्या हा बाबू महाराचा मुलगा. सोन्याची आई कधीकधी बांबूच्या पट्याची काही खेळणी आणि सुपे,रवळ्या टोपल्या सारख्या गोष्टी घेवून दारो दार विकायला जायची.त्यावेळी हा सोन्या तिच्या कंबरेवर बसण्याच्या वयाचा होता.तेव्हा पासून मी त्याला पाहिला होता. त्याच्या

गणपतीचा उत्सव - टिळकांचा अग्रलेख

लिखाळ ·
नमस्कार मंडळी, आताच लोकसत्ताची इ-आवृत्ती चाळत असताना मला टिळकांनी १८ सप्टेंबर १८९४ रोजी केसरीमध्ये लिहिलेला अग्रलेख वाचायला मिळाला. आपण सर्वांनी तो वाचावा असे वाटल्याने त्याचा इथे दुवा देत आहे. http://www.loksatta.com/daily/20080903/vishesh.htm या लेखात त्यांनी पुण्यातल्या गणपती उत्सवाचे वर्णन केले आहे. तसेच शेवटच्या दिवशीच्या मिरवणूकीचे सुद्धा वर्णन दिसेल. त्यात भक्तीरसाने म्हटलेली पदे वगैरे उल्लेख बघुन गहिवरून आले. भक्तीरस, प्रेमानंद वगैरे शब्द ते वापरतात. ते वर्णन वाचण्यासारखे आहे.