Skip to main content

लेख

गाडी अड्डा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 01/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठून घराच्या पडवीच्या पायरीवर बसलो होतो. दोन हातावर जबड्याचा खालचा भाग टेकून,हाताचे कोपर गुढ्घ्या जवळ मांडीचा आधार घेवून, दोन्ही पायाचे तळवे खालच्या पायरीवर ठेवून, विचार करीत बसलो असताना, मारुतीच्या देवळाच्या दिशेने घुंघुराचा मंजूळ आवाज कानावर पडत असताना, त्या सकाळ्च्या शांत वेळी ते सप्तसूर खूपच श्रवणीय वाटायचे. नक्कीच बेळगांवहून बैलगाड्या येवू लागल्या असणार,आणि तीस ते चाळीस गाड्यांची एकच ताफा दिसणार,त्या ऊंच ऊंच धिप्पाड पांढऱ्या बैलांच्या जोड्या,सरळ लांबच लांब लाल पिवळी अणकुचीदार त्यांची दोन दोन शिंगे,एक एक शिंगावर ओवलेले छोटे छोटे घुंघरु,प्रत्येक बैलाच्या गळ्यात दुपदरी मोठ्या घुंघरा

खुप दिवस

लेखक मनी यांनी बुधवार, 30/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवस झाले खर तर तुला भेटून वषा झाले असावे बहुतेक .. सगले कसा ठरवून केला होते मी ,,,,,स्वताच्या हाटटने ,,,तुला न भेटण्याची हत्ताही मझ्याचा ....सगले कसा मनाला समजावून.......पण तरी ही तुला विसरने जमात नही मला ..सगले कसा अवघड होते आहे .जम्यचाया पलीकडले...... परवाच तुझ्या बर्थडे होतो .खुप ठरवले ग्रीटिंग.ईमेल समस फ़ोन कही नही करयाच .......लक्षात नही कही असा दाखवायच .पण सगळा अथाव्दा तुझ्या बर्थडे ला क्या द्याच हा विचार करण्यात गेला.....शेवटी शेवटी तर एक ईमेल...एक ग्रीटिंग अणि फ़ोन यावर सेत्त्लेमेंट झाली काय बोल्याच.

"ठेविले अनंते तैसेचि रहावे"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 30/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अनंताचा निरोप घेताना मला खूप वाईट वाटलं.त्याला त्याचं काहीच वाटल्याचं दिसलं नाही.कदाचित, "ठेविले अनंते तैसेचि रहावे." असं त्याला वाटत असावं, असं मी मनात आणून त्याचा निरोप घेतला. अनंत नाडकर्णी आमच्या समोरच्या कॉलनीत रहायचा.त्याची आमच्याशी ओळख वसंत सबनीसमुळे झाली.वसंत सबनीसचा हा मेहुणा. अनंता एम.कॉम होता.त्याला एका बॅंकेत सिनीयर मॅनेजरची नोकरी होती.त्याचं लग्न झालं होत आणि त्याला एक लहान मुलगा होता. अनंताला दोन तीन बहिणी होत्या.

" त्या अनोळख्याने माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 29/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं,मी माझे डोळे उघडे ठेवून सर्वांकडे पाहत असावं.आणि त्यांच्या बुध्दितून शिकावं.मला वाटतं,आपले जवळचे आपण गमावले तरच आपलं सर्वस्व आपण गमावतो. मला वाटतं, त्या अनोळख्याने मला त्या झालेल्या बोलण्यातून माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं."असे उद्गार काढण्याची माझ्या एका मित्रावर पाळी आली.ती त्याची कथा सांगताना, मला म्हणाला, " मनुष्याच्या आत्म्यावर माझा विश्वास आहे आणि इतरांबरोबर दुवा ठेवण्याच्या आत्म्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे.

आगे बढो

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 27/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"खरंच,पाटी पुर्ण पुसून टाकल्यास जगात गुन्ह्यापासून झालेली होरपळ,आपण केलेली बदल्याची होरपळ, उघड उघड विसरून जावून जर का "आगे बढो" म्ह्टलं तर किती बरं होईल. " हल्ली त्यामानाने खूपच लोकांचे प्राण जातात.काहींचे अपघातात तर काहींचे मारामारीत,कांही मरतात आतंगवाद्दयाकडून वगैरे. हे शहरात जास्त होत असतं.

बंगळुरु आणि २५ जुलै २००८

लेखक यशोधरा यांनी रविवार, 27/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार, २५जुलै, २००८. नेहमीप्रमाणेच बंगळुरु सकाळी सकाळी आळोखे पिळोखे देत जागं होत असतं. नेहमीप्रमाणे मी सकाळची फिरुन परत येते, तेह्वा सकाळचे ७-७.१५ होत असतात. सकाळी बंगळुरुमधली हवा एकदम मस्त असते, रात्रीचा पाऊस झाल्याने, हवेत आल्हाददायक गारवा असतो. पुण्याची हवाही अशीच होती कधीतरी... माझ्या मनात विचार आल्याशिवाय रहात नाही... नेहमीप्रमाणे रस्त्यावरची बरीचशी दुकानं बंदच असतात. इथले दुकानदारही तसे पुण्यातल्या दुकानदारांचे भाऊबंदच!! आरामात साडेनऊ - दहाला आपापली दुकानं उघडणार!! अगदी इस्त्रीवाल्यापासून ते मॉलवाल्यांपर्यंत सगळे जण या परंपरेचं न चुकता पालन करणार...

नाहीतर माणूस कंप्युटरसारखाच असता.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 27/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"अमुक अमुक असा,असा,होता.तसा,तसा होता. पण मात्र तो माणूसही होता"असं काही व्यक्तिना श्रद्धांजली देताना म्हणतात ते उगाच नाही. त्याचं असं झालं,अलीकडे मला जरा थकल्या थकल्या सारखं वाटू लागलं होत.माझ्या डॉक्टरांकडे ही माझी तक्रार मी गेले कित्येक दिवस करीत होतो.ह्यावेळी परत तेच माझं रडगाणं ऐकून डॉक्टर मला म्हणाले आपण तुमचं पुर्ण चेकअप करून घेवूया.पण त्यासाठी मी सांगतो त्या नर्सिंग होम मधे तुम्हाला कमीत कमी एक आठवडा ऑबझरव्हेशन खाली राहवं लागेल.मी मनात म्हणालो ’बापरे!