Skip to main content

लेख

मराठी अस्मिता, आपण आणि राजकारण

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 28/10/2014 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
"नाही यार नाही. हा नाही. अरे तो ठीक आहे पंतप्रधान म्हणून. महाराष्ट्रात हा नाही पाहिजे. अरे तो मराठी माणसाचा, आपला, असा पक्ष नाहीये मित्रा.... तो महाराष्ट्रात मराठी माणसाला पोरकं करेल, अरे मारून टाकेल तो आपल्या अस्मितेला...." अगदी कळकळीने काल रस्त्यावर एक माणूस दुस-या माणसाला सांगत होता. या सगळ्या विचारांत काहीसं तथ्य असलं जरी, तरी बरचसं नाही आहे. मुंबईतला एक मुख्य पक्ष हा पहिल्यापासून मराठी माणसाचा पक्ष राहिलेला आहे. मराठी माणसाला मुंबईत कधीच पोरकं केलं गेलं असतं. पण त्याला बळ दिलं, त्याचा दरारा प्रस्थापित केला तो या पक्षाने. दंगलींच्या वेळी मराठी माणसाला मुंबईत आधार होता तो याच पक्षाचा.

पिंपळ (रहस्य कथा) - भाग १

लेखक खोंड यांनी शनिवार, 25/10/2014 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
करकर आवाज करीत आणि कच्च्या रसत्यावरील पांढरा धुरळा उडवीत एस टी थांबली. रसत्याच्या कडला बसलेले दोघं तिघं उठून एस टी च्या मागच्या बाजू जवळ आली. "आली बाबा शेवटली बस " ९.३० झाले म्हणलं आता काय येत नाय वाटतं " एक म्हातारा बाबा खाट करून खटक्याचा आवाज झाला आणि एखाद्या पुराणी हवेलीचा दरवाजा उघडावा तसा आवाज करीत वाहकान दरवाजा ढकलला. २ बाया उतरल्या त्यांच्या पाठोपाठ एक इसम उतरला. हातातली हिरव्या रंगाची लोखंडी ट्रंक सांभाळत तो उतरला. काखेत एक कवी लोक वागवतात तशी पिशवी. गाडीन यु टर्न घेतला. ३-४ जन एस टी मध्ये चढले आणि गाडी परत धुराळा उडवीत करकर आवाज करीत निघाली. तो इसम तसाच रसत्या च्या बाजूला थबकला.

दिवाळीचे फटाके !

लेखक मनो यांनी बुधवार, 22/10/2014 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
(वाघाच्या गुहेतला एक सीन) धाकटे राजे (बात्तीसाव्यांदा): "बाबा, मग लावू का त्या माथुरला फोन?" थोरले राजे: "थोडी वाट पहा अजून" धाकटे राजे (स्वतःशीच पुटपुटत): "पंधरा वर्षे झाली, लहान असल्यापासून लाल दिव्याची वाटच पाहतो आहे … " थोरले राजे: "काय म्हणालास?" धाकटे राजे: "काही नाही. दुपारी आमदारांना काय सांगायचं मग?" थोरले राजे: "त्यांना काय कळतंय, सगळे निर्णय मीच घेणार" धाकटे राजे: "मग सुभाषला का पाठवायचं?" थोरले राजे: "तुला काहीच कळत नाही. अरे त्याच्याकडे दोन अग्रलेख तयार आहेत.

लिफ्ट

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 19/10/2014 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
"साब, दो पंक्चर है. निकालनेमें टाईम लगेगा!" "दो पंक्चर?" "हा साब! देखो!" गॅरेजवाल्याने मला पाण्याच्या पिंपात बुडवलेली टायरची ट्यूब आणि दोन ठिकाणाहून येणारे बुडबुडे दाखवले. "कितना टाईम लगेगा?" "एक घंटा तो लगेगा साब कमसे कम!" मी दुसरं काय करु शकणार होतो? कारच्या डिकीत नेमका एक्स्ट्रा टायर नव्हता. त्यामुळे पंक्चर काढून होईपर्यंत थांबण्यापलीकडे गत्यंतर नव्हतं! आधीच माझा मूड खराब होता. एकतर ऑफीसमधून लवकर निघण्याच्या माझ्या बेताला नेहमीप्रमाणे माझ्या मॅनेजरने सुरुंग लावला होता.

पाणी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 19/10/2014 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख प्रहार वृत्तपत्रात प्रकाशित झालेला असून त्याचा दुवा हा: http://prahaar.in/collag/257578 काही दिवसांपूर्वी एका ट्रेकला गेलो होतो. डोंगरदऱ्यांतून फिरण्याची मजा जितकी वेगळी असते, तितकीच वेगळी असते ती म्हणजे अशा भटकंतीतून होत जाणारी स्वत:ची आणि जगाची ओळख. आपल्या ‘कंफर्ट झोन’मधून बाहेर गेल्यावर, गावातून खेडय़ांतून प्रवास केल्यावर तिथलं जीवन समोर येतं, तेव्हा कळतं की प्रत्येक गोष्टीला किती किंमत आहे आणि महत्त्व आहे. ट्रेक करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे कुठली असावी, तर ती म्हणजे ‘पाणी’.

'द साऊथ सी बबल'… एका जागतिक महाघोटाळ्याची कथा

लेखक प्रसाद भागवत यांनी शुक्रवार, 17/10/2014 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वी झालेले आणि संभाव्य घोटाळे हा सर्वसामान्यांना बाजारापासून दूर ठेवणारा एक मोठा घटक!!. हे गैरप्रकार नक्कीच निषेधार्ह, पण अशा घोटाळ्यांतून वा अपघातांतूनच प्रचलित व्यवस्थांना सुधारणांचे बाळकडू मिळते, त्या सुदृढ बनतात हे नाकारता येणार नाही. असे भ्रष्टाचार हल्लीच होतात, आपल्याकडेच होतात असे बिलकुलच नाही. वाचकांचा असा गैरसमज असेलच तर तो दूर करणारी ही एक ऐतिहासिक महाघोटाळ्याची सुरस कथा.... ‘घोटाळा' हा शब्द अलीकडे आपल्या भलताच परिचयाचा झाला आहे, वर जेव्हा तो शेअरबाजारासारख्या (कु??)प्रसिद्ध बाबीशी जोडला जातो, तेव्हा 'घोटाळस्य कथाः रम्याः' हे ओघानेच आले.

क्लास

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 14/10/2014 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रहार वृत्तपत्रात गेल्या रविवारी प्रकाशित झालेला माझा हा लेख इथे सादर करत आहे. मुंबई रेलवे ही भारतातल्या सर्वाधिक गर्दीच्या परिवहन सेवांपैकी एक आहे. दररोज सुमारे २५०० लोकल सेवा या मार्गांवर धावतात आणि सरासरी ७५ लाख प्रवाशांची ने-आण करतात. या रेल्वेचं मुंबईकरांशी असलेलं नातं, मुंबईकरांनाच नव्हे तर मुंबई बाहेरच्यांनाही जवळचं वाटणारं आहे. 'जवळचं' म्हणताना गर्दी, चेंगराचेंगरी नाही आठवली तरंच नवल. प्रचंड गर्दीच्या या मुंबईतील लोकल प्रवासात, भाग्यवंतांनाच बसायला मिळतं, एरवी घोड्यासारखं उभं रहाण्यावाचून पर्याय नसतो.

मोझाम्बिकची निवडणूक: २

लेखक आतिवास यांनी सोमवार, 13/10/2014 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ 5 सप्टेंबर रोजी झालेल्या 'शांती करारा'बद्दल लिहायचं होतं खरं; पण काही कारणांनी ते जमलं नाही. आता त्याबद्दल लिहायचं तर बराच उशिर झालाय. आता निवडणूक झाल्यावर त्याबद्दल कदाचित लिहिता येईल - म्हणजे या कराराचा निवडणुकीवर नेमका काय परिणाम झाला हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे; आणि दुसरं म्हणजे निवडणूक झाल्यावर हा 'शांती करार' टिकेल की पुन्हा एका नव्या संघर्षाची सुरुवात होईल ते पाहायला हवं. मी आधीच्या लेखात लिहिल्यानुसार इथं लोक 'पक्षाला' किती मतं मिळतात ते महत्त्वाचं आहे.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १५ (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 09/10/2014 05:03 या दिवशी प्रकाशित केले.
आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट ही लेखमालिका आज संपली. ही मालिका प्रकाशित करु दिल्याबद्दल मी मिसळपाव प्रशासनाचा मनापासून आभारी आहे. ही मालिका आपल्याला कशी वाटली ते जरुर कळवा. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सॅन फ्रॅन्सिस्को १९०६ च्या एप्रिलमध्ये बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यातून अद्यापही सावरत होतं. जवळपास ८०% शहर भूकंपात उध्वस्तं झालेलं होतं. नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे पार करुन आलेल्या अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्‍यांच्या यशाने सॅन फ्रॅन्सिस्कोवासियांना या धक्क्यातून सावरण्याची उमेद मिळाली असावी.