Skip to main content

लेख

क्लिकक्लिकाट !

लेखक चिनार यांनी सोमवार, 02/03/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
नवरा- बायको रम्य अश्या एखाद्या हिल स्टेशन वर आलेले आहेत. छानशी संध्याकाळ झालेली आहे . गार वारा घोंगावतोय. निसर्ग सौंदर्य अगदी दृष्ट लागण्याइतकं मनमोहक आहे. इतक्या रम्य वातावरणामुळे असेल कदाचित पण नवऱ्याला कधी नव्हे ती बायको सुंदर दिसतेय. अशातच त्याला 'आज मौसम बडा बेईमान हैं' गुणगुणाव वाटतंय. तेवढ्यात ती म्हणते," चल ना फोटो काढू " पुढची पूर्ण संध्याकाळ तो तिचे, स्वत: चे ,त्यांचे फोटो काढतोय. त्या दोघांनी केलेली बेईमानी सहन न होऊन मौसम निसर्गाशी ईमान राखून शांत झालेला आहे ! वरील प्रसंग ओळखीचा वाटतोय का ? या सारखे कितीतरी प्रसंग आजकाल तुम्ही आसपास बघत असाल.

मन अतर्क्य....

लेखक निनाद जोशी यांनी सोमवार, 02/03/2015 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी मन खरंच किती चंचलअसतं. मनाचे झालेले समज,मनाने तयार केलेल्या अनेक दिवसांच्या ओळखी पूर्णपणे बदलायलाकाही क्षणच पुरेसे असतात. आपल्याला सर्वात जवळचा वाटणारा व्यक्ती काही क्षणातचइतका परका होतो कि ज्याच्या बरोबर आपण अनेक गोष्टी शेअर केलेल्या असतात त्यालानुसते समोर पाहायला हि आपल्याला नकोसे वाटू लागते. त्याच्याशी बोलणे तर सोडाचत्याचा आवाज ऐकला तरी आपल्या मनातील कोलाहल जागृत होऊ लागतो. अश्यावेळी मनाला शांतकरणे अगदीच अशक्य होते. हे मनाचे बदलच मानवी मनाला अतर्क्य बनवतात.

बाई, आज रातच्याला वाड्यावर या !!! - भाजपा

लेखक किरण८८७७ यांनी बुधवार, 25/02/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
"बाई, आज रातच्याला वाड्यावर या" निळू फुलेच्या पाटील/सावकारी भूमिकेची आठवण झाली न. बाईंना यावेच लागणार, अन अत्याचार झाल्यावरही कुणाकडे दाद मागायला मार्ग नाही. कारण आगोदरच सांगितलेय कि "आवाज बंद, कुणाकडे काही बोलायचे नाही. हुकुमशाही आहे". काय मार्ग राहायचा त्या बाईंना? वाड्यावर हजेरी लावायची अन मग रडत कडत थोडे दिवस काढायचे अन मग जिवाचे बरेवाईट करून घ्यायचे. मी का सांगतोय हे सगळे? २ दिवसातल्या घडामोडी पाहुन मला हे सर्व आठवले. फरक फक्त इतकाच कि त्या बाई म्हणजे "आपला गरीब शेतकरी" अन सावकार म्हणजे "भाजपा सरकार" .

गुंतागुंत - (पार्ट -२)

लेखक Maheshswami यांनी सोमवार, 23/02/2015 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
पार्ट -१ इथे वाचा.Part-1 "सत्याएन्शी रुपये साठ पैसे झाले साहेब", या वाक्याने जाग आली अभयला. रिक्षात झोपी गेला होता तो. स्टेशनहून ससूनपर्यंत रिक्षा पोचली, तेव्हाच झोप लागली बहुतेक आपल्याला. शंभराची नोट रिक्षावाल्याचा हातात देत म्हणाला "राहू द्या काका वरचे चहा पाण्याला", आणि घराकडे वळला. प्रवासानी अंग शिणून गेलं होतं. काश्मीर पासून पुणे, कितीही नाही म्हटलं तरी थकवणारा प्रवास होता. नेत्राला वाटेत डेक्कन वर ड्रोप करून आला होता. संध्याकाळी भेटायचं पण ठरलं होतं त्याचं. घरी जाऊन आता एक मस्त झोप काढणार होता तो . अकरा वाजता जाग आली.

गुंतागुंत - (पार्ट -१)

लेखक Maheshswami यांनी शनिवार, 21/02/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच , काश्मीरला स्वर्ग म्हणतात ते अजिबात खोटं नाहिये. आरामखुर्चीत बसून अभय विचार करत होता. त्या थंडगार हवेत , बर्फानी आच्छादलेल्या पर्वतांकडे बघत , गरमागरम चहाचे घुटके घेताना किती छान वाटत होतं. निसर्गाचं हे सौंदर्य पाहून, काल दिवसभर केलेल्या प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळून गेला होता. अभयला तर पहाटेपासून झोपच येत नव्हती. सगळी मित्रकंपनी अजून झोपूनच असेल म्हणून तो एकटाच हॉटेलच्या बाहेर येवून तिथल्या गार्डन कैफ़े मध्ये येवून बसला होता. काल रात्रीच बाकी मित्रांसोबत तो जम्मूला आला होता.

छत्रपती शिवाजी महाराज आणि कविराज भूषण

लेखक सव्यसाची यांनी गुरुवार, 19/02/2015 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! साधारण ५-६ वर्षापूर्वी रायगडला आमच्या ग्रुप ने भेट दिली होती. त्या भेटीमध्ये कविराज भूषण यांचे छंद आणि त्यातील लय यांच्या प्रेमात पडलो. परत आल्यावर भारत इतिहास संशोधक मंडळातील ग्रंथालयात 'शिवाबावणी' आणि 'शिवराज भूषण' चा शोध घेतला आणि बरेचसे छंद लिहून काढले. आज शिवजयंती निमित्त त्यातील काही इथे देण्याचा प्रयत्न करेन. या कवितेतील बऱ्याच शब्दांचा अर्थ मला माहिती नाही कारण त्या भाषेशी माझी इतकी जवळीक नाही. परंतु, कवितांचा साधारण अर्थ या निमित्ताने सांगण्याचा जरूर प्रयत्न करेन. १. ही कविता सगळ्यांनाच माहिती असेल.

जंटलमन्स गेम - १ - डॉलिव्हिएरा अफेअर

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 19/02/2015 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन अरलॉट गंभीरपणे आपल्या समोरील पत्रं वाचत होता. हिरव्या शाईने लिहीलेलं ते पत्रं शेकडॉ मैलांचा प्रवास करुन त्याच्या डेस्कवर येऊन पडलं होतं. पत्रं लिहीणारा सुमारे अठ्ठावीस - तीस वर्षांचा एक तरुण होता. आपल्या अंगी असलेल्या गुणांचं चीज व्हावं यासाठी आपल्याला एक संधी मिळवून द्यावी अशी त्याने अत्यंत विनम्र सुरात अरलॉटला पत्रातून विनंती केली होती! हे पत्रं म्हणजे एका अत्यंत वादळी प्रकरणाची नांदी ठरणार होतं! सोळाव्या आणि सतराव्या शतकात सर्व जगभर पसरलेल्या युरोपियनांनी व्यापाराच्या माध्यमातून हळूहळू आपली साम्राज्ये उभी करण्यास सुरवात केली होती.

घटस्फोट

लेखक शिरीष फडके यांनी मंगळवार, 17/02/2015 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
घटस्फोट 'लहानपण देगा देवा' असं म्हणण्या इतपत लहानपणीचे दिवस चांगले होते तिचे. पण कळायला लागल्यापासून किंवा कळत्या वयापासुनच दिवस पालटले. सतत घरातलं वातावरण तणावाचं राहू लागलं. वडिलांचं दारू पिण्याचं प्रमाण दिवसें-दिवस वाढत होतं. आणि दारूमुळे होणार्या आई-वडिलां मधल्या भांडणांचं प्रमाण देखील वाढतच होतं. तसं नाही म्हटलं तरी आधी तिला तिच्या भावंडांचा आधार वाटायचा. पण कालांतराने भावंडांमध्ये देखील तणावाचं वातावरण निर्माण झालं. घरातील प्रत्येक दिवस प्रत्येकजण तणावाखाली वावरत होता. घरात तणाव निर्माण होण्यासाठी किंवा भांडणं होण्यासाठी आता कुणालाच विषयांची कमतरता भासत नव्हती.

हर्षयुक्त उमापती

लेखक देवदत्त परुळेकर यांनी मंगळवार, 17/02/2015 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाशिवरात्री शिवाचे वर्णन करणारा संत नरहरी सोनार महाराजांचा हा लोकप्रिय अभंग आहे - भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥ गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥ भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥ सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥ या अभंगात महाराज शिवाच्या रुपाचे तसेच स्वरुपाचेही वर्णन करतात. कसा आहे तो महादेव ? नरहरी सोनार महाराज वर्णन करतात - भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥ शिवाने भस्माची उटी अंगाला फासली आहे.

त्रिकूट - भाग १

लेखक हजारो ख्वाईशे ऐसी यांनी बुधवार, 11/02/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
"चिवचिव" "चिवचिव" तिची तंद्री अखेर मोडलीच त्या आवाजाने. मान वेळावून न पाहता तिने तो आवाज पुन्हा ऐकला. हं! आल्या चिमण्या. रोजच येतात म्हणा. आणि रोजच आपण त्यांना खायला टाकतो. आज फरक फक्त इतकाच आहे की रोज ऑफिसला धावतपळत जायची घाई असते. धावतपळत?! स्वतःशीच हसली ती. रावी. तिचं नाव. एक नावाजलेली उद्योजिका. ती इंजिनीअर झाली तेंव्हाच ठरवून मोकळी झाली होती की आयुष्यभर कोणाच्या हाताखाली नोकरी नाही करणार. सुरूवातीची काही स्ट्रगलची वर्षे सोडली की स्वतःची कंपनी सुरू करायची. तिच्या धडाडीने आणि गुणवत्तेने ते फारसं अवघडही नाही गेलं म्हणा तिला.