भेटवस्तू
भेटवस्तू
पूर्वीच्या काळी दळणवळणाची फारशी साधनं नव्हती. एका गावातून दुसर्या गावात जाण्यासाठी बरेच दिवस लागायचे. कधी कधी तर कित्येक महिने प्रवासात जायचे. त्या काळी मुलगी एका गावातून दुसर्या गावात लग्न करून जाणं म्हणजे मुलगी फार दूर गेली असं आईवडिलांना वाटायचं. कारण कधी कित्येक दिवस, कधी कधी कित्येक महिने, कधी तर कित्येक वर्षं आईवडिलांची आणि मुलीची भेटच व्हायची नाही. जी काही भेट व्हायची ती पत्रातूनच. अशाच एका आईवडील आणि त्यांच्या लाडक्या मुलीच्या बाबतीतली ही एक छोटीशी गोष्ट.
मुलीचं नुकतंच लग्न झालं आहे. लग्न होऊन ती दुसर्या गावात (सासरी) नांदायला गेली आहे.
मिसळपाव