Skip to main content

लेख

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ३)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 23/02/2016 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ ------------- जुनागढ हे आजच्या गुजरात मधील एक संस्थान. इथल्या नवाबाने १५ ऑगस्ट १९४७ ला माउंटबॅटनच्या भौगोलिक जवळिकीचा सिद्धांत धुडकावून लावत पाकिस्तानात सामील व्हायचा निर्णय घेतला. युक्तिवाद होता, समुद्रमार्गे पाकिस्तान जवळ आहे. मंगरूळ आणि बाबरीवाडा हे जुनागढचे दोन अंकित प्रदेश होते. त्यांनी जुनागढच्या नवाबाच्या इच्छेप्रमाणे पाकिस्तानात सामील होण्यास नकार दिला. म्हणून नवाबाने या दोन प्रदेशात आपले सैन्य पाठवले. त्यामुळे आजूबाजूची इतर संस्थाने खवळली आणि त्यानी आपापले सैन्य जुनागढच्या सीमेवर नेवून भारतीय सरकारला साकडे घातले. आणि जुनागढ मध्ये एक अस्थायी सरकार देखील स्थापण्यात आले.

बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/02/2016 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - १ .....या सर्व कारणाने जर्मनीने ऑपरेशन बार्बारोसा आखले आणि अमलात आणले.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जाता जाता या मोहिमेचे नाव हिटलरने बार्बारोसा का ठेवले हे पाहणे मनोरंजक ठरेल. बार्बारोसा या जर्मन शब्दाचा अर्थ होतो लाल दाढीचा किंवा लाल केसांचा (रानटी ?) माणूस.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग २)

लेखक Anand More यांनी सोमवार, 22/02/2016 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ------------------------ आजचा आपला भारत देश म्हणजे ब्रिटीशांच्या अखत्यारीतला संपूर्ण भूभाग नाही. ब्रिटीशांच्या अमलाखालील भारताची एकदा रद्द केलेली आणि तीनदा सर्वमान्य झालेली विभागणी / फाळणी झाली. १९०५ सालची बंगालची फाळणी ही पहिली फाळणी. ती लोकक्षोभामुळे ब्रिटीशांनी मागे घेतली. मग १९१९ साली दुसरी फाळणी झाली, ती जुन्या भारतीय संस्कृतीचा भाग असलेला सुदूर उत्तर-पश्चिमेच्या एक मोठ्या भागाने स्वतःला ब्रिटीश साम्राज्यापासून स्वतंत्र घोषित केल्याने. हा भाग होता प्राचीन भारतातला, ‘गांधार’. रामायणकालीन भरताने जिंकलेला गांधार. (भरताच्या तक्ष या पुत्रावरून तक्षशीला आणि पुष्कल या पुत्रावरून पुष्कलावती या शहरांची नावे पडली असे मानतात. प्रसिद्ध इतिहासतज्ञ दामोदर कोसंबींनी, तक्षक या नागाचे शहर म्हणून तक्षशीला अशीही व्युत्पत्ती सांगितली आहे.) बामियानच्या बुद्धमूर्तींची भूमी असलेला गांधार, मगधाधीपती धनानंदाकडून अपमानीत होऊन मगध सोडून विद्यार्जन आणि विद्यादान ही दोनही कामे आयुष्याच्या मोठ्या कालावधीसाठी आचार्य चाणक्यांनी जिथल्या विद्यापीठात पूर्ण केली त्या तक्षशिलेचा गांधार. म्हणजेच आजचा अफगाणिस्तान.

राष्ट्रीय आयोगाचा सोन्यासारखा निर्णय.....

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 22/02/2016 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यासारखे मोठे सण जवळ आले की फ्रीज, टी.व्ही. अशा किमती वस्तूंच्या खरेदीवर मोठी सूट, हप्त्याने खरेदीच्या योजना, किंवा मोठी भेटवस्तू इ. चा सुकाळ असतो. यामध्ये अलीकडे स्क्रॅच कार्ड योजनेची भर पडली आहे. या योजनेमध्ये खरेदीच्या वेळी बिलासोबत एक कार्ड दिले जाते. त्यावरील एक छोटेसे आवरण खरडले की खाली एका वस्तूचे नाव, चित्र किंवा क्वचित रोख रकमेचा आकडा लिहिलेला असतो. ग्राहकाला बक्षीस म्हणून मिळालेली ही वस्तू, किंवा रक्कम देण्याची मुख्य जबाबदारी योजना जाहीर करणाऱ्या उत्पादकाची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून वस्तू विकणाऱ्या वितरकाची असते.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग १)

लेखक Anand More यांनी रविवार, 21/02/2016 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
"विष्णू पुराण" म्हणते की, उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।। म्हणजे राजा भरताचे साम्राज्य आसेतुहिमाचल होते. पण या सम्राट भरताच्या पुढच्या पिढ्या जगात येईपर्यंत ते खंड खंड झालेले होते. महाभारत काळाततर कुठे जरासंधाच्या मगधासारखी साम्राज्यवादी राजेशाही नांदत होती, तर कुठे मथुरेसारखी छोटी छोटी गणराज्ये. म्हणजे भरताच्या वंशजांना "आम्ही चालवू हा पुढे वारसा" काही जमले नसावे.

बेधुंद (भाग ३) - Revised !

लेखक अविनाश लोंढे. यांनी रविवार, 21/02/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
(काल पोस्ट केलेला बेधुंद ३ हा धागा उडवला गेला आहे , जास्त वास्तवदर्शी लिहिण्याच्या नादात कदाचित जास्त ' भडक'झाला असावा …काय करणार वास्तव जास्त भडक असत ! , असो आज पुन्हा उजळणी करून पोस्ट करतोय , धन्यवाद ! ) मार्च २००६ : नित्या ,अक्षा , सुऱ्या अन चंद्या होस्टेल च्या बाहेर आले , कधीकधी मनात खूप विचारांचं थैमान असलं कि बोलायला काही शब्द उरत नाहीत , मनाच्या तळात अंधाराशिवाय काहीच दिसत नाही ! होस्टेल च्या समोर असलेल्या 'डांबरी' रस्त्यावर ते पोहचले . कॉलेज च्या जीवनात संध्याकाळ सुद्धा अगदी सकाळ सारखीच असते , ताजीतवानी !

बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग -१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 18/02/2016 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कबूल केल्याप्रमाणे या विषयावरचा शेवटचा लेख लिहायला घेतला आहे. विषय मोठा व थोडासा कंटाळवाणा होण्याची शक्यता आहे पण दुसर्‍या महायुद्धातील वाचावेच असे हे एकंदरीत प्रकरण आहे. तेव्हा थोडा धीर धरुन वाचावे ही विनंती. किती भाग होतील हे सांगता येत नाही पण मधेच गायब होऊ नका.... :-) भाग -१ १९४१ साली, जून महिन्यात जर्मनीचे १४६ डिव्हिजन सैन्य रशियाच्या आघाडीवर आक्रमणास तयार होते. त्यात जे सैन्य होते त्याची खालील यादी नजरेखालून घातल्यास त्यांच्या तयारीची कल्पना येते. मला स्वत:ला हे सैन्य त्या आघाडीवर कसे हलवले असेल याचा नेहमीच अचंबा वाटतो.

इंग्रजी स्पेलिंग्ज इतकी तर्कशून्य का?

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 16/02/2016 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझं शिक्षण मराठी माध्यमातून मजेत चाललं होतं. पण मुंबईला स्थलांतरित झालो, आणि समस्या उभी राहिली. जवळच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळेना. किंग जॉर्ज शाळेत त्याच वर्षी इंग्रजी माध्यम सुरू होत होतं. तिथे प्रवेश मिळाला आणि मी रुजू झालो. नशिबानी माझे सगळेच वर्गमित्र मराठी माध्यमातून आले असल्यामुळे आम्ही सगळेच बावचळलेले असायचो. आमचे इंग्रजीचे शिक्षक अतिशय उत्तम शिकवायचे. थोड्याच महिन्यात त्यांनी आम्हाला अज्ञानाच्या चिखलातून काढून गोंधळाच्या धुक्यात आणून सोडलं. पण ती चूक आमच्या शिक्षकांची अजिबात नव्हती. इंग्रजी भाषेची होती. त्यांनी आम्हाला उच्चारांचे नियम शिकवले.

बेधुंद (भाग २ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी सोमवार, 15/02/2016 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षला ने त्याचा हात झटकला , आपले डोळ्यावर आलेले केस बाजूला करत ती बोलली - 'नको ना नितेश , प्लीज …. जसा हर्षला ने त्याचा हात झटकला , तस नितेशच मनही त्याला झटके देऊ लागले , अन त्या झटक्याने त्याला २ महिन्यापूर्वीची त्याची आयुष्याला कलाटणी देणारी घटनेत अडकवले . अन तो काही क्षणासाठी स्तब्ध झाला . साधारण दोन महिन्यापूर्वी : जवळपास एक वर्ष 'चोरून' सुरु असलेल 'त्याच अन हर्षला'च प्रेम प्रकरण आता 'जगजाहीर' झालं होत . काही गोष्टी कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी लपत नाहीत !

प्रेम !!! ???

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 15/02/2016 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम दिवसाच्या निमित्ताने ही आठवण! आपल्या प्रियतमेची मोजून ५३ वर्षे, सात महिने, एकरा दिवस आणि अकरा रात्री , निरंतर वाट पाहणारा प्रियकर खऱ्या जगात असतो कि नाही माहित नाही, पण Gabriel García Márquez च्या ‘Love in the Time of Cholera’ या सुमारे साडेतीनशे पृष्ठांच्या कादंबरीत तो परतपरत जगतामरता भेटत राहतो. मूळ Spanish भाषेत लिहिलेली ही कादंबरी १९८५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि १९८८ साली त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. यावर आधारित याच नावाचा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. तसे सरधोपट कथानक! किशोरवयीन फ्लोरेन्तिनो फार्मिनाच्या प्रेमात पडतो. बिचारा गरीब असतो.पण त्याचे प्रेम भारी असते.