आताच समजलेल्या बातमीनुसार गुरुवार दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री झोपेतच त्यांचे निधन झाले. एक अविश्रांत धडपडणारा, कर्तबगार, करारी जीव मृत्यूला शांतपणे सामोरा गेला. त्यांना शेवटपर्यंत काहीही मोठे आजारपण नव्हते. सगळे काही अचानक घडल्याने त्यांचा मुलगा अभिजित इकडून लगेच जाऊ शकलेला नाही.
मागल्या वर्षी आजोबांची भेट इथे झाली आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित लेखमाला मला लिहिण्याचे भाग्य प्राप्त झाले हा माझ्या आयुष्यातला एक मोठा आनंदाचा आणि आगळ्या समाधानाचा काळ होता. त्यांचे थोडे तरी अनुभव शब्दबद्ध होऊ शकले हा मोठा योगच.