मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बातमी

हिरा हरपला - भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे देहावसान!

अनिता ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
निशब्द ..... ** आपल्या सर्वांचे लाडके मा. पं. भीमसेन जोशी यांचे निधन झाल्याची बातमी आताच याहु वर वाचली. त्यांना दिलेल्या "भारतरत्न" ह्यापुरस्काराने त्या पुरस्काराचीच शोभा वाढली. त्यांच्या बहुढंगी गायनामुळे आणि भारदस्त आवाजामुळे ते चिरकाल आपल्या स्मरणात राहतील. अशा ज्येष्ट आणि श्रेष्ठ प्रभूतीला माझी मिसळपाव परिवारातर्फे श्रद्धांजली. - हंस http://www.misalpav.com/node/16435 ** आवाहन! मित्रहो, इथे संगिताचे शौकिन आणि जाणकार खूपच आहे. तेव्हा या धाग्यावर पंडितजींना श्रद्धांजली वाहताना तुम्हाला आवडलेले त्यांचे गायन / गाणे इत्यादि आणि त्याबद्दल चार शब्द येऊ द्या.

"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"

चिंतामणी ·
लेखनविषय:
आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली. जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्‍मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्‍मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला.

क्षारांमुळे नापीक झालेल्या जमीनी

चिंतामणी ·
लेखनप्रकार
कालच्या सकाळच्या Today पुरवणीत एक बातमी होती. क्षारांमुळे नापीक झालेल्या जमीनी बद्दल. त्यात म्हणले होते की "ह्या जमीनी ४० वर्षापासुन पडीक आहेत. हे संशोधकांसाठी आव्हान आहे." सविस्तर बातमी येथे वाचा. http://72.78.249.107/Sakal/2Jan2011/Enlarge/PuneCity/PuneToday/page2.htm काही दिवसांपुर्वी लोकप्रभामधे एक लेख आला होता. त्यात गुजराथमधल्या एका गावाने, कोडिनार त्याचे नाव, या क्षाराच्या समस्येला कसे तोंड दिले याची सविस्तर माहिती दिली आहे. त्यातील काही भाग. गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या क्षारग्रस्त ३०० गावांनी विकासाचं एक नवं मॉडेल उभं केलं.

अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार

चिंतातुर जंतू ·
लेखनप्रकार
भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाङ्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. वाङ्मयाची आणि कलेची आस्वाद मीमांसा आणि समीक्षा या विषयांतल्या केळकरांच्या काही लेखांचं संकलन या पुस्तकात आहे. म्हैसूरची भारतीय भाषा संस्था (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिअन लँग्वेजेस), मुंबईची राज्य मराठी विकास संस्था, पुण्याची मराठी अभ्यास परिषद अशा संस्थांमागे केळकरांची प्रेरणा आणि त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. वैखरी, मध्यमा वगैरे त्यांची भाषाविषयक पुस्तकंही मराठीत यापूर्वी रसिकप्रिय झाली आहेत.

मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी

देवदत्त ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
साधारण २००६ पासून ऐकण्यात असलेली ’मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी’ सुविधा अखेर २५ नोव्हें २०१० पासून हरियाणामध्ये सुरू झाली. इतर भागांत ती २० जाने २०११ पासून सुरू होईल अशा बातम्या आहेत. मी ह्या ४ वर्षांत ३ क्रमांक बदलले. पण ह्या सुविधेचा मला फायदा झाला नसता, कारण माझे शहर आणि मोबाईलचे क्षेत्र ह्यांतच बदल होत गेला. आणि सध्यातरी ह्या सेवादात्याकडून एकदम बदलूनच टाकावे अशी काही वाईट सेवा नाही. तरीही ही सुविधा नेमकी कशाप्रकारे वापरता येईल हे पहायचा प्रयत्न केला.

सायलेंट रायफल ड्रील

जयंत कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
यात वापरलेल्या रायफल्स ३०३ आहेत. या टीमला या स्पर्धेचे पहीले बक्षीस मिळाले.

लेखन स्पर्धा २०१०

अर्धवट ·
लेखनप्रकार
नमस्कार, गेली काही वर्षे मराठी आंतरजालाची उत्तरोत्तर प्रगती होते आहे. मराठी ब्लॉग्स, मीमराठी.नेट सारख्या मराठी सोशल नेटवर्किंग संस्थळावर अनेक मराठी जालकर नियमित लेखन करीत असतात. अनेक उत्तम ब्लॉग लेखक, लेखक मराठी आंतरजालावर प्रसिद्ध झाले आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा याबाबतची माहिती आवश्यक त्या वेगाने सर्व जालकरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवर लिहिणारे जालकर अनेक उत्तम ब्लॉग्सबाबत अनभिज्ञ असतात, तर बहुतेक ब्लॉगर हे अशा सोशल नेटवर्किंग संस्थळावर फारसे दखलपात्र लेखन न होता ते निव्वळ वेळ घालवण्याचे कट्टे असतात असे समजतात.

ब्लॉग माझा - ३ : विजेत्यांचे अभिनंदन

छोटा डॉन ·
लेखनविषय:
सालाबादप्रमाणे ह्या ही वर्षी स्टार माझा आयोजीत 'ब्लॉग माझा' ह्या मराठी आंतरजालावर मुक्तपणाने आणि उत्साहाने भरभरुन लिखाण करुन आपल्या मायबोली मराठीच्या सेवेत असलेल्या मराठी जालनिशीकारांची ( मराठीत ब्लॉगर्सची ) स्पर्धा मोठ्ठ्या उत्साहात आणि जोशात पार पडली. नेहमीसारखाच ह्या ही वर्षी स्पर्धेला स्पर्धकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला असेल ह्याची खात्री आहे. लोक लिहीतच असतात, प्रतिसाद मिळाले तरी लिहतात आणि नाही मिळाले तरी जास्तच पेटुन लिहतात.