Skip to main content

बातमी

बेळगावी मराठी बांधवांवर हल्ला: सीमावासीयांनो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 13/07/2010 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
काल दि. १२ जुलै २०१० रोजी बेळगाव शहरात सीमावासीयांनी मराठीचा झेंडा फडकावत बेळगावात उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चावर कर्नाटक सरकारने अमानुष लाठीमार केला. शांततेने चालणार्‍या मोर्चावर अचानक लाठीमार करून सीमावासीयांच्या भावना कर्नाटकी सरकारने पायदळी तुडवल्या. म्हातार्‍या कोतार्‍या माणसांनाही पोलीसांनी सोडले नाही. केंद्रसरकारला अजून किती वेळा लाठीमार व सीमावासीयांचे बळी हवेत? न्याय्य मागण्यांना न्याय मिळेल की नाही? सीमाबांधवांनो, तुम्ही एकटे समजू नका.

ध्वनी - गॅरे कैझर या लेखकाच्या दृष्टीकोनातून

लेखक शुचि यांनी गुरुवार, 08/07/2010 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल फिरायला जाताना मी आणि नवरा इकडच्या तिकडच्या विषयांवरच्या गप्पा मारत होतो. सहज विषय निघाला "कोबेअर रिपोर्ट" शो चा. मध्यंतरी व्हरमाँट चा एक लेखक या शो मधे येऊन गेला. या लेखकाचं नाव "गॅरे कैझर". त्यानी या शो मधे काही नावीन्यपूर्ण विचार मांडले होते - ध्वनी या विषयावर. या लेखकाने एक पुस्तक लिहीले आहे "द अन्वाँन्टेड साऊंड ऑफ एव्ह्रीथिंग वी वाँट" घरी जाऊन मी मी जालावर त्याचे विचार वाचले आणि पुढील काही रोचक गोष्टी सापडल्या. त्या या लेखाकाच्या शब्दात- "उपासमार, महायुद्ध, पृथ्वीचे सातत्याने वाढणारे तापमान आदि समस्यांशी तुलना केली तर ध्वनी ही अजीबात समस्या वाटत नाही.

लिएंडर पेसचे १२वे ग्रँडस्लॅम विजेतेपद!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 06/07/2010 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ल्डकप फुटबॉलच्या रणधुमाळीत आपल्या (सुद्धा) नजरेतून एक महत्त्वाची बातमी सुटली म्हणायची! आपला लिएंडर पेस आणि झिम्बाब्वेची कॅरा ब्लॅक ह्या द्वितीय मानांकित जोडीने दक्षिण आफ्रिकेचा वेस्ली मूडी आणि अमेरिकेची लीसा रेमंड ह्यांचा ६-४, ७-६ (५) असा सरळ सेट्स मध्ये पराभव करून २०१० चे विम्बल्डन मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. पेसचे हे सहावे मिश्र दुहेरी तर एकुणात १२ वे ग्रॅन्डस्लॅम विजेतेपद आहे.

पावनखिंडीतली लढाई - ३५०वा स्मृतीदिन - २७ जुलै २०१०

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 04/07/2010 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी ही माहिती कळली. ती इथे प्रसिद्ध करायची विनंती झाली म्हणून हे प्रकाशित करत आहे. *** नमस्कार, येत्या २७ जुलैला पावनखिंडीतील रणसंग्रामाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने मी पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड असे पालखी घेऊन पदभ्रमण करायचे ठरविले आहे. आपल्या सहकार्यानेच हा ३५० वर्षांपूर्वींचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे. ह्या मोहिमेत सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करूया. सानथोर सर्व शिवप्रेमी ह्या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. सर्वांनाच तो ऐतिहासिक प्रसंग अनुभवता यावा असेच मोहिमेचे नियोजन केलेले आहे. तसेच आपल्या मित्रमंडळींना सुद्धा ह्या कार्यक्रमाची माहिती द्यावी.

गाय आणि विदाकेंद्रे (अर्थात डेटा सेंटर्स)

लेखक विकास यांनी सोमवार, 28/06/2010 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
Source: lbl.gov
left
आपण जे काही इंटरनेट वापरत असतो, ऑफिसातील कामात विदाचे आदानप्रदान करत असतो, साठवत असतो, त्या सर्वाला विदाकेंद्रे अर्थात डेटासेंटर्स लागतात. अनेक सर्वर्स जोडलेली ही क्रेंद्रे अथक आणि अहोरात्र कार्यरत असतात. प्रचंड उर्जा खर्च होत असते.

भारतीय टपाल खात्यातर्फे आता नागरिकांसाठी पोस्टल ओळखपत्र

लेखक अरुंधती यांनी रविवार, 27/06/2010 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय टपाल ऑफिस गाईडच्या ६३ व्या कलमान्वये आता पोस्टल ओळखपत्र देण्यात येणार आहे. अनेकदा लोक आपापले निवासस्थान बदलतात. त्यांना आपल्या नव्या पत्त्याचा सरकारी पुरावा सादर करणे बर्‍याचदा अवघड होऊन बसते. भारतीय टपाल खात्याने त्यावर एक उपाय शोधला आहे. टपाल खात्याकडून तुम्हाला आता तुमच्या निवासाचा पुरावा तुमच्या फोटोसहित मिळवता येतो. टपाल खाते हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांच्याकडून मिळणारे ओळखपत्र हे ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र इत्यादींप्रमाणेच प्रमाणित ठरते.