Skip to main content

आस्वाद

सविताभाभी

लेखक ब्रिटिश यांनी शुक्रवार, 12/03/2010 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
पाचेक वर्सापुर्वी जगन मारवाड्यान गावान दुकान टाकलवत. ईन मीन तिनशे घरं. कीराणा आनाला पार हायवे पोतूर जाव लागाच. सरपंचान जराशी जमिन दिल्लीवती. त्याच्यानच खोपटीसारक दूकान न पाटीमाग रायची खोली. मारवाड्याच लग्न झाल्त पन येकटाच आल्ता. आस्ती आस्ती गावची नाडी त्यान पकरली. लोकांना ऊधार द्याची सुरवात केली. उधारी वाडली क त्यांचेकडशी भात घेवाचा न मार्केट मदी विकाचा. आनि उधारी कती पैशे लावाचा ते त्याजं त्याला माईती. पाच वर्सात पक्क दुकान केल. खाडीजवल येकराच जमीनीत घर बांदल. न धा बारा दीवस आदी बायकोला झेउन आला. त्याला पॉर नवत. मना तो सगल काय सांगाचा. माजि न त्याची लय संगत व्हती.

बतावणी!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 12/03/2010 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
(स्थळ - क्षीरसागर, विष्णूंचा महाल. एका कोचावर गरुड लॅपटॉपवर 'मिपा मिपा' खेळतोय! टीपॉयवर काही आध्यात्मिक ग्रंथ पसरुन ठेवलेत.) (आतल्या खोलीतून) लक्ष्मी : अहो! अहोऽऽ!! लगबगीनं बाहेर येत : आँ..कुठे कडमडले हे आता? (गरुडाकडे पहात) : ए चोच्या, कुठैत रे हे? अं...आँ....कोण कुठे? अरे अं आँ काय? हे कुठे गेलेत आत्ता सकाळी सकाळी विचारतेय मी? हां हां ते होय, ते मगाशीच बाहेर पडले! जाताना काही सांगितलं नाही पण 'मानससरोवर' असं काहीतरी पुटपुटत होते! मानससरोवर?? इतक्या लांब आणि तुला न घेता कसे गेले? मला काय माहीत?

शब्दबंध २०१०

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 10/03/2010 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे. =========================================================================== २००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०! परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय.

इमर्जन्सी! -१

लेखक प्राजु यांनी रविवार, 07/03/2010 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
इमर्जन्सी.. दि. मार्च १, २०१०. सकाळपासून चहाशिवाय चालत नाही या सबबी खाली टमरेल भरून चहा, आणि सोबत बरंच सटरफ़टर खाऊन झालं होतं. वेळ जात नव्हता म्हणून की काय अधे मध्ये (खाण्यातून ) वेळ मिळेल तेव्हा, इमेल चेक करणे, त्यांना उत्तरे देणे, आणि घरातलं काम हे ही करत होते. आदल्या दिवशी होळीरे होळी पुरणाची पोळी असा शंख करत पुरणाच्या पोळ्या हादडल्या होत्याच. पुरणाची पोळी दुसरे दिवशी सुंदर लागते, त्यामुळे ती खायला हवीच, अशी मनाची समजूत घालून भरपेट नाष्टा केल्यावर , दुपारचं जेवणंही तितकंच व्यवस्थित केलं होतं.

नल सरोवर

लेखक Manish Mohile यांनी मंगळवार, 02/03/2010 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
दिनान्क ७ फेब्रुवारी २०१० - रविवार. सकाळी ६:१५ वाजता आम्ही घरून निघालो - नल सरोवर ला जाण्यासाठी. नल सरोवर पक्षी अभयारण्य - अहमदाबाद पासून साधारण ६० किलोमीटर दूर असलेले एक सरोवर. क्षेत्रफळ ११६ चौ. कि. या सरोवराच्या मध्ये छोटी छोटी बेटे आहेत . त्या बेटान्वर आणि सरोवराच्या पाण्यामध्ये पक्षी निरीक्षण करायचे. गुजरातमधले हे सगळ्यात प्रसिद्ध पक्षी अभयारण्य. दर हिवाळ्यात येथे खूप वेगवेगळे परदेशी पक्षी स्थलान्तर करून येतात. आम्हालाही काही दुर्मिळ पक्षी बघायला मिळतील अशी आशा मनात धरून आम्ही निघालो. साधरण तासा सव्वा तासाचे अन्तर. सकाळचा प्रसन्न करणारा गारवा वातावरणात होता.

झणझणीत

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 01/03/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! आज रंगपंचमीच्या निमित्ताने माझे हे रंगीत उद्योग.

जेवण

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 01/03/2010 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
या. आज उशीरा आलात मास्तर. तिकडे नको इकडे बसा की पलंगावर. पंख्याचा वाराही येतो तिथं. लवकर काय अन उशीरा काय? घरी एकट्या असणार्‍याला वेळेचे काय? आसं कसं वेळेवर जेवण झालं ठिक असते प्रकृतीला. सगळ्या गोष्टी वेळेवर व्हायला पाहिजे. तुमचे बरोबर आहे हो. पण वेळेआधी जेवले म्हणजे सगळाच प्रॉब्लेम. अन बाकीचे मेंबरं पण काय म्हणतील? बाकीचे मेंबरं काय हो, गप जेवतात अन जातात. तुमचे कसे सगळे वेगळेच आहे. म्हणून तर मी तुम्हाला निरनिराळे पदार्थ देते, खावू घालते. इतरांना देत नाही असले काही. अहो, तुमच्याकडे आम्ही काय जेवायला येतो का नुसते? पोट पुर्ण भरले तरच जेवणाची मजा आहे.

ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली

लेखक नितीनमहाजन यांनी गुरुवार, 25/02/2010 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात एकांतवासात असताना त्यांची काव्यप्रतिभा बहरली. त्या उर्मीतच त्यांना "कमला" सारखी खंडकाव्येही स्फुरली. या कविता शब्दबध्द करण्यासाठी त्यांनी बारीबाबाकडे कागद व टाकाची मागणी केली. त्या अक्कलशून्य, बिनडोक व उलट्या काळजाच्या बारीबाबाने ती मागणी मान्य केली नाही. सावरकरांची काव्यप्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी त्यांच्या कोठडीच्या छोट्याशा गवाक्षातून दिसणार्‍या आकाशाला विनंती केली की तू माझ्यासाठी कागद व्हायला तयार आहेस का? त्या घमेंडखोर आकाशाने उत्तर दिले: तुझी लायकी आहे का माझ्याशी बरोबरी करायची?