बर्फशिल्प

लेखनप्रकार
'मिपा' चं कलादालन खर तर फारच समृद्ध आहे. तरीही मला हे जे पाहायला मिळालं त्याची भर या कलादालनात घालावीशी वाटली ...

माय मराठी महोत्सव- निळू दामल्यांशी गप्पा

लेखनप्रकार
मराठी ग्रंथप्रदर्शनात अक्षरधारा हे नाव आता इतके रुजलय कि ग्रंथप्रदर्शन म्हणले कि अक्षरधारा असे समीकरण रुजलय.अक्षरधारा तर्फे मराठी वाचकांसाठी सातत्याने काही उपक्रम राबवले जातात. त्यात वेगवेगळ्या साहित्यिकांशी गप्पा हा प्रमुख कार्यक्रम असतो. काल निळू दामल्यांची मुलाखतीचा कार्यक्रम पहायला/ ऐकायला टिळकरोडच्या मराठा चेंबर्सच्या सभागृहात गेलो.

सध्याचे वाचन ...

लेखनप्रकार
नुकत्याच पुणे फेरी मधे काही पुस्तके विकत घेउन आलो. तु.मा.सा. इथे डाकवत आहे: १. चर्चबेल लेखकः ग्रेस ललित लघुनिबंध आहेत ग्रेस यांचे. सुंदर भाषा, कधी कधी दुर्बोध वाटणारे ग्रेस यातही तसाच वावर करतात. वाचताना त्यांच्या भावविश्वाची, विविध गोष्टींकडे बघण्याची त्यांची कवी-द्रुष्टी यांची अनुभुती येते. एका निळ्या जगात, जेथे आपण एकटे असतो, तेथे हे पुस्तक आपल्याला घेउन जाते. सुंदर लेखन !! जरूर वाचा. २. पांगिरा. विश्वास पाटिल यांची सुंदर कादंबरी. एका गावाची ही कथा आहे.

शुभ्र काही जीवघेणे

लेखनविषय:
लेखनप्रकार
अंबरीष मिश्र ह्यांचं “शुभ्र काही जीवघेणे” हे पुस्तक नुकतंच वाचलं. पुस्तकाचं नाव वाचूनच आत काहीतरी झालं. पुस्तक नक्कीच काहीतरी खास असणार असं वाटलं. अंबरीष मिश्र ह्या लेखकानं मराठीत इतक्या सुंदर नावाचं पुस्तक लिहावं…म्हणजे थोडं आश्चर्यच वाटलं. थोड्याशा कुतूहलानेच पुस्तक वाचायला घेतलं आणि लेखकाची पुरती फॅन झाले. काही मनस्वी कलाकारांबद्दल ह्या लेखकाने असं काही लिहिलंय ना……. की त्या कलावंताच्या प्रेमात पडावं की लेखकाच्या…… ह्याच संभ्रमात पडायला होतं. लिखाण असं काही काळजात घुसतं ना…..!!

"रत्नपारखी शिवराय - भाग २ : कान्होजी जेधे".....एक झलक

लेखनविषय:
लेखनप्रकार
सप्रेम नमस्कार मंडळी ! दिनांक ७ जून २००९ रोजी माझे पहिले पुस्तक "रत्नपारखी शिवराय - भाग १ : बाजी पासलकर" प्रकाशित झाले आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळतो आहे.या छोटेखानी पुस्तिकेद्वारे मी काहि वाचकांच्या मनापर्यंत पोचलो याची साक्ष देणारे अनेक फोन्स , ईमेल्स , पत्र येतात त्यावरून लक्षात येते आहे.आता "रत्नपारखी शिवराय - भाग २ : कान्होजी जेधे" जे ८५ % लिहून झाले आहे पण गेले सुमारे सव्वा वर्ष ते ८५ % एव्हढेच पूर्ण राहिले आहे ते लिहायला घेण्याचा मानस आहे.यासाठी एक सुरेख संधी पण डोंबिवलीच्या रोटरी क्लब ने उपलब्ध करून दिली आहे - १६-१७ जानेवारीला रायगड्-प्रतापगड वारी (हो आम्हा शिवप्रेमींस

अंत:स्थ

लेखनविषय:
एकविसावे शतक शेती आणि शेतक-यांसाठी, अनेक संकटे घेऊन आले. दुष्काळ, वीज, महागाई, व्यवस्थेतील धर्म, जात, भाषा, उद्योग, लोकशाही, माणूसपण, हे आणि असे कितीतरी प्रश्न आणि त्याची संदिग्ध उत्तरे याची आकडेमोड करत बसलो तर केवळ निराशा वाट्याला येते. माणूस हताश होतो. वर्तमानातील या सर्व वास्तवाला सामोरे जात संवेदनशील माणूस कुठेतरी व्यक्त होत असतो. अशाच एका व्यक्त होणा-या कवीची ओळख करुन द्यावीशी वाटते आणि हा कवीमाणूस आहे, डॉ.सर्जेराव जिगे.

थोडसं मनातलं..........

लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्ही कधी कोणाला एखाद्या गोष्टीत तल्लीन झालेलं बघितलं आहे का? म्हणजे एखादा गायक गाणं गाता गाता एखाद् वेळेस एकरूप होतो त्या गाण्याशीच. किंवा रंगमंचावर काम करता करता एखादा अभिनेता त्या भूमिकेशी एकरूप होउन जातो. मग कशाचंच भान उरत नाही त्याला. सगळ्या जगाचा विसर पडावा आणि आपण स्वतःच आपल्या कलाकृती सह विश्व व्यापून रहावं अशी ही अवस्था. खरं तर स्वतःचं अस्तित्व अशी काही गोष्टंच उरत नाही अशा वेळेस. मी, माझं गाणं, माझा आवाज, माझा अभिनय, माझी कलाकृती असं काही मनात येतच नसावं अश्या वेळेस, ईतकी भारून टाकणारी ती अवस्था असते. आणि याचा अनुभव ती अवस्था बघणार्‍यालाही येते.
Subscribe to आस्वाद