Skip to main content

आस्वाद

खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 26/08/2010 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत सध्या खासदारांच्या पगारवाढीचा मुद्दा देशात सर्वदूर गाजतोय. खासदारांच्या पगारवाढीबद्दल सर्वसामान्य जनतेत विशेषत: शेतकरी वर्गात प्रचंड रोष असणारच, असे गृहीत धरून आलेली संधी "कॅश" करायला हवी, अशा उद्देशाने एका संपादकाने मला मेल केली. त्यातील मजकूर असा.

शेरलॉक होम्सचे जग

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी बुधवार, 25/08/2010 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
शेरलॉक होम्सचे जग भाग १ पूर्वप्रकाशित: मायबोली आणि माझा ब्लॉग शेरलॉक होम्स हा विषय बर्‍याच दिवसांपासून मनात घोळतो आहे. विषय इंटरेस्टींग आहेच; त्याबद्दल असंख्य ठिकाणी छापून, लिहून आलेलं वाचूनसुद्धा शेरलॉकबद्दल मला लिहावं वाटत आहे - सखोल कायसं म्हणतात ते करायचा भुंगा डोक्यात गुईंगुईं करतोय. म्हणजे आंघोळ करताना नाही का एका कानात पाणी जातं आणि कितीही काही केलं तरी कानात सुईंफूईंबीईंईं असा आवाज चालुच राहातो तसं. हो..हो..शू:क्क्क्क..विषय गंभीर आहे..हे आवाज बिवाज बास आता.

कलात्म :- गोष्ट नव्या विचारांची... !!!

लेखक विनायक पाचलग यांनी मंगळवार, 24/08/2010 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी कलात्म हा विशेषांक वाचल्यानंतर लिहिलेले काही ... कला हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच, कलेच्या विविध अंगावर सातत्याने चर्चा होत आलेली आहे. त्याशिवाय, वेगवेगळया perspective ने त्याचा अभ्यासही झाला आहे, होत आहे. मात्र कलेचा सामाजिक अंगाने फारसा अभ्यास झालेला दिसत नाही, निदान मोठ्या प्रमाणात झालेला नाही असे मला वाटते . म्हणूनच या विषयाला वाहिलेला "कलात्म" विशेषांक हे एक युनिक प्रॉडक्ट आहे. तसे पहायला गेले तर कलेवर सामाजिक अंगाने १० वर्षापूर्वीच काही व्हायला हवे होते , नाही का? पण, ते आत्ता होतयं!! असो , देर हे लेकिन दुरूस्त है !

ई स्टाप मराठी साहित्य

लेखक आप्पा यांनी मंगळवार, 24/08/2010 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
इ_स्टाप एक ई साहित्य प्रकाशन हे अंक मराठी साहित्याला वाहीलेले असुन त्यांचा प्रयत्न नविन लेखकांचे साहित्य जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. सदर अंक रेणुका रेपाळ-खटावकर, सुप्रीया जोशी-जाधव व सुनिल सामंत (esahity@gmail.com) चालवतात. सदर प्रयत्नात एक खारीचा वाटा म्हणुन हे साहीत्य www.vishwasanchar.com येथे हि प्रसीध्द केले जाईल. सदर प्रयत्नांना आपले ही सहकार्य असावे.

पल पल दिल के पास...

लेखक दिपाली पाटिल यांनी सोमवार, 23/08/2010 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन माझा मित्र चंद्रशेखर महामुनीचे आहे. आधी इ-सकाळवर प्रकाशित झालंय पण त्याच्या परवानगीने इकडे प्रकाशित कर्तेय... पल पल दिल के पास... हर शाम आँखोपर तेरा आँचल लहेराये, हर रात यादों की बारात ले आये मै सॉंस लेता हूँ, तेरी खुशबू आती है इक महका महका सा, पैगाम लाती है मेरे दिलकी धडकन भी, तेरे गीत है पल पल दिल के पास, तुम रहती हो जीवन मिठी प्यास, ये कहती हो... प्रियतमेच्या आठवणींचं, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र भासणाऱ्या तिच्या हव्याहव्याशा अस्तित्वाचं इतकं अप्रतिम वर्णन खूप कमी ठिकाणी वाचायला मिळतं.

शिवनेरीवर....महाराजांच्या जन्मस्थळी

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 23/08/2010 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
माळशेज घाटात जाउन आलो. तिथून येतांना सीतेवाडी-गणेशखिंड मार्गे १९ किमी असलेल्या जुन्नरला आलो. गणेशखिंडीतूनच दिसणारा शिवनेरी आता त्याच्या कोरीव लेण्यांसह पूर्णपणे समोरच उभा ठाकला होता. शिवनेरी....एक बळकट, बुलंद, अभेद्य किल्ला....जवळजवळ २००० उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहीलेला, सातवाहनांचे राजकुल अंगाखांद्यावर मिरवणारा. नंतर चालुक्य, राष्ट्र्कूट, यादव अश्या राजवटी पाहिलेला नंतर मात्र ३०० वर्षांच्या काळरात्रीत झाकोळून गेलेला. एका दिवशी हळूच भोसल्यांचे सुनेचे, जाधवरावांच्या लेकीचे पाउल गडावर पडले.

हा कुठला बरे आजार/विकार?

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 20/08/2010 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
हा कुठला बरे आजार/विकार? वाचनाच्या बाबतीत ग्यानबा फ़ार अभागी मनुष्य आहे. अभागी या अर्थाने की साहित्यिक क्षेत्रात विपुल साहित्य उपलब्ध असूनही ते जास्तीत जास्त वाचण्याचे भाग्य त्याला फ़ारसे लाभले नाही. कधी आर्थीक स्थितीमुळे पुस्तके विकत न घेऊ शकल्यामुळे तर कधी भौगोलीक स्थितीमुळे पुस्तके अनुपलब्ध असल्यामुळे असे घडले असावे. पण हे सत्य असले तरी मात्र पुर्णसत्य नाही. खरे हे आहे की त्याला एक आजार आहे. आणि तो आजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याला वाचायला खूप आवडतं, खूपखूप आवडतं. विषयाचेही बंधन नाही, काहीही आवडतं.

वाचायला विसरू नका - तुझा बाप मरेल

लेखक सुनिल पाटकर यांनी बुधवार, 18/08/2010 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेच्या मैदानावर राजू आणि चिंटूची चांगलीच जमली.राजूने क्रिकेट खेळताखेळता चिंटूला भरमसाठ शिव्या दिल्या.आणि तुझा बाप मरेल असा घणाघाती शापही दिला.तुम्हाला वाटेल शाप फक्त महाभारात ,रामायणातच होते कि काय,आजच्या युगात आधुनिक भारतातही शाप आहेत आणि ते लागूही पडतात. राजूच्या जिभेवर म्हणे तीळ आहे .तो जे बोलतो ते खरे होते.बाकी काही खरे होऊ दे अथवा न होऊ दे ,पण जेव्हा राजू संतापाने कोणाला तुझा बाप मरेल असा शाप देतो त्यावेळी मात्र सारेच टरकतात.कारण दुस-या दिवशी बाप वर रवाना झालेला असतो.अशी अनेक उदाहरणे घडल्यामुळे मैदानावर सुरु असलेला क्रिकेटचा डाव अचानक थांबला.फिल्डर जागच