Skip to main content

आस्वाद

ये दौलतभी ले लो

लेखक शरद यांनी मंगळवार, 26/04/2011 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
ये दौलत भी ले लो गत दिनांची आठवण कोणाला येत नाही ? त्या दिवसांतील आठवणी निरनिराळ्या असतात. भर्तृहरि " सा रम्या नगरी महान स: नृपती.." म्हणेल व शेवटी "कालाय तस्मै नम:" म्हणून मोकळा होईल तर कोणाला पुण्यातील "बादशाही खानावळ " आठवेल. भवभुतीच्या उत्तर राम चरित्रातील राम व सीता यांना अयोध्येत, राजवाड्यात ऐषारामात असतांना सुद्धा वनवासातील झोपडीत गप्पा मारत कंठलेली रात्र आठवून " रात्रीरेव व्यंसरित " असे म्हणावे वाटेल. एखादा नभातील चंद्र पाहून "ती न आर्तता ऊरात ,," म्हणत दु:खाला वाट करून देत असेल तर दुसरा एकामेकावर उधळलेल्या फूलांची आठवण करत " गेले, ते दिन गेले " असे उसासे टाकत असेल.

रिक्रिएशन

लेखक सूर्य यांनी रविवार, 24/04/2011 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
चित्र बर्‍याच महिन्यांपुर्वीचे आहे परंतु कुठेही शेअर केलेले नाही. प्रथम इथेच डकवतोय. थोडे वेगळ्या प्रकारामधले छायाचित्र टाकण्याचा प्रयत्न केला असल्याने कसे आले आहे ते मिपाकरांनी जरुर सांगावे. Recreation - सूर्य.

एका व्यथित सॉफ्टवेअर इंजिनियरचे मनोगत!

लेखक विनीत संखे यांनी गुरुवार, 21/04/2011 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
शैशव, बाल्य, पौगंड, तारूण्य, गृहस्थ अन वार्धक्य अशा षटजीवनावस्थांमध्ये कैचर्य (असा शब्द कदाचित मराठीत सापडतो) किंवा कचेरीगिरी (साध्या भाषेत ऑफिसमनशिप) अंतर्भूत करावी असे माझ्यासारख्या नोकरमाणसाला वाटते. नवतारूण्याअंती, गृहस्थांगी अन वार्धक्यापूर्वी आपण आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा कालखंड खेचर म्हणून एका मळ्यात ओझं वाहत सोसतो. हे मळं म्हणजे ऑफिस होय. इंग्रज जाता जाता भारताला हा नोकरपणा आंदण देऊन गेले. तारुण्यसुलभ "जग जिंकायची इच्छा" ही उपजतच सगळ्यांत असते.

हे जग मी सुंदर करून जाईन....

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 21/04/2011 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... नाशिकला विध्यार्थी स्नेह-संमेलनात भाईकाकांनी केलेल्या भाषणाचा काही भाग नुकताच मी इथे वाचला. त्यांनी केलेल्या अनेक उत्तमोत्तम भाषणांपैकी एक!!! कधीकाळी नाशिकला पुलंनी केलेलं हे भाषण अजूनही खूप नाविन्यपूर्ण वाटते, त्यापेक्षा मी असं म्हणेन की, पुलंची कुठलीही भाषण असू द्यात ती कधीच जुनी होऊ शकत नाहीत.

स्पेशल फीचर...

लेखक गवि यांनी गुरुवार, 21/04/2011 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : यशचं घर. (बाहेरच्या खोलीत सोफ्यावर बाबा मुडपून आडवारलेले. यश हातात मोबाईल घेऊन घराच्या दाराबाहेर उभा. मोबाईलवर नजर अखंड खिळलेली आहे. एका हाताने मोबाईलची खूप फास्ट बटनं दाबत आणि मधेच त्यावरचा काहीतरी मजकूर वाचून खुदकन हसत तो उभा असतो. एक मोकळा हात सतत अस्वस्थपणे स्वत:चे खिसे चाचपत असतो. घराच्या किल्लीसाठी..पण मोबाईल वरची नजर मात्र एक क्षणही हटत नाही.) यश (स्वत:शी) : किल्ली कुठे गेली च्या मायला..(विचित्र टोन मध्ये मोठ्यांदा) पड्ली बिडली की क्कॉय…?!? (तेवढ्यात खिशातून खण्णकन किल्ली खाली पडते.

सरुटॉबाने कट्टा - एक सुरुवात

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 19/04/2011 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
१७ एप्रिल,रात्रीचे साडेसात वाजलेले, पुण्याच्या हद्दीबाहेर थोड्याश्या सुनसान रस्त्याच्या बाजुला एका मोठ्या इमारतीसमोर दोन धिप्पाड तरुण थोड्याश्या अंधारात उभे. समोरुन एक गाडी येते, कर्र्र्र्र्र ब्रेक दाबुन बंद पडते, एक दोन वेळा सुरु होते पुन्हा बंद पडते, त्या दोन्ही तरुणांच्या चेह-यावर हसु येतं, त्यांचे हात खिशात जातात, पुढ्च्याच क्षणी बाहेर येतात, तेवढ्यात गाडी पुढं जाते, त्या तरुणांचे हात पुन्हा खिशात. ते परत अंधारात सरकतात. गाडी थोडी पुढं जाउन पुन्हा त्या तरुणांच्या दिशेने येते, पुन्हा कर्र्र्र्र्र्र ब्रेकचा तोच आवाज पण यावेळी गाडितुन दोघं जण खाली उतरतात, त्या तरुणांच्या दिशेनं जायला लागतात.

महामहोपाध्याय, जैन आणि अंगवस्त्र

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 17/04/2011 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
अशोक जैन.. एक ज्येष्ठ वगैरे पत्रकार.... सर्व साहित्यिक वगैरे मंडळींचे पाय कसे मातीचेच असतात हे सांगणारे त्यांचा एका दिवाळी अंकातला लेख मित्राने खास रेकमेंड केल्याचे स्मरते... बर्‍याच थोरांची टर उडवणारा तो गंमतीदार लेख आवडला होता...