हिंदी व मराठी सुगम संगीतात तालांचे वैविध्य
'आर. डी. मल्हार' ह्या लेखात धागाप्रवर्तकाने ".....असा संगम कोणालाही जमला नाही , जमणार नाही" असे एक धाडसी व विषयावरील पुरेशी माहिती न घेताच विधान केले. त्यावर प्रतिक्रिया देतांना चौकटराजांनी लिहीले .."[आर. डीं]. नीकिती वाद्ये , किती ताल वापरले याला गणतीच नाही".
माझ्या माहितीप्रमाणे आर. डी. ने नेहमीचे केहेरवा, दादरा, खेमटा वगैरे तीन चार तालच वापरले आहेत, 'घर आजा, घिर आये' ह्या त्याच्या पहिल्याच गाण्यात रूपकचा सुंदर वापर आहे. तेव्हा अगणित ताल त्याने वापरलेले नाहीत.
मिसळपाव