मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनुभव

Injury ते SR

मालविका ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सदर लेख हा माझा लाईफ पार्टनर श्रीनिवास याने लिहिला आहे. मी फक्त शब्दांकन करण्यास हातभार लावला. २०१३-१४ ची गोष्ट आहे. सह्याद्री मधल्या अनवट वाटा ढूंढाळताना छोटासा अपघात होऊन गुडघा दुखावला गेला होता. नेहमीप्रमाणेच त्याच्याकडे दुर्लक्ष करून ट्रेकिंग चालूच होत. पण २०१५-१६ साली पुन्हा गुडघ्याच्या पाठीमागच्या भागात दुखायला लागलं. शेवटी झक मारीत डॉक्टर कडे गेलो. डॉक्टर नि तपासून MRI करायला सांगितल. weakness in posterior horn medical meniscus असा रिपोर्ट आला. म्हणजेच गुडघ्याच्या पाठीमागचा भाग सुजतो, लॉक होतो, वेदना होतात. रिपोर्ट वाचून डॉक्टर नि लगेचच मला ट्रेकिंग बंद करायचा सल्ला दिला.

तिळाचे लाडू

सरिता बांदेकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तिळाचे लाडू सौ सरिता सुभाष बांदेकर ही तिळाच्या लाडवाची पाककृती नाहीय, पण तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का??? याचा फोटो काढावा असे त्यावेळी वाटलं नाही कारण त्यावेळी सेल्फीची हवा नव्हती.म्हणजे मोबाईलच्या जन्मा आधीची ही खरीखुरी घडलेली गोष्ट आहे.

सरपण

नीलकंठ देशमुख ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सरपण लहानपणी गावी वीज नव्हती.गॅस नव्हता.स्टोव्ह नव्हते. स्वयंपाक ,पाणी तापवणे चुलीवरअसे.त्या दिवसांची आठवण आली अन सरपण आठवले. लिहायला इंधन मिळाले.सरपण नसले तर घरची चूल पेटणे शक्य नसे.मजूरीसाठी जाणार्या बाया बापड्या संध्याकाळी कामावरून परतताना वाटेत मिळेल त्या लाकूडफाट्याचा भारा डोक्यावर आणत.अजूनही आणतात.सुस्थितीतील घरच्या स्त्रियांना सरपण जमा करण्याचे कष्ट नसत. पुरूषांना त्याची काळजी.सरपणा साठी ,इमारतीसाठी,शेतीचीअवजारे,औत,कोळपे ,बैलगाड्या तयार करणे इ.साठी,लाकूड हवेच.मग शेतातल्या जुन्या,वहितीला अडचण असणारे झाडांची कटाई होई.झाडे जास्त व मोठी असली तर तोडायचा गुत्ता/ ठेका दिला जाई.

जयामावशी गेली!!

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सुचना- नुकत्याच आलेला अनुभव जसाच्या तसा मांडला आहे. मिपाच्या धोरणात बसत नसेल तर लेख उडवुन टाकावा. -------------------------------------------------------------- तसा अंदाज आला होताच सगळ्यांना हळुहळु. गेले ६ महिने डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या वार्‍या चालु होत्या. लिव्हर् वर २ गाठी झाल्या होत्या आणि जास्त वय व अशक्त प्रकृतीमुळे फार स्ट्राँग औषधे देता येत नव्हती. शुक्रवारी फोन आलाच मावसभावाचा की आईला पुन्हा हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागत आहे आणि लक्षणे काही ठिक दिसत नाहित तेव्हा फेरी मारुन जा. शनिवारी सकाळी पुण्याहुन निघालो आणि दुपारपर्यंत ठाण्याला पोचलो. सामान ठेवुन तडक हॉस्पिटलमध्येच गेलो.

"शिकायचं कसं" ते शिकूया

उपाशी बोका ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नवीन वर्ष आलं की आपण उत्साहाने संकल्प करतो की आता नवीन काही तरी शिकूया. म्हणजे नवीन काहीतरी शिकायचा उत्साह एरवीसुद्धा अधून मधून येतच असतो, पण नवीन वर्ष म्हटलं की तो उत्साह जरा जास्तच असतो. पण होतं काय की आपण २-४ दिवस शिकायला बसतो, मग काहीतरी महत्वाचे काम येते किंवा कंटाळा येतो, मग आजच्या ऐवजी उद्या करू असे वाटते आणि ते काम रंगाळत जाते आणि मग शेवटी बंदच पडते. असे होऊ नये, म्हणून मी काय करतो ते मांडायचा हा प्रयत्न. SMART Goals स्मार्ट गोल्स सर्वात आधी मी काय शिकायचे ते ठरवतो आणि त्यासाठी SMART Goals ही पद्धत वापरतो.

इकडचं तिकडचं

मालविका ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नोकरीची सुरवातीची वर्ष मुंबई पुण्यात घालवली. मग काही वर्ष परदेशात काढली. आता इकडे गावी येऊन सेटल झालेय. पण कधी ना कधी काही घटना घडतात आणि जुन्या आठवणी येतात. आठवणी म्हणण्यापेक्षा ते ठिकाण आठवतं. आणि साहजिकच इकडचं नि तिकडंच असं होत राहतं. आता आजचच घ्या ना. इकडे दोन दिवसापासून मळभ आलय. प्रकाश दिसतो म्हणून सूर्य उगवला म्हणायचा इतकं मळभ येतंय. सकाळी सायकल चालवायला गेले तेव्हा मळभ तर होतच पण हवा पण एकदम कोरडी होती. जरा देखील वारा नाही कि काही नाही. जणू सगळ्या वातावरणाला एक प्रकारची मरगळ आलेय. मला अगदी पटकन परदेशाची आठवण आली. तिकडे ढगाळ वातावरण हे कायमचंच. सनी वेदर म्हणजे लॉटरी.

मालवणचे देवधर: काही मौखिक आठवणींची नोंद

चलत मुसाफिर ·
लेखनप्रकार
(नोंद: या आठवणी त्रोटक आहेत. एका संध्याकाळी दोनतीन तास चाललेल्या गप्पांवरून दुसऱ्या दिवशी जे व जितके आठवले तसे नोंदले आहे. यात जातिसंस्था, शिवाशीव वगैरे प्रथांचा उल्लेख काळानुरूप आला असला तरी त्यांचे उदात्तीकरण करण्याचा मुळीच हेतू नाही. कुणाला ते तसे उल्लेखही अनुचित वाटण्याची शक्यता आहे, त्यांची आधीच माफी मागतो) *** संध्याकाळी आम्ही आमच्या कुटुंबातील Grand Old Man मनोहरमामा देवधर (मूळ गाव देऊळवाडा, मालवण, पण बरेचसे आयुष्य गुजरातेत काढले. आताही वास्तव्य तिथेच) यांच्या घरी गेलो होतो. हे खरेतर आईचे मामा, माझे आजोबाच. पण आम्हीही सगळे त्यांना मामाच म्हणतो. नव्वदीचे वय.

दे दे लिंक दे !!

अत्रन्गि पाउस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कुणी काही माहिती सांगायला लागलं कि "लिंक दे" कुणी काही मत मांडले रे मांडले कि "लिंक दे" एखादा विचार मांडायला लागलं, कि (त्याच्या पुष्ट्यर्थ) "लिंक दे" ह्यात ज्ञानोपासनेचा भाग असेलही बापडा !! पण मला पुष्कळ वेळा ऐकू येते ते असे "तुला काही नवीन मुद्दा सापडलाय का , त्याला पुष्ट्यर्थ काही लिंक नसेल तर तू , तुझं बोलणं आणि तुझा मुद्दा व्यर्थ ..." किंवा मग "तु कुणाला काही उद्धृत करू पाहतोयस का ? मग तुझी वायफळ बडबड बंद कर आणि ज्याने कुणी ते मुळात काय म्हटलं आहे ते साल्या तू कुठून वाचलं ते आधी सांग. मी माझं स्वतंत्र बघून माझं मत मी बनवीन.

गावाकडच्या गोष्टी

नीलकंठ देशमुख ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
विष्णू सहस्त्रनाम गावात,ब्राम्हणांची वीस बावीस घरे.देशमुख गल्लीतली देशमुखांची पंधरासोळा;पाटील गल्लीत जोशांची चारपाच,जहागिरदार ,कुलकर्णी,देशपांडे, पुराणिक यांची एकेक.वर्षभरातील  नेहमीचे कुलाचार,सणवार प्रत्येक घरी, आपापल्या परीने होत असत.उन्हाळ्यात ,विष्णू सहस्त्र नाम सप्ताहाचे निमित्ताने मात्र सर्वजण एकत्र येत. या विश्वाची उत्पत्ती,स्थिती,आणि विलय,ज्याच्या लीलेने होतो त्या परमेश्वर श्रीविष्णूला,वेदकाळा पासून ,पुराण काळापर्यंत ,ज्या ज्या नावांनी संबोधिले गेले त्या एक हजार नावांचे संकलन असलेले हे संस्कृत श्लोक भिष्माने युधिष्ठीराला सांगितले.महाभारतातील 'अनुशासन पर्वात 'याचा उल्लेख आहे.यात

गुर्हाळ

नीलकंठ देशमुख ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गुर्हाळ...     पन्नास,पंचावन्न वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत. गावी पिंपळाचा मळा नावाचे शेतआहे.तिथली जमीन कसदार. विहीरीला मुबलक पाणी असे.ते उपसण्यासाठी किर्लोस्कर इंजीन होते.पाण्यावर ऊस जोमाने वाढे. डिसेंबर मधे उस पूर्ण गोडीला येई.तेव्हा मराठवाड्यात एकही साखर कारखाना नव्हता.होते फक्त पश्चिम महाराष्ट्रात. त्यामूळे उस गाळून गुळ तयार करणे हा एकच पर्याय होता.एक छोटा उद्योगच. गुर्हाळ. तो दरवर्षीचाच असल्याने,मळ्यात एक चुलाण व धूर जाण्यासाठी धुराडे बांधून ठेवले होते.ते पाला पाचोळा घालून बंद केलेले असे.गुर्हाळ सुरू व्हायच्या आधी ते मोकळे करून,सारवून स्वच्छ केले जाई.