Skip to main content

अनुभव

अव्यक्त स्पंदने

तेजल दळवी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
...आणि मलाच माझी दया आली... इतका जीव लावतो आपण काही माणसांना .. त्यांच्या वागण्यात जरा जरी बदल झाला तरी कळवळून येत मनात.. कधीकधी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करायला लागतो आपण.. त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो ...पण त्रास काही संपत नाही.. असं का वागवस वाटलं असेल त्या व्यक्तीला माझ्याशी हे काही केल्या उमगत नाही.. मग अशावेळी काही हक्काची माणसं आठवतात ... जी कायम सोबत असतात सावलीसारखी ...या अशा काळात त्यांची जास्त आठवण येते.. कधीकधी वाटत खूप गृहीत धरतो आपण त्यांना.. तुम्ही खूप महत्वाचे आहात हे सांगायचंच राहून जातं बऱ्याचदा.. ही माणसं रक्ताच्या नात्यांनी बांधलेली नसतात..

कोविड : एक इष्टापत्ती ?? (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)

चित्रगुप्त यांनी या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आठवडाभरापूर्वी करवून घेतलेल्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, आणि हुश्श्य वाटले. १९६८ साली दहावीत असताना टायफॉईड, त्यानंतर चाळीस वर्षांनी चिकनगुनिया, आणि आताचा हा अनुभव तिन्ही अवघे जीवन ढवळून काढणारे होते. कालपर्यंत ठीकठाक असणारे शरीर आज अंथरुणावरून उठताही येऊ नये इतके क्षीण कसे काय होते, हे मला तरी समजलेले नाही (यावर कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा). प्रकरण १: पूर्वपीठिका आणि लॉकडौनातील रोम्यांटिसिझमपणा वगैरे : मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेतून मुलगा, सून आणि लहानशी नात भारतात आले. त्यांचे व्हिसादिकांचे काम आटोपल्यावर आम्ही सगळे उदयपूर प्रवासाला गेलो.

परीक्षा, उत्तरं आणि समुद्र!

लेखनवाला यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळी साडेचार वाजता उठायचं! का तर? सकाळी एकदम टाईमावर सात वाजता परीक्षाक्रेंदावर हजर व्हायचं… कशाला? साडेनऊ वाजताच्या पेपरसाठी…पेपर किती?…तीन… पहिले दोन पेपर झाले की साडेबाराला सुटका. आणि पुन्हा तिसरा आणि शेवटचा पेपर होणार दोन वाजता. तो अडीच तासाचा म्हणजे एका दिवसात तीन पेपर देवून मुक्तता होणार ती सांयकाळी साडेचार वाजता. परीक्षेला मित्र म्हणावा सोबतीला तर कोणी नाही. मग चला एकटेच... काही मोठाली उत्तरे लिहायची नाहीत की परिच्छेदांनी रकाने भरायचे नाहीत, काही नाही, निव्वळ प्रश्न त्याचें चार पर्याय, काही जास्त हाताला ताण न देता पेपर सोडवायचा, हे झालं वेळापत्रक.

भुतंखेतं

जिन्क्स यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
महिन्यातून एकदा ऑफिस संपल्यानंतर ऑफिसच्याच टेरेस वर रात्री जमून भोजनाचा आनंद घेत उशिरा पर्यंत गप्पा मारणे हा आमचा त्या वेळचा प्रघात होता. आमचा 4 मित्रांचा चमू होता. त्यातलाच एक मुस्लिम मित्र घरून सामिष पदार्थ घेऊन यायचा आणि त्याचा आस्वाद घेत आमच्या गप्पा रंगायच्या. एका रात्री असाच तो मित्र याखनी पुलाव घेऊन आला होता. टेरेस कडे जातच होतो तेवढ्यात मी पाहिले की आमच्याच ऑफिसचा एक सीनियर डेव्हलपर एकटाच काम करत बसला होता. मी त्याला आमच्या सोबत यायचा आग्रह केला. तो आधी तयार नव्हता पण नंतर तयार झाला. त्या रात्री गप्पा अचानक भुतांच्या विषयावर आल्या.

नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?

किसन शिंदे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती.

लॉकडाउनमधील रनिंगचा अनुभव

मार्गी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्वांना नमस्कार! परभणीमध्ये गेल्या महिन्यामध्ये विद्यापीठाचा परिसर नुकताच मॉर्निंग वॉक व रनिंग करणा-यांसाठी खुला केला होता. तेव्हा खूप दिवसांनी तिकडे रनिंग चालू केलं. लॉकडाउनच्या काळात सायकलिंग बंद होतं. त्यामुळे त्या दिवसांमध्ये अंगणामध्येच आठवड्यातून दोन- तीनदा टायमर लावून रनिंग करत होतो. परिस्थिती काही काळ ठीक झाल्यावर रोडवर थोडे दिवस सायकलिंग केलं आणि विद्यापीठाच्या परिसरात रनिंग करण्याचा आनंद घेतला न घेतला तोच घरासमोरच कंटेनमेंट झोन आला. सरकारचे नियम काहीही असले तरी परिस्थितीचं गांभीर्य समजून घेऊन काळजी घेणं प्रत्येकाचं काम आहे.

माझा कोविड अनुभव

अश्विनी मेमाणे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गुरुवार २ जुलै ला नवरा दुपार नंतर डोके दुखिची तक्रार करायला लागला. या वर्क फ्रॉम होम पासून त्याच्या मीटिंग्सचे प्रमाण एकंदरीच वाढले आहे. तो बऱ्याच वेळेस पूर्ण पूर्ण दिवस कॉलवर असतो. मला वाटल कदाचित या कॉल्समुळे त्रास होत असावा. क्रोसिन घेतल्यावर वाटेल ठीक. संध्याकाळी पण त्रास जाणवत होता त्याला अणि ताप बघितला तर ९९ च्या वर होता. अस वाटल की स्ट्रेस मुळे होतय मागच्या महिन्यामधे पण एकदा झाल होत. शुक्रवारी दिवसभर ताप चढत उतरत होता. प्रत्येक ४ तासाला परसटॉमल घेत होता. शेवटी संध्याकाळी एक लोकल डॉक्टरकड़े गेलो. आम्ही या एरियामधे एक वर्षा आधीच शिफ्ट झालोय. फॅमिली डॉक्टर अस काही अजुन झाल न्हवत.

एक संध्याकाळ कवितेची…..

लेखनवाला यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कार्यक्रम कसला? कविता वाचनाचा, कोण वाचणार कविता तर कवियत्री नीरजा, सो’कुल’ सोनाली कुलकर्णी, सौमित्र उर्फ किशोर कदम, प्रतिक्षा लोणकर, मुक्ता बर्वे, मिलिंद जोशी, हास्यकवी अशोक नायगांवकर आणि…. आणि…. नाना पाटेकर. ही अशी नाव लोकसत्ताच्या ‘अभिजात’ म्हणून सुरु झालेल्या उपक्रमाविषयीच्या ‘एक संध्याकाळ कवितेची’ नावाच्या कार्यक्रमाची माहिती पहिल्या पानावर बघितल्यावरच या कार्यक्रमाला जायला पाहिजे असं मनात पक्क झालं, पण कार्यक्रम आहे कुठे? तर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह घोडबंदर रोड ठाणे, हे ठिकाण काम करत असलेल्या ऑफिसपासून दहा मिनिटावर रिक्षाने, त्यामुळे जायचं अजून पक्क झालं.

एक संध्याकाळ.. कृष्ण-राधा समवेत!

राघव यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
दुपारची उन्हं जरा कलत नाहीत, तो सगळ्या गोपिका नटून थटून पुन्हा यशोदेकडे हजर. जणू यांची घरची सगळी कामं कृष्णाला बघण्याच्या ओढीनंच लवकर आटपायची. घरात कोणीही असो, त्या कोणतंही काम करत असोत, मनाचा एक भाग कृष्णाचं चिंतन करतच राही. घरच्यांचंही काही फार वेगळं होतं असं नाही. सगळ्या गोकुळाचंच त्याच्याकडे सतत लक्ष लागलेलं असायचं. एका अद्वितीय अशा प्रेमाच्या रेशीमधाग्यानं ते सर्व जणू बांधल्या गेलेले होतेत. त्यांच्या लेखी कृष्ण म्हणजे सर्व आणि सर्व म्हणजे कृष्ण! पण आज कृष्णाचं काहीतरी बिनसलं होतं खास. अगदी वेळ झाली तरी हा आपला तयार झालेलाच नव्हता.