Skip to main content

अनुभव

एक सकाळ - मुंबईतली आणि अमेरिकेतली

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 27/01/2009 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेले सोळा आठवडे अमेरिकेत राहून नुकताच मी मायदेशी परत आलो. साहजीकच मला अमेरिका कशी वाटली असे लोक विचारतात, त्याचे उत्तर काय द्यावे याचा विचार पडतो. तिकडे ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्यांना त्या चांगल्या आहेत असे कोणी म्हंटले की "तंकडचं सगळं लय भारी हाय हे आयकून आमाला आत्ता कंट्टाला आला हाये!" अशी प्रतिक्रिया एकाद्याकडून येते किंवा त्याचा बादरायण संबंध आपली संस्कृती, अस्मिता वगैरेशी जोडून राष्ट्राभिमान, देशभक्ती, धर्मनिष्ठा वगैरेवरले बौध्दिक दुसरा कोणी सुरू करतो.

मी "स्थानीक की परप्रांतीय " ??? - आपण सारेच अर्जुन ...

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 27/01/2009 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
हा काही लेख वगैरे नाही, गेल्या काही वर्षातील अनुभवांच्या आधारावर माझ्याच मनात आलेल्या ह्या मुक्त भावना आहेत, ह्याला फारतर मुक्तक किंवा बाष्कळ बडबड असे नाव देता येईल. पुण्यात" स्थानीक" असणारे मराठी मन .... बेंगलोरमध्ये "परप्रांतीय" असणारे मराठी मन .... आज पुण्यात एका नव्या कंपनीत जॉइन झालो, नवे नवे लोक भेटले, बॉसने टीमशी ओळख करुन दिली. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर सगळे "आपले" लोक आहेत. बाकीचे जे "उपरे" आहेत ते काही जास्त नादी लागत नाही ह्यांच्या असे दिसतेय.

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ७

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 23/01/2009 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा माझा गणपती उचलून बाहूबली हॊस्टेल मध्ये ठेवण्यात आला.... आईला काळजी लागली होती की हा पुन्हा पळाला व गावला नाही तर काय ? पुढे :- आई ने जाताना माझ्या आवडिचे बेसनचे लाडु व भडंग करुन दिला व काही पैसे खिश्यात ठेवले, अक्काने पण आपला बॉलपेन दिला व म्हणाली " दादा, परिक्षा देऊनच, ये. परत." मी जसा कैद्याला फाशीसाठी घेऊन जातात तसे तोंड करुन बाबाच्या मागे चालू लागलो, थोड्या वेळाने कोल्हापुर बस स्थानकावर आलो, बाबांनी मला एके जागे बसवलं व ते गाडीची टाईमींग विचारायला गेले, समोर मुतारी होती.. मी आपलं सामान तेथेच व्यवस्थीत लावले व सरळ मुतारी कडे गेलो.

(विचार)मंथन!

लेखक राघव यांनी शुक्रवार, 23/01/2009 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपुर्वी, बंगळूरात मित्रासमवेत राहत असतांना, एका दिवसभरात कमीत कमी ४ ते ५ अशा लोकांशी बोलणं झालं जे आपापल्या आयुष्यातल्या दु:खाला वैतागलेले होतेत. दोघा जणांनी तर जगण्यात काही राम नाही उरला असा निष्कर्षही काढून टाकला! अशावेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यायचे (व उगाच सांत्वन-प्रोत्साहनपर शब्द, त्यांना आलेल्या अडचणींवर उपाय शोधण्याचा प्रयत्न असले काहीही करायचे नाही !!) हे अनुभवाने आलेले शहाणपण वापरले व Be a Good Listener असाच वागलो! पण रात्री झोपण्याच्या प्रयत्नांत असतांना त्या सर्व गोष्टी परत आठवल्या अन् विचारांचे काहूर माजले.

दिल्ली ते दिल्ली !

लेखक दशानन यांनी बुधवार, 21/01/2009 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
१२ डिसेंबरला घरी जाणार जाणार म्हणून तयारी करत करत मी २२ला जाण्यासाठी मोकळा झालो, पण अचानक टिकीटे तथा काहीच बाकीचे प्लान तयार नव्हते तरी म्हणालो निघायचं आहे तर निघू .. बघू काय होईल ते ! मित्राबरोबर सरळ न्यु दिल्ली रेल्वेस्टेशनला पोहचलो व टिकीटासाठी दोन तास अटापिटा करुन शेवटी मुंबई राजधानीचे टिकीट घेतले व सरळ ४.१५ च्या गाडी बसलो. योग्य वेळ योग्य काम करणे हा माझा धर्मच नाही त्यामूळे गाडीत बसल्यावर विसरलेल्या गोष्टि आठवू लागल्या.. चार्जर घेऊन आला नाहीस.. पैसे सुट्टेच खिश्यात आहेत... नशीब एटीम तथा क्रिडीट कार्ड घेऊन आला आहेस नाही तर मुंबई मध्ये बस भीक मागत..

सर्पाख्यान !

लेखक मऊमाऊ यांनी मंगळवार, 20/01/2009 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
घराच्या फाटकाजवळच मी एक कृष्णकमळ लावले होते. तेव्हाच कोणीतरी शेरा मारला होता की कृष्णकमळाजवळ साप येतात असा. पण एक तर मला त्या फुलांचा सुगंध मनापासून आवडतो अन भर वस्तीत कुठले आले साप बीप ? असे म्हणून मी आपले दुर्लक्षच केले होते. तसे नाही म्हणायला पाठीमागच्या शाळेच्या आवारात एक दोन वेळा एक मोठा साप दिसला होता पण किती तरी वेळा सांगूनही त्या शाळेच्या मुख्याद्यापकांनी दुर्लक्षच केले होते अन शिवाय तिथे एक मूंगूसही दोन चारदा दिसले होते. कशी छान गुण्यागोविंदाने नांदणारी जोडी होती तिथे. पण तो साप कधी इकडे तिकडे भटकलेला पाहिला नव्हता, त्यामुळे मी ही जास्त विचार केला नव्ह्ता त्या बाबतीत.