Skip to main content

अनुभव

सेन्टी मेन्टी : Status Update

लेखक सुहास.. यांनी रविवार, 25/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
लाईफ म्हणजे स्साला छळ असतो, कधी ते आळसावलेल्या मांजरासारखं निपचिप पडुन असतं, तर कधी चंचल हरिणीसारखं सैरवैर धावत असतं.....कधी सिंहावलोकन करीत चौफैर लक्ष ठेवुन असतं तर कधी दर्ष्टीहीन सापासारख केवळ आशेचा फुत्कारावर अडथळे शोधत वेटोळं चालत असतं ................... सोमवारी पुणे - चेन्नई गो-एयर च्या फ्लाईट ने अक्षरशः छळ मांडला. फ्लाईट हवेत शिरल्यापासुन थडथडत होती. पण शेवटच्या वीस मिनीटात, उतरताना अक्षरश: आपण लामण-झुल्यावरून झुला खाली येताना जशी ग्रिप जाते तशी हाता-पायाची ग्रिप गेली होती. दहा-बारा सेकंदाचा वेळ असेल पण त्या हाय एसीत ही घाम फुटला.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - २ : पार्श्वभूमी

लेखक तिरकीट यांनी रविवार, 25/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
गीतरामायणाची मूळ संकल्पना सीताकांत लाड यांची. १९५५ साली पुणे आकाशवाणीमध्ये सहनिर्देषक म्हणून काम करत असलेल्या लाड यांनी ही कल्पना गदिमांना बोलून दाखवली. गीतकार म्हणून ग. दि. माडगुळकर आणी संगीतकार म्हणून सुधीर फडके या द्वयीची निवड करण्यात आली. तिघांच्या चर्चेतून 'गीतरामायण' हे शीर्षक ठरले. गुढीपाडव्याला सुरुवात करून आठवड्याला १ याप्रमाणे ५२ गीते पुणे आकाशवाणी वरून सादर करण्याचे ठरले.

डस्ट इन द विंड

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 21/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसांची एखादी सवय, एखादा विचार मनात कायमचं घर करून राहतो. या व्यक्तीचंही असंच होतं. 'होतं' म्हणताना वाईट वाटतंय, कारण त्याचं जाणं अगदीच अनपेक्षित होतं. आमच्या बाजूच्या कॉलनीत हा भाजीवाला गेले अनेक महिने भाजीची गाडी लावायचा. जाहिरातींवर कोट्यावधी खर्च करूनही मोठाल्या दुकानात चार दोन टकलीच फिरकतात अशा काळात याच्या भाजीच्या गाडीवर संध्याकाळी तो असेस्तोवर सतत गर्दी असायची. सेल, डिस्काउंट ही गर्दीची कारणं नव्हती. त्याचे युएसपी होते, त्याचा हसरा चेहरा, अगत्य, आपुलकी, आणि त्याने जपलेलं एक सात्विक माणूसपण.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - १

लेखक तिरकीट यांनी शनिवार, 17/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .. मिपावर माझे हे पहीलेच लिखाण आहे. कुठला विषय घ्यावा हा विचार करताना असं मनात होतं की मिपावर आत्तापर्यंत माझ्या वाचनात न आलेला विषय घ्यावा. आपल्याकडे अश्या अनेक गोष्टी वारसा असल्यासारख्या आल्या आहेत की ज्या नवीन पिढीला वेगळ्या शिकवाव्या लागत नाहीत, घरातील थोरा-मोठ्यांचे बघून, ऐकून त्या लहान मुलांपर्यंत पोहोचतात..मग त्यामध्ये रामरक्षा, अथर्वशीर्ष, भीमरूपी यांसारखी घरोघरी म्हटली जाणारी स्तोत्रं असोत किंवा क्रिकेट सारखे खेळ असोत. याचसारखी अजून १ गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे 'गीतरामायण'...

गंप्या आणि पाट्या

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 10/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
गंप्या कोठेही जातो तेथे रस्त्याने जाताना त्याला दुकानांचे फलक,घराबाहेर च्या पाट्या,जाहिरातींचे फलक वाचण्याचे वेड आहे,त्यातून तो काही विनोद शोधण्याचा प्रयत्न करत असतो,टकले हेअर कटिंग सलून,अंधळे ओप्टीशियंस ,पुस्तके रद्दी डेपो अशा मजेदार पाट्या होत्या नागडे वस्त्र भंडार वाचून त्याला वाटले अंगावरचे सर्व कपडे काढून दुकानात विकण्यास ठेवले कि काय? अंधारे विद्युत सेवा केंद्र ,तपस्वी शृंगार सदन,लोखंडे ज्वेलर्स,दाउद खादी भंडार अश्या पाट्या पाहून त्याला विनोद सुचत,डॉ काळे यांचे गोरे पणाचे क्रीम कसे काम करत असेल असे त्याला वाटले,मुळे टिफिन सेंटर च्या डब्यात बहुदा रोज मुळ्याची भाजी असावी असा कयास त्याने क

एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.

लेखक जॅक डनियल्स यांनी सोमवार, 05/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे ! या लेखमालेपासून मी सापांची ओळख करून देतो आहे. विचार केला की, विषारी सापांपासून श्रीगणेशा करू. सापांची पुस्तकी ओळख-त्यांचे निवास स्थान, मादी किती अंडी घालते, रंगाची रेंज, भक्ष इ.

प्रिय सखे....

लेखक वेणू यांनी शुक्रवार, 26/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय सखे, हे पत्र नाही, एक आवेग आहे... तो ओसरला की सारं शांत होईल... पूर्वीप्रमाणे, शांत! फक्त हा आवेग सांभाळून घे, समजून घे.... पेलून घे... दोन दिवस.. दोन दिवस झाले प्रचंड घूसमटते आहे.. प्रचंड! दोन दिवसांपूर्वी तुला फोन केला... खूप आनंदात.. माझ्याकडची आनंदाची बातमी तुला न देता तो आनंद साजरा होईलच कसा...?आपली सवयच ना... लहान लहानग्या इच्छा पूर्ण झाल्या की कर फोन ...आणि फोनवरच्या शब्दांतच सिलीब्रेशन, खरं तर तेच खरं आनंदानं न्हाऊन जाणं! अगदी तसाच तुझा नंबर डायल केला... तू फोन उचलेपर्यंत, नेमकं काय काय बोलायचंय...

मी खरच योग्य केल का?

लेखक saishwari यांनी बुधवार, 24/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ जवळ १५ दिवस झाले मला नोकरी सोडून . पण अजूनही या बाबत मला खात्री नाही. साधारण ३ वर्षांपूर्वी मला हि नोकरी लागली होती. तो काळ मंदीचा होता. नुकत्याच पदवीधर झालेल्यांना नोकरी मिळत नव्हती. ८ महिने नाममात्र पगारावर घासल्यावर हि संधी चालून आली होती. अर्थातच मोठ्या कंपनीतली ही संधी सोडून देण अजिबातच शक्य नव्हत. मुलाखत इथे झाली असली तरी नेमणूक बाहेरच्या राज्यात होती. फक्त ३ दिवसात सगळ ठरलं होत. सुरवातीचे दिवस नवीन शिकण्यात,नवीन ठिकाणी हिंडण्यात गेले, पैशांची चटक लागली होती, सोबतचे लोक अगोदरच पुढे गेले होते त्यामुळे आपण पण त्या शर्यतीत असाव अस वाटत होत.

वांग मराठवाडी... आता परीक्षा सरकारची!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 22/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण वर्षभरापूर्वी वांग मराठवाडी धरणग्रस्तांच्या संघर्षाबद्दल लिहिले होते. त्या नंतर बरंच काही घडून गेलं आहे. आणि अजूनही काही ना काही घडत आहे. गेल्या वर्षभरात बर्‍याच मित्रमैत्रिणींनी, हितचिंतकांनी नेहमीच या बाबतीत चौकशी केली, 'आता काय परिस्थिती आहे?' अशी विचारणा केली. म्हणून, हा स्टेटस अपडेट... मूळ लेखन, 'आंदोलन शाश्वत विकासासाठी' या मासिकाच्या जुलै'२०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाले असून, ते सुनिती सु. र. यांनी लिहिले आहे. त्यांच्या पूर्वपरवानगीने व त्यात काही भर घालून, ते येथे देत आहे.