Skip to main content

समाज

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १३: सायलकुडी ते मंडपम ८९ किमी

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 28/05/2026 12:23 या दिवशी प्रकाशित केले.

✪ नित्यानंदमजींकडचं इडियाअप्पम! 

✪ छोट्या गावातल्या लोकांसोबत गप्पा 

✪ We meet people if we don’t get deceived by their backgrounds 

✪ तळ्यांचा प्रदेश आणि मोरांची सोबत 

✪ पावसासोबत सायकलिंगचा आनंद 

✪ मंडपमचं वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आणि प्रचंड वारे 

✪ सायकलिस्ट कथिरंगाजींच्या घरी मुक्काम नमस्कार. 

दारू आणि गरीबी

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 30/07/2025 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
दारू आणि गरीबी ========= आत्ता सकाळी माझ्या प्रात:कालीन बाजाराच्या अभ्यासात एका समभागाने माझे लक्ष वेधले. तो समभाग म्ह० युनायटेड स्पिरीट. जूनपासून हा समभाग बराच गडगडला आहे आणि सध्या त्याची घसरगुंडी थांबली आहे, असे वाटत आहे. मग ग्रोकच्या मदतीने घसरगुंडीची कारणे शोधायचा प्रयत्न केला तेव्हा महा० सरकारने मद्यावरील कर वाढविल्याचे कळले. मग मनात पुढचा प्रश्न चमकला - समजा एक दारूची बाटली १००० रु० ला आहे. तेव्हा यातील एकूण किती भाग सरकारला कर म्हणून जातो?

ज्याचा त्याचा समाजवाद

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 08/02/2025 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
समाजवादी याचा काल सुसंगत व व्यापक अर्थ असा की आपण ज्या समाजात राहतो त्याचे काही देण लागतो या दृष्टीने आपल्या कुवतीनुसार समाज उन्नती साठी शक्य असेल ते काम करणे. स्वत:चा विकास करताना सोबत समाजाचाही विकास व्हावा या दृष्टीने काही योगदान देता आले तर ते पाहणे. व्यवहारिक दृष्ट्या स्वार्थ व परमार्थ दोन्ही कसा साधता येईल हे पहाणे. व्यक्तिगत पातळीवर समाजहिताचे व्यापक काम करताना अनेक मर्यादा येतात. त्यामुळॆ संघटनात्मक पातळीवर देखील हे काम केले जाते. एनजीओ, चळवळी, ट्र्स्ट अशा समाजसेवी संस्थांच्या मार्फत हे काम होत असते.

शिक्षित मध्यमवर्ग मोक्षाच्या वाटेवर

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 20/12/2024 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
दोन महीने पूर्वीची गोष्ट राजीव चौक जवळ असलेल्या हनुमान मंदिरात मारूतीचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडलो, अचानक पटाईssत, अशी जोराची हाक ऐकू आली. मागे वळून बघितले, एक सत्तरीचा वयस्कर माणूस माझ्याच कडे येत होता. तो जवळ आला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला तो प्रदीप* (टोपण नाव) होता. मला पाहताच तो म्हणाला, पटाईत, तुझ्या चेहर्‍यात काहीच बदल झालेला नाही. अजूनही तसाच दिसतो. तुला पाहताच ओळखले. प्रदीपची माझी पहिली ओळख कृषि भवन मध्ये कार्यरत असताना झाली होती. 1995 मध्ये त्याची बदली झाली. त्यानंतर काही आमची भेट झाली नाही. तब्बल 29 वर्षांनंतर आज आम्ही भेटलो होतो.

अभिनेते, अभिनेत्रीची बेटावर सुटी

लेखक केदार पाटणकर यांनी गुरुवार, 07/09/2023 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तमानपत्रांमध्ये विविध तऱ्हांच्या बातम्या असतात. सर्व तऱ्हांच्या बातम्या प्रसिध्द करणे हे वर्तमानपत्रांचे कर्तव्य (!) आहे. सध्या कोणत्या तरी एका बेटावर अमुक अभिनेत्रीने वा अभिनेत्याने सुटी घालवली, अशा बातम्या मोठ्या प्रमाणात इ-आवृत्तीमध्ये दिसतात. बातमीसोबत बिकिनीतले मोठे फोटोही असतात. अशा बातम्यांना बातमी म्हणून अर्थ असावा पण त्या बरीच जागा व्यापतात. एखाददुसरा फोटो कमी करून , मजकूर थोडा कमी करून इतर बातम्यांना जागा दिली जावी.

अग्निपथ

लेखक रणजित चितळे यांनी शुक्रवार, 17/06/2022 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत. सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही.

विद्या बाळ यांचे अखेरचे आवाहन

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 14/10/2020 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
विद्या बाळ गेल्यानंतर त्यांच्या आदरांजली सभेत उल्लेख केलेले त्यांचे शेवटचे रेकॉर्डिंग. मार्च 2020 च्या मिळून सार्‍याजणी मधे आले आहे. स्वेच्छामरण या विषयी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची मते काय होती हे जाणुन घेण्याची उत्सुकता होती. ------------------------------------------------------------------------- अखेरच आवाहन... मी विद्या बाळ, १०१, नचिकेत सोसायटी, प्रभात रोड, पुणे - ४, वय ८३ पूर्ण. आज मनाच्या एका अत्यंत गंभीर अशा; पण निर्णायक अवस्थेत बोलते आहे. हा विचार मी आजवर शेकडो लोकांशी बोललीये, पण कुणाला तो इतका गंभीर वाटला, कुणाला नाही, मीही कदाचित थोडी द्विधा मनस्थितीत असेन.

चालू घडामोडी - जून २०१८

लेखक manguu@mail.com यांनी मंगळवार, 12/06/2018 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे. भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता.

गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का?

लेखक पुंबा यांनी बुधवार, 11/04/2018 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
गांजाचे व्यसन असणारी शरीराचे खोके झालेली, डोळे निस्तेज झालेली समाजाच्या निम्न स्तरातली मंडळी नेहमी दिसून येत, तेव्हा त्यांच्याविषयी अनुकंपा वाटत असे. समाजात नेहमीच त्यांची गांजाडा म्हणूनच संभावना होत असे, दारूड्यांपेक्षा वाईट प्रतीचे व्यसनाधीन म्हणून त्यांची घृणा केली जाई. मी लहानपणी 'लोकमत' या वृत्तपत्रात डॉ. कल्याण गंगवाल यांची ड्रग्जचे दुष्परीणाम सांगणारी एक लेखमालिका वाचली होती, तीतदेखिल गांजाचे भरपूर दुष्परीणाम सांगितले होते, जे वाचून अंगावर काटा आल्याचे आठवते. आता मात्र ऑफिसमधील कलिग्ज किंवा कॉलेजमधले मित्र यांच्याकडून गांजाविषयी निराळीच माहिती समजते.

पुराणातल्या विमान शास्र वैगेरे वांग्याच चमचमीत भरीत !

लेखक डँबिस००७ यांनी शुक्रवार, 18/08/2017 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या ग्रंथ संपदेत ब्रम्हास्त्र, वेगवेगळी अस्त्रे , शस्त्रे , शास्त्रे जसे विमान शास्त्र वैगेरेचे विस्मयकारक उल्लेख आलेले आहेत. भारतीय समाजातील काही लोक अश्या विस्मयकारक उल्लेखाचा दाखला देत भुत काळातील भारत टेक्नॉलॉजीत खुप पुढे होता असा दावा करत असतात . पण त्याच वेळेला समाजातील काही सुशिक्षीत लोक हा दावा खोडताना ह्या सर्व मात्र कवि कल्पनाच आहेत असा दावा करतात. भारताने जगाला अंक मोजायला शिकवल. शुन्य, दशांश पद्धती ही भारताची जगाला भेट आहे. पण ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत. शाळेत विदेशी लोकांनी काय शोधुन काढल त्यावर जोर दिला जातो.