मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

मुक्त विहारि · · काथ्याकूट
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367031 वाचनखूण प्रतिक्रिया 1423

In reply to by बॅटमॅन

सूड गुरुवार, 01/22/2015 - 16:13
दोन लोक परस्परसंमतीने काही का करेनात. जोवर कुणाला त्रास देत नाहीत तोवर संभोगाला असे हीन लेखायचे कारणच काय?
ब्याट्या ह्या वाक्यासाठी एक मँगो केसर मस्तानी लागू माझ्याकडून!! काय का करेनात, मला त्रास होत नाही तोवर त्या गोष्टीशी शष्प देणं घेणं नाही.

In reply to by विटेकर

सूड गुरुवार, 01/22/2015 - 16:11
>>दुसर्याच्या बाईलीवर डोळा ठेवला
दुसर्‍याच्या बायलेवर डोळा ठेवा कोण म्हणतंय, हौसच असेल तर आपल्या वेगवेगळ्या कराव्या!! आणि शिंची महाभारतातली उदाहरणे देता; त्या अर्जुनान् चार (का पाच?) लग्ने केलांन् ती बरी चाल्ली!!

In reply to by सूड

बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 16:19
अगदी अगदी....कृष्ण गोकुळात गोपींशी काय काय करतो याची गीतगोविंदातली वर्णने चालतात. त्याची राधेबरोबरची वर्णने मिटक्या मारत वाचतात. पण तेच प्रत्यक्षात कुणी करू म्हटलं की पित्त खवळते. इतकेच असेल तर आपल्या ग्रंथांवर बंदी घालून दाखवा.

In reply to by विटेकर

सूड गुरुवार, 01/22/2015 - 15:45
रक्षिती
र्‍हस्व असायला हवाय का? बाकी ही ओळ कशासाठीही खपवून नेतात राव. मागे एकदा संभाजी बागेत 'वृक्षो रक्षति...' असा पाठभेद वाचला होता.

In reply to by सूड

विटेकर गुरुवार, 01/22/2015 - 16:01
बर .. दुसरी तर दुसरी वेलांटी .. हाय काय अन नाय काय .. वृक्ष ? असेल बाबा , पुणे तिथे काय उणे ? आणि अर्थ तसाच घेतला तरी काही फार फरक पडत नाही. परस्परांचे रक्षण हा आपला धर्मच आहे. न राज्यं न राजाsssसीत न दण्ड्यो न च दण्डिक: | धर्मेणैव प्रजास्सर्वा रक्षन्ति स्म परस्परम || There is no kingdom nor any king; no criminal nor any judge to administer penalty to the criminal. People protect each other by virtue of dharma.

In reply to by विटेकर

एस गुरुवार, 01/22/2015 - 16:29
विवाहसंस्था हा समाजाचा पाया नव्हे. समाजाचा पाया हा समाजाने राहण्याची, एकत्र राहण्याची प्रवृत्ती आहे. सृष्टीतील सर्वच प्राणी 'सामाजिक' नसतात. बिबट्या, वाघ ह्यांच्यात नर-मादी केवळ मीलनापुरते एकत्र येतात तर सिंहांमध्ये, रानकुत्र्यांमध्ये कळप अथवा टोळी करून राहण्याची प्रवृत्ती दिसते. मानव हा समाजशील प्राणी आहे हे खरंच आहे आणि मानवसमाजाचा पाया लग्नसंस्था नाही हेही तसेच आहे. लग्न हे शारीरिक गरजेच्या पूर्तीसाठी निर्माण झालेला एक समाजव्यवहार आहे. लग्नाचा पाया हा शरीरसंबंध आहे. लग्न हे 'ऑप्शनल' आहे, कारण निव्वळ शारीरिक सुखासाठी किंवा दोन व्यक्तींनी एकत्र राहण्यासाठी ते केलेच पाहिजे असे काही नाही. समाजबांधणीची प्रक्रिया ही आदिम इतिहासात डोकावून पाहिले असते विवाहसंस्था अस्तित्त्वात येण्याच्या फार आधी सुरू झाली होती. तुम्ही भारतीय संस्कृतीचं उदाहरण देताय म्हणून सांगतो. वसंतोत्सव हा टोळीतील किंवा गणातील सर्व प्रजननक्षम स्त्रीपुरुषांनी एकत्र जमून मुक्त शृंगारात रात्र घालवावी आणि त्यामुळे प्रजोत्पादन व्हावे अशा स्वरूपाचा उत्सव होता. त्यात हळूहळू बदल होत पुढे अशा व्यवहारास औपचारिक स्वरूप येऊ लागले. त्यातही दोन व्यक्तींनी एकत्र रहायचे आणि त्यातील कुणी त्या नात्याबाहेर संबंध ठेवायचे नाहीत अशा प्रकारचे बंधन अस्तित्त्वात यायला अजूनही बराच काळ जावा लागला. नंतर हे नाते जन्मभराचे होणे ही पुढची पायरी, विधवापुनर्विवाहबंदी ही त्यापुढची पायरी, विवाहीत स्त्रियांची आणि काही प्रमाणात पुरुषांची घुसमट ही पायरी अशा टप्प्याटप्प्याने विवाहसंस्थेचे स्वरूप, फायदे आणि तोटेही विकसित होत गेले. आर्थिकदृष्ट्या विवाहसंस्थेची आवश्यकता भासली ती मानवसमूहांनी भटके, शिकारी जीवन सोडून शेती करायला सुरूवात केली तेव्हा. विवाहसंस्थेची लवचिकता हाही मुद्दा काही अगदी अतिप्रगत, अर्वाचिन नसून पूर्वीपासूनच ती आहे. बॅटमन यांनी दिलेल्या आदिवासींमधील, पशुपालक समूहांमधील अशी लवचिकता प्रातिनिधिक ठरावी. आदिवासींमध्ये, विशेषतः गोंड आदिवासींमध्ये एक 'घोटुल' नावाचा प्रकार अगदी वीस-तीस वर्षांपर्यंत अस्तित्त्वात होता. थोडा शोध घेऊन पहा घोटुल म्हणजे काय ते. पुढारलेपणाबरोबर, आर्थिक-सामाजिक स्वातंत्र्याबरोबर लग्न या संस्थेची अपरिहार्यता, कर्मकठोरपणा अगदी संपणार नसली तरी विवाहसंस्थेची वाटचाल तिच्या शिखरापासून उतरणीच्या दिशेने नक्कीच सुरू झाली आहे आणि ती अटळ आहे. लग्न मोडीत काढा असे मी म्हणत नाही. पण त्या गोष्टीस वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊन आपल्या आणि इतरांच्याही आयुष्याचे मूल्यमापन त्याभोवती मर्यादित ठेऊ नका. समाजाच्या भुवयांना स्वतःच्या आयुष्याची होकायंत्रे बनू देऊ नका. :-)

In reply to by एस

विटेकर गुरुवार, 01/22/2015 - 16:33
अरे हे इतके सोप्पे आहे तर मग " वधू- वराच्या अपेक्षा" या गोष्टीवर का काथ्या कुटण्यात येतोय ? वसंतोत्सवाची वाट बघायची .. कशाला हवे ते जाचक विवाहबंधन ?

In reply to by विटेकर

एस गुरुवार, 01/22/2015 - 16:38
मुद्द्यांना विचारपूर्वक आणि खुल्या दिलाने उत्तरे द्या. आपण 'सर्वज्ञ' किंवा 'मसीहा' यांच्यासारखे वागणार नाहीत अशी निदान आपल्याकडून अपेक्षा आहे. नपेक्षा सोडून द्या.

In reply to by एस

विटेकर गुरुवार, 01/22/2015 - 16:49
मी सर्वज्ञ असण्याचा प्रश्नच नाही आणि तसा मी नाहीही. "भारतीय विवाह संस्थेचा इतिहास" ( वि का राजवाडे, गुग्लले तर पीदीएफ मिळेल ) वाचला तर तुम्ही सांगताय त्यापेक्षा भयानक गोष्टी समोर येतील. इतिहासातील/ पुराणातल्या नेमक्या कोणत्या गोष्टी आदर्श मानायचा यालाही काहीतरी ताळ तंत्र हवे की नको ? की मला सोयीस्कर आहे तेवढेच घेईन? सेक्स हा बेसिक इन्स्टि़क्ट आहे .. पण तो पशुन्चा ! जो पशुपासून मानव म्हणून उन्नत होऊ पाहतो त्याला धर्माधिश्ठित काम आणि अर्थ स्वीकारलाच पाहीजे. समाजाला फाट्यावर मारून मी जर कुत्र्या- मांजरां सारखा रस्त्यावर रत होणार असेन आणि पूर्वी हे निषिद्ध नव्हते म्हणून त्याचे समर्थन करणार असेन तर काय डोंबलाचा संतुलीत प्रतिसाद देणार? नपेक्शा मी गप्प बसणे पसंत करीन.

In reply to by विटेकर

बॅटमॅन गुरुवार, 01/22/2015 - 16:52
कुत्र्या-मांजरांसारखे रत होणे आणि पार्टनर बदलणे यात फरक नाही का? तुम्हांला तिटकारा असलेल्या गोष्टीबद्दल कसेही अंदाधुंद बोलावे का?

In reply to by विटेकर

एस गुरुवार, 01/22/2015 - 17:06
तुम्ही सर्वज्ञ नाहीत हो, 'सर्वज्ञ' आणि 'मसीहा' या पदव्या आहेत काही आयडींच्या. :-) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे खरंच आपल्या संस्कृतीश्रेष्ठत्त्वाच्या, उदात्तीकरणाच्या ढोंगाचा पडदा फाडणारं पुस्तक आहे. प्रत्येकाने जरूर वाचावे असे. इतिहास, पुराणे इत्यादी माध्यमांतून आपण जे पाहतो, ऐकतो, शिकतो ते सर्वच जसेच्या तसे आंधळेपणाने स्वीकारणे हा तद्दन मूर्खपणा आहेच; तोच न्याय लावला तर अशीच बंधने तथाकथितरित्या पूर्वीपासूनच चालत आलेली आहेत म्हणून पुढेही टिकली पाहिजेत असे मानणे हेही चुकीचेच ठरेल. त्यातही ती टिकवण्याचे कर्तव्य स्वतःच्या शिरावर घेणे आणि समाजाच्या, संस्कृतीच्या प्रवाही स्वरूपाला विरोध करत बसणे हा तर नतद्रष्टपणाच म्हटला पाहिजे. लैंगिक गरजा ह्या मूलभूत गरजा पशूंच्या आणि मानवाच्याही आहेत. त्या नाकारण्याचे काही कारण नाही. इथेही तुम्हीच म्हटल्याप्रमाणे ताळतंत्र ठेवलेच पाहिजे, फक्त ते ताळतंत्र हे पूर्वसूरींनी सांगितलेल्या धर्माच्या नावाखाली चालत आलेल्या चालीरीतींप्रमाणे असण्यापेक्षा 'नैतिक' अधिष्ठानावर आधारित असायला हवे. नैतिकता आणि धार्मिकता ह्या दोन्ही संपूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत ही बाब इथे विशेष उल्लेखनीय. रस्त्यावर कामक्रीडेबाबत - ज्या समाजात ही फारशी विशेष बाब मानली जात नाही तिथे त्याचे कुणाला आश्चर्य वाटणार नाही. जिथे संपूर्ण बुरख्याआड स्त्रीचे आख्खे आयुष्य जाते तिथे पाण्याने भरलेला खड्डा चुकवण्यासाठी चार बोटे जरी तिने झगा वर घेतला तर तिच्या टाचाही कापल्या जातात (संदर्भ - तालिबान) त्या समाजात इतकीही गोष्ट धक्कादायकच मानली जाईल. प्रश्न पुनरेकवार समाजाच्या मूल्यांच्या प्रवाहीपणाचा आहे. ह्या प्रवाहीपणाला, बदलाला कुणालाही बांध घालता येणार नाही.

In reply to by विटेकर

सूड गुरुवार, 01/22/2015 - 18:33
पूर्वी हे निषिद्ध नव्हते म्हणून त्याचे समर्थन करणार असेन तर काय डोंबलाचा संतुलीत प्रतिसाद देणार?
किती मजेशीर आहे बघा हे विटुकाका!! आदर्शवाद जेव्हा पटवून सांगायचा असतो तेव्हा पुराणातली उदाहरणे चालतात, तेच जेव्हा जी गोष्ट तुम्ही आता निषिद्ध मानताय ती तुम्ही म्हणताय त्याच ग्रंथांमध्ये निषिद्ध नव्हती हे समोरचा जेव्हा सांगतो तेव्हा ते पटायला फारफार जड जातं. वर स्वॅप्स ने जे लिहीलंय त्यात समाजाला फाट्यावर मारायचा उल्लेख कुठेही दिसला नाही. उलट लोक काय म्हणतील याचा विचार करुन तुमच्या आयुष्यातले निर्णय नका घेऊ, इतका सरळसोट निष्कर्ष काढला मी!!

In reply to by एस

हाडक्या गुरुवार, 01/22/2015 - 16:43
लग्न मोडीत काढा असे मी म्हणत नाही. पण त्या गोष्टीस वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊन आपल्या आणि इतरांच्याही आयुष्याचे मूल्यमापन त्याभोवती मर्यादित ठेऊ नका. समाजाच्या भुवयांना स्वतःच्या आयुष्याची होकायंत्रे बनू देऊ नका.
हा अख्खा प्रतिसादच सुंदर आहे. मला वाटत नाही, मी एवढ्या साक्षेपात मांडू शकलो असतो. :) जर सगळी वाक्ये तुमचीच असतील तर आमचा सलाम.

In reply to by एस

सुबोध खरे गुरुवार, 01/22/2015 - 18:52
वसंतोत्सव हा पुरुषांच्या दृष्टीने अतिशय सोयीचा आहे परंतु त्यातून गरोदर झालेल्या स्त्रियांचे काय? मानवी आयुष्यात लहानपण हे सर्वात लांब असते. मुल पूर्णपणे स्वावलंबी व्हायला आदिवासींमध्ये सुद्धा १५ वर्षे जायला लागतात. मांजर बिबळे, वाघ किंवा चित्ते यांच्यात मादी हि पूर्ण पाने पिल्लाला एकटी वाढवते. तिचा गर्भधारणेचा काळ ८०-९० दिवस असतो. या काळात सुद्धा ती शिकार करून आपले पोट भरत असते. मानवी स्त्रीला २८० दिवस गर्भारपण असते यातील १०० दिवस ती पूर्ण स्वावलंबी नसते यानंतर १५० दिवस (५ महिने पूल पूर्णपणे तिच्या वर अवलंबून असते या काळात स्त्री हि पूर्ण स्वावलंबी नसते. निर्माण होणार्या संततीने आदिवासिंसारखे भटके जीवन जगायचे असेल तर वेगळे परंतु जर स्थिर जीवन जागून शिक्षण घ्यायचे असेल तर हा वसंतोत्सव स्त्रियांच्या कोणत्याही कामाचा नाही. क्षणाची मजा आणी आयुष्यभराची सजा हि स्थिती स्त्रियांच्या आणी पर्यायाने समाजाच्या हिताची नाही यामुळेच जगभरातील सर्व संस्कृती मध्ये लग्न हि संस्था उदयास आली. यात एका संस्कृतीचा दुसरीशी काहीही संबंध नसताना सगळीकडे थोड्याफार प्रमाणात सारखीच लग्नसंस्था का विकसित झाली याचा मुद्दाम विचार करा. भटक्या जमातीत फक्त मुक्त सेक्स आहे कारण होणार्या संततीला देण्यास पुरुषाकडे काहीच नसते. जेंव्हा मानव स्थिर जीवन जगायला लागला आणी आपली संपत्ती निर्माण करू लागला तेंव्हा हि संपत्ती आपल्याच संततीला जावी हा नैसर्गिक विचार त्याच्या मनात आला. त्याचबरोबर वृद्धावस्थेत आपली काळजी फक्त आपलीच संतती घेईल हा स्वार्थी विचारही त्यात होता. वसंतोत्सवात होणारी संतती माहित नसलेल्या पित्याची का काळजी घेईल. ( वाघ सिंह ई प्राणी आपली नसलेली संतती सरळ मारून टाकतात). यातून पत्नी हि केवल आपलीच असावी या हेतूने लग्न हि संस्था अस्तित्वात आली म्हणजे होणारी संतती आपलीच असावी हा हेतू साध्य करता आला. लग्न संस्था हि परिपूर्ण नाहीच पण त्याला सशक्त पर्याय अजूनतरी उपलब्ध नाही. आदिवासींचे उदाहरण फक्त त्यांच्या उन्मुक्त सेक्स पुरते देणे ठीक आहे पण नैसर्गिक आपत्तीत त्यांची होणारी परवड या बद्दल कोणी बोलत नाहीत. समजा पुण्यात ५० मुलामुलींचा गट उन्मुक्त जीवन जगत आहे आणी त्यातील १५ मुली पुढच्या ३ महिन्यात गरोदर झाल्या तर त्यांचे पुढे काय होणार हे सरळच दिसते. यावेळेस मग आपल्याला आधुनिक वैद्यक शास्त्राचा आधार घ्यावा लागेल. अन्यथा त्या मुलांचे आयुष्य अनाथालयात( यासाठी पण तुम्हाला समाजाची गरज पडतेच) कसे जाईल किंवा त्या कुमारी मतांचे आयुष्य कसे असेल याचा विचार करून पहा. आदिवासी सेक्स जीवनाबद्दल आकर्षण तेवढ्यापुरते ठीक आहे. सध्या इतकेच

In reply to by सुबोध खरे

एस गुरुवार, 01/22/2015 - 19:48
सिलेक्टिव्ह रीडिंगचे उदाहरण. माझा प्रतिसाद वसंतोत्सवाबद्दल नसून समाजातील वाढत जाणार्‍या मोकळेपणाच्या अपरिहार्यतेबद्दल होता. असो.

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या गुरुवार, 01/22/2015 - 16:46
हे असं होतं टका भौ.. जे आहेत किंवा जे कधी नव्हे ते आलेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष आणि जे नाही आलेत (संक्षी, नाना, माई) त्यांचा धोसरा काढून उंबर्‍याबाहेर बघत बसायचे. असं कसं चालायचं हो ?

सस्नेह गुरुवार, 01/22/2015 - 16:45
इतके विचार वाचले पण पटतो एकच !..
अरे संसार संसार, दोन जिवांचा विचार ! देतो सुखाला नकार, आणि दु:खाला होकार
..मग तो संसार आणि विचार लग्नाचा असो नाहीतर 'बिन'लग्नाचा !

पैसा गुरुवार, 01/22/2015 - 17:00
सगळ्यांचं समाधान झालं का? खरडफळ्याच्या पुढची अवस्था येण्यापूर्वी थांबूया आता!

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या गुरुवार, 01/22/2015 - 17:31
आम्ही पण हेच म्हणतो. बाकी संमं ला बूच लावायची एवढी का घाई असते ? खरच विचारतोय, म्हणजे मिपावर लोड येतो का ५०० वगैरे प्रतिसाद झाल्यावर ? कारण कदाचित एखाद्याला एखादा मुद्दा नंतर आठवेल मग हा धागा बंद ( आणि बंद का तर ५०० + झालेत ) म्हणून नवाच काढावा लागेल .

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Fri, 01/23/2015 - 10:46
ही हौशी साईट असल्याने, अजून पण इथे बरेचसे बग्स आहेत. उदा. १. दुसर्‍या पानापासून नविन प्रतिसाद दिसत नाहीत. २. आपल्या पीसी किंवा मोबाईल वरून फोटो टाकता न येणे.आधी गुगल मध्ये टाका आणि मग इथे लिंक द्या, असला द्राविडी प्राणायाम करायला लागतो. ३. खरड-वहीत आलेली खरड दिसत नाही. त्यामुळे प्रतिसादांचे लोड-टेस्टींग पण झालेले नसावे.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस Fri, 01/23/2015 - 14:35
*मोबाइल व्ह्यू पर्याय ठेवलेला असला तर खरडवहीतली नोंद उघडूनच येते *इमेजिज ऑफ (/सिलेक्ट बैंडविड्थ=लो Low)ठेवूनच मोठे धागे पटकन उघडले जातात) .

In reply to by पैसा

एस गुरुवार, 01/22/2015 - 17:31
आपण सर्वज्ञ - आपलं ते संपादक आहात. काय तो साक्षेपाने निर्णय घ्या! :-) संपादकांनी आठवावे स्वरुप । संपादकांनी आठवावा साक्षेप । संपादकांनी आठवावा प्रताप । मिपावरी ॥

साधा मुलगा गुरुवार, 01/22/2015 - 17:27
मिपावर hall of fame वगैरे प्रकार आहे का? सर्वात जास्त प्रतिक्रियेचा धागा, सर्वात जास्त वाचनाचा धागा वगैरे वगैरे? याचे statics कुणाकडे आहे का?

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय गुरुवार, 01/22/2015 - 18:09
तुम्हाला कळत कसे नाही. माझा एक एक प्रतिसाद धाग्याला इंचाइंचाने १००० कडे नेउन इतिहासाचे पुनर्लेखन करायला भाग पाडत आहे.

कोमल गुरुवार, 01/22/2015 - 20:02
धाग्याची सप्तपदी झाली म्हणायची.. हाभिणंडण मु.वि. काका...

हाडक्या गुरुवार, 01/22/2015 - 20:52
अर्रे हो.. इथे अवांतर असेल पण समलिंगी व्यक्तींच्या विवाहविषयक अपेक्षा वगैरे बद्दल कोणीच कसे काही बोलले नाही अजून ?

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या Fri, 01/23/2015 - 15:19
अगदी अगदी.. टका म्हणतोय तसे सूडभौ, तुमचे मत लिहा पाहू.. आमच्या माहितीतले सगळे समलैंगिक इंग्रज पब्लिक प्रेम विवाह केलेले आहेत आणि जास्त काही विचारता येत नाही त्यांना (आणि भारतीय कोणी माहीत नाहीत अजून .. ;) ) पण एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्यांच्यात पण घरात "नवरा"(एक प्रकारे कर्ती व्यक्ती/dominance अशा अर्थाने) हा रोल कोणाचा यावर छुपा संघर्ष चालू असतो, अर्थात फार कमी असेल पण जास्त विदा नाही ब्वा आपल्याकडे. :)

In reply to by हाडक्या

सूड Fri, 01/23/2015 - 16:04
टका म्हणतोय तसे सूडभौ, तुमचे मत लिहा पाहू..
असं म्हणता? बरं!! मी आधीच एका प्रतिसादात म्हटलंय, दोन व्यक्ती परस्परसंमतीने काही करत असतील आणि त्या गोष्टीचा मला जोवर पर्सनली काही इम्पॅक्ट होत नाही तोवर मला त्याच्याशी शष्प घेणं देणं नसतं. तोच नियम इथेही!! आमच्या कॉलेजात आलेल्या काऊंन्सेलरने समलिंगी संबंध नैसर्गिक असतात असं सांगितलं होतं, त्यामुळे ज्यांना पटत असतील आणि त्यातून जे होईल ते निस्तरायची (सगळ्याच प्रकारची मानसिक, शारीरिक इ.) तयारी असेल त्यांनी ते खुशाल ठेवावेत असं माझं मत आहे.
आमच्या माहितीतले सगळे समलैंगिक इंग्रज पब्लिक प्रेम विवाह केलेले आहेत आणि जास्त काही विचारता येत नाही त्यांना (आणि भारतीय कोणी माहीत नाहीत अजून ..
तुम्हाला परदेशात तरी असलं काही पाहायला मिळालं!! आमचं परदेशगमन शिंचं जेमतेम सात दिवसाचं होतं. त्यामुळे आता याहून मोठ्ठं मतप्रदर्शन हवं असेल तर मला हिरव्या देशात जायला मिळावं म्हणून नवस करा अंबाबाईला!! तिकडे कोणी सापडलंच माहितीत तर मुलाखती घेऊन लेखच पाडतो. ;)

In reply to by सूड

टवाळ कार्टा Fri, 01/23/2015 - 16:05
दोन व्यक्ती परस्परसंमतीने काही करत असतील आणि त्या गोष्टीचा मला जोवर पर्सनली काही इम्पॅक्ट होत नाही तोवर मला त्याच्याशी शष्प घेणं देणं नसतं. तोच नियम इथेही!! आमच्या कॉलेजात आलेल्या काऊंन्सेलरने समलिंगी संबंध नैसर्गिक असतात असं सांगितलं होतं, त्यामुळे ज्यांना पटत असतील आणि त्यातून जे होईल ते निस्तरायची (सगळ्याच प्रकारची मानसिक, शारीरिक इ.) तयारी असेल त्यांनी ते खुशाल ठेवावेत असं माझं मत आहे.
+११११११११११११११११११११११११

श्रीरंग_जोशी गुरुवार, 01/22/2015 - 21:15
धाग्याच्या आशयाशी सहमत आहेच. पण माझ्या निरिक्षणाप्रमाणे पत्रिका या प्रकारामुळे अनेकदा अपेक्षा जुळत असूनही चांगल्या जोड्या बनता बनता राहतात अन एकमेकांशी जुळवून न घेता येणार्‍या जोड्यांचे प्रमाण वाढते. हे पत्रिकेचे जोखड संपूर्ण समाज दूर करेल तो सुदिन.

In reply to by श्रीरंग_जोशी

मुक्त विहारि Fri, 01/23/2015 - 11:36
पत्रिका हवीच पण ती आधुनिक... आता ह्या पत्रिकेवर पण एखादा धागा कुटायला घेवू या.

In reply to by श्रीरंग_जोशी

सुबोध खरे Sat, 01/24/2015 - 09:14
मला एक कुतूहल आहे कि माझी आणि माझ्या बायकोच पत्रिका जुळते कि नाही? पण एक भीती पण वाटते कि समजा पत्रिका जुळत नसेल तर "आता" (२२ वर्षांनी) आपसात पटणार नाही. असे झाले तर काय घ्या. या पत्रिकांचे काही सांगता येत नाही.

मदनबाण गुरुवार, 01/22/2015 - 22:08
बायको :- माझ्या मनाचा मोठेपणा बघा... मी तुम्हाला न बघताच लग्न केलं. नवरा :- माझा मोठेपणा बघ... मी तुला बघुन पण तुझ्याशीच लग्न केलं ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अहो धर्माचा आणि लग्नाचा गंभीर संबंध आहे , आपणास ठाऊक नाही काय ? बहुतेक ठाउक आहेच पण तुम्हीही कदाचित सहस्त्रकासाठी हातभार लावत आहात =)) --

अभ्या.. Fri, 01/23/2015 - 09:44
muvi हा ७८६ नं चा पर्तिसाद हाय. खास अंक काढला हाय. मधले आणि नंतर कीती बी टाका. :) बादवे मुवि हाबिणंड्ण बर्का. (गोड्बोल्याला थांकू ही खुर्ची मला दिल्याबद्दल ;) )

In reply to by अभ्या..

मुक्त विहारि Fri, 01/23/2015 - 21:54
भारी पोस्टर.... बाद्वे, एक ४-५ दिवसांपुर्वीच मुलाने पल्सर घेतली. किंबहूना पल्सरच्या चाक-गुणांमुळे ७८६ आकडा पार झाला...

अश्या प्रकारे धाग्यात फायनली संपादकांना काम मिळालेले है!! कपिलमुनिंनी टाकलेला शांती मंदीरा बेदीचा फोटो उडाल्येला आहे!!!!!! =))

In reply to by मुक्त विहारि

सकाळीच अभ्यारावांन्नी बन्नेर दाखवला होता , तो इथे अपडेट करणार आहे .... :) त्यांनी तो आधीच वर प्रकाशित केला आहे तो इथे मुव्ह कराना संपादक काका ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

टवाळ कार्टा Fri, 01/23/2015 - 11:48
१००० वा किंवा १००१ वा किंवा ११११ वा "बुच लावणारा" प्रतिसाद लिहायला संपादकांमधे सुध्धा काम्पिटिशन असेल काय? ;)

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा Fri, 01/23/2015 - 15:27
अर्रेच्चा "बगळ्यांची माळफुले" च्या ऐवजी मुविशेख - उंटांची माळफुले...अजुनी वाळवंटात असे हवे

दादा पेंगट Fri, 01/23/2015 - 13:21
ह्या अपेक्षा सरसकट सगळ्याच शिक्षण-नोकरी गटातल्या मुलींच्या असतात की विंजेनर-यम्बिये गटातल्या महानगरी नोकरीवाल्या मुलींच्या असतात हे जाणून घ्यायला आवडेल. आयटीवाल्या बव्हंशी मुलींना आपल्या मैत्रिणींमध्ये मिरवता येऊ शकणारा( मुलांनाही तशीच मुलगी पाहिजे असते म्हणा), स्वतःचा किमान १ बीहेच्चके असलेला,चार चाकी( न्यानो-आल्टो सारखे गरीबांचे मॉडेल्स नको) असणारा, अमुकपेक्षा जास्तच प्याकेज अससणाराच हवा असतो. बरं, ह्यांचे बाहेरच्या जगाविषयी पराकोटीचे अज्ञान असते. व्यासंग म्हणून नाही, डोक्याला खाद्य देण्याची इच्छा नाही, बिग बॉस च्या घरातली भांडणे हापिसात आणणार. (हापिसात सतत ह्यांची पिरपिर,निराळ्याच जगात असणारा वावर नि अपेक्षांची क्यासेट ऐकून डोके भंजाळले नि आयटी क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला. ) प्रेमविवाहात पण प्रॅक्टिकलपणा आला आहे. मुली, नि मुलेही, आंधळेपणाने प्रेमात पडत नाही. मुली सहसा आपल्याच हापिसातला, प्रोजेक्टमधला, काही वर्षे सिनिअर असलेल्या, शक्यतो जातीतल्या मुलाच्या प्रेमात पडतात आणि लग्नही करतात. घरचेही मुलगा नाकारण्यासारखा नाही म्हणून मंजूरी देतात. ह्यात एक विनोदी प्रकार पाहिलाय. तो म्हणजे हुंडावाल्या जातीतली मुलगी असेल तर कित्येक पालक 'बरं झालं, हुंड्याचा खर्च वाचला.' हादेखील विचार करताना पाहिले आहे. ते विरोध करतच नाही. कॉलेजमधले प्रेमप्रकरण कॉलेजमध्येच सोडून कंपनीत नवी इनिंग सुरु करणार्‍या मुली परिचयाच्या आहेत. मुलींची संख्या तशीही कमी असल्याने पोरं पोरगी गळ्यात पडतेय तर पडू देत म्हणत नकार काही देत नाही.त्यांचे मुलींच्या बाबतीत एकंदर धोरण 'आन्देव' प्रकारात मोडत असते. ( पण ज्याची गर्लफ्रेन्ड सोडून गेलेली असते त्याला पुन्हा बरी मुलगी शोधायला फार कष्ट पडतात.) म्हणून माझ्या ज्या मैत्रिणींनी कॉलेजात ज्याच्या प्रेमात पडल्या त्याच मुलाशी लग्न केले, त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. कोणापाशीही फ्लॅट नाही, कार नाही, पण एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे, नात्यात मस्त अवखळपणा, खेळकरपणा आहे. हे सगळे अर्थातच आयटीत जॉब असणारे आहेत. फ्लॅट-गाडी घेतील तेव्हा स्वतःच्या पैशाने घेतीलच, पण सध्या तरी मजेत आयुष्य जगत आहेत. असो. अस्मादिकांचा एक किस्सा आठवला. एका मुलीला अपेक्षा विचारल्या तेव्हा तिने मुलगा खूप पैसेवाला हवा जेणेकरून मला मनाप्रमाणे शॉपिंग करता येईल, असे सांगितले.बाकी काही अपेक्षा नाहीत. मी शॉक्ड! म्हणालो, गं पोरी, पैसा असेल पण संतोष नसेल तर काय फायदा? म्हणाली खूप पैसा असला तरच मला संतोष लाभेल.. मी म्हणालो, बरं. भेटून आनंद झाला.

In reply to by दादा पेंगट

टवाळ कार्टा Fri, 01/23/2015 - 13:25
पोग्गी कोणत्याही टायपची असो...नखरे बव्हांशी सगळ्यांचेच असतात...बदल असतो ते फक्त नखरे कधी करायचे त्या टायमिंगचा

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन Sat, 01/24/2015 - 11:53
अंमळ वैयक्तिक टिप्पणी झालीय इथे असं वाटतं. दोन्ही पार्ट्यांना अडचण नसेल तर मला काय प्राब्ळम असणारे? पण म्हटलं कमीतकमी निर्देश तरी करावा.

In reply to by टवाळ कार्टा

पैसा Sat, 01/24/2015 - 13:27
टका खरा खिलाडू आहे! @बॅट्या, वैयक्तिक वाटलं तरी ते तुमच्यासारख्या सगळ्या मुलांसाठी आहे. इथे पीसीसमोर बसून काथ्या कुटत बसलात तर कठीण आहे. आमच्यासाठी एकमेकांना भेटायच्या बर्‍याच जागा असायच्या आणि वेळ पण. कारण कॉम्प्युटरांनी जग व्यापलं नव्हतं. तात्पर्य काय, उत्तिष्ठ, जाग्रत आणि बाहेर पडा! पीसीसमोर बसून वेळ काढलात तर खर्‍या जगातल्या लग्नाच्या मुली तुमची वाट बघत थांबणार नाहीत. मुली बघून लग्न करायचं असेल तर २/४ भेटीत मग स्वभाव कळत नाही, "क्लिक" होत नाही असं काही काही चालवून घ्यावं लागेल. मुदलात मुलींचे नखरेच असतात अशा विचाराने मुलींकडे पाहिलंत तर चांगल्या गोष्टी समोर असल्या तरी लक्षात येणार नाहीत.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा Sat, 01/24/2015 - 13:38
पैसा तै...ठ्याम्क़ू :) रच्याकने...माझ्या कॉलेजात आणि आत्तापर्यंतच्या सगळी कम्पन्यांत एकही "सिंगल" पाखरु नव्हते....बाहेर लग्नांत वगैरे असतात पण तिथे मोठे पण आम्च्यावर नजर ठेउन अस्तात...मॉल मधे कोणी दिसली तर बोलण्याची सुरवात कशी करायची ते सांगता का

In reply to by टवाळ कार्टा

पैसा Sat, 01/24/2015 - 13:54
मुलीला पाखरू समजून बोलायला गेलास तर ती बिथरलीच म्हणून समजा! बाकी सल्ले प्रगोच्या लेखाचा दुसरा हप्ता आला की मिळतील! फिल्मी स्टैलने अ‍ॅप्रोच करायचं असेल तर चष्मेबद्दूर मधला अमिताभ आणि रेखाचा सीन बघा! =))

In reply to by टवाळ कार्टा

पैसा Sat, 01/24/2015 - 22:31
मॉलमधे ओळख करून घ्यायचं काम अगदीच सोप्पंय. ती मुलगी जी वस्तू खरेदी करायला बघत असेल त्याच वस्तूबद्दल तिला प्रश्न विचारावेत आणि आपल्याला खरेदी करायला मदत कर म्हणून सांगावे. मुलींच्या वस्तू असतील तर बहिणीला भेट द्यायची आहे किंवा बहिणीने, आईने आणायला सांगितलंय म्हण. जास्त इंप्रेशन पडेल!

In reply to by हाडक्या

टवाळ कार्टा Sun, 01/25/2015 - 09:30
हे सग्ळे कॉलेजात जात असतानाच जुने झालेले पर्याय आहेत आणि याचे कंफरमेशन सुध्धा कॉलेजातल्याच मैत्रिणींने दिलेले होते

In reply to by बॅटमॅन

पैसा Sat, 01/24/2015 - 17:14
सल्ल्याबद्दल थ्यांकू बर्का! तुम्हाला असल्या सल्ल्यांची गरज नै हे विसरलेच होते. बरं, तुमचं नाव त्यातून कट करून टाका! क्षमस्व!

In reply to by हाडक्या

बॅटमॅन Sat, 01/24/2015 - 23:34
असेच काही नाही हां. चांगली प्रगती असेल तर मात्र आमचे मास्तरचक्षू क्षणार्धात इ. उघडल्या जातात.

In reply to by दादा पेंगट

आजानुकर्ण Fri, 01/23/2015 - 23:46
गं पोरी, पैसा असेल पण संतोष नसेल तर काय फायदा? म्हणाली खूप पैसा असला तरच मला संतोष लाभेल.
समजा मुलाचंच नाव संतोष असेल तर या प्रयोगाच्या निकालात काही फरक पडू शकेल काय?

हाडक्या Fri, 01/23/2015 - 22:56
आता कोणी नाही आले तर ८५० पर्यंत एकटा लढण्याची मी हातातला चहाचा कप खाली ठेवून प्रतिज्ञा घेतो. जोवर ८५० होत नाहीत तोवर मी चहा पिणार नाही.. (विजा कडकडल्याची स्माईली कल्पावी)

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Sat, 01/24/2015 - 12:05
पुढचा आकडा ठरवा... अर्थात, जे काही वाद-विवाद किंवा चर्चा आणि अनुमान निघायचे होते ते आधीच समजल्याने, आता ही शेपटी किती लांबवायची, ते आपल्याच हातात आहे. नक्की किती प्रतिसाद झाले, की धागा उघडणे बंद होते, त्याची चाचपणी करू या.