पुराणातल्या विमान शास्र वैगेरे वांग्याच चमचमीत भरीत !
भारताच्या ग्रंथ संपदेत ब्रम्हास्त्र, वेगवेगळी अस्त्रे , शस्त्रे , शास्त्रे जसे विमान शास्त्र वैगेरेचे विस्मयकारक उल्लेख आलेले आहेत. भारतीय समाजातील काही लोक अश्या विस्मयकारक उल्लेखाचा दाखला देत भुत काळातील भारत टेक्नॉलॉजीत खुप पुढे होता असा दावा करत असतात . पण त्याच वेळेला समाजातील काही सुशिक्षीत लोक हा दावा खोडताना ह्या सर्व मात्र कवि कल्पनाच आहेत असा दावा करतात.
भारताने जगाला अंक मोजायला शिकवल. शुन्य, दशांश पद्धती ही भारताची जगाला भेट आहे. पण ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत. शाळेत विदेशी लोकांनी काय शोधुन काढल त्यावर जोर दिला जातो.
विमान शास्त्र, ब्रम्हास्त्र, वेगवेगळी अस्त्रे , शस्त्रे वैगेरे उदाहरणाच्या जोरावर कोणतेही संशोधन न करता, भारत फार पुर्वी प्रगत होता असा दावा करण चुकीच आहे. पण त्याच बरोबर कोणते ही संशोधन ही न करण हे ही तितकेच चुकीचे आहे.
भारतीय म्हणुन असे बरेच भाग आहेत ज्यावर सरकारी खर्चाने संशोधन होणे गरजेच आहे. हरप्पा, मोहेंजोदाडो च्या समकालिन भारतात असलेल्या संस्कृती तसेच खुतुबमिनार जवळचा लोहस्तंभ, कोणार्क मंदिर मधील विस्मयकारक मंदिर उभारणीतील टेक्निक , होयशाळा मंदीरातले चकाकीत स्तंभ व आजही चकाकणारा नंदी !!
स्वातंत्र्यानंतर भारतीय संस्कृतीक ठेव्यावर संशोधन व संवर्धन सोडाच पण त्याची उपेक्षाच झालेली आहे. ही अक्षम्य उपेक्षा जाणुन बुजुन केली आहे अस राहुन राहुन वाटत .
कोणार्क मंदीरावर एका परदेशी माणसाने विस्तृत फिल्म बनवली जी डीस्कव्हरी सारख्या चॅनेल वर दाखवली गेली. ह्या फिल्म मध्ये अश्या काही बाबी दाखवलेल्या होत्या की मला स्वतःला विश्वास बसला नाही.
अजिंठा वेरुळ सारख्या लेणी बनवल्या त्या वेळेला त्या कश्या बनवल्या असतील, कैलाश मंदीर बनवण्यासाठी लाखो टन खडकाचा भाग कोरुन काढावा लागला होता अस सांगीतल जात पण तो कचरा कुठे टाकला गेला ह्याचा कोणता ही पुरावा नजिकच्या परिसरात उपलब्ध नाही. ह्याचा अर्थ असा होतो की हे मंदीर कोरुन काढण्या ऐवजी दुसर्या कोणत्या तरी पद्धतीने बनवले गेले असले पाहीजे. जसे की दगड मऊ करुन त्या मऊ दगडातुन मंदीर कोरुन काढणे. जी मऊ झालेली ती माती सहज काढलेली असेल.
भारतीय नौका बनवण्यात माहीर होते अस म्हणतात पण अश्या नौका बनवण्याचे कारखाने कोठे होते, कोणते फायदे अश्या नौकेत असायचे हे आपल्याला आता कळणे कठिण आहे. ह्यावर संशोधन होणे महत्वाचे आहे.
भारतीय गाय ही भारतीय संस्कृतीच्या मध्य भागात विराजमान आहे. " गौ माता " ह्या नावाने मिरवणार्या ह्या प्राण्याला ईतक महत्व का दिल गेल असल पाहीजे ? ह्या वर संशोधन करण्या ऐवजी भारतीय समाजाला नाव ठेवण्यात लोकांनी धन्यता मानलेली आहे. जर संशोधन केल तर गायी बद्दलची भ्रांती दुर होईल व खरी माहीती बाहेर येईल. सरकार आता भारतीय गायी वर संशोधन करण्यावर जोर देत आहे.
भारतात स्वबळावर संशोधन करणे हे सोप्पे नाही ह्याची कल्पना आहे. ह्याच कारण आपली शिक्षण व्यवस्था आहे. आज आपण
रोबॉटस शिक्षण संस्थेतुन काढत आहोत. ज्या पेशात पैसा नाही त्यात कोणालाही आपल करीयर करायची ईच्छा असत नाही. आपली आवड , कल वैगेरेला ईथे स्थान नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खरयं!!! " घरातली कोंबडी दाळी
फुलपाखराच्या चार अवस्था असतात
सकाळी सकाळी देशभक्तीपर लेख
अत्रे साहेब, डोळे पुसत पुसत
प्रश्न नीट, कुतुहलपूर्वक
अजिंठा वेरुळ सारख्या लेणी
सोळा अणे
अभ्या..
"मी गेलो नसल्याची शक्यताच
अत्रे,
लेखाचा आशय पटला. आवडला.
"मी गेलो नसल्याची शक्यताच
"मी "अजिंठा वेरुळला" गेलो
धन्यवाद. आता मी तुम्हाला अशा
प्राचीन विज्ञान कि आधुनिक अंधश्रद्धा...
लाखमोलाचा प्रतिसाद!!!
होय केला ... वेगळा धागा केलाय
जब्बरदस्त प्रतिसाद!!
बर्याच दिवसांनी चांगला
अप्रतिम प्रतिसाद..
एक तर काय असत कि जुने ग्रंथ,
मस्त प्रश्न! मला सापडलेले
क्या बात है.
अत्रे साहेब,
विस्मयकारक आहे.
आदित्य कोरडे, छान प्रतिसाद,
आदित्य कोरडे,
मग कुठे आहेत ते फाळ? त्याचे
दादा, तो स्तंभ आहे का नाही?
प्राचिन भारतातले सर्व ज्ञान
बृहद् विमान शास्त्र नावाने
भारतीय संशोधनाचं जाऊ द्या पण
सध्या डॉक्टराम्नी एक नविनच
भारताने जगाला अंक मोजायला
+1
तुमच्या शिक्षकांनी सांगितले
शास्त्र आणि तंत्र यात फरक
इष्टुर फाकडा
उत्तर
युट्युब वर मिळालेला ऐक
शाळेत सर्व काही