भारताच्या ग्रंथ संपदेत ब्रम्हास्त्र, वेगवेगळी अस्त्रे , शस्त्रे , शास्त्रे जसे विमान शास्त्र वैगेरेचे विस्मयकारक उल्लेख आलेले आहेत. भारतीय समाजातील काही लोक अश्या विस्मयकारक उल्लेखाचा दाखला देत भुत काळातील भारत टेक्नॉलॉजीत खुप पुढे होता असा दावा करत असतात . पण त्याच वेळेला समाजातील काही सुशिक्षीत लोक हा दावा खोडताना ह्या सर्व मात्र कवि कल्पनाच आहेत असा दावा करतात.
भारताने जगाला अंक मोजायला शिकवल. शुन्य, दशांश पद्धती ही भारताची जगाला भेट आहे. पण ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत. शाळेत विदेशी लोकांनी काय शोधुन काढल त्यावर जोर दिला जातो.