मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

३१ डिसेंबर : एक काळा दिवस

अज्ञात ·

अनन्त अवधुत Tue, 01/01/2019 - 00:30
मोठ्या अपेक्षेने धागा उघडला होता. मला वाटले ३१ डिसेम्बर इंग्रजी कसा वाईट आणि फाल्गुन अमावस्या कशी चांगली असे काही वाचायला मिळेल. त्या फेसबुकी लिंक पलीकडे काही सांगायचे असेल, तुमची काही मते असतील तर मांडा. संपादक मंडळ , असल्या इधरका कन्टेन्ट उधर वाल्या प्रचारकी पोस्ट ज्यात लेखकाची काहीच मते नाहीत, त्या बाबत काही धोरण आहे का?

काय रे हे ब्लॅककॅट्या?
आणि हे सर्व झाले भाजपा आणि बाजपेयींमुळे.
त्यावेळी विमानात २०० प्रवासी असावेत. तुझे वय माहित नाही पण हायजॅक झाल्याची बातमी आली आणी काही तासातच प्रवाशांच्या नातेवाईकांनी चॅनेलसवर येऊन गलका केला व "सरकारने वाट्टेल ते करावे पण आमच्या नातलगांना सोडवावे. काही झाल्यास सरकार जबाब्दार' असा आक्रोश चालु केला. अनेकांनी/मिडिया पत्रकारांनी त्यात भर घालून आता सरकारने मागण्या मान्य कराव्यात असे लिहायला चालु केले. सरकार दबावाला बळी पडले नसते तर नवल. १९८४ साली फक्त रविंद्र म्हात्रे ह्यांचे अपहरण झाले होते. येथे २०० लोकांचे अपहरण झाले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Blackcat Tue, 01/01/2019 - 06:02
याच प्रकरणानंतर कायदाही झाला की , विमान हायजॅक झाल्यास सरकार काहीही करणार नाही. कुणाची कसलीही मागणी पुरवली जाणार नाही . त्यामुळे विमान हायजेकची प्रकरणे कायमची बंद पडली.

नाखु Wed, 01/02/2019 - 18:45
वाजपेयींचे भारतरत्न परत घेता येईल का? मिपावर तशी काही तजवीज आहे का? त्या दोनशे प्रवाशांच्या हत्येनंतर नक्की त्यांच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना "देशासाठी बलिदान"असं गौरव पुरस्काराने सन्मानित केले असते काय? असं ओलिसांबदल्यात सोडण्याचे एकमेव उदाहरण आहे काय? अगदी मोसाद पासून अमेरिकेत कधीच घडले नसावे ते पातक वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली घडले आहे,त्यांचे वारस नसल्याने नक्की प्राय:श्चित किती पिढ्यांनी घ्यावे? वाचकांची पत्रेवाला नाखु

प्रसाद_१९८२ Wed, 01/02/2019 - 18:50
हे व्हाट्सअपवर आले होते , काही असांसदीय शब्द वगळले आहेत. -- काय दिवस आलेत. आता व्हाट्सअपवरचे भिकार संदेश देखील इथे टाकायला सुरुवात केली लोकांनी.

In reply to by प्रसाद_१९८२

बनावट कचरा हुडकत राहून तो गोळा करून आणि नाहीच सापडला तर खोटा कचरा बनवून, त्याची टोपली दुसर्‍याच्या डोक्यावर उपडी करायची आणि मग, "बघा, बघा, किती गलिच्छ माणुस आहे" अशी घसा फुटेपर्यंत बोंब मारत बसायचे, हा हताश आणि अगतिक झालेल्या राजकारण्यांचा खेळ चालू आहे. :)

जानु Fri, 01/04/2019 - 12:36
अशा प्रकारचे लेख वाचल्यानंतर बाकी काही मत नाही झाले तरी माझ्यासारख्याचे काँग्रेस विरोधी मत फार नक्की होते. कारण काय ते फार स्पष्टपणे सांगता येणार नाही पण पुढच्या निवडणुकीत भाजपाला मत देणार हे निश्चित.

अनन्त अवधुत Tue, 01/01/2019 - 00:30
मोठ्या अपेक्षेने धागा उघडला होता. मला वाटले ३१ डिसेम्बर इंग्रजी कसा वाईट आणि फाल्गुन अमावस्या कशी चांगली असे काही वाचायला मिळेल. त्या फेसबुकी लिंक पलीकडे काही सांगायचे असेल, तुमची काही मते असतील तर मांडा. संपादक मंडळ , असल्या इधरका कन्टेन्ट उधर वाल्या प्रचारकी पोस्ट ज्यात लेखकाची काहीच मते नाहीत, त्या बाबत काही धोरण आहे का?

काय रे हे ब्लॅककॅट्या?
आणि हे सर्व झाले भाजपा आणि बाजपेयींमुळे.
त्यावेळी विमानात २०० प्रवासी असावेत. तुझे वय माहित नाही पण हायजॅक झाल्याची बातमी आली आणी काही तासातच प्रवाशांच्या नातेवाईकांनी चॅनेलसवर येऊन गलका केला व "सरकारने वाट्टेल ते करावे पण आमच्या नातलगांना सोडवावे. काही झाल्यास सरकार जबाब्दार' असा आक्रोश चालु केला. अनेकांनी/मिडिया पत्रकारांनी त्यात भर घालून आता सरकारने मागण्या मान्य कराव्यात असे लिहायला चालु केले. सरकार दबावाला बळी पडले नसते तर नवल. १९८४ साली फक्त रविंद्र म्हात्रे ह्यांचे अपहरण झाले होते. येथे २०० लोकांचे अपहरण झाले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Blackcat Tue, 01/01/2019 - 06:02
याच प्रकरणानंतर कायदाही झाला की , विमान हायजॅक झाल्यास सरकार काहीही करणार नाही. कुणाची कसलीही मागणी पुरवली जाणार नाही . त्यामुळे विमान हायजेकची प्रकरणे कायमची बंद पडली.

नाखु Wed, 01/02/2019 - 18:45
वाजपेयींचे भारतरत्न परत घेता येईल का? मिपावर तशी काही तजवीज आहे का? त्या दोनशे प्रवाशांच्या हत्येनंतर नक्की त्यांच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना "देशासाठी बलिदान"असं गौरव पुरस्काराने सन्मानित केले असते काय? असं ओलिसांबदल्यात सोडण्याचे एकमेव उदाहरण आहे काय? अगदी मोसाद पासून अमेरिकेत कधीच घडले नसावे ते पातक वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली घडले आहे,त्यांचे वारस नसल्याने नक्की प्राय:श्चित किती पिढ्यांनी घ्यावे? वाचकांची पत्रेवाला नाखु

प्रसाद_१९८२ Wed, 01/02/2019 - 18:50
हे व्हाट्सअपवर आले होते , काही असांसदीय शब्द वगळले आहेत. -- काय दिवस आलेत. आता व्हाट्सअपवरचे भिकार संदेश देखील इथे टाकायला सुरुवात केली लोकांनी.

In reply to by प्रसाद_१९८२

बनावट कचरा हुडकत राहून तो गोळा करून आणि नाहीच सापडला तर खोटा कचरा बनवून, त्याची टोपली दुसर्‍याच्या डोक्यावर उपडी करायची आणि मग, "बघा, बघा, किती गलिच्छ माणुस आहे" अशी घसा फुटेपर्यंत बोंब मारत बसायचे, हा हताश आणि अगतिक झालेल्या राजकारण्यांचा खेळ चालू आहे. :)

जानु Fri, 01/04/2019 - 12:36
अशा प्रकारचे लेख वाचल्यानंतर बाकी काही मत नाही झाले तरी माझ्यासारख्याचे काँग्रेस विरोधी मत फार नक्की होते. कारण काय ते फार स्पष्टपणे सांगता येणार नाही पण पुढच्या निवडणुकीत भाजपाला मत देणार हे निश्चित.
■31 डिसेंबर हा काळा दिवस आहे ह्याच दिवशी भारताचे प्रधानमंत्री अटलबिहारी बाजपेयीं ह्यांनी कट्टर अतिरेकी व त्यांचा मास्टर माईंड ना कंदहार येथे नेऊन सोडले होते. सन 1999 ? ■अशीही बातमी आहे कि 100 कोटी रुपये परकीय चलनात दिले गेले होते.

पुराणातल्या विमान शास्र वैगेरे वांग्याच चमचमीत भरीत !

डँबिस००७ ·

In reply to by डँबिस००७

अत्रे Sat, 08/19/2017 - 18:32
प्रश्न नीट, कुतुहलपूर्वक विचारले तर उत्तर द्यायला लोकांना बरे जाते. प्रश्न विचारताना "हेच बरोबरे" असा आवेश असला तर उगाच वाद होतो. तुम्ही एकच प्रश्न नीट निवडा आणि हायलाईट करा, उत्तरे द्यायचा प्रयत्न केला जाईल. भरमसाठ हायपोथेसिस ची जंत्री नको. मुद्देसूद लिहा.

अभ्या.. Sat, 08/19/2017 - 18:29
अजिंठा वेरुळ सारख्या लेणी बनवल्या त्या वेळेला त्या कश्या बनवल्या असतील, कैलाश मंदीर बनवण्यासाठी लाखो टन खडकाचा भाग कोरुन काढावा लागला होता अस सांगीतल जात पण तो कचरा कुठे टाकला गेला ह्याचा कोणता ही पुरावा नजिकच्या परिसरात उपलब्ध नाही. ह्याचा अर्थ असा होतो की हे मंदीर कोरुन काढण्या ऐवजी दुसर्या कोणत्या तरी पद्धतीने बनवले गेले असले पाहीजे. जसे की दगड मऊ करुन त्या मऊ दगडातुन मंदीर कोरुन काढणे. जी मऊ झालेली ती माती सहज काढलेली असेल.
हे लैच खतरनाक आहे. असले निष्कर्ष काढून व्हिज्युअलाईज करणे अ‍ॅक्चुअल मंदीर बांधण्यापेक्षा क्रियेटिव्ह काम आहे राव.

पैसा Sat, 08/19/2017 - 18:43
भारतात स्वबळावर संशोधन करणे हे सोप्पे नाही ह्याची कल्पना आहे. ह्याच कारण आपली शिक्षण व्यवस्था आहे. आज आपण रोबॉटस शिक्षण संस्थेतुन काढत आहोत. ज्या पेशात पैसा नाही त्यात कोणालाही आपल करीयर करायची ईच्छा असत नाही. आपली आवड , कल वैगेरेला ईथे स्थान नाही.
सोळा अणे पटलं बघा!

डँबिस००७ Sat, 08/19/2017 - 20:50
अभ्या.. तुम्ही अजिंठा वेरुळ सारख्या ठिकाणी गेले आहात का ? गेले नसण्याची शक्यताच जास्त, म्हणुनच छातीठोकपणे म्हणु शकता !!

डँबिस००७ Sat, 08/19/2017 - 20:54
अत्रे, खुतुबमिनार जवळचा लोहस्तंभ ! तो गेली कित्येक वर्षे उन्हापावसात ऊभा आहे व त्याला अजुनही गंज लागलेला नाही !! त्याच्या मॅटलर्जी बद्दल सांगा ! ह्या स्तंभातील मेटल बद्दल काय माहीती आहे ते सांगा !!

डँबिस००७ Sun, 08/20/2017 - 01:38
"मी "अजिंठा वेरुळला" गेलो आहे तिथले "कैलाश मंदिर " बघितले आहे अस तुम्ही अजुनही पण ठामपणे म्हणत नाही आहात " माझ्या दाव्यावरच भाष्यतर दुरची गोष्ट !

अत्रे Sun, 08/20/2017 - 07:27
धन्यवाद. आता मी तुम्हाला अशा प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचे हे सांगतो. हीच पद्धत वापरून तुम्ही तुमच्या इतर प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू शकता. तुमचा प्रश्न -
"खुतुबमिनार जवळचा लोहस्तंभ ! तो गेली कित्येक वर्षे उन्हापावसात ऊभा आहे व त्याला अजुनही गंज लागलेला नाही !! त्याच्या मॅटलर्जी बद्दल सांगा ! ह्या स्तंभातील मेटल बद्दल काय माहीती आहे ते सांगा !!"
उत्तर कसे शोधाल - सर्वप्रथम qutub minar असे गुगल करा. रिझल्ट मध्ये "iron pillar" अशी एक विकिपीडिया ची लिंक दिसून येते. त्यावर क्लीक करा. https://en.wikipedia.org/wiki/Iron_pillar_of_Delhi त्यातले दुसऱ्या परिच्छेदातले हे वाक्य बघा The pillar has attracted the attention of archaeologists and materials scientists because of its high resistance to corrosion and has been called a "testimony to the high level of skill achieved by the ancient Indian iron smiths in the extraction and processing of iron."[1][2] यात जे [१] आणि [२] असे आकडे दिसतात त्यांना सायटेशन असे म्हणतात. त्यावर क्लिक करा. तुम्हाला खालील संदर्भ दिसतील [१] On the Corrosion Resistance of the Delhi Iron Pillar, R. Balasubramaniam, Corrosion Science, Volume 42 (2000) pp. 2103–2129. "Corrosion Science" is a publication specialized in corrosion science and engineering. [२] Yoshio Waseda; Shigeru Suzuki (2006). Characterization of corrosion products on steel surfaces. Springer. p. vii. ISBN 978-3-540-35177-1. यातल्या पहिल्या पेपरचे नाव scholar.google.com या वेबसाईटवर टाका. रिझल्ट पेज वर उजवीकडे pdf लिंक दिसेल, त्यावर क्लीक करून pdf उघडा. (तुमच्या सोयीसाठी http://home.iitk.ac.in/~bala/journalpaper/journal/journalpaper_17.pdf) या पेपर चे conclusion वाचलं तर खालची माहिती मिळेल.
The critical factor aiding the superior corrosion resistance of the DIP is the formation of crystalline iron hydrogen phosphate hydrate, as a thin layer next to the metal±metaloxide interface, which drastically lowers the rate of corrosion due to its low porosity content. The process of protective crystalline phosphate formation is aided by alternate wetting and drying cycles, which is an important contribution of the atmosphere to the DIP's corrosion resistance. Therefore, the corrosion resistance of the Delhi Iron Pillar is due to both Delhi (the environment providing alternate wetting and drying conditions) and iron (with its high P content conferring protection by the formation of the crystalline iron hydrogen phosphate).
यातुन तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळते का? नसेल मिळाले तर केवळ याच विषयावर नवीन धागा सुरु करावा - मिपावर कोणी मेटॅलर्जी चे विद्यार्थी असतील तर जास्त डिटेलवारी सांगू शकतील.

आदित्य कोरडे Sun, 08/20/2017 - 07:29
सध्या हे असले म्हणजे आम्ही फार ग्रेट होतो आमच्या कडे सगळे होते हे सांगण्याची जोरदार चढाओढ लागली आहे किंवा जाणीवपूर्वक लावली जात आहे. अशा प्रकारचे विचार ही एक दिशाभूल आहे त्यातून साध्य काहीच होणार नाही पुरण काळात सोडा महाभारतात राजवाड्यात किंवा लोकांच्या घरात पाने पोहोचवायला नळ होते धरणे होती कालवे काढलेले होते असे उल्लेख आहेत का , सांद पाण्याचा निचरा करायची जी पद्धती सिंधू संस्कृतीत होती तशा प्रकारचा उल्लेख तरी सापडतो का? तर नाही सापडत .... मागे एकदा कुठेतरी ज्ञानेश्वरी तले विज्ञान किंवा असेच काहीतरी भन्नाट लिहिलेला लेख वाचला होता. त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना ऋतुचक्र, मानसशास्त्र, ते अगदी प्रसूतिशास्त्र यांची साद्यंत माहिती कशी होती आणि त्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीत कसे ठायी ठायी सापडतात याचे रसभरीत वर्णन केलेले होते. तसाच काहीसा लेख समर्थ रामदासांवर सुद्धा वाचण्यात आला. मला वाटतं पावसाळ्यात जशा रोगाच्या साथी येतात हा तसाच काहीसा हा प्रकार असावा...एक पुण्यात राहणारे लेखक(?) जे चांगले mbbs डॉक्टर आहेत त्यांनी तर अशा विषयांवर भरपूर पुस्तकं लिहिली आहेत. माणूस डॉ आहे म्हणून आमच्या वडलांनी ती घेतली आणि भयंकर निराशा झाली. रामायणात जम्बो जेट काय, महाभारतात अण्वस्त्र काय, सूक्ष्मदर्शक आणि टेस्ट ट्यूब बेबी काय.राम राम राम ....हे म्हणे स्वतः योग सामर्थ्याने मंगळावरगेले होते आणि त्यांची निरीक्षणं चक्क नासाने खरी मानली आहेत.(नासाला कामधंदे नाहीत) ...असो माझा एक मित्र आहे-देवधर म्हणून ... त्याची बायको भांडारकर संस्थेत जुन्या संस्कृत ग्रंथांचे भाषांतर करायचे काम करते. माझी तिची नुकतीच चर्चा झाली कि बुवा हे जे वेदकाली विमान ,अंतराळ यान , ब्रह्मास्त्र म्हणजे atom bomb अशा गोष्टी होत्या असं आम्ही ऐकतो, वाचतो त्यात काही तथ्य आहे का? यावर तिने सांगितलेली माहिती उद्बोधक ठरेल. एक तर काय असत कि जुने ग्रंथ, जुने ग्रंथ असे जे महणतात ते फार फार तर ८ व्या किंवा ९ व्या शतकातले असतात ते सुद्धा अत्यंत जीर्ण आणि तुटक. त्या आधी चे ग्रंथ असे मिळत नाहीत, शिलालेख, ताम्रपत्र मिळतात आणि ते अत्यंत महत्वाचे पण ते म्हणजे ग्रंथ नाही त्यातली माहिती त्रोटक आणि मुख्य म्हणजे फक्त मथळे(NOTICE BOARD) स्वरुपाची असते. आता यावरून प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होते अशी खातरजमा करता नाही आली तरी ह्या गोष्टी निखालस खोट्या आहेत असंही काही खात्रीलायकरित्या म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे ग्रंथ जरी जुने असले तरी ते अस्सल असतात असे नाही म्हणजे त्यात प्रक्षेप असतात उदा महाभारत या ग्रंथाचे घेतले तर महाभारताची जी चिकित्सक आवृत्ती आहे की जी अनेक थोर इतिहास संशोधकांनी ( सुखटणकर, कोसंबी, मिश्र वगैरे )अनेक वर्षांच्या अनंत परिश्रमांन्द्वारे सिद्ध केली आहे तिच्या मध्ये सुद्धा प्रक्षेप आहेत पण ते साधारणतः २ रया किंवा ३ रया शतकातले. म्हणजे आपण असे म्हणू शकतो कि हि महाभारताची चिकित्सक आवृत्ती आपल्याला साधारण ई स १५० च्या सुमारास प्रचलित असलेल्या महाभारतकथे कडे घेऊन जाते. आता तुम्ही विचार करा इतक्या महान इतिहास संशोधकांना इतक्या प्रचंड मेहनती नंतर जर सर्वांना माहित असलेल्या महाभारत कथेच्या त्यातल्या त्यात अस्सल प्रती पर्यंत पोहोचायला एवढा त्रास होत असेल तर आजकाल उठ सुट कोणीही लुंगासुंगा प्राचीन भारतात विमाने , अंतराळ याने, अण्वस्त्रे आणि काय काय शोधून काढतात त्यांच्या विश्वासार्हते बद्दल आपण काय बोलावे. आता रामायणात येणारा पुष्पक विमानाचा उल्लेख घ्या, एक तर हा एक प्रक्षेप आहे. तो नंतर कुणीतरी घुसडला आहे पण चला घटकाभर पुष्पक विमान होते असे गृहीत धरले तर ते कोणत्या इंधनावर चालायचे ते इंधन कुठून मिळायचे ? ते शुद्ध कुठे आणि कसे करायचे ? जिथे बनवले तिथून विमानापर्यंत कसे आणायचे? रथातून कि गाढवावर लादून?कि आजच्या सारख्या रेल्वे गाड्या , मोटारी डांबरी सडका होत्या तेव्हा? असतील त्याचे उल्लेख कसे कुठे नाहीत? कसे असतील कुणा शहाण्या माणसाने आपल्या गोष्टीवेल्हाळ स्वभावाला अनुअसरुन एक छान गोष्ट रचून दिले घुसडून झाले, अन काय? आणि एकच विमान बनवले विमानांचा ताफा नाही? कमाल आहे तीच गोष्ट अण्वस्त्रांची, अण्वस्त्र म्हणजे काय दिवाळीचे आपट बार आहेत का? ती अण्वस्त्र काय घोडागाडी(रथ) किंवा बैल गाडीतून तीर कामठ्याने हात दोन हात दूरवरच्या शत्रूवर मारायचे, एव्हढा मोठा अणुबॉम्ब असा टाकायचा, तर काही क्षेपणास्त्र वगैरे नाही ? कमाल आहे? अण्वस्त्र बनवायला लागणारे तंत्रज्ञान होते मग क्षेपणास्त्र बनवायचे नव्हते ते सोडा सध्या तोफा सुद्धा नव्हत्या तेव्हा. आता मूळ मुद्दा, त्याचं असं आहे कोणी ऋषी मुनी तप:सामर्थ्याच्या जोरावर एखादे विमान किंवा तत्सम गोष्ट बनवू शकत नाही (तसच ते बनवत असतील असं कुणाच म्हणण असेल तर मग प्रश्नच मिटला)विमान सोडा एक साधा विजेचा दिवा बनवायचा म्हटला तर काय गोष्टी लागतात बघा . १) विजेचा शोध, उत्पादन आणि खात्रीशीर असा पुरवठा / वितरण करणारी यंत्रणा(नुसता दिवा पेटवायला नव्हे तर बनवायला सुद्धा) २) अत्यंत पातळ आणि स्वच्छ पारदर्शक काच बनवण्याची परिष्कृत पद्धती. ३) Tungston सारख्या धातूंचा शोध उत्पादन तसेच त्यांच्या गुणधर्माची छाननी करणारी सुसज्ज प्रयोग शाळा आणि metallurgy सारख्या शास्त्राचा पुरेसा विकास.शिवाय त्याचे अत्यंत पातळ तंतू (फिलामेंट) बनवण्याची पद्धत. ते सोडा, दिवा बनवण्याच्या निरनिराळ्या विभागात द्यायला drawings च्या असंख्य प्रती काढण्यासाठी छपाईचे तंत्र.ते लागेल कि नाही? (वेदामध्ये काचेचा उल्लेख नाही तसाच लोखंडाचा हि नाही, कोळशाचा हि नाही . वेदाइतक्याच जुन्या आणि कदाचित त्यांची जन्मभूमी असलेल्या सिंधू संस्कृतीच्या अवशेषात काच, लोखंड, कोळसे सापडत नाहीत. आपल्या पुराणांमध्ये विमानाचे विविध अस्त्रांचे उल्लेख आहेत पण तुम्ही अनेक आधुनिक विज्ञानकथाकारांच्या गोष्टी वाचल्या तर तुम्हाला त्या सुद्धा तशाच खऱ्या वाटतील पण त्या माणसाच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत, खऱ्याखुऱ्या नाही.) आणि या सगळ्या पेक्षा महत्वाच म्हणजे प्रयोजन आणि बाजारपेठ. जर साधे तेलाचे दिवे पेटत असतील तर विजेच्या दिव्याच्या साह्याने उजेड पाडायचा कशाला? एव्हढे उपद्व्याप करून विजेचे दिवे बनवून जर घ्यायला खात्रीची बाजारपेठ नसेल तर कोण हा धंदा करेल. रामायण महाभारत या चांगल्या, मनोरंजक कथा आहेत असच नाही तर तो आपला इतिहास सुद्धा आहे हे खर पण इतिहास इतिहास म्हणून शिवाजी महाराजांना भवानी माता खरोखर प्रसन्न झाली आणि भवानी तलवार दिली यावर विश्वास ठेवण वेडेपणाच नाही का? ( खरच भवानी प्रसन्न झाली असती तर तिला महाराजांना एखादी AK47 द्यायला काय हरकत होती? भवानी मातेला काय अशक्य आहे?) एक नीट समजून घ्या, तंत्रज्ञानाचा विकास आणि समाजात सर्वदूर त्याचा प्रसार सरंजामशाही कधीच करत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांना गुलाम करण्यासाठी त्यांना अज्ञानात आणि मागास ठेवण भाग असतं. भांडवल शाही जरी सरंजामशाहीशी हातमिळवणी करून मजूर गुलाम वर्गाला सुरुवातीला वेठीला धरते, त्यांचे शोषण करते असे दिसले तरी त्यांच्या स्वतःच्या फायद्या साठी तरी त्यांना एका मर्यादे नंतर लोकांचे राहणी मान उंचावण्यासाठी/ त्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी अनिर्बंध शोषणाला आळा घालावा लागतो. लोकांची क्रयशक्ती अचानक घटली तर कसा हाहाकार उडतो ते मी काय वेगळ सांगायला हवं का ? समजा एक शाम्पू विकत घ्यायची लोकांची ऐपत नसेल तर कुणी धंदा करावा कसा? आणि खायची प्यायची भ्रांत असलेला गरीब गुलाम माणूस शाम्पू का विकत घेईल? त्याची, त्याच्या बायकोची चार लोकात उठ बस आणि किमान प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता असेल तर तो हा खर्च करून स्वतःला/ स्वतःच्या बायकोला सुंदर दाखवायचा प्रयत्न करेल.त्याची दोन वेळची खायची प्यायची सोय झाली तर तो पुढे पुढे काही जास्त खरेदी करू लागेल आणि उद्योग धंद्या शिवाय हे शक्य आहे का? सरंजामशाहीत मोठ मोठे शोध लागून त्याची उपयुक्तता पटल्यावर सरंजामशाही सरकार त्यांना स्वीकारते आधी संशोधकांना पदरमोड करून शोध लावावे लागतात. भांडवलशाहीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पादन करण्यासाठी संशोधकांना उद्योग प्रोत्साहन देतात. आपले वेद , रामायण, महाभारत, हे सरंजामशाही समाजव्यवस्था दाखवतातच पण तेव्हा उद्योग आणि औद्योगीकरण हा प्रकारच नव्हता.तो काळ एकवेळ, सोडा आपल्या पेशवाईच्या शेवटी शेवटी म्हणजे १९व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा आपल्याकडे छापील नकाशे बनवायचे तंत्र , होकायंत्र , दुर्बिणी नव्हत्या आपण त्या इंग्रज, पोर्तुगीजांकडून विकत घ्यायचो. साधे शेतातले नगराचे फाळ लोखंडी करायाल २० वे शतक उजाडावे लागले. अन सुरुवातीला लोकांनी आगगाडी मध्ये बसावे म्हणून ब्रिटीश सरकार पैसे देत असे. आपल्याकडे औद्योगीकरण सुरु झालं तेच मुळी १९ व्या शतकाच्या शेवटी आणि ते सुद्धा जुजबी. तेव्हा आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान असावा पण असं उगाच कुणी सुबुद्ध माणूस टर उडवेल असे काही करू नये त्याने या वारशाचाच अपमान होतो. असं नाही वाटत तुम्हाला . हा प्रश्न नास्तिक, आस्तिक, पुरोगामी, मूलतत्ववादी असा नाही. साधा बुद्धी आणि तर्काचा आहे. आदित्य---

In reply to by आदित्य कोरडे

मराठी_माणूस Mon, 08/21/2017 - 12:35
एक तर काय असत कि जुने ग्रंथ, जुने ग्रंथ असे जे महणतात ते फार फार तर ८ व्या किंवा ९ व्या शतकातले असतात ते सुद्धा अत्यंत जीर्ण आणि तुटक. त्या आधी चे ग्रंथ असे मिळत नाहीत, शिलालेख, ताम्रपत्र मिळतात आणि ते अत्यंत महत्वाचे पण ते म्हणजे ग्रंथ नाही त्यातली माहिती त्रोटक आणि मुख्य म्हणजे फक्त मथळे(NOTICE BOARD) स्वरुपाची असते.
एक शंका, कुतुहल म्हणून . वेद जे अपौरुषेय म्हटले जातात ते कशा स्वरुपात आणि कुठे मिळाले ?

In reply to by मराठी_माणूस

अत्रे Mon, 08/21/2017 - 12:56
मस्त प्रश्न! मला सापडलेले उत्तर - अकराव्या शतकातल्या मॅन्यूस्क्रिप्ट्स या सगळ्यात जुन्या मानल्या जातात.
Due to the ephemeral nature of the manuscript material (birch bark or palm leaves), surviving manuscripts rarely surpass an age of a few hundred years.[41] The Sampurnanand Sanskrit University has a Rigveda manuscript from the 14th century;[42] however, there are a number of older Veda manuscripts in Nepal that are dated from the 11th century onwards.[43]
पण मग वेदांचा कालखंड कसा ठरवला असेल? https://en.wikipedia.org/wiki/Rigveda#Dating_and_historical_context आणि हे पहा https://www.reddit.com/r/AskHistorians/comments/3lfmsu/how_old_are_the_vedic_texts_of_india_and_where_in/ मला जितकं समजलं - वेदात वापरलेल्या भाषेवरून, भौगोलिक वर्णनावरून त्यांचा काळ ठरवला. अजून डिटेलमध्ये कोणी सांगू शकेल तर उत्तमच.

In reply to by आदित्य कोरडे

नंबर एक प्रतिसाद. कोणत्याही पारंपरिक दळण दळणार्‍या आणि त्याचा थयथयाट करणार्‍या धाग्यावर प्रतिसाद चालू शकेल. पण कितीही डोकेफोड करुन सांगा, लोकांचे विचार बदलत नाही. आपण थकून जातो, हा माझा अनुभव आहे. आभार. -दिलीप बिरुटे

डँबिस००७ Sun, 08/20/2017 - 20:52
अत्रे साहेब, धन्यवाद, दादा ईतक लिहीलत पण तुम्हीच कॉपी पेस्ट केलेल तुम्हालाच दिसल नाही अरेरे , ..... The pillar has attracted the attention of archaeologists and materials scientists because of its high resistance to corrosion and has been called a "testimony to the high level of skill achieved by the ancient Indian iron smiths in the extraction and processing of iron." जरा विचार करा ! 402 CE ईतक्या अगोदर कोणीतरी ईतक हाय लेव्हलच स्किल तयार केलेल होत हे विस्मयकारक नाही का ?

In reply to by डँबिस००७

अत्रे Mon, 08/21/2017 - 04:54
विस्मयकारक आहे. पण याचा संबंध ऋषी मुनींशी किंवा कोणत्या मन्त्र -तंत्राशी लावू नका. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे मी उत्तर शोधून दिले - मग आता वाद घालण्याचे काही कारण दिसत नाही. तुम्ही तुमच्या इतर प्रश्नाचे उत्तर पण असेच शोधा . त्यासाठी शुभेच्छा.

डँबिस००७ Sun, 08/20/2017 - 21:07
आदित्य कोरडे, साधे शेतातले नगराचे फाळ लोखंडी करायाल २० वे शतक उजाडावे लागले. पण 402 CE पासुन उन्हा पावसात न गंजता उभा असलेला लोहस्तंभ मात्र तुम्हाला दिसत नाही. ज्या लोकांना 402 CE मध्ये ईतक्या हाय लेव्ह्लच मेटल तयार करता येत असेल त्याला नांगराचे फाळ करता येणार नाहीत ?

In reply to by डँबिस००७

पुंबा Mon, 08/21/2017 - 11:26
मग कुठे आहेत ते फाळ? त्याचे काही अवशेष, पुरावे सापडले आहेत का? किंवा लोखंडी नांगरांचा कुठल्या ग्रंथात उल्लेख वगैरे?

In reply to by पुंबा

इष्टुर फाकडा Wed, 08/23/2017 - 22:06
दादा, तो स्तंभ आहे का नाही? का तो फाळच हवाय तुला? जुन्या तालवारीही टिकून आहेत. म्हणजेच तंत्र होतं ना? कुठे गेलं विचारशील तर मला नाही माहित हेच उत्तर आहे सध्यातरी. मंगळावर पण एकेकाळी जीवसृष्टी असायचा तर्क आहे; कुठाय आता ती ;) लोकं स्वतःला हुच्च ठरवून घ्यायच्या नादात अडाणीपणा करतात.

In reply to by पुंबा

मामाजी गुरुवार, 08/24/2017 - 00:07
प्राचिन भारतातले सर्व ज्ञान विज्ञान इस्लामी आक्रमणाला तोंड देत देत सुद्धा सन 1800 ते 1825 पर्यंत संपूर्ण जगात आपले श्रेष्ठत्व टिकवून होते. सुलतानाने दिलेल्या शिक्षेत नाक व कान कापले गेलेले युद्धबंदी प्लास्टीक सर्जरी (या विषयावर मोदींची खील्ली उडवली होती) द्वारा परत नवीन व आपल्या आवडीनुसार बसवून घेत. भारतातील कृषी विज्ञान हे अव्वल दर्जाचे होते आणि हो हे सर्व भारतात पोस्टींग असणार्या ब्रिटीश अधिकार्यानी तारीखवार नोंदणी करून ठेवलेल आहे. विस्तृत माहितीसाठी खाली लिंक दिलेली आहे. https://1drv.ms/b/s!AuFt4YPB-CeYhVkhoRtWHejBwMrP

मिलिंद Sun, 08/20/2017 - 21:08
बृहद् विमान शास्त्र नावाने ग्रंथ आहे असे लोकप्रभाच्या जुन्या अंकात छापून आलेले होते. मी तो अंकही शोधतोय. नुसते विमानच नाही, त्याकरीता लागणारे धातू, त्यांची सिध्दता असे बरेच काही त्या लेखात होते.

शब्दबम्बाळ Sun, 08/20/2017 - 21:23
भारतीय संशोधनाचं जाऊ द्या पण हा लेख लिहिण्यापूर्वी आपण किती संशोधन केलंत या विषयांवर? गूगल बाबा कडे यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आहेत... काही वर्षांपूर्वी मी विमानशास्त्र या विषयावर IISC च्या प्रोफेसर लोकांनी केलेला पेपर वाचला होता. इथे टिचकी मारलीत तर संपूर्ण pdf मिळेल वाचायला तुम्हाला! बघा त्यात दिलेली "शास्त्रीय" कारण कि पुराण शास्त्रात वर्णन केलेली विमाने का उडू शकत नाहीत! जास्तीत जास्त त्या वेळेच्या लोकांच्या विचारशक्तीला आदर देता येईल पण म्हणून खरोखर त्यांनी लिहिलेल्या सगळ्या गोष्टी सत्य असल्याचं पाहिजेत असे नाही ना... कारण मग हल्ली येणाऱ्या विज्ञानपटांमध्ये दाखवलेल्या गोष्टी आत्ताच्या काळात "असायलाच" हव्यात नाही का?

डँबिस००७ Sun, 08/20/2017 - 21:32
सध्या डॉक्टराम्नी एक नविनच टुम काढलेली आहे. व्हिटामिन डी टेस्ट करण्याची !! नविन संशोधनानुसार म्हणे शरीरातील कॉलेस्ट्रॉल पासुन कॅल्शियम पर्यंत सर्व कार्यकारणात व्हिटामिन डी महत्वाची भुमि का बजावत आहे. नविन शोध लागला म्हणजे त्यावर लगेच उतारा आला पाहीजेच !! शास्र्त्रज्ञांनी तोंडावाटे घेण्याजोग व्हिटामिन डी चा शोध लावला व लोकांसाठी उपलब्धही केला. आता पर्यंत शाळेत " व्हिटामिन डी हे सुर्यप्रकाशात स्वतः च्या स्किनच्या खाली तयार होणारे व्हिटामिन आहे" हे शिकलेल्या ह्याच लोकांनी ह्याच व्हिटामिन डी साठी आपापली पैश्याची पर्सची तोंड व व्हिटामिन डी घेण्यासाठी स्वतःची तोंड उघडली. आता व्हिटामिन डी जर केमिस्टकडे उपलब्ध झाल तर त्याला विरोध करणारे , तोंडावाटे व्हिटामिन डी घेण्याचा , व्हिटामिन डीच्या अतिरेकी सेवनाने होणार्या व्हिटामिन डी पॉईझनचा संबंध लावणारच, त्याशिवाय शरीर स्वतःला लागणारे व्हिटामिन डी स्वत:च दहा मिनीटाच्या सुर्य प्रकाशात फिरण्याने बनवु शकते ते सुद्धा कोणत्याही व्हिटामिन डी पॉईझन शिवाय !! जर सकाळच्या कोवळ्या सुर्य प्रकाशात बाहेर फिरुन व्हिटामिन डी मिळत असेल तर काय वाईट आहे ? पण ह्याच कारणासाठी सुर्य नमस्काराची योजना होती हे मान्यच होणार नाही. "सुर्य नमस्कार " सुर्या समोर करायला नको ? घरी, बंद रुम म ध्ये फॅन लावुन सुर्य नमस्कार करता येईल का ? मग सुर्याच्या आशिर्वादाच सोडा पण तुम्हाला लागणार व्हिटामिन डी तुम्हाला कोठुन मिळणार ? नदिच्या, तलावाच्या , समुद्राच्या पाण्यात राहुन सुर्याला अर्घ ओतणार्या लोकांचा राग येण स्वाभाविक आहे. म्हणे सुर्याला अर्घ ओततात ! सुर्याला तुमच्या अर्घाची काय जरुरी आहे ? तो तुमच्या अगोदर होता, नंतरही असणार !! पण अर्घ ओतताना दहा मिंनीट होऊन जातात !!

पुंबा Mon, 08/21/2017 - 11:24
भारताने जगाला अंक मोजायला शिकवल. शुन्य, दशांश पद्धती ही भारताची जगाला भेट आहे. पण ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत.
हे शाळेत शिकवले गेले आहे आम्हाला. मी महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रम पूर्ण केला. एनसीआर्टीच्या पुस्तकात देखिल हे सांगितले आहे. तुम्ही कुठली पुस्तके चाळलीत?

In reply to by अत्रे

हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 08/24/2017 - 21:24
तुमच्या शिक्षकांनी सांगितले कि हे अभ्यासक्रमात होते? मीही महाराष्ट्रात शाळा शिकलो पण हे ज्ञान बऱ्याच उशिराने माझ्या इतर वाचनातूनच मिळाले. कितीची बॅच म्हणायची आपली?

इष्टुर फाकडा Wed, 08/23/2017 - 22:16
शास्त्र आणि तंत्र यात फरक असतो. विमान'शास्त्राचा' दावा आहे 'तंत्राचा' नाही. निदान इतकं तरी फुरोगामी हुच्च लोकांनी लक्षात घेतलं तरी फार होईल. काही आपलं म्हटलं कि उचलून आपटायचं आणि आपली आधुनिकतेची अहंमन्यता कुरवाळून घ्यायची यातच काही लोकांना धन्यता असते. पण जर यातल्याच काही गोष्टी पश्चिम टोकावरून आपटून परत आल्या कि मग असे लोक त्याच गोष्टी डोळे झाकून मान्य करतात असं आपलं माझं निरीक्षण आहे. अंधपणाने गोष्टी डोक्यावर घेणारे जसे बावळट असतात त्याच्यापेक्षा जास्त हे असले नवफुरोगामी कट्टर असतात.

डँबिस००७ गुरुवार, 08/24/2017 - 20:41
इष्टुर फाकडा अगदी सहमत !! इथे विचारलेल्या प्रश्नावर गुगल मधुन उत्तर शोधुन देण्याची चढा ओढ लागलेली आहे !! ;-)

अमितदादा Fri, 08/25/2017 - 14:11
http://www.misalpav.com/comment/956089#comment-956089 तुमच्या ह्या प्रतिक्रियेवरच उत्तर इथे देतो . मुळात तुमचे आणि माझे विचार वेगवेगळे आहेत, तुम्ही तुमचे विचार मांडलेत मी माझे मांडलेत त्यामुळे पुढे काथ्याकूट करण्यात अर्थ नाही.
कमाल ह्याची आहे की आपण फक्त एका जपानी शास्त्रज्ञांने संशोधन मांडे पर्यंत वाट बघायची पण एकाही भारतीय सरकारी आरकियोलॉजीकल सर्वे ऑफ ईंडीयाच्या लोकांना हे का जमल नाही अस विचारायच नाही.
सरकार, भारतीय लोक, शास्त्रज्ञ सगळे दोषी आहेत जे खरे काय आणि खोटे काय याचा उलघडा करू शकत नसतील तर, एखाद्या उपयुक्त प्राचीन गोष्टीवर संशोधन होत नसेल तर.
शुश्रुताच्या प्लॅस्टीक सर्जरीविषयी गुगल व विकी पिडीयावर भरपुर वाचयला मिळेल !
याबाबत फक्त ऐकून माहित आहे जास्त वाचाल नाही , तुम्ही मुद्देसूद आणि संदर्भसाहित लिहा वाचाय आणि प्रतिसाद द्यायला आवडेल.
शेवटी प्रत्येक गोष्ट तोलून मापून accept केली पाहिजे हेच तर मी पहील्या पासुन म्हणतोय !!
चांगली गोष्ट आहे याबाबत तरी सहमती आहे आपली

डँबिस००७ Fri, 08/25/2017 - 18:17
शाळेत सर्व काही शिकलेल्यांसाठी , १) जगातील मेटलर्जीच्या विकासात प्राचिन भारताचा किती हातभार लागलेला होता ? २) कोणत्या धातुच्या शोधाच श्रेय विदेशी शास्रज्ञांना दिल जात, जे धातु प्राचिन काळापासुन भारतात शुद्ध करुन वापरले जातात ? ३)आचार्य शुश्रुत यांना प्लॅस्टिक सर्जरीच जनक (भारतातच) समजल जात !! ह्या आचार्य शुश्रुत यांनी निर्माण केलेल्या १५० शस्त्रक्रिया आयुधांच्या संख्येत आजच्या आधुनिक विज्ञानाने किती भर घातली ? वरचे प्रश्न प्राचीन भारतातील विज्ञानावरचे प्रश्न व ऊत्तरांच संकलन करणार्या धाग्यावर विचारले तर काहीही ऊत्तर आल नाही !! तिथे प्रश्न विचारल की भराभर गुगल व विकीपिडीया वर ऊत्तर शोधुन दिली जातात !!

In reply to by डँबिस००७

अत्रे Sat, 08/19/2017 - 18:32
प्रश्न नीट, कुतुहलपूर्वक विचारले तर उत्तर द्यायला लोकांना बरे जाते. प्रश्न विचारताना "हेच बरोबरे" असा आवेश असला तर उगाच वाद होतो. तुम्ही एकच प्रश्न नीट निवडा आणि हायलाईट करा, उत्तरे द्यायचा प्रयत्न केला जाईल. भरमसाठ हायपोथेसिस ची जंत्री नको. मुद्देसूद लिहा.

अभ्या.. Sat, 08/19/2017 - 18:29
अजिंठा वेरुळ सारख्या लेणी बनवल्या त्या वेळेला त्या कश्या बनवल्या असतील, कैलाश मंदीर बनवण्यासाठी लाखो टन खडकाचा भाग कोरुन काढावा लागला होता अस सांगीतल जात पण तो कचरा कुठे टाकला गेला ह्याचा कोणता ही पुरावा नजिकच्या परिसरात उपलब्ध नाही. ह्याचा अर्थ असा होतो की हे मंदीर कोरुन काढण्या ऐवजी दुसर्या कोणत्या तरी पद्धतीने बनवले गेले असले पाहीजे. जसे की दगड मऊ करुन त्या मऊ दगडातुन मंदीर कोरुन काढणे. जी मऊ झालेली ती माती सहज काढलेली असेल.
हे लैच खतरनाक आहे. असले निष्कर्ष काढून व्हिज्युअलाईज करणे अ‍ॅक्चुअल मंदीर बांधण्यापेक्षा क्रियेटिव्ह काम आहे राव.

पैसा Sat, 08/19/2017 - 18:43
भारतात स्वबळावर संशोधन करणे हे सोप्पे नाही ह्याची कल्पना आहे. ह्याच कारण आपली शिक्षण व्यवस्था आहे. आज आपण रोबॉटस शिक्षण संस्थेतुन काढत आहोत. ज्या पेशात पैसा नाही त्यात कोणालाही आपल करीयर करायची ईच्छा असत नाही. आपली आवड , कल वैगेरेला ईथे स्थान नाही.
सोळा अणे पटलं बघा!

डँबिस००७ Sat, 08/19/2017 - 20:50
अभ्या.. तुम्ही अजिंठा वेरुळ सारख्या ठिकाणी गेले आहात का ? गेले नसण्याची शक्यताच जास्त, म्हणुनच छातीठोकपणे म्हणु शकता !!

डँबिस००७ Sat, 08/19/2017 - 20:54
अत्रे, खुतुबमिनार जवळचा लोहस्तंभ ! तो गेली कित्येक वर्षे उन्हापावसात ऊभा आहे व त्याला अजुनही गंज लागलेला नाही !! त्याच्या मॅटलर्जी बद्दल सांगा ! ह्या स्तंभातील मेटल बद्दल काय माहीती आहे ते सांगा !!

डँबिस००७ Sun, 08/20/2017 - 01:38
"मी "अजिंठा वेरुळला" गेलो आहे तिथले "कैलाश मंदिर " बघितले आहे अस तुम्ही अजुनही पण ठामपणे म्हणत नाही आहात " माझ्या दाव्यावरच भाष्यतर दुरची गोष्ट !

अत्रे Sun, 08/20/2017 - 07:27
धन्यवाद. आता मी तुम्हाला अशा प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचे हे सांगतो. हीच पद्धत वापरून तुम्ही तुमच्या इतर प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू शकता. तुमचा प्रश्न -
"खुतुबमिनार जवळचा लोहस्तंभ ! तो गेली कित्येक वर्षे उन्हापावसात ऊभा आहे व त्याला अजुनही गंज लागलेला नाही !! त्याच्या मॅटलर्जी बद्दल सांगा ! ह्या स्तंभातील मेटल बद्दल काय माहीती आहे ते सांगा !!"
उत्तर कसे शोधाल - सर्वप्रथम qutub minar असे गुगल करा. रिझल्ट मध्ये "iron pillar" अशी एक विकिपीडिया ची लिंक दिसून येते. त्यावर क्लीक करा. https://en.wikipedia.org/wiki/Iron_pillar_of_Delhi त्यातले दुसऱ्या परिच्छेदातले हे वाक्य बघा The pillar has attracted the attention of archaeologists and materials scientists because of its high resistance to corrosion and has been called a "testimony to the high level of skill achieved by the ancient Indian iron smiths in the extraction and processing of iron."[1][2] यात जे [१] आणि [२] असे आकडे दिसतात त्यांना सायटेशन असे म्हणतात. त्यावर क्लिक करा. तुम्हाला खालील संदर्भ दिसतील [१] On the Corrosion Resistance of the Delhi Iron Pillar, R. Balasubramaniam, Corrosion Science, Volume 42 (2000) pp. 2103–2129. "Corrosion Science" is a publication specialized in corrosion science and engineering. [२] Yoshio Waseda; Shigeru Suzuki (2006). Characterization of corrosion products on steel surfaces. Springer. p. vii. ISBN 978-3-540-35177-1. यातल्या पहिल्या पेपरचे नाव scholar.google.com या वेबसाईटवर टाका. रिझल्ट पेज वर उजवीकडे pdf लिंक दिसेल, त्यावर क्लीक करून pdf उघडा. (तुमच्या सोयीसाठी http://home.iitk.ac.in/~bala/journalpaper/journal/journalpaper_17.pdf) या पेपर चे conclusion वाचलं तर खालची माहिती मिळेल.
The critical factor aiding the superior corrosion resistance of the DIP is the formation of crystalline iron hydrogen phosphate hydrate, as a thin layer next to the metal±metaloxide interface, which drastically lowers the rate of corrosion due to its low porosity content. The process of protective crystalline phosphate formation is aided by alternate wetting and drying cycles, which is an important contribution of the atmosphere to the DIP's corrosion resistance. Therefore, the corrosion resistance of the Delhi Iron Pillar is due to both Delhi (the environment providing alternate wetting and drying conditions) and iron (with its high P content conferring protection by the formation of the crystalline iron hydrogen phosphate).
यातुन तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळते का? नसेल मिळाले तर केवळ याच विषयावर नवीन धागा सुरु करावा - मिपावर कोणी मेटॅलर्जी चे विद्यार्थी असतील तर जास्त डिटेलवारी सांगू शकतील.

आदित्य कोरडे Sun, 08/20/2017 - 07:29
सध्या हे असले म्हणजे आम्ही फार ग्रेट होतो आमच्या कडे सगळे होते हे सांगण्याची जोरदार चढाओढ लागली आहे किंवा जाणीवपूर्वक लावली जात आहे. अशा प्रकारचे विचार ही एक दिशाभूल आहे त्यातून साध्य काहीच होणार नाही पुरण काळात सोडा महाभारतात राजवाड्यात किंवा लोकांच्या घरात पाने पोहोचवायला नळ होते धरणे होती कालवे काढलेले होते असे उल्लेख आहेत का , सांद पाण्याचा निचरा करायची जी पद्धती सिंधू संस्कृतीत होती तशा प्रकारचा उल्लेख तरी सापडतो का? तर नाही सापडत .... मागे एकदा कुठेतरी ज्ञानेश्वरी तले विज्ञान किंवा असेच काहीतरी भन्नाट लिहिलेला लेख वाचला होता. त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना ऋतुचक्र, मानसशास्त्र, ते अगदी प्रसूतिशास्त्र यांची साद्यंत माहिती कशी होती आणि त्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीत कसे ठायी ठायी सापडतात याचे रसभरीत वर्णन केलेले होते. तसाच काहीसा लेख समर्थ रामदासांवर सुद्धा वाचण्यात आला. मला वाटतं पावसाळ्यात जशा रोगाच्या साथी येतात हा तसाच काहीसा हा प्रकार असावा...एक पुण्यात राहणारे लेखक(?) जे चांगले mbbs डॉक्टर आहेत त्यांनी तर अशा विषयांवर भरपूर पुस्तकं लिहिली आहेत. माणूस डॉ आहे म्हणून आमच्या वडलांनी ती घेतली आणि भयंकर निराशा झाली. रामायणात जम्बो जेट काय, महाभारतात अण्वस्त्र काय, सूक्ष्मदर्शक आणि टेस्ट ट्यूब बेबी काय.राम राम राम ....हे म्हणे स्वतः योग सामर्थ्याने मंगळावरगेले होते आणि त्यांची निरीक्षणं चक्क नासाने खरी मानली आहेत.(नासाला कामधंदे नाहीत) ...असो माझा एक मित्र आहे-देवधर म्हणून ... त्याची बायको भांडारकर संस्थेत जुन्या संस्कृत ग्रंथांचे भाषांतर करायचे काम करते. माझी तिची नुकतीच चर्चा झाली कि बुवा हे जे वेदकाली विमान ,अंतराळ यान , ब्रह्मास्त्र म्हणजे atom bomb अशा गोष्टी होत्या असं आम्ही ऐकतो, वाचतो त्यात काही तथ्य आहे का? यावर तिने सांगितलेली माहिती उद्बोधक ठरेल. एक तर काय असत कि जुने ग्रंथ, जुने ग्रंथ असे जे महणतात ते फार फार तर ८ व्या किंवा ९ व्या शतकातले असतात ते सुद्धा अत्यंत जीर्ण आणि तुटक. त्या आधी चे ग्रंथ असे मिळत नाहीत, शिलालेख, ताम्रपत्र मिळतात आणि ते अत्यंत महत्वाचे पण ते म्हणजे ग्रंथ नाही त्यातली माहिती त्रोटक आणि मुख्य म्हणजे फक्त मथळे(NOTICE BOARD) स्वरुपाची असते. आता यावरून प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होते अशी खातरजमा करता नाही आली तरी ह्या गोष्टी निखालस खोट्या आहेत असंही काही खात्रीलायकरित्या म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे ग्रंथ जरी जुने असले तरी ते अस्सल असतात असे नाही म्हणजे त्यात प्रक्षेप असतात उदा महाभारत या ग्रंथाचे घेतले तर महाभारताची जी चिकित्सक आवृत्ती आहे की जी अनेक थोर इतिहास संशोधकांनी ( सुखटणकर, कोसंबी, मिश्र वगैरे )अनेक वर्षांच्या अनंत परिश्रमांन्द्वारे सिद्ध केली आहे तिच्या मध्ये सुद्धा प्रक्षेप आहेत पण ते साधारणतः २ रया किंवा ३ रया शतकातले. म्हणजे आपण असे म्हणू शकतो कि हि महाभारताची चिकित्सक आवृत्ती आपल्याला साधारण ई स १५० च्या सुमारास प्रचलित असलेल्या महाभारतकथे कडे घेऊन जाते. आता तुम्ही विचार करा इतक्या महान इतिहास संशोधकांना इतक्या प्रचंड मेहनती नंतर जर सर्वांना माहित असलेल्या महाभारत कथेच्या त्यातल्या त्यात अस्सल प्रती पर्यंत पोहोचायला एवढा त्रास होत असेल तर आजकाल उठ सुट कोणीही लुंगासुंगा प्राचीन भारतात विमाने , अंतराळ याने, अण्वस्त्रे आणि काय काय शोधून काढतात त्यांच्या विश्वासार्हते बद्दल आपण काय बोलावे. आता रामायणात येणारा पुष्पक विमानाचा उल्लेख घ्या, एक तर हा एक प्रक्षेप आहे. तो नंतर कुणीतरी घुसडला आहे पण चला घटकाभर पुष्पक विमान होते असे गृहीत धरले तर ते कोणत्या इंधनावर चालायचे ते इंधन कुठून मिळायचे ? ते शुद्ध कुठे आणि कसे करायचे ? जिथे बनवले तिथून विमानापर्यंत कसे आणायचे? रथातून कि गाढवावर लादून?कि आजच्या सारख्या रेल्वे गाड्या , मोटारी डांबरी सडका होत्या तेव्हा? असतील त्याचे उल्लेख कसे कुठे नाहीत? कसे असतील कुणा शहाण्या माणसाने आपल्या गोष्टीवेल्हाळ स्वभावाला अनुअसरुन एक छान गोष्ट रचून दिले घुसडून झाले, अन काय? आणि एकच विमान बनवले विमानांचा ताफा नाही? कमाल आहे तीच गोष्ट अण्वस्त्रांची, अण्वस्त्र म्हणजे काय दिवाळीचे आपट बार आहेत का? ती अण्वस्त्र काय घोडागाडी(रथ) किंवा बैल गाडीतून तीर कामठ्याने हात दोन हात दूरवरच्या शत्रूवर मारायचे, एव्हढा मोठा अणुबॉम्ब असा टाकायचा, तर काही क्षेपणास्त्र वगैरे नाही ? कमाल आहे? अण्वस्त्र बनवायला लागणारे तंत्रज्ञान होते मग क्षेपणास्त्र बनवायचे नव्हते ते सोडा सध्या तोफा सुद्धा नव्हत्या तेव्हा. आता मूळ मुद्दा, त्याचं असं आहे कोणी ऋषी मुनी तप:सामर्थ्याच्या जोरावर एखादे विमान किंवा तत्सम गोष्ट बनवू शकत नाही (तसच ते बनवत असतील असं कुणाच म्हणण असेल तर मग प्रश्नच मिटला)विमान सोडा एक साधा विजेचा दिवा बनवायचा म्हटला तर काय गोष्टी लागतात बघा . १) विजेचा शोध, उत्पादन आणि खात्रीशीर असा पुरवठा / वितरण करणारी यंत्रणा(नुसता दिवा पेटवायला नव्हे तर बनवायला सुद्धा) २) अत्यंत पातळ आणि स्वच्छ पारदर्शक काच बनवण्याची परिष्कृत पद्धती. ३) Tungston सारख्या धातूंचा शोध उत्पादन तसेच त्यांच्या गुणधर्माची छाननी करणारी सुसज्ज प्रयोग शाळा आणि metallurgy सारख्या शास्त्राचा पुरेसा विकास.शिवाय त्याचे अत्यंत पातळ तंतू (फिलामेंट) बनवण्याची पद्धत. ते सोडा, दिवा बनवण्याच्या निरनिराळ्या विभागात द्यायला drawings च्या असंख्य प्रती काढण्यासाठी छपाईचे तंत्र.ते लागेल कि नाही? (वेदामध्ये काचेचा उल्लेख नाही तसाच लोखंडाचा हि नाही, कोळशाचा हि नाही . वेदाइतक्याच जुन्या आणि कदाचित त्यांची जन्मभूमी असलेल्या सिंधू संस्कृतीच्या अवशेषात काच, लोखंड, कोळसे सापडत नाहीत. आपल्या पुराणांमध्ये विमानाचे विविध अस्त्रांचे उल्लेख आहेत पण तुम्ही अनेक आधुनिक विज्ञानकथाकारांच्या गोष्टी वाचल्या तर तुम्हाला त्या सुद्धा तशाच खऱ्या वाटतील पण त्या माणसाच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत, खऱ्याखुऱ्या नाही.) आणि या सगळ्या पेक्षा महत्वाच म्हणजे प्रयोजन आणि बाजारपेठ. जर साधे तेलाचे दिवे पेटत असतील तर विजेच्या दिव्याच्या साह्याने उजेड पाडायचा कशाला? एव्हढे उपद्व्याप करून विजेचे दिवे बनवून जर घ्यायला खात्रीची बाजारपेठ नसेल तर कोण हा धंदा करेल. रामायण महाभारत या चांगल्या, मनोरंजक कथा आहेत असच नाही तर तो आपला इतिहास सुद्धा आहे हे खर पण इतिहास इतिहास म्हणून शिवाजी महाराजांना भवानी माता खरोखर प्रसन्न झाली आणि भवानी तलवार दिली यावर विश्वास ठेवण वेडेपणाच नाही का? ( खरच भवानी प्रसन्न झाली असती तर तिला महाराजांना एखादी AK47 द्यायला काय हरकत होती? भवानी मातेला काय अशक्य आहे?) एक नीट समजून घ्या, तंत्रज्ञानाचा विकास आणि समाजात सर्वदूर त्याचा प्रसार सरंजामशाही कधीच करत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांना गुलाम करण्यासाठी त्यांना अज्ञानात आणि मागास ठेवण भाग असतं. भांडवल शाही जरी सरंजामशाहीशी हातमिळवणी करून मजूर गुलाम वर्गाला सुरुवातीला वेठीला धरते, त्यांचे शोषण करते असे दिसले तरी त्यांच्या स्वतःच्या फायद्या साठी तरी त्यांना एका मर्यादे नंतर लोकांचे राहणी मान उंचावण्यासाठी/ त्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी अनिर्बंध शोषणाला आळा घालावा लागतो. लोकांची क्रयशक्ती अचानक घटली तर कसा हाहाकार उडतो ते मी काय वेगळ सांगायला हवं का ? समजा एक शाम्पू विकत घ्यायची लोकांची ऐपत नसेल तर कुणी धंदा करावा कसा? आणि खायची प्यायची भ्रांत असलेला गरीब गुलाम माणूस शाम्पू का विकत घेईल? त्याची, त्याच्या बायकोची चार लोकात उठ बस आणि किमान प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता असेल तर तो हा खर्च करून स्वतःला/ स्वतःच्या बायकोला सुंदर दाखवायचा प्रयत्न करेल.त्याची दोन वेळची खायची प्यायची सोय झाली तर तो पुढे पुढे काही जास्त खरेदी करू लागेल आणि उद्योग धंद्या शिवाय हे शक्य आहे का? सरंजामशाहीत मोठ मोठे शोध लागून त्याची उपयुक्तता पटल्यावर सरंजामशाही सरकार त्यांना स्वीकारते आधी संशोधकांना पदरमोड करून शोध लावावे लागतात. भांडवलशाहीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पादन करण्यासाठी संशोधकांना उद्योग प्रोत्साहन देतात. आपले वेद , रामायण, महाभारत, हे सरंजामशाही समाजव्यवस्था दाखवतातच पण तेव्हा उद्योग आणि औद्योगीकरण हा प्रकारच नव्हता.तो काळ एकवेळ, सोडा आपल्या पेशवाईच्या शेवटी शेवटी म्हणजे १९व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा आपल्याकडे छापील नकाशे बनवायचे तंत्र , होकायंत्र , दुर्बिणी नव्हत्या आपण त्या इंग्रज, पोर्तुगीजांकडून विकत घ्यायचो. साधे शेतातले नगराचे फाळ लोखंडी करायाल २० वे शतक उजाडावे लागले. अन सुरुवातीला लोकांनी आगगाडी मध्ये बसावे म्हणून ब्रिटीश सरकार पैसे देत असे. आपल्याकडे औद्योगीकरण सुरु झालं तेच मुळी १९ व्या शतकाच्या शेवटी आणि ते सुद्धा जुजबी. तेव्हा आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान असावा पण असं उगाच कुणी सुबुद्ध माणूस टर उडवेल असे काही करू नये त्याने या वारशाचाच अपमान होतो. असं नाही वाटत तुम्हाला . हा प्रश्न नास्तिक, आस्तिक, पुरोगामी, मूलतत्ववादी असा नाही. साधा बुद्धी आणि तर्काचा आहे. आदित्य---

In reply to by आदित्य कोरडे

मराठी_माणूस Mon, 08/21/2017 - 12:35
एक तर काय असत कि जुने ग्रंथ, जुने ग्रंथ असे जे महणतात ते फार फार तर ८ व्या किंवा ९ व्या शतकातले असतात ते सुद्धा अत्यंत जीर्ण आणि तुटक. त्या आधी चे ग्रंथ असे मिळत नाहीत, शिलालेख, ताम्रपत्र मिळतात आणि ते अत्यंत महत्वाचे पण ते म्हणजे ग्रंथ नाही त्यातली माहिती त्रोटक आणि मुख्य म्हणजे फक्त मथळे(NOTICE BOARD) स्वरुपाची असते.
एक शंका, कुतुहल म्हणून . वेद जे अपौरुषेय म्हटले जातात ते कशा स्वरुपात आणि कुठे मिळाले ?

In reply to by मराठी_माणूस

अत्रे Mon, 08/21/2017 - 12:56
मस्त प्रश्न! मला सापडलेले उत्तर - अकराव्या शतकातल्या मॅन्यूस्क्रिप्ट्स या सगळ्यात जुन्या मानल्या जातात.
Due to the ephemeral nature of the manuscript material (birch bark or palm leaves), surviving manuscripts rarely surpass an age of a few hundred years.[41] The Sampurnanand Sanskrit University has a Rigveda manuscript from the 14th century;[42] however, there are a number of older Veda manuscripts in Nepal that are dated from the 11th century onwards.[43]
पण मग वेदांचा कालखंड कसा ठरवला असेल? https://en.wikipedia.org/wiki/Rigveda#Dating_and_historical_context आणि हे पहा https://www.reddit.com/r/AskHistorians/comments/3lfmsu/how_old_are_the_vedic_texts_of_india_and_where_in/ मला जितकं समजलं - वेदात वापरलेल्या भाषेवरून, भौगोलिक वर्णनावरून त्यांचा काळ ठरवला. अजून डिटेलमध्ये कोणी सांगू शकेल तर उत्तमच.

In reply to by आदित्य कोरडे

नंबर एक प्रतिसाद. कोणत्याही पारंपरिक दळण दळणार्‍या आणि त्याचा थयथयाट करणार्‍या धाग्यावर प्रतिसाद चालू शकेल. पण कितीही डोकेफोड करुन सांगा, लोकांचे विचार बदलत नाही. आपण थकून जातो, हा माझा अनुभव आहे. आभार. -दिलीप बिरुटे

डँबिस००७ Sun, 08/20/2017 - 20:52
अत्रे साहेब, धन्यवाद, दादा ईतक लिहीलत पण तुम्हीच कॉपी पेस्ट केलेल तुम्हालाच दिसल नाही अरेरे , ..... The pillar has attracted the attention of archaeologists and materials scientists because of its high resistance to corrosion and has been called a "testimony to the high level of skill achieved by the ancient Indian iron smiths in the extraction and processing of iron." जरा विचार करा ! 402 CE ईतक्या अगोदर कोणीतरी ईतक हाय लेव्हलच स्किल तयार केलेल होत हे विस्मयकारक नाही का ?

In reply to by डँबिस००७

अत्रे Mon, 08/21/2017 - 04:54
विस्मयकारक आहे. पण याचा संबंध ऋषी मुनींशी किंवा कोणत्या मन्त्र -तंत्राशी लावू नका. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे मी उत्तर शोधून दिले - मग आता वाद घालण्याचे काही कारण दिसत नाही. तुम्ही तुमच्या इतर प्रश्नाचे उत्तर पण असेच शोधा . त्यासाठी शुभेच्छा.

डँबिस००७ Sun, 08/20/2017 - 21:07
आदित्य कोरडे, साधे शेतातले नगराचे फाळ लोखंडी करायाल २० वे शतक उजाडावे लागले. पण 402 CE पासुन उन्हा पावसात न गंजता उभा असलेला लोहस्तंभ मात्र तुम्हाला दिसत नाही. ज्या लोकांना 402 CE मध्ये ईतक्या हाय लेव्ह्लच मेटल तयार करता येत असेल त्याला नांगराचे फाळ करता येणार नाहीत ?

In reply to by डँबिस००७

पुंबा Mon, 08/21/2017 - 11:26
मग कुठे आहेत ते फाळ? त्याचे काही अवशेष, पुरावे सापडले आहेत का? किंवा लोखंडी नांगरांचा कुठल्या ग्रंथात उल्लेख वगैरे?

In reply to by पुंबा

इष्टुर फाकडा Wed, 08/23/2017 - 22:06
दादा, तो स्तंभ आहे का नाही? का तो फाळच हवाय तुला? जुन्या तालवारीही टिकून आहेत. म्हणजेच तंत्र होतं ना? कुठे गेलं विचारशील तर मला नाही माहित हेच उत्तर आहे सध्यातरी. मंगळावर पण एकेकाळी जीवसृष्टी असायचा तर्क आहे; कुठाय आता ती ;) लोकं स्वतःला हुच्च ठरवून घ्यायच्या नादात अडाणीपणा करतात.

In reply to by पुंबा

मामाजी गुरुवार, 08/24/2017 - 00:07
प्राचिन भारतातले सर्व ज्ञान विज्ञान इस्लामी आक्रमणाला तोंड देत देत सुद्धा सन 1800 ते 1825 पर्यंत संपूर्ण जगात आपले श्रेष्ठत्व टिकवून होते. सुलतानाने दिलेल्या शिक्षेत नाक व कान कापले गेलेले युद्धबंदी प्लास्टीक सर्जरी (या विषयावर मोदींची खील्ली उडवली होती) द्वारा परत नवीन व आपल्या आवडीनुसार बसवून घेत. भारतातील कृषी विज्ञान हे अव्वल दर्जाचे होते आणि हो हे सर्व भारतात पोस्टींग असणार्या ब्रिटीश अधिकार्यानी तारीखवार नोंदणी करून ठेवलेल आहे. विस्तृत माहितीसाठी खाली लिंक दिलेली आहे. https://1drv.ms/b/s!AuFt4YPB-CeYhVkhoRtWHejBwMrP

मिलिंद Sun, 08/20/2017 - 21:08
बृहद् विमान शास्त्र नावाने ग्रंथ आहे असे लोकप्रभाच्या जुन्या अंकात छापून आलेले होते. मी तो अंकही शोधतोय. नुसते विमानच नाही, त्याकरीता लागणारे धातू, त्यांची सिध्दता असे बरेच काही त्या लेखात होते.

शब्दबम्बाळ Sun, 08/20/2017 - 21:23
भारतीय संशोधनाचं जाऊ द्या पण हा लेख लिहिण्यापूर्वी आपण किती संशोधन केलंत या विषयांवर? गूगल बाबा कडे यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आहेत... काही वर्षांपूर्वी मी विमानशास्त्र या विषयावर IISC च्या प्रोफेसर लोकांनी केलेला पेपर वाचला होता. इथे टिचकी मारलीत तर संपूर्ण pdf मिळेल वाचायला तुम्हाला! बघा त्यात दिलेली "शास्त्रीय" कारण कि पुराण शास्त्रात वर्णन केलेली विमाने का उडू शकत नाहीत! जास्तीत जास्त त्या वेळेच्या लोकांच्या विचारशक्तीला आदर देता येईल पण म्हणून खरोखर त्यांनी लिहिलेल्या सगळ्या गोष्टी सत्य असल्याचं पाहिजेत असे नाही ना... कारण मग हल्ली येणाऱ्या विज्ञानपटांमध्ये दाखवलेल्या गोष्टी आत्ताच्या काळात "असायलाच" हव्यात नाही का?

डँबिस००७ Sun, 08/20/2017 - 21:32
सध्या डॉक्टराम्नी एक नविनच टुम काढलेली आहे. व्हिटामिन डी टेस्ट करण्याची !! नविन संशोधनानुसार म्हणे शरीरातील कॉलेस्ट्रॉल पासुन कॅल्शियम पर्यंत सर्व कार्यकारणात व्हिटामिन डी महत्वाची भुमि का बजावत आहे. नविन शोध लागला म्हणजे त्यावर लगेच उतारा आला पाहीजेच !! शास्र्त्रज्ञांनी तोंडावाटे घेण्याजोग व्हिटामिन डी चा शोध लावला व लोकांसाठी उपलब्धही केला. आता पर्यंत शाळेत " व्हिटामिन डी हे सुर्यप्रकाशात स्वतः च्या स्किनच्या खाली तयार होणारे व्हिटामिन आहे" हे शिकलेल्या ह्याच लोकांनी ह्याच व्हिटामिन डी साठी आपापली पैश्याची पर्सची तोंड व व्हिटामिन डी घेण्यासाठी स्वतःची तोंड उघडली. आता व्हिटामिन डी जर केमिस्टकडे उपलब्ध झाल तर त्याला विरोध करणारे , तोंडावाटे व्हिटामिन डी घेण्याचा , व्हिटामिन डीच्या अतिरेकी सेवनाने होणार्या व्हिटामिन डी पॉईझनचा संबंध लावणारच, त्याशिवाय शरीर स्वतःला लागणारे व्हिटामिन डी स्वत:च दहा मिनीटाच्या सुर्य प्रकाशात फिरण्याने बनवु शकते ते सुद्धा कोणत्याही व्हिटामिन डी पॉईझन शिवाय !! जर सकाळच्या कोवळ्या सुर्य प्रकाशात बाहेर फिरुन व्हिटामिन डी मिळत असेल तर काय वाईट आहे ? पण ह्याच कारणासाठी सुर्य नमस्काराची योजना होती हे मान्यच होणार नाही. "सुर्य नमस्कार " सुर्या समोर करायला नको ? घरी, बंद रुम म ध्ये फॅन लावुन सुर्य नमस्कार करता येईल का ? मग सुर्याच्या आशिर्वादाच सोडा पण तुम्हाला लागणार व्हिटामिन डी तुम्हाला कोठुन मिळणार ? नदिच्या, तलावाच्या , समुद्राच्या पाण्यात राहुन सुर्याला अर्घ ओतणार्या लोकांचा राग येण स्वाभाविक आहे. म्हणे सुर्याला अर्घ ओततात ! सुर्याला तुमच्या अर्घाची काय जरुरी आहे ? तो तुमच्या अगोदर होता, नंतरही असणार !! पण अर्घ ओतताना दहा मिंनीट होऊन जातात !!

पुंबा Mon, 08/21/2017 - 11:24
भारताने जगाला अंक मोजायला शिकवल. शुन्य, दशांश पद्धती ही भारताची जगाला भेट आहे. पण ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत.
हे शाळेत शिकवले गेले आहे आम्हाला. मी महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रम पूर्ण केला. एनसीआर्टीच्या पुस्तकात देखिल हे सांगितले आहे. तुम्ही कुठली पुस्तके चाळलीत?

In reply to by अत्रे

हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 08/24/2017 - 21:24
तुमच्या शिक्षकांनी सांगितले कि हे अभ्यासक्रमात होते? मीही महाराष्ट्रात शाळा शिकलो पण हे ज्ञान बऱ्याच उशिराने माझ्या इतर वाचनातूनच मिळाले. कितीची बॅच म्हणायची आपली?

इष्टुर फाकडा Wed, 08/23/2017 - 22:16
शास्त्र आणि तंत्र यात फरक असतो. विमान'शास्त्राचा' दावा आहे 'तंत्राचा' नाही. निदान इतकं तरी फुरोगामी हुच्च लोकांनी लक्षात घेतलं तरी फार होईल. काही आपलं म्हटलं कि उचलून आपटायचं आणि आपली आधुनिकतेची अहंमन्यता कुरवाळून घ्यायची यातच काही लोकांना धन्यता असते. पण जर यातल्याच काही गोष्टी पश्चिम टोकावरून आपटून परत आल्या कि मग असे लोक त्याच गोष्टी डोळे झाकून मान्य करतात असं आपलं माझं निरीक्षण आहे. अंधपणाने गोष्टी डोक्यावर घेणारे जसे बावळट असतात त्याच्यापेक्षा जास्त हे असले नवफुरोगामी कट्टर असतात.

डँबिस००७ गुरुवार, 08/24/2017 - 20:41
इष्टुर फाकडा अगदी सहमत !! इथे विचारलेल्या प्रश्नावर गुगल मधुन उत्तर शोधुन देण्याची चढा ओढ लागलेली आहे !! ;-)

अमितदादा Fri, 08/25/2017 - 14:11
http://www.misalpav.com/comment/956089#comment-956089 तुमच्या ह्या प्रतिक्रियेवरच उत्तर इथे देतो . मुळात तुमचे आणि माझे विचार वेगवेगळे आहेत, तुम्ही तुमचे विचार मांडलेत मी माझे मांडलेत त्यामुळे पुढे काथ्याकूट करण्यात अर्थ नाही.
कमाल ह्याची आहे की आपण फक्त एका जपानी शास्त्रज्ञांने संशोधन मांडे पर्यंत वाट बघायची पण एकाही भारतीय सरकारी आरकियोलॉजीकल सर्वे ऑफ ईंडीयाच्या लोकांना हे का जमल नाही अस विचारायच नाही.
सरकार, भारतीय लोक, शास्त्रज्ञ सगळे दोषी आहेत जे खरे काय आणि खोटे काय याचा उलघडा करू शकत नसतील तर, एखाद्या उपयुक्त प्राचीन गोष्टीवर संशोधन होत नसेल तर.
शुश्रुताच्या प्लॅस्टीक सर्जरीविषयी गुगल व विकी पिडीयावर भरपुर वाचयला मिळेल !
याबाबत फक्त ऐकून माहित आहे जास्त वाचाल नाही , तुम्ही मुद्देसूद आणि संदर्भसाहित लिहा वाचाय आणि प्रतिसाद द्यायला आवडेल.
शेवटी प्रत्येक गोष्ट तोलून मापून accept केली पाहिजे हेच तर मी पहील्या पासुन म्हणतोय !!
चांगली गोष्ट आहे याबाबत तरी सहमती आहे आपली

डँबिस००७ Fri, 08/25/2017 - 18:17
शाळेत सर्व काही शिकलेल्यांसाठी , १) जगातील मेटलर्जीच्या विकासात प्राचिन भारताचा किती हातभार लागलेला होता ? २) कोणत्या धातुच्या शोधाच श्रेय विदेशी शास्रज्ञांना दिल जात, जे धातु प्राचिन काळापासुन भारतात शुद्ध करुन वापरले जातात ? ३)आचार्य शुश्रुत यांना प्लॅस्टिक सर्जरीच जनक (भारतातच) समजल जात !! ह्या आचार्य शुश्रुत यांनी निर्माण केलेल्या १५० शस्त्रक्रिया आयुधांच्या संख्येत आजच्या आधुनिक विज्ञानाने किती भर घातली ? वरचे प्रश्न प्राचीन भारतातील विज्ञानावरचे प्रश्न व ऊत्तरांच संकलन करणार्या धाग्यावर विचारले तर काहीही ऊत्तर आल नाही !! तिथे प्रश्न विचारल की भराभर गुगल व विकीपिडीया वर ऊत्तर शोधुन दिली जातात !!
भारताच्या ग्रंथ संपदेत ब्रम्हास्त्र, वेगवेगळी अस्त्रे , शस्त्रे , शास्त्रे जसे विमान शास्त्र वैगेरेचे विस्मयकारक उल्लेख आलेले आहेत. भारतीय समाजातील काही लोक अश्या विस्मयकारक उल्लेखाचा दाखला देत भुत काळातील भारत टेक्नॉलॉजीत खुप पुढे होता असा दावा करत असतात . पण त्याच वेळेला समाजातील काही सुशिक्षीत लोक हा दावा खोडताना ह्या सर्व मात्र कवि कल्पनाच आहेत असा दावा करतात. भारताने जगाला अंक मोजायला शिकवल. शुन्य, दशांश पद्धती ही भारताची जगाला भेट आहे. पण ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत. शाळेत विदेशी लोकांनी काय शोधुन काढल त्यावर जोर दिला जातो.

थेट गहुंजेवरून . . .

श्रीगुरुजी ·

श्रीगुरुजी गुरुवार, 02/23/2017 - 21:08
सकाळी लवकर उठून गहुंजेला निघालो. काही कारणाने अपेक्षित वेळेवर निघता आले नाही. त्यामुळे अंदाजे अर्धा तास उशीरा पोहोचलो. पण नंतर दिवसभर सामना पाहिला. सुरवातीपासूनच वॉर्नर व रेनशॉ अत्यंत संथ खेळत होते. खेळपट्टी पाटा वाटत होती. तरीही दोघे संथ खेळत होते. बराच वेळ प्रतिषटक धावगती २.५० च्या आसपास होती. उपाहारापूर्वी काही वेळ असताना नाबाद ८२ या धावसंख्येवर उमेश यादवच्या गोलंदाजीवर वॉर्नर त्रिफळाबाद झाला. त्याच्या बॅटला लागून चेंडू यष्ट्यांवर गेला. यादव चेंडू टाकत असताना मी दुर्बिणीतून खेळ पाहत होतो. दुर्बिणीतूनच वॉर्नरचा त्रिफळा उडालेला अगदी स्पष्ट दिसला. हा माझ्या दृष्टीने अविस्मरणीय क्षण आहे! वॉर्नर बाद झाल्यावर पुढील फलंदाज यायच्या आतच रेनशॉ देखील स्नायू दुखावल्यामुळे तात्पुरता निवृत्त झाला. त्यामुळे शॉन मार्श व कर्णधार स्टिव्हन स्मिथ हे दोन फलंदाज एकदमच खेळायला आहे. उपाहाराला १ बाद ८४ अशी धावसंख्या होती. उपाहारानंतर पुन्हा एकदा संथ खेळ सुरू झाला. काही वेळातच शॉन मार्श स्वीप मारण्याच्या प्रयत्नात बॅकवर्ड शॉर्टलेगला कोहलीच्या हातात झेल देऊन बाद झाला. ही विकेट देखील मी दुर्बिणीतून पाहत असतानाच पडली. नंतर काही वेळाने पीटर हॅन्ड्सकॉम्ब व स्टिव्हन स्मिथ बाद झाले. उपाहाराला ऑसीज ४ बाद १४९ होते. उपाहारानंतर भराभर विकेट्स पडायला सुरूवात झाली. आधी शॉन मार्श, नंतर मॅथ्यू वेड व नंतर रेनशॉ बाद झाले. तत्पूर्वी रेनशॉने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. काही वेळाने उमेश यादवच्या एका चेंडूवर उडालेला ओ'कॅफीचा झेल साहाने उजव्या बाजूला हवेत झेपावत एका हातात घेतला व एक अत्यंत उत्कृष्ट झेल याचि देही याचि डोळा बघितल्याचे भाग्य लाभले. यादवच्या पुढच्याच चेंडूवर लॉयन पायचित झाला व उमेश यादवला हॅटट्रिकची संधी मिळाली. यावेळी ऑसीज ९ बाद २०५ अशा अवघड परिस्थितीत होते. परंतु त्याचा पुढील चेंडू हॅझलवूडने नीट खेळून हॅटट्रिक वाचविली. त्यावेळी पावणेचार वाजले होते व खेळ संपायला अजून ४५ मिनिटे होती. काही वेळातच १० गडी बाद होऊन आपल्याला आजच भारताची फलंदाजी बघायला मिळणार असे वाटत असतानाचा मिचेल स्टार्क ने जोरदार हल्ला चढविला. भारताच्या फिरकी गोलंदाजांची धुलाई करताना त्याने ३ षटकार व ५ चौकारांच्या सहाय्याने जवळपास १०० च्या धावगतीने नाबाद अर्धशतक करून दिवस संपविला. खेळ थांबला तेव्हा ऑसीज ९ बाद २५६ या धावसंख्येवर होते. आता उद्या लवकरच भारताची फलंदाजी सुरु होईल अशी आशा आहे.

कपिलमुनी Fri, 02/24/2017 - 11:55
आज सामना बघायला आलो होतो , कोहली आउट झाल्यावर परत ऑफिसला आलो, उद्या मी आणि काही मिपाकर मॅच बघायला येणार आहोत.

In reply to by अभिजीत अवलिया

श्रीगुरुजी Fri, 02/24/2017 - 21:19
येणार असाल तर भेटू या. मी साऊथ लोअर स्टँडमध्ये आहे. ४ थ्या दिवसावर नक्की जाईल. बहुतेक ४ थ्या दिवशीच सामना संपेल.

बाळ सप्रे Fri, 02/24/2017 - 12:44
उद्या येइन म्हणतो गहुंजेला.. पुण्यातला पहिला एकदिवसीय सामना पाहिला होता प्रत्यक्ष .. तो पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच होता.. माझ्या दुर्दैवाने तो सामना भारताने गमावला होता.. इंग्लंडविरुद्धचा पुण्यातला सामना त्याच दिवशी मुंबई मॅरॅथॉन असल्याने प्रत्यक्ष पहाता आला नव्हता.. नेमका तो अविस्मरणीय झाला.. आता कसोटी सामनाही बघायचाय आयुष्यात प्रथमच.. यावेळी तरी कामगिरी सरस होवो ही इच्छा.. आत्ता तरी फार वाईट अवस्था आहे भारताची.. १०० च्या आत ५ गेले...

बाळ सप्रे Fri, 02/24/2017 - 13:16
संपलं.. १५०+ आघाडी ... लो स्कोअरींग सामन्यात.. ओ कीफच्या ३ विकेटनी सामना फिरवला..

श्रीगुरुजी Fri, 02/24/2017 - 13:36
Great atmosphere here although very thin crowd (approx. 7 k). Watched all wickets live. Wicket boomranged. Excellent catching by Aussies. India got out in just 40.2 overs. Warner is already gone. India will most probably lose this match.

फेरफटका Fri, 02/24/2017 - 20:56
केटी लागून क्रिटीकल ला विषय गेलेल्या ईंजिनीअरिंग च्या स्टुडंट च्या निष्ठेनं, डिटरमिनेशन नं आणी बुडाला आग लागल्या च्या भावनेनं खेळलो तरच ईभ्रत वाचेल आता. नाहीतर दुसरा उपाय म्हणजे सारसबागेतल्या गणपतीसमोर सामुदायिक रीत्या 'ओ पालनहारे' चा गजर करणे.

श्रीगुरुजी Fri, 02/24/2017 - 21:16
दुसरा दिवसही आनंदात गेला. आजच्या दिवसात एकूण १५ विकेट्स पडल्या. ऑस्ट्रेलियाने ९ बाद २०५ वरून स्टार्कच्या फक्त ६३ चेंडूतील ६१ धावांमुळे २६० ची मजल मारली. ऑस्ट्रेलियाला थोडक्यात गुंडाळण्याचा भारताचा आनंद फार काळ टिकला नाही. फलंदाजी सुरू झाल्यापासून के एल राहुल जोरदार फलंदाजी करीत होता. तो थोडासा नशीबवानही ठरला कारण त्याचे २-३ फटके स्लीपच्या डोक्यावरून किंवा दोन स्लीपमधून हवेतून पार झाले. दुसरीकडे १० धावा करून मुरली विजय हॅझलवूडच्या एका बाहेर जाणार्‍या चेंडूला बॅट लावून यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. पुजारा थोडा वेळ टिकला. पण दुसर्‍या हप्त्यात गोलंदाजीला आलेल्या स्टार्कच्या एका बाहेर जाणार्‍या चेंडूवर पुजारा देखील बॅट लावून यष्टीरक्षकाकडे सोपा झेल देऊन बाद झाला. सर्व प्रेक्षक फलंदाजीसाठी कोहलीची आतुरतेने वाट पहात होते. तो मैदानात येऊ लागल्यावर प्रेक्षक भयंकर चेकाळले व आरडाओरडा करून त्यांनी स्टेडिअम दणाणून सोडले. त्यात अर्थात मी सुद्धा होता. कोहलीने स्टार्कचा पहिला चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळून काढला. पुढच्या काहीशा खाली राहिलेल्या बाहेर जाणार्‍या चेंडूवर चेंडूच्या पुरेसे जवळ न जाता त्याने बॅट लावली व पहिल्या स्लीपमध्ये पीटर हॅन्ड्सकॉम्बने एक अत्यंत उत्कृष्ट लो कॅच घेतल्यावर सर्वांना दु:खाचा धक्का बसला. १ बाद ४४ वरून केवळ ३ चेंडूत भारत ३ बाद ४४ अशा अडचणीत आला. नंतर रहाणेने राहुलला बर्‍यापैकी साथ दिली. राहुलने आपले अर्धशतक झटपट पूर्ण केले. नंतर त्याने लागोपाठ २ चौकार मारून रहाणेबरोबर ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. भारत ३ बाद ९४. पुढच्या ओ'कीफ या डावखुर्‍या फिरकी गोलंदाजाचा एक चेंडू खेळताना त्याने तो लाँगऑनला उचलून मारण्याचा प्रयत्न करताना त्याचा खांदा दुखावला व चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागून डीप फाईन लेग व डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान उंच झेल उडाला. फटका मारल्याक्षणीच तो वेदनेने जमिनीवर कोसळला. दरम्यानच्या काळात कसलेला क्षेत्ररक्षक डेव्हिड वॉर्नर लांबून धावत आला आणि त्याने अचूक झेल पकडला. ४ बाद ९४. अश्विन ६ व्या क्रमांकावर खेळायला आला व त्याने पहिल्याच चेंडूवर १ धाव घेतली. ओ'कीफच्या पुढच्याच काहीश्या उसळलेल्या चेंडूवर रहाणेला आपली बॅट काढता आली नाही आणि पुन्हा एकदा पीटर हॅन्ड्सकॉम्बने एका बाजूला झेपावत एका हातात उत्कृष्ट झेल घेतला. झेल नीट घेतला की नाही याची पंचांनी तृतीय पंचांकडे विचारणा केली. रिप्लेमध्ये झेल अत्यंत अचूक जमिनीच्या वरच पकडल्याचे स्पष्ट दिसले आणि रहाणे १३ धावा करून परतला. ५ बाद ९५. आता साहा खेळायला आला. या षटकाचे अजून २ चेंडू शिल्लक होते. षटकात पहिल्या ४ चेंडूत २ बळी गेलेले होते. ६ व्या चेंडूवर साहाची बॅट चेंडूला लागली आणि झेल यष्टीरक्षकाच्या हाताला लागून पहिल्या स्लीपमध्ये स्टिव्हन स्मिथच्या हातात विसावला. एकाच षटकात ३ बळी घेऊन ओ'कीफने भारताचे कंबरडे मोडले. ६ बाद ९५. काय होत आहे यावर प्रेक्षकांचा विश्वासच बसत नव्हता. अवघ्या ४-५ मिनिटात हाराकिरी झाली होती. लॉयनच्या पुढच्या षटकाच अश्विनने एक चेंडू बॅकफूटवर खेळला. चेंडू बॅटच्या दांड्याला लागून त्याच्या बुटावर पडला व तिथून उडून फॉरवर्ड शॉर्टलेगच्या दिशेने उडाला. पुन्हा एकदा पीटर हॅन्ड्सकॉम्बने अगदी खाली लो कॅच उत्कृष्ट झेलला. भारत ७ बाद ९५. आता जयंत यादव आला. तो बर्‍यापैकी फलंदाजी करू शकतो. त्याने व जडेजाने पुढील २ षटके सावध फलंदाजी करून धावसंख्या ९८ पर्यंत नेली. ओ'कीफच्या पुढच्या षटकात पाय ताणून फ्रंटफूटवर खेळताना जयंत यादवचा मागील पाय किंचित क्रीजच्या पुढे गेला. पाय मागे येण्याच्या आतच यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने बेल्स उडविल्या. रिप्लेत दिसले की यादवचा मागील पाय रेषेपासून जेमतेम १ सेंटीमीटर अलिकडेच राहिला व तो यष्टीचित झाला. ८ बाद ९८. उमेश यादव फलंदाजीला आल्यावर ओ'कीफच्या पुढच्या षटकात जडेजाने त्याचा एक चेंडू बेजबाबदारपणे मिडविकेट बाऊंड्रीच्या दिशेने उचलला. तिथे उभा असलेल्या लंबूटांग स्टार्कने कोणतीही चूक न करता आरामात झेल पकडला. हा ओ'कीफचा ५ वा बळी. ९ बाद १०१. शेवटचा फलंदाज इशांत शर्मा. पुन्हा एकदा ओ'कीफच्याच गोलंदाजीवर उमेशने स्लीपमध्ये स्मिथच्या हातात सोपा झेल दिला. भारत सर्वबाद १०५. ओ'कीफने ६ बळी घेऊन आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली. त्याचे पृथक्करण होते १३.१-२-३५-६. त्याने फक्त २४ चेंडूत ६ बळी मिळवून भारताची दाणादाण उडवून दिली. फिरकी खेळणारा सर्वोत्कृष्ट संघ अशी भारताची ओळख आहे. परंतु भारताने फिरकी गोलंदाजासमोरच नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाने एकूण १५५ धावांचे जबरदस्त आधिक्य मिळविले. ऑस्ट्रेलियाचा डाव देखील सुरवातीस कोसळला. अश्विन व जडेजाने गोलंदाजीची सुरूवात करून काही वेळातच ३ बाद ६१ अशी पडझड केली. तीनही बळी अश्विनने घेतले. परंतु नंतर कर्णधार स्मिथ व रेनशॉने डाव सावरला. ११३ धावसंख्येवर जयंत यादवच्या गोलंदाजीवर लाँगऑफला षटकार मारताना रेनशॉचा इशांत शर्माने उत्कृष्ट झेल घेतला. ४ बाद ११३. परंतु त्यानंतर मिचेल मार्श व स्मिथने अजून विकेट न गमावता धावसंख्या १४३ पर्यंत नेली. आता ऑस्ट्रेलियाकडे २९८ धावांचे आधिक्य आहे व अजून ६ गडी बाद व्हायचे आहेत. एकंदरीत भारताची अवघड परिस्थिती आहे. ३५० धावांहून मोठे लक्ष्य असेल तर भारताला ते अवघड जाणार आहे. उद्या जर ऑस्ट्रेलियाने ४०० धावांच्या लक्ष्याचा टप्पा पार केला तर भारत सामना हरल्यातच जमा आहे. सामना बहुतेक ४ थ्या दिवशीच संपेल अशी चिन्हे आहेत. तसा खेळपट्टीत फारसा दम नाही. परंतु भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली.

In reply to by विशुमित

अभिजीत अवलिया Sat, 02/25/2017 - 15:21
निघाले असतील. सर्वबाद १०७. ३३३ धावांनी पराभव. आज टिकाव धरला असता तर उद्या जाणार होतो पोराला घेऊन मॅच बघायला. आता त्याची कशी समजूत घालायची ह्याचा विचार करतोय.

श्रीगुरुजी Sat, 02/25/2017 - 17:30
चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताचा ६ वा गडी बाद झाला होता व फक्त ९९ धावा फलकावर होत्या. त्यामुळे तेव्हाच घरी निघालो. चहापानाची २० मिनिटे थांबून नंतर दिवस संपेपर्यंत थांबण्याचा पेशन्स शिल्लक नव्हता. चहापान संपल्यावर जेमतेम २०-२२ मिनिटातच उर्वरीत ४ खेळाडू बाद होऊन भारताचा स्वतःच्या भूमीवर तब्बल ३३३ धावांनी अत्यंत लाजिरवाणा पराभव झाल्याचे नेटवर समजले आणि चहापानानंतर लगेच परत निघण्याचा अचूक निर्णय घेतल्याबद्दल स्वत:चीच पाठ थोपटली. इतक्या लाजिरवाण्या पराभवाचे आपण साक्षीदार असल्याचे वाईट वाटले. कांगारूंना कमी लेखणे व स्वतःबद्दल असलेला फाजील आत्मविश्वास यामुळे भारताचा जेमतेम पावणेतीन दिवसातच दारूण पराभव झाला. भारताचा पहिला डाव जेमतेम ४०.१ षटकात ३ तासात १०५ धावात संपला तर दुसरा डाव तर जेमतेम २ तासात ३३.५ षटकात १०७ धावात संपला. भारताने दोन्ही डाव मिळून जेमतेम ५ तास फलंदाजी केली व फक्त ७४ षटके खेळून २१२ धावा केल्या. मी दुर्बिणीतून पाहत असतानाच बहुतेक सर्व विकेट्स पडल्या. त्यामुळे बहुतेक सर्व विकेट्स अगदी जवळून प्रत्यक्ष बघता आल्या. विशेषतः दोन्ही डावात कोहलीला बाद होताना बघितले. दुसर्‍या डावात ओ'कीफचा काहीसा बाहेर पडलेला एक चेंडू स्टंपाबाहेरून निघून जाईल या समजूतीने कोहलीने दोन्ही हाताने बॅट उचलून धरून चेंडू सोडून दिला. त्याच्या दुर्दैवाने त्याचा अंदाज चुकला व चेंडू काहीसा आत येऊन त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त झाल्याचे पाहणे नशीबी आले. खरं तर तिथेच सामना संपला होता. पण आशा चिवट असते. म्हणून अजून थोडा वेळ थांबावे असा विचार केला. परंतु निराशाच पदरात पडली. नवोदीत डावखुरा गोलंदाज स्टिव्हन ओ'कीफ याने दोन्ही डावात ६ बळी घेऊन सामन्यात तब्बल १२ बळी मिळवून सामनावीराचा पुरस्कार मिळविला. त्याला नेथन लॉयनने पहिल्या डावात १ व दुसर्‍या डावात ४ बळी घेऊन उत्तम साथ दिली. स्टार्कने पहिल्या डावात केवळ ३ चेंडूत पुजारा व कोहलीला बाद करताना फलंदाजीत पहिल्या डावात ६३ चेंडूत ६१ व दुसर्‍या डावात ३१ चेंडूत ३० असे वेगवान डाव खेळले. त्याने दोन्ही डावात ३-३- षटकार मारले. रेनशॉने पहिल्या डावात ६८ तर दुसर्‍या डावात ३१ धावा केल्या. कर्णधार स्टीव्हन स्मिथने पहिल्या डावात २७ धावाच केल्या, पण दुसर्‍या डावात शतक झळकावले. भारताची गोलंदाजी तशी चांगली झाली. उमेश यादव, अश्विन व जडेजाने दोन्ही डावात चांगली गोलंदाजी करून भरपूर बळी मिळविले. परंतु फलंदाजीत राहुलच्या पहिल्या डावातील ६१ धावांचा अपवाद वगळला तर इतरांनी नुसत्या पाट्या टाकल्या. २००४ नंतर तब्बल १३ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथमच भारतात कसोटी सामना जिंकला. २००४ ची भारतात खेळली गेलेली ४ सामन्यांची मालिका भारत १-२ असा हरला होता. यावेळी त्याचीच पुनरावृत्ती होते की काय ही भयशंका मनात डोकावत आहे. आता भारताला पुढील ३ कसोटींपैकी एकही न हरता किमान २ सामने जिंकावे लागतील. पुढील कसोटी सामना ४ मार्चला बंगळुरात आहे. ५ दिवसांच्या तिकिटापैकी सव्वा दोन दिवसांचे तिकीट वाया गेले. तिकिटाचे पैसे आता कोण भरून देणार?

In reply to by श्रीगुरुजी

अभिजीत अवलिया Sat, 02/25/2017 - 20:02
समजा एखाद्या व्यक्तीने फक्त ४थ्या किंवा ५व्या दिवसाचे तिकीट काढले असते तर अशा केस मध्ये पैसे परत मिळतात का?

In reply to by अभिजीत अवलिया

गणामास्तर Mon, 02/27/2017 - 14:21
हो मिळतात. बुकमायशो वाल्यांचा त्याच दिवशी रात्री मेल आला कि रविवारच्या तिकिटाचे पैसे ८ दिवसांत अकाउंटला जमा होतील म्हणून.

श्रीगुरुजी Sat, 03/04/2017 - 15:16
आजपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुसरा कसोटी सामना बंगळूर येथे सुरू झाला. भारताने संघात २ बदल केले आहेत. सलामीवीर मुरली विजयच्या जागी अभिनव मुकुंद व जयंत यादवच्या जागी त्रिशतकवीर करूण नायरला संघात घेतले. ऑस्ट्रेलियाने पुण्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे. मुरली विजयच्या जागी अभिनव मुकुंदला आणल्याने भारतीय संघाच्या कामगिरीत शून्य फरक पडला. संघाची धावसंख्या जेमतेम ११ असताना मुकुंद शून्यावर बाद झाला. मागील १-२ वर्षांपासून सलामीची जोडी ही भारताची प्रमुख समस्या आहे. गेल्या २ वर्षात खेळल्या गेलेल्या बहुतेक सामन्यात सलामीच्या जोडीचा किमान एक फलंदाज स्वस्तात बाद झालेला आहे. किंबहुना भारतीय सलामीच्या जोडीने यापूर्वी किमान अर्धशतकी भागीदारी मागील २ वर्षात किती वेळा केली हा संशोधननाचा विषय आहे. मुरली विजय, राहुल, पार्थिव पटेल, गौतम गंभीर, अभिनव मुकुंद असे सलामीसाठी अनेक प्रयोग करून झाले. परंतु भारताला भक्कम सुरूवात देणारी सलामीची जोडी अजून मिळालेली नाही. काही वेळाने पुजारा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने फक्त १७ धावा केल्या. त्यापाठोपाठ कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. फिरकी गोलंदाज नेथन लॉयनचा एक चेंडू खूप वळून लेगस्टंपबाहेर जाईल हे गृहित धरून त्याने चेंडू न खेळता बॅट वर करून सोडून दिला. त्याच्या दुर्दैवाने चेंडू थोडासाच वळून त्याच्या पायांवर चेंडू आदळला त्यावेळी त्याचा पाय अगदी मधल्या यष्टीसमोर होता. त्यामुळे पंचांना त्याला पायचित बाद द्यायला जराही कष्ट पडले नाहीत. मागील सामन्यातील दुसर्‍या डावात ओ'कीफचा चेंडू वळणार नाही अशा समजूतीने त्याने सोडून दिला होता, परंतु तो चेंडू थोडा वळून आत आला व कोहलीच्या ऑफस्टंपवर जाऊन आदळला होता. म्हणजे लागोपाठ दुसर्‍य डावात कोहलीचा फिरकीचा अंदाज चुकला. कोहलीने ३ डावात ०, १३ व १२ अशा धावा केल्या आहेत. नंतर रहाणे आला आणि थोड्याच वेळात तोही १७ वर यष्टीचित झाला. रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला. पुढील डावातही रहाणे अपयशी ठरला तर बहुतेक तो संघाबाहेर जाईल कारण रहाणे मागील १०-१२ डावात एक अर्धशतक वगळता पूर्ण अपयशी ठरला आहे. भारत ४ बाद ११८. त्यातले ३ बळी लॉयनचे. त्यानंतर स्थानिक खेळाडू करूण नायर आला. इंग्लंडविरूद्ध त्रिशतक करूनसुद्धा रहाणेला आत आणण्यासाठी त्याला नंतरच्या सामन्यात वगळण्यात आले होते. दुसरीकडे दुसरा स्थानिक खेळाडू के एल राहुल चांगली फलंदाजी करून धावा वाढवित होता. त्याने अर्धशतकही पूर्ण केले होते. करूण नायर बर्‍यापैकी खेळत असताना तो ओ'कीफच्या गोलंदाजीवर २६ धावांवर यष्टीचित झाला. एकंदरीत फिरकी गोलंदाजी खेळण्यामध्ये दादा समजले जाणारे भारतीय फलंदाज भारतातच फिरकीसमोर फसत आहेत. ५ बाद १५६. नंतर अश्विन आला आणि गेला. त्यापाठोपाठ वॄद्धिमान साहा आला आणि गेला. त्यानंतर आलेला जडेजा देखील हजेरी लावून परतला. आता भारताची अवस्था ८ बाद १८८ अशी दारूण आहे. यावेळी फिरकी गोलंदाज नेथन लॉयन याने ६ बळी घेतले आहेत. भारताची परिस्थिती अत्यंत अवघड आहे. एकटा राहुल नाबाद ८९ धावांवर झुंज देत आहे. उर्वरीत सर्व फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत.

श्रीगुरुजी Sat, 03/04/2017 - 15:24
संपला डाव. भारत सर्वबाद १८९. नेथन लॉयनची २२.२-४-५०-८ अशी अफलातून कामगिरी. १८९ मधील ९० धावा एकट्या राहुलच्या. उर्वरीत १० जणांनी मिळून ८३ धावा केल्या व १६ धावा अतिरिक्त. पुण्यातील कहाणीचा पुढील अंक बंगळूरमध्ये सुरू.

श्रीगुरुजी Sat, 03/04/2017 - 23:38
दिवसअखेर भारत सर्वबाद १८९ तर ऑसीज नाबाद ४०. पहिल्याच दिवशी भारताची वाट लागली आहे. हा सामना जर भारत हरला तर मालिका हरल्यातच जमा आहे. भारताची संघनिवड चुकत आहे. वृद्धिमान साहाऐवजी पार्थिव पटेल हवा होता. त्याच्यामुळे एक डावखुरा फलंदाज मिळतोच पण एक सलामीचा फलंदाजही मिळतो. इशांत शर्मा गोलंदाजी व फलंदाजी या दोन्हीतही निष्प्रभ आहे. त्याच्याऐवजी भुवनेश्वर कुमार हवा होता. भुवनेश्वर कुमार बर्‍यापैकी फलंदाजीही करतो. अजिंक्य रहाणेऐवजी कुलदीप यादव हा डावरा लेगस्पिन गोलंदाज संघात आल्यास एक वेगळ्या पद्धतीचा गोलंदाज संघात येऊन ५ व्या गोलंदाजाचा फायदा होईल. निदान पुढील २ कसोटीसाठी तरी योग्य ते बदल व्हावेत.

श्रीगुरुजी Tue, 03/07/2017 - 12:30
भारत जिंकण्याची शक्यता मला फारच कमी वाटत आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी करून मालिकेच्या आधीच्या तीनही डावात किमान २६० धावा केल्या आहेत. ही खेळपट्टी चमत्कारिक वाटते. भारताच्या पहिल्या डावात ९ फलंदाज फिरकी गोलंदाजांनी बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ८ फलंदाज फिरकी गोलंदाजांनी बाद केले. भारताच्या दुसर्‍या डावात फिरकी गोलंदाजांना फक्त दोनच बळी मिळाले पण वेगवान गोलंदाजांनी ८ गडी बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावात भारताचे फिरकी गोलंदा़ज यशस्वी ठरतात का मध्यमगती गोलंदाज हे सांगता येणे अवघड आहे. तसेही १८८ हे फार मोठे लक्ष्य नाही. भारताची फलंदाजी दयनीय अवस्थेत आहे. गेल्या २-३ वर्षांपासून भारताला भरवशाची सलामीची जोडी मिळालेली नाही. मुरली विजय, राहुल, धवन, गंभीर, पार्थिव पटेल, अभिनव मुकुंद असे अनेक प्रयोग सलामीसाठी केले गेले. सलामीच्या जोडीपैकी किमान एक फलंदाज चटकन बाद होतो. मागील २-३ वर्षात भारताच्या सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी केल्याची अगदी दुर्मिळ उदाहरणे सापडतील. कोहलीचे या मालिकेतील अपयश चिंताजनक आहे. मागील ४ डावात त्याने ४,१३, १२ व १५ अशा ४० धावा केल्या आहेत. जडेजा व अश्विन सर्व सामन्यात अपयशी ठरले आहेत. रहाणेने फक्त १ अर्धशतक केले. मुरली विजय व मुकुंद सर्व डावात अपयशी आहेत. पुजाराच्या आजच्या ९२ धावा सोडल्या तर तोही साहाच्या आजच्या नाबाद २० धावा सोडल्या तर तोसुद्धा अपयशी आहे. एकट्या राहुलने ४ पैकी ३ डावात अर्धशतक केले आहे. गोलंदाजांची व संघाची निवडही चुकत आहे. इशांत शर्माचा फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात फारसा उपयोग नाही. त्याच्याऐवजी भुवनेश्वर कुमार हवा होता. तसेच संघात कुलदीप यादव हा अजून एक चायनामन फिरकी गोलंदाज हवा होता. सलामीसाठी व यष्टीरक्षक म्हणून सुद्धा पार्थिव पटेलला पुन्हा संघात आणल्यास उपयोग होईल. भारताला डीआरएसचा नीट वापर करता येत नाही असे दिसत आहे. आतापर्यंत भारताने फलंदाजी व गोलंदाजी करताना डीआरएसच्या बहुतेक सर्व संधी वाया घालविल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावात पहिल्या ४ षटकात नाबाद २२ धावा आहेत. त्यात ८ बाय धावांचा समावेश आहे. जिंकण्यासाठी आता फक्त १६६ धावा हव्या आहेत. बहुतेक आजच सामना संपेल. एकंदरीत भारतीय भूमीवर भारताच्या सामर्थ्याचा फुगा फुटत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद_१९८२ Tue, 03/07/2017 - 13:01
भारताची फलंदाजी दयनीय अवस्थेत आहे. सहमत श्रीगुरुजी, आजच्या दिवशी फक्त ३६ धावांच्या बदल्यात भारताचे सहा फलंदाज बाद झाले, अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे ही.

प्रसाद_१९८२ Tue, 03/07/2017 - 15:42
अभिनंदन, भारतीय गोलंदाजांचे, खासकरुन आर आश्विनचे. अगदी भेदक गोलंदाजी केली त्याने आज. ४१/६

श्रीगुरुजी Wed, 03/15/2017 - 20:55
उद्यापासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रांची येथे सुरू होत आहे. गहुंजेप्रमाणे रांची येथे प्रथमच कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे ५ दिवसांच्या सामन्यात खेळपट्टी कसे रंग दाखवेल हे सांगता येणे अवघड आहे. नवीन खेळपट्टी असल्याने दोन्ही संघ नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजीचाच निर्णय घेतील असे वाटते. पहिल्या दोन सामन्यानंतर मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. पहिला सामना शांततेत पार पडला असला तरी दुसर्‍या सामन्यात डीआरएस व बाचाबाची यामुळे वाद निर्माण झाले होते. विशेषतः स्टीव्हन स्मिथने डीआरएस मागण्याआधी ड्रेसिंग रुमकडे बघून डीआरएस बद्दल अंदाज घ्यायचा प्रयत्न करणे, इशांत शर्माने तोंड वेडेवाकडे करून स्टीव्हन स्मिथची नक्कल करणे अशा गोष्टींमुळे वातावरण बिघडायला सुरूवात झाली आहे. भारत प्रथमच डीआरएसचा वापर करीत आहे व ते तंत्र भारताला फारसे जमलेले नाही. भारताने मागितलेले बहुतेक रिव्ह्यू भारताविरूद्धच गेले. भारताकडून कोहली व ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नर अपयशी ठरत आहे. ते पुन्हा एकदा भरात यावेत अशी अपेक्षा आहे. स्टार्क व मिचेल मार्श दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले असून ऑस्ट्रेलियाला त्यामुळे धक्का बसलेला आहे. स्टार्कऐवजी पॅट कमिन्सला आणले आहे व मार्शऐवजी मार्कस स्टॉईनिस संघात आला आहे. स्टार्कने गोलंदाजी व फलंदाजीतही भारताला वैताग आणला होता. उद्याचा कसोटी सामना हा ऑस्ट्रेलियाचा ८०० वा कसोटी सामना असणार आहे. स्टिव्हन स्मिथला आपल्या ५००० धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ७६ धावांची गरज आहे. पॅट कमिन्स आपला पदार्पणाचा कसोटी सामना २०११ मध्ये आफ्रिकेविरूद्ध खेळला होता. त्यात त्याने पहिल्या डावात १ व दुसर्‍या डावात ६ बळी घेतले होते. तब्बल ६ वर्षांच्या खंडानंतर तो पुन्हा कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे. भारतीय संघात एकमेव बदल होण्याची शक्यता आहे, तो म्हणजे अभिनव मुकुंदच्या जागी मुरली विजय पुन्हा संघात येऊ शकतो. बघूया उद्या काय होतंय ते.

विशुमित गुरुवार, 03/16/2017 - 10:11
कांगारूनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे. रेनशॉ ने धडाकेबाज सुरवात केली आहे. मला व्यक्तिशः हा खेळाडू खूप आवडला आहे.

श्रीगुरुजी गुरुवार, 03/16/2017 - 14:18
चहापानापर्यंत ऑसीज ४ बाद १९४. स्टिव्हन स्मिथ ८० वर नाबाद आहे. तो मालिकेतील दुसरे शतक करण्याच्या मार्गावर आहे. डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा १९ धावांवर बाद होऊन अपयशी ठरला. रेनशॉने पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करून ४४ धावा केल्या. यादवने २ तर जडेजा व अश्विनने प्रत्येकी १ बळी घेतला. इशांत शर्माला अजून बळी मिळालेला नाही. एकंदरीत इशांत शर्माऐवजी भुवनेश्वर किंवा शमी जास्त उपयोगी ठरला असता.

श्रीगुरुजी गुरुवार, 03/16/2017 - 20:55
पहिल्या दिवसाखेर ऑसीजने ४ बाद २९९ अशी भक्कम मजल मारलेली आहे. स्मिथने मालिकेतील दुसरे शतक केले. तो ११७ धावांवर नाबाद आहे तर ग्लेन मॅक्सवेल ८२ वर नाबाद आहे. स्टिव्हन स्मिथ भारताला कायमच नडत आला आहे. भारताविरूद्ध त्याने खेळलेल्या मागील ७ कसोटीत (या कसोटीसहित) त्याने एकूण ६ शतके केली आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने चारही सामन्यात शतक केले होते. या मालिकेतील पहिल्या कसोटीत आणि आजच्या कसोटीतही त्याने शतक केले आहे. अशीच फलंदाजी सुरू राहिली तर ऑस्ट्रेलिया उद्या किमान ४५० पर्यंत मजल मारू शकेल. क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीचा खांदा दुखावला आहे. त्यामुळे तो नंतर दिवसभर क्षेत्ररक्षणाला आला नाही. आज संध्याकाळी त्याच्या उजव्या खांद्याचे स्कॅनिंग होणार आहे. त्याची दुखापत कितपत गंभीर आहे ते उद्या सकाळीच समजेल. तो उद्या फलंदाजीसाठी तंदुरूस्त झाला तरी बराच वेळ मैदानाबाहेर असल्याने त्याला भारताचे किमान ५ फलंदाज बाद झाल्याशिवाय फलंदाजीला येता येणार नाही. जर त्याची दुखापत गंभीर असेल तर त्याला या कसोटीत फलंदाजी करता येणार नाही व ऑस्ट्रेलियाच्या धावांच्या डोंगरासमोर त्याच्याशिवाय भारत अत्यंत अडचणीत सापडू शकेल.

श्रीगुरुजी Sat, 03/18/2017 - 15:21
राहुलने या मालिकेत ५ डावातील ४ थे अर्धशतक केले. प्रथमच तो इतक्या जबाबदारीने व सातत्याने खेळताना दिसत आहे. मुरली विजयने पुनरागमन करताना चांगली फलंदाजी करून अर्धशतक केले. पुजाराला सूर गवसला आहे. मागील डावात तो ९२ वर बाद झाल्याने त्याचे शतक हुकले होते. मात्र या डावात त्याने नाबाद शतक केले आहे. या मालिकेत भारतातर्फे झालेले हे पहिलेच शतक. कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. ६ वर असताना स्लिपमध्ये झेल देऊन तो बाद झाला. आतापर्यंत झालेल्या ५ डावात त्याने फक्त ४६ धावा केल्या आहेत (सर्वाधिक १५). क्रिकेटरसिकांची त्याने घोर निराशा केली आहे. पाच डावात तो वेगवेगळ्या पाच गोलंदाजांच्या गोलंदाजीवर बाद झाला. रहाणे सुद्धा पुन्हा एकदा अपयशी ठरला. मागील कसोटीतील दुसर्‍या डावात केलेल्या ५२ धावांचा अपववाद वगळता इतर ४ डावात तो अपयशी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ४५१ धावांना उत्तर देताना भारत ५ बाद ३२० अशा चांगल्या स्थितीत आहे. खेळपट्टीचा रागरंग बघता हा सामना अनिर्णित होण्याचीच जास्त शक्यता दिसते. दुसरीकडे मायदेशात बांगलादेशाविरूद्ध खेळताना दुसर्‍या कसोटीत श्रीलंका अडचणीत आहे. आज चौथ्या दिवशी श्रीलंकेची अवस्था ६ बाद २०६ इतकी वाईट आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात ३३८ अशी बर्‍यापैकी धावसंख्या रचलेली होती. परंतु बांगलादेशने पहिल्या डावात ४६७ धावा करून १२९ धावांची आघाडी मिळविली. सध्या श्रीलंकेकडे फक्त ७७ धावांची आघाडी असून त्यांचे ६ फलंदाज बाद झाले आहेत व सामन्याच्या उद्याचा दिवस शिल्लक आहे. जर हा सामना बांगलाने जिंकला तर परदेशात मोठ्या संघाविरूद्ध मिळविलेला हा खर्‍या अर्थाने त्यांचा पहिलाच विजय असेल (तसे त्यांनी काही वर्षांपूर्वी वेस्ट इंडीजमध्ये यजमानांवर २-० अशी मात केली होती. परंतु त्यावेळी विंडीजच्या सर्व प्रमुख खेळाडूंनी बहिष्कार टाकल्याने विंडीजला पूर्णपणे दुय्यम संघ खेळवावा लागला होता.).

श्रीगुरुजी Sat, 03/18/2017 - 23:36
भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना अनिर्णिततेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दुसरीकडे श्रीलंका वि. बांगलादेश सामना अत्यंत चुरशीचा झाला आहे. चौथ्या दिवसाखेर श्रीलंकेकडे १३९ धावांचे आधिक्य असून त्यांचे ८ गडी बाद झाले आहेत. उद्या पाचव्या दिवशी जर श्रीलंकेने १ तास खेळून १६० च्या पुढचे लक्ष्य ठेवले तर ते बांगलादेशाला जड जाण्याची शक्यता आहे कारण बांगलादेशाचा दुसर्‍या डावातील फलंदाजीचा इतिहास अत्यंत केविलवाणा आहे. तिसरीकडे द. आफ्रिकेने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर हरवून सध्या आपणच कसोटीत प्रथम क्रमांकाचे आहोत हे सिद्ध केले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलियाचा हरविले होते. दुसर्‍या देशात सर्वाधिक विजय मिळविणार्‍या देशांमध्ये आफ्रिका प्रथम क्रमांकावर आहे.

अभिजीत अवलिया Sun, 03/19/2017 - 13:36
आता भारताने २६ धांवाची आघाडी घेतलेली आहे आणी अजूनही ४ गडी बाद व्हायचे आहेत. मला वाटते समजा आपली आघाडी १००-१२५ च्या पुढे गेली तर भारत कदाचित जिंकू शकेल हा सामना.

In reply to by अभिजीत अवलिया

गामा पैलवान Sun, 03/19/2017 - 18:45
सहमत. बक्कीने दीडशेची आघाडी घेतली. मला दोनशेची अपेक्षा होती. पण ठीकाय. कोहलीने साताठ षटके खेळायला लावून दोन गडी उचलले ते चांगलं केलं. आता आघाडी सव्वाशेच्या आसपास आहे. ती संपायच्या आंत पाहुण्यांना उखडायचे डावपेच तयार असतीलंच. -गा.पै.

आषाढ_दर्द_गाणे Sun, 03/19/2017 - 23:11
उद्याचा पहिल्या सत्राचा खेळ पाहण्याचा बेत करतोय. पण खेळपट्टी कदाचित दुपार संध्याकाळी जास्त रंग दाखवेल असं वाटतंय. हि कसोटी स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावर वाचवलीन तर स्मिथला 'मानला'. त्याचं तंत्र आणि शैली अजिबात आवडत नसले तरी.

श्रीगुरुजी Mon, 03/20/2017 - 14:21
५ व्या दिवशी पटापट बली मिळवून भारत सामना जिंकेल असे वाटले होते. त्या दृष्टीने आज सकाळच्या सत्रात स्टिव्हन स्मिथ व रेनशॉ यांचे बळी मिळवून भारताने ऑस्ट्रेलियाला उपाहारापूर्वीच ४ बाद ६३ असे अडचणीत टाकले होते. त्यावेळी ऑसीज ८९ धावांनी मागे होते. परंतु उपाहार ते चहापान हे संपूर्ण सत्र पीटर हॅन्ड्सकॉम्ब (नाबाद ४४) आणि शॉन मार्श (नाबाद ३८) यांनी सहज खेळून काढून नाबाद ८६ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला ४ बाद १४९ वर नेऊन अडचणीतून बाहेर काढले. ऑस्ट्रेलिया अजूनही ३ धावांनी मागे आहेत. परंतु सामन्याचे शेवटचे दोन तासच शिल्लक आहेत. चहापानानंतर पुढील १ तासात जर भारताने ऑस्ट्रेलियाचे उर्वरीत ६ गडी बाद केले तरच भारताला सामना जिंकण्याची संधी आहे. अन्यथा सामना अनिर्णित राहण्याचीच दाट शक्यता दिसते. आता मालिकेतील चौथा व शेवटचा कसोटी सामना धर्मशाळा येथे शनिवारी २५ मार्चला सुरू होईल. तो सामना २९ मार्चपर्यंत चालेल. नंतर लगेच ४ एप्रिलपासून आयपीएलचा तमाशा सुरू होईल व तो दीड महिना चालेल. नंतर लगेच १ जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही टॉपच्या ८ संघामध्ये एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा सुरू होईल. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी ८ व्या क्रमांकावर बांगलाचा संघ असून विंडीज ९ व्या क्रमांकावर असल्याने या स्पर्धेसाठी पात्र ठरलेले नाही. भारत या स्पर्धेत २००० मध्ये उपविजेता, २००२ मध्ये श्रीलंकेसह संयुक्त विजेता व २०१३ मध्ये विजेता होता. साधारणपणे दर दोन वर्षानंतर होणारी ही स्पर्धा ४ वर्षांच्या खंडानंतर ही स्पर्धा खेळली जात आहे कारण २०१४ व २०१६ मध्ये ट-२० विश्वचषक स्पर्धा खेळली गेली तर २०१५ मध्ये ११ वी विश्वचषक स्पर्धा खेळली गेली.

श्रीगुरुजी Sat, 03/25/2017 - 10:15
आजपासून धर्मशाळा येथे ४ था कसोटी सामना सुरु झाला. कोहली व इशांत शर्मा च्या जागी भुवनेश्वर कुमार व चायनामन गोलंदाज कुलदीप यादव संघात आला आहे. ऑस्ट्रेलिया आतापर्यंत ८.३ षटकांत १ बाद ४५ आहे.

श्रीगुरुजी Sat, 03/25/2017 - 20:47
पहिला दिवस रंगतदार अवस्थेत संपला. ऑस्ट्रेलियाने १ बाद १४ वरून १ बाद १४४ पर्यंत मजल मारली होती. मालिकेत पहिल्यांदाच वॉर्नरला सूर सापडला होता. स्टिव्हन स्मिथ नेहमीप्रमाणेच भारताला नडत होता. १ बाद १४४ वरून अचानक पारडे फिरले. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देऊ लागली आणि दिवस संपताना ऑस्ट्रेलियाचा डाव ३०० वर संपला. पदार्पणाचा सामना खेळणार्‍या चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने वॉर्नर हा आपला पहिलाच बळी मिळविला व नंतर एकूण ४ बळी मिळवून पदार्पण दणक्यात साजरे केले. त्याचे हळू फिरक घेणारे चेंडू कांगारूंना समजत नव्हते. दिवसअखेर भारत नाबाद ० आहे. दुसरीकडे श्रीलंकेची आपल्याच देशात लिंबूटिंबू विरूद्ध वाईट अवस्था सुरूच आहे. दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटल्यानंतर आजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ५ बाद ३२४ धावा केल्यानंतर आता याक्षणी श्रीलंकेची अवस्था २३ षटकात ३ बाद ८७ इतकी वाईट आहे. बांगलाच्या फलंदाजांनी शेवटच्या ६ षटकात तब्बल ८३ धावा फटकावल्या. आपल्याच भूमीवर बांगलाकडून हरण्याची नामुष्की श्रीलंकेवर येण्याची दाट शक्यता आहे.

श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 15:32
सामना रोमहर्षक अवस्थेत आहे. भारताने कालच्या ६ बाद २४८ वरून सुरूवात करून उपाहारापर्यंत उर्वरीत सर्व गडी गमावून सर्वबाद ३३२ धावा केल्या. गोलंदाजांना बर्‍यापैकी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर ३२ धावांची छोटीशी परंतु महत्त्वपूर्ण आघाडी भारताला मिळाली. नेथन लॉयनने ५ बळी घेतले. या मालिकेतील पहिल्या कसोटीतील दुसर्‍या डावात ४, दुसर्‍या कसोटीतील पहिल्या डावात ८ आणि या कसोटीतील पहिल्या डावात ५ बळी मिळविलेला लॉयन या मालिकेत चांगलाच यशस्वी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाची दुसर्‍या डावाची सुरूवात वाईट झाली. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने ६ बाद १२० धावा केल्या असून ते फक्त ८८ धावांनी पुढे आहेत. उमेश यादवने सर्व कसोटीत वेगवान गोलंदाजी केलेली असून आतापर्यंत या मालिकेत त्याने १६ बळी मिळविले आहेत. भारत उद्या सामना जिंकेल असं दिसतंय. अर्थात ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने त्रास दिला व लक्ष्य २०० च्या पुढे नेले तर जिंकणे तितकेसे सोपे नसेल.

श्रीगुरुजी Tue, 03/28/2017 - 21:20
भारताने आज उपाहारापूर्वीच २ बाद १०६ धावा करून सामना व मालिका जिंकली. गेल्या काही वर्षातील इतर मालिकांच्या तुलनेत ही मालिका भारताला बर्‍यापैकी जड गेली. मालिकेतील पहिलाच कसोटी सामना गमावल्याने भारत दडपणाखाली होता. दुसर्‍या सामन्यातही ऑस्ट्रेलियाला जेमतेम १८७ धावांचे लक्ष्य मिळाल्याने सामना हरण्याची भीति होतीच. परंतु दुसरा सामना गोलंदाजांनी जिंकून दिल्याने दडपण गेले. या मालिकेत काही रोचक गोष्टी झाल्या. - के एल राहुलने ७ डावात फलंदाजी करून ६५.५० सरासरीने ३९३ धावा केल्या. ७ पैकी ६ डावात त्याने अर्धशतक केले, परंतु एकदाही त्याला शतक करता आले नाही. - विराट कोहली सर्व ५ डावात अपयशी ठरला. मुरली विजय ५ पैकी ४ डावात, अभिनव मुकुंद २ पैकी दोन्ही डावात अपयशी ठरला. रहाणेला एकच अर्धशतक करता आले (५२ धावा). इशांत शर्माने ३ कसोटीतील ६ डावात फक्त ३ बळी घेतले. त्याच्या तुलनेत जडेजाने ८ डावात २५, अश्विनने ८ डावात २१ व उमेश यादवने वेगवान स्विंग गोलंदाजी करताना ८ डावात १७ बळी घेतले. - ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने ८ डावांमध्ये एकदाच अर्धशतक केले (५७ धावा). उर्वरीत ७ डावातही त्याला फार धावा करता आल्या नाहीत. शॉन मार्शही १ डावाचा अपवाद वगळता मालिकेत अपयशी ठरला. रेनशॉने पहिल्या दोन्ही कसोटीत अर्धशतक केले होते. परंतु तो नंतर ढेपाळला. या सर्वांच्या तुलनेत स्टिव्हन स्मिथने मालिकेत सर्वाधिक ३ शतके करून ८ डावात ७१.२८ सरासरीने ४९९ धावा केल्या. आता ५ एप्रिलपासून आयपीएलचा तमाशा सुरू होईल व नंतर १ जून पासून इंग्लंडमध्ये ८ देशांची चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा सुरू होईल. आयुष्यात प्रथमच संपूर्ण कसोटी सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहण्याचे भाग्य लाभले. गहुंजे येथील सामन्यात भारताचा दारूण पराभव झालेला असला तरी सामन्याच्या स्मृती प्रदीर्घ काळ मनात राहतील.

श्रीगुरुजी गुरुवार, 02/23/2017 - 21:08
सकाळी लवकर उठून गहुंजेला निघालो. काही कारणाने अपेक्षित वेळेवर निघता आले नाही. त्यामुळे अंदाजे अर्धा तास उशीरा पोहोचलो. पण नंतर दिवसभर सामना पाहिला. सुरवातीपासूनच वॉर्नर व रेनशॉ अत्यंत संथ खेळत होते. खेळपट्टी पाटा वाटत होती. तरीही दोघे संथ खेळत होते. बराच वेळ प्रतिषटक धावगती २.५० च्या आसपास होती. उपाहारापूर्वी काही वेळ असताना नाबाद ८२ या धावसंख्येवर उमेश यादवच्या गोलंदाजीवर वॉर्नर त्रिफळाबाद झाला. त्याच्या बॅटला लागून चेंडू यष्ट्यांवर गेला. यादव चेंडू टाकत असताना मी दुर्बिणीतून खेळ पाहत होतो. दुर्बिणीतूनच वॉर्नरचा त्रिफळा उडालेला अगदी स्पष्ट दिसला. हा माझ्या दृष्टीने अविस्मरणीय क्षण आहे! वॉर्नर बाद झाल्यावर पुढील फलंदाज यायच्या आतच रेनशॉ देखील स्नायू दुखावल्यामुळे तात्पुरता निवृत्त झाला. त्यामुळे शॉन मार्श व कर्णधार स्टिव्हन स्मिथ हे दोन फलंदाज एकदमच खेळायला आहे. उपाहाराला १ बाद ८४ अशी धावसंख्या होती. उपाहारानंतर पुन्हा एकदा संथ खेळ सुरू झाला. काही वेळातच शॉन मार्श स्वीप मारण्याच्या प्रयत्नात बॅकवर्ड शॉर्टलेगला कोहलीच्या हातात झेल देऊन बाद झाला. ही विकेट देखील मी दुर्बिणीतून पाहत असतानाच पडली. नंतर काही वेळाने पीटर हॅन्ड्सकॉम्ब व स्टिव्हन स्मिथ बाद झाले. उपाहाराला ऑसीज ४ बाद १४९ होते. उपाहारानंतर भराभर विकेट्स पडायला सुरूवात झाली. आधी शॉन मार्श, नंतर मॅथ्यू वेड व नंतर रेनशॉ बाद झाले. तत्पूर्वी रेनशॉने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. काही वेळाने उमेश यादवच्या एका चेंडूवर उडालेला ओ'कॅफीचा झेल साहाने उजव्या बाजूला हवेत झेपावत एका हातात घेतला व एक अत्यंत उत्कृष्ट झेल याचि देही याचि डोळा बघितल्याचे भाग्य लाभले. यादवच्या पुढच्याच चेंडूवर लॉयन पायचित झाला व उमेश यादवला हॅटट्रिकची संधी मिळाली. यावेळी ऑसीज ९ बाद २०५ अशा अवघड परिस्थितीत होते. परंतु त्याचा पुढील चेंडू हॅझलवूडने नीट खेळून हॅटट्रिक वाचविली. त्यावेळी पावणेचार वाजले होते व खेळ संपायला अजून ४५ मिनिटे होती. काही वेळातच १० गडी बाद होऊन आपल्याला आजच भारताची फलंदाजी बघायला मिळणार असे वाटत असतानाचा मिचेल स्टार्क ने जोरदार हल्ला चढविला. भारताच्या फिरकी गोलंदाजांची धुलाई करताना त्याने ३ षटकार व ५ चौकारांच्या सहाय्याने जवळपास १०० च्या धावगतीने नाबाद अर्धशतक करून दिवस संपविला. खेळ थांबला तेव्हा ऑसीज ९ बाद २५६ या धावसंख्येवर होते. आता उद्या लवकरच भारताची फलंदाजी सुरु होईल अशी आशा आहे.

कपिलमुनी Fri, 02/24/2017 - 11:55
आज सामना बघायला आलो होतो , कोहली आउट झाल्यावर परत ऑफिसला आलो, उद्या मी आणि काही मिपाकर मॅच बघायला येणार आहोत.

In reply to by अभिजीत अवलिया

श्रीगुरुजी Fri, 02/24/2017 - 21:19
येणार असाल तर भेटू या. मी साऊथ लोअर स्टँडमध्ये आहे. ४ थ्या दिवसावर नक्की जाईल. बहुतेक ४ थ्या दिवशीच सामना संपेल.

बाळ सप्रे Fri, 02/24/2017 - 12:44
उद्या येइन म्हणतो गहुंजेला.. पुण्यातला पहिला एकदिवसीय सामना पाहिला होता प्रत्यक्ष .. तो पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच होता.. माझ्या दुर्दैवाने तो सामना भारताने गमावला होता.. इंग्लंडविरुद्धचा पुण्यातला सामना त्याच दिवशी मुंबई मॅरॅथॉन असल्याने प्रत्यक्ष पहाता आला नव्हता.. नेमका तो अविस्मरणीय झाला.. आता कसोटी सामनाही बघायचाय आयुष्यात प्रथमच.. यावेळी तरी कामगिरी सरस होवो ही इच्छा.. आत्ता तरी फार वाईट अवस्था आहे भारताची.. १०० च्या आत ५ गेले...

बाळ सप्रे Fri, 02/24/2017 - 13:16
संपलं.. १५०+ आघाडी ... लो स्कोअरींग सामन्यात.. ओ कीफच्या ३ विकेटनी सामना फिरवला..

श्रीगुरुजी Fri, 02/24/2017 - 13:36
Great atmosphere here although very thin crowd (approx. 7 k). Watched all wickets live. Wicket boomranged. Excellent catching by Aussies. India got out in just 40.2 overs. Warner is already gone. India will most probably lose this match.

फेरफटका Fri, 02/24/2017 - 20:56
केटी लागून क्रिटीकल ला विषय गेलेल्या ईंजिनीअरिंग च्या स्टुडंट च्या निष्ठेनं, डिटरमिनेशन नं आणी बुडाला आग लागल्या च्या भावनेनं खेळलो तरच ईभ्रत वाचेल आता. नाहीतर दुसरा उपाय म्हणजे सारसबागेतल्या गणपतीसमोर सामुदायिक रीत्या 'ओ पालनहारे' चा गजर करणे.

श्रीगुरुजी Fri, 02/24/2017 - 21:16
दुसरा दिवसही आनंदात गेला. आजच्या दिवसात एकूण १५ विकेट्स पडल्या. ऑस्ट्रेलियाने ९ बाद २०५ वरून स्टार्कच्या फक्त ६३ चेंडूतील ६१ धावांमुळे २६० ची मजल मारली. ऑस्ट्रेलियाला थोडक्यात गुंडाळण्याचा भारताचा आनंद फार काळ टिकला नाही. फलंदाजी सुरू झाल्यापासून के एल राहुल जोरदार फलंदाजी करीत होता. तो थोडासा नशीबवानही ठरला कारण त्याचे २-३ फटके स्लीपच्या डोक्यावरून किंवा दोन स्लीपमधून हवेतून पार झाले. दुसरीकडे १० धावा करून मुरली विजय हॅझलवूडच्या एका बाहेर जाणार्‍या चेंडूला बॅट लावून यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. पुजारा थोडा वेळ टिकला. पण दुसर्‍या हप्त्यात गोलंदाजीला आलेल्या स्टार्कच्या एका बाहेर जाणार्‍या चेंडूवर पुजारा देखील बॅट लावून यष्टीरक्षकाकडे सोपा झेल देऊन बाद झाला. सर्व प्रेक्षक फलंदाजीसाठी कोहलीची आतुरतेने वाट पहात होते. तो मैदानात येऊ लागल्यावर प्रेक्षक भयंकर चेकाळले व आरडाओरडा करून त्यांनी स्टेडिअम दणाणून सोडले. त्यात अर्थात मी सुद्धा होता. कोहलीने स्टार्कचा पहिला चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळून काढला. पुढच्या काहीशा खाली राहिलेल्या बाहेर जाणार्‍या चेंडूवर चेंडूच्या पुरेसे जवळ न जाता त्याने बॅट लावली व पहिल्या स्लीपमध्ये पीटर हॅन्ड्सकॉम्बने एक अत्यंत उत्कृष्ट लो कॅच घेतल्यावर सर्वांना दु:खाचा धक्का बसला. १ बाद ४४ वरून केवळ ३ चेंडूत भारत ३ बाद ४४ अशा अडचणीत आला. नंतर रहाणेने राहुलला बर्‍यापैकी साथ दिली. राहुलने आपले अर्धशतक झटपट पूर्ण केले. नंतर त्याने लागोपाठ २ चौकार मारून रहाणेबरोबर ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. भारत ३ बाद ९४. पुढच्या ओ'कीफ या डावखुर्‍या फिरकी गोलंदाजाचा एक चेंडू खेळताना त्याने तो लाँगऑनला उचलून मारण्याचा प्रयत्न करताना त्याचा खांदा दुखावला व चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागून डीप फाईन लेग व डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान उंच झेल उडाला. फटका मारल्याक्षणीच तो वेदनेने जमिनीवर कोसळला. दरम्यानच्या काळात कसलेला क्षेत्ररक्षक डेव्हिड वॉर्नर लांबून धावत आला आणि त्याने अचूक झेल पकडला. ४ बाद ९४. अश्विन ६ व्या क्रमांकावर खेळायला आला व त्याने पहिल्याच चेंडूवर १ धाव घेतली. ओ'कीफच्या पुढच्याच काहीश्या उसळलेल्या चेंडूवर रहाणेला आपली बॅट काढता आली नाही आणि पुन्हा एकदा पीटर हॅन्ड्सकॉम्बने एका बाजूला झेपावत एका हातात उत्कृष्ट झेल घेतला. झेल नीट घेतला की नाही याची पंचांनी तृतीय पंचांकडे विचारणा केली. रिप्लेमध्ये झेल अत्यंत अचूक जमिनीच्या वरच पकडल्याचे स्पष्ट दिसले आणि रहाणे १३ धावा करून परतला. ५ बाद ९५. आता साहा खेळायला आला. या षटकाचे अजून २ चेंडू शिल्लक होते. षटकात पहिल्या ४ चेंडूत २ बळी गेलेले होते. ६ व्या चेंडूवर साहाची बॅट चेंडूला लागली आणि झेल यष्टीरक्षकाच्या हाताला लागून पहिल्या स्लीपमध्ये स्टिव्हन स्मिथच्या हातात विसावला. एकाच षटकात ३ बळी घेऊन ओ'कीफने भारताचे कंबरडे मोडले. ६ बाद ९५. काय होत आहे यावर प्रेक्षकांचा विश्वासच बसत नव्हता. अवघ्या ४-५ मिनिटात हाराकिरी झाली होती. लॉयनच्या पुढच्या षटकाच अश्विनने एक चेंडू बॅकफूटवर खेळला. चेंडू बॅटच्या दांड्याला लागून त्याच्या बुटावर पडला व तिथून उडून फॉरवर्ड शॉर्टलेगच्या दिशेने उडाला. पुन्हा एकदा पीटर हॅन्ड्सकॉम्बने अगदी खाली लो कॅच उत्कृष्ट झेलला. भारत ७ बाद ९५. आता जयंत यादव आला. तो बर्‍यापैकी फलंदाजी करू शकतो. त्याने व जडेजाने पुढील २ षटके सावध फलंदाजी करून धावसंख्या ९८ पर्यंत नेली. ओ'कीफच्या पुढच्या षटकात पाय ताणून फ्रंटफूटवर खेळताना जयंत यादवचा मागील पाय किंचित क्रीजच्या पुढे गेला. पाय मागे येण्याच्या आतच यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने बेल्स उडविल्या. रिप्लेत दिसले की यादवचा मागील पाय रेषेपासून जेमतेम १ सेंटीमीटर अलिकडेच राहिला व तो यष्टीचित झाला. ८ बाद ९८. उमेश यादव फलंदाजीला आल्यावर ओ'कीफच्या पुढच्या षटकात जडेजाने त्याचा एक चेंडू बेजबाबदारपणे मिडविकेट बाऊंड्रीच्या दिशेने उचलला. तिथे उभा असलेल्या लंबूटांग स्टार्कने कोणतीही चूक न करता आरामात झेल पकडला. हा ओ'कीफचा ५ वा बळी. ९ बाद १०१. शेवटचा फलंदाज इशांत शर्मा. पुन्हा एकदा ओ'कीफच्याच गोलंदाजीवर उमेशने स्लीपमध्ये स्मिथच्या हातात सोपा झेल दिला. भारत सर्वबाद १०५. ओ'कीफने ६ बळी घेऊन आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली. त्याचे पृथक्करण होते १३.१-२-३५-६. त्याने फक्त २४ चेंडूत ६ बळी मिळवून भारताची दाणादाण उडवून दिली. फिरकी खेळणारा सर्वोत्कृष्ट संघ अशी भारताची ओळख आहे. परंतु भारताने फिरकी गोलंदाजासमोरच नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाने एकूण १५५ धावांचे जबरदस्त आधिक्य मिळविले. ऑस्ट्रेलियाचा डाव देखील सुरवातीस कोसळला. अश्विन व जडेजाने गोलंदाजीची सुरूवात करून काही वेळातच ३ बाद ६१ अशी पडझड केली. तीनही बळी अश्विनने घेतले. परंतु नंतर कर्णधार स्मिथ व रेनशॉने डाव सावरला. ११३ धावसंख्येवर जयंत यादवच्या गोलंदाजीवर लाँगऑफला षटकार मारताना रेनशॉचा इशांत शर्माने उत्कृष्ट झेल घेतला. ४ बाद ११३. परंतु त्यानंतर मिचेल मार्श व स्मिथने अजून विकेट न गमावता धावसंख्या १४३ पर्यंत नेली. आता ऑस्ट्रेलियाकडे २९८ धावांचे आधिक्य आहे व अजून ६ गडी बाद व्हायचे आहेत. एकंदरीत भारताची अवघड परिस्थिती आहे. ३५० धावांहून मोठे लक्ष्य असेल तर भारताला ते अवघड जाणार आहे. उद्या जर ऑस्ट्रेलियाने ४०० धावांच्या लक्ष्याचा टप्पा पार केला तर भारत सामना हरल्यातच जमा आहे. सामना बहुतेक ४ थ्या दिवशीच संपेल अशी चिन्हे आहेत. तसा खेळपट्टीत फारसा दम नाही. परंतु भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली.

In reply to by विशुमित

अभिजीत अवलिया Sat, 02/25/2017 - 15:21
निघाले असतील. सर्वबाद १०७. ३३३ धावांनी पराभव. आज टिकाव धरला असता तर उद्या जाणार होतो पोराला घेऊन मॅच बघायला. आता त्याची कशी समजूत घालायची ह्याचा विचार करतोय.

श्रीगुरुजी Sat, 02/25/2017 - 17:30
चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताचा ६ वा गडी बाद झाला होता व फक्त ९९ धावा फलकावर होत्या. त्यामुळे तेव्हाच घरी निघालो. चहापानाची २० मिनिटे थांबून नंतर दिवस संपेपर्यंत थांबण्याचा पेशन्स शिल्लक नव्हता. चहापान संपल्यावर जेमतेम २०-२२ मिनिटातच उर्वरीत ४ खेळाडू बाद होऊन भारताचा स्वतःच्या भूमीवर तब्बल ३३३ धावांनी अत्यंत लाजिरवाणा पराभव झाल्याचे नेटवर समजले आणि चहापानानंतर लगेच परत निघण्याचा अचूक निर्णय घेतल्याबद्दल स्वत:चीच पाठ थोपटली. इतक्या लाजिरवाण्या पराभवाचे आपण साक्षीदार असल्याचे वाईट वाटले. कांगारूंना कमी लेखणे व स्वतःबद्दल असलेला फाजील आत्मविश्वास यामुळे भारताचा जेमतेम पावणेतीन दिवसातच दारूण पराभव झाला. भारताचा पहिला डाव जेमतेम ४०.१ षटकात ३ तासात १०५ धावात संपला तर दुसरा डाव तर जेमतेम २ तासात ३३.५ षटकात १०७ धावात संपला. भारताने दोन्ही डाव मिळून जेमतेम ५ तास फलंदाजी केली व फक्त ७४ षटके खेळून २१२ धावा केल्या. मी दुर्बिणीतून पाहत असतानाच बहुतेक सर्व विकेट्स पडल्या. त्यामुळे बहुतेक सर्व विकेट्स अगदी जवळून प्रत्यक्ष बघता आल्या. विशेषतः दोन्ही डावात कोहलीला बाद होताना बघितले. दुसर्‍या डावात ओ'कीफचा काहीसा बाहेर पडलेला एक चेंडू स्टंपाबाहेरून निघून जाईल या समजूतीने कोहलीने दोन्ही हाताने बॅट उचलून धरून चेंडू सोडून दिला. त्याच्या दुर्दैवाने त्याचा अंदाज चुकला व चेंडू काहीसा आत येऊन त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त झाल्याचे पाहणे नशीबी आले. खरं तर तिथेच सामना संपला होता. पण आशा चिवट असते. म्हणून अजून थोडा वेळ थांबावे असा विचार केला. परंतु निराशाच पदरात पडली. नवोदीत डावखुरा गोलंदाज स्टिव्हन ओ'कीफ याने दोन्ही डावात ६ बळी घेऊन सामन्यात तब्बल १२ बळी मिळवून सामनावीराचा पुरस्कार मिळविला. त्याला नेथन लॉयनने पहिल्या डावात १ व दुसर्‍या डावात ४ बळी घेऊन उत्तम साथ दिली. स्टार्कने पहिल्या डावात केवळ ३ चेंडूत पुजारा व कोहलीला बाद करताना फलंदाजीत पहिल्या डावात ६३ चेंडूत ६१ व दुसर्‍या डावात ३१ चेंडूत ३० असे वेगवान डाव खेळले. त्याने दोन्ही डावात ३-३- षटकार मारले. रेनशॉने पहिल्या डावात ६८ तर दुसर्‍या डावात ३१ धावा केल्या. कर्णधार स्टीव्हन स्मिथने पहिल्या डावात २७ धावाच केल्या, पण दुसर्‍या डावात शतक झळकावले. भारताची गोलंदाजी तशी चांगली झाली. उमेश यादव, अश्विन व जडेजाने दोन्ही डावात चांगली गोलंदाजी करून भरपूर बळी मिळविले. परंतु फलंदाजीत राहुलच्या पहिल्या डावातील ६१ धावांचा अपवाद वगळला तर इतरांनी नुसत्या पाट्या टाकल्या. २००४ नंतर तब्बल १३ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथमच भारतात कसोटी सामना जिंकला. २००४ ची भारतात खेळली गेलेली ४ सामन्यांची मालिका भारत १-२ असा हरला होता. यावेळी त्याचीच पुनरावृत्ती होते की काय ही भयशंका मनात डोकावत आहे. आता भारताला पुढील ३ कसोटींपैकी एकही न हरता किमान २ सामने जिंकावे लागतील. पुढील कसोटी सामना ४ मार्चला बंगळुरात आहे. ५ दिवसांच्या तिकिटापैकी सव्वा दोन दिवसांचे तिकीट वाया गेले. तिकिटाचे पैसे आता कोण भरून देणार?

In reply to by श्रीगुरुजी

अभिजीत अवलिया Sat, 02/25/2017 - 20:02
समजा एखाद्या व्यक्तीने फक्त ४थ्या किंवा ५व्या दिवसाचे तिकीट काढले असते तर अशा केस मध्ये पैसे परत मिळतात का?

In reply to by अभिजीत अवलिया

गणामास्तर Mon, 02/27/2017 - 14:21
हो मिळतात. बुकमायशो वाल्यांचा त्याच दिवशी रात्री मेल आला कि रविवारच्या तिकिटाचे पैसे ८ दिवसांत अकाउंटला जमा होतील म्हणून.

श्रीगुरुजी Sat, 03/04/2017 - 15:16
आजपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुसरा कसोटी सामना बंगळूर येथे सुरू झाला. भारताने संघात २ बदल केले आहेत. सलामीवीर मुरली विजयच्या जागी अभिनव मुकुंद व जयंत यादवच्या जागी त्रिशतकवीर करूण नायरला संघात घेतले. ऑस्ट्रेलियाने पुण्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे. मुरली विजयच्या जागी अभिनव मुकुंदला आणल्याने भारतीय संघाच्या कामगिरीत शून्य फरक पडला. संघाची धावसंख्या जेमतेम ११ असताना मुकुंद शून्यावर बाद झाला. मागील १-२ वर्षांपासून सलामीची जोडी ही भारताची प्रमुख समस्या आहे. गेल्या २ वर्षात खेळल्या गेलेल्या बहुतेक सामन्यात सलामीच्या जोडीचा किमान एक फलंदाज स्वस्तात बाद झालेला आहे. किंबहुना भारतीय सलामीच्या जोडीने यापूर्वी किमान अर्धशतकी भागीदारी मागील २ वर्षात किती वेळा केली हा संशोधननाचा विषय आहे. मुरली विजय, राहुल, पार्थिव पटेल, गौतम गंभीर, अभिनव मुकुंद असे सलामीसाठी अनेक प्रयोग करून झाले. परंतु भारताला भक्कम सुरूवात देणारी सलामीची जोडी अजून मिळालेली नाही. काही वेळाने पुजारा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने फक्त १७ धावा केल्या. त्यापाठोपाठ कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. फिरकी गोलंदाज नेथन लॉयनचा एक चेंडू खूप वळून लेगस्टंपबाहेर जाईल हे गृहित धरून त्याने चेंडू न खेळता बॅट वर करून सोडून दिला. त्याच्या दुर्दैवाने चेंडू थोडासाच वळून त्याच्या पायांवर चेंडू आदळला त्यावेळी त्याचा पाय अगदी मधल्या यष्टीसमोर होता. त्यामुळे पंचांना त्याला पायचित बाद द्यायला जराही कष्ट पडले नाहीत. मागील सामन्यातील दुसर्‍या डावात ओ'कीफचा चेंडू वळणार नाही अशा समजूतीने त्याने सोडून दिला होता, परंतु तो चेंडू थोडा वळून आत आला व कोहलीच्या ऑफस्टंपवर जाऊन आदळला होता. म्हणजे लागोपाठ दुसर्‍य डावात कोहलीचा फिरकीचा अंदाज चुकला. कोहलीने ३ डावात ०, १३ व १२ अशा धावा केल्या आहेत. नंतर रहाणे आला आणि थोड्याच वेळात तोही १७ वर यष्टीचित झाला. रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला. पुढील डावातही रहाणे अपयशी ठरला तर बहुतेक तो संघाबाहेर जाईल कारण रहाणे मागील १०-१२ डावात एक अर्धशतक वगळता पूर्ण अपयशी ठरला आहे. भारत ४ बाद ११८. त्यातले ३ बळी लॉयनचे. त्यानंतर स्थानिक खेळाडू करूण नायर आला. इंग्लंडविरूद्ध त्रिशतक करूनसुद्धा रहाणेला आत आणण्यासाठी त्याला नंतरच्या सामन्यात वगळण्यात आले होते. दुसरीकडे दुसरा स्थानिक खेळाडू के एल राहुल चांगली फलंदाजी करून धावा वाढवित होता. त्याने अर्धशतकही पूर्ण केले होते. करूण नायर बर्‍यापैकी खेळत असताना तो ओ'कीफच्या गोलंदाजीवर २६ धावांवर यष्टीचित झाला. एकंदरीत फिरकी गोलंदाजी खेळण्यामध्ये दादा समजले जाणारे भारतीय फलंदाज भारतातच फिरकीसमोर फसत आहेत. ५ बाद १५६. नंतर अश्विन आला आणि गेला. त्यापाठोपाठ वॄद्धिमान साहा आला आणि गेला. त्यानंतर आलेला जडेजा देखील हजेरी लावून परतला. आता भारताची अवस्था ८ बाद १८८ अशी दारूण आहे. यावेळी फिरकी गोलंदाज नेथन लॉयन याने ६ बळी घेतले आहेत. भारताची परिस्थिती अत्यंत अवघड आहे. एकटा राहुल नाबाद ८९ धावांवर झुंज देत आहे. उर्वरीत सर्व फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत.

श्रीगुरुजी Sat, 03/04/2017 - 15:24
संपला डाव. भारत सर्वबाद १८९. नेथन लॉयनची २२.२-४-५०-८ अशी अफलातून कामगिरी. १८९ मधील ९० धावा एकट्या राहुलच्या. उर्वरीत १० जणांनी मिळून ८३ धावा केल्या व १६ धावा अतिरिक्त. पुण्यातील कहाणीचा पुढील अंक बंगळूरमध्ये सुरू.

श्रीगुरुजी Sat, 03/04/2017 - 23:38
दिवसअखेर भारत सर्वबाद १८९ तर ऑसीज नाबाद ४०. पहिल्याच दिवशी भारताची वाट लागली आहे. हा सामना जर भारत हरला तर मालिका हरल्यातच जमा आहे. भारताची संघनिवड चुकत आहे. वृद्धिमान साहाऐवजी पार्थिव पटेल हवा होता. त्याच्यामुळे एक डावखुरा फलंदाज मिळतोच पण एक सलामीचा फलंदाजही मिळतो. इशांत शर्मा गोलंदाजी व फलंदाजी या दोन्हीतही निष्प्रभ आहे. त्याच्याऐवजी भुवनेश्वर कुमार हवा होता. भुवनेश्वर कुमार बर्‍यापैकी फलंदाजीही करतो. अजिंक्य रहाणेऐवजी कुलदीप यादव हा डावरा लेगस्पिन गोलंदाज संघात आल्यास एक वेगळ्या पद्धतीचा गोलंदाज संघात येऊन ५ व्या गोलंदाजाचा फायदा होईल. निदान पुढील २ कसोटीसाठी तरी योग्य ते बदल व्हावेत.

श्रीगुरुजी Tue, 03/07/2017 - 12:30
भारत जिंकण्याची शक्यता मला फारच कमी वाटत आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी करून मालिकेच्या आधीच्या तीनही डावात किमान २६० धावा केल्या आहेत. ही खेळपट्टी चमत्कारिक वाटते. भारताच्या पहिल्या डावात ९ फलंदाज फिरकी गोलंदाजांनी बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ८ फलंदाज फिरकी गोलंदाजांनी बाद केले. भारताच्या दुसर्‍या डावात फिरकी गोलंदाजांना फक्त दोनच बळी मिळाले पण वेगवान गोलंदाजांनी ८ गडी बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावात भारताचे फिरकी गोलंदा़ज यशस्वी ठरतात का मध्यमगती गोलंदाज हे सांगता येणे अवघड आहे. तसेही १८८ हे फार मोठे लक्ष्य नाही. भारताची फलंदाजी दयनीय अवस्थेत आहे. गेल्या २-३ वर्षांपासून भारताला भरवशाची सलामीची जोडी मिळालेली नाही. मुरली विजय, राहुल, धवन, गंभीर, पार्थिव पटेल, अभिनव मुकुंद असे अनेक प्रयोग सलामीसाठी केले गेले. सलामीच्या जोडीपैकी किमान एक फलंदाज चटकन बाद होतो. मागील २-३ वर्षात भारताच्या सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी केल्याची अगदी दुर्मिळ उदाहरणे सापडतील. कोहलीचे या मालिकेतील अपयश चिंताजनक आहे. मागील ४ डावात त्याने ४,१३, १२ व १५ अशा ४० धावा केल्या आहेत. जडेजा व अश्विन सर्व सामन्यात अपयशी ठरले आहेत. रहाणेने फक्त १ अर्धशतक केले. मुरली विजय व मुकुंद सर्व डावात अपयशी आहेत. पुजाराच्या आजच्या ९२ धावा सोडल्या तर तोही साहाच्या आजच्या नाबाद २० धावा सोडल्या तर तोसुद्धा अपयशी आहे. एकट्या राहुलने ४ पैकी ३ डावात अर्धशतक केले आहे. गोलंदाजांची व संघाची निवडही चुकत आहे. इशांत शर्माचा फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात फारसा उपयोग नाही. त्याच्याऐवजी भुवनेश्वर कुमार हवा होता. तसेच संघात कुलदीप यादव हा अजून एक चायनामन फिरकी गोलंदाज हवा होता. सलामीसाठी व यष्टीरक्षक म्हणून सुद्धा पार्थिव पटेलला पुन्हा संघात आणल्यास उपयोग होईल. भारताला डीआरएसचा नीट वापर करता येत नाही असे दिसत आहे. आतापर्यंत भारताने फलंदाजी व गोलंदाजी करताना डीआरएसच्या बहुतेक सर्व संधी वाया घालविल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावात पहिल्या ४ षटकात नाबाद २२ धावा आहेत. त्यात ८ बाय धावांचा समावेश आहे. जिंकण्यासाठी आता फक्त १६६ धावा हव्या आहेत. बहुतेक आजच सामना संपेल. एकंदरीत भारतीय भूमीवर भारताच्या सामर्थ्याचा फुगा फुटत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद_१९८२ Tue, 03/07/2017 - 13:01
भारताची फलंदाजी दयनीय अवस्थेत आहे. सहमत श्रीगुरुजी, आजच्या दिवशी फक्त ३६ धावांच्या बदल्यात भारताचे सहा फलंदाज बाद झाले, अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे ही.

प्रसाद_१९८२ Tue, 03/07/2017 - 15:42
अभिनंदन, भारतीय गोलंदाजांचे, खासकरुन आर आश्विनचे. अगदी भेदक गोलंदाजी केली त्याने आज. ४१/६

श्रीगुरुजी Wed, 03/15/2017 - 20:55
उद्यापासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रांची येथे सुरू होत आहे. गहुंजेप्रमाणे रांची येथे प्रथमच कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे ५ दिवसांच्या सामन्यात खेळपट्टी कसे रंग दाखवेल हे सांगता येणे अवघड आहे. नवीन खेळपट्टी असल्याने दोन्ही संघ नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजीचाच निर्णय घेतील असे वाटते. पहिल्या दोन सामन्यानंतर मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. पहिला सामना शांततेत पार पडला असला तरी दुसर्‍या सामन्यात डीआरएस व बाचाबाची यामुळे वाद निर्माण झाले होते. विशेषतः स्टीव्हन स्मिथने डीआरएस मागण्याआधी ड्रेसिंग रुमकडे बघून डीआरएस बद्दल अंदाज घ्यायचा प्रयत्न करणे, इशांत शर्माने तोंड वेडेवाकडे करून स्टीव्हन स्मिथची नक्कल करणे अशा गोष्टींमुळे वातावरण बिघडायला सुरूवात झाली आहे. भारत प्रथमच डीआरएसचा वापर करीत आहे व ते तंत्र भारताला फारसे जमलेले नाही. भारताने मागितलेले बहुतेक रिव्ह्यू भारताविरूद्धच गेले. भारताकडून कोहली व ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नर अपयशी ठरत आहे. ते पुन्हा एकदा भरात यावेत अशी अपेक्षा आहे. स्टार्क व मिचेल मार्श दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले असून ऑस्ट्रेलियाला त्यामुळे धक्का बसलेला आहे. स्टार्कऐवजी पॅट कमिन्सला आणले आहे व मार्शऐवजी मार्कस स्टॉईनिस संघात आला आहे. स्टार्कने गोलंदाजी व फलंदाजीतही भारताला वैताग आणला होता. उद्याचा कसोटी सामना हा ऑस्ट्रेलियाचा ८०० वा कसोटी सामना असणार आहे. स्टिव्हन स्मिथला आपल्या ५००० धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ७६ धावांची गरज आहे. पॅट कमिन्स आपला पदार्पणाचा कसोटी सामना २०११ मध्ये आफ्रिकेविरूद्ध खेळला होता. त्यात त्याने पहिल्या डावात १ व दुसर्‍या डावात ६ बळी घेतले होते. तब्बल ६ वर्षांच्या खंडानंतर तो पुन्हा कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे. भारतीय संघात एकमेव बदल होण्याची शक्यता आहे, तो म्हणजे अभिनव मुकुंदच्या जागी मुरली विजय पुन्हा संघात येऊ शकतो. बघूया उद्या काय होतंय ते.

विशुमित गुरुवार, 03/16/2017 - 10:11
कांगारूनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे. रेनशॉ ने धडाकेबाज सुरवात केली आहे. मला व्यक्तिशः हा खेळाडू खूप आवडला आहे.

श्रीगुरुजी गुरुवार, 03/16/2017 - 14:18
चहापानापर्यंत ऑसीज ४ बाद १९४. स्टिव्हन स्मिथ ८० वर नाबाद आहे. तो मालिकेतील दुसरे शतक करण्याच्या मार्गावर आहे. डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा १९ धावांवर बाद होऊन अपयशी ठरला. रेनशॉने पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करून ४४ धावा केल्या. यादवने २ तर जडेजा व अश्विनने प्रत्येकी १ बळी घेतला. इशांत शर्माला अजून बळी मिळालेला नाही. एकंदरीत इशांत शर्माऐवजी भुवनेश्वर किंवा शमी जास्त उपयोगी ठरला असता.

श्रीगुरुजी गुरुवार, 03/16/2017 - 20:55
पहिल्या दिवसाखेर ऑसीजने ४ बाद २९९ अशी भक्कम मजल मारलेली आहे. स्मिथने मालिकेतील दुसरे शतक केले. तो ११७ धावांवर नाबाद आहे तर ग्लेन मॅक्सवेल ८२ वर नाबाद आहे. स्टिव्हन स्मिथ भारताला कायमच नडत आला आहे. भारताविरूद्ध त्याने खेळलेल्या मागील ७ कसोटीत (या कसोटीसहित) त्याने एकूण ६ शतके केली आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने चारही सामन्यात शतक केले होते. या मालिकेतील पहिल्या कसोटीत आणि आजच्या कसोटीतही त्याने शतक केले आहे. अशीच फलंदाजी सुरू राहिली तर ऑस्ट्रेलिया उद्या किमान ४५० पर्यंत मजल मारू शकेल. क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीचा खांदा दुखावला आहे. त्यामुळे तो नंतर दिवसभर क्षेत्ररक्षणाला आला नाही. आज संध्याकाळी त्याच्या उजव्या खांद्याचे स्कॅनिंग होणार आहे. त्याची दुखापत कितपत गंभीर आहे ते उद्या सकाळीच समजेल. तो उद्या फलंदाजीसाठी तंदुरूस्त झाला तरी बराच वेळ मैदानाबाहेर असल्याने त्याला भारताचे किमान ५ फलंदाज बाद झाल्याशिवाय फलंदाजीला येता येणार नाही. जर त्याची दुखापत गंभीर असेल तर त्याला या कसोटीत फलंदाजी करता येणार नाही व ऑस्ट्रेलियाच्या धावांच्या डोंगरासमोर त्याच्याशिवाय भारत अत्यंत अडचणीत सापडू शकेल.

श्रीगुरुजी Sat, 03/18/2017 - 15:21
राहुलने या मालिकेत ५ डावातील ४ थे अर्धशतक केले. प्रथमच तो इतक्या जबाबदारीने व सातत्याने खेळताना दिसत आहे. मुरली विजयने पुनरागमन करताना चांगली फलंदाजी करून अर्धशतक केले. पुजाराला सूर गवसला आहे. मागील डावात तो ९२ वर बाद झाल्याने त्याचे शतक हुकले होते. मात्र या डावात त्याने नाबाद शतक केले आहे. या मालिकेत भारतातर्फे झालेले हे पहिलेच शतक. कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. ६ वर असताना स्लिपमध्ये झेल देऊन तो बाद झाला. आतापर्यंत झालेल्या ५ डावात त्याने फक्त ४६ धावा केल्या आहेत (सर्वाधिक १५). क्रिकेटरसिकांची त्याने घोर निराशा केली आहे. पाच डावात तो वेगवेगळ्या पाच गोलंदाजांच्या गोलंदाजीवर बाद झाला. रहाणे सुद्धा पुन्हा एकदा अपयशी ठरला. मागील कसोटीतील दुसर्‍या डावात केलेल्या ५२ धावांचा अपववाद वगळता इतर ४ डावात तो अपयशी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ४५१ धावांना उत्तर देताना भारत ५ बाद ३२० अशा चांगल्या स्थितीत आहे. खेळपट्टीचा रागरंग बघता हा सामना अनिर्णित होण्याचीच जास्त शक्यता दिसते. दुसरीकडे मायदेशात बांगलादेशाविरूद्ध खेळताना दुसर्‍या कसोटीत श्रीलंका अडचणीत आहे. आज चौथ्या दिवशी श्रीलंकेची अवस्था ६ बाद २०६ इतकी वाईट आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात ३३८ अशी बर्‍यापैकी धावसंख्या रचलेली होती. परंतु बांगलादेशने पहिल्या डावात ४६७ धावा करून १२९ धावांची आघाडी मिळविली. सध्या श्रीलंकेकडे फक्त ७७ धावांची आघाडी असून त्यांचे ६ फलंदाज बाद झाले आहेत व सामन्याच्या उद्याचा दिवस शिल्लक आहे. जर हा सामना बांगलाने जिंकला तर परदेशात मोठ्या संघाविरूद्ध मिळविलेला हा खर्‍या अर्थाने त्यांचा पहिलाच विजय असेल (तसे त्यांनी काही वर्षांपूर्वी वेस्ट इंडीजमध्ये यजमानांवर २-० अशी मात केली होती. परंतु त्यावेळी विंडीजच्या सर्व प्रमुख खेळाडूंनी बहिष्कार टाकल्याने विंडीजला पूर्णपणे दुय्यम संघ खेळवावा लागला होता.).

श्रीगुरुजी Sat, 03/18/2017 - 23:36
भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना अनिर्णिततेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दुसरीकडे श्रीलंका वि. बांगलादेश सामना अत्यंत चुरशीचा झाला आहे. चौथ्या दिवसाखेर श्रीलंकेकडे १३९ धावांचे आधिक्य असून त्यांचे ८ गडी बाद झाले आहेत. उद्या पाचव्या दिवशी जर श्रीलंकेने १ तास खेळून १६० च्या पुढचे लक्ष्य ठेवले तर ते बांगलादेशाला जड जाण्याची शक्यता आहे कारण बांगलादेशाचा दुसर्‍या डावातील फलंदाजीचा इतिहास अत्यंत केविलवाणा आहे. तिसरीकडे द. आफ्रिकेने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर हरवून सध्या आपणच कसोटीत प्रथम क्रमांकाचे आहोत हे सिद्ध केले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलियाचा हरविले होते. दुसर्‍या देशात सर्वाधिक विजय मिळविणार्‍या देशांमध्ये आफ्रिका प्रथम क्रमांकावर आहे.

अभिजीत अवलिया Sun, 03/19/2017 - 13:36
आता भारताने २६ धांवाची आघाडी घेतलेली आहे आणी अजूनही ४ गडी बाद व्हायचे आहेत. मला वाटते समजा आपली आघाडी १००-१२५ च्या पुढे गेली तर भारत कदाचित जिंकू शकेल हा सामना.

In reply to by अभिजीत अवलिया

गामा पैलवान Sun, 03/19/2017 - 18:45
सहमत. बक्कीने दीडशेची आघाडी घेतली. मला दोनशेची अपेक्षा होती. पण ठीकाय. कोहलीने साताठ षटके खेळायला लावून दोन गडी उचलले ते चांगलं केलं. आता आघाडी सव्वाशेच्या आसपास आहे. ती संपायच्या आंत पाहुण्यांना उखडायचे डावपेच तयार असतीलंच. -गा.पै.

आषाढ_दर्द_गाणे Sun, 03/19/2017 - 23:11
उद्याचा पहिल्या सत्राचा खेळ पाहण्याचा बेत करतोय. पण खेळपट्टी कदाचित दुपार संध्याकाळी जास्त रंग दाखवेल असं वाटतंय. हि कसोटी स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावर वाचवलीन तर स्मिथला 'मानला'. त्याचं तंत्र आणि शैली अजिबात आवडत नसले तरी.

श्रीगुरुजी Mon, 03/20/2017 - 14:21
५ व्या दिवशी पटापट बली मिळवून भारत सामना जिंकेल असे वाटले होते. त्या दृष्टीने आज सकाळच्या सत्रात स्टिव्हन स्मिथ व रेनशॉ यांचे बळी मिळवून भारताने ऑस्ट्रेलियाला उपाहारापूर्वीच ४ बाद ६३ असे अडचणीत टाकले होते. त्यावेळी ऑसीज ८९ धावांनी मागे होते. परंतु उपाहार ते चहापान हे संपूर्ण सत्र पीटर हॅन्ड्सकॉम्ब (नाबाद ४४) आणि शॉन मार्श (नाबाद ३८) यांनी सहज खेळून काढून नाबाद ८६ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला ४ बाद १४९ वर नेऊन अडचणीतून बाहेर काढले. ऑस्ट्रेलिया अजूनही ३ धावांनी मागे आहेत. परंतु सामन्याचे शेवटचे दोन तासच शिल्लक आहेत. चहापानानंतर पुढील १ तासात जर भारताने ऑस्ट्रेलियाचे उर्वरीत ६ गडी बाद केले तरच भारताला सामना जिंकण्याची संधी आहे. अन्यथा सामना अनिर्णित राहण्याचीच दाट शक्यता दिसते. आता मालिकेतील चौथा व शेवटचा कसोटी सामना धर्मशाळा येथे शनिवारी २५ मार्चला सुरू होईल. तो सामना २९ मार्चपर्यंत चालेल. नंतर लगेच ४ एप्रिलपासून आयपीएलचा तमाशा सुरू होईल व तो दीड महिना चालेल. नंतर लगेच १ जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही टॉपच्या ८ संघामध्ये एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा सुरू होईल. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी ८ व्या क्रमांकावर बांगलाचा संघ असून विंडीज ९ व्या क्रमांकावर असल्याने या स्पर्धेसाठी पात्र ठरलेले नाही. भारत या स्पर्धेत २००० मध्ये उपविजेता, २००२ मध्ये श्रीलंकेसह संयुक्त विजेता व २०१३ मध्ये विजेता होता. साधारणपणे दर दोन वर्षानंतर होणारी ही स्पर्धा ४ वर्षांच्या खंडानंतर ही स्पर्धा खेळली जात आहे कारण २०१४ व २०१६ मध्ये ट-२० विश्वचषक स्पर्धा खेळली गेली तर २०१५ मध्ये ११ वी विश्वचषक स्पर्धा खेळली गेली.

श्रीगुरुजी Sat, 03/25/2017 - 10:15
आजपासून धर्मशाळा येथे ४ था कसोटी सामना सुरु झाला. कोहली व इशांत शर्मा च्या जागी भुवनेश्वर कुमार व चायनामन गोलंदाज कुलदीप यादव संघात आला आहे. ऑस्ट्रेलिया आतापर्यंत ८.३ षटकांत १ बाद ४५ आहे.

श्रीगुरुजी Sat, 03/25/2017 - 20:47
पहिला दिवस रंगतदार अवस्थेत संपला. ऑस्ट्रेलियाने १ बाद १४ वरून १ बाद १४४ पर्यंत मजल मारली होती. मालिकेत पहिल्यांदाच वॉर्नरला सूर सापडला होता. स्टिव्हन स्मिथ नेहमीप्रमाणेच भारताला नडत होता. १ बाद १४४ वरून अचानक पारडे फिरले. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देऊ लागली आणि दिवस संपताना ऑस्ट्रेलियाचा डाव ३०० वर संपला. पदार्पणाचा सामना खेळणार्‍या चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने वॉर्नर हा आपला पहिलाच बळी मिळविला व नंतर एकूण ४ बळी मिळवून पदार्पण दणक्यात साजरे केले. त्याचे हळू फिरक घेणारे चेंडू कांगारूंना समजत नव्हते. दिवसअखेर भारत नाबाद ० आहे. दुसरीकडे श्रीलंकेची आपल्याच देशात लिंबूटिंबू विरूद्ध वाईट अवस्था सुरूच आहे. दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटल्यानंतर आजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ५ बाद ३२४ धावा केल्यानंतर आता याक्षणी श्रीलंकेची अवस्था २३ षटकात ३ बाद ८७ इतकी वाईट आहे. बांगलाच्या फलंदाजांनी शेवटच्या ६ षटकात तब्बल ८३ धावा फटकावल्या. आपल्याच भूमीवर बांगलाकडून हरण्याची नामुष्की श्रीलंकेवर येण्याची दाट शक्यता आहे.

श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 15:32
सामना रोमहर्षक अवस्थेत आहे. भारताने कालच्या ६ बाद २४८ वरून सुरूवात करून उपाहारापर्यंत उर्वरीत सर्व गडी गमावून सर्वबाद ३३२ धावा केल्या. गोलंदाजांना बर्‍यापैकी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर ३२ धावांची छोटीशी परंतु महत्त्वपूर्ण आघाडी भारताला मिळाली. नेथन लॉयनने ५ बळी घेतले. या मालिकेतील पहिल्या कसोटीतील दुसर्‍या डावात ४, दुसर्‍या कसोटीतील पहिल्या डावात ८ आणि या कसोटीतील पहिल्या डावात ५ बळी मिळविलेला लॉयन या मालिकेत चांगलाच यशस्वी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाची दुसर्‍या डावाची सुरूवात वाईट झाली. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने ६ बाद १२० धावा केल्या असून ते फक्त ८८ धावांनी पुढे आहेत. उमेश यादवने सर्व कसोटीत वेगवान गोलंदाजी केलेली असून आतापर्यंत या मालिकेत त्याने १६ बळी मिळविले आहेत. भारत उद्या सामना जिंकेल असं दिसतंय. अर्थात ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने त्रास दिला व लक्ष्य २०० च्या पुढे नेले तर जिंकणे तितकेसे सोपे नसेल.

श्रीगुरुजी Tue, 03/28/2017 - 21:20
भारताने आज उपाहारापूर्वीच २ बाद १०६ धावा करून सामना व मालिका जिंकली. गेल्या काही वर्षातील इतर मालिकांच्या तुलनेत ही मालिका भारताला बर्‍यापैकी जड गेली. मालिकेतील पहिलाच कसोटी सामना गमावल्याने भारत दडपणाखाली होता. दुसर्‍या सामन्यातही ऑस्ट्रेलियाला जेमतेम १८७ धावांचे लक्ष्य मिळाल्याने सामना हरण्याची भीति होतीच. परंतु दुसरा सामना गोलंदाजांनी जिंकून दिल्याने दडपण गेले. या मालिकेत काही रोचक गोष्टी झाल्या. - के एल राहुलने ७ डावात फलंदाजी करून ६५.५० सरासरीने ३९३ धावा केल्या. ७ पैकी ६ डावात त्याने अर्धशतक केले, परंतु एकदाही त्याला शतक करता आले नाही. - विराट कोहली सर्व ५ डावात अपयशी ठरला. मुरली विजय ५ पैकी ४ डावात, अभिनव मुकुंद २ पैकी दोन्ही डावात अपयशी ठरला. रहाणेला एकच अर्धशतक करता आले (५२ धावा). इशांत शर्माने ३ कसोटीतील ६ डावात फक्त ३ बळी घेतले. त्याच्या तुलनेत जडेजाने ८ डावात २५, अश्विनने ८ डावात २१ व उमेश यादवने वेगवान स्विंग गोलंदाजी करताना ८ डावात १७ बळी घेतले. - ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने ८ डावांमध्ये एकदाच अर्धशतक केले (५७ धावा). उर्वरीत ७ डावातही त्याला फार धावा करता आल्या नाहीत. शॉन मार्शही १ डावाचा अपवाद वगळता मालिकेत अपयशी ठरला. रेनशॉने पहिल्या दोन्ही कसोटीत अर्धशतक केले होते. परंतु तो नंतर ढेपाळला. या सर्वांच्या तुलनेत स्टिव्हन स्मिथने मालिकेत सर्वाधिक ३ शतके करून ८ डावात ७१.२८ सरासरीने ४९९ धावा केल्या. आता ५ एप्रिलपासून आयपीएलचा तमाशा सुरू होईल व नंतर १ जून पासून इंग्लंडमध्ये ८ देशांची चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा सुरू होईल. आयुष्यात प्रथमच संपूर्ण कसोटी सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहण्याचे भाग्य लाभले. गहुंजे येथील सामन्यात भारताचा दारूण पराभव झालेला असला तरी सामन्याच्या स्मृती प्रदीर्घ काळ मनात राहतील.

भारत वि. ऑस्ट्रेलिया ४ कसोटी सामन्यांची मालिका

उद्यापासून भारतात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाविरूद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना गहुंजे (पुणे) येथे गुरूवार २३ फेब्रु ते सोमवार २७ फेब्रु या कालावधीत खेळला जाईल. मी गहुंजे येथील पहिला कसोटी सामना बघण्यास जाणार आहे. जमल्यास तिथूनच किंवा नंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर सामन्याविषयी लिहीन व काही फोटोही टाकेन.

सूपरबोल - रामायण आणी महाभारत

फेरफटका ·

In reply to by राघवेंद्र

संदीप डांगे Mon, 02/06/2017 - 23:34
हे सर्वात प्रखर राष्ट्रवादी उत्तर आहे. ह्यात कोणताही उपरोध नाही. भारतात जर लोक एखाद्या खेळापे़क्षा (ज्याचा मनोरंजन सोडून काही उपयोग नाही) निवडणूक प्रक्रियेला (ज्याचा मनोरंजनासोबत इतरही अनेक महत्त्वाचे उपयोग आहेत) जास्त महत्त्व देत असतील तर अभिमानाचीच गोष्ट आहे.

In reply to by संदीप डांगे

स्रुजा Mon, 02/06/2017 - 23:54
बाकी सगळं ठीक आहे पण खेळाचा मनोरंजन सोडून काही उपयोग नाही हे पटलेलं नाही. अशाच विचारसरणीमुळे अजुनही आपल्याकडे खेळाला (क्कोणत्याही असो ) आणि त्यातील कौशल्याला म्हणावं इतकं महत्त्व नाही.

In reply to by स्रुजा

संदीप डांगे Tue, 02/07/2017 - 00:37
अर्रर्र... असं नै ते... थोडक्या शब्दात मोठा अर्थ समजवण्याचं सामर्थ्य अजून तरी माझ्याकडे आलं नाही स्रुजातै... मेगाबायटीस वेळ नाही आज. अभी के लिये माफ कर दो! ;-)

In reply to by राघवेंद्र

स्रुजा Mon, 02/06/2017 - 23:52
अगदी हेच म्हणणार होते. निवडणुका अगदी झाडून सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. अख्खी अमेरिका यात इन्व्हॉल्व्ह असते असं मी म्हणणार नाही. पण बहुतांश लोकांना याचं वेड आहे. बरेच माझ्या सारखे लोकं काय आहे तरी ही भानगड म्हणुन बघायला जातात आणि त्याकडे ओढले जातात. पण वैयक्तिकरित्या मला तो माहोल त्या गेमपेक्षाही आवडतो. शिवाय या टीम्स इतकाली वर्षं आहेत की ब्रँड लॉयल्टी आता सणसणीत तयार झाली आहे. आपल्याकडे मुळातच कुठलाच गेम / टीम इतकी वर्षं नाहीये. अजुन २५ वर्षांनी कदाचित आयपीएल किंवा कबड्डी टीम्स ना ही अशा प्रकारचा प्रतिसाद (फॅन फॉलोविंग ) मिळेल, मग ते सोहळे पण चर्चेचा विषय होतील.

In reply to by स्रुजा

फेरफटका Tue, 02/07/2017 - 02:59
"आपल्याकडे मुळातच कुठलाच गेम / टीम इतकी वर्षं नाहीये." - क्रिकेट च्या टीम्स स्वातंत्र्यपूर्वीपासून आहेत जेव्हा चौरंगी - पंचरंगी सामने होत. रणजी ट्रॉफी १९३४-३५ साली सुरू झाली. पण स्वतःच्या राज्याच्या टीम मधल्या खेळाडूंची नावं सुद्धा सगळ्या क्रिकेट प्रेमींना माहीत नसतात.

In reply to by स्रुजा

निवडणुका अगदी झाडून सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.
हे जरी खरे असले तरी, निवडणूक हा विषय सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो का हा एक प्रश्नच आहे! मला तर कधी कधी वाटते कि निवडणुकांचा कालावधी हा सर्वात जास्त नेगेटिव्हिटी तयार करणारा कालावधी असावा (टिपिकल घाणेरड्या राजकारणी वृत्तीमुळे).

रेवती Tue, 02/07/2017 - 02:22
असं काही नाही. कालच्या म्याचमुळे माझ्यासारख्या झोपाळू मनुष्यप्राण्यांना कटकट झाली. लोकांचं सेलिब्रेशन संपेचना! कामाच्या ठिकाणीही लोक्स सुपरबोलचीच चर्चा करत होते, जांभया देत होते. भारतात असं होत नसावं का? मला वाटतं क्रिकेट वर्ल्ड कपच्यावेळी असं झालं होतं. जुने धागे असतील त्या चर्चेचे. आपल्याकडील जीवनपद्धती वेगळी आहे. हातावरचं पोट असणारे लोक, घरात टीव्ही नसणारे किंवा घरच नसणारे लोक अस्तित्वात असताना खेळ हा बांधून ठेवणारा धागा असण्याची अपेक्षा करणे त्यांच्यावर अन्यायकारक असेल. आपल्या आजूबाजूला लोक सुपरबोलमध्ये गुंग असताना ज्यांचा हा (खाद्य पेय)व्यवसायाचा दिवस होता त्यांना येताजाता टीव्हीवर नजर टाकण्याशिवाय जास्त काही करता आले असेल असे वाटत नाही. काल घरोघरी पिझ्झा डिलिव्हरी देणारे लोक सुपरबोल सलग कसा पाहणार? जास्त कमाई करणे किंवा हातावरील पोट असणार्‍यांना अशा कितीतरी सुपरबोलची काय फिकीर? काल काही लोकांनी आता आपण काही जिंकत नाही असे वाटल्याने लवकर टीव्ही बंद करून झोपणे पसंत केले ते म्हणे आज डोक्याला हात लावून बसले. जसे वर्ल्ड कपच्यावेळी मी बाथरुमबाहेर बसल्यास सिक्सर मारले जात होते तसे एकीने सांगितले की ती कंटाळून उठली व जिन्यात जाऊन बसली की इकडे चांगली प्रगती झाली म्हणून तिला तिच्या वडिलांनी जिन्यातून उठू दिले नव्हते. ;) यासाठी सुपरस्टिशस झालेलं चालतय की दोन्हीकडे!

In reply to by रेवती

फेरफटका Tue, 02/07/2017 - 02:56
" खेळ हा बांधून ठेवणारा धागा असण्याची अपेक्षा करणे त्यांच्यावर अन्यायकारक असेल. " मी खेळच असावा असं काही म्हणट नाही. किंबहूना असा धागा असावाच असाही काही आग्रह नाही. मला किंबहूना वाटलं की खेळ नसून तो धागा अजूनही रामायण-महाभारत च आहे की काय?

In reply to by फेरफटका

रेवती Tue, 02/07/2017 - 04:03
कदाचित काळ बदललाय म्हणून स्वरूप बदलले असेल. लहान गटात बांधले गेले असतील. त्यात समान आवडी, निवडी, भाषा (अमेरिकेत एक भाषा प्रामुख्याने वापरतात, तसे आपल्याकडे नाही), वेष, हवामान यानुसार वेगळे असेल. तुम्ही म्हणताय तसे आख्ख्या देशाला बांधले जाईल असे (रस्ते ओस पाडण्याचे) काम हे लहान गट करू शकणार नाहीत ............................हम्म, नाही सांगता यायचे.

पर्णिका Tue, 02/07/2017 - 03:24
जबरी झाला कालचा गेम. या वर्षी ज्यु. मंडळींच्या दोन्ही टीम्स सूपरबोलमध्ये नसल्याने मस्त एन्जॉय (काहीही गडबड, टेंशन न घेता) केला. :) बाकी मला सर्वात जास्त आवडलेली सूपरबोल जाहिरात : Kia Super Bowl Commercial 2017 Melissa McCarthy

एस Tue, 02/07/2017 - 23:55
जल्ला हे सुपरबोल का काय ते असतंय कुठल्या खेळात? फुटबॉल? मग टचडाऊन बिचडाऊन ही काय भानगड आहे? ह्या कोणत्या टिमा आहेत? कधी ऐकलं नाय ह्यांच्याबद्दल. ते आपल्याकडं (म्हणजे भारतात (म्हणजे इंडियात)) कसं वल्कप म्हंजे किरकेटचा वल्कप, तसं करू नका. नाव घ्या. खेळाचं. इस्कटून बैजवार सांगा.

In reply to by एस

स्रुजा Wed, 02/08/2017 - 00:43
हीहीही... हे बघा https://en.wikipedia.org/wiki/Super_Bowl सुपर बोल म्हणजे त्यांच्या एन एफ एल -नॅशनल फुटबॉल लीग - चा फायनल गेम :) आपल्या आयपील सारखा त्यांचा एन एफ एल. खरं तर आपली आय पी एल तिथुन प्रेरीत आहे असं म्हणायला हरकत नाही.

In reply to by एस

फेरफटका Wed, 02/08/2017 - 01:24
ते सुरूवातीलाच छापून आलय ना भौ, "काल रात्री अमेरिकन फूटबॉल लीग (NFL) चा अंतिम सामना - सूपरबोल - पार पडला." आनि मंग, पुन्यांदा 'कुठल्या खेळात' म्हून काहून विचारून रैले भै?

In reply to by फेरफटका

त्यांचा फुटबॉल आणि आपला फुटबॉल वेगळा है ना भौ! :) आपल्या फुटबॉलला ते लोक सॉकर म्हणतात. टचडाऊन काय यामुळे त्यांना प्रश्न पडला असावा. :)

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

फेरफटका Wed, 02/08/2017 - 20:43
असल, असल, तसंबी असल. अमेरिकन फूटबॉल मधे फूटा-फूटाने (यार्डा-यार्डाने) गोलपर्यंत पोहोचतात. सॉकर मधे बॉल फूट (पाय) ने गोलपर्यंत पोहोचवतात.

In reply to by एस

ट्रेड मार्क Wed, 02/08/2017 - 02:07
हा फुटबॉल म्हणजे पाय न लावता खेळायचा खेळ आहे. बादवे - हामेरिकेतला कुठलाबी खेळ आणि कुठलीबी लीग ही क्रिकेट/ सॉकर वर्ल्ड कप येवढीच न्हवे तर ज्यास्तच म्हत्वाची असते.

अनरँडम Wed, 02/08/2017 - 01:09
अमेरिकेत ज्याला फुटबॉल म्हणतात तो हा खेळ मनापासून आवडत नाही. बॉल दिसत नाही पण हेल्मेट्स घातलेले खेळाडू, कानात हेडफोन्स आणि काय काय गॅजेट्स घेऊन उभे असलेले कोच आणि त्यांचा लवाजमा, टाइट इजारींमुळे उठून दिसणारी खेळाडूंची ढुंगणे हे सर्व व्यवस्थित दिसते. या खेळात डोक्याला मार लागून अनेक खेळाडूंच्या मेंदुवर विपरीत परिणाम होतात हे सिद्ध झालेले आहे. असे सर्व असूनही हा अमेरिकेतला सर्वात लोकप्रिय (?) खेळ आहे. या खेळाची लोकप्रियता आणि अमेरिकेतला स्वमग्नता यावर भाष्य करण्याचा मोह होत असूनही टाळत आहे.
ईतकी वर्षं सूपरबोल बघताना जाणवतं की ह्या एका खेळानं अमेरिकेला किती एकत्र बांधून ठेवलय.
एकत्र बांधून ठेवलं आहे म्हणजे नेमके काय ते कळले नाही. एकत्र बांधल्याने अमेरिकन लोकांमधला वंशभेद या (यातले अनेक खेळाडू कृष्णवर्णिय असूनही) खेळामुळे कमी झाला आहे का? की विविध समाजघटक या खेळामुळे जवळ आले आहेत असे आहे? खरेदी करायला जायचे असल्यास मोठ्या फुटबॉल सामन्याच्या वेळी जावे. एकत्रपणे लोक सामना पाहत असतात आणि आपल्याला निवांत खरेदी करता येते.

In reply to by अनरँडम

फेरफटका Wed, 02/08/2017 - 01:27
एकत्र बांधून ठेवलं म्हणजे काय ह्याचं उत्तर तुम्हीच दिलत, त्याबद्दल धन्यवाद. "खरेदी करायला जायचे असल्यास मोठ्या फुटबॉल सामन्याच्या वेळी जावे. एकत्रपणे लोक सामना पाहत असतात आणि आपल्याला निवांत खरेदी करता येते." माझा पुढचा रामायण-महाभारताचा उल्लेख ह्याच अनुशंगाने आलाय.

In reply to by फेरफटका

अनरँडम Wed, 02/08/2017 - 20:49
नोटाबंदी पर्फेक्ट आहे मग. देशात एकाच वेळी सगळीकडे. देशभक्त लोकांना काळा पैसा नष्ट होणार म्हणून भावनिक गुंतवणूक (देशभक्तांची) जबरदस्त. ह. घ्या

फेरफटका Wed, 02/08/2017 - 20:52
"नोटाबंदी पर्फेक्ट आहे मग. देशात एकाच वेळी सगळीकडे. देशभक्त लोकांना काळा पैसा नष्ट होणार म्हणून भावनिक गुंतवणूक (देशभक्तांची) जबरदस्त. ह. घ्या" - :) नोटाबंदी दरवर्षी कुठे होते पण? (थँक गॉड!!) ;)

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे Wed, 02/08/2017 - 21:19
अमेरिकेतला सगळ्यात जास्त टीआरपी खेचणारा कार्यक्रम आहे सुपर्बोल.. तस्मात जाहिराती तर असणारच! आणि जाहिरातींची जत्रा झाल्यामुळे प्रत्येकीला दुसरी पेक्षा जास्त मनोरंजक, उठावदार, धक्कादायक, लक्षात राहिल अशी असणे क्रमप्राप्त असते. त्याचसोबत उपलब्ध असणारा कमी वेळ (३० सेकंद) व स्पर्धा बघता सुपरबोलसाठी 'खास जाहिराती' बनवाव्याच लागतात. २०१३ साली ऐन गेममधे वीज गेली काही मिनिटांसाठी, तेव्हढ्यात ओरिओ बिस्किटांनी ट्विट केले की “you can still dunk in the dark” त्या वर्षी इतर सगळ्या लक्षावधी रुपये खर्चून बनवलेल्या जाहिरातींपेक्षा ओरिओची ट्विटरवरची वनलायनर फुकटात माहोल करुन गेली.... https://twitter.com/Oreo/status/298246571718483968/photo/1?ref_src=twsrc%5Etfw

In reply to by पिलीयन रायडर

फेरफटका Wed, 02/08/2017 - 22:50
सूपरबोल च्या वेळी दाखवल्या जाणार्या जाहिराती तयार करण्यात (खर्च, कल्पना) कंपनीज कसलीही कंजुशी करत नाहीत (सूपरबोल च्या वेळी दाखवल्या जाणार्या जाहिरातींसाठी अ‍ॅव्हरेज खर्च ३.५ मिलियन डॉलर्स आहे). ह्या जाहिरातीमधे सुद्धा सगळ्यात चांगली कुठली होती वगैरे चर्चा, रँकिंग वगैरे असतं. कोकाकोला, अ‍ॅनहाउजर बुश वगैरे कंपन्या ह्यात सातत्यानं आघाडीवर आहेत. बहूदा प्रेक्षक जाहिराती टाळतात (टीव्ही म्यूट करणं, ब्रेक घेणं वगैरे), पण सूपरबोल च्या जाहिराती आवर्जून पाहिल्या जातात.

In reply to by राघवेंद्र

संदीप डांगे Mon, 02/06/2017 - 23:34
हे सर्वात प्रखर राष्ट्रवादी उत्तर आहे. ह्यात कोणताही उपरोध नाही. भारतात जर लोक एखाद्या खेळापे़क्षा (ज्याचा मनोरंजन सोडून काही उपयोग नाही) निवडणूक प्रक्रियेला (ज्याचा मनोरंजनासोबत इतरही अनेक महत्त्वाचे उपयोग आहेत) जास्त महत्त्व देत असतील तर अभिमानाचीच गोष्ट आहे.

In reply to by संदीप डांगे

स्रुजा Mon, 02/06/2017 - 23:54
बाकी सगळं ठीक आहे पण खेळाचा मनोरंजन सोडून काही उपयोग नाही हे पटलेलं नाही. अशाच विचारसरणीमुळे अजुनही आपल्याकडे खेळाला (क्कोणत्याही असो ) आणि त्यातील कौशल्याला म्हणावं इतकं महत्त्व नाही.

In reply to by स्रुजा

संदीप डांगे Tue, 02/07/2017 - 00:37
अर्रर्र... असं नै ते... थोडक्या शब्दात मोठा अर्थ समजवण्याचं सामर्थ्य अजून तरी माझ्याकडे आलं नाही स्रुजातै... मेगाबायटीस वेळ नाही आज. अभी के लिये माफ कर दो! ;-)

In reply to by राघवेंद्र

स्रुजा Mon, 02/06/2017 - 23:52
अगदी हेच म्हणणार होते. निवडणुका अगदी झाडून सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. अख्खी अमेरिका यात इन्व्हॉल्व्ह असते असं मी म्हणणार नाही. पण बहुतांश लोकांना याचं वेड आहे. बरेच माझ्या सारखे लोकं काय आहे तरी ही भानगड म्हणुन बघायला जातात आणि त्याकडे ओढले जातात. पण वैयक्तिकरित्या मला तो माहोल त्या गेमपेक्षाही आवडतो. शिवाय या टीम्स इतकाली वर्षं आहेत की ब्रँड लॉयल्टी आता सणसणीत तयार झाली आहे. आपल्याकडे मुळातच कुठलाच गेम / टीम इतकी वर्षं नाहीये. अजुन २५ वर्षांनी कदाचित आयपीएल किंवा कबड्डी टीम्स ना ही अशा प्रकारचा प्रतिसाद (फॅन फॉलोविंग ) मिळेल, मग ते सोहळे पण चर्चेचा विषय होतील.

In reply to by स्रुजा

फेरफटका Tue, 02/07/2017 - 02:59
"आपल्याकडे मुळातच कुठलाच गेम / टीम इतकी वर्षं नाहीये." - क्रिकेट च्या टीम्स स्वातंत्र्यपूर्वीपासून आहेत जेव्हा चौरंगी - पंचरंगी सामने होत. रणजी ट्रॉफी १९३४-३५ साली सुरू झाली. पण स्वतःच्या राज्याच्या टीम मधल्या खेळाडूंची नावं सुद्धा सगळ्या क्रिकेट प्रेमींना माहीत नसतात.

In reply to by स्रुजा

निवडणुका अगदी झाडून सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.
हे जरी खरे असले तरी, निवडणूक हा विषय सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो का हा एक प्रश्नच आहे! मला तर कधी कधी वाटते कि निवडणुकांचा कालावधी हा सर्वात जास्त नेगेटिव्हिटी तयार करणारा कालावधी असावा (टिपिकल घाणेरड्या राजकारणी वृत्तीमुळे).

रेवती Tue, 02/07/2017 - 02:22
असं काही नाही. कालच्या म्याचमुळे माझ्यासारख्या झोपाळू मनुष्यप्राण्यांना कटकट झाली. लोकांचं सेलिब्रेशन संपेचना! कामाच्या ठिकाणीही लोक्स सुपरबोलचीच चर्चा करत होते, जांभया देत होते. भारतात असं होत नसावं का? मला वाटतं क्रिकेट वर्ल्ड कपच्यावेळी असं झालं होतं. जुने धागे असतील त्या चर्चेचे. आपल्याकडील जीवनपद्धती वेगळी आहे. हातावरचं पोट असणारे लोक, घरात टीव्ही नसणारे किंवा घरच नसणारे लोक अस्तित्वात असताना खेळ हा बांधून ठेवणारा धागा असण्याची अपेक्षा करणे त्यांच्यावर अन्यायकारक असेल. आपल्या आजूबाजूला लोक सुपरबोलमध्ये गुंग असताना ज्यांचा हा (खाद्य पेय)व्यवसायाचा दिवस होता त्यांना येताजाता टीव्हीवर नजर टाकण्याशिवाय जास्त काही करता आले असेल असे वाटत नाही. काल घरोघरी पिझ्झा डिलिव्हरी देणारे लोक सुपरबोल सलग कसा पाहणार? जास्त कमाई करणे किंवा हातावरील पोट असणार्‍यांना अशा कितीतरी सुपरबोलची काय फिकीर? काल काही लोकांनी आता आपण काही जिंकत नाही असे वाटल्याने लवकर टीव्ही बंद करून झोपणे पसंत केले ते म्हणे आज डोक्याला हात लावून बसले. जसे वर्ल्ड कपच्यावेळी मी बाथरुमबाहेर बसल्यास सिक्सर मारले जात होते तसे एकीने सांगितले की ती कंटाळून उठली व जिन्यात जाऊन बसली की इकडे चांगली प्रगती झाली म्हणून तिला तिच्या वडिलांनी जिन्यातून उठू दिले नव्हते. ;) यासाठी सुपरस्टिशस झालेलं चालतय की दोन्हीकडे!

In reply to by रेवती

फेरफटका Tue, 02/07/2017 - 02:56
" खेळ हा बांधून ठेवणारा धागा असण्याची अपेक्षा करणे त्यांच्यावर अन्यायकारक असेल. " मी खेळच असावा असं काही म्हणट नाही. किंबहूना असा धागा असावाच असाही काही आग्रह नाही. मला किंबहूना वाटलं की खेळ नसून तो धागा अजूनही रामायण-महाभारत च आहे की काय?

In reply to by फेरफटका

रेवती Tue, 02/07/2017 - 04:03
कदाचित काळ बदललाय म्हणून स्वरूप बदलले असेल. लहान गटात बांधले गेले असतील. त्यात समान आवडी, निवडी, भाषा (अमेरिकेत एक भाषा प्रामुख्याने वापरतात, तसे आपल्याकडे नाही), वेष, हवामान यानुसार वेगळे असेल. तुम्ही म्हणताय तसे आख्ख्या देशाला बांधले जाईल असे (रस्ते ओस पाडण्याचे) काम हे लहान गट करू शकणार नाहीत ............................हम्म, नाही सांगता यायचे.

पर्णिका Tue, 02/07/2017 - 03:24
जबरी झाला कालचा गेम. या वर्षी ज्यु. मंडळींच्या दोन्ही टीम्स सूपरबोलमध्ये नसल्याने मस्त एन्जॉय (काहीही गडबड, टेंशन न घेता) केला. :) बाकी मला सर्वात जास्त आवडलेली सूपरबोल जाहिरात : Kia Super Bowl Commercial 2017 Melissa McCarthy

एस Tue, 02/07/2017 - 23:55
जल्ला हे सुपरबोल का काय ते असतंय कुठल्या खेळात? फुटबॉल? मग टचडाऊन बिचडाऊन ही काय भानगड आहे? ह्या कोणत्या टिमा आहेत? कधी ऐकलं नाय ह्यांच्याबद्दल. ते आपल्याकडं (म्हणजे भारतात (म्हणजे इंडियात)) कसं वल्कप म्हंजे किरकेटचा वल्कप, तसं करू नका. नाव घ्या. खेळाचं. इस्कटून बैजवार सांगा.

In reply to by एस

स्रुजा Wed, 02/08/2017 - 00:43
हीहीही... हे बघा https://en.wikipedia.org/wiki/Super_Bowl सुपर बोल म्हणजे त्यांच्या एन एफ एल -नॅशनल फुटबॉल लीग - चा फायनल गेम :) आपल्या आयपील सारखा त्यांचा एन एफ एल. खरं तर आपली आय पी एल तिथुन प्रेरीत आहे असं म्हणायला हरकत नाही.

In reply to by एस

फेरफटका Wed, 02/08/2017 - 01:24
ते सुरूवातीलाच छापून आलय ना भौ, "काल रात्री अमेरिकन फूटबॉल लीग (NFL) चा अंतिम सामना - सूपरबोल - पार पडला." आनि मंग, पुन्यांदा 'कुठल्या खेळात' म्हून काहून विचारून रैले भै?

In reply to by फेरफटका

त्यांचा फुटबॉल आणि आपला फुटबॉल वेगळा है ना भौ! :) आपल्या फुटबॉलला ते लोक सॉकर म्हणतात. टचडाऊन काय यामुळे त्यांना प्रश्न पडला असावा. :)

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

फेरफटका Wed, 02/08/2017 - 20:43
असल, असल, तसंबी असल. अमेरिकन फूटबॉल मधे फूटा-फूटाने (यार्डा-यार्डाने) गोलपर्यंत पोहोचतात. सॉकर मधे बॉल फूट (पाय) ने गोलपर्यंत पोहोचवतात.

In reply to by एस

ट्रेड मार्क Wed, 02/08/2017 - 02:07
हा फुटबॉल म्हणजे पाय न लावता खेळायचा खेळ आहे. बादवे - हामेरिकेतला कुठलाबी खेळ आणि कुठलीबी लीग ही क्रिकेट/ सॉकर वर्ल्ड कप येवढीच न्हवे तर ज्यास्तच म्हत्वाची असते.

अनरँडम Wed, 02/08/2017 - 01:09
अमेरिकेत ज्याला फुटबॉल म्हणतात तो हा खेळ मनापासून आवडत नाही. बॉल दिसत नाही पण हेल्मेट्स घातलेले खेळाडू, कानात हेडफोन्स आणि काय काय गॅजेट्स घेऊन उभे असलेले कोच आणि त्यांचा लवाजमा, टाइट इजारींमुळे उठून दिसणारी खेळाडूंची ढुंगणे हे सर्व व्यवस्थित दिसते. या खेळात डोक्याला मार लागून अनेक खेळाडूंच्या मेंदुवर विपरीत परिणाम होतात हे सिद्ध झालेले आहे. असे सर्व असूनही हा अमेरिकेतला सर्वात लोकप्रिय (?) खेळ आहे. या खेळाची लोकप्रियता आणि अमेरिकेतला स्वमग्नता यावर भाष्य करण्याचा मोह होत असूनही टाळत आहे.
ईतकी वर्षं सूपरबोल बघताना जाणवतं की ह्या एका खेळानं अमेरिकेला किती एकत्र बांधून ठेवलय.
एकत्र बांधून ठेवलं आहे म्हणजे नेमके काय ते कळले नाही. एकत्र बांधल्याने अमेरिकन लोकांमधला वंशभेद या (यातले अनेक खेळाडू कृष्णवर्णिय असूनही) खेळामुळे कमी झाला आहे का? की विविध समाजघटक या खेळामुळे जवळ आले आहेत असे आहे? खरेदी करायला जायचे असल्यास मोठ्या फुटबॉल सामन्याच्या वेळी जावे. एकत्रपणे लोक सामना पाहत असतात आणि आपल्याला निवांत खरेदी करता येते.

In reply to by अनरँडम

फेरफटका Wed, 02/08/2017 - 01:27
एकत्र बांधून ठेवलं म्हणजे काय ह्याचं उत्तर तुम्हीच दिलत, त्याबद्दल धन्यवाद. "खरेदी करायला जायचे असल्यास मोठ्या फुटबॉल सामन्याच्या वेळी जावे. एकत्रपणे लोक सामना पाहत असतात आणि आपल्याला निवांत खरेदी करता येते." माझा पुढचा रामायण-महाभारताचा उल्लेख ह्याच अनुशंगाने आलाय.

In reply to by फेरफटका

अनरँडम Wed, 02/08/2017 - 20:49
नोटाबंदी पर्फेक्ट आहे मग. देशात एकाच वेळी सगळीकडे. देशभक्त लोकांना काळा पैसा नष्ट होणार म्हणून भावनिक गुंतवणूक (देशभक्तांची) जबरदस्त. ह. घ्या

फेरफटका Wed, 02/08/2017 - 20:52
"नोटाबंदी पर्फेक्ट आहे मग. देशात एकाच वेळी सगळीकडे. देशभक्त लोकांना काळा पैसा नष्ट होणार म्हणून भावनिक गुंतवणूक (देशभक्तांची) जबरदस्त. ह. घ्या" - :) नोटाबंदी दरवर्षी कुठे होते पण? (थँक गॉड!!) ;)

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे Wed, 02/08/2017 - 21:19
अमेरिकेतला सगळ्यात जास्त टीआरपी खेचणारा कार्यक्रम आहे सुपर्बोल.. तस्मात जाहिराती तर असणारच! आणि जाहिरातींची जत्रा झाल्यामुळे प्रत्येकीला दुसरी पेक्षा जास्त मनोरंजक, उठावदार, धक्कादायक, लक्षात राहिल अशी असणे क्रमप्राप्त असते. त्याचसोबत उपलब्ध असणारा कमी वेळ (३० सेकंद) व स्पर्धा बघता सुपरबोलसाठी 'खास जाहिराती' बनवाव्याच लागतात. २०१३ साली ऐन गेममधे वीज गेली काही मिनिटांसाठी, तेव्हढ्यात ओरिओ बिस्किटांनी ट्विट केले की “you can still dunk in the dark” त्या वर्षी इतर सगळ्या लक्षावधी रुपये खर्चून बनवलेल्या जाहिरातींपेक्षा ओरिओची ट्विटरवरची वनलायनर फुकटात माहोल करुन गेली.... https://twitter.com/Oreo/status/298246571718483968/photo/1?ref_src=twsrc%5Etfw

In reply to by पिलीयन रायडर

फेरफटका Wed, 02/08/2017 - 22:50
सूपरबोल च्या वेळी दाखवल्या जाणार्या जाहिराती तयार करण्यात (खर्च, कल्पना) कंपनीज कसलीही कंजुशी करत नाहीत (सूपरबोल च्या वेळी दाखवल्या जाणार्या जाहिरातींसाठी अ‍ॅव्हरेज खर्च ३.५ मिलियन डॉलर्स आहे). ह्या जाहिरातीमधे सुद्धा सगळ्यात चांगली कुठली होती वगैरे चर्चा, रँकिंग वगैरे असतं. कोकाकोला, अ‍ॅनहाउजर बुश वगैरे कंपन्या ह्यात सातत्यानं आघाडीवर आहेत. बहूदा प्रेक्षक जाहिराती टाळतात (टीव्ही म्यूट करणं, ब्रेक घेणं वगैरे), पण सूपरबोल च्या जाहिराती आवर्जून पाहिल्या जातात.
काल रात्री अमेरिकन फूटबॉल लीग (NFL) चा अंतिम सामना - सूपरबोल - पार पडला. मस्त झाला गेम. चारातल्या तीन क्वार्टर्स अ‍ॅटलांटा फाल्कन्स ने वर्चस्व गाजवल्यावर न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने मागून येत, बरोबरी साधली आणी सूपरबोल च्या ईतिहासात प्रथमच सामना एक्स्ट्रॉ टाईम मधे गेला, ज्यात न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने टचडाऊन (गोल) करत बाजी मारली. मागाहून पुढे येत असताना, त्यांनी रचलेले डावपेच, आत्यंतिक तणावाच्या वेळी दाखवलेली शांत पण झुंजार वृत्ती आणी त्या खेळाचा थरार, सगळच अफलातून होतं.

आधार कार्डः खरंच गरज आहे का?

अभिनव ·

अभिनव Tue, 09/13/2016 - 11:55
कोर्टाने आधार कार्ड अनिवार्य करता येणार नाही असा स्पष्ट आदेश देऊनही रेल्वेने तिकिट खरेदीसाठी आधार कार्ड अनिवार्य केलेले आहे. प्रत्यक्ष अमलबजावणी डिसेंबर पासुन होईल. http://trak.in/tags/business/2016/09/12/irctc-aadhaar-card-compulsory-booking-train-tickets-passenger-insurance/

राघव Tue, 09/13/2016 - 13:34
मला वाटतं आधार सारख्या योजनेची गरज होतीच. आणि भारताचा बर्‍यापैकी लँडस्केप त्यात कव्हर झालेला आहे. आता सिक्यूरिटी बद्दल काळजी घ्यायलाच हवी आणि डेटा प्रायव्हसी बद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारणही नाही. पण त्याबद्दलचे नियम/कायदे अस्तित्वात येऊन त्यावर होणारा अंमल ही खरंच खूप पुढची गोष्ट आहे. अमेरिकेतल्या सोशल सिक्यूरिटी नंबर च्या डेटामधे अनेक गोंधळ अनेकवेळा झालेले आहेत. त्यातून ते ती सिस्टीम पक्की करत जातात. सगळे फूलप्रूफ असण्याची अपेक्षा असणे बरोबर. पण जेव्हा तुम्ही एक योजना बनवता आणि राबवता, तेव्हा तुम्ही तिला शक्यतो फ्लेक्सिबल ठेवता. त्याशिवाय एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात योजना राबवणे अशक्य आहे. जेव्हा डेटा ९०% च्या वर जमा होतो, तेव्हा त्यापुढचा भाग राबवावा लागतो. त्यात मग हळुहळू सुधारणा होत जाते. हा डेटा सरकार कशासाठी वापरते ते आपल्या पर्यंत पोहचू शकत नाही. नाहीतर त्यांचा हेतू साध्य होणार नाही. पण ते वाईटासाठीच वापरतील असेच गृहित धरणे गरजेचे नाही. सरकारी पैशाचा सर्वसाधारण जनतेसाठीचा विनियोग हा या पद्धतीने चांगला होऊ शकेल हे मात्र खरे.

दासबोध.कॊम Tue, 09/13/2016 - 14:13
आधार कार्ड योजनेत तुमचा बायोमेट्रिक डेटा गोळा होतो हे माहित असल्याने जे खरे चोर लोक आहेत ते या योजनेपासून 10 हात दूरच राहणार आहेत! हि योजना सर्व समावेशक होणे निव्वळ अशक्य आहे. पण जितका डेटा गोळा होतोय हेही नसे थोडके! त्यात आता पर्सिस्टन्ट चे देशपांडे या योजनेवर गेलेत त्यामुळे काही चांगले बदल नक्की पाहावयास मिळतील असे वाटते .

फेदरवेट साहेब Tue, 09/13/2016 - 14:36
अहो डेटा सिक्युरिटी बद्दल केव्हा बोलणार जेव्हा डेटा आपल्या हातात असेल, इथे डेटा स्टोरेजलाच मोंगो डीबी अन अन तत्सम परदेशी कंपनी वापरल्या जातायत, म्हणजे करोडो लोकांचा बायोमेट्रिक डेटा परदेशात साठवणे. घ्या समजून काय ते

In reply to by फेदरवेट साहेब

लोकल डेटासेंटर असावे. तेवढीही काळजी आधार टीमने घेतली नसेल तर खुशाल आपण मुर्ख लोकांच्या हाती आपलं बायोमॅट्रिक दिलंय असं समजुन जाव!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मोदक Wed, 09/14/2016 - 17:19
लोकल डेटासेंटर असावे. तेवढीही काळजी आधार टीमने घेतली नसेल तर खुशाल आपण मुर्ख लोकांच्या हाती आपलं बायोमॅट्रिक दिलंय असं समजुन जाव! सरकार बदलल्यानंतर या धोरणामध्ये बदल झाला नाहीये का?

In reply to by मोदक

हे डिटेल्स पब्लिक डोमेनमध्ये नसावेत. मुळातच माँगो अतिशय सोपी अन साधारण हार्डवेअरवर चालणारी डाटाबेस सिस्टीम आहे. तिला स्पेशल हार्डवेअर लागत नाही. किंवा ती क्लाऊडबेस्ड सिस्टीमही नाही की डेटा बाहेर ठेवावा लागेल. माँगोला फंडींग सीआयेकडुन मिळालेल असल्याने हा सगळा धुरळा उठवलाय.

बोका-ए-आझम Tue, 09/13/2016 - 14:59
डेटाचा गैरवापर फक्त आधार कार्डमुळेच होईल असं थोडंच आहे? जेव्हा तुम्ही तुमची माहिती इतरांना देता तेव्हा समोरच्या माणसाच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवणे आणि त्याचबरोबर काळजी घेणे या दोन्हीही गोष्टी कराव्या लागतात. इन्कमटॅक्स रिटर्न्स भरताना आपली माहिती सरकारी खात्यात जातच असते की. अजूनपर्यंत त्याचा गैरवापर झाल्याची उदाहरणं नाहीत. निदान मला तरी माहित नाहीत. जाणकारांनी सांगावी.

In reply to by बोका-ए-आझम

फेदरवेट साहेब Wed, 09/14/2016 - 06:56
इनकम टॅक्सचा डेटा भारतीय सर्वर्सवर असतो (नॅशनल इन्फॉर्मटिकस सेंटर, वगैरे) आधारचे तसे नाही, त्याच्यामुळे करोडो लोकांचा डेटा संवेदनशील झालाय. शिवाय इतर योजना गाय मारतात म्हणून आपण वासरू मारणे हे काही पटणारे लॉजिक नाही.

In reply to by बोका-ए-आझम

साहना Wed, 09/14/2016 - 20:05
स्वानुभवाने भरपूर गैर व्यवहार झाला आहे हे सांगू शकते. लोकांचा PAN इत्यादी पर्सनल डेटा घेऊन गुपचूप त्यांच्या माहितीशिवाय त्यांचे रिटर्न ऑनलाईन चेक करून ती माहिती इतरांना देणाऱ्या अनेक कंपन्या/लोक आहेत. पण बहुतेक वेळा त्याची सुद्धा गरज नसते. आमच्या धंद्यांत आम्ही बँक मॅनेजरला फोने करून श्री अमुक तमुक ह्यांच्या खात्यात किती पैसे आहेत हो ? असा प्रश्न केला तर मॅनेजर सहज सांगतो (आपली उलाढाल किती आहे ह्यावर हे अवलंबून असते). हे रिटर्न्स चोरणारे लोक बहुतेक वेळा private लेंडर्स साठी काम करतात. इलेक्शन रोल, RTO चा डेटा आणि इतर अनेक सरकारी डेटा वापरून एका माणसाची संपूर्ण माहिती काढणार्या एका पुणे कंपनीबरोबर मी काही काळ काम केले होते. एखाद्या माणसाची किती माहिती त्यांच्या कडे होती हे अक्षरशः थक्क करणारी गोष्ट होती. अनेकदा सरकारी खात्यात प्युन सारखा माणूस सुद्धा बऱ्यापैकी माहिती चोरून त्यांना देऊ शकत होता.

तुषार काळभोर Tue, 09/13/2016 - 16:01
??? हे काय सार्वजनिक शौचालय आहे का? तिथे अन् तिथे करून झालं होतं, इथं करायचं राहिलं होतं!! आता इथं पण करून झालंय, कसं शांत वाटतंय, निवांत वाटतंय, बरं वाटतंय! .. अन् तुम्हाला 'स्वतःला अडचणीत टाकणारे प्रश्न" इतरांनी विचारल्यावर त्रास होतो ना? मग इथली चर्चा कशी चालणार? इथे तर लोक प्रश्न विचारतात. सरळ मनाने पण विचारतात आणि खवचटपणा करत 'ह्याला आता तोंडावरच पाडायचं!" अस ठरवून पण विचारतात!

विवेकपटाईत Tue, 09/13/2016 - 17:22
या आधार मुळे सरकारचे राशन आणि गस सबसिडीत हजारों कोटी वाचले. बाकी कपिल शर्मा सारखे गैर काम करणार्यांना परिणाम भोगावेच लागतात मग ओरड सुरु होते.

चौकटराजा Tue, 09/13/2016 - 17:35
मी ज्यावेळी सरकारी व खाजगी नोकरीत मुलाखत दिली त्यानंतर मला नग्न होऊन डॉक्टरांसमोर जावे लागले. याचाच अर्थ माझ्या मांडीवर तीळ असेल व तेथे कॅमेरा असेल तो त्याने टिपला असेल. माझ्या एक्स रे मधे माझी डावी बरगडी जोडलेली आहे पीन घालून हे ही कोठेतरी नोंदले गेले असेल. या पातळीवर सुद्धा मला " प्रायव्हेट" रहाता येत नाही. समाजात रहाताना फार अतिरेक प्रायव्हसीचा करून चालणारच नाही. अशा लोकानी समुद्रात घर करून रहावे. हो तरीही तुमच्या मांडीवरचा तीळ सॅटेलाईटचा कॅमेरा टिपणारच. आपण गुरूचे फोटो काढून त्याला चार उपग्रह आहेत हे समजून घेतले आहेत म्हणजे त्याची प्रायव्हसी चोरलीच आहे.

In reply to by चौकटराजा

बोका-ए-आझम Wed, 09/14/2016 - 01:07
आपण गुरूचे फोटो काढून त्याला चार उपग्रह आहेत हे समजून घेतले आहेत म्हणजे त्याची प्रायव्हसी चोरलीच आहे.
))) महालोल! चौराकाकांनी बर्रा (एकाच वेळी दोन सिक्सर्स) मारलेल्या आहेत. रच्याकने गुरुची प्रायव्हसी गॅलिलिओ नावाच्या खऊट इटालियन दाढीवाल्याने फार पूर्वीच चोरली होती!

साहना Wed, 09/14/2016 - 01:46
दोन आधार कार्ड करून ठेवा. एक गावाकडे आणि एक शहरात. असे केल्याने प्रायव्हसीचा प्रश्नच मिटला. एकच कार्ड महत्वाच्या कामासाठी वापर दुसरे कार्ड तिकीट वगैरे बुक करण्यासाठी वापरा.

In reply to by साहना

फेदरवेट साहेब Wed, 09/14/2016 - 07:02
अहो काहीही काय! दोन आधारकार्ड्स कशी तयार होतील? तुम्ही एक तयार करता तेव्हाच तुमचे बोटांचे ठसे अन रेटिना स्कॅन घेतले जातात, ते डाटाबेस मध्ये स्टोर केलेले असतात (ते डाटाबेस foreigner असणे हाच तर सद्ध्या मुद्दा आहे) , तरीही जर तुम्ही एक आधार असताना दुसरे काढायला गेलात तर तुमचे फिंगर प्रिंट अन रेटिना स्कॅन अकॅसेप्ट होत नाहीत सिस्टिम मध्ये, डेटा redundancy एरर येतो किंवा रेकॉर्ड ओव्हरलाप दाखवतात त्यामुळे दोन आधार वगैरे तयार करणे कठीण नाही अशक्य आहे, तुम्ही राहिवासाचा पत्ता अन नाव बदलाल खरं बोटाचे ठसे अन रेटिना स्कॅनचे काय??

In reply to by फेदरवेट साहेब

साहना Wed, 09/14/2016 - 18:29
आपली कायद्याने जाणाऱ्यांची एक दुनिया असते आणि .... डुप्लिकेट, खोटी, ड्युअल वाट्टेल त्या प्रकारची आधार कार्डे भेटतात

साहना Wed, 09/14/2016 - 01:50
प्रायव्हसीचा अर्थ सर्व गोष्टींची गुप्तता असा होत नाही. डॉक्टरने आपली नग्न चित्रे काढून पॉर्न साईटवर टाकली असती तर तो आपल्या प्रायव्हसीचा भंग झाला असता. किंवा नोकरीच्या साठी तपासणी ह्या नावाखाली आपली किडनी काढून विकली तर तो आपला हक्क भंग झाला असता.

दासबोध.कॊम Wed, 09/14/2016 - 16:34
योजना छान आहे आधाराची..पण आधार या नावात उगाचच आपण "हे येण्यापूर्वी आपण निराधार होतो" असा भाव जाणवतो! याचे नाव काहीतरी वेगळे हवे होते. जसे की " हाथियार ", "मेरा यार", इ.इ.

In reply to by दासबोध.कॊम

अभ्या.. गुरुवार, 09/15/2016 - 11:19
याचे नाव काहीतरी वेगळे हवे होते. जसे की " हाथियार ", "मेरा यार", इ.इ.
कार्डच काढताय ना? का त्याच्या पाकीटाची रुंदी वाढवायचा विचार आहे? फ्लेवर बिवर काही आहेत का डोक्यात?

प्रीत-मोहर Wed, 09/14/2016 - 17:11
बाकी माहित नाही. पण Direct benefit Transfer schemes जसे की MHRD ची Central Sector Scheme of Scholarship for College and University Students किंवा pre-matric or post-matric scheme for minorities etc साठी आता आधार अनिवार्य केला आहे. आम्हाला विद्यार्थ्यांच्या मागे लागुन आधार ब्यांकेत सीड करुन घ्यावा लागतोय.(गोव्यात ९९ टक्के आधार आहे)

आशु जोग Mon, 07/03/2017 - 12:51
हा विषय पुन्हा पेटलाय या आधाराने काही घोटाळे कुणाला माहीत असतील तर कृपया माहीती द्यावी !

अभिनव Tue, 09/13/2016 - 11:55
कोर्टाने आधार कार्ड अनिवार्य करता येणार नाही असा स्पष्ट आदेश देऊनही रेल्वेने तिकिट खरेदीसाठी आधार कार्ड अनिवार्य केलेले आहे. प्रत्यक्ष अमलबजावणी डिसेंबर पासुन होईल. http://trak.in/tags/business/2016/09/12/irctc-aadhaar-card-compulsory-booking-train-tickets-passenger-insurance/

राघव Tue, 09/13/2016 - 13:34
मला वाटतं आधार सारख्या योजनेची गरज होतीच. आणि भारताचा बर्‍यापैकी लँडस्केप त्यात कव्हर झालेला आहे. आता सिक्यूरिटी बद्दल काळजी घ्यायलाच हवी आणि डेटा प्रायव्हसी बद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारणही नाही. पण त्याबद्दलचे नियम/कायदे अस्तित्वात येऊन त्यावर होणारा अंमल ही खरंच खूप पुढची गोष्ट आहे. अमेरिकेतल्या सोशल सिक्यूरिटी नंबर च्या डेटामधे अनेक गोंधळ अनेकवेळा झालेले आहेत. त्यातून ते ती सिस्टीम पक्की करत जातात. सगळे फूलप्रूफ असण्याची अपेक्षा असणे बरोबर. पण जेव्हा तुम्ही एक योजना बनवता आणि राबवता, तेव्हा तुम्ही तिला शक्यतो फ्लेक्सिबल ठेवता. त्याशिवाय एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात योजना राबवणे अशक्य आहे. जेव्हा डेटा ९०% च्या वर जमा होतो, तेव्हा त्यापुढचा भाग राबवावा लागतो. त्यात मग हळुहळू सुधारणा होत जाते. हा डेटा सरकार कशासाठी वापरते ते आपल्या पर्यंत पोहचू शकत नाही. नाहीतर त्यांचा हेतू साध्य होणार नाही. पण ते वाईटासाठीच वापरतील असेच गृहित धरणे गरजेचे नाही. सरकारी पैशाचा सर्वसाधारण जनतेसाठीचा विनियोग हा या पद्धतीने चांगला होऊ शकेल हे मात्र खरे.

दासबोध.कॊम Tue, 09/13/2016 - 14:13
आधार कार्ड योजनेत तुमचा बायोमेट्रिक डेटा गोळा होतो हे माहित असल्याने जे खरे चोर लोक आहेत ते या योजनेपासून 10 हात दूरच राहणार आहेत! हि योजना सर्व समावेशक होणे निव्वळ अशक्य आहे. पण जितका डेटा गोळा होतोय हेही नसे थोडके! त्यात आता पर्सिस्टन्ट चे देशपांडे या योजनेवर गेलेत त्यामुळे काही चांगले बदल नक्की पाहावयास मिळतील असे वाटते .

फेदरवेट साहेब Tue, 09/13/2016 - 14:36
अहो डेटा सिक्युरिटी बद्दल केव्हा बोलणार जेव्हा डेटा आपल्या हातात असेल, इथे डेटा स्टोरेजलाच मोंगो डीबी अन अन तत्सम परदेशी कंपनी वापरल्या जातायत, म्हणजे करोडो लोकांचा बायोमेट्रिक डेटा परदेशात साठवणे. घ्या समजून काय ते

In reply to by फेदरवेट साहेब

लोकल डेटासेंटर असावे. तेवढीही काळजी आधार टीमने घेतली नसेल तर खुशाल आपण मुर्ख लोकांच्या हाती आपलं बायोमॅट्रिक दिलंय असं समजुन जाव!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मोदक Wed, 09/14/2016 - 17:19
लोकल डेटासेंटर असावे. तेवढीही काळजी आधार टीमने घेतली नसेल तर खुशाल आपण मुर्ख लोकांच्या हाती आपलं बायोमॅट्रिक दिलंय असं समजुन जाव! सरकार बदलल्यानंतर या धोरणामध्ये बदल झाला नाहीये का?

In reply to by मोदक

हे डिटेल्स पब्लिक डोमेनमध्ये नसावेत. मुळातच माँगो अतिशय सोपी अन साधारण हार्डवेअरवर चालणारी डाटाबेस सिस्टीम आहे. तिला स्पेशल हार्डवेअर लागत नाही. किंवा ती क्लाऊडबेस्ड सिस्टीमही नाही की डेटा बाहेर ठेवावा लागेल. माँगोला फंडींग सीआयेकडुन मिळालेल असल्याने हा सगळा धुरळा उठवलाय.

बोका-ए-आझम Tue, 09/13/2016 - 14:59
डेटाचा गैरवापर फक्त आधार कार्डमुळेच होईल असं थोडंच आहे? जेव्हा तुम्ही तुमची माहिती इतरांना देता तेव्हा समोरच्या माणसाच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवणे आणि त्याचबरोबर काळजी घेणे या दोन्हीही गोष्टी कराव्या लागतात. इन्कमटॅक्स रिटर्न्स भरताना आपली माहिती सरकारी खात्यात जातच असते की. अजूनपर्यंत त्याचा गैरवापर झाल्याची उदाहरणं नाहीत. निदान मला तरी माहित नाहीत. जाणकारांनी सांगावी.

In reply to by बोका-ए-आझम

फेदरवेट साहेब Wed, 09/14/2016 - 06:56
इनकम टॅक्सचा डेटा भारतीय सर्वर्सवर असतो (नॅशनल इन्फॉर्मटिकस सेंटर, वगैरे) आधारचे तसे नाही, त्याच्यामुळे करोडो लोकांचा डेटा संवेदनशील झालाय. शिवाय इतर योजना गाय मारतात म्हणून आपण वासरू मारणे हे काही पटणारे लॉजिक नाही.

In reply to by बोका-ए-आझम

साहना Wed, 09/14/2016 - 20:05
स्वानुभवाने भरपूर गैर व्यवहार झाला आहे हे सांगू शकते. लोकांचा PAN इत्यादी पर्सनल डेटा घेऊन गुपचूप त्यांच्या माहितीशिवाय त्यांचे रिटर्न ऑनलाईन चेक करून ती माहिती इतरांना देणाऱ्या अनेक कंपन्या/लोक आहेत. पण बहुतेक वेळा त्याची सुद्धा गरज नसते. आमच्या धंद्यांत आम्ही बँक मॅनेजरला फोने करून श्री अमुक तमुक ह्यांच्या खात्यात किती पैसे आहेत हो ? असा प्रश्न केला तर मॅनेजर सहज सांगतो (आपली उलाढाल किती आहे ह्यावर हे अवलंबून असते). हे रिटर्न्स चोरणारे लोक बहुतेक वेळा private लेंडर्स साठी काम करतात. इलेक्शन रोल, RTO चा डेटा आणि इतर अनेक सरकारी डेटा वापरून एका माणसाची संपूर्ण माहिती काढणार्या एका पुणे कंपनीबरोबर मी काही काळ काम केले होते. एखाद्या माणसाची किती माहिती त्यांच्या कडे होती हे अक्षरशः थक्क करणारी गोष्ट होती. अनेकदा सरकारी खात्यात प्युन सारखा माणूस सुद्धा बऱ्यापैकी माहिती चोरून त्यांना देऊ शकत होता.

तुषार काळभोर Tue, 09/13/2016 - 16:01
??? हे काय सार्वजनिक शौचालय आहे का? तिथे अन् तिथे करून झालं होतं, इथं करायचं राहिलं होतं!! आता इथं पण करून झालंय, कसं शांत वाटतंय, निवांत वाटतंय, बरं वाटतंय! .. अन् तुम्हाला 'स्वतःला अडचणीत टाकणारे प्रश्न" इतरांनी विचारल्यावर त्रास होतो ना? मग इथली चर्चा कशी चालणार? इथे तर लोक प्रश्न विचारतात. सरळ मनाने पण विचारतात आणि खवचटपणा करत 'ह्याला आता तोंडावरच पाडायचं!" अस ठरवून पण विचारतात!

विवेकपटाईत Tue, 09/13/2016 - 17:22
या आधार मुळे सरकारचे राशन आणि गस सबसिडीत हजारों कोटी वाचले. बाकी कपिल शर्मा सारखे गैर काम करणार्यांना परिणाम भोगावेच लागतात मग ओरड सुरु होते.

चौकटराजा Tue, 09/13/2016 - 17:35
मी ज्यावेळी सरकारी व खाजगी नोकरीत मुलाखत दिली त्यानंतर मला नग्न होऊन डॉक्टरांसमोर जावे लागले. याचाच अर्थ माझ्या मांडीवर तीळ असेल व तेथे कॅमेरा असेल तो त्याने टिपला असेल. माझ्या एक्स रे मधे माझी डावी बरगडी जोडलेली आहे पीन घालून हे ही कोठेतरी नोंदले गेले असेल. या पातळीवर सुद्धा मला " प्रायव्हेट" रहाता येत नाही. समाजात रहाताना फार अतिरेक प्रायव्हसीचा करून चालणारच नाही. अशा लोकानी समुद्रात घर करून रहावे. हो तरीही तुमच्या मांडीवरचा तीळ सॅटेलाईटचा कॅमेरा टिपणारच. आपण गुरूचे फोटो काढून त्याला चार उपग्रह आहेत हे समजून घेतले आहेत म्हणजे त्याची प्रायव्हसी चोरलीच आहे.

In reply to by चौकटराजा

बोका-ए-आझम Wed, 09/14/2016 - 01:07
आपण गुरूचे फोटो काढून त्याला चार उपग्रह आहेत हे समजून घेतले आहेत म्हणजे त्याची प्रायव्हसी चोरलीच आहे.
))) महालोल! चौराकाकांनी बर्रा (एकाच वेळी दोन सिक्सर्स) मारलेल्या आहेत. रच्याकने गुरुची प्रायव्हसी गॅलिलिओ नावाच्या खऊट इटालियन दाढीवाल्याने फार पूर्वीच चोरली होती!

साहना Wed, 09/14/2016 - 01:46
दोन आधार कार्ड करून ठेवा. एक गावाकडे आणि एक शहरात. असे केल्याने प्रायव्हसीचा प्रश्नच मिटला. एकच कार्ड महत्वाच्या कामासाठी वापर दुसरे कार्ड तिकीट वगैरे बुक करण्यासाठी वापरा.

In reply to by साहना

फेदरवेट साहेब Wed, 09/14/2016 - 07:02
अहो काहीही काय! दोन आधारकार्ड्स कशी तयार होतील? तुम्ही एक तयार करता तेव्हाच तुमचे बोटांचे ठसे अन रेटिना स्कॅन घेतले जातात, ते डाटाबेस मध्ये स्टोर केलेले असतात (ते डाटाबेस foreigner असणे हाच तर सद्ध्या मुद्दा आहे) , तरीही जर तुम्ही एक आधार असताना दुसरे काढायला गेलात तर तुमचे फिंगर प्रिंट अन रेटिना स्कॅन अकॅसेप्ट होत नाहीत सिस्टिम मध्ये, डेटा redundancy एरर येतो किंवा रेकॉर्ड ओव्हरलाप दाखवतात त्यामुळे दोन आधार वगैरे तयार करणे कठीण नाही अशक्य आहे, तुम्ही राहिवासाचा पत्ता अन नाव बदलाल खरं बोटाचे ठसे अन रेटिना स्कॅनचे काय??

In reply to by फेदरवेट साहेब

साहना Wed, 09/14/2016 - 18:29
आपली कायद्याने जाणाऱ्यांची एक दुनिया असते आणि .... डुप्लिकेट, खोटी, ड्युअल वाट्टेल त्या प्रकारची आधार कार्डे भेटतात

साहना Wed, 09/14/2016 - 01:50
प्रायव्हसीचा अर्थ सर्व गोष्टींची गुप्तता असा होत नाही. डॉक्टरने आपली नग्न चित्रे काढून पॉर्न साईटवर टाकली असती तर तो आपल्या प्रायव्हसीचा भंग झाला असता. किंवा नोकरीच्या साठी तपासणी ह्या नावाखाली आपली किडनी काढून विकली तर तो आपला हक्क भंग झाला असता.

दासबोध.कॊम Wed, 09/14/2016 - 16:34
योजना छान आहे आधाराची..पण आधार या नावात उगाचच आपण "हे येण्यापूर्वी आपण निराधार होतो" असा भाव जाणवतो! याचे नाव काहीतरी वेगळे हवे होते. जसे की " हाथियार ", "मेरा यार", इ.इ.

In reply to by दासबोध.कॊम

अभ्या.. गुरुवार, 09/15/2016 - 11:19
याचे नाव काहीतरी वेगळे हवे होते. जसे की " हाथियार ", "मेरा यार", इ.इ.
कार्डच काढताय ना? का त्याच्या पाकीटाची रुंदी वाढवायचा विचार आहे? फ्लेवर बिवर काही आहेत का डोक्यात?

प्रीत-मोहर Wed, 09/14/2016 - 17:11
बाकी माहित नाही. पण Direct benefit Transfer schemes जसे की MHRD ची Central Sector Scheme of Scholarship for College and University Students किंवा pre-matric or post-matric scheme for minorities etc साठी आता आधार अनिवार्य केला आहे. आम्हाला विद्यार्थ्यांच्या मागे लागुन आधार ब्यांकेत सीड करुन घ्यावा लागतोय.(गोव्यात ९९ टक्के आधार आहे)

आशु जोग Mon, 07/03/2017 - 12:51
हा विषय पुन्हा पेटलाय या आधाराने काही घोटाळे कुणाला माहीत असतील तर कृपया माहीती द्यावी !
हा लेख इथे टाकायचा राहुन गेला होता.