Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नर्मदेतला गोटा on Mon, 09/12/2016 - 13:26
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
मत
संघ आणि त्याचे टिकाकार साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे. आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे. समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे. इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे. खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे. आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे. शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो. तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे. म्हणून काम करणार्‍याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
  • 83205 views

प्रतिक्रिया

Submitted by शाम भागवत on Tue, 09/13/2016 - 17:54

In reply to > हे ख्रिस्ती आणि मुस्लीम by साहना

Permalink

अस ऐकल आहे की अरबस्तानात जर

अस ऐकल आहे की अरबस्तानात जर एखादा भारतीय मुस्लीम गेला तर त्याला हिंदू मुस्लिम म्हणतात. हाहाहा कित्ती तो वेडेपणा अरब लोकांचा ह.घ्या. :-)
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 09/13/2016 - 18:41

In reply to > हे ख्रिस्ती आणि मुस्लीम by साहना

Permalink

मूर्खपणा कसला?

साहना, भारतातले ख्रिस्ती आणि मुस्लिम पूर्वाश्रमीचे हिंदू आहेत या विधानात मूर्खपणा कसला? उद्या हिंदूंच्या भावना तुडवणं बंद केलं तर ख्रिस्ती/मुस्लिम आणि हिंदूंमध्ये फरक तो काय उरला? आ.न., -गा.पै.

Submitted by साहना on Wed, 09/14/2016 - 22:25

In reply to मूर्खपणा कसला? by गामा पैलवान

Permalink

समजा १० हजार गरीब हिंदूंनी

समजा १० हजार गरीब हिंदूंनी ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला आपल्या राहणसाहनीत काहीही फरक केला नाही तर "ख्रिस्ती लोक हिंदू आहेत" ह्या नियमाखाली संघाला ते चालेल काय ? ---- सदर फरक तुम्हाला ठाऊक नाही ह्यात आपला गोंधळ दिसून येतो. कळावी वेंकट ह्या स्वतंत्र हिंदू अभ्यासकांचे हे पुस्तक जरूर वाचावे किमान त्याचा रिव्यू तरी वाचावा https://pothi.com/pothi/book/kalavai-venkat-what-every-hindu-should-know-about-christianity रेव्हिएव: http://koenraadelst.blogspot.com/2014/05/a-hindu-argues-circles-around.html मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्म समजण्यासाठी त्याचे धर्म ग्रंथ खोलांत वाचणे आणि प्रत्यक्षांत त्या धर्माचे पालन कसे केले जाते हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदू म्हणजे अनेकेश्वरवादि, मूर्तीपूजक, निसर्गपूजक धर्म आहे. ह्या सर्व गोष्टींना एकेश्वरवादी धर्म "जनावरापेक्षाही खाली" मानतात. कुराण बायबलची शिकवणच तशी आहे. उदा मुस्लिम ख्रिस्ती असण्यासाठी शिवलिंगपूजा, गणेशपूजेविषयी घृणा असणे अत्यावश्यक आहे. आपण एक तर मुस्लिम असू शकता नाही तर गणेशपूजक. कारण खुनाला अल्लाह माफ करतो, मूर्तीपूजेला नाही. ख्रिस्ती देव Jealus God आहे. बलात्काराला माफी करेल पण दुसऱ्या देवाच्या पूजेला नाही. हिंदू धर्म आणि ख्रिस्ती/मुस्लिम धर्म ह्यांच्यात काहीही सामान्य नसून फक्त विरोध आहे. हे धर्म Exclusive आहेत. बौद्ध, जैन किंवा शीख हिंदू असू शकतात, अमेरिकेतील नेटिव्ह अमेरिकन लोक सुद्धा कदाचित हिंदू धर्माच्या छत्री खाली राहू शकतात पण ख्रिस्ती, मुस्लिम , जु, पारसी ह्यांना त्या छत्रीत (त्यांचा धर्म सोडल्या शिवाय) प्रवेश नाही. आपल्याही धर्माचा अभ्यास नाही , दुसऱ्यांच्या धर्माचाही खोल अभ्यास नाही आणि त्यावर "ख्रिस्ती हिंदू सगळे सेम" असले विचार. हे विचार मूर्खपणाचेच आहेत असे नाही तर अतिशय घटक सुद्धा आहेत. --- एका मित्राने सांगितलेली सत्य घटना. दिवाळीच्या दिवशी एक मुस्लिम फकीर घरी बक्षीस मागणीसाठी हजार झाला. परंपरे प्रमाणे आम्ही त्याला गूळ आणि पाणी दिले. त्याने पैसे दान म्हणून मागितले. आई पैसे द्यायला तयार झाली इतक्यांत आजीने. मुस्लिम फकिराने आम्ही पैसे देऊ शकत नाही असे सांगितले. "सभी एकही अल्लाह के बंदे है बीबीजी, आपला भगवान भी हमारे लिये अल्लाह है" म्हणून आपला हेका सोडला नाही. आजी एकदम खमकी होती. "ठीक आहे, ये है आमची तुळस, इस्को हम भगवान मानके हम पाया पडता है तुम अल्लाह मानके तुम्हारा नमस्कार करो और पैसे दान में लेके जाओ". ह्या तिच्या वाचनावर फकिराला राग आला आणि "हम बूट कि इबादत नाही करता" असे बोलून तो चालत झाला.

Submitted by चंपाबाई on Wed, 09/14/2016 - 22:49

In reply to समजा १० हजार गरीब हिंदूंनी by साहना

Permalink

...

मुस्लिम ख्रिस्ती असण्यासाठी शिवलिंगपूजा, गणेशपूजेविषयी घृणा असणे अत्यावश्यक आहे. संदर्भ मिळेल का ?

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 09/15/2016 - 09:58

In reply to ... by चंपाबाई

Permalink

अफझलखानाच्या पदव्या पहा

अफझलखानाच्या पदव्या पहा दीनदार, बुतशिकन, कुफ्रशिकन

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 09/15/2016 - 10:00

In reply to अफझलखानाच्या पदव्या पहा by सुबोध खरे

Permalink

आणि "तुमच्या" बामियान येथील

आणि "तुमच्या" बामियान येथील बुद्धाच्या प्राचीन मूर्ती फोडणारे कोण संघवाले होते का? कि सर्वात शुद्ध आणि पवित्र म्हणवणारे महंमदाच्या वाटेने चालणारे (सुन्नी) तालिबान होते?

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Tue, 09/13/2016 - 13:51

Permalink

लैच गोंधळ!

हे माझे संघाबाबतचे मत आहे. ;)

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 09/13/2016 - 15:06

Permalink

संघाबद्दल एकंदरीत काही जणांचे

संघाबद्दल एकंदरीत काही जणांचे जुने पूर्वग्रह उफाळून वर आलेले आहेत. संघ या विषयावर यापूर्वी असंख्य वेळा चर्चा झालेली आहे. पुन्हापुन्हा तेचतेच उगाळायचा कंटाळा आला आहे. संघविरोधकांना संघाला विरोध करताना वैचारिक किंवा तात्विक पातळीवरून चर्चा करता येत नाही व त्यामुळे संघावर टीका करताना ते एकदम खालची पातळी गाठतात हे काही प्रतिसादांवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. ज्याप्रमाणे हजार पानांचा प्रबंध वाचण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली तर लगेच साखरेची गोडी कळते, तद्वत संघ म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ग्रंथ वाचण्यापेक्षा काही काळ संघात काढला तर संघ लगेच समजेल. निव्वळ पुस्तके वाचून संघ म्हणजे काय याविषयी मत बनविण्यापेक्षा प्रत्यक्ष संघात काही काळ व्यतीत केल्यास संघ जास्त चांगल्या तर्‍हेने समजेल. तरीसुद्धा जिज्ञासूंसाठी खालील पुस्तके सुचवित आहे. ही पुस्तके वाचून नंतर काही काळ संघात व्यतीत केल्यास संघाविषयीच्या सर्व शंकांची उत्तरे मिळतील. Secrets of RSS - Demystifying the Sangh (लेखक - डॉ. जयप्रकाश नारायण, रतन शारदा, डॉ. अशोक मोडक) Know the RSS: Based on Rashtriya Swayamsevak Sangh Documents (लेखक - शमसुल इस्लाम) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: काल, आज आणि उद्या (लेखक - गंगाधर इंदूरकर) _________________________________________________________ संघाबद्दल फारशी माहिती नसलेली एक वेगळ्या प्रकारची माहिती खाली देत आहे. संघ म्हणजे निव्वळ शाखा, कवायती किंवा संचलन नव्हे. संघ टीकेकडे दुर्लक्ष करून, अनेकदा टीकाकारांना अनुल्लेखाने मारून, टीकेने निरूत्साही न होता, अनेक क्षेत्रात गाजावाजा न करता संरक्षण, शिक्षण, आंतरराष्ट्रीय संबंध, अंतर्गत सुरक्षा, परराष्ट्र धोरण इ. वेगवेगळ्या विषयांवर विचार व संशोधन करण्यासाठी संघाने अनेक संस्था स्थापन केल्या आहेत. १) विवेकानंद आंतरराष्ट्रीय संस्था (http://www.vifindia.org/) - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, अर्थतज्ज्ञ विवेक देब्रॉय, नीति आयोगाचे सदस्य व्ही के सारस्वत, नृपेंद्र मिश्रा इ. नामवंत या संस्थेचे सदस्य आहे. भारतातील सामाजिक, सुरक्षा व आर्थिक आव्हानांवर ही संस्था काम करीत आहे. २) इंडिया फाऊंडेशन (http://netleondev.com/indiafoundation/) - India Foundation is an independent research centre focussed on the issues, challenges and opportunities of the Indian polity. The Foundation believes in understanding contemporary India and its global context through a civilizational lens of a society on the forward move. Based on the principles of independence, objectivity and academic rigour, the Foundation aims at increasing awareness and advocating its views on issues of both national and international importance. It seeks to articulate Indian nationalistic perspective on issues. India Foundation’s vision is to be a premier think tank that can help understand the Indian civilizational influence on our contemporary society. ३) Forum for Integrated National Security - भारताची राष्ट्रीय सुरक्षा, त्या दृष्टीने शेजारी देशांशी असलेले संबंध, आण्विक धोरण इ. विषयांवर ही संस्था अभ्यास व संशोधन करते. Established in 2004, FINS describes itself as an 'apolitical think tank' that believes 'a secured nationhood can provide peace and prosperity to citizens', 'keeping national security at its core'. ४) India Policy Foundation - Established in 2008, IPF describes itself as a not-for-profit think-tank engaged in "high quality research, influential thought leadership, educated debates and policy recommendations to issues of national importance for India". It also "aims to strengthen democracy and egalitarianism", with "utmost adherence to national interest". ५) Forum for Strategic and Security Studies - Set up in 2010, FSSS claims to be an "independent, non-profit making, non-political institution" that provides "a platform for research, analysis, option formulation and evaluation of national security policies of, and security relationships between, states, particularly those in South Asia and the Asia Pacific region". The institute's areas of "special research" include Nuclear Proliferation Review - Ripple Effect on Global Nuclear Strategies and Arms Control, Missile Defence, South Asian Security Environment, Global War on Terrorism, India's Security Matrix, Conundrum in Afghanistan, Indo-Bangladesh Relations and Climate Change and Environmental Security. ६) Public Policy Research Centre - Established in 2011 and fully launched in October 2013, PPRC addresses "the emerging challenges of 21st century". ७) Centre for Policy Studies - The centre was established in 1990. It claims to be "an institute for research and study aimed at comprehending and cherishing the essential civilisational genius of India, and to help formulate a polity that would allow the Indian genius to flourish and assert itself in the present day world".

Submitted by साहना on Tue, 09/13/2016 - 16:56

In reply to संघाबद्दल एकंदरीत काही जणांचे by श्रीगुरुजी

Permalink

ह्या सर्व संघटनांच्या

ह्या सर्व संघटनांच्या प्रयत्नाने भारतात कुठलाही पॉलिसी बदल घडून आला काय ? पुढील २० वर्षांत एखाद्या क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्याचीटाकत त्यांच्यात आहे काय आणि त्या दृष्टीने काही पावले उचलली गेली आहेत का कि निव्वळ संघ प्रमाणे उभा विटेवरी अशी परिस्थतीती आहे ? VIF ला मी RTE वर आपली भूमिका स्पष्ट करा म्हणून इमेल पाठवले अजून तरी त्यांना वेळ मिळाला असेल असे वाटत नाही. त्यांच्या ह्या लेखांत मायनॉरिटी ह्या शब्दाचा उल्लेख सुद्धा नाही http://www.vifindia.org/article/2012/may/16/the-right-to-education आणि ९० वर्षांत हीच का ती उपलब्धी ? कुणीही वाचत नाही आणि काहीही इम्पॅक्ट नाही अश्या प्रकारचे लेख लिहिणाऱ्या ३-४ संस्था ? सोनिया गांधी पासून धडा घ्या. १० वर्षांत NAC बनवून त्यांनी ४ वेळा घटना दुरुस्ती केली किमान ३ मोठे कायदे पास केले ज्याची फळे आम्हाला भोगावी लागतील. आणि पुढील १० वर्षांत काय कायदे पस करायचे ह्याचा आराखडा सुद्धा आधीच तयार. संघाच्या कॅम्प मध्ये काय खिचडी शिजत आहे ?

Submitted by साहना on Tue, 09/13/2016 - 16:57

In reply to ह्या सर्व संघटनांच्या by साहना

Permalink

मी हे उपरोधाने विचार नाही आहे

मी हे उपरोधाने विचार नाही आहे मनापासून प्रश्न आहे. आपणाला जर माहिती असेल तर जरूर सांगा कि राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर ह्या विचार टांकीनी काही बदल घडवून आणला काय ?

Submitted by मोदक on Tue, 09/13/2016 - 17:16

In reply to मी हे उपरोधाने विचार नाही आहे by साहना

Permalink

तुमचे मनापासून विचारलेले

तुमचे मनापासून विचारलेले प्रश्न आक्रस्ताळेपणे मांडून तुम्हाला हवी तशी उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहात का..? खरोखरी उत्तरे हवी असतील तर दोन्ही बाजूंचा नीट अभ्यास करा आणि मग सभ्यतेने प्रकट व्हा. बाकी तुम्ही डुआयडी पिलावळीतले असाल तर वरची सुचवणूक तुम्हाला लागू नाही असे समजून गरळ ओकणे सुरू ठेवा.

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 09/13/2016 - 18:28

In reply to ह्या सर्व संघटनांच्या by साहना

Permalink

त्यांच्या ह्या लेखांत

त्यांच्या ह्या लेखांत मायनॉरिटी ह्या शब्दाचा उल्लेख सुद्धा नाही http://www.vifindia.org/article/2012/may/16/the-right-to-education
कशाला पाहिजे तो उल्लेख? तसं पाहिलं तर त्या लेखात हिंदू, ख्रिश्चन इ. शब्दांचे सुद्धा उल्लेख नाहीत.
VIF ला मी RTE वर आपली भूमिका स्पष्ट करा म्हणून इमेल पाठवले अजून तरी त्यांना वेळ मिळाला असेल असे वाटत नाही.
अनुदानाच्या मुद्द्यावर पर्रीकर सरकारने २०१२ मधील निवेदन तुम्हाला समजलेच नाही. तरीसुद्धा तुम्ही छातीठोकपणे 'पर्रीकर सरकारने हिंदू शाळांचे अनुदान काढून ते इंग्लिश शाळांना दिले' अशा अर्थाचे पूर्णपणे असत्य असलेले दावे रेटून केलेत. या धाग्यावर प्रतिसाद देताना अनेक प्रतिसादात तुम्ही खालची पातळी गाठलीत. एकंदरीत तुम्ही त्या ईमेलमध्ये काय चुकीचे प्रश्न विचारले असेल व त्यासाठी कशी भाषा वापरली असेल याचा अंदाज येतोय. त्यामुळेच त्यांनी ईमेलला उत्तर दिले नसावे.

Submitted by साहना on Wed, 09/14/2016 - 01:43

In reply to त्यांच्या ह्या लेखांत by श्रीगुरुजी

Permalink

आर्यभट्टानी थेअरी ऑफ

आर्यभट्टानी थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा शोध आधीच लावला होता पण कुणी विचारले नाही म्हणून सांगितले नाही अश्या प्रकारच्या अर्ग्युमेण्ट निरर्थक आहेत. RTE कायदा युनिफॉर्म नाही हा त्यातील घोळ कोणीही समजू शकतो. हे ज्या विचारवंतांच्या लक्षांत येत नाही ते आणि कसले विचारवंत ? आणि फायदा काय असल्या विचारटंकीचा ज्यांना मूलभूत प्रश्न सुद्धा समाजत नाहीत ? ह्या उलट स्वतंत्र हिंदू आक्टिविस्ट जसे राजीव मल्होत्रा ह्यांना हे मुद्दे तात्काळ समजतात. अगदी विदेशी विचारवंत जसे कोएनरोड एलस्ट वगैरे लोकांना सुद्धा ह्या कायद्यातील हिंदू विरोधी त्रुटी तात्काळ समजल्या पण आपले सांग वाले मात्र कम्युनिस्ट छाप लिखाणाचं करतात. कायदा, शिक्षण, अर्थव्यवस्था ह्या विषयावर संघ आणि कम्युनिस्ट ह्यांच्यात विशेष फरक नाही. > तुम्ही छातीठोकपणे 'पर्रीकर सरकारने हिंदू शाळांचे अनुदान काढून ते इंग्लिश शाळांना दिले' मी काय लिहिते ह्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही काय समजलात ह्याची जबाबदारी माझ्या कडे नाही. पर्रीकर सरकारने फक्त ख्रिस्ती इंग्रजी शाळांनाच अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय परिपत्रक काढून जाहीर केला होता. काही दिवसांत त्याचे रूपांतरण कायद्यांत सुद्धा होईल. परिपत्रक आणि त्यासंबंधित कॅबिनेट नोट दोन्ही गोआ सरकारच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत आणि तिथे जे लिहिले आहे ते स्पष्ट आहे. तुम्हाला अज्ञानात लोळून सुख उपभोगायचे असेल तर मी काय करू शकते ?

Submitted by प्रीत-मोहर on Wed, 09/14/2016 - 08:22

In reply to आर्यभट्टानी थेअरी ऑफ by साहना

Permalink

पर्रीकर सरकारने फक्त ख्रिस्ती

पर्रीकर सरकारने फक्त ख्रिस्ती इंग्रजी शाळांनाच अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय परिपत्रक काढून जाहीर केला होता. काही दिवसांत त्याचे रूपांतरण कायद्यांत सुद्धा होईल.
होईल ...अच्छा म्हणजे झालं नाही हे मान्य करता तर.पण तुम्ही तर म्हणला होता ८ शाळांच अनुदान काढल होत, त्या कोणत्या शाळा हे सांगाल का? नाही आता डायरेक्ट सांगते मी गोवा बोर्ड मधे कार्यरत आहे. त्यामुळे ग्रांट काढली ना तर मला समजतं अहो. हां १-२ शाळा मुलं नसल्यामुळे बंद पडायच्या मार्गावर आहेत (का हे मी सांगू शकत नाही) पर्रीकरांनी माध्यम प्रश्न नीट हाताळला नाहीये हे मान्यच आहे. पण म्हणून नाही ते त्यांच्या माथी मारु नका. मराठी/ कोकणी शाळा कोणत्याही संस्थेच्या असल्या तर अनुदान मिळेल. इंग्रजी माध्यमातून फक्त जुन २०११ पूर्वी अनुदानित शाळांच अनुदान काढणार नाही आहेत. आता डायोसेशन सोसायटीच्या काही शाळांना मान्यता मिळाली (माझ्या माहितीप्रमाणे त्या प्राथमिक शाळा नाहियेत).जर माध्यमिक शाळा असतील तर प्रश्नच नाही. पण प्राथमिक असतील तर या शाळांचे माध्यम कोणते ते पहावे लागेल. जर इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा असतील तर अनुदान मिळू नये त्यांना. टीप. या शाळांसोबत अनेक बिगर ख्रिश्चन प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना मान्यता मिळाल्याचे मला ठाउक आहे. त्यातल्या काही शाळा माझ्या भागातच सुरु झाल्या आहेत.

Submitted by प्रीत-मोहर on Wed, 09/14/2016 - 08:25

In reply to पर्रीकर सरकारने फक्त ख्रिस्ती by प्रीत-मोहर

Permalink

आणि अश्या प्रकारे ग्रांट

आणि अश्या प्रकारे ग्रांट काढली असेल तर ते रस्त्यावर उतरले असते की हो. आता तर भाभासुमं पण आहे सपोर्ट ला. अस काही घडल्याच माझ्या ऎकण्यात आणि वाचण्यात नाहीये.

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 09/14/2016 - 13:26

In reply to आर्यभट्टानी थेअरी ऑफ by साहना

Permalink

> तुम्ही छातीठोकपणे 'पर्रीकर

> तुम्ही छातीठोकपणे 'पर्रीकर सरकारने हिंदू शाळांचे अनुदान काढून ते इंग्लिश शाळांना दिले' मी काय लिहिते ह्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही काय समजलात ह्याची जबाबदारी माझ्या कडे नाही. पर्रीकर सरकारने फक्त ख्रिस्ती इंग्रजी शाळांनाच अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय परिपत्रक काढून जाहीर केला होता. काही दिवसांत त्याचे रूपांतरण कायद्यांत सुद्धा होईल. परिपत्रक आणि त्यासंबंधित कॅबिनेट नोट दोन्ही गोआ सरकारच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत आणि तिथे जे लिहिले आहे ते स्पष्ट आहे. तुम्हाला अज्ञानात लोळून सुख उपभोगायचे असेल तर मी काय करू शकते ?
तुमच्या पूर्वीच्या प्रतिसादात गोवा सरकारच्या परिपत्रकासंबंधी तुम्हीच खालील लिंक दिलेली आहे.
पर्रीकर ह्यांचा बद्दल मी जे काही लिहिले आहे ते १००% सत्य आहे. पर्रीकर ह्यांनी इशू केलेले हे सर्कलर वाचा http://www.education.goa.gov.in/Cir_MoI1.pdf (पॅरा vi )
या परिपत्रकातील सर्व मुद्दे पाहू या. १) At the primary level, the teaching in primary schools shall be in the mother tounge of the child i.e. Konkani/Marathi, as the case may be and subject to exception provided herein after, only Konkani/Marathi primary schools shall be entitled to receive grants. 2) Government will give permission immediately to new primary schools oting to impact primary education in Konkani/Marathi. For such schools, one time initila special grant of Rs. 12.00 Lakhs and Rs. 1.00 Lakh per annum for next 05 years shall be given so as to imrpove and set up the necessary infrastructure as well as build up resources in the school. 3) State government proposes to amend suitably the Goa School Education Rules to voercome the distance criteria, in respect of permitting additional schools in Konkani/Marathi within 01 KM, provided the existing school has strength of less than 40 students. 4) All grent-in-aid primary schools, including the new ones will be eligible for full grant to primary schools including Maintenance Grant Salary Grant for non teaching staff as also addional teacher with B.Ed. qualifications for improving the quality of English/Konkani/Marathi teaching at the primary level, on a case to case basis. 5) The State Policy is to encourage Primary Education in the mother tongue of the Children i.e. with Konkani and Marathi being the regional languages of the State and in this regard, the State Government shall initiate all steps to increase the number of schools in the regional languages namely Konkani/Marathi and give financial assistance as well as full grants over and as above free salary grants to all such Konkni/Marathi schools proposed to be started in the State. 6) However, having regard to the fact that
minority/certain institutions in the State which were prior to 10th June, 2011 imparting Konkani/Marathi primary education, and have thereafter simultaneously shifted to English and started English Primary classes shall, vontinue to receive grants so as to give continuity to these schools and especially having regard to the fact the fact that the students in these schools should not suffer.
7) The aforesaid schools will be entitled to continuw receiving grants provided the fulfill the follwoing" a) Such schools were Konkani/Marathi schools until 10th June 2011. These schools have started English classes at the primary stage during the last academic year wholly or partly. b) That none of such schools had given an undertaking to the Directorate of Education stating that they would not claim grant in aid from the state Government to establish or run such English Primary schools. या परिपत्रकातील सर्व ७ मुद्द्यांमधून खालील गोष्टी अगदी स्पष्ट दिसत आहेत. - कोकणी/मराठी माध्यम असलेल्या शाळांना अनुदान सुरूच राहील. - नवीन कोकणी/मराठी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यास सरकार प्रोत्साहन देऊन सरकार अशा शाळांना अनुदान देईल. - जून २०११ पूर्वी ज्या शाळा कोकणी/मराठी माध्यमाच्या होत्या व त्यानंतर ज्यांनी इंग्लिश माध्यम सुरू केले आहे, अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अशा शाळांचे देखील अनुदान सुरू राहील. तुमचे आधीचे दोन दावे - 'पर्रीकर सरकारने हिंदू शाळांचे अनुदान काढून ते इंग्लिश शाळांना दिले' व 'पर्रीकर सरकारने फक्त ख्रिस्ती इंग्रजी शाळांनाच अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय परिपत्रक काढून जाहीर केला होता.' - हे धडधडीत खोटे आहेत हे या परिपत्रकातील मुद्द्यांवरून स्पष्ट आहे. एवढे असूनसुद्धा तुम्ही आपल्या मूळच्या पूर्वग्रहदूषित व असत्य दाव्यांना चिकटून आहात व त्याचे समर्थन करीत आहात.

Submitted by साहना on Wed, 09/14/2016 - 20:30

In reply to > तुम्ही छातीठोकपणे 'पर्रीकर by श्रीगुरुजी

Permalink

> minority/certain

> minority/certain institutions in the State which were prior to 10th June, 2011 imparting Konkani/Marathi primary education ह्यांत मायनॉरिटी हा शब्द आपल्याला दिसत नाही का ? "मायनॉरिटी/certain" ह्या शब्दाचा अर्थ कॅबिनेट च्या concept नोट मध्ये अधिक स्पष्ट पणे (फक्त मायनॉरिटी) दिला गेला आहे. पूर्वग्रहाचा प्रश्नच येत नाही. पूर्वी पासून आमचे पर्रीकर आणि गोवा भाजपशी घनिष्ट संबंध आहेत. आज सुद्धा फार चांगले संबंध आहेत. अकॅडेमिक क्षेत्रांत कार्य असल्याने कायदा काय आहे, कश्या साठी केला गेला आहे आणि त्याचा वापर कसा केला जाईल हे ह्याचा माझ्या परिवाराला first hand अनुभव आहे. पर्रीकरांना व्हिलन ठरविण्याचा माझा उद्धेश नाही उलट पर्रीकर सारखा विद्वान माणूस सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी हिंदू हिताचा बळी देऊ शकतो आणि त्यासाठी तुमच्या आमच्या सारख्यांच्या डोळ्यांत तेल घालून सरकारी कारभारावर लक्ष ठेवले पाहिजे असे माझे म्हणणे आहे. पर्रीकर ह्यांनी फक्त ख्रिस्ती शाळांचे अनुदान चालू ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो वरील मुद्यातून अगदी स्पष्ट आहे. सुमारे १३० ख्रिस्ती शाळांनी १० जून आधी माध्यम बदलले होते. एकूणच कायदा निर्माणात डायसोजेन सोसायटी ह्यांचा फार जवळचा सहभाग असल्याने त्यांनी व्यवस्थतीत गंगेत हात धुवून घेतले आहेत. १० जून आधी माध्यम बदलेल्या हिंदूचालीत शाळांची संख्या फार कमी आहे आणि त्यांना अनुदान प्राप्त होणार नाही. खरेतर सुमारे १२ खाजगी शाळांनी इंग्रजी पासून मराठी/कोंकणी माध्यम बदलले आहे. Certain हा एक अतिशय vague शब्द परिपत्रकांत वापरला गेला आहे. Certain ह्याचा अर्थ बिगर-अल्पसंख्यांक असा होत नाही. कायदा जेंव्हा पास होईल तेंव्हा कदाचित ह्या शब्दाचा नेमका अर्थ स्पष्ट केला जाईल पण मुद्दाम हुन हा ओपन एंडेड शब्द वापरला गेला आहे. कायद्यात certain ह्या शब्दाचा अर्थ MOI concept नोट मधील डेफिनिशन ने ठरवलं जाईल असे सर्वच (गोव्यांतील) कायदे पंडितात एकमत आहे. पान ८ वर A मध्ये तीन वर्गवारी दिल्या गेल्या आहेत. त्यातील i आणि ii म्हणजे मायनॉरिटी/certain आणि iii म्हणजे इतर (ज्यांत हिंदू इंग्रजी शाळा ज्यांनी माध्यम १० जून आधी बदलले होते) [ http://www.education.goa.gov.in/cir13/State%20Govt%20decision%20on%20MOI%20policy.pdf ] कायद्याची भाषा वेगळी असते. कायद्याचा भाषेंत "only minority" असा शब्द प्रयोग करण्याची गरज नाही कारण "मायनॉरिटी" ह्याचा अर्थ "only minority" असाच होतो.

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 09/14/2016 - 20:41

In reply to > minority/certain by साहना

Permalink

> minority/certain

> minority/certain institutions in the State which were prior to 10th June, 2011 imparting Konkani/Marathi primary education ह्यांत मायनॉरिटी हा शब्द आपल्याला दिसत नाही का ?
दिसतोय ना. पण याचा अर्थ तुमच्या आधीच्या दाव्यानुसार 'मराठी शाळांचे अनुदान बंद करून १००% अनुदान ख्रिस्ती शाळांना दिले' असा होतो का? हा मुद्दा पुन्हा एकदा वाचा व त्यातील ठळक वाक्ये वाचा. minority/certain institutions in the State which were prior to 10th June, 2011 imparting Konkani/Marathi primary education, and have thereafter simultaneously shifted to English and started English Primary classes shall, vontinue to receive grants so as to give continuity to these schools and especially having regard to the fact the fact that the students in these schools should not suffer.
अकॅडेमिक क्षेत्रांत कार्य असल्याने कायदा काय आहे, कश्या साठी केला गेला आहे आणि त्याचा वापर कसा केला जाईल हे ह्याचा माझ्या परिवाराला first hand अनुभव आहे.
तुमचे एकंदरीत इंग्लिश भाषेचे अज्ञान, मनात भरलेला पराकोटीचा पूर्वग्रह व द्वेष आणि इथल्या बहुसंख्य प्रतिसादातून दिसणारी अत्यंत खालच्या पातळीची, असभ्य व शिवराळ भाषा यावरून तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात आहात यावर विश्वास ठेवणे अत्यंत अवघड आहे.
पर्रीकरांना व्हिलन ठरविण्याचा माझा उद्धेश नाही उलट पर्रीकर सारखा विद्वान माणूस सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी हिंदू हिताचा बळी देऊ शकतो आणि त्यासाठी तुमच्या आमच्या सारख्यांच्या डोळ्यांत तेल घालून सरकारी कारभारावर लक्ष ठेवले पाहिजे असे माझे म्हणणे आहे.
पर्रीकरांनी हिंदू हिताचा बळी दिलेला नाही. हा निष्कर्ष अत्यंत चुकीचा आहे.
पर्रीकर ह्यांनी फक्त ख्रिस्ती शाळांचे अनुदान चालू ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो वरील मुद्यातून अगदी स्पष्ट आहे.
पहिले ५-६ मुद्दे अजूनही समजलेले दिसत नाहीत. कोकणी/मराठी शाळांचे अनुदान सुरूच राहील, नवीन कोकणी/मराठी शाळांना प्रोत्साहन देऊन त्यांना अनुदान देण्यात येईल असे अगदी स्पष्ट व निसंदिग्ध शब्दात लिहिले आहे. तरीसुद्धा पर्रीकर यांनी फक्त ख्रिस्ती शाळांचे अनुदान सुरू ठेवले हा अत्यंत चुकीचा निष्कर्ष अजूनही कायम आहे.
१० जून आधी माध्यम बदलेल्या हिंदूचालीत शाळांची संख्या फार कमी आहे आणि त्यांना अनुदान प्राप्त होणार नाही.
असे परिपत्रकात कोठे लिहिले आहे?

Submitted by साहना on Wed, 09/14/2016 - 21:17

In reply to > minority/certain by श्रीगुरुजी

Permalink

हम्म, आता मला आपला गोंधळ

हम्म, आता मला आपला गोंधळ समजला. मराठी/कोंकणी शाळा हे dont care टर्म आहे. म्हणजे ह्या शाळा संबंधित काहीही विशेष पोलिसी बदल पर्रीकरांनी किंवा आणखी कोणीही केलेला नाही. संपूर्ण वाद फक्त इंग्रजी प्राथमिक शाळांचाच आहे. थोडक्यांत सांगायचे झाले तर हि क्रमवारी आहे. ०. गोव्यांत कुठल्याही इंग्रजी प्राथमिक शाळेला अनुदान मिळत नव्हते. १. काँग्रेस सरकारने सर्व प्राथमिक इंग्रजी शाळांना सरकारी अनुदान जाहीर केले. २. सुमारे १३० आणि १०-२० हिंदू खाजगी शाळांनी माध्यम बदलून अनुदानाचा फायदा घेतला. ३. पर्रीकर सरकारनी इंग्रजी प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान ह्या पुढे मिळणार नाही असे जाहीर केले. ४. जुन १० पूर्वी ज्या अल्पसंख्यांक इंग्रजी शाळांना अनुदान मिळत होते त्यांना ते तसेच चालू राहील हे घोषित केले. ह्याचाच अर्थ ज्या १०-२० हिंदू इंग्रजी प्राथमिक शाळा होत्या त्यांना ते अनुदान मिळणे बंद झाले आहे. थोडक्यांत काय तर आज गोव्यांत सुमारे १३० ख्रिस्ती इंग्रजी माध्यमाच्या शाळा सरकारी अनुदानावर चालतात तर सरकारी अनुदानावर चालणाऱ्या हिंदू इंग्रजी शाळांची संख्या शून्य आहे. इंग्रजी प्राथमिक शिक्षण ह्या high growth मार्केट वर सरकारने चर्च ला मोनोपॉली प्रदान केली आहे.

Submitted by प्रीत-मोहर on गुरुवार, 09/15/2016 - 07:29

In reply to हम्म, आता मला आपला गोंधळ by साहना

Permalink

थोडक्यांत काय तर आज गोव्यांत

थोडक्यांत काय तर आज गोव्यांत सुमारे १३० ख्रिस्ती इंग्रजी माध्यमाच्या शाळा सरकारी अनुदानावर चालतात तर सरकारी अनुदानावर चालणाऱ्या हिंदू इंग्रजी शाळांची संख्या शून्य आहे. इंग्रजी प्राथमिक शिक्षण ह्या high growth मार्केट वर सरकारने चर्च ला मोनोपॉली प्रदान केली आहे.
Are you sure about this? कारण मला जितकी इंग्रजी समजते त्यात सर्टन मधे बिगर मायनोरिटी शाळा येतात. कोई नही. हातच्या काकणाला आरसा कशाला?DE माझ्या ऒफिसशेजारीच आहे. बघतेच विचारून.

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 09/13/2016 - 20:35

Permalink

चमत्कार हा शब्द फारच उदारपणे

चमत्कार हा शब्द फारच उदारपणे वापरला आहे असं म्हणता येईल. संघाने जे काही चांगलं काम केलेलं आहे तसं काम करणाऱ्या संस्था, संघटना जगभर गेल्या हजारो वर्षांत कित्येक झाल्या. हिंदू धर्मात जी वर्णव्यवस्था आहे त्याप्रमाणे जर कलियुगात झालेल्या चमत्कारांचं वर्गीकरण करायचं झालं तर संघ हा त्यामनाने क्षुद्र चमत्कार आहे. वरच्या जातीतले चमत्कार काही नोंदवतो. १. आधुनिक वैद्यक किंवा मॉ़डर्न मेडिसिन - पेनिसिलिनने कोट्यवधी जीव वाचवले. पोलियो, देवी, वगैरेंवरच्या लशींमुळे अब्जावधी आयुष्यं सुखी झाली. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान जितके लोक युद्धाने मारले तितकेच फ्लूच्या साथीने मेले. आता हे सगळं इतिहासात गेलं आहे. हा खरा उच्च जातीचा चमत्कार. २. लोकशाही - जगभर लोकशाहीचं वारं फिरतं आहे. शंभरेक वर्षांपूर्वी जवळपास आख्खं जग कुठल्या ना कुठल्या राजवटीखाली होतं. आता लोकं काय म्हणतात हे गंभीरपणे घेणाऱ्या राज्यव्यवस्थांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. अमर्त्य सेन यांनी म्हटलेलं होतं त्याप्रमाणे दुष्काळ आणि त्यातून होणारे मृत्यू हे लोकशाही व्यवस्थेत होत नाहीत - आणि त्याची प्रचिती दिसून येते आहे. हाही उच्च प्रतीचा चमत्कार आहे. त्याआधी गेल्या हजारो वर्षांत दुष्काळात लोकं मरणं हे जवळपास नैसर्गिक होतं. ३. शिक्षणाचा प्रसार - हजारो वर्षं अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेली सामान्य जनता आता ज्ञान घेऊ शकते आहे. शिक्षण हा मूलभूत अधिकार बनलेला आहे. जगातल्या साक्षरांचं प्रमाण दोनपाच टक्क्यांवरून नव्वद टक्क्यांच्या आसपास येतं आहे. याला म्हणतात चमत्कार. कारण तो अब्जावधी जीवनांवर सकारात्मक परिणाम करून जातो. ४. इंटरनेट/मोबाइल क्रांती - प्रत्यक्ष ज्ञान अगदी चुटकीसरशी हाताशी आलेलं आहे. त्याचबरोबर घडलेल्या मोबाईल क्रांतीमुळे जगाशी असलेला जोडलेपणा वाढलेला आहे. हा खरा चमत्कार आहे. ५. भारतीय घटना - नुसतं हिंदूंबाबतच बोलायचं तर हिंदू समाजातल्या ८० टक्के समाजाला दलित, महार, सोनार, चांभार वगैरे जातींच्या बंधनांतून बाहेर काढण्याचं काम भारतीय घटनेवर काम करून जे आंबेडकरांनी लेखणीच्या काही फटकाऱ्यांनी केलं, ते कितीही दंड फिरवून संघाला करता आलं नाही. त्या चमत्काराच्या मानाने संघाचा 'चमत्कार' हा क्षुद्रच आहे. तेव्हा चमत्कार नक्की कशाला म्हणायचं हे जरा तुलनेेनेच ठरवावं असं माझं मत आहे.

Submitted by चंपाबाई on Tue, 09/13/2016 - 20:47

In reply to चमत्कार हा शब्द फारच उदारपणे by राजेश घासकडवी

Permalink

....

जे आंबेडकरांनी लेखणीच्या काही फटकाऱ्यांनी केलं, ते कितीही दंड फिरवून संघाला करता आलं नाही. दंडवत !

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 09/13/2016 - 20:50

In reply to .... by चंपाबाई

Permalink

लोचट प्रतिसाद!

लोचट प्रतिसाद!

Submitted by चंपाबाई on Tue, 09/13/2016 - 23:18

In reply to लोचट प्रतिसाद! by श्रीगुरुजी

Permalink

...

मिरच्या झोंबल्या का ? डॉ. आंबेडकरांचे कर्तूत्व जगभर गाजल्यावर संघाने आंबेडकर जयंतीचा गांजावाजा सुरु केला ना ? एकेकाळी बुद्धाला त्या धर्मातून या धर्मात ओढुन झालं .... आता बाबासाहेबाना 'त्या' संघातून 'या ' संघात ओढण्याची धडपड !

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 09/13/2016 - 23:26

In reply to ... by चंपाबाई

Permalink

लोचट प्रतिसाद!

लोचट प्रतिसाद!

Submitted by नर्मदेतला गोटा on Wed, 09/14/2016 - 00:34

In reply to लोचट प्रतिसाद! by श्रीगुरुजी

Permalink

नेमका कुणाचा

नेमका कुणाचा

Submitted by पैसा on Wed, 09/14/2016 - 11:07

In reply to चमत्कार हा शब्द फारच उदारपणे by राजेश घासकडवी

Permalink

टैम प्लीज

भारतीय घटनेवर काम करून जे आंबेडकरांनी लेखणीच्या काही फटकाऱ्यांनी केलं,
घटनेचे प्रारूप तयार केले ते सात सदस्यांच्या समितीने. समितीचे सदस्य होते अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के.एम. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मित्तल व डी.पी. खेतान. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद होते असाही उल्लेख दिसतो. सदस्यांची नावे गांधीजींनी सत्यनारायण सिन्हा यांच्यातर्फे सुचवली होती आणि बी एन राव यानी घटनेचा पहिला कच्चा मसूदा तयार केला होता अशीही माहिती मिळते. मग "ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिली" या चालीत घटना डॉ. आंबेडकरांनी लिहिली असे का म्हटले जाते? डॉ आंबेडकरांचे कार्य वादातीत आहे पण घटना तयार करण्याचे श्रेय बर्‍याच जणांचे मिळून आहे ना?

Submitted by सुबोध खरे on Wed, 09/14/2016 - 12:12

In reply to टैम प्लीज by पैसा

Permalink

घटना तयार करण्याचे श्रेय बर्

घटना तयार करण्याचे श्रेय बर्‍याच जणांचे मिळून आहे ना? असे लिहिणे म्हणजे प्रतिगामी आणि मनुवादी आहे. आम्ही पैसा ताईंचा निषेध करतो.

Submitted by पैसा on Wed, 09/14/2016 - 12:15

In reply to घटना तयार करण्याचे श्रेय बर् by सुबोध खरे

Permalink

करा करा!

मी पण तुम्हाला सहमत! फुरोगामी म्हणालात नाही तोपर्यंत काहीही चालेल! =))

Submitted by चंपाबाई on Wed, 09/14/2016 - 13:38

In reply to करा करा! by पैसा

Permalink

....

ते रामाने लंकेवर विजय मिळवला , या चालीत वाचावे. टीमवर्क असले तरी टीम त्यातल्या कुणाच्या तरी नावे ओळखली जाते , तसे. किंवा शास्त्रीय संगीताच्या भाषेत , एका थाटात भरपूर राग असतात . त्यापैकी एकाचे नाव थाटाला देतात , तसे.

Submitted by अप्पा जोगळेकर on Wed, 09/14/2016 - 14:20

In reply to .... by चंपाबाई

Permalink

टीमवर्क असले तरी टीम

टीमवर्क असले तरी टीम त्यातल्या कुणाच्या तरी नावे ओळखली जाते , तसे. ओके. तर मग यापुढे कोणत्याही डु आयडीने उचापती केल्या तर त्या 'चंपाबाई' या आयडीच्या नावे ओळखल्या जाव्यात का ?

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 09/14/2016 - 14:24

In reply to .... by चंपाबाई

Permalink

लोचट प्रतिसाद!

लोचट प्रतिसाद!

Submitted by चंपाबाई on Wed, 09/14/2016 - 16:41

In reply to लोचट प्रतिसाद! by श्रीगुरुजी

Permalink

बर्र्र्र्र्र !

मूल आई व बाप दोघांचे असते... पण पूर्ण नाव म्हटले की बाबांचे नाव लागते , तसे. बाबा ! हे तरी पटले का ?

Submitted by तेजस आठवले on Wed, 09/14/2016 - 20:01

In reply to बर्र्र्र्र्र ! by चंपाबाई

Permalink

माई मोड सुरु

माई मोड सुरु हो ग चंपूडी, अगं अगदी तुझा जन्म झाला तेव्हा आमचे हे आणि मी किती वेळ ठरवत होतो कि तुझे नाव काय बरे ठेवावे.... पण नाव काय ठेवायचे.. मुलीचे का मुलाचे.... तुझा तर काही अंदाजच लागत नव्हता.... पुन्हा पुन्हा पहिले तरी !! तसे आमचे हे जरा धांदरट होतेच म्हणा पण त्यांचे शब्द मात्र खरे ठरले हो, म्हणाले, नाव काहीही ठेवा, हे बालक नेहमी नाव बदलून जगात आग लावायचे धंदे करणार हे मात्र नक्की. मी काही फारसे लक्ष तेव्हा देऊ शकले नाही तेव्हा, मला माझ्याच दहाव्या डुआयडी चे डोहाळे लागले होते ...इश्श्य!!! माई मोड समाप्त हलके घेणे : सर्व वर्जिनल आयडी .... अजिबात हलके घेऊ नये :डुआयडी.... विशेष नोंद : मी कोणाचा ही डुआयडी नाही. मी गेली 6 वर्षे वाचनमात्र होतो आणि आत्ताच सदस्यत्व घेतले आहे. सबब माझ्या इकडील सदस्यत्व कार्यकालावरून कोणतेही तर्क व आरोप करू नयेत ही विनंती!

Submitted by चंपाबाई on Wed, 09/14/2016 - 20:24

In reply to माई मोड सुरु by तेजस आठवले

Permalink

अय्या !

नाव आत्या ठेवते . म्हणजे तू माझी आत्या ! आत या !
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 09/14/2016 - 20:32

In reply to अय्या ! by चंपाबाई

Permalink

बाकी चंपेशा तुमची विचारसरणी

बाकी चंपेशा तुमची विचारसरणी काय का असेना, हजरजबाबी पणाला मात्र तोड नै. अशे कै लिहिता की हसलाच पैजे वाचणारा.

Submitted by सुबोध खरे on Wed, 09/14/2016 - 20:33

In reply to अय्या ! by चंपाबाई

Permalink

आणि तुम्ही बाहेर जा

आणि तुम्ही बाहेर जा

Submitted by तेजस आठवले on Wed, 09/14/2016 - 20:39

In reply to अय्या ! by चंपाबाई

Permalink

हो,

हो, माई तुझी आत्या आणि माईंचे हे तुझे आत्तोबा

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 09/14/2016 - 20:49

In reply to बर्र्र्र्र्र ! by चंपाबाई

Permalink

चूक.

आता मुलाच्या वडिलांचं आणि आईचं अशी दोघांचीही नावं लागतात. मुंबई विद्यापीठातल्या गुणपत्रकावर असं नाव गेली १५ वर्षे लिहिलं जातंय. बाकी विद्यापीठांमध्येही असंच असावं. जन्म प्रमाणपत्रावरही दोघांची नावं असतात.

Submitted by नर्मदेतला गोटा on Wed, 09/14/2016 - 15:03

In reply to चमत्कार हा शब्द फारच उदारपणे by राजेश घासकडवी

Permalink

अनेक बॅका आज दादा बाबा

अनेक बॅका आज दादा बाबा यांच्या नावाने ओळखल्या जातात. करोडोंच्या गैरव्यवहारात त्या अडकतात. हे आपल्यासमोर आहे. पण संघ स्वयंसेवकांच्या बँका कोणा एका व्यक्तिच्या नावाने ओळखल्या जात नाहीत. दुसरी गोष्ट खातेदारांचा पैसा लाटण्याच्या उद्देशाने त्या चालवल्या जात नाहीत. या स्वार्थी जगातले हे वेगळेपण आहे.
हिंदू धर्मात जी वर्णव्यवस्था आहे त्याप्रमाणे
वरच्या जातीतले चमत्कार
जातीपातींनी बरबटलेला हा आपला विचार. याचे मूळ नक्कीच माजवादात असणार. चमत्कार शब्द वापरताना तो का हे सविस्तर लिहीले आहे. तेवढे न वाचता चमत्कार शब्दावर इतकं लिहित बसलात. शब्दछळ करण्याचा माजवाद्यांचा आवडता छंद असतो. तो जोपासत रहा.

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 09/14/2016 - 15:22

In reply to अनेक बॅका आज दादा बाबा by नर्मदेतला गोटा

Permalink

जातीपातींनी बरबटलेला हा आपला

जातीपातींनी बरबटलेला हा आपला विचार. याचे मूळ नक्कीच माजवादात असणार.
नाही हो, हिंदुत्वावाद्यांना त्यांची भाषा समजेल म्हणून मी ती रूपकं वापरली. जात वगैरे शब्दांऐवजी प्रत दर्जा असे शब्द वापरले तरी माझ्या प्रतिसादात शष्पही फरक पडत नाही. बाकी संघाला जर तुम्ही चमत्कार म्हणत असाल तर आधुनिक वैद्यकाला 'अतिमहासुपरड्युपर चमत्कार' वगैरे काहीतरी म्हणावं लागेल. माझी तक्रार संघाच्या कार्याबद्दल नसून भोंगळ लेखनाबद्दल होती. जर लेखात अतिरेकी आणि पोकळ विधानं आली नसती तर लेख जास्त परिणामकारक झाला असता. हा फीडबॅक आहे, घ्यायचा तर घ्या, नाहीतर द्या सोडून.

Submitted by मोदक on Wed, 09/14/2016 - 15:48

In reply to जातीपातींनी बरबटलेला हा आपला by राजेश घासकडवी

Permalink

शष्प फरक पडत नव्हता तर प्रत

शष्प फरक पडत नव्हता तर प्रत दर्जा वगैरे शब्द असणारी भाषा वापरायला कोणी आडकाठी केली नव्हती ना..? का तुम्ही सर्वमान्य भाषेबद्दल निवडक लोकांना सोयीस्कर सल्ले देता..?

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 09/14/2016 - 16:14

In reply to शष्प फरक पडत नव्हता तर प्रत by मोदक

Permalink

शष्प फरक पडत नव्हता तर प्रत

शष्प फरक पडत नव्हता तर प्रत दर्जा वगैरे शब्द असणारी भाषा वापरायला कोणी आडकाठी केली नव्हती ना..?
आडकाठी? छे छे, वर म्हटल्याप्रमाणे हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतं, त्यांना जात, उच्चनीचता वगैरे गोष्टी चटकन समजतात म्हणून मुद्दामून ते शब्दप्रयोग केले होते.
का तुम्ही सर्वमान्य भाषेबद्दल निवडक लोकांना सोयीस्कर सल्ले देता..?
हो, पण निवडक नाही, सर्वच लोकांना देतो. असे सल्ले नको असतील तर मिपावर लेखन टाकू नये, किंवा लेखात खाली "कृपया टीका करू नये, माझ्या भावना दुखावतात" असं ठळक शब्दांत लिहावं.

Submitted by मोदक on Wed, 09/14/2016 - 16:21

In reply to शष्प फरक पडत नव्हता तर प्रत by राजेश घासकडवी

Permalink

हिंदुत्ववाद्यांना

हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतं हे पण वरवरचा अभ्यास करून बनवलेले मत की आणखी काही..? सर्वच लोकांना देतो. अरे व्वा.. सुधारणा आहे, अच्छे दिन आले मिपाकरांचे.

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 09/14/2016 - 19:51

In reply to हिंदुत्ववाद्यांना by मोदक

Permalink

अहो काय चालवलंय हे? मी फक्त

अहो काय चालवलंय हे? मी फक्त लेखकाला त्याच्या लेखनशैलीबद्दल सूचना केल्या. त्यांनी त्या घेतल्या असाव्यात, किंवा फाट्यावर मारल्या असाव्यात. विषय संपला. माझ्या लेखनशैलीबद्दल प्रश्न उभा केला तर मी त्याचं कारण सांगितलं. सोडून द्या ना...

Submitted by मोदक on Wed, 09/14/2016 - 20:01

In reply to अहो काय चालवलंय हे? मी फक्त by राजेश घासकडवी

Permalink

हिंदुत्ववाद्यांना

हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतं, त्यांना जात, उच्चनीचता वगैरे गोष्टी चटकन समजतात हे तुमचे अभ्यासपूर्ण मत आहे की अभ्यास, अनुभव आणि आकलन नसतानाही केलेले बेजबाबदार विधान..?

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 09/14/2016 - 20:31

In reply to हिंदुत्ववाद्यांना by मोदक

Permalink

अनुभव, पुरावे, अभ्यास इ.

अनुभव, पुरावे, अभ्यास इ. गोष्टी त्यांना विचारायच्या नसतात. उदा. हिंदुत्ववाद्यांना वर्णव्यवस्थेचं कौतुक असतं, त्यांना जात, उच्चनीचता वगैरे गोष्टी चटकन समजतात किंवा सध्याची राजवट ही फॅसिस्ट राजवट आहे, ही त्यांची मते पुरावेबिरावे, अनुभव, अभ्यास वगैरे नसले तरी ठाम आहेत.

Submitted by सुबोध खरे on Wed, 09/14/2016 - 20:37

In reply to अनुभव, पुरावे, अभ्यास इ. by श्रीगुरुजी

Permalink

http://www.firstpost.com

http://www.firstpost.com/politics/modi-govt-is-not-fascist-prakash-karats-salvo-at-sitaram-yechury-reveals-schism-in-the-left-3003104.html सध्याची राजवट फॅसिस्ट नाही असा निर्वाळा खुद्द "करात साहेबानी" दिला.कम्युनिस्टांकडून असे प्रमाणपत्र मिळणें म्हणजे शेळींनी वाघाला अहिंसक असल्याचे प्रमाणपत्र देण्यासारखे आहे. तेंव्हा गुरुजी तुम्ही आपले मत ताबडतोब मागे घ्या.
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 09/14/2016 - 20:43

In reply to http://www.firstpost.com by सुबोध खरे

Permalink

उपमा जरा गंडेश काय डॉक?

उपमा जरा गंडेश काय डॉक? लांडग्याने सर्टिफिकट बकरीला देणे वगैरे चालली असती.

Submitted by सुबोध खरे on Wed, 09/14/2016 - 20:48

In reply to उपमा जरा गंडेश काय डॉक? by अभ्या..

Permalink

बकरी (बोकड) अहिंसकच असतात.

बकरी (बोकड) अहिंसकच असतात. त्यांना सर्टिफिकेटची काय गरज?

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com