Skip to main content

६ वी क्रिकेट ट-२० विश्वचषक स्पर्धा - २०१६

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 13/03/2016 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटच्या २० षटकांच्या सामन्यांची ६ वी विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे. स्पर्धेत एकूण २ गट आहेत. गट १) इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, अफगाणिस्तान गट २) भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश किंवा ओमान (बहुतेक बांगलादेश पात्र ठरेल असे वाटते) गट २ हा गट १ च्या तुलनेत जास्त चुरशीचा वाटतो. २००७ मध्ये प्रथमच या स्पर्धेला सुरूवात झाली. त्या स्पर्धेत अनपेक्षितपणे भारत विजेता ठरला. आतापर्यंत खालील देश विजेते व उपविजेते ठरले आहेत. १) २००७ - भारत विजेता, पाकिस्तान उपविजेता २) २००९- पाकिस्तान विजेता, श्रीलंका उपविजेता ३) २०१० - इंग्लंड विजेता, ऑस्ट्रेलिया उपविजेता ४) २०१२ - वेस्ट इंडिज विजेता, श्रीलंक उपविजेता ५) २०१४ - श्रीलंका विजेता, भारत उपविजेता ६) २०१४ - ? आतापर्यंत श्रीलंकेने १ विजेतेपद व २ वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. भारत व पाकिस्तान या दोघांनीही एकदा विजेतेपद व एकदा उपविजेतेपद मिळविले आहे. परंतु या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी भारताच्या तुलनेत जास्त चांगली आहे कारण पहिल्या ४ स्पर्धेत पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला होता, तर भारत आजतगायत फक्त दोन वेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आश्चर्य म्हणजे ५ वेळा एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविणार्‍या ऑस्ट्रेलियाला ही स्पर्धा आजवर एकदाही जिंकता आलेली नाही. तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांना आजवर कधीही अंतिम फेरीत प्रवेश मिळालेला नाही, मग विजेतेपद लांबच राहिले (एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत २०१५ मध्ये न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरीत पोहोचले होते, परंतु तिथे त्यांचा पराभव झाला). एकंदरीत या स्पर्धेवर आजतगायत भारत, श्रीलंका व पाकिस्तान या आशियायी संघांचेच वर्चस्व राहिलेले दिसते. तसेच प्रत्येक वेळी नवीन संघ विजेता होताना दिसतो, त्यामुळे आजतगायत कोणत्याही संघाला २ वेळा विजेतेपद जिंकता आलेले नाही. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत भारत व पाकिस्तान ६ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ६ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले. ट-२० सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतही भारत व पाकिस्तान ३ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ३ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले आहे. तसेच या स्पर्धेत आतापर्यंत भारताने न्यूझीलंडला एकदाही पराभूत केलेले नाही. यावेळी श्रीलंकेचा संघ अगदीच नवखा आहे. पाकिस्तानचा संघ फारसा चांगला नाही व त्यांचे क्षेत्ररक्षण अत्यंत वाईट आहे. वेस्ट इंडिज संघात अनेक तगडे खेळाडू असले तरी एकत्रित संघ असे ते खेळताना फारसे दिसत नाहीत. न्यूझीलंडकडे देखील तगडे खेळाडू असले तरी त्यांची गोलंदाजी फारशी चांगली नाही व विजिगीषू वृत्तीचा अभाव दिसतो. इंग्लंडकडे ट-२० प्रकारातले फारसे नावाजलेले खेळाडू नाहीत. याउलट दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया या ३ संघांकडे कसलेले खेळाडू आहेत. माझ्या अंदाजानुसार यावेळी दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यापैकीच एखादा विजेता असेल. स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे. १) मंगळवार १५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. न्यूझीलंड २) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, पाकिस्तान वि. बांगलादेश/ओमान ३) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. वेस्ट इंडिज ४) गुरूवार १७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, अफगाणिस्तान वि. श्रीलंका ५) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड ६) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. द. आफ्रिका ७) शनिवार १९ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. पाकिस्तान ८) रविवार २० मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. आफ्रिका ९) रविवार २० मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, श्रीलंका वि. वेस्ट इंडिज १०) सोमवार २१ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश/ओमान ११) मंगळवार २२ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, न्यूझीलंड वि. पाकिस्तान १२) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. इंग्लंड १३) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. बांगलादेश/ओमान १४) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान १५) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, द. आफ्रिका वि. वेस्ट इंडिज १६) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, न्यूझीलंड वि. बांगलादेश/ओमान १७) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. श्रीलंका १८) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडिज १९) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. ऑस्ट्रेलिया २०) सोमवार २८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका ______________________________________________________________________

२१) बुधवार ३० मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, पहिला उपांत्य फेरीचा सामना

२२) गुरूवार ३१ मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, दुसरा उपांत्य फेरीचा सामना

______________________________________________________________________

२३) रविवार ३ एप्रिल, संध्याकाळी ७:०० वाजता, अंतिम फेरीचा सामना

______________________________________________________________________

वाचने 26106
प्रतिक्रिया 180

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

असहमत! रहाणेला खेळवलंच पाहिजे. पण युवराजच्या जागेवर नको. युवराज जिगरबाज खेळाडू आहे. त्याची डावखुरी गोलंदाजीसुद्धा उपयुक्त आहे. (धोनी ती का वापरत नाहीये कुणास ठाऊक?) ते तीन आयतोबा बसलेत ना जागा अडवून, त्यातले दोन तरी हाकलले पाहिजेत. धवन, रोहित व रैना. (रोहितने अजून चार द्विशतके केली, तरी तो मला आवडणार नाही. द्विशतके करणारे इतर: सचिन, सेहवाग, गेल यांच्याविषयी एक भरोसा असायचा/असतो, की अजून काहीतरी होईल, पण या रोहित दगडाविषयी कणभरही विश्वास नाही. अन् आशासुद्धा नाही!)

ऑसीज विरुद्ध मॅच मोहालीला आहे का ? तसे असल्यास भारत हरण्याची शक्यता जास्त. हीच टीम ठेवली तर नक्कीच.

आता ब गटात उपांत्य फेरीचा दुसरा संघ ठरविण्यासाठी ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया वि. भारत हे दोनच महत्त्वाचे सामने आहेत. या तीनही संघांना उपांत्य फेरीत जाण्याची संधी आहे. - भारताने ३ सामन्यात २ विजयांसह ४ गुण मिळविले असून निव्वळ धावगती -०.५४६ आहे. - पाकड्यांनी ३ सामन्यात १ विजयासह २ गुण मिळविले असून निव्वळ धावगती +०.२५४ आहे. - ऑसीजने २ सामन्यात १ विजयासह २ गुण मिळविले असून निव्वळ धावगती +०.१०८ आहे. ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान सामन्यात ३ शक्यता आहेत आणि नंतर भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यात देखील ३ शक्यता आहेत. एकूण ९ शक्यता आहेत. १) ऑस्ट्रेलिया वि. पाकडे सामना पावसामुळे अनिर्णित - असे झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळून पाकड्यांचे एकूण गुण ३ होऊन त्यांचे आव्हान संपेल व ऑस्ट्रेलियाचे देखील ३ गुण होतील. अशा परिस्थितीत भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर अशी परिस्थिती असेल. अ) सामना पावसामुळे अनिर्णित - असे झाल्यास भारताचे ५ व ऑस्टेलियाचे ४ गुण होऊन भारत उपांत्य फेरीत जाईल. ब) ऑस्ट्रेलिया विजयी - ऑस्ट्रेलियाचे ५ गुण व भारताचे ४ गुण होऊन ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत जाईल. क) भारत विजयी - भारताचे ६ गुण व ऑस्ट्रेलियाचे ३ गुण होऊन भारत उपांत्य फेरीत जाईल. म्हणजे ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान सामना अनिर्णित राहिल्यास भारत उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता ६६.६६% आहे. परंतु (१) आणि (अ) होण्याची शक्यता ११.११% आहे. तसेच (१) आणि (क) होण्याची शक्यता देखील ११.११% आहे. म्हणजे या दोनपैकी कोणतेही एक होण्याची शक्यता २२.२२% आहे. २) ऑस्ट्रेलिया वि. पाकडे सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी - असे झाल्यास पाकड्यांचे एकूण गुण २ होऊन त्यांचे आव्हान संपेल व ऑस्ट्रेलियाचे ४ गुण होतील. ऑस्ट्रेलियाची निव्वळ धावगती देखील वाढेल. अशा परिस्थितीत भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर अशी परिस्थिती असेल. अ) सामना पावसामुळे अनिर्णित - असे झाल्यास भारताचे ५ व ऑस्टेलियाचे ५ गुण होऊन सरस धावगतीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत जाईल. ब) ऑस्ट्रेलिया विजयी - ऑस्ट्रेलियाचे ६ गुण व भारताचे ४ गुण होऊन ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत जाईल. क) भारत विजयी - भारताचे ६ गुण व ऑस्ट्रेलियाचे ४ गुण होऊन भारत उपांत्य फेरीत जाईल. म्हणजे ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यास भारत उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता ३३.३३% आहे. परंतु (१) आणि (क) होण्याची शक्यता फक्त ११.११% आहे. ३) ऑस्ट्रेलिया वि. पाकडे सामन्यात पाकडे विजयी - असे झाल्यास पाकड्यांचे एकूण गुण ४ होऊन त्यांचे आव्हान टिकून राहील व ऑस्ट्रेलियाचे २ गुण होतील. पाकड्यांची निव्वळ धावगती देखील वाढेल. अशा परिस्थितीत भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर अशी परिस्थिती असेल. अ) सामना पावसामुळे अनिर्णित - असे झाल्यास भारताचे ५ व ऑस्टेलियाचे ३ गुण होऊन भारत उपांत्य फेरीत जाईल. ब) ऑस्ट्रेलिया विजयी - ऑस्ट्रेलियाचे ४ गुण व भारताचे ४ गुण होऊन कमी धावगतीमुळे भारताचे आव्हान संपुष्टात येईल व ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यापैकी ज्याची धावगती सरस असेल तो उपांत्य फेरीत जाईल. क) भारत विजयी - भारताचे ६ गुण व ऑस्ट्रेलियाचे ४ गुण होऊन भारत उपांत्य फेरीत जाईल. म्हणजे ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान सामना पाकड्यांनी जिंकल्यास भारत उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता ६६.६६% आहे. परंतु (१) आणि (अ) होण्याची शक्यता ११.११% आहे. तसेच (१) आणि (क) होण्याची शक्यता देखील ११.११% आहे. म्हणजे असे होण्याची शक्यता २२.२२% आहे. म्हणजे पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया हा सामना ऑस्ट्रेलिया हरल्यास भारत उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता जास्त आहे. अर्थात पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया या सामन्याचा तीनपैकी कोणताही निकाल लागला तरी जर भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध जिंकला तर भारत १००% उपांत्य फेरीत जाणार. त्यामुळे उपांत्य फेरीत जाण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध जिंकावेच लागेल व हा सामना भारत हरला तर भारताचे आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता १००% आहे.

आज ३ वाजता ऑसीज वि. पाकडे हा भारत, ऑस्ट्रेलिया व पाकड्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना आहे. यात पाकडे जिंकले तर त्यांचे आव्हान कायम राहील. ते हरले किंवा सामना अनिर्णित राहिला तर पाकड्यांना बॅगा भराव्या लागतील. दुसरा सामना विंडीज वि. द. आफ्रिका ७:३० वाजता आहे.

युवराजला बाहेर करून उपयोग नाही,कारण त्याची वादळी बॅटींग कधीही बरसू शकते. रोहितला देखील बाहेर करून उपयोग नाही,धवनला बाहेर बसवलं तरी चालेल. रैना,जडेजा यांनासुद्धा बाहेर बसवून उपयोग नाही कारण यांच्याइतके अफलातून क्षेत्ररक्षक टीममध्ये नाहीत.शिवाय जडेज्याची गोलंदाजीही उत्तम आहे. पंड्याला बाहेर करण्यात हरकत नसावी,पण तो बॅटींग चांगली करतो म्हणे! so धवन बाहेर अन् रहाणे आत ही एकच रिप्लेसमेंट योग्य वाटते.

आता रविवारी ऑसीज व भारतातला सामना हा नॉकआऊट उपांत्यपूर्व फेरीचा सामना असेल. जो जिंकेल तो उपांत्य फेरीत जाईल. सामना पावसामुळे झालाच नाही तर भारत बाहेर. विंडीजविरूद्ध आफ्रिकेची वाट लागली आहे. आफ्रिकेला २० षटकात फक्त ८ बाद १२२ धावा करता आल्या. याच खेळपट्टीवर भारत वि. न्यूझीलंड हा अत्यंत कमी धावसंख्येचा सामना झाला होता. त्यामुळे अचूक गोलंदाजी केल्यास आफ्रिकेला संधी आहे. मात्र आफ्रिका हरल्यास विंडीजची जागा नक्की होईल व आफ्रिकेसाठी उपांत्य फेरी गाठणे अत्यंत अवघड होईल.

बांगलादेशविरुद्ध आजचा न्यूझीलंडचा खेळ पाहिल्यावर, आपल्याला फायनलला पोचलो तरी काही चान्स नाही असे वाटते. स्पिन, फास्ट बोलिंग, बॅटिंग, फिल्डिंग.... सगळ्याच बाबतीत , ती एक परिपूर्ण टीम वाटते.

बांगला २०१४ च्या स्पर्धेप्रमाणे याही स्पर्धेत सर्व ४ सामने हरले. उपांत्य फेरीसाठी विंडीज व न्यूझीलंड हे दोन संघ नक्की झालेत. 'ब' गटातून दुसरा संघ उद्याच्या ऑस्ट्रेलिया वि. भारत या सामन्यातील विजेता असेल. 'अ' गटात अजून चुरस आहे. आज इंग्लंड लंकेविरूद्ध जिंकले तर इंग्लंड उपांत्य फेरीत जाईल. पण श्रीलंका जिंकले तर इंग्लंड, आफ्रिका व श्रीलंका या तीनही संघांना अजूनही संधी असेल.

'अ' गटात आज चक्क विंडीज अफगाणिस्तानकडून हरले. पण तरीसुद्धा सरस निव्वळ धावगतीमुळे विंडीज प्रथम क्रमांकावर व इंग्लंड दुसर्‍या क्रमांकावर राहून दोघेही उपांत्य फेरीत आले. आता एक उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंड वि. इंग्लंड असा होईल. दुसरा सामना आजच्या भारत वि. ऑस्ट्रेलिया या सामन्यातील विजेता विरूद्ध विंडीज असा होईल. भारतीय महिला मात्र स्पर्धेतून बाहेर पडल्या. आज विंडीजविरूद्ध फक्त ३ धावांनी पराभव झाल्याने उपांत्य फेरीचा प्रवेश बंद झाला.

4 गोलंदाज आणि कोहली इतकीच भारतीय टिम उरलेली आहे असे खेदाने वाटते, आज जिंकलो तरी अजिबात आनंद झालेला नाही. शर्मा, धवन आणि रॆना ची पुण्याई अजुन किती बाकी आहे? युवराज ची दयनीय अवस्था बघवत नाही. जडेजा ची अवस्था झाकली मुठ सव्वा लाखाची आहे. शेम आॅन सिलेक्शन कमीटी

लक्ष्याचा पाठलाग करताना आणि दबावाखाली कस खेळाव याच उत्तम उदाहरण कोहलीने पुन्हा एकदा सादर केल आहे! त्याचबरोबर, या वर्ल्ड कपमध्ये, सुरूवातीला विकेट कवडीमोल भावात फेकून मधल्या फळीवर दबाव कसा आणायचा ह्या कामी रोहित, धवन, रैना यांनी यात सातत्य राखण्यात आजही यश मिळवलं! धोनी परत एकदा विनींग शॉट मारण्यासाठी नशिबवान ठरला, त्यात तो आजिबात चुकला नाही, जरी थोडा मिसहीट वाटत होता शॉट, बाऊंड्रीपार आरामात गेलाच! युवराजकडून आज अनपेक्षितरित्या धोनीने बॉलिंग करवून घेतली. ज्यात, भाऊने आजिबात निराश नाही केले. पहिल्याच बॉलवर धोकादायक ऑसि कॅप्टन स्मीथला बाद केले तसेच मॅक्सवेलला नोबॉलनंतरच्या फ्रीहीट साठी टाकलेला बॉल निव्वळ अफलातून! ऑस्ट्रेलियन प्लेयर्स सुरूवतीच्या सहा ओव्हर्स सोडल्या तर लौकिकाला साजेसा खेळ नाही दाखवू शकले. कोहली पुढे तर निव्वळ हात टेकलेले त्यांनी. एकोणिसाव्या ओव्हरमध्ये तर फिल्डर्सच नव्हते जणू मैदानात. फक्त बॉलर आणि विकेटकीपर एवढीच ऑस्ट्रेलियन टीम दिसत होती! बाकीचे कुठे गेलेले कुणास ठावूक? ;) आज जे बोलेन ते खरे असं होत होत माझ..... त्यामुळे, आजच, भारत वर्ल्ड कप जिंकणार अस बोलून ठेवलयं!! ;) Sandy

स्टीव स्मिथ: भावांनो आज आमचा ईस्टर संडे आहे त्यामुळ मॅच आम्हीच जिंकणार. एम्.एस.धोनी: भावा आमची पण संकष्टी आहे आज विसरु नको

लक्ष्याचा पाठलाग करताना आणि दबावाखाली कस खेळाव याच उत्तम उदाहरण कोहलीने पुन्हा एकदा सादर केल आहे! त्याचबरोबर, या वर्ल्ड कपमध्ये, सुरूवातीला विकेट कवडीमोल भावात फेकून मधल्या फळीवर दबाव कसा आणायचा ह्या कामी रोहित, धवन, रैना यांनी यात सातत्य राखण्यात आजही यश मिळवलं! धोनी परत एकदा विनींग शॉट मारण्यासाठी नशिबवान ठरला, त्यात तो आजिबात चुकला नाही, जरी थोडा मिसहीट वाटत होता शॉट, बाऊंड्रीपार आरामात गेलाच! युवराजकडून आज अनपेक्षितरित्या धोनीने बॉलिंग करवून घेतली. ज्यात, भाऊने आजिबात निराश नाही केले. पहिल्याच बॉलवर धोकादायक ऑसि कॅप्टन स्मीथला बाद केले तसेच मॅक्सवेलला नोबॉलनंतरच्या फ्रीहीट साठी टाकलेला बॉल निव्वळ अफलातून! ऑस्ट्रेलियन प्लेयर्स सुरूवतीच्या सहा ओव्हर्स सोडल्या तर लौकिकाला साजेसा खेळ नाही दाखवू शकले. कोहली पुढे तर निव्वळ हात टेकलेले त्यांनी. एकोणिसाव्या ओव्हरमध्ये तर फिल्डर्सच नव्हते जणू मैदानात. फक्त बॉलर आणि विकेटकीपर एवढीच ऑस्ट्रेलियन टीम दिसत होती! बाकीचे कुठे गेलेले कुणास ठावूक? ;) आज जे बोलेन ते खरे असं होत होत माझ..... त्यामुळे, आजच, भारत वर्ल्ड कप जिंकणार अस बोलून ठेवलयं!! ;) Sandy

आज कोहली, युवराज, धोनी यांच्या फलंदाजीचे जेव्हढे कौतुक करावे तेव्हढे थोडेच. बिचारा युवराज, लंगडा होऊन सुद्धा धडाडीने खेळला. स्ट्राईक रेट १०० च्या वर ठेवला. एकूणच तिघेहि जण सामना जिंकायचा या जिद्दीने खेळले. विशेषतः कोहली. नंतर पण त्याने युवराज ची स्तुति केली, प्रेक्षकांचे परत परत आभार्‍ मानले. व्वा!

कोहली ची इन्निंग्स कमाल होती !! अजिबात स्लॉग न करता त्याने २ ओव्हर्स मधे सामना संपवला !! मजा आली !!! ऑसी आणि पाकला हारवल्यावर काही वेगळाच आनंद होतो :) रहाणे ला घेतला पाहिजे आता, धवनच्या जागी तरी, धवन आणि शर्मा फक्त भूमिपूजनासाठी आहेत टीममधे रैना पहिला शॉर्ट बॉल येईस्तोवर कर्तो बॅटिंग, शॉर्ट टाकला की मात्र ईमाने ईतबारे वि़केट देउन परत येतो पण धोनी आता टीम बदलणं शक्य नाही, जर युवीच अनफीट ठरला तर बदलावी लागेल.

रहाणेवर एकतर धोनीचा वैयक्तिक आकस असावा, किंवा तो रवी शास्त्रीचा नावडता असावा. नाहीतर त्या तीन आयतोबांच्या आयुष्यातला सुवर्णकाळ सुरू असताना रहाणेला बाहेर बसवून त्यांना आग्रहाने खेळवण्यामागचे प्रयोजन कळत नाही. विराट या पिढीचा तेंडूलकर आहे. (स्वभाव सोडला तर) तो असेपर्यंत आशा शिल्लक असतात.

आपली टीम उपांत्य फेरीत खेळायला मुळीच लायक नाही. नशीब, विराट, धोनी व काही प्रमाणात नेहरा बस्स...याची मला वाटणारी कारणे .. १. वरील तिघांशिवाय इतर कोणीही खेळाडु कसोटी दर्जाच्या इतर कोणत्याही संघात जागा मिळवु शकेल असे वाटत नाही. माझ्या मते चांगल्या संघात असे किमान ५-६ खेळाडु हवेत. उदा. आपलाच जुना ५०-५० चा २००३ किंवा २०११ चा संघ आठवा. २. ३७ वर्षाचा नेहरा सोडता बाकी एकही गोलंदाज नाही जो ४ षटके टाकु शकेल याची खात्री देता येइल. बरेचदा कामचलाऊ फिरकी गोलंदाज अश्विनपेक्षा बरे वाटतात. ३. विराट, धोनी व काही प्रमाणात युवराज सोडला तर कोणीही फलंदाज माफक आव्हानात्मक खेळपट्टी वा गोलंदाजीसमोर उभाही राहु शकत नाही. (पुण्यातली श्रीलंकेची व २०-२० चषकातील सर्वच सामने) अवांतरः बांगलादेशविरुद्ध्च्या सामन्यात पंड्याच्या षटकाची सर्व तारीफ करत आहेत पण माझ्यामते त्याने सामना घालवला होता. दोन विकेट्तर फलंदाजांच्या मुर्खपणामुळे मिळाल्या. कालसुद्धा त्याने शेवटच्या षटकात १५ धावा दिल्या त्याही ८ नं. फलंदाजाला.. बाकी काय लिहणे?

In reply to by एक सामान्य मानव

अवांतरः बांगलादेशविरुद्ध्च्या सामन्यात पंड्याच्या षटकाची सर्व तारीफ करत आहेत पण माझ्यामते त्याने सामना घालवला होता. दोन विकेट्तर फलंदाजांच्या मुर्खपणामुळे मिळाल्या. कालसुद्धा त्याने शेवटच्या षटकात १५ धावा दिल्या त्याही ८ नं. फलंदाजाला.. बाकी काय लिहणे? +++111

मॅच संपल्यावर कोहली मैदानावरच बसला ते दृष्य आयुष्यात विसरणार नाही.... भावना अनावर झाल्या बहुतेक त्याला!!

In reply to by असंका

येस ! मला ते पाहुन २०११ वर्ल्ड कपला युवीनेहि सेम पोज दिलेली ते आठवलं !!

निव्वळ कोहलीमुळे जिंकलो. पहिल्या ४ मधील ३ फलंदाज सातत्याने अपयशी ठरत आहेत. आणि प्रत्येकवेळी कोहलीलाच खेळावे लागते. युवराज येऊन पडझड थांबवितो व कोहलीला साथ देतो. फारश्या धावा करत नसल्या तरी निदान मोठी भागिदारी तरी करतो. त्यानंतर धोनी व पंड्या थोड्याच पण वेगवान धावा करून जातात. म्हणजे फक्त ४ फलंदाज धावा करताहेत. गोलंदाजीत नेहरा व अश्विन सोडला तर बाकी आनंदच आहे. रोहीतची ४ सामन्यातील कामगिरी - ५,१०, १८, १२ धवनची ४ सामन्यातील कामगिरी - १,६,२३,१३, २ झेल, १ धावबाद रैनाची ४ सामन्यातील कामगिरी - १,०, ३०, १०, ३ बळी, १ झेल,१ धावबाद युवराजची ४ सामन्यातील कामगिरी - ४, २४, ३, २१, १ बळी जडेजाची ४ सामन्यातील कामगिरी - ०, १२, ४ बळी, १ झेल रोहीतने ४ सामन्यात एकूण ४५ धावा, धवनने ४३ व रैनाने ४१ धावा केल्या आहेत. या तिघांना भरपूर संधी दिलेली आहे. निदान उर्वरीत सामन्यासाठी तरी रहाणे, नेगी व हरभजनला संधी मिळावी. रोहितऐवजी रहाणे नक्कीच हवा. विंडीज फिरकीसमोर नीट खेळत नसल्याने रैनाऐवजी पवन नेगी येऊ शकतो. तो फलंदाजीही बर्‍यापैकी करू शकतो.

In reply to by श्रीगुरुजी

रोहितऐवजी रहाणे नक्कीच हवा.
हे बोलल्यावर आता कसं बरं बरं वाटलं असेल नाही? (निदान मला तरी जुने श्रीगुरुजी परत आल्यामुळे बरं वाटलंच.)

२००७ च्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत भारत पहिला सामना न्यूझीलंडकडून हरला होता. नंतर पाकड्यांना हरविले होते व नंतर उपांत्य फेरीत ऑसीजना हरविले होते. यावेळी साधारण तशीच परिस्थिती आहे.

काल खुप दिवसानंतर सचिनची फटकेबाजी विसरता आली. धन्स विराट. जबरा म्याच ओढलास. -दिलीप बिरुटे

In reply to by बोका-ए-आझम

मला आत्ताच तो विंडीजचा गेल स्वप्नात यायला लागला आहे. नेहराला लै बेक्कार धुनार आहे तो. सध्या नेहरा तर असं ग्राउंडवर वावरतोय जसा याने पाच पन्नास म्याच जिंकून दिल्या आहेत. धोनीला चक्क मार्गदर्शन करतांना दिसतो. बॉलरला मार्गदर्शन करतो, आणि सर्वात कळस म्हणजे क्षेत्ररक्षणही बॉलींग करतांना तो बदलू लागला आहे. तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी पहिल्याच ओव्हरीत धु धु धुतला. बॉलचा टप्पा कुठे टाकू हे त्याला समजत नव्हतं. च्यायला, आपल्याकडेहीकुठे लपवावं असं वाटणार्‍या खेळाडुला भले दिवस आले आहेत. तीच गत युवराजची. अजिबात काँफिडन्स नै, उगं बॉल खात राहतो. काल तो कधी एकदा बाद होतो असं मला झालं होतं. काल चक्क जिंकलो, यावर माझा विश्वास बसत नै ये अजून. बाय द वे, वाट्सपवर मुंबैच्या कोणत्या ज्योतिष मंडळाचा अगदी परफेक्ट कोणकोणत्या सामन्यात विजयी होऊ त्याचं भविष्य फिरत आहे. सालं माझं खेळाडुवर नै पण त्या ज्योतिषांवर लै विश्वास बसला आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी पहिल्याच ओव्हरीत धु धु धुतला. बॉलचा टप्पा कुठे टाकू हे त्याला समजत नव्हतं. च्यायला, आपल्याकडेहीकुठे लपवावं असं वाटणार्‍या खेळाडुला भले दिवस आले आहेत.
नेहराने प्रत्येक ओवरला सरासरी पाच रन दिल्या. भारतीय आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही कडच्या बोलरमध्ये सर्वोत्तम. स्फोटक उस्मान खवाजाचा बळी त्यानेच मिळवला. त्याला लपवा आणि कल्पना करा ऑस्ट्रेलियाने मग किती रन केले असते...

In reply to by असंका

तूर्तास वासरात लंगडी गाय या न्यायापुरताच मेहरा आहे आणि बर्याचदा त्याच्या नावातला मे टंकन दोष होऊन मै असा होतो. पंड्या त्या षटकाची पुण्याई आणि कैफ अजून विसरायला तयार नाही आणि त्याचा र्हास त्यानेच होऊ घातला आहे. जडेजा नक्की कश्यासाठी संघात आहे याची पाहणी करायला सार्क परिषदच बोलवावी लागेल असे दिसते. बाकी नंतर. सौंदाळा भाऊ या निमित्ताने मिपावर लिहू लागलेत हे पाहून बरे वाटले. श्री गुरुजी सध्या तरी या धाग्यावरून धगीकडे जाऊ नका.

In reply to by DEADPOOL

तिकडेच अडकून पडतात आणि या धाग्यावर धावफलक मंदावतो. जाहीराती मार खातात ते वेगळेच.

In reply to by DEADPOOL

पण जरा जाहीराती मोठ्या आणि या प्रकारच्या असतील तर धाग्या धाग्यानुसार जाहीरातींचे एक पॅकेज तयार करा. तो धागा :सर्फ एक्सेल्,निरमा,घडी डिटर्जंट,पाटणकर काढा,कायमचूर्ण. हा धागा : मौका मौका,डर के आगे जीत,मेन विल बी मेन,कच्चा आम. जाहीराती पंखा नाखु

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी पहिल्याच ओव्हरीत धु धु धुतला. बॉलचा टप्पा कुठे टाकू हे त्याला समजत नव्हतं. च्यायला, आपल्याकडेहीकुठे लपवावं असं वाटणार्‍या खेळाडुला भले दिवस आले आहेत.
काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. नेहराची एकूण कामगिरी ४-०-२०-१ इतकी उत्तम होती. त्याने डावाचे पहिले षटक टाकले व त्यात फक्त ४ धावा दिल्या. दुसरे षटक बुमराहने टाकले व त्यात त्याने १७ धावा दिल्या. तिसरे षटक परत नेहराने टाकले व त्यात त्याने १० धावा दिल्या. पॉवरप्लेमध्ये एका षटकात १० धावा म्हणजे खूप जास्त नाही. ४ थे षटक अश्विनने टाकले व त्यात त्याने २२ धावा दिल्या. ऑसीजने पहिल्या ४ षटकात ५३ धावा केल्या होत्या. त्यात नेहरूच्या २ षटकात फक्त १४ धावा होत्या. ५ वे षटक पुन्हा नेहरूने टाकले व त्यात फक्त २ धावा दिल्या. म्हणजे पॉवरप्लेच्या ६ पैकी ३ षटके नेहरूने टाकली व त्यात त्याने फक्त १६ धावा दिल्या. नंतर परत आल्यावर ४ थ्या षटकातही त्याने फक्त ४ धावा देऊन १ बळी मिळविला. नेहरूने एकूण ४ षटकात फक्त २० धावा देऊन एक बळी घेतला. त्या सामन्यात एकूण ६ गोलंदाजांपैकी नेहरू सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज होता. त्याखालोखाल युवराज होता (३-०-१९-१).

In reply to by श्रीगुरुजी

बरोबर आहे गुरुजी ह्या सीरीज मधे नेहरा चांगली गोलंदाजी करत आहे, वादच नाही. तरीही ३५ - ३६ व्या वर्षी कमबॅक करणं नक्कीच सोपं नाह/, तेही मधले काही वर्ष ईंटरनॅशनल क्रिकेटसाठी विचार पण न केला गेलेला खेळाडु असताना ! पण का कोणजाणे, तो कधीच भरवश्याचा वाटत नाही!! युवी च्या जागी मनिष पांडे हे लॉजिक काही कळत नाही. पण बहुधा १५ च्या संघात म्हणुन बोलवला असावा. आणि रहाणेलाच खेळायला संधी मिळावी ही एक क्रिकेटप्रेमी म्हणुन अधिक आणि एक मराठी माणुस म्हणुन थोडीशी ईच्छा :) गेल च काही सांगता येत नाही, त्याचा दिवस असेल तर तो कोणालाही फोडुन काढतो, आणि नसेल तर कोणालाही फार त्रास न देता तंबुत परत येतो (डावखुरा विरु???). गुरुवारी त्याचा दिवस नसावा अशी अपेक्षा :)

In reply to by श्रीगुरुजी

त्यातून तो आता १४० च्या आसपास वेगाने टाकतोय , "तरुण " असताना कसाबसा १३० पार करायचा . रिवैटल चा डोस जास्ती झालाय बहुदा . पण तरीही. तो वासरात लंगडी गाय शहाणी सारखा प्रकार वाटतोय. बुमरा योर्कर टाकू शकतो चांगले. पण ते तो फक्त शेवटच्या षटकातच का वापरतो हे त्यालाच माहित , पंड्या कैच्याकाय टाकतो. काहीच अर्थ नाही त्याच्या गोलंदाजीला , क्षेत्ररक्षण जबराट आहे त्याचं खरं. राहिला अश्विन. हि सिरीज भारतात चालले म्हणून हा हि चाललाय. राहणे सारखा फलंदाज बाहेर बसवून काय मिळतंय देव जाणे

नाही सर, अस काही होणार नाही .... गेल जरी चांगला hitter असला तरी त्याच्या काही मर्यादा आहेत, ज्या धोनी exploit करेल. गेल खूपच clumsy आहे, मागचा पाय जमिनीत गाडून batting करतो. त्याचा "wait n watch" game असतो. त्याच्या comfort zone मधले गोलंदाज(फिरकी) शोधतो आणि धुलाई करतो. माझ्या अंदाज नुसार बुमरा/अश्विन/नेहरा हे गेल ला रोखू शकतील. गेल जडेजा आणि युवी ची धुलाई करू शकतो, ह्यांना गेल समोर आणणे म्हणजे वाघा समोर शेळी सोडण्या सारखं आहे.

जखमी युवराज च्या जागी पांडे येणार म्हणजे रहाणे ला चान्स नाहीच .

सगळ्यांनीच कशाला चांगल खेळायला हव या विचाराने संघ चालला आहे . बाकीचे येणा-या सामन्यांमधे चांगले खेळतील . आणि तेही नाही जमल तर IPL आहेच की , तिथ बघा कसा सगळ्यांना सूर सापडतो आहे .

रेदिफ वर सारखे सांगतायत की कायद्यानुसार अपडेट्स थोडे उशिरा दिले जात आहेत. हे थोडे म्हणजे किती उशिरा असतं?

In reply to by असंका

स्पॉट फिक्सिंग / बेटिंग रोखण्यासाठी कायद्यानुसार अपडेट १ बॉल उशिरा दिल्या जातात असे मागे इएसपीएन क्रिक इन्फोवर वाचल्याचे आठवते.

In reply to by भाते

बीसीसीआयने बंदी घातली आहे. 'लाईव्ह' अपडेट्स्/क्षणचित्रे फक्त त्यांनी परवाना दिलेल्या वाहिन्यांवर मिळावेत म्हणून. टीव्हीवरील बातम्यांमध्ये सुद्धा फक्त फोटो दाखवले जातात.

शेवटी इंग्लंड सहज जिंकले. किवीजची १० षटकात १ बाद ८९ अशी मजबूत स्थिती होती. परंतु त्यांची मधली फळी पूर्ण अपयशी ठरल्याने उर्वरीत १० षटकात तब्बल ७ गडी गमावून जेमतेम ६४ धावा झाल्या. या खेळपट्टीवर १५३ धावा पुरेश्या नव्हत्या. खरं तर १८० धावा सुद्धा पुरेश्या ठरल्या नसत्या. इंग्लंडला रॉय आणि हेल्स ही सलामीची चांगली जोडी मिळाली आहे. नंतर जो रूट व बटलर आहेतच. त्याव्यतिरिक्त मोईन अली व बेन स्टोक्स हे देखील चांगले फलंदाज आहेत. कप्तान मॉर्गन अपयशी आहे. परंतु इतर १० जण चांगले खेळत आहेत. आपण अंतिम फेरीत आलो तर इंग्लंड आपल्याला नक्कीच जड जाईल. मी सुरवातीला इंग्लंडला खिजगणतीतही धरत नव्हतो. परंतु उत्तम सांघिक खेळामुळे ते अंतिम फेरीत पोहोचले आहेत. किवीज हरल्यामुळे वाईट वाटले. परंतु सर्वोत्तम खेळ करणारा संघच जिंकतो व आज इंग्लडने सर्व आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ केला.

कचराच केला काल किवीजचा !!! रॉस टेलर एके काळी उत्तर फलंदाजांच्या यादीत यायचा, पण आता त्याचा अगदीच शिखर धवन झाला आहे असं वाटतं आहे !! भरवश्याचा असा अजिबात राहिलेला नाही ! २०११ वर्ल्ड कप (नक्की ना?) मधे पाकींना धुवुन काढलेलं शेवटच आठवत आहे त्यानी, नंतर बहुतेक तरि काहीच खेळलेला नाही उल्लेखनीय आज होप सो आपण विंडीजना हरवु, रच्याकने - पोलार्ड का खेळत नाहिये? (जखमी आहे का नेहमीचीच भांडणे??)

In reply to by बेकार तरुण

रॉस टेलरला काही वर्षांपूर्वी कप्तानपदावरून हटविल्यापासून तो रुसलेलाच आहे. त्या रूसव्याचा त्याच्या खेळावर परीणाम झाला आहे. त्याच्याकडे कसोटीचे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले होते. परंतु एकदिवसीय सामन्यांसाठी मॅकलमला कर्णधार केल्यावर तो रागारागाने विंडीजच्या दौर्‍यावर गेलाच नाही व त्याने कसोटी कर्णधारपद देखील नाकारले. डिसेंबर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यात त्याने २९० धावांची जबरदस्त खेळी खेळली होती. त्यानंतर तो बहुतेक सर्व सामन्यात अपयशी आहे. तो अत्यंत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. पण सध्या मैदानावर तो अत्यंत निरूत्साही दिसतो. त्याचा खेळ एकेकाळी मला खूप आवडायचा. आता त्याची अवस्था बघवत नाही. २००१ च्या विश्वचषकात पाकड्यांविरूद्ध न्यूझीलंडची अवस्था ४६ षटकात २१० अशी फारशी चांगली नव्हती. पण शेवटच्या ४ षटकात त्याने साऊदीला हाताशी घेऊन तब्बल ९५ धावा चोपल्या होत्या. त्यात उमर गुलची प्रचंड धुलाई झाली होती. असा डाव तो नंतर क्वचितच खेळताना दिसला. तो बहुतेक लवकरच निवृत्त होईल असे वाटते. >>> आज होप सो आपण विंडीजना हरवु, रच्याकने - पोलार्ड का खेळत नाहिये? (जखमी आहे का नेहमीचीच भांडणे??) पोलार्ड, मलिंगा इ. मंडळी आयपीएल साठी स्वतःला तंदुरूस्त ठेवत आहेत. म्हणूनच ते या स्पर्धेत खेळत नाहीत. चुकुनमाकुन या स्पर्धेत खेळताना जखमी झाले तर आयपीएल बुडायचे. म्हणून आजारी असल्याचा बहाणा करून ते स्पर्धेच्या बाहेर आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

ओह ओके हापुसचे आंबे आहेत म्हणजे पोलार्ड आणि मलिंगा. एप्रिल आणि मे मधे फक्त फळणार, बाकी दहा महिने नाही!! असल्या लोकांचा रागहि येतो, पण एवढा पैसा मिळत असेल तर आपण स्वतः कसे वागलो असतो हे ठरवणेहि मुश्कीलच आहे !!! कारण माझ्या माहितीनुसार लंकेच्या खेळाडुंना मागील काही वर्षापासुनचे वेतन मिळाले नव्हते आणि विंडीज बद्दल तर बोलायलाच नको !

In reply to by बेकार तरुण

तेही बरोबर आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते खूप काही चुकीचे करीत आहेत असे म्हणता येणार नाही. कायदेशीर मार्गाने पैसा मिळत असेल तर तो का नाकारावा? भारताचा मुष्टीयोद्धा विजेंद्रकुमारही आता व्यावसायिक खेळाडू बनला आहे. त्यामुळे तो २०१६ च्या ऑलिम्पिक मध्ये नसेल. तसाच विचार पोलार्ड व मलिंगाही करत असणार.

ट-२० विश्वचषक स्पर्धेत प्रथमच कोणत्यातरी एका संघाला दुसर्‍यांदा विश्वकरंडक उचाविण्याची संधी आहे. इंग्लंडचा कालचा खेळ बघून यावेळी बहुतेक इंग्लंड विजयी होतील असं वाटत आहे.

विंडीजविरूद्ध आपली प्रथम फलंदाजी आहे. विंडीज पाठलाग करणार असल्याने किमान २०० धावा तरी हव्यात. धवनच्या जागी रहाणे व युवराजच्या जागी मनीष पांडे आत आलाय. मला सारखं असं फीलिंग येतंय की अंतिम सामना विंडीज व इंग्लंड यांच्यात होऊन इंग्लंड जिंकेल. बघूया काय होतंय ते.

In reply to by श्रीगुरुजी

. मला सारखं असं फीलिंग येतंय की अंतिम सामना विंडीज व इंग्लंड यांच्यात होऊन इंग्लंड जिंकेल.
तुमच्या तोंडात शेपूचा रस

In reply to by श्रीगुरुजी

काय राव गुर्जी!! धागाकर्तेच नकारात्मक बोलत असतील तर आम्ही काय करावे ब्रे?

३५-० पाच ओव्हर्स. धवन आणि युवी ला बसवलं मला खुप आनन्द झाला. १९० होतीलच. फ्री हिट वर सिक्स काय अफलातून मारलाय रोहितने . क्लास. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेली विकेट.७६/१. जम बसलेला खेळाडू lbw व्हावा हे मला पटत नाही. चेंडूवर नजर बसलेली असते तसाही चेंडू टप्पा पडल्यावर लेगला जात होता फेव्हर मध्ये द्यायला पाहिजे होतं डिसिजन. . नाऊ विराट :) वाचला रन आऊट होता होता. दोन्हीकडून वाचला. अरे फोकलच्या हो तुमच्यावर भरवसा आहे. भाऊ जास्त आक्रमक पणा नको दाखवू.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेली विकेट.७६/१. जम बसलेला खेळाडू lbw व्हावा हे मला पटत नाही. चेंडूवर नजर बसलेली असते तसाही चेंडू टप्पा पडल्यावर लेगला जात होता फेव्हर मध्ये द्यायला पाहिजे होतं डिसिजन. . नाऊ विराट :) वाचला रन आऊट होता होता. दोन्हीकडून वाचला. अरे फोकलच्या हो तुमच्यावर भरवसा आहे. भाऊ जास्त आक्रमक पणा नको दाखवू. शेवटच्या १० ओव्हर्स राहिल्या १०० अपेक्षित. -दिलीप बिरुटे

In reply to by राघवेंद्र

माझे prediction चूकले असले तरी ट्विटर वर असलेल्य @aslamkhantanoli या माणसाने भारताचा स्कोर 192 परफेक्ट सांगितला होता तोही सामना सुरू होण्याच्या चार तास आधी .

गेल आणि स्यामुल गेले लवकर बाद झाले पाहिजे तर सामना आपला. सुरुवात ते हानामारीने करतील आणि भारतीय तंबूत घबराट उडवतील असे वाटते. -दिलीप बिरुटे