एकच शब्द
जबरदस्त फिरवुन फिरवुन मुळ पदावर
लय भारी
मानले आपल्याला
काहितरी वेगळा शेवट असणार हे माहित होतेच पण इतका वेगळा असेल असे वाटले नव्हते.
च्यामारी धरुन फट्याक्......(गाववाल्याकडून चोरलेला टोला)
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
ही कथा आहे की सत्यघटना ??
खूपच अप्रतिम लिहिलं आहे श्रावणजी. लिहिण्याची स्टाईल, वेग कमी - जास्त करण्याची पद्धत सगळंच आवडलं
पुलेखूशु :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
पहिले काही भाग वाचताना व्यक्तिरेखेबद्दल कुतूहल, पुढील काही भाग वाचताना भ्रष्ट यंत्रणेबद्दल आचंभायुक्त राग/हळहळ, या भागात व्यक्ती/समाज तत्त्वज्ञानाबद्दल चिंतन... वाचताना भाव सारखे बदलत होते. तरी सुद्धा कथा ओघवती, एकसंध वाटली.
राजेंची ओळख इतक्या सहज-कुशल शैलीने करून दिल्याबद्दल श्रावण मोडक यांचे आभार.
छान. सर्व भाग आवडले. कथा सात भागात असूनही आपण भराभर भाग लिहिल्याने वाचताना सलगता राहिली.
कथालेखक म्हणून तुमचा सहभाग चित्रकारासारखा वाटला. तुम्ही कथेतले पात्र बनुन फार ढवळाढवळ केली नाहीत. त्यामुळे राज्यांच्या स्वभाव-व्यक्तिमत्त्वावरचा झोत टिकून राहिला.
पु ले शु
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
सगळे भाग सॉल्लीड झाले आहेत. खिळवून ठेवणारी ओघवती भाषा.
श्रावण साहेब, तुम्ही ही दीर्घकथा बाहेर मासिकात वगैरे प्रसिद्ध करायला हवीत, म्हणजे उर्वरीत मराठी प्रेमी पण त्याचा आनंद घेऊ शकतील.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
ही घटना सत्य आहे का?
अनेकांनी हा प्रश्न विचारला आहे. कोणी प्रतिसादात, कोणी व्य. नि.ने. एकाने खरडवहीत. माझे उत्तर - "हा सारा प्रवास असा सत्य किंवा कल्पित असा कृष्ण-धवल सांगता येत नसतो. अनेकदा लेखक त्या सीमेवरून इकडे किंवा तिकडे जात असतो."
यापलीकडे, राजे हे वास्तविक व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे हे कथन एका अर्थी वास्तववादी म्हणता येईल. पूर्ण वास्तविक नव्हे. त्याची कारणेही स्वाभाविक आहेत. काही घटना-प्रसंग, मूळ आशय तोच ठेवून, संदर्भचौकट बदलत येथे उतरली आहेत.
विसुनानांनी विचारले आहे की, या घटना अनुभवल्या तेव्हा मी त्या प्रकाशात आणल्या का, त्याही नावानिशी? नाही. वैयक्तिक श्रावण मोडक यांनी घेतलेला अनुभव यापलीकडे, कोणत्याही मार्गाने त्या प्रकाशात आणण्यासाठी, कायद्याच्या कसोटीवर उतरणारा पुरावा नाही. त्यामुळे वृत्तपत्रीय लेखनाच्या किंवा तत्सम स्वरूपात हा भाग प्रकाशात आणता आलेला नाही. जेव्हा हे अनुभव घेतले तेव्हा स्टिंग ऑपरेशन हा प्रकार आपल्या येथे इतका आलेला नव्हता. त्यासाठी आवश्यक साधनस्रोतही माझ्याकडे नव्हते. एक पत्रकार म्हणून मी बघ्याची भूमिका घेतली इतके सत्य. मात्र, अशा काही प्रकरणात लाचखोरीच्या पलीकडे जाऊन प्रश्न उपस्थित करीत हे मुद्दे तडीला लावण्याचे प्रयत्न पत्रकार या भूमिकेतून केले होते. तेथे संमीश्र यशच पदरी पडले. आपल्या अ-क्षमतेची टोचणी लावून घेण्याच्या अनेक अनुभवातील हे काही अनुभव आहेत.
सिस्टमवर कुरघोडी करण्याच्या (हे शब्द विसूनानांचे, अगदी नेमके) आपल्या सोसामुळे या माणसाने मला आकृष्ट करून घेतले होते. तो तसा का झपाटला गेला, यामागे सूडभावना होती का हे मला शेवटपर्यंत पूर्ण उमगले नाही. त्याच्या स्वप्नांचा विरस झाल्यामुळे तसे घडले का हा एकच प्रश्न मला छळतो आहे. या माणसाचा अंत मात्र खोलवर हादरवून गेला. अशा संवेदनशील माणसांना समाजात स्पेस असतच नाही का, आणि ती न मिळाल्याने ही माणसं असं काही करतात का हेही असेच छळणारे प्रश्न.
व्यक्तीचित्रण, मानसिक विश्लेषण आणि यंत्रणेला आधारभूत बनलेल्या भ्रष्टाचाराचा परामर्श या सर्वच बाबी अत्युत्कृष्ट उतरल्या आहेत.
या कसदार 'व्यक्तीचित्र-लेख-कथा' लेखनाबद्दल लेखकाचे अभिनंदन आणि आभार.
सगळे भाग सॉल्लीड झाले आहेत. खिळवून ठेवणारी ओघवती भाषा.
श्रावण साहेब, तुम्ही ही दीर्घकथा बाहेर मासिकात वगैरे प्रसिद्ध करायला हवीत, म्हणजे उर्वरीत मराठी प्रेमी पण त्याचा आनंद घेऊ शकतील.
आपलि परवानगी मिळू शकेल ? .
चाबूक!
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
प्रस्थापित व्यवस्था, त्यातला भ्रष्टाचार, तो करणारे अधिकार पदावरचे लोक ह्या बाबी कितीही माहीत असल्या तरी प्रत्यक्ष आपल्या समोर अशा घटना घडणे आणि आपण त्याचे मूक साक्षीदार असणे हाच एक खचवून टाकणारा अनुभव आहे, तुमच्या बाबतीत तर जास्तीच तसा कारण एक पत्रकार म्हणूनही तुमचे काम आहे.
तुम्ही म्हणता तसे स्टिंग ऑपरेशन त्या वेळी नसल्याने आणि मुळात तो तुमचा उद्देश नसल्याने तुम्हाला ह्या घटना वृत्तपत्रात पुराव्याने देणे शक्य नव्हते, त्याने तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला लागलेली टोचणी ह्यालेखनातून काही अंशी तरी कमी झाली असावी असे मला वाटते.
'राजे' ही एक व्यक्ती नसून संपूर्ण सिस्टिममधली एक छोटी बांडगुळासारखी उपव्यवस्था आहे असे वाटते. काही व्यक्तिगत कार्यात असफलता मिळाल्याने व्यवस्थेविरुद्ध काही अंशी सूड उगवायला टपलेल्या माणसाने व्यवस्थेत राहूनच व्यवस्थेशी एकप्रकारे बंड केल्यासारखे काही. राजेंच्या ह्या कामाच्या उर्जेचा स्त्रोत म्हणजे डीसीपी विपिनसारखी त्या व्यवस्थेतली काही चाके की जी त्या व्यवस्थेत आहेत पण शक्य तिथे योग्य गोष्टींची कदर करतात आणि तुमच्यासारखे पत्रकार मित्रही, जे हे सगळे अनुभवून केव्हातरी, कुठेतरी त्याला वाचा फोडण्यात महत्त्वाचा वाटा उचलू शकतात!
राजेंच्या एकूण व्यक्तिमत्त्वाकडे पहाता एक अतिशय बुद्धिमान, संवेदनक्षम, तीव्र इच्छाशक्ती असलेला माणूस जो म्हटले तर संपूर्णपणे भ्रष्टाचाराच्या चिखलात स्वतःला रोवून एक मोठे धेंड स्वतःच होऊ शकला असता पण त्याचे सच्चेपण आणि मनातली सूडाची आग ह्यांच्या द्वंद्वात तो सतत होरपळत आणि हेलकावे खात असलेला दिसला!
ह्या सगळ्या राड्यात घरापासून त्यांनी स्वतःला तोडून घेतले आहे हे हेतुपुर:सर आहे. कारण आपल्या रोजच्या जळण्याचा त्रास त्यांना घरच्यांना द्यायचा नाहीये! एकप्रकारे त्यांचा शेवट होण्याची दुसरी कोणती रीत माझ्यातरी नजरेत आली नाही कारण एकेककरुन व्यवस्थेतले ऊर्जा स्त्रोत विझल्यानंतर किंवा बाजूला टाकले जाऊन दूरस्थ झाल्यानंतर व्यवस्थेशी 'सामना' करताना त्यांची शोकांतिका स्वाभाविक आहे!
अतिशय कसदार आणि जिवंत अनुभव देणार्या लेखनाबद्दल अभिनंदन!
चतुरंग
श्रावणजी,
लिखाणाचे सातही भाग सलग वाचले. कथा मस्त उतरली आहे..
तुमचे हार्दिक अभिनंदन!
राजेंची कॅरेक्टर सुरेख रंगवली आहे..
तसेच लेखकाने पत्रकाराच्या त्रयस्थ भूमिकेतून केलेले निरिक्षणही झकास आहे. विशेषतः राजेंचं जीवनविषयक/ समाजविषयक तत्वज्ञान आणि त्या विचारांचं एका मध्यमवर्गीय (हा माझा आपला अंदाज!) पत्रकाराच्या विचारधारेबरोबर चाललेलं मंथन तुम्ही मस्त मांडलं आहे.
जियो! असेच लिहीत रहा ही प्रार्थना!!
आपला,
पिवळा डांबिस
नव्या मंडळींचे आभार.
अदिती, चाबूक उगारलेला नाही ना?:)
चतुरंग, टोचणी कमी झाली असे म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की बरेच हलके वाटले लिहून झाल्यानंतर. मोकळे वाटले. टोचणी म्हणाल तर तिचा संदर्भ राजेंशी कमी, व्यवस्थेशी अधिक. त्यामुळे ती कायम राहणार. तिच्यात मी तीव्र आणि कमी तीव्र असे करू शकत नाही.
पिवळा डांबिस, तुमचा अंदाज बरोबर आहे. मध्यमवर्गीयच!!! बहुतेक पत्रकार याच कॅटगरीत मो़डतात. अलीकडे त्यात भारतीय मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग (आता तर यात श्रीमंतही येतात) असे दोन प्रकारही अनेकदा केले जातात, तो भाग वेगळा. तो प्रामुख्याने आर्थिक स्थितीशी संबंधित. बाकी सामाजिक स्तरावर मानसीकतेचा उगम भारतीय मध्यमवर्गातूनच. काही बाबींमध्ये 'डी-क्लास' होणं अवघडच दिसतंय थोडं. पण मी आपला मार्क्सवर विश्वास ठेवतो याबाबतीत. त्यानं म्हटलं होतं की, डी-क्लास होण्याची पहिली पायरी म्हणजे क्लास उमजून घेणं. मी ती पायरी गाठतोय असं म्हणूया.:)
क्रमशः लेखन सुद्धा अगदी झटपट लिहीण्याची तुमची पद्धत आवडेच...
पुर्ण लेखमाला अतीशय आवडली...राजे अगदी समोर उभे केलेत ...
अजुनही उत्तमोत्तम लेखाची तुमच्या कडुन अपेक्षा आहे...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
प्रतिक्रिया
लय भारी
झकास
अप्रतिम !!!
वाचताना वेगवेगळे भाव
सगळे भाग
अप्रतिम
छान. सर्व
जबरदस्त!
बापरे!
राजे ही
खुप आवडल!
झकास!!!
सुंदर
.
अतिसुंदर!!!
वेगळीच कथा
मस्त
भन्नाट...
सातही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आभार
सुंदर
आभारी आहे.
मस्त
जबराट
चाबूक
श्रावण, सर्व लेखन पुन्हा एकदा संगतवार वाचले. अतिशय सुरेख आहे.
सुरेख!
आभार
+++१
आवडले
जबरदस्त!
प्रतिक्रिया
_/\_
_^_
लेखमाला खुप आवडली. _/\_
जबरदस्त!
वास्तवदर्शी व्यक्तिचित्रण
नो वर्ड्स.. जस्ट सिंपली नो वर्ड्स.