Skip to main content

स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?

लेखक माहितगार यांनी सोमवार, 30/11/2015 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न तसा दिसतो तेवढा सोपा नसावा, नाहीतर मंदिर प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ८५व्या वर्षानंतर कदाचित या प्रश्नाची चर्चा करण्याचे प्रयोजन उरले नसते. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न चर्चेस घेतला तर पहिला आक्षेप हा येऊ शकेल की तुम्ही केवळ हिंदुधर्मीय प्रार्थनास्थळातील असमानतेचीच चर्चा का करता आणि इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्रीयांना दिल्या जाणार्‍या असमान वागणूकीची चर्चा का करत नाही ? हा प्रश्न येतो, या प्रश्नाचे काहुर येथवरच थांबत नाही, कारण: १) हा असमानतेचा प्रश्न त्यांना धार्मीक गुरु पुजारी (येथे त्या त्या धर्मातील शब्द कल्पावेत) इत्यादी संधी समानपणे का मिळत नाही हा प्रश्न एक्स्टेंड होतो; मग असे का होते कारण प्रेषित, विदुषी, तत्त्वज्ञ या जागी अपवादात्मक स्त्रीयांचे दाखले सोडल्यास त्यांचे अस्तीत्व विरळ असल्यामुळे असे होते का ? एखादा प्रेषित असो वा प्रार्थनास्थळात प्रवेश अथवा धर्मगुरुपद नाकारणारा पुरुषवर्ग शेवटी स्त्रीयांच्या पोटीच जन्माला येतो माता पत्नी कन्या बहीण या रोलचा प्रभाव इतरवेळी बर्‍याचदा दिसून येतो तर प्रार्थनास्थळातील समानतेचे तत्त्वज्ञान आपापल्या पातळीवर रेटण्यात या स्त्रीया कुठे कमी पडताहेत का ? मुलतः त्यांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ? :) आता हा प्रश्न म्हणजे जरासे व्हिक्टीम ब्लेमींग केल्यासारखे आहे जे व्यक्तीशः मलाही मान्य नाही (शिवाय मी स्वतःही खोडू शकेन असा यात तर्कदोष आहे) तरीही असा प्रश्न उपस्थीत करण्या मागे उद्देश केवळ चर्चेस तोंड फोडणे एवढाच आहे. २) शनि शिंगणापुरचा स्त्री प्रवेशाचा प्रश्न कदाचित कायद्याच्या मार्गाने सोडवता येईल पण इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्री प्रवेश आणि धर्मगुरुपदावरील समानतेचा प्रश्न विचारला तरी प्रश्न विचारणारे असहिष्णू ठरतील ? स्त्रीयांना समानता नाकारण्यासाठी आपापल्या धर्मग्रंथाची शब्दपुजा रचत उत्पातमुल्य दाखवणारे असहिष्णू ठरणार नाहीत. मग इथे राजकीय शांतता साधण्याच्या व्यावहारीक गरजांसाठी केलेली धर्मग्रंथांना पुढेकरत उत्पातमुल्य दाखवणार्‍यांशी विवीध धर्मियांची उत्पातमुल्यावर आधारीत एक तडजोड अस्तीत्वात आहे का? असे उत्पात मुल्य दर्शवणारे असोत अथवा लोकसभेत केवळ असहिष्णूतेवर चर्चा करणार पण तेही गोंधळ करून हा कायदेमंडळांमधे घातला जाणारा गोंधळ ही सुद्धा असहिष्णूता नाही का ? ३) किंवा बर्‍याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्‍या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ? ४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ? आतापर्यंतच्या चर्चेचा रोख तुम्ही पाहीलात तर शीर्षक आणि लेखाचा उद्देश स्त्री विरोधी नाही आणि कोणत्याही विशीष्ट धर्म अथवा संस्कृतीस लक्ष्य करणेही या धागा लेखाचा उद्देश नाही, मी परिवर्तनांसाठी क्रांतीचा पक्षधर नाही पण परिवर्तनासाठी लागणार्‍या उत्क्रांतीसाठी प्रबोधनासाठी सदैव आग्रही असावे असे वाटते, हे वाचकांनी लक्षात घेतले असेलच. मी माझ्या या धागा लेखातील माझे सर्वच प्रश्न आणि विचारांचे काहुराचे निटसे विश्लेषण केले आहे असेही नाही. इतरांचे विचार समजून घेऊन माझ्या साशंकता कमी करण्यास साहाय्य व्हावे म्हणून हा धागा लेख लिहिला आहे. बाकी चुभूदेघे. चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद

वाचने 74857
प्रतिक्रिया 322

प्रतिक्रिया

In reply to by सायकलस्वार

अरे वा हे सोपे तत्त्वज्ञान दिसते!कळायला अवघड गेला असेल विषय बाकीचा! चालु द्या निरर्थक अत्मरंजन! etc etc!!

In reply to by अजया

@ सायकलस्वार, इथला तुमच्या मते गाभारा किती महत्वाचा आहे हे अधोरेखित केल्याबद्दल आभार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

In reply to by सायकलस्वार

सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा कमालीचा अभ्यास केलेला दिसतोय! का आताचा आयडी बॅन झाल्यावरची तरतूद करून ठेवली आहे! अभ्यास जोरात चालू ठेवा बरं!

In reply to by पैसा

सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा कमालीचा अभ्यास केलेला दिसतोय!
एका महिन्यात जर कुणी सालसपणे प्रतिसाद देऊ शकत असेल तर चार महिने लै झाले, नै का?

In reply to by बॅटमॅन

अगदी खरं आहे. लोक काड्या करण्यासाठी स्पेशल अवतार घेऊन येतात त्यामुळे तयार असतातच. आमच्यासारखे बसतात बोंबलत.

In reply to by पैसा

आमच्यासारखे बसतात बोंबलत.
चांगलंच आहे. बोंबलण्याचे फायदे काय असतात ते इथे पहावयास मिळेल. आरोग्यास हितकारकच असते. http://www.sanatan.org/mr/a/574.html त्या निमित्ताने सालसपणामागील अमंगळ निघून जाईल अशी भाबडी आशा करावयास हरकत नाही. =))

In reply to by सायकलस्वार

तायांनो थोडं विनोदानं घ्या की सायकलस्वाराचं वाक्य. :D का उगा वाढदिवसाच्या शुभेच्छा देउन राहीलात?

In reply to by सायकलस्वार

पुरुषांना बंदी असलेला एक गाभारा इथे मिपावरच आहे म्हणे... हाहाहाहा. पण आत मध्ये देव आहे याची खात्री आहे का तुम्हाला? ;)

In reply to by मृत्युन्जय

पण आत मध्ये देव आहे याची खात्री आहे का तुम्हाला?
देव नाही ह्याची १००% खात्री आहे ... देवी असु शकेल कदाचित =))))

In reply to by मितान

डोक्यातल्या किड्यांची पूजा करत बसलं की असं होतं
त्या स्वमतांध दांभिक क्रायबेबी कंपूबाजांना आपली पूर्ण सिंपथी आहे. :) #छाणप्रतिसाद

In reply to by बॅटमॅन

माझी तर अशा लोकांना नुसती सिंपथीच नाही तर किंड्यांविषयीच्या फोबियावर फुकट उपचार करणार्या संस्थांची यादीही तयार ठेवली आहे मी !

In reply to by बॅटमॅन

माझी तर अशा लोकांना नुसती सिंपथीच नाही तर किंड्यांविषयीच्या फोबियावर फुकट उपचार करणार्या संस्थांची यादीही तयार ठेवली आहे मी !

In reply to by मितान

एकूण प्रतिसाद पाहून "कोण तो **चा म्हणतोय मी शिव्या देतोय म्हणून?" या अजरामर वाक्याची अठवण झाली. =))

In reply to by प्रसाद गोडबोले

असं नाही असं नाही, यावेळेस सचित्र व्याख्या का नाही बरं.. अशाने फाऊल धरला जाईल ;)

In reply to by नीलमोहर

नीमो , चित्र सापडले आहे , फक्त तुर्तास संपादक मंडळ सुट्टीवर असल्याने चित्र इथे टाकले नव्हते , आपल्याला व्यनी करतो ;) बाकी चेष्टा मस्करी इतकी स्पोर्टींगली घेतल्याबद्दल आपल्यावर कारवाई वगैरे होईल की हो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

Smiley नको नको व्यनि नको.. आणि संपादक मंडळच सुट्टीवर असल्यावर कारवाई कोण करणार :)

In reply to by नीलमोहर

>>>नको नको व्यनि नको. दूरदर्शन ची दारुबंदी ची जाहिरात आठवली. नको बाबा नको नको. संसार उद्ध्वस्त करी दारु, म्हणून संसार नका करु

In reply to by संदीप डांगे

"....मंदीरप्रवेश आंदोलनाबद्दलही मला हाच प्रश्न पडला होता............जो स्वत: तुम्हाला जवळ घेऊ शकत नाही, तुमचे दु:ख दूर करू शकत नाही तो देव कशाला डोक्यावर घ्यायचा?....
कदाचित याच भावनेने सहसा लोक दुर्लक्ष करतात, अशी काही स्थाने असतील तर जाण्याचे टाळले जाते पण या दृष्टीकोणा बद्दल एक साशंकता आहे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी पाणी पिण्यास दिले नाही तर तुम्ही ते टाळाल दुसरीकडे जाऊन पाणी प्याल एका अर्थाने समतेच्या वागणूकीचा आग्रह बाजूस पडून एक अप्रत्यक्ष तडजोड स्विकारली जाते आहे. मी शीख धर्मीय असो वा नसो त्यांच्या डोक्यावर कापड बांधून पाय धुण्याची अट पूर्ण केली कि मला त्यांच्या धर्मस्थानात जाऊन दर्शन घेता येते. मी स्त्री आहे पुरुष आहे कोणत्या वर्ण धर्म पंथाचा आहे याने सहसा फरक पडत नाही. अशाच पद्धतीने इतर धर्मीय स्थळांमध्ये कुणीही आदर पुर्वक दर्शन/प्रार्थना करू इच्छित असेल तर त्यासाठी मुभा असावयास हवी आणि त्यासाठीचे आग्रह तुम्ही नास्तीक असाल अथवा इतर धर्मीय असाल तरीही सोडू नयेत कारण तुम्ही धरत असलेला आग्रह सुसंस्कृततेसाठी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सामाजीक समस्यांच्या संदर्भाने मी मागेही धागा काढला होता, तुम्ही धर्मस्थळात जाऊन प्रत्येक वेळी पुजा केली पाहीजे असे नाही पण एकदा तो अधिकार प्राप्त झाला की बाकी समाजात समतेच्या वागणूकीची खात्री करणे सोपे जाऊ शकते. मी आफ्रीकन ख्रिश्चन असेन तर काळ्यांच्या चर्च मध्ये जाउन तडजोड करेन पण दुसर्‍या समुदाया पासून तुटलेलाच राहीन ही जी सामाजीक दरी आहे ती सांधण्यासाठी म्हणून मला ऑदरवाईज रस नसला तरी गोर्‍यांच्या प्रत्येक चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करून येण्यास आवडेल. अर्थात आपण लाथ वगैरे शब्द सात्वीक रागाने जरी वापरला असला तरी आदरणीय उद्देशाने न येणार्‍यांना नाकारण्याचा एक वेगळा अधिकार धार्मीक स्थळांना प्राप्त होऊ लागतो याने सामाजीक दरी सांधण्यास मदत होते असे वाटत नाही म्हणून असे शब्द टाळावेत किंवा कसे.

In reply to by माहितगार

आता पुरेसा वेळ हाताशी नसल्याने तुमच्या प्रतिसादाचं उत्तर नंतर देईल वा वेगळा धागा काढेन, कारण इथे दलितप्रश्नावर चर्चा करणे मूळ धाग्याशी, विषयाशी प्रतारणा होइल. पण खालील मुद्द्यावर माझं मत मांडतो.
अर्थात आपण लाथ वगैरे शब्द सात्वीक रागाने जरी वापरला असला तरी आदरणीय उद्देशाने न येणार्‍यांना नाकारण्याचा एक वेगळा अधिकार धार्मीक स्थळांना प्राप्त होऊ लागतो याने सामाजीक दरी सांधण्यास मदत होते असे वाटत नाही म्हणून असे शब्द टाळावेत किंवा कसे.
'विशिष्ट मंदिरातच जागृत देव असतात' ही इतकी तकलादू आणि भ्रामक कल्पना भारतीय समाज कवटाळून बसला आहे की आपण एकाच बाबतीत वेगवेगळे विचारप्रवाह एकाच वेळी पाळत आहोत ते त्यांच्या लक्षात येत नाही. १. मनुष्य देवळात जातो. कारण देवाप्रति त्याला आपली भक्ती, श्रद्धा अर्पण करायची असते, आपले दु:ख, सुख याचे कारण तोच आहे असे समजून एक मालक-पालक-मित्र-सखा म्हणून त्याच्याशी गुजगोष्टी करायच्या असतात. आपले गार्‍हाणे सांगायचे असते, त्यावर त्याने काहीतरी करावे अशी अपेक्षा असते. थोडक्यात मंदीर हे एका व्यक्तिचे असते. भक्त तिथे स्वतःपुरते लाभ घेण्यासाठी जातो. अखंड समाजासाठी नाही. ते राजे, सत्ताधारी वैगेरे करतात. पण व्यक्तिगत पातळीवर देव हा वैयक्तिकच असतो. २. मंदिरात एक व्यवस्था असते, देवाची काळजी घेण्याची. त्याचे षोडशोपचार, पुजाअर्चा, आरत्या नैवेद्ये वैगेरे करणे गरजेचे असते. त्याची समाजातल्या एका व्यक्तिवर जबाबदारी टाकल्या जाते. परंपरेने वा कसेही चालत आलेले नियम, अटी हे गुरव, पुजारी, पुरोहित पाळत असतात जेणेकरुन 'देवाचे हित' जपल्या जावे. ह्यात स्त्रियांनी प्रवेश करू नये, रजस्वला स्त्रीने प्रवेश करू नये, अमूक जातीतल्या माणसाने प्रवेश करू नये असे नियम असतात. त्याची कारणे दैवी वैगेरे असतात. भारतात अशी बरीच मंदीरे आहेत जी विशिष्ट जातीची, उपजातीची आहेत. त्यांच्याशिवाय तिथे दुसर्‍या कोणाला प्रवेश नसतो. 'स्थानाची पवित्रता' जपणे हा उद्देश असतो. ही पवित्रता, नियम परंपरेने जसे आले तसे, थोडेसे आपल्याला सोयिस्कर ठरतील असे करत पुरोहित, गुरव पाळतात. इथे देव व पुरोहित यांचे हिताला प्राधान्य आहे, भक्तांच्या नाही. आमच्या कुलदैवतेच्या गाभार्‍यात पुरुषांना प्रवेश नाही, तिथे सगळे षोडशोपचार, विधी फक्त स्त्रिया करतात. ३. भारतीय मंदिरांचा इतिहास पाहू जाता. पुरातन मंदिरे व्यक्तिगत उपयोगासाठी, ध्यानपुजाअर्चेसाठी बांधलेली आहेत. गाभार्‍यांची रुंदी एकाच व्यक्तिला सहज बसता येईल अशी आहे. एक असाही संशय आहे की काही महत्त्वपूर्ण ज्ञान, वस्तू इथे सांभाळून ठेवलेल्या आहेत. मंदीर हे अतिशय व्यक्तिगत साधनेचे स्थळ आहे. कोणा राजाने, प्रधानाने, मंत्र्याने, सरदाराने स्वतःचे पैसे घालून एक चांगली जागा तयार केली असते. तीथे त्याने वा अजून कोणा तंत्रमंत्रात कुशल पुजार्‍याने पुजा करून वातावरण, जागा मंतरलेली असते. नित्य साधनेने तिथे एक जाणवेल असे वातावरण तयार होते. तिथे शांती लाभते. मग त्या जागेच्या दैवीपणाचे किस्से बाहेर पडतात. पण हे सगळे व्यक्तिगत आहे. त्यामुळे अशी व्यक्तिगत जागा कुठेही तयार करता येऊ शकते. पण ते वातावरण तयार करणे चटकन, झटपट होणारे काम नाही, त्यास कित्येक वर्षांची अखंड तपस्या लागते. अनिर्बंध हेळसांडीने ते वातावरण नाहिसे होऊ शकते. त्यामुळे अशी मंदीरे लोकांपासून सुरक्षित ठेवणे आले. त्यातून नियम बनले. पण जागृत देवस्थान म्हटले गेल्यावर जनसामान्यांना तेच पावरफुल वाटते आणि लोकांचा गार्‍हाणे मांडण्यासाठी तिकडेच ओढा असतो. ४. इतर धर्माच्या प्रार्थळास्थळांशी अजिबात तुलना करू नये कारण हिंदू हा व्यक्तिगत धर्म(आचरण) आहे. इतर धर्म हे सामुहिक धर्म आहेत. चर्च, गुरुद्वारा, मशीद इथे आपणास एकसमानता दिसून येईल की अनेक लोकांना एकत्र बसता येईल असा हॉल असतो. जिथे प्रार्थनास्थळ बांधतांनाच समाजाचा विचार केला गेला आहे तिथे 'कुणास मनाई करावी' हा विचारच मुलतः येणार नाही हे सरळ आहे. काळ्यांसाठी वेगळे चर्च असतील तर ते सरळ डिस्क्रिमीनेशन आहे. (आजकाल म्हणजे गेल्या वीस-तीस वर्षांतील नवीन मंदीरांच्या रचना बघितल्या तर आता समुहासाठी अशी खास मंदीरे गाव-शहरामधे चर्चच्या शैलीत बांधली जाऊ लागली आहेत. ज्यात हॉल बराच मोठा असतो, देवाची मुर्ती भींतीला टेकलेली असते, गाभार्‍यात पुजारी आणि दानपेटी राहील एवढीच जागा असते. देवाला स्पर्श करू शकत नाही. इथे आता एक क्रांती घडलेली आहे. या प्रकारच्या मंदिरांमधे कुणालाही प्रवेश बंदी नसते.) ५. देव चराचरात आहे, ज्याला जिथे भाव प्रकट होईल देव तिथे प्रकट होतो. म्हणून इथे-तिथे कुठेही दगडाला शेंदूर फासून अगरबत्ती लावलेली दिसून येते. मरीआई, म्हसोबा, सटवाई, आसरामाता, अशा जनसामान्यांच्या श्रद्धा स्विकारत भारतात लाखो ठिकाणी आहेत. इथे येता जाता कोणी नमस्कार करू शकतो. अगदी गायींपासून ते झाडांपर्यंत लोक दर्शनं घेत असतात. तिथं कोणालाही बंदी नसते. स्त्री, रजस्वला, दलित, कोणीही निषिद्ध नसतो. कारण तो सर्वांचा देव असतो, 'निसर्गदेव' असतो. असे सगळे आहे तर मग लक्षात येईल की काही विशिष्ट मंदिरांमधेच प्रवेशबंदी का? पण अशी प्रवेशबंदी असलेली मंदीरे किती आहेत? असली तरी ती खाजगी मालकीची किंवा विशिष्ट जातींसाठीची आहेत. तिथे त्यांचेच नियम चालणार. या नियमांविरुद्ध अपील होऊच शकत नाहीत त्याचे कारणे कितीही मूर्ख वा अवैज्ञानिक असली तरी. ते तिथे भेट द्यायला जाणार्‍यांना मान्य असलीच पाहिजेत. कारण नाहीतर विसंगती निर्माण होईल. जी शशीं प्रकरणात झाली, सबरीमाला प्रकरणात झाली. तुम्ही शनिदेवाला मानता पण त्याचे नियम नाही. हे मजेशीर आहे. त्यामुळे मंदिरांमधे प्रवेशबंदीला मी समर्थन देतो. एखादा देव मी मानतो तर त्याचे सगळे नियम मला मान्य असलेच पाहिजेत. शिवपिंडीवर मी मेणबत्ती नाही लावणार किंवा चादर नाही घालणार. व्यक्तिस्वातंत्र्याच्या, सन्माननीय वागणुकीच्या नावाखाली मला हे सर्व करण्याचा अधिकार आहेच. पण तो मूर्खपणा आहे ना? यावर उपाय काय? तर देव चराचरात आहे. प्रत्येक घरी गणपती बसतो, प्रत्येकाच्या घरच्या गणपतीत सेम देवत्व येतं. लाखो ठिकाणी शिवालयं, राममंदीरं आहेत, सगळीकडे प्राणप्रतिष्ठापना केलेले देव आहेत. मग दलितांनी, स्त्रियांनी आपल्यासाठी मंदीर बांधून घ्यावं, तिथेही तोच देव, तेच वातावरण करावं आणि सिद्ध करावं की देव ठायीठायी आहे, तुम्ही त्याला तुमच्या मंदिरात डांबुन ठेवुन मूर्खपणा करत आहात. पण असे होत नाही, झाले नाही. रजस्वला स्त्रियांना प्रवेशबंदी हा एक तांत्रिक मुद्दा बाजूला ठेवला तर दलितांना मंदिरात प्रवेश हा अनेक प्रश्नांना जन्म देणारा आहे. दलितांना मंदिरप्रवेश नाकारणे हा सरळ सरळ सामाजिक भेदभावाचा प्रश्न आहे. तो काही एका दिवसात तयार झालेला नाही. मंदिरात प्रवेश आहे म्हणून फार उचित सन्मान मिळतो असेही नाही हे देवदासींकडे, वाघ्यामुरळी, इत्यादींकडे बघुन कळते. त्यामुळे मंदिरात प्रवेश म्हणजे लगेच पाटील-ब्राहमणांच्या पंगतीत जेवायला मिळेल, त्यांच्या स्वयंपाकघरात प्रवेश मिळेल असे काही नव्हते, आणि झालेही नाही. (शहरातली उदाहरणे देऊ नये) ज्या देवाचा धर्म आपल्यासारख्या माणसाशी अमानुष वागण्याचे नियम बनवतो तो देव आपण कशाला मानावा हा विचार रुजवणे आवश्यक होते. जे आंबेडकरांनी अगदी योग्य पद्धतीने केले. जिथे आपल्याला सन्मान नाही तिथे जावेच कशाला हा साधा प्रश्न माझ्या 'लाथ' या शब्दामागे आहे. तुम्ही पाण्याचे उदाहरण दिले. तडजोडीबद्दल बोलत आहात. ज्या देशात रोटी-बेटी व्यवहार आपल्याच पोटजातीत व्हावे हा आग्रह असतो, तिथे मंदिरप्रवेशाने फार काही बदलत नाही. लोकांना आपल्याच जातीत, पोटजातीत मुली, मुलं बघावी लागतात. कितीही समकक्ष, समविचारी, जीवश्चकंठश्च मित्र असले तरी दोन वेगळ्या जातीत अरेंज मॅरेज होऊ शकत नाही हे स्वता:च्या डोळ्यांनी पाह्यलंय. इथे जी केली जाते ती अप्रत्यक्ष तडजोड नाही का? जात बंद, देव बंद, पंगत बंद अशा समाजाला 'लाथ' नाही मारायची तर का पूजा करायची काय? ह्याच सगळ्याला कंटाळून गावातील लोकांचा ओढा शहरांकडे वाढत असणे हे एक प्रकारे लाथ मारणेच आहे, तडजोड नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. बाकी माझ्या मतांशी प्रत्येकाने सहमत व्हावे असे नाहीच. तरी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.

In reply to by संदीप डांगे

अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला.. देवाच्या नावावर चालणार्‍या भ्रष्ट आचारा बद्द्ल तुमची स्वत:ची काही मते असतील. तुमच्या मतस्वातंत्र्याचा आदर आहे. परंतु दुसर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असली विधाने करणे कृपया टाळा. "सश्रद्ध लोकांनी अंगावर येउ नये" असा स्वतःच कांगावा करत तुम्ही हे असले काहितरी लिहयचे आणि आम्ही ते निमूटपणे वाचुन घ्यायचे ही अपेक्षा चुकीची आहे. यापुढे आपल्याला जे काही समाज प्रबोधन करायचे आहे ते योग्य शब्दात, योग्य भाषेत आणि योग्य प्रकारे कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.

In reply to by मृत्युन्जय

मागचे पुढचे काही न वाचता एक शब्द उचलून कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील सर्वस्वी अशक्य आहे. प्रतिसादात स्पष्ट लिहलंय की "जो देव तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या देवाला लाथ मारा." ज्यांना त्यांचा देव हे सगळे करतो (म्हणजे जवळ करतो, दु:ख दुर करून सुख-सन्मान-शांती देतो) अशी खात्री-विश्वास-श्रद्धा आहे त्यांच्या भावना दुखावणारं हे विधान आहे असं कसं काय ठरवलं जातंय? हे म्हणजे असं झालंय की मी म्हटलं, 'दारू पिणार्‍यांना चाबकाने फोडून काढलं पाहिजे' त्यावर 'दुध' पिणार्‍यांनी आक्षेप नोंदवावा का तर तिथे 'पिणार्‍यां'चा उल्लेख केला म्हणून. कुठल्याही विशिष्ट देवाचे नाव न घेता विधान केलं आहे, त्यात अशा देवाचं वर्णन आहे जो 'देव' ह्या सश्रद्धांच्या संकल्पनेत बसत नाही. मग त्यांच्या धार्मिक भावना का दुखावतात? शंकराला शिवी दिली तर मुस्लिम रागावतील काय? अल्लाहला शिवी दिली तर हिंदु रागावतील काय? जिजसला शिवी दिली तर जैनांना राग येईल काय? माझं विधान धार्मिक भावना दुखावणारं कसं आहे ते पटवून दिलंत तर तुमच्या अपेक्षेबद्दल विचार करता येईल. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल.

In reply to by संदीप डांगे

हे वाक्य असे वाचावे: मागचे पुढचे काही न वाचता एक शब्द उचलून कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील तर सर्वस्वी अशक्य आहे.

In reply to by संदीप डांगे

"जो देव तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या देवाला लाथ मारा." डांगे साहेब हेच विधान जर आपण असे वाचले तर? "जो "बाप" तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या "बापाला" लाथ मारा." असे पटेल काय? आपण नास्तिक असाल पण शेवटी प्रत्येक माणसाची एक श्रद्धा असते( ती असणे बरोबर कि चूक हा एक वेगळा मुद्दा असू शकतो) त्याला आपण इतक्या सहज ठोकर मारता हे पटले नाही.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, जो "देश/समाज/धर्म" तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या "देश/समाज/धर्माला" लाथ मारा. असंही वाचून बघा. मला नक्की काय म्हणायचे ते लक्षात येईल अशी अपेक्षा आहे.

In reply to by संदीप डांगे

आपल्याकडून अश्याच आक्रस्ताळ्या प्रतिसादाची अपेक्षा होती. तुम्ही तुमची वाक्य नीट वाचत नाही किंवा तुम्ही काय लिहिता ते तुमचे तुम्हाला कळत नाही. किंवा कदाचित मुद्दाम वाद निर्माण करण्यासाठी तुम्ही असले वाचाळ प्रतिसाद देता. पहिली गोष्ट म्हणजे तुमची दोन्ही वाक्ये वेगळी आहेत. ती एकत्र करुन लिहिली असतीत तर कदाचित वरचा प्रतिसाद तरी ग्राह्य धरला असता. दुसरी गोष्ट म्हणजे "लाथ मारा देवाला" हे पुर्णपणे अमान्य, अग्राह्य, अस्थायी आहे. तुम्हाला तुमच्या देवाबद्दलच्या भावना योग्य शब्दात मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे. पण देवाला लाथा मारा, त्याच्यावर थुंका, मुता (उरलेले दोन शब्द तुम्ही लिहिलेले नाहित. ते उदाहारणार्थ दिले आहेत) असली अग्राह्य भाषा ही मुळात एखाद्याच्या श्रद्धेबद्दल असलेली कमालीची असहिष्णुता दर्शवते. तुम्हाला तुमचा नास्तिकपणा गोंजारत बसण्याचा पुर्ण अधिकार आहे. मात्र हे करताना आस्तिकांच्या भावनेविषयी अनादर दाखवणे हे हीनपणाचे लक्षण आहे. चूक स्पष्टपणे दाखवल्यावर ती मान्य करुन दुरुस्त करण्यापेक्ष दुरुत्तरे करणे, वाद घालणे, आक्रस्ताळेपणा करणे हाच जर तुम्ही तुमचा युएसपी करु इच्छित असाल तर नाईलाज आहे. योग्य त्या भाषेत सर्वांनाच उत्तरे देता येतील. मात्र हे करताना "देवाला लाथा घाला" असली दळभद्री भाषा वापरणे किंबहुना कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी उगाच काड्या सारण्यासाठी असंस्कृत भाषा वापरणे आमच्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे प्रतिवाद करताना थोड्या मर्यादा जरुर येतील पण मलातरी पातळी सोडुन बोलणे शक्य होणार नाही. कुठल्याही विशिष्ट देवाचे नाव न घेता विधान केलं आहे, त्यात अशा देवाचं वर्णन आहे जो 'देव' ह्या सश्रद्धांच्या संकल्पनेत बसत नाही. मग त्यांच्या धार्मिक भावना का दुखावतात? शंकराला शिवी दिली तर मुस्लिम रागावतील काय? अल्लाहला शिवी दिली तर हिंदु रागावतील काय? जिजसला शिवी दिली तर जैनांना राग येईल काय? माझं विधान धार्मिक भावना दुखावणारं कसं आहे ते पटवून दिलंत तर तुमच्या अपेक्षेबद्दल विचार करता येईल. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल. तुम्ही कुठल्याही विशिष्ट धर्माचे नाव घेतले नाही म्हणुभाते धार्मिक भावना न दुखावणारे विधान आहे हा तर्क अजब आहे. देव ही वैश्विक संकल्पना आहे. किंबहुना जगातल्या ९९% धर्मांचा गाभा देव हाच असेल. देवाला कुठल्या स्वरुपात पहायचे याबद्दलचे प्रत्येक धर्माचे निकष वेगळे असु शकतील. पण म्हणुन देव ही संरचना नाकारता येतच नाही. एखाद्या अज्ञेयवाद्यासाठी देवाचे अस्तित्व नसणे हा समज योग्य असु शकतो पण जगाच्या पाठीवरील बहुसंख्य धर्मात देवाचे अतित्व मान्यच आहे. तुम्ही या संरचनेला उद्देशुनच "लाथा घाला" असे म्हटले आहे. इथे ते हिंदुंच्या देवासाठी म्हटले किंवा मुसलमानांच्या देवासाठी म्हटले हा मुद्दा पुर्णतः गैरलागू आहे. किंबहुना मुस्लिमांच्या देवासाठी बोललात तर धार्मिक भावना दुखावणार नाहित आणी हिंदुंच्या देवाबद्दल बोललात तर दुखावतील असेही काही नाही. वाटल्यास "मुस्लिमांचा देव" असे स्पष्टपणे लिहुन मग त्याला "लाथा घाला" असे वक्तव्य खुषाल करुन पहा. मला ते ही आवडणार नाही. पण तुम्हाला प्रयोग करुन बघायचा असेल तर करा की. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल. गंमतच आहे. कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली. उद्या तुम्ही म्हणाल की माझ्या वरील विधानावरुन माझा स्त्रीशिक्षणाला विरोध आहे असे समजावे लागेल. आता असल्या फालतु तर्कांना मी कं क्रवे ब्रं? ज्याची त्याची जाण समज वगैरे वग्रै.

In reply to by मृत्युन्जय

पण देवाला लाथा मारा, त्याच्यावर थुंका, मुता (उरलेले दोन शब्द तुम्ही लिहिलेले नाहित. ते उदाहारणार्थ दिले आहेत) हे अतिशय चिंताजनक आहे. आपण एखादं विधान कुठल्या बाजूने झुकणारं आहे हे स्वतःच ठरवून मो़कळे होता हे आधी मंत्रीमंडळाच्या विधानाबद्दल जे झालं तिथेच लक्षात आलं. इथेही तेच. ज्या वाक्याचा साधा अर्थ देवाला बंदिस्त करणार्‍या व्यवस्थेला नाकारा इतकाच अभिप्रेत आहे. 'लाथ घाला' म्हणजे तिथे जाऊन प्रत्यक्ष मुर्तीवर लाथ घाला असेच म्हटले असे तुम्ही कशावरून ठरवले? त्या विधानाला दुसर्‍या बाजूने ढकलत नेऊन 'थुंका-मुता' इथपर्यंत घेऊन जाणे, वरून मला असंच म्हणायचे होतं असे अर्थ काढणे म्हणजे वा! तुमची 'देव ह्या संकल्पनेला विरोध करणार्‍यांबद्दलची' स्वतःची मते माझ्यावर लादू नये अशी प्रांजळ प्रार्थना. कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली हेच तुम्हाला आणि इतरांना ज्यांनी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला त्यासाठी म्हणावेसे वाटते. माझे इतर धाग्यांवरचे ह्याच विषयाशी संबंधीत प्रतिसाद आपण वाचलेले नाहीत असे दिसते. तसेच माहितगार यांना जो प्रतिसाद दिला व त्याचे शेवटचे वाक्य उतावीळपणाच्या भरात आपण वाचलेले नाही असेही दिसते. अन्यथा आपण असा प्रतिसाद टाकलाच नसता. बाकी कोणत्या प्रॉडक्टचा युएसपी काय असावा हे कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार ठरते हे आपणास मी काय सांगावे. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

हे अतिशय चिंताजनक आहे. आपण एखादं विधान कुठल्या बाजूने झुकणारं आहे हे स्वतःच ठरवून मो़कळे होता हे आधी मंत्रीमंडळाच्या विधानाबद्दल जे झालं तिथेच लक्षात आलं. इथेही तेच. तुम्ही काय लिहिता ते तुमचे तुम्हालाच कळत नाही वगैर वगैरे जे मी वरती लिहिले आहे. त्याचा संदरभ मंत्रिमंडळाचा धागच होता. तिथेही तुम्ही चुकीचे लिहुन माती खाल्ली आणि मग सारवासारव केली. इथेही तेच करत आहात. तुम्ही चुकीच्या प्रकारे लिहिता म्हणुन आम्हाला कळफलक बडवावा लागतो. ज्या वाक्याचा साधा अर्थ देवाला बंदिस्त करणार्‍या व्यवस्थेला नाकारा इतकाच अभिप्रेत आहे. 'लाथ घाला' म्हणजे तिथे जाऊन प्रत्यक्ष मुर्तीवर लाथ घाला असेच म्हटले असे तुम्ही कशावरून ठरवले? तुम्ही जे लिहिले आहे तेच मी उद्ध्रूत करतो आहे. तुम्ही स्पष्ट शब्दात "अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला.." असे लिहिले आहे. इथे "लाथा मारा" आणि "च्यामायला त्या" या दोन्ही शब्दसमूहांना माझा आक्षेप आहे. आणि तुम्ही जे लिहिले आहे तेच मी परत टंकले आहे. तुम्ही स्पष्ट लिहित जा म्हणजे नंतर असली सारवासारव करावी लागणार नाही. तुम्ही चुकीचे लिहित आहात आणि वर कांगावा करत आहात. हे पहिल्यांदा होते आहे असे नाही. पण इतर वेळेस तो मनुष्यस्वभाव म्हणुन सोडुन देता येइल. इथे धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये जाणुनबुजुन करुन तुम्ही वातावरण दूषित करत आहात. त्या विधानाला दुसर्‍या बाजूने ढकलत नेऊन 'थुंका-मुता' इथपर्यंत घेऊन जाणे, वरून मला असंच म्हणायचे होतं असे अर्थ काढणे म्हणजे वा! बघा. तुम्हीच किती आक्रस्ताळेपणा करत आहात. मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही 'थुंका-मुता' लिहिलेले नाही. लाथा घाला हे काही फार वेगळे वक्तव्य आहे असे नाही. बाकी मी अर्थ काहिच काढलेला नाही,. तुम्ही स्पष्टपणे लिहिलेले आहे. "तु गाढव आहेस. कुत्रा आहेस तु" असे लिहायचे आणि वर तोंड करुन म्हणायचे की "तु गाढवासारखा कष्टाळु आणि कुत्र्यासारखा प्रामाणिक आहेस असे मला म्हणायचे होते. तु चुकीचा अर्थ काढतोस" तर ती निव्वळ सारवासारव झाली. इथे स्पष्ट शब्दात "लाथ मारा च्यायला त्या देवाला.." असे लिहिले आहे तुम्ही. अर्थ काढायला पण वाव नाही ठेवलेला. तुमची 'देव ह्या संकल्पनेला विरोध करणार्‍यांबद्दलची' स्वतःची मते माझ्यावर लादू नये अशी प्रांजळ प्रार्थना. मी कुठलीही मते लादत नाही आहे. तुम्ही ओझे वाहत चालला आहात त्याला मी काय करणार? कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली काहीही बोलण्याची हद्द तर तुम्ही केली आहे. माझे इतर धाग्यांवरचे ह्याच विषयाशी संबंधीत प्रतिसाद आपण वाचलेले नाहीत असे दिसते. तसेच माहितगार यांना जो प्रतिसाद दिला व त्याचे शेवटचे वाक्य उतावीळपणाच्या भरात आपण वाचलेले नाही असेही दिसते. अन्यथा आपण असा प्रतिसाद टाकलाच नसता. स्वतः उतावीळपणे बेताल वक्तव्ये करायची आणी मग चोर तो चोर वर शिरजोर या न्यायाने तोंड वर करुन बोलायचे ही सवय आपली असावी. आमची नाही. बाकी कोणत्या प्रॉडक्टचा युएसपी काय असावा हे कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार ठरते हे आपणास मी काय सांगावे. प्रॉडक्टचा युएसपी प्रॉडक्टवरच ठरतो. त्यातले इंप्रोव्हायझेशन कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार होते.

In reply to by मृत्युन्जय

मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही 'थुंका-मुता' लिहिलेले नाही. लाथा घाला हे काही फार वेगळे वक्तव्य आहे असे नाही. बाकी मी अर्थ काहिच काढलेला नाही,. तुम्ही स्पष्टपणे लिहिलेले आहे.
तुम्हाला हिस्टरी चॅनलवरचा हा माणूस आठवतो काय? अगदी असंच बोलतो. cc

In reply to by संदीप डांगे

नाय ब्वो. आम्हाला काही असला कोणी माहिती नाही. पण वरचा तो फोटो बघुन कळाले की तुम्ही फक्त चुकीचे लिहितच नाही तर चुकीचे अर्थ पण काढता. तुम्ही जरा मराठी भाषा समजुन उमजुन लिहित चला बरे म्हणजे तुमच्याच डोक्यात गोंधळ कमी उडेल.

यावरून इंदिरा गांधीन पंतप्रधान असतानाही तिरुपती मंदिरात जाण्यास विरोध झाला होता त्याची आठवण झाली.तेव्हा इंदिरा गांधी मंदिरात न जाता परत गेल्या होत्या त्याची आठवण झाली.

In reply to by नूतन सावंत

केरळातील गुरुवायूर येथील प्रसिद्ध अय्यप्पा मंदिरात हा विरोध झाला होता. त्याचं कारण ते कार्तिकेयाचं (जो अखंड ब्रम्हचारी समजला जातो) मंदीर आहे असं सांगण्यात आलं होतं. तिरुपती मंदिरात असं काही असल्याचं पाहण्यात किंवा ऐकण्यात आलेलं नाही. चूभूद्याघ्या.

In reply to by नूतन सावंत

मला वाटते उडीशातल्या जगन्नाथ मंदिरात(ही) असा विरोध झाला होता. त्यांच्या हत्येआधी एक दोन दिवस. इंदिरा गांधींचे शेवटचे जाहीर भाषण या उडीशा दौर्‍यातले होते आणि 'माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून भारताला संजीवन मिळेल' या अर्थाच्या शब्दांमुळे कायम स्मरणात राहाण्याजोगे झाले आहे.

अजून एक गोष्ट दैनिकात वाचण्यात आली की भारतातील शंभर टक्के साक्षर म्हणुन मिरवणार्‍या केरळ राज्यातील घटना. आपण अजूनही मानसिकरित्या कसे विकलांग आहोत हे दर्शविणारी ही घटना. केरळमधील पठाणमधिटा जिल्ह्यात असणार्‍या सबरीमला मंदिराचे विश्वस्त यांनी एका मशीनची मागणी केली आहे. हे स्कॅनिंग मशीन मंदिराच्या सुरक्षेसाठी असेल असे वाटले परंतु तसे ते नाही. तर या मशीनद्वारे महिलांची पवित्रता सिद्ध केली जाणार आहे. मंदिर विश्वस्तांना असे वाटते की मासिक धर्माच्या काळात स्त्रीया अस्वच्छ आणि अपवित्र असतात. आता स्कॅनिंग करणारं मशिन मासिक धर्म असणार्‍या स्त्रीया ओळखणार आहे. आणि अशा ओळखलेल्या गेलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. कारण अशा विटाळलेल्या महिलांमुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता वाटते. जी गोष्ट नैसर्गिक आहे त्यामुळे देवालाही विटाळ होतो ? स्त्रीयांनी या गोष्टीला विरोध म्हणुन हॅपी टू ब्लीड ही चळवळ सुरु केलीच आहे. आपण ब्वॉ ही गोष्ट सबरीमला देवावर आणि शनिमहाराजावर सोडून दिली आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुर्दैव... मंदिरातील देवाचं आणि त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ इच्छिणार्‍या स्त्रीयांचं.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विश्वस्तांचा निषेध. बुद्धीची कीव कराविशी वाटते. देवस्थान सुधारा भगव्यान्नो आधी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करेक्ट ! पुरोगामी विचारांच्या लोकांनी ह्यॅप्पी टु ब्लीड वगैरे आंदोलने करत बसण्यापेक्षा असल्या दगडाच्या देवावर आणि संस्थानांवर बहिष्कार टाकावा . ह्याचे दुहेरी फायदे आहेत पुढील प्रमाणे १) पुरोगामी लोकांन्ना पुरोगामित्वाचा आनंद आणि समाधान मिळेल. २) परंपरावादी लोकांन्ना मंदीरात गर्दी कमी झाल्याचा अन निवांतपणे दर्शन घेता आल्याचा आनंद मिळेल. आणि एकच की परंपरावादी लोकांनी स्वतःच्या हुच्चतेची जाहिरात करु नये अन पुरोगामी लोकांनी त्यांन्ना चणे फेकुन मारु नयेत , बस्स इतकेच जमले तर सर्वेत्र सुखिनो सन्तु: हे साध्य होईल !! :)

च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे उमाळे दाटल्यावर संबंधितांना हिंदूंची मंदिरेच बरी आठवतात! एव्हढाच जर पुळका आला असेल तर स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी म्हणतो मी. कोणी अडवलंय! -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे उमाळे दाटल्यावर संबंधितांना हिंदूंची मंदिरेच बरी आठवतात!
आपण धागालेख नीट वाचला आहेत का ? स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करताना हा धागालेख कोणत्याही एकाच विशीष्ट धर्माला लक्ष्य बनवत नाही हे लेखाच्या शेवटी स्पष्ट नमूद केले आहे, अशा स्वरूपाच्या असमानता राखणार्‍या सर्वच धर्मसंस्थांच्या प्रबोधनाचे आवाहन या धागालेखातून आवाहन केले आहे. शनि शिंगणापूर हे केवळ चर्चा सुरवातीसाठी निमीत्तमात्र आहे. केवळ शनि शिंगणापूरला लक्ष्य बनवायचे असते तर धागा लेखाचे शीर्षक तसे लिहिले असते, ध्रर्मसंस्था आणि धर्मस्थळे संबंधाने पक्षपात टाळण्याचा अधिकतम प्रयास केला आहे.
एव्हढाच जर पुळका आला असेल तर स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी म्हणतो मी. कोणी अडवलंय!
गा.पै. आपल्या या वाक्याचा नेमका अर्थ लक्षात आला नाही अर्थ काय होतो ते कृपया स्पष्ट कराल काय ? म्हणजे इतरांना चर्चा करता येईल

In reply to by माहितगार

माहितगार, माझं म्हणणं अधिक व्यवस्थित शब्दांत मांडता आलं असतं. ते न केल्यामुळे तुमची आणि वाचकांची क्षमा मागतो. १.
स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करताना हा धागालेख कोणत्याही एकाच विशीष्ट धर्माला लक्ष्य बनवत नाही हे लेखाच्या शेवटी स्पष्ट नमूद केले आहे,
बरोबर आहे. जे लोकं मंदिरांतल्या विविध प्रथांना स्त्रीपुरुष भेदभावाचा रंग देऊ इच्छितात त्यांच्यासाठी माझा प्रतिसाद आहे. धागाकर्त्यासाठी नाही. २.
आपल्या या वाक्याचा नेमका अर्थ लक्षात आला नाही अर्थ काय होतो ते कृपया स्पष्ट कराल काय ? म्हणजे इतरांना चर्चा करता येईल
जिथेतिथे स्त्रीपुरुष समानता बघायची ज्यांना हौस आहे त्यांनी स्वत:च्या शरीराकडे बघायला शिकावं. आपलं शरीर आणि मन हेच मुळी स्त्रीपुरुष भेदभावावर आधारलेलं आहे. उगाच मंदिरबिंदिर अशा बाह्य ठिकाणी समानता पैदा करण्याऐवजी स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी. आ.न., -गा.पै.

'देव दानवां नरे निर्मिले' आणि त्यांचे नियमही. देव जर असलाच तर त्याच्यापाशी कसला भेदभाव असूच कसा शकेल? शनिशिंगणापूरच्या गावकर्‍यांनी शनिदेवाला दुधा-तेलाचा अभिषेक घालून स्वतःच्या कोतेपणाचे दर्शन घडवले आहे. देवाला विटाळ घडविणारीही माणसेच. आणि देवाचे शुद्धीकरण करणारीही माणसेच! अजब आहे सगळे...

In reply to by एस

सर्वच प्रस्थापित धर्मांमधे एक अनुस्यूत घटक म्हणून हा दुजा-भाव पहिल्या पासून आहे....ज्याना बदलायच आहे त्यानी बिनदिक्कत बदलाव.. धर्म आपोआप बदलेल..ज्याना जाणीव पूर्वक मागास रहायच असेल,त्यांना राहु द्यावे. ते आपोआप गाळात जातील. दुसरे धर्म बदलत नाहीत,मग आम्ही तरी का बदलाव? अस म्हणणाय्राना तर बदलाची इच्छा असलेल्यानी मुद्दाम स्वत: बदलून त्याची ताकद कमी करावी. जोपर्यंत इथे लोकशाही आहे , तो पर्यंत हे सहज शक्य आहे

In reply to by अत्रुप्त आत्मा

हो , व्यक्तिगत पातळीवर सत्यनारायणासारखी सरळ सरळ लुबाडणुक करणारी पुजा अन अन्य कर्मकांडे संपुर्णपणे बंद करणे आम्हाला जमले आहे :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

@ अत्रुप्त एक चांगाला प्रतिसाद, असा प्रतिसाद देण्यासाठी धारीष्ट्य लागते. बाकी प्रगोंंच्या प्रतिसादाबाबत; सत्यनारायण कथेत कुठे दुजाभाव असण्याबद्दल अजून एकदा अभ्यासावी लागेल पण तरीही -सत्यनारायण कथेतील काही विश्वास तुर्तास बाजूस ठेवले तर- सत्यनारायण सर्वांचा समान सहभाग वाढवण्यास उपयूक्त आहे का त्या बाबत त्यात भेदभाव कमी असावा अंदाजा आहे जाणकारांनी प्रकाश टाकावा.