मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वच्छतेचं सोवळं की सोवळ्यातील स्वच्छता!?

अत्रुप्त आत्मा ·

माहितगार Sat, 04/18/2020 - 07:33
आपण श्रद्धा डोळस असाव्यात यासाठी प्रयत्न करता हे स्तुत्य आहे. सद्द चर्चांमधील मुख्य विषय कोविड१९ वीषाणू पासून सुरक्षीत करण्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे पालन आणि सामाजिक अंतर हा आहे. सोवळ्याचा उद्देश्य आणि अंशतः संबंध स्वच्छतेशी होता हे खरे आहे. अर्थात रेशमी वस्त्र धुतलेले नसले तरी सोवळ्यास स्विकार्य समजणे म्हणजे किमतीने भारी गालीच्यावर वीषाणू पसरणार नाहीत असे समजण्यासारखे असावे. सोवळे सुती असो वा रेशमी त्याचे साबणाच्या पाण्याने निर्जंतुकीकरण आवश्यक असावे असे आधुनिक विज्ञान सांगते. आणि अधिक नविन वैज्ञानिक ज्ञान मोकळ्या मनाने स्विकारले जावयास हवेच. पुर्वी सोवळे पाळणार्‍या व्यक्ती सोवळ्यात नसलेल्या व्यक्तींपासून सामाजिक अंतर पाळत (पण आपापसात पाळत नसत) आता संसर्गजन्य वीषाणू संसर्ग पसरवताना कुणी सोवळ्यात आहे की नाही हे बघत नाही, सोवळ्यातील व्यक्तींनी परस्परात सामाजिक अंतर पाळले नाही आणि त्यापैकी एकास वीषाणूचा संसर्ग असेल तर तो दुसर्‍या सोवळ्यातील व्यक्तीस पोहोचवू शकतोच.

In reply to by माहितगार

माहितगार Sat, 04/18/2020 - 07:41
अर्थात सोवळ्यात स्वच्छतेची जी इतर काही बंधने पाळली जात जसे की, वस्त्रे स्नानाच्याच वेळी धुवावीत आणि स्नान केल्यानंतर मागच्या स्नानाच्या वेळी धुतलेली वस्त्रेच वापरावीत, सोवळ्यातील स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन न केलेल्यांपासून सामाजिक अंतर पाळणे आणि स्वयंपाक हा सोवळ्यातच करणे याचे स्वच्छता पालनाच्या दृष्टीने अंशिक फायदे होतेच. वर नमुद केल्या प्रमाणे वीषाणूपासून सुरक्षेसाठी सामाजिक अंतर सोवळ्यातील व्यक्ती सोबत सुद्धा पाळले जावयास हवे आणि सोवळ्याची सर्वच वस्त्रे साबण अथवा निर्जंतुकीकरण अल्कोहोलने आणि अथवा कडत पाण्याने निर्जंतुक करुन घेणे गरजेचे असावे.

In reply to by माहितगार

@अर्थात सोवळ्यात स्वच्छतेची जी इतर काही बंधने पाळली जात जसे की, वस्त्रे स्नानाच्याच वेळी धुवावीत आणि स्नान केल्यानंतर मागच्या स्नानाच्या वेळी धुतलेली वस्त्रेच वापरावीत, - आहो पण याचा हेतू स्वच्चता हा नाही! अपवित्रता हा आहे. नसला अस म्हणायचं असेल,तर रेशमी सोवळं वाली व्यक्ती तितकंच स्वच्छ व अस्पर्श धोतर नेसलेल्या (स्नान झालेल्या) व्यक्तीकडून पाणी घेत नाही, ते का? हे आम्ही अनुभवलेलं आहे. उद्या एखाद्या देवळातला पुजारी तिथल्या एखाद्या सेवकाकडून पूजेचा द्यायचा नारळ स्पर्श न करता वरून ओंजळीत टाकतो,या मागे काय कारण असतं?(अस तुम्हाला वाटत?) शरीराने व मनानेही स्वच्छ असलेल्या चार दिवसातल्या स्त्री ला मंदिरात प्रवेश का नसतो? स्वच्छतेचाच निकष आहे ना? मग काय हरकत आहे. आंबेडकरांसारख्या स्वच्छ बुद्धीमान दलितांचा मंदिर प्रवेश नक्की कोणत्या अस्वच्छतेच्या कारणांनी अडवला जात होता?

In reply to by अत्रुप्त आत्मा

मदनबाण Sat, 04/18/2020 - 11:32
शरीराने व मनानेही स्वच्छ असलेल्या चार दिवसातल्या स्त्री ला मंदिरात प्रवेश का नसतो? स्वच्छतेचाच निकष आहे ना? मग काय हरकत आहे. या नाजुक काळात स्त्रीस शारिरिक कष्ट होत असतात, तसेच त्यांचे मन देखील प्रसन्न नसते. इतर दिवशी कुठलीही आडकाठी नसतान, याच काळात मंदिर प्रवेशाचा अट्टहास करणे हे मी बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण समजतो. !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aithey Aa... :- Bharat

In reply to by मदनबाण

चौकस२१२ Sat, 04/18/2020 - 13:32
मुळात पूर्वी, त्या चार दिवसात स्त्रीला विश्रांती मिळावी म्हणून काही प्रथा पडल्या असाव्यात . दुर्दैवाने त्या कालानुरूप नष्ट व्हायला पाहिजे होत्या ... पुरेश्या झाल्या नाहीत... हे हिंदू धर्माचे दुर्दैव ... दुसरे दुर्दैव असे कि याचा बरोबर मशिदीत स्त्रियांना वेगळ्या भागात का बसावे लागते यावर चकार शब्द कोणी बोलणार नाही... या दुटप्पी पणाचा राग येतो अर्थात फक्त मुस्लिमांच्यात नाही तर " स्वामिनारया" या "पंथा " मध्ये पण स्त्रियांवर जी बंधन आहेत ती पण अतिशय चुकीची आहेत ( मी मुद्डमून याला पंथ म्हणतोय... धर्म नाही कारण हि मंडळी जरी वरवर हिंदू दिसत असली तरी "मेनस्ट्रीम" हिंदू म्हणून घेत नाहीत स्वतःला )

In reply to by माहितगार

आता आपल्याला बाहेरून आल्यावर घरात कुठेही स्पर्श न करता बाथरुमात जाऊन आधी हात साबणाने 25 सेकंद धुवून, सर्व कपडे बदलावे यातल्या कुठेही कोणालाही स्पर्श न करण्याचा आरोग्य शास्त्राचा धर्मप्रेमी लोक धर्मातील अस्पृश्य/अस्पर्श शास्त्राशी संबंध जोडत आहेत. धर्मातील शिवाशिव , अस्पर्श याचा मानसिक संबंध अपवित्रतेशी आहे, अनारोग्याशी नाही..हे ते दाखवून दिलं/प्रतिवाद केला, तरी दडवत आहेत..

माहितगार Sat, 04/18/2020 - 07:48
मला वाटते काही अल्कोहोल युक्त हँडसानीटायझर ज्वलनशील असतात (चुभूदेघे) ती पुजादी कार्ये करताना दिव्यांपासून दूर ठेवण्याची दक्षता घेणे श्रेयस्कर असावे. आणि अगदी निर्जंतुकीकरणाच्या दृष्टीने मुर्तींनाही साबणाच्या पाण्याने धुणे श्रेयस्कर असावे असे वाटते. पुजाकरतानाची पुसण्याची अनेक वस्त्रे प्रत्यक्षात अत्यंत अस्वच्छ असतात तीही साबणाच्या गरम पाण्याने धुऊन घेणे बंधन कारक समजणे श्रेयस्कर असावे.

चौकस२१२ Sat, 04/18/2020 - 08:01
हे अतृप्त आत्म्या .... आपल्या लेखातील मूळ मुद्दा बऱयापैकी पटला आणि त्याचं सार मला कळलेलं असे कि " परंपरा, संस्कृती , धर्म यातून येणाऱ्या काही गोष्टी आणि खास करून आरोग्याशी निगडित असेलेल्या गोष्टी आंधळेपणाने स्वीकारू नयेत? त्यामागे काही तर्कसंगत विचार आहे का? असले तर तो सिद्ध झाला आहे का याचा विचार करावा " यात न पटण्यासारखेच काही नाहीये खास करून ते भस्माचे उदाहरण... किंवा आपण हवनातील धुराचे उदाहरण म्हणू... दुर्दैवाने आपल्या समाजात या विषयवार नेहमीच दोन टोकांच्या भूमिका असतात एक तर "आहे ते नं प्रश्न विचारता स्वीकारा किंवा दुसरे टोक म्हणजे "हे धर्मात/ परंपरेत लिहिले आहे ना म्हणजे सगळेच ( यातील "च" वर भर) खोटे आणि फालतू असले पाहिजे " मध्य गाठणारे पण अनेक आहेत नाही असे नाही पण कमी .... मग हे असा का? एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितले तर यांवरून एक विधान आठवले ( यात पूर्व आणि पश्चिमेकडील विचारसरणी तील फरक दाखवला आहे ) त एम्हणजे = पूर्वकडची विचारसरणी म्हणजे "आधी विश्वास ठेवा, अनुभव घ्या आणि मग ठरवा " आणि पश्चिमेकडची विचारसरणी म्हणजे = " आधी सिद्ध होतंय की नाही ते पहा , मग अनुभवा आणि मग ठरवा कि विश्वास ठेवायचा कि नाही तो " यातील कोणता विचार अंगिकार्याचा ते प्रतेय्कने ठरवावे पारंपरिक औषधी वैगरे मध्ये तर्कसंगत चाचण्या ना असण्यामागची जुनी करणे अनेक आहेत .. १) खोल अभ्यास करून निष्कर्ष काढयनासाठी लागणार वेळ आणि पैसे कदाचित नवहता २) तंत्रन्यान नवहते हे मुद्दे आता जरी सोपे झाला असले तरी स्वार्थ आडवा येत असेल म्हणजे .. एखादा बलाढ्य "पारपरंपरिक " औषधे बनवणारा उद्योग . कशाला "मूळ संशोधनावर " पैसे खर्च करेल .. चालतंय ना गल्ला जमतेय ना चालू द्या... (अर्थात यात ऍलोपॅथी चे उद्योग सुद्धा काही कमी पापी नाहीयेत... एकाच पॅरासिटामोल त्याला पाठीसाठीचे वेगळे, हाडांसाठी वेगळे असे करून पैसा कसा जास्त मिळेल असले उद्योग करीत असतो आणि रेग्युलेटर कधी कधी पकडतो हि ) आता थोडे ना पटणारे : ना पटणारे असे नाहीच फक्त एक टीका होऊ शकते ती का होईल ते मात्र समजवून घ्या ती टीका म्हणजे " हा बरोबर आहे पण मग हे हिंदूइतर धर्मावर आधारित उपाय योजनांवर पण हे चालते मग त्याबद्दल का नाही लिहिले? अशी टीका जर कोणी केली तर ती रास्त ठरते असे मला वाटते मान्य आहे कि आपण कदाचित वयसायिक पत्रकार नाही त्यामुळे हे बंधन आपल्यावर नाही आणि आपल्याला कदाचित युनानी वैगरे औषधी वर काय होते याची माहिती नसावी पण विचार करूयात कि हा ल्लेख जर मिपा पेक्षा मोठा वाचक वर्ग असलेल्या एखाद्या ब्लॉग किंवा व्यावसायिक वर्तमान पत्रात/ मासिकात कोणी "पत्रकाराने" लिहिला तर? तर मग मात्र यात "युनानी" आणि चिनी धर्म/ समाज/ परंपरेचा पण गोषवारा घेणे हि त्या "पत्रकाराची" वयवसायिक जबाबदारी ठरते.. नाहीतर कोण्ही म्हणाले कि "बघा हिंदूंनाच बडवतात सारखे" तर ती टीका यौग्याचा ठरेल बरेच पत्रकार लेखाला असे शीर्षक देतात कि " समाजातील वाईट चालीरीती" आणि लेखात भर असतो तो एकाच धर्मातील चालीरीतींनवर आणि वरती असे भास्वततात कि "हि समतोल पत्रकारिता आहे " ( हि टीका आपल्यावर नाही )

In reply to by चौकस२१२

@ना पटणारे असे नाहीच फक्त एक टीका होऊ शकते ती का होईल ते मात्र समजवून घ्या ती टीका म्हणजे " हा बरोबर आहे पण मग हे हिंदूइतर धर्मावर आधारित उपाय योजनांवर पण हे चालते मग त्याबद्दल का नाही लिहिले? अशी टीका जर कोणी केली तर ती रास्त ठरते असे मला वाटते. :--- अगदी बरोबर. पण माझा अनुभव असा आहे की अशी मी केलेली टीका मी दाखवून दिली तरी ही लोकं (त्यांनीच घातलेल्या किंवा आकसाने लादलेल्या कंडिशन्स नुसार) नन्तर स्वतःच्या मतात,वागण्यात बदल करत नाहीत. हे फक्त मुद्दा उडवून लावण्यासाठी वापरायचं हत्यार आहे. कामात फोटोग्राफर,व्हिडीओ शूटिंग,केटरर, स्टेज डेकोरेटर अश्या मंडळीतील ही हिंदू-इतर मंडळी येतात. त्यांनाही मी त्यांच्या प्रथा कुप्रथांबद्दल प्रश्न विचारतो , बोलतो.. ते ही सकारात्मक,नकारात्मक प्रतिसाद देतात. तसच फेसबुकावर कुठे कुठे केलेलं असच लेखनही असतं. त्या लेखनाचे व सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या मंडळींचे दाखले दिले तर धर्मप्रेमीपैकी अगदी थोडी मंडळी तात्पुरती किंवा कायमस्वरूपी बदलतात. पण यांच्यातल्या कांगावेखोर लोकांचा जो गट,तट आहे,जो अश्या विरोधात प्रामुख्याने सहभागी असतो तो मात्र भ्याडपणानी पळून जातो,नाहीतर क्रूरपणे हल्ला करतो हाच माझा अनुभव आहे.

In reply to by चौकस२१२

@बरेच पत्रकार लेखाला असे शीर्षक देतात कि " समाजातील वाईट चालीरीती" आणि लेखात भर असतो तो एकाच धर्मातील चालीरीतींनवर आणि वरती असे भास्वततात कि "हि समतोल पत्रकारिता आहे " ( हि टीका आपल्यावर नाही ) :- हे 100% खरं आहे. आम्ही या मंडळींना फेक्युलर,फुरोगामी म्हणतो. ही पक्षपाती मंडळी धर्मअंधप्रेमी लोकांची जुळी भावंडे आहेत. ह्यांनी धर्म फक्त नावाला सोडलेला असतो. व कथित पुरोगामी गटात शिरकाव केलेला असतो. पण मूळचा सनातनी धार्मिकपणा,लबाडी,पक्षपाती वृत्ती तशीच कायम असते.

संगणकनंद Sat, 04/18/2020 - 10:50
सत्यनारायण पूजा, वास्तूशांत, विवाहातील रुढी परंपरा आणि मृत्यूपश्चात कर्मकांडे याबाबतीत जनमानसात जी धारणा किंवा तर्कसंगती असते तीच यावेळी स्वच्छतेच्या बाबतीत पुढे येत आहे. मात्र मनातील स्वतःविषयीची तथाकथित सुधारक ही भुमिका बाजूला ठेवली आणि लोकांच्या काही अतिरंजित दाव्यांकडे दुर्लक्ष केले तर आपल्याकडे स्वच्छतेचं महत्व आधीपासूनच होतं हे लक्षात येईल. सोवळ्याचा मूळ हेतू आरोग्यविषयक स्वच्छता हाच असावा. (मला hygiene ला मराठी शब्द सुचत नाही) नंतर पुढे कधीतरी त्याचे अतिकठोर कर्मकांडात रुपांतर झाले असावे. एक उदाहरण देतो. आमच्या लहानपणी शौचास जाऊन आलो की आम्ही बाहेरच हात पाय स्वच्छ धूवून आलो की नाही हे आमची आजी कटाक्षाने पाहत असे. तिला असं का हे विचारलं की ती म्हणायची शौचास जाऊन आल्यावर हात पाय स्वच्छ न धूता तसेच घरात वावरल्यास घरात कली शिरतो. तिचे हे उत्तर अर्थातच हास्यास्पद होते मात्र शौचास जाऊन आल्यावर हात पाय स्वच्छ न धूणे आरोग्याच्या दृष्टिने किती अत्यावश्यक आहे हे आपल्याला माहीतीच आहे. तीच गोष्ट नमस्काराची, आपले त्यामागील स्पष्टीकरण काहीही असले तरी दुसर्‍या व्यक्तीला अभिवादन करताना त्या व्यक्तिच्या शरीराशी थेट संपर्क होत नाही. पर्यायाने स्पर्शाने होणारा जंतू संसर्ग टळतो ही वस्तूस्थिती आहे. किंबहूना ती कोरोनाच्या साथीमुळे अधोरेखीत झाली आहे आणि जगाने स्विकारली आहे. सत्यनारायण पूजा, वास्तूशांत, विवाहातील रुढी परंपरा आणि मृत्यूपश्चात कर्मकांडे वगैरे गोष्टी करुन त्याची प्रसारमाध्यमाध्यंमध्ये जाहीरात करणार्‍या व्यक्तीने सोवळे या बाबतीत टीकेची झोड उठवणे हास्यास्पद आहे. असे का बरे असेल? नो मनी देन नो हनी?

संगणकनंद Sat, 04/18/2020 - 11:15
(पुन्हा आम्ही असें युक्तिवाद केले की "तुम्ही गुरुजी/पुरोहित असून(?) स्वतःच्याच धर्माविरुद्ध कसे बोलता?" हा मनभावी परंतु अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न येतोच! जणू काही पुरोहित जेव्हढा जास्तीत जास्त अंधश्रद्ध तेव्हढा तो धार्मिक जनतेला अधिक आदर्श,असा या लोकांचा {आत्मप्रतारक} समजच आहे... असो!)
अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न ??? तुम्ही स्वतःला काय समजता हो? हे तीन शब्द तुमच्यातील टोकाच्या अहंकाराचे प्रतिक आहे. सुधारक असणारी व्यक्ती कधीही लोकांप्रती अशा अपशब्दांचा वापर करणार नाही. तुमच्यासारख्या ढोंगी सुधारकांमुळे खरे सुधारक बदनाम होतात. जेव्हा तुमचे यजमान तुमच्याकडून एखादी पूजा किंवा विधी करुन घेतात तेव्हा "आपण देवाचे काही करतोय" ही त्यांची प्रामाणिक भावना असते. तेव्हा सारे विधी किंवा पूजा प्रथेप्रमाणे व्हावेत आणि ते करण्यार्‍या पूरोहीताचीही तीच भुमिका असावी अशी त्यांची अपेक्षा असली तर त्यांचे काय चुकले? त्यांचा "अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न" अशा शब्दांत पूरोहिताने अपमान करणे कितपत योग्य आहे? विधी/पुजा सर्व करायच्या, फक्त त्यात थोडेसे फेरफार करुन त्याला सुधारणा असे गोंडस नाव द्यायचे आणि समाजात सुधारणावादी म्हणून मिरवायचे ही दांभिकता आहे. ज्याक्षणी सुधारणा म्हणजे काय हे खर्‍या अर्थाने तुम्हाला कळेल त्याक्षणी तुम्हाला दुसरा व्यवसाय शोधावा लागेल.

In reply to by अत्रुप्त आत्मा

संगणकनंद Sat, 04/18/2020 - 12:05
"अत्मकुंथन" च्या ऐवजी वापरलेला धूळफेक हा शब्द आवडला. धूळफेक म्हणा हवं तर. पण मी माझे मुद्दे मांडले, मिपा वाचक ते वाचतील. आणि तुमच्या या प्रतिसादाने तुमच्याकडे उत्तर नाही हे ही मिपा वाचकांच्या लक्षात येईल. मुद्दे कोणते आणि धूळफेक कोणती हे लक्षात येण्याईतके मिपा वाचक सुज्ञ आहेत. असो, तुम्ही काही प्रतिवाद केला असता तर पुढे काही लिहीता आले असते. तुम्ही धूळफेक म्हणून चर्चेपासून पळ काढत आहात म्हटल्यावर विषय संपला.

In reply to by संगणकनंद

माहितगार Sat, 04/18/2020 - 12:06
ज्याक्षणी सुधारणा म्हणजे काय हे खर्‍या अर्थाने तुम्हाला कळेल त्याक्षणी तुम्हाला दुसरा व्यवसाय शोधावा लागेल.
असहमत, सुयोग्य चर्चा करुन हिंदू चाली रितींमध्ये सुधारणा केली जाऊ शकत नाही हि सुद्धा एक अंधश्रद्धाच नाही काय? अगदी ऋग्वेदात्च हिंदू संस्कृतीच्या उत्क्रांती स्वभावाची चिन्हे मिळतात ती नंतरही मिळतात. माणूस ब्राह्मण अथवा हिंदू असो अथवा नसो काळानुसार बदलणे मानवी स्वभावाला नेहमीच जड जाणारे असते म्हणून माणूस आणि समुह काल परत्वे बदलू शकत नाहीत आणि त्यांची सद्य संस्कृती बदल करत बसण्यापेक्षा पूर्ण मोडीत काढा म्हणणे माणूस प्राणि असांस्कृतिक आहे म्हणण्यासारखे असत्य नाही किंवा कसे? पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संलग्न पौरोहित्य असेल किंवा आपले मिपाकर अत्रुप्त आत्मा असतील हि मंडळी सांस्कृतिक उत्क्रांतीत जुन्यातले चांगले ठेऊन त्याज्य टाकण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. एकतर सर्वच अंधश्रद्धा पूर्ण करा किंवा सगळ्याच श्रद्धांना अंधश्रद्ध ठरवून काहीच नको दोन्ही टोके आहेत. डोळस श्रद्धा मानवी संस्कृतिस साहायक होऊ शकतात आणि अत्रुप्त आत्मा सारख्या सुधारकांचा आपला स्वतःचा एक रोल असतो आणि असावा.

In reply to by माहितगार

संगणकनंद Sat, 04/18/2020 - 12:36
प्रतिसादातील अगदी थोडा भाग वगळता बाकी प्रतिसादाशी सहमत. चाली-रिती, रुढी -परंपरा खूप जुन्या असतात, संस्कृतीचा भाग असतात. कालौघात त्यांना कर्मठपणा चिकटतो. आणि बुद्धिवंताना त्यातील फोलपणा जाणवतो. मात्र अशा रुढी-परंपरांचे समूळ उच्चाटन न करता त्यात सुधारणा करणे केव्हाही श्रेयस्कर यात दुमत नाही. यामुळे समाजमन दुखावत नाही आणि कर्मकांडातील कर्मठपणा एक तर नाहीसा होईल किंवा कमी तरी होईल. आणि जर जीवनात कुठल्याच चाली-रिती पाळायचे नाही असे ठरवले, सण सोहळे साजरे करायचे नाही असे ठरवले तर जीवनच रुक्ष होऊन जाईल. आक्षेप असतो तो सोयिस्कर असेल तेव्हा मौन पाळणार्‍या आणि सोयिस्कर असेल तेव्हा टीका करणार्‍या तथाकथित सुधारकांच्या भुमिकेला.

In reply to by संगणकनंद

@स्वगृह मिसळपाव Search form शोधा साहित्य प्रकार नवे लेखन नवे प्रतिसाद मिपा पुस्तकं घोषणा मदत पान मिपा विशेषांक दिवाळी अंक २०१९ श्रीगणेश लेखमाला २०१९ स्वच्छतेचं सोवळं की सोवळ्यातील स्वच्छता!? प्रतिसाद द्या प्रतिसाद द्या त्याचू वैलपान's picture प्रतिसादातील अगदी थोडा भाग 18 Apr 2020 - 1:06 pm | त्याचू वैलपान प्रतिसादातील अगदी थोडा भाग वगळता बाकी प्रतिसादाशी सहमत. चाली-रिती, रुढी -परंपरा खूप जुन्या असतात, संस्कृतीचा भाग असतात. कालौघात त्यांना कर्मठपणा चिकटतो. आणि बुद्धिवंताना त्यातील फोलपणा जाणवतो. मात्र अशा रुढी-परंपरांचे समूळ उच्चाटन न करता त्यात सुधारणा करणे केव्हाही श्रेयस्कर यात दुमत नाही. यामुळे समाजमन दुखावत नाही आणि कर्मकांडातील कर्मठपणा एक तर नाहीसा होईल किंवा कमी तरी होईल. आणि जर जीवनात कुठल्याच चाली-रिती पाळायचे नाही असे ठरवले, सण सोहळे साजरे करायचे नाही असे ठरवले तर जीवनच रुक्ष होऊन जाईल.:--- हेच सर्व मी करतो, हे दिसत असूनही जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा कुटील डाव साधण्यासाठी मला फोल दाखवून तुम्हाला काहीही हाती लागणार नाही,हेच माहितगार यांच्या प्रतिसादावरून स्पष्ट झालंय. बाकी पळ काढणं इत्यादी निरर्थक आत्मकुंथन किंवा स्वमतांध दांभिकता(शब्द बरोबर-आला ना?) एन्जॉएबल आहे! चालू द्या! लउल्लूल्लूल्लू =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

संगणकनंद Mon, 04/20/2020 - 22:35
हेच सर्व मी करतो तुम्ही काय करता याची कबुली तुम्हीच तुमच्या फेसबुकवरच्या पोस्टमध्ये दिलीत, जी पोस्ट तुम्ही डिलीट केलीत. सांगा बरे, ती तथाकथित सुधारणावादी पोस्ट का डिलीट केलीत?

गामा पैलवान Sat, 04/18/2020 - 14:54
अतृप्त आत्मा, तुम्ही विचारलंय की :
जर धर्मातल्या सगळ्या सोवळ्या ओवळ्या कथित साधनशुचितेचा हेतू फक्त स्वच्छता हाच होता तर पूजेला बसताना मग स्वच्छ धुतलेले कपडे हे तेव्हढ्याच स्वच्छ (नेसायाच्या) सोवळ्यापेक्षा कमी दर्जाचे किंवा कट्टर सनातनी मतांनुसार अयोग्य कसे होतात?
प्रश्न रोचक आहे. माझ्या मते केवळ स्वच्छता हा हेतू नाही. सैनिकाने वा अग्निशामक जवानाने गणवेश घातल्याने तो जास्त पराक्रम गाजवतो का? मग गणवेशावर इतके पैसे का खर्च करायचे? अशा प्रकारची ऐहिक कारणमीमांसा असावी. अध्यात्मिक कारणमीमांसा सध्यातरी सांगत नाही. आ.न., -गा.पै.

शा वि कु Mon, 04/20/2020 - 18:45
मुळात रितीरिवाज करण्यासाठी कोणत्याही वैज्ञानिक रॅशनलायझेषनची काय गरज आहे ? इतर कोणाला इजा होत नसेल तर तार्किक दृष्ट्या कितीही निरुपयोगी वाटणारा विधी आपण निव्वळ आनंदासाठी का ना करावा ? उदा- तुम्हाला द्रोण आणि पत्र्यावळ्यांमध्ये जेवायला आवडतं तर जेवूनच टाका !

वीणा३ Mon, 04/20/2020 - 22:38
लेख वाचताना अगदी अगदी झालं. एक गोष्ट खूप वर्षपूर्वी ऐकली होती. एका नवीन लग्न झालेल्या मुलीचा नवरा तिला म्हणतो कि माझी आई एक प्रकारचं धिरडं खूप छान बनवते. ती मुलगी ते शिकून घ्यायला सासू कडे जाते. सासू तिला धिरडं घालून दाखवते आणि तव्यावर टाकल्यावर ती त्याच्या कडेचा एक तुकडा कापते. सून तिला विचारते कि तुकडा का कापला, सासू म्हणते, माझ्या सासूने हे धिरडं मला शिकवलं, तिने मला सांगितलं तुकडा काप म्हणून मी तुकडा कापते. सुनेला ते पटत नाही. तिची आजेसासू अजून हयात असते, ती आणि सासू  तिच्याकडे जाते, आणि विचारतात कि का बाई तुकडा कापायचीस. आजेसासू म्हणते आग माझ्या तव्याला एक भोक होत तिथे धिरडं करपायचं आणि तेल पण वाया जायचं म्हणून मी ते कापायची. सासू ने आजेसासू ला कधीच प्रश्न न विचारल्याने (किंवा कधीच स्वतः विचार न केल्याने)ती एक गरज नसलेली रूढी आयुष्यभर पाळत अली. सुनेने फक्त प्रश्न विचारल्याने ती त्या अनावश्यक रुढितून मोकळी झाली.  माझ्या माहितीत खालच्या गोष्टी फार उलट सुलट आहेत : १. रिकाम्या पानात भात वाढायचा नाही, कारण दहाव्याला तसा वाढतात. आता जर वाढला भात रिकाम्या पानात तर बऱ्याच घरात फार मोठा गहजब उडतो. जस काय भात वाढला म्हणून कोणाचातरी दहावा घालायला लागणार आहे.  २.तीच गोष्ट तांदुळाच्या खिरीची, माझ्या ओळखीत ३-४ घरामध्ये तांदुळाची खीर आवडत असूनही करत नाहीत (बाहेर जाऊन फिरनी खातात बर का )  ३. बाळांतीणील शेक शेगडी करायला पाहिजे म्हणून माझ्या एक मैत्रिणीला तिच्या सासूने भर मे  महिन्यात , मुंबईत शेक घ्यायला लावलं, ज्यामुळे तिला घामोळं होऊन प्रचंड त्रास झाला. कदाचित हे जेव्हा करायला सुरवात केली असेल तेव्हा भरपूर जंगल असल्यामुळे हवा थंड असेल, त्यामुळे हे बाळंतिणीला बर वाटाव म्हणून करत असतील.  ४. बाळाला सतत डायपर घातला तर त्याचं चालणं बिघडेल, पायात बिघाड येईल. आपल्याकडे पायाला मजबूती यावी म्हणून वाळे घालतात. - या लोकांना "मग भारतीय धावपटू (किंवा खेळाडू ) प्रत्येक खेळात पुढे का नाहीत", जगभरात लोक डायपर वापरतात, आणि वाले घालत नाहीत, तरी व्यवस्थित चालतात. यावर उत्तर नसत. आपले पूर्वज हुशार, त्यांना सगळं माहिती होतं, आम्ही कधी असले प्रश्न विचारले नाहीत अशा प्रकारची उत्तरं येतात.  माझा अनुभव असा आहे कि आपण ज्याला प्रश्न विचारतोय त्याला उत्तर माहित नसेल किंवा स्वतः कधी प्रश्न विचारलाच नसेल तर "शास्त्र असतं ते " वाल उत्तर येत. काही लोकांना आपल्या ठराविक कोशात राहायला खूप आवडतं. तो कोष मोडण्याची कल्पना पण करवत नाही. आणि दुसरा कोणी तो मोडायचा प्रयत्न करत असेल तर ते फारसं आवडत नाही. ते त्यांच्या दृष्टीने बरोबरही आहे म्हणा. जर विचार करणारा माणूस बरोबर आहे हे मान्य केलं तर, आपण इतकी वर्ष विचार केला नाही हे हि मान्य करावं लागतं आणि ते फार गैरसोयीचे असू शकत.  माझ्या बघण्यात अजून एकपण माणूस नाही जो आपल्या रूढी - परंपरा आजच्या काळात १००% उपयोगी आहेत हे पटल्यामुळे त्या पाळतोय. तो एखादी रूढी का पळतोय ह्याच संपुर्ण तार्किक उत्तर त्याच्याकडे आहे आणि तर्कावर विचार करणाऱ्या कुठल्याही माणसाला तो ते पटवू शकेल. 

In reply to by वीणा३

चौकस२१२ Tue, 04/21/2020 - 05:17
नाण्याची दुसरी बाजू = काही पटलेल्या रूढी आणि सवयी कि ज्या केवळ प्रतीकात्मक असतात त्या ना पाळल्याने काही आकाश कोसळत नाही परंतु पाळल्या तरीही काही आकाश कोसळत नाही किंवा काही त्या त्या काळानुसार पडलेल्या असतात .. पुढे कदाचित कालबाहय झालेल्या असतात . १) साधारण पणे एखाद्याचा सत्कार करताना जेव्हा शाल पांघरली जाते तेव्हा सत्कार करणारी व्यक्ती हि जिचा सत्कार केला जातोय त्या व्यक्तीच्या पुढे उभे राहून डावीकडून उजवीकडे जणू हार घातल्या सरकारी ती शाल त्या व्यक्तीचं खांद्यांवर पांघरते - उलट प्रथा: मर्तिक झाल्यावर व्यक्तीचे सांत्वन करण्यासाठी जे काही विधी कर्मे केली जातात तेव्हा अशीच शाल पण त्या व्यक्तीचं मागे उभे राहून त्याला पांघरली जाते... जणू काही हे दाखवण्यासाठी कि आम्ही / समाज तुमचं पाठीशी आहोत ( दुःखावर पांघरून घालणे असे काहीसे असावे ) २) एका कुटुंबात प्रथा पहिली.. ज्यात पाश्चिमात्य आणि पौरात्य परंपरांचं मिश्रण होता.. वाढदिवसाला पाश्चिमात्य पद्धतीप्रमाणे केक आणलं जातो पण त्यावर मेणबत्या "विझवण्यापेक्षा " मेणबत्ती किंवा दिवा प्रज्वलित केला जातो .. तर्क असा काहीस कि हिंदू परंपरेत दिवे / ऊर्जा जातं करावी घालावू नये ... आवडली मला हि प्रथा काही फारश्या ना पटलेल्या प्रथा ३) मर्तिका नंतर च्या दिवसांच्या जेवणात पहिले कि आमसुलांची चटणी केली होती.. छान लागत होती.. पण असे कळले कि हि फक्त अशावेळीस करतात इतर वेळी नाही... का कोण जाणे. इतर वेळी हि ती कार्याला काय हरकत आहे ? चविष्ट लागतेच कि

वीणा३ Tue, 04/21/2020 - 05:59
ना पाळल्याने काही आकाश कोसळत नाही परंतु पाळल्या तरीही काही आकाश कोसळत  -  हे आकाश कोसळणं - न -कोसळणं प्रत्येक माणसावर अवलंबून असतं. अजून एका नात्यात घरातले लोक सांगतात कि आम्ही जास्त देव-धर्माचं स्तोम माजवत नाही. जेवढं जमेल तेवढं करतो. त्यांच्या घरातली प्रथा म्हणजे दिवाळीचा फराळ (किंवा कुठलाही खास पदार्थ) करताना देवाचं नाव घ्यायचं आणि मगच पदार्थ करायला सुरवात करायची. आता काय साधीच तर प्रथा आहे, कुठे जास्त काय करायचंय. पण त्यांच्या घरात नवीन आलेली सून विसरली, आणि नेमका पदार्थ बिघडला. आता ह्यांचे पदार्थ कधी देवाचं नाव घेऊन सुद्धा बिघडले नसतील का, पण घरात प्रत्येकाने बोलून दाखवलं कि देवाचं नाव नाही घेतलं ना :P . एरवी शिक्षित आहेत, काय वाईटहि नाहीयेत माणसं एरवी, पण आपल्या प्रथेला कुठलाही तर्काधार नाही हे कळत नसेल का. पण पाळली न गेल्यावर मनात चुकचुकलं. आणि ह्या गोष्टी थांबवल्या नाहीत तर वाढत जातात. आणि घरात ते न मानणाऱ्या माणसाला त्रास होतो आणि प्रथा पाळली गेली नाही कि मानणाऱ्या माणसाला त्रास होतो :).  माझ्या मते केवळ स्वच्छता हा हेतू नाही. सैनिकाने वा अग्निशामक जवानाने गणवेश घातल्याने तो जास्त पराक्रम गाजवतो का? मग गणवेशावर इतके पैसे का खर्च करायचे? अशा प्रकारची ऐहिक कारणमीमांसा असावी.  मलातरी कारण विशेष पटलं नाही  - कुठलाही गणवेश हा त्या समूहाचा आपण भाग आहोत हा मानसिक परिणाम करत. एकदा गणवेश घातला कि तुम्ही घरी कोणीही असा इथे तुम्ही सगळे सारखे आहात आणि तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या गणवेशावर तारे लावायला मिळतील हा मानसिक परिणाम करत. अग्निशमन दलाचा गणवेश दिसला कि आसपासच्या लोकांनाही कळतं कि जवळपास लागलेली आग विझवायला हे लोक आले आहेत, तो मानसिक आधार साधे कपडे घालून मिळेल असं वाटत नाही. टीम वर्क, टीम स्पिरिट वाढवायला गणवेश मदत करतो. 

चौकस२१२ Tue, 04/21/2020 - 07:24
आणि घरात ते न मानणाऱ्या माणसाला त्रास होतो आणि प्रथा पाळली गेली नाही कि मानणाऱ्या माणसाला त्रास होतो :). मग अश्या वेळी करायचं काय? वीणाजी? वरील उदाहरणात जर सुनेने तिला माहित नसताना केले असेल तर त्याचे लगेच खापर "देवाला नमस्कार ना केल्याने झाले" असे फोडणे हे अन्यायकारकच आहे आणि पुढल्यावेळेल्स दोन्ही बाजूनी तडजोड कार्याला हवी.. पण एकूण जीवनात माणसाचं प्रयत्नाचा अपमान श्रद्धाळू लोकांनी करू नये असे वाटते . मी अशी उद्धरण पहिली आहेत कि जीव तोडून एखादा नोकरी मिळणे/ उद्योग निर्माण करणे याची धडपड करीत असतो... आणि त्यावेळीस ते प्रयत्न हेच महत्वाचे असते ...बाकी गोष्टी गौण असतात .. पण अश्या वेळी काही मित्र/ नातेवाईक अशी काही विधान करताना ना... "अरे त्याने या या गुरूंकडे जायला पाहिजे होते.. किंवा बघ सुरवात करताना नामस्मरण नाही केले .. वैगरे" हे बोलून तो माणूस किती दुखावला जात असेल त्याची या लोकांना कल्पना तरी असते का..? हा मान्य आहे कि खडतर प्रयत्न करिताना मनुष्याला मनशांती साठी काही मानधारण, चिंतन/ योग करून फायदा होऊ शकतो किंवा एखाद्या जाणत्या अनुभवी माणसाशी नुसत्या गप्पा मारून फायदा होऊ शकतो .. पण याचे रूपांतर जेव्हा काही लोक बघ "श्रद्धा नाही म्हणून यश नाही" असे करतात ना तेव्हा तो मला तरी हलकटपणाच वाटतो...(येथे मी अनिस सारखात्यांशी १०० % सहमत आहे मनुष्य आणि त्याचे प्रामाणिक प्रयन्त "इतुकेच खरे ")

माहितगार Sat, 04/18/2020 - 07:33
आपण श्रद्धा डोळस असाव्यात यासाठी प्रयत्न करता हे स्तुत्य आहे. सद्द चर्चांमधील मुख्य विषय कोविड१९ वीषाणू पासून सुरक्षीत करण्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे पालन आणि सामाजिक अंतर हा आहे. सोवळ्याचा उद्देश्य आणि अंशतः संबंध स्वच्छतेशी होता हे खरे आहे. अर्थात रेशमी वस्त्र धुतलेले नसले तरी सोवळ्यास स्विकार्य समजणे म्हणजे किमतीने भारी गालीच्यावर वीषाणू पसरणार नाहीत असे समजण्यासारखे असावे. सोवळे सुती असो वा रेशमी त्याचे साबणाच्या पाण्याने निर्जंतुकीकरण आवश्यक असावे असे आधुनिक विज्ञान सांगते. आणि अधिक नविन वैज्ञानिक ज्ञान मोकळ्या मनाने स्विकारले जावयास हवेच. पुर्वी सोवळे पाळणार्‍या व्यक्ती सोवळ्यात नसलेल्या व्यक्तींपासून सामाजिक अंतर पाळत (पण आपापसात पाळत नसत) आता संसर्गजन्य वीषाणू संसर्ग पसरवताना कुणी सोवळ्यात आहे की नाही हे बघत नाही, सोवळ्यातील व्यक्तींनी परस्परात सामाजिक अंतर पाळले नाही आणि त्यापैकी एकास वीषाणूचा संसर्ग असेल तर तो दुसर्‍या सोवळ्यातील व्यक्तीस पोहोचवू शकतोच.

In reply to by माहितगार

माहितगार Sat, 04/18/2020 - 07:41
अर्थात सोवळ्यात स्वच्छतेची जी इतर काही बंधने पाळली जात जसे की, वस्त्रे स्नानाच्याच वेळी धुवावीत आणि स्नान केल्यानंतर मागच्या स्नानाच्या वेळी धुतलेली वस्त्रेच वापरावीत, सोवळ्यातील स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन न केलेल्यांपासून सामाजिक अंतर पाळणे आणि स्वयंपाक हा सोवळ्यातच करणे याचे स्वच्छता पालनाच्या दृष्टीने अंशिक फायदे होतेच. वर नमुद केल्या प्रमाणे वीषाणूपासून सुरक्षेसाठी सामाजिक अंतर सोवळ्यातील व्यक्ती सोबत सुद्धा पाळले जावयास हवे आणि सोवळ्याची सर्वच वस्त्रे साबण अथवा निर्जंतुकीकरण अल्कोहोलने आणि अथवा कडत पाण्याने निर्जंतुक करुन घेणे गरजेचे असावे.

In reply to by माहितगार

@अर्थात सोवळ्यात स्वच्छतेची जी इतर काही बंधने पाळली जात जसे की, वस्त्रे स्नानाच्याच वेळी धुवावीत आणि स्नान केल्यानंतर मागच्या स्नानाच्या वेळी धुतलेली वस्त्रेच वापरावीत, - आहो पण याचा हेतू स्वच्चता हा नाही! अपवित्रता हा आहे. नसला अस म्हणायचं असेल,तर रेशमी सोवळं वाली व्यक्ती तितकंच स्वच्छ व अस्पर्श धोतर नेसलेल्या (स्नान झालेल्या) व्यक्तीकडून पाणी घेत नाही, ते का? हे आम्ही अनुभवलेलं आहे. उद्या एखाद्या देवळातला पुजारी तिथल्या एखाद्या सेवकाकडून पूजेचा द्यायचा नारळ स्पर्श न करता वरून ओंजळीत टाकतो,या मागे काय कारण असतं?(अस तुम्हाला वाटत?) शरीराने व मनानेही स्वच्छ असलेल्या चार दिवसातल्या स्त्री ला मंदिरात प्रवेश का नसतो? स्वच्छतेचाच निकष आहे ना? मग काय हरकत आहे. आंबेडकरांसारख्या स्वच्छ बुद्धीमान दलितांचा मंदिर प्रवेश नक्की कोणत्या अस्वच्छतेच्या कारणांनी अडवला जात होता?

In reply to by अत्रुप्त आत्मा

मदनबाण Sat, 04/18/2020 - 11:32
शरीराने व मनानेही स्वच्छ असलेल्या चार दिवसातल्या स्त्री ला मंदिरात प्रवेश का नसतो? स्वच्छतेचाच निकष आहे ना? मग काय हरकत आहे. या नाजुक काळात स्त्रीस शारिरिक कष्ट होत असतात, तसेच त्यांचे मन देखील प्रसन्न नसते. इतर दिवशी कुठलीही आडकाठी नसतान, याच काळात मंदिर प्रवेशाचा अट्टहास करणे हे मी बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण समजतो. !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aithey Aa... :- Bharat

In reply to by मदनबाण

चौकस२१२ Sat, 04/18/2020 - 13:32
मुळात पूर्वी, त्या चार दिवसात स्त्रीला विश्रांती मिळावी म्हणून काही प्रथा पडल्या असाव्यात . दुर्दैवाने त्या कालानुरूप नष्ट व्हायला पाहिजे होत्या ... पुरेश्या झाल्या नाहीत... हे हिंदू धर्माचे दुर्दैव ... दुसरे दुर्दैव असे कि याचा बरोबर मशिदीत स्त्रियांना वेगळ्या भागात का बसावे लागते यावर चकार शब्द कोणी बोलणार नाही... या दुटप्पी पणाचा राग येतो अर्थात फक्त मुस्लिमांच्यात नाही तर " स्वामिनारया" या "पंथा " मध्ये पण स्त्रियांवर जी बंधन आहेत ती पण अतिशय चुकीची आहेत ( मी मुद्डमून याला पंथ म्हणतोय... धर्म नाही कारण हि मंडळी जरी वरवर हिंदू दिसत असली तरी "मेनस्ट्रीम" हिंदू म्हणून घेत नाहीत स्वतःला )

In reply to by माहितगार

आता आपल्याला बाहेरून आल्यावर घरात कुठेही स्पर्श न करता बाथरुमात जाऊन आधी हात साबणाने 25 सेकंद धुवून, सर्व कपडे बदलावे यातल्या कुठेही कोणालाही स्पर्श न करण्याचा आरोग्य शास्त्राचा धर्मप्रेमी लोक धर्मातील अस्पृश्य/अस्पर्श शास्त्राशी संबंध जोडत आहेत. धर्मातील शिवाशिव , अस्पर्श याचा मानसिक संबंध अपवित्रतेशी आहे, अनारोग्याशी नाही..हे ते दाखवून दिलं/प्रतिवाद केला, तरी दडवत आहेत..

माहितगार Sat, 04/18/2020 - 07:48
मला वाटते काही अल्कोहोल युक्त हँडसानीटायझर ज्वलनशील असतात (चुभूदेघे) ती पुजादी कार्ये करताना दिव्यांपासून दूर ठेवण्याची दक्षता घेणे श्रेयस्कर असावे. आणि अगदी निर्जंतुकीकरणाच्या दृष्टीने मुर्तींनाही साबणाच्या पाण्याने धुणे श्रेयस्कर असावे असे वाटते. पुजाकरतानाची पुसण्याची अनेक वस्त्रे प्रत्यक्षात अत्यंत अस्वच्छ असतात तीही साबणाच्या गरम पाण्याने धुऊन घेणे बंधन कारक समजणे श्रेयस्कर असावे.

चौकस२१२ Sat, 04/18/2020 - 08:01
हे अतृप्त आत्म्या .... आपल्या लेखातील मूळ मुद्दा बऱयापैकी पटला आणि त्याचं सार मला कळलेलं असे कि " परंपरा, संस्कृती , धर्म यातून येणाऱ्या काही गोष्टी आणि खास करून आरोग्याशी निगडित असेलेल्या गोष्टी आंधळेपणाने स्वीकारू नयेत? त्यामागे काही तर्कसंगत विचार आहे का? असले तर तो सिद्ध झाला आहे का याचा विचार करावा " यात न पटण्यासारखेच काही नाहीये खास करून ते भस्माचे उदाहरण... किंवा आपण हवनातील धुराचे उदाहरण म्हणू... दुर्दैवाने आपल्या समाजात या विषयवार नेहमीच दोन टोकांच्या भूमिका असतात एक तर "आहे ते नं प्रश्न विचारता स्वीकारा किंवा दुसरे टोक म्हणजे "हे धर्मात/ परंपरेत लिहिले आहे ना म्हणजे सगळेच ( यातील "च" वर भर) खोटे आणि फालतू असले पाहिजे " मध्य गाठणारे पण अनेक आहेत नाही असे नाही पण कमी .... मग हे असा का? एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितले तर यांवरून एक विधान आठवले ( यात पूर्व आणि पश्चिमेकडील विचारसरणी तील फरक दाखवला आहे ) त एम्हणजे = पूर्वकडची विचारसरणी म्हणजे "आधी विश्वास ठेवा, अनुभव घ्या आणि मग ठरवा " आणि पश्चिमेकडची विचारसरणी म्हणजे = " आधी सिद्ध होतंय की नाही ते पहा , मग अनुभवा आणि मग ठरवा कि विश्वास ठेवायचा कि नाही तो " यातील कोणता विचार अंगिकार्याचा ते प्रतेय्कने ठरवावे पारंपरिक औषधी वैगरे मध्ये तर्कसंगत चाचण्या ना असण्यामागची जुनी करणे अनेक आहेत .. १) खोल अभ्यास करून निष्कर्ष काढयनासाठी लागणार वेळ आणि पैसे कदाचित नवहता २) तंत्रन्यान नवहते हे मुद्दे आता जरी सोपे झाला असले तरी स्वार्थ आडवा येत असेल म्हणजे .. एखादा बलाढ्य "पारपरंपरिक " औषधे बनवणारा उद्योग . कशाला "मूळ संशोधनावर " पैसे खर्च करेल .. चालतंय ना गल्ला जमतेय ना चालू द्या... (अर्थात यात ऍलोपॅथी चे उद्योग सुद्धा काही कमी पापी नाहीयेत... एकाच पॅरासिटामोल त्याला पाठीसाठीचे वेगळे, हाडांसाठी वेगळे असे करून पैसा कसा जास्त मिळेल असले उद्योग करीत असतो आणि रेग्युलेटर कधी कधी पकडतो हि ) आता थोडे ना पटणारे : ना पटणारे असे नाहीच फक्त एक टीका होऊ शकते ती का होईल ते मात्र समजवून घ्या ती टीका म्हणजे " हा बरोबर आहे पण मग हे हिंदूइतर धर्मावर आधारित उपाय योजनांवर पण हे चालते मग त्याबद्दल का नाही लिहिले? अशी टीका जर कोणी केली तर ती रास्त ठरते असे मला वाटते मान्य आहे कि आपण कदाचित वयसायिक पत्रकार नाही त्यामुळे हे बंधन आपल्यावर नाही आणि आपल्याला कदाचित युनानी वैगरे औषधी वर काय होते याची माहिती नसावी पण विचार करूयात कि हा ल्लेख जर मिपा पेक्षा मोठा वाचक वर्ग असलेल्या एखाद्या ब्लॉग किंवा व्यावसायिक वर्तमान पत्रात/ मासिकात कोणी "पत्रकाराने" लिहिला तर? तर मग मात्र यात "युनानी" आणि चिनी धर्म/ समाज/ परंपरेचा पण गोषवारा घेणे हि त्या "पत्रकाराची" वयवसायिक जबाबदारी ठरते.. नाहीतर कोण्ही म्हणाले कि "बघा हिंदूंनाच बडवतात सारखे" तर ती टीका यौग्याचा ठरेल बरेच पत्रकार लेखाला असे शीर्षक देतात कि " समाजातील वाईट चालीरीती" आणि लेखात भर असतो तो एकाच धर्मातील चालीरीतींनवर आणि वरती असे भास्वततात कि "हि समतोल पत्रकारिता आहे " ( हि टीका आपल्यावर नाही )

In reply to by चौकस२१२

@ना पटणारे असे नाहीच फक्त एक टीका होऊ शकते ती का होईल ते मात्र समजवून घ्या ती टीका म्हणजे " हा बरोबर आहे पण मग हे हिंदूइतर धर्मावर आधारित उपाय योजनांवर पण हे चालते मग त्याबद्दल का नाही लिहिले? अशी टीका जर कोणी केली तर ती रास्त ठरते असे मला वाटते. :--- अगदी बरोबर. पण माझा अनुभव असा आहे की अशी मी केलेली टीका मी दाखवून दिली तरी ही लोकं (त्यांनीच घातलेल्या किंवा आकसाने लादलेल्या कंडिशन्स नुसार) नन्तर स्वतःच्या मतात,वागण्यात बदल करत नाहीत. हे फक्त मुद्दा उडवून लावण्यासाठी वापरायचं हत्यार आहे. कामात फोटोग्राफर,व्हिडीओ शूटिंग,केटरर, स्टेज डेकोरेटर अश्या मंडळीतील ही हिंदू-इतर मंडळी येतात. त्यांनाही मी त्यांच्या प्रथा कुप्रथांबद्दल प्रश्न विचारतो , बोलतो.. ते ही सकारात्मक,नकारात्मक प्रतिसाद देतात. तसच फेसबुकावर कुठे कुठे केलेलं असच लेखनही असतं. त्या लेखनाचे व सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या मंडळींचे दाखले दिले तर धर्मप्रेमीपैकी अगदी थोडी मंडळी तात्पुरती किंवा कायमस्वरूपी बदलतात. पण यांच्यातल्या कांगावेखोर लोकांचा जो गट,तट आहे,जो अश्या विरोधात प्रामुख्याने सहभागी असतो तो मात्र भ्याडपणानी पळून जातो,नाहीतर क्रूरपणे हल्ला करतो हाच माझा अनुभव आहे.

In reply to by चौकस२१२

@बरेच पत्रकार लेखाला असे शीर्षक देतात कि " समाजातील वाईट चालीरीती" आणि लेखात भर असतो तो एकाच धर्मातील चालीरीतींनवर आणि वरती असे भास्वततात कि "हि समतोल पत्रकारिता आहे " ( हि टीका आपल्यावर नाही ) :- हे 100% खरं आहे. आम्ही या मंडळींना फेक्युलर,फुरोगामी म्हणतो. ही पक्षपाती मंडळी धर्मअंधप्रेमी लोकांची जुळी भावंडे आहेत. ह्यांनी धर्म फक्त नावाला सोडलेला असतो. व कथित पुरोगामी गटात शिरकाव केलेला असतो. पण मूळचा सनातनी धार्मिकपणा,लबाडी,पक्षपाती वृत्ती तशीच कायम असते.

संगणकनंद Sat, 04/18/2020 - 10:50
सत्यनारायण पूजा, वास्तूशांत, विवाहातील रुढी परंपरा आणि मृत्यूपश्चात कर्मकांडे याबाबतीत जनमानसात जी धारणा किंवा तर्कसंगती असते तीच यावेळी स्वच्छतेच्या बाबतीत पुढे येत आहे. मात्र मनातील स्वतःविषयीची तथाकथित सुधारक ही भुमिका बाजूला ठेवली आणि लोकांच्या काही अतिरंजित दाव्यांकडे दुर्लक्ष केले तर आपल्याकडे स्वच्छतेचं महत्व आधीपासूनच होतं हे लक्षात येईल. सोवळ्याचा मूळ हेतू आरोग्यविषयक स्वच्छता हाच असावा. (मला hygiene ला मराठी शब्द सुचत नाही) नंतर पुढे कधीतरी त्याचे अतिकठोर कर्मकांडात रुपांतर झाले असावे. एक उदाहरण देतो. आमच्या लहानपणी शौचास जाऊन आलो की आम्ही बाहेरच हात पाय स्वच्छ धूवून आलो की नाही हे आमची आजी कटाक्षाने पाहत असे. तिला असं का हे विचारलं की ती म्हणायची शौचास जाऊन आल्यावर हात पाय स्वच्छ न धूता तसेच घरात वावरल्यास घरात कली शिरतो. तिचे हे उत्तर अर्थातच हास्यास्पद होते मात्र शौचास जाऊन आल्यावर हात पाय स्वच्छ न धूणे आरोग्याच्या दृष्टिने किती अत्यावश्यक आहे हे आपल्याला माहीतीच आहे. तीच गोष्ट नमस्काराची, आपले त्यामागील स्पष्टीकरण काहीही असले तरी दुसर्‍या व्यक्तीला अभिवादन करताना त्या व्यक्तिच्या शरीराशी थेट संपर्क होत नाही. पर्यायाने स्पर्शाने होणारा जंतू संसर्ग टळतो ही वस्तूस्थिती आहे. किंबहूना ती कोरोनाच्या साथीमुळे अधोरेखीत झाली आहे आणि जगाने स्विकारली आहे. सत्यनारायण पूजा, वास्तूशांत, विवाहातील रुढी परंपरा आणि मृत्यूपश्चात कर्मकांडे वगैरे गोष्टी करुन त्याची प्रसारमाध्यमाध्यंमध्ये जाहीरात करणार्‍या व्यक्तीने सोवळे या बाबतीत टीकेची झोड उठवणे हास्यास्पद आहे. असे का बरे असेल? नो मनी देन नो हनी?

संगणकनंद Sat, 04/18/2020 - 11:15
(पुन्हा आम्ही असें युक्तिवाद केले की "तुम्ही गुरुजी/पुरोहित असून(?) स्वतःच्याच धर्माविरुद्ध कसे बोलता?" हा मनभावी परंतु अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न येतोच! जणू काही पुरोहित जेव्हढा जास्तीत जास्त अंधश्रद्ध तेव्हढा तो धार्मिक जनतेला अधिक आदर्श,असा या लोकांचा {आत्मप्रतारक} समजच आहे... असो!)
अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न ??? तुम्ही स्वतःला काय समजता हो? हे तीन शब्द तुमच्यातील टोकाच्या अहंकाराचे प्रतिक आहे. सुधारक असणारी व्यक्ती कधीही लोकांप्रती अशा अपशब्दांचा वापर करणार नाही. तुमच्यासारख्या ढोंगी सुधारकांमुळे खरे सुधारक बदनाम होतात. जेव्हा तुमचे यजमान तुमच्याकडून एखादी पूजा किंवा विधी करुन घेतात तेव्हा "आपण देवाचे काही करतोय" ही त्यांची प्रामाणिक भावना असते. तेव्हा सारे विधी किंवा पूजा प्रथेप्रमाणे व्हावेत आणि ते करण्यार्‍या पूरोहीताचीही तीच भुमिका असावी अशी त्यांची अपेक्षा असली तर त्यांचे काय चुकले? त्यांचा "अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न" अशा शब्दांत पूरोहिताने अपमान करणे कितपत योग्य आहे? विधी/पुजा सर्व करायच्या, फक्त त्यात थोडेसे फेरफार करुन त्याला सुधारणा असे गोंडस नाव द्यायचे आणि समाजात सुधारणावादी म्हणून मिरवायचे ही दांभिकता आहे. ज्याक्षणी सुधारणा म्हणजे काय हे खर्‍या अर्थाने तुम्हाला कळेल त्याक्षणी तुम्हाला दुसरा व्यवसाय शोधावा लागेल.

In reply to by अत्रुप्त आत्मा

संगणकनंद Sat, 04/18/2020 - 12:05
"अत्मकुंथन" च्या ऐवजी वापरलेला धूळफेक हा शब्द आवडला. धूळफेक म्हणा हवं तर. पण मी माझे मुद्दे मांडले, मिपा वाचक ते वाचतील. आणि तुमच्या या प्रतिसादाने तुमच्याकडे उत्तर नाही हे ही मिपा वाचकांच्या लक्षात येईल. मुद्दे कोणते आणि धूळफेक कोणती हे लक्षात येण्याईतके मिपा वाचक सुज्ञ आहेत. असो, तुम्ही काही प्रतिवाद केला असता तर पुढे काही लिहीता आले असते. तुम्ही धूळफेक म्हणून चर्चेपासून पळ काढत आहात म्हटल्यावर विषय संपला.

In reply to by संगणकनंद

माहितगार Sat, 04/18/2020 - 12:06
ज्याक्षणी सुधारणा म्हणजे काय हे खर्‍या अर्थाने तुम्हाला कळेल त्याक्षणी तुम्हाला दुसरा व्यवसाय शोधावा लागेल.
असहमत, सुयोग्य चर्चा करुन हिंदू चाली रितींमध्ये सुधारणा केली जाऊ शकत नाही हि सुद्धा एक अंधश्रद्धाच नाही काय? अगदी ऋग्वेदात्च हिंदू संस्कृतीच्या उत्क्रांती स्वभावाची चिन्हे मिळतात ती नंतरही मिळतात. माणूस ब्राह्मण अथवा हिंदू असो अथवा नसो काळानुसार बदलणे मानवी स्वभावाला नेहमीच जड जाणारे असते म्हणून माणूस आणि समुह काल परत्वे बदलू शकत नाहीत आणि त्यांची सद्य संस्कृती बदल करत बसण्यापेक्षा पूर्ण मोडीत काढा म्हणणे माणूस प्राणि असांस्कृतिक आहे म्हणण्यासारखे असत्य नाही किंवा कसे? पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संलग्न पौरोहित्य असेल किंवा आपले मिपाकर अत्रुप्त आत्मा असतील हि मंडळी सांस्कृतिक उत्क्रांतीत जुन्यातले चांगले ठेऊन त्याज्य टाकण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. एकतर सर्वच अंधश्रद्धा पूर्ण करा किंवा सगळ्याच श्रद्धांना अंधश्रद्ध ठरवून काहीच नको दोन्ही टोके आहेत. डोळस श्रद्धा मानवी संस्कृतिस साहायक होऊ शकतात आणि अत्रुप्त आत्मा सारख्या सुधारकांचा आपला स्वतःचा एक रोल असतो आणि असावा.

In reply to by माहितगार

संगणकनंद Sat, 04/18/2020 - 12:36
प्रतिसादातील अगदी थोडा भाग वगळता बाकी प्रतिसादाशी सहमत. चाली-रिती, रुढी -परंपरा खूप जुन्या असतात, संस्कृतीचा भाग असतात. कालौघात त्यांना कर्मठपणा चिकटतो. आणि बुद्धिवंताना त्यातील फोलपणा जाणवतो. मात्र अशा रुढी-परंपरांचे समूळ उच्चाटन न करता त्यात सुधारणा करणे केव्हाही श्रेयस्कर यात दुमत नाही. यामुळे समाजमन दुखावत नाही आणि कर्मकांडातील कर्मठपणा एक तर नाहीसा होईल किंवा कमी तरी होईल. आणि जर जीवनात कुठल्याच चाली-रिती पाळायचे नाही असे ठरवले, सण सोहळे साजरे करायचे नाही असे ठरवले तर जीवनच रुक्ष होऊन जाईल. आक्षेप असतो तो सोयिस्कर असेल तेव्हा मौन पाळणार्‍या आणि सोयिस्कर असेल तेव्हा टीका करणार्‍या तथाकथित सुधारकांच्या भुमिकेला.

In reply to by संगणकनंद

@स्वगृह मिसळपाव Search form शोधा साहित्य प्रकार नवे लेखन नवे प्रतिसाद मिपा पुस्तकं घोषणा मदत पान मिपा विशेषांक दिवाळी अंक २०१९ श्रीगणेश लेखमाला २०१९ स्वच्छतेचं सोवळं की सोवळ्यातील स्वच्छता!? प्रतिसाद द्या प्रतिसाद द्या त्याचू वैलपान's picture प्रतिसादातील अगदी थोडा भाग 18 Apr 2020 - 1:06 pm | त्याचू वैलपान प्रतिसादातील अगदी थोडा भाग वगळता बाकी प्रतिसादाशी सहमत. चाली-रिती, रुढी -परंपरा खूप जुन्या असतात, संस्कृतीचा भाग असतात. कालौघात त्यांना कर्मठपणा चिकटतो. आणि बुद्धिवंताना त्यातील फोलपणा जाणवतो. मात्र अशा रुढी-परंपरांचे समूळ उच्चाटन न करता त्यात सुधारणा करणे केव्हाही श्रेयस्कर यात दुमत नाही. यामुळे समाजमन दुखावत नाही आणि कर्मकांडातील कर्मठपणा एक तर नाहीसा होईल किंवा कमी तरी होईल. आणि जर जीवनात कुठल्याच चाली-रिती पाळायचे नाही असे ठरवले, सण सोहळे साजरे करायचे नाही असे ठरवले तर जीवनच रुक्ष होऊन जाईल.:--- हेच सर्व मी करतो, हे दिसत असूनही जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा कुटील डाव साधण्यासाठी मला फोल दाखवून तुम्हाला काहीही हाती लागणार नाही,हेच माहितगार यांच्या प्रतिसादावरून स्पष्ट झालंय. बाकी पळ काढणं इत्यादी निरर्थक आत्मकुंथन किंवा स्वमतांध दांभिकता(शब्द बरोबर-आला ना?) एन्जॉएबल आहे! चालू द्या! लउल्लूल्लूल्लू =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

संगणकनंद Mon, 04/20/2020 - 22:35
हेच सर्व मी करतो तुम्ही काय करता याची कबुली तुम्हीच तुमच्या फेसबुकवरच्या पोस्टमध्ये दिलीत, जी पोस्ट तुम्ही डिलीट केलीत. सांगा बरे, ती तथाकथित सुधारणावादी पोस्ट का डिलीट केलीत?

गामा पैलवान Sat, 04/18/2020 - 14:54
अतृप्त आत्मा, तुम्ही विचारलंय की :
जर धर्मातल्या सगळ्या सोवळ्या ओवळ्या कथित साधनशुचितेचा हेतू फक्त स्वच्छता हाच होता तर पूजेला बसताना मग स्वच्छ धुतलेले कपडे हे तेव्हढ्याच स्वच्छ (नेसायाच्या) सोवळ्यापेक्षा कमी दर्जाचे किंवा कट्टर सनातनी मतांनुसार अयोग्य कसे होतात?
प्रश्न रोचक आहे. माझ्या मते केवळ स्वच्छता हा हेतू नाही. सैनिकाने वा अग्निशामक जवानाने गणवेश घातल्याने तो जास्त पराक्रम गाजवतो का? मग गणवेशावर इतके पैसे का खर्च करायचे? अशा प्रकारची ऐहिक कारणमीमांसा असावी. अध्यात्मिक कारणमीमांसा सध्यातरी सांगत नाही. आ.न., -गा.पै.

शा वि कु Mon, 04/20/2020 - 18:45
मुळात रितीरिवाज करण्यासाठी कोणत्याही वैज्ञानिक रॅशनलायझेषनची काय गरज आहे ? इतर कोणाला इजा होत नसेल तर तार्किक दृष्ट्या कितीही निरुपयोगी वाटणारा विधी आपण निव्वळ आनंदासाठी का ना करावा ? उदा- तुम्हाला द्रोण आणि पत्र्यावळ्यांमध्ये जेवायला आवडतं तर जेवूनच टाका !

वीणा३ Mon, 04/20/2020 - 22:38
लेख वाचताना अगदी अगदी झालं. एक गोष्ट खूप वर्षपूर्वी ऐकली होती. एका नवीन लग्न झालेल्या मुलीचा नवरा तिला म्हणतो कि माझी आई एक प्रकारचं धिरडं खूप छान बनवते. ती मुलगी ते शिकून घ्यायला सासू कडे जाते. सासू तिला धिरडं घालून दाखवते आणि तव्यावर टाकल्यावर ती त्याच्या कडेचा एक तुकडा कापते. सून तिला विचारते कि तुकडा का कापला, सासू म्हणते, माझ्या सासूने हे धिरडं मला शिकवलं, तिने मला सांगितलं तुकडा काप म्हणून मी तुकडा कापते. सुनेला ते पटत नाही. तिची आजेसासू अजून हयात असते, ती आणि सासू  तिच्याकडे जाते, आणि विचारतात कि का बाई तुकडा कापायचीस. आजेसासू म्हणते आग माझ्या तव्याला एक भोक होत तिथे धिरडं करपायचं आणि तेल पण वाया जायचं म्हणून मी ते कापायची. सासू ने आजेसासू ला कधीच प्रश्न न विचारल्याने (किंवा कधीच स्वतः विचार न केल्याने)ती एक गरज नसलेली रूढी आयुष्यभर पाळत अली. सुनेने फक्त प्रश्न विचारल्याने ती त्या अनावश्यक रुढितून मोकळी झाली.  माझ्या माहितीत खालच्या गोष्टी फार उलट सुलट आहेत : १. रिकाम्या पानात भात वाढायचा नाही, कारण दहाव्याला तसा वाढतात. आता जर वाढला भात रिकाम्या पानात तर बऱ्याच घरात फार मोठा गहजब उडतो. जस काय भात वाढला म्हणून कोणाचातरी दहावा घालायला लागणार आहे.  २.तीच गोष्ट तांदुळाच्या खिरीची, माझ्या ओळखीत ३-४ घरामध्ये तांदुळाची खीर आवडत असूनही करत नाहीत (बाहेर जाऊन फिरनी खातात बर का )  ३. बाळांतीणील शेक शेगडी करायला पाहिजे म्हणून माझ्या एक मैत्रिणीला तिच्या सासूने भर मे  महिन्यात , मुंबईत शेक घ्यायला लावलं, ज्यामुळे तिला घामोळं होऊन प्रचंड त्रास झाला. कदाचित हे जेव्हा करायला सुरवात केली असेल तेव्हा भरपूर जंगल असल्यामुळे हवा थंड असेल, त्यामुळे हे बाळंतिणीला बर वाटाव म्हणून करत असतील.  ४. बाळाला सतत डायपर घातला तर त्याचं चालणं बिघडेल, पायात बिघाड येईल. आपल्याकडे पायाला मजबूती यावी म्हणून वाळे घालतात. - या लोकांना "मग भारतीय धावपटू (किंवा खेळाडू ) प्रत्येक खेळात पुढे का नाहीत", जगभरात लोक डायपर वापरतात, आणि वाले घालत नाहीत, तरी व्यवस्थित चालतात. यावर उत्तर नसत. आपले पूर्वज हुशार, त्यांना सगळं माहिती होतं, आम्ही कधी असले प्रश्न विचारले नाहीत अशा प्रकारची उत्तरं येतात.  माझा अनुभव असा आहे कि आपण ज्याला प्रश्न विचारतोय त्याला उत्तर माहित नसेल किंवा स्वतः कधी प्रश्न विचारलाच नसेल तर "शास्त्र असतं ते " वाल उत्तर येत. काही लोकांना आपल्या ठराविक कोशात राहायला खूप आवडतं. तो कोष मोडण्याची कल्पना पण करवत नाही. आणि दुसरा कोणी तो मोडायचा प्रयत्न करत असेल तर ते फारसं आवडत नाही. ते त्यांच्या दृष्टीने बरोबरही आहे म्हणा. जर विचार करणारा माणूस बरोबर आहे हे मान्य केलं तर, आपण इतकी वर्ष विचार केला नाही हे हि मान्य करावं लागतं आणि ते फार गैरसोयीचे असू शकत.  माझ्या बघण्यात अजून एकपण माणूस नाही जो आपल्या रूढी - परंपरा आजच्या काळात १००% उपयोगी आहेत हे पटल्यामुळे त्या पाळतोय. तो एखादी रूढी का पळतोय ह्याच संपुर्ण तार्किक उत्तर त्याच्याकडे आहे आणि तर्कावर विचार करणाऱ्या कुठल्याही माणसाला तो ते पटवू शकेल. 

In reply to by वीणा३

चौकस२१२ Tue, 04/21/2020 - 05:17
नाण्याची दुसरी बाजू = काही पटलेल्या रूढी आणि सवयी कि ज्या केवळ प्रतीकात्मक असतात त्या ना पाळल्याने काही आकाश कोसळत नाही परंतु पाळल्या तरीही काही आकाश कोसळत नाही किंवा काही त्या त्या काळानुसार पडलेल्या असतात .. पुढे कदाचित कालबाहय झालेल्या असतात . १) साधारण पणे एखाद्याचा सत्कार करताना जेव्हा शाल पांघरली जाते तेव्हा सत्कार करणारी व्यक्ती हि जिचा सत्कार केला जातोय त्या व्यक्तीच्या पुढे उभे राहून डावीकडून उजवीकडे जणू हार घातल्या सरकारी ती शाल त्या व्यक्तीचं खांद्यांवर पांघरते - उलट प्रथा: मर्तिक झाल्यावर व्यक्तीचे सांत्वन करण्यासाठी जे काही विधी कर्मे केली जातात तेव्हा अशीच शाल पण त्या व्यक्तीचं मागे उभे राहून त्याला पांघरली जाते... जणू काही हे दाखवण्यासाठी कि आम्ही / समाज तुमचं पाठीशी आहोत ( दुःखावर पांघरून घालणे असे काहीसे असावे ) २) एका कुटुंबात प्रथा पहिली.. ज्यात पाश्चिमात्य आणि पौरात्य परंपरांचं मिश्रण होता.. वाढदिवसाला पाश्चिमात्य पद्धतीप्रमाणे केक आणलं जातो पण त्यावर मेणबत्या "विझवण्यापेक्षा " मेणबत्ती किंवा दिवा प्रज्वलित केला जातो .. तर्क असा काहीस कि हिंदू परंपरेत दिवे / ऊर्जा जातं करावी घालावू नये ... आवडली मला हि प्रथा काही फारश्या ना पटलेल्या प्रथा ३) मर्तिका नंतर च्या दिवसांच्या जेवणात पहिले कि आमसुलांची चटणी केली होती.. छान लागत होती.. पण असे कळले कि हि फक्त अशावेळीस करतात इतर वेळी नाही... का कोण जाणे. इतर वेळी हि ती कार्याला काय हरकत आहे ? चविष्ट लागतेच कि

वीणा३ Tue, 04/21/2020 - 05:59
ना पाळल्याने काही आकाश कोसळत नाही परंतु पाळल्या तरीही काही आकाश कोसळत  -  हे आकाश कोसळणं - न -कोसळणं प्रत्येक माणसावर अवलंबून असतं. अजून एका नात्यात घरातले लोक सांगतात कि आम्ही जास्त देव-धर्माचं स्तोम माजवत नाही. जेवढं जमेल तेवढं करतो. त्यांच्या घरातली प्रथा म्हणजे दिवाळीचा फराळ (किंवा कुठलाही खास पदार्थ) करताना देवाचं नाव घ्यायचं आणि मगच पदार्थ करायला सुरवात करायची. आता काय साधीच तर प्रथा आहे, कुठे जास्त काय करायचंय. पण त्यांच्या घरात नवीन आलेली सून विसरली, आणि नेमका पदार्थ बिघडला. आता ह्यांचे पदार्थ कधी देवाचं नाव घेऊन सुद्धा बिघडले नसतील का, पण घरात प्रत्येकाने बोलून दाखवलं कि देवाचं नाव नाही घेतलं ना :P . एरवी शिक्षित आहेत, काय वाईटहि नाहीयेत माणसं एरवी, पण आपल्या प्रथेला कुठलाही तर्काधार नाही हे कळत नसेल का. पण पाळली न गेल्यावर मनात चुकचुकलं. आणि ह्या गोष्टी थांबवल्या नाहीत तर वाढत जातात. आणि घरात ते न मानणाऱ्या माणसाला त्रास होतो आणि प्रथा पाळली गेली नाही कि मानणाऱ्या माणसाला त्रास होतो :).  माझ्या मते केवळ स्वच्छता हा हेतू नाही. सैनिकाने वा अग्निशामक जवानाने गणवेश घातल्याने तो जास्त पराक्रम गाजवतो का? मग गणवेशावर इतके पैसे का खर्च करायचे? अशा प्रकारची ऐहिक कारणमीमांसा असावी.  मलातरी कारण विशेष पटलं नाही  - कुठलाही गणवेश हा त्या समूहाचा आपण भाग आहोत हा मानसिक परिणाम करत. एकदा गणवेश घातला कि तुम्ही घरी कोणीही असा इथे तुम्ही सगळे सारखे आहात आणि तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या गणवेशावर तारे लावायला मिळतील हा मानसिक परिणाम करत. अग्निशमन दलाचा गणवेश दिसला कि आसपासच्या लोकांनाही कळतं कि जवळपास लागलेली आग विझवायला हे लोक आले आहेत, तो मानसिक आधार साधे कपडे घालून मिळेल असं वाटत नाही. टीम वर्क, टीम स्पिरिट वाढवायला गणवेश मदत करतो. 

चौकस२१२ Tue, 04/21/2020 - 07:24
आणि घरात ते न मानणाऱ्या माणसाला त्रास होतो आणि प्रथा पाळली गेली नाही कि मानणाऱ्या माणसाला त्रास होतो :). मग अश्या वेळी करायचं काय? वीणाजी? वरील उदाहरणात जर सुनेने तिला माहित नसताना केले असेल तर त्याचे लगेच खापर "देवाला नमस्कार ना केल्याने झाले" असे फोडणे हे अन्यायकारकच आहे आणि पुढल्यावेळेल्स दोन्ही बाजूनी तडजोड कार्याला हवी.. पण एकूण जीवनात माणसाचं प्रयत्नाचा अपमान श्रद्धाळू लोकांनी करू नये असे वाटते . मी अशी उद्धरण पहिली आहेत कि जीव तोडून एखादा नोकरी मिळणे/ उद्योग निर्माण करणे याची धडपड करीत असतो... आणि त्यावेळीस ते प्रयत्न हेच महत्वाचे असते ...बाकी गोष्टी गौण असतात .. पण अश्या वेळी काही मित्र/ नातेवाईक अशी काही विधान करताना ना... "अरे त्याने या या गुरूंकडे जायला पाहिजे होते.. किंवा बघ सुरवात करताना नामस्मरण नाही केले .. वैगरे" हे बोलून तो माणूस किती दुखावला जात असेल त्याची या लोकांना कल्पना तरी असते का..? हा मान्य आहे कि खडतर प्रयत्न करिताना मनुष्याला मनशांती साठी काही मानधारण, चिंतन/ योग करून फायदा होऊ शकतो किंवा एखाद्या जाणत्या अनुभवी माणसाशी नुसत्या गप्पा मारून फायदा होऊ शकतो .. पण याचे रूपांतर जेव्हा काही लोक बघ "श्रद्धा नाही म्हणून यश नाही" असे करतात ना तेव्हा तो मला तरी हलकटपणाच वाटतो...(येथे मी अनिस सारखात्यांशी १०० % सहमत आहे मनुष्य आणि त्याचे प्रामाणिक प्रयन्त "इतुकेच खरे ")
सध्या सोशल मीडियावर कोरोना कोविड19 या रोगाच्या अनुषंगाने याप्रकारचं समर्थक लेखन आढळत आहे. यातले भेद ,हेतू दुसऱ्या उदाहरणांवरून दाखवून देणे हा सदर लेखनाचा हेतू आहे. 1)भस्मधारण विधी:- हा विधी धर्मशास्त्रात (शरीर)शुद्धीचा विधी म्हणून(अनेक ठिकाणी) सांगितला गेलेला आहे. सामान्यतः भस्म म्हणजे होमहवनातील आहुती दिलेल्या पदार्थांची राख. या राखेत लाकडं गोवऱ्या तूप तीळ भात दुर्वा असे बरेच घटक जळालेल्या अंश रूपांनी येतात. स्वाभाविकच याचे काही रासायनीक गुणधर्म त्यात असतात.

स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?

माहितगार ·

In reply to by प्रसाद१९७१

माहितगार Mon, 11/30/2015 - 16:45
पॉपकॉर्न सोबत थंडीचे दिवस आले म्हणून गरमागरम विषय चर्चेसाठी दिला आहे, खूप गरम वाटल्यास क्षुधाशांतीसाठी थंड पेयेही सोबत ठेवावीत

In reply to by जेपी

माहितगार Tue, 12/01/2015 - 13:16
तुमच्या शुभेच्छांसाठी मिठाई. पहिल्या दिवसात १०० चा दर बरा असतो का ? धागा लेखातील बर्‍याच मुद्द्यांना अद्याप स्पर्श झाला नाही त्यातील अर्ध्या मुद्द्यांना स्पर्ष केलातरी भरपूर होतील असे वाटते.

कंजूस Mon, 11/30/2015 - 17:20
स्त्रिया बय्राचदा चुलीजवळ असतात.कोणी फुकाचं व्यवहाराला धरून नसलेलं बोललं की " तुझं तत्वज्ञान गेलं चुलीत " +"{ दोनवेळचं गिळण्यासाठी छनछन घेऊन ये मग ऐकते }."हे एक "बेसिक इंस्टिन्क्ट आहे". बाकी शनि काही शिंगणापुरलाच नाही घरातही बनवता येतो.

मितान Mon, 11/30/2015 - 17:25
पहिल्या काही प्रतिसादांमध्ये गांभीर्य आले तरच इथे या विषयावर चर्चा करण्यात अर्थ आहे. अन्यथा वेळ शब्द शक्ती वाया घालवू इच्छित नाही.

संदीप डांगे Mon, 11/30/2015 - 18:09
शशी केसबद्दलः जिथे स्त्रियांना प्रवेशास बंदी आहे अशा प्रार्थनास्थळांमधे त्यांनी जाऊच नये. किंवा कुणीही जाऊ नये. देवाच्या गाभार्‍यावर हे बसलेले चोर का नियम ठरवतात..? बाकीचे का पाळतात? खरंच चालत नसेल (म्हणजे देव कोपत बीपत असेल) तर कोपू दे! ती तरुणी तिथेच शिळा होऊन पडली असती तर देव आहे हे सिद्धही झाले असते, नाही पडली त्यामुळे खरा प्रश्न आणि तमाशा चालू झाला. देव कोपण्याऐवजी गावकरीच कोपलेत. अकलेचे कांदे आणि डोळे असून आंधळे लोक अजूनही शनि-शिंगणापुरास जातात. दलितांच्या मंदीरप्रवेश आंदोलनाबद्दलही मला हाच प्रश्न पडला होता. अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला... जो स्वत: तुम्हाला जवळ घेऊ शकत नाही, तुमचे दु:ख दूर करू शकत नाही तो देव कशाला डोक्यावर घ्यायचा? (देवाने दु:ख दूर करून सुख द्यावे म्हणून लोक देव संकल्पना मानतात, सश्रद्ध लोकांनी अंगावर येऊ नये) दुसरा प्रतिसाद नंतर देतो.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम Mon, 11/30/2015 - 19:50
आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. दुर्दैवाने या अनुषंगाने स्त्रियांना जी सापत्न वागणूक मिळते ती देण्यात इतर स्त्रियाही पुढे सरसावतात.

In reply to by बोका-ए-आझम

आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
ह्याला म्हणतात अनभ्यासातुन आलेले स्वकपोकल्पित निरर्थक अत्मरंजन ! पारश्यांच्या सर्व अग्यारी मधे कितीही हुच्चवर्णीय असला तरीही तुम्हाला प्रवेश दिला जात नाही ... कित्येक अग्यारीबाहेर "पारशी आणि इराणी झोराष्ट्रीयन सोडुन सर्वांन्ना प्रवेश निशिध्द " अशी स्पष्ट पाटी वाचली आहे मी !

In reply to by प्रसाद गोडबोले

बोका-ए-आझम Mon, 11/30/2015 - 22:57
त्यावरून तुम्हाला वाचता येतं याशिवाय दुसरं काहीही सिद्ध होत नाही. पहिले तो 'निशिद्ध'शब्द 'निषिद्ध' असा नीट लिहायला शिका. शंभर वेळा लिहून काढा हवं तर. पारशांच्या धर्मस्थळात फक्त पारशांना परवानगी असते. पुरुष किंवा स्त्री. आणि जे पारशी नसतात त्यांना नसते. पुरुष किंवा स्त्री. इथे धाग्यात उल्लेख नसलेल्या मुद्द्यांवर वाद घालायचा असेल तर परीराज्यात जा. नाहीतर मुद्दा समजून घेऊन नीट वाद घाला. एवढा अभ्यास केलाय त्याचा उजेड पडू दे जरा!

In reply to by बोका-ए-आझम

किती ती असहिष्णुता ! तुमच्या ह्या प्रतिसादातुन वाक्य जसेच्या तसे कॉपी पेस्ट करुन लिहिले आहे >>>> http://www.misalpav.com/comment/777704#comment-777704 १००% सहमत. बोका-ए-आझम - Mon, 30/11/2015 - 19:50 आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. >>>> उगाच स्वतःच्या मनाचे काही घुसडलेले असेल तर दाखवा नाही तर वाक्य लिहायला चुकले असे कबुल करा की राव !! आम्ही आमचा शब्द सुधारतो तुम्ही तुमचे वाक्य सुधारा . हाकानाका.

In reply to by प्रसाद गोडबोले

बोका-ए-आझम Tue, 12/01/2015 - 07:02
तुम्ही खरोखर चूक दाखवली असतीत तर ती मान्य करायला हरकत नव्हती. चूक नसताना उगाचच आक्षेप घेणं याला काय अर्थ आहे? धागा स्त्रियांवरच्या धार्मिक बंधनांची चर्चा करतोय. त्यावर संदीप डांगे यांनी शनि शिंगणापूरच्या घटनेचा संदर्भ दिला. त्यावर मी प्रतिक्रिया दिली. त्याला संदर्भ हा शनि शिंगणापूरसारख्या हिंदू तीर्थक्षेत्रात स्त्रियांवर लादण्यात आलेल्या बंधनांवर होता. पारशांचा संबंध कुठे येतो यामध्ये? पारशी कोणत्याही पारशी नसलेल्या माणसाला त्याची जात/धर्म/लिंग/वर्ण यावरून अपवाद करुन अग्यारीत प्रवेश देत नाहीत. यात मुद्दाम पुरुष आणि उच्चवर्णीयांचा अपवाद केला जात नाही. तसंच कोणत्याही पारशी पुरुष आणि स्त्रीला तिथे प्रवेश असतो. त्यात लिंग आणि वर्ण यावरुन अपवाद केला जात नाही. त्यामुळे तुमचा आक्षेप निरर्थक ठरतो. उद्या स्त्रियांच्या स्वच्छतागृहांमध्ये आणि ट्रेनच्या स्त्रियांच्या डब्यांमध्ये पुरूषांना प्रवेश नसतो असं कुणी तरी म्हणेल. ते विधानही तुमच्या आक्षेपाप्रमाणेच निरर्थक आहे.

In reply to by बोका-ए-आझम

प्रचेतस Tue, 12/01/2015 - 07:18
वेरुळच्या घृष्णेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात मात्र पुरुषांना बनेल काढल्याशिवाय अजूनही प्रवेश मिळत नाही.

In reply to by प्रचेतस

तुषार काळभोर Tue, 12/01/2015 - 11:55
असा नियम असावा. सासवडजवळच्या हिवरे येथील मंदीराच्या गाभार्‍यातसुद्धा बनियन (आणि कमरेचा पट्टा-चामडी वस्तू नको म्हणून) काढून जावं लागतं. कानिफनाथांचं मंदीर हिवर्‍यापासून पुढेजवळच आहे. (शिवमंदीर नसले तरी) तेथेही हाच नियम आहे. या नियमामुळे बाय डिफॉल्ट महिला मंदीर प्रवेशास अपात्र ठरतात.

In reply to by तुषार काळभोर

कवितानागेश Tue, 12/01/2015 - 14:55
मी गोकर्ण, घृष्णेश्वर इथे जाऊन आले आहे. दक्षिणेत अनेक शिवमंदीर्ांमध्ये असा नियम आहे पण तो पुरुषांसाठी. स्त्रियांना तस्सच्या तस्स आत जाऊ देतात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम Tue, 12/01/2015 - 09:49
तरी आपण उत्तरं देतोच ना सर! शिक्षकांच्या व्यवसायात हा occupational hazard असतोच ना! त्यामुळे इच्छा असूनसुद्धा फाट्यावर मारता येत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

सहमत आहे. पण मला अनेक वर्षाच्या जालानुभव सांगतो आपल्याला त्रास होतो पेक्षा थांबणं परवडतं. म्हणजे उद्या एखाद्या मंदिराच्या विश्वस्तानी ठरवलं की महिलांनी यापुढे.... जाऊ देत. पुरुषांना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर नागडं जावं लागेल तरी हे म्हणतील काय होतं मंदिराचे नियम पाळले पाहिजेत. शिकलेले असून सारासार विवेकबुद्धि वापरता येत नसेल तर काय उपयोग शिक्षणाचा. शनीमंदिराचा चौथारा असू देत की रजस्वला असलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश असू देत स्री पुरुषांनी मिळुन जनआंदोलन केलं पाहिजे, देव आहे नाही तो भाग वेगळा. पण प्रवेश बंदी कोणालाच नको. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सर्वांसाठी खुलं केलं त्या प्रमाणे ही आंदोलनं झाली पाहिजेत, असं वाटतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पगला गजोधर Tue, 12/01/2015 - 10:46
शिकलेले असून सारासार विवेकबुद्धि वापरता येत नसेल तर काय उपयोग शिक्षणाचा.
अश्या लोकांना साक्षर म्हणावे, सुशिक्षित नव्हे, भलेही त्यांनी फुरोगामी/विचारजंत असे इतरांना शिव्या घालून हिणवलं तरी… call spade a spade.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 10:50
बिरुटेसर, परस्परविरोधी विधाने करत आहात. सारासारविवेकबुद्धी असेल तर कुणी मंदिरात जाणारच कशाला? मंदिरातले नियम विश्वस्त ठरवत नाहीत, भक्त ठरवतात. भक्तांनी ठरवलेले नियम विश्वस्त पाळतात. पुढे विश्वस्त/पुजारी आपल्या सोयीनुसार ते वळवून घेतात आणि पुढे भक्त हेच नियम पाळायला लागतात. हे ज्या भक्तांना कळत नाही त्यांना नागडे जाण्याचाही नियम मान्य होतो. प्रथा एखाद्याच्या मूर्खपणामुळे तयार होतात. एखाद्याने नागड्याने जाण्याचा नवस केला अन् अनमानधपक्याने फळास आला तर ते पाहून अक्कल गहाण टाकलेले लोक तसेच करायला लागतील. बहुसंख्य तसे करतात पाहून मग तोच नियम होईल आणि तीच प्रथा होईल. मग ते न पाळणार्‍याला देवाचा उपमर्द करत आहे असे म्हणून प्रवेश नाकारला जाईल. कारण मेंढ्यांच्या कळपात ते फिट बसत नाहीत म्हणून. मंदिरात कुणालाच प्रवेशबंदी नसावी असे ज्यांचे मत आहे त्यांना मंदिर ही व्यवस्थाच समजली नाही असे म्हणावे लागते. चर्च, मशिद, गुरुद्वारा, विहार ह्यापेक्षा ही व्यवस्था कशी वेगळी आहे हे खालच्या माझ्या प्रतिसादात सांगितले आहे. काही चार बुकं शिकून अतिशहाणे झालेले लोक तिकडची व्यवस्था पाहून इकडंही तसेच असले पाहिजे ह्या दिव्य विचाराप्रत येतात. त्यांना तिकडचाही अभ्यास नसतो, इकडचाही नसतो. समानतेच्या तत्त्वाचा चुकीच्या ठिकाणी आग्रह होत आहे हे लक्षात येत नाही. जनआंदोलन जर करायचे तर मंदिरात कुणीच जाऊ नये यासाठी करावे. त्यानेच समाजाचे जास्त आणि योग्य भले होईल. सगळी मंदिरेच ओसाड पाडावीत. जिथे बंदी आहे तिथे जबरदस्ती मंदिरप्रवेश ही अतिशय हास्यास्पद संकल्पना आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम Tue, 12/01/2015 - 11:52
आणि मंदिरात जाणं या परस्परविरोधी गोष्टी कशा काय? मंदिरात नवस करणं, तो पूर्ण होईल किंवा होतोच अशी अंधश्रद्धा ठेवणं, त्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी असणं ही सारासारविवेकबुद्धी नसल्याची लक्षणं आहेत हे मान्य, पण मंदिरात निव्वळ जाणं हे सारासारविवेकबुद्धीच्या विरोधात आहे हे पटलं नाही.

In reply to by बोका-ए-आझम

मंदिरात निव्वळ जाणं हे सारासारविवेकबुद्धीच्या विरोधात आहे हे पटलं नाही. सहमत....! योग्य आणि अयोग्य यातील समज . -दिलीप बिरुटे

In reply to by बोका-ए-आझम

राही Tue, 12/01/2015 - 09:30
दक्षिणेतल्या काही देवळांत प्रवेशबंदी नसली तरी पुरुषांना वेष्टि नेसावी लागते. अलीकडे बहुतेक पुरुष ती पँट्वरूनच गुंडाळतात. महिलांना साडी किंवा सलवारकमीज आवश्यक आहे. जीन्स अजूनही काही ठिकाणी चालत नाहीत. चिपळूणमध्ये डेरवण येथे महिलांना नऊवारी नेसावे लागत असे तसेच तेथे महिलांनी महिना असताना आत जाऊ नये अशी पाटीही होती. आताची स्थिती माहीत नाही. अवांतर : काही वर्षांपूर्वी केरळला गेलो असताना एकदा एका देवळात आमच्या मुलांना प्रवेश द्यावा की नाही याबद्दल तिथल्या पुजार्‍यांमध्ये चर्चा झाली. तिथल्या मुख्य प्रशासकाला बोलवण्यात आले. कारण मजेशीर होते. त्यावेळी तिथे आम्हीच फक्त उत्तरहिंदुस्तानी होतो आणि मुलांचा वर्ण तांबूस गोरा आणि केस पिंगट ही बाब तिथल्या समुदायात वेगळी दिसत होती. कदाचित परदेशी पाहुणी मुले एक्स्चेंज कार्यक्रमातून आली असतील असा संशय त्यांना आला होता. (केरळमधे बरेच परदेशी लोक येतात.) त्यांची समजूत पटवण्यात थोडा वेळ गेला. रांगेतल्या मागच्या लोकांचा खोळंबा झाला नाही कारण आम्हांला रांगेतून बाहेर काढले होते. थोड्या वेळाने सर्व ठीक झाले.

In reply to by राही

मितान Tue, 12/01/2015 - 09:43
विजारीवरून वेष्टी एवढा बिनडोक भंपकपणा मी कोणत्याच देवळात पाहिला नाही! एका ठिकाणी मला सलवारवरून ते कळकट कापड ते ही भाड्याने घेऊन नेसले तरच मंदिरात जाता येईल असे सांगून अडवले. त्याचवेळी २ फिरंगी स्कर्टवाल्या मुलींना मात्र वाकून नमस्कारासह प्रवेश मिळाला. हे बघून मला त्या आतल्या देवाचीच कीव आली. तसंही मला जाऊन न जाऊन काही फरक पडत नसल्याने बाकीच्यांचे दर्शन होईस्तवर मी देवळाबाहेरच्या दुकानांना माझे दर्शन देऊन आले.

In reply to by मितान

पगला गजोधर Tue, 12/01/2015 - 10:41
हे बघून मला त्या आतल्या देवाचीच कीव आली. तसंही मला जाऊन न जाऊन काही फरक पडत नसल्याने बाकीच्यांचे दर्शन होईस्तवर मी देवळाबाहेरच्या दुकानांना माझे दर्शन देऊन आले.
तै मस्तच, मी सुद्धा जेजुरीला धन्दा होताना पाहीला, तेव्हा मी सुद्धा आत गेलो नाही.

In reply to by मितान

बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 12:03
नै म्हणजे जो काय नियम आहे तो तरी सारख्या प्रमाणात राबवावा. हे असली चाटूगिरी डोक्यात जाईल नै तर काय!

In reply to by राही

गॅरी ट्रुमन Tue, 12/01/2015 - 11:18
चिपळूणमध्ये डेरवण येथे महिलांना नऊवारी नेसावे लागत असे तसेच तेथे महिलांनी महिना असताना आत जाऊ नये अशी पाटीही होती. आताची स्थिती माहीत नाही.
मी या वर्षी जानेवारीतच तिथे गेलो होतो. तिथे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही घटनांचे पुतळे आहेत आणि वालावरकर महाराज म्हणून कुणा महाराजांची समाधी आहे. पुतळ्यांच्या ठिकाणी असे वेषभूषेवर बंधन नाही.पण समाधीच्या ठिकाणी जायचे असेल तर स्त्रियांना "वयोमानानुसार फ्रॉक किंवा साडी ही वेशभूषा असेल तरच प्रवेश दिला जाईल" अशी पाटी वाचली होती. नऊवारी असा काही उल्लेख नव्हता. याविषयीच मी मिपावर मागे लिहिलेले थोडे चोप्य-पस्ते करतो--- "म्हणजे मी जीन्स घालून गेलो तरी त्या महाराजांना चालणार पण हिलरीने साडीच नेसली पाहिजे ही सक्ती. हे काही मला पटले नाही....ते पुतळे बघून झाल्यानंतर आणखी एक ठिकाण होते तिथे जायला आम्ही निघालो तेव्हा हिलरीने साडी नेसली नसल्यामुळे आत प्रवेश नाही हे कळले.आम्ही विचारले की आत नक्की काय आहे?त्यावर कळले की तिथे आत वालावलकर महाराजांची समाधी आहे.एक तर वालावरकर महाराज हे नाव मी आयुष्यात दुसऱ्यांदा ऐकले.कदाचित शाळेत असताना आमची सहल गेली होती त्यावेळी ते नाव ऐकले असेल ही शक्यता गृहित धरून दुसऱ्यांदा असे लिहितो.हे महाराज कोण होते किंवा ते खरोखर चांगले होते की नाही याविषयी मला काहीच माहित नव्हते. ज्या माणसाविषयी काही माहित नाही त्याची समाधी बघण्यात काय कपाळ इंटरेस्ट असणार? आणि समजा हे महाराज कोण हे माहित असते तरी तिथे जावेसे वाटायची शक्यता अगदी शून्य होती.उंटाच्या लहान आतड्याची लांबी किती असते हे समजून घेण्यात मला जितका इंटरेस्ट आहे त्यापेक्षाही कमी इंटरेस्ट या असल्या महाराजांच्या समाध्या वगैरे बघण्यात मला आहे.त्यामुळे आत जाऊ देणार नसाल तर नका देऊ, हू केअर्स असे म्हणत आम्ही तिथून निघालो."

In reply to by बोका-ए-आझम

आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
मी फक्त तुमचे हे वाक्य चुकले आहे इतकेच निदर्शनास आणुन देत आहे . तुम्हाला कदाचित असे लिहायचे असावे आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली हिंदु प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. तुमची वाक्य रचना चुकली आहे इतकेच निदर्शनास आणुन देत आहे !

In reply to by पगला गजोधर

त्यांचे मुळ वाक्य हे आहे >>>
आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
>>> मी कमीत कमी सुधारणा सुचवत होतो , बरे झाले आपण अजुन एक अ‍ॅडीशन सुचवली ! बोकाराव तुमचे वाक्य असे असले पाहिजे आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली हिंदु पूजास्थळे कुठेच नाहीत.

In reply to by प्रसाद गोडबोले

नूतन सावंत Wed, 12/02/2015 - 22:10
बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्लर येथे हिंदू धर्मियांशिवाय कोणालाही प्रवेश नाही,अशी पाटी आहे.एकदा आय.टी.डी.सी.च्या बसने आलेल्या क्रिश्चन धर्मियांना मंदिराच्या प्रांगणात आणल्याबद्द्ल पंजाबी हिंदू गाईडला तिथले पुजारी आईबहिणीवरुन शिव्या देताना प्रत्यक्ष पाहिले आहे.

In reply to by नूतन सावंत

माहितगार गुरुवार, 12/03/2015 - 10:24
खरच हे दुर्दैवी आहे. मी एकदा एका आफ्रीकन (ख्रिश्चन) स्त्रीला विवेकनंदांच्या भूमिकेतून हिंदू धर्म या विषयावर माहिती दिली तिला हिंदू संस्कृती बद्दल सकारात्मक उत्सुकता निर्माण झाली आणि मंदिरांना भेट देण्याचीही इच्छा झाली पण मंदिरातील पुजारीवर्ग कसा वागेल या विचाराने मंदिर भेटीस आमंत्रण देण्याचे धाडस मलाच झाले नाही याची आठवण झाली.

In reply to by माहितगार

संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 11:24
जिथे पुजारी नाहीत अशा मंदिरांना भेट द्यायला सांगावी. प्रसिद्ध व गर्दिने गजबजलेली मंदिरे म्हणजेच हिंदू धर्म असे नाही.

In reply to by संदीप डांगे

माहितगार गुरुवार, 12/03/2015 - 11:53
म्हणजे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तुमच्या धर्मातील हेदभाव कबूल करणे, शिवाय हायलाइट करणे झाले असे नाही का ?

In reply to by माहितगार

संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 12:37
नाही हो तसे नाही. मंदिरांबद्दल मी जे वर विवेचन दिले त्यानुसार काही मंदिरे खाजगी पद्धतीची आहेत. लोक तिथे गर्दी करतात म्हणजे ती लोकांची झाली असा अर्थ होत नाही. चित्रपटगृहांमधे लोक गर्दी करतात म्हणून तिथे वाट्टेल तसे वागण्याचा, किंवा तिथले नियम ठरवण्याचा अधिकार जाणार्‍या प्रेक्षकांना मिळत नाही. कुणाला प्रवेश द्यावा न द्यावा हे जसे चित्रमंदीर ठरवू शकते तसेच हे मंदिरही ठरवू शकते. टिकिट असणे म्हणजे प्रवेशास पात्र असणे हा साधा नियम तिकडे आहे, तर हिंदू असणे म्हणजे पात्र असने हा नियम इकडे आहे. ह्यात भेदभाव आहे असे मानणे चुकीचे आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' असे एखादा हिंदू मानतो म्हणून तुम्ही त्याच्या घरात घुसून राहणार हे योग्य नाही. भेदभाव आणि पात्रतानुसार प्रवेश ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत. मंदिरे आणि देव ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत हे मी आधीपासून सांगतोय. त्यात गल्लत होऊ देऊ नये. प्रवास हा प्रवास असतो पण गावातल्या एसटी स्टँडवर ज्या सहजतेने आपण फिरू शकतो, टिकट काढण्याची वेळ येईपर्यंत बसमधे बसू शकतो, तितक्या सहज कुठल्या एअरपोर्ट वर नाही फिरू शकत. म्हटले तर दोन्ही पब्लिक प्लेस, सार्वजनिक स्थळ आहेत. मग तिथेही भेदभाव समजायचा का? प्रवास म्हणजे हिंदू धर्म आणि मंदिरं म्हणजे एअरपोर्ट, बसस्थानकं असं समजा. (फार गुंतागुंत होतेय का? फारच दृष्टांतहेवी प्रतिसाद होतोय, माफी असावी)

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 12:50
सरसकट कुणालाही गाभार्‍यात सोडणे आणि निव्वळ मंदिरात अलाउ करणे यात फरक आहे की नाही? फक्त मंदिरप्रवेश करू दिला तरी बास आहे. तेवढंही कबूल करवत नसेल तर हाईट आहे.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 13:00
सरसकट कुणालाही गाभार्‍यात सोडणे आणि निव्वळ मंदिरात अलाउ करणे यात फरक आहे की नाही? हो. फरक आहे. फक्त मंदिरप्रवेश करू दिला तरी बास आहे. तेवढंही कबूल करवत नसेल तर हाईट आहे. बरोबर. माझ्यामते नियम जर असतील तर ते काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. अन्यथा तो सरळ भेदभाव आहेच. म्हणजे माहितगार म्हणत आहेत ती आफ्रिकन व्यक्ति जर सहज टूरीस्ट म्हणून मंदिरात आली आणि तीला प्रवेश नाकारला पण तीच व्यक्ती कुणा केंद्रिय मंत्र्यासोबत आली आणि तिला गाभार्‍यात घेऊन गेले तर हा भेदभावच झाला. मला वाटते इंदिरा गांधीसोबत जे त्या मंदिराने केले तेवढे कडक नियम कुणी मंदिर पाळत असेल तर तो भेदभाव समजू नये. अन्यथा हाईट आहेच.

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 13:05
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो.

In reply to by बॅटमॅन

पगला गजोधर गुरुवार, 12/03/2015 - 13:49
अमेरिका/ गोव्यातल्या/केप टाउन चर्चमधे (डोक्यावर टोपी न ठेवणे की संपले) व सिंगापूर /थायलंड मधील बौद्ध मंदिरात (पादत्राणे न घालणे की संपले), मला प्रवेश मिळाला, फोटो सुद्धा काढता आले. (कोणीही जात धर्म विचारला नाही). गुरुद्वाराच्या लंगर मधे जेवलोय (कोणीही जात धर्म विचारला नाही).

In reply to by बॅटमॅन

नाखु गुरुवार, 12/03/2015 - 14:47
हेच मी स्वतः शिवथर घळला अनुभवले आहे. सुमारे २०-२२ वर्षांपूर्वी (जेव्हा थेट नेट सेल्फी) इफे़क्ट नव्हता तेव्हा.. माझ्याबरोबर आम्च्या कंपनी समूहात दोन मुस्लीम २ केरळीयन ख्रिषचन यांनाही विना अटकाव प्रवेश दिला होता. शिवथर घळ हे संपूर्णतः खाजगी आहे असे मला वाटते तिथेही तुम्ही कुठल्या धर्माचे आहात हे विचारत नाहीत (किमान आम्हाला तरी विचारले नाही) फक्त पोषाख सभ्य असावा असा संकेत असावा.(किंवा मधल्या काळात काही वावगे घडले असावे म्हणून पेहरावाबद्दल काही नियम बन्विले असावेत). भेदभाव करणे कुठेही वाईच धाग्यावर आणि मंदीरातही...... लाईनीत (थांबण्याची सक्ती न करता लांबूनही नमस्कार)नमस्कारी नाखु

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 13:06
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो. बाकी नियम कसाही असो मात्र पुजार्‍यांनी शिव्या देणे म्हणजे हाईट आहे. असे अनुभव वाईटच.

In reply to by बॅटमॅन

गवि गुरुवार, 12/03/2015 - 14:08
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो.
अ. कडक अथवा सौम्य, जे काही नियम असतील त्यांची कमाल व्याप्ती नागरिकाला एखाद्या खाजगी, प्री-डिफाईन्ड सीमारेषा असलेल्या जागेत प्रवेश नाकारणे इतकीच असेल आणि ब. या जागी न जाण्याने त्या व्यक्तीच्या अन्न वस्त्र निवारा यांपैकी एक अथवा अनेक गरजा बाधित होत नसतील किंवा या गरजांना मिळवण्याचा एकमेव मार्ग खंडित होत नसेल. आणि क. स्वतःच्या आवारात तसे किंवा कोणतेही नियम करण्याची पूर्ण कायदेशीर मान्यता नियम बनवणार्‍या बॉडीला त्या देशाच्या मुख्य कायदेशीर संस्थेने दिलेली असेल. तर कोणतेही नियम चूक ठरणार नाहीत / ठरु नयेत. आणि तसं नसेल तर सर्व नियम चूक ठरतील / ठरावेत. मग ते वस्त्र, लिंग, वर्ण, धर्म, भाषा, उंची, वजन, केसांची लांबी, आहारपद्धती, लैंगिक ओरिएन्टेशन किंवा अन्य कोणत्याही व्हेरिफायेबल पॅरामीटरवर आधारित असोत. बाकी कितीही काही बोललं तरी निरुपयोगी.

In reply to by गवि

बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 14:18
म्हणजे या न्यायाने दलितांच्या मंदिरप्रवेशाबद्दलची सर्व आंदोलने आणि महिलांच्या गाभाराप्रवेशाबद्दलची आंदोलने निरुपयोगीच ठरावीत, नै का? मध्यंतरी कर्नाटकातील एका मंदिरातल्या गलिच्छ प्रथेबद्दल बरेच काही छापून आले होते. ब्रह्मवृंदाचे जेवण झाल्यावर त्या उष्ट्या खरकट्या पत्रावळ्यांवर लोटांगण घालत प्रदक्षिणा घालण्याचा प्रकार तिथे अगोदरपासून आहे. हाही कायदेशीर प्रकार आहे, कुणाच्या कसल्या हक्कावर गदा वगैरे येत नाही. पण यावर बंदी घालण्यात आली. आणि ते मलाही समर्थनीय वाटते. बर्‍याच जणांनी विरोधही केला, कैकांनी समर्थनही केले. नेमके देवळाचे नाव आठवत नै नैतर लिंक दिली असती. बाकी हा मुद्दा अंमळ भावनिकही आहेच. काही प्रमाणात अ‍ॅक्सेस ओपन केल्यास अजून बरे होईल असे बर्‍याच जणांना वाटते, तदनुरूप अनेक लोकांनी चळवळी केलेल्या आहेत आणि त्यांना कमीअधिक प्रमाणात यशही मिळालेले आहे. त्यामुळे यात निरुपयोगी असे काही वाटत नाही.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 14:43
मंदिरनामक जागा केंद्रस्थानी ठेवून समाज त्याविषयी काय निर्णय घेतो हे समाजावर बंधनकारक असते. संपूर्ण समाजाने (यात स्त्रिया-पुरुष, दलित-उच्चवर्णिय, श्रीमंत-गरीब सगळे आले) स्त्रियांच्या गाभाराप्रवेशावर बंदी घातली तर तेही बरोबर, उठवली तरी बरोबर. पण समाजातले काही विशिष्ट घटक आपले स्वार्थ साधण्यासाठी, असमतोल मानसिकतांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उर्वरीत समाजाला फसवत असतील आणि त्यायोगे काही भेदभाव घडत असेल तरच तो चुकीचा ठरेल. बाकी तुम्ही म्हणताय त्या अनिष्ट प्रथा ह्या सहज भावनेतून सुरु झालेल्या, पुढे विकृत रुप घेतलेल्या असतात. त्यांच्यावर प्रबोधनासह बंदी घालणे आवश्यकच आहे.

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 15:05
फसवणे म्हणजे काय? आर्थिक फायदा करून घेणे वगैरे? तसे असेल तर मग दलितांना मंदिरप्रवेशापासून रोखण्यात पुरोहितांचा तरी आर्थिक फायदा काय होता? उलट त्यांना अलाउ केले असते तर त्यांनीही दाने दिलीच असती की. तस्मात निव्वळ फसवणूक असेल तरच चूक ही व्याख्या अपुरी आहे असे वाटते. पण हा मुद्दा बर्‍याच अंशी सब्जेक्टिव्ह आहे हेही तितकेच खरे.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 15:26
फसवणे म्हणजे आर्थिक फायदाच असे नाही. खरे न सांगणे, सत्य दडवून ठेवणे, मिळालेल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन दमदाटी करणे. 'एखादा अधिकार तुम्हालाही उपलब्ध आहे' हे जातीपातीच्या पूर्वग्रहातून निम्नजातींना न सांगणे ही फसवणूकच आहे. एक उदाहरण देतो. मी आणि माझ्या मित्राने अमेरिकेतल्या कुठल्या युनिवर्सिटीला अप्लाय केले. पण प्रवेश मिळेल की नाही हे तिथे गेल्यावरच समजते अशी अट आहे. माझा मित्र तिथे आधीच गेलेला आहे. काय निकाल आहे हे त्याने मलाही कळवणे अपेक्षित आहे. पण इर्ष्येतून, सामाजिक सन्मानाच्या हेतूने त्याने मला 'तुझा नंबर लागला नाही' असे चुकीचे सांगितले. मला त्याच्यावर प्रचंड विश्वास असल्याने मी तोच निकाल खरा मानला. यात माझे नुकसान झाले. म्हणजे मला फसवले असेच म्हणेन ना मी? माझ्यामते मंदिरांमधे विशिष्टांना प्रवेशबंदी ही खाजगीकरणातून आलेली आहे. मंदिरव्यवस्थापनाच्या इतिहासाबद्दल मला तेवढे इत्थंभूत ज्ञान नाही. याविषयी जास्त माहिती मिळाली तर ह्या बंदीप्रथा कुठून उपजल्या हे शोधता येईल.

In reply to by संदीप डांगे

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/03/2015 - 18:24
@माझ्यामते मंदिरांमधे विशिष्टांना प्रवेशबंदी ही खाजगीकरणातून आलेली आहे.>> आहो कुठचं काय आलय खाजगीकरण.? ही अस्पृश्यता पाळली जाते सरळ सरळ! ह्याला पोथ्यांचाही आधार असतो.. देवाची पॉवर कमी होइल्,अमके तमके शिवल्यानी..असली मूर्ख टनाटनी गणित असतात...ह्या देवाला शिवू न देण्याच्या प्रथांमागे.. आतल्या गोटातून ,माहिती घ्या ..मग कळेल

In reply to by अत्रुप्त आत्मा

संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 19:01
अहो, अस्पृश्यता म्हणजेच खाजगीकरण. तेच म्हणायचे आहे. हे देवाची पावर कमी होईल वैगेरे बालीश कारणं देण्यामागे जी काय मानसिकता आहे ते म्हणजे खाजगीकरण. खरेतर अस्पृश्यता, देवाची पॉवर इतकी वरवरची कारणं बघण्यापेक्षा माणसाच्या अंतर्मनात ह्या गोष्टी निर्माण होण्यामागे आणि चराचरात देव आहे ह्या भावनेच्या विरूद्ध वागण्यामागे काय इतिहास असावा, कुठून सुरू झालं, नेमकं काय कारण असावं यावर विचार करतोय. काहीतरी आहे जे इतरांपासून लपवून, सुरक्षित ठेवायचं आहे. कुणाला तरी काही तरी फायदा असल्याशिवाय ह्या मान्यता व भेदभाव निर्माण होणार नाहीत. नुसतं 'आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ' एवढ्याशा भांडवलावर ही व्यवस्था इतकी शतके चालू शकत नाही. गूढत्वाच्या भांडवलावर असेल तरी सुरुवातीस काहीतरी अनुभव आल्याशिवाय लोक मानणार नाहीत. म्हणजे दहा समान दर्जा असलेल्या व्यक्ती प्रवासाला निघाल्या पण रस्ता माहीत नाही, त्यातल्या प्रत्येकाने प्रयत्न करून पाहिला पण एकाचेच रस्त्याबद्दलचे अंदाज दोन-तीन वेळा सलग बरोबर निघाले की तोच त्या गटाचा म्होरक्या होतो. मग भलेही पुढचे सगळे अंदाज चुकत गेले तरीही पुर्वसंचितानुसार त्यालाच तो मान मिळतो. पुढे इतरांची मते लक्षात घेऊन तो अंदाज वर्तवेल पण शेवटपर्यंत इतर लोक त्यानेच आपल्याला कसे योग्य मार्गदर्शन केले ह्यावर विश्वास ठेवतील. चातुर्वर्ण्य व्यवस्था होऊन ब्राह्मण सर्वश्रेष्ठ ठरवण्यामागे ब्राहमणांचे असेच काहीसे योगदान कारणीभूत असेल काय? ज्याचा गैरफायदा घेऊन जन्मनिहाय व्यवस्था निर्माण झाली आणि पुढे श्रेष्ठ कनिष्ठ चे मत मानवी मनाच्या विकृत बाजूचे दर्शन करत प्रभावी झाले. मूळावरच घाव घातला तर फांद्या आपोआप तुटून पडतात. बाजीरावपेशव्यांनीच सांगितलंय. म्हणून मूळ शोधावे. ते मनुस्मृतीच्याही पलिकडे असावे. जाणकारांच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत.

In reply to by बॅटमॅन

गवि गुरुवार, 12/03/2015 - 14:46
म्हणजे या न्यायाने दलितांच्या मंदिरप्रवेशाबद्दलची सर्व आंदोलने आणि महिलांच्या गाभाराप्रवेशाबद्दलची आंदोलने निरुपयोगीच ठरावीत, नै का?
माझा प्रतिसाद परत वाच. आजरोजीविषयी बोलायचं आहे. अ. जागा खाजगी आहे की सार्वजनिक मालकीची? ब. प्रवेश रोखणारा नियम अलिखित आणि लोकल पुजार्‍याने / बडव्यांच्या गटाने आपसात ठरवून केला आहे की मंदिराच्या ट्रस्टने अधिकृत ऑथॉरिटीसह केलेला आहे? यावर ते वैध की अवैध ते ठरेल. कधी भावना, कधी कायदा अशाने बरेच घोळ होतात.

In reply to by गवि

बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 15:01
गाभाराप्रवेशाची आंदोलने गेल्या पाचेक वर्षांत झालेली आहेत. कर्नाटकातले उदाहरणही अलीकडचेच आहे. बाकी अधिकृत अ‍ॅथॉरिटीने घेतलेला निर्णय तांत्रिकदृष्ट्या वैध असला तरी योग्य असेलच का? ते अय्यप्पा मंदिरात पाळीवाल्या स्त्रिया ओळखण्यासाठी स्कॅनर बसवायचा निर्णय समजा उद्या अगदी अधिकृतपणे घेतला तर तुम्ही त्याला योग्यच म्हणाल का? वैध आणि योग्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दरवेळेस एकाच एक चौकटीत अशा गोष्टी पकडता येत नसल्या म्हणून नुस्ता घोळ आहे असे नाही.

In reply to by बॅटमॅन

अभ्या.. गुरुवार, 12/03/2015 - 14:09
पुजारी हे माणसांचे प्रतिनिधी म्हणून देवापुढे गार्‍हाणे मांडतात, सेवा करतात तोपर्यंत ठिकच असते. जेंव्हा ते स्वतःला देवाचे प्रतिनिधी समजू लागतात तेंव्हाच अवघड होते. अशावेळी व्यवस्था त्यांना बदलते किंवा ते व्यवस्था बदलतात.

In reply to by संदीप डांगे

माहितगार गुरुवार, 12/03/2015 - 13:57
@ डांगेजी
म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत.
काय होतय १) अनेक ऑदरवाईज सार्वजनिक असलेली मंदिरे/प्रार्थनास्थळे केवळ भेदभावाच्या सोईसाठी म्हणून खासगीपणा पुढे केला जाताना दिसतो यात कुणाच्या व्यक्तीगत घरात जाण्याचा तसा प्रश्न नाही आणि 'अतिथी देवोभव' म्हणणार्‍या संस्कृतीत अगदी घरातल्या मंदिरा बाबत सुद्धा भेदभावयूक्त व्यवहार आदर्श कसा म्हणता येईल ? २) मी समोरच्या परधर्मीय व्यक्तिशी माझ्या संस्कृतीतील उदात्तते बद्दल बोलणार आणि नंतर हजारो लोक जात असलेल मंदिर खासगी आहे आणि तुमच्या बॅकग्राऊंडमुळे प्रवेश नाही असे सांगणार यात माझ्या संस्कृतीच्या उदात्ततेच प्रदर्शन होत की कोत्या मनोवृत्तीच प्रदर्शन होते आहे?
म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत.
मी माझ्या धर्माचा संस्कृतीचा अभिमान ठेवतानाच, सहिष्णूता बाळगाणारा समधर्म समभाव बाळगणारा व्यक्ती आहे, मला माझ्या प्रमाणेच माझ्या मुलांमध्ये सहिष्णूता वृद्धींगत व्हावी आणि इतर धर्म आणि विचार पद्धतीचा परिचय व्हावा म्हणून माझ्या मुलांना विवीध धर्मांच्या धर्म स्थळांना भेटीस न्यावयाचे आहे त्यावेळी मुलांनो अमुक अमुक मंदिरे/प्रार्थनास्थळांमध्ये तुम्ही तुमच्या बॅकग्राउंडमुळे प्रवेशासाठी अपात्र आहात हे सांगणे नेमकी कोणती गोष्ट बाल मनांवर बिंबवते ज्यांना धर्मंच्या दुकानांवरच्या प्रवेश नाकारणार्‍र्‍या असहिष्णु पाट्या पाहून त्या मुलांकडून मोठे झाल्या नंतर सहिष्णूतेची अपेक्षा करणे कितपत रास्त ठरते या बद्दल मी साशंक आहे. असो.

In reply to by सायकलस्वार

अजया Tue, 12/01/2015 - 08:02
अरे वा हे सोपे तत्त्वज्ञान दिसते!कळायला अवघड गेला असेल विषय बाकीचा! चालु द्या निरर्थक अत्मरंजन! etc etc!!

In reply to by अजया

मितान Tue, 12/01/2015 - 08:49
@ सायकलस्वार, इथला तुमच्या मते गाभारा किती महत्वाचा आहे हे अधोरेखित केल्याबद्दल आभार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

In reply to by सायकलस्वार

पैसा Tue, 12/01/2015 - 09:37
सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा कमालीचा अभ्यास केलेला दिसतोय! का आताचा आयडी बॅन झाल्यावरची तरतूद करून ठेवली आहे! अभ्यास जोरात चालू ठेवा बरं!

In reply to by पैसा

बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 12:08
सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा कमालीचा अभ्यास केलेला दिसतोय!
एका महिन्यात जर कुणी सालसपणे प्रतिसाद देऊ शकत असेल तर चार महिने लै झाले, नै का?

In reply to by पैसा

बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 12:24
आमच्यासारखे बसतात बोंबलत.
चांगलंच आहे. बोंबलण्याचे फायदे काय असतात ते इथे पहावयास मिळेल. आरोग्यास हितकारकच असते. http://www.sanatan.org/mr/a/574.html त्या निमित्ताने सालसपणामागील अमंगळ निघून जाईल अशी भाबडी आशा करावयास हरकत नाही. =))

In reply to by सायकलस्वार

गणपा Tue, 12/01/2015 - 10:09
तायांनो थोडं विनोदानं घ्या की सायकलस्वाराचं वाक्य. :D का उगा वाढदिवसाच्या शुभेच्छा देउन राहीलात?

In reply to by सायकलस्वार

मृत्युन्जय Tue, 12/01/2015 - 11:09
पुरुषांना बंदी असलेला एक गाभारा इथे मिपावरच आहे म्हणे... हाहाहाहा. पण आत मध्ये देव आहे याची खात्री आहे का तुम्हाला? ;)

In reply to by मृत्युन्जय

पण आत मध्ये देव आहे याची खात्री आहे का तुम्हाला?
देव नाही ह्याची १००% खात्री आहे ... देवी असु शकेल कदाचित =))))

In reply to by मितान

बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 15:19
डोक्यातल्या किड्यांची पूजा करत बसलं की असं होतं
त्या स्वमतांध दांभिक क्रायबेबी कंपूबाजांना आपली पूर्ण सिंपथी आहे. :) #छाणप्रतिसाद

In reply to by बॅटमॅन

मितान Tue, 12/01/2015 - 15:25
माझी तर अशा लोकांना नुसती सिंपथीच नाही तर किंड्यांविषयीच्या फोबियावर फुकट उपचार करणार्या संस्थांची यादीही तयार ठेवली आहे मी !

In reply to by बॅटमॅन

मितान Tue, 12/01/2015 - 15:25
माझी तर अशा लोकांना नुसती सिंपथीच नाही तर किंड्यांविषयीच्या फोबियावर फुकट उपचार करणार्या संस्थांची यादीही तयार ठेवली आहे मी !

In reply to by मितान

बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 15:28
एकूण प्रतिसाद पाहून "कोण तो **चा म्हणतोय मी शिव्या देतोय म्हणून?" या अजरामर वाक्याची अठवण झाली. =))

In reply to by नीलमोहर

नीमो , चित्र सापडले आहे , फक्त तुर्तास संपादक मंडळ सुट्टीवर असल्याने चित्र इथे टाकले नव्हते , आपल्याला व्यनी करतो ;) बाकी चेष्टा मस्करी इतकी स्पोर्टींगली घेतल्याबद्दल आपल्यावर कारवाई वगैरे होईल की हो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

नीलमोहर Tue, 12/01/2015 - 16:54
Smiley नको नको व्यनि नको.. आणि संपादक मंडळच सुट्टीवर असल्यावर कारवाई कोण करणार :)

In reply to by नीलमोहर

pacificready Tue, 12/01/2015 - 17:12
>>>नको नको व्यनि नको. दूरदर्शन ची दारुबंदी ची जाहिरात आठवली. नको बाबा नको नको. संसार उद्ध्वस्त करी दारु, म्हणून संसार नका करु

In reply to by संदीप डांगे

माहितगार Mon, 11/30/2015 - 20:35
"....मंदीरप्रवेश आंदोलनाबद्दलही मला हाच प्रश्न पडला होता............जो स्वत: तुम्हाला जवळ घेऊ शकत नाही, तुमचे दु:ख दूर करू शकत नाही तो देव कशाला डोक्यावर घ्यायचा?....
कदाचित याच भावनेने सहसा लोक दुर्लक्ष करतात, अशी काही स्थाने असतील तर जाण्याचे टाळले जाते पण या दृष्टीकोणा बद्दल एक साशंकता आहे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी पाणी पिण्यास दिले नाही तर तुम्ही ते टाळाल दुसरीकडे जाऊन पाणी प्याल एका अर्थाने समतेच्या वागणूकीचा आग्रह बाजूस पडून एक अप्रत्यक्ष तडजोड स्विकारली जाते आहे. मी शीख धर्मीय असो वा नसो त्यांच्या डोक्यावर कापड बांधून पाय धुण्याची अट पूर्ण केली कि मला त्यांच्या धर्मस्थानात जाऊन दर्शन घेता येते. मी स्त्री आहे पुरुष आहे कोणत्या वर्ण धर्म पंथाचा आहे याने सहसा फरक पडत नाही. अशाच पद्धतीने इतर धर्मीय स्थळांमध्ये कुणीही आदर पुर्वक दर्शन/प्रार्थना करू इच्छित असेल तर त्यासाठी मुभा असावयास हवी आणि त्यासाठीचे आग्रह तुम्ही नास्तीक असाल अथवा इतर धर्मीय असाल तरीही सोडू नयेत कारण तुम्ही धरत असलेला आग्रह सुसंस्कृततेसाठी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सामाजीक समस्यांच्या संदर्भाने मी मागेही धागा काढला होता, तुम्ही धर्मस्थळात जाऊन प्रत्येक वेळी पुजा केली पाहीजे असे नाही पण एकदा तो अधिकार प्राप्त झाला की बाकी समाजात समतेच्या वागणूकीची खात्री करणे सोपे जाऊ शकते. मी आफ्रीकन ख्रिश्चन असेन तर काळ्यांच्या चर्च मध्ये जाउन तडजोड करेन पण दुसर्‍या समुदाया पासून तुटलेलाच राहीन ही जी सामाजीक दरी आहे ती सांधण्यासाठी म्हणून मला ऑदरवाईज रस नसला तरी गोर्‍यांच्या प्रत्येक चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करून येण्यास आवडेल. अर्थात आपण लाथ वगैरे शब्द सात्वीक रागाने जरी वापरला असला तरी आदरणीय उद्देशाने न येणार्‍यांना नाकारण्याचा एक वेगळा अधिकार धार्मीक स्थळांना प्राप्त होऊ लागतो याने सामाजीक दरी सांधण्यास मदत होते असे वाटत नाही म्हणून असे शब्द टाळावेत किंवा कसे.

In reply to by माहितगार

संदीप डांगे Mon, 11/30/2015 - 22:26
आता पुरेसा वेळ हाताशी नसल्याने तुमच्या प्रतिसादाचं उत्तर नंतर देईल वा वेगळा धागा काढेन, कारण इथे दलितप्रश्नावर चर्चा करणे मूळ धाग्याशी, विषयाशी प्रतारणा होइल. पण खालील मुद्द्यावर माझं मत मांडतो.
अर्थात आपण लाथ वगैरे शब्द सात्वीक रागाने जरी वापरला असला तरी आदरणीय उद्देशाने न येणार्‍यांना नाकारण्याचा एक वेगळा अधिकार धार्मीक स्थळांना प्राप्त होऊ लागतो याने सामाजीक दरी सांधण्यास मदत होते असे वाटत नाही म्हणून असे शब्द टाळावेत किंवा कसे.
'विशिष्ट मंदिरातच जागृत देव असतात' ही इतकी तकलादू आणि भ्रामक कल्पना भारतीय समाज कवटाळून बसला आहे की आपण एकाच बाबतीत वेगवेगळे विचारप्रवाह एकाच वेळी पाळत आहोत ते त्यांच्या लक्षात येत नाही. १. मनुष्य देवळात जातो. कारण देवाप्रति त्याला आपली भक्ती, श्रद्धा अर्पण करायची असते, आपले दु:ख, सुख याचे कारण तोच आहे असे समजून एक मालक-पालक-मित्र-सखा म्हणून त्याच्याशी गुजगोष्टी करायच्या असतात. आपले गार्‍हाणे सांगायचे असते, त्यावर त्याने काहीतरी करावे अशी अपेक्षा असते. थोडक्यात मंदीर हे एका व्यक्तिचे असते. भक्त तिथे स्वतःपुरते लाभ घेण्यासाठी जातो. अखंड समाजासाठी नाही. ते राजे, सत्ताधारी वैगेरे करतात. पण व्यक्तिगत पातळीवर देव हा वैयक्तिकच असतो. २. मंदिरात एक व्यवस्था असते, देवाची काळजी घेण्याची. त्याचे षोडशोपचार, पुजाअर्चा, आरत्या नैवेद्ये वैगेरे करणे गरजेचे असते. त्याची समाजातल्या एका व्यक्तिवर जबाबदारी टाकल्या जाते. परंपरेने वा कसेही चालत आलेले नियम, अटी हे गुरव, पुजारी, पुरोहित पाळत असतात जेणेकरुन 'देवाचे हित' जपल्या जावे. ह्यात स्त्रियांनी प्रवेश करू नये, रजस्वला स्त्रीने प्रवेश करू नये, अमूक जातीतल्या माणसाने प्रवेश करू नये असे नियम असतात. त्याची कारणे दैवी वैगेरे असतात. भारतात अशी बरीच मंदीरे आहेत जी विशिष्ट जातीची, उपजातीची आहेत. त्यांच्याशिवाय तिथे दुसर्‍या कोणाला प्रवेश नसतो. 'स्थानाची पवित्रता' जपणे हा उद्देश असतो. ही पवित्रता, नियम परंपरेने जसे आले तसे, थोडेसे आपल्याला सोयिस्कर ठरतील असे करत पुरोहित, गुरव पाळतात. इथे देव व पुरोहित यांचे हिताला प्राधान्य आहे, भक्तांच्या नाही. आमच्या कुलदैवतेच्या गाभार्‍यात पुरुषांना प्रवेश नाही, तिथे सगळे षोडशोपचार, विधी फक्त स्त्रिया करतात. ३. भारतीय मंदिरांचा इतिहास पाहू जाता. पुरातन मंदिरे व्यक्तिगत उपयोगासाठी, ध्यानपुजाअर्चेसाठी बांधलेली आहेत. गाभार्‍यांची रुंदी एकाच व्यक्तिला सहज बसता येईल अशी आहे. एक असाही संशय आहे की काही महत्त्वपूर्ण ज्ञान, वस्तू इथे सांभाळून ठेवलेल्या आहेत. मंदीर हे अतिशय व्यक्तिगत साधनेचे स्थळ आहे. कोणा राजाने, प्रधानाने, मंत्र्याने, सरदाराने स्वतःचे पैसे घालून एक चांगली जागा तयार केली असते. तीथे त्याने वा अजून कोणा तंत्रमंत्रात कुशल पुजार्‍याने पुजा करून वातावरण, जागा मंतरलेली असते. नित्य साधनेने तिथे एक जाणवेल असे वातावरण तयार होते. तिथे शांती लाभते. मग त्या जागेच्या दैवीपणाचे किस्से बाहेर पडतात. पण हे सगळे व्यक्तिगत आहे. त्यामुळे अशी व्यक्तिगत जागा कुठेही तयार करता येऊ शकते. पण ते वातावरण तयार करणे चटकन, झटपट होणारे काम नाही, त्यास कित्येक वर्षांची अखंड तपस्या लागते. अनिर्बंध हेळसांडीने ते वातावरण नाहिसे होऊ शकते. त्यामुळे अशी मंदीरे लोकांपासून सुरक्षित ठेवणे आले. त्यातून नियम बनले. पण जागृत देवस्थान म्हटले गेल्यावर जनसामान्यांना तेच पावरफुल वाटते आणि लोकांचा गार्‍हाणे मांडण्यासाठी तिकडेच ओढा असतो. ४. इतर धर्माच्या प्रार्थळास्थळांशी अजिबात तुलना करू नये कारण हिंदू हा व्यक्तिगत धर्म(आचरण) आहे. इतर धर्म हे सामुहिक धर्म आहेत. चर्च, गुरुद्वारा, मशीद इथे आपणास एकसमानता दिसून येईल की अनेक लोकांना एकत्र बसता येईल असा हॉल असतो. जिथे प्रार्थनास्थळ बांधतांनाच समाजाचा विचार केला गेला आहे तिथे 'कुणास मनाई करावी' हा विचारच मुलतः येणार नाही हे सरळ आहे. काळ्यांसाठी वेगळे चर्च असतील तर ते सरळ डिस्क्रिमीनेशन आहे. (आजकाल म्हणजे गेल्या वीस-तीस वर्षांतील नवीन मंदीरांच्या रचना बघितल्या तर आता समुहासाठी अशी खास मंदीरे गाव-शहरामधे चर्चच्या शैलीत बांधली जाऊ लागली आहेत. ज्यात हॉल बराच मोठा असतो, देवाची मुर्ती भींतीला टेकलेली असते, गाभार्‍यात पुजारी आणि दानपेटी राहील एवढीच जागा असते. देवाला स्पर्श करू शकत नाही. इथे आता एक क्रांती घडलेली आहे. या प्रकारच्या मंदिरांमधे कुणालाही प्रवेश बंदी नसते.) ५. देव चराचरात आहे, ज्याला जिथे भाव प्रकट होईल देव तिथे प्रकट होतो. म्हणून इथे-तिथे कुठेही दगडाला शेंदूर फासून अगरबत्ती लावलेली दिसून येते. मरीआई, म्हसोबा, सटवाई, आसरामाता, अशा जनसामान्यांच्या श्रद्धा स्विकारत भारतात लाखो ठिकाणी आहेत. इथे येता जाता कोणी नमस्कार करू शकतो. अगदी गायींपासून ते झाडांपर्यंत लोक दर्शनं घेत असतात. तिथं कोणालाही बंदी नसते. स्त्री, रजस्वला, दलित, कोणीही निषिद्ध नसतो. कारण तो सर्वांचा देव असतो, 'निसर्गदेव' असतो. असे सगळे आहे तर मग लक्षात येईल की काही विशिष्ट मंदिरांमधेच प्रवेशबंदी का? पण अशी प्रवेशबंदी असलेली मंदीरे किती आहेत? असली तरी ती खाजगी मालकीची किंवा विशिष्ट जातींसाठीची आहेत. तिथे त्यांचेच नियम चालणार. या नियमांविरुद्ध अपील होऊच शकत नाहीत त्याचे कारणे कितीही मूर्ख वा अवैज्ञानिक असली तरी. ते तिथे भेट द्यायला जाणार्‍यांना मान्य असलीच पाहिजेत. कारण नाहीतर विसंगती निर्माण होईल. जी शशीं प्रकरणात झाली, सबरीमाला प्रकरणात झाली. तुम्ही शनिदेवाला मानता पण त्याचे नियम नाही. हे मजेशीर आहे. त्यामुळे मंदिरांमधे प्रवेशबंदीला मी समर्थन देतो. एखादा देव मी मानतो तर त्याचे सगळे नियम मला मान्य असलेच पाहिजेत. शिवपिंडीवर मी मेणबत्ती नाही लावणार किंवा चादर नाही घालणार. व्यक्तिस्वातंत्र्याच्या, सन्माननीय वागणुकीच्या नावाखाली मला हे सर्व करण्याचा अधिकार आहेच. पण तो मूर्खपणा आहे ना? यावर उपाय काय? तर देव चराचरात आहे. प्रत्येक घरी गणपती बसतो, प्रत्येकाच्या घरच्या गणपतीत सेम देवत्व येतं. लाखो ठिकाणी शिवालयं, राममंदीरं आहेत, सगळीकडे प्राणप्रतिष्ठापना केलेले देव आहेत. मग दलितांनी, स्त्रियांनी आपल्यासाठी मंदीर बांधून घ्यावं, तिथेही तोच देव, तेच वातावरण करावं आणि सिद्ध करावं की देव ठायीठायी आहे, तुम्ही त्याला तुमच्या मंदिरात डांबुन ठेवुन मूर्खपणा करत आहात. पण असे होत नाही, झाले नाही. रजस्वला स्त्रियांना प्रवेशबंदी हा एक तांत्रिक मुद्दा बाजूला ठेवला तर दलितांना मंदिरात प्रवेश हा अनेक प्रश्नांना जन्म देणारा आहे. दलितांना मंदिरप्रवेश नाकारणे हा सरळ सरळ सामाजिक भेदभावाचा प्रश्न आहे. तो काही एका दिवसात तयार झालेला नाही. मंदिरात प्रवेश आहे म्हणून फार उचित सन्मान मिळतो असेही नाही हे देवदासींकडे, वाघ्यामुरळी, इत्यादींकडे बघुन कळते. त्यामुळे मंदिरात प्रवेश म्हणजे लगेच पाटील-ब्राहमणांच्या पंगतीत जेवायला मिळेल, त्यांच्या स्वयंपाकघरात प्रवेश मिळेल असे काही नव्हते, आणि झालेही नाही. (शहरातली उदाहरणे देऊ नये) ज्या देवाचा धर्म आपल्यासारख्या माणसाशी अमानुष वागण्याचे नियम बनवतो तो देव आपण कशाला मानावा हा विचार रुजवणे आवश्यक होते. जे आंबेडकरांनी अगदी योग्य पद्धतीने केले. जिथे आपल्याला सन्मान नाही तिथे जावेच कशाला हा साधा प्रश्न माझ्या 'लाथ' या शब्दामागे आहे. तुम्ही पाण्याचे उदाहरण दिले. तडजोडीबद्दल बोलत आहात. ज्या देशात रोटी-बेटी व्यवहार आपल्याच पोटजातीत व्हावे हा आग्रह असतो, तिथे मंदिरप्रवेशाने फार काही बदलत नाही. लोकांना आपल्याच जातीत, पोटजातीत मुली, मुलं बघावी लागतात. कितीही समकक्ष, समविचारी, जीवश्चकंठश्च मित्र असले तरी दोन वेगळ्या जातीत अरेंज मॅरेज होऊ शकत नाही हे स्वता:च्या डोळ्यांनी पाह्यलंय. इथे जी केली जाते ती अप्रत्यक्ष तडजोड नाही का? जात बंद, देव बंद, पंगत बंद अशा समाजाला 'लाथ' नाही मारायची तर का पूजा करायची काय? ह्याच सगळ्याला कंटाळून गावातील लोकांचा ओढा शहरांकडे वाढत असणे हे एक प्रकारे लाथ मारणेच आहे, तडजोड नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. बाकी माझ्या मतांशी प्रत्येकाने सहमत व्हावे असे नाहीच. तरी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय Tue, 12/01/2015 - 11:13
अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला.. देवाच्या नावावर चालणार्‍या भ्रष्ट आचारा बद्द्ल तुमची स्वत:ची काही मते असतील. तुमच्या मतस्वातंत्र्याचा आदर आहे. परंतु दुसर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असली विधाने करणे कृपया टाळा. "सश्रद्ध लोकांनी अंगावर येउ नये" असा स्वतःच कांगावा करत तुम्ही हे असले काहितरी लिहयचे आणि आम्ही ते निमूटपणे वाचुन घ्यायचे ही अपेक्षा चुकीची आहे. यापुढे आपल्याला जे काही समाज प्रबोधन करायचे आहे ते योग्य शब्दात, योग्य भाषेत आणि योग्य प्रकारे कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 11:53
मागचे पुढचे काही न वाचता एक शब्द उचलून कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील सर्वस्वी अशक्य आहे. प्रतिसादात स्पष्ट लिहलंय की "जो देव तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या देवाला लाथ मारा." ज्यांना त्यांचा देव हे सगळे करतो (म्हणजे जवळ करतो, दु:ख दुर करून सुख-सन्मान-शांती देतो) अशी खात्री-विश्वास-श्रद्धा आहे त्यांच्या भावना दुखावणारं हे विधान आहे असं कसं काय ठरवलं जातंय? हे म्हणजे असं झालंय की मी म्हटलं, 'दारू पिणार्‍यांना चाबकाने फोडून काढलं पाहिजे' त्यावर 'दुध' पिणार्‍यांनी आक्षेप नोंदवावा का तर तिथे 'पिणार्‍यां'चा उल्लेख केला म्हणून. कुठल्याही विशिष्ट देवाचे नाव न घेता विधान केलं आहे, त्यात अशा देवाचं वर्णन आहे जो 'देव' ह्या सश्रद्धांच्या संकल्पनेत बसत नाही. मग त्यांच्या धार्मिक भावना का दुखावतात? शंकराला शिवी दिली तर मुस्लिम रागावतील काय? अल्लाहला शिवी दिली तर हिंदु रागावतील काय? जिजसला शिवी दिली तर जैनांना राग येईल काय? माझं विधान धार्मिक भावना दुखावणारं कसं आहे ते पटवून दिलंत तर तुमच्या अपेक्षेबद्दल विचार करता येईल. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 11:55
हे वाक्य असे वाचावे: मागचे पुढचे काही न वाचता एक शब्द उचलून कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील तर सर्वस्वी अशक्य आहे.

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे Tue, 12/01/2015 - 12:42
"जो देव तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या देवाला लाथ मारा." डांगे साहेब हेच विधान जर आपण असे वाचले तर? "जो "बाप" तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या "बापाला" लाथ मारा." असे पटेल काय? आपण नास्तिक असाल पण शेवटी प्रत्येक माणसाची एक श्रद्धा असते( ती असणे बरोबर कि चूक हा एक वेगळा मुद्दा असू शकतो) त्याला आपण इतक्या सहज ठोकर मारता हे पटले नाही.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 13:22
डॉक्टरसाहेब, जो "देश/समाज/धर्म" तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या "देश/समाज/धर्माला" लाथ मारा. असंही वाचून बघा. मला नक्की काय म्हणायचे ते लक्षात येईल अशी अपेक्षा आहे.

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय Tue, 12/01/2015 - 12:49
आपल्याकडून अश्याच आक्रस्ताळ्या प्रतिसादाची अपेक्षा होती. तुम्ही तुमची वाक्य नीट वाचत नाही किंवा तुम्ही काय लिहिता ते तुमचे तुम्हाला कळत नाही. किंवा कदाचित मुद्दाम वाद निर्माण करण्यासाठी तुम्ही असले वाचाळ प्रतिसाद देता. पहिली गोष्ट म्हणजे तुमची दोन्ही वाक्ये वेगळी आहेत. ती एकत्र करुन लिहिली असतीत तर कदाचित वरचा प्रतिसाद तरी ग्राह्य धरला असता. दुसरी गोष्ट म्हणजे "लाथ मारा देवाला" हे पुर्णपणे अमान्य, अग्राह्य, अस्थायी आहे. तुम्हाला तुमच्या देवाबद्दलच्या भावना योग्य शब्दात मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे. पण देवाला लाथा मारा, त्याच्यावर थुंका, मुता (उरलेले दोन शब्द तुम्ही लिहिलेले नाहित. ते उदाहारणार्थ दिले आहेत) असली अग्राह्य भाषा ही मुळात एखाद्याच्या श्रद्धेबद्दल असलेली कमालीची असहिष्णुता दर्शवते. तुम्हाला तुमचा नास्तिकपणा गोंजारत बसण्याचा पुर्ण अधिकार आहे. मात्र हे करताना आस्तिकांच्या भावनेविषयी अनादर दाखवणे हे हीनपणाचे लक्षण आहे. चूक स्पष्टपणे दाखवल्यावर ती मान्य करुन दुरुस्त करण्यापेक्ष दुरुत्तरे करणे, वाद घालणे, आक्रस्ताळेपणा करणे हाच जर तुम्ही तुमचा युएसपी करु इच्छित असाल तर नाईलाज आहे. योग्य त्या भाषेत सर्वांनाच उत्तरे देता येतील. मात्र हे करताना "देवाला लाथा घाला" असली दळभद्री भाषा वापरणे किंबहुना कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी उगाच काड्या सारण्यासाठी असंस्कृत भाषा वापरणे आमच्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे प्रतिवाद करताना थोड्या मर्यादा जरुर येतील पण मलातरी पातळी सोडुन बोलणे शक्य होणार नाही. कुठल्याही विशिष्ट देवाचे नाव न घेता विधान केलं आहे, त्यात अशा देवाचं वर्णन आहे जो 'देव' ह्या सश्रद्धांच्या संकल्पनेत बसत नाही. मग त्यांच्या धार्मिक भावना का दुखावतात? शंकराला शिवी दिली तर मुस्लिम रागावतील काय? अल्लाहला शिवी दिली तर हिंदु रागावतील काय? जिजसला शिवी दिली तर जैनांना राग येईल काय? माझं विधान धार्मिक भावना दुखावणारं कसं आहे ते पटवून दिलंत तर तुमच्या अपेक्षेबद्दल विचार करता येईल. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल. तुम्ही कुठल्याही विशिष्ट धर्माचे नाव घेतले नाही म्हणुभाते धार्मिक भावना न दुखावणारे विधान आहे हा तर्क अजब आहे. देव ही वैश्विक संकल्पना आहे. किंबहुना जगातल्या ९९% धर्मांचा गाभा देव हाच असेल. देवाला कुठल्या स्वरुपात पहायचे याबद्दलचे प्रत्येक धर्माचे निकष वेगळे असु शकतील. पण म्हणुन देव ही संरचना नाकारता येतच नाही. एखाद्या अज्ञेयवाद्यासाठी देवाचे अस्तित्व नसणे हा समज योग्य असु शकतो पण जगाच्या पाठीवरील बहुसंख्य धर्मात देवाचे अतित्व मान्यच आहे. तुम्ही या संरचनेला उद्देशुनच "लाथा घाला" असे म्हटले आहे. इथे ते हिंदुंच्या देवासाठी म्हटले किंवा मुसलमानांच्या देवासाठी म्हटले हा मुद्दा पुर्णतः गैरलागू आहे. किंबहुना मुस्लिमांच्या देवासाठी बोललात तर धार्मिक भावना दुखावणार नाहित आणी हिंदुंच्या देवाबद्दल बोललात तर दुखावतील असेही काही नाही. वाटल्यास "मुस्लिमांचा देव" असे स्पष्टपणे लिहुन मग त्याला "लाथा घाला" असे वक्तव्य खुषाल करुन पहा. मला ते ही आवडणार नाही. पण तुम्हाला प्रयोग करुन बघायचा असेल तर करा की. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल. गंमतच आहे. कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली. उद्या तुम्ही म्हणाल की माझ्या वरील विधानावरुन माझा स्त्रीशिक्षणाला विरोध आहे असे समजावे लागेल. आता असल्या फालतु तर्कांना मी कं क्रवे ब्रं? ज्याची त्याची जाण समज वगैरे वग्रै.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 13:18
पण देवाला लाथा मारा, त्याच्यावर थुंका, मुता (उरलेले दोन शब्द तुम्ही लिहिलेले नाहित. ते उदाहारणार्थ दिले आहेत) हे अतिशय चिंताजनक आहे. आपण एखादं विधान कुठल्या बाजूने झुकणारं आहे हे स्वतःच ठरवून मो़कळे होता हे आधी मंत्रीमंडळाच्या विधानाबद्दल जे झालं तिथेच लक्षात आलं. इथेही तेच. ज्या वाक्याचा साधा अर्थ देवाला बंदिस्त करणार्‍या व्यवस्थेला नाकारा इतकाच अभिप्रेत आहे. 'लाथ घाला' म्हणजे तिथे जाऊन प्रत्यक्ष मुर्तीवर लाथ घाला असेच म्हटले असे तुम्ही कशावरून ठरवले? त्या विधानाला दुसर्‍या बाजूने ढकलत नेऊन 'थुंका-मुता' इथपर्यंत घेऊन जाणे, वरून मला असंच म्हणायचे होतं असे अर्थ काढणे म्हणजे वा! तुमची 'देव ह्या संकल्पनेला विरोध करणार्‍यांबद्दलची' स्वतःची मते माझ्यावर लादू नये अशी प्रांजळ प्रार्थना. कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली हेच तुम्हाला आणि इतरांना ज्यांनी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला त्यासाठी म्हणावेसे वाटते. माझे इतर धाग्यांवरचे ह्याच विषयाशी संबंधीत प्रतिसाद आपण वाचलेले नाहीत असे दिसते. तसेच माहितगार यांना जो प्रतिसाद दिला व त्याचे शेवटचे वाक्य उतावीळपणाच्या भरात आपण वाचलेले नाही असेही दिसते. अन्यथा आपण असा प्रतिसाद टाकलाच नसता. बाकी कोणत्या प्रॉडक्टचा युएसपी काय असावा हे कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार ठरते हे आपणास मी काय सांगावे. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय Tue, 12/01/2015 - 14:42
हे अतिशय चिंताजनक आहे. आपण एखादं विधान कुठल्या बाजूने झुकणारं आहे हे स्वतःच ठरवून मो़कळे होता हे आधी मंत्रीमंडळाच्या विधानाबद्दल जे झालं तिथेच लक्षात आलं. इथेही तेच. तुम्ही काय लिहिता ते तुमचे तुम्हालाच कळत नाही वगैर वगैरे जे मी वरती लिहिले आहे. त्याचा संदरभ मंत्रिमंडळाचा धागच होता. तिथेही तुम्ही चुकीचे लिहुन माती खाल्ली आणि मग सारवासारव केली. इथेही तेच करत आहात. तुम्ही चुकीच्या प्रकारे लिहिता म्हणुन आम्हाला कळफलक बडवावा लागतो. ज्या वाक्याचा साधा अर्थ देवाला बंदिस्त करणार्‍या व्यवस्थेला नाकारा इतकाच अभिप्रेत आहे. 'लाथ घाला' म्हणजे तिथे जाऊन प्रत्यक्ष मुर्तीवर लाथ घाला असेच म्हटले असे तुम्ही कशावरून ठरवले? तुम्ही जे लिहिले आहे तेच मी उद्ध्रूत करतो आहे. तुम्ही स्पष्ट शब्दात "अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला.." असे लिहिले आहे. इथे "लाथा मारा" आणि "च्यामायला त्या" या दोन्ही शब्दसमूहांना माझा आक्षेप आहे. आणि तुम्ही जे लिहिले आहे तेच मी परत टंकले आहे. तुम्ही स्पष्ट लिहित जा म्हणजे नंतर असली सारवासारव करावी लागणार नाही. तुम्ही चुकीचे लिहित आहात आणि वर कांगावा करत आहात. हे पहिल्यांदा होते आहे असे नाही. पण इतर वेळेस तो मनुष्यस्वभाव म्हणुन सोडुन देता येइल. इथे धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये जाणुनबुजुन करुन तुम्ही वातावरण दूषित करत आहात. त्या विधानाला दुसर्‍या बाजूने ढकलत नेऊन 'थुंका-मुता' इथपर्यंत घेऊन जाणे, वरून मला असंच म्हणायचे होतं असे अर्थ काढणे म्हणजे वा! बघा. तुम्हीच किती आक्रस्ताळेपणा करत आहात. मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही 'थुंका-मुता' लिहिलेले नाही. लाथा घाला हे काही फार वेगळे वक्तव्य आहे असे नाही. बाकी मी अर्थ काहिच काढलेला नाही,. तुम्ही स्पष्टपणे लिहिलेले आहे. "तु गाढव आहेस. कुत्रा आहेस तु" असे लिहायचे आणि वर तोंड करुन म्हणायचे की "तु गाढवासारखा कष्टाळु आणि कुत्र्यासारखा प्रामाणिक आहेस असे मला म्हणायचे होते. तु चुकीचा अर्थ काढतोस" तर ती निव्वळ सारवासारव झाली. इथे स्पष्ट शब्दात "लाथ मारा च्यायला त्या देवाला.." असे लिहिले आहे तुम्ही. अर्थ काढायला पण वाव नाही ठेवलेला. तुमची 'देव ह्या संकल्पनेला विरोध करणार्‍यांबद्दलची' स्वतःची मते माझ्यावर लादू नये अशी प्रांजळ प्रार्थना. मी कुठलीही मते लादत नाही आहे. तुम्ही ओझे वाहत चालला आहात त्याला मी काय करणार? कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली काहीही बोलण्याची हद्द तर तुम्ही केली आहे. माझे इतर धाग्यांवरचे ह्याच विषयाशी संबंधीत प्रतिसाद आपण वाचलेले नाहीत असे दिसते. तसेच माहितगार यांना जो प्रतिसाद दिला व त्याचे शेवटचे वाक्य उतावीळपणाच्या भरात आपण वाचलेले नाही असेही दिसते. अन्यथा आपण असा प्रतिसाद टाकलाच नसता. स्वतः उतावीळपणे बेताल वक्तव्ये करायची आणी मग चोर तो चोर वर शिरजोर या न्यायाने तोंड वर करुन बोलायचे ही सवय आपली असावी. आमची नाही. बाकी कोणत्या प्रॉडक्टचा युएसपी काय असावा हे कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार ठरते हे आपणास मी काय सांगावे. प्रॉडक्टचा युएसपी प्रॉडक्टवरच ठरतो. त्यातले इंप्रोव्हायझेशन कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार होते.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 15:05
मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही 'थुंका-मुता' लिहिलेले नाही. लाथा घाला हे काही फार वेगळे वक्तव्य आहे असे नाही. बाकी मी अर्थ काहिच काढलेला नाही,. तुम्ही स्पष्टपणे लिहिलेले आहे.
तुम्हाला हिस्टरी चॅनलवरचा हा माणूस आठवतो काय? अगदी असंच बोलतो. cc

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय Tue, 12/01/2015 - 19:50
नाय ब्वो. आम्हाला काही असला कोणी माहिती नाही. पण वरचा तो फोटो बघुन कळाले की तुम्ही फक्त चुकीचे लिहितच नाही तर चुकीचे अर्थ पण काढता. तुम्ही जरा मराठी भाषा समजुन उमजुन लिहित चला बरे म्हणजे तुमच्याच डोक्यात गोंधळ कमी उडेल.

नूतन सावंत Mon, 11/30/2015 - 19:03
यावरून इंदिरा गांधीन पंतप्रधान असतानाही तिरुपती मंदिरात जाण्यास विरोध झाला होता त्याची आठवण झाली.तेव्हा इंदिरा गांधी मंदिरात न जाता परत गेल्या होत्या त्याची आठवण झाली.

In reply to by नूतन सावंत

बोका-ए-आझम Mon, 11/30/2015 - 19:45
केरळातील गुरुवायूर येथील प्रसिद्ध अय्यप्पा मंदिरात हा विरोध झाला होता. त्याचं कारण ते कार्तिकेयाचं (जो अखंड ब्रम्हचारी समजला जातो) मंदीर आहे असं सांगण्यात आलं होतं. तिरुपती मंदिरात असं काही असल्याचं पाहण्यात किंवा ऐकण्यात आलेलं नाही. चूभूद्याघ्या.

In reply to by नूतन सावंत

राही Tue, 12/01/2015 - 10:17
मला वाटते उडीशातल्या जगन्नाथ मंदिरात(ही) असा विरोध झाला होता. त्यांच्या हत्येआधी एक दोन दिवस. इंदिरा गांधींचे शेवटचे जाहीर भाषण या उडीशा दौर्‍यातले होते आणि 'माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून भारताला संजीवन मिळेल' या अर्थाच्या शब्दांमुळे कायम स्मरणात राहाण्याजोगे झाले आहे.

अजून एक गोष्ट दैनिकात वाचण्यात आली की भारतातील शंभर टक्के साक्षर म्हणुन मिरवणार्‍या केरळ राज्यातील घटना. आपण अजूनही मानसिकरित्या कसे विकलांग आहोत हे दर्शविणारी ही घटना. केरळमधील पठाणमधिटा जिल्ह्यात असणार्‍या सबरीमला मंदिराचे विश्वस्त यांनी एका मशीनची मागणी केली आहे. हे स्कॅनिंग मशीन मंदिराच्या सुरक्षेसाठी असेल असे वाटले परंतु तसे ते नाही. तर या मशीनद्वारे महिलांची पवित्रता सिद्ध केली जाणार आहे. मंदिर विश्वस्तांना असे वाटते की मासिक धर्माच्या काळात स्त्रीया अस्वच्छ आणि अपवित्र असतात. आता स्कॅनिंग करणारं मशिन मासिक धर्म असणार्‍या स्त्रीया ओळखणार आहे. आणि अशा ओळखलेल्या गेलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. कारण अशा विटाळलेल्या महिलांमुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता वाटते. जी गोष्ट नैसर्गिक आहे त्यामुळे देवालाही विटाळ होतो ? स्त्रीयांनी या गोष्टीला विरोध म्हणुन हॅपी टू ब्लीड ही चळवळ सुरु केलीच आहे. आपण ब्वॉ ही गोष्ट सबरीमला देवावर आणि शनिमहाराजावर सोडून दिली आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सतिश गावडे Mon, 11/30/2015 - 22:39
दुर्दैव... मंदिरातील देवाचं आणि त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ इच्छिणार्‍या स्त्रीयांचं.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

pacificready Mon, 11/30/2015 - 23:09
विश्वस्तांचा निषेध. बुद्धीची कीव कराविशी वाटते. देवस्थान सुधारा भगव्यान्नो आधी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करेक्ट ! पुरोगामी विचारांच्या लोकांनी ह्यॅप्पी टु ब्लीड वगैरे आंदोलने करत बसण्यापेक्षा असल्या दगडाच्या देवावर आणि संस्थानांवर बहिष्कार टाकावा . ह्याचे दुहेरी फायदे आहेत पुढील प्रमाणे १) पुरोगामी लोकांन्ना पुरोगामित्वाचा आनंद आणि समाधान मिळेल. २) परंपरावादी लोकांन्ना मंदीरात गर्दी कमी झाल्याचा अन निवांतपणे दर्शन घेता आल्याचा आनंद मिळेल. आणि एकच की परंपरावादी लोकांनी स्वतःच्या हुच्चतेची जाहिरात करु नये अन पुरोगामी लोकांनी त्यांन्ना चणे फेकुन मारु नयेत , बस्स इतकेच जमले तर सर्वेत्र सुखिनो सन्तु: हे साध्य होईल !! :)

गामा पैलवान Mon, 11/30/2015 - 23:25
च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे उमाळे दाटल्यावर संबंधितांना हिंदूंची मंदिरेच बरी आठवतात! एव्हढाच जर पुळका आला असेल तर स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी म्हणतो मी. कोणी अडवलंय! -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार Tue, 12/01/2015 - 10:48
च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे उमाळे दाटल्यावर संबंधितांना हिंदूंची मंदिरेच बरी आठवतात!
आपण धागालेख नीट वाचला आहेत का ? स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करताना हा धागालेख कोणत्याही एकाच विशीष्ट धर्माला लक्ष्य बनवत नाही हे लेखाच्या शेवटी स्पष्ट नमूद केले आहे, अशा स्वरूपाच्या असमानता राखणार्‍या सर्वच धर्मसंस्थांच्या प्रबोधनाचे आवाहन या धागालेखातून आवाहन केले आहे. शनि शिंगणापूर हे केवळ चर्चा सुरवातीसाठी निमीत्तमात्र आहे. केवळ शनि शिंगणापूरला लक्ष्य बनवायचे असते तर धागा लेखाचे शीर्षक तसे लिहिले असते, ध्रर्मसंस्था आणि धर्मस्थळे संबंधाने पक्षपात टाळण्याचा अधिकतम प्रयास केला आहे.
एव्हढाच जर पुळका आला असेल तर स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी म्हणतो मी. कोणी अडवलंय!
गा.पै. आपल्या या वाक्याचा नेमका अर्थ लक्षात आला नाही अर्थ काय होतो ते कृपया स्पष्ट कराल काय ? म्हणजे इतरांना चर्चा करता येईल

In reply to by माहितगार

गामा पैलवान Tue, 12/01/2015 - 19:59
माहितगार, माझं म्हणणं अधिक व्यवस्थित शब्दांत मांडता आलं असतं. ते न केल्यामुळे तुमची आणि वाचकांची क्षमा मागतो. १.
स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करताना हा धागालेख कोणत्याही एकाच विशीष्ट धर्माला लक्ष्य बनवत नाही हे लेखाच्या शेवटी स्पष्ट नमूद केले आहे,
बरोबर आहे. जे लोकं मंदिरांतल्या विविध प्रथांना स्त्रीपुरुष भेदभावाचा रंग देऊ इच्छितात त्यांच्यासाठी माझा प्रतिसाद आहे. धागाकर्त्यासाठी नाही. २.
आपल्या या वाक्याचा नेमका अर्थ लक्षात आला नाही अर्थ काय होतो ते कृपया स्पष्ट कराल काय ? म्हणजे इतरांना चर्चा करता येईल
जिथेतिथे स्त्रीपुरुष समानता बघायची ज्यांना हौस आहे त्यांनी स्वत:च्या शरीराकडे बघायला शिकावं. आपलं शरीर आणि मन हेच मुळी स्त्रीपुरुष भेदभावावर आधारलेलं आहे. उगाच मंदिरबिंदिर अशा बाह्य ठिकाणी समानता पैदा करण्याऐवजी स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी. आ.न., -गा.पै.

एस Mon, 11/30/2015 - 23:36
'देव दानवां नरे निर्मिले' आणि त्यांचे नियमही. देव जर असलाच तर त्याच्यापाशी कसला भेदभाव असूच कसा शकेल? शनिशिंगणापूरच्या गावकर्‍यांनी शनिदेवाला दुधा-तेलाचा अभिषेक घालून स्वतःच्या कोतेपणाचे दर्शन घडवले आहे. देवाला विटाळ घडविणारीही माणसेच. आणि देवाचे शुद्धीकरण करणारीही माणसेच! अजब आहे सगळे...

In reply to by एस

सर्वच प्रस्थापित धर्मांमधे एक अनुस्यूत घटक म्हणून हा दुजा-भाव पहिल्या पासून आहे....ज्याना बदलायच आहे त्यानी बिनदिक्कत बदलाव.. धर्म आपोआप बदलेल..ज्याना जाणीव पूर्वक मागास रहायच असेल,त्यांना राहु द्यावे. ते आपोआप गाळात जातील. दुसरे धर्म बदलत नाहीत,मग आम्ही तरी का बदलाव? अस म्हणणाय्राना तर बदलाची इच्छा असलेल्यानी मुद्दाम स्वत: बदलून त्याची ताकद कमी करावी. जोपर्यंत इथे लोकशाही आहे , तो पर्यंत हे सहज शक्य आहे

In reply to by अत्रुप्त आत्मा

हो , व्यक्तिगत पातळीवर सत्यनारायणासारखी सरळ सरळ लुबाडणुक करणारी पुजा अन अन्य कर्मकांडे संपुर्णपणे बंद करणे आम्हाला जमले आहे :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

माहितगार Tue, 12/01/2015 - 11:45
@ अत्रुप्त एक चांगाला प्रतिसाद, असा प्रतिसाद देण्यासाठी धारीष्ट्य लागते. बाकी प्रगोंंच्या प्रतिसादाबाबत; सत्यनारायण कथेत कुठे दुजाभाव असण्याबद्दल अजून एकदा अभ्यासावी लागेल पण तरीही -सत्यनारायण कथेतील काही विश्वास तुर्तास बाजूस ठेवले तर- सत्यनारायण सर्वांचा समान सहभाग वाढवण्यास उपयूक्त आहे का त्या बाबत त्यात भेदभाव कमी असावा अंदाजा आहे जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by कवितानागेश

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 09:50
धागालेखकांनी एकाच धाग्यात दोन वेगवेगळे मुद्दे मांडलेत. मला तरी दोन्हींची सांगड कशी घालावी हे कळले नाही. माझ्यामते 'समानतेचे तत्त्व' पुरुषवर्गाला समजावून सांगण्यात स्त्रिया कमी पडतात असे त्यांना म्हणायचे आहे. आता समानतेचे तत्त्व न पाळणार्‍यांमधे स्त्रि-पुरूष असा काही भेद दिसून येत नाही. त्यामुळे तो मुद्दा रद्दबातल होतो. बहुतेक 'पुरूषांसोबत अर्ग्युमेंट मधे स्त्रिया कमी पडतात' असे त्यांना म्हणायचे आहे काय असा मला प्रश्न पडला कारण मग हा जरा गंमतीदार विषय होइल. शिर्षक वादग्रस्त असावे याचसाठी केला होता अट्टाहास असे वाटत आहे. धागालेखकांनी यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.

In reply to by संदीप डांगे

माहितगार Tue, 12/01/2015 - 11:05
बहुतेक 'पुरूषांसोबत अर्ग्युमेंट मधे स्त्रिया कमी पडतात' असे त्यांना म्हणायचे आहे काय असा मला प्रश्न पडला कारण मग हा जरा गंमतीदार विषय होइल.
=)) अहो काहीही काय ? =)) एनीवे हा विषय या धागा लेखाच्या परिघातला नाही. बाकी धागा लेखाचा मुद्दा क्रमांक १ तुर्तास चर्चेसाठी पुरेशी हिंट देणारा आहे असे वाटते. अधिक स्पष्टीकरण म्हणजे प्रश्नही मीच विचारला उत्तरही मीच दिले होईल म्हणून चर्चा बरिच पुढे गेल्यावर अथवा संपताना देईन.

In reply to by कवितानागेश

नीलमोहर Tue, 12/01/2015 - 09:58
" शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे." मोठ्या अपेक्षेने धागा उघडला होता या विषयी काही उपयुक्त माहिती मिळेल म्हणून, पण हे 'उल्लू बनाया बडा मजा आया' असं झालं आहे. बाकी जिथे आपलं स्वागत आहे तिथे जावं, जिथे नाही त्याचा विचारही करू नये असं आमचं तत्व. आमच्या आवडत्या तळ्यातल्या गणपतीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात, तिथे जाऊन डोकं टेकून यायचं. दर्शनासाठी न येता कचरा करायला येणार्‍या बुरखेधारी भक्तांना नो एंट्री, असा फलक न लावलेलं सहिष्णू देवस्थान आहे ते.

गॅरी ट्रुमन Tue, 12/01/2015 - 11:04
स्त्रियांना किंवा अन्य कोणालाही मंदिर प्रवेशापासून रोखणे अयोग्य आहे याविषयी फारसे दुमत नसावे. पण मंदिरात जाऊन काय होते, सगळी मंदिरे बंदच करा वगैरे विचार असणारे लोक हमरीतुमरीवर येऊन चर्चा करताना दिसले की जरा मजाच वाटते. समजा माझे असे मत आहे की दारूचे गुत्ते बंद करून टाकावेत आणि कुठल्या दारूच्या गुत्त्याने "ट्रुमन अडनावाच्या लोकांना प्रवेश नाही" अशा स्वरूपाची पाटी लावली तर त्यामुळे मला काय शष्प फरक पडणार आहे? अन्यथाही मी तिथे जाणार नव्हतोच त्यामुळे बंदी असली काय आणि नसली काय--- हू केअर्स? मंदिरांविरोधात असे मत नसणार्‍या इतर सर्वांचे आक्षेप मात्र नक्कीच ग्राह्य आहेत असे मला वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 11:33
इथे 'स्त्रियांना प्रवेशबंदी हे स्पष्ट भेदभावाचे निदर्शक आहे' हा चुकीचा ग्रह काहिजणांनी करून घेतला आहे असे दिसून येते आहे. त्यामुळे लगेच सामाजिक न्यायतत्त्वानुसार सर्वांना समान हक्क, दर्जा ह्याची भलामण करून सर्वांना मंदिरप्रवेशाचा आग्रह धरला जात आहे. पण हे इतके सरळ, साधे सोपे आहे काय? खरा मुद्दा साधनशुचितेचा आहे. वर काहींनी कपड्यांचे उदाहरण दिले आहे. कुणी बिकिनी घालून मंदिरप्रवेश केलेला चालेल काय? पुरुषांनी भले अंतर्वस्त्रांवर ओलेते गेले तर चालते, पण स्त्रियांनी तसेच करावे असा आग्रह धरून चालेल काय? तिथे समानतेचा आग्रह केला तर मान्य होईल काय? चपला, बूट घालून गेलेले चालेल काय? गुत्त्यात जायचेच नसेल तर प्रश्नच मिटतो पण ट्रुमन यांना गुत्त्यात जायची इच्छा आहे पण वय २१ पेक्षा कमी असल्याने प्रवेश नाकारला जाईल, त्यावेळी सामाजिक समानतेचा मुद्दा का लागू होत नाही हे सांगता आले तर बर्‍याच बाबी स्पष्ट होण्यास मदत होईल. तीच गोष्ट संवैधानिक पदांवरील व्यक्तिच्या वयाच्या अटीची, सरकारी नोकरीच्या पदावरील शैक्षणिक अर्हतेच्या अटीची. प्रत्येक जागी सरसकट प्रवेश नाकारणारे इतर मुद्दे असतात. तिथे भेदभाव होतो असे कसे म्हणता येईल?

बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 12:08
या निमित्ताने उहापोह होतो आहे ही चांगलीच गोष्ट आहे. खुद्द कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळाच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश नव्हता अगोदर, पाळी ऑर नॉन पाळी. तो ब्यान उठल्याचे कळते, तसेच इथेही होईल मोस्टली होपफुली.

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 12:35
शनि मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदीचे कारण कळल्यास ह्या विषयावर अजून विस्तृत व समर्पक चर्चेस मदत होईल म्हणून सामान्य जनमानसात रूढ असलेल्या काही मान्यता: स्त्रियांच्या शनिमंदिर प्रवेशाला खरा कारणीभूत आहे तो मारूतीराया. कसा? तर मारुतीराया, हनुमान हा आजन्म ब्रह्मचारी आहे, शिवाय तो चिरंजीव आहे, परत तो सर्वव्यापी-विशाल आहे. 'हनुमानतत्त्व' असं काही मानल्या जातं. समर्थांनी महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी, गावोगावी मारुतीची प्रतिष्ठापना केली. गावात बलोपसाना व्हावी, त्यातून भक्ती आणि शक्तीची उपासना होऊन चांगले तरूण तयार व्हावे अशी त्यांची योजना. दुसरी मान्यता अशी की गावात मारुतीचे मंदीर असेल तर भूत-प्रेत-पिशाच्च यापासून गावाचे रक्षण होते. तीसरी मान्यता अशी की हनुमान हा जागृत देव आहे. म्हणजे त्याचे आवाहन केले तर तो खरंच त्या ठिकाणी येऊन भक्तांच्या समस्या दूर करतो. तो असे करु शकतो ही मान्यता इतकी घट्ट आहे कारण तो अजून जीवंत आहे, त्याला वेगवेगळे आकार, अवस्था घेता येतात ही मान्यता. त्यामुळे शक्यतो हनुमानमंदिरात गांभिर्य जास्त असते. तो इथेच आसपास आहे, आपण काही उलट सुलट केले तर कानफाटवेल अशीही भीती असते. चौथी मान्यता अशी की हनुमान वीर्यतेजाने संपृक्त आहे. त्याच्या नुसत्या उच्छवासाने वा अवतीभवतीच्या वातावरणाने स्त्रिया गर्भवती राहू शकतात. इतके त्याचे वीर्यतेज बलवान आहे. आता आपल्या लक्षात येईल की याचमुळे कुमारी मुलींना हनुमानमंदिरात बंदी असायची. (असायची असे म्हटले आहे कारण गेल्या १०-१५ वर्षात विचारधारा बदलत गेल्या). अघोरीसदृश्य तंत्रविद्येत मूल न होऊ शकणार्‍या स्त्रीने अनावृत्त अवस्थेत जाऊन मध्यरात्री हनुमानाची विशिष्ट तंत्राने पूजा करून हनुमानत्त्व जागृत करून त्यास प्रसन्न करणे व गर्भवती होण्याची इच्छा पूर्ण करणे असेही विधी आहेत. ह्याचे एक उदाहरण मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहे. म्हणजे मध्यरात्री स्त्री हनुमान मंदिराकडे जातांना पाहिली आहे. ते सर्व दृश्य पार टरकवणारे असते, त्यामुळे पुढे काही बघायची हिंमत झाली नाही. तेव्हा माझे वयही १५-१६ होते. हेच वीर्यतेज नव्याने गृहस्थाश्रमात प्रवेश करणार्‍या नवरदेवाच्या अंगात संचारावे म्हणून लग्नाआधी नवरदेवाला हनुमानमंदिरात दर्शनाला घेऊन जाण्याची प्रथा आहे. आजकाल मानवी अहंकार वाढल्याने ह्या प्रथेचे कारण विचित्रपणे बदलल्याचेही काही ठिकाणी दिसून येते. म्हणजे स्वतःमधे काहीच कमतरता नाही हे दाखवण्यासाठी त्याच्या विर्यतेजाची मला गरज नाही असे म्हणून त्याचे लग्न झाले नाही त्या बिचार्‍या ब्रह्मचार्‍याचा आशिर्वाद चांगला असेल म्हणून दर्शनाला आलो असं काहीसे. एवढं सगळं लक्षात घेतलं तर स्त्रियांनी हनुमानापासून दूर राहावे यामागचे कारण समजुन येईल. आता शनीमहाराजांनी काय घोडं मारलं? तर कुठल्याशा पुराणकथेनुसार शनीमहाराज हे हनुमानाचे अंकित आहेत, साडेसातीत त्रास कमी व्हावा म्हणून शनीसोबतच हनुमानाचीही उपासना करावी म्हणजे हनुमानजी शनीला तंबी देऊन आपल्या भक्ताचे त्रास कमी करून देतात. हनुमानजी आणि शनी हे एकसारखेच मानले जाऊ लागले. ३०-४० वर्षांआधी शनीमंदीर हे काही फार प्रस्थ नव्हते. एखाद्या गावात एखादे दुर्लक्षलेले शनीमंदीर असायचे. आता ते दुर्लक्षलेले नाही हा भाग वेगळा. पण हनुमानमंदिरापेक्षा शनीमंदिरास कमी महत्त्व होते, जे लोक साडेसातीने त्रस्त आहेत तेच तिथे पुजेला जात. पण तिथे गेल्यावरही हनुमानाचेच नियम लावत. परत शनीमहाराजांची कडक असल्याबद्दलची ख्याती. ह्यामुळे स्त्रियांना प्रवेश नाकारणे घडत आले आहे. ह्यात कुठेही भेदभाव, असमानता वैगेरे नाही. अनेक ठिकाणी आता स्त्रिया न घाबरता प्रवेश करत आहेत. काही हनुमान-शनी मंदिरांत अजून कर्मठ व्यवस्था आहे. हळूहळू सर्व बदलणारच आहे. वरील सर्व जनमान्यता आहेत. वैज्ञानिक सत्ये नव्हेत त्यामुळे चर्चा करतांना ह्याचे भान असणे गरजेचे.

pacificready Tue, 12/01/2015 - 12:40
गवि सर, तुमच्या टंचनिकेची- दिसायला ज़रा कमी सुन्दर आणि तत्त्वज्ञानात बऱ्यापैकी पक्की- बहिण डांगे अण्णा कड़े पाठवली आहे ना? खरं सांगा सर.

In reply to by प्रसाद१९७१

माहितगार Mon, 11/30/2015 - 16:45
पॉपकॉर्न सोबत थंडीचे दिवस आले म्हणून गरमागरम विषय चर्चेसाठी दिला आहे, खूप गरम वाटल्यास क्षुधाशांतीसाठी थंड पेयेही सोबत ठेवावीत

In reply to by जेपी

माहितगार Tue, 12/01/2015 - 13:16
तुमच्या शुभेच्छांसाठी मिठाई. पहिल्या दिवसात १०० चा दर बरा असतो का ? धागा लेखातील बर्‍याच मुद्द्यांना अद्याप स्पर्श झाला नाही त्यातील अर्ध्या मुद्द्यांना स्पर्ष केलातरी भरपूर होतील असे वाटते.

कंजूस Mon, 11/30/2015 - 17:20
स्त्रिया बय्राचदा चुलीजवळ असतात.कोणी फुकाचं व्यवहाराला धरून नसलेलं बोललं की " तुझं तत्वज्ञान गेलं चुलीत " +"{ दोनवेळचं गिळण्यासाठी छनछन घेऊन ये मग ऐकते }."हे एक "बेसिक इंस्टिन्क्ट आहे". बाकी शनि काही शिंगणापुरलाच नाही घरातही बनवता येतो.

मितान Mon, 11/30/2015 - 17:25
पहिल्या काही प्रतिसादांमध्ये गांभीर्य आले तरच इथे या विषयावर चर्चा करण्यात अर्थ आहे. अन्यथा वेळ शब्द शक्ती वाया घालवू इच्छित नाही.

संदीप डांगे Mon, 11/30/2015 - 18:09
शशी केसबद्दलः जिथे स्त्रियांना प्रवेशास बंदी आहे अशा प्रार्थनास्थळांमधे त्यांनी जाऊच नये. किंवा कुणीही जाऊ नये. देवाच्या गाभार्‍यावर हे बसलेले चोर का नियम ठरवतात..? बाकीचे का पाळतात? खरंच चालत नसेल (म्हणजे देव कोपत बीपत असेल) तर कोपू दे! ती तरुणी तिथेच शिळा होऊन पडली असती तर देव आहे हे सिद्धही झाले असते, नाही पडली त्यामुळे खरा प्रश्न आणि तमाशा चालू झाला. देव कोपण्याऐवजी गावकरीच कोपलेत. अकलेचे कांदे आणि डोळे असून आंधळे लोक अजूनही शनि-शिंगणापुरास जातात. दलितांच्या मंदीरप्रवेश आंदोलनाबद्दलही मला हाच प्रश्न पडला होता. अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला... जो स्वत: तुम्हाला जवळ घेऊ शकत नाही, तुमचे दु:ख दूर करू शकत नाही तो देव कशाला डोक्यावर घ्यायचा? (देवाने दु:ख दूर करून सुख द्यावे म्हणून लोक देव संकल्पना मानतात, सश्रद्ध लोकांनी अंगावर येऊ नये) दुसरा प्रतिसाद नंतर देतो.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम Mon, 11/30/2015 - 19:50
आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. दुर्दैवाने या अनुषंगाने स्त्रियांना जी सापत्न वागणूक मिळते ती देण्यात इतर स्त्रियाही पुढे सरसावतात.

In reply to by बोका-ए-आझम

आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
ह्याला म्हणतात अनभ्यासातुन आलेले स्वकपोकल्पित निरर्थक अत्मरंजन ! पारश्यांच्या सर्व अग्यारी मधे कितीही हुच्चवर्णीय असला तरीही तुम्हाला प्रवेश दिला जात नाही ... कित्येक अग्यारीबाहेर "पारशी आणि इराणी झोराष्ट्रीयन सोडुन सर्वांन्ना प्रवेश निशिध्द " अशी स्पष्ट पाटी वाचली आहे मी !

In reply to by प्रसाद गोडबोले

बोका-ए-आझम Mon, 11/30/2015 - 22:57
त्यावरून तुम्हाला वाचता येतं याशिवाय दुसरं काहीही सिद्ध होत नाही. पहिले तो 'निशिद्ध'शब्द 'निषिद्ध' असा नीट लिहायला शिका. शंभर वेळा लिहून काढा हवं तर. पारशांच्या धर्मस्थळात फक्त पारशांना परवानगी असते. पुरुष किंवा स्त्री. आणि जे पारशी नसतात त्यांना नसते. पुरुष किंवा स्त्री. इथे धाग्यात उल्लेख नसलेल्या मुद्द्यांवर वाद घालायचा असेल तर परीराज्यात जा. नाहीतर मुद्दा समजून घेऊन नीट वाद घाला. एवढा अभ्यास केलाय त्याचा उजेड पडू दे जरा!

In reply to by बोका-ए-आझम

किती ती असहिष्णुता ! तुमच्या ह्या प्रतिसादातुन वाक्य जसेच्या तसे कॉपी पेस्ट करुन लिहिले आहे >>>> http://www.misalpav.com/comment/777704#comment-777704 १००% सहमत. बोका-ए-आझम - Mon, 30/11/2015 - 19:50 आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. >>>> उगाच स्वतःच्या मनाचे काही घुसडलेले असेल तर दाखवा नाही तर वाक्य लिहायला चुकले असे कबुल करा की राव !! आम्ही आमचा शब्द सुधारतो तुम्ही तुमचे वाक्य सुधारा . हाकानाका.

In reply to by प्रसाद गोडबोले

बोका-ए-आझम Tue, 12/01/2015 - 07:02
तुम्ही खरोखर चूक दाखवली असतीत तर ती मान्य करायला हरकत नव्हती. चूक नसताना उगाचच आक्षेप घेणं याला काय अर्थ आहे? धागा स्त्रियांवरच्या धार्मिक बंधनांची चर्चा करतोय. त्यावर संदीप डांगे यांनी शनि शिंगणापूरच्या घटनेचा संदर्भ दिला. त्यावर मी प्रतिक्रिया दिली. त्याला संदर्भ हा शनि शिंगणापूरसारख्या हिंदू तीर्थक्षेत्रात स्त्रियांवर लादण्यात आलेल्या बंधनांवर होता. पारशांचा संबंध कुठे येतो यामध्ये? पारशी कोणत्याही पारशी नसलेल्या माणसाला त्याची जात/धर्म/लिंग/वर्ण यावरून अपवाद करुन अग्यारीत प्रवेश देत नाहीत. यात मुद्दाम पुरुष आणि उच्चवर्णीयांचा अपवाद केला जात नाही. तसंच कोणत्याही पारशी पुरुष आणि स्त्रीला तिथे प्रवेश असतो. त्यात लिंग आणि वर्ण यावरुन अपवाद केला जात नाही. त्यामुळे तुमचा आक्षेप निरर्थक ठरतो. उद्या स्त्रियांच्या स्वच्छतागृहांमध्ये आणि ट्रेनच्या स्त्रियांच्या डब्यांमध्ये पुरूषांना प्रवेश नसतो असं कुणी तरी म्हणेल. ते विधानही तुमच्या आक्षेपाप्रमाणेच निरर्थक आहे.

In reply to by बोका-ए-आझम

प्रचेतस Tue, 12/01/2015 - 07:18
वेरुळच्या घृष्णेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात मात्र पुरुषांना बनेल काढल्याशिवाय अजूनही प्रवेश मिळत नाही.

In reply to by प्रचेतस

तुषार काळभोर Tue, 12/01/2015 - 11:55
असा नियम असावा. सासवडजवळच्या हिवरे येथील मंदीराच्या गाभार्‍यातसुद्धा बनियन (आणि कमरेचा पट्टा-चामडी वस्तू नको म्हणून) काढून जावं लागतं. कानिफनाथांचं मंदीर हिवर्‍यापासून पुढेजवळच आहे. (शिवमंदीर नसले तरी) तेथेही हाच नियम आहे. या नियमामुळे बाय डिफॉल्ट महिला मंदीर प्रवेशास अपात्र ठरतात.

In reply to by तुषार काळभोर

कवितानागेश Tue, 12/01/2015 - 14:55
मी गोकर्ण, घृष्णेश्वर इथे जाऊन आले आहे. दक्षिणेत अनेक शिवमंदीर्ांमध्ये असा नियम आहे पण तो पुरुषांसाठी. स्त्रियांना तस्सच्या तस्स आत जाऊ देतात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम Tue, 12/01/2015 - 09:49
तरी आपण उत्तरं देतोच ना सर! शिक्षकांच्या व्यवसायात हा occupational hazard असतोच ना! त्यामुळे इच्छा असूनसुद्धा फाट्यावर मारता येत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

सहमत आहे. पण मला अनेक वर्षाच्या जालानुभव सांगतो आपल्याला त्रास होतो पेक्षा थांबणं परवडतं. म्हणजे उद्या एखाद्या मंदिराच्या विश्वस्तानी ठरवलं की महिलांनी यापुढे.... जाऊ देत. पुरुषांना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर नागडं जावं लागेल तरी हे म्हणतील काय होतं मंदिराचे नियम पाळले पाहिजेत. शिकलेले असून सारासार विवेकबुद्धि वापरता येत नसेल तर काय उपयोग शिक्षणाचा. शनीमंदिराचा चौथारा असू देत की रजस्वला असलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश असू देत स्री पुरुषांनी मिळुन जनआंदोलन केलं पाहिजे, देव आहे नाही तो भाग वेगळा. पण प्रवेश बंदी कोणालाच नको. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सर्वांसाठी खुलं केलं त्या प्रमाणे ही आंदोलनं झाली पाहिजेत, असं वाटतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पगला गजोधर Tue, 12/01/2015 - 10:46
शिकलेले असून सारासार विवेकबुद्धि वापरता येत नसेल तर काय उपयोग शिक्षणाचा.
अश्या लोकांना साक्षर म्हणावे, सुशिक्षित नव्हे, भलेही त्यांनी फुरोगामी/विचारजंत असे इतरांना शिव्या घालून हिणवलं तरी… call spade a spade.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 10:50
बिरुटेसर, परस्परविरोधी विधाने करत आहात. सारासारविवेकबुद्धी असेल तर कुणी मंदिरात जाणारच कशाला? मंदिरातले नियम विश्वस्त ठरवत नाहीत, भक्त ठरवतात. भक्तांनी ठरवलेले नियम विश्वस्त पाळतात. पुढे विश्वस्त/पुजारी आपल्या सोयीनुसार ते वळवून घेतात आणि पुढे भक्त हेच नियम पाळायला लागतात. हे ज्या भक्तांना कळत नाही त्यांना नागडे जाण्याचाही नियम मान्य होतो. प्रथा एखाद्याच्या मूर्खपणामुळे तयार होतात. एखाद्याने नागड्याने जाण्याचा नवस केला अन् अनमानधपक्याने फळास आला तर ते पाहून अक्कल गहाण टाकलेले लोक तसेच करायला लागतील. बहुसंख्य तसे करतात पाहून मग तोच नियम होईल आणि तीच प्रथा होईल. मग ते न पाळणार्‍याला देवाचा उपमर्द करत आहे असे म्हणून प्रवेश नाकारला जाईल. कारण मेंढ्यांच्या कळपात ते फिट बसत नाहीत म्हणून. मंदिरात कुणालाच प्रवेशबंदी नसावी असे ज्यांचे मत आहे त्यांना मंदिर ही व्यवस्थाच समजली नाही असे म्हणावे लागते. चर्च, मशिद, गुरुद्वारा, विहार ह्यापेक्षा ही व्यवस्था कशी वेगळी आहे हे खालच्या माझ्या प्रतिसादात सांगितले आहे. काही चार बुकं शिकून अतिशहाणे झालेले लोक तिकडची व्यवस्था पाहून इकडंही तसेच असले पाहिजे ह्या दिव्य विचाराप्रत येतात. त्यांना तिकडचाही अभ्यास नसतो, इकडचाही नसतो. समानतेच्या तत्त्वाचा चुकीच्या ठिकाणी आग्रह होत आहे हे लक्षात येत नाही. जनआंदोलन जर करायचे तर मंदिरात कुणीच जाऊ नये यासाठी करावे. त्यानेच समाजाचे जास्त आणि योग्य भले होईल. सगळी मंदिरेच ओसाड पाडावीत. जिथे बंदी आहे तिथे जबरदस्ती मंदिरप्रवेश ही अतिशय हास्यास्पद संकल्पना आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम Tue, 12/01/2015 - 11:52
आणि मंदिरात जाणं या परस्परविरोधी गोष्टी कशा काय? मंदिरात नवस करणं, तो पूर्ण होईल किंवा होतोच अशी अंधश्रद्धा ठेवणं, त्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी असणं ही सारासारविवेकबुद्धी नसल्याची लक्षणं आहेत हे मान्य, पण मंदिरात निव्वळ जाणं हे सारासारविवेकबुद्धीच्या विरोधात आहे हे पटलं नाही.

In reply to by बोका-ए-आझम

मंदिरात निव्वळ जाणं हे सारासारविवेकबुद्धीच्या विरोधात आहे हे पटलं नाही. सहमत....! योग्य आणि अयोग्य यातील समज . -दिलीप बिरुटे

In reply to by बोका-ए-आझम

राही Tue, 12/01/2015 - 09:30
दक्षिणेतल्या काही देवळांत प्रवेशबंदी नसली तरी पुरुषांना वेष्टि नेसावी लागते. अलीकडे बहुतेक पुरुष ती पँट्वरूनच गुंडाळतात. महिलांना साडी किंवा सलवारकमीज आवश्यक आहे. जीन्स अजूनही काही ठिकाणी चालत नाहीत. चिपळूणमध्ये डेरवण येथे महिलांना नऊवारी नेसावे लागत असे तसेच तेथे महिलांनी महिना असताना आत जाऊ नये अशी पाटीही होती. आताची स्थिती माहीत नाही. अवांतर : काही वर्षांपूर्वी केरळला गेलो असताना एकदा एका देवळात आमच्या मुलांना प्रवेश द्यावा की नाही याबद्दल तिथल्या पुजार्‍यांमध्ये चर्चा झाली. तिथल्या मुख्य प्रशासकाला बोलवण्यात आले. कारण मजेशीर होते. त्यावेळी तिथे आम्हीच फक्त उत्तरहिंदुस्तानी होतो आणि मुलांचा वर्ण तांबूस गोरा आणि केस पिंगट ही बाब तिथल्या समुदायात वेगळी दिसत होती. कदाचित परदेशी पाहुणी मुले एक्स्चेंज कार्यक्रमातून आली असतील असा संशय त्यांना आला होता. (केरळमधे बरेच परदेशी लोक येतात.) त्यांची समजूत पटवण्यात थोडा वेळ गेला. रांगेतल्या मागच्या लोकांचा खोळंबा झाला नाही कारण आम्हांला रांगेतून बाहेर काढले होते. थोड्या वेळाने सर्व ठीक झाले.

In reply to by राही

मितान Tue, 12/01/2015 - 09:43
विजारीवरून वेष्टी एवढा बिनडोक भंपकपणा मी कोणत्याच देवळात पाहिला नाही! एका ठिकाणी मला सलवारवरून ते कळकट कापड ते ही भाड्याने घेऊन नेसले तरच मंदिरात जाता येईल असे सांगून अडवले. त्याचवेळी २ फिरंगी स्कर्टवाल्या मुलींना मात्र वाकून नमस्कारासह प्रवेश मिळाला. हे बघून मला त्या आतल्या देवाचीच कीव आली. तसंही मला जाऊन न जाऊन काही फरक पडत नसल्याने बाकीच्यांचे दर्शन होईस्तवर मी देवळाबाहेरच्या दुकानांना माझे दर्शन देऊन आले.

In reply to by मितान

पगला गजोधर Tue, 12/01/2015 - 10:41
हे बघून मला त्या आतल्या देवाचीच कीव आली. तसंही मला जाऊन न जाऊन काही फरक पडत नसल्याने बाकीच्यांचे दर्शन होईस्तवर मी देवळाबाहेरच्या दुकानांना माझे दर्शन देऊन आले.
तै मस्तच, मी सुद्धा जेजुरीला धन्दा होताना पाहीला, तेव्हा मी सुद्धा आत गेलो नाही.

In reply to by मितान

बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 12:03
नै म्हणजे जो काय नियम आहे तो तरी सारख्या प्रमाणात राबवावा. हे असली चाटूगिरी डोक्यात जाईल नै तर काय!

In reply to by राही

गॅरी ट्रुमन Tue, 12/01/2015 - 11:18
चिपळूणमध्ये डेरवण येथे महिलांना नऊवारी नेसावे लागत असे तसेच तेथे महिलांनी महिना असताना आत जाऊ नये अशी पाटीही होती. आताची स्थिती माहीत नाही.
मी या वर्षी जानेवारीतच तिथे गेलो होतो. तिथे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही घटनांचे पुतळे आहेत आणि वालावरकर महाराज म्हणून कुणा महाराजांची समाधी आहे. पुतळ्यांच्या ठिकाणी असे वेषभूषेवर बंधन नाही.पण समाधीच्या ठिकाणी जायचे असेल तर स्त्रियांना "वयोमानानुसार फ्रॉक किंवा साडी ही वेशभूषा असेल तरच प्रवेश दिला जाईल" अशी पाटी वाचली होती. नऊवारी असा काही उल्लेख नव्हता. याविषयीच मी मिपावर मागे लिहिलेले थोडे चोप्य-पस्ते करतो--- "म्हणजे मी जीन्स घालून गेलो तरी त्या महाराजांना चालणार पण हिलरीने साडीच नेसली पाहिजे ही सक्ती. हे काही मला पटले नाही....ते पुतळे बघून झाल्यानंतर आणखी एक ठिकाण होते तिथे जायला आम्ही निघालो तेव्हा हिलरीने साडी नेसली नसल्यामुळे आत प्रवेश नाही हे कळले.आम्ही विचारले की आत नक्की काय आहे?त्यावर कळले की तिथे आत वालावलकर महाराजांची समाधी आहे.एक तर वालावरकर महाराज हे नाव मी आयुष्यात दुसऱ्यांदा ऐकले.कदाचित शाळेत असताना आमची सहल गेली होती त्यावेळी ते नाव ऐकले असेल ही शक्यता गृहित धरून दुसऱ्यांदा असे लिहितो.हे महाराज कोण होते किंवा ते खरोखर चांगले होते की नाही याविषयी मला काहीच माहित नव्हते. ज्या माणसाविषयी काही माहित नाही त्याची समाधी बघण्यात काय कपाळ इंटरेस्ट असणार? आणि समजा हे महाराज कोण हे माहित असते तरी तिथे जावेसे वाटायची शक्यता अगदी शून्य होती.उंटाच्या लहान आतड्याची लांबी किती असते हे समजून घेण्यात मला जितका इंटरेस्ट आहे त्यापेक्षाही कमी इंटरेस्ट या असल्या महाराजांच्या समाध्या वगैरे बघण्यात मला आहे.त्यामुळे आत जाऊ देणार नसाल तर नका देऊ, हू केअर्स असे म्हणत आम्ही तिथून निघालो."

In reply to by बोका-ए-आझम

आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
मी फक्त तुमचे हे वाक्य चुकले आहे इतकेच निदर्शनास आणुन देत आहे . तुम्हाला कदाचित असे लिहायचे असावे आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली हिंदु प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. तुमची वाक्य रचना चुकली आहे इतकेच निदर्शनास आणुन देत आहे !

In reply to by पगला गजोधर

त्यांचे मुळ वाक्य हे आहे >>>
आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
>>> मी कमीत कमी सुधारणा सुचवत होतो , बरे झाले आपण अजुन एक अ‍ॅडीशन सुचवली ! बोकाराव तुमचे वाक्य असे असले पाहिजे आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली हिंदु पूजास्थळे कुठेच नाहीत.

In reply to by प्रसाद गोडबोले

नूतन सावंत Wed, 12/02/2015 - 22:10
बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्लर येथे हिंदू धर्मियांशिवाय कोणालाही प्रवेश नाही,अशी पाटी आहे.एकदा आय.टी.डी.सी.च्या बसने आलेल्या क्रिश्चन धर्मियांना मंदिराच्या प्रांगणात आणल्याबद्द्ल पंजाबी हिंदू गाईडला तिथले पुजारी आईबहिणीवरुन शिव्या देताना प्रत्यक्ष पाहिले आहे.

In reply to by नूतन सावंत

माहितगार गुरुवार, 12/03/2015 - 10:24
खरच हे दुर्दैवी आहे. मी एकदा एका आफ्रीकन (ख्रिश्चन) स्त्रीला विवेकनंदांच्या भूमिकेतून हिंदू धर्म या विषयावर माहिती दिली तिला हिंदू संस्कृती बद्दल सकारात्मक उत्सुकता निर्माण झाली आणि मंदिरांना भेट देण्याचीही इच्छा झाली पण मंदिरातील पुजारीवर्ग कसा वागेल या विचाराने मंदिर भेटीस आमंत्रण देण्याचे धाडस मलाच झाले नाही याची आठवण झाली.

In reply to by माहितगार

संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 11:24
जिथे पुजारी नाहीत अशा मंदिरांना भेट द्यायला सांगावी. प्रसिद्ध व गर्दिने गजबजलेली मंदिरे म्हणजेच हिंदू धर्म असे नाही.

In reply to by संदीप डांगे

माहितगार गुरुवार, 12/03/2015 - 11:53
म्हणजे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तुमच्या धर्मातील हेदभाव कबूल करणे, शिवाय हायलाइट करणे झाले असे नाही का ?

In reply to by माहितगार

संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 12:37
नाही हो तसे नाही. मंदिरांबद्दल मी जे वर विवेचन दिले त्यानुसार काही मंदिरे खाजगी पद्धतीची आहेत. लोक तिथे गर्दी करतात म्हणजे ती लोकांची झाली असा अर्थ होत नाही. चित्रपटगृहांमधे लोक गर्दी करतात म्हणून तिथे वाट्टेल तसे वागण्याचा, किंवा तिथले नियम ठरवण्याचा अधिकार जाणार्‍या प्रेक्षकांना मिळत नाही. कुणाला प्रवेश द्यावा न द्यावा हे जसे चित्रमंदीर ठरवू शकते तसेच हे मंदिरही ठरवू शकते. टिकिट असणे म्हणजे प्रवेशास पात्र असणे हा साधा नियम तिकडे आहे, तर हिंदू असणे म्हणजे पात्र असने हा नियम इकडे आहे. ह्यात भेदभाव आहे असे मानणे चुकीचे आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' असे एखादा हिंदू मानतो म्हणून तुम्ही त्याच्या घरात घुसून राहणार हे योग्य नाही. भेदभाव आणि पात्रतानुसार प्रवेश ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत. मंदिरे आणि देव ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत हे मी आधीपासून सांगतोय. त्यात गल्लत होऊ देऊ नये. प्रवास हा प्रवास असतो पण गावातल्या एसटी स्टँडवर ज्या सहजतेने आपण फिरू शकतो, टिकट काढण्याची वेळ येईपर्यंत बसमधे बसू शकतो, तितक्या सहज कुठल्या एअरपोर्ट वर नाही फिरू शकत. म्हटले तर दोन्ही पब्लिक प्लेस, सार्वजनिक स्थळ आहेत. मग तिथेही भेदभाव समजायचा का? प्रवास म्हणजे हिंदू धर्म आणि मंदिरं म्हणजे एअरपोर्ट, बसस्थानकं असं समजा. (फार गुंतागुंत होतेय का? फारच दृष्टांतहेवी प्रतिसाद होतोय, माफी असावी)

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 12:50
सरसकट कुणालाही गाभार्‍यात सोडणे आणि निव्वळ मंदिरात अलाउ करणे यात फरक आहे की नाही? फक्त मंदिरप्रवेश करू दिला तरी बास आहे. तेवढंही कबूल करवत नसेल तर हाईट आहे.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 13:00
सरसकट कुणालाही गाभार्‍यात सोडणे आणि निव्वळ मंदिरात अलाउ करणे यात फरक आहे की नाही? हो. फरक आहे. फक्त मंदिरप्रवेश करू दिला तरी बास आहे. तेवढंही कबूल करवत नसेल तर हाईट आहे. बरोबर. माझ्यामते नियम जर असतील तर ते काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. अन्यथा तो सरळ भेदभाव आहेच. म्हणजे माहितगार म्हणत आहेत ती आफ्रिकन व्यक्ति जर सहज टूरीस्ट म्हणून मंदिरात आली आणि तीला प्रवेश नाकारला पण तीच व्यक्ती कुणा केंद्रिय मंत्र्यासोबत आली आणि तिला गाभार्‍यात घेऊन गेले तर हा भेदभावच झाला. मला वाटते इंदिरा गांधीसोबत जे त्या मंदिराने केले तेवढे कडक नियम कुणी मंदिर पाळत असेल तर तो भेदभाव समजू नये. अन्यथा हाईट आहेच.

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 13:05
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो.

In reply to by बॅटमॅन

पगला गजोधर गुरुवार, 12/03/2015 - 13:49
अमेरिका/ गोव्यातल्या/केप टाउन चर्चमधे (डोक्यावर टोपी न ठेवणे की संपले) व सिंगापूर /थायलंड मधील बौद्ध मंदिरात (पादत्राणे न घालणे की संपले), मला प्रवेश मिळाला, फोटो सुद्धा काढता आले. (कोणीही जात धर्म विचारला नाही). गुरुद्वाराच्या लंगर मधे जेवलोय (कोणीही जात धर्म विचारला नाही).

In reply to by बॅटमॅन

नाखु गुरुवार, 12/03/2015 - 14:47
हेच मी स्वतः शिवथर घळला अनुभवले आहे. सुमारे २०-२२ वर्षांपूर्वी (जेव्हा थेट नेट सेल्फी) इफे़क्ट नव्हता तेव्हा.. माझ्याबरोबर आम्च्या कंपनी समूहात दोन मुस्लीम २ केरळीयन ख्रिषचन यांनाही विना अटकाव प्रवेश दिला होता. शिवथर घळ हे संपूर्णतः खाजगी आहे असे मला वाटते तिथेही तुम्ही कुठल्या धर्माचे आहात हे विचारत नाहीत (किमान आम्हाला तरी विचारले नाही) फक्त पोषाख सभ्य असावा असा संकेत असावा.(किंवा मधल्या काळात काही वावगे घडले असावे म्हणून पेहरावाबद्दल काही नियम बन्विले असावेत). भेदभाव करणे कुठेही वाईच धाग्यावर आणि मंदीरातही...... लाईनीत (थांबण्याची सक्ती न करता लांबूनही नमस्कार)नमस्कारी नाखु

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 13:06
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो. बाकी नियम कसाही असो मात्र पुजार्‍यांनी शिव्या देणे म्हणजे हाईट आहे. असे अनुभव वाईटच.

In reply to by बॅटमॅन

गवि गुरुवार, 12/03/2015 - 14:08
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो.
अ. कडक अथवा सौम्य, जे काही नियम असतील त्यांची कमाल व्याप्ती नागरिकाला एखाद्या खाजगी, प्री-डिफाईन्ड सीमारेषा असलेल्या जागेत प्रवेश नाकारणे इतकीच असेल आणि ब. या जागी न जाण्याने त्या व्यक्तीच्या अन्न वस्त्र निवारा यांपैकी एक अथवा अनेक गरजा बाधित होत नसतील किंवा या गरजांना मिळवण्याचा एकमेव मार्ग खंडित होत नसेल. आणि क. स्वतःच्या आवारात तसे किंवा कोणतेही नियम करण्याची पूर्ण कायदेशीर मान्यता नियम बनवणार्‍या बॉडीला त्या देशाच्या मुख्य कायदेशीर संस्थेने दिलेली असेल. तर कोणतेही नियम चूक ठरणार नाहीत / ठरु नयेत. आणि तसं नसेल तर सर्व नियम चूक ठरतील / ठरावेत. मग ते वस्त्र, लिंग, वर्ण, धर्म, भाषा, उंची, वजन, केसांची लांबी, आहारपद्धती, लैंगिक ओरिएन्टेशन किंवा अन्य कोणत्याही व्हेरिफायेबल पॅरामीटरवर आधारित असोत. बाकी कितीही काही बोललं तरी निरुपयोगी.

In reply to by गवि

बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 14:18
म्हणजे या न्यायाने दलितांच्या मंदिरप्रवेशाबद्दलची सर्व आंदोलने आणि महिलांच्या गाभाराप्रवेशाबद्दलची आंदोलने निरुपयोगीच ठरावीत, नै का? मध्यंतरी कर्नाटकातील एका मंदिरातल्या गलिच्छ प्रथेबद्दल बरेच काही छापून आले होते. ब्रह्मवृंदाचे जेवण झाल्यावर त्या उष्ट्या खरकट्या पत्रावळ्यांवर लोटांगण घालत प्रदक्षिणा घालण्याचा प्रकार तिथे अगोदरपासून आहे. हाही कायदेशीर प्रकार आहे, कुणाच्या कसल्या हक्कावर गदा वगैरे येत नाही. पण यावर बंदी घालण्यात आली. आणि ते मलाही समर्थनीय वाटते. बर्‍याच जणांनी विरोधही केला, कैकांनी समर्थनही केले. नेमके देवळाचे नाव आठवत नै नैतर लिंक दिली असती. बाकी हा मुद्दा अंमळ भावनिकही आहेच. काही प्रमाणात अ‍ॅक्सेस ओपन केल्यास अजून बरे होईल असे बर्‍याच जणांना वाटते, तदनुरूप अनेक लोकांनी चळवळी केलेल्या आहेत आणि त्यांना कमीअधिक प्रमाणात यशही मिळालेले आहे. त्यामुळे यात निरुपयोगी असे काही वाटत नाही.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 14:43
मंदिरनामक जागा केंद्रस्थानी ठेवून समाज त्याविषयी काय निर्णय घेतो हे समाजावर बंधनकारक असते. संपूर्ण समाजाने (यात स्त्रिया-पुरुष, दलित-उच्चवर्णिय, श्रीमंत-गरीब सगळे आले) स्त्रियांच्या गाभाराप्रवेशावर बंदी घातली तर तेही बरोबर, उठवली तरी बरोबर. पण समाजातले काही विशिष्ट घटक आपले स्वार्थ साधण्यासाठी, असमतोल मानसिकतांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उर्वरीत समाजाला फसवत असतील आणि त्यायोगे काही भेदभाव घडत असेल तरच तो चुकीचा ठरेल. बाकी तुम्ही म्हणताय त्या अनिष्ट प्रथा ह्या सहज भावनेतून सुरु झालेल्या, पुढे विकृत रुप घेतलेल्या असतात. त्यांच्यावर प्रबोधनासह बंदी घालणे आवश्यकच आहे.

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 15:05
फसवणे म्हणजे काय? आर्थिक फायदा करून घेणे वगैरे? तसे असेल तर मग दलितांना मंदिरप्रवेशापासून रोखण्यात पुरोहितांचा तरी आर्थिक फायदा काय होता? उलट त्यांना अलाउ केले असते तर त्यांनीही दाने दिलीच असती की. तस्मात निव्वळ फसवणूक असेल तरच चूक ही व्याख्या अपुरी आहे असे वाटते. पण हा मुद्दा बर्‍याच अंशी सब्जेक्टिव्ह आहे हेही तितकेच खरे.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 15:26
फसवणे म्हणजे आर्थिक फायदाच असे नाही. खरे न सांगणे, सत्य दडवून ठेवणे, मिळालेल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन दमदाटी करणे. 'एखादा अधिकार तुम्हालाही उपलब्ध आहे' हे जातीपातीच्या पूर्वग्रहातून निम्नजातींना न सांगणे ही फसवणूकच आहे. एक उदाहरण देतो. मी आणि माझ्या मित्राने अमेरिकेतल्या कुठल्या युनिवर्सिटीला अप्लाय केले. पण प्रवेश मिळेल की नाही हे तिथे गेल्यावरच समजते अशी अट आहे. माझा मित्र तिथे आधीच गेलेला आहे. काय निकाल आहे हे त्याने मलाही कळवणे अपेक्षित आहे. पण इर्ष्येतून, सामाजिक सन्मानाच्या हेतूने त्याने मला 'तुझा नंबर लागला नाही' असे चुकीचे सांगितले. मला त्याच्यावर प्रचंड विश्वास असल्याने मी तोच निकाल खरा मानला. यात माझे नुकसान झाले. म्हणजे मला फसवले असेच म्हणेन ना मी? माझ्यामते मंदिरांमधे विशिष्टांना प्रवेशबंदी ही खाजगीकरणातून आलेली आहे. मंदिरव्यवस्थापनाच्या इतिहासाबद्दल मला तेवढे इत्थंभूत ज्ञान नाही. याविषयी जास्त माहिती मिळाली तर ह्या बंदीप्रथा कुठून उपजल्या हे शोधता येईल.

In reply to by संदीप डांगे

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/03/2015 - 18:24
@माझ्यामते मंदिरांमधे विशिष्टांना प्रवेशबंदी ही खाजगीकरणातून आलेली आहे.>> आहो कुठचं काय आलय खाजगीकरण.? ही अस्पृश्यता पाळली जाते सरळ सरळ! ह्याला पोथ्यांचाही आधार असतो.. देवाची पॉवर कमी होइल्,अमके तमके शिवल्यानी..असली मूर्ख टनाटनी गणित असतात...ह्या देवाला शिवू न देण्याच्या प्रथांमागे.. आतल्या गोटातून ,माहिती घ्या ..मग कळेल

In reply to by अत्रुप्त आत्मा

संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 19:01
अहो, अस्पृश्यता म्हणजेच खाजगीकरण. तेच म्हणायचे आहे. हे देवाची पावर कमी होईल वैगेरे बालीश कारणं देण्यामागे जी काय मानसिकता आहे ते म्हणजे खाजगीकरण. खरेतर अस्पृश्यता, देवाची पॉवर इतकी वरवरची कारणं बघण्यापेक्षा माणसाच्या अंतर्मनात ह्या गोष्टी निर्माण होण्यामागे आणि चराचरात देव आहे ह्या भावनेच्या विरूद्ध वागण्यामागे काय इतिहास असावा, कुठून सुरू झालं, नेमकं काय कारण असावं यावर विचार करतोय. काहीतरी आहे जे इतरांपासून लपवून, सुरक्षित ठेवायचं आहे. कुणाला तरी काही तरी फायदा असल्याशिवाय ह्या मान्यता व भेदभाव निर्माण होणार नाहीत. नुसतं 'आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ' एवढ्याशा भांडवलावर ही व्यवस्था इतकी शतके चालू शकत नाही. गूढत्वाच्या भांडवलावर असेल तरी सुरुवातीस काहीतरी अनुभव आल्याशिवाय लोक मानणार नाहीत. म्हणजे दहा समान दर्जा असलेल्या व्यक्ती प्रवासाला निघाल्या पण रस्ता माहीत नाही, त्यातल्या प्रत्येकाने प्रयत्न करून पाहिला पण एकाचेच रस्त्याबद्दलचे अंदाज दोन-तीन वेळा सलग बरोबर निघाले की तोच त्या गटाचा म्होरक्या होतो. मग भलेही पुढचे सगळे अंदाज चुकत गेले तरीही पुर्वसंचितानुसार त्यालाच तो मान मिळतो. पुढे इतरांची मते लक्षात घेऊन तो अंदाज वर्तवेल पण शेवटपर्यंत इतर लोक त्यानेच आपल्याला कसे योग्य मार्गदर्शन केले ह्यावर विश्वास ठेवतील. चातुर्वर्ण्य व्यवस्था होऊन ब्राह्मण सर्वश्रेष्ठ ठरवण्यामागे ब्राहमणांचे असेच काहीसे योगदान कारणीभूत असेल काय? ज्याचा गैरफायदा घेऊन जन्मनिहाय व्यवस्था निर्माण झाली आणि पुढे श्रेष्ठ कनिष्ठ चे मत मानवी मनाच्या विकृत बाजूचे दर्शन करत प्रभावी झाले. मूळावरच घाव घातला तर फांद्या आपोआप तुटून पडतात. बाजीरावपेशव्यांनीच सांगितलंय. म्हणून मूळ शोधावे. ते मनुस्मृतीच्याही पलिकडे असावे. जाणकारांच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत.

In reply to by बॅटमॅन

गवि गुरुवार, 12/03/2015 - 14:46
म्हणजे या न्यायाने दलितांच्या मंदिरप्रवेशाबद्दलची सर्व आंदोलने आणि महिलांच्या गाभाराप्रवेशाबद्दलची आंदोलने निरुपयोगीच ठरावीत, नै का?
माझा प्रतिसाद परत वाच. आजरोजीविषयी बोलायचं आहे. अ. जागा खाजगी आहे की सार्वजनिक मालकीची? ब. प्रवेश रोखणारा नियम अलिखित आणि लोकल पुजार्‍याने / बडव्यांच्या गटाने आपसात ठरवून केला आहे की मंदिराच्या ट्रस्टने अधिकृत ऑथॉरिटीसह केलेला आहे? यावर ते वैध की अवैध ते ठरेल. कधी भावना, कधी कायदा अशाने बरेच घोळ होतात.

In reply to by गवि

बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 15:01
गाभाराप्रवेशाची आंदोलने गेल्या पाचेक वर्षांत झालेली आहेत. कर्नाटकातले उदाहरणही अलीकडचेच आहे. बाकी अधिकृत अ‍ॅथॉरिटीने घेतलेला निर्णय तांत्रिकदृष्ट्या वैध असला तरी योग्य असेलच का? ते अय्यप्पा मंदिरात पाळीवाल्या स्त्रिया ओळखण्यासाठी स्कॅनर बसवायचा निर्णय समजा उद्या अगदी अधिकृतपणे घेतला तर तुम्ही त्याला योग्यच म्हणाल का? वैध आणि योग्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दरवेळेस एकाच एक चौकटीत अशा गोष्टी पकडता येत नसल्या म्हणून नुस्ता घोळ आहे असे नाही.

In reply to by बॅटमॅन

अभ्या.. गुरुवार, 12/03/2015 - 14:09
पुजारी हे माणसांचे प्रतिनिधी म्हणून देवापुढे गार्‍हाणे मांडतात, सेवा करतात तोपर्यंत ठिकच असते. जेंव्हा ते स्वतःला देवाचे प्रतिनिधी समजू लागतात तेंव्हाच अवघड होते. अशावेळी व्यवस्था त्यांना बदलते किंवा ते व्यवस्था बदलतात.

In reply to by संदीप डांगे

माहितगार गुरुवार, 12/03/2015 - 13:57
@ डांगेजी
म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत.
काय होतय १) अनेक ऑदरवाईज सार्वजनिक असलेली मंदिरे/प्रार्थनास्थळे केवळ भेदभावाच्या सोईसाठी म्हणून खासगीपणा पुढे केला जाताना दिसतो यात कुणाच्या व्यक्तीगत घरात जाण्याचा तसा प्रश्न नाही आणि 'अतिथी देवोभव' म्हणणार्‍या संस्कृतीत अगदी घरातल्या मंदिरा बाबत सुद्धा भेदभावयूक्त व्यवहार आदर्श कसा म्हणता येईल ? २) मी समोरच्या परधर्मीय व्यक्तिशी माझ्या संस्कृतीतील उदात्तते बद्दल बोलणार आणि नंतर हजारो लोक जात असलेल मंदिर खासगी आहे आणि तुमच्या बॅकग्राऊंडमुळे प्रवेश नाही असे सांगणार यात माझ्या संस्कृतीच्या उदात्ततेच प्रदर्शन होत की कोत्या मनोवृत्तीच प्रदर्शन होते आहे?
म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत.
मी माझ्या धर्माचा संस्कृतीचा अभिमान ठेवतानाच, सहिष्णूता बाळगाणारा समधर्म समभाव बाळगणारा व्यक्ती आहे, मला माझ्या प्रमाणेच माझ्या मुलांमध्ये सहिष्णूता वृद्धींगत व्हावी आणि इतर धर्म आणि विचार पद्धतीचा परिचय व्हावा म्हणून माझ्या मुलांना विवीध धर्मांच्या धर्म स्थळांना भेटीस न्यावयाचे आहे त्यावेळी मुलांनो अमुक अमुक मंदिरे/प्रार्थनास्थळांमध्ये तुम्ही तुमच्या बॅकग्राउंडमुळे प्रवेशासाठी अपात्र आहात हे सांगणे नेमकी कोणती गोष्ट बाल मनांवर बिंबवते ज्यांना धर्मंच्या दुकानांवरच्या प्रवेश नाकारणार्‍र्‍या असहिष्णु पाट्या पाहून त्या मुलांकडून मोठे झाल्या नंतर सहिष्णूतेची अपेक्षा करणे कितपत रास्त ठरते या बद्दल मी साशंक आहे. असो.

In reply to by सायकलस्वार

अजया Tue, 12/01/2015 - 08:02
अरे वा हे सोपे तत्त्वज्ञान दिसते!कळायला अवघड गेला असेल विषय बाकीचा! चालु द्या निरर्थक अत्मरंजन! etc etc!!

In reply to by अजया

मितान Tue, 12/01/2015 - 08:49
@ सायकलस्वार, इथला तुमच्या मते गाभारा किती महत्वाचा आहे हे अधोरेखित केल्याबद्दल आभार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

In reply to by सायकलस्वार

पैसा Tue, 12/01/2015 - 09:37
सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा कमालीचा अभ्यास केलेला दिसतोय! का आताचा आयडी बॅन झाल्यावरची तरतूद करून ठेवली आहे! अभ्यास जोरात चालू ठेवा बरं!

In reply to by पैसा

बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 12:08
सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा कमालीचा अभ्यास केलेला दिसतोय!
एका महिन्यात जर कुणी सालसपणे प्रतिसाद देऊ शकत असेल तर चार महिने लै झाले, नै का?

In reply to by पैसा

बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 12:24
आमच्यासारखे बसतात बोंबलत.
चांगलंच आहे. बोंबलण्याचे फायदे काय असतात ते इथे पहावयास मिळेल. आरोग्यास हितकारकच असते. http://www.sanatan.org/mr/a/574.html त्या निमित्ताने सालसपणामागील अमंगळ निघून जाईल अशी भाबडी आशा करावयास हरकत नाही. =))

In reply to by सायकलस्वार

गणपा Tue, 12/01/2015 - 10:09
तायांनो थोडं विनोदानं घ्या की सायकलस्वाराचं वाक्य. :D का उगा वाढदिवसाच्या शुभेच्छा देउन राहीलात?

In reply to by सायकलस्वार

मृत्युन्जय Tue, 12/01/2015 - 11:09
पुरुषांना बंदी असलेला एक गाभारा इथे मिपावरच आहे म्हणे... हाहाहाहा. पण आत मध्ये देव आहे याची खात्री आहे का तुम्हाला? ;)

In reply to by मृत्युन्जय

पण आत मध्ये देव आहे याची खात्री आहे का तुम्हाला?
देव नाही ह्याची १००% खात्री आहे ... देवी असु शकेल कदाचित =))))

In reply to by मितान

बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 15:19
डोक्यातल्या किड्यांची पूजा करत बसलं की असं होतं
त्या स्वमतांध दांभिक क्रायबेबी कंपूबाजांना आपली पूर्ण सिंपथी आहे. :) #छाणप्रतिसाद

In reply to by बॅटमॅन

मितान Tue, 12/01/2015 - 15:25
माझी तर अशा लोकांना नुसती सिंपथीच नाही तर किंड्यांविषयीच्या फोबियावर फुकट उपचार करणार्या संस्थांची यादीही तयार ठेवली आहे मी !

In reply to by बॅटमॅन

मितान Tue, 12/01/2015 - 15:25
माझी तर अशा लोकांना नुसती सिंपथीच नाही तर किंड्यांविषयीच्या फोबियावर फुकट उपचार करणार्या संस्थांची यादीही तयार ठेवली आहे मी !

In reply to by मितान

बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 15:28
एकूण प्रतिसाद पाहून "कोण तो **चा म्हणतोय मी शिव्या देतोय म्हणून?" या अजरामर वाक्याची अठवण झाली. =))

In reply to by नीलमोहर

नीमो , चित्र सापडले आहे , फक्त तुर्तास संपादक मंडळ सुट्टीवर असल्याने चित्र इथे टाकले नव्हते , आपल्याला व्यनी करतो ;) बाकी चेष्टा मस्करी इतकी स्पोर्टींगली घेतल्याबद्दल आपल्यावर कारवाई वगैरे होईल की हो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

नीलमोहर Tue, 12/01/2015 - 16:54
Smiley नको नको व्यनि नको.. आणि संपादक मंडळच सुट्टीवर असल्यावर कारवाई कोण करणार :)

In reply to by नीलमोहर

pacificready Tue, 12/01/2015 - 17:12
>>>नको नको व्यनि नको. दूरदर्शन ची दारुबंदी ची जाहिरात आठवली. नको बाबा नको नको. संसार उद्ध्वस्त करी दारु, म्हणून संसार नका करु

In reply to by संदीप डांगे

माहितगार Mon, 11/30/2015 - 20:35
"....मंदीरप्रवेश आंदोलनाबद्दलही मला हाच प्रश्न पडला होता............जो स्वत: तुम्हाला जवळ घेऊ शकत नाही, तुमचे दु:ख दूर करू शकत नाही तो देव कशाला डोक्यावर घ्यायचा?....
कदाचित याच भावनेने सहसा लोक दुर्लक्ष करतात, अशी काही स्थाने असतील तर जाण्याचे टाळले जाते पण या दृष्टीकोणा बद्दल एक साशंकता आहे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी पाणी पिण्यास दिले नाही तर तुम्ही ते टाळाल दुसरीकडे जाऊन पाणी प्याल एका अर्थाने समतेच्या वागणूकीचा आग्रह बाजूस पडून एक अप्रत्यक्ष तडजोड स्विकारली जाते आहे. मी शीख धर्मीय असो वा नसो त्यांच्या डोक्यावर कापड बांधून पाय धुण्याची अट पूर्ण केली कि मला त्यांच्या धर्मस्थानात जाऊन दर्शन घेता येते. मी स्त्री आहे पुरुष आहे कोणत्या वर्ण धर्म पंथाचा आहे याने सहसा फरक पडत नाही. अशाच पद्धतीने इतर धर्मीय स्थळांमध्ये कुणीही आदर पुर्वक दर्शन/प्रार्थना करू इच्छित असेल तर त्यासाठी मुभा असावयास हवी आणि त्यासाठीचे आग्रह तुम्ही नास्तीक असाल अथवा इतर धर्मीय असाल तरीही सोडू नयेत कारण तुम्ही धरत असलेला आग्रह सुसंस्कृततेसाठी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सामाजीक समस्यांच्या संदर्भाने मी मागेही धागा काढला होता, तुम्ही धर्मस्थळात जाऊन प्रत्येक वेळी पुजा केली पाहीजे असे नाही पण एकदा तो अधिकार प्राप्त झाला की बाकी समाजात समतेच्या वागणूकीची खात्री करणे सोपे जाऊ शकते. मी आफ्रीकन ख्रिश्चन असेन तर काळ्यांच्या चर्च मध्ये जाउन तडजोड करेन पण दुसर्‍या समुदाया पासून तुटलेलाच राहीन ही जी सामाजीक दरी आहे ती सांधण्यासाठी म्हणून मला ऑदरवाईज रस नसला तरी गोर्‍यांच्या प्रत्येक चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करून येण्यास आवडेल. अर्थात आपण लाथ वगैरे शब्द सात्वीक रागाने जरी वापरला असला तरी आदरणीय उद्देशाने न येणार्‍यांना नाकारण्याचा एक वेगळा अधिकार धार्मीक स्थळांना प्राप्त होऊ लागतो याने सामाजीक दरी सांधण्यास मदत होते असे वाटत नाही म्हणून असे शब्द टाळावेत किंवा कसे.

In reply to by माहितगार

संदीप डांगे Mon, 11/30/2015 - 22:26
आता पुरेसा वेळ हाताशी नसल्याने तुमच्या प्रतिसादाचं उत्तर नंतर देईल वा वेगळा धागा काढेन, कारण इथे दलितप्रश्नावर चर्चा करणे मूळ धाग्याशी, विषयाशी प्रतारणा होइल. पण खालील मुद्द्यावर माझं मत मांडतो.
अर्थात आपण लाथ वगैरे शब्द सात्वीक रागाने जरी वापरला असला तरी आदरणीय उद्देशाने न येणार्‍यांना नाकारण्याचा एक वेगळा अधिकार धार्मीक स्थळांना प्राप्त होऊ लागतो याने सामाजीक दरी सांधण्यास मदत होते असे वाटत नाही म्हणून असे शब्द टाळावेत किंवा कसे.
'विशिष्ट मंदिरातच जागृत देव असतात' ही इतकी तकलादू आणि भ्रामक कल्पना भारतीय समाज कवटाळून बसला आहे की आपण एकाच बाबतीत वेगवेगळे विचारप्रवाह एकाच वेळी पाळत आहोत ते त्यांच्या लक्षात येत नाही. १. मनुष्य देवळात जातो. कारण देवाप्रति त्याला आपली भक्ती, श्रद्धा अर्पण करायची असते, आपले दु:ख, सुख याचे कारण तोच आहे असे समजून एक मालक-पालक-मित्र-सखा म्हणून त्याच्याशी गुजगोष्टी करायच्या असतात. आपले गार्‍हाणे सांगायचे असते, त्यावर त्याने काहीतरी करावे अशी अपेक्षा असते. थोडक्यात मंदीर हे एका व्यक्तिचे असते. भक्त तिथे स्वतःपुरते लाभ घेण्यासाठी जातो. अखंड समाजासाठी नाही. ते राजे, सत्ताधारी वैगेरे करतात. पण व्यक्तिगत पातळीवर देव हा वैयक्तिकच असतो. २. मंदिरात एक व्यवस्था असते, देवाची काळजी घेण्याची. त्याचे षोडशोपचार, पुजाअर्चा, आरत्या नैवेद्ये वैगेरे करणे गरजेचे असते. त्याची समाजातल्या एका व्यक्तिवर जबाबदारी टाकल्या जाते. परंपरेने वा कसेही चालत आलेले नियम, अटी हे गुरव, पुजारी, पुरोहित पाळत असतात जेणेकरुन 'देवाचे हित' जपल्या जावे. ह्यात स्त्रियांनी प्रवेश करू नये, रजस्वला स्त्रीने प्रवेश करू नये, अमूक जातीतल्या माणसाने प्रवेश करू नये असे नियम असतात. त्याची कारणे दैवी वैगेरे असतात. भारतात अशी बरीच मंदीरे आहेत जी विशिष्ट जातीची, उपजातीची आहेत. त्यांच्याशिवाय तिथे दुसर्‍या कोणाला प्रवेश नसतो. 'स्थानाची पवित्रता' जपणे हा उद्देश असतो. ही पवित्रता, नियम परंपरेने जसे आले तसे, थोडेसे आपल्याला सोयिस्कर ठरतील असे करत पुरोहित, गुरव पाळतात. इथे देव व पुरोहित यांचे हिताला प्राधान्य आहे, भक्तांच्या नाही. आमच्या कुलदैवतेच्या गाभार्‍यात पुरुषांना प्रवेश नाही, तिथे सगळे षोडशोपचार, विधी फक्त स्त्रिया करतात. ३. भारतीय मंदिरांचा इतिहास पाहू जाता. पुरातन मंदिरे व्यक्तिगत उपयोगासाठी, ध्यानपुजाअर्चेसाठी बांधलेली आहेत. गाभार्‍यांची रुंदी एकाच व्यक्तिला सहज बसता येईल अशी आहे. एक असाही संशय आहे की काही महत्त्वपूर्ण ज्ञान, वस्तू इथे सांभाळून ठेवलेल्या आहेत. मंदीर हे अतिशय व्यक्तिगत साधनेचे स्थळ आहे. कोणा राजाने, प्रधानाने, मंत्र्याने, सरदाराने स्वतःचे पैसे घालून एक चांगली जागा तयार केली असते. तीथे त्याने वा अजून कोणा तंत्रमंत्रात कुशल पुजार्‍याने पुजा करून वातावरण, जागा मंतरलेली असते. नित्य साधनेने तिथे एक जाणवेल असे वातावरण तयार होते. तिथे शांती लाभते. मग त्या जागेच्या दैवीपणाचे किस्से बाहेर पडतात. पण हे सगळे व्यक्तिगत आहे. त्यामुळे अशी व्यक्तिगत जागा कुठेही तयार करता येऊ शकते. पण ते वातावरण तयार करणे चटकन, झटपट होणारे काम नाही, त्यास कित्येक वर्षांची अखंड तपस्या लागते. अनिर्बंध हेळसांडीने ते वातावरण नाहिसे होऊ शकते. त्यामुळे अशी मंदीरे लोकांपासून सुरक्षित ठेवणे आले. त्यातून नियम बनले. पण जागृत देवस्थान म्हटले गेल्यावर जनसामान्यांना तेच पावरफुल वाटते आणि लोकांचा गार्‍हाणे मांडण्यासाठी तिकडेच ओढा असतो. ४. इतर धर्माच्या प्रार्थळास्थळांशी अजिबात तुलना करू नये कारण हिंदू हा व्यक्तिगत धर्म(आचरण) आहे. इतर धर्म हे सामुहिक धर्म आहेत. चर्च, गुरुद्वारा, मशीद इथे आपणास एकसमानता दिसून येईल की अनेक लोकांना एकत्र बसता येईल असा हॉल असतो. जिथे प्रार्थनास्थळ बांधतांनाच समाजाचा विचार केला गेला आहे तिथे 'कुणास मनाई करावी' हा विचारच मुलतः येणार नाही हे सरळ आहे. काळ्यांसाठी वेगळे चर्च असतील तर ते सरळ डिस्क्रिमीनेशन आहे. (आजकाल म्हणजे गेल्या वीस-तीस वर्षांतील नवीन मंदीरांच्या रचना बघितल्या तर आता समुहासाठी अशी खास मंदीरे गाव-शहरामधे चर्चच्या शैलीत बांधली जाऊ लागली आहेत. ज्यात हॉल बराच मोठा असतो, देवाची मुर्ती भींतीला टेकलेली असते, गाभार्‍यात पुजारी आणि दानपेटी राहील एवढीच जागा असते. देवाला स्पर्श करू शकत नाही. इथे आता एक क्रांती घडलेली आहे. या प्रकारच्या मंदिरांमधे कुणालाही प्रवेश बंदी नसते.) ५. देव चराचरात आहे, ज्याला जिथे भाव प्रकट होईल देव तिथे प्रकट होतो. म्हणून इथे-तिथे कुठेही दगडाला शेंदूर फासून अगरबत्ती लावलेली दिसून येते. मरीआई, म्हसोबा, सटवाई, आसरामाता, अशा जनसामान्यांच्या श्रद्धा स्विकारत भारतात लाखो ठिकाणी आहेत. इथे येता जाता कोणी नमस्कार करू शकतो. अगदी गायींपासून ते झाडांपर्यंत लोक दर्शनं घेत असतात. तिथं कोणालाही बंदी नसते. स्त्री, रजस्वला, दलित, कोणीही निषिद्ध नसतो. कारण तो सर्वांचा देव असतो, 'निसर्गदेव' असतो. असे सगळे आहे तर मग लक्षात येईल की काही विशिष्ट मंदिरांमधेच प्रवेशबंदी का? पण अशी प्रवेशबंदी असलेली मंदीरे किती आहेत? असली तरी ती खाजगी मालकीची किंवा विशिष्ट जातींसाठीची आहेत. तिथे त्यांचेच नियम चालणार. या नियमांविरुद्ध अपील होऊच शकत नाहीत त्याचे कारणे कितीही मूर्ख वा अवैज्ञानिक असली तरी. ते तिथे भेट द्यायला जाणार्‍यांना मान्य असलीच पाहिजेत. कारण नाहीतर विसंगती निर्माण होईल. जी शशीं प्रकरणात झाली, सबरीमाला प्रकरणात झाली. तुम्ही शनिदेवाला मानता पण त्याचे नियम नाही. हे मजेशीर आहे. त्यामुळे मंदिरांमधे प्रवेशबंदीला मी समर्थन देतो. एखादा देव मी मानतो तर त्याचे सगळे नियम मला मान्य असलेच पाहिजेत. शिवपिंडीवर मी मेणबत्ती नाही लावणार किंवा चादर नाही घालणार. व्यक्तिस्वातंत्र्याच्या, सन्माननीय वागणुकीच्या नावाखाली मला हे सर्व करण्याचा अधिकार आहेच. पण तो मूर्खपणा आहे ना? यावर उपाय काय? तर देव चराचरात आहे. प्रत्येक घरी गणपती बसतो, प्रत्येकाच्या घरच्या गणपतीत सेम देवत्व येतं. लाखो ठिकाणी शिवालयं, राममंदीरं आहेत, सगळीकडे प्राणप्रतिष्ठापना केलेले देव आहेत. मग दलितांनी, स्त्रियांनी आपल्यासाठी मंदीर बांधून घ्यावं, तिथेही तोच देव, तेच वातावरण करावं आणि सिद्ध करावं की देव ठायीठायी आहे, तुम्ही त्याला तुमच्या मंदिरात डांबुन ठेवुन मूर्खपणा करत आहात. पण असे होत नाही, झाले नाही. रजस्वला स्त्रियांना प्रवेशबंदी हा एक तांत्रिक मुद्दा बाजूला ठेवला तर दलितांना मंदिरात प्रवेश हा अनेक प्रश्नांना जन्म देणारा आहे. दलितांना मंदिरप्रवेश नाकारणे हा सरळ सरळ सामाजिक भेदभावाचा प्रश्न आहे. तो काही एका दिवसात तयार झालेला नाही. मंदिरात प्रवेश आहे म्हणून फार उचित सन्मान मिळतो असेही नाही हे देवदासींकडे, वाघ्यामुरळी, इत्यादींकडे बघुन कळते. त्यामुळे मंदिरात प्रवेश म्हणजे लगेच पाटील-ब्राहमणांच्या पंगतीत जेवायला मिळेल, त्यांच्या स्वयंपाकघरात प्रवेश मिळेल असे काही नव्हते, आणि झालेही नाही. (शहरातली उदाहरणे देऊ नये) ज्या देवाचा धर्म आपल्यासारख्या माणसाशी अमानुष वागण्याचे नियम बनवतो तो देव आपण कशाला मानावा हा विचार रुजवणे आवश्यक होते. जे आंबेडकरांनी अगदी योग्य पद्धतीने केले. जिथे आपल्याला सन्मान नाही तिथे जावेच कशाला हा साधा प्रश्न माझ्या 'लाथ' या शब्दामागे आहे. तुम्ही पाण्याचे उदाहरण दिले. तडजोडीबद्दल बोलत आहात. ज्या देशात रोटी-बेटी व्यवहार आपल्याच पोटजातीत व्हावे हा आग्रह असतो, तिथे मंदिरप्रवेशाने फार काही बदलत नाही. लोकांना आपल्याच जातीत, पोटजातीत मुली, मुलं बघावी लागतात. कितीही समकक्ष, समविचारी, जीवश्चकंठश्च मित्र असले तरी दोन वेगळ्या जातीत अरेंज मॅरेज होऊ शकत नाही हे स्वता:च्या डोळ्यांनी पाह्यलंय. इथे जी केली जाते ती अप्रत्यक्ष तडजोड नाही का? जात बंद, देव बंद, पंगत बंद अशा समाजाला 'लाथ' नाही मारायची तर का पूजा करायची काय? ह्याच सगळ्याला कंटाळून गावातील लोकांचा ओढा शहरांकडे वाढत असणे हे एक प्रकारे लाथ मारणेच आहे, तडजोड नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. बाकी माझ्या मतांशी प्रत्येकाने सहमत व्हावे असे नाहीच. तरी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय Tue, 12/01/2015 - 11:13
अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला.. देवाच्या नावावर चालणार्‍या भ्रष्ट आचारा बद्द्ल तुमची स्वत:ची काही मते असतील. तुमच्या मतस्वातंत्र्याचा आदर आहे. परंतु दुसर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असली विधाने करणे कृपया टाळा. "सश्रद्ध लोकांनी अंगावर येउ नये" असा स्वतःच कांगावा करत तुम्ही हे असले काहितरी लिहयचे आणि आम्ही ते निमूटपणे वाचुन घ्यायचे ही अपेक्षा चुकीची आहे. यापुढे आपल्याला जे काही समाज प्रबोधन करायचे आहे ते योग्य शब्दात, योग्य भाषेत आणि योग्य प्रकारे कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 11:53
मागचे पुढचे काही न वाचता एक शब्द उचलून कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील सर्वस्वी अशक्य आहे. प्रतिसादात स्पष्ट लिहलंय की "जो देव तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या देवाला लाथ मारा." ज्यांना त्यांचा देव हे सगळे करतो (म्हणजे जवळ करतो, दु:ख दुर करून सुख-सन्मान-शांती देतो) अशी खात्री-विश्वास-श्रद्धा आहे त्यांच्या भावना दुखावणारं हे विधान आहे असं कसं काय ठरवलं जातंय? हे म्हणजे असं झालंय की मी म्हटलं, 'दारू पिणार्‍यांना चाबकाने फोडून काढलं पाहिजे' त्यावर 'दुध' पिणार्‍यांनी आक्षेप नोंदवावा का तर तिथे 'पिणार्‍यां'चा उल्लेख केला म्हणून. कुठल्याही विशिष्ट देवाचे नाव न घेता विधान केलं आहे, त्यात अशा देवाचं वर्णन आहे जो 'देव' ह्या सश्रद्धांच्या संकल्पनेत बसत नाही. मग त्यांच्या धार्मिक भावना का दुखावतात? शंकराला शिवी दिली तर मुस्लिम रागावतील काय? अल्लाहला शिवी दिली तर हिंदु रागावतील काय? जिजसला शिवी दिली तर जैनांना राग येईल काय? माझं विधान धार्मिक भावना दुखावणारं कसं आहे ते पटवून दिलंत तर तुमच्या अपेक्षेबद्दल विचार करता येईल. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 11:55
हे वाक्य असे वाचावे: मागचे पुढचे काही न वाचता एक शब्द उचलून कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील तर सर्वस्वी अशक्य आहे.

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे Tue, 12/01/2015 - 12:42
"जो देव तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या देवाला लाथ मारा." डांगे साहेब हेच विधान जर आपण असे वाचले तर? "जो "बाप" तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या "बापाला" लाथ मारा." असे पटेल काय? आपण नास्तिक असाल पण शेवटी प्रत्येक माणसाची एक श्रद्धा असते( ती असणे बरोबर कि चूक हा एक वेगळा मुद्दा असू शकतो) त्याला आपण इतक्या सहज ठोकर मारता हे पटले नाही.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 13:22
डॉक्टरसाहेब, जो "देश/समाज/धर्म" तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या "देश/समाज/धर्माला" लाथ मारा. असंही वाचून बघा. मला नक्की काय म्हणायचे ते लक्षात येईल अशी अपेक्षा आहे.

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय Tue, 12/01/2015 - 12:49
आपल्याकडून अश्याच आक्रस्ताळ्या प्रतिसादाची अपेक्षा होती. तुम्ही तुमची वाक्य नीट वाचत नाही किंवा तुम्ही काय लिहिता ते तुमचे तुम्हाला कळत नाही. किंवा कदाचित मुद्दाम वाद निर्माण करण्यासाठी तुम्ही असले वाचाळ प्रतिसाद देता. पहिली गोष्ट म्हणजे तुमची दोन्ही वाक्ये वेगळी आहेत. ती एकत्र करुन लिहिली असतीत तर कदाचित वरचा प्रतिसाद तरी ग्राह्य धरला असता. दुसरी गोष्ट म्हणजे "लाथ मारा देवाला" हे पुर्णपणे अमान्य, अग्राह्य, अस्थायी आहे. तुम्हाला तुमच्या देवाबद्दलच्या भावना योग्य शब्दात मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे. पण देवाला लाथा मारा, त्याच्यावर थुंका, मुता (उरलेले दोन शब्द तुम्ही लिहिलेले नाहित. ते उदाहारणार्थ दिले आहेत) असली अग्राह्य भाषा ही मुळात एखाद्याच्या श्रद्धेबद्दल असलेली कमालीची असहिष्णुता दर्शवते. तुम्हाला तुमचा नास्तिकपणा गोंजारत बसण्याचा पुर्ण अधिकार आहे. मात्र हे करताना आस्तिकांच्या भावनेविषयी अनादर दाखवणे हे हीनपणाचे लक्षण आहे. चूक स्पष्टपणे दाखवल्यावर ती मान्य करुन दुरुस्त करण्यापेक्ष दुरुत्तरे करणे, वाद घालणे, आक्रस्ताळेपणा करणे हाच जर तुम्ही तुमचा युएसपी करु इच्छित असाल तर नाईलाज आहे. योग्य त्या भाषेत सर्वांनाच उत्तरे देता येतील. मात्र हे करताना "देवाला लाथा घाला" असली दळभद्री भाषा वापरणे किंबहुना कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी उगाच काड्या सारण्यासाठी असंस्कृत भाषा वापरणे आमच्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे प्रतिवाद करताना थोड्या मर्यादा जरुर येतील पण मलातरी पातळी सोडुन बोलणे शक्य होणार नाही. कुठल्याही विशिष्ट देवाचे नाव न घेता विधान केलं आहे, त्यात अशा देवाचं वर्णन आहे जो 'देव' ह्या सश्रद्धांच्या संकल्पनेत बसत नाही. मग त्यांच्या धार्मिक भावना का दुखावतात? शंकराला शिवी दिली तर मुस्लिम रागावतील काय? अल्लाहला शिवी दिली तर हिंदु रागावतील काय? जिजसला शिवी दिली तर जैनांना राग येईल काय? माझं विधान धार्मिक भावना दुखावणारं कसं आहे ते पटवून दिलंत तर तुमच्या अपेक्षेबद्दल विचार करता येईल. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल. तुम्ही कुठल्याही विशिष्ट धर्माचे नाव घेतले नाही म्हणुभाते धार्मिक भावना न दुखावणारे विधान आहे हा तर्क अजब आहे. देव ही वैश्विक संकल्पना आहे. किंबहुना जगातल्या ९९% धर्मांचा गाभा देव हाच असेल. देवाला कुठल्या स्वरुपात पहायचे याबद्दलचे प्रत्येक धर्माचे निकष वेगळे असु शकतील. पण म्हणुन देव ही संरचना नाकारता येतच नाही. एखाद्या अज्ञेयवाद्यासाठी देवाचे अस्तित्व नसणे हा समज योग्य असु शकतो पण जगाच्या पाठीवरील बहुसंख्य धर्मात देवाचे अतित्व मान्यच आहे. तुम्ही या संरचनेला उद्देशुनच "लाथा घाला" असे म्हटले आहे. इथे ते हिंदुंच्या देवासाठी म्हटले किंवा मुसलमानांच्या देवासाठी म्हटले हा मुद्दा पुर्णतः गैरलागू आहे. किंबहुना मुस्लिमांच्या देवासाठी बोललात तर धार्मिक भावना दुखावणार नाहित आणी हिंदुंच्या देवाबद्दल बोललात तर दुखावतील असेही काही नाही. वाटल्यास "मुस्लिमांचा देव" असे स्पष्टपणे लिहुन मग त्याला "लाथा घाला" असे वक्तव्य खुषाल करुन पहा. मला ते ही आवडणार नाही. पण तुम्हाला प्रयोग करुन बघायचा असेल तर करा की. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल. गंमतच आहे. कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली. उद्या तुम्ही म्हणाल की माझ्या वरील विधानावरुन माझा स्त्रीशिक्षणाला विरोध आहे असे समजावे लागेल. आता असल्या फालतु तर्कांना मी कं क्रवे ब्रं? ज्याची त्याची जाण समज वगैरे वग्रै.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 13:18
पण देवाला लाथा मारा, त्याच्यावर थुंका, मुता (उरलेले दोन शब्द तुम्ही लिहिलेले नाहित. ते उदाहारणार्थ दिले आहेत) हे अतिशय चिंताजनक आहे. आपण एखादं विधान कुठल्या बाजूने झुकणारं आहे हे स्वतःच ठरवून मो़कळे होता हे आधी मंत्रीमंडळाच्या विधानाबद्दल जे झालं तिथेच लक्षात आलं. इथेही तेच. ज्या वाक्याचा साधा अर्थ देवाला बंदिस्त करणार्‍या व्यवस्थेला नाकारा इतकाच अभिप्रेत आहे. 'लाथ घाला' म्हणजे तिथे जाऊन प्रत्यक्ष मुर्तीवर लाथ घाला असेच म्हटले असे तुम्ही कशावरून ठरवले? त्या विधानाला दुसर्‍या बाजूने ढकलत नेऊन 'थुंका-मुता' इथपर्यंत घेऊन जाणे, वरून मला असंच म्हणायचे होतं असे अर्थ काढणे म्हणजे वा! तुमची 'देव ह्या संकल्पनेला विरोध करणार्‍यांबद्दलची' स्वतःची मते माझ्यावर लादू नये अशी प्रांजळ प्रार्थना. कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली हेच तुम्हाला आणि इतरांना ज्यांनी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला त्यासाठी म्हणावेसे वाटते. माझे इतर धाग्यांवरचे ह्याच विषयाशी संबंधीत प्रतिसाद आपण वाचलेले नाहीत असे दिसते. तसेच माहितगार यांना जो प्रतिसाद दिला व त्याचे शेवटचे वाक्य उतावीळपणाच्या भरात आपण वाचलेले नाही असेही दिसते. अन्यथा आपण असा प्रतिसाद टाकलाच नसता. बाकी कोणत्या प्रॉडक्टचा युएसपी काय असावा हे कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार ठरते हे आपणास मी काय सांगावे. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय Tue, 12/01/2015 - 14:42
हे अतिशय चिंताजनक आहे. आपण एखादं विधान कुठल्या बाजूने झुकणारं आहे हे स्वतःच ठरवून मो़कळे होता हे आधी मंत्रीमंडळाच्या विधानाबद्दल जे झालं तिथेच लक्षात आलं. इथेही तेच. तुम्ही काय लिहिता ते तुमचे तुम्हालाच कळत नाही वगैर वगैरे जे मी वरती लिहिले आहे. त्याचा संदरभ मंत्रिमंडळाचा धागच होता. तिथेही तुम्ही चुकीचे लिहुन माती खाल्ली आणि मग सारवासारव केली. इथेही तेच करत आहात. तुम्ही चुकीच्या प्रकारे लिहिता म्हणुन आम्हाला कळफलक बडवावा लागतो. ज्या वाक्याचा साधा अर्थ देवाला बंदिस्त करणार्‍या व्यवस्थेला नाकारा इतकाच अभिप्रेत आहे. 'लाथ घाला' म्हणजे तिथे जाऊन प्रत्यक्ष मुर्तीवर लाथ घाला असेच म्हटले असे तुम्ही कशावरून ठरवले? तुम्ही जे लिहिले आहे तेच मी उद्ध्रूत करतो आहे. तुम्ही स्पष्ट शब्दात "अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला.." असे लिहिले आहे. इथे "लाथा मारा" आणि "च्यामायला त्या" या दोन्ही शब्दसमूहांना माझा आक्षेप आहे. आणि तुम्ही जे लिहिले आहे तेच मी परत टंकले आहे. तुम्ही स्पष्ट लिहित जा म्हणजे नंतर असली सारवासारव करावी लागणार नाही. तुम्ही चुकीचे लिहित आहात आणि वर कांगावा करत आहात. हे पहिल्यांदा होते आहे असे नाही. पण इतर वेळेस तो मनुष्यस्वभाव म्हणुन सोडुन देता येइल. इथे धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये जाणुनबुजुन करुन तुम्ही वातावरण दूषित करत आहात. त्या विधानाला दुसर्‍या बाजूने ढकलत नेऊन 'थुंका-मुता' इथपर्यंत घेऊन जाणे, वरून मला असंच म्हणायचे होतं असे अर्थ काढणे म्हणजे वा! बघा. तुम्हीच किती आक्रस्ताळेपणा करत आहात. मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही 'थुंका-मुता' लिहिलेले नाही. लाथा घाला हे काही फार वेगळे वक्तव्य आहे असे नाही. बाकी मी अर्थ काहिच काढलेला नाही,. तुम्ही स्पष्टपणे लिहिलेले आहे. "तु गाढव आहेस. कुत्रा आहेस तु" असे लिहायचे आणि वर तोंड करुन म्हणायचे की "तु गाढवासारखा कष्टाळु आणि कुत्र्यासारखा प्रामाणिक आहेस असे मला म्हणायचे होते. तु चुकीचा अर्थ काढतोस" तर ती निव्वळ सारवासारव झाली. इथे स्पष्ट शब्दात "लाथ मारा च्यायला त्या देवाला.." असे लिहिले आहे तुम्ही. अर्थ काढायला पण वाव नाही ठेवलेला. तुमची 'देव ह्या संकल्पनेला विरोध करणार्‍यांबद्दलची' स्वतःची मते माझ्यावर लादू नये अशी प्रांजळ प्रार्थना. मी कुठलीही मते लादत नाही आहे. तुम्ही ओझे वाहत चालला आहात त्याला मी काय करणार? कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली काहीही बोलण्याची हद्द तर तुम्ही केली आहे. माझे इतर धाग्यांवरचे ह्याच विषयाशी संबंधीत प्रतिसाद आपण वाचलेले नाहीत असे दिसते. तसेच माहितगार यांना जो प्रतिसाद दिला व त्याचे शेवटचे वाक्य उतावीळपणाच्या भरात आपण वाचलेले नाही असेही दिसते. अन्यथा आपण असा प्रतिसाद टाकलाच नसता. स्वतः उतावीळपणे बेताल वक्तव्ये करायची आणी मग चोर तो चोर वर शिरजोर या न्यायाने तोंड वर करुन बोलायचे ही सवय आपली असावी. आमची नाही. बाकी कोणत्या प्रॉडक्टचा युएसपी काय असावा हे कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार ठरते हे आपणास मी काय सांगावे. प्रॉडक्टचा युएसपी प्रॉडक्टवरच ठरतो. त्यातले इंप्रोव्हायझेशन कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार होते.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 15:05
मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही 'थुंका-मुता' लिहिलेले नाही. लाथा घाला हे काही फार वेगळे वक्तव्य आहे असे नाही. बाकी मी अर्थ काहिच काढलेला नाही,. तुम्ही स्पष्टपणे लिहिलेले आहे.
तुम्हाला हिस्टरी चॅनलवरचा हा माणूस आठवतो काय? अगदी असंच बोलतो. cc

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय Tue, 12/01/2015 - 19:50
नाय ब्वो. आम्हाला काही असला कोणी माहिती नाही. पण वरचा तो फोटो बघुन कळाले की तुम्ही फक्त चुकीचे लिहितच नाही तर चुकीचे अर्थ पण काढता. तुम्ही जरा मराठी भाषा समजुन उमजुन लिहित चला बरे म्हणजे तुमच्याच डोक्यात गोंधळ कमी उडेल.

नूतन सावंत Mon, 11/30/2015 - 19:03
यावरून इंदिरा गांधीन पंतप्रधान असतानाही तिरुपती मंदिरात जाण्यास विरोध झाला होता त्याची आठवण झाली.तेव्हा इंदिरा गांधी मंदिरात न जाता परत गेल्या होत्या त्याची आठवण झाली.

In reply to by नूतन सावंत

बोका-ए-आझम Mon, 11/30/2015 - 19:45
केरळातील गुरुवायूर येथील प्रसिद्ध अय्यप्पा मंदिरात हा विरोध झाला होता. त्याचं कारण ते कार्तिकेयाचं (जो अखंड ब्रम्हचारी समजला जातो) मंदीर आहे असं सांगण्यात आलं होतं. तिरुपती मंदिरात असं काही असल्याचं पाहण्यात किंवा ऐकण्यात आलेलं नाही. चूभूद्याघ्या.

In reply to by नूतन सावंत

राही Tue, 12/01/2015 - 10:17
मला वाटते उडीशातल्या जगन्नाथ मंदिरात(ही) असा विरोध झाला होता. त्यांच्या हत्येआधी एक दोन दिवस. इंदिरा गांधींचे शेवटचे जाहीर भाषण या उडीशा दौर्‍यातले होते आणि 'माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून भारताला संजीवन मिळेल' या अर्थाच्या शब्दांमुळे कायम स्मरणात राहाण्याजोगे झाले आहे.

अजून एक गोष्ट दैनिकात वाचण्यात आली की भारतातील शंभर टक्के साक्षर म्हणुन मिरवणार्‍या केरळ राज्यातील घटना. आपण अजूनही मानसिकरित्या कसे विकलांग आहोत हे दर्शविणारी ही घटना. केरळमधील पठाणमधिटा जिल्ह्यात असणार्‍या सबरीमला मंदिराचे विश्वस्त यांनी एका मशीनची मागणी केली आहे. हे स्कॅनिंग मशीन मंदिराच्या सुरक्षेसाठी असेल असे वाटले परंतु तसे ते नाही. तर या मशीनद्वारे महिलांची पवित्रता सिद्ध केली जाणार आहे. मंदिर विश्वस्तांना असे वाटते की मासिक धर्माच्या काळात स्त्रीया अस्वच्छ आणि अपवित्र असतात. आता स्कॅनिंग करणारं मशिन मासिक धर्म असणार्‍या स्त्रीया ओळखणार आहे. आणि अशा ओळखलेल्या गेलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. कारण अशा विटाळलेल्या महिलांमुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता वाटते. जी गोष्ट नैसर्गिक आहे त्यामुळे देवालाही विटाळ होतो ? स्त्रीयांनी या गोष्टीला विरोध म्हणुन हॅपी टू ब्लीड ही चळवळ सुरु केलीच आहे. आपण ब्वॉ ही गोष्ट सबरीमला देवावर आणि शनिमहाराजावर सोडून दिली आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सतिश गावडे Mon, 11/30/2015 - 22:39
दुर्दैव... मंदिरातील देवाचं आणि त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ इच्छिणार्‍या स्त्रीयांचं.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

pacificready Mon, 11/30/2015 - 23:09
विश्वस्तांचा निषेध. बुद्धीची कीव कराविशी वाटते. देवस्थान सुधारा भगव्यान्नो आधी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करेक्ट ! पुरोगामी विचारांच्या लोकांनी ह्यॅप्पी टु ब्लीड वगैरे आंदोलने करत बसण्यापेक्षा असल्या दगडाच्या देवावर आणि संस्थानांवर बहिष्कार टाकावा . ह्याचे दुहेरी फायदे आहेत पुढील प्रमाणे १) पुरोगामी लोकांन्ना पुरोगामित्वाचा आनंद आणि समाधान मिळेल. २) परंपरावादी लोकांन्ना मंदीरात गर्दी कमी झाल्याचा अन निवांतपणे दर्शन घेता आल्याचा आनंद मिळेल. आणि एकच की परंपरावादी लोकांनी स्वतःच्या हुच्चतेची जाहिरात करु नये अन पुरोगामी लोकांनी त्यांन्ना चणे फेकुन मारु नयेत , बस्स इतकेच जमले तर सर्वेत्र सुखिनो सन्तु: हे साध्य होईल !! :)

गामा पैलवान Mon, 11/30/2015 - 23:25
च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे उमाळे दाटल्यावर संबंधितांना हिंदूंची मंदिरेच बरी आठवतात! एव्हढाच जर पुळका आला असेल तर स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी म्हणतो मी. कोणी अडवलंय! -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार Tue, 12/01/2015 - 10:48
च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे उमाळे दाटल्यावर संबंधितांना हिंदूंची मंदिरेच बरी आठवतात!
आपण धागालेख नीट वाचला आहेत का ? स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करताना हा धागालेख कोणत्याही एकाच विशीष्ट धर्माला लक्ष्य बनवत नाही हे लेखाच्या शेवटी स्पष्ट नमूद केले आहे, अशा स्वरूपाच्या असमानता राखणार्‍या सर्वच धर्मसंस्थांच्या प्रबोधनाचे आवाहन या धागालेखातून आवाहन केले आहे. शनि शिंगणापूर हे केवळ चर्चा सुरवातीसाठी निमीत्तमात्र आहे. केवळ शनि शिंगणापूरला लक्ष्य बनवायचे असते तर धागा लेखाचे शीर्षक तसे लिहिले असते, ध्रर्मसंस्था आणि धर्मस्थळे संबंधाने पक्षपात टाळण्याचा अधिकतम प्रयास केला आहे.
एव्हढाच जर पुळका आला असेल तर स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी म्हणतो मी. कोणी अडवलंय!
गा.पै. आपल्या या वाक्याचा नेमका अर्थ लक्षात आला नाही अर्थ काय होतो ते कृपया स्पष्ट कराल काय ? म्हणजे इतरांना चर्चा करता येईल

In reply to by माहितगार

गामा पैलवान Tue, 12/01/2015 - 19:59
माहितगार, माझं म्हणणं अधिक व्यवस्थित शब्दांत मांडता आलं असतं. ते न केल्यामुळे तुमची आणि वाचकांची क्षमा मागतो. १.
स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करताना हा धागालेख कोणत्याही एकाच विशीष्ट धर्माला लक्ष्य बनवत नाही हे लेखाच्या शेवटी स्पष्ट नमूद केले आहे,
बरोबर आहे. जे लोकं मंदिरांतल्या विविध प्रथांना स्त्रीपुरुष भेदभावाचा रंग देऊ इच्छितात त्यांच्यासाठी माझा प्रतिसाद आहे. धागाकर्त्यासाठी नाही. २.
आपल्या या वाक्याचा नेमका अर्थ लक्षात आला नाही अर्थ काय होतो ते कृपया स्पष्ट कराल काय ? म्हणजे इतरांना चर्चा करता येईल
जिथेतिथे स्त्रीपुरुष समानता बघायची ज्यांना हौस आहे त्यांनी स्वत:च्या शरीराकडे बघायला शिकावं. आपलं शरीर आणि मन हेच मुळी स्त्रीपुरुष भेदभावावर आधारलेलं आहे. उगाच मंदिरबिंदिर अशा बाह्य ठिकाणी समानता पैदा करण्याऐवजी स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी. आ.न., -गा.पै.

एस Mon, 11/30/2015 - 23:36
'देव दानवां नरे निर्मिले' आणि त्यांचे नियमही. देव जर असलाच तर त्याच्यापाशी कसला भेदभाव असूच कसा शकेल? शनिशिंगणापूरच्या गावकर्‍यांनी शनिदेवाला दुधा-तेलाचा अभिषेक घालून स्वतःच्या कोतेपणाचे दर्शन घडवले आहे. देवाला विटाळ घडविणारीही माणसेच. आणि देवाचे शुद्धीकरण करणारीही माणसेच! अजब आहे सगळे...

In reply to by एस

सर्वच प्रस्थापित धर्मांमधे एक अनुस्यूत घटक म्हणून हा दुजा-भाव पहिल्या पासून आहे....ज्याना बदलायच आहे त्यानी बिनदिक्कत बदलाव.. धर्म आपोआप बदलेल..ज्याना जाणीव पूर्वक मागास रहायच असेल,त्यांना राहु द्यावे. ते आपोआप गाळात जातील. दुसरे धर्म बदलत नाहीत,मग आम्ही तरी का बदलाव? अस म्हणणाय्राना तर बदलाची इच्छा असलेल्यानी मुद्दाम स्वत: बदलून त्याची ताकद कमी करावी. जोपर्यंत इथे लोकशाही आहे , तो पर्यंत हे सहज शक्य आहे

In reply to by अत्रुप्त आत्मा

हो , व्यक्तिगत पातळीवर सत्यनारायणासारखी सरळ सरळ लुबाडणुक करणारी पुजा अन अन्य कर्मकांडे संपुर्णपणे बंद करणे आम्हाला जमले आहे :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

माहितगार Tue, 12/01/2015 - 11:45
@ अत्रुप्त एक चांगाला प्रतिसाद, असा प्रतिसाद देण्यासाठी धारीष्ट्य लागते. बाकी प्रगोंंच्या प्रतिसादाबाबत; सत्यनारायण कथेत कुठे दुजाभाव असण्याबद्दल अजून एकदा अभ्यासावी लागेल पण तरीही -सत्यनारायण कथेतील काही विश्वास तुर्तास बाजूस ठेवले तर- सत्यनारायण सर्वांचा समान सहभाग वाढवण्यास उपयूक्त आहे का त्या बाबत त्यात भेदभाव कमी असावा अंदाजा आहे जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by कवितानागेश

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 09:50
धागालेखकांनी एकाच धाग्यात दोन वेगवेगळे मुद्दे मांडलेत. मला तरी दोन्हींची सांगड कशी घालावी हे कळले नाही. माझ्यामते 'समानतेचे तत्त्व' पुरुषवर्गाला समजावून सांगण्यात स्त्रिया कमी पडतात असे त्यांना म्हणायचे आहे. आता समानतेचे तत्त्व न पाळणार्‍यांमधे स्त्रि-पुरूष असा काही भेद दिसून येत नाही. त्यामुळे तो मुद्दा रद्दबातल होतो. बहुतेक 'पुरूषांसोबत अर्ग्युमेंट मधे स्त्रिया कमी पडतात' असे त्यांना म्हणायचे आहे काय असा मला प्रश्न पडला कारण मग हा जरा गंमतीदार विषय होइल. शिर्षक वादग्रस्त असावे याचसाठी केला होता अट्टाहास असे वाटत आहे. धागालेखकांनी यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.

In reply to by संदीप डांगे

माहितगार Tue, 12/01/2015 - 11:05
बहुतेक 'पुरूषांसोबत अर्ग्युमेंट मधे स्त्रिया कमी पडतात' असे त्यांना म्हणायचे आहे काय असा मला प्रश्न पडला कारण मग हा जरा गंमतीदार विषय होइल.
=)) अहो काहीही काय ? =)) एनीवे हा विषय या धागा लेखाच्या परिघातला नाही. बाकी धागा लेखाचा मुद्दा क्रमांक १ तुर्तास चर्चेसाठी पुरेशी हिंट देणारा आहे असे वाटते. अधिक स्पष्टीकरण म्हणजे प्रश्नही मीच विचारला उत्तरही मीच दिले होईल म्हणून चर्चा बरिच पुढे गेल्यावर अथवा संपताना देईन.

In reply to by कवितानागेश

नीलमोहर Tue, 12/01/2015 - 09:58
" शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे." मोठ्या अपेक्षेने धागा उघडला होता या विषयी काही उपयुक्त माहिती मिळेल म्हणून, पण हे 'उल्लू बनाया बडा मजा आया' असं झालं आहे. बाकी जिथे आपलं स्वागत आहे तिथे जावं, जिथे नाही त्याचा विचारही करू नये असं आमचं तत्व. आमच्या आवडत्या तळ्यातल्या गणपतीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात, तिथे जाऊन डोकं टेकून यायचं. दर्शनासाठी न येता कचरा करायला येणार्‍या बुरखेधारी भक्तांना नो एंट्री, असा फलक न लावलेलं सहिष्णू देवस्थान आहे ते.

गॅरी ट्रुमन Tue, 12/01/2015 - 11:04
स्त्रियांना किंवा अन्य कोणालाही मंदिर प्रवेशापासून रोखणे अयोग्य आहे याविषयी फारसे दुमत नसावे. पण मंदिरात जाऊन काय होते, सगळी मंदिरे बंदच करा वगैरे विचार असणारे लोक हमरीतुमरीवर येऊन चर्चा करताना दिसले की जरा मजाच वाटते. समजा माझे असे मत आहे की दारूचे गुत्ते बंद करून टाकावेत आणि कुठल्या दारूच्या गुत्त्याने "ट्रुमन अडनावाच्या लोकांना प्रवेश नाही" अशा स्वरूपाची पाटी लावली तर त्यामुळे मला काय शष्प फरक पडणार आहे? अन्यथाही मी तिथे जाणार नव्हतोच त्यामुळे बंदी असली काय आणि नसली काय--- हू केअर्स? मंदिरांविरोधात असे मत नसणार्‍या इतर सर्वांचे आक्षेप मात्र नक्कीच ग्राह्य आहेत असे मला वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 11:33
इथे 'स्त्रियांना प्रवेशबंदी हे स्पष्ट भेदभावाचे निदर्शक आहे' हा चुकीचा ग्रह काहिजणांनी करून घेतला आहे असे दिसून येते आहे. त्यामुळे लगेच सामाजिक न्यायतत्त्वानुसार सर्वांना समान हक्क, दर्जा ह्याची भलामण करून सर्वांना मंदिरप्रवेशाचा आग्रह धरला जात आहे. पण हे इतके सरळ, साधे सोपे आहे काय? खरा मुद्दा साधनशुचितेचा आहे. वर काहींनी कपड्यांचे उदाहरण दिले आहे. कुणी बिकिनी घालून मंदिरप्रवेश केलेला चालेल काय? पुरुषांनी भले अंतर्वस्त्रांवर ओलेते गेले तर चालते, पण स्त्रियांनी तसेच करावे असा आग्रह धरून चालेल काय? तिथे समानतेचा आग्रह केला तर मान्य होईल काय? चपला, बूट घालून गेलेले चालेल काय? गुत्त्यात जायचेच नसेल तर प्रश्नच मिटतो पण ट्रुमन यांना गुत्त्यात जायची इच्छा आहे पण वय २१ पेक्षा कमी असल्याने प्रवेश नाकारला जाईल, त्यावेळी सामाजिक समानतेचा मुद्दा का लागू होत नाही हे सांगता आले तर बर्‍याच बाबी स्पष्ट होण्यास मदत होईल. तीच गोष्ट संवैधानिक पदांवरील व्यक्तिच्या वयाच्या अटीची, सरकारी नोकरीच्या पदावरील शैक्षणिक अर्हतेच्या अटीची. प्रत्येक जागी सरसकट प्रवेश नाकारणारे इतर मुद्दे असतात. तिथे भेदभाव होतो असे कसे म्हणता येईल?

बॅटमॅन Tue, 12/01/2015 - 12:08
या निमित्ताने उहापोह होतो आहे ही चांगलीच गोष्ट आहे. खुद्द कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळाच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश नव्हता अगोदर, पाळी ऑर नॉन पाळी. तो ब्यान उठल्याचे कळते, तसेच इथेही होईल मोस्टली होपफुली.

संदीप डांगे Tue, 12/01/2015 - 12:35
शनि मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदीचे कारण कळल्यास ह्या विषयावर अजून विस्तृत व समर्पक चर्चेस मदत होईल म्हणून सामान्य जनमानसात रूढ असलेल्या काही मान्यता: स्त्रियांच्या शनिमंदिर प्रवेशाला खरा कारणीभूत आहे तो मारूतीराया. कसा? तर मारुतीराया, हनुमान हा आजन्म ब्रह्मचारी आहे, शिवाय तो चिरंजीव आहे, परत तो सर्वव्यापी-विशाल आहे. 'हनुमानतत्त्व' असं काही मानल्या जातं. समर्थांनी महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी, गावोगावी मारुतीची प्रतिष्ठापना केली. गावात बलोपसाना व्हावी, त्यातून भक्ती आणि शक्तीची उपासना होऊन चांगले तरूण तयार व्हावे अशी त्यांची योजना. दुसरी मान्यता अशी की गावात मारुतीचे मंदीर असेल तर भूत-प्रेत-पिशाच्च यापासून गावाचे रक्षण होते. तीसरी मान्यता अशी की हनुमान हा जागृत देव आहे. म्हणजे त्याचे आवाहन केले तर तो खरंच त्या ठिकाणी येऊन भक्तांच्या समस्या दूर करतो. तो असे करु शकतो ही मान्यता इतकी घट्ट आहे कारण तो अजून जीवंत आहे, त्याला वेगवेगळे आकार, अवस्था घेता येतात ही मान्यता. त्यामुळे शक्यतो हनुमानमंदिरात गांभिर्य जास्त असते. तो इथेच आसपास आहे, आपण काही उलट सुलट केले तर कानफाटवेल अशीही भीती असते. चौथी मान्यता अशी की हनुमान वीर्यतेजाने संपृक्त आहे. त्याच्या नुसत्या उच्छवासाने वा अवतीभवतीच्या वातावरणाने स्त्रिया गर्भवती राहू शकतात. इतके त्याचे वीर्यतेज बलवान आहे. आता आपल्या लक्षात येईल की याचमुळे कुमारी मुलींना हनुमानमंदिरात बंदी असायची. (असायची असे म्हटले आहे कारण गेल्या १०-१५ वर्षात विचारधारा बदलत गेल्या). अघोरीसदृश्य तंत्रविद्येत मूल न होऊ शकणार्‍या स्त्रीने अनावृत्त अवस्थेत जाऊन मध्यरात्री हनुमानाची विशिष्ट तंत्राने पूजा करून हनुमानत्त्व जागृत करून त्यास प्रसन्न करणे व गर्भवती होण्याची इच्छा पूर्ण करणे असेही विधी आहेत. ह्याचे एक उदाहरण मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहे. म्हणजे मध्यरात्री स्त्री हनुमान मंदिराकडे जातांना पाहिली आहे. ते सर्व दृश्य पार टरकवणारे असते, त्यामुळे पुढे काही बघायची हिंमत झाली नाही. तेव्हा माझे वयही १५-१६ होते. हेच वीर्यतेज नव्याने गृहस्थाश्रमात प्रवेश करणार्‍या नवरदेवाच्या अंगात संचारावे म्हणून लग्नाआधी नवरदेवाला हनुमानमंदिरात दर्शनाला घेऊन जाण्याची प्रथा आहे. आजकाल मानवी अहंकार वाढल्याने ह्या प्रथेचे कारण विचित्रपणे बदलल्याचेही काही ठिकाणी दिसून येते. म्हणजे स्वतःमधे काहीच कमतरता नाही हे दाखवण्यासाठी त्याच्या विर्यतेजाची मला गरज नाही असे म्हणून त्याचे लग्न झाले नाही त्या बिचार्‍या ब्रह्मचार्‍याचा आशिर्वाद चांगला असेल म्हणून दर्शनाला आलो असं काहीसे. एवढं सगळं लक्षात घेतलं तर स्त्रियांनी हनुमानापासून दूर राहावे यामागचे कारण समजुन येईल. आता शनीमहाराजांनी काय घोडं मारलं? तर कुठल्याशा पुराणकथेनुसार शनीमहाराज हे हनुमानाचे अंकित आहेत, साडेसातीत त्रास कमी व्हावा म्हणून शनीसोबतच हनुमानाचीही उपासना करावी म्हणजे हनुमानजी शनीला तंबी देऊन आपल्या भक्ताचे त्रास कमी करून देतात. हनुमानजी आणि शनी हे एकसारखेच मानले जाऊ लागले. ३०-४० वर्षांआधी शनीमंदीर हे काही फार प्रस्थ नव्हते. एखाद्या गावात एखादे दुर्लक्षलेले शनीमंदीर असायचे. आता ते दुर्लक्षलेले नाही हा भाग वेगळा. पण हनुमानमंदिरापेक्षा शनीमंदिरास कमी महत्त्व होते, जे लोक साडेसातीने त्रस्त आहेत तेच तिथे पुजेला जात. पण तिथे गेल्यावरही हनुमानाचेच नियम लावत. परत शनीमहाराजांची कडक असल्याबद्दलची ख्याती. ह्यामुळे स्त्रियांना प्रवेश नाकारणे घडत आले आहे. ह्यात कुठेही भेदभाव, असमानता वैगेरे नाही. अनेक ठिकाणी आता स्त्रिया न घाबरता प्रवेश करत आहेत. काही हनुमान-शनी मंदिरांत अजून कर्मठ व्यवस्था आहे. हळूहळू सर्व बदलणारच आहे. वरील सर्व जनमान्यता आहेत. वैज्ञानिक सत्ये नव्हेत त्यामुळे चर्चा करतांना ह्याचे भान असणे गरजेचे.

pacificready Tue, 12/01/2015 - 12:40
गवि सर, तुमच्या टंचनिकेची- दिसायला ज़रा कमी सुन्दर आणि तत्त्वज्ञानात बऱ्यापैकी पक्की- बहिण डांगे अण्णा कड़े पाठवली आहे ना? खरं सांगा सर.
प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे.