Skip to main content

समाजमन

जगा आणि जगू द्या!!

लेखक बाजीप्रभू यांनी रविवार, 23/10/2016 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धाची शिकवण आणि आपण, "खून ऋजुरात" आमच्या कंपनीच्या थायलंड युनिटची स्टोर्स मॅनेजर. अतिशय बुद्धिमान, दर आठवड्यात होणाऱ्या प्रोजेक्ट स्टेटस मिटिंगमधे कंपनीच्या सीईओच्या प्रश्नांनी फाफलणारे एक आम्ही आणि एका दमात क्रिस्टल क्लीअर रिपोर्ट देणारी "खून ऋजुरात" दुसरीकडे. ३० जणांच्या स्टाफला आणि स्टोर्स डिपार्मेंटला लीलया हाताळते. ऑडिटर्सना आजतागायत स्टोर्स डिपार्टमेंटच्या चुका शोधता आल्या नाहीत. तिच्या कामाची पद्धत इतरांनाही शिकावी म्हणून तिला मागे आमच्या स्विझर्लंड युनिटच्या स्टोर्स डिपार्मेंटला ट्रेनिंग देण्यासाठी पाठवले होते.

भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 06/06/2016 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी. पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा.

देऊळ, लोकल ट्रेन, चित्रपटगृह आणि माणसं

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 01/12/2015 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
तीन घटना. तीन बातम्या. आणि तीन प्रकारे वागलेली तिथली माणसं. याबाबत मी गेले तीन दिवस विचार करतोय. रत्नाकर मतकरींचं एक वाक्य आठवतं, 'माणूस वाईट नसतो; माणसं वाईट असतात.' याबद्दल विचार केला की त्यांचं म्हणणं किती खरं आहे ते जाणवतं. या घटना वृत्तवाहिन्यांनी, वृत्तपत्रांनी पुरेशा चघळल्यात त्यामुळे त्या सगळ्यांना माहित असतीलच. लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाचं वागणं, त्यांचा विचार. शनिशिंगणापूरला, जिथल्या देवळात स्त्रीयांना प्रवेश निषिद्ध आहे, तिथे एका मुलीने जाऊन तेलाचा अभिषेक केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?

लेखक माहितगार यांनी सोमवार, 30/11/2015 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे.

पिंगा, बाजीराव मस्तानी, भन्साळी इत्यादी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 18/11/2015 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
पिंगा. येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू. मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे.

पुरोगामी दहशतवाद

लेखक विकास यांनी सोमवार, 07/09/2015 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्राध्यापक शेषराव मोरे यांच्या विश्व मराठी साहीत्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरील भाषणाचा गोषवारा वाचता आला. भाषण मुळातून संपूर्ण वाचायला आवडेल म्हणजे संदर्भ अधिक लागू शकतो. तरी देखील त्यातिल एका महत्वाच्या मुद्यावर चर्चा झाल्यास उत्तम होईल असे वाटते. प्रा.मोरे म्हणतात:
.....‘हा पुरोगामी आणि तो प्रतिगामी’, ‘हा डावा आणि तो उजवा’ असे शिक्के मारून वर्गवारी करण्याची पद्धत महाराष्ट्रात प्रचलित करण्यात आली आहे. ती कोणी प्रचलित केली? अर्थात ‘पुरोगाम्यां’नी!

हार्दीक ते अन्सारी

लेखक विकास यांनी बुधवार, 02/09/2015 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्टच्या मध्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून वादग्रस्त ठरणार्‍या मागण्या केल्या गेल्या. पहील्यांदा हार्दीक पटेल या विशीतल्या युवकाने पाटीदार पटेल समाजासाठी राखीव जागांची मागणी केली. नंतर काल म्हणजे ३१ ऑगस्टला मज्लीस-ए-मुशावरात च्या ५० व्या वर्धापन दिना निमित्त झालेल्या सोहळ्यात झालेल्या मा.उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी मुस्लीम समाजासाठी विशेष हक्कांची (affirmative action) मागणी केली अथवा सुचना केली. यात राजकारण असू शकेल का? माझ्या सारख्याला नक्की वाटते. दोन्ही घटनांमधे राजकारण करणारे समान नसले तरी उद्देश समान असू देखील शकतो, असे मला वाटते.

सुंदर पिचई आणि ऐंशीच्या दशकातली गरीबी...

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 23/08/2015 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
सुंदर पिचईबद्दल लेख वाचला लोकमतमधे... आजकाल कुणीही यशस्वी झाला की तो कसा गरिबीत जगला याचं फारच चर्वितचर्वण करतात बॉ पत्तर्कार लोक. काय तर म्हणे "तीनच" खोल्यांचं घर होतं, 'स्कूटर'वरून चौघे फिरायचे, 'साधा' टेलिफोनही नव्हता (१९८५), तो आणि त्याच्या भावाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागायचं.. अरे काय राव गरिबाची चेष्टा करताय. हे ऐंशीच्या दशकातल्या एका साध्या गरिब मध्यमवर्गीय कुटूंबाचं वर्णन आहे का? आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणारा गरिब मध्यमवर्गीय?