मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जगा आणि जगू द्या!!

बाजीप्रभू ·

राही 23/10/2016 - 09:50
मुंबई, महाराष्ट्र आणि आता देशभरात 'अनाम प्रेम' या नावाखाली एकत्र आलेल्या एका मोठ्या लोकसमूहाने या लोकांविषयीच्या प्रश्नांना नुसतीच वाचा फोडली नाही तर त्यांना आत्मसन्मानाने जगू देण्याच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली कित्येक वर्षे कोणताही गाजावाजा न करता काम सुरू ठेवले आहे. आपला लेख आवडला.

लेख आवडला. एकीकडे युगप्रवर्तक विचार आमच्या ग्रंथांत ठासून भरलेले आहे असे म्हणणार्‍या आपल्या समाजात दुसरूकडे अश्या नकारात्मक ग्रह/समजूतीही ठासून भरलेल्या आहेत. :(

अनंत छंदी 23/10/2016 - 14:38
लेखातील "त्याना" ही स्वत:ची ओळख हवी, आत्मसन्मान द्यायला हवा ही बाजू १००% पटली. त्यांना जगण्याची समान संधी मिळायलाच हवी. पण, त्याच बरोबर त्यांनीही नीट वागायला हवे हे देखील हवे. हे मत मी व्यक्त करताच माझ्यावर टिकेची झोड उठण्याची शक्यता आहे. पण मी पाहिलेली एक बाजू आपणासमोर मांडतो. पुणे ते लोणावळा या दरम्यान या लोकांची एक वसाहत आहे. त्यातील लोक पुणे लोणावळा लोकलमध्ये भीक (?) त्याला खरेतर खंडणी म्हणणे जास्त योग्य होईल. मागतात. ज्या पद्द्धतीने पैसे मागितले जातात व न दिल्यास अश्लील व अर्वाच्च्य शब्दात त्या माणसाची निरभर्त्सना केली जाते ते ते पाहता या लोकांची दया येणे तर दूर किळस वाटू लागते. यातील अनेकांची कमाई दिवसाला ५ ते ६ हजार रुपये इतकी असते. (माहिती खात्रीशीर आहे) त्यामुळे ते लोक अन्य काही करू पहात नाहीत.

In reply to by अनंत छंदी

ज्या पद्द्धतीने पैसे मागितले जातात व न दिल्यास अश्लील व अर्वाच्च्य शब्दात त्या माणसाची निरभर्त्सना केली जाते ते ते पाहता या लोकांची दया येणे तर दूर किळस वाटू लागते. हे जरा अतिच सेन्सेटिव्ह होतय नाही का ? याहून जास्त त्रास लोकलच्या गर्दीमुळे होतो. तो मुकाट झेलला जातो. तृतीयपंथी इतके अ‍ॅग्रेसिव्ह वगैरे नसतात. थोडा-फार तमाशा करतात. ती किळस वगैरे तुमच्या मनात आहे. यानिमित्ताने उगाचच '१०० रुपयांच्या बदल्यात १ किस' असे किन्नरांबरोबर डील करणारा मित्र आठवला.

In reply to by अप्पा जोगळेकर

सुबोध खरे 24/10/2016 - 18:30
अप्पा साहेब टोकाचे अनुभव बऱ्याच लोकांना आलेले आहेत म्हणून ते असे नमूद केले जातात. माझ्या भावाचे लग्न ठरलेले असताना तो आपल्या वाग्दत्त वधू बरोबर गिरगाव चौपाटीवर बसलेला असताना दोन तृतीय पंथी आले आणि १०० रुपयांची मागणी केली. (१९९० साली हि रक्कम मोठी होती) आणि हि रक्कम न दिल्यास आपले कपडे फेडू म्हणून धमकी दिली. माझा भाऊ निःसंग होता म्हणून त्याने एक पैसा हि देण्यास नकार दिला. एक तृतीय पंथीने आपली साडी वर केली. तरीही माझ्या भावाने एकही पैसा दिला नाही म्हणून ते नाद सोडून निघून गेले. परंतु आजू बाजूच्या जोडप्यानकडून मात्र ते असे जबरदस्तीने पैसे उकळताना दिसत होते. पैसे मिळवण्यासाठी हे लोक "अंगचटीला" येतात हा मात्र सार्वत्रिक अनुभव आहे.आपल्या अंगाला हात लावलेला कोणत्या स्त्रीला आवडेल? दुसऱ्या कोणी भिकाऱ्याने आपले/ आपल्या बायकोचे गाल कुरवाळले तर आपण त्याच्या कानाखाली आवाज काढाल कि नाही? तेंव्हा टाळी फक्त एकाच हाताने वाजत नाही हेही लक्षात ठेवा. बाकी जनता त्यांच्याशी हिडीस फ़िडीस करून वागते यात संशय नाही. त्यांना पण माणसासारखे वागवणे आवश्यक आहे एवढेच नव्हे तर तो त्यांचा हक्क आहे.

बाजीप्रभू 24/10/2016 - 07:29
अनंत छंदी, तुम्हाला आलेला अनुभव इतर बऱ्याच जणांना आला असेल. मनुष्याला असलेल्या षडरिपुंची बाधा याला तेही अपवाद नाहीत. लोभ हा कुणाला चुकलेला नाही. समाजाने वाळीत टाकल्याचा क्रोध, त्यांना माहित असलेली त्यांच्याबद्दल समाजात असलेली एकप्रकारची भीती या सर्वांचा परिपाक तुम्हाला आलेल्या अनुभवात होतो. पण मुद्दा संधी देण्याचा आहे. संधी असूनही ते भिक मागण्याला प्रेफरन्स देत असतील तर तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण मला वाटत नाही असं होईल. थर्ड जेंडर ऍक्टिविस्ट "गौरी सावंत" हि खरंतर माझी सख्खी आतेबहीण आहे. तिच्या रेफरन्स नुसार आपण जे "छक्का" म्हणून हिणवतो ते बहुतांशी चांगल्या घरातून आलेली मुलं/मुली असतात. कुठेतरी १०/१२ व्यावर्षी हे सिम्टन्स दिसू लागतात. मग आई-वडिलांची मारझोड, शाळेतील टिंगल-टवाळीला कंटाळून शाळा सुटणे, प्रचंड घुसमट आणि सरतेशेवटी घर सोडून नाईलाजाने यावस्तीत आश्रयाला येणे.. हा कॉमन पॅटर्न या समाजात दिसतो. सांगायचा मुद्दा असा कि, आईवडिलांचा खंबीर सपोर्ट असेल तर हि मंडळी इतर समाजाला नक्कीच तोंड देऊ शकतात. पण आई-वडीलच जिथे कच खातात तिथे यांचा नाईलाज होतो. आपल्याकडे मेंटली चॅलेंज, मंदबुद्धी मुलांचा आई-बाप सांभाळ करतांना दिसतात पण "किन्नर" म्हणून जन्माला आलेल्या मुलाला हाकलून देण्यात धन्यता मानतात हि भारतातील शोकांतिका आहे. या लोकांमधे टॅलेंड आणि शारीरिक क्षमतेत कोणतीही कमी नसते. थायलंडसारख्या देशाने हे शक्य करून दाखवले आहे, आपणही नक्की करू शकतो.

In reply to by बाजीप्रभू

नाखु 24/10/2016 - 09:07
तर आवडलाच पण हा प्रतिसादही तुमची विषयाबाबत असलेली आस्था आणि सखोल अभ्यास दाखविणारा आहे. आप्ल्या बहिणीला कार्याबद्दल शुभेच्छा आणि एका वेगळ्या प्रबोधनपर लेखासाठी आपले अभिनंदन.

आतिवास 24/10/2016 - 09:02
एका वेगळ्या विषयावर चर्चा सुरू केल्याबद्दल आभारी आहे. तुमचे अनुभव वाचायला आवडले. पण १. शहरी-ग्रामीण हे विभाजन थाईलँडमध्ये टोकदार आहे. त्यामुळे तुम्हाला दिसलेले चित्र शहरी भागात प्रातिनिधिक असले तरी ग्रामीण भागात परिस्थिती वेगळी आहे. २. बौद्ध धर्म - थाईलँडप्रमाणेच थेरवाद बौद्ध धर्म म्यानमार आणि श्रीलंकेतही आहे. तिथंही शहरांत एलजीबीटीना लोकांनी काही अंशी स्वीकारले आहे असं दिसतं - पण संपूर्ण देशाबाबत ते म्हणता येणाार नाही. ३. तुमच्या आधीच्या लेखात तुम्ही लिहिल्याप्रमाणे दुस-या महायुद्धाने थाईलँडमध्ये अनेक बदल झाले. हाही त्यातला एक बदल, पण तो बराच वरवरचा आहे. समाजाने व्यक्तींचे चाकोरीबाहेरचे (हा शब्द कदाचित अयोग्य आहे, स्टिरिओटिपिकल म्हणायचं आहे मला) लैंगिकत्व स्वीकारण्यासाठी थाईलँडला आपल्यासारखीच अजून बरीच वाटचाल करायची आहे. अवांतर - ज्यांना या विषयात अधिक रस आहे त्यांनी हा अहवाल जरूर वाचावा.

In reply to by आतिवास

बाजीप्रभू 25/10/2016 - 09:49
काल अहवाल वाचता होतो पण दुसऱ्या महत्वाच्या कामामुळे बाकी ठेवावा लागला. पुर्ण वाचून मगच प्रतिसाद लिहीन. बादवे लिंकबद्दल आभारी.

लेख आवडला. ते लेडी बॉय, टॉम बॉय म्हणजे काय असत. आणि किन्नर गे असतात म्हणजे काय कोणास ठाऊक. बारीक केस कापणार्‍या मुलीला टॉमबॉय म्हणतात इतकच माहिती होतं. अवांतर - 'घरात आलेल्या सुनेला उंबरठ्यावर फटकवायच' हे गेल्या आठवड्यात लिहिणारे तुम्हीच कसे याच खूप आश्चर्य वाटतय.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाजीप्रभू 24/10/2016 - 15:17
ढोबळ मानाने "लेडी बॉय" म्हणजे शरीर/भावना स्त्रीच्या मात्र जननेंद्रिय पुरुषाचं. आणि "टॉम बॉय" म्हणजे संपूर्ण शरीर स्त्रीचं मात्र भावना/रहायला मुलांसारखं आवडतं असे. अवांतराबत खुलासा, "घरात आलेल्या सुनेला उंबरठ्यावर... " हि गुजरातमधील प्रचलित म्हण आहे. तिचा शब्दशः अर्थ "रूढ़िवादी" वाटत असला तरी ती बऱ्याचदा रूपक म्हणून वापरली जाते. फॉर एक्साम्पल, उदा-१. कामाच्या ठिकाणी बॉस जेव्हा पहिल्यावेळी जास्तीच्या कामासाठी थांबायला लावतो त्या पहिल्याच दिवशीच बॉसला सडेतोड उत्तर दिलं तर नंतर उगाचच थांबायची वेळ येत नाही. उदा-२ मुलं पहिल्यांदा उलट उत्तर देतात तेव्हाच ठेवून दयायची असते म्हणजे परत अपमान होत नाही. इत्यादी. मी गुजरातेत ६ वर्षे राहिलेलो असल्यामुळे तिथल्या काही म्हणी माहित झाल्यात. आपले "ते" गलितगात्र झालेले धागाकर्ते पाहून हि म्हण पोस्ट केली. बाकी मला सुदैवाने म्हणीप्रमाणे वागायची संधी अजूनतरी मिळालेली नाही.

अनुप ढेरे 24/10/2016 - 15:25
माझ्या माहिती प्रमाणे हिजडा = युनक. ज्यांचे टेस्टिकल्स कापलेले आहेत ते. ट्रान्स लोकांनापण हिजडा म्हणतात का? ट्राण्स लोकांना सरकारद्वारे रेकग्निशन मिळत आहे हळू हळू. ही एक आश्वासक बातमी वाचली होती काही दिवसांपूर्वी http://www.thehindu.com/news/national/other-states/manobi-bandopadhyay-indias-first-transgender-college-principal-takes-charge/article7298708.ece

In reply to by अनुप ढेरे

बाजीप्रभू 24/10/2016 - 16:10
फार अभ्यास नाहीये माझा, माहिती घेऊन सांगतो. पण जुजबी माहिती नुसार, तृतीयपंथी (3RD Gender) हि एकच कॅटेगरी वापरली जाते या समाजाची विभागणी करण्यासाठी. जे पूर्ण नर नाहीत किंवा पूर्ण मादी नाहीत असे, बाकी "किन्नर", "हिजडा", "छक्का" व बोली भाषेतील "बापट" हे केवळ साऊथ एशियामधे वापरले जाणारे समानार्थी शब्द आहेत. "ट्रान्स जेंडर" हा शब्द जनरली ज्यांनी आपल्या शरीरात शस्त्र क्रियेद्वारा बदल करून घेतला आहे अश्या लोकांसाठी वापरला जातो. असं असूनही शस्त्रक्रिये पूर्वी आणि नंतर "हिजडा" हे बिरुद पुसलं जात नाही हे विशेष. बाकी दिलेली लिंक वाचून आनंद वाटला. फोटोत मागच्या लोकांचे भाव मात्र लपून राहात नाही.

In reply to by बाजीप्रभू

आतिवास 25/10/2016 - 07:56
"ट्रान्स जेंडर" हा शब्द जनरली ज्यांनी आपल्या शरीरात शस्त्र क्रियेद्वारा बदल करून घेतला आहे अश्या लोकांसाठी वापरला जातो. असं नाहीये हो. इथं पाहा. अवघड आहे.

In reply to by आतिवास

बाजीप्रभू 25/10/2016 - 09:44
अतिवास, माहितीबद्दल धन्यवाद! स्वतःला करेक्ट केलेय तुमच्या माहितीनुसार. खरंतर "थर्ड जेंडर" मंडळींच्या शरीर रचनेबद्दल मला फार कल्पना नाही. कर्णोपकर्णी जे ऐकून माहित आहे तेव्हढच. या धाग्याच्या निमित्ताने तीही माहिती जाणकारांकडून मिळतेय हे विशेष. मिपावरील डॉ. मंडळी यावर अधिकारवाणीने बोलू शकतील. या लेखानिमित्त थायलंडमधील समाज किती प्रगल्भ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होता. प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या बुद्धाच्या शिकवणुकीचा मूळ गाभा या मंडळींनि किती आत्मसात केला आहे याच्या उधाहरणादाखल वरील पोस्ट लिहिली होती. अजून एक उधाहरण म्हणजे "रोड ऍक्सिडंट" होतो तेव्हा थाई मंडळी कशी वागतात याचं. याबद्दल मी एक सेपरेट पोस्ट लिहिणार आहे. त्यासाठी थोडं थांबावं लागेल.

In reply to by बाजीप्रभू

सुबोध खरे 25/10/2016 - 10:01
ट्रान्सजेन्डर म्हणजे ज्यांचे मानसिक लिंग वेगळे असते. म्हणजेच पुरुषाच्या शरीरात लपलेले स्त्रीचे व्यक्तिमत्त्व किंवा उलट(स्त्रीच्या शरीरात लपलेले पुरुष व्यक्तिमत्त्व). यात त्या व्यक्तीला आपली ओळख पुरुष किंवा स्त्री किंवा यातील काहीच नाही अशी हवी असते पण बाह्य लिंगाचा संबंध नाही. या व्यक्ती बऱ्याच वेळेस संभोगासाठी/ शारीरिक जवळिकीसाठी उत्सुक नसतात पण व्यक्तिमत्त्वाची ओळख हवी असते ट्रान्स सेक्सुअल म्हणजे ज्यांचे बाह्य लिंग वेगळे आहे आणि मेंदूला भिन्न लिंगी जाणीव असणे. अशा व्यक्ती आपली शल्यक्रिया करून घेण्यास तयार असतात आणि त्यांना शारीरिक जवळीक/ संबंध ठेवण्यात रस असतो. ट्रान्सवेस्टाईट - या व्यक्ती शरीराने आणि मेंदूने एका लिंगच्या असतात परंतु भिन्न लिंगीय कपडे घातले कि त्यांना अतीव आनंद होतो.परंतु त्यांची शारीरिक जवळीक आणि संबंध हे मूळ लिंगाशी एकरूप असतात.

In reply to by सुबोध खरे

बाजीप्रभू 25/10/2016 - 11:32
सोनाराने कान टोचले हे बरं झालं. आम्ही आपले काहीहि अनुमान लावत होतो. आंतर जालावरची अश्या विषयावरची माहिती आमच्यासारख्या बॉयलर सुट वाल्यांना कमीच कळते.... नेमकी माहिती, वेळेवर दिल्याबद्दल डॉक्टरांचे आभार.

उत्तम विषय अन संवेदनशील मांडणी बाजीप्रभू साहेब, लेख आवडला हे वेगळे सांगणे नलगे, ह्या निमित्ताने एक अनुभव शेअर करावा वाटतोय, २००३-०८ दरम्यान हिमाचलमध्ये खूप भटकत असे मी, त्याकरता मी नागपूर दिल्ली रेल्वेवे प्रवास करत असे. त्या प्रवासात भोपाळ नंतर खूप तृतीयपंथी लोक चढत असत (भोपाळ त्यांच्या मोठ्या वस्ती पैकी एक असून त्यांच्यातील शबनम मौसी ह्या भोपाळच्या मेयर होत्या असे ऐकिवात आहे) लोक ह्या लोकांना खूप हाडहूड करीत असत रेल्वेत, एकदा मी प्रवास करत असताना माझ्या पलीकडल्या कंपार्टमेंट मध्ये ह्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली तसे लोकांनी त्यांना हाकलून लावले, पुढे ती मंडळी आमच्या कंपार्टमेंट मध्ये आली तेव्हा त्यांच्यातील एकाने माझा गालगुच्चा घेऊन पैस्याची मागणी केली, तेव्हा मी त्याला/तिला हसून शांतपणे म्हणले "मौसी अभी तो मै भी बाप के पैसे पर ही पल राहा हूं, आज मत मांग, जिस दिन नौकरी लगी उस दिन इसी ट्रेन मे इसी बर्थ पर तू मु मांगी बक्षीस दूंगा" तसे तो/ती गोड़ हसला अन म्हणाला "हिजडे को भी इज्जत देता है रे तू तो, अच्छा है अच्छा बने रहना" अन डोक्यावर हात ठेऊन "तेरा जिंदगी मे बहुत भला होगा बच्चे" असा मनापासून आशीर्वाद देऊन गेला, तेव्हा एक पक्के कळले, ही मंडळी प्रेमाची भुकेली असतात त्यांना शांतपणे एक मानव म्हणून उत्तर दिल्यास ते आचकट वगैरे अजिबात बोलत नाहीत, माझ्यामते किमान समोरच्याला माणुसकी ने संबोधणे इतके तर आपण करूच शकतो, असे वाटते.

नोकरी,शिक्षण वगैरे बाबतीत रिझर्वेशनची सर्वात जास्त गरज या समुदायाला आहे. पण त्यांचा निवडणूकीच्या दॄष्टीने फारसा उपयोग नसल्यामुळे राजकीय पक्षांनी सुद्धा या समुदायाला वळचणीला टाकून दिले आहे. मुळात या समुदायाबाबत किळस करण्याजोगे काय आहे हे अजून कळले नाही. याहून अधिक किळस तर लग्नाच्या जेवणात ताटात टाकून दिलेले अन्न पाहून येते. पण ती माणसे तर उजळ माथ्याने वावरत असतात.

राही 23/10/2016 - 09:50
मुंबई, महाराष्ट्र आणि आता देशभरात 'अनाम प्रेम' या नावाखाली एकत्र आलेल्या एका मोठ्या लोकसमूहाने या लोकांविषयीच्या प्रश्नांना नुसतीच वाचा फोडली नाही तर त्यांना आत्मसन्मानाने जगू देण्याच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली कित्येक वर्षे कोणताही गाजावाजा न करता काम सुरू ठेवले आहे. आपला लेख आवडला.

लेख आवडला. एकीकडे युगप्रवर्तक विचार आमच्या ग्रंथांत ठासून भरलेले आहे असे म्हणणार्‍या आपल्या समाजात दुसरूकडे अश्या नकारात्मक ग्रह/समजूतीही ठासून भरलेल्या आहेत. :(

अनंत छंदी 23/10/2016 - 14:38
लेखातील "त्याना" ही स्वत:ची ओळख हवी, आत्मसन्मान द्यायला हवा ही बाजू १००% पटली. त्यांना जगण्याची समान संधी मिळायलाच हवी. पण, त्याच बरोबर त्यांनीही नीट वागायला हवे हे देखील हवे. हे मत मी व्यक्त करताच माझ्यावर टिकेची झोड उठण्याची शक्यता आहे. पण मी पाहिलेली एक बाजू आपणासमोर मांडतो. पुणे ते लोणावळा या दरम्यान या लोकांची एक वसाहत आहे. त्यातील लोक पुणे लोणावळा लोकलमध्ये भीक (?) त्याला खरेतर खंडणी म्हणणे जास्त योग्य होईल. मागतात. ज्या पद्द्धतीने पैसे मागितले जातात व न दिल्यास अश्लील व अर्वाच्च्य शब्दात त्या माणसाची निरभर्त्सना केली जाते ते ते पाहता या लोकांची दया येणे तर दूर किळस वाटू लागते. यातील अनेकांची कमाई दिवसाला ५ ते ६ हजार रुपये इतकी असते. (माहिती खात्रीशीर आहे) त्यामुळे ते लोक अन्य काही करू पहात नाहीत.

In reply to by अनंत छंदी

ज्या पद्द्धतीने पैसे मागितले जातात व न दिल्यास अश्लील व अर्वाच्च्य शब्दात त्या माणसाची निरभर्त्सना केली जाते ते ते पाहता या लोकांची दया येणे तर दूर किळस वाटू लागते. हे जरा अतिच सेन्सेटिव्ह होतय नाही का ? याहून जास्त त्रास लोकलच्या गर्दीमुळे होतो. तो मुकाट झेलला जातो. तृतीयपंथी इतके अ‍ॅग्रेसिव्ह वगैरे नसतात. थोडा-फार तमाशा करतात. ती किळस वगैरे तुमच्या मनात आहे. यानिमित्ताने उगाचच '१०० रुपयांच्या बदल्यात १ किस' असे किन्नरांबरोबर डील करणारा मित्र आठवला.

In reply to by अप्पा जोगळेकर

सुबोध खरे 24/10/2016 - 18:30
अप्पा साहेब टोकाचे अनुभव बऱ्याच लोकांना आलेले आहेत म्हणून ते असे नमूद केले जातात. माझ्या भावाचे लग्न ठरलेले असताना तो आपल्या वाग्दत्त वधू बरोबर गिरगाव चौपाटीवर बसलेला असताना दोन तृतीय पंथी आले आणि १०० रुपयांची मागणी केली. (१९९० साली हि रक्कम मोठी होती) आणि हि रक्कम न दिल्यास आपले कपडे फेडू म्हणून धमकी दिली. माझा भाऊ निःसंग होता म्हणून त्याने एक पैसा हि देण्यास नकार दिला. एक तृतीय पंथीने आपली साडी वर केली. तरीही माझ्या भावाने एकही पैसा दिला नाही म्हणून ते नाद सोडून निघून गेले. परंतु आजू बाजूच्या जोडप्यानकडून मात्र ते असे जबरदस्तीने पैसे उकळताना दिसत होते. पैसे मिळवण्यासाठी हे लोक "अंगचटीला" येतात हा मात्र सार्वत्रिक अनुभव आहे.आपल्या अंगाला हात लावलेला कोणत्या स्त्रीला आवडेल? दुसऱ्या कोणी भिकाऱ्याने आपले/ आपल्या बायकोचे गाल कुरवाळले तर आपण त्याच्या कानाखाली आवाज काढाल कि नाही? तेंव्हा टाळी फक्त एकाच हाताने वाजत नाही हेही लक्षात ठेवा. बाकी जनता त्यांच्याशी हिडीस फ़िडीस करून वागते यात संशय नाही. त्यांना पण माणसासारखे वागवणे आवश्यक आहे एवढेच नव्हे तर तो त्यांचा हक्क आहे.

बाजीप्रभू 24/10/2016 - 07:29
अनंत छंदी, तुम्हाला आलेला अनुभव इतर बऱ्याच जणांना आला असेल. मनुष्याला असलेल्या षडरिपुंची बाधा याला तेही अपवाद नाहीत. लोभ हा कुणाला चुकलेला नाही. समाजाने वाळीत टाकल्याचा क्रोध, त्यांना माहित असलेली त्यांच्याबद्दल समाजात असलेली एकप्रकारची भीती या सर्वांचा परिपाक तुम्हाला आलेल्या अनुभवात होतो. पण मुद्दा संधी देण्याचा आहे. संधी असूनही ते भिक मागण्याला प्रेफरन्स देत असतील तर तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण मला वाटत नाही असं होईल. थर्ड जेंडर ऍक्टिविस्ट "गौरी सावंत" हि खरंतर माझी सख्खी आतेबहीण आहे. तिच्या रेफरन्स नुसार आपण जे "छक्का" म्हणून हिणवतो ते बहुतांशी चांगल्या घरातून आलेली मुलं/मुली असतात. कुठेतरी १०/१२ व्यावर्षी हे सिम्टन्स दिसू लागतात. मग आई-वडिलांची मारझोड, शाळेतील टिंगल-टवाळीला कंटाळून शाळा सुटणे, प्रचंड घुसमट आणि सरतेशेवटी घर सोडून नाईलाजाने यावस्तीत आश्रयाला येणे.. हा कॉमन पॅटर्न या समाजात दिसतो. सांगायचा मुद्दा असा कि, आईवडिलांचा खंबीर सपोर्ट असेल तर हि मंडळी इतर समाजाला नक्कीच तोंड देऊ शकतात. पण आई-वडीलच जिथे कच खातात तिथे यांचा नाईलाज होतो. आपल्याकडे मेंटली चॅलेंज, मंदबुद्धी मुलांचा आई-बाप सांभाळ करतांना दिसतात पण "किन्नर" म्हणून जन्माला आलेल्या मुलाला हाकलून देण्यात धन्यता मानतात हि भारतातील शोकांतिका आहे. या लोकांमधे टॅलेंड आणि शारीरिक क्षमतेत कोणतीही कमी नसते. थायलंडसारख्या देशाने हे शक्य करून दाखवले आहे, आपणही नक्की करू शकतो.

In reply to by बाजीप्रभू

नाखु 24/10/2016 - 09:07
तर आवडलाच पण हा प्रतिसादही तुमची विषयाबाबत असलेली आस्था आणि सखोल अभ्यास दाखविणारा आहे. आप्ल्या बहिणीला कार्याबद्दल शुभेच्छा आणि एका वेगळ्या प्रबोधनपर लेखासाठी आपले अभिनंदन.

आतिवास 24/10/2016 - 09:02
एका वेगळ्या विषयावर चर्चा सुरू केल्याबद्दल आभारी आहे. तुमचे अनुभव वाचायला आवडले. पण १. शहरी-ग्रामीण हे विभाजन थाईलँडमध्ये टोकदार आहे. त्यामुळे तुम्हाला दिसलेले चित्र शहरी भागात प्रातिनिधिक असले तरी ग्रामीण भागात परिस्थिती वेगळी आहे. २. बौद्ध धर्म - थाईलँडप्रमाणेच थेरवाद बौद्ध धर्म म्यानमार आणि श्रीलंकेतही आहे. तिथंही शहरांत एलजीबीटीना लोकांनी काही अंशी स्वीकारले आहे असं दिसतं - पण संपूर्ण देशाबाबत ते म्हणता येणाार नाही. ३. तुमच्या आधीच्या लेखात तुम्ही लिहिल्याप्रमाणे दुस-या महायुद्धाने थाईलँडमध्ये अनेक बदल झाले. हाही त्यातला एक बदल, पण तो बराच वरवरचा आहे. समाजाने व्यक्तींचे चाकोरीबाहेरचे (हा शब्द कदाचित अयोग्य आहे, स्टिरिओटिपिकल म्हणायचं आहे मला) लैंगिकत्व स्वीकारण्यासाठी थाईलँडला आपल्यासारखीच अजून बरीच वाटचाल करायची आहे. अवांतर - ज्यांना या विषयात अधिक रस आहे त्यांनी हा अहवाल जरूर वाचावा.

In reply to by आतिवास

बाजीप्रभू 25/10/2016 - 09:49
काल अहवाल वाचता होतो पण दुसऱ्या महत्वाच्या कामामुळे बाकी ठेवावा लागला. पुर्ण वाचून मगच प्रतिसाद लिहीन. बादवे लिंकबद्दल आभारी.

लेख आवडला. ते लेडी बॉय, टॉम बॉय म्हणजे काय असत. आणि किन्नर गे असतात म्हणजे काय कोणास ठाऊक. बारीक केस कापणार्‍या मुलीला टॉमबॉय म्हणतात इतकच माहिती होतं. अवांतर - 'घरात आलेल्या सुनेला उंबरठ्यावर फटकवायच' हे गेल्या आठवड्यात लिहिणारे तुम्हीच कसे याच खूप आश्चर्य वाटतय.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाजीप्रभू 24/10/2016 - 15:17
ढोबळ मानाने "लेडी बॉय" म्हणजे शरीर/भावना स्त्रीच्या मात्र जननेंद्रिय पुरुषाचं. आणि "टॉम बॉय" म्हणजे संपूर्ण शरीर स्त्रीचं मात्र भावना/रहायला मुलांसारखं आवडतं असे. अवांतराबत खुलासा, "घरात आलेल्या सुनेला उंबरठ्यावर... " हि गुजरातमधील प्रचलित म्हण आहे. तिचा शब्दशः अर्थ "रूढ़िवादी" वाटत असला तरी ती बऱ्याचदा रूपक म्हणून वापरली जाते. फॉर एक्साम्पल, उदा-१. कामाच्या ठिकाणी बॉस जेव्हा पहिल्यावेळी जास्तीच्या कामासाठी थांबायला लावतो त्या पहिल्याच दिवशीच बॉसला सडेतोड उत्तर दिलं तर नंतर उगाचच थांबायची वेळ येत नाही. उदा-२ मुलं पहिल्यांदा उलट उत्तर देतात तेव्हाच ठेवून दयायची असते म्हणजे परत अपमान होत नाही. इत्यादी. मी गुजरातेत ६ वर्षे राहिलेलो असल्यामुळे तिथल्या काही म्हणी माहित झाल्यात. आपले "ते" गलितगात्र झालेले धागाकर्ते पाहून हि म्हण पोस्ट केली. बाकी मला सुदैवाने म्हणीप्रमाणे वागायची संधी अजूनतरी मिळालेली नाही.

अनुप ढेरे 24/10/2016 - 15:25
माझ्या माहिती प्रमाणे हिजडा = युनक. ज्यांचे टेस्टिकल्स कापलेले आहेत ते. ट्रान्स लोकांनापण हिजडा म्हणतात का? ट्राण्स लोकांना सरकारद्वारे रेकग्निशन मिळत आहे हळू हळू. ही एक आश्वासक बातमी वाचली होती काही दिवसांपूर्वी http://www.thehindu.com/news/national/other-states/manobi-bandopadhyay-indias-first-transgender-college-principal-takes-charge/article7298708.ece

In reply to by अनुप ढेरे

बाजीप्रभू 24/10/2016 - 16:10
फार अभ्यास नाहीये माझा, माहिती घेऊन सांगतो. पण जुजबी माहिती नुसार, तृतीयपंथी (3RD Gender) हि एकच कॅटेगरी वापरली जाते या समाजाची विभागणी करण्यासाठी. जे पूर्ण नर नाहीत किंवा पूर्ण मादी नाहीत असे, बाकी "किन्नर", "हिजडा", "छक्का" व बोली भाषेतील "बापट" हे केवळ साऊथ एशियामधे वापरले जाणारे समानार्थी शब्द आहेत. "ट्रान्स जेंडर" हा शब्द जनरली ज्यांनी आपल्या शरीरात शस्त्र क्रियेद्वारा बदल करून घेतला आहे अश्या लोकांसाठी वापरला जातो. असं असूनही शस्त्रक्रिये पूर्वी आणि नंतर "हिजडा" हे बिरुद पुसलं जात नाही हे विशेष. बाकी दिलेली लिंक वाचून आनंद वाटला. फोटोत मागच्या लोकांचे भाव मात्र लपून राहात नाही.

In reply to by बाजीप्रभू

आतिवास 25/10/2016 - 07:56
"ट्रान्स जेंडर" हा शब्द जनरली ज्यांनी आपल्या शरीरात शस्त्र क्रियेद्वारा बदल करून घेतला आहे अश्या लोकांसाठी वापरला जातो. असं नाहीये हो. इथं पाहा. अवघड आहे.

In reply to by आतिवास

बाजीप्रभू 25/10/2016 - 09:44
अतिवास, माहितीबद्दल धन्यवाद! स्वतःला करेक्ट केलेय तुमच्या माहितीनुसार. खरंतर "थर्ड जेंडर" मंडळींच्या शरीर रचनेबद्दल मला फार कल्पना नाही. कर्णोपकर्णी जे ऐकून माहित आहे तेव्हढच. या धाग्याच्या निमित्ताने तीही माहिती जाणकारांकडून मिळतेय हे विशेष. मिपावरील डॉ. मंडळी यावर अधिकारवाणीने बोलू शकतील. या लेखानिमित्त थायलंडमधील समाज किती प्रगल्भ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होता. प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या बुद्धाच्या शिकवणुकीचा मूळ गाभा या मंडळींनि किती आत्मसात केला आहे याच्या उधाहरणादाखल वरील पोस्ट लिहिली होती. अजून एक उधाहरण म्हणजे "रोड ऍक्सिडंट" होतो तेव्हा थाई मंडळी कशी वागतात याचं. याबद्दल मी एक सेपरेट पोस्ट लिहिणार आहे. त्यासाठी थोडं थांबावं लागेल.

In reply to by बाजीप्रभू

सुबोध खरे 25/10/2016 - 10:01
ट्रान्सजेन्डर म्हणजे ज्यांचे मानसिक लिंग वेगळे असते. म्हणजेच पुरुषाच्या शरीरात लपलेले स्त्रीचे व्यक्तिमत्त्व किंवा उलट(स्त्रीच्या शरीरात लपलेले पुरुष व्यक्तिमत्त्व). यात त्या व्यक्तीला आपली ओळख पुरुष किंवा स्त्री किंवा यातील काहीच नाही अशी हवी असते पण बाह्य लिंगाचा संबंध नाही. या व्यक्ती बऱ्याच वेळेस संभोगासाठी/ शारीरिक जवळिकीसाठी उत्सुक नसतात पण व्यक्तिमत्त्वाची ओळख हवी असते ट्रान्स सेक्सुअल म्हणजे ज्यांचे बाह्य लिंग वेगळे आहे आणि मेंदूला भिन्न लिंगी जाणीव असणे. अशा व्यक्ती आपली शल्यक्रिया करून घेण्यास तयार असतात आणि त्यांना शारीरिक जवळीक/ संबंध ठेवण्यात रस असतो. ट्रान्सवेस्टाईट - या व्यक्ती शरीराने आणि मेंदूने एका लिंगच्या असतात परंतु भिन्न लिंगीय कपडे घातले कि त्यांना अतीव आनंद होतो.परंतु त्यांची शारीरिक जवळीक आणि संबंध हे मूळ लिंगाशी एकरूप असतात.

In reply to by सुबोध खरे

बाजीप्रभू 25/10/2016 - 11:32
सोनाराने कान टोचले हे बरं झालं. आम्ही आपले काहीहि अनुमान लावत होतो. आंतर जालावरची अश्या विषयावरची माहिती आमच्यासारख्या बॉयलर सुट वाल्यांना कमीच कळते.... नेमकी माहिती, वेळेवर दिल्याबद्दल डॉक्टरांचे आभार.

उत्तम विषय अन संवेदनशील मांडणी बाजीप्रभू साहेब, लेख आवडला हे वेगळे सांगणे नलगे, ह्या निमित्ताने एक अनुभव शेअर करावा वाटतोय, २००३-०८ दरम्यान हिमाचलमध्ये खूप भटकत असे मी, त्याकरता मी नागपूर दिल्ली रेल्वेवे प्रवास करत असे. त्या प्रवासात भोपाळ नंतर खूप तृतीयपंथी लोक चढत असत (भोपाळ त्यांच्या मोठ्या वस्ती पैकी एक असून त्यांच्यातील शबनम मौसी ह्या भोपाळच्या मेयर होत्या असे ऐकिवात आहे) लोक ह्या लोकांना खूप हाडहूड करीत असत रेल्वेत, एकदा मी प्रवास करत असताना माझ्या पलीकडल्या कंपार्टमेंट मध्ये ह्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली तसे लोकांनी त्यांना हाकलून लावले, पुढे ती मंडळी आमच्या कंपार्टमेंट मध्ये आली तेव्हा त्यांच्यातील एकाने माझा गालगुच्चा घेऊन पैस्याची मागणी केली, तेव्हा मी त्याला/तिला हसून शांतपणे म्हणले "मौसी अभी तो मै भी बाप के पैसे पर ही पल राहा हूं, आज मत मांग, जिस दिन नौकरी लगी उस दिन इसी ट्रेन मे इसी बर्थ पर तू मु मांगी बक्षीस दूंगा" तसे तो/ती गोड़ हसला अन म्हणाला "हिजडे को भी इज्जत देता है रे तू तो, अच्छा है अच्छा बने रहना" अन डोक्यावर हात ठेऊन "तेरा जिंदगी मे बहुत भला होगा बच्चे" असा मनापासून आशीर्वाद देऊन गेला, तेव्हा एक पक्के कळले, ही मंडळी प्रेमाची भुकेली असतात त्यांना शांतपणे एक मानव म्हणून उत्तर दिल्यास ते आचकट वगैरे अजिबात बोलत नाहीत, माझ्यामते किमान समोरच्याला माणुसकी ने संबोधणे इतके तर आपण करूच शकतो, असे वाटते.

नोकरी,शिक्षण वगैरे बाबतीत रिझर्वेशनची सर्वात जास्त गरज या समुदायाला आहे. पण त्यांचा निवडणूकीच्या दॄष्टीने फारसा उपयोग नसल्यामुळे राजकीय पक्षांनी सुद्धा या समुदायाला वळचणीला टाकून दिले आहे. मुळात या समुदायाबाबत किळस करण्याजोगे काय आहे हे अजून कळले नाही. याहून अधिक किळस तर लग्नाच्या जेवणात ताटात टाकून दिलेले अन्न पाहून येते. पण ती माणसे तर उजळ माथ्याने वावरत असतात.
बुद्धाची शिकवण आणि आपण, "खून ऋजुरात" आमच्या कंपनीच्या थायलंड युनिटची स्टोर्स मॅनेजर. अतिशय बुद्धिमान, दर आठवड्यात होणाऱ्या प्रोजेक्ट स्टेटस मिटिंगमधे कंपनीच्या सीईओच्या प्रश्नांनी फाफलणारे एक आम्ही आणि एका दमात क्रिस्टल क्लीअर रिपोर्ट देणारी "खून ऋजुरात" दुसरीकडे. ३० जणांच्या स्टाफला आणि स्टोर्स डिपार्मेंटला लीलया हाताळते. ऑडिटर्सना आजतागायत स्टोर्स डिपार्टमेंटच्या चुका शोधता आल्या नाहीत. तिच्या कामाची पद्धत इतरांनाही शिकावी म्हणून तिला मागे आमच्या स्विझर्लंड युनिटच्या स्टोर्स डिपार्मेंटला ट्रेनिंग देण्यासाठी पाठवले होते.

भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

वेल्लाभट ·

हकु 06/06/2016 - 08:40
आवडलं. आणि पटलं सुद्धा! मी स्वत: मराठी माध्यमातून शिकलो आहे. आणि कुठल्याही इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या व्यक्तीइतकच, किंबहुना जास्त अस्खलित व व्याकरणशुद्ध इंग्रजी मी बोलू शकतो असा मला आत्मविश्वास आहे. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. तिच्याकडे तशाच दृष्टीने बघावे. जशी जापनीज, फ्रेंच, चायनीज, तशीच इंग्रजी. ती कुठल्याही वयात आरामात शिकता येईल. इंग्रजी म्हणजे संपूर्ण शिक्षण नव्हे.

>> शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत. अगदी खरं बोललात वेल्लाजी.जी भाषा आपल्याला कम्फर्ट वाटत नाही त्या भाषेतून घेतलेलं शिक्षण हे शिक्षण नसून फक्त ट्रेनिंग आहे. (well educated बनायला हवं well trained नाही-3 idots) सर्व प्रकारचं शिक्षण/कोर्सेस हे मातृभाषेतून घेण्याची व्यवस्था असावी असे वाटते.अर्थात यामध्ये सरकारी जबरदस्ती नसायला हवी. आणि इतरांचे अनुकरण करणे याहून दुसरी मूर्खता नसावी.

आनंदी गोपाळ 06/06/2016 - 09:29
गुजरातेत १२ पर्यंत गुजराती मिडियममधे शिक्षण घेता येत असे. मेडिकलला जाणारी मुले सीईटी देखिल आपल्या भाषेत देऊ शकत होती. आता "नीट"च्या रिसेंट आदेशामुळे आता मुलांना नाईलाजाने पूर्ण भारतभर सीबीएसई अर्थात इंग्रजीत शिक्षण घ्यावे लागणार असे दिसते. यालाच मॅकॉलेकरण म्हणता येईल का?

नमकिन 06/06/2016 - 09:49
प्रबोधनपर व्याख्याने व सभा (सप्टेंबर ते मार्च) घेऊन जनजागरण केले तरच याला रोखता येईल अन्यथा मातृभाषा हे शिक्षण माध्यम उरणार नाहीं व पुढच्या पिढीला पर्याय नाहीं (जो सोयिस्कररित्या आजंच काहीपालक कारण सांगतात) म्हणून नाईलाजाने इंग्रजी माध्यमात शिकावे लागेल. खास करुन महिला वर्ग हिरिरिने सामिल करुन घ्यायला हवा, कारण पुरुषांचे यात काही चालत नाहीं असे पाहण्यात आले आहे.

In reply to by नमकिन

वेल्लाभट 06/06/2016 - 12:36
अधिकाधिक लोकांनी आपापल्या परीने प्रबोधन केलं तरीही पुष्कळ फरक पडेल. मागणीचा दबाव सरकार आणि शाळांवर झाला पाहिजे. अर्थात याचं समीकरण इतकं साधं नसून त्यात पैसा नामक गोष्ट मुख्य भूमिका बजावत आहे हे उघड आहे. शाळांना सीबीएसईचे वेध मिळणार्‍या फियांमुळे लागत आहेत हे त्यांच्या प्रत्येक युक्तिवादातून दिसतं. त्यामुळे प्रचंड मोठी चळवळ उभी राहिली तरच बदलाचा वेग वाढू शकतो. सोशल मिडिया यात मोठं काम करेल असा विश्वास आहे. फेसबुकवरचे मराठी शाळा आपणच टिकवल्या पाहिजेत व मराठी माध्यमाच्या शाळा हे ग्रूप बघा, सामील व्हा असं आवाहन सर्वांना करेन.

In reply to by वेल्लाभट

नमकिन 09/06/2016 - 10:28
Amway व तत्सम कंपन्या तुम्ही पाहिल्या असतीलंच. तिथे उच्च स्तर चा माणूस सोबत येतो व सर्व योजना उलगडुन सांगतो पण जो तुमच्या ओळखिचा असतो तो गप्प असतो किंवा मधली माहिती पेरत असतो. याचे कारण अनोळखी लोकांशी संवाद ठेवावा व वाद टाळावा हे आपण उमजून वागतो व ज्ञात व्यक्तिचे राग, लोभ सांभाळायचे असतात. आपल्या पातळीवर प्रयास चालूंच आहेत पण संख्या ला सामोरे जाताना पटावर संख्याच जरुरी. समूह मन एक करण्यास एक एकटे प्रयत्न अपुरे तसेच कमी प्रभावी ठरतात. मित्र,परिवार व आजु-बाजूचे एकाच दिशेने जाताना दिसले की (माहित असूनही एक-दिशा मार्गात विरुद्ध दिशेने जातातंच लोकं) मग वेगळे/एकटे पडण्याच्या भितीने इंग्लिश माध्यम निवडले जाते. २ सभा गोखले फेसबुक समूहाच्या हजर होतो पण अजूनही चळवळीत बदलायला वेळ आहे.

In reply to by हेमन्त वाघे

वेल्लाभट 06/06/2016 - 23:18
वाघे साहेब, मुद्दा न मिळाल्यास वैयक्तिक पातळीवर येऊन प्रतिवाद करणे हे अतिशय खालच्या दर्जाच्या विचारसरणीचे लक्षण आहे. तरीही आता विचारलंतच म्हणून सांगतो की माझा मुलगा एक वर्षाचा आहे. आणि तुम्हाला विशेष स्वारस्य असल्यास सांगा म्हणजे तुम्हाला पुढच्या वाटचालीची यथोचित माहिती देण्यात येईल.

भारतासारख्या बहुभाषिक देशात जेव्हा कामानिमित्त एका ठिकाणाहुन दुसर्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावे लागते तिथे मातृभाषेतुनच शिक्षण हा हट्ट अडचणीचा ठरु शकतो. मी सध्या बेंगलोरमध्ये राहतो.अल्याड पल्याडला कोणी मराठी नाही.भारताच्या बाबत बोलायचे झाल्यास एकुण शिक्षणपध्दतीतच आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. केवळ मातृभाषेतुन शिक्षण घेतल्याने मिळणारा फायदा नगण्य असावा. मराठीतुन शिक्षण घेऊन सुध्दा शिक्षणपध्दतीचा भर घोकंपट्टीवरच असेल तर मग इंग्रजीतच घोकंपट्टी केल्याचा फायदा जास्तच असेल.

प्रियाजी 06/06/2016 - 22:10
भारतभर बदलीच्या नोकरीमुळे आम्हालाही दोन्ही मुलांना ईंग्रजी माध्यमाच्या शाळात नाईलाजाने घालावे लागले.त्यामुळे होणारे तोटेही सहन करावे लागले. सुरवातीला मुले ईंग्रजीमधून शिकताना कंटाळत असत परंतू नंतर जमले. मात्र त्यामुळे मराठी अवांतर वाचनावर व बोलण्यावर थोडाफार परीणाम झालाच. मात्र घरात सतत मराठीच बोलत असल्याने मुले मराठी अगदीच विसरली नाहीत. त्यामुळे मलाही असेच वाटते की ज्यांना शक्य आहे त्यांनी मराठी/ मात्रुभाषेतच मुलांना शालांत शिक्षण द्यावे त्याचवेळी ईंग्रजी बोलीभाषा म्हणून शिकवावी. सध्या शालेय सुट्ट्यामध्ये ज्या अनेक कलाकौशल्याच्या वर्गांना मराठी माध्यमातील मुले जातात तसेच हसत खेळत मुले सहज ईंग्रजी बोलीभाषा म्हणून शिकू शकतील व एकदा भाषेची गोडी लागली की त्यांच्या आकलन शक्तीनुसार छोटी छोटी गोष्टींची पुस्तके सतत त्यांच्या वाचनात येतील असे पाहून ती मुले चांगले ईंग्रजी बोलू शकतील. आम्हा उभयतांनाही शाळेत मराठी माध्यम व कॉलेजला ईंग्रजी माध्यम असूनही बोलीभाषा म्हणून ईंग्रजी चांगले येत नव्हते परंतू मी स्वतः ईंग्रजी पुस्तके सतत वाचूनच अन घरात सतत सवय केल्यानेच परप्रांतात स्वतःचे विचार योग्य रीतीने मांडू शकले.

सुरेख लेख आणि उत्तम विवेचन ! आपल्या मातृभाषीक राज्यात/देशात राहत असल्यास मातृभाषेतच प्राथमिक शिक्षण व शक्य असल्यास माध्यमिक शिक्षणही घ्यावे. मात्र इंग्लिश ही आणखी एक भाषा म्हणुन शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल. भारतात शास्त्रिय विषयांतील उच्च शिक्षण व विशेषतः व्यावसायीक शिक्षण घेण्याची इच्छा असल्यास सद्यातरी विद्यालयीन शिक्षण इंग्लिशमध्ये घेणे आवश्यक आहे. असे शिक्षण अनेक विकसित देशांमध्ये स्थानिक भाषेत करता येते. कारण तेथे स्थानिक भाषेत शिक्षण व संशोधन करण्यासाठी आवश्यक असणार्‍या अनेक मूलभूत सोई निर्माण केल्या गेल्या आहेत. अमेरिका, कॅनडा, युके, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, सिंगापूर इत्यादी देशांत पदवी शिक्षण अथवा नोकरी करावयाची असल्यास इंग्लिशला पर्याय नाही. आंतरराष्ट्रिय स्तरावरचे संशोधन करायचे असल्यास आजतरी सर्वच देशांच्या नागरिकांना (यात सर्व विकसित पाश्च्यात्य देशही येतात) इंग्लिश शिकणे आवश्यक ठरते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझे स्वतःचे ११ पर्यंतचे (त्यावेळची एस एस सी) शिक्षण मराठीत झाले. तोपर्यंत इंग्लिशचा फारसा गंधही नव्हता... शिक्षाकांनाही केवळ जुजुबी इंग्लिश येत होते ! सायन्स कॉलेजमध्ये गेल्यावर सगळे शिक्षण एकदम इंग्लिशमध्ये ! सुरुवातीला जरा कठीण गेले पण भाषांची आवड असल्याने नंतर सोपे झाले. ज्यांना इंग्लिश झेपले नाही त्यांची मात्र परवड झाली. त्यानंतर मात्र सर्व सायन्स कॉलेजचे व व्यावसायिक शिक्षण आणि सर्व प्रकारचे व्यवसाय पूर्णपणे इंग्लिशमध्येच केले... करावेच लागले. व्यवसायानिमित्ताने इंग्लिश, अमेरिकन, कॅनॅडियन, सिंगापोरियन, ऑस्ट्रेलियन, इ लोकांबरोबर काम करायला आणि त्यांना इंग्लिशमध्ये युक्तीच्या चार गोष्टी सांगायलाही काही अडचण आली नाही :) मुलाचे आठवी पर्यंतचे शिक्षण परदेशात झाल्याने अर्थातच इंग्लिशमध्ये झाले. त्यामुळे नंतर भारतातले व परदेशातले शिक्षण अर्थातच इंग्लिशमध्ये झाले. पण घरात कटाक्षाने मराठीचा वापर असल्याने त्याचे मराठी लिहिणे-बोलणे अस्खलित आहे. त्याच्या शिक्षणात एकही वर्ष मराठी हा विषय नव्हता हे सांगून विश्वास बसणार नाही, इतके ! "पुल" त्याचे आवडते लेखक आहेत, मराठी नाटक-सिनेमा आवडीने बघतो, सर्व नातेवाईकांशी सरळ सोप्या मराठीत (इंग्राजळेल्या नाही ;) ) बोलतो. हा आणि इतर काही अनुभवांवरून (व काही बाबतीत शास्त्रिय मानल्या गेलेल्या पुराव्यांवरून) असे वाटते की : १. लहानपणी मुले अनेक भाषा सहजी आत्मसात करतात. तेव्हा त्यांना प्राधान्याने मातृभाषा शिकवावी, शक्य असल्यास मातृभाषेतून शिक्षण द्यावे... पण त्याचबरोबर इतर उपयोगी भाषा शिकण्यासाठीही जरूर प्रोत्साहन द्यावे. २. घरात मातृभाषा वापरली जात असली तर मुले ती सहज आत्मसात करतात... जशी ती त्यांच्या शाळेतील / घराशेजारच्या खेळगड्यांची भाषा सहज शिकतात तशीच. मुलांना इंग्लिशची सवय व्हावी या उद्येशाने बरेच पालक घरात इंग्लिश / इंग्राजळलेली मराठी बोलताना दिसतात. याचा अंतीम फायदा किती याबद्दल माझ्या मनात शंका आहे... मात्र त्यामुळे मुलांची मराठी बिघडते हे नक्की :( त्याऐवजी सरमिसळ न करता जशी जरूर आहे तशी (चर्चेच्या विषयावर अवलंबून) शक्यतो शुद्ध मराठी किंवा शुद्ध इंग्लिश वापरावी. ३. विशेषतः व्यापारी व शास्त्रिय विषयांतील उच्चशिक्षण आणि संशोधन स्थानिक भाषांत व्हावे इतक्या मूलभूत सोई सद्या भारतात नाहीत आणि (अगदीच अशक्य नसल्या तरी) त्या नजिकच्या काळात भारतात निर्माण होतील अशी शक्यता नाही... कारण त्याकरिता वित्त, राजकिय इच्छाशक्ती आणि सामाजिक इच्छाशक्ती यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते आणि त्या सर्वांचाच प्रचंड अभाव सद्या दिसतो आहे :( ४. वरील सर्व मुद्दे पाहता, (अ) आपल्या मातृभाषेत शिकणे केव्हाही जास्त सोपे आणि श्रेयस्कर असते याबाबत शंका नाही. (आ) मातृभाषेबद्दल ममत्व जरूर असावे आणि तिचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. हे मान्य केल्यावरही खालील व्यावहारीक कटू सत्ये मानाविच लागतात... (इ) भारतात व्यापारी व शास्त्रिय विषयांत उच्च ध्येय ठेवण्यार्‍या भारतियांसाठी सद्या इंग्लिश ही एक महत्वाची भाषा म्हणून शिकणे अपरिहार्य आहे. (ई) आंतरराष्ट्रिय क्षेत्रांत व्यापारी व शास्त्रिय शास्त्रिय विषयांत उच्च ध्येय ठेवण्यार्‍या जगातल्या सर्व देशातील नागरिकांसाठी सद्या इंग्लिश ही एक महत्वाची भाषा म्हणून शिकणे अपरिहार्य आहे. याबाबत गैरसमज नसावा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नमकिन 08/06/2016 - 09:21
विषय सोपा व सरळ आहे त्यात गैरसमज नसावा. भाषा अमाप आहेत शिकण्यास कुणाचीच ना नाहीं तर मातृभाषा हे शैक्षणिक माध्यम असावे हीच वैज्ञानिक व वैश्विक प्रमाण आहे. "आंतरराष्ट्रिय स्तरावरचे संशोधन करायचे असल्यास आजतरी सर्वच देशांच्या नागरिकांना (यात सर्व विकसित पाश्च्यात्य देशही येतात) इंग्लिश शिकणे आवश्यक ठरते."- इंग्रजी भाषा शिकण्यास आक्षेप नाहींच आहे तसेच संशोधन करताना कुठल्याही भाषेत करु शकतो, प्रत्येक देश आपल्या भाषेत संशोधन लेख प्रसिद्ध व उपलब्ध करतो. तेव्हा कृपया गैरसमज न पसरवावा.

In reply to by नमकिन

वेल्लाभट 08/06/2016 - 11:06
योग्य उत्तर दिलंत नमकिन. धाग्यातल्या लिंका अनेकांनी उघडल्याच नसण्याची दाट शंका येते काही प्रतिसाद बघून. धागाकर्त्याने आपली मतं कमी आणि इतर जागतिक संस्था काय म्हणतात त्याचे दुवे देण्याच्या हेतूने धागा काढलेला असूनही तो उद्देश पूर्णतः सफल झालेला नाही असं खेदाने वाटतं. उदाहरणार्थ
आंतरराष्ट्रिय क्षेत्रांत व्यापारी व शास्त्रिय शास्त्रिय विषयांत उच्च ध्येय ठेवण्यार्‍या जगातल्या सर्व देशातील नागरिकांसाठी
अशी वाक्यं. नेमकं हेच पूर्णसत्य नाही हे सांगायचा प्रयत्न होता. असो.

In reply to by नमकिन

संशोधन करताना कुठल्याही भाषेत करु शकतो, प्रत्येक देश आपल्या भाषेत संशोधन लेख प्रसिद्ध व उपलब्ध करतो. तेव्हा कृपया गैरसमज न पसरवावा. गैरसमज !? नक्की ??? भारतिय भाषेत जागतिक स्तराचे शास्त्रिय संशोधन व्हावे असे माझेही स्वप्न आहेच. पण, दुर्दैवाने तशी वस्तुस्थिती सद्या तरी आस्तित्वात नाही. प्रत्येक प्रबंध "कोण्याएका शास्त्रिय नियतकालिकात प्रकाशित झाला" या एकाच कारणाने त्यातले संशोधन जागतिक स्तराचे आणि / अथवा उपयोगी ठरत नाही.... मग ती भाषा इंग्लिश असो की इतर कोणतीही. जेव्हा खालील गोष्टी आस्तित्वात येतील तेव्हाच एखादी भाषा जागतिक स्तरावरचे संशोधन होणारी भाषा मानणे योग्य होईल : १. त्या भाषेत "जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त होऊ शकणारे संशोधन" प्रथम प्रकाशित केले जाईल व गैरभाषिक संशोधकांना त्याच्या भाषांतराची निकड वाटेल. २. त्या भाषेतील प्रथम प्रकाशित झालेले एखादे संशोधन पाठ्यपुस्तकात सामील होईल. ३. त्या भाषेतील प्रथम प्रकाशित झालेल्या संशोधनाने जागतिक उद्योगधंद्यांमध्ये किंवा जागतिक व्यवहारांमध्ये महत्वाचे बदल घडवून आणले जातील. ४. जागतिक स्तरावरचे इतर भाषांतले संशोधन प्रसिद्ध झाल्यावर ते त्या भाषेत त्वरीत (जास्तित जास्त एक-दोन महिन्यांत) भाषांतरीत होऊन ते स्थानिक संशोधकांना उपल्ब्ध होईल. सद्या ही परिस्थिती पूर्णतः केवळ इंग्लिश व कमी-अधिक प्रमाणात आधुनिक पाश्च्यात्य भाषांतच (जर्मन, फ्रेंच, स्कँडेनेव्हियन भाषा, इ) उपलब्ध आहे. इतके असूनही इंग्लिश सोडून इतर भाषांतील संशोधकांना जर आंतरराष्ट्रिय स्तरावर काम करायचे असले तर एक सामाईक भाषा म्हणून इंग्लिश शिकावीच लागते, ही वस्तुस्थिती आहे. मातृभाषेचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्वाचे असते... नक्कीच असावे. माझेही असेच मत आहे. मात्र, एखाद्या भाषेला जागतिक शास्त्रिय संशोधनातले महत्वाचे स्थान केवळ तशी कल्पना करून, बोलून किंवा लिहून मिळणार नाही... वस्तूस्थितीकडे डोळेझाक करून तर नाहीच नाही. कारण वस्तूस्थितीकडे डोळेझाक करणे गैरसमजाचे तर होईलच, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे ते अंतिमतः भाषेलाही घातक ठरेल. भाषेला तसे उच्च स्थान मिळण्यासाठी, सर्वप्रथम त्यासाठी लागणार्‍या सर्व आवश्यक गोष्टींचा सखोल अभ्यास करावा लागेल; सर्व आवश्यक संसाधनांची व व्यवस्थांची उभारणी करावी लागेल; आणि त्या सर्व प्रणालीचे अविरत-अखंड व्यवस्थापन चालू राहील याची खात्री करावी लागेल... असे झाल्यावर मग एकदोन दशकांनी त्या प्रणालीची फळे दिसायला लागतील. सद्या मान्यताप्राप्त समजल्या जाण्यार्‍या (इंग्लिशसह) सर्व भाषांनी याच खडतर मार्गावरून वाटचाल केलेली आहे व ती चाल अविरत-अखंड चालू ठेवली आहे... या मार्गाला दुसरा साधासोपा पर्याय नाही. पूर्णविराम.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अर्थात... जर स्थानिक भाषेत काम करून स्थानिक स्तरावर कार्यरत रहायचे असेल तर मात्र इंग्लिशच काय इतर कोणत्याही भाषेविना (अगदी इतर भारतिय भाषेविनाही) फारसे अडणार नाही... अगदी अडणारच नाही असे नाही, पण चालून जाऊ शकेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वेल्लाभट 09/06/2016 - 12:39
म्हात्रे साहेब; इंग्लिश ला विरोध आहे असं एका शब्दानेही सूचित होत नाहीये लेखात. शिक्षणाचं माध्यमच इंग्लिश असण्याला विरोध आहे. हे इतकं साधं असून तुमचाही प्रतिसाद चुकीचा अर्थ काढून दिलेला यावा याचं आश्चर्य आहे.

In reply to by वेल्लाभट

वेल्लाभट साहेब, मी माझ्या पहिल्या प्रतिसादाची सुरुवात, आपल्या मातृभाषीक राज्यात/देशात राहत असल्यास मातृभाषेतच प्राथमिक शिक्षण व शक्य असल्यास माध्यमिक शिक्षणही घ्यावे. मात्र इंग्लिश ही आणखी एक भाषा म्हणुन शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल. अशीच केली होती. तरीही त्यावरच्या प्रतिसादात 'नमकिन' यांनी माझा गैरसमज असल्याचे लिहिले (?!). त्यातच त्यांनी, मातृभाषा हे शैक्षणिक माध्यम असावे हीच वैज्ञानिक व वैश्विक प्रमाण आहे. असे सरकटीकरण करणारे आश्चर्यकारक विधान केले. त्या विधानाने काही वाचकांचा "मातृभाषेतलेच शिक्षण जगात सर्व काही मिळवून देऊ शकेल" असा गैरसमज होईल असे वाटले. हे विधान मराठीच्या बाबतीत खरे असते तर माझ्याइतका आनंद कोणाला झाला नसता... पण दुर्दैवाने तशी वस्तुस्थिती आज नाही. त्याऐवजी ते वाक्य खालील्प्रमाणे लिहिले असते तर सत्याच्या बरेच जवळपास असते... "आयुष्यातले सुरुवातिचे (प्राथमिक व माध्यमिक) शिक्षण मातृभाषेतून दिल्यास ते विद्यार्थ्याला विषय समजून घेण्यास (ज्ञानार्जनासाठी) जास्त फायद्याचे ठरेल" असे पुरावे संशोधनाव्दारे पुढे आले आहेत. आपल्याला ममत्व वाटणार्‍या गोष्टींबद्दल अतिशयोक्त दावे मूळ उद्द्येशाला धोका पोहोचवतात*. कारण, त्या दाव्यांतला फोलपणा आज ना उद्या बाहेर येतोच आणि मग त्यां दाव्यांची व इतर खर्‍या दाव्यांची (आणि दावे करणार्‍यांचीही) विश्वासार्हता कमी होते. या वरच्या कारणांसाठीच पुढचे प्रतिसाद लिहिणे भाग पडले. . * : अतिशयोक्त दावे राजकारणात "तात्कालिक व संकुचित" स्वार्थ साधण्यासाठी बर्‍याचदा यशस्विरित्या केले जातात... हे "वैज्ञानिक" नाहीच व "नैतिक" तर अजिबात नाही. एखाद्या गोष्टीबद्दल खरे ममत्व वाटणार्‍या लोकांना हे लोकांना जेवढे लवकर कळेल तेवढे बरे. =============== अजून थोडेसे... (अ) मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेला खालील कारणांनी उर्जितावस्था येणार नाही : १. केवळ भाषेचे गोडवे गाणे. २. त्या भाषेबाबतीत भावनिक दावे करणे... आणि विषेशतः अतिरंजित दावे करण्यासारखी धोकादायक दुसरी गोष्ट नाही. ३. त्या भाषेच्या शिक्षणाची चांगली व्यवस्था जरूर असावी पण ते वापरण्याची जबरदस्ती करणे मूळ मुद्द्याला मारक ठरेल. किंबहुना, खालील (आ) मधिल परिस्थिती निर्माण केली तर लोकच त्या भाषेच्या उत्तम शिक्षणासाठीच्या व्यवस्थेचा आग्रह धरतील. (आ) जर मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेला उर्जितावस्था यायला हवी असेल तर खालील गोष्टी व्यवहारात आस्तित्वात असणे / आणणे ही योग्य नीति ठरेल : १. त्या भाषेचा वापर उपजिविका करण्यासाठी उपयोगी असावा. यामुळे ती भाषा शिकणे सर्वसामान्यांना आवश्यक वाटते. २. त्यापुढे जाऊन, त्या भाषेचा वापर सधन आणि / किंवा उत्तम जीवनशैली जगण्यासाठी आवश्यक असला तर सोन्याहून पिवळे. असे झाले की आपोआप ती भाषा शिकणे ही एक आकर्षक गोष्ट बनते. मग ती "भाषा शिका, तिचे संवर्धन करा, तिला जगवा" अशी मनधरणी करण्याची वेळ येणार नाही... मातृभाषा असलेले व नसलेलेही लोक काकू न करता आवश्यक ते परिश्रम घेऊन ती भाषा शिकायला आपणहून पुढे येतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वेल्लाभट 10/06/2016 - 10:20
बरं, तुमची मतं कळली. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट; कुठले दावे किती फोल ठरतील ते कळेलच पुढे पुढे. (यात आक्रस्ताळेपणा नाही किंवा धमकीही नाही) एखादं विधान तुम्हाला अतिरंजित वाटलं तरी तसे सिद्धांत मांडलेले आहेत जगभर; तेही विद्वान (मानले तर) लोकांनी... त्याला काहीच कन्सिडरेशन नाही काय? प्रॅक्टिकॅलिटी डाय्जेस्ट नाही झाली की त्याला भावनिक म्हणायचं... हे कसं बरोबर आहे? आणि त्या खालील गोष्टी करायला हव्यात.... ज्या तुम्ही लिहिल्यात त्या सगळ्या करतातच ती लोकं ज्यांना कळकळ वाटते. त्यामुळे ते होईलच बरोबर पद्धतीने. चिंताच नको. मला कळ्ळतच नाही की मराठीतनं मोठी झालेली आणि त्यातूनच इंग्लिशमधे पारंगत झालेली मंडळी मराठीला एवढ्या आग्रहाने राइट ऑफ कसं करू शकतात. हे भावनिक विधान वाटलं तर समजा तसं. पण हे अनाकलनीय आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नमकिन 10/06/2016 - 21:05
सुरुवातंच गंडली - भाषा शिकण्यास विरोध प्रदर्शन धाग्यात केले नव्हतेच पण इंग्लिश भाषा शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल - हे विधान भरकटवणारे वर भरीस संशोधन कसे १ भाषा प्रसिद्ध करण्यास अनिवार्य आहे यामुळे गाड़ी विषयावर आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. दिलेल्या संशोधन पर दुवे व मागे शोधून केलेले वाचन यावरुन तुमचे अपेक्षित विधान मी मांडू शकलो नाहीं त्याबद्दल क्षमस्व; तरी भावना पोचल्याचे समाधान. होता होता पुन्हा त्याच विषयावर भर घातलीत मूळ विषयाला बगलेत घालून. असेल ते इटवा अन् नसेल ते पाठवा! या उक्तीनुसार मातृभाषेला बाजूला सारुन मुलाचा आनंद, शिकण्यातली सहजता व जीवन अनुभव जो परिसरात सहजसाध्य आहे तो सोडून अनैसर्गिक वातावरण देऊन इवल्या जीवाला आपल्या अपेक्षांच्या, आकांक्षाच्या ओझ्याखाली फुलवायचा प्रयोग करने व त्याची भलामण करीत रहाणे का? तर नौकरीच्या संधी व पैशाची राशि यांचा संबंध यशाच्या व्याख्येत समाविष्ट करुन लहान वयापासुन त्या बालकाच्या भावविश्वाचा नाश करतात व पुढे जीवनात अपेक्षा करतात संवेदनशीलता असन्याची, कसं काय शक्य आहे? कित्येक शाळा शिक्षक सांगतात की आम्ही मुलांना काही शिकवताना मुलेच आम्हाला बरेच काही शिकवतात, अर्थात शिकण्याची तयारी असेल तर. हेच मोकळे मन धागा लिहिताना लेखकाच्या मनात असावे, असे वाटते. त्याला असे फरफटत घेऊन जाऊन चर्चा विस्कटते. या विषयावर साधक बाधक चर्चा होत रहावी ही सद्य सच्ची भावना.

In reply to by नमकिन

@ वेलाभट व नमकिन : माझ्या आतापर्यंतच्या प्रतिसादातून माझे मुद्दे स्पष्ट झाले आहेतच. तेव्हा पुनरुक्ती टाळतो आहे. फक्त... मला कळ्ळतच नाही की मराठीतनं मोठी झालेली आणि त्यातूनच इंग्लिशमधे पारंगत झालेली मंडळी मराठीला एवढ्या आग्रहाने राइट ऑफ कसं करू शकतात. हा (अजून एक) गैरसमज दूर करण्यासाठी एकच गोष्ट सांगाविशी वाटतेय, ती अशी... मराठीबद्दलच्या तुमच्या आणि माझ्या भावना एकाच आत्मियतेच्या आहेत आहेत. म्हणुनच, माझ्या घरात मराठीच पहिली भाषा आहे आणि ४० वर्षांच्या लिहिण्याच्या दुराव्यानंतर मराठी वाचण्याची-लिहिण्याची संधी मिळते या एका महत्वाच्या कारणाने मी मिपावर चि़कटलो. मराठीचे महत्व कायम ठेवण्यासाठी, किंबहुना वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे माझेही ठाम मत आहे. मात्र, त्या प्रयत्नांची दिशा कोणती असावी याबाबत आपल्यात मतभेद आहेत असेच आतापर्यंतच्या लिखाणातून मला ध्वनित होते आहे. ते कसे हे अगोदर आले आहेच. आणि हा फरक फार महत्वाचा आहे, कारण... यशासाठी खूप जोर लावणे फार महत्वाचे आहेच, पण तो जोर कोणत्या जागी/दिशेने लावला जात आहे यावर यश मिळेल की नाही हे जास्त अवलंबून असते. असो. या विषयावर अजून काही नवीन मुद्दा नसल्यास, मी इथेच थांबणे श्रेयस्कर समजतो. धन्यवाद !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभिनव 09/06/2016 - 12:46
आणि त्या सर्व प्रणालीचे अविरत-अखंड व्यवस्थापन चालू राहील याची खात्री करावी लागेल... असे झाल्यावर मग एकदोन दशकांनी त्या प्रणालीची फळे दिसायला लागतील. >> तुमच्या प्रतिसादातील उपाय व इतर अनेक उपाय कोणी करायचे? गुजरात्यांनी? बंगाल्यांनी? की मराठ्यांनी? मी ? तुम्ही? कोणी? आज २०१६ मधे तुम्ही म्हणता एकदोन दशकांनी फळ दिसतील, तर महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासुन एवढ्या वर्षात मराठी माणसांनी काय केले? तेव्हाच केले असते तर ते एकदोन दशके नंतरचे फळ आज २०१६ मधे नसते का दिसले? अजुन एकदोन दशकानंतरही फक्त उपाय सुचवायचे का? अंमल कधी करायचा? त्या उपायांच्या मोठ्या चित्राचा एक छोटा भाग शिक्षणाचे मराठी माध्यम असणे हा आहे. तो तर तुम्ही मराठी विरोधक करत नाही आणि बाकीचे उपाय मात्र सुचवत बसता. कुठुनतरी सुरुवात तर करा ना?

एकच, तुम्ही म्हणालात तसे शिक्षणाला मातृभाषा माध्यम grasping करता उत्तम ! मान्य करतो मी, पण ज्या मराठी माध्यमाबद्दल आपण हे म्हणता आहात ती मराठी खरंच आपली मातृभाषा आहे का?? 'त्वरक' 'उत्प्रेरक' 'संप्रेरक' ह्या वैज्ञानिक संकल्पना म्हणा किंवा सामाजिक शास्त्र विषयातील भौगोलिक ऐतिहासिक जारगन म्हणा ही छापील मराठी आपली मातृभाषा आहे का?? कुठल्या घरातली कुठली माता अशी दिव्य छापील मराठी बोलत असेल? ही प्रमाणित मराठी आहे मातृभाषा अहिराणी, कोकणी, वर्हाड़ी इत्यादी म्हणता येतील मग काय करावे बुआ?? माझी मातृभाषा वर्हाड़ी आहे मग उद्या मी पुस्तक मागतो ज्यात लिहिले असेल की बुआ 'लोकमान्य टीळकायनं अंग्रेजाले बेज्या झाबु देल्ला! इतला का त्याहीनं टिळक महाराजाले उचलून मंडाले ले पाठोले' ही आहे बुआ माझी मातृभाषा मुद्दा काय तर ही प्रमाणित मराठी मातृभाषा नाहीच अन त्यामुळे ती सुद्धा बहुसंख्य पाल्यांस इंग्रजी इतकीच जड़ जाते गणित शिकताना 'simultaneous equation' हे जर वाचायला जड़ जात असेल तर 'एकसमयावच्छेदक समीकरण' सुद्धा काही नीट पचत नाही कारण मुळात ती आपली मातृभाषा नाही!

बाकी चालू द्या

प्रतिसाद आधी इतरत्र प्रकाशित

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 08/06/2016 - 13:12
सोन्याबापू, असे प्रतिसाद टाकून तुम्ही फार काही साध्य करंत नाही आहात हे सांगू इच्छितो. आपल्याला धड एक बाजू घेता येत नसल्यास फाटे फोडत बसणं यात शहाणपण नव्हे. तुम्हा लोकांचा नक्की प्रॉब्लेम तुम्हालाही कळत नसावा. मातृभाषा अयोग्य असंही तुम्हाला म्हणवत नाही, इंग्रजी अयोग्य असंही म्हणवत नाही. मग मातृभाषातर हवी पण मग हे अमकं अमकं ही आपली मातृभाषा आहे का? किंवा आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्याच्या मुलाची मातृभाषा कुठली समजायची यासम मुद्दे काढत बसून आपली आणि पर्यायाने इतरांची दिशाभूल करत बसणं यातच तुम्हाला समाधान मिळतं बहुदा. किंवा आपण काय भारी मुद्दा टाकलाय आता दे उत्तर असं काहीतरी वाटून आनंद मिळत असावा. घ्या तुम्ही तो, माझं काही म्हणणं नाही. पण अशाच वृत्तीमुळे आज ही गत आहे इतकं नमूद करतो. चीनमधेही अनेक 'डायलेक्ट्स' आहेत. पण कँटोनीज ला त्यांनी प्रमाण मानलेलं आहे. वरील लिंक्स वाचल्या असाल तर हे तुम्हाला कळलं असेल. उपाय शोधण्याची मनोवृत्ती ठेवली तर उपाय मिळतात. अन्यथा 'बाकी चालू दे' असंच म्हणून नामानिराळं होता येतंच, कशाही बाबतीत.

In reply to by वेल्लाभट

पहिली गोष्ट "ऐड होमिनेम" अर्थात वैयक्तिक हल्ले करू नका , ही विनंती , धागा सार्वजनिक आहे , तुम्हाला विरोधी मते चालणार नसली तर तुम्ही तशी सूचना धाग्यातच टाकायला हवी होती हे नम्रपणे सांगू इच्छितो. दूसरे म्हणजे मराठी भाषा ही शालेय शिक्षणाचे माध्यम ह्या विषयावर आपण बोलतोय मला वाटते मी बरेचसे विषयाला अनुसरुन बोलतोय, तीसरे म्हणजे "तुम्हा लोकांचा" वगैरे मधे मला ओढु नका मी कोणा व्यक्तीचा स्टीरियोटाइप करत नाही अन माझा केलेला मी खपवूनही घेणार नाही. (ही विनंती आहे धमकी समजू नये स्पष्टीकरण इतक्यासाठी का तुम्ही वाकडाच विचार करत असल्याचे स्पष्ट दिसते आहे) "बाकी चालू द्या" बद्दल, ते म्हणणे संयुक्तिक कसे आहे हे तुम्ही दिलेल्या वैयक्तिक शेरेबाजीने परिपूर्ण प्रतिसादातून सहज कळते असो आता चालूच द्या!. :) ताजा कलम - समोरच्याला लागट बोलून मुद्दे सिद्ध होत नसतात त्याला तर्क लागतो अन तो हमरीतुमरी वर येऊन सापडत नसतो. बाकी तुम्ही असलं काहीतरी बोलले म्हणून मी आज एखाद चपाती कमी खाईन अशी तुमची धारणा असल्यास शुभेच्छा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 09/06/2016 - 12:52
चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात याला. तुमचा http://www.misalpav.com/comment/847258 हा प्रतिसाद बघा. आक्रस्ताळेपणा, थयथयाट तुम्ही सुरू केलात. सरसकटीकरण तुम्ही केलंत... ज्यांना हे झेपत नाही, संस्कार ज्यांना शाळेच्या बोडक्यावर मारायचेत इत्यादी इत्यादी काय काय. ठीक आहे? तुमच्या चिथावण्याने मलाही शष्प फरक पडणार नाही हे ही सांगतो. काय आता; जाऊ द्या.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

असंका 08/06/2016 - 15:11
मुद्दा काय तर ही प्रमाणित मराठी मातृभाषा नाहीच अन त्यामुळे ती सुद्धा बहुसंख्य पाल्यांस इंग्रजी इतकीच जड़ जाते.
जड जात असेल, तरीही इंग्रजीइतकी जड अजिबात जाणार नाही. व्याकरणाचे नियम आणि असंख्य शब्द एकच असतील बोलीतले आणि लेखीतले. इंग्रजीत मात्र व्याकरण पूर्ण वेगळं असेल आणि एकही शब्द ओळखीचा नसेल. त्यामुळे सारखेच जड जातील हे आपण म्हणत असला तरी ते अजिबात पट्ण्यासारखं नाही. शिक्षणाची भाषा ही बोलण्यातलीच भाषा असावी असं वाटण्यात काहीच गैर नसावं. तर मग आपण आता त्या दृष्टीने प्रयत्न करायचे, की जे तसे प्रयत्न करतायत त्यांनाच असं खच्ची करायचं? तुमची भावना आणि तुम्हाला अपेक्षित असलेले उपाय सुसंगत नाहीत. म्हणजे तुमची इच्छा आहे की शिक्षण बोलीतनं मिळावं. आणि त्यावर उपाय हा की शिक्षण इंग्रजीतनंच घ्यावं? पुढे आपण आपल्या मते सारखीच कठीण असलेले काही शब्द दिलेले आहेत. कुठली दिव्य माता असे शब्द घरात वापरत असेल असंही आपण विचारलंय. तर जोडीला, आपल्या भागातल्या साध्या साध्या माता आपल्या घरात या कल्पनांना (त्वरक, उत्प्रेरक, संप्रेरक इ.ना) आपल्या बोलीतले कुठले शब्द वापरतात तेही सांगायचंत ना? शिवाय यातनं आपण नक्की काय सांगू इच्छिता? एक तत्त्व म्हणून?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नमकिन 09/06/2016 - 09:11
दिलेल्या pulse linked in च्या लेखात तसेच UNESCO च्या बहुसंख्य संशोधनात मातृभाषा व इतर शिक्षण माध्यम भाषा याचा परिणाम यावरंच ऊहापोह करण्यात येतोय (मागील जवळपास ५० वर्ष चे वेचक संशोधन माझ्या नजरेत आलेले)• तर यावर जे बोली भाषिक समूह आहेत त्यांनी बोली भाषेला लिखित रूप देण्यासाठी जर कष्ट उपसले तरंच ती भाषा तगेल, जिथे मुळात script नाहीं त्यात शिक्षण (आजच्या जमान्यातले जे सर्वस्वी छापील व प्रसारित करने योग्य) कसे शक्य आहे? हे शिवधनुष्य उचलायला कोन्या युगप्रवर्तक बापू ची वाट पाहण्यापेक्षा अशी शाळा उघडलीत वा लिपी घडवलीत तर पुढच्या पिढीला सार्थ अभिमान व भविष्य राहील अन्यथा संस्कृत -प्राकृत वाद जुन्या काळापासून सर्व जाणतात व त्यातून साधलेली सामाजिक उतरंड आपण पाहतोच/अनुभवतोच आहोत. उपलब्ध पर्याय कुठवर चालू द्यायचं व किती चालवून घ्यायचं यावरंच तर संघर्ष व अंतिमत: अपेक्षित स्वातंत्र्य निश्चित होते. बाकी पोकळ!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सरकारी अभ्यासक्रमात शिकवली जाते ती मराठी 'प्रमाण मराठी मात्रूभाषा' नाहीख्हे ऐकून मौज वाटली. भारताची राज्यघटना, सरकार, सैन्य, पोलिस, झालंच सरकारी कार्यालये वगैरे गोष्टी तरी प्रमाण मानाव्यात किंवा कसे असा प्रश्न पडला आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

आप्पा आमचे लैच भारी ! फट म्हणता प्राण कंठाशी आणणाऱ्या अस्सल श्रीवर्धनी रोठ्यासारखे! त्यात आप्पा ह्यांची आमच्यावर खाशी खुन्नस अर्र मर्जी म्हणायचे होते आम्हाला, म्हणून बुआ आमचे आप्पा काहीही बोलताना मधे सैन्य आणतात(च) बघा कायम! नाहीतर बहुदा त्यांना तो तिरके बोलायचा आनंद मिळत नसावा (आवडी एकेकाच्या) तरीही प्रिय आप्पा दरवेळी "कशी शिपुरड्याची जिरावली" मोड़ असू दे तुमचा तुम्हाला लखलाभ तरीही मुद्दा मांडताना आपण काय बोलतोय ह्याचं ज़रा भान ठेवा, अन हो प्रमाण मराठी ही मातृभाषा नसते(च) ती वेगवेगळ्या भागांतील भाषा ह्यात समन्वय साधायला प्रमाणित केलेली असते, अर्थात ती प्रशासकीय सुविधेस उत्तम असतेच , फ़क्त म्हणून ती शिक्षणमाध्यम म्हणून उत्तम ठरेलच असे नाही , तुमचा मुद्द्यावर बोलायचा विचार असला तर पुढे बोलता येईल नसलीच इच्छा तर ओढ़ा अजुन एकदा सैन्यबिन्य मधे! तसंही लागट बोलायला काही जात नाही टाकायचं बोलून! हाकानाका!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही सांगता ते प्रमाण असा आग्रह दिसतो. जौंद्या. You cannot agree to disagree. बाकी मुद्दा सोडून केलेली वैयक्तिक टीका दखलपात्र नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

तुम्ही शिकवणार अग्री टु डिसग्री? And I thought तुम्ही सवंग विनोद करणे बंद कराल! असो! Lets agree to disagree here ;)

वेल्लाभट 08/06/2016 - 13:17
तूर्तास ही कालची बातमी वाचा. http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Marathi-pulls-down-aggregate-scores-of-many-SSC-students/articleshow/52626740.cms मजल इथवर गेलेली आहे. पुढे मराठी ऐच्छिक करतील, आपण तरीही फ्यूच्चर चा विचार करून जर्मन, फ्रेंच किंवा अजून काही निवडू, मग मराठी कुणी घेत नाही आजकाल म्हणून अभ्यासक्रमातून काढूनही टाकतील कदाचित, आपण तरीही नक्की प्रमाण मराठी ही आपली मातृभाषा का अशा गोष्टींमधे अडकलेले असू, किंवा कदाचित तोवर इंग्रजी इतकं अनिवार्य झालेलं असेल की मातृभाषा वगैरे संकल्पनाच गौण ठरतील... दहा वर्ष अजून... हे असंच चाललं तर लिहून देतो दहा वर्षात यासारखी परिस्थिती असेल नक्की. बाकी चालू दे!, नाही का?

In reply to by वेल्लाभट

बाकी चालूच द्या तुमचं आक्रस्ताळेपण कारण तो तुमचा चॉइस आहे . पोरे फ़क्त ५ तास शाळेत असतात उर्वरीत वेळ म्हणजे एकोणीस तास आपल्यासोबत असतात. मराठी ऐच्छिकच काय बंद केली तरी मला फरक पडत नाही. चांगली नोकरी मिळवायला माझ्या पोराला फ्रेंच अन जर्मन काय स्वाहिली शिकावी लागली तरी मी शिकवेल. राहता मायमराठीचा प्रश्न तर घरी असलेले १९ तास मी त्याला/तिला मराठी शिकवायला रोजचा एक तास घातला तरी पुरेसा होईल. ठराविक वयात हाती गोट्या सरकवले की भागते ठराविक वयात बोरकरांच्या कविता हाती दिल्या की मी माझ्या मातृभाषेबद्दल निश्चिन्त असेल. ज्यांना वैयक्तिक संस्कार करणे हा भाग सुद्धा शाळेच्या बोडक्यावर घालायचाय त्यांना कोपरा पासुन दंडवत . माझी भाषा माझ्या पोराला शिकवायला मी समर्थ आहे शाळेने त्याला मॉब सेन्स अन कागदं इतकं शिकवले तरी हरकत नाही. अस्मिता घरी शिकवायच्या असतात अन योगक्षेम संबंधी शिक्षण शाळेत शिकायचे असते हा आमचा फंडा सुस्पष्ट आहे ज्यांना हे झेपत नाही त्यांनी फुकट आक्रस्ताळेपणा करत लोकांवर शाळेवर शिक्षणव्यवस्थेवर ब्रह्मदेवावर ओबामावर वाटेल त्याच्यावर लांछन लावत फिरावे मला घेणे देणे नाही. पालक म्हणून माझ्या जबाबदारी मला कळतात नीट! मग? चालू दे का बाकी? ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 08/06/2016 - 14:15
मी म्हणणार नाही. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे तो माझा चॉईस आहे. तुम्हाला फरकच पडत नाही, हा तुमचा चॉईस(?) आहे. चांगली नोकरी हे तुमच्या लेखी शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट आहे, तुमचा चॉईस(?) भारी आहे. संस्कार शाळेच्या बोडक्यावर घालण्याच्या लोकांच्या कल्पना तुम्हाला अंतर्ज्ञानाने कळतात नाही का! हे पण भारी आहे. तसंही पाचच तास ना शाळेत जायचंय; त्यापेक्षा न जाऊनही चालेल, बघा विचार करून. तुम्ही समर्थ पालक आहातच तसंही. जाता जाता, बोरकरांच्या कविता हाती दिल्या की.... मी शिकवेल... मी माझ्या मातृभाषेबद्दल निश्चिन्त असेल... माझ्या जबाबदारी... हे शब्दप्रयोग बाकी अतिशय मजेशीर होते.

In reply to by वेल्लाभट

आनंदी गोपाळ 09/06/2016 - 21:39
व्हय का जी? तुम्हाला त्यांची "मातृभाषा" उर्फ वर्‍हाडी अजिबातच येत नाही, वेल्लाभट. तुम्हाला तुमची संस्कृतप्रचुर पुणेरी मराठीच जर समस्त मराठी लोकांची "मातृभाषा" म्हणून रेटायची आहे काय?

बाकी चालू द्या!

;)

In reply to by आनंदी गोपाळ

असंका 09/06/2016 - 22:04
मराठी माध्यम, इयत्ता पहिली,विषय मराठी पाठ पहिला- आला पाऊस आला पान २- "ढोंड, ढोंड पानी दे, साय माय पिकू दे" हे माझी लेक कोल्हापुरात शिकली. हे संस्कृत शब्द आहेत का? जी कुठली ही भाषा आहे ती तिची मातृभाषा आहे का? एकदा फाटे फोडायला लागलं की हे असं होतं. वस्तुस्थिती न बघता फक्त समोरच्याचा मुद्दा खोडून काढला असं दाखवणं एवढंच शिल्लक रहातं. खरंतर पुण्याचे लोकही लिहितानाची भाषा आणि बोलतानाची भाषा यात अंतर ठेवतच असतील. पण एकदा पुणेरी म्हणून हिणवलं की मुद्दा सर झाल्याचं दाखवणं एकदम सोपं जातं.

In reply to by असंका

आनंदी गोपाळ 09/06/2016 - 22:55
त्या प्रतिसादातला मुद्दा वेल्लाभट यांनी बापूंच्या बोलीला हिणवून दाखवण्याचा आहे. "आजकालच्या" मराठी मेडियममधे काय शिकवतात तो नाही. बाकी चालू द्या ;)

In reply to by आनंदी गोपाळ

असंका 11/06/2016 - 08:41
अच्छा? शिक्षणाच्या धाग्यावर 'काय शिकवलं जातं' हा मुद्दा नसून 'कोण काय म्हणतं' हा मुद्दा आहे तर! बरं झालं आपला प्राधान्यक्रम इतका उघड सांगितलात ते. आधी माझ्या लक्षातच आलं नव्हतं की फाटे फोडायचे हाच उद्देश आहे. मला वाटलेलं की गैरसमजातून विषय वाढतोय तेव्हा त्याच्यामागची सत्य परीस्थिती सांगितली की गैरसमज संपून विषय पुढे सरकेल. पण ते नकोच असेल तर ... चालेल तितकं चालू द्या...अन काय!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 08/06/2016 - 14:28
आणिक एक; ते २४ वजा ५ १९ तास जे तुम्ही घरी शिकवेल, ते इंग्लिशमधे शिकवेल की मराठीमधे शिकवेल? जर इंग्लिशमधे शिकवेल तर त्याला मराठी कसे येएल? आणि मराठीतून शिकवेल तर.... तर मग मराठी शाळेत काय वेगळं असेल?

In reply to by वेल्लाभट

नमकिन 09/06/2016 - 09:45
मराठी शाळांना प्रतिसाद नाहीं असे चित्र उभे करुन सरकारी यंत्रणा व व्यापारी वृत्तीचे संचालक /विश्वस्त मंडळाचा अनुदान विलंब, कमी पगार व शिक्षक/कर्मचारी वर्गाचा इतर शिक्षणेतर कामात राबवून घेणे असे विघ्नसंतोषी प्रकार चालू असतात तिथे मराठी भाषा ऐच्छिक करुन पुढे त्यामुळेच गुण कमी होतात असा प्रचार करुन मुलांची इच्छा कमी करायची व पुढे प्रतिसादाअभावी शिक्षकांना अतिरिक्त ठरवून "मराठी भाषा" विषय संपवायचे उघड कारस्थान आहे. शेरा- पालकांनाच नकोय मराठी शाळा, मराठी विषय व मराठी भाषा हे सोदाहरण नियमात बसवणे.

वेगळी मतं असणार्‍यांनी नाही लिहिलं तरी चालेल हे वाचूनही आणि तशीही सध्या मिपावर वामा असूनही काही मुद्दे लिहायचा मोह आवरला नाही. तेही माझी मतं काय हे लिहित नाही, महत्वाचं हे की सतत जर्मनी, जपान वगैरेचे जे दाखले दिले जातात, त्याबद्दल. मुळात जर्मनी या देशात एकच मुख्य भाषा आहे. बोलीभाषा आहेत, पण त्या वेगळ्या. भारतात तसे नाही. त्यामुळे इतकी सरळसरळ तुलना होऊ शकत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे शिक्षणाची पद्धत. कितव्या वर्षीपासून शिक्षण चालू होते, त्याची एकंदर रचना कशी आहे, शाळेत कशा पद्धतीने शिकवले जाते, त्यात पाठांतरावर भर दिला जातो की समजून घेण्यावर, परीक्षा पद्धती कशा आहेत, शाळेतून बाहेर पडल्यावर कुठे आणि काय संधी उपलब्ध आहेत, उच्च शिक्षणाच्या संधी किती आहेत, शिवाय मग तिथे आरक्षणादि मुद्दे वगैरे अनेक बाबतीत भारतातले शिक्षण आणि जर्मनीतले यात फरक आहे. बरं भारतातलं शिक्षण हे पुण्या मुंबईपुरतं गृहित धरून चालणार नाही. कित्येक ठिकाणी अनावस्था आहे सगळ्याची. अगदी निषाणी डावा अंगठा सारखी परिस्थिती आहे. मातृभाषेतून शिकण्याचे फायदे असतीलही किंवा तोटेही असतील, याबाबतीत माझं एकच असं काही मत नाही, पण सतत इतर देशांशी तुलना करून ते कसे बरोबर असं होत नाही. अमुक एका देशात जर मातृभाषेत शिक्षण होते तर आम्ही का नको, हा युक्तीवाद त्यामुळे पटत नाही. पूर्णपणे इकडचे सगळेच बरोबर असेही नाही, दोन्हीकडे चांगले वाईट मुद्दे आहेत. मातृभाषेतील शिक्षण असावे की नाही याबद्दलचा कुठलाही प्रतिवाद करायचा नाही. दोन्ही बाजूची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. जर्मनीत जन्म घेऊन, जर्मन माध्यमाच्या शाळेत शिकूनही उत्तम मराठी आणि इंग्रजी बोलणारी मुले आहेत तशीच मराठी आणि इंग्रजीही न येणारी देखील आहेत. आणि मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. कदाचित इंग्रजीशी थोडी जरी मैत्री करायची जरा जास्त जर्मन लोकांची तयारी असती, तर इथल्या बर्‍याच कंपन्या आज वेगळ्या उंचीवर राहिल्या असत्या आणि पर्यायाने देशही अजून जास्त पुढे गेला असता असं वाटण्याची वेळ बरेचदा आली आहे. याबाबतीत मागेही एका धाग्यावर लिहिले होते, पण तरीही हे फक्त माझे आणि काही ओळखीच्यांचे अनुभव म्हणून तसंच आहे असे म्हणणार नाही. असो, तो वेगळा मुद्दा आहे.

In reply to by मधुरा देशपांडे

वेल्लाभट 08/06/2016 - 14:25
कित्येक ठिकाणी अनावस्था आहे सगळ्याची
याला पुरावा आहे का? नसेल तर ग्रामीण भागात बदलत चाललेल्या शिक्षण पद्धतीची चार उदाहरणं मी तुम्हाला देतो. बघून आलोय मी.
अमुक एका देशात जर मातृभाषेत शिक्षण होते तर आम्ही का नको, हा युक्तीवाद त्यामुळे पटत नाही
असा युक्तिवाद नाहीच आहे तो. अनेकांनी त्यावर अभ्यास करून काढलेले निष्कर्ष आहेत जे सांगतात की हे व्हायला हवं, हे योग्य आहे. आणि काही वर्षापूर्वीपर्यंत होतंच होतं ना मातृभाषेतून शिक्षण? तसंच शिकून आपल्यातले अनेक जण आज इंग्रजी बोलतात ना? जर्मनीत काय आहे हे तुम्हीच सांगू शकता जास्त योग्य प्रकारे पण जर्मनीत आहे 'म्हणून' आपल्याइथे असं मुळीच म्हणणं नाही, ना इंग्लिशला विरोध आहे. ज्याला त्याला हेच समजावून दमतोय की इंग्लिश पहिलीपासून शिकवतात! आणि असं असताना एका कणाचीही अडचण येत नाही पुढे जाऊन. पण अख्खं माध्यमच इंग्लिश केलं ना की विचार करण्याची जी भाषा आहे तिचं खोबरं होतं. असो. उपयोग नाहीच आहे हे समजवण्याचा असं दिसतंय. टाईम विल टेल.

In reply to by वेल्लाभट

तुम्ही ज्या बदल घडत असलेल्या उदाहरणांबद्दल लिहिलं होतं वेगळ्या धाग्यात, त्या बदलांचं स्वागतही आहे आणि कौतुकही. पण ग्रामीण भागातलीच शिक्षणाची अनावस्था याची देही याची डोळा पाहिली आहे, आणि आता मी त्यातून बाहेर पडले असले तरीही माझी आई शिक्षणक्षेत्रात असल्याने अजूनही संबंध येतो. तुम्ही जो भाषेचा मुद्दा सांगताय त्याबाबतीत मी पूर्ण असा विरोध करत नाही, पण फक्त तेच बरोबर असे नाही. भाषेशिवाय इतर अनेक मुद्दे येतात. माझी आई ज्या ११-१२वीतल्या मुलींना शिकवते, त्यांना इंग्रजीतून शिक्षणाची सक्ती करा असे अजिबात नाही. त्या इंग्रजी सुटलं दहावीत की किती खुश होतात, (गणित सुटलं की सुद्धा) आणि पुढे मराठीतून कशी प्रगती करू शकतात हे माहिती आहे. पण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्यामुळे जर इतर अनेक मुद्दे बघता एखाद्याला इंग्रजी बरे पडेल असे वाटले तर तेही चुकीचे नाही. मग अगदी
अनेकांनी त्यावर अभ्यास करून काढलेले निष्कर्ष आहेत जे सांगतात की हे व्हायला हवं, हे योग्य आहे.
असे कुणी मला सांगितले तरीही मी स्वत: दोन्ही बाबतीत टोकाची मते ठेवू शकत नाही. आणि जर्मनीचा मुद्दा यासाठी कारण वर लेखातही मारियाताई विर्थ यांचे उदा आहे. आणि इतरही अनेक वेळा याबाबतीत जपान, जर्मनी वगैरे उदा. नेहमी बघितली आहेत. ती खरी असतीलही, पण भाषा हाच एकमेव मुद्दा त्यात येत नाही असे माझे अनुभव. लेखनसीमा.

In reply to by मधुरा देशपांडे

अभिनव 08/06/2016 - 17:18
मुळात जर्मनी या देशात एकच मुख्य भाषा आहे. बोलीभाषा आहेत, पण त्या वेगळ्या. भारतात तसे नाही. त्यामुळे इतकी सरळसरळ तुलना होऊ शकत नाही. >> का नाही? प्रत्येक राज्याला प्रचंड अधिकार आहेत. समुद्रकिनारा असलेल्या सगळ्यांना त्यांचे त्यांचे पोर्ट्स आहेत. इतर राज्यांना पण ते वापरता येऊ शकतात. अधिकृत नसला तरी भारत शेवटी अनेक देशांचाच देश आहे. तसे फक्त घटनेत लिहिलेले नाही. राहिले असेल वेळेअभावी. ४७ लाच नाहीका ५०० संस्थाने होती? दुसरा मुद्दा म्हणजे शिक्षणाची पद्धत. कितव्या वर्षीपासून शिक्षण चालू होते, त्याची एकंदर रचना कशी आहे, शाळेत कशा पद्धतीने शिकवले जाते, त्यात पाठांतरावर भर दिला जातो की समजून घेण्यावर, परीक्षा पद्धती कशा आहेत, शाळेतून बाहेर पडल्यावर कुठे आणि काय संधी उपलब्ध आहेत, उच्च शिक्षणाच्या संधी किती आहेत, शिवाय मग तिथे आरक्षणादि मुद्दे वगैरे अनेक बाबतीत भारतातले शिक्षण आणि जर्मनीतले यात फरक आहे >> मग हा फरक मिटवण्यासाठी कमी करण्यासाठी भारतीय नागरीक / अधिकारी / नेता या नात्याने मी तुम्ही आपण आपल्या पुर्वजांनी काय काय केले? त्याची यादी मिळेल का? कदाचित इंग्रजीशी थोडी जरी मैत्री करायची जरा जास्त जर्मन लोकांची तयारी असती, तर इथल्या बर्‍याच कंपन्या आज वेगळ्या उंचीवर राहिल्या असत्या आणि पर्यायाने देशही अजून जास्त पुढे गेला असता असं वाटण्याची वेळ बरेचदा आली आहे. >> या ज्या जर्मन कंपन्या तुम्हाला माहिती आहेत, त्याच क्षेत्रातल्या किती अशा भारतीय कंपन्या तुम्ही सांगु शकता ज्यांचे मालक / सीईओ/ अधिकारी वर्ग भारतातील इंग्रजी माध्यमातुन शिकला, इंग्रजीशी प्रचंड मैत्री केली म्हणून आज त्या जर्मन कंपन्यांचा बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या आहेत? भारतात तर इंग्रजी माध्यमाच उदोउदो कधीपासुन चालू आहे ना? मग आत्तापर्यंत तुमच्य लॉजीकने अशा डझनभर तरी भारतीय कंपन्या पाहीजे होत्या ना ज्या निव्वळ इंग्रजीशी मैत्री या मुद्द्यामुळे त्यांच्या जर्मन कांउटरपार्टपेक्षा मोठ्या / उजव्या आहेत? नोकरी मिळवणे या व्यतिरिक्त काय फायदा करुन घेतला भारतीयांनी इंग्रजीचा? मागच्या पिढीपिर्यंततर यातले बहुतांश त्यांच्या त्यांच्य मातृभाषेतुनच शिकलेले होते. थोडक्यात निव्वळ इंग्रजीमुळे असे जर्मनांचे किती व काय नुकसान झाले जे भारतीयांचे झाले नाही? नोक-य मिळवणे हे नका सांगू. ते तर जर्मन्स पण मिळवतात.

मारवा 09/06/2016 - 10:59
वरील चर्चेत सोन्याबापु यांनी मांडलेला बोली भाषे संदर्भातील मुद्दा मराठीतच शिक्षण हवे ची तार्कीक परीणीती आहे. अत्यंत वेगळा व जबरदस्त मुद्दा तर्कयुक्त रीतीने मांडलेला आहे जो विचारणीय आहे. असंका यांनी इंग्रजीपेक्षा मराठी च बोलीभाषेशी अंतर जे दाखवल आहे तो मुद्दाही जबरदस्त तर्कयुक्त आहे. चर्चेतील प्रतिसाद प्रगल्भ आहेत मजा येत आहे वाचायला धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते.

In reply to by मारवा

वेल्लाभट 09/06/2016 - 12:48
धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते
बर दिला.

In reply to by मारवा

असंका 09/06/2016 - 13:16
अवांतरः अरेच्या! धन्यवाद !! खरं तर तुमचाच एक प्रतिसाद माझ्या वरच्या प्रतिसादाच्या मुळाशी होता. यनावाला की राजेश घासकडवी यांच्या धाग्यावरचा. "ब्रिटीश राज नक्की कधी सुरु झालं?...तो पहिला ब्रिटिश नागरीक महत्वाचा!" असं काहीतरी होतं.
धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते.
हे आयडियल झालं. लेखक विषयाशी अत्यंत समरस होउन लिहित असल्याने त्यांची प्रतिक्रिया तशी साहजिक वाटली. मुळ विषयाबद्दल आपण काहीच मत दिलेलं नाही याचं मात्र आश्चर्य वाटलं.

माझेही शिक्षण मराठी भाषेत झाले. पण त्यामुळेच मी चांगले इंग्रजीहि बोलु शकतो. परंतु माझ्या मुलीला मी इंग्रजी माध्यमात घातले आहे. पण तिला मराठीची आवड निर्माण करायचा माझा प्रयत्न असतो. आणि माझे सुदैव म्हणजे आवड हळूहळू निर्माण होत आहे. सध्या ती म्रुत्युंजय हे पुस्तक वाचत आहे ( हळुहळु). त्यातील काहि शब्द कळाले नाहित तर मी समजावुन सांगतो. मराठी हा विषय सर्व शाळात १ ली पासुन (सि बि एस ई, आय सी एस ई, इंटर्नेशनल स्कूल) सक्तीचा करावा या मताचा आहे. इंग्रजीही १ली पासुन शिकवावे.

In reply to by शान्तिप्रिय

असंका 09/06/2016 - 11:34
आपणास लेखाचा मुद्दा कळलेला आहे का? मुलांना मराठी येणं न येणं हा मुद्दा नाहीये. मुलांना सर्वोत्तम माध्यमातनं शिक्षण मिळावं - जे मातृभाषा हेच असू शकते, हा मुद्दा आहे. मराठी ही इथे बहुतेकांची मातृभाषा आहे त्यामुळे सरळ "मराठी" माध्यम म्हणून लोक पुढे जात आहेत.

In reply to by असंका

नमकिन 10/06/2016 - 08:56
मुलांना इंग्रजी वा इतर भाषा येणं न येणं हा ही मुद्दा नाहीं तर मातृभाषा (भले ती कुठलिही असो) शिक्षण माध्यम असावी हाच आहे. मुद्दा धरुन ठेवायला माझा हातभार!

In reply to by शान्तिप्रिय

श्रीगुरुजी 10/06/2016 - 15:30
मराठी हा विषय सर्व शाळात १ ली पासुन (सि बि एस ई, आय सी एस ई, इंटर्नेशनल स्कूल) सक्तीचा करावा या मताचा आहे. इंग्रजीही १ली पासुन शिकवावे.
+१ खरं तर महाराष्ट्राने अंमलात आणलेलं त्रिभाषा सूत्र ही मुख्य समस्या आहे. महाराष्ट्रात लहानपणापासून हिंदी सक्तीची असल्याने इतरभाषिक महाराष्ट्रात हिंदीतच बोलतात कारण महाराष्ट्रीयन हिंदी बोलू शकतात. महाराष्ट्र हे असं राज्य आहे की जिथे त्या राज्याची भाषा शिकणे सक्तीचे नाही व इतरभाषिक स्थानिक भाषा अजिबात न शिकता आपले संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात आरामात घालवू शकतात (अमिताभ बच्चन, गुलजार, सलीम , जावेद, शाहरूख, दिलीपकुमार इ. मंडळींनी आपले सर्व आयुष्य महाराष्ट्रात घालविले पण आजतगायत मराठी शिकले नाहीत.). महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी व इंग्लिश भाषा सक्तीची असावी व हिंदी ऑप्शनल असावी.

In reply to by श्रीगुरुजी

महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी व इंग्लिश भाषा सक्तीची असावी व हिंदी ऑप्शनल असावी. तसंही आमची पिढी हिंदी सिनेमे पाहूनच हिंदी भाषा शिकली आहे. हिंदी ८ नंतर संस्कृताला ऑप्शन म्हणून असली तरी चालेल. मराठी आणि इंग्रजी कंपल्सरी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चंपाबाई 27/06/2016 - 23:13
हिंदी ऑप्शनल आहे... हिंदी , हिं + सं , पूर्ण संस्कृत असे पर्याय असतात. बायदिवे , लोकाना संस्कृत ही परकी वाटत नाही , पण हिंदी परकी वाटते हे पाहून नेत्रे जलं आगम्यति !

In reply to by श्रीगुरुजी

पुंबा 01/07/2016 - 13:00
+१ मु़ळात ज्या प्रांतात आपण राहतो तिथली भाषा उत्तम बोलता यावी ही आनंदाची गोष्ट आहे असंच वाटत नाही या लोकांना. दुसरी भाषा चांगली बोलता यावी अशी आस असणं हे किती आनंददायी असु शकतं हे परप्रांतियांना कळत नाही हे फार दुर्दैवी आहे.

उत्तम विषय व चांगली चर्चा. मातृभाषेतून शिक्षण केव्हाही चांगले पण तीच मातृभाषा कायम वापर्ली जाते का शि़क्षणात? एम.ए. मराठी झालेला तरूण महाराष्ट्राबाहेर्,देशाबाहेर करीयर करू शकेल का?वर चीन्,जर्मनीची उदाहरणे दिली आहेत पण त्या देशात बालवाडीपासुन ते पी.एच.डी.पर्यंत मातृभाषाच वापरली जाते ना ?इंग्रजीकडे दुर्लक्ष करणारे तरूण मुलाखतीत 'त त प प' करतात व हुशारी असूनही नोकरी मिळू शकत नाही. https://en.wikipedia.org/wiki/Foreign_Secretary_(India) येथे बहुतांशी लोक इंग्रजी माध्यमात शिकलेले कसे? त्यातही बहुतांशी एम.ए.इंग्रजी! मातृभाषेत शि़क्षण घेऊन परिस्थिती बदलेल का ? असा ह्यांचा प्रश्न.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वेल्लाभट 10/06/2016 - 10:28
मातृभाषेतून शिक्षण केव्हाही चांगले पण तीच मातृभाषा कायम वापर्ली जाते का शि़क्षणात? हा प्रश्न आहे, आरोप आहे, तक्रार आहे की पळवाट आहे? एम.ए. मराठी झालेला तरूण महाराष्ट्राबाहेर्,देशाबाहेर करीयर करू शकेल का?वर चीन्,जर्मनीची उदाहरणे दिली आहेत पण त्या देशात बालवाडीपासुन ते पी.एच.डी.पर्यंत मातृभाषाच वापरली जाते ना ?इंग्रजीकडे दुर्लक्ष करणारे तरूण मुलाखतीत 'त त प प' करतात व हुशारी असूनही नोकरी मिळू शकत नाही. नक्कीच करू शकेल कारण त्याचा विचार भक्कम तयार झालेला असेल. तो कुठलीही भाषा सहज शिकू शकेल, इतरांपेक्षा लवकर. याचीही उदाहरणं असंख्य आहेत. ते त त प प वाले इंग्लिशवर मेहनत घेत नसावेत पुरेशी. इंग्लिश यायलाच हवं, आधीपासून म्हणतोय, आणि तेही उत्तम यायला हवं. स्वतःची स्तुती नाही पण अमेरिकेतल्या परिक्षेसाठी प्रश्न सेट करताना, किंवा ऑफिसात लोक (इंग्लिशमधूनच शिकलेले) जेंव्हा मला मेल ड्राफ्ट करून दे सांगत येतात तेंव्हा ते करताना, कंपनीच्या अ‍ॅन्युल पब्लिकेशन मधे टॉपिक्स लिहिताना, इंग्लिश पुस्तकाच्या मॅनुस्क्रिप्टचं प्रूफरिडिंग करताना... मला काडीचीही अडचण जाणवली नाही. इंग्रजीची आवड लहानपणापासून लावली गेली, आणि प्रोत्साहन दिलं गेलं. पण विचार मराठीतूनच करतो आणि त्याचा अभिमान आहे. https://en.wikipedia.org/wiki/Foreign_Secretary_(India) येथे बहुतांशी लोक इंग्रजी माध्यमात शिकलेले कसे? त्यातही बहुतांशी एम.ए.इंग्रजी! मातृभाषेत शि़क्षण घेऊन परिस्थिती बदलेल का ? असा ह्यांचा प्रश्न. पास. ते ह्यांनाच विचारा तुमच्या.

In reply to by वेल्लाभट

इंग्रजीची आवड लहानपणापासून लावली गेली, आणि प्रोत्साहन दिलं गेलं हे अतिशय महत्वाचे. प्रत्येक घरात ते कसे होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
ते त त प प वाले इंग्लिशवर मेहनत घेत नसावेत पुरेशी
म्हणजे अगदी सुरूवातीपासूनच तशी मेहनत घ्यायला हवी.पण त्याच वेळेत इंग्रजी माध्यमाचा एखादा मुलगा तासभर फूट्बॉल खेळेल व घरी आई वडिलांबरोबर बसून इंडिया-टुडे वाचण्याचा प्रयत्न करणार्या मुलाला नैराश्य आणेल.असो. मी म्हणते, मुलास इंग्रजी माध्यमात घालून मराठीवर घर मेहनत घ्यायला काय अडचण आहे?अमेरिकेत राहणारे भारतिय वंशाचे लोक असेच प्रयत्न करतात ना?त्यांच्या मुलांना विचार करताना काही अडचण येते का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वेल्लाभट 10/06/2016 - 12:52
मुलास इंग्रजी माध्यमात घालून मराठीवर घर मेहनत घ्यायला काय अडचण आहे
अरे यार! मी म्हणतो हा उलटा अट्टाहास का? आपलं सोडून दुसर्‍याचं नेसायची धडपड का?
त्याच वेळेत इंग्रजी माध्यमाचा एखादा मुलगा तासभर फूट्बॉल खेळेल व घरी आई वडिलांबरोबर बसून इंडिया-टुडे वाचण्याचा प्रयत्न करणार्या मुलाला नैराश्य आणेल.असो.
हो आणि त्याचप्रकारे मराठी माध्यमाचा मुलगा उद्या मराठी साहित्य, दर्जेदार कलाकृतीही तितक्याच आनंदाने बघेल आणि इंग्रजी माध्यमाचा मुलगा 'त्यात खूप हाय फाय मराठी असतं' म्हणून त्याला मुकेल. जवळचे मित्र आहेत हे वाक्य म्हणणारे. कीव येते.
अमेरिकेत राहणारे भारतिय वंशाचे लोक असेच प्रयत्न करतात ना?त्यांच्या मुलांना विचार करताना काही अडचण येते का?
ते अमेरिकेत राहतात, तो प्रश्नच वेगळा आहे. इथल्यांबद्दल बोला. आणि विचार करताना अडचण येतेच्च.

In reply to by वेल्लाभट

नमकिन 10/06/2016 - 21:18
असेल ते इटवा अन् नसेल ते पाठवा हा प्रकार आहे शाळेत वेगळी भाषा अन् घरी वेगळी शिकवणी, मूल बिचारे सगळीकडे शिकण्यातंच. इक पल तो जीने दो!

In reply to by वेल्लाभट

वेल्ला तुझाशी अनेक वेळा सहमत आहे. मराठी वाचकच दर्जेदार न राहील्यामुळे उरले सुरलेले लेखकू भाव खाऊन जातात. मराठी मधे उत्कृष्ठ लेखन करणारे आता फारसे शिल्लक नाहीत. सुदैवाने जे आहेत ते जुन्या पिढीतलेच आहेत. मराठी माणूस इंग्रजी चांगला शिकला अभ्यास करून, सराव करून तर शिक्षणाचे माध्यम मराठी असल्याने काही फार बिघडणार नाही.

संदीप डांगे 11/06/2016 - 15:15
नेहमीचाच विषय आणि सर्वांचे नेहमीचेच गैरसमज. ह्यावर मागे बराच वादंग होऊनही 'मातृभाषेतून शिक्षण' ह्याचा अजूनही भलताच अर्थ लावत काही लोक गोंधळ घालत आहेत हे बघून आश्चर्य वाटले. १. युनेस्कोच्या मते प्राथमिक शाळा म्हणजे अगदी बालवाडी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण. २. हे शिक्षण मुलांना अनोळखी भाषेतून देणे चुकीचे. कारण ह्याचे विषय हे अगदी जवळचे, आजूबाजूचे, परिसरातले असतात. मुलांना त्यांच्या नेहमीच्या (मातृभाषा हा शब्द शब्दशः घ्यायची गरज नाही) भाषेतून माहिती लवकर समजू शकते. अनोळखी भाषेमधे आधी भाषेवर मेहनत घ्यावी लागते, नंतर माहितीवर दुसरी. ३. इंग्रजीतून उच्च शिक्षण ह्याबद्दल दुमत असायचे कारण नाही. जागतिक स्तरावर राहण्यासाठी बारावीनंतरचे काही शाखांचे शिक्षण इंग्रजीतून असले तरी हरकत नसावी. काथ्याकुट करणारी मंडळी 'उच्चशिक्षण मातृभाषेतून उपयोगाचे नाही' ह्याच मुद्द्यावर विनाकारण अडून बसलेले असतात हे नेहमीच बघितले आहे. 'मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण' व 'उच्चशिक्षणाची भाषा' हे दोन वेगवेगळे मुद्दे व विषय आहेत हे कृपया आतातरी ध्यानात घ्या.

In reply to by संदीप डांगे

नमकिन 11/06/2016 - 16:19
कुणाच्यातरी आयुष्यातला व आयुष्याची दिशा ठरवणारा प्रश्न. जालावर मनोहर राईलकरांचे अनेक लेख मराठीत ( "अमृतमंथन" अनुदिनीवर ) फार पूर्वी पासून हीच भूमिका आग्रहाने मांडत आहेत. बाल संगोपन विषयावर विविध पुस्तकातही हेच म्हटलंय की मातृभाषा शिक्षण माध्यम उत्तम. बहुधा व्यवहार भावनेवर मात करतोय हेच खरं

In reply to by संदीप डांगे

काथ्याकुट करणारी मंडळी 'उच्चशिक्षण मातृभाषेतून उपयोगाचे नाही' ह्याच मुद्द्यावर विनाकारण अडून बसलेले असतात हे नेहमीच बघितले आहे. हज्जारदा सहमत. आताच आमच्या ओळखीती एका मध्यप्रदेशस्थ मुलीने एम एस सी कॉम्य्पुटर सायन्स केले. तिची क्रमीक पुस्तके हिंदीतून होती. जिथे तांत्रिक शब्द येई तेव्हढा फक्त ईंग्रजीत होता. जसे "Menu में जाकर, आप सारे System Options देख सकते है". "Java एक Object Oriented programming languag है". ती आता तिच्या कंपनीत इतरांबरोबर राहून इंग्रजी पण चांगली बोलते. मागे कोणत्या तरी चर्चेत बंगालात १८७० साली मेडीकल चे शिक्षण देखील बंगाली भाषेत देत असत हे वाचले आहे. आणि त्यात इंग्रजी आणि बंगाली २न्ही माध्यमातून मेडीकल शिक्षण घेणार्‍यांची संख्या सारखी होती उलट बंगाली भाषेत शिक्षण घेणारे अंबळ जास्त होते हे ही वाचल्याचे स्मरते.

In reply to by टवाळ कार्टा

सुचिकांत 13/06/2016 - 16:58
सेमी इंग्लिशचे वर्ग चुकीच्या पद्धतीने भरवले जातात. त्याचे २ निकष पूर्ण व्हावे लागतात. १. इंग्रजी माध्यमात शिकून किमान डीएड झालेला शिक्षक त्या शाळेत हवा २. पुस्तके सेमीची असावीत. सध्या सेमीची पुस्तके बाजारात नाहीत. ती इंग्रजी माध्यमाची पुस्तके आहेत. सेमीची पुस्तके आर्धी मराठी आणि आर्धी इंग्रजी असावीत..पण हे दोन्ही निकष शासनातर्फे पूर्ण केले जात नाहीत. मग सेमी अवघड जाते अशी पण अगदी हुशार समजल्या जाणाऱ्या मुलांकडून ओरड ऐकायला मिळते. त्यापेक्षा युनेस्कोच्या संशोधनाप्रमाणे जितके दूरपर्यंत शिकता येईल तितके मातृभाषेतूनच शिका.

ऋषिकेश 13/06/2016 - 16:18
छान लेख आहे. आम्ही आधीच मुलीला मराठी माध्यमांत घातले आहे. पण इतर कुंपणावरल्या लोकांसाठी उपयुक्त ठरावा.

सुचिकांत 13/06/2016 - 16:50
@वेल्लाभट - लेख अभ्यासपूर्णच आहे. आम्ही याच विषयावर काम करत आहोत. असे सर्व संदर्भ एकत्रित करून आम्ही एक पीपीटी, सद्य मराठी शाळांची स्थिती, युनेस्कोचा मराठीतून अहवाल अशा अनेक गोष्टी एकाच इमेल मध्ये देत आहोत. एकदा डोळ्याखालून घालायचे असल्यास, Majhishala.Majhibhasha@gmail.com ला मेल करा. नाहीतर तुमचा मेल आयडी द्या. इतरांना पण हीच विनंती.

माझा मुलगा एकाच भाषेतुन काही शिकत नाही हे माझ्या लक्षात आलंय. सध्या तरी त्याला शाळाच नसल्याने आम्ही मनाला येईल ते प्रयोग करु शकतो. तो आमच्याशी बोलतो.. इथे अमेरिकेत आता त्याला सतत इंग्रजीत बोलणारे लोक भेटत आहेत, त्याच्याशी बोलत आहेत. आम्ही मध्ये पडत नाही, तो त्याचा प्रयत्न करुन बोलतो. हिंदी लोकांशी हिंदीत. मराठी लोकांशी मराठीत. प्रत्येक वेळेस त्या त्या भाषेतले शब्द बरोबर वापर्तो. ह्याचा अर्थ मुलं डोक्यात बरोबर ठेवत असतात. ज्ञान महत्वाचं ना. भाषा दुय्यम वाटते मला तरी. पण माझी मतं बदलत असतात. एक वर्ष इंटरनॅशनल शाळेत घालवुन लक्षात आलंय की कल्पना कितीही भारी असली तरी ती राबवणं जास्त महत्वाचं असतं. अत्यंत दर्जा शिक्षणपद्धत असुनही काही फायदा नसतो जर शिक्षक उत्तम नसतील. शिक्षक चांगले असतील तर भाषा दुय्यम असते. हे सध्याचं मत आहे. एक वर्षानी पाहु. आल्यावर मराठी एस.एस.सी मध्ये घालायचा विचार आहे.

In reply to by पिलीयन रायडर

सुचिकांत 14/06/2016 - 10:42
मी तुमची याअगोदरचीपण मते वाचली आहेत. तुम्ही मराठी एसएससीचा विचार करताय ही गोष्ट अभिनंदनीय आहे. तुमची टोकाची विचारसरणी नाही.. तुम्हाला मराठी माध्यमाचे फायदे पाठवायची इच्छा आहे. यावर जाणून घ्यायचे असल्यास मेल करा आणि अभिप्राय द्या - Majhishala.Majhibhasha@gmail.com

Nitin Palkar 25/06/2016 - 21:31
माझ्या मुलाचा जन्म ऑक्टोबर १९८५ मधला.तो मराठी माध्यमातून शिकला. तो पाचवीत असताना त्याच्या शाळेतील एका शिक्षक पालक सभेत 'गणित व शास्त्र हे विषय मुलांना इंग्रजीतून शिकवावेत का' या विषयावर चर्चा होती. बहुसंख्य पालकांचे मत सदर विषय इंग्रजी भाषेतून शिकवावे असे होते. काही जणांनी असे प्रतिपादन केले की, गणित व शास्त्र विषय आतापासून इंग्रजीतून शिकवल्याने मुलांना उच्च माध्यमिक व पुढील शिक्षणात त्याचा फायदा होईल कारण उच्च शिक्षण इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. माझे स्वतःचे मत मात्र याच्या विरुद्ध होते. मी माझ्या मुलाला दहावी पर्यंत संपूर्ण मराठी तुकडीत ठेवले. २००० साली तो एस.एस.सी. व २००२मध्ये एच.एस.सी. झाला. त्याला अनुक्रमे ८४% व ८६% गुण मिळाले. त्यानंतर त्याने भौतिक शास्त्रात पदवी व पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी. फिजिक्स) मिळवली. या सर्व शिक्षणात त्याला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठीतून (मातृभाषेतून) घेतल्याने कोणतीही अडचण आली नाही. आणखी एक माहिती येथे देणे अनाठायी ठरणार नाही असे वाटते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करताना, काही काळ त्याने ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतील उच्च पदाधिकाऱ्यांना (एक्झीक्युटिव्ह्जना) इंग्रजीचे शिक्षण देण्याचे कामही केले. मुलांच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे मध्यम मातृभाषाच असावी असे माझे ठाम मत आहे.

माझे मत थोडे वेगळे आहे ,मुळात इंग्रजी भाषा ही आपल्यापेक्षा प्रगत मेंदू असलेल्या युरोपियन अर्थात ब्रिटीशांची भाषा आहे .एखादा भारतीय विद्यार्थी जर कमी IQ चा असेल तर त्याला पहील्या यत्तेपासुन जरी इंग्रजि माध्यमात ठेवले तरी त्याला इंग्रजीचे पुर्ण ज्ञान घेता येणार नाही कारण मुळातच ही भाषा शिकायला अक्कल लागते.जर एखादा भारतीय विद्यार्थी जात्याच हुशार असेल तर तो कोणत्याहि माध्यमात शिकला तरी त्याला इंग्रजी सहज आत्मसात करता येईल.माझ्या बरोबर मराठि माध्यमात शिकलेले अनेकजण केवळ बुद्धीमत्तेमुळे इंग्रजी आत्मसात करु शकले व आज ते परदेशात डॉलरमध्ये खेळत आहेत व माझ्यासारखे बेताची अक्कल असलेले आजही इंग्रजीत बोलताना चाचपडतात तात्पर्य काय ,अक्कल असेल तर मराठी माध्यमात शिकुनसुद्धा इंग्रजिवर प्रभुत्व मिळवता येते ,जगभरातल्या संधी दाराशी येतात व आमच्या सारखे सुमार बुद्धिमत्तेचे लोक तंबाखु मळत पाट्या टाकत बसतात. ( आपला पाल्य हुशार असेल तर बिनधास्त मराठी माध्यमात घालावा)

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

सुचिकांत 29/06/2016 - 13:58
अत्यंत बेजबाबदार विधान करताय! @'टर्बोचार्जड फिलॉसॉफर' - शहरातल्या मोठ्या इस्पितळामध्ये दरवर्षी शाळा सुरु व्हायच्या वेळी, आयक्यू तपासणी कार्यक्रमासाठी पालक येतात, आणि डॉक्टर सांगतात आयक्यू चांगलाच आहे, तुम्ही तुमच्या मुलांना मातृभाषेतून शिकवा. इंग्रजी शिकायला काय आयक्यू लागतो? काहीही !!! गोव्यात गेला तर, फेरीवाला पण चांगलं इंग्रजी बोलू शकतो! बुद्धीमत्तेचे विविध प्रकार आहेत. भाषिक बुद्धिमत्ता त्यापैकी एक. एखाद्या उत्कृष्ट mechanical engineer चे इंग्रजी जर कच्चे असेल तर त्याचा आयक्यू कमी आहे म्हणता येईल का? यावर विचार करा. मुलांचा कल कोणत्या दिशेला आहे, हे जर ठरवायचे असेल तर पहिल्या पासून मातृभाषेतून शिक्षण कधीही चांगलेच आहे.

हकु 06/06/2016 - 08:40
आवडलं. आणि पटलं सुद्धा! मी स्वत: मराठी माध्यमातून शिकलो आहे. आणि कुठल्याही इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या व्यक्तीइतकच, किंबहुना जास्त अस्खलित व व्याकरणशुद्ध इंग्रजी मी बोलू शकतो असा मला आत्मविश्वास आहे. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. तिच्याकडे तशाच दृष्टीने बघावे. जशी जापनीज, फ्रेंच, चायनीज, तशीच इंग्रजी. ती कुठल्याही वयात आरामात शिकता येईल. इंग्रजी म्हणजे संपूर्ण शिक्षण नव्हे.

>> शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत. अगदी खरं बोललात वेल्लाजी.जी भाषा आपल्याला कम्फर्ट वाटत नाही त्या भाषेतून घेतलेलं शिक्षण हे शिक्षण नसून फक्त ट्रेनिंग आहे. (well educated बनायला हवं well trained नाही-3 idots) सर्व प्रकारचं शिक्षण/कोर्सेस हे मातृभाषेतून घेण्याची व्यवस्था असावी असे वाटते.अर्थात यामध्ये सरकारी जबरदस्ती नसायला हवी. आणि इतरांचे अनुकरण करणे याहून दुसरी मूर्खता नसावी.

आनंदी गोपाळ 06/06/2016 - 09:29
गुजरातेत १२ पर्यंत गुजराती मिडियममधे शिक्षण घेता येत असे. मेडिकलला जाणारी मुले सीईटी देखिल आपल्या भाषेत देऊ शकत होती. आता "नीट"च्या रिसेंट आदेशामुळे आता मुलांना नाईलाजाने पूर्ण भारतभर सीबीएसई अर्थात इंग्रजीत शिक्षण घ्यावे लागणार असे दिसते. यालाच मॅकॉलेकरण म्हणता येईल का?

नमकिन 06/06/2016 - 09:49
प्रबोधनपर व्याख्याने व सभा (सप्टेंबर ते मार्च) घेऊन जनजागरण केले तरच याला रोखता येईल अन्यथा मातृभाषा हे शिक्षण माध्यम उरणार नाहीं व पुढच्या पिढीला पर्याय नाहीं (जो सोयिस्कररित्या आजंच काहीपालक कारण सांगतात) म्हणून नाईलाजाने इंग्रजी माध्यमात शिकावे लागेल. खास करुन महिला वर्ग हिरिरिने सामिल करुन घ्यायला हवा, कारण पुरुषांचे यात काही चालत नाहीं असे पाहण्यात आले आहे.

In reply to by नमकिन

वेल्लाभट 06/06/2016 - 12:36
अधिकाधिक लोकांनी आपापल्या परीने प्रबोधन केलं तरीही पुष्कळ फरक पडेल. मागणीचा दबाव सरकार आणि शाळांवर झाला पाहिजे. अर्थात याचं समीकरण इतकं साधं नसून त्यात पैसा नामक गोष्ट मुख्य भूमिका बजावत आहे हे उघड आहे. शाळांना सीबीएसईचे वेध मिळणार्‍या फियांमुळे लागत आहेत हे त्यांच्या प्रत्येक युक्तिवादातून दिसतं. त्यामुळे प्रचंड मोठी चळवळ उभी राहिली तरच बदलाचा वेग वाढू शकतो. सोशल मिडिया यात मोठं काम करेल असा विश्वास आहे. फेसबुकवरचे मराठी शाळा आपणच टिकवल्या पाहिजेत व मराठी माध्यमाच्या शाळा हे ग्रूप बघा, सामील व्हा असं आवाहन सर्वांना करेन.

In reply to by वेल्लाभट

नमकिन 09/06/2016 - 10:28
Amway व तत्सम कंपन्या तुम्ही पाहिल्या असतीलंच. तिथे उच्च स्तर चा माणूस सोबत येतो व सर्व योजना उलगडुन सांगतो पण जो तुमच्या ओळखिचा असतो तो गप्प असतो किंवा मधली माहिती पेरत असतो. याचे कारण अनोळखी लोकांशी संवाद ठेवावा व वाद टाळावा हे आपण उमजून वागतो व ज्ञात व्यक्तिचे राग, लोभ सांभाळायचे असतात. आपल्या पातळीवर प्रयास चालूंच आहेत पण संख्या ला सामोरे जाताना पटावर संख्याच जरुरी. समूह मन एक करण्यास एक एकटे प्रयत्न अपुरे तसेच कमी प्रभावी ठरतात. मित्र,परिवार व आजु-बाजूचे एकाच दिशेने जाताना दिसले की (माहित असूनही एक-दिशा मार्गात विरुद्ध दिशेने जातातंच लोकं) मग वेगळे/एकटे पडण्याच्या भितीने इंग्लिश माध्यम निवडले जाते. २ सभा गोखले फेसबुक समूहाच्या हजर होतो पण अजूनही चळवळीत बदलायला वेळ आहे.

In reply to by हेमन्त वाघे

वेल्लाभट 06/06/2016 - 23:18
वाघे साहेब, मुद्दा न मिळाल्यास वैयक्तिक पातळीवर येऊन प्रतिवाद करणे हे अतिशय खालच्या दर्जाच्या विचारसरणीचे लक्षण आहे. तरीही आता विचारलंतच म्हणून सांगतो की माझा मुलगा एक वर्षाचा आहे. आणि तुम्हाला विशेष स्वारस्य असल्यास सांगा म्हणजे तुम्हाला पुढच्या वाटचालीची यथोचित माहिती देण्यात येईल.

भारतासारख्या बहुभाषिक देशात जेव्हा कामानिमित्त एका ठिकाणाहुन दुसर्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावे लागते तिथे मातृभाषेतुनच शिक्षण हा हट्ट अडचणीचा ठरु शकतो. मी सध्या बेंगलोरमध्ये राहतो.अल्याड पल्याडला कोणी मराठी नाही.भारताच्या बाबत बोलायचे झाल्यास एकुण शिक्षणपध्दतीतच आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. केवळ मातृभाषेतुन शिक्षण घेतल्याने मिळणारा फायदा नगण्य असावा. मराठीतुन शिक्षण घेऊन सुध्दा शिक्षणपध्दतीचा भर घोकंपट्टीवरच असेल तर मग इंग्रजीतच घोकंपट्टी केल्याचा फायदा जास्तच असेल.

प्रियाजी 06/06/2016 - 22:10
भारतभर बदलीच्या नोकरीमुळे आम्हालाही दोन्ही मुलांना ईंग्रजी माध्यमाच्या शाळात नाईलाजाने घालावे लागले.त्यामुळे होणारे तोटेही सहन करावे लागले. सुरवातीला मुले ईंग्रजीमधून शिकताना कंटाळत असत परंतू नंतर जमले. मात्र त्यामुळे मराठी अवांतर वाचनावर व बोलण्यावर थोडाफार परीणाम झालाच. मात्र घरात सतत मराठीच बोलत असल्याने मुले मराठी अगदीच विसरली नाहीत. त्यामुळे मलाही असेच वाटते की ज्यांना शक्य आहे त्यांनी मराठी/ मात्रुभाषेतच मुलांना शालांत शिक्षण द्यावे त्याचवेळी ईंग्रजी बोलीभाषा म्हणून शिकवावी. सध्या शालेय सुट्ट्यामध्ये ज्या अनेक कलाकौशल्याच्या वर्गांना मराठी माध्यमातील मुले जातात तसेच हसत खेळत मुले सहज ईंग्रजी बोलीभाषा म्हणून शिकू शकतील व एकदा भाषेची गोडी लागली की त्यांच्या आकलन शक्तीनुसार छोटी छोटी गोष्टींची पुस्तके सतत त्यांच्या वाचनात येतील असे पाहून ती मुले चांगले ईंग्रजी बोलू शकतील. आम्हा उभयतांनाही शाळेत मराठी माध्यम व कॉलेजला ईंग्रजी माध्यम असूनही बोलीभाषा म्हणून ईंग्रजी चांगले येत नव्हते परंतू मी स्वतः ईंग्रजी पुस्तके सतत वाचूनच अन घरात सतत सवय केल्यानेच परप्रांतात स्वतःचे विचार योग्य रीतीने मांडू शकले.

सुरेख लेख आणि उत्तम विवेचन ! आपल्या मातृभाषीक राज्यात/देशात राहत असल्यास मातृभाषेतच प्राथमिक शिक्षण व शक्य असल्यास माध्यमिक शिक्षणही घ्यावे. मात्र इंग्लिश ही आणखी एक भाषा म्हणुन शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल. भारतात शास्त्रिय विषयांतील उच्च शिक्षण व विशेषतः व्यावसायीक शिक्षण घेण्याची इच्छा असल्यास सद्यातरी विद्यालयीन शिक्षण इंग्लिशमध्ये घेणे आवश्यक आहे. असे शिक्षण अनेक विकसित देशांमध्ये स्थानिक भाषेत करता येते. कारण तेथे स्थानिक भाषेत शिक्षण व संशोधन करण्यासाठी आवश्यक असणार्‍या अनेक मूलभूत सोई निर्माण केल्या गेल्या आहेत. अमेरिका, कॅनडा, युके, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, सिंगापूर इत्यादी देशांत पदवी शिक्षण अथवा नोकरी करावयाची असल्यास इंग्लिशला पर्याय नाही. आंतरराष्ट्रिय स्तरावरचे संशोधन करायचे असल्यास आजतरी सर्वच देशांच्या नागरिकांना (यात सर्व विकसित पाश्च्यात्य देशही येतात) इंग्लिश शिकणे आवश्यक ठरते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझे स्वतःचे ११ पर्यंतचे (त्यावेळची एस एस सी) शिक्षण मराठीत झाले. तोपर्यंत इंग्लिशचा फारसा गंधही नव्हता... शिक्षाकांनाही केवळ जुजुबी इंग्लिश येत होते ! सायन्स कॉलेजमध्ये गेल्यावर सगळे शिक्षण एकदम इंग्लिशमध्ये ! सुरुवातीला जरा कठीण गेले पण भाषांची आवड असल्याने नंतर सोपे झाले. ज्यांना इंग्लिश झेपले नाही त्यांची मात्र परवड झाली. त्यानंतर मात्र सर्व सायन्स कॉलेजचे व व्यावसायिक शिक्षण आणि सर्व प्रकारचे व्यवसाय पूर्णपणे इंग्लिशमध्येच केले... करावेच लागले. व्यवसायानिमित्ताने इंग्लिश, अमेरिकन, कॅनॅडियन, सिंगापोरियन, ऑस्ट्रेलियन, इ लोकांबरोबर काम करायला आणि त्यांना इंग्लिशमध्ये युक्तीच्या चार गोष्टी सांगायलाही काही अडचण आली नाही :) मुलाचे आठवी पर्यंतचे शिक्षण परदेशात झाल्याने अर्थातच इंग्लिशमध्ये झाले. त्यामुळे नंतर भारतातले व परदेशातले शिक्षण अर्थातच इंग्लिशमध्ये झाले. पण घरात कटाक्षाने मराठीचा वापर असल्याने त्याचे मराठी लिहिणे-बोलणे अस्खलित आहे. त्याच्या शिक्षणात एकही वर्ष मराठी हा विषय नव्हता हे सांगून विश्वास बसणार नाही, इतके ! "पुल" त्याचे आवडते लेखक आहेत, मराठी नाटक-सिनेमा आवडीने बघतो, सर्व नातेवाईकांशी सरळ सोप्या मराठीत (इंग्राजळेल्या नाही ;) ) बोलतो. हा आणि इतर काही अनुभवांवरून (व काही बाबतीत शास्त्रिय मानल्या गेलेल्या पुराव्यांवरून) असे वाटते की : १. लहानपणी मुले अनेक भाषा सहजी आत्मसात करतात. तेव्हा त्यांना प्राधान्याने मातृभाषा शिकवावी, शक्य असल्यास मातृभाषेतून शिक्षण द्यावे... पण त्याचबरोबर इतर उपयोगी भाषा शिकण्यासाठीही जरूर प्रोत्साहन द्यावे. २. घरात मातृभाषा वापरली जात असली तर मुले ती सहज आत्मसात करतात... जशी ती त्यांच्या शाळेतील / घराशेजारच्या खेळगड्यांची भाषा सहज शिकतात तशीच. मुलांना इंग्लिशची सवय व्हावी या उद्येशाने बरेच पालक घरात इंग्लिश / इंग्राजळलेली मराठी बोलताना दिसतात. याचा अंतीम फायदा किती याबद्दल माझ्या मनात शंका आहे... मात्र त्यामुळे मुलांची मराठी बिघडते हे नक्की :( त्याऐवजी सरमिसळ न करता जशी जरूर आहे तशी (चर्चेच्या विषयावर अवलंबून) शक्यतो शुद्ध मराठी किंवा शुद्ध इंग्लिश वापरावी. ३. विशेषतः व्यापारी व शास्त्रिय विषयांतील उच्चशिक्षण आणि संशोधन स्थानिक भाषांत व्हावे इतक्या मूलभूत सोई सद्या भारतात नाहीत आणि (अगदीच अशक्य नसल्या तरी) त्या नजिकच्या काळात भारतात निर्माण होतील अशी शक्यता नाही... कारण त्याकरिता वित्त, राजकिय इच्छाशक्ती आणि सामाजिक इच्छाशक्ती यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते आणि त्या सर्वांचाच प्रचंड अभाव सद्या दिसतो आहे :( ४. वरील सर्व मुद्दे पाहता, (अ) आपल्या मातृभाषेत शिकणे केव्हाही जास्त सोपे आणि श्रेयस्कर असते याबाबत शंका नाही. (आ) मातृभाषेबद्दल ममत्व जरूर असावे आणि तिचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. हे मान्य केल्यावरही खालील व्यावहारीक कटू सत्ये मानाविच लागतात... (इ) भारतात व्यापारी व शास्त्रिय विषयांत उच्च ध्येय ठेवण्यार्‍या भारतियांसाठी सद्या इंग्लिश ही एक महत्वाची भाषा म्हणून शिकणे अपरिहार्य आहे. (ई) आंतरराष्ट्रिय क्षेत्रांत व्यापारी व शास्त्रिय शास्त्रिय विषयांत उच्च ध्येय ठेवण्यार्‍या जगातल्या सर्व देशातील नागरिकांसाठी सद्या इंग्लिश ही एक महत्वाची भाषा म्हणून शिकणे अपरिहार्य आहे. याबाबत गैरसमज नसावा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नमकिन 08/06/2016 - 09:21
विषय सोपा व सरळ आहे त्यात गैरसमज नसावा. भाषा अमाप आहेत शिकण्यास कुणाचीच ना नाहीं तर मातृभाषा हे शैक्षणिक माध्यम असावे हीच वैज्ञानिक व वैश्विक प्रमाण आहे. "आंतरराष्ट्रिय स्तरावरचे संशोधन करायचे असल्यास आजतरी सर्वच देशांच्या नागरिकांना (यात सर्व विकसित पाश्च्यात्य देशही येतात) इंग्लिश शिकणे आवश्यक ठरते."- इंग्रजी भाषा शिकण्यास आक्षेप नाहींच आहे तसेच संशोधन करताना कुठल्याही भाषेत करु शकतो, प्रत्येक देश आपल्या भाषेत संशोधन लेख प्रसिद्ध व उपलब्ध करतो. तेव्हा कृपया गैरसमज न पसरवावा.

In reply to by नमकिन

वेल्लाभट 08/06/2016 - 11:06
योग्य उत्तर दिलंत नमकिन. धाग्यातल्या लिंका अनेकांनी उघडल्याच नसण्याची दाट शंका येते काही प्रतिसाद बघून. धागाकर्त्याने आपली मतं कमी आणि इतर जागतिक संस्था काय म्हणतात त्याचे दुवे देण्याच्या हेतूने धागा काढलेला असूनही तो उद्देश पूर्णतः सफल झालेला नाही असं खेदाने वाटतं. उदाहरणार्थ
आंतरराष्ट्रिय क्षेत्रांत व्यापारी व शास्त्रिय शास्त्रिय विषयांत उच्च ध्येय ठेवण्यार्‍या जगातल्या सर्व देशातील नागरिकांसाठी
अशी वाक्यं. नेमकं हेच पूर्णसत्य नाही हे सांगायचा प्रयत्न होता. असो.

In reply to by नमकिन

संशोधन करताना कुठल्याही भाषेत करु शकतो, प्रत्येक देश आपल्या भाषेत संशोधन लेख प्रसिद्ध व उपलब्ध करतो. तेव्हा कृपया गैरसमज न पसरवावा. गैरसमज !? नक्की ??? भारतिय भाषेत जागतिक स्तराचे शास्त्रिय संशोधन व्हावे असे माझेही स्वप्न आहेच. पण, दुर्दैवाने तशी वस्तुस्थिती सद्या तरी आस्तित्वात नाही. प्रत्येक प्रबंध "कोण्याएका शास्त्रिय नियतकालिकात प्रकाशित झाला" या एकाच कारणाने त्यातले संशोधन जागतिक स्तराचे आणि / अथवा उपयोगी ठरत नाही.... मग ती भाषा इंग्लिश असो की इतर कोणतीही. जेव्हा खालील गोष्टी आस्तित्वात येतील तेव्हाच एखादी भाषा जागतिक स्तरावरचे संशोधन होणारी भाषा मानणे योग्य होईल : १. त्या भाषेत "जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त होऊ शकणारे संशोधन" प्रथम प्रकाशित केले जाईल व गैरभाषिक संशोधकांना त्याच्या भाषांतराची निकड वाटेल. २. त्या भाषेतील प्रथम प्रकाशित झालेले एखादे संशोधन पाठ्यपुस्तकात सामील होईल. ३. त्या भाषेतील प्रथम प्रकाशित झालेल्या संशोधनाने जागतिक उद्योगधंद्यांमध्ये किंवा जागतिक व्यवहारांमध्ये महत्वाचे बदल घडवून आणले जातील. ४. जागतिक स्तरावरचे इतर भाषांतले संशोधन प्रसिद्ध झाल्यावर ते त्या भाषेत त्वरीत (जास्तित जास्त एक-दोन महिन्यांत) भाषांतरीत होऊन ते स्थानिक संशोधकांना उपल्ब्ध होईल. सद्या ही परिस्थिती पूर्णतः केवळ इंग्लिश व कमी-अधिक प्रमाणात आधुनिक पाश्च्यात्य भाषांतच (जर्मन, फ्रेंच, स्कँडेनेव्हियन भाषा, इ) उपलब्ध आहे. इतके असूनही इंग्लिश सोडून इतर भाषांतील संशोधकांना जर आंतरराष्ट्रिय स्तरावर काम करायचे असले तर एक सामाईक भाषा म्हणून इंग्लिश शिकावीच लागते, ही वस्तुस्थिती आहे. मातृभाषेचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्वाचे असते... नक्कीच असावे. माझेही असेच मत आहे. मात्र, एखाद्या भाषेला जागतिक शास्त्रिय संशोधनातले महत्वाचे स्थान केवळ तशी कल्पना करून, बोलून किंवा लिहून मिळणार नाही... वस्तूस्थितीकडे डोळेझाक करून तर नाहीच नाही. कारण वस्तूस्थितीकडे डोळेझाक करणे गैरसमजाचे तर होईलच, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे ते अंतिमतः भाषेलाही घातक ठरेल. भाषेला तसे उच्च स्थान मिळण्यासाठी, सर्वप्रथम त्यासाठी लागणार्‍या सर्व आवश्यक गोष्टींचा सखोल अभ्यास करावा लागेल; सर्व आवश्यक संसाधनांची व व्यवस्थांची उभारणी करावी लागेल; आणि त्या सर्व प्रणालीचे अविरत-अखंड व्यवस्थापन चालू राहील याची खात्री करावी लागेल... असे झाल्यावर मग एकदोन दशकांनी त्या प्रणालीची फळे दिसायला लागतील. सद्या मान्यताप्राप्त समजल्या जाण्यार्‍या (इंग्लिशसह) सर्व भाषांनी याच खडतर मार्गावरून वाटचाल केलेली आहे व ती चाल अविरत-अखंड चालू ठेवली आहे... या मार्गाला दुसरा साधासोपा पर्याय नाही. पूर्णविराम.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अर्थात... जर स्थानिक भाषेत काम करून स्थानिक स्तरावर कार्यरत रहायचे असेल तर मात्र इंग्लिशच काय इतर कोणत्याही भाषेविना (अगदी इतर भारतिय भाषेविनाही) फारसे अडणार नाही... अगदी अडणारच नाही असे नाही, पण चालून जाऊ शकेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वेल्लाभट 09/06/2016 - 12:39
म्हात्रे साहेब; इंग्लिश ला विरोध आहे असं एका शब्दानेही सूचित होत नाहीये लेखात. शिक्षणाचं माध्यमच इंग्लिश असण्याला विरोध आहे. हे इतकं साधं असून तुमचाही प्रतिसाद चुकीचा अर्थ काढून दिलेला यावा याचं आश्चर्य आहे.

In reply to by वेल्लाभट

वेल्लाभट साहेब, मी माझ्या पहिल्या प्रतिसादाची सुरुवात, आपल्या मातृभाषीक राज्यात/देशात राहत असल्यास मातृभाषेतच प्राथमिक शिक्षण व शक्य असल्यास माध्यमिक शिक्षणही घ्यावे. मात्र इंग्लिश ही आणखी एक भाषा म्हणुन शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल. अशीच केली होती. तरीही त्यावरच्या प्रतिसादात 'नमकिन' यांनी माझा गैरसमज असल्याचे लिहिले (?!). त्यातच त्यांनी, मातृभाषा हे शैक्षणिक माध्यम असावे हीच वैज्ञानिक व वैश्विक प्रमाण आहे. असे सरकटीकरण करणारे आश्चर्यकारक विधान केले. त्या विधानाने काही वाचकांचा "मातृभाषेतलेच शिक्षण जगात सर्व काही मिळवून देऊ शकेल" असा गैरसमज होईल असे वाटले. हे विधान मराठीच्या बाबतीत खरे असते तर माझ्याइतका आनंद कोणाला झाला नसता... पण दुर्दैवाने तशी वस्तुस्थिती आज नाही. त्याऐवजी ते वाक्य खालील्प्रमाणे लिहिले असते तर सत्याच्या बरेच जवळपास असते... "आयुष्यातले सुरुवातिचे (प्राथमिक व माध्यमिक) शिक्षण मातृभाषेतून दिल्यास ते विद्यार्थ्याला विषय समजून घेण्यास (ज्ञानार्जनासाठी) जास्त फायद्याचे ठरेल" असे पुरावे संशोधनाव्दारे पुढे आले आहेत. आपल्याला ममत्व वाटणार्‍या गोष्टींबद्दल अतिशयोक्त दावे मूळ उद्द्येशाला धोका पोहोचवतात*. कारण, त्या दाव्यांतला फोलपणा आज ना उद्या बाहेर येतोच आणि मग त्यां दाव्यांची व इतर खर्‍या दाव्यांची (आणि दावे करणार्‍यांचीही) विश्वासार्हता कमी होते. या वरच्या कारणांसाठीच पुढचे प्रतिसाद लिहिणे भाग पडले. . * : अतिशयोक्त दावे राजकारणात "तात्कालिक व संकुचित" स्वार्थ साधण्यासाठी बर्‍याचदा यशस्विरित्या केले जातात... हे "वैज्ञानिक" नाहीच व "नैतिक" तर अजिबात नाही. एखाद्या गोष्टीबद्दल खरे ममत्व वाटणार्‍या लोकांना हे लोकांना जेवढे लवकर कळेल तेवढे बरे. =============== अजून थोडेसे... (अ) मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेला खालील कारणांनी उर्जितावस्था येणार नाही : १. केवळ भाषेचे गोडवे गाणे. २. त्या भाषेबाबतीत भावनिक दावे करणे... आणि विषेशतः अतिरंजित दावे करण्यासारखी धोकादायक दुसरी गोष्ट नाही. ३. त्या भाषेच्या शिक्षणाची चांगली व्यवस्था जरूर असावी पण ते वापरण्याची जबरदस्ती करणे मूळ मुद्द्याला मारक ठरेल. किंबहुना, खालील (आ) मधिल परिस्थिती निर्माण केली तर लोकच त्या भाषेच्या उत्तम शिक्षणासाठीच्या व्यवस्थेचा आग्रह धरतील. (आ) जर मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेला उर्जितावस्था यायला हवी असेल तर खालील गोष्टी व्यवहारात आस्तित्वात असणे / आणणे ही योग्य नीति ठरेल : १. त्या भाषेचा वापर उपजिविका करण्यासाठी उपयोगी असावा. यामुळे ती भाषा शिकणे सर्वसामान्यांना आवश्यक वाटते. २. त्यापुढे जाऊन, त्या भाषेचा वापर सधन आणि / किंवा उत्तम जीवनशैली जगण्यासाठी आवश्यक असला तर सोन्याहून पिवळे. असे झाले की आपोआप ती भाषा शिकणे ही एक आकर्षक गोष्ट बनते. मग ती "भाषा शिका, तिचे संवर्धन करा, तिला जगवा" अशी मनधरणी करण्याची वेळ येणार नाही... मातृभाषा असलेले व नसलेलेही लोक काकू न करता आवश्यक ते परिश्रम घेऊन ती भाषा शिकायला आपणहून पुढे येतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वेल्लाभट 10/06/2016 - 10:20
बरं, तुमची मतं कळली. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट; कुठले दावे किती फोल ठरतील ते कळेलच पुढे पुढे. (यात आक्रस्ताळेपणा नाही किंवा धमकीही नाही) एखादं विधान तुम्हाला अतिरंजित वाटलं तरी तसे सिद्धांत मांडलेले आहेत जगभर; तेही विद्वान (मानले तर) लोकांनी... त्याला काहीच कन्सिडरेशन नाही काय? प्रॅक्टिकॅलिटी डाय्जेस्ट नाही झाली की त्याला भावनिक म्हणायचं... हे कसं बरोबर आहे? आणि त्या खालील गोष्टी करायला हव्यात.... ज्या तुम्ही लिहिल्यात त्या सगळ्या करतातच ती लोकं ज्यांना कळकळ वाटते. त्यामुळे ते होईलच बरोबर पद्धतीने. चिंताच नको. मला कळ्ळतच नाही की मराठीतनं मोठी झालेली आणि त्यातूनच इंग्लिशमधे पारंगत झालेली मंडळी मराठीला एवढ्या आग्रहाने राइट ऑफ कसं करू शकतात. हे भावनिक विधान वाटलं तर समजा तसं. पण हे अनाकलनीय आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नमकिन 10/06/2016 - 21:05
सुरुवातंच गंडली - भाषा शिकण्यास विरोध प्रदर्शन धाग्यात केले नव्हतेच पण इंग्लिश भाषा शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल - हे विधान भरकटवणारे वर भरीस संशोधन कसे १ भाषा प्रसिद्ध करण्यास अनिवार्य आहे यामुळे गाड़ी विषयावर आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. दिलेल्या संशोधन पर दुवे व मागे शोधून केलेले वाचन यावरुन तुमचे अपेक्षित विधान मी मांडू शकलो नाहीं त्याबद्दल क्षमस्व; तरी भावना पोचल्याचे समाधान. होता होता पुन्हा त्याच विषयावर भर घातलीत मूळ विषयाला बगलेत घालून. असेल ते इटवा अन् नसेल ते पाठवा! या उक्तीनुसार मातृभाषेला बाजूला सारुन मुलाचा आनंद, शिकण्यातली सहजता व जीवन अनुभव जो परिसरात सहजसाध्य आहे तो सोडून अनैसर्गिक वातावरण देऊन इवल्या जीवाला आपल्या अपेक्षांच्या, आकांक्षाच्या ओझ्याखाली फुलवायचा प्रयोग करने व त्याची भलामण करीत रहाणे का? तर नौकरीच्या संधी व पैशाची राशि यांचा संबंध यशाच्या व्याख्येत समाविष्ट करुन लहान वयापासुन त्या बालकाच्या भावविश्वाचा नाश करतात व पुढे जीवनात अपेक्षा करतात संवेदनशीलता असन्याची, कसं काय शक्य आहे? कित्येक शाळा शिक्षक सांगतात की आम्ही मुलांना काही शिकवताना मुलेच आम्हाला बरेच काही शिकवतात, अर्थात शिकण्याची तयारी असेल तर. हेच मोकळे मन धागा लिहिताना लेखकाच्या मनात असावे, असे वाटते. त्याला असे फरफटत घेऊन जाऊन चर्चा विस्कटते. या विषयावर साधक बाधक चर्चा होत रहावी ही सद्य सच्ची भावना.

In reply to by नमकिन

@ वेलाभट व नमकिन : माझ्या आतापर्यंतच्या प्रतिसादातून माझे मुद्दे स्पष्ट झाले आहेतच. तेव्हा पुनरुक्ती टाळतो आहे. फक्त... मला कळ्ळतच नाही की मराठीतनं मोठी झालेली आणि त्यातूनच इंग्लिशमधे पारंगत झालेली मंडळी मराठीला एवढ्या आग्रहाने राइट ऑफ कसं करू शकतात. हा (अजून एक) गैरसमज दूर करण्यासाठी एकच गोष्ट सांगाविशी वाटतेय, ती अशी... मराठीबद्दलच्या तुमच्या आणि माझ्या भावना एकाच आत्मियतेच्या आहेत आहेत. म्हणुनच, माझ्या घरात मराठीच पहिली भाषा आहे आणि ४० वर्षांच्या लिहिण्याच्या दुराव्यानंतर मराठी वाचण्याची-लिहिण्याची संधी मिळते या एका महत्वाच्या कारणाने मी मिपावर चि़कटलो. मराठीचे महत्व कायम ठेवण्यासाठी, किंबहुना वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे माझेही ठाम मत आहे. मात्र, त्या प्रयत्नांची दिशा कोणती असावी याबाबत आपल्यात मतभेद आहेत असेच आतापर्यंतच्या लिखाणातून मला ध्वनित होते आहे. ते कसे हे अगोदर आले आहेच. आणि हा फरक फार महत्वाचा आहे, कारण... यशासाठी खूप जोर लावणे फार महत्वाचे आहेच, पण तो जोर कोणत्या जागी/दिशेने लावला जात आहे यावर यश मिळेल की नाही हे जास्त अवलंबून असते. असो. या विषयावर अजून काही नवीन मुद्दा नसल्यास, मी इथेच थांबणे श्रेयस्कर समजतो. धन्यवाद !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभिनव 09/06/2016 - 12:46
आणि त्या सर्व प्रणालीचे अविरत-अखंड व्यवस्थापन चालू राहील याची खात्री करावी लागेल... असे झाल्यावर मग एकदोन दशकांनी त्या प्रणालीची फळे दिसायला लागतील. >> तुमच्या प्रतिसादातील उपाय व इतर अनेक उपाय कोणी करायचे? गुजरात्यांनी? बंगाल्यांनी? की मराठ्यांनी? मी ? तुम्ही? कोणी? आज २०१६ मधे तुम्ही म्हणता एकदोन दशकांनी फळ दिसतील, तर महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासुन एवढ्या वर्षात मराठी माणसांनी काय केले? तेव्हाच केले असते तर ते एकदोन दशके नंतरचे फळ आज २०१६ मधे नसते का दिसले? अजुन एकदोन दशकानंतरही फक्त उपाय सुचवायचे का? अंमल कधी करायचा? त्या उपायांच्या मोठ्या चित्राचा एक छोटा भाग शिक्षणाचे मराठी माध्यम असणे हा आहे. तो तर तुम्ही मराठी विरोधक करत नाही आणि बाकीचे उपाय मात्र सुचवत बसता. कुठुनतरी सुरुवात तर करा ना?

एकच, तुम्ही म्हणालात तसे शिक्षणाला मातृभाषा माध्यम grasping करता उत्तम ! मान्य करतो मी, पण ज्या मराठी माध्यमाबद्दल आपण हे म्हणता आहात ती मराठी खरंच आपली मातृभाषा आहे का?? 'त्वरक' 'उत्प्रेरक' 'संप्रेरक' ह्या वैज्ञानिक संकल्पना म्हणा किंवा सामाजिक शास्त्र विषयातील भौगोलिक ऐतिहासिक जारगन म्हणा ही छापील मराठी आपली मातृभाषा आहे का?? कुठल्या घरातली कुठली माता अशी दिव्य छापील मराठी बोलत असेल? ही प्रमाणित मराठी आहे मातृभाषा अहिराणी, कोकणी, वर्हाड़ी इत्यादी म्हणता येतील मग काय करावे बुआ?? माझी मातृभाषा वर्हाड़ी आहे मग उद्या मी पुस्तक मागतो ज्यात लिहिले असेल की बुआ 'लोकमान्य टीळकायनं अंग्रेजाले बेज्या झाबु देल्ला! इतला का त्याहीनं टिळक महाराजाले उचलून मंडाले ले पाठोले' ही आहे बुआ माझी मातृभाषा मुद्दा काय तर ही प्रमाणित मराठी मातृभाषा नाहीच अन त्यामुळे ती सुद्धा बहुसंख्य पाल्यांस इंग्रजी इतकीच जड़ जाते गणित शिकताना 'simultaneous equation' हे जर वाचायला जड़ जात असेल तर 'एकसमयावच्छेदक समीकरण' सुद्धा काही नीट पचत नाही कारण मुळात ती आपली मातृभाषा नाही!

बाकी चालू द्या

प्रतिसाद आधी इतरत्र प्रकाशित

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 08/06/2016 - 13:12
सोन्याबापू, असे प्रतिसाद टाकून तुम्ही फार काही साध्य करंत नाही आहात हे सांगू इच्छितो. आपल्याला धड एक बाजू घेता येत नसल्यास फाटे फोडत बसणं यात शहाणपण नव्हे. तुम्हा लोकांचा नक्की प्रॉब्लेम तुम्हालाही कळत नसावा. मातृभाषा अयोग्य असंही तुम्हाला म्हणवत नाही, इंग्रजी अयोग्य असंही म्हणवत नाही. मग मातृभाषातर हवी पण मग हे अमकं अमकं ही आपली मातृभाषा आहे का? किंवा आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्याच्या मुलाची मातृभाषा कुठली समजायची यासम मुद्दे काढत बसून आपली आणि पर्यायाने इतरांची दिशाभूल करत बसणं यातच तुम्हाला समाधान मिळतं बहुदा. किंवा आपण काय भारी मुद्दा टाकलाय आता दे उत्तर असं काहीतरी वाटून आनंद मिळत असावा. घ्या तुम्ही तो, माझं काही म्हणणं नाही. पण अशाच वृत्तीमुळे आज ही गत आहे इतकं नमूद करतो. चीनमधेही अनेक 'डायलेक्ट्स' आहेत. पण कँटोनीज ला त्यांनी प्रमाण मानलेलं आहे. वरील लिंक्स वाचल्या असाल तर हे तुम्हाला कळलं असेल. उपाय शोधण्याची मनोवृत्ती ठेवली तर उपाय मिळतात. अन्यथा 'बाकी चालू दे' असंच म्हणून नामानिराळं होता येतंच, कशाही बाबतीत.

In reply to by वेल्लाभट

पहिली गोष्ट "ऐड होमिनेम" अर्थात वैयक्तिक हल्ले करू नका , ही विनंती , धागा सार्वजनिक आहे , तुम्हाला विरोधी मते चालणार नसली तर तुम्ही तशी सूचना धाग्यातच टाकायला हवी होती हे नम्रपणे सांगू इच्छितो. दूसरे म्हणजे मराठी भाषा ही शालेय शिक्षणाचे माध्यम ह्या विषयावर आपण बोलतोय मला वाटते मी बरेचसे विषयाला अनुसरुन बोलतोय, तीसरे म्हणजे "तुम्हा लोकांचा" वगैरे मधे मला ओढु नका मी कोणा व्यक्तीचा स्टीरियोटाइप करत नाही अन माझा केलेला मी खपवूनही घेणार नाही. (ही विनंती आहे धमकी समजू नये स्पष्टीकरण इतक्यासाठी का तुम्ही वाकडाच विचार करत असल्याचे स्पष्ट दिसते आहे) "बाकी चालू द्या" बद्दल, ते म्हणणे संयुक्तिक कसे आहे हे तुम्ही दिलेल्या वैयक्तिक शेरेबाजीने परिपूर्ण प्रतिसादातून सहज कळते असो आता चालूच द्या!. :) ताजा कलम - समोरच्याला लागट बोलून मुद्दे सिद्ध होत नसतात त्याला तर्क लागतो अन तो हमरीतुमरी वर येऊन सापडत नसतो. बाकी तुम्ही असलं काहीतरी बोलले म्हणून मी आज एखाद चपाती कमी खाईन अशी तुमची धारणा असल्यास शुभेच्छा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 09/06/2016 - 12:52
चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात याला. तुमचा http://www.misalpav.com/comment/847258 हा प्रतिसाद बघा. आक्रस्ताळेपणा, थयथयाट तुम्ही सुरू केलात. सरसकटीकरण तुम्ही केलंत... ज्यांना हे झेपत नाही, संस्कार ज्यांना शाळेच्या बोडक्यावर मारायचेत इत्यादी इत्यादी काय काय. ठीक आहे? तुमच्या चिथावण्याने मलाही शष्प फरक पडणार नाही हे ही सांगतो. काय आता; जाऊ द्या.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

असंका 08/06/2016 - 15:11
मुद्दा काय तर ही प्रमाणित मराठी मातृभाषा नाहीच अन त्यामुळे ती सुद्धा बहुसंख्य पाल्यांस इंग्रजी इतकीच जड़ जाते.
जड जात असेल, तरीही इंग्रजीइतकी जड अजिबात जाणार नाही. व्याकरणाचे नियम आणि असंख्य शब्द एकच असतील बोलीतले आणि लेखीतले. इंग्रजीत मात्र व्याकरण पूर्ण वेगळं असेल आणि एकही शब्द ओळखीचा नसेल. त्यामुळे सारखेच जड जातील हे आपण म्हणत असला तरी ते अजिबात पट्ण्यासारखं नाही. शिक्षणाची भाषा ही बोलण्यातलीच भाषा असावी असं वाटण्यात काहीच गैर नसावं. तर मग आपण आता त्या दृष्टीने प्रयत्न करायचे, की जे तसे प्रयत्न करतायत त्यांनाच असं खच्ची करायचं? तुमची भावना आणि तुम्हाला अपेक्षित असलेले उपाय सुसंगत नाहीत. म्हणजे तुमची इच्छा आहे की शिक्षण बोलीतनं मिळावं. आणि त्यावर उपाय हा की शिक्षण इंग्रजीतनंच घ्यावं? पुढे आपण आपल्या मते सारखीच कठीण असलेले काही शब्द दिलेले आहेत. कुठली दिव्य माता असे शब्द घरात वापरत असेल असंही आपण विचारलंय. तर जोडीला, आपल्या भागातल्या साध्या साध्या माता आपल्या घरात या कल्पनांना (त्वरक, उत्प्रेरक, संप्रेरक इ.ना) आपल्या बोलीतले कुठले शब्द वापरतात तेही सांगायचंत ना? शिवाय यातनं आपण नक्की काय सांगू इच्छिता? एक तत्त्व म्हणून?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नमकिन 09/06/2016 - 09:11
दिलेल्या pulse linked in च्या लेखात तसेच UNESCO च्या बहुसंख्य संशोधनात मातृभाषा व इतर शिक्षण माध्यम भाषा याचा परिणाम यावरंच ऊहापोह करण्यात येतोय (मागील जवळपास ५० वर्ष चे वेचक संशोधन माझ्या नजरेत आलेले)• तर यावर जे बोली भाषिक समूह आहेत त्यांनी बोली भाषेला लिखित रूप देण्यासाठी जर कष्ट उपसले तरंच ती भाषा तगेल, जिथे मुळात script नाहीं त्यात शिक्षण (आजच्या जमान्यातले जे सर्वस्वी छापील व प्रसारित करने योग्य) कसे शक्य आहे? हे शिवधनुष्य उचलायला कोन्या युगप्रवर्तक बापू ची वाट पाहण्यापेक्षा अशी शाळा उघडलीत वा लिपी घडवलीत तर पुढच्या पिढीला सार्थ अभिमान व भविष्य राहील अन्यथा संस्कृत -प्राकृत वाद जुन्या काळापासून सर्व जाणतात व त्यातून साधलेली सामाजिक उतरंड आपण पाहतोच/अनुभवतोच आहोत. उपलब्ध पर्याय कुठवर चालू द्यायचं व किती चालवून घ्यायचं यावरंच तर संघर्ष व अंतिमत: अपेक्षित स्वातंत्र्य निश्चित होते. बाकी पोकळ!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सरकारी अभ्यासक्रमात शिकवली जाते ती मराठी 'प्रमाण मराठी मात्रूभाषा' नाहीख्हे ऐकून मौज वाटली. भारताची राज्यघटना, सरकार, सैन्य, पोलिस, झालंच सरकारी कार्यालये वगैरे गोष्टी तरी प्रमाण मानाव्यात किंवा कसे असा प्रश्न पडला आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

आप्पा आमचे लैच भारी ! फट म्हणता प्राण कंठाशी आणणाऱ्या अस्सल श्रीवर्धनी रोठ्यासारखे! त्यात आप्पा ह्यांची आमच्यावर खाशी खुन्नस अर्र मर्जी म्हणायचे होते आम्हाला, म्हणून बुआ आमचे आप्पा काहीही बोलताना मधे सैन्य आणतात(च) बघा कायम! नाहीतर बहुदा त्यांना तो तिरके बोलायचा आनंद मिळत नसावा (आवडी एकेकाच्या) तरीही प्रिय आप्पा दरवेळी "कशी शिपुरड्याची जिरावली" मोड़ असू दे तुमचा तुम्हाला लखलाभ तरीही मुद्दा मांडताना आपण काय बोलतोय ह्याचं ज़रा भान ठेवा, अन हो प्रमाण मराठी ही मातृभाषा नसते(च) ती वेगवेगळ्या भागांतील भाषा ह्यात समन्वय साधायला प्रमाणित केलेली असते, अर्थात ती प्रशासकीय सुविधेस उत्तम असतेच , फ़क्त म्हणून ती शिक्षणमाध्यम म्हणून उत्तम ठरेलच असे नाही , तुमचा मुद्द्यावर बोलायचा विचार असला तर पुढे बोलता येईल नसलीच इच्छा तर ओढ़ा अजुन एकदा सैन्यबिन्य मधे! तसंही लागट बोलायला काही जात नाही टाकायचं बोलून! हाकानाका!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही सांगता ते प्रमाण असा आग्रह दिसतो. जौंद्या. You cannot agree to disagree. बाकी मुद्दा सोडून केलेली वैयक्तिक टीका दखलपात्र नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

तुम्ही शिकवणार अग्री टु डिसग्री? And I thought तुम्ही सवंग विनोद करणे बंद कराल! असो! Lets agree to disagree here ;)

वेल्लाभट 08/06/2016 - 13:17
तूर्तास ही कालची बातमी वाचा. http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Marathi-pulls-down-aggregate-scores-of-many-SSC-students/articleshow/52626740.cms मजल इथवर गेलेली आहे. पुढे मराठी ऐच्छिक करतील, आपण तरीही फ्यूच्चर चा विचार करून जर्मन, फ्रेंच किंवा अजून काही निवडू, मग मराठी कुणी घेत नाही आजकाल म्हणून अभ्यासक्रमातून काढूनही टाकतील कदाचित, आपण तरीही नक्की प्रमाण मराठी ही आपली मातृभाषा का अशा गोष्टींमधे अडकलेले असू, किंवा कदाचित तोवर इंग्रजी इतकं अनिवार्य झालेलं असेल की मातृभाषा वगैरे संकल्पनाच गौण ठरतील... दहा वर्ष अजून... हे असंच चाललं तर लिहून देतो दहा वर्षात यासारखी परिस्थिती असेल नक्की. बाकी चालू दे!, नाही का?

In reply to by वेल्लाभट

बाकी चालूच द्या तुमचं आक्रस्ताळेपण कारण तो तुमचा चॉइस आहे . पोरे फ़क्त ५ तास शाळेत असतात उर्वरीत वेळ म्हणजे एकोणीस तास आपल्यासोबत असतात. मराठी ऐच्छिकच काय बंद केली तरी मला फरक पडत नाही. चांगली नोकरी मिळवायला माझ्या पोराला फ्रेंच अन जर्मन काय स्वाहिली शिकावी लागली तरी मी शिकवेल. राहता मायमराठीचा प्रश्न तर घरी असलेले १९ तास मी त्याला/तिला मराठी शिकवायला रोजचा एक तास घातला तरी पुरेसा होईल. ठराविक वयात हाती गोट्या सरकवले की भागते ठराविक वयात बोरकरांच्या कविता हाती दिल्या की मी माझ्या मातृभाषेबद्दल निश्चिन्त असेल. ज्यांना वैयक्तिक संस्कार करणे हा भाग सुद्धा शाळेच्या बोडक्यावर घालायचाय त्यांना कोपरा पासुन दंडवत . माझी भाषा माझ्या पोराला शिकवायला मी समर्थ आहे शाळेने त्याला मॉब सेन्स अन कागदं इतकं शिकवले तरी हरकत नाही. अस्मिता घरी शिकवायच्या असतात अन योगक्षेम संबंधी शिक्षण शाळेत शिकायचे असते हा आमचा फंडा सुस्पष्ट आहे ज्यांना हे झेपत नाही त्यांनी फुकट आक्रस्ताळेपणा करत लोकांवर शाळेवर शिक्षणव्यवस्थेवर ब्रह्मदेवावर ओबामावर वाटेल त्याच्यावर लांछन लावत फिरावे मला घेणे देणे नाही. पालक म्हणून माझ्या जबाबदारी मला कळतात नीट! मग? चालू दे का बाकी? ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 08/06/2016 - 14:15
मी म्हणणार नाही. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे तो माझा चॉईस आहे. तुम्हाला फरकच पडत नाही, हा तुमचा चॉईस(?) आहे. चांगली नोकरी हे तुमच्या लेखी शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट आहे, तुमचा चॉईस(?) भारी आहे. संस्कार शाळेच्या बोडक्यावर घालण्याच्या लोकांच्या कल्पना तुम्हाला अंतर्ज्ञानाने कळतात नाही का! हे पण भारी आहे. तसंही पाचच तास ना शाळेत जायचंय; त्यापेक्षा न जाऊनही चालेल, बघा विचार करून. तुम्ही समर्थ पालक आहातच तसंही. जाता जाता, बोरकरांच्या कविता हाती दिल्या की.... मी शिकवेल... मी माझ्या मातृभाषेबद्दल निश्चिन्त असेल... माझ्या जबाबदारी... हे शब्दप्रयोग बाकी अतिशय मजेशीर होते.

In reply to by वेल्लाभट

आनंदी गोपाळ 09/06/2016 - 21:39
व्हय का जी? तुम्हाला त्यांची "मातृभाषा" उर्फ वर्‍हाडी अजिबातच येत नाही, वेल्लाभट. तुम्हाला तुमची संस्कृतप्रचुर पुणेरी मराठीच जर समस्त मराठी लोकांची "मातृभाषा" म्हणून रेटायची आहे काय?

बाकी चालू द्या!

;)

In reply to by आनंदी गोपाळ

असंका 09/06/2016 - 22:04
मराठी माध्यम, इयत्ता पहिली,विषय मराठी पाठ पहिला- आला पाऊस आला पान २- "ढोंड, ढोंड पानी दे, साय माय पिकू दे" हे माझी लेक कोल्हापुरात शिकली. हे संस्कृत शब्द आहेत का? जी कुठली ही भाषा आहे ती तिची मातृभाषा आहे का? एकदा फाटे फोडायला लागलं की हे असं होतं. वस्तुस्थिती न बघता फक्त समोरच्याचा मुद्दा खोडून काढला असं दाखवणं एवढंच शिल्लक रहातं. खरंतर पुण्याचे लोकही लिहितानाची भाषा आणि बोलतानाची भाषा यात अंतर ठेवतच असतील. पण एकदा पुणेरी म्हणून हिणवलं की मुद्दा सर झाल्याचं दाखवणं एकदम सोपं जातं.

In reply to by असंका

आनंदी गोपाळ 09/06/2016 - 22:55
त्या प्रतिसादातला मुद्दा वेल्लाभट यांनी बापूंच्या बोलीला हिणवून दाखवण्याचा आहे. "आजकालच्या" मराठी मेडियममधे काय शिकवतात तो नाही. बाकी चालू द्या ;)

In reply to by आनंदी गोपाळ

असंका 11/06/2016 - 08:41
अच्छा? शिक्षणाच्या धाग्यावर 'काय शिकवलं जातं' हा मुद्दा नसून 'कोण काय म्हणतं' हा मुद्दा आहे तर! बरं झालं आपला प्राधान्यक्रम इतका उघड सांगितलात ते. आधी माझ्या लक्षातच आलं नव्हतं की फाटे फोडायचे हाच उद्देश आहे. मला वाटलेलं की गैरसमजातून विषय वाढतोय तेव्हा त्याच्यामागची सत्य परीस्थिती सांगितली की गैरसमज संपून विषय पुढे सरकेल. पण ते नकोच असेल तर ... चालेल तितकं चालू द्या...अन काय!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वेल्लाभट 08/06/2016 - 14:28
आणिक एक; ते २४ वजा ५ १९ तास जे तुम्ही घरी शिकवेल, ते इंग्लिशमधे शिकवेल की मराठीमधे शिकवेल? जर इंग्लिशमधे शिकवेल तर त्याला मराठी कसे येएल? आणि मराठीतून शिकवेल तर.... तर मग मराठी शाळेत काय वेगळं असेल?

In reply to by वेल्लाभट

नमकिन 09/06/2016 - 09:45
मराठी शाळांना प्रतिसाद नाहीं असे चित्र उभे करुन सरकारी यंत्रणा व व्यापारी वृत्तीचे संचालक /विश्वस्त मंडळाचा अनुदान विलंब, कमी पगार व शिक्षक/कर्मचारी वर्गाचा इतर शिक्षणेतर कामात राबवून घेणे असे विघ्नसंतोषी प्रकार चालू असतात तिथे मराठी भाषा ऐच्छिक करुन पुढे त्यामुळेच गुण कमी होतात असा प्रचार करुन मुलांची इच्छा कमी करायची व पुढे प्रतिसादाअभावी शिक्षकांना अतिरिक्त ठरवून "मराठी भाषा" विषय संपवायचे उघड कारस्थान आहे. शेरा- पालकांनाच नकोय मराठी शाळा, मराठी विषय व मराठी भाषा हे सोदाहरण नियमात बसवणे.

वेगळी मतं असणार्‍यांनी नाही लिहिलं तरी चालेल हे वाचूनही आणि तशीही सध्या मिपावर वामा असूनही काही मुद्दे लिहायचा मोह आवरला नाही. तेही माझी मतं काय हे लिहित नाही, महत्वाचं हे की सतत जर्मनी, जपान वगैरेचे जे दाखले दिले जातात, त्याबद्दल. मुळात जर्मनी या देशात एकच मुख्य भाषा आहे. बोलीभाषा आहेत, पण त्या वेगळ्या. भारतात तसे नाही. त्यामुळे इतकी सरळसरळ तुलना होऊ शकत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे शिक्षणाची पद्धत. कितव्या वर्षीपासून शिक्षण चालू होते, त्याची एकंदर रचना कशी आहे, शाळेत कशा पद्धतीने शिकवले जाते, त्यात पाठांतरावर भर दिला जातो की समजून घेण्यावर, परीक्षा पद्धती कशा आहेत, शाळेतून बाहेर पडल्यावर कुठे आणि काय संधी उपलब्ध आहेत, उच्च शिक्षणाच्या संधी किती आहेत, शिवाय मग तिथे आरक्षणादि मुद्दे वगैरे अनेक बाबतीत भारतातले शिक्षण आणि जर्मनीतले यात फरक आहे. बरं भारतातलं शिक्षण हे पुण्या मुंबईपुरतं गृहित धरून चालणार नाही. कित्येक ठिकाणी अनावस्था आहे सगळ्याची. अगदी निषाणी डावा अंगठा सारखी परिस्थिती आहे. मातृभाषेतून शिकण्याचे फायदे असतीलही किंवा तोटेही असतील, याबाबतीत माझं एकच असं काही मत नाही, पण सतत इतर देशांशी तुलना करून ते कसे बरोबर असं होत नाही. अमुक एका देशात जर मातृभाषेत शिक्षण होते तर आम्ही का नको, हा युक्तीवाद त्यामुळे पटत नाही. पूर्णपणे इकडचे सगळेच बरोबर असेही नाही, दोन्हीकडे चांगले वाईट मुद्दे आहेत. मातृभाषेतील शिक्षण असावे की नाही याबद्दलचा कुठलाही प्रतिवाद करायचा नाही. दोन्ही बाजूची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. जर्मनीत जन्म घेऊन, जर्मन माध्यमाच्या शाळेत शिकूनही उत्तम मराठी आणि इंग्रजी बोलणारी मुले आहेत तशीच मराठी आणि इंग्रजीही न येणारी देखील आहेत. आणि मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. कदाचित इंग्रजीशी थोडी जरी मैत्री करायची जरा जास्त जर्मन लोकांची तयारी असती, तर इथल्या बर्‍याच कंपन्या आज वेगळ्या उंचीवर राहिल्या असत्या आणि पर्यायाने देशही अजून जास्त पुढे गेला असता असं वाटण्याची वेळ बरेचदा आली आहे. याबाबतीत मागेही एका धाग्यावर लिहिले होते, पण तरीही हे फक्त माझे आणि काही ओळखीच्यांचे अनुभव म्हणून तसंच आहे असे म्हणणार नाही. असो, तो वेगळा मुद्दा आहे.

In reply to by मधुरा देशपांडे

वेल्लाभट 08/06/2016 - 14:25
कित्येक ठिकाणी अनावस्था आहे सगळ्याची
याला पुरावा आहे का? नसेल तर ग्रामीण भागात बदलत चाललेल्या शिक्षण पद्धतीची चार उदाहरणं मी तुम्हाला देतो. बघून आलोय मी.
अमुक एका देशात जर मातृभाषेत शिक्षण होते तर आम्ही का नको, हा युक्तीवाद त्यामुळे पटत नाही
असा युक्तिवाद नाहीच आहे तो. अनेकांनी त्यावर अभ्यास करून काढलेले निष्कर्ष आहेत जे सांगतात की हे व्हायला हवं, हे योग्य आहे. आणि काही वर्षापूर्वीपर्यंत होतंच होतं ना मातृभाषेतून शिक्षण? तसंच शिकून आपल्यातले अनेक जण आज इंग्रजी बोलतात ना? जर्मनीत काय आहे हे तुम्हीच सांगू शकता जास्त योग्य प्रकारे पण जर्मनीत आहे 'म्हणून' आपल्याइथे असं मुळीच म्हणणं नाही, ना इंग्लिशला विरोध आहे. ज्याला त्याला हेच समजावून दमतोय की इंग्लिश पहिलीपासून शिकवतात! आणि असं असताना एका कणाचीही अडचण येत नाही पुढे जाऊन. पण अख्खं माध्यमच इंग्लिश केलं ना की विचार करण्याची जी भाषा आहे तिचं खोबरं होतं. असो. उपयोग नाहीच आहे हे समजवण्याचा असं दिसतंय. टाईम विल टेल.

In reply to by वेल्लाभट

तुम्ही ज्या बदल घडत असलेल्या उदाहरणांबद्दल लिहिलं होतं वेगळ्या धाग्यात, त्या बदलांचं स्वागतही आहे आणि कौतुकही. पण ग्रामीण भागातलीच शिक्षणाची अनावस्था याची देही याची डोळा पाहिली आहे, आणि आता मी त्यातून बाहेर पडले असले तरीही माझी आई शिक्षणक्षेत्रात असल्याने अजूनही संबंध येतो. तुम्ही जो भाषेचा मुद्दा सांगताय त्याबाबतीत मी पूर्ण असा विरोध करत नाही, पण फक्त तेच बरोबर असे नाही. भाषेशिवाय इतर अनेक मुद्दे येतात. माझी आई ज्या ११-१२वीतल्या मुलींना शिकवते, त्यांना इंग्रजीतून शिक्षणाची सक्ती करा असे अजिबात नाही. त्या इंग्रजी सुटलं दहावीत की किती खुश होतात, (गणित सुटलं की सुद्धा) आणि पुढे मराठीतून कशी प्रगती करू शकतात हे माहिती आहे. पण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्यामुळे जर इतर अनेक मुद्दे बघता एखाद्याला इंग्रजी बरे पडेल असे वाटले तर तेही चुकीचे नाही. मग अगदी
अनेकांनी त्यावर अभ्यास करून काढलेले निष्कर्ष आहेत जे सांगतात की हे व्हायला हवं, हे योग्य आहे.
असे कुणी मला सांगितले तरीही मी स्वत: दोन्ही बाबतीत टोकाची मते ठेवू शकत नाही. आणि जर्मनीचा मुद्दा यासाठी कारण वर लेखातही मारियाताई विर्थ यांचे उदा आहे. आणि इतरही अनेक वेळा याबाबतीत जपान, जर्मनी वगैरे उदा. नेहमी बघितली आहेत. ती खरी असतीलही, पण भाषा हाच एकमेव मुद्दा त्यात येत नाही असे माझे अनुभव. लेखनसीमा.

In reply to by मधुरा देशपांडे

अभिनव 08/06/2016 - 17:18
मुळात जर्मनी या देशात एकच मुख्य भाषा आहे. बोलीभाषा आहेत, पण त्या वेगळ्या. भारतात तसे नाही. त्यामुळे इतकी सरळसरळ तुलना होऊ शकत नाही. >> का नाही? प्रत्येक राज्याला प्रचंड अधिकार आहेत. समुद्रकिनारा असलेल्या सगळ्यांना त्यांचे त्यांचे पोर्ट्स आहेत. इतर राज्यांना पण ते वापरता येऊ शकतात. अधिकृत नसला तरी भारत शेवटी अनेक देशांचाच देश आहे. तसे फक्त घटनेत लिहिलेले नाही. राहिले असेल वेळेअभावी. ४७ लाच नाहीका ५०० संस्थाने होती? दुसरा मुद्दा म्हणजे शिक्षणाची पद्धत. कितव्या वर्षीपासून शिक्षण चालू होते, त्याची एकंदर रचना कशी आहे, शाळेत कशा पद्धतीने शिकवले जाते, त्यात पाठांतरावर भर दिला जातो की समजून घेण्यावर, परीक्षा पद्धती कशा आहेत, शाळेतून बाहेर पडल्यावर कुठे आणि काय संधी उपलब्ध आहेत, उच्च शिक्षणाच्या संधी किती आहेत, शिवाय मग तिथे आरक्षणादि मुद्दे वगैरे अनेक बाबतीत भारतातले शिक्षण आणि जर्मनीतले यात फरक आहे >> मग हा फरक मिटवण्यासाठी कमी करण्यासाठी भारतीय नागरीक / अधिकारी / नेता या नात्याने मी तुम्ही आपण आपल्या पुर्वजांनी काय काय केले? त्याची यादी मिळेल का? कदाचित इंग्रजीशी थोडी जरी मैत्री करायची जरा जास्त जर्मन लोकांची तयारी असती, तर इथल्या बर्‍याच कंपन्या आज वेगळ्या उंचीवर राहिल्या असत्या आणि पर्यायाने देशही अजून जास्त पुढे गेला असता असं वाटण्याची वेळ बरेचदा आली आहे. >> या ज्या जर्मन कंपन्या तुम्हाला माहिती आहेत, त्याच क्षेत्रातल्या किती अशा भारतीय कंपन्या तुम्ही सांगु शकता ज्यांचे मालक / सीईओ/ अधिकारी वर्ग भारतातील इंग्रजी माध्यमातुन शिकला, इंग्रजीशी प्रचंड मैत्री केली म्हणून आज त्या जर्मन कंपन्यांचा बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या आहेत? भारतात तर इंग्रजी माध्यमाच उदोउदो कधीपासुन चालू आहे ना? मग आत्तापर्यंत तुमच्य लॉजीकने अशा डझनभर तरी भारतीय कंपन्या पाहीजे होत्या ना ज्या निव्वळ इंग्रजीशी मैत्री या मुद्द्यामुळे त्यांच्या जर्मन कांउटरपार्टपेक्षा मोठ्या / उजव्या आहेत? नोकरी मिळवणे या व्यतिरिक्त काय फायदा करुन घेतला भारतीयांनी इंग्रजीचा? मागच्या पिढीपिर्यंततर यातले बहुतांश त्यांच्या त्यांच्य मातृभाषेतुनच शिकलेले होते. थोडक्यात निव्वळ इंग्रजीमुळे असे जर्मनांचे किती व काय नुकसान झाले जे भारतीयांचे झाले नाही? नोक-य मिळवणे हे नका सांगू. ते तर जर्मन्स पण मिळवतात.

मारवा 09/06/2016 - 10:59
वरील चर्चेत सोन्याबापु यांनी मांडलेला बोली भाषे संदर्भातील मुद्दा मराठीतच शिक्षण हवे ची तार्कीक परीणीती आहे. अत्यंत वेगळा व जबरदस्त मुद्दा तर्कयुक्त रीतीने मांडलेला आहे जो विचारणीय आहे. असंका यांनी इंग्रजीपेक्षा मराठी च बोलीभाषेशी अंतर जे दाखवल आहे तो मुद्दाही जबरदस्त तर्कयुक्त आहे. चर्चेतील प्रतिसाद प्रगल्भ आहेत मजा येत आहे वाचायला धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते.

In reply to by मारवा

वेल्लाभट 09/06/2016 - 12:48
धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते
बर दिला.

In reply to by मारवा

असंका 09/06/2016 - 13:16
अवांतरः अरेच्या! धन्यवाद !! खरं तर तुमचाच एक प्रतिसाद माझ्या वरच्या प्रतिसादाच्या मुळाशी होता. यनावाला की राजेश घासकडवी यांच्या धाग्यावरचा. "ब्रिटीश राज नक्की कधी सुरु झालं?...तो पहिला ब्रिटिश नागरीक महत्वाचा!" असं काहीतरी होतं.
धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते.
हे आयडियल झालं. लेखक विषयाशी अत्यंत समरस होउन लिहित असल्याने त्यांची प्रतिक्रिया तशी साहजिक वाटली. मुळ विषयाबद्दल आपण काहीच मत दिलेलं नाही याचं मात्र आश्चर्य वाटलं.

माझेही शिक्षण मराठी भाषेत झाले. पण त्यामुळेच मी चांगले इंग्रजीहि बोलु शकतो. परंतु माझ्या मुलीला मी इंग्रजी माध्यमात घातले आहे. पण तिला मराठीची आवड निर्माण करायचा माझा प्रयत्न असतो. आणि माझे सुदैव म्हणजे आवड हळूहळू निर्माण होत आहे. सध्या ती म्रुत्युंजय हे पुस्तक वाचत आहे ( हळुहळु). त्यातील काहि शब्द कळाले नाहित तर मी समजावुन सांगतो. मराठी हा विषय सर्व शाळात १ ली पासुन (सि बि एस ई, आय सी एस ई, इंटर्नेशनल स्कूल) सक्तीचा करावा या मताचा आहे. इंग्रजीही १ली पासुन शिकवावे.

In reply to by शान्तिप्रिय

असंका 09/06/2016 - 11:34
आपणास लेखाचा मुद्दा कळलेला आहे का? मुलांना मराठी येणं न येणं हा मुद्दा नाहीये. मुलांना सर्वोत्तम माध्यमातनं शिक्षण मिळावं - जे मातृभाषा हेच असू शकते, हा मुद्दा आहे. मराठी ही इथे बहुतेकांची मातृभाषा आहे त्यामुळे सरळ "मराठी" माध्यम म्हणून लोक पुढे जात आहेत.

In reply to by असंका

नमकिन 10/06/2016 - 08:56
मुलांना इंग्रजी वा इतर भाषा येणं न येणं हा ही मुद्दा नाहीं तर मातृभाषा (भले ती कुठलिही असो) शिक्षण माध्यम असावी हाच आहे. मुद्दा धरुन ठेवायला माझा हातभार!

In reply to by शान्तिप्रिय

श्रीगुरुजी 10/06/2016 - 15:30
मराठी हा विषय सर्व शाळात १ ली पासुन (सि बि एस ई, आय सी एस ई, इंटर्नेशनल स्कूल) सक्तीचा करावा या मताचा आहे. इंग्रजीही १ली पासुन शिकवावे.
+१ खरं तर महाराष्ट्राने अंमलात आणलेलं त्रिभाषा सूत्र ही मुख्य समस्या आहे. महाराष्ट्रात लहानपणापासून हिंदी सक्तीची असल्याने इतरभाषिक महाराष्ट्रात हिंदीतच बोलतात कारण महाराष्ट्रीयन हिंदी बोलू शकतात. महाराष्ट्र हे असं राज्य आहे की जिथे त्या राज्याची भाषा शिकणे सक्तीचे नाही व इतरभाषिक स्थानिक भाषा अजिबात न शिकता आपले संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात आरामात घालवू शकतात (अमिताभ बच्चन, गुलजार, सलीम , जावेद, शाहरूख, दिलीपकुमार इ. मंडळींनी आपले सर्व आयुष्य महाराष्ट्रात घालविले पण आजतगायत मराठी शिकले नाहीत.). महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी व इंग्लिश भाषा सक्तीची असावी व हिंदी ऑप्शनल असावी.

In reply to by श्रीगुरुजी

महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी व इंग्लिश भाषा सक्तीची असावी व हिंदी ऑप्शनल असावी. तसंही आमची पिढी हिंदी सिनेमे पाहूनच हिंदी भाषा शिकली आहे. हिंदी ८ नंतर संस्कृताला ऑप्शन म्हणून असली तरी चालेल. मराठी आणि इंग्रजी कंपल्सरी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चंपाबाई 27/06/2016 - 23:13
हिंदी ऑप्शनल आहे... हिंदी , हिं + सं , पूर्ण संस्कृत असे पर्याय असतात. बायदिवे , लोकाना संस्कृत ही परकी वाटत नाही , पण हिंदी परकी वाटते हे पाहून नेत्रे जलं आगम्यति !

In reply to by श्रीगुरुजी

पुंबा 01/07/2016 - 13:00
+१ मु़ळात ज्या प्रांतात आपण राहतो तिथली भाषा उत्तम बोलता यावी ही आनंदाची गोष्ट आहे असंच वाटत नाही या लोकांना. दुसरी भाषा चांगली बोलता यावी अशी आस असणं हे किती आनंददायी असु शकतं हे परप्रांतियांना कळत नाही हे फार दुर्दैवी आहे.

उत्तम विषय व चांगली चर्चा. मातृभाषेतून शिक्षण केव्हाही चांगले पण तीच मातृभाषा कायम वापर्ली जाते का शि़क्षणात? एम.ए. मराठी झालेला तरूण महाराष्ट्राबाहेर्,देशाबाहेर करीयर करू शकेल का?वर चीन्,जर्मनीची उदाहरणे दिली आहेत पण त्या देशात बालवाडीपासुन ते पी.एच.डी.पर्यंत मातृभाषाच वापरली जाते ना ?इंग्रजीकडे दुर्लक्ष करणारे तरूण मुलाखतीत 'त त प प' करतात व हुशारी असूनही नोकरी मिळू शकत नाही. https://en.wikipedia.org/wiki/Foreign_Secretary_(India) येथे बहुतांशी लोक इंग्रजी माध्यमात शिकलेले कसे? त्यातही बहुतांशी एम.ए.इंग्रजी! मातृभाषेत शि़क्षण घेऊन परिस्थिती बदलेल का ? असा ह्यांचा प्रश्न.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वेल्लाभट 10/06/2016 - 10:28
मातृभाषेतून शिक्षण केव्हाही चांगले पण तीच मातृभाषा कायम वापर्ली जाते का शि़क्षणात? हा प्रश्न आहे, आरोप आहे, तक्रार आहे की पळवाट आहे? एम.ए. मराठी झालेला तरूण महाराष्ट्राबाहेर्,देशाबाहेर करीयर करू शकेल का?वर चीन्,जर्मनीची उदाहरणे दिली आहेत पण त्या देशात बालवाडीपासुन ते पी.एच.डी.पर्यंत मातृभाषाच वापरली जाते ना ?इंग्रजीकडे दुर्लक्ष करणारे तरूण मुलाखतीत 'त त प प' करतात व हुशारी असूनही नोकरी मिळू शकत नाही. नक्कीच करू शकेल कारण त्याचा विचार भक्कम तयार झालेला असेल. तो कुठलीही भाषा सहज शिकू शकेल, इतरांपेक्षा लवकर. याचीही उदाहरणं असंख्य आहेत. ते त त प प वाले इंग्लिशवर मेहनत घेत नसावेत पुरेशी. इंग्लिश यायलाच हवं, आधीपासून म्हणतोय, आणि तेही उत्तम यायला हवं. स्वतःची स्तुती नाही पण अमेरिकेतल्या परिक्षेसाठी प्रश्न सेट करताना, किंवा ऑफिसात लोक (इंग्लिशमधूनच शिकलेले) जेंव्हा मला मेल ड्राफ्ट करून दे सांगत येतात तेंव्हा ते करताना, कंपनीच्या अ‍ॅन्युल पब्लिकेशन मधे टॉपिक्स लिहिताना, इंग्लिश पुस्तकाच्या मॅनुस्क्रिप्टचं प्रूफरिडिंग करताना... मला काडीचीही अडचण जाणवली नाही. इंग्रजीची आवड लहानपणापासून लावली गेली, आणि प्रोत्साहन दिलं गेलं. पण विचार मराठीतूनच करतो आणि त्याचा अभिमान आहे. https://en.wikipedia.org/wiki/Foreign_Secretary_(India) येथे बहुतांशी लोक इंग्रजी माध्यमात शिकलेले कसे? त्यातही बहुतांशी एम.ए.इंग्रजी! मातृभाषेत शि़क्षण घेऊन परिस्थिती बदलेल का ? असा ह्यांचा प्रश्न. पास. ते ह्यांनाच विचारा तुमच्या.

In reply to by वेल्लाभट

इंग्रजीची आवड लहानपणापासून लावली गेली, आणि प्रोत्साहन दिलं गेलं हे अतिशय महत्वाचे. प्रत्येक घरात ते कसे होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
ते त त प प वाले इंग्लिशवर मेहनत घेत नसावेत पुरेशी
म्हणजे अगदी सुरूवातीपासूनच तशी मेहनत घ्यायला हवी.पण त्याच वेळेत इंग्रजी माध्यमाचा एखादा मुलगा तासभर फूट्बॉल खेळेल व घरी आई वडिलांबरोबर बसून इंडिया-टुडे वाचण्याचा प्रयत्न करणार्या मुलाला नैराश्य आणेल.असो. मी म्हणते, मुलास इंग्रजी माध्यमात घालून मराठीवर घर मेहनत घ्यायला काय अडचण आहे?अमेरिकेत राहणारे भारतिय वंशाचे लोक असेच प्रयत्न करतात ना?त्यांच्या मुलांना विचार करताना काही अडचण येते का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वेल्लाभट 10/06/2016 - 12:52
मुलास इंग्रजी माध्यमात घालून मराठीवर घर मेहनत घ्यायला काय अडचण आहे
अरे यार! मी म्हणतो हा उलटा अट्टाहास का? आपलं सोडून दुसर्‍याचं नेसायची धडपड का?
त्याच वेळेत इंग्रजी माध्यमाचा एखादा मुलगा तासभर फूट्बॉल खेळेल व घरी आई वडिलांबरोबर बसून इंडिया-टुडे वाचण्याचा प्रयत्न करणार्या मुलाला नैराश्य आणेल.असो.
हो आणि त्याचप्रकारे मराठी माध्यमाचा मुलगा उद्या मराठी साहित्य, दर्जेदार कलाकृतीही तितक्याच आनंदाने बघेल आणि इंग्रजी माध्यमाचा मुलगा 'त्यात खूप हाय फाय मराठी असतं' म्हणून त्याला मुकेल. जवळचे मित्र आहेत हे वाक्य म्हणणारे. कीव येते.
अमेरिकेत राहणारे भारतिय वंशाचे लोक असेच प्रयत्न करतात ना?त्यांच्या मुलांना विचार करताना काही अडचण येते का?
ते अमेरिकेत राहतात, तो प्रश्नच वेगळा आहे. इथल्यांबद्दल बोला. आणि विचार करताना अडचण येतेच्च.

In reply to by वेल्लाभट

नमकिन 10/06/2016 - 21:18
असेल ते इटवा अन् नसेल ते पाठवा हा प्रकार आहे शाळेत वेगळी भाषा अन् घरी वेगळी शिकवणी, मूल बिचारे सगळीकडे शिकण्यातंच. इक पल तो जीने दो!

In reply to by वेल्लाभट

वेल्ला तुझाशी अनेक वेळा सहमत आहे. मराठी वाचकच दर्जेदार न राहील्यामुळे उरले सुरलेले लेखकू भाव खाऊन जातात. मराठी मधे उत्कृष्ठ लेखन करणारे आता फारसे शिल्लक नाहीत. सुदैवाने जे आहेत ते जुन्या पिढीतलेच आहेत. मराठी माणूस इंग्रजी चांगला शिकला अभ्यास करून, सराव करून तर शिक्षणाचे माध्यम मराठी असल्याने काही फार बिघडणार नाही.

संदीप डांगे 11/06/2016 - 15:15
नेहमीचाच विषय आणि सर्वांचे नेहमीचेच गैरसमज. ह्यावर मागे बराच वादंग होऊनही 'मातृभाषेतून शिक्षण' ह्याचा अजूनही भलताच अर्थ लावत काही लोक गोंधळ घालत आहेत हे बघून आश्चर्य वाटले. १. युनेस्कोच्या मते प्राथमिक शाळा म्हणजे अगदी बालवाडी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण. २. हे शिक्षण मुलांना अनोळखी भाषेतून देणे चुकीचे. कारण ह्याचे विषय हे अगदी जवळचे, आजूबाजूचे, परिसरातले असतात. मुलांना त्यांच्या नेहमीच्या (मातृभाषा हा शब्द शब्दशः घ्यायची गरज नाही) भाषेतून माहिती लवकर समजू शकते. अनोळखी भाषेमधे आधी भाषेवर मेहनत घ्यावी लागते, नंतर माहितीवर दुसरी. ३. इंग्रजीतून उच्च शिक्षण ह्याबद्दल दुमत असायचे कारण नाही. जागतिक स्तरावर राहण्यासाठी बारावीनंतरचे काही शाखांचे शिक्षण इंग्रजीतून असले तरी हरकत नसावी. काथ्याकुट करणारी मंडळी 'उच्चशिक्षण मातृभाषेतून उपयोगाचे नाही' ह्याच मुद्द्यावर विनाकारण अडून बसलेले असतात हे नेहमीच बघितले आहे. 'मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण' व 'उच्चशिक्षणाची भाषा' हे दोन वेगवेगळे मुद्दे व विषय आहेत हे कृपया आतातरी ध्यानात घ्या.

In reply to by संदीप डांगे

नमकिन 11/06/2016 - 16:19
कुणाच्यातरी आयुष्यातला व आयुष्याची दिशा ठरवणारा प्रश्न. जालावर मनोहर राईलकरांचे अनेक लेख मराठीत ( "अमृतमंथन" अनुदिनीवर ) फार पूर्वी पासून हीच भूमिका आग्रहाने मांडत आहेत. बाल संगोपन विषयावर विविध पुस्तकातही हेच म्हटलंय की मातृभाषा शिक्षण माध्यम उत्तम. बहुधा व्यवहार भावनेवर मात करतोय हेच खरं

In reply to by संदीप डांगे

काथ्याकुट करणारी मंडळी 'उच्चशिक्षण मातृभाषेतून उपयोगाचे नाही' ह्याच मुद्द्यावर विनाकारण अडून बसलेले असतात हे नेहमीच बघितले आहे. हज्जारदा सहमत. आताच आमच्या ओळखीती एका मध्यप्रदेशस्थ मुलीने एम एस सी कॉम्य्पुटर सायन्स केले. तिची क्रमीक पुस्तके हिंदीतून होती. जिथे तांत्रिक शब्द येई तेव्हढा फक्त ईंग्रजीत होता. जसे "Menu में जाकर, आप सारे System Options देख सकते है". "Java एक Object Oriented programming languag है". ती आता तिच्या कंपनीत इतरांबरोबर राहून इंग्रजी पण चांगली बोलते. मागे कोणत्या तरी चर्चेत बंगालात १८७० साली मेडीकल चे शिक्षण देखील बंगाली भाषेत देत असत हे वाचले आहे. आणि त्यात इंग्रजी आणि बंगाली २न्ही माध्यमातून मेडीकल शिक्षण घेणार्‍यांची संख्या सारखी होती उलट बंगाली भाषेत शिक्षण घेणारे अंबळ जास्त होते हे ही वाचल्याचे स्मरते.

In reply to by टवाळ कार्टा

सुचिकांत 13/06/2016 - 16:58
सेमी इंग्लिशचे वर्ग चुकीच्या पद्धतीने भरवले जातात. त्याचे २ निकष पूर्ण व्हावे लागतात. १. इंग्रजी माध्यमात शिकून किमान डीएड झालेला शिक्षक त्या शाळेत हवा २. पुस्तके सेमीची असावीत. सध्या सेमीची पुस्तके बाजारात नाहीत. ती इंग्रजी माध्यमाची पुस्तके आहेत. सेमीची पुस्तके आर्धी मराठी आणि आर्धी इंग्रजी असावीत..पण हे दोन्ही निकष शासनातर्फे पूर्ण केले जात नाहीत. मग सेमी अवघड जाते अशी पण अगदी हुशार समजल्या जाणाऱ्या मुलांकडून ओरड ऐकायला मिळते. त्यापेक्षा युनेस्कोच्या संशोधनाप्रमाणे जितके दूरपर्यंत शिकता येईल तितके मातृभाषेतूनच शिका.

ऋषिकेश 13/06/2016 - 16:18
छान लेख आहे. आम्ही आधीच मुलीला मराठी माध्यमांत घातले आहे. पण इतर कुंपणावरल्या लोकांसाठी उपयुक्त ठरावा.

सुचिकांत 13/06/2016 - 16:50
@वेल्लाभट - लेख अभ्यासपूर्णच आहे. आम्ही याच विषयावर काम करत आहोत. असे सर्व संदर्भ एकत्रित करून आम्ही एक पीपीटी, सद्य मराठी शाळांची स्थिती, युनेस्कोचा मराठीतून अहवाल अशा अनेक गोष्टी एकाच इमेल मध्ये देत आहोत. एकदा डोळ्याखालून घालायचे असल्यास, Majhishala.Majhibhasha@gmail.com ला मेल करा. नाहीतर तुमचा मेल आयडी द्या. इतरांना पण हीच विनंती.

माझा मुलगा एकाच भाषेतुन काही शिकत नाही हे माझ्या लक्षात आलंय. सध्या तरी त्याला शाळाच नसल्याने आम्ही मनाला येईल ते प्रयोग करु शकतो. तो आमच्याशी बोलतो.. इथे अमेरिकेत आता त्याला सतत इंग्रजीत बोलणारे लोक भेटत आहेत, त्याच्याशी बोलत आहेत. आम्ही मध्ये पडत नाही, तो त्याचा प्रयत्न करुन बोलतो. हिंदी लोकांशी हिंदीत. मराठी लोकांशी मराठीत. प्रत्येक वेळेस त्या त्या भाषेतले शब्द बरोबर वापर्तो. ह्याचा अर्थ मुलं डोक्यात बरोबर ठेवत असतात. ज्ञान महत्वाचं ना. भाषा दुय्यम वाटते मला तरी. पण माझी मतं बदलत असतात. एक वर्ष इंटरनॅशनल शाळेत घालवुन लक्षात आलंय की कल्पना कितीही भारी असली तरी ती राबवणं जास्त महत्वाचं असतं. अत्यंत दर्जा शिक्षणपद्धत असुनही काही फायदा नसतो जर शिक्षक उत्तम नसतील. शिक्षक चांगले असतील तर भाषा दुय्यम असते. हे सध्याचं मत आहे. एक वर्षानी पाहु. आल्यावर मराठी एस.एस.सी मध्ये घालायचा विचार आहे.

In reply to by पिलीयन रायडर

सुचिकांत 14/06/2016 - 10:42
मी तुमची याअगोदरचीपण मते वाचली आहेत. तुम्ही मराठी एसएससीचा विचार करताय ही गोष्ट अभिनंदनीय आहे. तुमची टोकाची विचारसरणी नाही.. तुम्हाला मराठी माध्यमाचे फायदे पाठवायची इच्छा आहे. यावर जाणून घ्यायचे असल्यास मेल करा आणि अभिप्राय द्या - Majhishala.Majhibhasha@gmail.com

Nitin Palkar 25/06/2016 - 21:31
माझ्या मुलाचा जन्म ऑक्टोबर १९८५ मधला.तो मराठी माध्यमातून शिकला. तो पाचवीत असताना त्याच्या शाळेतील एका शिक्षक पालक सभेत 'गणित व शास्त्र हे विषय मुलांना इंग्रजीतून शिकवावेत का' या विषयावर चर्चा होती. बहुसंख्य पालकांचे मत सदर विषय इंग्रजी भाषेतून शिकवावे असे होते. काही जणांनी असे प्रतिपादन केले की, गणित व शास्त्र विषय आतापासून इंग्रजीतून शिकवल्याने मुलांना उच्च माध्यमिक व पुढील शिक्षणात त्याचा फायदा होईल कारण उच्च शिक्षण इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. माझे स्वतःचे मत मात्र याच्या विरुद्ध होते. मी माझ्या मुलाला दहावी पर्यंत संपूर्ण मराठी तुकडीत ठेवले. २००० साली तो एस.एस.सी. व २००२मध्ये एच.एस.सी. झाला. त्याला अनुक्रमे ८४% व ८६% गुण मिळाले. त्यानंतर त्याने भौतिक शास्त्रात पदवी व पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी. फिजिक्स) मिळवली. या सर्व शिक्षणात त्याला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठीतून (मातृभाषेतून) घेतल्याने कोणतीही अडचण आली नाही. आणखी एक माहिती येथे देणे अनाठायी ठरणार नाही असे वाटते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करताना, काही काळ त्याने ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतील उच्च पदाधिकाऱ्यांना (एक्झीक्युटिव्ह्जना) इंग्रजीचे शिक्षण देण्याचे कामही केले. मुलांच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे मध्यम मातृभाषाच असावी असे माझे ठाम मत आहे.

माझे मत थोडे वेगळे आहे ,मुळात इंग्रजी भाषा ही आपल्यापेक्षा प्रगत मेंदू असलेल्या युरोपियन अर्थात ब्रिटीशांची भाषा आहे .एखादा भारतीय विद्यार्थी जर कमी IQ चा असेल तर त्याला पहील्या यत्तेपासुन जरी इंग्रजि माध्यमात ठेवले तरी त्याला इंग्रजीचे पुर्ण ज्ञान घेता येणार नाही कारण मुळातच ही भाषा शिकायला अक्कल लागते.जर एखादा भारतीय विद्यार्थी जात्याच हुशार असेल तर तो कोणत्याहि माध्यमात शिकला तरी त्याला इंग्रजी सहज आत्मसात करता येईल.माझ्या बरोबर मराठि माध्यमात शिकलेले अनेकजण केवळ बुद्धीमत्तेमुळे इंग्रजी आत्मसात करु शकले व आज ते परदेशात डॉलरमध्ये खेळत आहेत व माझ्यासारखे बेताची अक्कल असलेले आजही इंग्रजीत बोलताना चाचपडतात तात्पर्य काय ,अक्कल असेल तर मराठी माध्यमात शिकुनसुद्धा इंग्रजिवर प्रभुत्व मिळवता येते ,जगभरातल्या संधी दाराशी येतात व आमच्या सारखे सुमार बुद्धिमत्तेचे लोक तंबाखु मळत पाट्या टाकत बसतात. ( आपला पाल्य हुशार असेल तर बिनधास्त मराठी माध्यमात घालावा)

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

सुचिकांत 29/06/2016 - 13:58
अत्यंत बेजबाबदार विधान करताय! @'टर्बोचार्जड फिलॉसॉफर' - शहरातल्या मोठ्या इस्पितळामध्ये दरवर्षी शाळा सुरु व्हायच्या वेळी, आयक्यू तपासणी कार्यक्रमासाठी पालक येतात, आणि डॉक्टर सांगतात आयक्यू चांगलाच आहे, तुम्ही तुमच्या मुलांना मातृभाषेतून शिकवा. इंग्रजी शिकायला काय आयक्यू लागतो? काहीही !!! गोव्यात गेला तर, फेरीवाला पण चांगलं इंग्रजी बोलू शकतो! बुद्धीमत्तेचे विविध प्रकार आहेत. भाषिक बुद्धिमत्ता त्यापैकी एक. एखाद्या उत्कृष्ट mechanical engineer चे इंग्रजी जर कच्चे असेल तर त्याचा आयक्यू कमी आहे म्हणता येईल का? यावर विचार करा. मुलांचा कल कोणत्या दिशेला आहे, हे जर ठरवायचे असेल तर पहिल्या पासून मातृभाषेतून शिक्षण कधीही चांगलेच आहे.
ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी. पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा. जरी शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असं पक्कं समीकरण आजकाल झालेलं असलं, तरीही मातृभाषा शिक्षणाबद्दल काही सत्य आणि त्यासंबंधी जगात बळावत असलेली भावना सांगण्याचा इथे प्रयत्न आहे.

देऊळ, लोकल ट्रेन, चित्रपटगृह आणि माणसं

वेल्लाभट ·

अत्रे 01/12/2015 - 12:24
तिसरी घटना - त्या टकलू माणसाला कोणालाही थापड मारायचा अधिकार कोणी दिला? माझ्या मते त्याच्यावर intimidation, assault असा गुन्हा दाखल करायला हवा.

अत्रे 01/12/2015 - 12:32
कायद्यानुसार उभे राहणे बंधनकारक नाही.. पहा http://qr.ae/RbyGzx
Legally no. You are only required to show respect. That is all that is asked of Indian citizens. You are not required to even sing. But yes, you are expected to respect. Which basically means that you are not supposed to do anything that shows your disrespect. That is all. This issue came up in a case before the Supreme Court in Bijoe Emmanuel & Ors vs State Of Kerala & Ors (Citation here - Bijoe Emmanuel & Ors vs State Of Kerala & Ors on 11 August, 1986) All the cases where people were arrested for not standing, if you read the facts carefully, you will see that they were also doing acts to show their disrespect. In some cases, they were found booing the National anthem or otherwise making gestures of disrespect. They were arrested for that. It is the habit of Indian newspapers and media in general to not write complete facts and show the Indian law enforcement agencies in bad light.

साधा मुलगा 01/12/2015 - 15:39
हि तर धक्कादायकच होती, मी रोज लोकलने प्रवास करतो त्यामुळे ज्यास्तच जिव्हारी लागली. लोकांना त्या मुलाला सांभाळून घेता आले असते. मी सुद्धा कधी घाई गर्दीच्या वेळी उशीर झाल्यामुळे म्हणा,असा राम भरोसे प्रवास केला आहे, हे कबुल करतो पण हे फारच धोकादायक आहे, गर्दीच्या वेळी मी तर गाडी सोडूनच देतो असला जीवघेणा प्रवास करण्यापेक्षा. विडिओ काढणार्याचा काय उद्देश होता समजला नाही, खरे तर खिशात हात घालायला देखील जागा नसताना हा शुटींग कशासाठी होता?

In reply to by साधा मुलगा

गामा पैलवान 02/12/2015 - 02:29
साधा मुलगा, भावेशचा मृत्यू धक्कादायक आहे. मात्र तुम्ही म्हणता तसे लोकांनी सांभाळून घेणे जमले नसते. त्या चलच्चित्रात बघितल्याप्रमाणे बाकीचे लोकंही लटकूनच प्रवास करंत होते. कोणी सांभाळून घ्यायचं ठरवलं असतं तर एकाऐवजी दोन जीव गेले असते. शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे भावेशने दोन्ही हातांनी मिळेल तो भाग घट्ट पकडून ठेवला होता. मधल्या उभ्या दांड्यावर त्याच्या डाव्या हाताची पकड अगदी मजबूत बसलेली दिसते आहे. ती त्याने कशाला सोडली हे गूढच आहे. बहुतेक ती चुकून सुटली असावी. उजव्या हाताने त्याने मागील हँडल पकडायचा प्रयत्न चालवला असावा. मात्र तो सफल झाल्याखेरीज डावा हात सोडायला नको होता. तसेच त्याच्या चेहऱ्यावरून तो संकटात आहे असं वाटंत नाही. हा फाजील आत्मविश्वासाचा बळी दिसतो आहे. तरीही अर्थात समस्येचं गांभीर्य कमी होत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

साधा मुलगा 02/12/2015 - 10:56
माझ्या अनुभवाने सांगतो दारातल्या माणसाचा जरा जरी तोल जात असेल तर लोक सावध करतात, अर्थात त्यावेळी खूप गर्दी असल्याने लोकांना दुसर्याकडे लक्ष देत आले नसेल आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एकापेक्षा अधिक लोकांचा अपघात होण्याची शक्यता होतीच.त्याने दांड्याला पकडलेला हात का सोडला हे देखील गूढ आहेच. खरेतर अश्या अवस्थेत त्याने दोन्ही हात घट्टपणे पकडायला हवे होते आणि पुढील स्टेशन आल्यानंतर जितके जाता येईल तितके आत जाणे. या सर्व गर्दीवर उपाय म्हणजे लवकर निघून , ठाणे लोकल, दोम्बिविली लोकल , कल्याण लोकल मध्ये आरामात बसून जाणे, उशीर होऊन फास्ट गाडी पकडायची वेळ आली तर तर आतमध्ये शिरता येईल अश्याच गाड्यामधून प्रवास करणे.रेल्वे गाड्यांची संख्या आणि वारंवारता एका मर्यादेपर्यंत वाढवू शकते त्याला आपण काही करू शकत नाही. लोकांकडूनही शिस्त आणि संयमाची अपेक्षा आहे. मेट्रोप्रमाणे इथेही सुरक्षा रक्षक नेमून रांगेने आत चढायची शिस्त लोकांना लावली पाहिजे अशी वेळ आली आहे. आपण आपली काळजी घेऊन सुरक्षित प्रवास करणे हेच आपल्या हातात आहे.

In reply to by साधा मुलगा

टवाळ कार्टा 02/12/2015 - 12:44
लवकर निघून , ठाणे लोकल, दोम्बिविली लोकल , कल्याण लोकल मध्ये आरामात बसून जाणे
हल्ली सकाळी १०:३० नंतरच हे करता येउ शकते

प्रसाद१९७१ 02/12/2015 - 11:00
या सर्व गर्दीवर उपाय म्हणजे लवकर निघून , ठाणे लोकल, दोम्बिविली लोकल , कल्याण लोकल मध्ये आरामात बसून जाणे,
ह्या पेक्षा मुंबई सोडुन दुसर्‍या छोट्या शहरात ( पुणे सोडुन ) कमी पैसे मिळत असतील तर तिथे स्थानांतर का करत नाहीत. एकुण नोकरी करणार्‍या लोकांपैकी ५-१० टक्के लोकांना हे शक्य असावे नक्कीच.

साधा मुलगा 02/12/2015 - 11:41
ते झालच हो साहेब, पण आमच्यासारख्या जन्मजात मुंबई/ठाणेकराला गाडी परवडत नसल्याने दुसरा पर्याय नाही हो. मुंबई बाहेरच्या लोकांना मुम्बैची सोलिड क्रेझ असते , त्यामुळे सगळे मुंबईला यायला बघतात, खरे पहिले तर छोट्या शहरात सर्व सुविधा आणि प्रगतीच्या संधी असतील तर मुंबईत यायची गरज नाही, जाऊदे यावर एक स्वतंत्र धागा निघू शकतो, उगाच विषयांतर नको.

वेल्लाभट 02/12/2015 - 12:00
लोकसत्तात आज जो अग्रलेख आला आहे, त्याबद्दल माझं मत, पत्राद्वारे. ▼ Wednesday, December 2, 2015 Re: बिनडोकांची राष्ट्रभक्ती लोकसत्ता अग्रलेख http://www.loksatta.com/aghralekh-news/national-anthem-in-multiplex-1165590/ त्याबद्दल माझे विचार, पत्ररूपात. नमस्कार महोदय, लोकसत्ताच्या २-१२-२०१५ रोजीच्या अंकातील आपला अग्रलेख, 'बिनडोकांची राष्ट्रभक्ती' वाचला. त्याबद्दल माझे विचार थोडे वेगळे आहेत. ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा पत्रप्रपंच. दिवसागणिक घडणा-या असंख्य अशा गोष्टी असतात की ज्यात बघ्याची भूमिका घेणारे १० असतील तर एखादाच असतो जो झाला प्रसंग निस्तरायचा प्रामाणिक प्रयत्न करू पाहतो. बाकी बहुतांश लोक 'मला काय फरक पडतो?' मानसिकतेच्या प्रभावाखाली असतात. सिनेमागृहातल्या घटनेत दोन गोष्टी आशादायी आहेत. एक म्हणजे अर्थातच तिथे उपस्थित असलेले ते' ४-५ जण वगळता सर्वजण राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिले, आणि बहुतांश जण नेहमीच राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे समोर घडणारी एखादी घटना चूक वाटल्यावर तिच्या विरोधात एकत्रितपणे आवाज उठवला गेला. देशातील वाढता बेदरकारपणा रोखायचा असेल तर माझ्या मते अशी एकी वेळोवेळी दिसायला हवी. कायद्याच्या मुद्द्याकडे येतो. कायद्याने राष्ट्रगीताला उभं राहणं बंधनकारक नाही. तुम्ही देशभक्तीची सक्ती करू शकत नाही. पण त्या नात्याने तुम्ही सहिष्णुतेचीही सक्ती करू शकत नाही. तुम्हीच म्हटलेल्या मुद्द्यांनुसार, सिनेमागृहात फोन न घेणे, मोठ्याने न बोलणे, इत्यादी गोष्टीही कायद्याने निषिद्ध नाहीत. परंतु एखादी व्यक्ती मोठ्याने फोन वर बोलत असेल तर तिला दटावणारे दहा लोक असतातच. तसाच प्रकार इथे झाला. कायद्यावर बोट ठेवणे हा सदर घटनेच्या भावनिक चौकटीला दिलेला छेद आहे. कायद्यात निषिद्ध नसलेल्या अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपण रीत म्हणून, पद्धत म्हणून, सगळे करतात वा करत नाहीत म्हणून पाळतो. सिनेमागृहात सिनेमाच्या आधी राष्ट्रगीत ऐकवण्याची प्रथा गेली अनेक वर्ष चालू आहे. झाल्या प्रसंगासारखे प्रसंग आधीही नक्कीच झाले असतील. पण कसं आहे की सद्ध्याच्या काळात मुद्द्यांना मोठं रूप देऊन देशाची असहिष्णू म्हणून प्रसिद्धी करण्याचाही ट्रेंड आला आहे, ट्रेंड; जसा ध्वनिचित्रफीत काढण्याचा आला आहे तसाच. पुढे जाऊन मी असं म्हणेन की असाच एकत्रित विरोध जर कचरा टाकणे, थुंकणे, उगाच हॉर्न वाजवणे, आणि तुम्ही दिलेल्या राष्ट्रसेवेच्या प्रत्येक उदाहरणाबाबत झाला, तर प्रगतिपथावर देशाची गती वाढेल, समाजाला आपोआप शिस्त येईल, नियम मोडण्याची वृत्ती कमी होईल आणि सर्वांचंच कल्याण होईल. तेंव्हा राष्ट्रगीत सिनेमागृहात का? आणि उभं रहायचा नियम नाही वगैरे मुद्द्यांपेक्षा खरं तर याच दरम्यान झालेल्या लोकल अपघातात लोकांनी एकत्रित होऊन लोकलमधे लटकणा-या त्या मुलाला वाचवायचा प्रयत्न का नाही केला हा प्रश्न जास्त त्रास देणारा असायला हवा. आमिर खान असो, शाहरुख खान असो, किंवा सिनेमागृहातलं राष्ट्रगीत प्रकरण असो; देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने, देशभक्तीच्या भावनेतून होणारं हे सामाजिक एकीकरण हे चांगलं लक्षण आहे. कदाचित थोडं अतिरेकी वाटेलही ते अनेकांना, पण प्रत्येक रूढ गोष्ट ही कधीकाळी अतिरेकी ठरवलेली असते. तेंव्हा ही सार्वजनिक देशभक्ती पुढे जाऊन एका सकारात्मक ऊर्जेचं रूप घेईल, अशी मी आशा करतो. अपूर्व ओक

अत्रे 01/12/2015 - 12:24
तिसरी घटना - त्या टकलू माणसाला कोणालाही थापड मारायचा अधिकार कोणी दिला? माझ्या मते त्याच्यावर intimidation, assault असा गुन्हा दाखल करायला हवा.

अत्रे 01/12/2015 - 12:32
कायद्यानुसार उभे राहणे बंधनकारक नाही.. पहा http://qr.ae/RbyGzx
Legally no. You are only required to show respect. That is all that is asked of Indian citizens. You are not required to even sing. But yes, you are expected to respect. Which basically means that you are not supposed to do anything that shows your disrespect. That is all. This issue came up in a case before the Supreme Court in Bijoe Emmanuel & Ors vs State Of Kerala & Ors (Citation here - Bijoe Emmanuel & Ors vs State Of Kerala & Ors on 11 August, 1986) All the cases where people were arrested for not standing, if you read the facts carefully, you will see that they were also doing acts to show their disrespect. In some cases, they were found booing the National anthem or otherwise making gestures of disrespect. They were arrested for that. It is the habit of Indian newspapers and media in general to not write complete facts and show the Indian law enforcement agencies in bad light.

साधा मुलगा 01/12/2015 - 15:39
हि तर धक्कादायकच होती, मी रोज लोकलने प्रवास करतो त्यामुळे ज्यास्तच जिव्हारी लागली. लोकांना त्या मुलाला सांभाळून घेता आले असते. मी सुद्धा कधी घाई गर्दीच्या वेळी उशीर झाल्यामुळे म्हणा,असा राम भरोसे प्रवास केला आहे, हे कबुल करतो पण हे फारच धोकादायक आहे, गर्दीच्या वेळी मी तर गाडी सोडूनच देतो असला जीवघेणा प्रवास करण्यापेक्षा. विडिओ काढणार्याचा काय उद्देश होता समजला नाही, खरे तर खिशात हात घालायला देखील जागा नसताना हा शुटींग कशासाठी होता?

In reply to by साधा मुलगा

गामा पैलवान 02/12/2015 - 02:29
साधा मुलगा, भावेशचा मृत्यू धक्कादायक आहे. मात्र तुम्ही म्हणता तसे लोकांनी सांभाळून घेणे जमले नसते. त्या चलच्चित्रात बघितल्याप्रमाणे बाकीचे लोकंही लटकूनच प्रवास करंत होते. कोणी सांभाळून घ्यायचं ठरवलं असतं तर एकाऐवजी दोन जीव गेले असते. शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे भावेशने दोन्ही हातांनी मिळेल तो भाग घट्ट पकडून ठेवला होता. मधल्या उभ्या दांड्यावर त्याच्या डाव्या हाताची पकड अगदी मजबूत बसलेली दिसते आहे. ती त्याने कशाला सोडली हे गूढच आहे. बहुतेक ती चुकून सुटली असावी. उजव्या हाताने त्याने मागील हँडल पकडायचा प्रयत्न चालवला असावा. मात्र तो सफल झाल्याखेरीज डावा हात सोडायला नको होता. तसेच त्याच्या चेहऱ्यावरून तो संकटात आहे असं वाटंत नाही. हा फाजील आत्मविश्वासाचा बळी दिसतो आहे. तरीही अर्थात समस्येचं गांभीर्य कमी होत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

साधा मुलगा 02/12/2015 - 10:56
माझ्या अनुभवाने सांगतो दारातल्या माणसाचा जरा जरी तोल जात असेल तर लोक सावध करतात, अर्थात त्यावेळी खूप गर्दी असल्याने लोकांना दुसर्याकडे लक्ष देत आले नसेल आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एकापेक्षा अधिक लोकांचा अपघात होण्याची शक्यता होतीच.त्याने दांड्याला पकडलेला हात का सोडला हे देखील गूढ आहेच. खरेतर अश्या अवस्थेत त्याने दोन्ही हात घट्टपणे पकडायला हवे होते आणि पुढील स्टेशन आल्यानंतर जितके जाता येईल तितके आत जाणे. या सर्व गर्दीवर उपाय म्हणजे लवकर निघून , ठाणे लोकल, दोम्बिविली लोकल , कल्याण लोकल मध्ये आरामात बसून जाणे, उशीर होऊन फास्ट गाडी पकडायची वेळ आली तर तर आतमध्ये शिरता येईल अश्याच गाड्यामधून प्रवास करणे.रेल्वे गाड्यांची संख्या आणि वारंवारता एका मर्यादेपर्यंत वाढवू शकते त्याला आपण काही करू शकत नाही. लोकांकडूनही शिस्त आणि संयमाची अपेक्षा आहे. मेट्रोप्रमाणे इथेही सुरक्षा रक्षक नेमून रांगेने आत चढायची शिस्त लोकांना लावली पाहिजे अशी वेळ आली आहे. आपण आपली काळजी घेऊन सुरक्षित प्रवास करणे हेच आपल्या हातात आहे.

In reply to by साधा मुलगा

टवाळ कार्टा 02/12/2015 - 12:44
लवकर निघून , ठाणे लोकल, दोम्बिविली लोकल , कल्याण लोकल मध्ये आरामात बसून जाणे
हल्ली सकाळी १०:३० नंतरच हे करता येउ शकते

प्रसाद१९७१ 02/12/2015 - 11:00
या सर्व गर्दीवर उपाय म्हणजे लवकर निघून , ठाणे लोकल, दोम्बिविली लोकल , कल्याण लोकल मध्ये आरामात बसून जाणे,
ह्या पेक्षा मुंबई सोडुन दुसर्‍या छोट्या शहरात ( पुणे सोडुन ) कमी पैसे मिळत असतील तर तिथे स्थानांतर का करत नाहीत. एकुण नोकरी करणार्‍या लोकांपैकी ५-१० टक्के लोकांना हे शक्य असावे नक्कीच.

साधा मुलगा 02/12/2015 - 11:41
ते झालच हो साहेब, पण आमच्यासारख्या जन्मजात मुंबई/ठाणेकराला गाडी परवडत नसल्याने दुसरा पर्याय नाही हो. मुंबई बाहेरच्या लोकांना मुम्बैची सोलिड क्रेझ असते , त्यामुळे सगळे मुंबईला यायला बघतात, खरे पहिले तर छोट्या शहरात सर्व सुविधा आणि प्रगतीच्या संधी असतील तर मुंबईत यायची गरज नाही, जाऊदे यावर एक स्वतंत्र धागा निघू शकतो, उगाच विषयांतर नको.

वेल्लाभट 02/12/2015 - 12:00
लोकसत्तात आज जो अग्रलेख आला आहे, त्याबद्दल माझं मत, पत्राद्वारे. ▼ Wednesday, December 2, 2015 Re: बिनडोकांची राष्ट्रभक्ती लोकसत्ता अग्रलेख http://www.loksatta.com/aghralekh-news/national-anthem-in-multiplex-1165590/ त्याबद्दल माझे विचार, पत्ररूपात. नमस्कार महोदय, लोकसत्ताच्या २-१२-२०१५ रोजीच्या अंकातील आपला अग्रलेख, 'बिनडोकांची राष्ट्रभक्ती' वाचला. त्याबद्दल माझे विचार थोडे वेगळे आहेत. ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा पत्रप्रपंच. दिवसागणिक घडणा-या असंख्य अशा गोष्टी असतात की ज्यात बघ्याची भूमिका घेणारे १० असतील तर एखादाच असतो जो झाला प्रसंग निस्तरायचा प्रामाणिक प्रयत्न करू पाहतो. बाकी बहुतांश लोक 'मला काय फरक पडतो?' मानसिकतेच्या प्रभावाखाली असतात. सिनेमागृहातल्या घटनेत दोन गोष्टी आशादायी आहेत. एक म्हणजे अर्थातच तिथे उपस्थित असलेले ते' ४-५ जण वगळता सर्वजण राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिले, आणि बहुतांश जण नेहमीच राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे समोर घडणारी एखादी घटना चूक वाटल्यावर तिच्या विरोधात एकत्रितपणे आवाज उठवला गेला. देशातील वाढता बेदरकारपणा रोखायचा असेल तर माझ्या मते अशी एकी वेळोवेळी दिसायला हवी. कायद्याच्या मुद्द्याकडे येतो. कायद्याने राष्ट्रगीताला उभं राहणं बंधनकारक नाही. तुम्ही देशभक्तीची सक्ती करू शकत नाही. पण त्या नात्याने तुम्ही सहिष्णुतेचीही सक्ती करू शकत नाही. तुम्हीच म्हटलेल्या मुद्द्यांनुसार, सिनेमागृहात फोन न घेणे, मोठ्याने न बोलणे, इत्यादी गोष्टीही कायद्याने निषिद्ध नाहीत. परंतु एखादी व्यक्ती मोठ्याने फोन वर बोलत असेल तर तिला दटावणारे दहा लोक असतातच. तसाच प्रकार इथे झाला. कायद्यावर बोट ठेवणे हा सदर घटनेच्या भावनिक चौकटीला दिलेला छेद आहे. कायद्यात निषिद्ध नसलेल्या अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपण रीत म्हणून, पद्धत म्हणून, सगळे करतात वा करत नाहीत म्हणून पाळतो. सिनेमागृहात सिनेमाच्या आधी राष्ट्रगीत ऐकवण्याची प्रथा गेली अनेक वर्ष चालू आहे. झाल्या प्रसंगासारखे प्रसंग आधीही नक्कीच झाले असतील. पण कसं आहे की सद्ध्याच्या काळात मुद्द्यांना मोठं रूप देऊन देशाची असहिष्णू म्हणून प्रसिद्धी करण्याचाही ट्रेंड आला आहे, ट्रेंड; जसा ध्वनिचित्रफीत काढण्याचा आला आहे तसाच. पुढे जाऊन मी असं म्हणेन की असाच एकत्रित विरोध जर कचरा टाकणे, थुंकणे, उगाच हॉर्न वाजवणे, आणि तुम्ही दिलेल्या राष्ट्रसेवेच्या प्रत्येक उदाहरणाबाबत झाला, तर प्रगतिपथावर देशाची गती वाढेल, समाजाला आपोआप शिस्त येईल, नियम मोडण्याची वृत्ती कमी होईल आणि सर्वांचंच कल्याण होईल. तेंव्हा राष्ट्रगीत सिनेमागृहात का? आणि उभं रहायचा नियम नाही वगैरे मुद्द्यांपेक्षा खरं तर याच दरम्यान झालेल्या लोकल अपघातात लोकांनी एकत्रित होऊन लोकलमधे लटकणा-या त्या मुलाला वाचवायचा प्रयत्न का नाही केला हा प्रश्न जास्त त्रास देणारा असायला हवा. आमिर खान असो, शाहरुख खान असो, किंवा सिनेमागृहातलं राष्ट्रगीत प्रकरण असो; देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने, देशभक्तीच्या भावनेतून होणारं हे सामाजिक एकीकरण हे चांगलं लक्षण आहे. कदाचित थोडं अतिरेकी वाटेलही ते अनेकांना, पण प्रत्येक रूढ गोष्ट ही कधीकाळी अतिरेकी ठरवलेली असते. तेंव्हा ही सार्वजनिक देशभक्ती पुढे जाऊन एका सकारात्मक ऊर्जेचं रूप घेईल, अशी मी आशा करतो. अपूर्व ओक
तीन घटना. तीन बातम्या. आणि तीन प्रकारे वागलेली तिथली माणसं. याबाबत मी गेले तीन दिवस विचार करतोय. रत्नाकर मतकरींचं एक वाक्य आठवतं, 'माणूस वाईट नसतो; माणसं वाईट असतात.' याबद्दल विचार केला की त्यांचं म्हणणं किती खरं आहे ते जाणवतं. या घटना वृत्तवाहिन्यांनी, वृत्तपत्रांनी पुरेशा चघळल्यात त्यामुळे त्या सगळ्यांना माहित असतीलच. लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाचं वागणं, त्यांचा विचार. शनिशिंगणापूरला, जिथल्या देवळात स्त्रीयांना प्रवेश निषिद्ध आहे, तिथे एका मुलीने जाऊन तेलाचा अभिषेक केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?

माहितगार ·

In reply to by प्रसाद१९७१

माहितगार 30/11/2015 - 16:45
पॉपकॉर्न सोबत थंडीचे दिवस आले म्हणून गरमागरम विषय चर्चेसाठी दिला आहे, खूप गरम वाटल्यास क्षुधाशांतीसाठी थंड पेयेही सोबत ठेवावीत

In reply to by जेपी

माहितगार 01/12/2015 - 13:16
तुमच्या शुभेच्छांसाठी मिठाई. पहिल्या दिवसात १०० चा दर बरा असतो का ? धागा लेखातील बर्‍याच मुद्द्यांना अद्याप स्पर्श झाला नाही त्यातील अर्ध्या मुद्द्यांना स्पर्ष केलातरी भरपूर होतील असे वाटते.

कंजूस 30/11/2015 - 17:20
स्त्रिया बय्राचदा चुलीजवळ असतात.कोणी फुकाचं व्यवहाराला धरून नसलेलं बोललं की " तुझं तत्वज्ञान गेलं चुलीत " +"{ दोनवेळचं गिळण्यासाठी छनछन घेऊन ये मग ऐकते }."हे एक "बेसिक इंस्टिन्क्ट आहे". बाकी शनि काही शिंगणापुरलाच नाही घरातही बनवता येतो.

संदीप डांगे 30/11/2015 - 18:09
शशी केसबद्दलः जिथे स्त्रियांना प्रवेशास बंदी आहे अशा प्रार्थनास्थळांमधे त्यांनी जाऊच नये. किंवा कुणीही जाऊ नये. देवाच्या गाभार्‍यावर हे बसलेले चोर का नियम ठरवतात..? बाकीचे का पाळतात? खरंच चालत नसेल (म्हणजे देव कोपत बीपत असेल) तर कोपू दे! ती तरुणी तिथेच शिळा होऊन पडली असती तर देव आहे हे सिद्धही झाले असते, नाही पडली त्यामुळे खरा प्रश्न आणि तमाशा चालू झाला. देव कोपण्याऐवजी गावकरीच कोपलेत. अकलेचे कांदे आणि डोळे असून आंधळे लोक अजूनही शनि-शिंगणापुरास जातात. दलितांच्या मंदीरप्रवेश आंदोलनाबद्दलही मला हाच प्रश्न पडला होता. अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला... जो स्वत: तुम्हाला जवळ घेऊ शकत नाही, तुमचे दु:ख दूर करू शकत नाही तो देव कशाला डोक्यावर घ्यायचा? (देवाने दु:ख दूर करून सुख द्यावे म्हणून लोक देव संकल्पना मानतात, सश्रद्ध लोकांनी अंगावर येऊ नये) दुसरा प्रतिसाद नंतर देतो.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 30/11/2015 - 19:50
आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. दुर्दैवाने या अनुषंगाने स्त्रियांना जी सापत्न वागणूक मिळते ती देण्यात इतर स्त्रियाही पुढे सरसावतात.

In reply to by बोका-ए-आझम

आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
ह्याला म्हणतात अनभ्यासातुन आलेले स्वकपोकल्पित निरर्थक अत्मरंजन ! पारश्यांच्या सर्व अग्यारी मधे कितीही हुच्चवर्णीय असला तरीही तुम्हाला प्रवेश दिला जात नाही ... कित्येक अग्यारीबाहेर "पारशी आणि इराणी झोराष्ट्रीयन सोडुन सर्वांन्ना प्रवेश निशिध्द " अशी स्पष्ट पाटी वाचली आहे मी !

In reply to by प्रसाद गोडबोले

बोका-ए-आझम 30/11/2015 - 22:57
त्यावरून तुम्हाला वाचता येतं याशिवाय दुसरं काहीही सिद्ध होत नाही. पहिले तो 'निशिद्ध'शब्द 'निषिद्ध' असा नीट लिहायला शिका. शंभर वेळा लिहून काढा हवं तर. पारशांच्या धर्मस्थळात फक्त पारशांना परवानगी असते. पुरुष किंवा स्त्री. आणि जे पारशी नसतात त्यांना नसते. पुरुष किंवा स्त्री. इथे धाग्यात उल्लेख नसलेल्या मुद्द्यांवर वाद घालायचा असेल तर परीराज्यात जा. नाहीतर मुद्दा समजून घेऊन नीट वाद घाला. एवढा अभ्यास केलाय त्याचा उजेड पडू दे जरा!

In reply to by बोका-ए-आझम

किती ती असहिष्णुता ! तुमच्या ह्या प्रतिसादातुन वाक्य जसेच्या तसे कॉपी पेस्ट करुन लिहिले आहे >>>> http://www.misalpav.com/comment/777704#comment-777704 १००% सहमत. बोका-ए-आझम - Mon, 30/11/2015 - 19:50 आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. >>>> उगाच स्वतःच्या मनाचे काही घुसडलेले असेल तर दाखवा नाही तर वाक्य लिहायला चुकले असे कबुल करा की राव !! आम्ही आमचा शब्द सुधारतो तुम्ही तुमचे वाक्य सुधारा . हाकानाका.

In reply to by प्रसाद गोडबोले

बोका-ए-आझम 01/12/2015 - 07:02
तुम्ही खरोखर चूक दाखवली असतीत तर ती मान्य करायला हरकत नव्हती. चूक नसताना उगाचच आक्षेप घेणं याला काय अर्थ आहे? धागा स्त्रियांवरच्या धार्मिक बंधनांची चर्चा करतोय. त्यावर संदीप डांगे यांनी शनि शिंगणापूरच्या घटनेचा संदर्भ दिला. त्यावर मी प्रतिक्रिया दिली. त्याला संदर्भ हा शनि शिंगणापूरसारख्या हिंदू तीर्थक्षेत्रात स्त्रियांवर लादण्यात आलेल्या बंधनांवर होता. पारशांचा संबंध कुठे येतो यामध्ये? पारशी कोणत्याही पारशी नसलेल्या माणसाला त्याची जात/धर्म/लिंग/वर्ण यावरून अपवाद करुन अग्यारीत प्रवेश देत नाहीत. यात मुद्दाम पुरुष आणि उच्चवर्णीयांचा अपवाद केला जात नाही. तसंच कोणत्याही पारशी पुरुष आणि स्त्रीला तिथे प्रवेश असतो. त्यात लिंग आणि वर्ण यावरुन अपवाद केला जात नाही. त्यामुळे तुमचा आक्षेप निरर्थक ठरतो. उद्या स्त्रियांच्या स्वच्छतागृहांमध्ये आणि ट्रेनच्या स्त्रियांच्या डब्यांमध्ये पुरूषांना प्रवेश नसतो असं कुणी तरी म्हणेल. ते विधानही तुमच्या आक्षेपाप्रमाणेच निरर्थक आहे.

In reply to by बोका-ए-आझम

प्रचेतस 01/12/2015 - 07:18
वेरुळच्या घृष्णेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात मात्र पुरुषांना बनेल काढल्याशिवाय अजूनही प्रवेश मिळत नाही.

In reply to by प्रचेतस

असा नियम असावा. सासवडजवळच्या हिवरे येथील मंदीराच्या गाभार्‍यातसुद्धा बनियन (आणि कमरेचा पट्टा-चामडी वस्तू नको म्हणून) काढून जावं लागतं. कानिफनाथांचं मंदीर हिवर्‍यापासून पुढेजवळच आहे. (शिवमंदीर नसले तरी) तेथेही हाच नियम आहे. या नियमामुळे बाय डिफॉल्ट महिला मंदीर प्रवेशास अपात्र ठरतात.

In reply to by तुषार काळभोर

कवितानागेश 01/12/2015 - 14:55
मी गोकर्ण, घृष्णेश्वर इथे जाऊन आले आहे. दक्षिणेत अनेक शिवमंदीर्ांमध्ये असा नियम आहे पण तो पुरुषांसाठी. स्त्रियांना तस्सच्या तस्स आत जाऊ देतात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम 01/12/2015 - 09:49
तरी आपण उत्तरं देतोच ना सर! शिक्षकांच्या व्यवसायात हा occupational hazard असतोच ना! त्यामुळे इच्छा असूनसुद्धा फाट्यावर मारता येत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

सहमत आहे. पण मला अनेक वर्षाच्या जालानुभव सांगतो आपल्याला त्रास होतो पेक्षा थांबणं परवडतं. म्हणजे उद्या एखाद्या मंदिराच्या विश्वस्तानी ठरवलं की महिलांनी यापुढे.... जाऊ देत. पुरुषांना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर नागडं जावं लागेल तरी हे म्हणतील काय होतं मंदिराचे नियम पाळले पाहिजेत. शिकलेले असून सारासार विवेकबुद्धि वापरता येत नसेल तर काय उपयोग शिक्षणाचा. शनीमंदिराचा चौथारा असू देत की रजस्वला असलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश असू देत स्री पुरुषांनी मिळुन जनआंदोलन केलं पाहिजे, देव आहे नाही तो भाग वेगळा. पण प्रवेश बंदी कोणालाच नको. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सर्वांसाठी खुलं केलं त्या प्रमाणे ही आंदोलनं झाली पाहिजेत, असं वाटतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पगला गजोधर 01/12/2015 - 10:46
शिकलेले असून सारासार विवेकबुद्धि वापरता येत नसेल तर काय उपयोग शिक्षणाचा.
अश्या लोकांना साक्षर म्हणावे, सुशिक्षित नव्हे, भलेही त्यांनी फुरोगामी/विचारजंत असे इतरांना शिव्या घालून हिणवलं तरी… call spade a spade.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संदीप डांगे 01/12/2015 - 10:50
बिरुटेसर, परस्परविरोधी विधाने करत आहात. सारासारविवेकबुद्धी असेल तर कुणी मंदिरात जाणारच कशाला? मंदिरातले नियम विश्वस्त ठरवत नाहीत, भक्त ठरवतात. भक्तांनी ठरवलेले नियम विश्वस्त पाळतात. पुढे विश्वस्त/पुजारी आपल्या सोयीनुसार ते वळवून घेतात आणि पुढे भक्त हेच नियम पाळायला लागतात. हे ज्या भक्तांना कळत नाही त्यांना नागडे जाण्याचाही नियम मान्य होतो. प्रथा एखाद्याच्या मूर्खपणामुळे तयार होतात. एखाद्याने नागड्याने जाण्याचा नवस केला अन् अनमानधपक्याने फळास आला तर ते पाहून अक्कल गहाण टाकलेले लोक तसेच करायला लागतील. बहुसंख्य तसे करतात पाहून मग तोच नियम होईल आणि तीच प्रथा होईल. मग ते न पाळणार्‍याला देवाचा उपमर्द करत आहे असे म्हणून प्रवेश नाकारला जाईल. कारण मेंढ्यांच्या कळपात ते फिट बसत नाहीत म्हणून. मंदिरात कुणालाच प्रवेशबंदी नसावी असे ज्यांचे मत आहे त्यांना मंदिर ही व्यवस्थाच समजली नाही असे म्हणावे लागते. चर्च, मशिद, गुरुद्वारा, विहार ह्यापेक्षा ही व्यवस्था कशी वेगळी आहे हे खालच्या माझ्या प्रतिसादात सांगितले आहे. काही चार बुकं शिकून अतिशहाणे झालेले लोक तिकडची व्यवस्था पाहून इकडंही तसेच असले पाहिजे ह्या दिव्य विचाराप्रत येतात. त्यांना तिकडचाही अभ्यास नसतो, इकडचाही नसतो. समानतेच्या तत्त्वाचा चुकीच्या ठिकाणी आग्रह होत आहे हे लक्षात येत नाही. जनआंदोलन जर करायचे तर मंदिरात कुणीच जाऊ नये यासाठी करावे. त्यानेच समाजाचे जास्त आणि योग्य भले होईल. सगळी मंदिरेच ओसाड पाडावीत. जिथे बंदी आहे तिथे जबरदस्ती मंदिरप्रवेश ही अतिशय हास्यास्पद संकल्पना आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 01/12/2015 - 11:52
आणि मंदिरात जाणं या परस्परविरोधी गोष्टी कशा काय? मंदिरात नवस करणं, तो पूर्ण होईल किंवा होतोच अशी अंधश्रद्धा ठेवणं, त्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी असणं ही सारासारविवेकबुद्धी नसल्याची लक्षणं आहेत हे मान्य, पण मंदिरात निव्वळ जाणं हे सारासारविवेकबुद्धीच्या विरोधात आहे हे पटलं नाही.

In reply to by बोका-ए-आझम

मंदिरात निव्वळ जाणं हे सारासारविवेकबुद्धीच्या विरोधात आहे हे पटलं नाही. सहमत....! योग्य आणि अयोग्य यातील समज . -दिलीप बिरुटे

In reply to by बोका-ए-आझम

राही 01/12/2015 - 09:30
दक्षिणेतल्या काही देवळांत प्रवेशबंदी नसली तरी पुरुषांना वेष्टि नेसावी लागते. अलीकडे बहुतेक पुरुष ती पँट्वरूनच गुंडाळतात. महिलांना साडी किंवा सलवारकमीज आवश्यक आहे. जीन्स अजूनही काही ठिकाणी चालत नाहीत. चिपळूणमध्ये डेरवण येथे महिलांना नऊवारी नेसावे लागत असे तसेच तेथे महिलांनी महिना असताना आत जाऊ नये अशी पाटीही होती. आताची स्थिती माहीत नाही. अवांतर : काही वर्षांपूर्वी केरळला गेलो असताना एकदा एका देवळात आमच्या मुलांना प्रवेश द्यावा की नाही याबद्दल तिथल्या पुजार्‍यांमध्ये चर्चा झाली. तिथल्या मुख्य प्रशासकाला बोलवण्यात आले. कारण मजेशीर होते. त्यावेळी तिथे आम्हीच फक्त उत्तरहिंदुस्तानी होतो आणि मुलांचा वर्ण तांबूस गोरा आणि केस पिंगट ही बाब तिथल्या समुदायात वेगळी दिसत होती. कदाचित परदेशी पाहुणी मुले एक्स्चेंज कार्यक्रमातून आली असतील असा संशय त्यांना आला होता. (केरळमधे बरेच परदेशी लोक येतात.) त्यांची समजूत पटवण्यात थोडा वेळ गेला. रांगेतल्या मागच्या लोकांचा खोळंबा झाला नाही कारण आम्हांला रांगेतून बाहेर काढले होते. थोड्या वेळाने सर्व ठीक झाले.

In reply to by राही

मितान 01/12/2015 - 09:43
विजारीवरून वेष्टी एवढा बिनडोक भंपकपणा मी कोणत्याच देवळात पाहिला नाही! एका ठिकाणी मला सलवारवरून ते कळकट कापड ते ही भाड्याने घेऊन नेसले तरच मंदिरात जाता येईल असे सांगून अडवले. त्याचवेळी २ फिरंगी स्कर्टवाल्या मुलींना मात्र वाकून नमस्कारासह प्रवेश मिळाला. हे बघून मला त्या आतल्या देवाचीच कीव आली. तसंही मला जाऊन न जाऊन काही फरक पडत नसल्याने बाकीच्यांचे दर्शन होईस्तवर मी देवळाबाहेरच्या दुकानांना माझे दर्शन देऊन आले.

In reply to by मितान

पगला गजोधर 01/12/2015 - 10:41
हे बघून मला त्या आतल्या देवाचीच कीव आली. तसंही मला जाऊन न जाऊन काही फरक पडत नसल्याने बाकीच्यांचे दर्शन होईस्तवर मी देवळाबाहेरच्या दुकानांना माझे दर्शन देऊन आले.
तै मस्तच, मी सुद्धा जेजुरीला धन्दा होताना पाहीला, तेव्हा मी सुद्धा आत गेलो नाही.

In reply to by मितान

बॅटमॅन 01/12/2015 - 12:03
नै म्हणजे जो काय नियम आहे तो तरी सारख्या प्रमाणात राबवावा. हे असली चाटूगिरी डोक्यात जाईल नै तर काय!

In reply to by राही

गॅरी ट्रुमन 01/12/2015 - 11:18
चिपळूणमध्ये डेरवण येथे महिलांना नऊवारी नेसावे लागत असे तसेच तेथे महिलांनी महिना असताना आत जाऊ नये अशी पाटीही होती. आताची स्थिती माहीत नाही.
मी या वर्षी जानेवारीतच तिथे गेलो होतो. तिथे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही घटनांचे पुतळे आहेत आणि वालावरकर महाराज म्हणून कुणा महाराजांची समाधी आहे. पुतळ्यांच्या ठिकाणी असे वेषभूषेवर बंधन नाही.पण समाधीच्या ठिकाणी जायचे असेल तर स्त्रियांना "वयोमानानुसार फ्रॉक किंवा साडी ही वेशभूषा असेल तरच प्रवेश दिला जाईल" अशी पाटी वाचली होती. नऊवारी असा काही उल्लेख नव्हता. याविषयीच मी मिपावर मागे लिहिलेले थोडे चोप्य-पस्ते करतो--- "म्हणजे मी जीन्स घालून गेलो तरी त्या महाराजांना चालणार पण हिलरीने साडीच नेसली पाहिजे ही सक्ती. हे काही मला पटले नाही....ते पुतळे बघून झाल्यानंतर आणखी एक ठिकाण होते तिथे जायला आम्ही निघालो तेव्हा हिलरीने साडी नेसली नसल्यामुळे आत प्रवेश नाही हे कळले.आम्ही विचारले की आत नक्की काय आहे?त्यावर कळले की तिथे आत वालावलकर महाराजांची समाधी आहे.एक तर वालावरकर महाराज हे नाव मी आयुष्यात दुसऱ्यांदा ऐकले.कदाचित शाळेत असताना आमची सहल गेली होती त्यावेळी ते नाव ऐकले असेल ही शक्यता गृहित धरून दुसऱ्यांदा असे लिहितो.हे महाराज कोण होते किंवा ते खरोखर चांगले होते की नाही याविषयी मला काहीच माहित नव्हते. ज्या माणसाविषयी काही माहित नाही त्याची समाधी बघण्यात काय कपाळ इंटरेस्ट असणार? आणि समजा हे महाराज कोण हे माहित असते तरी तिथे जावेसे वाटायची शक्यता अगदी शून्य होती.उंटाच्या लहान आतड्याची लांबी किती असते हे समजून घेण्यात मला जितका इंटरेस्ट आहे त्यापेक्षाही कमी इंटरेस्ट या असल्या महाराजांच्या समाध्या वगैरे बघण्यात मला आहे.त्यामुळे आत जाऊ देणार नसाल तर नका देऊ, हू केअर्स असे म्हणत आम्ही तिथून निघालो."

In reply to by बोका-ए-आझम

आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
मी फक्त तुमचे हे वाक्य चुकले आहे इतकेच निदर्शनास आणुन देत आहे . तुम्हाला कदाचित असे लिहायचे असावे आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली हिंदु प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. तुमची वाक्य रचना चुकली आहे इतकेच निदर्शनास आणुन देत आहे !

In reply to by पगला गजोधर

त्यांचे मुळ वाक्य हे आहे >>>
आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
>>> मी कमीत कमी सुधारणा सुचवत होतो , बरे झाले आपण अजुन एक अ‍ॅडीशन सुचवली ! बोकाराव तुमचे वाक्य असे असले पाहिजे आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली हिंदु पूजास्थळे कुठेच नाहीत.

In reply to by प्रसाद गोडबोले

नूतन सावंत 02/12/2015 - 22:10
बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्लर येथे हिंदू धर्मियांशिवाय कोणालाही प्रवेश नाही,अशी पाटी आहे.एकदा आय.टी.डी.सी.च्या बसने आलेल्या क्रिश्चन धर्मियांना मंदिराच्या प्रांगणात आणल्याबद्द्ल पंजाबी हिंदू गाईडला तिथले पुजारी आईबहिणीवरुन शिव्या देताना प्रत्यक्ष पाहिले आहे.

In reply to by नूतन सावंत

माहितगार 03/12/2015 - 10:24
खरच हे दुर्दैवी आहे. मी एकदा एका आफ्रीकन (ख्रिश्चन) स्त्रीला विवेकनंदांच्या भूमिकेतून हिंदू धर्म या विषयावर माहिती दिली तिला हिंदू संस्कृती बद्दल सकारात्मक उत्सुकता निर्माण झाली आणि मंदिरांना भेट देण्याचीही इच्छा झाली पण मंदिरातील पुजारीवर्ग कसा वागेल या विचाराने मंदिर भेटीस आमंत्रण देण्याचे धाडस मलाच झाले नाही याची आठवण झाली.

In reply to by माहितगार

संदीप डांगे 03/12/2015 - 11:24
जिथे पुजारी नाहीत अशा मंदिरांना भेट द्यायला सांगावी. प्रसिद्ध व गर्दिने गजबजलेली मंदिरे म्हणजेच हिंदू धर्म असे नाही.

In reply to by संदीप डांगे

माहितगार 03/12/2015 - 11:53
म्हणजे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तुमच्या धर्मातील हेदभाव कबूल करणे, शिवाय हायलाइट करणे झाले असे नाही का ?

In reply to by माहितगार

संदीप डांगे 03/12/2015 - 12:37
नाही हो तसे नाही. मंदिरांबद्दल मी जे वर विवेचन दिले त्यानुसार काही मंदिरे खाजगी पद्धतीची आहेत. लोक तिथे गर्दी करतात म्हणजे ती लोकांची झाली असा अर्थ होत नाही. चित्रपटगृहांमधे लोक गर्दी करतात म्हणून तिथे वाट्टेल तसे वागण्याचा, किंवा तिथले नियम ठरवण्याचा अधिकार जाणार्‍या प्रेक्षकांना मिळत नाही. कुणाला प्रवेश द्यावा न द्यावा हे जसे चित्रमंदीर ठरवू शकते तसेच हे मंदिरही ठरवू शकते. टिकिट असणे म्हणजे प्रवेशास पात्र असणे हा साधा नियम तिकडे आहे, तर हिंदू असणे म्हणजे पात्र असने हा नियम इकडे आहे. ह्यात भेदभाव आहे असे मानणे चुकीचे आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' असे एखादा हिंदू मानतो म्हणून तुम्ही त्याच्या घरात घुसून राहणार हे योग्य नाही. भेदभाव आणि पात्रतानुसार प्रवेश ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत. मंदिरे आणि देव ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत हे मी आधीपासून सांगतोय. त्यात गल्लत होऊ देऊ नये. प्रवास हा प्रवास असतो पण गावातल्या एसटी स्टँडवर ज्या सहजतेने आपण फिरू शकतो, टिकट काढण्याची वेळ येईपर्यंत बसमधे बसू शकतो, तितक्या सहज कुठल्या एअरपोर्ट वर नाही फिरू शकत. म्हटले तर दोन्ही पब्लिक प्लेस, सार्वजनिक स्थळ आहेत. मग तिथेही भेदभाव समजायचा का? प्रवास म्हणजे हिंदू धर्म आणि मंदिरं म्हणजे एअरपोर्ट, बसस्थानकं असं समजा. (फार गुंतागुंत होतेय का? फारच दृष्टांतहेवी प्रतिसाद होतोय, माफी असावी)

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन 03/12/2015 - 12:50
सरसकट कुणालाही गाभार्‍यात सोडणे आणि निव्वळ मंदिरात अलाउ करणे यात फरक आहे की नाही? फक्त मंदिरप्रवेश करू दिला तरी बास आहे. तेवढंही कबूल करवत नसेल तर हाईट आहे.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 03/12/2015 - 13:00
सरसकट कुणालाही गाभार्‍यात सोडणे आणि निव्वळ मंदिरात अलाउ करणे यात फरक आहे की नाही? हो. फरक आहे. फक्त मंदिरप्रवेश करू दिला तरी बास आहे. तेवढंही कबूल करवत नसेल तर हाईट आहे. बरोबर. माझ्यामते नियम जर असतील तर ते काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. अन्यथा तो सरळ भेदभाव आहेच. म्हणजे माहितगार म्हणत आहेत ती आफ्रिकन व्यक्ति जर सहज टूरीस्ट म्हणून मंदिरात आली आणि तीला प्रवेश नाकारला पण तीच व्यक्ती कुणा केंद्रिय मंत्र्यासोबत आली आणि तिला गाभार्‍यात घेऊन गेले तर हा भेदभावच झाला. मला वाटते इंदिरा गांधीसोबत जे त्या मंदिराने केले तेवढे कडक नियम कुणी मंदिर पाळत असेल तर तो भेदभाव समजू नये. अन्यथा हाईट आहेच.

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन 03/12/2015 - 13:05
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो.

In reply to by बॅटमॅन

पगला गजोधर 03/12/2015 - 13:49
अमेरिका/ गोव्यातल्या/केप टाउन चर्चमधे (डोक्यावर टोपी न ठेवणे की संपले) व सिंगापूर /थायलंड मधील बौद्ध मंदिरात (पादत्राणे न घालणे की संपले), मला प्रवेश मिळाला, फोटो सुद्धा काढता आले. (कोणीही जात धर्म विचारला नाही). गुरुद्वाराच्या लंगर मधे जेवलोय (कोणीही जात धर्म विचारला नाही).

In reply to by बॅटमॅन

नाखु 03/12/2015 - 14:47
हेच मी स्वतः शिवथर घळला अनुभवले आहे. सुमारे २०-२२ वर्षांपूर्वी (जेव्हा थेट नेट सेल्फी) इफे़क्ट नव्हता तेव्हा.. माझ्याबरोबर आम्च्या कंपनी समूहात दोन मुस्लीम २ केरळीयन ख्रिषचन यांनाही विना अटकाव प्रवेश दिला होता. शिवथर घळ हे संपूर्णतः खाजगी आहे असे मला वाटते तिथेही तुम्ही कुठल्या धर्माचे आहात हे विचारत नाहीत (किमान आम्हाला तरी विचारले नाही) फक्त पोषाख सभ्य असावा असा संकेत असावा.(किंवा मधल्या काळात काही वावगे घडले असावे म्हणून पेहरावाबद्दल काही नियम बन्विले असावेत). भेदभाव करणे कुठेही वाईच धाग्यावर आणि मंदीरातही...... लाईनीत (थांबण्याची सक्ती न करता लांबूनही नमस्कार)नमस्कारी नाखु

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन 03/12/2015 - 13:06
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो. बाकी नियम कसाही असो मात्र पुजार्‍यांनी शिव्या देणे म्हणजे हाईट आहे. असे अनुभव वाईटच.

In reply to by बॅटमॅन

गवि 03/12/2015 - 14:08
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो.
अ. कडक अथवा सौम्य, जे काही नियम असतील त्यांची कमाल व्याप्ती नागरिकाला एखाद्या खाजगी, प्री-डिफाईन्ड सीमारेषा असलेल्या जागेत प्रवेश नाकारणे इतकीच असेल आणि ब. या जागी न जाण्याने त्या व्यक्तीच्या अन्न वस्त्र निवारा यांपैकी एक अथवा अनेक गरजा बाधित होत नसतील किंवा या गरजांना मिळवण्याचा एकमेव मार्ग खंडित होत नसेल. आणि क. स्वतःच्या आवारात तसे किंवा कोणतेही नियम करण्याची पूर्ण कायदेशीर मान्यता नियम बनवणार्‍या बॉडीला त्या देशाच्या मुख्य कायदेशीर संस्थेने दिलेली असेल. तर कोणतेही नियम चूक ठरणार नाहीत / ठरु नयेत. आणि तसं नसेल तर सर्व नियम चूक ठरतील / ठरावेत. मग ते वस्त्र, लिंग, वर्ण, धर्म, भाषा, उंची, वजन, केसांची लांबी, आहारपद्धती, लैंगिक ओरिएन्टेशन किंवा अन्य कोणत्याही व्हेरिफायेबल पॅरामीटरवर आधारित असोत. बाकी कितीही काही बोललं तरी निरुपयोगी.

In reply to by गवि

बॅटमॅन 03/12/2015 - 14:18
म्हणजे या न्यायाने दलितांच्या मंदिरप्रवेशाबद्दलची सर्व आंदोलने आणि महिलांच्या गाभाराप्रवेशाबद्दलची आंदोलने निरुपयोगीच ठरावीत, नै का? मध्यंतरी कर्नाटकातील एका मंदिरातल्या गलिच्छ प्रथेबद्दल बरेच काही छापून आले होते. ब्रह्मवृंदाचे जेवण झाल्यावर त्या उष्ट्या खरकट्या पत्रावळ्यांवर लोटांगण घालत प्रदक्षिणा घालण्याचा प्रकार तिथे अगोदरपासून आहे. हाही कायदेशीर प्रकार आहे, कुणाच्या कसल्या हक्कावर गदा वगैरे येत नाही. पण यावर बंदी घालण्यात आली. आणि ते मलाही समर्थनीय वाटते. बर्‍याच जणांनी विरोधही केला, कैकांनी समर्थनही केले. नेमके देवळाचे नाव आठवत नै नैतर लिंक दिली असती. बाकी हा मुद्दा अंमळ भावनिकही आहेच. काही प्रमाणात अ‍ॅक्सेस ओपन केल्यास अजून बरे होईल असे बर्‍याच जणांना वाटते, तदनुरूप अनेक लोकांनी चळवळी केलेल्या आहेत आणि त्यांना कमीअधिक प्रमाणात यशही मिळालेले आहे. त्यामुळे यात निरुपयोगी असे काही वाटत नाही.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 03/12/2015 - 14:43
मंदिरनामक जागा केंद्रस्थानी ठेवून समाज त्याविषयी काय निर्णय घेतो हे समाजावर बंधनकारक असते. संपूर्ण समाजाने (यात स्त्रिया-पुरुष, दलित-उच्चवर्णिय, श्रीमंत-गरीब सगळे आले) स्त्रियांच्या गाभाराप्रवेशावर बंदी घातली तर तेही बरोबर, उठवली तरी बरोबर. पण समाजातले काही विशिष्ट घटक आपले स्वार्थ साधण्यासाठी, असमतोल मानसिकतांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उर्वरीत समाजाला फसवत असतील आणि त्यायोगे काही भेदभाव घडत असेल तरच तो चुकीचा ठरेल. बाकी तुम्ही म्हणताय त्या अनिष्ट प्रथा ह्या सहज भावनेतून सुरु झालेल्या, पुढे विकृत रुप घेतलेल्या असतात. त्यांच्यावर प्रबोधनासह बंदी घालणे आवश्यकच आहे.

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन 03/12/2015 - 15:05
फसवणे म्हणजे काय? आर्थिक फायदा करून घेणे वगैरे? तसे असेल तर मग दलितांना मंदिरप्रवेशापासून रोखण्यात पुरोहितांचा तरी आर्थिक फायदा काय होता? उलट त्यांना अलाउ केले असते तर त्यांनीही दाने दिलीच असती की. तस्मात निव्वळ फसवणूक असेल तरच चूक ही व्याख्या अपुरी आहे असे वाटते. पण हा मुद्दा बर्‍याच अंशी सब्जेक्टिव्ह आहे हेही तितकेच खरे.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 03/12/2015 - 15:26
फसवणे म्हणजे आर्थिक फायदाच असे नाही. खरे न सांगणे, सत्य दडवून ठेवणे, मिळालेल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन दमदाटी करणे. 'एखादा अधिकार तुम्हालाही उपलब्ध आहे' हे जातीपातीच्या पूर्वग्रहातून निम्नजातींना न सांगणे ही फसवणूकच आहे. एक उदाहरण देतो. मी आणि माझ्या मित्राने अमेरिकेतल्या कुठल्या युनिवर्सिटीला अप्लाय केले. पण प्रवेश मिळेल की नाही हे तिथे गेल्यावरच समजते अशी अट आहे. माझा मित्र तिथे आधीच गेलेला आहे. काय निकाल आहे हे त्याने मलाही कळवणे अपेक्षित आहे. पण इर्ष्येतून, सामाजिक सन्मानाच्या हेतूने त्याने मला 'तुझा नंबर लागला नाही' असे चुकीचे सांगितले. मला त्याच्यावर प्रचंड विश्वास असल्याने मी तोच निकाल खरा मानला. यात माझे नुकसान झाले. म्हणजे मला फसवले असेच म्हणेन ना मी? माझ्यामते मंदिरांमधे विशिष्टांना प्रवेशबंदी ही खाजगीकरणातून आलेली आहे. मंदिरव्यवस्थापनाच्या इतिहासाबद्दल मला तेवढे इत्थंभूत ज्ञान नाही. याविषयी जास्त माहिती मिळाली तर ह्या बंदीप्रथा कुठून उपजल्या हे शोधता येईल.

In reply to by संदीप डांगे

@माझ्यामते मंदिरांमधे विशिष्टांना प्रवेशबंदी ही खाजगीकरणातून आलेली आहे.>> आहो कुठचं काय आलय खाजगीकरण.? ही अस्पृश्यता पाळली जाते सरळ सरळ! ह्याला पोथ्यांचाही आधार असतो.. देवाची पॉवर कमी होइल्,अमके तमके शिवल्यानी..असली मूर्ख टनाटनी गणित असतात...ह्या देवाला शिवू न देण्याच्या प्रथांमागे.. आतल्या गोटातून ,माहिती घ्या ..मग कळेल

In reply to by अत्रुप्त आत्मा

संदीप डांगे 03/12/2015 - 19:01
अहो, अस्पृश्यता म्हणजेच खाजगीकरण. तेच म्हणायचे आहे. हे देवाची पावर कमी होईल वैगेरे बालीश कारणं देण्यामागे जी काय मानसिकता आहे ते म्हणजे खाजगीकरण. खरेतर अस्पृश्यता, देवाची पॉवर इतकी वरवरची कारणं बघण्यापेक्षा माणसाच्या अंतर्मनात ह्या गोष्टी निर्माण होण्यामागे आणि चराचरात देव आहे ह्या भावनेच्या विरूद्ध वागण्यामागे काय इतिहास असावा, कुठून सुरू झालं, नेमकं काय कारण असावं यावर विचार करतोय. काहीतरी आहे जे इतरांपासून लपवून, सुरक्षित ठेवायचं आहे. कुणाला तरी काही तरी फायदा असल्याशिवाय ह्या मान्यता व भेदभाव निर्माण होणार नाहीत. नुसतं 'आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ' एवढ्याशा भांडवलावर ही व्यवस्था इतकी शतके चालू शकत नाही. गूढत्वाच्या भांडवलावर असेल तरी सुरुवातीस काहीतरी अनुभव आल्याशिवाय लोक मानणार नाहीत. म्हणजे दहा समान दर्जा असलेल्या व्यक्ती प्रवासाला निघाल्या पण रस्ता माहीत नाही, त्यातल्या प्रत्येकाने प्रयत्न करून पाहिला पण एकाचेच रस्त्याबद्दलचे अंदाज दोन-तीन वेळा सलग बरोबर निघाले की तोच त्या गटाचा म्होरक्या होतो. मग भलेही पुढचे सगळे अंदाज चुकत गेले तरीही पुर्वसंचितानुसार त्यालाच तो मान मिळतो. पुढे इतरांची मते लक्षात घेऊन तो अंदाज वर्तवेल पण शेवटपर्यंत इतर लोक त्यानेच आपल्याला कसे योग्य मार्गदर्शन केले ह्यावर विश्वास ठेवतील. चातुर्वर्ण्य व्यवस्था होऊन ब्राह्मण सर्वश्रेष्ठ ठरवण्यामागे ब्राहमणांचे असेच काहीसे योगदान कारणीभूत असेल काय? ज्याचा गैरफायदा घेऊन जन्मनिहाय व्यवस्था निर्माण झाली आणि पुढे श्रेष्ठ कनिष्ठ चे मत मानवी मनाच्या विकृत बाजूचे दर्शन करत प्रभावी झाले. मूळावरच घाव घातला तर फांद्या आपोआप तुटून पडतात. बाजीरावपेशव्यांनीच सांगितलंय. म्हणून मूळ शोधावे. ते मनुस्मृतीच्याही पलिकडे असावे. जाणकारांच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत.

In reply to by बॅटमॅन

गवि 03/12/2015 - 14:46
म्हणजे या न्यायाने दलितांच्या मंदिरप्रवेशाबद्दलची सर्व आंदोलने आणि महिलांच्या गाभाराप्रवेशाबद्दलची आंदोलने निरुपयोगीच ठरावीत, नै का?
माझा प्रतिसाद परत वाच. आजरोजीविषयी बोलायचं आहे. अ. जागा खाजगी आहे की सार्वजनिक मालकीची? ब. प्रवेश रोखणारा नियम अलिखित आणि लोकल पुजार्‍याने / बडव्यांच्या गटाने आपसात ठरवून केला आहे की मंदिराच्या ट्रस्टने अधिकृत ऑथॉरिटीसह केलेला आहे? यावर ते वैध की अवैध ते ठरेल. कधी भावना, कधी कायदा अशाने बरेच घोळ होतात.

In reply to by गवि

बॅटमॅन 03/12/2015 - 15:01
गाभाराप्रवेशाची आंदोलने गेल्या पाचेक वर्षांत झालेली आहेत. कर्नाटकातले उदाहरणही अलीकडचेच आहे. बाकी अधिकृत अ‍ॅथॉरिटीने घेतलेला निर्णय तांत्रिकदृष्ट्या वैध असला तरी योग्य असेलच का? ते अय्यप्पा मंदिरात पाळीवाल्या स्त्रिया ओळखण्यासाठी स्कॅनर बसवायचा निर्णय समजा उद्या अगदी अधिकृतपणे घेतला तर तुम्ही त्याला योग्यच म्हणाल का? वैध आणि योग्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दरवेळेस एकाच एक चौकटीत अशा गोष्टी पकडता येत नसल्या म्हणून नुस्ता घोळ आहे असे नाही.

In reply to by बॅटमॅन

अभ्या.. 03/12/2015 - 14:09
पुजारी हे माणसांचे प्रतिनिधी म्हणून देवापुढे गार्‍हाणे मांडतात, सेवा करतात तोपर्यंत ठिकच असते. जेंव्हा ते स्वतःला देवाचे प्रतिनिधी समजू लागतात तेंव्हाच अवघड होते. अशावेळी व्यवस्था त्यांना बदलते किंवा ते व्यवस्था बदलतात.

In reply to by संदीप डांगे

माहितगार 03/12/2015 - 13:57
@ डांगेजी
म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत.
काय होतय १) अनेक ऑदरवाईज सार्वजनिक असलेली मंदिरे/प्रार्थनास्थळे केवळ भेदभावाच्या सोईसाठी म्हणून खासगीपणा पुढे केला जाताना दिसतो यात कुणाच्या व्यक्तीगत घरात जाण्याचा तसा प्रश्न नाही आणि 'अतिथी देवोभव' म्हणणार्‍या संस्कृतीत अगदी घरातल्या मंदिरा बाबत सुद्धा भेदभावयूक्त व्यवहार आदर्श कसा म्हणता येईल ? २) मी समोरच्या परधर्मीय व्यक्तिशी माझ्या संस्कृतीतील उदात्तते बद्दल बोलणार आणि नंतर हजारो लोक जात असलेल मंदिर खासगी आहे आणि तुमच्या बॅकग्राऊंडमुळे प्रवेश नाही असे सांगणार यात माझ्या संस्कृतीच्या उदात्ततेच प्रदर्शन होत की कोत्या मनोवृत्तीच प्रदर्शन होते आहे?
म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत.
मी माझ्या धर्माचा संस्कृतीचा अभिमान ठेवतानाच, सहिष्णूता बाळगाणारा समधर्म समभाव बाळगणारा व्यक्ती आहे, मला माझ्या प्रमाणेच माझ्या मुलांमध्ये सहिष्णूता वृद्धींगत व्हावी आणि इतर धर्म आणि विचार पद्धतीचा परिचय व्हावा म्हणून माझ्या मुलांना विवीध धर्मांच्या धर्म स्थळांना भेटीस न्यावयाचे आहे त्यावेळी मुलांनो अमुक अमुक मंदिरे/प्रार्थनास्थळांमध्ये तुम्ही तुमच्या बॅकग्राउंडमुळे प्रवेशासाठी अपात्र आहात हे सांगणे नेमकी कोणती गोष्ट बाल मनांवर बिंबवते ज्यांना धर्मंच्या दुकानांवरच्या प्रवेश नाकारणार्‍र्‍या असहिष्णु पाट्या पाहून त्या मुलांकडून मोठे झाल्या नंतर सहिष्णूतेची अपेक्षा करणे कितपत रास्त ठरते या बद्दल मी साशंक आहे. असो.

In reply to by सायकलस्वार

अजया 01/12/2015 - 08:02
अरे वा हे सोपे तत्त्वज्ञान दिसते!कळायला अवघड गेला असेल विषय बाकीचा! चालु द्या निरर्थक अत्मरंजन! etc etc!!

In reply to by अजया

मितान 01/12/2015 - 08:49
@ सायकलस्वार, इथला तुमच्या मते गाभारा किती महत्वाचा आहे हे अधोरेखित केल्याबद्दल आभार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

In reply to by सायकलस्वार

पैसा 01/12/2015 - 09:37
सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा कमालीचा अभ्यास केलेला दिसतोय! का आताचा आयडी बॅन झाल्यावरची तरतूद करून ठेवली आहे! अभ्यास जोरात चालू ठेवा बरं!

In reply to by पैसा

बॅटमॅन 01/12/2015 - 12:08
सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा कमालीचा अभ्यास केलेला दिसतोय!
एका महिन्यात जर कुणी सालसपणे प्रतिसाद देऊ शकत असेल तर चार महिने लै झाले, नै का?

In reply to by पैसा

बॅटमॅन 01/12/2015 - 12:24
आमच्यासारखे बसतात बोंबलत.
चांगलंच आहे. बोंबलण्याचे फायदे काय असतात ते इथे पहावयास मिळेल. आरोग्यास हितकारकच असते. http://www.sanatan.org/mr/a/574.html त्या निमित्ताने सालसपणामागील अमंगळ निघून जाईल अशी भाबडी आशा करावयास हरकत नाही. =))

In reply to by सायकलस्वार

गणपा 01/12/2015 - 10:09
तायांनो थोडं विनोदानं घ्या की सायकलस्वाराचं वाक्य. :D का उगा वाढदिवसाच्या शुभेच्छा देउन राहीलात?

In reply to by सायकलस्वार

मृत्युन्जय 01/12/2015 - 11:09
पुरुषांना बंदी असलेला एक गाभारा इथे मिपावरच आहे म्हणे... हाहाहाहा. पण आत मध्ये देव आहे याची खात्री आहे का तुम्हाला? ;)

In reply to by मृत्युन्जय

पण आत मध्ये देव आहे याची खात्री आहे का तुम्हाला?
देव नाही ह्याची १००% खात्री आहे ... देवी असु शकेल कदाचित =))))

In reply to by मितान

बॅटमॅन 01/12/2015 - 15:19
डोक्यातल्या किड्यांची पूजा करत बसलं की असं होतं
त्या स्वमतांध दांभिक क्रायबेबी कंपूबाजांना आपली पूर्ण सिंपथी आहे. :) #छाणप्रतिसाद

In reply to by बॅटमॅन

मितान 01/12/2015 - 15:25
माझी तर अशा लोकांना नुसती सिंपथीच नाही तर किंड्यांविषयीच्या फोबियावर फुकट उपचार करणार्या संस्थांची यादीही तयार ठेवली आहे मी !

In reply to by बॅटमॅन

मितान 01/12/2015 - 15:25
माझी तर अशा लोकांना नुसती सिंपथीच नाही तर किंड्यांविषयीच्या फोबियावर फुकट उपचार करणार्या संस्थांची यादीही तयार ठेवली आहे मी !

In reply to by मितान

बॅटमॅन 01/12/2015 - 15:28
एकूण प्रतिसाद पाहून "कोण तो **चा म्हणतोय मी शिव्या देतोय म्हणून?" या अजरामर वाक्याची अठवण झाली. =))

In reply to by नीलमोहर

नीमो , चित्र सापडले आहे , फक्त तुर्तास संपादक मंडळ सुट्टीवर असल्याने चित्र इथे टाकले नव्हते , आपल्याला व्यनी करतो ;) बाकी चेष्टा मस्करी इतकी स्पोर्टींगली घेतल्याबद्दल आपल्यावर कारवाई वगैरे होईल की हो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

नीलमोहर 01/12/2015 - 16:54
Smiley नको नको व्यनि नको.. आणि संपादक मंडळच सुट्टीवर असल्यावर कारवाई कोण करणार :)

In reply to by नीलमोहर

pacificready 01/12/2015 - 17:12
>>>नको नको व्यनि नको. दूरदर्शन ची दारुबंदी ची जाहिरात आठवली. नको बाबा नको नको. संसार उद्ध्वस्त करी दारु, म्हणून संसार नका करु

In reply to by संदीप डांगे

माहितगार 30/11/2015 - 20:35
"....मंदीरप्रवेश आंदोलनाबद्दलही मला हाच प्रश्न पडला होता............जो स्वत: तुम्हाला जवळ घेऊ शकत नाही, तुमचे दु:ख दूर करू शकत नाही तो देव कशाला डोक्यावर घ्यायचा?....
कदाचित याच भावनेने सहसा लोक दुर्लक्ष करतात, अशी काही स्थाने असतील तर जाण्याचे टाळले जाते पण या दृष्टीकोणा बद्दल एक साशंकता आहे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी पाणी पिण्यास दिले नाही तर तुम्ही ते टाळाल दुसरीकडे जाऊन पाणी प्याल एका अर्थाने समतेच्या वागणूकीचा आग्रह बाजूस पडून एक अप्रत्यक्ष तडजोड स्विकारली जाते आहे. मी शीख धर्मीय असो वा नसो त्यांच्या डोक्यावर कापड बांधून पाय धुण्याची अट पूर्ण केली कि मला त्यांच्या धर्मस्थानात जाऊन दर्शन घेता येते. मी स्त्री आहे पुरुष आहे कोणत्या वर्ण धर्म पंथाचा आहे याने सहसा फरक पडत नाही. अशाच पद्धतीने इतर धर्मीय स्थळांमध्ये कुणीही आदर पुर्वक दर्शन/प्रार्थना करू इच्छित असेल तर त्यासाठी मुभा असावयास हवी आणि त्यासाठीचे आग्रह तुम्ही नास्तीक असाल अथवा इतर धर्मीय असाल तरीही सोडू नयेत कारण तुम्ही धरत असलेला आग्रह सुसंस्कृततेसाठी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सामाजीक समस्यांच्या संदर्भाने मी मागेही धागा काढला होता, तुम्ही धर्मस्थळात जाऊन प्रत्येक वेळी पुजा केली पाहीजे असे नाही पण एकदा तो अधिकार प्राप्त झाला की बाकी समाजात समतेच्या वागणूकीची खात्री करणे सोपे जाऊ शकते. मी आफ्रीकन ख्रिश्चन असेन तर काळ्यांच्या चर्च मध्ये जाउन तडजोड करेन पण दुसर्‍या समुदाया पासून तुटलेलाच राहीन ही जी सामाजीक दरी आहे ती सांधण्यासाठी म्हणून मला ऑदरवाईज रस नसला तरी गोर्‍यांच्या प्रत्येक चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करून येण्यास आवडेल. अर्थात आपण लाथ वगैरे शब्द सात्वीक रागाने जरी वापरला असला तरी आदरणीय उद्देशाने न येणार्‍यांना नाकारण्याचा एक वेगळा अधिकार धार्मीक स्थळांना प्राप्त होऊ लागतो याने सामाजीक दरी सांधण्यास मदत होते असे वाटत नाही म्हणून असे शब्द टाळावेत किंवा कसे.

In reply to by माहितगार

संदीप डांगे 30/11/2015 - 22:26
आता पुरेसा वेळ हाताशी नसल्याने तुमच्या प्रतिसादाचं उत्तर नंतर देईल वा वेगळा धागा काढेन, कारण इथे दलितप्रश्नावर चर्चा करणे मूळ धाग्याशी, विषयाशी प्रतारणा होइल. पण खालील मुद्द्यावर माझं मत मांडतो.
अर्थात आपण लाथ वगैरे शब्द सात्वीक रागाने जरी वापरला असला तरी आदरणीय उद्देशाने न येणार्‍यांना नाकारण्याचा एक वेगळा अधिकार धार्मीक स्थळांना प्राप्त होऊ लागतो याने सामाजीक दरी सांधण्यास मदत होते असे वाटत नाही म्हणून असे शब्द टाळावेत किंवा कसे.
'विशिष्ट मंदिरातच जागृत देव असतात' ही इतकी तकलादू आणि भ्रामक कल्पना भारतीय समाज कवटाळून बसला आहे की आपण एकाच बाबतीत वेगवेगळे विचारप्रवाह एकाच वेळी पाळत आहोत ते त्यांच्या लक्षात येत नाही. १. मनुष्य देवळात जातो. कारण देवाप्रति त्याला आपली भक्ती, श्रद्धा अर्पण करायची असते, आपले दु:ख, सुख याचे कारण तोच आहे असे समजून एक मालक-पालक-मित्र-सखा म्हणून त्याच्याशी गुजगोष्टी करायच्या असतात. आपले गार्‍हाणे सांगायचे असते, त्यावर त्याने काहीतरी करावे अशी अपेक्षा असते. थोडक्यात मंदीर हे एका व्यक्तिचे असते. भक्त तिथे स्वतःपुरते लाभ घेण्यासाठी जातो. अखंड समाजासाठी नाही. ते राजे, सत्ताधारी वैगेरे करतात. पण व्यक्तिगत पातळीवर देव हा वैयक्तिकच असतो. २. मंदिरात एक व्यवस्था असते, देवाची काळजी घेण्याची. त्याचे षोडशोपचार, पुजाअर्चा, आरत्या नैवेद्ये वैगेरे करणे गरजेचे असते. त्याची समाजातल्या एका व्यक्तिवर जबाबदारी टाकल्या जाते. परंपरेने वा कसेही चालत आलेले नियम, अटी हे गुरव, पुजारी, पुरोहित पाळत असतात जेणेकरुन 'देवाचे हित' जपल्या जावे. ह्यात स्त्रियांनी प्रवेश करू नये, रजस्वला स्त्रीने प्रवेश करू नये, अमूक जातीतल्या माणसाने प्रवेश करू नये असे नियम असतात. त्याची कारणे दैवी वैगेरे असतात. भारतात अशी बरीच मंदीरे आहेत जी विशिष्ट जातीची, उपजातीची आहेत. त्यांच्याशिवाय तिथे दुसर्‍या कोणाला प्रवेश नसतो. 'स्थानाची पवित्रता' जपणे हा उद्देश असतो. ही पवित्रता, नियम परंपरेने जसे आले तसे, थोडेसे आपल्याला सोयिस्कर ठरतील असे करत पुरोहित, गुरव पाळतात. इथे देव व पुरोहित यांचे हिताला प्राधान्य आहे, भक्तांच्या नाही. आमच्या कुलदैवतेच्या गाभार्‍यात पुरुषांना प्रवेश नाही, तिथे सगळे षोडशोपचार, विधी फक्त स्त्रिया करतात. ३. भारतीय मंदिरांचा इतिहास पाहू जाता. पुरातन मंदिरे व्यक्तिगत उपयोगासाठी, ध्यानपुजाअर्चेसाठी बांधलेली आहेत. गाभार्‍यांची रुंदी एकाच व्यक्तिला सहज बसता येईल अशी आहे. एक असाही संशय आहे की काही महत्त्वपूर्ण ज्ञान, वस्तू इथे सांभाळून ठेवलेल्या आहेत. मंदीर हे अतिशय व्यक्तिगत साधनेचे स्थळ आहे. कोणा राजाने, प्रधानाने, मंत्र्याने, सरदाराने स्वतःचे पैसे घालून एक चांगली जागा तयार केली असते. तीथे त्याने वा अजून कोणा तंत्रमंत्रात कुशल पुजार्‍याने पुजा करून वातावरण, जागा मंतरलेली असते. नित्य साधनेने तिथे एक जाणवेल असे वातावरण तयार होते. तिथे शांती लाभते. मग त्या जागेच्या दैवीपणाचे किस्से बाहेर पडतात. पण हे सगळे व्यक्तिगत आहे. त्यामुळे अशी व्यक्तिगत जागा कुठेही तयार करता येऊ शकते. पण ते वातावरण तयार करणे चटकन, झटपट होणारे काम नाही, त्यास कित्येक वर्षांची अखंड तपस्या लागते. अनिर्बंध हेळसांडीने ते वातावरण नाहिसे होऊ शकते. त्यामुळे अशी मंदीरे लोकांपासून सुरक्षित ठेवणे आले. त्यातून नियम बनले. पण जागृत देवस्थान म्हटले गेल्यावर जनसामान्यांना तेच पावरफुल वाटते आणि लोकांचा गार्‍हाणे मांडण्यासाठी तिकडेच ओढा असतो. ४. इतर धर्माच्या प्रार्थळास्थळांशी अजिबात तुलना करू नये कारण हिंदू हा व्यक्तिगत धर्म(आचरण) आहे. इतर धर्म हे सामुहिक धर्म आहेत. चर्च, गुरुद्वारा, मशीद इथे आपणास एकसमानता दिसून येईल की अनेक लोकांना एकत्र बसता येईल असा हॉल असतो. जिथे प्रार्थनास्थळ बांधतांनाच समाजाचा विचार केला गेला आहे तिथे 'कुणास मनाई करावी' हा विचारच मुलतः येणार नाही हे सरळ आहे. काळ्यांसाठी वेगळे चर्च असतील तर ते सरळ डिस्क्रिमीनेशन आहे. (आजकाल म्हणजे गेल्या वीस-तीस वर्षांतील नवीन मंदीरांच्या रचना बघितल्या तर आता समुहासाठी अशी खास मंदीरे गाव-शहरामधे चर्चच्या शैलीत बांधली जाऊ लागली आहेत. ज्यात हॉल बराच मोठा असतो, देवाची मुर्ती भींतीला टेकलेली असते, गाभार्‍यात पुजारी आणि दानपेटी राहील एवढीच जागा असते. देवाला स्पर्श करू शकत नाही. इथे आता एक क्रांती घडलेली आहे. या प्रकारच्या मंदिरांमधे कुणालाही प्रवेश बंदी नसते.) ५. देव चराचरात आहे, ज्याला जिथे भाव प्रकट होईल देव तिथे प्रकट होतो. म्हणून इथे-तिथे कुठेही दगडाला शेंदूर फासून अगरबत्ती लावलेली दिसून येते. मरीआई, म्हसोबा, सटवाई, आसरामाता, अशा जनसामान्यांच्या श्रद्धा स्विकारत भारतात लाखो ठिकाणी आहेत. इथे येता जाता कोणी नमस्कार करू शकतो. अगदी गायींपासून ते झाडांपर्यंत लोक दर्शनं घेत असतात. तिथं कोणालाही बंदी नसते. स्त्री, रजस्वला, दलित, कोणीही निषिद्ध नसतो. कारण तो सर्वांचा देव असतो, 'निसर्गदेव' असतो. असे सगळे आहे तर मग लक्षात येईल की काही विशिष्ट मंदिरांमधेच प्रवेशबंदी का? पण अशी प्रवेशबंदी असलेली मंदीरे किती आहेत? असली तरी ती खाजगी मालकीची किंवा विशिष्ट जातींसाठीची आहेत. तिथे त्यांचेच नियम चालणार. या नियमांविरुद्ध अपील होऊच शकत नाहीत त्याचे कारणे कितीही मूर्ख वा अवैज्ञानिक असली तरी. ते तिथे भेट द्यायला जाणार्‍यांना मान्य असलीच पाहिजेत. कारण नाहीतर विसंगती निर्माण होईल. जी शशीं प्रकरणात झाली, सबरीमाला प्रकरणात झाली. तुम्ही शनिदेवाला मानता पण त्याचे नियम नाही. हे मजेशीर आहे. त्यामुळे मंदिरांमधे प्रवेशबंदीला मी समर्थन देतो. एखादा देव मी मानतो तर त्याचे सगळे नियम मला मान्य असलेच पाहिजेत. शिवपिंडीवर मी मेणबत्ती नाही लावणार किंवा चादर नाही घालणार. व्यक्तिस्वातंत्र्याच्या, सन्माननीय वागणुकीच्या नावाखाली मला हे सर्व करण्याचा अधिकार आहेच. पण तो मूर्खपणा आहे ना? यावर उपाय काय? तर देव चराचरात आहे. प्रत्येक घरी गणपती बसतो, प्रत्येकाच्या घरच्या गणपतीत सेम देवत्व येतं. लाखो ठिकाणी शिवालयं, राममंदीरं आहेत, सगळीकडे प्राणप्रतिष्ठापना केलेले देव आहेत. मग दलितांनी, स्त्रियांनी आपल्यासाठी मंदीर बांधून घ्यावं, तिथेही तोच देव, तेच वातावरण करावं आणि सिद्ध करावं की देव ठायीठायी आहे, तुम्ही त्याला तुमच्या मंदिरात डांबुन ठेवुन मूर्खपणा करत आहात. पण असे होत नाही, झाले नाही. रजस्वला स्त्रियांना प्रवेशबंदी हा एक तांत्रिक मुद्दा बाजूला ठेवला तर दलितांना मंदिरात प्रवेश हा अनेक प्रश्नांना जन्म देणारा आहे. दलितांना मंदिरप्रवेश नाकारणे हा सरळ सरळ सामाजिक भेदभावाचा प्रश्न आहे. तो काही एका दिवसात तयार झालेला नाही. मंदिरात प्रवेश आहे म्हणून फार उचित सन्मान मिळतो असेही नाही हे देवदासींकडे, वाघ्यामुरळी, इत्यादींकडे बघुन कळते. त्यामुळे मंदिरात प्रवेश म्हणजे लगेच पाटील-ब्राहमणांच्या पंगतीत जेवायला मिळेल, त्यांच्या स्वयंपाकघरात प्रवेश मिळेल असे काही नव्हते, आणि झालेही नाही. (शहरातली उदाहरणे देऊ नये) ज्या देवाचा धर्म आपल्यासारख्या माणसाशी अमानुष वागण्याचे नियम बनवतो तो देव आपण कशाला मानावा हा विचार रुजवणे आवश्यक होते. जे आंबेडकरांनी अगदी योग्य पद्धतीने केले. जिथे आपल्याला सन्मान नाही तिथे जावेच कशाला हा साधा प्रश्न माझ्या 'लाथ' या शब्दामागे आहे. तुम्ही पाण्याचे उदाहरण दिले. तडजोडीबद्दल बोलत आहात. ज्या देशात रोटी-बेटी व्यवहार आपल्याच पोटजातीत व्हावे हा आग्रह असतो, तिथे मंदिरप्रवेशाने फार काही बदलत नाही. लोकांना आपल्याच जातीत, पोटजातीत मुली, मुलं बघावी लागतात. कितीही समकक्ष, समविचारी, जीवश्चकंठश्च मित्र असले तरी दोन वेगळ्या जातीत अरेंज मॅरेज होऊ शकत नाही हे स्वता:च्या डोळ्यांनी पाह्यलंय. इथे जी केली जाते ती अप्रत्यक्ष तडजोड नाही का? जात बंद, देव बंद, पंगत बंद अशा समाजाला 'लाथ' नाही मारायची तर का पूजा करायची काय? ह्याच सगळ्याला कंटाळून गावातील लोकांचा ओढा शहरांकडे वाढत असणे हे एक प्रकारे लाथ मारणेच आहे, तडजोड नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. बाकी माझ्या मतांशी प्रत्येकाने सहमत व्हावे असे नाहीच. तरी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 01/12/2015 - 11:13
अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला.. देवाच्या नावावर चालणार्‍या भ्रष्ट आचारा बद्द्ल तुमची स्वत:ची काही मते असतील. तुमच्या मतस्वातंत्र्याचा आदर आहे. परंतु दुसर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असली विधाने करणे कृपया टाळा. "सश्रद्ध लोकांनी अंगावर येउ नये" असा स्वतःच कांगावा करत तुम्ही हे असले काहितरी लिहयचे आणि आम्ही ते निमूटपणे वाचुन घ्यायचे ही अपेक्षा चुकीची आहे. यापुढे आपल्याला जे काही समाज प्रबोधन करायचे आहे ते योग्य शब्दात, योग्य भाषेत आणि योग्य प्रकारे कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे 01/12/2015 - 11:53
मागचे पुढचे काही न वाचता एक शब्द उचलून कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील सर्वस्वी अशक्य आहे. प्रतिसादात स्पष्ट लिहलंय की "जो देव तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या देवाला लाथ मारा." ज्यांना त्यांचा देव हे सगळे करतो (म्हणजे जवळ करतो, दु:ख दुर करून सुख-सन्मान-शांती देतो) अशी खात्री-विश्वास-श्रद्धा आहे त्यांच्या भावना दुखावणारं हे विधान आहे असं कसं काय ठरवलं जातंय? हे म्हणजे असं झालंय की मी म्हटलं, 'दारू पिणार्‍यांना चाबकाने फोडून काढलं पाहिजे' त्यावर 'दुध' पिणार्‍यांनी आक्षेप नोंदवावा का तर तिथे 'पिणार्‍यां'चा उल्लेख केला म्हणून. कुठल्याही विशिष्ट देवाचे नाव न घेता विधान केलं आहे, त्यात अशा देवाचं वर्णन आहे जो 'देव' ह्या सश्रद्धांच्या संकल्पनेत बसत नाही. मग त्यांच्या धार्मिक भावना का दुखावतात? शंकराला शिवी दिली तर मुस्लिम रागावतील काय? अल्लाहला शिवी दिली तर हिंदु रागावतील काय? जिजसला शिवी दिली तर जैनांना राग येईल काय? माझं विधान धार्मिक भावना दुखावणारं कसं आहे ते पटवून दिलंत तर तुमच्या अपेक्षेबद्दल विचार करता येईल. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे 01/12/2015 - 11:55
हे वाक्य असे वाचावे: मागचे पुढचे काही न वाचता एक शब्द उचलून कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील तर सर्वस्वी अशक्य आहे.

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 01/12/2015 - 12:42
"जो देव तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या देवाला लाथ मारा." डांगे साहेब हेच विधान जर आपण असे वाचले तर? "जो "बाप" तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या "बापाला" लाथ मारा." असे पटेल काय? आपण नास्तिक असाल पण शेवटी प्रत्येक माणसाची एक श्रद्धा असते( ती असणे बरोबर कि चूक हा एक वेगळा मुद्दा असू शकतो) त्याला आपण इतक्या सहज ठोकर मारता हे पटले नाही.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 01/12/2015 - 13:22
डॉक्टरसाहेब, जो "देश/समाज/धर्म" तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या "देश/समाज/धर्माला" लाथ मारा. असंही वाचून बघा. मला नक्की काय म्हणायचे ते लक्षात येईल अशी अपेक्षा आहे.

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 01/12/2015 - 12:49
आपल्याकडून अश्याच आक्रस्ताळ्या प्रतिसादाची अपेक्षा होती. तुम्ही तुमची वाक्य नीट वाचत नाही किंवा तुम्ही काय लिहिता ते तुमचे तुम्हाला कळत नाही. किंवा कदाचित मुद्दाम वाद निर्माण करण्यासाठी तुम्ही असले वाचाळ प्रतिसाद देता. पहिली गोष्ट म्हणजे तुमची दोन्ही वाक्ये वेगळी आहेत. ती एकत्र करुन लिहिली असतीत तर कदाचित वरचा प्रतिसाद तरी ग्राह्य धरला असता. दुसरी गोष्ट म्हणजे "लाथ मारा देवाला" हे पुर्णपणे अमान्य, अग्राह्य, अस्थायी आहे. तुम्हाला तुमच्या देवाबद्दलच्या भावना योग्य शब्दात मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे. पण देवाला लाथा मारा, त्याच्यावर थुंका, मुता (उरलेले दोन शब्द तुम्ही लिहिलेले नाहित. ते उदाहारणार्थ दिले आहेत) असली अग्राह्य भाषा ही मुळात एखाद्याच्या श्रद्धेबद्दल असलेली कमालीची असहिष्णुता दर्शवते. तुम्हाला तुमचा नास्तिकपणा गोंजारत बसण्याचा पुर्ण अधिकार आहे. मात्र हे करताना आस्तिकांच्या भावनेविषयी अनादर दाखवणे हे हीनपणाचे लक्षण आहे. चूक स्पष्टपणे दाखवल्यावर ती मान्य करुन दुरुस्त करण्यापेक्ष दुरुत्तरे करणे, वाद घालणे, आक्रस्ताळेपणा करणे हाच जर तुम्ही तुमचा युएसपी करु इच्छित असाल तर नाईलाज आहे. योग्य त्या भाषेत सर्वांनाच उत्तरे देता येतील. मात्र हे करताना "देवाला लाथा घाला" असली दळभद्री भाषा वापरणे किंबहुना कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी उगाच काड्या सारण्यासाठी असंस्कृत भाषा वापरणे आमच्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे प्रतिवाद करताना थोड्या मर्यादा जरुर येतील पण मलातरी पातळी सोडुन बोलणे शक्य होणार नाही. कुठल्याही विशिष्ट देवाचे नाव न घेता विधान केलं आहे, त्यात अशा देवाचं वर्णन आहे जो 'देव' ह्या सश्रद्धांच्या संकल्पनेत बसत नाही. मग त्यांच्या धार्मिक भावना का दुखावतात? शंकराला शिवी दिली तर मुस्लिम रागावतील काय? अल्लाहला शिवी दिली तर हिंदु रागावतील काय? जिजसला शिवी दिली तर जैनांना राग येईल काय? माझं विधान धार्मिक भावना दुखावणारं कसं आहे ते पटवून दिलंत तर तुमच्या अपेक्षेबद्दल विचार करता येईल. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल. तुम्ही कुठल्याही विशिष्ट धर्माचे नाव घेतले नाही म्हणुभाते धार्मिक भावना न दुखावणारे विधान आहे हा तर्क अजब आहे. देव ही वैश्विक संकल्पना आहे. किंबहुना जगातल्या ९९% धर्मांचा गाभा देव हाच असेल. देवाला कुठल्या स्वरुपात पहायचे याबद्दलचे प्रत्येक धर्माचे निकष वेगळे असु शकतील. पण म्हणुन देव ही संरचना नाकारता येतच नाही. एखाद्या अज्ञेयवाद्यासाठी देवाचे अस्तित्व नसणे हा समज योग्य असु शकतो पण जगाच्या पाठीवरील बहुसंख्य धर्मात देवाचे अतित्व मान्यच आहे. तुम्ही या संरचनेला उद्देशुनच "लाथा घाला" असे म्हटले आहे. इथे ते हिंदुंच्या देवासाठी म्हटले किंवा मुसलमानांच्या देवासाठी म्हटले हा मुद्दा पुर्णतः गैरलागू आहे. किंबहुना मुस्लिमांच्या देवासाठी बोललात तर धार्मिक भावना दुखावणार नाहित आणी हिंदुंच्या देवाबद्दल बोललात तर दुखावतील असेही काही नाही. वाटल्यास "मुस्लिमांचा देव" असे स्पष्टपणे लिहुन मग त्याला "लाथा घाला" असे वक्तव्य खुषाल करुन पहा. मला ते ही आवडणार नाही. पण तुम्हाला प्रयोग करुन बघायचा असेल तर करा की. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल. गंमतच आहे. कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली. उद्या तुम्ही म्हणाल की माझ्या वरील विधानावरुन माझा स्त्रीशिक्षणाला विरोध आहे असे समजावे लागेल. आता असल्या फालतु तर्कांना मी कं क्रवे ब्रं? ज्याची त्याची जाण समज वगैरे वग्रै.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे 01/12/2015 - 13:18
पण देवाला लाथा मारा, त्याच्यावर थुंका, मुता (उरलेले दोन शब्द तुम्ही लिहिलेले नाहित. ते उदाहारणार्थ दिले आहेत) हे अतिशय चिंताजनक आहे. आपण एखादं विधान कुठल्या बाजूने झुकणारं आहे हे स्वतःच ठरवून मो़कळे होता हे आधी मंत्रीमंडळाच्या विधानाबद्दल जे झालं तिथेच लक्षात आलं. इथेही तेच. ज्या वाक्याचा साधा अर्थ देवाला बंदिस्त करणार्‍या व्यवस्थेला नाकारा इतकाच अभिप्रेत आहे. 'लाथ घाला' म्हणजे तिथे जाऊन प्रत्यक्ष मुर्तीवर लाथ घाला असेच म्हटले असे तुम्ही कशावरून ठरवले? त्या विधानाला दुसर्‍या बाजूने ढकलत नेऊन 'थुंका-मुता' इथपर्यंत घेऊन जाणे, वरून मला असंच म्हणायचे होतं असे अर्थ काढणे म्हणजे वा! तुमची 'देव ह्या संकल्पनेला विरोध करणार्‍यांबद्दलची' स्वतःची मते माझ्यावर लादू नये अशी प्रांजळ प्रार्थना. कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली हेच तुम्हाला आणि इतरांना ज्यांनी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला त्यासाठी म्हणावेसे वाटते. माझे इतर धाग्यांवरचे ह्याच विषयाशी संबंधीत प्रतिसाद आपण वाचलेले नाहीत असे दिसते. तसेच माहितगार यांना जो प्रतिसाद दिला व त्याचे शेवटचे वाक्य उतावीळपणाच्या भरात आपण वाचलेले नाही असेही दिसते. अन्यथा आपण असा प्रतिसाद टाकलाच नसता. बाकी कोणत्या प्रॉडक्टचा युएसपी काय असावा हे कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार ठरते हे आपणास मी काय सांगावे. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 01/12/2015 - 14:42
हे अतिशय चिंताजनक आहे. आपण एखादं विधान कुठल्या बाजूने झुकणारं आहे हे स्वतःच ठरवून मो़कळे होता हे आधी मंत्रीमंडळाच्या विधानाबद्दल जे झालं तिथेच लक्षात आलं. इथेही तेच. तुम्ही काय लिहिता ते तुमचे तुम्हालाच कळत नाही वगैर वगैरे जे मी वरती लिहिले आहे. त्याचा संदरभ मंत्रिमंडळाचा धागच होता. तिथेही तुम्ही चुकीचे लिहुन माती खाल्ली आणि मग सारवासारव केली. इथेही तेच करत आहात. तुम्ही चुकीच्या प्रकारे लिहिता म्हणुन आम्हाला कळफलक बडवावा लागतो. ज्या वाक्याचा साधा अर्थ देवाला बंदिस्त करणार्‍या व्यवस्थेला नाकारा इतकाच अभिप्रेत आहे. 'लाथ घाला' म्हणजे तिथे जाऊन प्रत्यक्ष मुर्तीवर लाथ घाला असेच म्हटले असे तुम्ही कशावरून ठरवले? तुम्ही जे लिहिले आहे तेच मी उद्ध्रूत करतो आहे. तुम्ही स्पष्ट शब्दात "अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला.." असे लिहिले आहे. इथे "लाथा मारा" आणि "च्यामायला त्या" या दोन्ही शब्दसमूहांना माझा आक्षेप आहे. आणि तुम्ही जे लिहिले आहे तेच मी परत टंकले आहे. तुम्ही स्पष्ट लिहित जा म्हणजे नंतर असली सारवासारव करावी लागणार नाही. तुम्ही चुकीचे लिहित आहात आणि वर कांगावा करत आहात. हे पहिल्यांदा होते आहे असे नाही. पण इतर वेळेस तो मनुष्यस्वभाव म्हणुन सोडुन देता येइल. इथे धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये जाणुनबुजुन करुन तुम्ही वातावरण दूषित करत आहात. त्या विधानाला दुसर्‍या बाजूने ढकलत नेऊन 'थुंका-मुता' इथपर्यंत घेऊन जाणे, वरून मला असंच म्हणायचे होतं असे अर्थ काढणे म्हणजे वा! बघा. तुम्हीच किती आक्रस्ताळेपणा करत आहात. मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही 'थुंका-मुता' लिहिलेले नाही. लाथा घाला हे काही फार वेगळे वक्तव्य आहे असे नाही. बाकी मी अर्थ काहिच काढलेला नाही,. तुम्ही स्पष्टपणे लिहिलेले आहे. "तु गाढव आहेस. कुत्रा आहेस तु" असे लिहायचे आणि वर तोंड करुन म्हणायचे की "तु गाढवासारखा कष्टाळु आणि कुत्र्यासारखा प्रामाणिक आहेस असे मला म्हणायचे होते. तु चुकीचा अर्थ काढतोस" तर ती निव्वळ सारवासारव झाली. इथे स्पष्ट शब्दात "लाथ मारा च्यायला त्या देवाला.." असे लिहिले आहे तुम्ही. अर्थ काढायला पण वाव नाही ठेवलेला. तुमची 'देव ह्या संकल्पनेला विरोध करणार्‍यांबद्दलची' स्वतःची मते माझ्यावर लादू नये अशी प्रांजळ प्रार्थना. मी कुठलीही मते लादत नाही आहे. तुम्ही ओझे वाहत चालला आहात त्याला मी काय करणार? कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली काहीही बोलण्याची हद्द तर तुम्ही केली आहे. माझे इतर धाग्यांवरचे ह्याच विषयाशी संबंधीत प्रतिसाद आपण वाचलेले नाहीत असे दिसते. तसेच माहितगार यांना जो प्रतिसाद दिला व त्याचे शेवटचे वाक्य उतावीळपणाच्या भरात आपण वाचलेले नाही असेही दिसते. अन्यथा आपण असा प्रतिसाद टाकलाच नसता. स्वतः उतावीळपणे बेताल वक्तव्ये करायची आणी मग चोर तो चोर वर शिरजोर या न्यायाने तोंड वर करुन बोलायचे ही सवय आपली असावी. आमची नाही. बाकी कोणत्या प्रॉडक्टचा युएसपी काय असावा हे कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार ठरते हे आपणास मी काय सांगावे. प्रॉडक्टचा युएसपी प्रॉडक्टवरच ठरतो. त्यातले इंप्रोव्हायझेशन कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार होते.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे 01/12/2015 - 15:05
मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही 'थुंका-मुता' लिहिलेले नाही. लाथा घाला हे काही फार वेगळे वक्तव्य आहे असे नाही. बाकी मी अर्थ काहिच काढलेला नाही,. तुम्ही स्पष्टपणे लिहिलेले आहे.
तुम्हाला हिस्टरी चॅनलवरचा हा माणूस आठवतो काय? अगदी असंच बोलतो. cc

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 01/12/2015 - 19:50
नाय ब्वो. आम्हाला काही असला कोणी माहिती नाही. पण वरचा तो फोटो बघुन कळाले की तुम्ही फक्त चुकीचे लिहितच नाही तर चुकीचे अर्थ पण काढता. तुम्ही जरा मराठी भाषा समजुन उमजुन लिहित चला बरे म्हणजे तुमच्याच डोक्यात गोंधळ कमी उडेल.

नूतन सावंत 30/11/2015 - 19:03
यावरून इंदिरा गांधीन पंतप्रधान असतानाही तिरुपती मंदिरात जाण्यास विरोध झाला होता त्याची आठवण झाली.तेव्हा इंदिरा गांधी मंदिरात न जाता परत गेल्या होत्या त्याची आठवण झाली.

In reply to by नूतन सावंत

बोका-ए-आझम 30/11/2015 - 19:45
केरळातील गुरुवायूर येथील प्रसिद्ध अय्यप्पा मंदिरात हा विरोध झाला होता. त्याचं कारण ते कार्तिकेयाचं (जो अखंड ब्रम्हचारी समजला जातो) मंदीर आहे असं सांगण्यात आलं होतं. तिरुपती मंदिरात असं काही असल्याचं पाहण्यात किंवा ऐकण्यात आलेलं नाही. चूभूद्याघ्या.

In reply to by नूतन सावंत

राही 01/12/2015 - 10:17
मला वाटते उडीशातल्या जगन्नाथ मंदिरात(ही) असा विरोध झाला होता. त्यांच्या हत्येआधी एक दोन दिवस. इंदिरा गांधींचे शेवटचे जाहीर भाषण या उडीशा दौर्‍यातले होते आणि 'माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून भारताला संजीवन मिळेल' या अर्थाच्या शब्दांमुळे कायम स्मरणात राहाण्याजोगे झाले आहे.

अजून एक गोष्ट दैनिकात वाचण्यात आली की भारतातील शंभर टक्के साक्षर म्हणुन मिरवणार्‍या केरळ राज्यातील घटना. आपण अजूनही मानसिकरित्या कसे विकलांग आहोत हे दर्शविणारी ही घटना. केरळमधील पठाणमधिटा जिल्ह्यात असणार्‍या सबरीमला मंदिराचे विश्वस्त यांनी एका मशीनची मागणी केली आहे. हे स्कॅनिंग मशीन मंदिराच्या सुरक्षेसाठी असेल असे वाटले परंतु तसे ते नाही. तर या मशीनद्वारे महिलांची पवित्रता सिद्ध केली जाणार आहे. मंदिर विश्वस्तांना असे वाटते की मासिक धर्माच्या काळात स्त्रीया अस्वच्छ आणि अपवित्र असतात. आता स्कॅनिंग करणारं मशिन मासिक धर्म असणार्‍या स्त्रीया ओळखणार आहे. आणि अशा ओळखलेल्या गेलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. कारण अशा विटाळलेल्या महिलांमुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता वाटते. जी गोष्ट नैसर्गिक आहे त्यामुळे देवालाही विटाळ होतो ? स्त्रीयांनी या गोष्टीला विरोध म्हणुन हॅपी टू ब्लीड ही चळवळ सुरु केलीच आहे. आपण ब्वॉ ही गोष्ट सबरीमला देवावर आणि शनिमहाराजावर सोडून दिली आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सतिश गावडे 30/11/2015 - 22:39
दुर्दैव... मंदिरातील देवाचं आणि त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ इच्छिणार्‍या स्त्रीयांचं.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

pacificready 30/11/2015 - 23:09
विश्वस्तांचा निषेध. बुद्धीची कीव कराविशी वाटते. देवस्थान सुधारा भगव्यान्नो आधी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करेक्ट ! पुरोगामी विचारांच्या लोकांनी ह्यॅप्पी टु ब्लीड वगैरे आंदोलने करत बसण्यापेक्षा असल्या दगडाच्या देवावर आणि संस्थानांवर बहिष्कार टाकावा . ह्याचे दुहेरी फायदे आहेत पुढील प्रमाणे १) पुरोगामी लोकांन्ना पुरोगामित्वाचा आनंद आणि समाधान मिळेल. २) परंपरावादी लोकांन्ना मंदीरात गर्दी कमी झाल्याचा अन निवांतपणे दर्शन घेता आल्याचा आनंद मिळेल. आणि एकच की परंपरावादी लोकांनी स्वतःच्या हुच्चतेची जाहिरात करु नये अन पुरोगामी लोकांनी त्यांन्ना चणे फेकुन मारु नयेत , बस्स इतकेच जमले तर सर्वेत्र सुखिनो सन्तु: हे साध्य होईल !! :)

गामा पैलवान 30/11/2015 - 23:25
च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे उमाळे दाटल्यावर संबंधितांना हिंदूंची मंदिरेच बरी आठवतात! एव्हढाच जर पुळका आला असेल तर स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी म्हणतो मी. कोणी अडवलंय! -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 01/12/2015 - 10:48
च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे उमाळे दाटल्यावर संबंधितांना हिंदूंची मंदिरेच बरी आठवतात!
आपण धागालेख नीट वाचला आहेत का ? स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करताना हा धागालेख कोणत्याही एकाच विशीष्ट धर्माला लक्ष्य बनवत नाही हे लेखाच्या शेवटी स्पष्ट नमूद केले आहे, अशा स्वरूपाच्या असमानता राखणार्‍या सर्वच धर्मसंस्थांच्या प्रबोधनाचे आवाहन या धागालेखातून आवाहन केले आहे. शनि शिंगणापूर हे केवळ चर्चा सुरवातीसाठी निमीत्तमात्र आहे. केवळ शनि शिंगणापूरला लक्ष्य बनवायचे असते तर धागा लेखाचे शीर्षक तसे लिहिले असते, ध्रर्मसंस्था आणि धर्मस्थळे संबंधाने पक्षपात टाळण्याचा अधिकतम प्रयास केला आहे.
एव्हढाच जर पुळका आला असेल तर स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी म्हणतो मी. कोणी अडवलंय!
गा.पै. आपल्या या वाक्याचा नेमका अर्थ लक्षात आला नाही अर्थ काय होतो ते कृपया स्पष्ट कराल काय ? म्हणजे इतरांना चर्चा करता येईल

In reply to by माहितगार

गामा पैलवान 01/12/2015 - 19:59
माहितगार, माझं म्हणणं अधिक व्यवस्थित शब्दांत मांडता आलं असतं. ते न केल्यामुळे तुमची आणि वाचकांची क्षमा मागतो. १.
स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करताना हा धागालेख कोणत्याही एकाच विशीष्ट धर्माला लक्ष्य बनवत नाही हे लेखाच्या शेवटी स्पष्ट नमूद केले आहे,
बरोबर आहे. जे लोकं मंदिरांतल्या विविध प्रथांना स्त्रीपुरुष भेदभावाचा रंग देऊ इच्छितात त्यांच्यासाठी माझा प्रतिसाद आहे. धागाकर्त्यासाठी नाही. २.
आपल्या या वाक्याचा नेमका अर्थ लक्षात आला नाही अर्थ काय होतो ते कृपया स्पष्ट कराल काय ? म्हणजे इतरांना चर्चा करता येईल
जिथेतिथे स्त्रीपुरुष समानता बघायची ज्यांना हौस आहे त्यांनी स्वत:च्या शरीराकडे बघायला शिकावं. आपलं शरीर आणि मन हेच मुळी स्त्रीपुरुष भेदभावावर आधारलेलं आहे. उगाच मंदिरबिंदिर अशा बाह्य ठिकाणी समानता पैदा करण्याऐवजी स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी. आ.न., -गा.पै.

एस 30/11/2015 - 23:36
'देव दानवां नरे निर्मिले' आणि त्यांचे नियमही. देव जर असलाच तर त्याच्यापाशी कसला भेदभाव असूच कसा शकेल? शनिशिंगणापूरच्या गावकर्‍यांनी शनिदेवाला दुधा-तेलाचा अभिषेक घालून स्वतःच्या कोतेपणाचे दर्शन घडवले आहे. देवाला विटाळ घडविणारीही माणसेच. आणि देवाचे शुद्धीकरण करणारीही माणसेच! अजब आहे सगळे...

In reply to by एस

सर्वच प्रस्थापित धर्मांमधे एक अनुस्यूत घटक म्हणून हा दुजा-भाव पहिल्या पासून आहे....ज्याना बदलायच आहे त्यानी बिनदिक्कत बदलाव.. धर्म आपोआप बदलेल..ज्याना जाणीव पूर्वक मागास रहायच असेल,त्यांना राहु द्यावे. ते आपोआप गाळात जातील. दुसरे धर्म बदलत नाहीत,मग आम्ही तरी का बदलाव? अस म्हणणाय्राना तर बदलाची इच्छा असलेल्यानी मुद्दाम स्वत: बदलून त्याची ताकद कमी करावी. जोपर्यंत इथे लोकशाही आहे , तो पर्यंत हे सहज शक्य आहे

In reply to by अत्रुप्त आत्मा

हो , व्यक्तिगत पातळीवर सत्यनारायणासारखी सरळ सरळ लुबाडणुक करणारी पुजा अन अन्य कर्मकांडे संपुर्णपणे बंद करणे आम्हाला जमले आहे :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

माहितगार 01/12/2015 - 11:45
@ अत्रुप्त एक चांगाला प्रतिसाद, असा प्रतिसाद देण्यासाठी धारीष्ट्य लागते. बाकी प्रगोंंच्या प्रतिसादाबाबत; सत्यनारायण कथेत कुठे दुजाभाव असण्याबद्दल अजून एकदा अभ्यासावी लागेल पण तरीही -सत्यनारायण कथेतील काही विश्वास तुर्तास बाजूस ठेवले तर- सत्यनारायण सर्वांचा समान सहभाग वाढवण्यास उपयूक्त आहे का त्या बाबत त्यात भेदभाव कमी असावा अंदाजा आहे जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by कवितानागेश

संदीप डांगे 01/12/2015 - 09:50
धागालेखकांनी एकाच धाग्यात दोन वेगवेगळे मुद्दे मांडलेत. मला तरी दोन्हींची सांगड कशी घालावी हे कळले नाही. माझ्यामते 'समानतेचे तत्त्व' पुरुषवर्गाला समजावून सांगण्यात स्त्रिया कमी पडतात असे त्यांना म्हणायचे आहे. आता समानतेचे तत्त्व न पाळणार्‍यांमधे स्त्रि-पुरूष असा काही भेद दिसून येत नाही. त्यामुळे तो मुद्दा रद्दबातल होतो. बहुतेक 'पुरूषांसोबत अर्ग्युमेंट मधे स्त्रिया कमी पडतात' असे त्यांना म्हणायचे आहे काय असा मला प्रश्न पडला कारण मग हा जरा गंमतीदार विषय होइल. शिर्षक वादग्रस्त असावे याचसाठी केला होता अट्टाहास असे वाटत आहे. धागालेखकांनी यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.

In reply to by संदीप डांगे

माहितगार 01/12/2015 - 11:05
बहुतेक 'पुरूषांसोबत अर्ग्युमेंट मधे स्त्रिया कमी पडतात' असे त्यांना म्हणायचे आहे काय असा मला प्रश्न पडला कारण मग हा जरा गंमतीदार विषय होइल.
=)) अहो काहीही काय ? =)) एनीवे हा विषय या धागा लेखाच्या परिघातला नाही. बाकी धागा लेखाचा मुद्दा क्रमांक १ तुर्तास चर्चेसाठी पुरेशी हिंट देणारा आहे असे वाटते. अधिक स्पष्टीकरण म्हणजे प्रश्नही मीच विचारला उत्तरही मीच दिले होईल म्हणून चर्चा बरिच पुढे गेल्यावर अथवा संपताना देईन.

In reply to by कवितानागेश

नीलमोहर 01/12/2015 - 09:58
" शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे." मोठ्या अपेक्षेने धागा उघडला होता या विषयी काही उपयुक्त माहिती मिळेल म्हणून, पण हे 'उल्लू बनाया बडा मजा आया' असं झालं आहे. बाकी जिथे आपलं स्वागत आहे तिथे जावं, जिथे नाही त्याचा विचारही करू नये असं आमचं तत्व. आमच्या आवडत्या तळ्यातल्या गणपतीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात, तिथे जाऊन डोकं टेकून यायचं. दर्शनासाठी न येता कचरा करायला येणार्‍या बुरखेधारी भक्तांना नो एंट्री, असा फलक न लावलेलं सहिष्णू देवस्थान आहे ते.

गॅरी ट्रुमन 01/12/2015 - 11:04
स्त्रियांना किंवा अन्य कोणालाही मंदिर प्रवेशापासून रोखणे अयोग्य आहे याविषयी फारसे दुमत नसावे. पण मंदिरात जाऊन काय होते, सगळी मंदिरे बंदच करा वगैरे विचार असणारे लोक हमरीतुमरीवर येऊन चर्चा करताना दिसले की जरा मजाच वाटते. समजा माझे असे मत आहे की दारूचे गुत्ते बंद करून टाकावेत आणि कुठल्या दारूच्या गुत्त्याने "ट्रुमन अडनावाच्या लोकांना प्रवेश नाही" अशा स्वरूपाची पाटी लावली तर त्यामुळे मला काय शष्प फरक पडणार आहे? अन्यथाही मी तिथे जाणार नव्हतोच त्यामुळे बंदी असली काय आणि नसली काय--- हू केअर्स? मंदिरांविरोधात असे मत नसणार्‍या इतर सर्वांचे आक्षेप मात्र नक्कीच ग्राह्य आहेत असे मला वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

संदीप डांगे 01/12/2015 - 11:33
इथे 'स्त्रियांना प्रवेशबंदी हे स्पष्ट भेदभावाचे निदर्शक आहे' हा चुकीचा ग्रह काहिजणांनी करून घेतला आहे असे दिसून येते आहे. त्यामुळे लगेच सामाजिक न्यायतत्त्वानुसार सर्वांना समान हक्क, दर्जा ह्याची भलामण करून सर्वांना मंदिरप्रवेशाचा आग्रह धरला जात आहे. पण हे इतके सरळ, साधे सोपे आहे काय? खरा मुद्दा साधनशुचितेचा आहे. वर काहींनी कपड्यांचे उदाहरण दिले आहे. कुणी बिकिनी घालून मंदिरप्रवेश केलेला चालेल काय? पुरुषांनी भले अंतर्वस्त्रांवर ओलेते गेले तर चालते, पण स्त्रियांनी तसेच करावे असा आग्रह धरून चालेल काय? तिथे समानतेचा आग्रह केला तर मान्य होईल काय? चपला, बूट घालून गेलेले चालेल काय? गुत्त्यात जायचेच नसेल तर प्रश्नच मिटतो पण ट्रुमन यांना गुत्त्यात जायची इच्छा आहे पण वय २१ पेक्षा कमी असल्याने प्रवेश नाकारला जाईल, त्यावेळी सामाजिक समानतेचा मुद्दा का लागू होत नाही हे सांगता आले तर बर्‍याच बाबी स्पष्ट होण्यास मदत होईल. तीच गोष्ट संवैधानिक पदांवरील व्यक्तिच्या वयाच्या अटीची, सरकारी नोकरीच्या पदावरील शैक्षणिक अर्हतेच्या अटीची. प्रत्येक जागी सरसकट प्रवेश नाकारणारे इतर मुद्दे असतात. तिथे भेदभाव होतो असे कसे म्हणता येईल?

बॅटमॅन 01/12/2015 - 12:08
या निमित्ताने उहापोह होतो आहे ही चांगलीच गोष्ट आहे. खुद्द कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळाच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश नव्हता अगोदर, पाळी ऑर नॉन पाळी. तो ब्यान उठल्याचे कळते, तसेच इथेही होईल मोस्टली होपफुली.

संदीप डांगे 01/12/2015 - 12:35
शनि मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदीचे कारण कळल्यास ह्या विषयावर अजून विस्तृत व समर्पक चर्चेस मदत होईल म्हणून सामान्य जनमानसात रूढ असलेल्या काही मान्यता: स्त्रियांच्या शनिमंदिर प्रवेशाला खरा कारणीभूत आहे तो मारूतीराया. कसा? तर मारुतीराया, हनुमान हा आजन्म ब्रह्मचारी आहे, शिवाय तो चिरंजीव आहे, परत तो सर्वव्यापी-विशाल आहे. 'हनुमानतत्त्व' असं काही मानल्या जातं. समर्थांनी महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी, गावोगावी मारुतीची प्रतिष्ठापना केली. गावात बलोपसाना व्हावी, त्यातून भक्ती आणि शक्तीची उपासना होऊन चांगले तरूण तयार व्हावे अशी त्यांची योजना. दुसरी मान्यता अशी की गावात मारुतीचे मंदीर असेल तर भूत-प्रेत-पिशाच्च यापासून गावाचे रक्षण होते. तीसरी मान्यता अशी की हनुमान हा जागृत देव आहे. म्हणजे त्याचे आवाहन केले तर तो खरंच त्या ठिकाणी येऊन भक्तांच्या समस्या दूर करतो. तो असे करु शकतो ही मान्यता इतकी घट्ट आहे कारण तो अजून जीवंत आहे, त्याला वेगवेगळे आकार, अवस्था घेता येतात ही मान्यता. त्यामुळे शक्यतो हनुमानमंदिरात गांभिर्य जास्त असते. तो इथेच आसपास आहे, आपण काही उलट सुलट केले तर कानफाटवेल अशीही भीती असते. चौथी मान्यता अशी की हनुमान वीर्यतेजाने संपृक्त आहे. त्याच्या नुसत्या उच्छवासाने वा अवतीभवतीच्या वातावरणाने स्त्रिया गर्भवती राहू शकतात. इतके त्याचे वीर्यतेज बलवान आहे. आता आपल्या लक्षात येईल की याचमुळे कुमारी मुलींना हनुमानमंदिरात बंदी असायची. (असायची असे म्हटले आहे कारण गेल्या १०-१५ वर्षात विचारधारा बदलत गेल्या). अघोरीसदृश्य तंत्रविद्येत मूल न होऊ शकणार्‍या स्त्रीने अनावृत्त अवस्थेत जाऊन मध्यरात्री हनुमानाची विशिष्ट तंत्राने पूजा करून हनुमानत्त्व जागृत करून त्यास प्रसन्न करणे व गर्भवती होण्याची इच्छा पूर्ण करणे असेही विधी आहेत. ह्याचे एक उदाहरण मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहे. म्हणजे मध्यरात्री स्त्री हनुमान मंदिराकडे जातांना पाहिली आहे. ते सर्व दृश्य पार टरकवणारे असते, त्यामुळे पुढे काही बघायची हिंमत झाली नाही. तेव्हा माझे वयही १५-१६ होते. हेच वीर्यतेज नव्याने गृहस्थाश्रमात प्रवेश करणार्‍या नवरदेवाच्या अंगात संचारावे म्हणून लग्नाआधी नवरदेवाला हनुमानमंदिरात दर्शनाला घेऊन जाण्याची प्रथा आहे. आजकाल मानवी अहंकार वाढल्याने ह्या प्रथेचे कारण विचित्रपणे बदलल्याचेही काही ठिकाणी दिसून येते. म्हणजे स्वतःमधे काहीच कमतरता नाही हे दाखवण्यासाठी त्याच्या विर्यतेजाची मला गरज नाही असे म्हणून त्याचे लग्न झाले नाही त्या बिचार्‍या ब्रह्मचार्‍याचा आशिर्वाद चांगला असेल म्हणून दर्शनाला आलो असं काहीसे. एवढं सगळं लक्षात घेतलं तर स्त्रियांनी हनुमानापासून दूर राहावे यामागचे कारण समजुन येईल. आता शनीमहाराजांनी काय घोडं मारलं? तर कुठल्याशा पुराणकथेनुसार शनीमहाराज हे हनुमानाचे अंकित आहेत, साडेसातीत त्रास कमी व्हावा म्हणून शनीसोबतच हनुमानाचीही उपासना करावी म्हणजे हनुमानजी शनीला तंबी देऊन आपल्या भक्ताचे त्रास कमी करून देतात. हनुमानजी आणि शनी हे एकसारखेच मानले जाऊ लागले. ३०-४० वर्षांआधी शनीमंदीर हे काही फार प्रस्थ नव्हते. एखाद्या गावात एखादे दुर्लक्षलेले शनीमंदीर असायचे. आता ते दुर्लक्षलेले नाही हा भाग वेगळा. पण हनुमानमंदिरापेक्षा शनीमंदिरास कमी महत्त्व होते, जे लोक साडेसातीने त्रस्त आहेत तेच तिथे पुजेला जात. पण तिथे गेल्यावरही हनुमानाचेच नियम लावत. परत शनीमहाराजांची कडक असल्याबद्दलची ख्याती. ह्यामुळे स्त्रियांना प्रवेश नाकारणे घडत आले आहे. ह्यात कुठेही भेदभाव, असमानता वैगेरे नाही. अनेक ठिकाणी आता स्त्रिया न घाबरता प्रवेश करत आहेत. काही हनुमान-शनी मंदिरांत अजून कर्मठ व्यवस्था आहे. हळूहळू सर्व बदलणारच आहे. वरील सर्व जनमान्यता आहेत. वैज्ञानिक सत्ये नव्हेत त्यामुळे चर्चा करतांना ह्याचे भान असणे गरजेचे.

pacificready 01/12/2015 - 12:40
गवि सर, तुमच्या टंचनिकेची- दिसायला ज़रा कमी सुन्दर आणि तत्त्वज्ञानात बऱ्यापैकी पक्की- बहिण डांगे अण्णा कड़े पाठवली आहे ना? खरं सांगा सर.

In reply to by प्रसाद१९७१

माहितगार 30/11/2015 - 16:45
पॉपकॉर्न सोबत थंडीचे दिवस आले म्हणून गरमागरम विषय चर्चेसाठी दिला आहे, खूप गरम वाटल्यास क्षुधाशांतीसाठी थंड पेयेही सोबत ठेवावीत

In reply to by जेपी

माहितगार 01/12/2015 - 13:16
तुमच्या शुभेच्छांसाठी मिठाई. पहिल्या दिवसात १०० चा दर बरा असतो का ? धागा लेखातील बर्‍याच मुद्द्यांना अद्याप स्पर्श झाला नाही त्यातील अर्ध्या मुद्द्यांना स्पर्ष केलातरी भरपूर होतील असे वाटते.

कंजूस 30/11/2015 - 17:20
स्त्रिया बय्राचदा चुलीजवळ असतात.कोणी फुकाचं व्यवहाराला धरून नसलेलं बोललं की " तुझं तत्वज्ञान गेलं चुलीत " +"{ दोनवेळचं गिळण्यासाठी छनछन घेऊन ये मग ऐकते }."हे एक "बेसिक इंस्टिन्क्ट आहे". बाकी शनि काही शिंगणापुरलाच नाही घरातही बनवता येतो.

संदीप डांगे 30/11/2015 - 18:09
शशी केसबद्दलः जिथे स्त्रियांना प्रवेशास बंदी आहे अशा प्रार्थनास्थळांमधे त्यांनी जाऊच नये. किंवा कुणीही जाऊ नये. देवाच्या गाभार्‍यावर हे बसलेले चोर का नियम ठरवतात..? बाकीचे का पाळतात? खरंच चालत नसेल (म्हणजे देव कोपत बीपत असेल) तर कोपू दे! ती तरुणी तिथेच शिळा होऊन पडली असती तर देव आहे हे सिद्धही झाले असते, नाही पडली त्यामुळे खरा प्रश्न आणि तमाशा चालू झाला. देव कोपण्याऐवजी गावकरीच कोपलेत. अकलेचे कांदे आणि डोळे असून आंधळे लोक अजूनही शनि-शिंगणापुरास जातात. दलितांच्या मंदीरप्रवेश आंदोलनाबद्दलही मला हाच प्रश्न पडला होता. अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला... जो स्वत: तुम्हाला जवळ घेऊ शकत नाही, तुमचे दु:ख दूर करू शकत नाही तो देव कशाला डोक्यावर घ्यायचा? (देवाने दु:ख दूर करून सुख द्यावे म्हणून लोक देव संकल्पना मानतात, सश्रद्ध लोकांनी अंगावर येऊ नये) दुसरा प्रतिसाद नंतर देतो.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 30/11/2015 - 19:50
आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. दुर्दैवाने या अनुषंगाने स्त्रियांना जी सापत्न वागणूक मिळते ती देण्यात इतर स्त्रियाही पुढे सरसावतात.

In reply to by बोका-ए-आझम

आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
ह्याला म्हणतात अनभ्यासातुन आलेले स्वकपोकल्पित निरर्थक अत्मरंजन ! पारश्यांच्या सर्व अग्यारी मधे कितीही हुच्चवर्णीय असला तरीही तुम्हाला प्रवेश दिला जात नाही ... कित्येक अग्यारीबाहेर "पारशी आणि इराणी झोराष्ट्रीयन सोडुन सर्वांन्ना प्रवेश निशिध्द " अशी स्पष्ट पाटी वाचली आहे मी !

In reply to by प्रसाद गोडबोले

बोका-ए-आझम 30/11/2015 - 22:57
त्यावरून तुम्हाला वाचता येतं याशिवाय दुसरं काहीही सिद्ध होत नाही. पहिले तो 'निशिद्ध'शब्द 'निषिद्ध' असा नीट लिहायला शिका. शंभर वेळा लिहून काढा हवं तर. पारशांच्या धर्मस्थळात फक्त पारशांना परवानगी असते. पुरुष किंवा स्त्री. आणि जे पारशी नसतात त्यांना नसते. पुरुष किंवा स्त्री. इथे धाग्यात उल्लेख नसलेल्या मुद्द्यांवर वाद घालायचा असेल तर परीराज्यात जा. नाहीतर मुद्दा समजून घेऊन नीट वाद घाला. एवढा अभ्यास केलाय त्याचा उजेड पडू दे जरा!

In reply to by बोका-ए-आझम

किती ती असहिष्णुता ! तुमच्या ह्या प्रतिसादातुन वाक्य जसेच्या तसे कॉपी पेस्ट करुन लिहिले आहे >>>> http://www.misalpav.com/comment/777704#comment-777704 १००% सहमत. बोका-ए-आझम - Mon, 30/11/2015 - 19:50 आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. >>>> उगाच स्वतःच्या मनाचे काही घुसडलेले असेल तर दाखवा नाही तर वाक्य लिहायला चुकले असे कबुल करा की राव !! आम्ही आमचा शब्द सुधारतो तुम्ही तुमचे वाक्य सुधारा . हाकानाका.

In reply to by प्रसाद गोडबोले

बोका-ए-आझम 01/12/2015 - 07:02
तुम्ही खरोखर चूक दाखवली असतीत तर ती मान्य करायला हरकत नव्हती. चूक नसताना उगाचच आक्षेप घेणं याला काय अर्थ आहे? धागा स्त्रियांवरच्या धार्मिक बंधनांची चर्चा करतोय. त्यावर संदीप डांगे यांनी शनि शिंगणापूरच्या घटनेचा संदर्भ दिला. त्यावर मी प्रतिक्रिया दिली. त्याला संदर्भ हा शनि शिंगणापूरसारख्या हिंदू तीर्थक्षेत्रात स्त्रियांवर लादण्यात आलेल्या बंधनांवर होता. पारशांचा संबंध कुठे येतो यामध्ये? पारशी कोणत्याही पारशी नसलेल्या माणसाला त्याची जात/धर्म/लिंग/वर्ण यावरून अपवाद करुन अग्यारीत प्रवेश देत नाहीत. यात मुद्दाम पुरुष आणि उच्चवर्णीयांचा अपवाद केला जात नाही. तसंच कोणत्याही पारशी पुरुष आणि स्त्रीला तिथे प्रवेश असतो. त्यात लिंग आणि वर्ण यावरुन अपवाद केला जात नाही. त्यामुळे तुमचा आक्षेप निरर्थक ठरतो. उद्या स्त्रियांच्या स्वच्छतागृहांमध्ये आणि ट्रेनच्या स्त्रियांच्या डब्यांमध्ये पुरूषांना प्रवेश नसतो असं कुणी तरी म्हणेल. ते विधानही तुमच्या आक्षेपाप्रमाणेच निरर्थक आहे.

In reply to by बोका-ए-आझम

प्रचेतस 01/12/2015 - 07:18
वेरुळच्या घृष्णेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात मात्र पुरुषांना बनेल काढल्याशिवाय अजूनही प्रवेश मिळत नाही.

In reply to by प्रचेतस

असा नियम असावा. सासवडजवळच्या हिवरे येथील मंदीराच्या गाभार्‍यातसुद्धा बनियन (आणि कमरेचा पट्टा-चामडी वस्तू नको म्हणून) काढून जावं लागतं. कानिफनाथांचं मंदीर हिवर्‍यापासून पुढेजवळच आहे. (शिवमंदीर नसले तरी) तेथेही हाच नियम आहे. या नियमामुळे बाय डिफॉल्ट महिला मंदीर प्रवेशास अपात्र ठरतात.

In reply to by तुषार काळभोर

कवितानागेश 01/12/2015 - 14:55
मी गोकर्ण, घृष्णेश्वर इथे जाऊन आले आहे. दक्षिणेत अनेक शिवमंदीर्ांमध्ये असा नियम आहे पण तो पुरुषांसाठी. स्त्रियांना तस्सच्या तस्स आत जाऊ देतात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम 01/12/2015 - 09:49
तरी आपण उत्तरं देतोच ना सर! शिक्षकांच्या व्यवसायात हा occupational hazard असतोच ना! त्यामुळे इच्छा असूनसुद्धा फाट्यावर मारता येत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

सहमत आहे. पण मला अनेक वर्षाच्या जालानुभव सांगतो आपल्याला त्रास होतो पेक्षा थांबणं परवडतं. म्हणजे उद्या एखाद्या मंदिराच्या विश्वस्तानी ठरवलं की महिलांनी यापुढे.... जाऊ देत. पुरुषांना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर नागडं जावं लागेल तरी हे म्हणतील काय होतं मंदिराचे नियम पाळले पाहिजेत. शिकलेले असून सारासार विवेकबुद्धि वापरता येत नसेल तर काय उपयोग शिक्षणाचा. शनीमंदिराचा चौथारा असू देत की रजस्वला असलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश असू देत स्री पुरुषांनी मिळुन जनआंदोलन केलं पाहिजे, देव आहे नाही तो भाग वेगळा. पण प्रवेश बंदी कोणालाच नको. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सर्वांसाठी खुलं केलं त्या प्रमाणे ही आंदोलनं झाली पाहिजेत, असं वाटतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पगला गजोधर 01/12/2015 - 10:46
शिकलेले असून सारासार विवेकबुद्धि वापरता येत नसेल तर काय उपयोग शिक्षणाचा.
अश्या लोकांना साक्षर म्हणावे, सुशिक्षित नव्हे, भलेही त्यांनी फुरोगामी/विचारजंत असे इतरांना शिव्या घालून हिणवलं तरी… call spade a spade.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संदीप डांगे 01/12/2015 - 10:50
बिरुटेसर, परस्परविरोधी विधाने करत आहात. सारासारविवेकबुद्धी असेल तर कुणी मंदिरात जाणारच कशाला? मंदिरातले नियम विश्वस्त ठरवत नाहीत, भक्त ठरवतात. भक्तांनी ठरवलेले नियम विश्वस्त पाळतात. पुढे विश्वस्त/पुजारी आपल्या सोयीनुसार ते वळवून घेतात आणि पुढे भक्त हेच नियम पाळायला लागतात. हे ज्या भक्तांना कळत नाही त्यांना नागडे जाण्याचाही नियम मान्य होतो. प्रथा एखाद्याच्या मूर्खपणामुळे तयार होतात. एखाद्याने नागड्याने जाण्याचा नवस केला अन् अनमानधपक्याने फळास आला तर ते पाहून अक्कल गहाण टाकलेले लोक तसेच करायला लागतील. बहुसंख्य तसे करतात पाहून मग तोच नियम होईल आणि तीच प्रथा होईल. मग ते न पाळणार्‍याला देवाचा उपमर्द करत आहे असे म्हणून प्रवेश नाकारला जाईल. कारण मेंढ्यांच्या कळपात ते फिट बसत नाहीत म्हणून. मंदिरात कुणालाच प्रवेशबंदी नसावी असे ज्यांचे मत आहे त्यांना मंदिर ही व्यवस्थाच समजली नाही असे म्हणावे लागते. चर्च, मशिद, गुरुद्वारा, विहार ह्यापेक्षा ही व्यवस्था कशी वेगळी आहे हे खालच्या माझ्या प्रतिसादात सांगितले आहे. काही चार बुकं शिकून अतिशहाणे झालेले लोक तिकडची व्यवस्था पाहून इकडंही तसेच असले पाहिजे ह्या दिव्य विचाराप्रत येतात. त्यांना तिकडचाही अभ्यास नसतो, इकडचाही नसतो. समानतेच्या तत्त्वाचा चुकीच्या ठिकाणी आग्रह होत आहे हे लक्षात येत नाही. जनआंदोलन जर करायचे तर मंदिरात कुणीच जाऊ नये यासाठी करावे. त्यानेच समाजाचे जास्त आणि योग्य भले होईल. सगळी मंदिरेच ओसाड पाडावीत. जिथे बंदी आहे तिथे जबरदस्ती मंदिरप्रवेश ही अतिशय हास्यास्पद संकल्पना आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 01/12/2015 - 11:52
आणि मंदिरात जाणं या परस्परविरोधी गोष्टी कशा काय? मंदिरात नवस करणं, तो पूर्ण होईल किंवा होतोच अशी अंधश्रद्धा ठेवणं, त्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी असणं ही सारासारविवेकबुद्धी नसल्याची लक्षणं आहेत हे मान्य, पण मंदिरात निव्वळ जाणं हे सारासारविवेकबुद्धीच्या विरोधात आहे हे पटलं नाही.

In reply to by बोका-ए-आझम

मंदिरात निव्वळ जाणं हे सारासारविवेकबुद्धीच्या विरोधात आहे हे पटलं नाही. सहमत....! योग्य आणि अयोग्य यातील समज . -दिलीप बिरुटे

In reply to by बोका-ए-आझम

राही 01/12/2015 - 09:30
दक्षिणेतल्या काही देवळांत प्रवेशबंदी नसली तरी पुरुषांना वेष्टि नेसावी लागते. अलीकडे बहुतेक पुरुष ती पँट्वरूनच गुंडाळतात. महिलांना साडी किंवा सलवारकमीज आवश्यक आहे. जीन्स अजूनही काही ठिकाणी चालत नाहीत. चिपळूणमध्ये डेरवण येथे महिलांना नऊवारी नेसावे लागत असे तसेच तेथे महिलांनी महिना असताना आत जाऊ नये अशी पाटीही होती. आताची स्थिती माहीत नाही. अवांतर : काही वर्षांपूर्वी केरळला गेलो असताना एकदा एका देवळात आमच्या मुलांना प्रवेश द्यावा की नाही याबद्दल तिथल्या पुजार्‍यांमध्ये चर्चा झाली. तिथल्या मुख्य प्रशासकाला बोलवण्यात आले. कारण मजेशीर होते. त्यावेळी तिथे आम्हीच फक्त उत्तरहिंदुस्तानी होतो आणि मुलांचा वर्ण तांबूस गोरा आणि केस पिंगट ही बाब तिथल्या समुदायात वेगळी दिसत होती. कदाचित परदेशी पाहुणी मुले एक्स्चेंज कार्यक्रमातून आली असतील असा संशय त्यांना आला होता. (केरळमधे बरेच परदेशी लोक येतात.) त्यांची समजूत पटवण्यात थोडा वेळ गेला. रांगेतल्या मागच्या लोकांचा खोळंबा झाला नाही कारण आम्हांला रांगेतून बाहेर काढले होते. थोड्या वेळाने सर्व ठीक झाले.

In reply to by राही

मितान 01/12/2015 - 09:43
विजारीवरून वेष्टी एवढा बिनडोक भंपकपणा मी कोणत्याच देवळात पाहिला नाही! एका ठिकाणी मला सलवारवरून ते कळकट कापड ते ही भाड्याने घेऊन नेसले तरच मंदिरात जाता येईल असे सांगून अडवले. त्याचवेळी २ फिरंगी स्कर्टवाल्या मुलींना मात्र वाकून नमस्कारासह प्रवेश मिळाला. हे बघून मला त्या आतल्या देवाचीच कीव आली. तसंही मला जाऊन न जाऊन काही फरक पडत नसल्याने बाकीच्यांचे दर्शन होईस्तवर मी देवळाबाहेरच्या दुकानांना माझे दर्शन देऊन आले.

In reply to by मितान

पगला गजोधर 01/12/2015 - 10:41
हे बघून मला त्या आतल्या देवाचीच कीव आली. तसंही मला जाऊन न जाऊन काही फरक पडत नसल्याने बाकीच्यांचे दर्शन होईस्तवर मी देवळाबाहेरच्या दुकानांना माझे दर्शन देऊन आले.
तै मस्तच, मी सुद्धा जेजुरीला धन्दा होताना पाहीला, तेव्हा मी सुद्धा आत गेलो नाही.

In reply to by मितान

बॅटमॅन 01/12/2015 - 12:03
नै म्हणजे जो काय नियम आहे तो तरी सारख्या प्रमाणात राबवावा. हे असली चाटूगिरी डोक्यात जाईल नै तर काय!

In reply to by राही

गॅरी ट्रुमन 01/12/2015 - 11:18
चिपळूणमध्ये डेरवण येथे महिलांना नऊवारी नेसावे लागत असे तसेच तेथे महिलांनी महिना असताना आत जाऊ नये अशी पाटीही होती. आताची स्थिती माहीत नाही.
मी या वर्षी जानेवारीतच तिथे गेलो होतो. तिथे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही घटनांचे पुतळे आहेत आणि वालावरकर महाराज म्हणून कुणा महाराजांची समाधी आहे. पुतळ्यांच्या ठिकाणी असे वेषभूषेवर बंधन नाही.पण समाधीच्या ठिकाणी जायचे असेल तर स्त्रियांना "वयोमानानुसार फ्रॉक किंवा साडी ही वेशभूषा असेल तरच प्रवेश दिला जाईल" अशी पाटी वाचली होती. नऊवारी असा काही उल्लेख नव्हता. याविषयीच मी मिपावर मागे लिहिलेले थोडे चोप्य-पस्ते करतो--- "म्हणजे मी जीन्स घालून गेलो तरी त्या महाराजांना चालणार पण हिलरीने साडीच नेसली पाहिजे ही सक्ती. हे काही मला पटले नाही....ते पुतळे बघून झाल्यानंतर आणखी एक ठिकाण होते तिथे जायला आम्ही निघालो तेव्हा हिलरीने साडी नेसली नसल्यामुळे आत प्रवेश नाही हे कळले.आम्ही विचारले की आत नक्की काय आहे?त्यावर कळले की तिथे आत वालावलकर महाराजांची समाधी आहे.एक तर वालावरकर महाराज हे नाव मी आयुष्यात दुसऱ्यांदा ऐकले.कदाचित शाळेत असताना आमची सहल गेली होती त्यावेळी ते नाव ऐकले असेल ही शक्यता गृहित धरून दुसऱ्यांदा असे लिहितो.हे महाराज कोण होते किंवा ते खरोखर चांगले होते की नाही याविषयी मला काहीच माहित नव्हते. ज्या माणसाविषयी काही माहित नाही त्याची समाधी बघण्यात काय कपाळ इंटरेस्ट असणार? आणि समजा हे महाराज कोण हे माहित असते तरी तिथे जावेसे वाटायची शक्यता अगदी शून्य होती.उंटाच्या लहान आतड्याची लांबी किती असते हे समजून घेण्यात मला जितका इंटरेस्ट आहे त्यापेक्षाही कमी इंटरेस्ट या असल्या महाराजांच्या समाध्या वगैरे बघण्यात मला आहे.त्यामुळे आत जाऊ देणार नसाल तर नका देऊ, हू केअर्स असे म्हणत आम्ही तिथून निघालो."

In reply to by बोका-ए-आझम

आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
मी फक्त तुमचे हे वाक्य चुकले आहे इतकेच निदर्शनास आणुन देत आहे . तुम्हाला कदाचित असे लिहायचे असावे आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली हिंदु प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. तुमची वाक्य रचना चुकली आहे इतकेच निदर्शनास आणुन देत आहे !

In reply to by पगला गजोधर

त्यांचे मुळ वाक्य हे आहे >>>
आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
>>> मी कमीत कमी सुधारणा सुचवत होतो , बरे झाले आपण अजुन एक अ‍ॅडीशन सुचवली ! बोकाराव तुमचे वाक्य असे असले पाहिजे आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली हिंदु पूजास्थळे कुठेच नाहीत.

In reply to by प्रसाद गोडबोले

नूतन सावंत 02/12/2015 - 22:10
बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्लर येथे हिंदू धर्मियांशिवाय कोणालाही प्रवेश नाही,अशी पाटी आहे.एकदा आय.टी.डी.सी.च्या बसने आलेल्या क्रिश्चन धर्मियांना मंदिराच्या प्रांगणात आणल्याबद्द्ल पंजाबी हिंदू गाईडला तिथले पुजारी आईबहिणीवरुन शिव्या देताना प्रत्यक्ष पाहिले आहे.

In reply to by नूतन सावंत

माहितगार 03/12/2015 - 10:24
खरच हे दुर्दैवी आहे. मी एकदा एका आफ्रीकन (ख्रिश्चन) स्त्रीला विवेकनंदांच्या भूमिकेतून हिंदू धर्म या विषयावर माहिती दिली तिला हिंदू संस्कृती बद्दल सकारात्मक उत्सुकता निर्माण झाली आणि मंदिरांना भेट देण्याचीही इच्छा झाली पण मंदिरातील पुजारीवर्ग कसा वागेल या विचाराने मंदिर भेटीस आमंत्रण देण्याचे धाडस मलाच झाले नाही याची आठवण झाली.

In reply to by माहितगार

संदीप डांगे 03/12/2015 - 11:24
जिथे पुजारी नाहीत अशा मंदिरांना भेट द्यायला सांगावी. प्रसिद्ध व गर्दिने गजबजलेली मंदिरे म्हणजेच हिंदू धर्म असे नाही.

In reply to by संदीप डांगे

माहितगार 03/12/2015 - 11:53
म्हणजे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तुमच्या धर्मातील हेदभाव कबूल करणे, शिवाय हायलाइट करणे झाले असे नाही का ?

In reply to by माहितगार

संदीप डांगे 03/12/2015 - 12:37
नाही हो तसे नाही. मंदिरांबद्दल मी जे वर विवेचन दिले त्यानुसार काही मंदिरे खाजगी पद्धतीची आहेत. लोक तिथे गर्दी करतात म्हणजे ती लोकांची झाली असा अर्थ होत नाही. चित्रपटगृहांमधे लोक गर्दी करतात म्हणून तिथे वाट्टेल तसे वागण्याचा, किंवा तिथले नियम ठरवण्याचा अधिकार जाणार्‍या प्रेक्षकांना मिळत नाही. कुणाला प्रवेश द्यावा न द्यावा हे जसे चित्रमंदीर ठरवू शकते तसेच हे मंदिरही ठरवू शकते. टिकिट असणे म्हणजे प्रवेशास पात्र असणे हा साधा नियम तिकडे आहे, तर हिंदू असणे म्हणजे पात्र असने हा नियम इकडे आहे. ह्यात भेदभाव आहे असे मानणे चुकीचे आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' असे एखादा हिंदू मानतो म्हणून तुम्ही त्याच्या घरात घुसून राहणार हे योग्य नाही. भेदभाव आणि पात्रतानुसार प्रवेश ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत. मंदिरे आणि देव ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत हे मी आधीपासून सांगतोय. त्यात गल्लत होऊ देऊ नये. प्रवास हा प्रवास असतो पण गावातल्या एसटी स्टँडवर ज्या सहजतेने आपण फिरू शकतो, टिकट काढण्याची वेळ येईपर्यंत बसमधे बसू शकतो, तितक्या सहज कुठल्या एअरपोर्ट वर नाही फिरू शकत. म्हटले तर दोन्ही पब्लिक प्लेस, सार्वजनिक स्थळ आहेत. मग तिथेही भेदभाव समजायचा का? प्रवास म्हणजे हिंदू धर्म आणि मंदिरं म्हणजे एअरपोर्ट, बसस्थानकं असं समजा. (फार गुंतागुंत होतेय का? फारच दृष्टांतहेवी प्रतिसाद होतोय, माफी असावी)

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन 03/12/2015 - 12:50
सरसकट कुणालाही गाभार्‍यात सोडणे आणि निव्वळ मंदिरात अलाउ करणे यात फरक आहे की नाही? फक्त मंदिरप्रवेश करू दिला तरी बास आहे. तेवढंही कबूल करवत नसेल तर हाईट आहे.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 03/12/2015 - 13:00
सरसकट कुणालाही गाभार्‍यात सोडणे आणि निव्वळ मंदिरात अलाउ करणे यात फरक आहे की नाही? हो. फरक आहे. फक्त मंदिरप्रवेश करू दिला तरी बास आहे. तेवढंही कबूल करवत नसेल तर हाईट आहे. बरोबर. माझ्यामते नियम जर असतील तर ते काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. अन्यथा तो सरळ भेदभाव आहेच. म्हणजे माहितगार म्हणत आहेत ती आफ्रिकन व्यक्ति जर सहज टूरीस्ट म्हणून मंदिरात आली आणि तीला प्रवेश नाकारला पण तीच व्यक्ती कुणा केंद्रिय मंत्र्यासोबत आली आणि तिला गाभार्‍यात घेऊन गेले तर हा भेदभावच झाला. मला वाटते इंदिरा गांधीसोबत जे त्या मंदिराने केले तेवढे कडक नियम कुणी मंदिर पाळत असेल तर तो भेदभाव समजू नये. अन्यथा हाईट आहेच.

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन 03/12/2015 - 13:05
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो.

In reply to by बॅटमॅन

पगला गजोधर 03/12/2015 - 13:49
अमेरिका/ गोव्यातल्या/केप टाउन चर्चमधे (डोक्यावर टोपी न ठेवणे की संपले) व सिंगापूर /थायलंड मधील बौद्ध मंदिरात (पादत्राणे न घालणे की संपले), मला प्रवेश मिळाला, फोटो सुद्धा काढता आले. (कोणीही जात धर्म विचारला नाही). गुरुद्वाराच्या लंगर मधे जेवलोय (कोणीही जात धर्म विचारला नाही).

In reply to by बॅटमॅन

नाखु 03/12/2015 - 14:47
हेच मी स्वतः शिवथर घळला अनुभवले आहे. सुमारे २०-२२ वर्षांपूर्वी (जेव्हा थेट नेट सेल्फी) इफे़क्ट नव्हता तेव्हा.. माझ्याबरोबर आम्च्या कंपनी समूहात दोन मुस्लीम २ केरळीयन ख्रिषचन यांनाही विना अटकाव प्रवेश दिला होता. शिवथर घळ हे संपूर्णतः खाजगी आहे असे मला वाटते तिथेही तुम्ही कुठल्या धर्माचे आहात हे विचारत नाहीत (किमान आम्हाला तरी विचारले नाही) फक्त पोषाख सभ्य असावा असा संकेत असावा.(किंवा मधल्या काळात काही वावगे घडले असावे म्हणून पेहरावाबद्दल काही नियम बन्विले असावेत). भेदभाव करणे कुठेही वाईच धाग्यावर आणि मंदीरातही...... लाईनीत (थांबण्याची सक्ती न करता लांबूनही नमस्कार)नमस्कारी नाखु

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन 03/12/2015 - 13:06
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो. बाकी नियम कसाही असो मात्र पुजार्‍यांनी शिव्या देणे म्हणजे हाईट आहे. असे अनुभव वाईटच.

In reply to by बॅटमॅन

गवि 03/12/2015 - 14:08
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो.
अ. कडक अथवा सौम्य, जे काही नियम असतील त्यांची कमाल व्याप्ती नागरिकाला एखाद्या खाजगी, प्री-डिफाईन्ड सीमारेषा असलेल्या जागेत प्रवेश नाकारणे इतकीच असेल आणि ब. या जागी न जाण्याने त्या व्यक्तीच्या अन्न वस्त्र निवारा यांपैकी एक अथवा अनेक गरजा बाधित होत नसतील किंवा या गरजांना मिळवण्याचा एकमेव मार्ग खंडित होत नसेल. आणि क. स्वतःच्या आवारात तसे किंवा कोणतेही नियम करण्याची पूर्ण कायदेशीर मान्यता नियम बनवणार्‍या बॉडीला त्या देशाच्या मुख्य कायदेशीर संस्थेने दिलेली असेल. तर कोणतेही नियम चूक ठरणार नाहीत / ठरु नयेत. आणि तसं नसेल तर सर्व नियम चूक ठरतील / ठरावेत. मग ते वस्त्र, लिंग, वर्ण, धर्म, भाषा, उंची, वजन, केसांची लांबी, आहारपद्धती, लैंगिक ओरिएन्टेशन किंवा अन्य कोणत्याही व्हेरिफायेबल पॅरामीटरवर आधारित असोत. बाकी कितीही काही बोललं तरी निरुपयोगी.

In reply to by गवि

बॅटमॅन 03/12/2015 - 14:18
म्हणजे या न्यायाने दलितांच्या मंदिरप्रवेशाबद्दलची सर्व आंदोलने आणि महिलांच्या गाभाराप्रवेशाबद्दलची आंदोलने निरुपयोगीच ठरावीत, नै का? मध्यंतरी कर्नाटकातील एका मंदिरातल्या गलिच्छ प्रथेबद्दल बरेच काही छापून आले होते. ब्रह्मवृंदाचे जेवण झाल्यावर त्या उष्ट्या खरकट्या पत्रावळ्यांवर लोटांगण घालत प्रदक्षिणा घालण्याचा प्रकार तिथे अगोदरपासून आहे. हाही कायदेशीर प्रकार आहे, कुणाच्या कसल्या हक्कावर गदा वगैरे येत नाही. पण यावर बंदी घालण्यात आली. आणि ते मलाही समर्थनीय वाटते. बर्‍याच जणांनी विरोधही केला, कैकांनी समर्थनही केले. नेमके देवळाचे नाव आठवत नै नैतर लिंक दिली असती. बाकी हा मुद्दा अंमळ भावनिकही आहेच. काही प्रमाणात अ‍ॅक्सेस ओपन केल्यास अजून बरे होईल असे बर्‍याच जणांना वाटते, तदनुरूप अनेक लोकांनी चळवळी केलेल्या आहेत आणि त्यांना कमीअधिक प्रमाणात यशही मिळालेले आहे. त्यामुळे यात निरुपयोगी असे काही वाटत नाही.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 03/12/2015 - 14:43
मंदिरनामक जागा केंद्रस्थानी ठेवून समाज त्याविषयी काय निर्णय घेतो हे समाजावर बंधनकारक असते. संपूर्ण समाजाने (यात स्त्रिया-पुरुष, दलित-उच्चवर्णिय, श्रीमंत-गरीब सगळे आले) स्त्रियांच्या गाभाराप्रवेशावर बंदी घातली तर तेही बरोबर, उठवली तरी बरोबर. पण समाजातले काही विशिष्ट घटक आपले स्वार्थ साधण्यासाठी, असमतोल मानसिकतांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उर्वरीत समाजाला फसवत असतील आणि त्यायोगे काही भेदभाव घडत असेल तरच तो चुकीचा ठरेल. बाकी तुम्ही म्हणताय त्या अनिष्ट प्रथा ह्या सहज भावनेतून सुरु झालेल्या, पुढे विकृत रुप घेतलेल्या असतात. त्यांच्यावर प्रबोधनासह बंदी घालणे आवश्यकच आहे.

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन 03/12/2015 - 15:05
फसवणे म्हणजे काय? आर्थिक फायदा करून घेणे वगैरे? तसे असेल तर मग दलितांना मंदिरप्रवेशापासून रोखण्यात पुरोहितांचा तरी आर्थिक फायदा काय होता? उलट त्यांना अलाउ केले असते तर त्यांनीही दाने दिलीच असती की. तस्मात निव्वळ फसवणूक असेल तरच चूक ही व्याख्या अपुरी आहे असे वाटते. पण हा मुद्दा बर्‍याच अंशी सब्जेक्टिव्ह आहे हेही तितकेच खरे.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 03/12/2015 - 15:26
फसवणे म्हणजे आर्थिक फायदाच असे नाही. खरे न सांगणे, सत्य दडवून ठेवणे, मिळालेल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन दमदाटी करणे. 'एखादा अधिकार तुम्हालाही उपलब्ध आहे' हे जातीपातीच्या पूर्वग्रहातून निम्नजातींना न सांगणे ही फसवणूकच आहे. एक उदाहरण देतो. मी आणि माझ्या मित्राने अमेरिकेतल्या कुठल्या युनिवर्सिटीला अप्लाय केले. पण प्रवेश मिळेल की नाही हे तिथे गेल्यावरच समजते अशी अट आहे. माझा मित्र तिथे आधीच गेलेला आहे. काय निकाल आहे हे त्याने मलाही कळवणे अपेक्षित आहे. पण इर्ष्येतून, सामाजिक सन्मानाच्या हेतूने त्याने मला 'तुझा नंबर लागला नाही' असे चुकीचे सांगितले. मला त्याच्यावर प्रचंड विश्वास असल्याने मी तोच निकाल खरा मानला. यात माझे नुकसान झाले. म्हणजे मला फसवले असेच म्हणेन ना मी? माझ्यामते मंदिरांमधे विशिष्टांना प्रवेशबंदी ही खाजगीकरणातून आलेली आहे. मंदिरव्यवस्थापनाच्या इतिहासाबद्दल मला तेवढे इत्थंभूत ज्ञान नाही. याविषयी जास्त माहिती मिळाली तर ह्या बंदीप्रथा कुठून उपजल्या हे शोधता येईल.

In reply to by संदीप डांगे

@माझ्यामते मंदिरांमधे विशिष्टांना प्रवेशबंदी ही खाजगीकरणातून आलेली आहे.>> आहो कुठचं काय आलय खाजगीकरण.? ही अस्पृश्यता पाळली जाते सरळ सरळ! ह्याला पोथ्यांचाही आधार असतो.. देवाची पॉवर कमी होइल्,अमके तमके शिवल्यानी..असली मूर्ख टनाटनी गणित असतात...ह्या देवाला शिवू न देण्याच्या प्रथांमागे.. आतल्या गोटातून ,माहिती घ्या ..मग कळेल

In reply to by अत्रुप्त आत्मा

संदीप डांगे 03/12/2015 - 19:01
अहो, अस्पृश्यता म्हणजेच खाजगीकरण. तेच म्हणायचे आहे. हे देवाची पावर कमी होईल वैगेरे बालीश कारणं देण्यामागे जी काय मानसिकता आहे ते म्हणजे खाजगीकरण. खरेतर अस्पृश्यता, देवाची पॉवर इतकी वरवरची कारणं बघण्यापेक्षा माणसाच्या अंतर्मनात ह्या गोष्टी निर्माण होण्यामागे आणि चराचरात देव आहे ह्या भावनेच्या विरूद्ध वागण्यामागे काय इतिहास असावा, कुठून सुरू झालं, नेमकं काय कारण असावं यावर विचार करतोय. काहीतरी आहे जे इतरांपासून लपवून, सुरक्षित ठेवायचं आहे. कुणाला तरी काही तरी फायदा असल्याशिवाय ह्या मान्यता व भेदभाव निर्माण होणार नाहीत. नुसतं 'आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ' एवढ्याशा भांडवलावर ही व्यवस्था इतकी शतके चालू शकत नाही. गूढत्वाच्या भांडवलावर असेल तरी सुरुवातीस काहीतरी अनुभव आल्याशिवाय लोक मानणार नाहीत. म्हणजे दहा समान दर्जा असलेल्या व्यक्ती प्रवासाला निघाल्या पण रस्ता माहीत नाही, त्यातल्या प्रत्येकाने प्रयत्न करून पाहिला पण एकाचेच रस्त्याबद्दलचे अंदाज दोन-तीन वेळा सलग बरोबर निघाले की तोच त्या गटाचा म्होरक्या होतो. मग भलेही पुढचे सगळे अंदाज चुकत गेले तरीही पुर्वसंचितानुसार त्यालाच तो मान मिळतो. पुढे इतरांची मते लक्षात घेऊन तो अंदाज वर्तवेल पण शेवटपर्यंत इतर लोक त्यानेच आपल्याला कसे योग्य मार्गदर्शन केले ह्यावर विश्वास ठेवतील. चातुर्वर्ण्य व्यवस्था होऊन ब्राह्मण सर्वश्रेष्ठ ठरवण्यामागे ब्राहमणांचे असेच काहीसे योगदान कारणीभूत असेल काय? ज्याचा गैरफायदा घेऊन जन्मनिहाय व्यवस्था निर्माण झाली आणि पुढे श्रेष्ठ कनिष्ठ चे मत मानवी मनाच्या विकृत बाजूचे दर्शन करत प्रभावी झाले. मूळावरच घाव घातला तर फांद्या आपोआप तुटून पडतात. बाजीरावपेशव्यांनीच सांगितलंय. म्हणून मूळ शोधावे. ते मनुस्मृतीच्याही पलिकडे असावे. जाणकारांच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत.

In reply to by बॅटमॅन

गवि 03/12/2015 - 14:46
म्हणजे या न्यायाने दलितांच्या मंदिरप्रवेशाबद्दलची सर्व आंदोलने आणि महिलांच्या गाभाराप्रवेशाबद्दलची आंदोलने निरुपयोगीच ठरावीत, नै का?
माझा प्रतिसाद परत वाच. आजरोजीविषयी बोलायचं आहे. अ. जागा खाजगी आहे की सार्वजनिक मालकीची? ब. प्रवेश रोखणारा नियम अलिखित आणि लोकल पुजार्‍याने / बडव्यांच्या गटाने आपसात ठरवून केला आहे की मंदिराच्या ट्रस्टने अधिकृत ऑथॉरिटीसह केलेला आहे? यावर ते वैध की अवैध ते ठरेल. कधी भावना, कधी कायदा अशाने बरेच घोळ होतात.

In reply to by गवि

बॅटमॅन 03/12/2015 - 15:01
गाभाराप्रवेशाची आंदोलने गेल्या पाचेक वर्षांत झालेली आहेत. कर्नाटकातले उदाहरणही अलीकडचेच आहे. बाकी अधिकृत अ‍ॅथॉरिटीने घेतलेला निर्णय तांत्रिकदृष्ट्या वैध असला तरी योग्य असेलच का? ते अय्यप्पा मंदिरात पाळीवाल्या स्त्रिया ओळखण्यासाठी स्कॅनर बसवायचा निर्णय समजा उद्या अगदी अधिकृतपणे घेतला तर तुम्ही त्याला योग्यच म्हणाल का? वैध आणि योग्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दरवेळेस एकाच एक चौकटीत अशा गोष्टी पकडता येत नसल्या म्हणून नुस्ता घोळ आहे असे नाही.

In reply to by बॅटमॅन

अभ्या.. 03/12/2015 - 14:09
पुजारी हे माणसांचे प्रतिनिधी म्हणून देवापुढे गार्‍हाणे मांडतात, सेवा करतात तोपर्यंत ठिकच असते. जेंव्हा ते स्वतःला देवाचे प्रतिनिधी समजू लागतात तेंव्हाच अवघड होते. अशावेळी व्यवस्था त्यांना बदलते किंवा ते व्यवस्था बदलतात.

In reply to by संदीप डांगे

माहितगार 03/12/2015 - 13:57
@ डांगेजी
म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत.
काय होतय १) अनेक ऑदरवाईज सार्वजनिक असलेली मंदिरे/प्रार्थनास्थळे केवळ भेदभावाच्या सोईसाठी म्हणून खासगीपणा पुढे केला जाताना दिसतो यात कुणाच्या व्यक्तीगत घरात जाण्याचा तसा प्रश्न नाही आणि 'अतिथी देवोभव' म्हणणार्‍या संस्कृतीत अगदी घरातल्या मंदिरा बाबत सुद्धा भेदभावयूक्त व्यवहार आदर्श कसा म्हणता येईल ? २) मी समोरच्या परधर्मीय व्यक्तिशी माझ्या संस्कृतीतील उदात्तते बद्दल बोलणार आणि नंतर हजारो लोक जात असलेल मंदिर खासगी आहे आणि तुमच्या बॅकग्राऊंडमुळे प्रवेश नाही असे सांगणार यात माझ्या संस्कृतीच्या उदात्ततेच प्रदर्शन होत की कोत्या मनोवृत्तीच प्रदर्शन होते आहे?
म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत.
मी माझ्या धर्माचा संस्कृतीचा अभिमान ठेवतानाच, सहिष्णूता बाळगाणारा समधर्म समभाव बाळगणारा व्यक्ती आहे, मला माझ्या प्रमाणेच माझ्या मुलांमध्ये सहिष्णूता वृद्धींगत व्हावी आणि इतर धर्म आणि विचार पद्धतीचा परिचय व्हावा म्हणून माझ्या मुलांना विवीध धर्मांच्या धर्म स्थळांना भेटीस न्यावयाचे आहे त्यावेळी मुलांनो अमुक अमुक मंदिरे/प्रार्थनास्थळांमध्ये तुम्ही तुमच्या बॅकग्राउंडमुळे प्रवेशासाठी अपात्र आहात हे सांगणे नेमकी कोणती गोष्ट बाल मनांवर बिंबवते ज्यांना धर्मंच्या दुकानांवरच्या प्रवेश नाकारणार्‍र्‍या असहिष्णु पाट्या पाहून त्या मुलांकडून मोठे झाल्या नंतर सहिष्णूतेची अपेक्षा करणे कितपत रास्त ठरते या बद्दल मी साशंक आहे. असो.

In reply to by सायकलस्वार

अजया 01/12/2015 - 08:02
अरे वा हे सोपे तत्त्वज्ञान दिसते!कळायला अवघड गेला असेल विषय बाकीचा! चालु द्या निरर्थक अत्मरंजन! etc etc!!

In reply to by अजया

मितान 01/12/2015 - 08:49
@ सायकलस्वार, इथला तुमच्या मते गाभारा किती महत्वाचा आहे हे अधोरेखित केल्याबद्दल आभार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

In reply to by सायकलस्वार

पैसा 01/12/2015 - 09:37
सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा कमालीचा अभ्यास केलेला दिसतोय! का आताचा आयडी बॅन झाल्यावरची तरतूद करून ठेवली आहे! अभ्यास जोरात चालू ठेवा बरं!

In reply to by पैसा

बॅटमॅन 01/12/2015 - 12:08
सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा कमालीचा अभ्यास केलेला दिसतोय!
एका महिन्यात जर कुणी सालसपणे प्रतिसाद देऊ शकत असेल तर चार महिने लै झाले, नै का?

In reply to by पैसा

बॅटमॅन 01/12/2015 - 12:24
आमच्यासारखे बसतात बोंबलत.
चांगलंच आहे. बोंबलण्याचे फायदे काय असतात ते इथे पहावयास मिळेल. आरोग्यास हितकारकच असते. http://www.sanatan.org/mr/a/574.html त्या निमित्ताने सालसपणामागील अमंगळ निघून जाईल अशी भाबडी आशा करावयास हरकत नाही. =))

In reply to by सायकलस्वार

गणपा 01/12/2015 - 10:09
तायांनो थोडं विनोदानं घ्या की सायकलस्वाराचं वाक्य. :D का उगा वाढदिवसाच्या शुभेच्छा देउन राहीलात?

In reply to by सायकलस्वार

मृत्युन्जय 01/12/2015 - 11:09
पुरुषांना बंदी असलेला एक गाभारा इथे मिपावरच आहे म्हणे... हाहाहाहा. पण आत मध्ये देव आहे याची खात्री आहे का तुम्हाला? ;)

In reply to by मृत्युन्जय

पण आत मध्ये देव आहे याची खात्री आहे का तुम्हाला?
देव नाही ह्याची १००% खात्री आहे ... देवी असु शकेल कदाचित =))))

In reply to by मितान

बॅटमॅन 01/12/2015 - 15:19
डोक्यातल्या किड्यांची पूजा करत बसलं की असं होतं
त्या स्वमतांध दांभिक क्रायबेबी कंपूबाजांना आपली पूर्ण सिंपथी आहे. :) #छाणप्रतिसाद

In reply to by बॅटमॅन

मितान 01/12/2015 - 15:25
माझी तर अशा लोकांना नुसती सिंपथीच नाही तर किंड्यांविषयीच्या फोबियावर फुकट उपचार करणार्या संस्थांची यादीही तयार ठेवली आहे मी !

In reply to by बॅटमॅन

मितान 01/12/2015 - 15:25
माझी तर अशा लोकांना नुसती सिंपथीच नाही तर किंड्यांविषयीच्या फोबियावर फुकट उपचार करणार्या संस्थांची यादीही तयार ठेवली आहे मी !

In reply to by मितान

बॅटमॅन 01/12/2015 - 15:28
एकूण प्रतिसाद पाहून "कोण तो **चा म्हणतोय मी शिव्या देतोय म्हणून?" या अजरामर वाक्याची अठवण झाली. =))

In reply to by नीलमोहर

नीमो , चित्र सापडले आहे , फक्त तुर्तास संपादक मंडळ सुट्टीवर असल्याने चित्र इथे टाकले नव्हते , आपल्याला व्यनी करतो ;) बाकी चेष्टा मस्करी इतकी स्पोर्टींगली घेतल्याबद्दल आपल्यावर कारवाई वगैरे होईल की हो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

नीलमोहर 01/12/2015 - 16:54
Smiley नको नको व्यनि नको.. आणि संपादक मंडळच सुट्टीवर असल्यावर कारवाई कोण करणार :)

In reply to by नीलमोहर

pacificready 01/12/2015 - 17:12
>>>नको नको व्यनि नको. दूरदर्शन ची दारुबंदी ची जाहिरात आठवली. नको बाबा नको नको. संसार उद्ध्वस्त करी दारु, म्हणून संसार नका करु

In reply to by संदीप डांगे

माहितगार 30/11/2015 - 20:35
"....मंदीरप्रवेश आंदोलनाबद्दलही मला हाच प्रश्न पडला होता............जो स्वत: तुम्हाला जवळ घेऊ शकत नाही, तुमचे दु:ख दूर करू शकत नाही तो देव कशाला डोक्यावर घ्यायचा?....
कदाचित याच भावनेने सहसा लोक दुर्लक्ष करतात, अशी काही स्थाने असतील तर जाण्याचे टाळले जाते पण या दृष्टीकोणा बद्दल एक साशंकता आहे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी पाणी पिण्यास दिले नाही तर तुम्ही ते टाळाल दुसरीकडे जाऊन पाणी प्याल एका अर्थाने समतेच्या वागणूकीचा आग्रह बाजूस पडून एक अप्रत्यक्ष तडजोड स्विकारली जाते आहे. मी शीख धर्मीय असो वा नसो त्यांच्या डोक्यावर कापड बांधून पाय धुण्याची अट पूर्ण केली कि मला त्यांच्या धर्मस्थानात जाऊन दर्शन घेता येते. मी स्त्री आहे पुरुष आहे कोणत्या वर्ण धर्म पंथाचा आहे याने सहसा फरक पडत नाही. अशाच पद्धतीने इतर धर्मीय स्थळांमध्ये कुणीही आदर पुर्वक दर्शन/प्रार्थना करू इच्छित असेल तर त्यासाठी मुभा असावयास हवी आणि त्यासाठीचे आग्रह तुम्ही नास्तीक असाल अथवा इतर धर्मीय असाल तरीही सोडू नयेत कारण तुम्ही धरत असलेला आग्रह सुसंस्कृततेसाठी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सामाजीक समस्यांच्या संदर्भाने मी मागेही धागा काढला होता, तुम्ही धर्मस्थळात जाऊन प्रत्येक वेळी पुजा केली पाहीजे असे नाही पण एकदा तो अधिकार प्राप्त झाला की बाकी समाजात समतेच्या वागणूकीची खात्री करणे सोपे जाऊ शकते. मी आफ्रीकन ख्रिश्चन असेन तर काळ्यांच्या चर्च मध्ये जाउन तडजोड करेन पण दुसर्‍या समुदाया पासून तुटलेलाच राहीन ही जी सामाजीक दरी आहे ती सांधण्यासाठी म्हणून मला ऑदरवाईज रस नसला तरी गोर्‍यांच्या प्रत्येक चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करून येण्यास आवडेल. अर्थात आपण लाथ वगैरे शब्द सात्वीक रागाने जरी वापरला असला तरी आदरणीय उद्देशाने न येणार्‍यांना नाकारण्याचा एक वेगळा अधिकार धार्मीक स्थळांना प्राप्त होऊ लागतो याने सामाजीक दरी सांधण्यास मदत होते असे वाटत नाही म्हणून असे शब्द टाळावेत किंवा कसे.

In reply to by माहितगार

संदीप डांगे 30/11/2015 - 22:26
आता पुरेसा वेळ हाताशी नसल्याने तुमच्या प्रतिसादाचं उत्तर नंतर देईल वा वेगळा धागा काढेन, कारण इथे दलितप्रश्नावर चर्चा करणे मूळ धाग्याशी, विषयाशी प्रतारणा होइल. पण खालील मुद्द्यावर माझं मत मांडतो.
अर्थात आपण लाथ वगैरे शब्द सात्वीक रागाने जरी वापरला असला तरी आदरणीय उद्देशाने न येणार्‍यांना नाकारण्याचा एक वेगळा अधिकार धार्मीक स्थळांना प्राप्त होऊ लागतो याने सामाजीक दरी सांधण्यास मदत होते असे वाटत नाही म्हणून असे शब्द टाळावेत किंवा कसे.
'विशिष्ट मंदिरातच जागृत देव असतात' ही इतकी तकलादू आणि भ्रामक कल्पना भारतीय समाज कवटाळून बसला आहे की आपण एकाच बाबतीत वेगवेगळे विचारप्रवाह एकाच वेळी पाळत आहोत ते त्यांच्या लक्षात येत नाही. १. मनुष्य देवळात जातो. कारण देवाप्रति त्याला आपली भक्ती, श्रद्धा अर्पण करायची असते, आपले दु:ख, सुख याचे कारण तोच आहे असे समजून एक मालक-पालक-मित्र-सखा म्हणून त्याच्याशी गुजगोष्टी करायच्या असतात. आपले गार्‍हाणे सांगायचे असते, त्यावर त्याने काहीतरी करावे अशी अपेक्षा असते. थोडक्यात मंदीर हे एका व्यक्तिचे असते. भक्त तिथे स्वतःपुरते लाभ घेण्यासाठी जातो. अखंड समाजासाठी नाही. ते राजे, सत्ताधारी वैगेरे करतात. पण व्यक्तिगत पातळीवर देव हा वैयक्तिकच असतो. २. मंदिरात एक व्यवस्था असते, देवाची काळजी घेण्याची. त्याचे षोडशोपचार, पुजाअर्चा, आरत्या नैवेद्ये वैगेरे करणे गरजेचे असते. त्याची समाजातल्या एका व्यक्तिवर जबाबदारी टाकल्या जाते. परंपरेने वा कसेही चालत आलेले नियम, अटी हे गुरव, पुजारी, पुरोहित पाळत असतात जेणेकरुन 'देवाचे हित' जपल्या जावे. ह्यात स्त्रियांनी प्रवेश करू नये, रजस्वला स्त्रीने प्रवेश करू नये, अमूक जातीतल्या माणसाने प्रवेश करू नये असे नियम असतात. त्याची कारणे दैवी वैगेरे असतात. भारतात अशी बरीच मंदीरे आहेत जी विशिष्ट जातीची, उपजातीची आहेत. त्यांच्याशिवाय तिथे दुसर्‍या कोणाला प्रवेश नसतो. 'स्थानाची पवित्रता' जपणे हा उद्देश असतो. ही पवित्रता, नियम परंपरेने जसे आले तसे, थोडेसे आपल्याला सोयिस्कर ठरतील असे करत पुरोहित, गुरव पाळतात. इथे देव व पुरोहित यांचे हिताला प्राधान्य आहे, भक्तांच्या नाही. आमच्या कुलदैवतेच्या गाभार्‍यात पुरुषांना प्रवेश नाही, तिथे सगळे षोडशोपचार, विधी फक्त स्त्रिया करतात. ३. भारतीय मंदिरांचा इतिहास पाहू जाता. पुरातन मंदिरे व्यक्तिगत उपयोगासाठी, ध्यानपुजाअर्चेसाठी बांधलेली आहेत. गाभार्‍यांची रुंदी एकाच व्यक्तिला सहज बसता येईल अशी आहे. एक असाही संशय आहे की काही महत्त्वपूर्ण ज्ञान, वस्तू इथे सांभाळून ठेवलेल्या आहेत. मंदीर हे अतिशय व्यक्तिगत साधनेचे स्थळ आहे. कोणा राजाने, प्रधानाने, मंत्र्याने, सरदाराने स्वतःचे पैसे घालून एक चांगली जागा तयार केली असते. तीथे त्याने वा अजून कोणा तंत्रमंत्रात कुशल पुजार्‍याने पुजा करून वातावरण, जागा मंतरलेली असते. नित्य साधनेने तिथे एक जाणवेल असे वातावरण तयार होते. तिथे शांती लाभते. मग त्या जागेच्या दैवीपणाचे किस्से बाहेर पडतात. पण हे सगळे व्यक्तिगत आहे. त्यामुळे अशी व्यक्तिगत जागा कुठेही तयार करता येऊ शकते. पण ते वातावरण तयार करणे चटकन, झटपट होणारे काम नाही, त्यास कित्येक वर्षांची अखंड तपस्या लागते. अनिर्बंध हेळसांडीने ते वातावरण नाहिसे होऊ शकते. त्यामुळे अशी मंदीरे लोकांपासून सुरक्षित ठेवणे आले. त्यातून नियम बनले. पण जागृत देवस्थान म्हटले गेल्यावर जनसामान्यांना तेच पावरफुल वाटते आणि लोकांचा गार्‍हाणे मांडण्यासाठी तिकडेच ओढा असतो. ४. इतर धर्माच्या प्रार्थळास्थळांशी अजिबात तुलना करू नये कारण हिंदू हा व्यक्तिगत धर्म(आचरण) आहे. इतर धर्म हे सामुहिक धर्म आहेत. चर्च, गुरुद्वारा, मशीद इथे आपणास एकसमानता दिसून येईल की अनेक लोकांना एकत्र बसता येईल असा हॉल असतो. जिथे प्रार्थनास्थळ बांधतांनाच समाजाचा विचार केला गेला आहे तिथे 'कुणास मनाई करावी' हा विचारच मुलतः येणार नाही हे सरळ आहे. काळ्यांसाठी वेगळे चर्च असतील तर ते सरळ डिस्क्रिमीनेशन आहे. (आजकाल म्हणजे गेल्या वीस-तीस वर्षांतील नवीन मंदीरांच्या रचना बघितल्या तर आता समुहासाठी अशी खास मंदीरे गाव-शहरामधे चर्चच्या शैलीत बांधली जाऊ लागली आहेत. ज्यात हॉल बराच मोठा असतो, देवाची मुर्ती भींतीला टेकलेली असते, गाभार्‍यात पुजारी आणि दानपेटी राहील एवढीच जागा असते. देवाला स्पर्श करू शकत नाही. इथे आता एक क्रांती घडलेली आहे. या प्रकारच्या मंदिरांमधे कुणालाही प्रवेश बंदी नसते.) ५. देव चराचरात आहे, ज्याला जिथे भाव प्रकट होईल देव तिथे प्रकट होतो. म्हणून इथे-तिथे कुठेही दगडाला शेंदूर फासून अगरबत्ती लावलेली दिसून येते. मरीआई, म्हसोबा, सटवाई, आसरामाता, अशा जनसामान्यांच्या श्रद्धा स्विकारत भारतात लाखो ठिकाणी आहेत. इथे येता जाता कोणी नमस्कार करू शकतो. अगदी गायींपासून ते झाडांपर्यंत लोक दर्शनं घेत असतात. तिथं कोणालाही बंदी नसते. स्त्री, रजस्वला, दलित, कोणीही निषिद्ध नसतो. कारण तो सर्वांचा देव असतो, 'निसर्गदेव' असतो. असे सगळे आहे तर मग लक्षात येईल की काही विशिष्ट मंदिरांमधेच प्रवेशबंदी का? पण अशी प्रवेशबंदी असलेली मंदीरे किती आहेत? असली तरी ती खाजगी मालकीची किंवा विशिष्ट जातींसाठीची आहेत. तिथे त्यांचेच नियम चालणार. या नियमांविरुद्ध अपील होऊच शकत नाहीत त्याचे कारणे कितीही मूर्ख वा अवैज्ञानिक असली तरी. ते तिथे भेट द्यायला जाणार्‍यांना मान्य असलीच पाहिजेत. कारण नाहीतर विसंगती निर्माण होईल. जी शशीं प्रकरणात झाली, सबरीमाला प्रकरणात झाली. तुम्ही शनिदेवाला मानता पण त्याचे नियम नाही. हे मजेशीर आहे. त्यामुळे मंदिरांमधे प्रवेशबंदीला मी समर्थन देतो. एखादा देव मी मानतो तर त्याचे सगळे नियम मला मान्य असलेच पाहिजेत. शिवपिंडीवर मी मेणबत्ती नाही लावणार किंवा चादर नाही घालणार. व्यक्तिस्वातंत्र्याच्या, सन्माननीय वागणुकीच्या नावाखाली मला हे सर्व करण्याचा अधिकार आहेच. पण तो मूर्खपणा आहे ना? यावर उपाय काय? तर देव चराचरात आहे. प्रत्येक घरी गणपती बसतो, प्रत्येकाच्या घरच्या गणपतीत सेम देवत्व येतं. लाखो ठिकाणी शिवालयं, राममंदीरं आहेत, सगळीकडे प्राणप्रतिष्ठापना केलेले देव आहेत. मग दलितांनी, स्त्रियांनी आपल्यासाठी मंदीर बांधून घ्यावं, तिथेही तोच देव, तेच वातावरण करावं आणि सिद्ध करावं की देव ठायीठायी आहे, तुम्ही त्याला तुमच्या मंदिरात डांबुन ठेवुन मूर्खपणा करत आहात. पण असे होत नाही, झाले नाही. रजस्वला स्त्रियांना प्रवेशबंदी हा एक तांत्रिक मुद्दा बाजूला ठेवला तर दलितांना मंदिरात प्रवेश हा अनेक प्रश्नांना जन्म देणारा आहे. दलितांना मंदिरप्रवेश नाकारणे हा सरळ सरळ सामाजिक भेदभावाचा प्रश्न आहे. तो काही एका दिवसात तयार झालेला नाही. मंदिरात प्रवेश आहे म्हणून फार उचित सन्मान मिळतो असेही नाही हे देवदासींकडे, वाघ्यामुरळी, इत्यादींकडे बघुन कळते. त्यामुळे मंदिरात प्रवेश म्हणजे लगेच पाटील-ब्राहमणांच्या पंगतीत जेवायला मिळेल, त्यांच्या स्वयंपाकघरात प्रवेश मिळेल असे काही नव्हते, आणि झालेही नाही. (शहरातली उदाहरणे देऊ नये) ज्या देवाचा धर्म आपल्यासारख्या माणसाशी अमानुष वागण्याचे नियम बनवतो तो देव आपण कशाला मानावा हा विचार रुजवणे आवश्यक होते. जे आंबेडकरांनी अगदी योग्य पद्धतीने केले. जिथे आपल्याला सन्मान नाही तिथे जावेच कशाला हा साधा प्रश्न माझ्या 'लाथ' या शब्दामागे आहे. तुम्ही पाण्याचे उदाहरण दिले. तडजोडीबद्दल बोलत आहात. ज्या देशात रोटी-बेटी व्यवहार आपल्याच पोटजातीत व्हावे हा आग्रह असतो, तिथे मंदिरप्रवेशाने फार काही बदलत नाही. लोकांना आपल्याच जातीत, पोटजातीत मुली, मुलं बघावी लागतात. कितीही समकक्ष, समविचारी, जीवश्चकंठश्च मित्र असले तरी दोन वेगळ्या जातीत अरेंज मॅरेज होऊ शकत नाही हे स्वता:च्या डोळ्यांनी पाह्यलंय. इथे जी केली जाते ती अप्रत्यक्ष तडजोड नाही का? जात बंद, देव बंद, पंगत बंद अशा समाजाला 'लाथ' नाही मारायची तर का पूजा करायची काय? ह्याच सगळ्याला कंटाळून गावातील लोकांचा ओढा शहरांकडे वाढत असणे हे एक प्रकारे लाथ मारणेच आहे, तडजोड नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. बाकी माझ्या मतांशी प्रत्येकाने सहमत व्हावे असे नाहीच. तरी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 01/12/2015 - 11:13
अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला.. देवाच्या नावावर चालणार्‍या भ्रष्ट आचारा बद्द्ल तुमची स्वत:ची काही मते असतील. तुमच्या मतस्वातंत्र्याचा आदर आहे. परंतु दुसर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असली विधाने करणे कृपया टाळा. "सश्रद्ध लोकांनी अंगावर येउ नये" असा स्वतःच कांगावा करत तुम्ही हे असले काहितरी लिहयचे आणि आम्ही ते निमूटपणे वाचुन घ्यायचे ही अपेक्षा चुकीची आहे. यापुढे आपल्याला जे काही समाज प्रबोधन करायचे आहे ते योग्य शब्दात, योग्य भाषेत आणि योग्य प्रकारे कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे 01/12/2015 - 11:53
मागचे पुढचे काही न वाचता एक शब्द उचलून कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील सर्वस्वी अशक्य आहे. प्रतिसादात स्पष्ट लिहलंय की "जो देव तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या देवाला लाथ मारा." ज्यांना त्यांचा देव हे सगळे करतो (म्हणजे जवळ करतो, दु:ख दुर करून सुख-सन्मान-शांती देतो) अशी खात्री-विश्वास-श्रद्धा आहे त्यांच्या भावना दुखावणारं हे विधान आहे असं कसं काय ठरवलं जातंय? हे म्हणजे असं झालंय की मी म्हटलं, 'दारू पिणार्‍यांना चाबकाने फोडून काढलं पाहिजे' त्यावर 'दुध' पिणार्‍यांनी आक्षेप नोंदवावा का तर तिथे 'पिणार्‍यां'चा उल्लेख केला म्हणून. कुठल्याही विशिष्ट देवाचे नाव न घेता विधान केलं आहे, त्यात अशा देवाचं वर्णन आहे जो 'देव' ह्या सश्रद्धांच्या संकल्पनेत बसत नाही. मग त्यांच्या धार्मिक भावना का दुखावतात? शंकराला शिवी दिली तर मुस्लिम रागावतील काय? अल्लाहला शिवी दिली तर हिंदु रागावतील काय? जिजसला शिवी दिली तर जैनांना राग येईल काय? माझं विधान धार्मिक भावना दुखावणारं कसं आहे ते पटवून दिलंत तर तुमच्या अपेक्षेबद्दल विचार करता येईल. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे 01/12/2015 - 11:55
हे वाक्य असे वाचावे: मागचे पुढचे काही न वाचता एक शब्द उचलून कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील तर सर्वस्वी अशक्य आहे.

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 01/12/2015 - 12:42
"जो देव तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या देवाला लाथ मारा." डांगे साहेब हेच विधान जर आपण असे वाचले तर? "जो "बाप" तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या "बापाला" लाथ मारा." असे पटेल काय? आपण नास्तिक असाल पण शेवटी प्रत्येक माणसाची एक श्रद्धा असते( ती असणे बरोबर कि चूक हा एक वेगळा मुद्दा असू शकतो) त्याला आपण इतक्या सहज ठोकर मारता हे पटले नाही.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 01/12/2015 - 13:22
डॉक्टरसाहेब, जो "देश/समाज/धर्म" तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या "देश/समाज/धर्माला" लाथ मारा. असंही वाचून बघा. मला नक्की काय म्हणायचे ते लक्षात येईल अशी अपेक्षा आहे.

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 01/12/2015 - 12:49
आपल्याकडून अश्याच आक्रस्ताळ्या प्रतिसादाची अपेक्षा होती. तुम्ही तुमची वाक्य नीट वाचत नाही किंवा तुम्ही काय लिहिता ते तुमचे तुम्हाला कळत नाही. किंवा कदाचित मुद्दाम वाद निर्माण करण्यासाठी तुम्ही असले वाचाळ प्रतिसाद देता. पहिली गोष्ट म्हणजे तुमची दोन्ही वाक्ये वेगळी आहेत. ती एकत्र करुन लिहिली असतीत तर कदाचित वरचा प्रतिसाद तरी ग्राह्य धरला असता. दुसरी गोष्ट म्हणजे "लाथ मारा देवाला" हे पुर्णपणे अमान्य, अग्राह्य, अस्थायी आहे. तुम्हाला तुमच्या देवाबद्दलच्या भावना योग्य शब्दात मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे. पण देवाला लाथा मारा, त्याच्यावर थुंका, मुता (उरलेले दोन शब्द तुम्ही लिहिलेले नाहित. ते उदाहारणार्थ दिले आहेत) असली अग्राह्य भाषा ही मुळात एखाद्याच्या श्रद्धेबद्दल असलेली कमालीची असहिष्णुता दर्शवते. तुम्हाला तुमचा नास्तिकपणा गोंजारत बसण्याचा पुर्ण अधिकार आहे. मात्र हे करताना आस्तिकांच्या भावनेविषयी अनादर दाखवणे हे हीनपणाचे लक्षण आहे. चूक स्पष्टपणे दाखवल्यावर ती मान्य करुन दुरुस्त करण्यापेक्ष दुरुत्तरे करणे, वाद घालणे, आक्रस्ताळेपणा करणे हाच जर तुम्ही तुमचा युएसपी करु इच्छित असाल तर नाईलाज आहे. योग्य त्या भाषेत सर्वांनाच उत्तरे देता येतील. मात्र हे करताना "देवाला लाथा घाला" असली दळभद्री भाषा वापरणे किंबहुना कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी उगाच काड्या सारण्यासाठी असंस्कृत भाषा वापरणे आमच्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे प्रतिवाद करताना थोड्या मर्यादा जरुर येतील पण मलातरी पातळी सोडुन बोलणे शक्य होणार नाही. कुठल्याही विशिष्ट देवाचे नाव न घेता विधान केलं आहे, त्यात अशा देवाचं वर्णन आहे जो 'देव' ह्या सश्रद्धांच्या संकल्पनेत बसत नाही. मग त्यांच्या धार्मिक भावना का दुखावतात? शंकराला शिवी दिली तर मुस्लिम रागावतील काय? अल्लाहला शिवी दिली तर हिंदु रागावतील काय? जिजसला शिवी दिली तर जैनांना राग येईल काय? माझं विधान धार्मिक भावना दुखावणारं कसं आहे ते पटवून दिलंत तर तुमच्या अपेक्षेबद्दल विचार करता येईल. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल. तुम्ही कुठल्याही विशिष्ट धर्माचे नाव घेतले नाही म्हणुभाते धार्मिक भावना न दुखावणारे विधान आहे हा तर्क अजब आहे. देव ही वैश्विक संकल्पना आहे. किंबहुना जगातल्या ९९% धर्मांचा गाभा देव हाच असेल. देवाला कुठल्या स्वरुपात पहायचे याबद्दलचे प्रत्येक धर्माचे निकष वेगळे असु शकतील. पण म्हणुन देव ही संरचना नाकारता येतच नाही. एखाद्या अज्ञेयवाद्यासाठी देवाचे अस्तित्व नसणे हा समज योग्य असु शकतो पण जगाच्या पाठीवरील बहुसंख्य धर्मात देवाचे अतित्व मान्यच आहे. तुम्ही या संरचनेला उद्देशुनच "लाथा घाला" असे म्हटले आहे. इथे ते हिंदुंच्या देवासाठी म्हटले किंवा मुसलमानांच्या देवासाठी म्हटले हा मुद्दा पुर्णतः गैरलागू आहे. किंबहुना मुस्लिमांच्या देवासाठी बोललात तर धार्मिक भावना दुखावणार नाहित आणी हिंदुंच्या देवाबद्दल बोललात तर दुखावतील असेही काही नाही. वाटल्यास "मुस्लिमांचा देव" असे स्पष्टपणे लिहुन मग त्याला "लाथा घाला" असे वक्तव्य खुषाल करुन पहा. मला ते ही आवडणार नाही. पण तुम्हाला प्रयोग करुन बघायचा असेल तर करा की. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल. गंमतच आहे. कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली. उद्या तुम्ही म्हणाल की माझ्या वरील विधानावरुन माझा स्त्रीशिक्षणाला विरोध आहे असे समजावे लागेल. आता असल्या फालतु तर्कांना मी कं क्रवे ब्रं? ज्याची त्याची जाण समज वगैरे वग्रै.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे 01/12/2015 - 13:18
पण देवाला लाथा मारा, त्याच्यावर थुंका, मुता (उरलेले दोन शब्द तुम्ही लिहिलेले नाहित. ते उदाहारणार्थ दिले आहेत) हे अतिशय चिंताजनक आहे. आपण एखादं विधान कुठल्या बाजूने झुकणारं आहे हे स्वतःच ठरवून मो़कळे होता हे आधी मंत्रीमंडळाच्या विधानाबद्दल जे झालं तिथेच लक्षात आलं. इथेही तेच. ज्या वाक्याचा साधा अर्थ देवाला बंदिस्त करणार्‍या व्यवस्थेला नाकारा इतकाच अभिप्रेत आहे. 'लाथ घाला' म्हणजे तिथे जाऊन प्रत्यक्ष मुर्तीवर लाथ घाला असेच म्हटले असे तुम्ही कशावरून ठरवले? त्या विधानाला दुसर्‍या बाजूने ढकलत नेऊन 'थुंका-मुता' इथपर्यंत घेऊन जाणे, वरून मला असंच म्हणायचे होतं असे अर्थ काढणे म्हणजे वा! तुमची 'देव ह्या संकल्पनेला विरोध करणार्‍यांबद्दलची' स्वतःची मते माझ्यावर लादू नये अशी प्रांजळ प्रार्थना. कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली हेच तुम्हाला आणि इतरांना ज्यांनी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला त्यासाठी म्हणावेसे वाटते. माझे इतर धाग्यांवरचे ह्याच विषयाशी संबंधीत प्रतिसाद आपण वाचलेले नाहीत असे दिसते. तसेच माहितगार यांना जो प्रतिसाद दिला व त्याचे शेवटचे वाक्य उतावीळपणाच्या भरात आपण वाचलेले नाही असेही दिसते. अन्यथा आपण असा प्रतिसाद टाकलाच नसता. बाकी कोणत्या प्रॉडक्टचा युएसपी काय असावा हे कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार ठरते हे आपणास मी काय सांगावे. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 01/12/2015 - 14:42
हे अतिशय चिंताजनक आहे. आपण एखादं विधान कुठल्या बाजूने झुकणारं आहे हे स्वतःच ठरवून मो़कळे होता हे आधी मंत्रीमंडळाच्या विधानाबद्दल जे झालं तिथेच लक्षात आलं. इथेही तेच. तुम्ही काय लिहिता ते तुमचे तुम्हालाच कळत नाही वगैर वगैरे जे मी वरती लिहिले आहे. त्याचा संदरभ मंत्रिमंडळाचा धागच होता. तिथेही तुम्ही चुकीचे लिहुन माती खाल्ली आणि मग सारवासारव केली. इथेही तेच करत आहात. तुम्ही चुकीच्या प्रकारे लिहिता म्हणुन आम्हाला कळफलक बडवावा लागतो. ज्या वाक्याचा साधा अर्थ देवाला बंदिस्त करणार्‍या व्यवस्थेला नाकारा इतकाच अभिप्रेत आहे. 'लाथ घाला' म्हणजे तिथे जाऊन प्रत्यक्ष मुर्तीवर लाथ घाला असेच म्हटले असे तुम्ही कशावरून ठरवले? तुम्ही जे लिहिले आहे तेच मी उद्ध्रूत करतो आहे. तुम्ही स्पष्ट शब्दात "अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला.." असे लिहिले आहे. इथे "लाथा मारा" आणि "च्यामायला त्या" या दोन्ही शब्दसमूहांना माझा आक्षेप आहे. आणि तुम्ही जे लिहिले आहे तेच मी परत टंकले आहे. तुम्ही स्पष्ट लिहित जा म्हणजे नंतर असली सारवासारव करावी लागणार नाही. तुम्ही चुकीचे लिहित आहात आणि वर कांगावा करत आहात. हे पहिल्यांदा होते आहे असे नाही. पण इतर वेळेस तो मनुष्यस्वभाव म्हणुन सोडुन देता येइल. इथे धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये जाणुनबुजुन करुन तुम्ही वातावरण दूषित करत आहात. त्या विधानाला दुसर्‍या बाजूने ढकलत नेऊन 'थुंका-मुता' इथपर्यंत घेऊन जाणे, वरून मला असंच म्हणायचे होतं असे अर्थ काढणे म्हणजे वा! बघा. तुम्हीच किती आक्रस्ताळेपणा करत आहात. मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही 'थुंका-मुता' लिहिलेले नाही. लाथा घाला हे काही फार वेगळे वक्तव्य आहे असे नाही. बाकी मी अर्थ काहिच काढलेला नाही,. तुम्ही स्पष्टपणे लिहिलेले आहे. "तु गाढव आहेस. कुत्रा आहेस तु" असे लिहायचे आणि वर तोंड करुन म्हणायचे की "तु गाढवासारखा कष्टाळु आणि कुत्र्यासारखा प्रामाणिक आहेस असे मला म्हणायचे होते. तु चुकीचा अर्थ काढतोस" तर ती निव्वळ सारवासारव झाली. इथे स्पष्ट शब्दात "लाथ मारा च्यायला त्या देवाला.." असे लिहिले आहे तुम्ही. अर्थ काढायला पण वाव नाही ठेवलेला. तुमची 'देव ह्या संकल्पनेला विरोध करणार्‍यांबद्दलची' स्वतःची मते माझ्यावर लादू नये अशी प्रांजळ प्रार्थना. मी कुठलीही मते लादत नाही आहे. तुम्ही ओझे वाहत चालला आहात त्याला मी काय करणार? कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली काहीही बोलण्याची हद्द तर तुम्ही केली आहे. माझे इतर धाग्यांवरचे ह्याच विषयाशी संबंधीत प्रतिसाद आपण वाचलेले नाहीत असे दिसते. तसेच माहितगार यांना जो प्रतिसाद दिला व त्याचे शेवटचे वाक्य उतावीळपणाच्या भरात आपण वाचलेले नाही असेही दिसते. अन्यथा आपण असा प्रतिसाद टाकलाच नसता. स्वतः उतावीळपणे बेताल वक्तव्ये करायची आणी मग चोर तो चोर वर शिरजोर या न्यायाने तोंड वर करुन बोलायचे ही सवय आपली असावी. आमची नाही. बाकी कोणत्या प्रॉडक्टचा युएसपी काय असावा हे कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार ठरते हे आपणास मी काय सांगावे. प्रॉडक्टचा युएसपी प्रॉडक्टवरच ठरतो. त्यातले इंप्रोव्हायझेशन कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार होते.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे 01/12/2015 - 15:05
मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही 'थुंका-मुता' लिहिलेले नाही. लाथा घाला हे काही फार वेगळे वक्तव्य आहे असे नाही. बाकी मी अर्थ काहिच काढलेला नाही,. तुम्ही स्पष्टपणे लिहिलेले आहे.
तुम्हाला हिस्टरी चॅनलवरचा हा माणूस आठवतो काय? अगदी असंच बोलतो. cc

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय 01/12/2015 - 19:50
नाय ब्वो. आम्हाला काही असला कोणी माहिती नाही. पण वरचा तो फोटो बघुन कळाले की तुम्ही फक्त चुकीचे लिहितच नाही तर चुकीचे अर्थ पण काढता. तुम्ही जरा मराठी भाषा समजुन उमजुन लिहित चला बरे म्हणजे तुमच्याच डोक्यात गोंधळ कमी उडेल.

नूतन सावंत 30/11/2015 - 19:03
यावरून इंदिरा गांधीन पंतप्रधान असतानाही तिरुपती मंदिरात जाण्यास विरोध झाला होता त्याची आठवण झाली.तेव्हा इंदिरा गांधी मंदिरात न जाता परत गेल्या होत्या त्याची आठवण झाली.

In reply to by नूतन सावंत

बोका-ए-आझम 30/11/2015 - 19:45
केरळातील गुरुवायूर येथील प्रसिद्ध अय्यप्पा मंदिरात हा विरोध झाला होता. त्याचं कारण ते कार्तिकेयाचं (जो अखंड ब्रम्हचारी समजला जातो) मंदीर आहे असं सांगण्यात आलं होतं. तिरुपती मंदिरात असं काही असल्याचं पाहण्यात किंवा ऐकण्यात आलेलं नाही. चूभूद्याघ्या.

In reply to by नूतन सावंत

राही 01/12/2015 - 10:17
मला वाटते उडीशातल्या जगन्नाथ मंदिरात(ही) असा विरोध झाला होता. त्यांच्या हत्येआधी एक दोन दिवस. इंदिरा गांधींचे शेवटचे जाहीर भाषण या उडीशा दौर्‍यातले होते आणि 'माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून भारताला संजीवन मिळेल' या अर्थाच्या शब्दांमुळे कायम स्मरणात राहाण्याजोगे झाले आहे.

अजून एक गोष्ट दैनिकात वाचण्यात आली की भारतातील शंभर टक्के साक्षर म्हणुन मिरवणार्‍या केरळ राज्यातील घटना. आपण अजूनही मानसिकरित्या कसे विकलांग आहोत हे दर्शविणारी ही घटना. केरळमधील पठाणमधिटा जिल्ह्यात असणार्‍या सबरीमला मंदिराचे विश्वस्त यांनी एका मशीनची मागणी केली आहे. हे स्कॅनिंग मशीन मंदिराच्या सुरक्षेसाठी असेल असे वाटले परंतु तसे ते नाही. तर या मशीनद्वारे महिलांची पवित्रता सिद्ध केली जाणार आहे. मंदिर विश्वस्तांना असे वाटते की मासिक धर्माच्या काळात स्त्रीया अस्वच्छ आणि अपवित्र असतात. आता स्कॅनिंग करणारं मशिन मासिक धर्म असणार्‍या स्त्रीया ओळखणार आहे. आणि अशा ओळखलेल्या गेलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. कारण अशा विटाळलेल्या महिलांमुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता वाटते. जी गोष्ट नैसर्गिक आहे त्यामुळे देवालाही विटाळ होतो ? स्त्रीयांनी या गोष्टीला विरोध म्हणुन हॅपी टू ब्लीड ही चळवळ सुरु केलीच आहे. आपण ब्वॉ ही गोष्ट सबरीमला देवावर आणि शनिमहाराजावर सोडून दिली आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सतिश गावडे 30/11/2015 - 22:39
दुर्दैव... मंदिरातील देवाचं आणि त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ इच्छिणार्‍या स्त्रीयांचं.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

pacificready 30/11/2015 - 23:09
विश्वस्तांचा निषेध. बुद्धीची कीव कराविशी वाटते. देवस्थान सुधारा भगव्यान्नो आधी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करेक्ट ! पुरोगामी विचारांच्या लोकांनी ह्यॅप्पी टु ब्लीड वगैरे आंदोलने करत बसण्यापेक्षा असल्या दगडाच्या देवावर आणि संस्थानांवर बहिष्कार टाकावा . ह्याचे दुहेरी फायदे आहेत पुढील प्रमाणे १) पुरोगामी लोकांन्ना पुरोगामित्वाचा आनंद आणि समाधान मिळेल. २) परंपरावादी लोकांन्ना मंदीरात गर्दी कमी झाल्याचा अन निवांतपणे दर्शन घेता आल्याचा आनंद मिळेल. आणि एकच की परंपरावादी लोकांनी स्वतःच्या हुच्चतेची जाहिरात करु नये अन पुरोगामी लोकांनी त्यांन्ना चणे फेकुन मारु नयेत , बस्स इतकेच जमले तर सर्वेत्र सुखिनो सन्तु: हे साध्य होईल !! :)

गामा पैलवान 30/11/2015 - 23:25
च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे उमाळे दाटल्यावर संबंधितांना हिंदूंची मंदिरेच बरी आठवतात! एव्हढाच जर पुळका आला असेल तर स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी म्हणतो मी. कोणी अडवलंय! -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 01/12/2015 - 10:48
च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे उमाळे दाटल्यावर संबंधितांना हिंदूंची मंदिरेच बरी आठवतात!
आपण धागालेख नीट वाचला आहेत का ? स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करताना हा धागालेख कोणत्याही एकाच विशीष्ट धर्माला लक्ष्य बनवत नाही हे लेखाच्या शेवटी स्पष्ट नमूद केले आहे, अशा स्वरूपाच्या असमानता राखणार्‍या सर्वच धर्मसंस्थांच्या प्रबोधनाचे आवाहन या धागालेखातून आवाहन केले आहे. शनि शिंगणापूर हे केवळ चर्चा सुरवातीसाठी निमीत्तमात्र आहे. केवळ शनि शिंगणापूरला लक्ष्य बनवायचे असते तर धागा लेखाचे शीर्षक तसे लिहिले असते, ध्रर्मसंस्था आणि धर्मस्थळे संबंधाने पक्षपात टाळण्याचा अधिकतम प्रयास केला आहे.
एव्हढाच जर पुळका आला असेल तर स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी म्हणतो मी. कोणी अडवलंय!
गा.पै. आपल्या या वाक्याचा नेमका अर्थ लक्षात आला नाही अर्थ काय होतो ते कृपया स्पष्ट कराल काय ? म्हणजे इतरांना चर्चा करता येईल

In reply to by माहितगार

गामा पैलवान 01/12/2015 - 19:59
माहितगार, माझं म्हणणं अधिक व्यवस्थित शब्दांत मांडता आलं असतं. ते न केल्यामुळे तुमची आणि वाचकांची क्षमा मागतो. १.
स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करताना हा धागालेख कोणत्याही एकाच विशीष्ट धर्माला लक्ष्य बनवत नाही हे लेखाच्या शेवटी स्पष्ट नमूद केले आहे,
बरोबर आहे. जे लोकं मंदिरांतल्या विविध प्रथांना स्त्रीपुरुष भेदभावाचा रंग देऊ इच्छितात त्यांच्यासाठी माझा प्रतिसाद आहे. धागाकर्त्यासाठी नाही. २.
आपल्या या वाक्याचा नेमका अर्थ लक्षात आला नाही अर्थ काय होतो ते कृपया स्पष्ट कराल काय ? म्हणजे इतरांना चर्चा करता येईल
जिथेतिथे स्त्रीपुरुष समानता बघायची ज्यांना हौस आहे त्यांनी स्वत:च्या शरीराकडे बघायला शिकावं. आपलं शरीर आणि मन हेच मुळी स्त्रीपुरुष भेदभावावर आधारलेलं आहे. उगाच मंदिरबिंदिर अशा बाह्य ठिकाणी समानता पैदा करण्याऐवजी स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी. आ.न., -गा.पै.

एस 30/11/2015 - 23:36
'देव दानवां नरे निर्मिले' आणि त्यांचे नियमही. देव जर असलाच तर त्याच्यापाशी कसला भेदभाव असूच कसा शकेल? शनिशिंगणापूरच्या गावकर्‍यांनी शनिदेवाला दुधा-तेलाचा अभिषेक घालून स्वतःच्या कोतेपणाचे दर्शन घडवले आहे. देवाला विटाळ घडविणारीही माणसेच. आणि देवाचे शुद्धीकरण करणारीही माणसेच! अजब आहे सगळे...

In reply to by एस

सर्वच प्रस्थापित धर्मांमधे एक अनुस्यूत घटक म्हणून हा दुजा-भाव पहिल्या पासून आहे....ज्याना बदलायच आहे त्यानी बिनदिक्कत बदलाव.. धर्म आपोआप बदलेल..ज्याना जाणीव पूर्वक मागास रहायच असेल,त्यांना राहु द्यावे. ते आपोआप गाळात जातील. दुसरे धर्म बदलत नाहीत,मग आम्ही तरी का बदलाव? अस म्हणणाय्राना तर बदलाची इच्छा असलेल्यानी मुद्दाम स्वत: बदलून त्याची ताकद कमी करावी. जोपर्यंत इथे लोकशाही आहे , तो पर्यंत हे सहज शक्य आहे

In reply to by अत्रुप्त आत्मा

हो , व्यक्तिगत पातळीवर सत्यनारायणासारखी सरळ सरळ लुबाडणुक करणारी पुजा अन अन्य कर्मकांडे संपुर्णपणे बंद करणे आम्हाला जमले आहे :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

माहितगार 01/12/2015 - 11:45
@ अत्रुप्त एक चांगाला प्रतिसाद, असा प्रतिसाद देण्यासाठी धारीष्ट्य लागते. बाकी प्रगोंंच्या प्रतिसादाबाबत; सत्यनारायण कथेत कुठे दुजाभाव असण्याबद्दल अजून एकदा अभ्यासावी लागेल पण तरीही -सत्यनारायण कथेतील काही विश्वास तुर्तास बाजूस ठेवले तर- सत्यनारायण सर्वांचा समान सहभाग वाढवण्यास उपयूक्त आहे का त्या बाबत त्यात भेदभाव कमी असावा अंदाजा आहे जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by कवितानागेश

संदीप डांगे 01/12/2015 - 09:50
धागालेखकांनी एकाच धाग्यात दोन वेगवेगळे मुद्दे मांडलेत. मला तरी दोन्हींची सांगड कशी घालावी हे कळले नाही. माझ्यामते 'समानतेचे तत्त्व' पुरुषवर्गाला समजावून सांगण्यात स्त्रिया कमी पडतात असे त्यांना म्हणायचे आहे. आता समानतेचे तत्त्व न पाळणार्‍यांमधे स्त्रि-पुरूष असा काही भेद दिसून येत नाही. त्यामुळे तो मुद्दा रद्दबातल होतो. बहुतेक 'पुरूषांसोबत अर्ग्युमेंट मधे स्त्रिया कमी पडतात' असे त्यांना म्हणायचे आहे काय असा मला प्रश्न पडला कारण मग हा जरा गंमतीदार विषय होइल. शिर्षक वादग्रस्त असावे याचसाठी केला होता अट्टाहास असे वाटत आहे. धागालेखकांनी यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.

In reply to by संदीप डांगे

माहितगार 01/12/2015 - 11:05
बहुतेक 'पुरूषांसोबत अर्ग्युमेंट मधे स्त्रिया कमी पडतात' असे त्यांना म्हणायचे आहे काय असा मला प्रश्न पडला कारण मग हा जरा गंमतीदार विषय होइल.
=)) अहो काहीही काय ? =)) एनीवे हा विषय या धागा लेखाच्या परिघातला नाही. बाकी धागा लेखाचा मुद्दा क्रमांक १ तुर्तास चर्चेसाठी पुरेशी हिंट देणारा आहे असे वाटते. अधिक स्पष्टीकरण म्हणजे प्रश्नही मीच विचारला उत्तरही मीच दिले होईल म्हणून चर्चा बरिच पुढे गेल्यावर अथवा संपताना देईन.

In reply to by कवितानागेश

नीलमोहर 01/12/2015 - 09:58
" शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे." मोठ्या अपेक्षेने धागा उघडला होता या विषयी काही उपयुक्त माहिती मिळेल म्हणून, पण हे 'उल्लू बनाया बडा मजा आया' असं झालं आहे. बाकी जिथे आपलं स्वागत आहे तिथे जावं, जिथे नाही त्याचा विचारही करू नये असं आमचं तत्व. आमच्या आवडत्या तळ्यातल्या गणपतीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात, तिथे जाऊन डोकं टेकून यायचं. दर्शनासाठी न येता कचरा करायला येणार्‍या बुरखेधारी भक्तांना नो एंट्री, असा फलक न लावलेलं सहिष्णू देवस्थान आहे ते.

गॅरी ट्रुमन 01/12/2015 - 11:04
स्त्रियांना किंवा अन्य कोणालाही मंदिर प्रवेशापासून रोखणे अयोग्य आहे याविषयी फारसे दुमत नसावे. पण मंदिरात जाऊन काय होते, सगळी मंदिरे बंदच करा वगैरे विचार असणारे लोक हमरीतुमरीवर येऊन चर्चा करताना दिसले की जरा मजाच वाटते. समजा माझे असे मत आहे की दारूचे गुत्ते बंद करून टाकावेत आणि कुठल्या दारूच्या गुत्त्याने "ट्रुमन अडनावाच्या लोकांना प्रवेश नाही" अशा स्वरूपाची पाटी लावली तर त्यामुळे मला काय शष्प फरक पडणार आहे? अन्यथाही मी तिथे जाणार नव्हतोच त्यामुळे बंदी असली काय आणि नसली काय--- हू केअर्स? मंदिरांविरोधात असे मत नसणार्‍या इतर सर्वांचे आक्षेप मात्र नक्कीच ग्राह्य आहेत असे मला वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

संदीप डांगे 01/12/2015 - 11:33
इथे 'स्त्रियांना प्रवेशबंदी हे स्पष्ट भेदभावाचे निदर्शक आहे' हा चुकीचा ग्रह काहिजणांनी करून घेतला आहे असे दिसून येते आहे. त्यामुळे लगेच सामाजिक न्यायतत्त्वानुसार सर्वांना समान हक्क, दर्जा ह्याची भलामण करून सर्वांना मंदिरप्रवेशाचा आग्रह धरला जात आहे. पण हे इतके सरळ, साधे सोपे आहे काय? खरा मुद्दा साधनशुचितेचा आहे. वर काहींनी कपड्यांचे उदाहरण दिले आहे. कुणी बिकिनी घालून मंदिरप्रवेश केलेला चालेल काय? पुरुषांनी भले अंतर्वस्त्रांवर ओलेते गेले तर चालते, पण स्त्रियांनी तसेच करावे असा आग्रह धरून चालेल काय? तिथे समानतेचा आग्रह केला तर मान्य होईल काय? चपला, बूट घालून गेलेले चालेल काय? गुत्त्यात जायचेच नसेल तर प्रश्नच मिटतो पण ट्रुमन यांना गुत्त्यात जायची इच्छा आहे पण वय २१ पेक्षा कमी असल्याने प्रवेश नाकारला जाईल, त्यावेळी सामाजिक समानतेचा मुद्दा का लागू होत नाही हे सांगता आले तर बर्‍याच बाबी स्पष्ट होण्यास मदत होईल. तीच गोष्ट संवैधानिक पदांवरील व्यक्तिच्या वयाच्या अटीची, सरकारी नोकरीच्या पदावरील शैक्षणिक अर्हतेच्या अटीची. प्रत्येक जागी सरसकट प्रवेश नाकारणारे इतर मुद्दे असतात. तिथे भेदभाव होतो असे कसे म्हणता येईल?

बॅटमॅन 01/12/2015 - 12:08
या निमित्ताने उहापोह होतो आहे ही चांगलीच गोष्ट आहे. खुद्द कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळाच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश नव्हता अगोदर, पाळी ऑर नॉन पाळी. तो ब्यान उठल्याचे कळते, तसेच इथेही होईल मोस्टली होपफुली.

संदीप डांगे 01/12/2015 - 12:35
शनि मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदीचे कारण कळल्यास ह्या विषयावर अजून विस्तृत व समर्पक चर्चेस मदत होईल म्हणून सामान्य जनमानसात रूढ असलेल्या काही मान्यता: स्त्रियांच्या शनिमंदिर प्रवेशाला खरा कारणीभूत आहे तो मारूतीराया. कसा? तर मारुतीराया, हनुमान हा आजन्म ब्रह्मचारी आहे, शिवाय तो चिरंजीव आहे, परत तो सर्वव्यापी-विशाल आहे. 'हनुमानतत्त्व' असं काही मानल्या जातं. समर्थांनी महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी, गावोगावी मारुतीची प्रतिष्ठापना केली. गावात बलोपसाना व्हावी, त्यातून भक्ती आणि शक्तीची उपासना होऊन चांगले तरूण तयार व्हावे अशी त्यांची योजना. दुसरी मान्यता अशी की गावात मारुतीचे मंदीर असेल तर भूत-प्रेत-पिशाच्च यापासून गावाचे रक्षण होते. तीसरी मान्यता अशी की हनुमान हा जागृत देव आहे. म्हणजे त्याचे आवाहन केले तर तो खरंच त्या ठिकाणी येऊन भक्तांच्या समस्या दूर करतो. तो असे करु शकतो ही मान्यता इतकी घट्ट आहे कारण तो अजून जीवंत आहे, त्याला वेगवेगळे आकार, अवस्था घेता येतात ही मान्यता. त्यामुळे शक्यतो हनुमानमंदिरात गांभिर्य जास्त असते. तो इथेच आसपास आहे, आपण काही उलट सुलट केले तर कानफाटवेल अशीही भीती असते. चौथी मान्यता अशी की हनुमान वीर्यतेजाने संपृक्त आहे. त्याच्या नुसत्या उच्छवासाने वा अवतीभवतीच्या वातावरणाने स्त्रिया गर्भवती राहू शकतात. इतके त्याचे वीर्यतेज बलवान आहे. आता आपल्या लक्षात येईल की याचमुळे कुमारी मुलींना हनुमानमंदिरात बंदी असायची. (असायची असे म्हटले आहे कारण गेल्या १०-१५ वर्षात विचारधारा बदलत गेल्या). अघोरीसदृश्य तंत्रविद्येत मूल न होऊ शकणार्‍या स्त्रीने अनावृत्त अवस्थेत जाऊन मध्यरात्री हनुमानाची विशिष्ट तंत्राने पूजा करून हनुमानत्त्व जागृत करून त्यास प्रसन्न करणे व गर्भवती होण्याची इच्छा पूर्ण करणे असेही विधी आहेत. ह्याचे एक उदाहरण मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहे. म्हणजे मध्यरात्री स्त्री हनुमान मंदिराकडे जातांना पाहिली आहे. ते सर्व दृश्य पार टरकवणारे असते, त्यामुळे पुढे काही बघायची हिंमत झाली नाही. तेव्हा माझे वयही १५-१६ होते. हेच वीर्यतेज नव्याने गृहस्थाश्रमात प्रवेश करणार्‍या नवरदेवाच्या अंगात संचारावे म्हणून लग्नाआधी नवरदेवाला हनुमानमंदिरात दर्शनाला घेऊन जाण्याची प्रथा आहे. आजकाल मानवी अहंकार वाढल्याने ह्या प्रथेचे कारण विचित्रपणे बदलल्याचेही काही ठिकाणी दिसून येते. म्हणजे स्वतःमधे काहीच कमतरता नाही हे दाखवण्यासाठी त्याच्या विर्यतेजाची मला गरज नाही असे म्हणून त्याचे लग्न झाले नाही त्या बिचार्‍या ब्रह्मचार्‍याचा आशिर्वाद चांगला असेल म्हणून दर्शनाला आलो असं काहीसे. एवढं सगळं लक्षात घेतलं तर स्त्रियांनी हनुमानापासून दूर राहावे यामागचे कारण समजुन येईल. आता शनीमहाराजांनी काय घोडं मारलं? तर कुठल्याशा पुराणकथेनुसार शनीमहाराज हे हनुमानाचे अंकित आहेत, साडेसातीत त्रास कमी व्हावा म्हणून शनीसोबतच हनुमानाचीही उपासना करावी म्हणजे हनुमानजी शनीला तंबी देऊन आपल्या भक्ताचे त्रास कमी करून देतात. हनुमानजी आणि शनी हे एकसारखेच मानले जाऊ लागले. ३०-४० वर्षांआधी शनीमंदीर हे काही फार प्रस्थ नव्हते. एखाद्या गावात एखादे दुर्लक्षलेले शनीमंदीर असायचे. आता ते दुर्लक्षलेले नाही हा भाग वेगळा. पण हनुमानमंदिरापेक्षा शनीमंदिरास कमी महत्त्व होते, जे लोक साडेसातीने त्रस्त आहेत तेच तिथे पुजेला जात. पण तिथे गेल्यावरही हनुमानाचेच नियम लावत. परत शनीमहाराजांची कडक असल्याबद्दलची ख्याती. ह्यामुळे स्त्रियांना प्रवेश नाकारणे घडत आले आहे. ह्यात कुठेही भेदभाव, असमानता वैगेरे नाही. अनेक ठिकाणी आता स्त्रिया न घाबरता प्रवेश करत आहेत. काही हनुमान-शनी मंदिरांत अजून कर्मठ व्यवस्था आहे. हळूहळू सर्व बदलणारच आहे. वरील सर्व जनमान्यता आहेत. वैज्ञानिक सत्ये नव्हेत त्यामुळे चर्चा करतांना ह्याचे भान असणे गरजेचे.

pacificready 01/12/2015 - 12:40
गवि सर, तुमच्या टंचनिकेची- दिसायला ज़रा कमी सुन्दर आणि तत्त्वज्ञानात बऱ्यापैकी पक्की- बहिण डांगे अण्णा कड़े पाठवली आहे ना? खरं सांगा सर.
प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे.

पिंगा, बाजीराव मस्तानी, भन्साळी इत्यादी

वेल्लाभट ·

मांत्रिक 18/11/2015 - 17:12
सहमत! अगदी दुर्दैवी प्रकार आहे! इतिहासाची धडधडीत चेष्टा करणारा हीन आणि हिणकस सिनेमा..

नया है वह 18/11/2015 - 17:26
बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे.

नाव आडनाव 18/11/2015 - 17:29
भंसाळींच्याच देवदासमधलं गाणं चाललं, म्हणून तसंच इथेही करायचंय त्यांना. इतिहास काय आपण दाखवतोय काय, काही लॉजिकंच नाही. फक्त पैसा मिळाला पाहिजे, मग तो कसाही मिळाला तरी चालेल असं दिसतंय. नॉर्थ इंडियन लोकांना शाळेत (सीबीएसई) मराठी इतिहास कमी असतो, म्हणजे आधीच कमी माहिती त्यात अजून बाजीराव बघून असा नाच इतिहासात झालेला आहे हे एक आणि असे लावलेले अजून काही शोध हा असाच इतिहास आहे असंच वाटेल त्यांना. पेशव्यांच्या वंशजांना जेंव्हा पार्टिला बोलावलं होतं तेंव्हा (आणि आत्ता पण) ह्यात काहीच चूक वाटलं नाही का?

मारवा 18/11/2015 - 17:35
१- चित्रपटातील गाण्यात दाखवल तशी टोपी ती खरच घालत असे का ? २- ती त्यात दाखवलं तशी मॅन्डोलीन वाजवत असे का ? ३- त्यांच्या कडे तसा शीश महल वास्तवात होता का ? ४- दोन्ही स्त्रीयांमध्ये मैत्रीपुर्ण स्पर्धा दाखवलेली दिसते तशी खरोखर च होती का ? ५- लास्ट बट नॉट द लीस्ट मस्तानी ने खालेल्ला पान गळ्यातुन आरपार ते दिसत असे ते खर होत का ? आणि ते खर होतंच तर ती काही भयानक रोगग्रस्त वा अगदी आतल्या वाहीन्या दिसाव्या इतकी कृश होती का ? आणि असं शरीर असणं यात सौंदर्य कुणाला काय आढळल असावं. की हे आपलं नाजुकी उनके लब की क्या कहीए एक पंखुडी गुलाब की सी है इन पॉवो को जमीन पर ना रखना मैले हो जाएंगे की ते बोसा हमने लिया था ख्वाब मे आरीज उनके नीले पड गये टाइप शायरीइश कविकल्पनाच आहे ? बाकी बाजीराव बाजीराव सारखाच वाटतो दिसतो यात दुमत नसावे.

पिंगा ह्या गाण्यानी माझंही डोकं फार फिरवलं आहे आणि चेपुवर करायची ती चिडचिड करुन झालेली आहे. नऊवार नेसण्याचेही प्रकार असतात. पैकी मला आठवतय की मी जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये असताना एका आजींकडुन साडी नेसुन घेतली होती तेव्हा त्यांनी "पेशवाई" की "ब्राह्मणी" अशा प्रकारची समोरुन काठ परत कमरेला खोचायचा असतो अशी नऊवार नेसवली होती. अर्थात पदर दोन्ही खांद्यावर होता आणि पोट सोडा, पोटरी सुद्धा मागुन दिसत नव्हती. आता इथे साक्षात काशीबाई आपल्या सवतीच्या कौतुकाची गाणी गात, तिच्याकडे प्रेमभरल्या नजरेने पहात.. "मंगळागौरीची" गाणी गात लावणीच करत आहेत! क्या बात है!! लगे हाथो आयटम नंबर पण होऊन गेला पेशवाई साम्राज्यात. जिथे बायकांना दरबारी सुद्धा एका विशिष्ट दालनात, पडद्यामागे वगैरे बसण्याची पद्धत होती (ही माझी ऐकीव माहिती बर का) तिथे डायरेक्ट राणीच दणादणा नाचतेय.. मराठमोळा, जुन्या पद्धतीचा पदरेला कंबर खोचुन केलेला पिंगा नाही तर उघडी कंबर कचाकच हलवत आणि लावणीचे हावभाव करत!!! आहात कुठे..?? एका गटाचे असेही म्हणणे आहे की कसा का होईना, तुमच्या मराठी लोकांचा इतिहास तर जगभर पोहचवला ना... खरंय.. आम्ही दळभद्री लोक, तुमचे उपकार मानायचे सोडुन चिकित्सा करत बसलोय.. जोड्यानं दोन हाणा गालात, पण पिक्चर काढा आमच्या इतिहासावर.. तसंही तुम्ही काहिही दाखवलं तरी गल्ला भरणारच आहात. आम्ही पण मग "पिंगा"च्या रिमिक्स व्हर्जनवर गणपतीत नाचु.. हाकानाका..

In reply to by पिलीयन रायडर

स्रुजा 18/11/2015 - 19:28
अगदी १०० % सहमत. बुकलुन काढणार आहे मी त्या भन्साळ्याला !! काय त्रास आहे यार ! एक तर त्याने लावणी आणि पिंगा या दोन नाच प्रकारात जाम गोंधळ घातला आहे. लावणी ही मुख्यतः पुरुषांनी भरलेल्या रंगमंदिराला भुलवण्यासाठी म्हणुन केली जाते त्यामुळे ती नृत्यशैली पण थोडी प्रोव्होकेटिव आहे. पिंगा मंगळागौरी चा असतो, मुली मुली एकत्र येऊन जे खेळ खेळतात ते पिंगा !! इतके सुंदर खेळ असतात ते, आणि त्यात देखील मजा असते. जिची मंगळागौर असते तिला मध्यवर्ती ठेवुन अनेक लाडीक, खोडकर गाणी म्हणली जातात , आणि एंजॉय करतात. यात एक तर काशीबाई आणि मस्तानी लावणी स्टेप्स करतायेत. त्यात त्यांचा शेला गायब आहे. तू म्हणते आहेस तसं नौवारी नेसायची पद्धत अगदीच गंडली आहे. ९ वारी स्टाईल मध्ये घागरा चोळी वाटते आहे. मुळात वर वेल्लाभट म्हणतात तसं ती काही एक चीप प्रेमकथा नाही, तो काही कुणी छंदी फंदी माणुस नव्हता. एवढ्या मोठ्या राज्याची जबाबदारी उचलणारा, मनस्वी नायक होता. त्याला परिवार पण हवा होता आणि तो मस्तानी मध्ये पण गुंतला होता. काशीबाई देखील या दोन्ही मध्ये खुप भरडल्या गेल्या असणार. एवढा कर्तबगार नवरा , त्याची २ तितकीच हुशार मुलं पदरात; असं असताना प्रेम आणि त्यांचं स्वत्व यात सतत युद्ध चालू असणार. मी कल्पना देखील करु शकत नाही की त्या मस्तानी बरोबर लावणी म्हणतायेत , ते ही पिंगा पिंगा करत !! देवदास सिनेमामध्ये ही लिबर्टी चालून गेली कारण बोलुन चालुन तो एक कल्पनाविलास होता. इथे प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासामध्ये हा माणुस काय विचार करुन स्वत :ची भर घालतोय देव जाणे. त्यात ही , मुळात तो इतिहास आहे तसाच अत्यंत नाट्यपूर्ण आणि विस्मयचकीत करवणारा आहे. त्यात शौर्य आहे, प्रेम आहे, राजकारण आहे, कारुण्य आहे आणि सगळं अगदी ठासुन भरलं आहे. त्याला आणखीन ड्रामेबाज करायची गरज च का पडावी? दिपीका कितीही सुंदर असली तरी "मस्तानी" नक्कीच दिसत नाही. चिमाजी अप्पांच्या भुमिकेत वैभव तत्ववादी आहे ते योग्य पण बाजीराव म्हणुन रणवीर !!! पेशवे चित्पाव्॑नी गोरे नव्हते, युद्धाने रापले होते हे जरी मान्य केलं तरी घारे डोळे??? ते पण काळे झाले का? जरा देखील सत्याच्या जवळ जाणारं कास्टिंग नाहीये. हे असा भेसळ केलेला इतिहास लोकांसमोर येऊन काय उपयोग? बॉलिवुडी डान्स आणि शीश महल आणि बाकी चकाचौन गोष्टींशिवाय देखील मराठी इतिहास अत्यंत भव्य दिव्य होता कारण ती भव्यता कपड्यांवर आणि आजुबाजुच्या गोष्टींवर च फक्त अवलंबुन नव्हती. "लार्जर दॅन लाईफ" आयुष्य जगलेली माणसं तेंव्हा अस्तित्वात होती आणि खरं तर त्या मुळेच इतिहास घडला.

बॅटमॅन 18/11/2015 - 17:50
साला, पिच्चरच्या निमित्ताने पेशव्यांना तेवढीच प्रसिद्धी मिळेल म्हणून मी याची वकिलीच करत होतो आजवर...पण हे गाणे पाहून भ्रमनिरास झाला फुल्लच. देवदास काय सुटत नाय भन्साळीचा. दोन बायका पटकथेत आहेत म्हणून पारो आणि चंद्रमुखीच असाव्यात? अडाण** साले. हाड तेच्यायला.

In reply to by बॅटमॅन

मारवा 18/11/2015 - 18:00
बॅटमॅन जी बाजीराव एक उत्कृष्ठ योद्धा होता. व मस्तानी प्रकरणाकडेच त्याचा उल्लेख वळवला जात असतो. तुम्ही एकदा आपल्या इतिहासाच्या ज्ञानाने आम्हाला बाजीरावचं युद्ध लढाया आदी बाबतीतलं कर्तुत्वाची ओळख करुन द्यावी. आम्हाला ते ३९ लढाया एकही न हरता इतकीच एका ओळीची माहीती असते. आपण आपल्या इतिहासाच्या ज्ञानाने आम्हाला बाजीरावाच्या अ‍ॅज अ वॉरीयर ओळख करुन द्यावी. ही विनंती

In reply to by मारवा

रमेश आठवले 18/11/2015 - 21:44
दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटीश जनरल मोन्टगोमरी यांनी त्यांच्या The Concise History of Warfare या पुस्तकात बाजीराव पेशव्यांनी घोड दळा चा चपळतेने व सुरेख वापर करून नाशिक जवळ पालखेड येथे १७२८ साली निजामावर मिळवलेल्या विजयाची तारिफ केली आहे . फक्त वीस वर्षाच्या कारकिर्दीत बाजीरावांनी ३९ लढाया लढल्या आणि सर्वच्या सर्व जिंकल्या.

In reply to by रमेश आठवले

पालखेडच्या लढाईचे मॉडेल अमेरीकन सैनिकाना शिकवले जाते असे निनाद बेडेकरांच्या एका व्याख्यानात ऐकले होते ,गल्फ वॉर १ व २ मध्ये या तंत्राचा वापर झाला होता हे हि त्यांनी सांगितलेले आठवते.

In reply to by काकासाहेब केंजळे

राजाभाऊ 18/11/2015 - 23:12
पालखेड लढाई आणि अमेरिकन मिलिटरी स्कुल्स याचा संबंध शोधायचा प्रयत्न केला, हाती काहिहि लागलं नाहि. लाॅंग रेंज मिसायल्स, ड्रोनच्या (बी२ बाॅंबर तर दुर) जमान्यात हे थोडं फारफेच्ड वाटतंय... वाचण्यात आलंय कि हे बेडेकर साहेब, बाजीराव मस्तानी प्रोजेक्टवर भंसाळीचे ॲडवायजर होते. "पिंगा" गाण्यात प्रदर्शित केलेलं इतिहासाचं विक्रुतीकरण त्याना खटकलं नाहि?

In reply to by राजाभाऊ

मालोजीराव 18/11/2015 - 23:33
पालखेड लढाई आणि अमेरिकन मिलिटरी स्कुल्स याचा संबंध शोधायचा प्रयत्न केला, हाती काहिहि लागलं नाहि.
युनायटेड स्टेट्स मिलिटरी अकादमी,वेस्टपॉइंट,न्यूयॉर्क...हि माहिती डॉ. स्टुअर्ट गॉर्डन (मराठा इतिहासकार) यांनी एका भाषणात दिली आहे.

In reply to by राजाभाऊ

sagarpdy 19/11/2015 - 09:10
दुर्दैवाने निनाद बेडेकरांचे ६ महिन्यापूर्वी निधन झाले. तसेच ॲडवायजर ने कितीही सल्ले दिले तरी, दिग्दर्शक व निर्माते त्यांना काय करायचं ते करतातच. उदा. इंटरस्टेलर साठी कीप थोर्न ॲडवायजर म्हणून होते. तरीदेखील चित्रपटात भौतिकशास्त्राशी निगडीत चुका आहेतच.

In reply to by sagarpdy

राजाभाऊ 19/11/2015 - 21:19
बेडेकर गेल्याचं माहित नव्हतं. ते हयात असते तर त्यांनी नक्किच निषेध नोंदवला असता; तो कुठे दिसला नाहि म्हणुनच वरची शंका बोलुन दाखवली. बाकि सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात, इंटरस्टेलर या चित्रपटाच्या दरम्यान झालेली किप थोर्न, क्रिस नोलन ची मुलाखत बरंच काहि सांगुन जाते...

In reply to by राजाभाऊ

बॅटमॅन 19/11/2015 - 10:20
पालखेडच्या लढाईचा उल्लेख माँटगोमेरीच्या पुस्तकात आहे. तो स्वतः निनाद बेडेकरांकडूनच अस्सल पुस्तकात पाहण्याचे भाग्य लाभले आहे. मात्र मिलिटरी स्कूलमध्ये शिकवले जाणे इ. ला काही पुरावा आहे असे दिसत नाही.

In reply to by बॅटमॅन

मारवा 19/11/2015 - 11:11
बॅटमॅन राव थोडंस निनाद बेडेकरांची या लढाई संदर्भातील वक्तव्ये मते आपल्या बरोबर झालेला संवाद थोडा आमच्याही वाट्याला येऊ द्या ना. अस तुम्ही सांगितल नाही तर दुसरी बाजु उजळ बाजु कशी समोर येणार मग ? अप्रचलित झाकलेला भाग समोर येणं हे कधीही सर्वात जास्त महत्वाचं नसत का ? १०० तील १०० स बाजीराव म्हटला की मस्तानी माहीती असते मात्र पालखेडची लढाई कदाचित १०० तील १ स च माहीत असते.

In reply to by मारवा

बॅटमॅन 19/11/2015 - 12:51
विशेष चर्चा झाली नव्हती. माँटगोमेरीचा उल्लेख त्यांनी केला तेव्हा आम्ही पुरावा विचारला, लगेच हातासरशी त्यांनी काढूनही दाखवला. तेवढीच त्यासंदर्भात झालेली चर्चा.

In reply to by बॅटमॅन

"हाड तेच्यायला." +१ हे वाक्य बॅट्या जेवढ्या त्वेषाने बोललाय तेवढ्याच त्वेषाने बोलतो.... हाड तेच्यायला.

सर्वसाक्षी 18/11/2015 - 17:52
सहिष्णु वृत्तिने लोक चित्रपट पाहतील, भरपूर गल्ला जमेल. लोक चित्रपट गृहात शिट्या मारतील, बाहेर पडताना आजुबाला दिसणार्‍या मुलींकडे पाहुन 'ए मस्तानी' अशा हाका मारतील. नामवंत लोक 'या निमित्ताने आमचे बाजीराव पेशवे सार्‍या देशाला दिसले' असे भरभरून कौतुक करतील. झालच तर काशीबाई मस्तानी हे दोन धर्माच्या ऐक्याचे प्रतिक आहे असे म्हणत निर्मात्याला एखादं राष्ट्रिय एकात्मका पारितोषिक मिळावं अशी शिपफारसही करतील. मुळात चित्रपट पाहायला जाणारे दिपीका आणि प्रियांका पाहायला जातील, त्यांना बाजीरावाचा इतिहास कितपत माहित असेल कोण जाणे. अर्थात त्यांना त्याच्याशी सोयरसुतक नसेल. तीन तास टाईमपास धमालमस्ती. मध्यंतरात पॉपकॉर्न. तुम्हा आम्हा सारखे बाजीरावाचे प्रेम असलेले चित्रपट पाहायला जातील की नाही शंकाच आहे पण त्याने निर्मात्याला फरक पडणार नाही, जसा मूठभर सुशिक्षित लोकांनी मत न दिल्याने उमेदवारांना पडत नाही.

प्रसाद१९७१ 18/11/2015 - 18:02
अहो हे गाणे सिनेमात मधे नाहीये. सिनेमा संपल्यावर श्रेय-नामावली दाखवताना बाजूला हे गाणे दाखवणार आहेत. हल्ली तशी स्टाईल आहे ना. अश्या गाण्यांचा सिनेमाच्या कथेशी संबंध नसतो. पब्लिसीटी साठी अशी गाणी तयार करतात पण ती तशीच सिनेमात घालत नाहीत. हे पण तश्याच गाण्यांपैकी आहे. त्यामुळे कावून जाऊ नका.

In reply to by प्रसाद१९७१

कपिलमुनी 18/11/2015 - 18:21
गाणे सिनेमात मधे नाहीये. ? मग त्याने काय फरक पडतो ? पात्रे तर तीच आहेत ना ? बाकी रीलीजच्या अगोदरच तुम्हाला असलेली माहिती बघून तुम्ही सेन्सॉरमध्ये असता काय असा प्रश्न पडलाय

In reply to by कपिलमुनी

प्रसाद१९७१ 20/11/2015 - 10:07
गाणे सिनेमात मधे नाहीये. ?
नाही, सिनेमात नाही. प्रसिद्धी साठीचे गिमिक आहे.
बाकी रीलीजच्या अगोदरच तुम्हाला असलेली माहिती बघून तुम्ही सेन्सॉरमध्ये असता काय असा प्रश्न पडलाय
असते कोणाला आतली बातमी माहीती.

पैसा 18/11/2015 - 18:18
मी त्या गाण्याच्या ऑफिशियल व्हिडिओ यूट्यूबच्या पानावर शिव्या घालून आलेय. १३०० प्रतिक्रियांमधे शिव्या देणारी मी एकटीच असावी बहुधा. नुकताच लावणी-तमाशाचा इतिहास वाचला, http://digitalkatta.com/2015/11/01/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/ त्यानुसार तमाशात बायका नाचण्याच्या प्रकार पेशवाई संपून नंतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाला. बाजीरावाच्या काळात शाहिरी तमाशात नाचे पोरे असत. अशा परिस्थितीत बाजीरावाच्या दोन बायका लावणीचे हावभाव करत नाचतात तेही नऊवारी साडीच्या नावावर चिंध्या पांघरून हे सहन करण्यापलिकडचे आहे. नऊवारी साडी नेसून लावणी कशी सादर करतात हे बघायचे असेल तर सुरेखा पुणेकर, छाया माया खुटेगावकर वगैरेंचा कोणताही प्रोग्राम बघावा. बरे ज्याला पिंगा म्हटलंय तो पिंगाही नाहीच. मंगळागौरीला "दिंडा" नावाचा खेळ खेळतात. त्याच्या जवळपास जाणारे काही हातवारे आहेत खरे. या "फिल्मी स्वातंत्र्याच्या" नावाखाली जे काय दाखवले आहे त्याचा त्रिवार धिक्कार. शिरीष कणेकरांनी म्हटल्याप्रमाणे बाजीराव आणि निजाम "इमली का बुटा" म्हणत नाचतात का एवढेच बघायचे राहिले आहे.

In reply to by पैसा

रेवती 18/11/2015 - 20:19
येस्स! पिंगा हा कमरेत वाकून गोल फिरण्याचा प्रकार आहे. त्यात पाय न हलवता तसे घुमणे बरेच कठीण असते. त्या दोघी ज्याप्रकारे नाचल्यात तो पिंगा नव्हे.

In reply to by मारवा

पैसा 18/11/2015 - 18:32
या व्हिडिओमधे ०.५० ते १.० हात कोपरावर आपटून फट फट असा आवाज काढत जो खेळ आहे त्याला दिंडा मोडणे असे म्हणतात. या व्हिडिओमधे हे गाणे कोळी नृत्यासारखे बसवले आहे. पण त्यातला हाच भाग दिंड्याचा आहे.

पगला गजोधर 18/11/2015 - 18:24
शिवाजीमहाराज व थोरला बाजीराव, हे जात धर्म यांच्या पलीकडे पाहणारे संघटक, सहकाऱ्यात भावंड भावना जोपासणारे नेतृत्व, आणि उत्कृस्थ योद्धे होते. ( बारकाईने पहा त्यांचा जीवाला जीव देण्यार्यात दुसर्या जात धर्माचे होते, व त्यांच्या मार्गात काटे पसरवणारे त्यांच्याच जाती/ धर्माचे होते ) अश्या रण धुरांदाराच्या पराक्रमाकडे दुर्लक्ष करून, केवळ प्रणयजिवना विषयी लफडेबाजी म्हणून राळ उडवण्याचा करंटेपणा करणाऱ्यांची कीव येते.

In reply to by पगला गजोधर

शब्दबम्बाळ 18/11/2015 - 18:32
अहो मस्तानी तर त्यांची बायको होती!(बरोबर आहे ना?) मग कोणाला काय कारण लफडेबाजी वगैरे म्हणायचं? आणि तरीही म्हणत असतील तर ती त्यांची चुकी आहे...

हिंदी चित्रपटवाल्यांनी तर्क्,ईतिहास वगैरे वापरून चित्रपट बनववेत अशी अपेक्षा म्हणजे एखाद्या कट्टर मौलवीने घरी सत्यनारायण केल्यासारखे..चित्रपट फक्त चालला पाहिजे हेच व अगदी हेच ध्येय असते त्यांचे. असो. चित्रपटाकडे फक्त मनोरंजन म्हणून बघावे असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मोगा 21/12/2015 - 21:33
अगो ते मौलवी , सत्यनारायणवाले , राजे अन पेशवे सगळे आपापला व्यवसाय फायदेशीर कसा होइइल हेच बघायचे ना ? कधी युद्ध काय , कधी तह काय , कधी कुणाला मुलगी देणं काय आणि मुलगी घेणं काय , स्वतःचं सैन्य न वापरता दुसर्‍याच्या वानरसेकडुन सेतू बांधुन घेणं काय ... आपापला व्यवसाय किफायतशीर करण्याचेच हे सगळे प्रयत्न होते ! अन हेच सगळं भन्साळीनं त्याच्या व्यवसायात केलं तर तो मात्र वैट्ट !

अरेरे! असं आहे तर एकंदरीत ! मला वाटलं होतं की बाजीराव या काहीशा दुर्लक्षीत योद्ध्याच्या जीवनावर आधारित , मोठमोठे युद्धप्रसंग असलेला भव्य चित्रपट पाहायला मिळेल . आता केवळ बाजीरावांची बदनामी होऊ नये इतकीच माफक अपेक्षा ...

In reply to by मुक्त विहारि

मारवा 18/11/2015 - 18:56
खाणावळीत मित्राच्या खाणावळीत कधीमधी फिस्ट असली तरी तुम्ही जात नाही का ? म्हणजे स्पेशल आयटम असला तर अस म्हणतो. शेवटचे खानावळी कधी गेलेला ?

In reply to by मारवा

एका महान खानावळीत शेवटचे गेलो. सध्या तरी पंचतारांकित जेवण मिळत असल्याने आणि ते आता आयुष्यभर परवडत असल्याने, मुद्दाम वेडी-वाकडी वाट करून खानावळीत कशाला जाईन? राहता राहिला प्रश्र्न स्पेशल आयटम बाबत.... स्पेशल आयटम देखील आजकाल कुठले बुरखे आणि कुठली कुठली ठिगळे लावलेली वस्त्रे नेसून येईल ते काही सांगता येत नाही....

In reply to by मुक्त विहारि

भाऊंचे भाऊ 20/11/2015 - 19:02
आपण बरे आणि आपले हॉलीवूड बरे.
ब्रॅड् पिटच्या ट्रॉयमधेही ही सिनेमॅटीक लिबर्टी बरीच घेतलेली आहे.

In reply to by टवाळ कार्टा

अभ्या.. 20/11/2015 - 20:37
आता ते ससा आणि गंडस्थळ न आण्ल्याबद्दल धन्यवाद. . वासुकी आणी गांडूळ पाल आणि डैनासॉर किरडू आणि शेषनाग नेक्ष्ट टैम ह्या उपमा वापरल्या तरी चालेल.

सूड 18/11/2015 - 18:41
म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली.
अहो त्या पिढीत अर्थाअर्थी महाराष्ट्राशी आणि मराठी संस्कृतीशी संबंध असलेले किती असतील हा ही प्रश्नच आहे. तिथेही बीबीशीआयला ज्यायपीचा डबा जोडलेला असेल तर कौतुक करतील नाहीतर काय!! काल हापिसात यावर चर्चा चाललेली असताना एका मराठी महाभागाने विचारलेला प्रश्न ऐकून मी गारच पडलो. "काशीबाई ही बाजीरावाची बायको 'असते' का?"

In reply to by सूड

बॅटमॅन 18/11/2015 - 19:36
तिथेही बीबीशीआयला ज्यायपीचा डबा जोडलेला असेल तर कौतुक करतील नाहीतर काय!!
ह्याचा काय संबंध आहे? असला प्रश्न सूडकडून अपेक्षित नव्हता.

In reply to by सूड

मालोजीराव 20/11/2015 - 15:10
अहो त्या पिढीत अर्थाअर्थी महाराष्ट्राशी आणि मराठी संस्कृतीशी संबंध असलेले किती असतील हा ही प्रश्नच आहे.
सूड अरे त्यांची पिढी जाऊदे, इथे हिरोलाच माहित नाई कि खर्या हिरोच नाव काय आहे… 'बल्लाड' म्हणे :)) baji

In reply to by मालोजीराव

आदिजोशी 20/11/2015 - 18:08
Ballad शब्दाचा अर्थ एखादी कथा सादर करणारे काव्य. आपल्याकडे पोवाडा असतो तसाच काहीसा इंग्रजांचा पोवाडा म्हणजे Ballad. ह्याच शब्दाचा अजून एक थोड अप्रचलीत अर्थ म्हणजे रोमँटीक काव्य. त्या अर्थाने शब्द बरोबर आहे. आडनाव म्हणून वापरलाय असं वाटत नाही.

In reply to by खटपट्या

अभ्या.. 20/11/2015 - 21:09
अमरावती विदर्भातले पण करतेत. सकाडी सकाडी तड्याकडे पडायला जातो ना. ;) बरेच मुस्लीम पण असेच करताना एकलेय.

_मनश्री_ 18/11/2015 - 18:52
ह्या पेशवीणबाई आहेत का तमासगीरीण बाई ? आणि काशीबाई सवतीकडे इतक्या प्रेमाने का बघताहेत ? 1 2

In reply to by _मनश्री_

रेवती 18/11/2015 - 20:16
दागिने घालण्याचाही क्रम असतो. वरील चित्रात हातातील दागिने, म्हणजे तोडे हे सगळ्यात शेवटी घालायचे असतात, ज्यायोगे ते सगळ्यात पहिले दिसतात. आधी पाटली मग गोठ, नंतर दोन (किंवा तीन.......हव्या तितक्या) हिरव्या बांगड्या, एक बिलवर, दोन हिरव्या बांगड्या, पुन्हा एक बिलवर, दोन हिरव्या बांगड्या व शेवटी तोडा घालावा म्हणजे तो सगळ्यात पुढे दिसतो. ही जुनी पद्धत आहे. आजकाल जसे हवे तसे घालतात ही गोष्ट वेगळी.

In reply to by रेवती

स्रुजा 18/11/2015 - 20:20
परफेक्ट .. एक तर साड्या च धन्यवाद आहेत एकदम ! काठ पदर कुठे गेले त्या साड्यांवरचे? तू म्हणतेस तसं ही साडी मराठी नाहीच आहे. रमा माधव पण एकदम सॉरी सिनेमा होता पण त्यातल्या साड्या आणि बाकी सगळं नेपथ्य १०० % मराठी होतं

sagarpdy 18/11/2015 - 18:56
कालच कट्यार च्या धाग्यावर म्हणले कि - चित्रपट हे उथळ माध्यम आणि मसाला हे त्याच्या यशाचे गमक. पण बाजीरावाच्या स्टोरीत एवढा मसाला (पराक्रम & प्रणय दोन्ही) असताना हा नको तो मसाला घालायची काय गरज. अति मसाला झाला तर आम्लपित्त होणारच! आणि या नको त्या भानगडींमध्ये बाजीरावाची रणनीती (हि शस्त्र कलेहून वेगळी) गाळणार.

दिपक.कुवेत 18/11/2015 - 19:00
तू नळी वर पाहिले. वादाचा मुद्दा सोडला तर प्रियांका आणि दिपीका दोघीहि कातील दिसत आहेत नउवारी मधे. कंबर पण काय लचकवतायत. वा!! जी खुष हो गया. पण बाकी कोरस च्या नऊवारी बघता ह्या दोघींच्या रेडीमेड वाटत आहेत. शीवाय काठ मधेच खोचलेला वाटतोय. तो साईडला हवा (वर पिरा म्हणते त्या प्रमाने ती पेशवाई किंवा ब्राम्हणी असेल तर!!) बाकी चालू द्या....

पराचे फे बु वर सात्विकसंतापाचे बोल वाचले म्हणून तू नळीवर हे गाणे पाहिले, स्क्रिन फोडावासा वाटला. शेवटी कपाळाला हात लावून बसले. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

_मनश्री_ 18/11/2015 - 19:20
खरय गाण पाहून लॅपटॉप आणि त्या भन्साळीच थोबाड दोन्ही फोडावस वाटलं 1 2

आदिजोशी 18/11/2015 - 19:28
माननीय श्री. विनोदजी, नुकतेच फेसबूक वर श्री संजय लीला भंसाली ह्यांच्या बाजीराव मस्तानी ह्या चित्रपटातील 'पिंगा' गाणे बघायचे दुर्भाग्य मला लाभले. ह्या गाण्यात बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई आणि दुसरी पत्नी मस्तानी ह्या एकत्र लाडीगोडीने नाचताना दाखवल्या आहेत. हा इतिहासाचा केलेला केवळ बट्ट्याबोळ नसून चक्क विकॄतीकरण आहे. जगातील एकमेव अजेय योद्धा असे ज्यांना संबोधले जाते त्या बाजीरावांवर चित्रपट बनवल्याबद्दल श्री संजय लीला भंसाली जितके अभिनंदनास पात्र आहेत, तितकेच ते ह्या विकॄतीकरणासही जबाबदार आहेत. आधीच महाराष्ट्रातील वीर पुरुषांबद्दल भारतात फारशी कुणाला माहिती नाही. त्यात हे असलं काही तरी पाहून चुकीची प्रतिमा उभी रहायला नको. मुळात 'पिंगा' हे मंगळागौरीदरम्यान गायले जाणारे गाणे आहे. त्याचे सादरीकरण बघितले की लावणी बघत असल्याचा भास होतो. छत्रपतींचे पेशवे असलेल्या बाजीरावांची पत्नी आपल्या सवतीसोबत कंबर उडवत नाचते ही कल्पनाच सहन होत नाही. देवदासच्या निर्मीतीच्या वेळी कथेची अशीच मोडतोड करून सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून एक घरंदाज स्त्री आणि एक वेश्या ह्यांना एकत्र नाचताना दाखवलं होतं. पण शेवटी ती एक काल्पनीक कथा होती. हा आपला इतिहास आहे. खरा खुरा, घडलेला आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा इतिहास. त्याची अशी भयानक मोडतोड करून कसे चालेल? तो काळ, त्या वेळची संस्कॄती, पाळल्या जाणार्‍या मर्यादा, इत्यादिंविषयी मी तुम्हाला सांगायची अर्थातच गरज नाही. क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली आपल्या संस्कॄतीचे दिवसाढवळ्या होणारे हे विकॄतीकरण पाहवले नाही म्हणून आपणांस तसदी दिली. महाराष्ट्राचे सांस्कॄतीक मंत्री ह्या नात्याने आपण योग्य तो निर्णय घ्याल ही खात्री आहे. आपला, आदित्य जोशी

In reply to by आदिजोशी

_मनश्री_ 18/11/2015 - 19:37
@ आदित्य जोशी तुम्ही पत्र पाठवलंत हे चांगलं केलं पण ह्या पत्राने खरच काही फायदा होणार आहे का ? मला नाही वाटत ह्याने काही होईल

In reply to by आदिजोशी

_मनश्री_ 18/11/2015 - 20:06
पत्र पाठवू नये अस अजिबात नाही मी वरच्या प्रतिसादातही म्हटलं आहे की तुम्ही पत्र पाठवलंत हे चांगल केलं

In reply to by आदिजोशी

अ‍ॅडी, पत्र लिहिलेस ते उत्तमच केलेस. काहीतरी चांगली अ‍ॅक्शन घेतली जावी ऑथोरिटीजकडून अशी अपेक्षा करू या. स्वाती

माननीय श्री. विनोद तावडे जी, सांस्कृतिक कार्यमंत्री , महाराष्ट्र राज्य नुकतेच फेसबूक व यूट्युब वर श्री संजल लीला भंसाली ह्यांच्या बाजीराव मस्तानी ह्या चित्रपटातील 'पिंगा' गाणे बघायचे दुर्भाग्य मला लाभले. ह्या गाण्यात बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई आणि दुसरी पत्नी मस्तानी ह्या एकत्र लाडीगोडीने नाचताना दाखवल्या आहेत. हा इतिहासाचा केलेला केवळ बट्ट्याबोळ नसून चक्क विकॄतीकरण आहे. जगातील एकमेव अजेय योद्धा असे ज्यांना संबोधले जाते त्या बाजीरावांवर चित्रपट बनवल्याबद्दल श्री संजल लीला भंसाली जितके अभिनंदनास पात्र आहेत, तितकेच ते ह्या विकॄतीकरणासही जबाबदार आहेत. आधीच महाराष्ट्रातील वीर पुरुषांबद्दल भारतात फारशी कुणाला माहिती नाही. त्यात हे असलं काही तरी पाहून चुकीची प्रतिमा उभी रहायला नको. मुळात 'पिंगा' हे मंगळागौरीदरम्यान गायले जाणारे गाणे आहे. त्याचे सादरीकरण बघितले की बैठकीची लावणी बघत असल्याचा भास होतो. छत्रपतींचे पेशवे असलेल्या बाजीरावांची पत्नी आपल्या सवतीसोबत कंबर उडवत नाचते ही कल्पनाच सहन होत नाही. देवदासच्या निर्मीतीच्या वेळी कथेची अशीच मोडतोड करून सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून एक घरंदाज स्त्री आणि एक वेश्या ह्यांना एकत्र नाचताना दाखवलं होतं. पण शेवटी ती एक काल्पनीक कथा होती. हा आपला इतिहास आहे. खरा खुरा, घडलेला आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा इतिहास. त्याची अशी भयानक मोडतोड करून कसे चालेल? तो काळ, त्या वेळची संस्कॄती, पाळल्या जाणार्‍या मर्यादा, इत्यादिंविषयी मी तुम्हाला सांगायची अर्थातच गरज नाही. क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली आपल्या संस्कॄतीचे दिवसाढवळ्या होणारे हे विकॄतीकरण पाहवले नाही म्हणून आपणांस तसदी दिली. महाराष्ट्राचे सांस्कॄतीक मंत्री ह्या नात्याने आपण योग्य तो निर्णय घ्याल ही खात्री आहे. आपला नम्र एक "भन्साळीपीडित" मराठी माणूस ...

सागरकदम 18/11/2015 - 19:32
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या भन्साळी विरोधाची दखल चॅनेल्सनी देखील घेतलेली आहे. आताच TV9, जय महाराष्ट्र आणि प्राईम ह्या चॅनेल्सनी खास फोन करून ह्या संदर्भात माझी मुलाखत घेतली. आज उद्या मध्ये हे चित्रीकरण सगळीकडे दिसेलच. हे खरेतर तुमच्या सगळ्यांच्या पाठींब्याचे यश आहे. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद __/\__ प्रसाद ताम्हणकर

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 18/11/2015 - 20:08
आपली बहुतेक खफ वर याचसंदर्भात चर्चा झालेली. तेव्हाच मी याप्रकाराबद्दल शंका नोंदवली होती. अजून काय बोलावे..? बाजीरावासारख्या विस्मरणात टाकलेल्या महान इतिहास पुरूषाबद्दल आधीच योग्य असा चित्रपट/कादंबरी/नाटक निघाला नाही आणि जो काय निघाला तो तोही असा हे बघून कोणत्या मराठी माणसाची तळपायाची मस्तकात जाणारी नाही?

In reply to by टवाळ कार्टा

संदीप डांगे 19/11/2015 - 11:39
हे हे, तालिबान? नेहमी तालिबानच बरे आठवते बॉ तुम्हाला नेहमी. खाप, विहिंप, सनातन, बजरंग दल, श्रीरामसेने इत्यादी नै आठवत कंदी...

In reply to by संदीप डांगे

टवाळ कार्टा 19/11/2015 - 13:21
हे सगळे सुध्धा हिंदू तालिबान टैप किडे करत अस्तातच (फक्त कधी कधी...आणि उघडपणे नाही)...दूमत नाही

In reply to by संदीप डांगे

विवेकपटाईत 19/11/2015 - 19:35
या पैकी कुठलीही संस्था युद्धाची तालीम देत नाही किंवा असे युद्ध पुकारण्याची क्षमता कुठल्याही संस्थेत नाही. जास्तीस्जास्त थोड्या प्रमाणात थोड्या खुरापती करू शकतात.

रेवती 18/11/2015 - 20:08
हैला! चर्चा मिसली होती. फारच तणतण केली मी हे गाणं पाहून! भन्साळीला घातलेल्या शिवांचे कलेक्षन खरडफळ्यावर आहेच. तेथील प्रतिसाद हिकडे चिकटवते. आताच्या काळात आमची आजीबाई मला नृत्याचा क्लासात घालायला राजी नव्हती तर त्या काळात काशीबाईंना नाचायला कोठून परवानगी असणार? नाचवायचच होतं तर मंगळागौरीच्या गाण्यावर जरा जुन्या पद्धतीच्या स्टेप्स घेऊ द्यायच्या. पण हिकडे फुल्ल दंगा! मस्तानी ही सवत्/मिस्ट्रेस किंवा कोणीही असली तरी त्या काळी मुसलमान लोकही अदबशीर, खानदानी बाजाचे कपडे घालत असत. महाराष्ट्रीय महिला कंबरपट्टा घालून साडी चापून चोपून अंग झाकेल अशी नेसत असत. त्या गाण्यात खटकलेल्या गोष्टीच जास्त आहेत. पुरेश्या अभ्यासाआभावी नाचवलं, तेही दोघी सवतींना एकत्र, नऊवारी साडी ब्राह्मणी घरात ज्यापद्धतीने नेसतात तशी नेसवलेली नाही. एका शॉटमध्ये प्रियंकाने जराशी तशी साडी नेसल्यागत दिसते की पुन्हा जैसे थे! नको तिथे (किंवा हवं तिथे) अंगप्रदर्शन! हे गाणं कोणत्यातरी सणाच्या निमित्तानं केलं असल्यास आपल्याकडे जरीच्या साड्याच नेसत असत. अगदी काठापदराच्या. चांदीची जर वगैरे असल्याशिवाय माझी आजी साडी नेसायची नाही तर पेशविणबाईंची कथा काय सांगायची! वेलवेटची ब्लाऊजे आणि त्यावर जी कारागिरी आहे त्याला जर्दोसी काम म्हणतात. तेही शक्यतो मुसलमानी क्यार्‍याक्टरे पूर्वी त्यांच्या कपड्यांवर करत असत. नाचणार्‍या बायकाही अंग झाकतेल असे कपडे करत असत. पेशवाईत नऊवारी साडी नेसल्यावर त्यावर शेला असणे जरूरीचे असे. महिलांच्या कार्यक्रमातही राजेरजवाड्यांकडील महिला नाचत नसत. त्या हे कार्यक्रम बघून मनोरंजन करून घेत असत. अगदी आग्रह केला तर फुगडी घालत असत. इतिहास विषयात शून्य गती असलेल्या मला नेहमीच्या बघण्यातून जर इतपत माहित असेल तर त्या भन्साळ्याला इतके पैसे इनव्हेस्ट करताना एखादा तज्ञ हायर करता येऊ नये? हा शिनेमा बघण्याचे माझ्या फार मनात होते. थेट्रात जाऊन पेशव्यांचा शिनेमा पहावा, अगदी पर्फेक्ट नसणार हे गृहित धरले होते पण जरा महाराष्ट्रीय काही येऊ घातलेय म्हणून बरे वाटले होते. या गाण्याचे हिरमोड केलाय अगदी! काय मेलं डोकं त्या मनुष्याचं..........

विवेकपटाईत 18/11/2015 - 20:11
हि काल्पनिक कथा आहे, खर्या ऐतिहासिक घटनांशी या कथेचा काहीच संबंध नाही असे टायटल मध्ये दाखविले जाईल. आता हिंदीत सिया के राम येतात आहे, भव्य रामायण काळ बघायला मिळेल. अस्तित्वात नसलेल्या कथा पाहायला मिळतील. असो.

In reply to by विवेकपटाईत

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 20:15
मिपावर रामायण महाभरताच्या प्रक्षीप्त कथा चवीने चघळणारे अशा चित्रपटांवर किती ताठर भुमीका घेतात नै.

In reply to by काळा पहाड

नन्दादीप 19/11/2015 - 11:40
Chiefminister@maharashtra.gov.in / min_l&jd@maharashtra.gov.in DeputyChiefMinister@maharashtra.gov.in Min_Rev@maharashtra.gov.in / min_earthquakerehab@maharashtra.gov.in Min_Home@maharashtra.gov.in Min_Sports&YouthWelfare@maharashtra.gov.in Min_Forest@maharashtra.gov.in Min_Socjust@maharashtra.gov.in Min_Waterresources&cada@maharashtra.gov.in Min_Rdd@maharashtra.gov.in Min_Coop@maharashtra.gov.in Min_Energy@maharashtra.gov.in Min_Agri@maharashtra.gov.in Min_WSSD@maharashtra.gov.in Min_FCSCP@maharashtra.gov.in Min_PWD_PU@maharashtra.gov.in Min_FDA@maharashtra.gov.in Min_Horticulture@maharashtra.gov.in Min_Finance@maharashtra.gov.in Min_WaterResources_KVIC@maharashtra.gov.in Min_TD@maharashtra.gov.in Min_HigherEdu@maharashtra.gov.in Min_industry&Emp@maharashtra.gov.in Min_Textile@maharashtra.gov.in Min_Env@maharashtra.gov.in / Min_PH@maharashtra.gov.in Min_Labour@maharashtra.gov.in Min_ANHS@maharashtra.gov.in Min_W&CHD@maharashtra.gov.in जालावर शोधल्यावर हेच मिळाले...

तो भन्साळि राहुद्या महारष्ट्रातच मुळात पेशवे-पेशवाई हा किती आणि कोणासाठी अभिमनाचा विषय आहे ? त्यातून पेशवे केवळ ब्राह्मण होते म्हणून त्यांच्या इतिहासकडे मुद्दामुहून दुर्लक्ष केले जाते असो आपण कितीही कळफलक बडवुन काय फायदा ?

मंडळी आपले आक्षेप अधिकृत व्हिडिओवर प्रतिक्रियेच्या स्वरुपात लिहा. आतापर्यंत आलेल्या सतराशेहून अधिक प्रतिक्रियांमध्ये आक्षेप फारसे दिसत नाहीयेत. तसेच डिसलाइक्सही केवळ दोन हजारहून थोडे अधिक आहेत अन लाइक्स लौकरच १५ हजार होतील.

In reply to by श्रीरंग_जोशी

तिथे तर अस लिहून आहे...
This is not an Official website of Bajirao Mastani Film. We do not represent the official team of Bajirao Mastani or any part of it. We are just providing you the information about Bajirao Mastani movie. The content is strictly copyrighted and may not create again without permission .

In reply to by चांदणे संदीप

चित्रपटाच्या नावाने वेबसाइट असल्याने मला ती अधिकृत वाटली. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी तरी निर्मात्यांनी प्रत्यक्ष नाव वापरून अनधिकृत वेबसाइटबाबत तक्रार करायला हवी. चुकीची माहिती इथे दिल्याबद्दल मी दिलगीर आहे.

सागरकदम 18/11/2015 - 22:29
http://www.dnaindia.com/entertainment/report-pinga-controversy-bajirao-s-descendant-hits-out-at-sanjay-leela-bhansali-२१४६६२३ Pinga Controversy: Bajirao's descendant hits out at Sanjay Leela Bhansali

प्रसादराव पेशवे यांचे मुख्यमंत्र्यांना अत्यंत संयत भाषेत लिहिलेले ह्यासंदर्भातील पत्र पहा. . स्वाती

भंसाली बुवांना फार फरक पडणार नाहीच बहुधा, आजच एक अनुभव आला.. मी माझ्या एका नातेवाइकाकडे गेले होते, तिथे ३-४ बायका पोरी हे गाणं बघून खुपच चेकाळलेल्या किती मस्तंय मस्तंय करत आणि पुढ्च्या दिवाळीत याच गाण्यावर नाचायचं म्हणून... हे लोक १००% मराठी आहेत, मराठी माध्यमातून शिकलेले आहेत...

In reply to by दिपाली पाटिल

भाऊंचे भाऊ 19/11/2015 - 11:40
गाणं, डान्स संगीत सगळे उत्तम आहे. फक्त हे असं गानं पेशव्यांच्या चित्रपटात नको होतं असं टीजर बघुन नक्किच वाटतं. एकुणच चित्रपटाची काटछाट अथवा राडा होण्याची शक्यता भरपुर आहे. लेट्स सी.

आपल्याकडे खुद्द महाराष्ट्रात आणी उर्वरीत भारतात बाजीराव म्हटले की मस्तानी एवढेच लोकांना ठाऊक आहे त्यात आता पिंगा गाण्यामुळे सोशल मिडीयावर जी राळ उडाली त्याने खेदाने नमूद करावेसे वाटते की त्याचा ह्या सिनेमाला आयती नकारात्मक प्रसिद्धी मिळाली , आजकाल नकारात्मक प्रसिद्धी ही सिनेमाच्या पहिल्या ३ दिवसात गल्ला भरायला कामी येते. भारतात मला एखाद्या सिनेमाच्या आधी त्याचे ट्रेलर किंवा परीक्षण पाहून त्या सिनेमाच्या लायकीची कल्पना येउन सुद्धा लोक्स सिनेमाला पहिल्या आठवड्यात हजेरी लावतात. अनेक जण सिनेम पाहतोय असे चेपू वरून जगाला सांगतात. मग दुसर्या दिवशी चेपू वरील भिंती वर, समूहात त्या सिनेमाची चिरफाड करणारे परीक्षण खरडतात. तेव्हा त्यात सिनेमाची बिनपाण्याने करतांना हा सिनेमा आपण पैसे देऊन थेटरात पहिला , ह्याचे त्यांना सोयरसुतक नसते. वाईट सिनेमा पाहिला कि असह्य तगमग होते तर मग १ आठवडा कळ काढून थांबावे , सोशल मिडिया वर व आप्त स्वकीयांच्या कडून सिनेमाच्या वद्दल खात्री करून मग तो पहावा. पण अनेक परीक्षणसम्राट हे केवळ जनतेने वाईट शिनेमा पाहून पैसा खर्ची करू नये म्हणू अडीच तासाचे हलाहल स्वतः नेत्राने प्राशन करतात. येथे पोटतिडकीने प्रतिसाद देणारे कितीतरीजण थेटरात जाऊन काय नक्की भन्साळी ने गोंधळ घातला आहे हे स्वःताच्या डोळ्यांनी थेटरात जाऊन येतील आणि बाहेर येतांना खेटर खाल्या सारखा चेहरा करून बाहेर येतील. आणि मग तावातावाने सिनेमाला नावे ठेवतील पुढे असे सिनेमे १०० कोटीच्या वर गल्ला कसा जमवतात ह्या बद्दल सखेद आश्यर्य व्यक्त करतील. बाजीरावांच्या कर्तुत्वावर प्रेम व श्रद्धा असेल तर आज सगळ्यांनी पण करूया हा सिनेमा थेटरात जाउन पाहायचा नाही, पंचतारांकित नगरीत स्वागत आहे आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

स्रुजा 19/11/2015 - 03:40
बरोबर आहे तुमचं. आणि आजकाल तर १०० कोटी हा आकडा १० रुपयाचं चॉकोलेट खाल्लं इतक्या सहजतेने उच्चारतात. एक तर बर्‍याचशा उत्तर भारतीय जनतेला अशा ओव्हर द टॉप चित्रीकरणाचं आकर्षण आहे आणि त्याहीपेक्षा जास्त बाहेरील देशांत. हल्ली बड्या बॅनरचे सिनेमे मध्य पूर्वेत, उत्तर अमेरिकेत, कधी कधी काही युरोपियन देशांत एकत्र रीलीज होतात. मल्टीप्लेक्स चं तिकीट बघता आणि निव्वळ चकाचौन वाल्या बॉलिवुड सिनेमांचं बाहेर असलेलं आकर्षण बघता १०० कोटी कितीही रद्दी सिनेमा असला तरी गोळा होतातच. त्यात अजुनही काही मार्केटिंग गिमिक्स असतील. धुम ३ आणि प्रेम रतन नी जर २-३०० चा गल्ला गोळा केला तर मग बाकीबद्दल काही बोलायलाच नको. सिनेमाचा दर्जा आणि मिळणारा पैसा यांचा आपापसात सुतराम संबंध नाही. आतादेखील काही अ-मराठी भारतीयांच्या अगदी भारावुन गेलेल्या प्रतिक्रिया आहेत. आपण उगाच सात्विक संताप करत बसण्यात काही पॉईंट नाही. ते गाणं, तो सिनेमा बरेच पुरस्कार देखील घेऊन जाणार आहे . उद्या कदाचित करण जोहर भन्साळीला त्याच्या शो मधे बोलावुन या "काँट्रोव्हर्सी" बद्दल विचारेल , भन्साळी काहीतरी तद्दन दिखाऊ उत्तरं देऊन मराठी जनतेलाच मुर्ख ठरवेल. त्यामुळे गेला उडत तो भन्साळी आणि खड्ड्यात जाऊ दे तो सिनेमा !

नगरीनिरंजन 19/11/2015 - 05:25
भन्साळीकडून काय अपेक्षा होती? या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हाच कळले होते की काय होणार आहे. बाकी एक-दीड टक्के लोकसंख्येने पिच्चर पाहिला तरी १०० कोटी जमा होत असल्याने त्या आकड्यांना काहीही महत्त्व नाही. भन्साळीसारख्या येडपटांना आधीच जागा दाखवायला पाहिजे होती. त्याचा हम दिल दे चुके सनम हा पिच्चरच इतका इरिटेटिंग होता की पुढचे त्याला काढू दिले हेच आश्चर्य आहे.

पॉइंट ब्लँक 19/11/2015 - 09:33
आयला, मिपावर कोणी उदारमतवादी धर्मनिरपेक्ष मंडळी जिवंत नाहित का? त्यांच्याकडून खालील प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. १. मराठी माणसाचा कट्टरवाद फार वाढला आहे. भारतातील "Intolerance" वाडवण्यासाठी मिपावरचे असे लेख हातभार लावतात २. मिपावरील हा लेख म्हणजे कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्यांची उघड उघड गळचेपी आहे. ३. नऊ वारी साडी नेसून पोट दाखवले म्हणून आरडाओरडा हे बुरसटलेल्या मनोवृत्त्तीचे लक्षण आहे. कुणी काय दाखवावे हा ज्याचा त्याचा "my chioce" आहे. ४. वरील लेख आणि त्याला आलेले प्रतिसाद पाहता काही सहिष्णु मंडळी मिपावरील सनातनी विचाररसणीमुळे दुखावले गेले आहे. असे सर्व लेखक, छायाचित्रकार आणि शास्त्रज्ञ (ह्यांचा काय संबंध हा प्रश्न विचारू नये) दिवाळी अंकातून आपले लेख मागे घेण्याच्या विचारात आहेत. मिपातर्फे शनिवार वाड्यावर जंगी पुरस्कारवापसी सोहळा आयोजित केला जावा !

In reply to by पॉइंट ब्लँक

आणि त्या सोहळ्यात ह्या गाण्यावर सोनाली कुलकर्णी (ज्यु.) व अम्रुता खानविलकर यांचा या गाण्यावर नाच असावा (मधेच "लघुगुरु" बाजीराव म्हणुन स्पेशल अ‍ॅपिअरन्स)

In reply to by पॉइंट ब्लँक

विवेकपटाईत 19/11/2015 - 19:39
अरे बाबा हा सिनेमा पुरोगामी लोकांनी बनविला असता तर मिपावर असे आक्षेप निश्चित आले असते. नयनतारा यांना सा.अ. पुरस्कार मिळाला आहे, अधिकांश लोकांना वापसी नंतर कळले.

नमस्कार, या गाण्यावर वाद याचमुळे आहे, की हे गाणे काशी बाई आणी मस्तानी वर एकत्रित चित्रित झाले आहे, मुद्दा असा पण वाचण्यात आलाय की मूळ सिनेमा मधे हे गाणे नाही, तर शेवटी दाखवले जाईल, अर्थात त्याने वाद समाप्त होत नाहीच... काशी बाई या पायाने अधू होत्या, त्यामुळे त्यांना नाचता येणे शक्य नाही, मुळात काशी बाई आणि मस्तानी बरोबर का नाचव्यात... ही सरळ सरळ इतिहासाची दिशाभूल आहे...एक मात्र खरं, या मुळे slb ची प्रसिद्धी नक्की होणार

"माळव्यातली हिरवीगार शेते..बाजीराव घोड्यावरून...मस्तानी पुढे फेर धरून नाचत जातीये...बाजीराव उतरतात मस्तानीचा हात धरुन गोल फिरवतात (शारुख स्टाईल)...पुढच्या सीनमधे मस्तानीच्या जागी काशीबाई...मागे शिंदे..होळकर वगैरे खासे हातात तलवारी घेऊन उधे गं अम्बे उदे स्टाईलने नाचतायत...बरोबर नऊवारीमधील बाया (झी मराठी पुरस्कार स्टाईल)...मग प्रत्येक कडव्याला मस्तानी व काशीबाई आलटुन पालटुन येतात" अशी ज्याची प्रतिभा त्या संजयने फक्त "पिंगा" वर भागवले ह्याबद्द्ल आपण खरंतर संजयचे जाहीर आभार मानायला हवेत व पुढिल वर्षीचा "महाराष्ट्र भूषण" त्यालाच मिळायला हवा व औस्कर मधील मानांकन सुदधा... आणि इथे मराठी लोक्स नऊवारी ब्राम्हणी की साधी रितीभाती वगैरे चर्चा करत बसलेत. "मस्तं पिक्चर बघा आणि थंड बसा" (आ. बाळासाहेबांना स्मरुन...) ता. क. कदाचित असं एखादं गाणं असेलही. मला माहीत नाही. असल्यास वरील लिखाण सपशेल मागे घेतले जाईल...

In reply to by एक सामान्य मानव

जिन्क्स 19/11/2015 - 12:07
सहमत. बर्‍याच लोकांचा आक्षेप काशीबाई आणि मस्तानी एकत्र नाचण्यावर आहे. बाकी त्या कोणत्या पद्धतीने नऊवारी नेसल्या आहेत, बाजीरावांचे डोळे घारे दाखवले आहेत की काळे हे सगळं "poetic leverage" म्हणून माफ करता येईल. अजून चित्रपट रिलीज पण नाही झाला तरी त्याच्यावर एवढी आगपाखड. समजा, भंसाळी नी इतिहासाशी जास्त प्रतारणा न करता, पालखेड- भोपाळ च्या लढाईची सुंदर दृश्ये (ट्रोय स्टाइल) दाखवली, बाजीरावांची रणनीतीचं नाही पण युद्धनीती पण सुंदर रित्या लोकांसमोर आणली आणि हे जे गाणं आहे ते शेवटच्या एंडिंग ला पाट्या पडतानी दाखवले तर त्याच्या ह्या बारीक सारीक चुका कट्टर मराठी माणूस नक्कीच माफ करेल. तस्मात, चित्रपटाची वाट बघा आणि चुकीचं काही दाखवले असेल तर वाट लावा.

सिरुसेरि 19/11/2015 - 13:57
"भाऊंचे भाऊ - Thu, 19/11/2015 - 11:40 गाणं, डान्स संगीत सगळे उत्तम आहे. फक्त हे असं गानं पेशव्यांच्या चित्रपटात नको होतं असं टीजर बघुन नक्किच वाटतं. एकुणच चित्रपटाची काटछाट अथवा राडा होण्याची शक्यता भरपुर आहे. लेट्स सी. " -- सहमत . +१ संजय लीला भंसालीचा "खामोशी - द म्युझीकल" सिनेमा खुप सुंदर , अर्थपुर्ण होता. पण नंतरचे सिनेमे जास्तच व्यावसायिक होते . असे वाटते कि , जर आशुतोष गोवारिकरने "बाजीराव" सिनेमा बनवला असता , तर तो जास्त चांगला झाला असता .

चलत मुसाफिर 19/11/2015 - 15:56
मुळात भारतातले लोक रोज बागेत जाऊन एक गाणे म्हणतात अशातला भाग नाही. त्यामुळे कुठलेच चित्रपटगीत वास्तववादी असू शकत नाही. मानापमानात रुक्मिणीने का कोणीतरी गाणी म्हटली ती कशी चालली? बाजीराव असला तरी त्याने चोवीस तास तलवार घेऊन युद्धच करायला पाहिजे की काय? काशीबाई या आयुष्यात कधीही नाचल्या नाहीत किंवा नाचणे या शब्दाची त्यांना चीड होती असा पुरावा उपलब्ध आहे काय? नसेल तर मग काय बिघडलं त्या घटकाभर नाचल्या म्हणून? भगतसिंह आणि त्याचे जिच्याशी लग्न ठरले होते ती मुलगी (बायको नव्हे) हेही प्रत्येक हिंदी सिनेमात गाणी म्हणताना दाखवले आहेत. लोकांना काही तो खरा इतिहास वगैरे वाटला नाही.

आबा 19/11/2015 - 15:57
नाच फारतर काल्पनीक आहे असं म्हणता येईल, विकृत कसा काय ?

In reply to by वेल्लाभट

आबा 19/11/2015 - 16:20
कमरेला झाडू आणि गळ्यात मडके, वगैरे गोष्टी दाखविल्या असत्या तर विकृत ठरला असता, डान्समध्ये काय वि़कृती आहे ?

In reply to by आबा

कमरेला झाडू... वगैरे गोष्टी दाखविल्या असत्या तर विकृत ठरला असता आता तुमच्यावर दिल्लीत एक निषेधाची प्रेस कॉन्फरन्स होणार बघा ! ;)

In reply to by आबा

बॅटमॅन 19/11/2015 - 17:55
काशीबाईला पायाचे दुखणे होते म्हणतात. शिवाय सवतीबरोबर असा डान्स, तोही अगदी बिनघरंदाज थाटाच्या बेंबीदर्शन साड्या नेसून केलेला दाखवणे हे चूकच. हेत्वारोप करावा की नाही हे ज्याचं त्यानं आपापलं ठरवावं, परंतु असे काही दाखवणे पाहून हेत्वारोप करावासा वाटणे यात काही चूक नाही असे वाटते. वैसेभी पेशवा म्हणजे सन ऑफ अ लेसर गॉड, त्यांच्या नावाला इतके उपद्रवमूल्यही नाही. त्यामुळे तितका परिणाम होणार नाही.

In reply to by बॅटमॅन

आबा 19/11/2015 - 22:40
१) काशीबाईंना असलेले पायाचे दुखणे विचारात न घेणे २) सवतीसोबत नाचताना दाखवणे ३) तात्कालीन पद्धतीचे पोषाख न दाखवणे या सरळ सरळ फॅक्चुअल चूका आहेत, यात ईतिहासाचे विकृतीकरण काही नाही

In reply to by बॅटमॅन

आबा 20/11/2015 - 15:31
हो तुमचं बरोबर आहे,, फॅक्ट्च्युअली चूकच आणि विकृतही म्हणता येईल, मुख्य मुद्दा म्हणजे, आर्टिस्टीक लिबर्टी घेऊन इतिहासाचं इंटरप्रिटेशन यापूर्वीसुद्धा झालेलं आहे (ऊदा. - राऊ, राजा शिवछत्रपती, श्रीमान योगी, मृत्युंजय, मी नथुराम गोडसे बोलतोय, वगैरे). असं इंटरप्रिटेशन चांगलं/वाईट्/विकृत कसंही असू शकतं. आपल्या अहंगंडांना सुखावणारं इंटरप्रिटेशन तेवढं लालित्यपूर्ण, आणि थोडं वेगळं असलं की विकृत; ही मांडणी तात्विक नाही. त्या डान्स मध्ये काय व्हल्गर/विकृत आहे, ते त्यांनाच माहीत. असो. पेशव्यांनी चालवलेला थयथयाट, थोडा जरी ऐतिहासिक कन्सिस्ट्न्सी साठी असता; तरी मी अहंगंड वगैरे शब्द वापरले नसते, परंतू तो तसा नाहीय याची मला बर्‍याच अंशी खात्री आहे. मोअरओव्हर, काशीबाईंच्या ऐवजी मस्तानीला नाचताना दाखविले असते तरी त्यांनी पत्र लिहिण्याचे कष्ट घेतलेच नसते (ते असं मान्य करायचे नाहीत, हेही मला माहीत आहे). आमच्या थोर, खानदानी (इत्यादी) घरातल्या स्त्रीया डान्स करत नाहीत, हा भन्साळ्या कोण लागून गेला आमच्या बायकांना नाचवणरा अश्या प्रकारचा पंचरंगी माज आहे. तुमचा स्वतःचा विरोध फक्त अ‍ॅक्युरसी साठी आहे, तरीही तुम्ही विकृत का म्हणंत आहात ते मला कळंत नाहीये.

In reply to by आबा

बॅटमॅन 20/11/2015 - 15:41
आमच्या थोर, खानदानी (इत्यादी) घरातल्या स्त्रीया डान्स करत नाहीत, हा भन्साळ्या कोण लागून गेला आमच्या बायकांना नाचवणरा अश्या प्रकारचा पंचरंगी माज आहे.
मुळात काशीबाईस पायाचे दुखणे असतानाही ती नाचली असे दाखवणे हे विकृत वाटते. हे चेष्टा केल्यासारखे वाटते. शिवाय तत्कालीन समजानुसार खालच्या दर्जाचे मानले गेलेले गुणविशेष दाखवणे हेही खटकतेच. यात माज कसला आला?

In reply to by बॅटमॅन

आबा 20/11/2015 - 15:46
ते आणि तत्सम गुणविशेष खालच्या दर्जाचे आहेत, असे अजूनही मानणे (आणि तेच पत्राचे कारणही असणे) हा माज

In reply to by बॅटमॅन

नाखु 20/11/2015 - 15:56
हे इतीहास-विकृत प्रदर्शनाचे समर्थन करणार्या अस्सल विचारवंताना प्र्शन करतो की तुमच्या घराण्याच्या इतीहासावर एखादा माहीती पट बनविला आणि त्यात तुमच्या आज्जीला खालील गाण्याप्रमाणे दाखविले तर तुम्ही तुमच्या आप्तेष्टासहीत मिटक्या मारत पहाल काय ? असेच समर्थन कराल काय? चला त्या निमित्ताने तुमच्या घराण्याची माहीत+जाहीरात तरी झाली सगळ्या जगाला असे ऊर बडवून सांगाल काय ? का त्यांचे खरेच काही कर्तुत्व होते ते दाखविण्याचा आग्रह धराल ?
इथे उत्तरे द्या किंवा देऊ नकाच, फक्त घरी गेल्यावर आपल्या आईसमोर आणि कन्येसमोर उत्तरे द्या आणि त्यांचीच उत्तरे इथे टंका.

In reply to by नाखु

बॅटमॅन 20/11/2015 - 16:02
नाखुकाका, ही तुलना गंडलेली आहे. पेशव्यांबद्दल आदर- प्रेम जरूर असावा, मात्र जिथे तिथे हे तुमच्या घराण्याबद्दल बोलले तर काय वगैरे प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. याने साध्य काहीच होत नाही.

In reply to by बॅटमॅन

नाखु 20/11/2015 - 16:11
बॅटमण त्यांनी पेशवे यांनी लिहिलेल्या पत्रातील मुद्द्यांना आक्षेप घेतला आणि शिवाय त्यांच्या घरंदाजपणाबद्दल अनावश्यक टिप्पण्णी केली. मी त्यांच्या पत्र लिहिण्याच्या आणि मुद्द्याच्य समर्थान ही तुलना केली आहे उदाहरण दिले आहे. जर तू आणि मी ज्यांचा दूरान्वयेही पेशव्यांशी संबध नाही अश्यांना हे सारे अत्यंत आक्षेपार्ह वाटते तर त्यांच्या खर्या खुर्या वारसांना काहीच वाटत नसेल का? तरी तुला राग आला असेल तर आधीक उणे क्षमा.. तडजोडी नाखुस

In reply to by नाखु

बॅटमॅन 20/11/2015 - 16:20
जर तू आणि मी ज्यांचा दूरान्वयेही पेशव्यांशी संबध नाही अश्यांना हे सारे अत्यंत आक्षेपार्ह वाटते तर त्यांच्या खर्या खुर्या वारसांना काहीच वाटत नसेल का?
त्यांना काय वाटेल याची चिंता आपण कशाला करावी? आपल्याला त्यांच्या पूर्वजांविषयी त्यांच्या पराक्रमामुळे प्रेम आणि आदर आहे. त्यांच्या खानदानात जन्माला येणे हा फक्त एक जैविक अ‍ॅक्सिडेंट आहे. त्यात त्यांचे काहीसुद्धा कर्तृत्व नाही. त्याचे इतके कौतुक कशाला? वंशजांना काय वाटेल त्याची चिंता वंशजांनी करावी. आपल्याला जे खटकतं त्याला विरोध केला ना, तेवढं बास आहे.

In reply to by नाखु

आबा 21/11/2015 - 00:13
एक मिनिट, फालतू कांगावा करू नका, मी कोठे त्यांच्या घरंदाजपणा बद्दल टिपण्णी केली? मी त्यांच्या पोकळ अभिमाना विषयी बोललो, जे त्यांच्या फेसबूक वरील इतर कमेंट्स वाचल्या तरी सहज समजेल (सध्या अकांऊंट डीअ‍ॅक्टीव्हेट केलेले आहे ). कलाकारांच्या दिसण्या विषयी केलेलविषयी केलेल्या कमेंट्स तर सरळ रेसीस्ट आहेत आणि, त्यांच्या घरंदाज पणा बद्दल मला काही घेणे देणे नाही, असो. आता तुमच्या आधीच्या प्रश्नाविषयी- माझं सोडा, माझ्या आजीला सुद्धा अश्या डान्सचा फरक पडला नसता यापेक्शा सुद्धा पॉईटेड प्रश्न असा विचारता आला असता, की "माझ्या आजीने असा डान्स केला असता, तर मला चालला असता का?" ज्याचे उत्तर असे आहे की, माझ्या आजीला स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे अस मी मानतो.. हाच तुमच्या आणि माझ्या मधला फरक आहे.. आता मुख्य प्रश्न, पिंगा गाण्यामध्ये व्ह्ल्गर्/विकृत काय आहे ?

In reply to by आबा

स्रुजा 21/11/2015 - 00:17
असं करा, प्रतिसाद देण्यात वेळ न घालवता एकदा वरची चर्चा वाचुन तरी या. त्यात यातल्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरं आहेत. आणि रेसिस्ट???? कहर आहे.

In reply to by स्रुजा

आबा 21/11/2015 - 00:44
मी बरेच नाही, एकच प्रश्न विचारला आहे की पिंगा गाण्यात विकॄत किंवा व्हल्गर काय आहे? त्याचं उत्तर वरती नाहीय, वरती इतकंच सांगितल आहे की ते गाणं ऐतिहासिक नाही

In reply to by आबा

रेवती 21/11/2015 - 00:50
पिंगा घालण्यात विकृत असे काही नाहीये. पिंगा गाण्यात जो आहे त्याला दिंडा म्हणतात. ही सगळी चर्चा व त्या गाण्यातील चुका यांची सांगोपांग चर्चा याच धाग्यात झालेली आहे.

In reply to by आबा

स्रुजा 21/11/2015 - 00:58
पिंगा गाण्यात त्यांच्या साड्या कशा नेसवल्यात ते बघा. त्या दोघी लावणीच्या स्टेप्स करतायेत. या स्टेप्स् मुळीच मंगळागौरीच्या खेळाच्या नाहीत. बाकी कल्चरल सेन्सिटिविटी बद्दल मी आधीच लिहिलं आहे http://misalpav.com/comment/772589#comment-772589, ते सगळं नाहीये तस्मात चुकीचं आहे, शिवाय त्या काळी पेशव्यांची पत्नी लावणी च्या स्टेप्स करतीये हे विकृतीकरण च आहे. लावणीच्या स्टेप्स सोज्वळ नसतात. त्याकाळच्या समाजमान्यतांना, घरंदाजपणाच्या मानदंडाला सरळ सरळ धाब्यावर बसवलंय . आणि इतिहास बदलायची गरज नाही, तो फिक्शन नाही.

In reply to by आबा

सूड 21/11/2015 - 00:26
१) तुम्हाला पिंगा कधी खेळतात/घालतात, कशासंदर्भात असतो माहीतीये? २) तुम्हाला लावणीचा संदर्भ माहीतीये? ३) 'पिंगा- द सेन्शेशनल लावणी नंबर' अशी पब्लिसिटी केलेली माहीतीये? ४) दोन्हीची सरमिसळ तुम्हाला पटत्ये? येवढं सगळं माहीत असूनही तुम्हाला जे काय दाखवलंय योग्य वाटत असेल तर पुढे प्रतिसाद देण्यात काही पॉईंट आहे असं मला तरी वाटत नाही.

In reply to by सूड

आबा 21/11/2015 - 00:50
या सर्व प्रश्नांची माझी उत्तरे हो अशी आहेत सेन्सेशलायझेशन चा उद्देश पैसा कमावणे असा आहे, जो जगातल्या प्रत्येक व्यवसायाचा असतो पिंगा गाण्याने इतिहास "विकॄत" कसा होतो ते मात्र कोणी सांगत नाही असो

मांत्रिक 18/11/2015 - 17:12
सहमत! अगदी दुर्दैवी प्रकार आहे! इतिहासाची धडधडीत चेष्टा करणारा हीन आणि हिणकस सिनेमा..

नया है वह 18/11/2015 - 17:26
बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे.

नाव आडनाव 18/11/2015 - 17:29
भंसाळींच्याच देवदासमधलं गाणं चाललं, म्हणून तसंच इथेही करायचंय त्यांना. इतिहास काय आपण दाखवतोय काय, काही लॉजिकंच नाही. फक्त पैसा मिळाला पाहिजे, मग तो कसाही मिळाला तरी चालेल असं दिसतंय. नॉर्थ इंडियन लोकांना शाळेत (सीबीएसई) मराठी इतिहास कमी असतो, म्हणजे आधीच कमी माहिती त्यात अजून बाजीराव बघून असा नाच इतिहासात झालेला आहे हे एक आणि असे लावलेले अजून काही शोध हा असाच इतिहास आहे असंच वाटेल त्यांना. पेशव्यांच्या वंशजांना जेंव्हा पार्टिला बोलावलं होतं तेंव्हा (आणि आत्ता पण) ह्यात काहीच चूक वाटलं नाही का?

मारवा 18/11/2015 - 17:35
१- चित्रपटातील गाण्यात दाखवल तशी टोपी ती खरच घालत असे का ? २- ती त्यात दाखवलं तशी मॅन्डोलीन वाजवत असे का ? ३- त्यांच्या कडे तसा शीश महल वास्तवात होता का ? ४- दोन्ही स्त्रीयांमध्ये मैत्रीपुर्ण स्पर्धा दाखवलेली दिसते तशी खरोखर च होती का ? ५- लास्ट बट नॉट द लीस्ट मस्तानी ने खालेल्ला पान गळ्यातुन आरपार ते दिसत असे ते खर होत का ? आणि ते खर होतंच तर ती काही भयानक रोगग्रस्त वा अगदी आतल्या वाहीन्या दिसाव्या इतकी कृश होती का ? आणि असं शरीर असणं यात सौंदर्य कुणाला काय आढळल असावं. की हे आपलं नाजुकी उनके लब की क्या कहीए एक पंखुडी गुलाब की सी है इन पॉवो को जमीन पर ना रखना मैले हो जाएंगे की ते बोसा हमने लिया था ख्वाब मे आरीज उनके नीले पड गये टाइप शायरीइश कविकल्पनाच आहे ? बाकी बाजीराव बाजीराव सारखाच वाटतो दिसतो यात दुमत नसावे.

पिंगा ह्या गाण्यानी माझंही डोकं फार फिरवलं आहे आणि चेपुवर करायची ती चिडचिड करुन झालेली आहे. नऊवार नेसण्याचेही प्रकार असतात. पैकी मला आठवतय की मी जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये असताना एका आजींकडुन साडी नेसुन घेतली होती तेव्हा त्यांनी "पेशवाई" की "ब्राह्मणी" अशा प्रकारची समोरुन काठ परत कमरेला खोचायचा असतो अशी नऊवार नेसवली होती. अर्थात पदर दोन्ही खांद्यावर होता आणि पोट सोडा, पोटरी सुद्धा मागुन दिसत नव्हती. आता इथे साक्षात काशीबाई आपल्या सवतीच्या कौतुकाची गाणी गात, तिच्याकडे प्रेमभरल्या नजरेने पहात.. "मंगळागौरीची" गाणी गात लावणीच करत आहेत! क्या बात है!! लगे हाथो आयटम नंबर पण होऊन गेला पेशवाई साम्राज्यात. जिथे बायकांना दरबारी सुद्धा एका विशिष्ट दालनात, पडद्यामागे वगैरे बसण्याची पद्धत होती (ही माझी ऐकीव माहिती बर का) तिथे डायरेक्ट राणीच दणादणा नाचतेय.. मराठमोळा, जुन्या पद्धतीचा पदरेला कंबर खोचुन केलेला पिंगा नाही तर उघडी कंबर कचाकच हलवत आणि लावणीचे हावभाव करत!!! आहात कुठे..?? एका गटाचे असेही म्हणणे आहे की कसा का होईना, तुमच्या मराठी लोकांचा इतिहास तर जगभर पोहचवला ना... खरंय.. आम्ही दळभद्री लोक, तुमचे उपकार मानायचे सोडुन चिकित्सा करत बसलोय.. जोड्यानं दोन हाणा गालात, पण पिक्चर काढा आमच्या इतिहासावर.. तसंही तुम्ही काहिही दाखवलं तरी गल्ला भरणारच आहात. आम्ही पण मग "पिंगा"च्या रिमिक्स व्हर्जनवर गणपतीत नाचु.. हाकानाका..

In reply to by पिलीयन रायडर

स्रुजा 18/11/2015 - 19:28
अगदी १०० % सहमत. बुकलुन काढणार आहे मी त्या भन्साळ्याला !! काय त्रास आहे यार ! एक तर त्याने लावणी आणि पिंगा या दोन नाच प्रकारात जाम गोंधळ घातला आहे. लावणी ही मुख्यतः पुरुषांनी भरलेल्या रंगमंदिराला भुलवण्यासाठी म्हणुन केली जाते त्यामुळे ती नृत्यशैली पण थोडी प्रोव्होकेटिव आहे. पिंगा मंगळागौरी चा असतो, मुली मुली एकत्र येऊन जे खेळ खेळतात ते पिंगा !! इतके सुंदर खेळ असतात ते, आणि त्यात देखील मजा असते. जिची मंगळागौर असते तिला मध्यवर्ती ठेवुन अनेक लाडीक, खोडकर गाणी म्हणली जातात , आणि एंजॉय करतात. यात एक तर काशीबाई आणि मस्तानी लावणी स्टेप्स करतायेत. त्यात त्यांचा शेला गायब आहे. तू म्हणते आहेस तसं नौवारी नेसायची पद्धत अगदीच गंडली आहे. ९ वारी स्टाईल मध्ये घागरा चोळी वाटते आहे. मुळात वर वेल्लाभट म्हणतात तसं ती काही एक चीप प्रेमकथा नाही, तो काही कुणी छंदी फंदी माणुस नव्हता. एवढ्या मोठ्या राज्याची जबाबदारी उचलणारा, मनस्वी नायक होता. त्याला परिवार पण हवा होता आणि तो मस्तानी मध्ये पण गुंतला होता. काशीबाई देखील या दोन्ही मध्ये खुप भरडल्या गेल्या असणार. एवढा कर्तबगार नवरा , त्याची २ तितकीच हुशार मुलं पदरात; असं असताना प्रेम आणि त्यांचं स्वत्व यात सतत युद्ध चालू असणार. मी कल्पना देखील करु शकत नाही की त्या मस्तानी बरोबर लावणी म्हणतायेत , ते ही पिंगा पिंगा करत !! देवदास सिनेमामध्ये ही लिबर्टी चालून गेली कारण बोलुन चालुन तो एक कल्पनाविलास होता. इथे प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासामध्ये हा माणुस काय विचार करुन स्वत :ची भर घालतोय देव जाणे. त्यात ही , मुळात तो इतिहास आहे तसाच अत्यंत नाट्यपूर्ण आणि विस्मयचकीत करवणारा आहे. त्यात शौर्य आहे, प्रेम आहे, राजकारण आहे, कारुण्य आहे आणि सगळं अगदी ठासुन भरलं आहे. त्याला आणखीन ड्रामेबाज करायची गरज च का पडावी? दिपीका कितीही सुंदर असली तरी "मस्तानी" नक्कीच दिसत नाही. चिमाजी अप्पांच्या भुमिकेत वैभव तत्ववादी आहे ते योग्य पण बाजीराव म्हणुन रणवीर !!! पेशवे चित्पाव्॑नी गोरे नव्हते, युद्धाने रापले होते हे जरी मान्य केलं तरी घारे डोळे??? ते पण काळे झाले का? जरा देखील सत्याच्या जवळ जाणारं कास्टिंग नाहीये. हे असा भेसळ केलेला इतिहास लोकांसमोर येऊन काय उपयोग? बॉलिवुडी डान्स आणि शीश महल आणि बाकी चकाचौन गोष्टींशिवाय देखील मराठी इतिहास अत्यंत भव्य दिव्य होता कारण ती भव्यता कपड्यांवर आणि आजुबाजुच्या गोष्टींवर च फक्त अवलंबुन नव्हती. "लार्जर दॅन लाईफ" आयुष्य जगलेली माणसं तेंव्हा अस्तित्वात होती आणि खरं तर त्या मुळेच इतिहास घडला.

बॅटमॅन 18/11/2015 - 17:50
साला, पिच्चरच्या निमित्ताने पेशव्यांना तेवढीच प्रसिद्धी मिळेल म्हणून मी याची वकिलीच करत होतो आजवर...पण हे गाणे पाहून भ्रमनिरास झाला फुल्लच. देवदास काय सुटत नाय भन्साळीचा. दोन बायका पटकथेत आहेत म्हणून पारो आणि चंद्रमुखीच असाव्यात? अडाण** साले. हाड तेच्यायला.

In reply to by बॅटमॅन

मारवा 18/11/2015 - 18:00
बॅटमॅन जी बाजीराव एक उत्कृष्ठ योद्धा होता. व मस्तानी प्रकरणाकडेच त्याचा उल्लेख वळवला जात असतो. तुम्ही एकदा आपल्या इतिहासाच्या ज्ञानाने आम्हाला बाजीरावचं युद्ध लढाया आदी बाबतीतलं कर्तुत्वाची ओळख करुन द्यावी. आम्हाला ते ३९ लढाया एकही न हरता इतकीच एका ओळीची माहीती असते. आपण आपल्या इतिहासाच्या ज्ञानाने आम्हाला बाजीरावाच्या अ‍ॅज अ वॉरीयर ओळख करुन द्यावी. ही विनंती

In reply to by मारवा

रमेश आठवले 18/11/2015 - 21:44
दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटीश जनरल मोन्टगोमरी यांनी त्यांच्या The Concise History of Warfare या पुस्तकात बाजीराव पेशव्यांनी घोड दळा चा चपळतेने व सुरेख वापर करून नाशिक जवळ पालखेड येथे १७२८ साली निजामावर मिळवलेल्या विजयाची तारिफ केली आहे . फक्त वीस वर्षाच्या कारकिर्दीत बाजीरावांनी ३९ लढाया लढल्या आणि सर्वच्या सर्व जिंकल्या.

In reply to by रमेश आठवले

पालखेडच्या लढाईचे मॉडेल अमेरीकन सैनिकाना शिकवले जाते असे निनाद बेडेकरांच्या एका व्याख्यानात ऐकले होते ,गल्फ वॉर १ व २ मध्ये या तंत्राचा वापर झाला होता हे हि त्यांनी सांगितलेले आठवते.

In reply to by काकासाहेब केंजळे

राजाभाऊ 18/11/2015 - 23:12
पालखेड लढाई आणि अमेरिकन मिलिटरी स्कुल्स याचा संबंध शोधायचा प्रयत्न केला, हाती काहिहि लागलं नाहि. लाॅंग रेंज मिसायल्स, ड्रोनच्या (बी२ बाॅंबर तर दुर) जमान्यात हे थोडं फारफेच्ड वाटतंय... वाचण्यात आलंय कि हे बेडेकर साहेब, बाजीराव मस्तानी प्रोजेक्टवर भंसाळीचे ॲडवायजर होते. "पिंगा" गाण्यात प्रदर्शित केलेलं इतिहासाचं विक्रुतीकरण त्याना खटकलं नाहि?

In reply to by राजाभाऊ

मालोजीराव 18/11/2015 - 23:33
पालखेड लढाई आणि अमेरिकन मिलिटरी स्कुल्स याचा संबंध शोधायचा प्रयत्न केला, हाती काहिहि लागलं नाहि.
युनायटेड स्टेट्स मिलिटरी अकादमी,वेस्टपॉइंट,न्यूयॉर्क...हि माहिती डॉ. स्टुअर्ट गॉर्डन (मराठा इतिहासकार) यांनी एका भाषणात दिली आहे.

In reply to by राजाभाऊ

sagarpdy 19/11/2015 - 09:10
दुर्दैवाने निनाद बेडेकरांचे ६ महिन्यापूर्वी निधन झाले. तसेच ॲडवायजर ने कितीही सल्ले दिले तरी, दिग्दर्शक व निर्माते त्यांना काय करायचं ते करतातच. उदा. इंटरस्टेलर साठी कीप थोर्न ॲडवायजर म्हणून होते. तरीदेखील चित्रपटात भौतिकशास्त्राशी निगडीत चुका आहेतच.

In reply to by sagarpdy

राजाभाऊ 19/11/2015 - 21:19
बेडेकर गेल्याचं माहित नव्हतं. ते हयात असते तर त्यांनी नक्किच निषेध नोंदवला असता; तो कुठे दिसला नाहि म्हणुनच वरची शंका बोलुन दाखवली. बाकि सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात, इंटरस्टेलर या चित्रपटाच्या दरम्यान झालेली किप थोर्न, क्रिस नोलन ची मुलाखत बरंच काहि सांगुन जाते...

In reply to by राजाभाऊ

बॅटमॅन 19/11/2015 - 10:20
पालखेडच्या लढाईचा उल्लेख माँटगोमेरीच्या पुस्तकात आहे. तो स्वतः निनाद बेडेकरांकडूनच अस्सल पुस्तकात पाहण्याचे भाग्य लाभले आहे. मात्र मिलिटरी स्कूलमध्ये शिकवले जाणे इ. ला काही पुरावा आहे असे दिसत नाही.

In reply to by बॅटमॅन

मारवा 19/11/2015 - 11:11
बॅटमॅन राव थोडंस निनाद बेडेकरांची या लढाई संदर्भातील वक्तव्ये मते आपल्या बरोबर झालेला संवाद थोडा आमच्याही वाट्याला येऊ द्या ना. अस तुम्ही सांगितल नाही तर दुसरी बाजु उजळ बाजु कशी समोर येणार मग ? अप्रचलित झाकलेला भाग समोर येणं हे कधीही सर्वात जास्त महत्वाचं नसत का ? १०० तील १०० स बाजीराव म्हटला की मस्तानी माहीती असते मात्र पालखेडची लढाई कदाचित १०० तील १ स च माहीत असते.

In reply to by मारवा

बॅटमॅन 19/11/2015 - 12:51
विशेष चर्चा झाली नव्हती. माँटगोमेरीचा उल्लेख त्यांनी केला तेव्हा आम्ही पुरावा विचारला, लगेच हातासरशी त्यांनी काढूनही दाखवला. तेवढीच त्यासंदर्भात झालेली चर्चा.

In reply to by बॅटमॅन

"हाड तेच्यायला." +१ हे वाक्य बॅट्या जेवढ्या त्वेषाने बोललाय तेवढ्याच त्वेषाने बोलतो.... हाड तेच्यायला.

सर्वसाक्षी 18/11/2015 - 17:52
सहिष्णु वृत्तिने लोक चित्रपट पाहतील, भरपूर गल्ला जमेल. लोक चित्रपट गृहात शिट्या मारतील, बाहेर पडताना आजुबाला दिसणार्‍या मुलींकडे पाहुन 'ए मस्तानी' अशा हाका मारतील. नामवंत लोक 'या निमित्ताने आमचे बाजीराव पेशवे सार्‍या देशाला दिसले' असे भरभरून कौतुक करतील. झालच तर काशीबाई मस्तानी हे दोन धर्माच्या ऐक्याचे प्रतिक आहे असे म्हणत निर्मात्याला एखादं राष्ट्रिय एकात्मका पारितोषिक मिळावं अशी शिपफारसही करतील. मुळात चित्रपट पाहायला जाणारे दिपीका आणि प्रियांका पाहायला जातील, त्यांना बाजीरावाचा इतिहास कितपत माहित असेल कोण जाणे. अर्थात त्यांना त्याच्याशी सोयरसुतक नसेल. तीन तास टाईमपास धमालमस्ती. मध्यंतरात पॉपकॉर्न. तुम्हा आम्हा सारखे बाजीरावाचे प्रेम असलेले चित्रपट पाहायला जातील की नाही शंकाच आहे पण त्याने निर्मात्याला फरक पडणार नाही, जसा मूठभर सुशिक्षित लोकांनी मत न दिल्याने उमेदवारांना पडत नाही.

प्रसाद१९७१ 18/11/2015 - 18:02
अहो हे गाणे सिनेमात मधे नाहीये. सिनेमा संपल्यावर श्रेय-नामावली दाखवताना बाजूला हे गाणे दाखवणार आहेत. हल्ली तशी स्टाईल आहे ना. अश्या गाण्यांचा सिनेमाच्या कथेशी संबंध नसतो. पब्लिसीटी साठी अशी गाणी तयार करतात पण ती तशीच सिनेमात घालत नाहीत. हे पण तश्याच गाण्यांपैकी आहे. त्यामुळे कावून जाऊ नका.

In reply to by प्रसाद१९७१

कपिलमुनी 18/11/2015 - 18:21
गाणे सिनेमात मधे नाहीये. ? मग त्याने काय फरक पडतो ? पात्रे तर तीच आहेत ना ? बाकी रीलीजच्या अगोदरच तुम्हाला असलेली माहिती बघून तुम्ही सेन्सॉरमध्ये असता काय असा प्रश्न पडलाय

In reply to by कपिलमुनी

प्रसाद१९७१ 20/11/2015 - 10:07
गाणे सिनेमात मधे नाहीये. ?
नाही, सिनेमात नाही. प्रसिद्धी साठीचे गिमिक आहे.
बाकी रीलीजच्या अगोदरच तुम्हाला असलेली माहिती बघून तुम्ही सेन्सॉरमध्ये असता काय असा प्रश्न पडलाय
असते कोणाला आतली बातमी माहीती.

पैसा 18/11/2015 - 18:18
मी त्या गाण्याच्या ऑफिशियल व्हिडिओ यूट्यूबच्या पानावर शिव्या घालून आलेय. १३०० प्रतिक्रियांमधे शिव्या देणारी मी एकटीच असावी बहुधा. नुकताच लावणी-तमाशाचा इतिहास वाचला, http://digitalkatta.com/2015/11/01/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/ त्यानुसार तमाशात बायका नाचण्याच्या प्रकार पेशवाई संपून नंतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाला. बाजीरावाच्या काळात शाहिरी तमाशात नाचे पोरे असत. अशा परिस्थितीत बाजीरावाच्या दोन बायका लावणीचे हावभाव करत नाचतात तेही नऊवारी साडीच्या नावावर चिंध्या पांघरून हे सहन करण्यापलिकडचे आहे. नऊवारी साडी नेसून लावणी कशी सादर करतात हे बघायचे असेल तर सुरेखा पुणेकर, छाया माया खुटेगावकर वगैरेंचा कोणताही प्रोग्राम बघावा. बरे ज्याला पिंगा म्हटलंय तो पिंगाही नाहीच. मंगळागौरीला "दिंडा" नावाचा खेळ खेळतात. त्याच्या जवळपास जाणारे काही हातवारे आहेत खरे. या "फिल्मी स्वातंत्र्याच्या" नावाखाली जे काय दाखवले आहे त्याचा त्रिवार धिक्कार. शिरीष कणेकरांनी म्हटल्याप्रमाणे बाजीराव आणि निजाम "इमली का बुटा" म्हणत नाचतात का एवढेच बघायचे राहिले आहे.

In reply to by पैसा

रेवती 18/11/2015 - 20:19
येस्स! पिंगा हा कमरेत वाकून गोल फिरण्याचा प्रकार आहे. त्यात पाय न हलवता तसे घुमणे बरेच कठीण असते. त्या दोघी ज्याप्रकारे नाचल्यात तो पिंगा नव्हे.

In reply to by मारवा

पैसा 18/11/2015 - 18:32
या व्हिडिओमधे ०.५० ते १.० हात कोपरावर आपटून फट फट असा आवाज काढत जो खेळ आहे त्याला दिंडा मोडणे असे म्हणतात. या व्हिडिओमधे हे गाणे कोळी नृत्यासारखे बसवले आहे. पण त्यातला हाच भाग दिंड्याचा आहे.

पगला गजोधर 18/11/2015 - 18:24
शिवाजीमहाराज व थोरला बाजीराव, हे जात धर्म यांच्या पलीकडे पाहणारे संघटक, सहकाऱ्यात भावंड भावना जोपासणारे नेतृत्व, आणि उत्कृस्थ योद्धे होते. ( बारकाईने पहा त्यांचा जीवाला जीव देण्यार्यात दुसर्या जात धर्माचे होते, व त्यांच्या मार्गात काटे पसरवणारे त्यांच्याच जाती/ धर्माचे होते ) अश्या रण धुरांदाराच्या पराक्रमाकडे दुर्लक्ष करून, केवळ प्रणयजिवना विषयी लफडेबाजी म्हणून राळ उडवण्याचा करंटेपणा करणाऱ्यांची कीव येते.

In reply to by पगला गजोधर

शब्दबम्बाळ 18/11/2015 - 18:32
अहो मस्तानी तर त्यांची बायको होती!(बरोबर आहे ना?) मग कोणाला काय कारण लफडेबाजी वगैरे म्हणायचं? आणि तरीही म्हणत असतील तर ती त्यांची चुकी आहे...

हिंदी चित्रपटवाल्यांनी तर्क्,ईतिहास वगैरे वापरून चित्रपट बनववेत अशी अपेक्षा म्हणजे एखाद्या कट्टर मौलवीने घरी सत्यनारायण केल्यासारखे..चित्रपट फक्त चालला पाहिजे हेच व अगदी हेच ध्येय असते त्यांचे. असो. चित्रपटाकडे फक्त मनोरंजन म्हणून बघावे असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मोगा 21/12/2015 - 21:33
अगो ते मौलवी , सत्यनारायणवाले , राजे अन पेशवे सगळे आपापला व्यवसाय फायदेशीर कसा होइइल हेच बघायचे ना ? कधी युद्ध काय , कधी तह काय , कधी कुणाला मुलगी देणं काय आणि मुलगी घेणं काय , स्वतःचं सैन्य न वापरता दुसर्‍याच्या वानरसेकडुन सेतू बांधुन घेणं काय ... आपापला व्यवसाय किफायतशीर करण्याचेच हे सगळे प्रयत्न होते ! अन हेच सगळं भन्साळीनं त्याच्या व्यवसायात केलं तर तो मात्र वैट्ट !

अरेरे! असं आहे तर एकंदरीत ! मला वाटलं होतं की बाजीराव या काहीशा दुर्लक्षीत योद्ध्याच्या जीवनावर आधारित , मोठमोठे युद्धप्रसंग असलेला भव्य चित्रपट पाहायला मिळेल . आता केवळ बाजीरावांची बदनामी होऊ नये इतकीच माफक अपेक्षा ...

In reply to by मुक्त विहारि

मारवा 18/11/2015 - 18:56
खाणावळीत मित्राच्या खाणावळीत कधीमधी फिस्ट असली तरी तुम्ही जात नाही का ? म्हणजे स्पेशल आयटम असला तर अस म्हणतो. शेवटचे खानावळी कधी गेलेला ?

In reply to by मारवा

एका महान खानावळीत शेवटचे गेलो. सध्या तरी पंचतारांकित जेवण मिळत असल्याने आणि ते आता आयुष्यभर परवडत असल्याने, मुद्दाम वेडी-वाकडी वाट करून खानावळीत कशाला जाईन? राहता राहिला प्रश्र्न स्पेशल आयटम बाबत.... स्पेशल आयटम देखील आजकाल कुठले बुरखे आणि कुठली कुठली ठिगळे लावलेली वस्त्रे नेसून येईल ते काही सांगता येत नाही....

In reply to by मुक्त विहारि

भाऊंचे भाऊ 20/11/2015 - 19:02
आपण बरे आणि आपले हॉलीवूड बरे.
ब्रॅड् पिटच्या ट्रॉयमधेही ही सिनेमॅटीक लिबर्टी बरीच घेतलेली आहे.

In reply to by टवाळ कार्टा

अभ्या.. 20/11/2015 - 20:37
आता ते ससा आणि गंडस्थळ न आण्ल्याबद्दल धन्यवाद. . वासुकी आणी गांडूळ पाल आणि डैनासॉर किरडू आणि शेषनाग नेक्ष्ट टैम ह्या उपमा वापरल्या तरी चालेल.

सूड 18/11/2015 - 18:41
म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली.
अहो त्या पिढीत अर्थाअर्थी महाराष्ट्राशी आणि मराठी संस्कृतीशी संबंध असलेले किती असतील हा ही प्रश्नच आहे. तिथेही बीबीशीआयला ज्यायपीचा डबा जोडलेला असेल तर कौतुक करतील नाहीतर काय!! काल हापिसात यावर चर्चा चाललेली असताना एका मराठी महाभागाने विचारलेला प्रश्न ऐकून मी गारच पडलो. "काशीबाई ही बाजीरावाची बायको 'असते' का?"

In reply to by सूड

बॅटमॅन 18/11/2015 - 19:36
तिथेही बीबीशीआयला ज्यायपीचा डबा जोडलेला असेल तर कौतुक करतील नाहीतर काय!!
ह्याचा काय संबंध आहे? असला प्रश्न सूडकडून अपेक्षित नव्हता.

In reply to by सूड

मालोजीराव 20/11/2015 - 15:10
अहो त्या पिढीत अर्थाअर्थी महाराष्ट्राशी आणि मराठी संस्कृतीशी संबंध असलेले किती असतील हा ही प्रश्नच आहे.
सूड अरे त्यांची पिढी जाऊदे, इथे हिरोलाच माहित नाई कि खर्या हिरोच नाव काय आहे… 'बल्लाड' म्हणे :)) baji

In reply to by मालोजीराव

आदिजोशी 20/11/2015 - 18:08
Ballad शब्दाचा अर्थ एखादी कथा सादर करणारे काव्य. आपल्याकडे पोवाडा असतो तसाच काहीसा इंग्रजांचा पोवाडा म्हणजे Ballad. ह्याच शब्दाचा अजून एक थोड अप्रचलीत अर्थ म्हणजे रोमँटीक काव्य. त्या अर्थाने शब्द बरोबर आहे. आडनाव म्हणून वापरलाय असं वाटत नाही.

In reply to by खटपट्या

अभ्या.. 20/11/2015 - 21:09
अमरावती विदर्भातले पण करतेत. सकाडी सकाडी तड्याकडे पडायला जातो ना. ;) बरेच मुस्लीम पण असेच करताना एकलेय.

_मनश्री_ 18/11/2015 - 18:52
ह्या पेशवीणबाई आहेत का तमासगीरीण बाई ? आणि काशीबाई सवतीकडे इतक्या प्रेमाने का बघताहेत ? 1 2

In reply to by _मनश्री_

रेवती 18/11/2015 - 20:16
दागिने घालण्याचाही क्रम असतो. वरील चित्रात हातातील दागिने, म्हणजे तोडे हे सगळ्यात शेवटी घालायचे असतात, ज्यायोगे ते सगळ्यात पहिले दिसतात. आधी पाटली मग गोठ, नंतर दोन (किंवा तीन.......हव्या तितक्या) हिरव्या बांगड्या, एक बिलवर, दोन हिरव्या बांगड्या, पुन्हा एक बिलवर, दोन हिरव्या बांगड्या व शेवटी तोडा घालावा म्हणजे तो सगळ्यात पुढे दिसतो. ही जुनी पद्धत आहे. आजकाल जसे हवे तसे घालतात ही गोष्ट वेगळी.

In reply to by रेवती

स्रुजा 18/11/2015 - 20:20
परफेक्ट .. एक तर साड्या च धन्यवाद आहेत एकदम ! काठ पदर कुठे गेले त्या साड्यांवरचे? तू म्हणतेस तसं ही साडी मराठी नाहीच आहे. रमा माधव पण एकदम सॉरी सिनेमा होता पण त्यातल्या साड्या आणि बाकी सगळं नेपथ्य १०० % मराठी होतं

sagarpdy 18/11/2015 - 18:56
कालच कट्यार च्या धाग्यावर म्हणले कि - चित्रपट हे उथळ माध्यम आणि मसाला हे त्याच्या यशाचे गमक. पण बाजीरावाच्या स्टोरीत एवढा मसाला (पराक्रम & प्रणय दोन्ही) असताना हा नको तो मसाला घालायची काय गरज. अति मसाला झाला तर आम्लपित्त होणारच! आणि या नको त्या भानगडींमध्ये बाजीरावाची रणनीती (हि शस्त्र कलेहून वेगळी) गाळणार.

दिपक.कुवेत 18/11/2015 - 19:00
तू नळी वर पाहिले. वादाचा मुद्दा सोडला तर प्रियांका आणि दिपीका दोघीहि कातील दिसत आहेत नउवारी मधे. कंबर पण काय लचकवतायत. वा!! जी खुष हो गया. पण बाकी कोरस च्या नऊवारी बघता ह्या दोघींच्या रेडीमेड वाटत आहेत. शीवाय काठ मधेच खोचलेला वाटतोय. तो साईडला हवा (वर पिरा म्हणते त्या प्रमाने ती पेशवाई किंवा ब्राम्हणी असेल तर!!) बाकी चालू द्या....

पराचे फे बु वर सात्विकसंतापाचे बोल वाचले म्हणून तू नळीवर हे गाणे पाहिले, स्क्रिन फोडावासा वाटला. शेवटी कपाळाला हात लावून बसले. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

_मनश्री_ 18/11/2015 - 19:20
खरय गाण पाहून लॅपटॉप आणि त्या भन्साळीच थोबाड दोन्ही फोडावस वाटलं 1 2

आदिजोशी 18/11/2015 - 19:28
माननीय श्री. विनोदजी, नुकतेच फेसबूक वर श्री संजय लीला भंसाली ह्यांच्या बाजीराव मस्तानी ह्या चित्रपटातील 'पिंगा' गाणे बघायचे दुर्भाग्य मला लाभले. ह्या गाण्यात बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई आणि दुसरी पत्नी मस्तानी ह्या एकत्र लाडीगोडीने नाचताना दाखवल्या आहेत. हा इतिहासाचा केलेला केवळ बट्ट्याबोळ नसून चक्क विकॄतीकरण आहे. जगातील एकमेव अजेय योद्धा असे ज्यांना संबोधले जाते त्या बाजीरावांवर चित्रपट बनवल्याबद्दल श्री संजय लीला भंसाली जितके अभिनंदनास पात्र आहेत, तितकेच ते ह्या विकॄतीकरणासही जबाबदार आहेत. आधीच महाराष्ट्रातील वीर पुरुषांबद्दल भारतात फारशी कुणाला माहिती नाही. त्यात हे असलं काही तरी पाहून चुकीची प्रतिमा उभी रहायला नको. मुळात 'पिंगा' हे मंगळागौरीदरम्यान गायले जाणारे गाणे आहे. त्याचे सादरीकरण बघितले की लावणी बघत असल्याचा भास होतो. छत्रपतींचे पेशवे असलेल्या बाजीरावांची पत्नी आपल्या सवतीसोबत कंबर उडवत नाचते ही कल्पनाच सहन होत नाही. देवदासच्या निर्मीतीच्या वेळी कथेची अशीच मोडतोड करून सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून एक घरंदाज स्त्री आणि एक वेश्या ह्यांना एकत्र नाचताना दाखवलं होतं. पण शेवटी ती एक काल्पनीक कथा होती. हा आपला इतिहास आहे. खरा खुरा, घडलेला आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा इतिहास. त्याची अशी भयानक मोडतोड करून कसे चालेल? तो काळ, त्या वेळची संस्कॄती, पाळल्या जाणार्‍या मर्यादा, इत्यादिंविषयी मी तुम्हाला सांगायची अर्थातच गरज नाही. क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली आपल्या संस्कॄतीचे दिवसाढवळ्या होणारे हे विकॄतीकरण पाहवले नाही म्हणून आपणांस तसदी दिली. महाराष्ट्राचे सांस्कॄतीक मंत्री ह्या नात्याने आपण योग्य तो निर्णय घ्याल ही खात्री आहे. आपला, आदित्य जोशी

In reply to by आदिजोशी

_मनश्री_ 18/11/2015 - 19:37
@ आदित्य जोशी तुम्ही पत्र पाठवलंत हे चांगलं केलं पण ह्या पत्राने खरच काही फायदा होणार आहे का ? मला नाही वाटत ह्याने काही होईल

In reply to by आदिजोशी

_मनश्री_ 18/11/2015 - 20:06
पत्र पाठवू नये अस अजिबात नाही मी वरच्या प्रतिसादातही म्हटलं आहे की तुम्ही पत्र पाठवलंत हे चांगल केलं

In reply to by आदिजोशी

अ‍ॅडी, पत्र लिहिलेस ते उत्तमच केलेस. काहीतरी चांगली अ‍ॅक्शन घेतली जावी ऑथोरिटीजकडून अशी अपेक्षा करू या. स्वाती

माननीय श्री. विनोद तावडे जी, सांस्कृतिक कार्यमंत्री , महाराष्ट्र राज्य नुकतेच फेसबूक व यूट्युब वर श्री संजल लीला भंसाली ह्यांच्या बाजीराव मस्तानी ह्या चित्रपटातील 'पिंगा' गाणे बघायचे दुर्भाग्य मला लाभले. ह्या गाण्यात बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई आणि दुसरी पत्नी मस्तानी ह्या एकत्र लाडीगोडीने नाचताना दाखवल्या आहेत. हा इतिहासाचा केलेला केवळ बट्ट्याबोळ नसून चक्क विकॄतीकरण आहे. जगातील एकमेव अजेय योद्धा असे ज्यांना संबोधले जाते त्या बाजीरावांवर चित्रपट बनवल्याबद्दल श्री संजल लीला भंसाली जितके अभिनंदनास पात्र आहेत, तितकेच ते ह्या विकॄतीकरणासही जबाबदार आहेत. आधीच महाराष्ट्रातील वीर पुरुषांबद्दल भारतात फारशी कुणाला माहिती नाही. त्यात हे असलं काही तरी पाहून चुकीची प्रतिमा उभी रहायला नको. मुळात 'पिंगा' हे मंगळागौरीदरम्यान गायले जाणारे गाणे आहे. त्याचे सादरीकरण बघितले की बैठकीची लावणी बघत असल्याचा भास होतो. छत्रपतींचे पेशवे असलेल्या बाजीरावांची पत्नी आपल्या सवतीसोबत कंबर उडवत नाचते ही कल्पनाच सहन होत नाही. देवदासच्या निर्मीतीच्या वेळी कथेची अशीच मोडतोड करून सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून एक घरंदाज स्त्री आणि एक वेश्या ह्यांना एकत्र नाचताना दाखवलं होतं. पण शेवटी ती एक काल्पनीक कथा होती. हा आपला इतिहास आहे. खरा खुरा, घडलेला आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा इतिहास. त्याची अशी भयानक मोडतोड करून कसे चालेल? तो काळ, त्या वेळची संस्कॄती, पाळल्या जाणार्‍या मर्यादा, इत्यादिंविषयी मी तुम्हाला सांगायची अर्थातच गरज नाही. क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली आपल्या संस्कॄतीचे दिवसाढवळ्या होणारे हे विकॄतीकरण पाहवले नाही म्हणून आपणांस तसदी दिली. महाराष्ट्राचे सांस्कॄतीक मंत्री ह्या नात्याने आपण योग्य तो निर्णय घ्याल ही खात्री आहे. आपला नम्र एक "भन्साळीपीडित" मराठी माणूस ...

सागरकदम 18/11/2015 - 19:32
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या भन्साळी विरोधाची दखल चॅनेल्सनी देखील घेतलेली आहे. आताच TV9, जय महाराष्ट्र आणि प्राईम ह्या चॅनेल्सनी खास फोन करून ह्या संदर्भात माझी मुलाखत घेतली. आज उद्या मध्ये हे चित्रीकरण सगळीकडे दिसेलच. हे खरेतर तुमच्या सगळ्यांच्या पाठींब्याचे यश आहे. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद __/\__ प्रसाद ताम्हणकर

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 18/11/2015 - 20:08
आपली बहुतेक खफ वर याचसंदर्भात चर्चा झालेली. तेव्हाच मी याप्रकाराबद्दल शंका नोंदवली होती. अजून काय बोलावे..? बाजीरावासारख्या विस्मरणात टाकलेल्या महान इतिहास पुरूषाबद्दल आधीच योग्य असा चित्रपट/कादंबरी/नाटक निघाला नाही आणि जो काय निघाला तो तोही असा हे बघून कोणत्या मराठी माणसाची तळपायाची मस्तकात जाणारी नाही?

In reply to by टवाळ कार्टा

संदीप डांगे 19/11/2015 - 11:39
हे हे, तालिबान? नेहमी तालिबानच बरे आठवते बॉ तुम्हाला नेहमी. खाप, विहिंप, सनातन, बजरंग दल, श्रीरामसेने इत्यादी नै आठवत कंदी...

In reply to by संदीप डांगे

टवाळ कार्टा 19/11/2015 - 13:21
हे सगळे सुध्धा हिंदू तालिबान टैप किडे करत अस्तातच (फक्त कधी कधी...आणि उघडपणे नाही)...दूमत नाही

In reply to by संदीप डांगे

विवेकपटाईत 19/11/2015 - 19:35
या पैकी कुठलीही संस्था युद्धाची तालीम देत नाही किंवा असे युद्ध पुकारण्याची क्षमता कुठल्याही संस्थेत नाही. जास्तीस्जास्त थोड्या प्रमाणात थोड्या खुरापती करू शकतात.

रेवती 18/11/2015 - 20:08
हैला! चर्चा मिसली होती. फारच तणतण केली मी हे गाणं पाहून! भन्साळीला घातलेल्या शिवांचे कलेक्षन खरडफळ्यावर आहेच. तेथील प्रतिसाद हिकडे चिकटवते. आताच्या काळात आमची आजीबाई मला नृत्याचा क्लासात घालायला राजी नव्हती तर त्या काळात काशीबाईंना नाचायला कोठून परवानगी असणार? नाचवायचच होतं तर मंगळागौरीच्या गाण्यावर जरा जुन्या पद्धतीच्या स्टेप्स घेऊ द्यायच्या. पण हिकडे फुल्ल दंगा! मस्तानी ही सवत्/मिस्ट्रेस किंवा कोणीही असली तरी त्या काळी मुसलमान लोकही अदबशीर, खानदानी बाजाचे कपडे घालत असत. महाराष्ट्रीय महिला कंबरपट्टा घालून साडी चापून चोपून अंग झाकेल अशी नेसत असत. त्या गाण्यात खटकलेल्या गोष्टीच जास्त आहेत. पुरेश्या अभ्यासाआभावी नाचवलं, तेही दोघी सवतींना एकत्र, नऊवारी साडी ब्राह्मणी घरात ज्यापद्धतीने नेसतात तशी नेसवलेली नाही. एका शॉटमध्ये प्रियंकाने जराशी तशी साडी नेसल्यागत दिसते की पुन्हा जैसे थे! नको तिथे (किंवा हवं तिथे) अंगप्रदर्शन! हे गाणं कोणत्यातरी सणाच्या निमित्तानं केलं असल्यास आपल्याकडे जरीच्या साड्याच नेसत असत. अगदी काठापदराच्या. चांदीची जर वगैरे असल्याशिवाय माझी आजी साडी नेसायची नाही तर पेशविणबाईंची कथा काय सांगायची! वेलवेटची ब्लाऊजे आणि त्यावर जी कारागिरी आहे त्याला जर्दोसी काम म्हणतात. तेही शक्यतो मुसलमानी क्यार्‍याक्टरे पूर्वी त्यांच्या कपड्यांवर करत असत. नाचणार्‍या बायकाही अंग झाकतेल असे कपडे करत असत. पेशवाईत नऊवारी साडी नेसल्यावर त्यावर शेला असणे जरूरीचे असे. महिलांच्या कार्यक्रमातही राजेरजवाड्यांकडील महिला नाचत नसत. त्या हे कार्यक्रम बघून मनोरंजन करून घेत असत. अगदी आग्रह केला तर फुगडी घालत असत. इतिहास विषयात शून्य गती असलेल्या मला नेहमीच्या बघण्यातून जर इतपत माहित असेल तर त्या भन्साळ्याला इतके पैसे इनव्हेस्ट करताना एखादा तज्ञ हायर करता येऊ नये? हा शिनेमा बघण्याचे माझ्या फार मनात होते. थेट्रात जाऊन पेशव्यांचा शिनेमा पहावा, अगदी पर्फेक्ट नसणार हे गृहित धरले होते पण जरा महाराष्ट्रीय काही येऊ घातलेय म्हणून बरे वाटले होते. या गाण्याचे हिरमोड केलाय अगदी! काय मेलं डोकं त्या मनुष्याचं..........

विवेकपटाईत 18/11/2015 - 20:11
हि काल्पनिक कथा आहे, खर्या ऐतिहासिक घटनांशी या कथेचा काहीच संबंध नाही असे टायटल मध्ये दाखविले जाईल. आता हिंदीत सिया के राम येतात आहे, भव्य रामायण काळ बघायला मिळेल. अस्तित्वात नसलेल्या कथा पाहायला मिळतील. असो.

In reply to by विवेकपटाईत

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 20:15
मिपावर रामायण महाभरताच्या प्रक्षीप्त कथा चवीने चघळणारे अशा चित्रपटांवर किती ताठर भुमीका घेतात नै.

In reply to by काळा पहाड

नन्दादीप 19/11/2015 - 11:40
Chiefminister@maharashtra.gov.in / min_l&jd@maharashtra.gov.in DeputyChiefMinister@maharashtra.gov.in Min_Rev@maharashtra.gov.in / min_earthquakerehab@maharashtra.gov.in Min_Home@maharashtra.gov.in Min_Sports&YouthWelfare@maharashtra.gov.in Min_Forest@maharashtra.gov.in Min_Socjust@maharashtra.gov.in Min_Waterresources&cada@maharashtra.gov.in Min_Rdd@maharashtra.gov.in Min_Coop@maharashtra.gov.in Min_Energy@maharashtra.gov.in Min_Agri@maharashtra.gov.in Min_WSSD@maharashtra.gov.in Min_FCSCP@maharashtra.gov.in Min_PWD_PU@maharashtra.gov.in Min_FDA@maharashtra.gov.in Min_Horticulture@maharashtra.gov.in Min_Finance@maharashtra.gov.in Min_WaterResources_KVIC@maharashtra.gov.in Min_TD@maharashtra.gov.in Min_HigherEdu@maharashtra.gov.in Min_industry&Emp@maharashtra.gov.in Min_Textile@maharashtra.gov.in Min_Env@maharashtra.gov.in / Min_PH@maharashtra.gov.in Min_Labour@maharashtra.gov.in Min_ANHS@maharashtra.gov.in Min_W&CHD@maharashtra.gov.in जालावर शोधल्यावर हेच मिळाले...

तो भन्साळि राहुद्या महारष्ट्रातच मुळात पेशवे-पेशवाई हा किती आणि कोणासाठी अभिमनाचा विषय आहे ? त्यातून पेशवे केवळ ब्राह्मण होते म्हणून त्यांच्या इतिहासकडे मुद्दामुहून दुर्लक्ष केले जाते असो आपण कितीही कळफलक बडवुन काय फायदा ?

मंडळी आपले आक्षेप अधिकृत व्हिडिओवर प्रतिक्रियेच्या स्वरुपात लिहा. आतापर्यंत आलेल्या सतराशेहून अधिक प्रतिक्रियांमध्ये आक्षेप फारसे दिसत नाहीयेत. तसेच डिसलाइक्सही केवळ दोन हजारहून थोडे अधिक आहेत अन लाइक्स लौकरच १५ हजार होतील.

In reply to by श्रीरंग_जोशी

तिथे तर अस लिहून आहे...
This is not an Official website of Bajirao Mastani Film. We do not represent the official team of Bajirao Mastani or any part of it. We are just providing you the information about Bajirao Mastani movie. The content is strictly copyrighted and may not create again without permission .

In reply to by चांदणे संदीप

चित्रपटाच्या नावाने वेबसाइट असल्याने मला ती अधिकृत वाटली. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी तरी निर्मात्यांनी प्रत्यक्ष नाव वापरून अनधिकृत वेबसाइटबाबत तक्रार करायला हवी. चुकीची माहिती इथे दिल्याबद्दल मी दिलगीर आहे.

सागरकदम 18/11/2015 - 22:29
http://www.dnaindia.com/entertainment/report-pinga-controversy-bajirao-s-descendant-hits-out-at-sanjay-leela-bhansali-२१४६६२३ Pinga Controversy: Bajirao's descendant hits out at Sanjay Leela Bhansali

प्रसादराव पेशवे यांचे मुख्यमंत्र्यांना अत्यंत संयत भाषेत लिहिलेले ह्यासंदर्भातील पत्र पहा. . स्वाती

भंसाली बुवांना फार फरक पडणार नाहीच बहुधा, आजच एक अनुभव आला.. मी माझ्या एका नातेवाइकाकडे गेले होते, तिथे ३-४ बायका पोरी हे गाणं बघून खुपच चेकाळलेल्या किती मस्तंय मस्तंय करत आणि पुढ्च्या दिवाळीत याच गाण्यावर नाचायचं म्हणून... हे लोक १००% मराठी आहेत, मराठी माध्यमातून शिकलेले आहेत...

In reply to by दिपाली पाटिल

भाऊंचे भाऊ 19/11/2015 - 11:40
गाणं, डान्स संगीत सगळे उत्तम आहे. फक्त हे असं गानं पेशव्यांच्या चित्रपटात नको होतं असं टीजर बघुन नक्किच वाटतं. एकुणच चित्रपटाची काटछाट अथवा राडा होण्याची शक्यता भरपुर आहे. लेट्स सी.

आपल्याकडे खुद्द महाराष्ट्रात आणी उर्वरीत भारतात बाजीराव म्हटले की मस्तानी एवढेच लोकांना ठाऊक आहे त्यात आता पिंगा गाण्यामुळे सोशल मिडीयावर जी राळ उडाली त्याने खेदाने नमूद करावेसे वाटते की त्याचा ह्या सिनेमाला आयती नकारात्मक प्रसिद्धी मिळाली , आजकाल नकारात्मक प्रसिद्धी ही सिनेमाच्या पहिल्या ३ दिवसात गल्ला भरायला कामी येते. भारतात मला एखाद्या सिनेमाच्या आधी त्याचे ट्रेलर किंवा परीक्षण पाहून त्या सिनेमाच्या लायकीची कल्पना येउन सुद्धा लोक्स सिनेमाला पहिल्या आठवड्यात हजेरी लावतात. अनेक जण सिनेम पाहतोय असे चेपू वरून जगाला सांगतात. मग दुसर्या दिवशी चेपू वरील भिंती वर, समूहात त्या सिनेमाची चिरफाड करणारे परीक्षण खरडतात. तेव्हा त्यात सिनेमाची बिनपाण्याने करतांना हा सिनेमा आपण पैसे देऊन थेटरात पहिला , ह्याचे त्यांना सोयरसुतक नसते. वाईट सिनेमा पाहिला कि असह्य तगमग होते तर मग १ आठवडा कळ काढून थांबावे , सोशल मिडिया वर व आप्त स्वकीयांच्या कडून सिनेमाच्या वद्दल खात्री करून मग तो पहावा. पण अनेक परीक्षणसम्राट हे केवळ जनतेने वाईट शिनेमा पाहून पैसा खर्ची करू नये म्हणू अडीच तासाचे हलाहल स्वतः नेत्राने प्राशन करतात. येथे पोटतिडकीने प्रतिसाद देणारे कितीतरीजण थेटरात जाऊन काय नक्की भन्साळी ने गोंधळ घातला आहे हे स्वःताच्या डोळ्यांनी थेटरात जाऊन येतील आणि बाहेर येतांना खेटर खाल्या सारखा चेहरा करून बाहेर येतील. आणि मग तावातावाने सिनेमाला नावे ठेवतील पुढे असे सिनेमे १०० कोटीच्या वर गल्ला कसा जमवतात ह्या बद्दल सखेद आश्यर्य व्यक्त करतील. बाजीरावांच्या कर्तुत्वावर प्रेम व श्रद्धा असेल तर आज सगळ्यांनी पण करूया हा सिनेमा थेटरात जाउन पाहायचा नाही, पंचतारांकित नगरीत स्वागत आहे आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

स्रुजा 19/11/2015 - 03:40
बरोबर आहे तुमचं. आणि आजकाल तर १०० कोटी हा आकडा १० रुपयाचं चॉकोलेट खाल्लं इतक्या सहजतेने उच्चारतात. एक तर बर्‍याचशा उत्तर भारतीय जनतेला अशा ओव्हर द टॉप चित्रीकरणाचं आकर्षण आहे आणि त्याहीपेक्षा जास्त बाहेरील देशांत. हल्ली बड्या बॅनरचे सिनेमे मध्य पूर्वेत, उत्तर अमेरिकेत, कधी कधी काही युरोपियन देशांत एकत्र रीलीज होतात. मल्टीप्लेक्स चं तिकीट बघता आणि निव्वळ चकाचौन वाल्या बॉलिवुड सिनेमांचं बाहेर असलेलं आकर्षण बघता १०० कोटी कितीही रद्दी सिनेमा असला तरी गोळा होतातच. त्यात अजुनही काही मार्केटिंग गिमिक्स असतील. धुम ३ आणि प्रेम रतन नी जर २-३०० चा गल्ला गोळा केला तर मग बाकीबद्दल काही बोलायलाच नको. सिनेमाचा दर्जा आणि मिळणारा पैसा यांचा आपापसात सुतराम संबंध नाही. आतादेखील काही अ-मराठी भारतीयांच्या अगदी भारावुन गेलेल्या प्रतिक्रिया आहेत. आपण उगाच सात्विक संताप करत बसण्यात काही पॉईंट नाही. ते गाणं, तो सिनेमा बरेच पुरस्कार देखील घेऊन जाणार आहे . उद्या कदाचित करण जोहर भन्साळीला त्याच्या शो मधे बोलावुन या "काँट्रोव्हर्सी" बद्दल विचारेल , भन्साळी काहीतरी तद्दन दिखाऊ उत्तरं देऊन मराठी जनतेलाच मुर्ख ठरवेल. त्यामुळे गेला उडत तो भन्साळी आणि खड्ड्यात जाऊ दे तो सिनेमा !

नगरीनिरंजन 19/11/2015 - 05:25
भन्साळीकडून काय अपेक्षा होती? या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हाच कळले होते की काय होणार आहे. बाकी एक-दीड टक्के लोकसंख्येने पिच्चर पाहिला तरी १०० कोटी जमा होत असल्याने त्या आकड्यांना काहीही महत्त्व नाही. भन्साळीसारख्या येडपटांना आधीच जागा दाखवायला पाहिजे होती. त्याचा हम दिल दे चुके सनम हा पिच्चरच इतका इरिटेटिंग होता की पुढचे त्याला काढू दिले हेच आश्चर्य आहे.

पॉइंट ब्लँक 19/11/2015 - 09:33
आयला, मिपावर कोणी उदारमतवादी धर्मनिरपेक्ष मंडळी जिवंत नाहित का? त्यांच्याकडून खालील प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. १. मराठी माणसाचा कट्टरवाद फार वाढला आहे. भारतातील "Intolerance" वाडवण्यासाठी मिपावरचे असे लेख हातभार लावतात २. मिपावरील हा लेख म्हणजे कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्यांची उघड उघड गळचेपी आहे. ३. नऊ वारी साडी नेसून पोट दाखवले म्हणून आरडाओरडा हे बुरसटलेल्या मनोवृत्त्तीचे लक्षण आहे. कुणी काय दाखवावे हा ज्याचा त्याचा "my chioce" आहे. ४. वरील लेख आणि त्याला आलेले प्रतिसाद पाहता काही सहिष्णु मंडळी मिपावरील सनातनी विचाररसणीमुळे दुखावले गेले आहे. असे सर्व लेखक, छायाचित्रकार आणि शास्त्रज्ञ (ह्यांचा काय संबंध हा प्रश्न विचारू नये) दिवाळी अंकातून आपले लेख मागे घेण्याच्या विचारात आहेत. मिपातर्फे शनिवार वाड्यावर जंगी पुरस्कारवापसी सोहळा आयोजित केला जावा !

In reply to by पॉइंट ब्लँक

आणि त्या सोहळ्यात ह्या गाण्यावर सोनाली कुलकर्णी (ज्यु.) व अम्रुता खानविलकर यांचा या गाण्यावर नाच असावा (मधेच "लघुगुरु" बाजीराव म्हणुन स्पेशल अ‍ॅपिअरन्स)

In reply to by पॉइंट ब्लँक

विवेकपटाईत 19/11/2015 - 19:39
अरे बाबा हा सिनेमा पुरोगामी लोकांनी बनविला असता तर मिपावर असे आक्षेप निश्चित आले असते. नयनतारा यांना सा.अ. पुरस्कार मिळाला आहे, अधिकांश लोकांना वापसी नंतर कळले.

नमस्कार, या गाण्यावर वाद याचमुळे आहे, की हे गाणे काशी बाई आणी मस्तानी वर एकत्रित चित्रित झाले आहे, मुद्दा असा पण वाचण्यात आलाय की मूळ सिनेमा मधे हे गाणे नाही, तर शेवटी दाखवले जाईल, अर्थात त्याने वाद समाप्त होत नाहीच... काशी बाई या पायाने अधू होत्या, त्यामुळे त्यांना नाचता येणे शक्य नाही, मुळात काशी बाई आणि मस्तानी बरोबर का नाचव्यात... ही सरळ सरळ इतिहासाची दिशाभूल आहे...एक मात्र खरं, या मुळे slb ची प्रसिद्धी नक्की होणार

"माळव्यातली हिरवीगार शेते..बाजीराव घोड्यावरून...मस्तानी पुढे फेर धरून नाचत जातीये...बाजीराव उतरतात मस्तानीचा हात धरुन गोल फिरवतात (शारुख स्टाईल)...पुढच्या सीनमधे मस्तानीच्या जागी काशीबाई...मागे शिंदे..होळकर वगैरे खासे हातात तलवारी घेऊन उधे गं अम्बे उदे स्टाईलने नाचतायत...बरोबर नऊवारीमधील बाया (झी मराठी पुरस्कार स्टाईल)...मग प्रत्येक कडव्याला मस्तानी व काशीबाई आलटुन पालटुन येतात" अशी ज्याची प्रतिभा त्या संजयने फक्त "पिंगा" वर भागवले ह्याबद्द्ल आपण खरंतर संजयचे जाहीर आभार मानायला हवेत व पुढिल वर्षीचा "महाराष्ट्र भूषण" त्यालाच मिळायला हवा व औस्कर मधील मानांकन सुदधा... आणि इथे मराठी लोक्स नऊवारी ब्राम्हणी की साधी रितीभाती वगैरे चर्चा करत बसलेत. "मस्तं पिक्चर बघा आणि थंड बसा" (आ. बाळासाहेबांना स्मरुन...) ता. क. कदाचित असं एखादं गाणं असेलही. मला माहीत नाही. असल्यास वरील लिखाण सपशेल मागे घेतले जाईल...

In reply to by एक सामान्य मानव

जिन्क्स 19/11/2015 - 12:07
सहमत. बर्‍याच लोकांचा आक्षेप काशीबाई आणि मस्तानी एकत्र नाचण्यावर आहे. बाकी त्या कोणत्या पद्धतीने नऊवारी नेसल्या आहेत, बाजीरावांचे डोळे घारे दाखवले आहेत की काळे हे सगळं "poetic leverage" म्हणून माफ करता येईल. अजून चित्रपट रिलीज पण नाही झाला तरी त्याच्यावर एवढी आगपाखड. समजा, भंसाळी नी इतिहासाशी जास्त प्रतारणा न करता, पालखेड- भोपाळ च्या लढाईची सुंदर दृश्ये (ट्रोय स्टाइल) दाखवली, बाजीरावांची रणनीतीचं नाही पण युद्धनीती पण सुंदर रित्या लोकांसमोर आणली आणि हे जे गाणं आहे ते शेवटच्या एंडिंग ला पाट्या पडतानी दाखवले तर त्याच्या ह्या बारीक सारीक चुका कट्टर मराठी माणूस नक्कीच माफ करेल. तस्मात, चित्रपटाची वाट बघा आणि चुकीचं काही दाखवले असेल तर वाट लावा.

सिरुसेरि 19/11/2015 - 13:57
"भाऊंचे भाऊ - Thu, 19/11/2015 - 11:40 गाणं, डान्स संगीत सगळे उत्तम आहे. फक्त हे असं गानं पेशव्यांच्या चित्रपटात नको होतं असं टीजर बघुन नक्किच वाटतं. एकुणच चित्रपटाची काटछाट अथवा राडा होण्याची शक्यता भरपुर आहे. लेट्स सी. " -- सहमत . +१ संजय लीला भंसालीचा "खामोशी - द म्युझीकल" सिनेमा खुप सुंदर , अर्थपुर्ण होता. पण नंतरचे सिनेमे जास्तच व्यावसायिक होते . असे वाटते कि , जर आशुतोष गोवारिकरने "बाजीराव" सिनेमा बनवला असता , तर तो जास्त चांगला झाला असता .

चलत मुसाफिर 19/11/2015 - 15:56
मुळात भारतातले लोक रोज बागेत जाऊन एक गाणे म्हणतात अशातला भाग नाही. त्यामुळे कुठलेच चित्रपटगीत वास्तववादी असू शकत नाही. मानापमानात रुक्मिणीने का कोणीतरी गाणी म्हटली ती कशी चालली? बाजीराव असला तरी त्याने चोवीस तास तलवार घेऊन युद्धच करायला पाहिजे की काय? काशीबाई या आयुष्यात कधीही नाचल्या नाहीत किंवा नाचणे या शब्दाची त्यांना चीड होती असा पुरावा उपलब्ध आहे काय? नसेल तर मग काय बिघडलं त्या घटकाभर नाचल्या म्हणून? भगतसिंह आणि त्याचे जिच्याशी लग्न ठरले होते ती मुलगी (बायको नव्हे) हेही प्रत्येक हिंदी सिनेमात गाणी म्हणताना दाखवले आहेत. लोकांना काही तो खरा इतिहास वगैरे वाटला नाही.

आबा 19/11/2015 - 15:57
नाच फारतर काल्पनीक आहे असं म्हणता येईल, विकृत कसा काय ?

In reply to by वेल्लाभट

आबा 19/11/2015 - 16:20
कमरेला झाडू आणि गळ्यात मडके, वगैरे गोष्टी दाखविल्या असत्या तर विकृत ठरला असता, डान्समध्ये काय वि़कृती आहे ?

In reply to by आबा

कमरेला झाडू... वगैरे गोष्टी दाखविल्या असत्या तर विकृत ठरला असता आता तुमच्यावर दिल्लीत एक निषेधाची प्रेस कॉन्फरन्स होणार बघा ! ;)

In reply to by आबा

बॅटमॅन 19/11/2015 - 17:55
काशीबाईला पायाचे दुखणे होते म्हणतात. शिवाय सवतीबरोबर असा डान्स, तोही अगदी बिनघरंदाज थाटाच्या बेंबीदर्शन साड्या नेसून केलेला दाखवणे हे चूकच. हेत्वारोप करावा की नाही हे ज्याचं त्यानं आपापलं ठरवावं, परंतु असे काही दाखवणे पाहून हेत्वारोप करावासा वाटणे यात काही चूक नाही असे वाटते. वैसेभी पेशवा म्हणजे सन ऑफ अ लेसर गॉड, त्यांच्या नावाला इतके उपद्रवमूल्यही नाही. त्यामुळे तितका परिणाम होणार नाही.

In reply to by बॅटमॅन

आबा 19/11/2015 - 22:40
१) काशीबाईंना असलेले पायाचे दुखणे विचारात न घेणे २) सवतीसोबत नाचताना दाखवणे ३) तात्कालीन पद्धतीचे पोषाख न दाखवणे या सरळ सरळ फॅक्चुअल चूका आहेत, यात ईतिहासाचे विकृतीकरण काही नाही

In reply to by बॅटमॅन

आबा 20/11/2015 - 15:31
हो तुमचं बरोबर आहे,, फॅक्ट्च्युअली चूकच आणि विकृतही म्हणता येईल, मुख्य मुद्दा म्हणजे, आर्टिस्टीक लिबर्टी घेऊन इतिहासाचं इंटरप्रिटेशन यापूर्वीसुद्धा झालेलं आहे (ऊदा. - राऊ, राजा शिवछत्रपती, श्रीमान योगी, मृत्युंजय, मी नथुराम गोडसे बोलतोय, वगैरे). असं इंटरप्रिटेशन चांगलं/वाईट्/विकृत कसंही असू शकतं. आपल्या अहंगंडांना सुखावणारं इंटरप्रिटेशन तेवढं लालित्यपूर्ण, आणि थोडं वेगळं असलं की विकृत; ही मांडणी तात्विक नाही. त्या डान्स मध्ये काय व्हल्गर/विकृत आहे, ते त्यांनाच माहीत. असो. पेशव्यांनी चालवलेला थयथयाट, थोडा जरी ऐतिहासिक कन्सिस्ट्न्सी साठी असता; तरी मी अहंगंड वगैरे शब्द वापरले नसते, परंतू तो तसा नाहीय याची मला बर्‍याच अंशी खात्री आहे. मोअरओव्हर, काशीबाईंच्या ऐवजी मस्तानीला नाचताना दाखविले असते तरी त्यांनी पत्र लिहिण्याचे कष्ट घेतलेच नसते (ते असं मान्य करायचे नाहीत, हेही मला माहीत आहे). आमच्या थोर, खानदानी (इत्यादी) घरातल्या स्त्रीया डान्स करत नाहीत, हा भन्साळ्या कोण लागून गेला आमच्या बायकांना नाचवणरा अश्या प्रकारचा पंचरंगी माज आहे. तुमचा स्वतःचा विरोध फक्त अ‍ॅक्युरसी साठी आहे, तरीही तुम्ही विकृत का म्हणंत आहात ते मला कळंत नाहीये.

In reply to by आबा

बॅटमॅन 20/11/2015 - 15:41
आमच्या थोर, खानदानी (इत्यादी) घरातल्या स्त्रीया डान्स करत नाहीत, हा भन्साळ्या कोण लागून गेला आमच्या बायकांना नाचवणरा अश्या प्रकारचा पंचरंगी माज आहे.
मुळात काशीबाईस पायाचे दुखणे असतानाही ती नाचली असे दाखवणे हे विकृत वाटते. हे चेष्टा केल्यासारखे वाटते. शिवाय तत्कालीन समजानुसार खालच्या दर्जाचे मानले गेलेले गुणविशेष दाखवणे हेही खटकतेच. यात माज कसला आला?

In reply to by बॅटमॅन

आबा 20/11/2015 - 15:46
ते आणि तत्सम गुणविशेष खालच्या दर्जाचे आहेत, असे अजूनही मानणे (आणि तेच पत्राचे कारणही असणे) हा माज

In reply to by बॅटमॅन

नाखु 20/11/2015 - 15:56
हे इतीहास-विकृत प्रदर्शनाचे समर्थन करणार्या अस्सल विचारवंताना प्र्शन करतो की तुमच्या घराण्याच्या इतीहासावर एखादा माहीती पट बनविला आणि त्यात तुमच्या आज्जीला खालील गाण्याप्रमाणे दाखविले तर तुम्ही तुमच्या आप्तेष्टासहीत मिटक्या मारत पहाल काय ? असेच समर्थन कराल काय? चला त्या निमित्ताने तुमच्या घराण्याची माहीत+जाहीरात तरी झाली सगळ्या जगाला असे ऊर बडवून सांगाल काय ? का त्यांचे खरेच काही कर्तुत्व होते ते दाखविण्याचा आग्रह धराल ?
इथे उत्तरे द्या किंवा देऊ नकाच, फक्त घरी गेल्यावर आपल्या आईसमोर आणि कन्येसमोर उत्तरे द्या आणि त्यांचीच उत्तरे इथे टंका.

In reply to by नाखु

बॅटमॅन 20/11/2015 - 16:02
नाखुकाका, ही तुलना गंडलेली आहे. पेशव्यांबद्दल आदर- प्रेम जरूर असावा, मात्र जिथे तिथे हे तुमच्या घराण्याबद्दल बोलले तर काय वगैरे प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. याने साध्य काहीच होत नाही.

In reply to by बॅटमॅन

नाखु 20/11/2015 - 16:11
बॅटमण त्यांनी पेशवे यांनी लिहिलेल्या पत्रातील मुद्द्यांना आक्षेप घेतला आणि शिवाय त्यांच्या घरंदाजपणाबद्दल अनावश्यक टिप्पण्णी केली. मी त्यांच्या पत्र लिहिण्याच्या आणि मुद्द्याच्य समर्थान ही तुलना केली आहे उदाहरण दिले आहे. जर तू आणि मी ज्यांचा दूरान्वयेही पेशव्यांशी संबध नाही अश्यांना हे सारे अत्यंत आक्षेपार्ह वाटते तर त्यांच्या खर्या खुर्या वारसांना काहीच वाटत नसेल का? तरी तुला राग आला असेल तर आधीक उणे क्षमा.. तडजोडी नाखुस

In reply to by नाखु

बॅटमॅन 20/11/2015 - 16:20
जर तू आणि मी ज्यांचा दूरान्वयेही पेशव्यांशी संबध नाही अश्यांना हे सारे अत्यंत आक्षेपार्ह वाटते तर त्यांच्या खर्या खुर्या वारसांना काहीच वाटत नसेल का?
त्यांना काय वाटेल याची चिंता आपण कशाला करावी? आपल्याला त्यांच्या पूर्वजांविषयी त्यांच्या पराक्रमामुळे प्रेम आणि आदर आहे. त्यांच्या खानदानात जन्माला येणे हा फक्त एक जैविक अ‍ॅक्सिडेंट आहे. त्यात त्यांचे काहीसुद्धा कर्तृत्व नाही. त्याचे इतके कौतुक कशाला? वंशजांना काय वाटेल त्याची चिंता वंशजांनी करावी. आपल्याला जे खटकतं त्याला विरोध केला ना, तेवढं बास आहे.

In reply to by नाखु

आबा 21/11/2015 - 00:13
एक मिनिट, फालतू कांगावा करू नका, मी कोठे त्यांच्या घरंदाजपणा बद्दल टिपण्णी केली? मी त्यांच्या पोकळ अभिमाना विषयी बोललो, जे त्यांच्या फेसबूक वरील इतर कमेंट्स वाचल्या तरी सहज समजेल (सध्या अकांऊंट डीअ‍ॅक्टीव्हेट केलेले आहे ). कलाकारांच्या दिसण्या विषयी केलेलविषयी केलेल्या कमेंट्स तर सरळ रेसीस्ट आहेत आणि, त्यांच्या घरंदाज पणा बद्दल मला काही घेणे देणे नाही, असो. आता तुमच्या आधीच्या प्रश्नाविषयी- माझं सोडा, माझ्या आजीला सुद्धा अश्या डान्सचा फरक पडला नसता यापेक्शा सुद्धा पॉईटेड प्रश्न असा विचारता आला असता, की "माझ्या आजीने असा डान्स केला असता, तर मला चालला असता का?" ज्याचे उत्तर असे आहे की, माझ्या आजीला स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे अस मी मानतो.. हाच तुमच्या आणि माझ्या मधला फरक आहे.. आता मुख्य प्रश्न, पिंगा गाण्यामध्ये व्ह्ल्गर्/विकृत काय आहे ?

In reply to by आबा

स्रुजा 21/11/2015 - 00:17
असं करा, प्रतिसाद देण्यात वेळ न घालवता एकदा वरची चर्चा वाचुन तरी या. त्यात यातल्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरं आहेत. आणि रेसिस्ट???? कहर आहे.

In reply to by स्रुजा

आबा 21/11/2015 - 00:44
मी बरेच नाही, एकच प्रश्न विचारला आहे की पिंगा गाण्यात विकॄत किंवा व्हल्गर काय आहे? त्याचं उत्तर वरती नाहीय, वरती इतकंच सांगितल आहे की ते गाणं ऐतिहासिक नाही

In reply to by आबा

रेवती 21/11/2015 - 00:50
पिंगा घालण्यात विकृत असे काही नाहीये. पिंगा गाण्यात जो आहे त्याला दिंडा म्हणतात. ही सगळी चर्चा व त्या गाण्यातील चुका यांची सांगोपांग चर्चा याच धाग्यात झालेली आहे.

In reply to by आबा

स्रुजा 21/11/2015 - 00:58
पिंगा गाण्यात त्यांच्या साड्या कशा नेसवल्यात ते बघा. त्या दोघी लावणीच्या स्टेप्स करतायेत. या स्टेप्स् मुळीच मंगळागौरीच्या खेळाच्या नाहीत. बाकी कल्चरल सेन्सिटिविटी बद्दल मी आधीच लिहिलं आहे http://misalpav.com/comment/772589#comment-772589, ते सगळं नाहीये तस्मात चुकीचं आहे, शिवाय त्या काळी पेशव्यांची पत्नी लावणी च्या स्टेप्स करतीये हे विकृतीकरण च आहे. लावणीच्या स्टेप्स सोज्वळ नसतात. त्याकाळच्या समाजमान्यतांना, घरंदाजपणाच्या मानदंडाला सरळ सरळ धाब्यावर बसवलंय . आणि इतिहास बदलायची गरज नाही, तो फिक्शन नाही.

In reply to by आबा

सूड 21/11/2015 - 00:26
१) तुम्हाला पिंगा कधी खेळतात/घालतात, कशासंदर्भात असतो माहीतीये? २) तुम्हाला लावणीचा संदर्भ माहीतीये? ३) 'पिंगा- द सेन्शेशनल लावणी नंबर' अशी पब्लिसिटी केलेली माहीतीये? ४) दोन्हीची सरमिसळ तुम्हाला पटत्ये? येवढं सगळं माहीत असूनही तुम्हाला जे काय दाखवलंय योग्य वाटत असेल तर पुढे प्रतिसाद देण्यात काही पॉईंट आहे असं मला तरी वाटत नाही.

In reply to by सूड

आबा 21/11/2015 - 00:50
या सर्व प्रश्नांची माझी उत्तरे हो अशी आहेत सेन्सेशलायझेशन चा उद्देश पैसा कमावणे असा आहे, जो जगातल्या प्रत्येक व्यवसायाचा असतो पिंगा गाण्याने इतिहास "विकॄत" कसा होतो ते मात्र कोणी सांगत नाही असो
पिंगा. येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू. मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे.

पुरोगामी दहशतवाद

विकास ·

जेपी 07/09/2015 - 19:58
मोरे सरांचे अभ्यासपुर्ण लेखन वाचले आहे का ? किंवा अंदमान मधील पुर्ण भाषण वाचले/आयकले आहे का ?नायतर ठराविक कंटेट पकडुन चर्चा करणे व्यर्थ आहे.

In reply to by जेपी

विकास 07/09/2015 - 20:02
धागा प्रस्तावात सुरवातीस म्हणल्याप्रमाणे, संपुर्ण भाषण वाचायला आवडेल. जर त्याचा दुवा असल्यास कृपया येथे कळवा. युट्यूब पण शोधले पण मिळाले नाही.

एस 07/09/2015 - 20:05
पुरोगामी आणि त्यातही खास करून महाराष्ट्रातील पुरोगामी (हा शब्दही बिन-पुरोगाम्यांचाच. 'हिंदू' या संज्ञेप्रमाणेच.) वर्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या फार मोठ्या व सर्वसमावेशक अशा विचारधारेवर प्रा. शेषराव मोर्‍यांनी टीका केलेली नसून पुरोगामी ह्या संज्ञेच्या आड दडून स्वतःचे 'व्हेस्टेड इंटरेस्ट्स' पुढे दामटणार्‍यांना लगावलेली ती चपराक आहे. तस्मात्, ज्याप्रमाणे 'हिंदुत्त्ववादी' ह्या लेबलाचे सरसकटीकरण पटणारे नाही, तद्वतच 'पुरोगामी' ह्या विशेषणाचाही शिवीसारखा वापर होणे हेही निषेधार्हच आहे.

पुरोगामी दहशतवाद समाजासाठी चांगलाच असावा ,त्याशिवाय धार्मिक रुढी परंपरेच्या,अंधश्रद्धेच्या गटारात लोळणारे किडे सुधारणार कसे? सतीची प्रथा हिंदू सोडायला तयार न्हवते, आलमगीर औरंगजेब याने आदेश देऊन हि रानटी पद्धत बंद पाडली.तरीही काही जनांना या प्रथेचा अभिमान वाटत होता, पुढे लॉर्ड बेंटिंक ने कायदा करुन ही प्रथा बंद पाडली. भारतात रेल्वे सुरु झाल्यानंतर काही उच्च जातीयांनी स्वतःसाठी वेगळे डबे असावेत अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली ,यावर ब्रिटिशांनी त्यांना सुनावले,की रेल्वेप्रवास करायचा असेल तर गपगुमान करा, नाहीतर बैलगाडीतून फुटा..तुमचे सोवळे ओवळे घरात ठेवायचे. धर्माची झापडे लावलेल्यांना , व त्याद्वारे समाजाला नाडनार्यांना दहशतवाद दाखवला तर बिघडले कुठे? मी तर् म्हणतो या सबह्युमन मध्ययुगीन बांडगुळांना दहशतीखालीच ठेवायला हवे, त्याशिवाय ते सुधरणार नाहीत.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

भुमन्यु 08/09/2015 - 09:50
तुम्ही फक्त गरळ ओकण्याचेच काम करता का? औरंगजेबाचे कौतुक करतांना त्यांचे बाकिचे पराक्रम सहज विसरता. असो ज्याची त्याची बुद्धी.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

विनोद१८ 09/09/2015 - 00:37
तुला जर इतके असह्य होत असेल तर जात का नाहीस शेजारच्या पापिस्थानात आणि तू कोणत्या समाजसुधारक कुळातला रे ?? तुझ्यासारख्या 'मध्ययुगीन वाळवंटी विचारसरणी'च्या अनुयायाने इथली इतकी चिंता तरी का वहावी ?? तू कोणत्या हेतुने अशा प्रतिक्रीया देतोस ?? अरे आमची काळजी सोड, आमच्याकडे तर समाजसुधारक आहेत, विचारवंत आहेत झालेच तर गेलाबाजार पुरोगामीसुद्धा आहेत मोठी परंपरा आहे आमची काळजी घ्यायला. पण आपले काय, आपल्याकडे काय आहे ?? सगळेच वैराण वाळवंट, अगदी आनंदी आनंद. जरा स्वताच्या पायाखाली बघ काय जळतेय ते, धमक असेल तर तिकडे 'धर्मसुधारणा करा' अशा प्रतिक्रीया दे, तिकडेच त्याची इथल्यापेक्षा अधिक गऱज आहे.
धर्माची झापडे लावलेल्यांना , व त्याद्वारे समाजाला नाडनार्यांना दहशतवाद दाखवला तर बिघडले कुठे? मी तर् म्हणतो या सबह्युमन मध्ययुगीन बांडगुळांना दहशतीखालीच ठेवायला हवे, त्याशिवाय ते सुधरणार नाहीत.
हे तुझे विधान तू ज्या 'हिरव्या मध्ययुगीन वाळवंटी विचारसरणी'चा अंगिकार केला आहेस त्यालाच अगदी चपखलपणे लागू पडते, तू इथे जागा चुकलायस. अरे 'गिरे तो भी टांग उप्पर' किंवा 'चोराच्या उलट्या बोंबा' म्हणतात ते हेच. एकंदरीत तुझ्यात सुधारणा होणे मोठे कठीण दिसते हेच खरे.

बोका-ए-आझम 07/09/2015 - 23:12
समाजाला नाडणा-यांना दहशतवाद दाखवला तर बिघडलं कुठे >>> असं वाटणा-यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमीच. मुळात त्यांना बुद्धी आहे हाच वादाचा मुद्दा आहे. दहशतवाद हा कधीही यशस्वी होऊ शकत नाही. पुरोगामी असो किंवा प्रतिगामी. जर एखादी गोष्ट समोरच्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर तो दुप्पट जोराने त्याचा विरोध करणारच. मग त्याची बाजू बरोबर असो किंवा नसो. आणि या संघर्षात जो जास्त बलाढ्य असेल तोच जिंकणार. इथे बांडगुळांना वगैरे ठोकण्याची भाषा करणा-यांनी कलबुर्गींच्या हत्येचे असलेल्या धाग्यावर हिंदू दहशतवादी वगैरे फुलथ्राॅटल प्रतिक्रिया दिली होती. लगेच तीन दिवसांत ते दहशतवाद हवाच वगैरे म्हणायला लागले.ही अशी वैचारिक पलटी मारणा-यांना जिनियस म्हणतात काय हल्ली?

जानु 07/09/2015 - 23:31
आपणास असे वाटत असेल की मागील प्रकाराची फेड झाली पाहिजे तर मग चक्र सुरुच राहणार कधी काळी यांचा दहशतवादही अश्याच कारणाने आणि विषयावरुन सुरु झाला असेल, आणि पुढे त्याने त्याचे टोकाचे रुप दाखविले असेल. पण आज त्यावर त्यांना दहशतीत ठेवायचे आणि मग समाधान झाले की बघु. याने काय साध्य होणार? दुसरा प्रश्न असा की जर आपण लोकशाही मानत असु तर आजही अश्या घटना घडलेल्या दिसतात त्यावर आहे त्या आणि उपलब्ध कायदे वापरुन कठोरात कठोर शिक्षा करणे शक्य असुन देखील ते होतांना दिसत नाही. ते करणे आवश्यक आहे. सतीप्रथेच्या निर्मुलनात सुरुवात करणारा यासाठी जर आपण औरंगजेबाकडे पाहत तर मग मला वाटते ती एक मोठी चुक आहे. औरंगजेब हा काही निधर्मी वा सहिष्णु म्हणुन मानला जावा असे काही पुरावे नाहीत. तरी फक्त एका गटाला लाभ द्यायचा नाही म्हणुन परका डोक्यावर बसवावा अशी विचारसरणी घातकच आहे त्याचा सगळ्यात जास्त फटका आपण पानिपतात खाल्लाच आहे. (आठवीत असतांना गावात लग्नात उच्च वर्णियांच्या पंगतीनंतर जेवण करायचे हे समजल्यानंतर त्या गावातील एकाही पंगतीत न जेवलेला)

याॅर्कर 08/09/2015 - 10:36
म्हणजे दोन कठीण दगड एकमेकांवर आदळले तर त्या दगडांच्या होणार्या नुकसानीस ते दोनही दगड जबाबदार असतात. आणि प्रत्येक गोष्टी,घटनेमागे एक कारण हे असतेच असते.

विकास 08/09/2015 - 18:45
समर्थ रामदासांचे एक वचन आहे:
स्वतःशी चिमुटा घेतला, तेणे जीव कासावीस झाला | आपुल्यावरूनी दुसर्‍यासी, वोळखावे ||
भगवा दहशतवाद, हिंदूत्ववादी म्हणल्यावर गुंड, अंधश्रद्धा, परधर्म व्देष्टा, जातीयवादी इत्यादी इत्यादी अर्थ लावत सगळ्यांना एकाच पंगतीत बसवताना तथाकथीत पुरोगाम्यांना अथवा इतरांना देखील काही वाटले नाही/वाटत नाही. किंबहूना जे खरेच पुरोगामी आहेत अशांनी देखील या विरोधात कधी मत मांडल्याचे आठवत नाही... म्हणूनच शेषराव मोरे यांनी त्यांना जेंव्हा असेच लेबल लावले जात आहे हे समजल्यावर संयमाने पण परखड उत्तर दिले तेंव्हा तो चिमटा बरोबर बसला. अर्थात यातून असले पुरोगामी काही शिकतील असे वाटत नाही, फक्त मोरे यांच्या (आणि त्यांच्या विद्वत्तेच्या) विरोधात वाटेल ते बोलण्याचे धाडस होणार नाही... पण आज त्यांच्यासाठी असा एक शब्दप्रयोग प्रचलात आणला गेला याचा मात्र तमाम स्वयंघोषित पुरोगाम्यांना त्रास झाला आहे.

शेषराव मोरेंचे भाषण ऐकले आणि वाचले तेव्हापासून अनेक आमच्या प्राध्यापकांच्या वाट्सपगृपवर मी शेषराव मोरेंचे भाषण आवडले असे म्हणालो तेव्हा अनेक मित्रांच्य भुवया उंचावल्या. प्रा.डॉ. तुम्ही कर्मठ होत चालला आहात असेही म्हणाले. मी म्हणालो, माझी बांधिलकी आधुनिक विचारांशी आहे पण, ते चुक काय बोलले ते मला सांगा. एकीकडे परंपरावादी जसे टोकाचे बोलत असतात तसे काही पुरोगामी अतिशय उथळ आणि टोकाचे बोलत असतात, समाजाचे त्याने नुकसानच होणार आहे. वर उल्लेख केला तसा हिंदुंच्या काही गोष्टींना विरोध केल्याशिवाय तो पुरोगामीच नाही का ? आणि अलिकडे शिव्या देण्याची एक फॅशनच आली आहे. काही ढोंगी लोकांनी तर पुरोगाम्यांचं व्यासपीठ बळकावलं आहे, आणि तेथून ते समाजात दरी पसरविण्याचे काम करत आहेत. शेषराव मोरे जे बोलले ते अजिबात चुक बोलले नाहीत, ही गोष्ट मात्र खरी आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास 08/09/2015 - 19:09
पूर्ण सहमत सर. शेषराव मोरे यांचे वक्तव्य हे खर्‍या (म्हणजे) मनाने पुरोगामी असलेल्या व्यक्तीला संयमीतच वाटेल. मला खात्री आहे, त्यांचे म्हणणे सरसकट सर्व पुरोगाम्यांच्या बाबतीत नव्हते. त्यांनी पुरोगामी हा शब्द शिवी केलेला नाही आणि तसेच चुकीच्या हिंदूत्ववादाची भलावण केलेली नाही. मला वाटते त्या भाषणात म्हणूनच ते समजून सांगताना ते म्हणाले की सावरकरांनी त्यावेळेस केलेली हिंदू शब्दाची व्याख्या तशीच ठेवून त्यातील हिंदू हा शब्द बदलून भारतीय करावा आणि पुढे वैचारीक दृष्ट्या भारतीय कोण याची व्याख्या करणे देखील गरजेचे आहे असे म्हणतात... यात मेख अशी आहे की बहुतांशी (पुरोगामी अथवा सनातनी पण) हिंदूत्ववादी हे मोरे यांनी उर्धृत केलेल्त्या व्याख्येतील, "धर्मग्रंथापेक्षा राज्यघटना श्रेष्ठ आहे" या विचाराशी सहमत होण्याची शक्यता आहे. पण अनेकदा अनेक पुरोगामी म्हणवणार्‍या व्यक्तींना "राष्ट्र" ही संकल्पनाच मान्य नसते. त्यांचे पुरोगामित्व हे केवळ निधर्मी असण्याशी आणि बहुतांशी वेळेस हिंदू धर्मालाच नावे ठेवण्यापुरते मर्यादीत असते. त्यांचे काय करावे. असेच निधर्मी पुरोगामी मग नक्षलवाद्यांचे समर्थन करायला लागतात, याकूब-अफझल वरून (त्यांचे गुन्हे काय आहेत) हे मान्य असून देखील गळे काढायला लागतात. सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पेशल पहाटे २ वाजता पण ऐकून घेतले तरी तेच न्यायालय कसे चुकीचे आहे ह्याची जाहीर बौध्दीके देतात... एकीकडे (हिंदू) धर्म आणि धार्मिकांना शत्रू ठरवायचे आणि दुसरीकडे घटनेनुसार केलेल्या न्यायनिवाड्यापासून ते राष्ट्राच्या सीमा पण अमान्य करणे, ही सगळी पुरोगामी दहशतवादाची लक्षणे आहेत.

In reply to by विकास

प्रतिसादाशी सहमत आहे. आवडला प्रतिसाद. शेषराव मोर्‍यांनी ढोंगी पुरोगाम्यांना या भाषणाबद्दल बोलायची संधीच दिली नाही, म्हणुन हे भाषण वेगळेच ठरले यात काही वाद नाही. -दिलीप बिरुटे

जानु 08/09/2015 - 22:05
आजवर भारतातील राजकारण आणि त्यावर असलेला एकाच विचारसरणीचा प्रभाव नवीन सरकार पुसण्याचा प्रयत्न करणार हे नक्की, यामधुन वर्चस्व असणारे आणि वर्चस्व निर्माण करु पाहणारे यांच्यातील हा संघर्ष अटळ आहे. नमो नी त्याची सुरुवात केलेली आहे. या तर सुरुवातीच्या झटापटी आहेत, एकमेकांचा अंदाज पाहणार्‍या पैलवानांप्रमाणे, उजव्या विचारांकडुन अजुन बरेच काही घडविण्याचा आणि वैचारिक बदल करण्याचा प्रयन्त होणार. घोडामैदान जवळ आहे.....

गेल्या दोन दशकांत आपल्या राज्यात बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा आवाज अत्यंत क्षीण झालेला होता. एकीकडे सरंजामी प्रवृत्ती असणारे कट्टरवादी अन दुसरीकडे स्वतःला पुरोगामी म्हणवत व सकाळ संध्याकाळ शाहू, फुले, आंबेडकर ही नावे घेत सत्तेसाठी जातिचे अत्यंत हीन राजकारण करणारे राजकारणी. हेच राजकारणी इतर पक्षांचा उल्लेख करताना जातियवादी हे विशेषण जोडतात तेव्हा तो खूप मोठा विनोद होतो. कदाचित नरहर कुरुंदकरांनंतर कुणी प्रथमच बेधडकपणे या दांभिकतेवर कोरडे ओढले आहेत. यासाठी मोरे सरांचे मनःपूर्वक आभार.

जेपी 07/09/2015 - 19:58
मोरे सरांचे अभ्यासपुर्ण लेखन वाचले आहे का ? किंवा अंदमान मधील पुर्ण भाषण वाचले/आयकले आहे का ?नायतर ठराविक कंटेट पकडुन चर्चा करणे व्यर्थ आहे.

In reply to by जेपी

विकास 07/09/2015 - 20:02
धागा प्रस्तावात सुरवातीस म्हणल्याप्रमाणे, संपुर्ण भाषण वाचायला आवडेल. जर त्याचा दुवा असल्यास कृपया येथे कळवा. युट्यूब पण शोधले पण मिळाले नाही.

एस 07/09/2015 - 20:05
पुरोगामी आणि त्यातही खास करून महाराष्ट्रातील पुरोगामी (हा शब्दही बिन-पुरोगाम्यांचाच. 'हिंदू' या संज्ञेप्रमाणेच.) वर्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या फार मोठ्या व सर्वसमावेशक अशा विचारधारेवर प्रा. शेषराव मोर्‍यांनी टीका केलेली नसून पुरोगामी ह्या संज्ञेच्या आड दडून स्वतःचे 'व्हेस्टेड इंटरेस्ट्स' पुढे दामटणार्‍यांना लगावलेली ती चपराक आहे. तस्मात्, ज्याप्रमाणे 'हिंदुत्त्ववादी' ह्या लेबलाचे सरसकटीकरण पटणारे नाही, तद्वतच 'पुरोगामी' ह्या विशेषणाचाही शिवीसारखा वापर होणे हेही निषेधार्हच आहे.

पुरोगामी दहशतवाद समाजासाठी चांगलाच असावा ,त्याशिवाय धार्मिक रुढी परंपरेच्या,अंधश्रद्धेच्या गटारात लोळणारे किडे सुधारणार कसे? सतीची प्रथा हिंदू सोडायला तयार न्हवते, आलमगीर औरंगजेब याने आदेश देऊन हि रानटी पद्धत बंद पाडली.तरीही काही जनांना या प्रथेचा अभिमान वाटत होता, पुढे लॉर्ड बेंटिंक ने कायदा करुन ही प्रथा बंद पाडली. भारतात रेल्वे सुरु झाल्यानंतर काही उच्च जातीयांनी स्वतःसाठी वेगळे डबे असावेत अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली ,यावर ब्रिटिशांनी त्यांना सुनावले,की रेल्वेप्रवास करायचा असेल तर गपगुमान करा, नाहीतर बैलगाडीतून फुटा..तुमचे सोवळे ओवळे घरात ठेवायचे. धर्माची झापडे लावलेल्यांना , व त्याद्वारे समाजाला नाडनार्यांना दहशतवाद दाखवला तर बिघडले कुठे? मी तर् म्हणतो या सबह्युमन मध्ययुगीन बांडगुळांना दहशतीखालीच ठेवायला हवे, त्याशिवाय ते सुधरणार नाहीत.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

भुमन्यु 08/09/2015 - 09:50
तुम्ही फक्त गरळ ओकण्याचेच काम करता का? औरंगजेबाचे कौतुक करतांना त्यांचे बाकिचे पराक्रम सहज विसरता. असो ज्याची त्याची बुद्धी.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

विनोद१८ 09/09/2015 - 00:37
तुला जर इतके असह्य होत असेल तर जात का नाहीस शेजारच्या पापिस्थानात आणि तू कोणत्या समाजसुधारक कुळातला रे ?? तुझ्यासारख्या 'मध्ययुगीन वाळवंटी विचारसरणी'च्या अनुयायाने इथली इतकी चिंता तरी का वहावी ?? तू कोणत्या हेतुने अशा प्रतिक्रीया देतोस ?? अरे आमची काळजी सोड, आमच्याकडे तर समाजसुधारक आहेत, विचारवंत आहेत झालेच तर गेलाबाजार पुरोगामीसुद्धा आहेत मोठी परंपरा आहे आमची काळजी घ्यायला. पण आपले काय, आपल्याकडे काय आहे ?? सगळेच वैराण वाळवंट, अगदी आनंदी आनंद. जरा स्वताच्या पायाखाली बघ काय जळतेय ते, धमक असेल तर तिकडे 'धर्मसुधारणा करा' अशा प्रतिक्रीया दे, तिकडेच त्याची इथल्यापेक्षा अधिक गऱज आहे.
धर्माची झापडे लावलेल्यांना , व त्याद्वारे समाजाला नाडनार्यांना दहशतवाद दाखवला तर बिघडले कुठे? मी तर् म्हणतो या सबह्युमन मध्ययुगीन बांडगुळांना दहशतीखालीच ठेवायला हवे, त्याशिवाय ते सुधरणार नाहीत.
हे तुझे विधान तू ज्या 'हिरव्या मध्ययुगीन वाळवंटी विचारसरणी'चा अंगिकार केला आहेस त्यालाच अगदी चपखलपणे लागू पडते, तू इथे जागा चुकलायस. अरे 'गिरे तो भी टांग उप्पर' किंवा 'चोराच्या उलट्या बोंबा' म्हणतात ते हेच. एकंदरीत तुझ्यात सुधारणा होणे मोठे कठीण दिसते हेच खरे.

बोका-ए-आझम 07/09/2015 - 23:12
समाजाला नाडणा-यांना दहशतवाद दाखवला तर बिघडलं कुठे >>> असं वाटणा-यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमीच. मुळात त्यांना बुद्धी आहे हाच वादाचा मुद्दा आहे. दहशतवाद हा कधीही यशस्वी होऊ शकत नाही. पुरोगामी असो किंवा प्रतिगामी. जर एखादी गोष्ट समोरच्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर तो दुप्पट जोराने त्याचा विरोध करणारच. मग त्याची बाजू बरोबर असो किंवा नसो. आणि या संघर्षात जो जास्त बलाढ्य असेल तोच जिंकणार. इथे बांडगुळांना वगैरे ठोकण्याची भाषा करणा-यांनी कलबुर्गींच्या हत्येचे असलेल्या धाग्यावर हिंदू दहशतवादी वगैरे फुलथ्राॅटल प्रतिक्रिया दिली होती. लगेच तीन दिवसांत ते दहशतवाद हवाच वगैरे म्हणायला लागले.ही अशी वैचारिक पलटी मारणा-यांना जिनियस म्हणतात काय हल्ली?

जानु 07/09/2015 - 23:31
आपणास असे वाटत असेल की मागील प्रकाराची फेड झाली पाहिजे तर मग चक्र सुरुच राहणार कधी काळी यांचा दहशतवादही अश्याच कारणाने आणि विषयावरुन सुरु झाला असेल, आणि पुढे त्याने त्याचे टोकाचे रुप दाखविले असेल. पण आज त्यावर त्यांना दहशतीत ठेवायचे आणि मग समाधान झाले की बघु. याने काय साध्य होणार? दुसरा प्रश्न असा की जर आपण लोकशाही मानत असु तर आजही अश्या घटना घडलेल्या दिसतात त्यावर आहे त्या आणि उपलब्ध कायदे वापरुन कठोरात कठोर शिक्षा करणे शक्य असुन देखील ते होतांना दिसत नाही. ते करणे आवश्यक आहे. सतीप्रथेच्या निर्मुलनात सुरुवात करणारा यासाठी जर आपण औरंगजेबाकडे पाहत तर मग मला वाटते ती एक मोठी चुक आहे. औरंगजेब हा काही निधर्मी वा सहिष्णु म्हणुन मानला जावा असे काही पुरावे नाहीत. तरी फक्त एका गटाला लाभ द्यायचा नाही म्हणुन परका डोक्यावर बसवावा अशी विचारसरणी घातकच आहे त्याचा सगळ्यात जास्त फटका आपण पानिपतात खाल्लाच आहे. (आठवीत असतांना गावात लग्नात उच्च वर्णियांच्या पंगतीनंतर जेवण करायचे हे समजल्यानंतर त्या गावातील एकाही पंगतीत न जेवलेला)

याॅर्कर 08/09/2015 - 10:36
म्हणजे दोन कठीण दगड एकमेकांवर आदळले तर त्या दगडांच्या होणार्या नुकसानीस ते दोनही दगड जबाबदार असतात. आणि प्रत्येक गोष्टी,घटनेमागे एक कारण हे असतेच असते.

विकास 08/09/2015 - 18:45
समर्थ रामदासांचे एक वचन आहे:
स्वतःशी चिमुटा घेतला, तेणे जीव कासावीस झाला | आपुल्यावरूनी दुसर्‍यासी, वोळखावे ||
भगवा दहशतवाद, हिंदूत्ववादी म्हणल्यावर गुंड, अंधश्रद्धा, परधर्म व्देष्टा, जातीयवादी इत्यादी इत्यादी अर्थ लावत सगळ्यांना एकाच पंगतीत बसवताना तथाकथीत पुरोगाम्यांना अथवा इतरांना देखील काही वाटले नाही/वाटत नाही. किंबहूना जे खरेच पुरोगामी आहेत अशांनी देखील या विरोधात कधी मत मांडल्याचे आठवत नाही... म्हणूनच शेषराव मोरे यांनी त्यांना जेंव्हा असेच लेबल लावले जात आहे हे समजल्यावर संयमाने पण परखड उत्तर दिले तेंव्हा तो चिमटा बरोबर बसला. अर्थात यातून असले पुरोगामी काही शिकतील असे वाटत नाही, फक्त मोरे यांच्या (आणि त्यांच्या विद्वत्तेच्या) विरोधात वाटेल ते बोलण्याचे धाडस होणार नाही... पण आज त्यांच्यासाठी असा एक शब्दप्रयोग प्रचलात आणला गेला याचा मात्र तमाम स्वयंघोषित पुरोगाम्यांना त्रास झाला आहे.

शेषराव मोरेंचे भाषण ऐकले आणि वाचले तेव्हापासून अनेक आमच्या प्राध्यापकांच्या वाट्सपगृपवर मी शेषराव मोरेंचे भाषण आवडले असे म्हणालो तेव्हा अनेक मित्रांच्य भुवया उंचावल्या. प्रा.डॉ. तुम्ही कर्मठ होत चालला आहात असेही म्हणाले. मी म्हणालो, माझी बांधिलकी आधुनिक विचारांशी आहे पण, ते चुक काय बोलले ते मला सांगा. एकीकडे परंपरावादी जसे टोकाचे बोलत असतात तसे काही पुरोगामी अतिशय उथळ आणि टोकाचे बोलत असतात, समाजाचे त्याने नुकसानच होणार आहे. वर उल्लेख केला तसा हिंदुंच्या काही गोष्टींना विरोध केल्याशिवाय तो पुरोगामीच नाही का ? आणि अलिकडे शिव्या देण्याची एक फॅशनच आली आहे. काही ढोंगी लोकांनी तर पुरोगाम्यांचं व्यासपीठ बळकावलं आहे, आणि तेथून ते समाजात दरी पसरविण्याचे काम करत आहेत. शेषराव मोरे जे बोलले ते अजिबात चुक बोलले नाहीत, ही गोष्ट मात्र खरी आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास 08/09/2015 - 19:09
पूर्ण सहमत सर. शेषराव मोरे यांचे वक्तव्य हे खर्‍या (म्हणजे) मनाने पुरोगामी असलेल्या व्यक्तीला संयमीतच वाटेल. मला खात्री आहे, त्यांचे म्हणणे सरसकट सर्व पुरोगाम्यांच्या बाबतीत नव्हते. त्यांनी पुरोगामी हा शब्द शिवी केलेला नाही आणि तसेच चुकीच्या हिंदूत्ववादाची भलावण केलेली नाही. मला वाटते त्या भाषणात म्हणूनच ते समजून सांगताना ते म्हणाले की सावरकरांनी त्यावेळेस केलेली हिंदू शब्दाची व्याख्या तशीच ठेवून त्यातील हिंदू हा शब्द बदलून भारतीय करावा आणि पुढे वैचारीक दृष्ट्या भारतीय कोण याची व्याख्या करणे देखील गरजेचे आहे असे म्हणतात... यात मेख अशी आहे की बहुतांशी (पुरोगामी अथवा सनातनी पण) हिंदूत्ववादी हे मोरे यांनी उर्धृत केलेल्त्या व्याख्येतील, "धर्मग्रंथापेक्षा राज्यघटना श्रेष्ठ आहे" या विचाराशी सहमत होण्याची शक्यता आहे. पण अनेकदा अनेक पुरोगामी म्हणवणार्‍या व्यक्तींना "राष्ट्र" ही संकल्पनाच मान्य नसते. त्यांचे पुरोगामित्व हे केवळ निधर्मी असण्याशी आणि बहुतांशी वेळेस हिंदू धर्मालाच नावे ठेवण्यापुरते मर्यादीत असते. त्यांचे काय करावे. असेच निधर्मी पुरोगामी मग नक्षलवाद्यांचे समर्थन करायला लागतात, याकूब-अफझल वरून (त्यांचे गुन्हे काय आहेत) हे मान्य असून देखील गळे काढायला लागतात. सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पेशल पहाटे २ वाजता पण ऐकून घेतले तरी तेच न्यायालय कसे चुकीचे आहे ह्याची जाहीर बौध्दीके देतात... एकीकडे (हिंदू) धर्म आणि धार्मिकांना शत्रू ठरवायचे आणि दुसरीकडे घटनेनुसार केलेल्या न्यायनिवाड्यापासून ते राष्ट्राच्या सीमा पण अमान्य करणे, ही सगळी पुरोगामी दहशतवादाची लक्षणे आहेत.

In reply to by विकास

प्रतिसादाशी सहमत आहे. आवडला प्रतिसाद. शेषराव मोर्‍यांनी ढोंगी पुरोगाम्यांना या भाषणाबद्दल बोलायची संधीच दिली नाही, म्हणुन हे भाषण वेगळेच ठरले यात काही वाद नाही. -दिलीप बिरुटे

जानु 08/09/2015 - 22:05
आजवर भारतातील राजकारण आणि त्यावर असलेला एकाच विचारसरणीचा प्रभाव नवीन सरकार पुसण्याचा प्रयत्न करणार हे नक्की, यामधुन वर्चस्व असणारे आणि वर्चस्व निर्माण करु पाहणारे यांच्यातील हा संघर्ष अटळ आहे. नमो नी त्याची सुरुवात केलेली आहे. या तर सुरुवातीच्या झटापटी आहेत, एकमेकांचा अंदाज पाहणार्‍या पैलवानांप्रमाणे, उजव्या विचारांकडुन अजुन बरेच काही घडविण्याचा आणि वैचारिक बदल करण्याचा प्रयन्त होणार. घोडामैदान जवळ आहे.....

गेल्या दोन दशकांत आपल्या राज्यात बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा आवाज अत्यंत क्षीण झालेला होता. एकीकडे सरंजामी प्रवृत्ती असणारे कट्टरवादी अन दुसरीकडे स्वतःला पुरोगामी म्हणवत व सकाळ संध्याकाळ शाहू, फुले, आंबेडकर ही नावे घेत सत्तेसाठी जातिचे अत्यंत हीन राजकारण करणारे राजकारणी. हेच राजकारणी इतर पक्षांचा उल्लेख करताना जातियवादी हे विशेषण जोडतात तेव्हा तो खूप मोठा विनोद होतो. कदाचित नरहर कुरुंदकरांनंतर कुणी प्रथमच बेधडकपणे या दांभिकतेवर कोरडे ओढले आहेत. यासाठी मोरे सरांचे मनःपूर्वक आभार.
आज प्राध्यापक शेषराव मोरे यांच्या विश्व मराठी साहीत्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरील भाषणाचा गोषवारा वाचता आला. भाषण मुळातून संपूर्ण वाचायला आवडेल म्हणजे संदर्भ अधिक लागू शकतो. तरी देखील त्यातिल एका महत्वाच्या मुद्यावर चर्चा झाल्यास उत्तम होईल असे वाटते. प्रा.मोरे म्हणतात:
.....‘हा पुरोगामी आणि तो प्रतिगामी’, ‘हा डावा आणि तो उजवा’ असे शिक्के मारून वर्गवारी करण्याची पद्धत महाराष्ट्रात प्रचलित करण्यात आली आहे. ती कोणी प्रचलित केली? अर्थात ‘पुरोगाम्यां’नी!

हार्दीक ते अन्सारी

विकास ·

यशोधरा 02/09/2015 - 03:06
. पण एकीकडे पै. अब्दुल कलाम आणि दुसरीकडे बिस्मिल्ला खांन सारखे सामान्यातून येऊन असामान्य होऊ शकले ते केवळ त्यांच्या अथक परीश्रमामुळे... पण या सर्व सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करत जेंव्हा संपूर्ण समाजाला राखीव जागांच्या नावाखाली वेठीला धरले जाते तेंव्हा देशाचे काय होते हा प्रश्न आहेच पण नक्की आपण समाजातला घटक म्हणून काय मिळवतो याचा व्यक्तीगत विचार करण्याची गरज आलेली आहे असे वाटते. आज देखील भारतीय समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना मदतीच्या हाताची गरज आहे आणि खर्‍या अर्थाने मदत झाली पाहीजे. इतक्या वर्षांनी जर आपण अजून जास्तच राखीव जागा मागत असलो तर नक्कीच काहीतरी चुकते आहे का असा प्रश्न पडतो..
अगदी सहमत.

बहुगुणी 02/09/2015 - 03:27
Insanity means doing the same thing over and over again and expecting different results. असे तर आपले होत नाही आहे ना? हा खरा कळीचा प्रश्न आहे. (माननीय उप-राष्ट्रपति श्री. अन्सारी यांनी केलेलं भाषण पूर्णत्वाने वाचायचं होतं. पण या शासकीय पानावरचा नेमका तोच दुवा ...August 31, 2015 : Remarks by Shri M. Hamid Ansari, Hon'ble Vice President of India at the Inauguration of the All India Majlis-E- Mushawarat Golden Jubilee in New Delhi on August 31, 2015 काम करत नाही असं दिसतंय....)

अर्धवटराव 02/09/2015 - 03:35
आरक्षणामुळे नेमका काय व किती फरक पडतो हे सर्वप्रथम तयासायला हवं. आर्थीक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण द्यावं तर सध्याची आरक्षण पद्धत ७५% तेच काम करत असावी. औद्योगीक क्षेत्र तर गुणवत्ता आणि मेहनत बघुन मोबदला देते. शिक्षण क्षेत्रात त्रास होतो, पण लेखात म्हटल्याप्रमाणे ज्याला शिकायचं आहे तो शिकतोच. सरकारी क्षेत्रात पदोन्नती वगैरे बाबतीत बराच फरक पडतो. पण तसंही ते क्षेत्रं आटत चाललं आहे. आणि स्पर्धा युगात त्यातही सुधारणा होईल..थोडी संथ पण होईल. मग राहिलं राजकारण. तिथे तर परफॉर्मन्स मस्ट होतोय आता. काम करायलाच लागेल. मग आरक्षणाचं एव्हढं आकर्षण का आहे ?

In reply to by अर्धवटराव

यशोधरा 02/09/2015 - 03:50
आर्थीक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण द्यावं तर सध्याची आरक्षण पद्धत ७५% तेच काम करत असावी. > खरच असं होत असावं का?

In reply to by अर्धवटराव

आर्थीक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण द्यावं तर सध्याची आरक्षण पद्धत ७५% तेच काम करत असावी. मला असे वाटत नाही. जर तसे असते तर आरक्षण विरोधात एवढा काक्षोभ निर्माण झाला नसता. हे प्रमाण ५०% पेक्षाही खाली असावं.

रमेश आठवले 02/09/2015 - 06:13
राष्ट्र्पति आणि उपराष्ट्रपती या पदावर असणार्यांनी राजकीय किंवा धार्मिक विषयावर आपली वैयक्तिक मते मांडू नयेत -असा एक संकेत आहे.

In reply to by रमेश आठवले

विकास 02/09/2015 - 16:47
तांत्रिक दृष्ट्या उपराष्ट्रपतींनी राजकीय अथवा धार्मिक गोष्टींवर मत मांडले आहे असे वाटत नाही. हा विषय सामाजीक आहे आणि तसा धरून त्यावर आपली मते मांडणे देखील गैर नाही. त्यांचे हे मत पटले नाही तर तो न पटण्याचा हक्क आणि तसे म्हणण्याचा हक्क देखील इतरांनी मान्य करायला हवा. म्हणजे उपराष्ट्रपतींबद्दल टिका कशाला वगैरे म्हणणे योग्य वाटत नाही. अर्थात जो पर्यंत पातळी सोडली जात नाही तो पर्यंत. येथे मी एक नक्की म्हणेन की मुस्लीम समाज मागासलेला आहे असे माझे देखील मत आहे. त्यासाठी सामाजीक उपाय पण होणे गरजेचे आहे. पण मागासलेपणावर (मग तो कुठलाही समाज असोत) राखीव जागा देणे अथवा विशेष हक्क देणे हे उत्तर आहे असे मला वाटत नाही. (विशेष हक्क हे affirmative action साठी मी वापरत आहे)

In reply to by विकास

रमेश आठवले 02/09/2015 - 21:13
फक्त मुस्लीम समाजातील काही वर्गाना खास सवलती देण्यास सांगणे, हे धर्म ध्यानात घेऊन दिलेले मत म्हणजे धार्मिक विषयात दखल देणे आहे असे मी मानतो.

सुनील 02/09/2015 - 08:58
व्यक्तिगत जीवनात जात-पात माना अथवा नका परंतु भारतात जातीव्यवस्था घट्ट आहे हे वास्तव आहे. त्याचबरोबर, सामाजिकदृष्ट्या सर्व जाती एकाच पातळीवर प्रगत नाहीत, हेदेखिल सत्यच आहे. तेव्हा, 'सर्वांना समान संधींची उपलब्धता' मिळण्यासाठी, जातीनिहाय आरक्षण ठेवण्यात गैर नाही. १) सामाजिकदृष्ट्या मागास जाती कोणत्या (सर्व धर्मांतील) हे ठरवण्यासाठीचे निकष काटेखोर असणे आवश्यक आहे. २) एकदा त्या जाती ठरल्या की त्यात बदल न करणे. ३) दर एका पिढी नंतर (सुमारे २५ वर्षे) पुन्हा अवलोकन करून आरक्षणाच्या टक्केवारीत घट करीत राहणे. ४) आरक्षण फक्त शैक्षणिक पातळीवरच मर्यादित ठेवणे. असे केले असते तर आज हा प्रश्न असा धगधगत राहिला नसता. पण ते झाले नाही...पण अजूनही होऊ शकेल. त्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती मात्र कुठल्याच राजकीय पक्षांत दिसत नाही.
भारतासारख्या देशात अधुनिक भारत होण्याआधीच जातीव्यवस्थेमुळे विषमता होतीच. त्याकरता राखीव जागा सुचवल्या गेल्या. आंबेडकरांनी हे केवळ १० वर्षेच चालेल या अटीवर त्याला पाठींबा दिला
हे खरे नाही. आंबेडकरांनी सुचवलेली दहा वर्षांची मर्यादा ही फक्त राजकीय आरक्षणापुरती (राखीव मतदारसंघ इ.) मर्यादित होती. अन्य आरक्षणांसाठी नव्हे.

In reply to by सुनील

विकास 03/09/2015 - 06:30
१-४ या सर्व मुद्यांशी सहमत. अर्थात त्यातच पुढे म्हणल्याप्रमाणे राजकीय इच्छाशक्ती कुठलाही राजकीय पक्ष दाखवेल असे वाटत नाही. त्यामुळे आता ते होणे अवघड आहे. आंबेडकरांचे म्हणणे नक्की काय होते हे शोधण्याचा प्रयत्न आधी देखील करत होतो पण त्यावेळेस नीट संदर्भ मिळाला नाही. अजूनही मिळालेला नाही... त्यामुळे आठवणीतून ते लिहील पण धागाप्रस्तावात म्हणल्याप्रमाणे, " १० वर्षात एखाद्या समाजाचे संपूर्ण भले होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या तशा राहील्या म्हणून बिघडले असे मला वाटत नाही. " - हा मुद्दा म्हणूनच मांडला.

पैसा 02/09/2015 - 09:15
आरक्षणाबद्दल बरेच काही लिहिता येईल आणि लिहिले जाईल. मात्र जाती आधारित आरक्षणामुळे आरक्षण घेणार्‍यांचेच जास्त नुकसान होते असे वाटते. निदान त्यांच्यापैकी ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेतलाय त्यांच्या मुलांनी तरी त्यातून बाहेर यायचा प्रयत्न करावा. नाहीतर त्या त्या जातीत पुन्हा प्रचंड आर्थिक आणि सामाजिक विषमता तयार होईल. गरीबांना शिक्षण हे आर्थिक मदत करून सरकारने उपलब्ध करून दिले पाहिजे. खर्‍या सुधारलेल्या जातींनी आरक्षण मागितले तरी ते सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. आणि समजा काही जुगाड करून दिलेच तर ओबीसी लोकांना कमी जागा राहतील. आता इंजिनिअरिंग क्षेत्रात भरपूर कॉलेजेस आहेत, शैक्षणिक कर्ज सोपे झाले आहे त्यामुळे खरे तर फक्त वैद्यकीय क्षेत्रातच आरक्षणामुळे एखाद्याची सीट गेली असे होऊ शकते. इंजिनिअरिंगमधे दुसरा काहीतरी पर्याय असतो. त्याचवेळी डोनेशन देऊन उलटे आर्थिक आरक्षणही चालू आहे. म्हणजे अति श्रीमंताना डोनेशन देऊन पेमेंट सीटचे आरक्षण सहज मिळते. जाती आधारित आरक्षण एकवेळ मान्य करता येईल. मात्र धर्मावर आधारित आरक्षण कधीही मान्य होण्यासारखे नाही. आपला देश अधिकृतपणे सेक्युलर असेल तर ते शक्यच नाही. शिवाय इतिहासापासून आपण काहीच शिकणार नाही आहोत का? एकाच देशात दुसरा देश तयार करण्याचा धोका यात दिसतो.

राही 02/09/2015 - 10:17
कालच्या (की आजच्या? नक्की नाही. नंतर नक्की लिहीन) टीओआय मध्ये बर्‍यापैकी गोषवारा आला आहे आणि तो समग्र वाचल्यावर त्यात फारसे काही आक्षेपार्ह वाटले नाही. मुस्लिमांच्या मागासलेपणाबाबत त्यांनी चार खडे बोलही मुस्लिमांना सुनावले आहेत. एकच वाक्य उचलून जंगी विरोध करणे योग्य नाही. शासकीय पानावरचा नेमका तोच दुवा काम करीत नाहीय. (बहुगुणी)

In reply to by राही

विकास 02/09/2015 - 16:41
मुस्लिमांच्या मागासलेपणाबाबत त्यांनी चार खडे बोलही मुस्लिमांना सुनावले आहेत. एकच वाक्य उचलून जंगी विरोध करणे योग्य नाही. हा धागा जंगी विरोध करायला काढला आहे असे मला वाटत नाही. तसा माझा उद्देश देखील नाही. पण जेंव्हा उपराष्ट्रपती पदावरील व्यक्ती धर्माधारीत विशेष हक्क मागू लागते, तेंव्हा ते काळजीचे कारण आहे असे नक्कीच वाटते. शेवटी पब्लीक जे सोपे असते तेव्हढेच लक्षात ठेवून त्याच्या मागे लागते/मागणी करते... म्हणून त्या अनुषंगाने मूळ प्रश्नावर चर्चा घडावी या हेतूने धागा काढला होता/आहे.

च्यायला योगा डे च्या निमित्ताने एक खासदार कोण ती गसाध्वी प्राची आहे म्हणे तिने सुद्धा अन्सारींची पिसे काढली होती "बेटी की शादी है क्या इनविटेशन की जरुरत है क्या" वगैरे बरळल्या होत्या त्या साध्वी (प्रोटोकॉल ची शष्प माहिती नसताना सुद्धा) आता उपराष्ट्रपती असलेल्या माणसाला निव्वळ नावामुळे अन प्रोटोकॉल पाळून ही इतके काही taunting झाले तर तो तरी काय बोलणार हो? besides वर म्हणल्याप्रमाणे त्याच्या एका वाक्यावर इतकी पिसे काढण्यासारखे मलाही काही वाटले नाही

कपिलमुनी 02/09/2015 - 13:57
'सब का साथ, सब का विकास' करायचा तर ही कारणे दूर करणे आवश्यक आहे हेच त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्याचबरोबर ही एका हाताने वाजणारी टाळी नाही हेही त्यांना ठाऊक आहे. आणि म्हणूनच त्यांनी जादिदियत (आधुनिकता) - म्हणजे हराम मानणाऱ्या, इज्तिहाद (बदलांशी जुळवून घेणे) - यास पाप मानणाऱ्या मुस्लिमांना कानपिचक्या दिल्या आहेत. विविधता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या तीन मितींमध्ये राहूनच मुस्लिमांना आपल्या समस्यांना उत्तरे शोधायची आहेत हे अन्सारी यांचे विधान येथे अधोरेखित करण्यासारखे आहे. मुस्लिमांच्या समस्या केवळ दारिद्रय़ वा अशिक्षितपणा यातून आलेल्या नाहीत. त्या मानसिकही आहेत. त्यातील बदलांसाठीची ही हाक आहे. आता असा बदललेला मुस्लीम समाज कोणाला नको आहे? तेव्हा अन्सारी यांच्या या भाषणाकडे कावीळ झालेल्या नजरेने पाहण्याऐवजी त्यावर किमान विचार होणे, देशासाठी फायद्याचे आहे.

प्यारे१ 02/09/2015 - 16:45
हल्ली भूषणास्पद काय नि दूषणास्पद काय हेच समजेनासं झालंय. सगळ्यांना दारिद्रयाचे डोहाळे लागलेले दिसत आहेत. बोल्ट ला रिटायर करून १००मीटर धावण्याच्या स्पर्धेत ठराविक लोकांना 15 सेकंदात तर काहींना उपस्थितीबद्दल विश्वविक्रमाची पत्रकं वाटण्याची शिफारस या ठिकाणी करावीशी वाटते आहे. ही नेमकी कसली होड़ आहे तेच समजत नाहीये!

dadadarekar 02/09/2015 - 17:21
त्यानी राखीव जागा मागितलेल्या आहेत का ? अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन म्हणजे रिजर्वेशन का ? .... मराठमोळा दादू

In reply to by dadadarekar

विकास 02/09/2015 - 18:33
तुम्हाला काय वाटतं अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन म्हणजे? ते स्पष्ट केलेत तर बरे होईल... मी वर म्हणल्याप्रमाणे त्याचा मी मराठीत भावार्थ "विशेष हक्क" असा केला आहे. विकीदुवा योग्य ठरवल्यासः Affirmative action or positive discrimination (known as employment equity in Canada, reservation in India and Nepal, and positive action in the UK) is the policy of favoring members of a disadvantaged group who suffer from discrimination within a culture. https://en.wikipedia.org/wiki/Affirmative_actionWikipedia

सुनील ह्यांचा प्रतिसाद उत्तम वाटला. माझा प्रतिसाद थोडा कडवट वाटेल काही जनाना. पण कितीही समानतेच्या गोष्टी केल्या तरी अजून भारतात जातीव्यवस्था मोठ्या प्रमाणात टिकून आहे हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. कोणत्याही पेपर मधली वर पाहिजे / वधू पाहिजे च्या जाहिराती पहा. लगेच लक्षात येईल. तसेच अजून बर्याच जातींना तथाकथित उच्च जातीतले लोक खूप त्रास देतात. (विशेषत: लहान गावांमध्ये). गावांमध्ये खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतल्या लोकांना अजूनही गावकुसाबाहेरच बर्याचदा हलाखित राहावे लागते. अशा लोकांमध्ये उच्च शिक्षणाचे, रोजगाराचे प्रमाण वाढून त्या देखील मुख्य प्रवाहात सामील व्हाव्यात ह्यासाठी आरक्षण असणे काही गैर नाही. काहीजण म्हणतील आरक्षणामुळे ६०% मार्क मिळवणारा खालच्या जातीतला विद्यार्थी चांगल्या संस्थेत प्रवेश घेतो आणी ९०% मार्क मिळवणारा खुल्या गटातला विद्यार्थी वंचित राहतो. पण बर्याचदा ह्या गावकुसाबाहेर राहणाऱ्या लोकांची परिस्थिती इतकी भयान असते कि एखादा उच्च जातीतला विद्यार्थी ज्याला बर्याच सुविधा उपलब्ध असतात; जर अशा स्थितीत राहिला तर त्याला पास होण्याची देखील मारामार पडेल. त्यामुळे केवळ मार्क बघण्यापेक्षा ते कशा परिस्थितीत मिळवले आहेत ते देखील बघणे महत्वाचे ठरते. आणी जरी ५०% जागा आरक्षणात गेल्या तरी उर्वरीत ५०% जागा खुल्या गटाला उपलब्ध आहेतच. त्यामुळे आरक्षणाने आमची संधी जाते असे म्हणण्यात मला तरी काहीच दम दिसत नाही. बाकी सुनील ह्यांनी जे ४ मुद्दे मांडले आहेत ते योग्य वाटले.

In reply to by अभिजीत अवलिया

आरक्षणाने आमची संधी जाते ह्यात दम आहे फक्त तो मान्य नाहीये. खरी गोची आहे कि चांगल्या संस्था योग्य प्रमाणात नसल्याने हि समस्या आहे. आणि हे मान्य नाहीये म्हणून सगळा गोंधळ आहे. इतकी प्रचंड लोकसंख्या आणि त्याला तुरळक अशी चांगली कॉलेजेस मग त्यात ५०-५५% आरक्षण म्हणून सगळी गडबड आहे. आयआयटी आणि डी वाय/भारती विद्यापीठ(खरे म्हणजे ह्याला विद्यापीठ म्हणणे म्हणजेच एक मोठा जोक आहे) ह्यात मिळणारे शिक्षण ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. शासन काय वाटेल ते निर्णय घेताय आणि स्वतःचे हात काढून घेताय. उगाचच आपले कायदे करायचे पण अंमलबजावणी करायचीच नाही. सगळ्या चांगल्या संस्थांची वाट लावायची. त्यापेक्षा अजून चांगल्या संस्था उभाराव्यात हे लक्षात येत नाही उलट भुक्कड संस्था उभारून लुबाडणे हेच मुख्य काम झाले आहे. ५०% आरक्षण असले तरी अशी जर का व्यवस्था तयार केली तर हा प्रश्न बर्याच प्रमाणात कमी होईल. पण हि अडचण समजण्याची इच्छा किंवा तेवढी झेप आहे का आपल्या पॉलिसि मेकर्स मध्ये?

In reply to by अभिजीत अवलिया

सुबोध खरे 03/09/2015 - 09:50
अभिजित शेट सर्व आरक्षणाला क्रिमी लेयर लावा म्हणजे वर्षाला ५ लाखापेक्षा जास्त पगार घेणाऱ्या( महिना ४०,०००/- पेक्षा जास्त पगार घेणारा माणूस वंचित कसा?) किंवा कुटुंबात १० एकर पेक्षा जास्त शेती असलेल्या लोकांच्या मुलांना राखीव जागा बंद करा. म्हणजे त्याच जातीतील खरोखर गरज असलेल्या( गावकुसाच्या बाहेर ई ई) मुलांना संधी मिळेल. आय ए एस अधिकारी असणार्या बापाच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात राखीव जागा आणी त्यानंतर भारतीय विदेश सेवेत राखीव जागा दिल्याने कुणाचे भले झाले आहे.नवरा आणी मुले अमेरिकन नागरिक, आदर्श मध्ये जागा( मुंबईत एक सरकारच्या कोट्यातून मिळालेली जागा असताना). होय मी देवयानी खोब्रागडे यांचे उदाहरण दिले आहे. यांना का म्हणून राखीव जागा द्यायची? यांची जागा त्यांच्या जातीतील एखाद्या खर्या गरीब मुलाला मिळाली असती तर त्याच्या कुटुंबाचा अंत्योदय झाला असता. येथे उद्याचा अंत होताना दिसतो. माझ्या मुलाला JEE मध्ये गुण कमी मिळाले म्हणून त्याला आय आय टी/ एन आय टी मध्ये जागा मिळाली नाही हे मान्य पण त्याचा मित्र त्याच्या अर्धे गुण मिळवतो पण विशिष्ट जातीत जन्माला आल्यामुळे आय आय टी त प्रवेश मिळवतो. त्याचा बाप महापालिकेत अभियंता आहे. वरकड उत्पन्न भरपूर. तीन बेडरूमचे राहते घर. मुंबइत इतर तीन घरे, टोयोटा कोरोलात फिरतो. अशा मुलाला राखीव जागा देऊन काय बोडक्याचा अंत्योदय होतो? माझ्या मुलाच्या मनात फसवले गेल्याची भावना आहे त्याचे निराकरण कसे करणार? त्यांच्या गटात अमेरिकेला गेले पाहिजे असे बोलणे आहे त्याला कसे थांबवणार. देशभक्ती वगैरे १९ वर्षाच्या मुलाला समजावणे सोपे नाही. म्हणूनच मी म्हणतो राखीव जागान क्रिमी लेयर लावा. पिंपळगाव खुर्द मध्ये जन्माला आलेला क्लास लावण्याची कुवत नसल्याने मागे राहिलेल्या मुलाला जागा दिली तर खरा फायदा.

In reply to by सुबोध खरे

dadadarekar 03/09/2015 - 10:20
पेमेंट सीट हेही श्रीमंतांसाठी असलेले आरक्षणच ना ? ते चालते मग हे का चालू नये ?

In reply to by dadadarekar

कानडा 03/09/2015 - 18:54
IIT आणि NIT (आणि महाराष्ट्रात तरी कुठल्याच Govt. Engg. college) मधे पेमेंट सीट्स नसतात हो.

In reply to by dadadarekar

सुबोध खरे 03/09/2015 - 20:03
@ दादा द रेकर हितेस भाय मारुतीच्या बेंबीत बोट घालायची सवय तुमची काही जात नाही. मग गार लागतं हे हि म्हणायचं. दोन वर्षांनी पैसे आले( कर्ज मिळाले,आखातात कमावले) तर तुम्हाला तुमच्या मुलाला पेमेंट सीट मिळू शकते. ती जन्माधिष्ठित नाही तर कर्माधिष्ठीत आहे.पण केवळ अमुक एका जातीत जन्माला आला म्हणून गडगंज असताना (किंवा खाल्ले असताना) सुद्धा राखीव जागा मिळावी यातच राखीव जागांचे अपयश स्पष्ट होते आहे. राहिली गोष्ट क्रिमी लेयरची त्याबद्दल तुम्ही कुठे बोलत नाही? जळजळ कुठे आहे ते दिसून येते आहे. जो क्रिमी लेयर मध्ये नाही तो नक्कीच जास्त लायक उमेदवार आहे याबद्दल सर्वसंमती आहे. (हो न्यायालयाची सुद्धा) म्हणूनच इतर मागासवर्गीयांसाठी(OBC) साठी क्रिमी लेयर आहे मी फक्त तो अनुसूचित जाती आणी जमातींनासुद्धा लावा असे म्हटले. श्रीमंतांचा आणी श्रीमंतीचा द्वेष करणे हा आपल्या कोन्ग्रेस/ कम्युनिस्ट संस्कृतीचा मिळालेला दळभद्री वारसा आहे.( लुळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी कट्टी गरिबी चांगली) रेल्वेचा वातानुकुलीत डबा परवडत नाही म्हणून रेल्वेला सगळे तृतीय दर्जाचे डबे लावा म्हणण्याची हि मनोवृत्ती आहे.यातून बाहेर पडा (आणी मानसिक गरीबीतूनही).

In reply to by सुबोध खरे

होबासराव 03/09/2015 - 12:49
मी सुद्धा हे भोगलय, १३ मार्काने मागे पडलो MPSC Gazzeted ला. २ रा अटेम्प्ट होता आणि वय वर्ष ३० झालो होतो त्यामुळे तोच शेवटचा होता. पण माझ्यापेक्षा बरेच कमी मार्क असुन सुद्धा माझे काहि मित्र सिलेक्ट झाले कारण ते आरक्षित कोटयात होते. काहि काहि तर आत्ता काहि वर्षापुर्वि सुद्धा सिलेक्ट झालेयत कारण त्यांना एज लिमिट ३८ आहे.

In reply to by सुबोध खरे

gogglya 03/09/2015 - 15:19
+१११११११११११ पुढील पिढ्यांसाठी आपण काय आदर्श ठेवतो आहोत हे सध्या चालु असलेल्या आरक्षणासंबंधीत अनेक घटना बघता निराशा येते. जर निव्वळ आर्थीक परिस्थीतीवर आरक्षण ठेवले तरी बरेच प्रश्न सुटण्यास मदत होउ शकेल. प्रश्न हा आहे की हे बदल कोण आणी कसे घडवुन आणणार?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

dadadarekar 03/09/2015 - 15:46
हिंदू धर्मानुसार , याला कर्मविपाक / प्रारब्ध असे म्हणतात ना ? म्हणजे होबासरावाने गेल्या जन्मी कुणाचा तरी शिक्षणाचा अधिकार नाकारला असणार म्हणून या जन्मात त्याला हे फळ मिळाले.

In reply to by dadadarekar

काळा पहाड 03/09/2015 - 23:04
बापरे, म्हणजे दादासाहेब मागच्या जन्मी तुम्हाला इथल्या सगळ्या मिपाकरांनी बेअक्कलपणे आणि निर्लज्जपणे बरेच खोटे आयडी धारण करून, खोटं नाटं लिहून आणि ट्रोलींग करून बराच त्रास दिलेला दिसतोय.

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब, आपले मुद्दे मान्य आहेत. पण त्याच बरोबर आपण म्हणता तसे उत्पन्नावर आधारीत आरक्षण ठेवणे थोडे कठीण वाटते. कारण माणसाची आर्थिक परिस्थिती नेहमी बदलत असते. एखादी व्यक्ती आज आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल पण उद्या त्याची नोकरी गेली तर? (जे खाजगी क्षेत्रात सहज शक्य आहे) किंवा काही कारणाने (जसे की धंद्यात नुकसान, नैसर्गिक आपत्ती) एखादा श्रीमंत माणूस कफल्लक झाला तर ? तसेच एखादा कफल्लक माणूस अचानक श्रीमंत देखील होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या आर्थिक परिस्थितीचा सतत track ठेवावा लागेल जे खूप कठीण काम आहे असे मला वाटते. प्रत्येकाने आपल्या आर्थिक स्थितीची खरी माहिती देणे आणी त्यावरून आरक्षण घेणे अथवा नाकारणे हा त्यावरचा उपाय आहे. पण स्वताहून आपली खरी आर्थिक परिस्थिती उघड करावी इतकी नैतिकता किती भारतीय लोकांमध्ये असेल हा देखील एक प्रश्न आहे.

In reply to by अभिजीत अवलिया

सुबोध खरे 03/09/2015 - 20:16
अभिजित शेट मी केंव्हा असे म्हणालो कि आर्थिक दृष्ट्या मागास वर्गीयांना आरक्षण द्या. ती पुढची पायरी आहे जेंव्हा प्रत्येक माणसाच्या उत्पन्नाचा खरा हिशेब ठेवणे सरकारला शक्य होईल. सध्या फक्त सर्व आरक्षणाला क्रिमी लेयर लावा. सरकारी नोकरी (आणी बढती जी आरक्षणाने मिळाली आहे) त्यात आपल्याला किती पगार मिळतो हे जगजाहीर असते तेंव्हा तेथे उत्पन्न लपविणे अशक्य आहे. असे लोक वगळा आणी उरलेल्या मागास्वर्गीयाना आरक्षण द्या यात ज्या जागा उरतील त्या गुणवत्ता वर्गात खुल्या करा. बस इतकेच. आजोबा आरक्षणातून डॉक्टर होऊन सरकारी नोकरीत वर चढले( आणी भरपूर माया केली) त्यावर मुलाने पण आरक्षण घेऊन डॉक्टरकि केली आणी बापाच्या वरकड पैश्यातून रुग्णालय बांधले अशा बापाच्या मुलाला अभियांत्रिकीचा प्रवेश अगदी कमी गुण असताना ( ते सुद्धा मुंबईत ३ लाख रुपयांचा क्लास लावून) मिळाला हेच आरक्षणाचे अपयश आहे. हि जागा जर एखाद्या त्याच जातीतील गरीब विद्यर्थ्याला ( ज्याला क्लास परवडत नाही) मिळाली असती तर तो खरा अंत्योदय ठरला असता. आरक्षणाने मागासवर्गीयात "जावई" निर्माण करुन ठेवले आहेत आणी त्यांनी आपल्याच जातीतील खर्या लायक लोकांना वंचित करून ठेवले आहे असे खेदाने म्हणावे लागते.

In reply to by सुबोध खरे

चिगो 04/09/2015 - 14:16
तीन-एक वर्षांपुर्वी एक धागा लिहीला होता. 'कोणाचा रे तू?' म्हणून.. त्यातही मी असेच विचार मांडले होते. मी 'ओबीसी' आहे. मला आरक्षणाचा फायदा मिळाला की नाही, ठाऊक नाही. (युपीएससी सांगत नाही च्यामारी..) पण तो माझ्या मुलांना नक्कीच मिळू नये आता. 'क्रिमीलेअर'चा निकष हा सर्वच आरक्षीत जातींना लावण्यात यावा. मी इथे मेघालयात करोडपती पाहतोय, ज्यांच्या मुला-बाळांना आरक्षीत सीट्स जाताहेत, 'आदीवासी' म्हणून. त्यांचा 'मागास'पणाचा मागमुसही नाही कुठेच. पण त्याचवेळी त्याच जातींतल्या खर्‍याखुर्‍या गरजू मुला-मुलींना आरक्षणाचा फायदा पोहचत नाही, कारण की सगळा मलिदा हे श्रीमंत, 'वेलकनेक्टेड' मागासवर्गीय (?) आदिवासीच घेतात. हेच बाकीच्या राज्यांमध्येपण होतंय. ही पहिली पायरी आहे आरक्षणात सुधारना घडवून आणण्याची..

मदनबाण 02/09/2015 - 19:46
आज देखील भारतीय समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना मदतीच्या हाताची गरज आहे आणि खर्‍या अर्थाने मदत झाली पाहीजे. +१०० मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Halke Gaadi Haako... { Folk Fusion by Neeraj Arya's Kabir Cafe - Official Video }

आज देखील भारतीय समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना मदतीच्या हाताची गरज आहे आणि खर्‍या अर्थाने मदत झाली पाहीजे. हे १०० टक्के खरे आहे. पण... आईन्स्टाईनच्या नावाने वापरले जाणारे एक वाक्य या निमित्ताने आठवते - Insanity means doing the same thing over and over again and expecting different results. असे तर आपले होत नाही आहे ना? यात आपण पी एच डी केलेली आहे, हे पण १०० टक्के खरे आहे. :(

तुडतुडी 03/09/2015 - 17:35
पूर्वीच्या काळी मागास जाती जमातींना अस्पृश्य वगेरे ठरवून त्यांना शिक्षण घेण्यास बंदी होती . हे लोक पुढे जाणार नाहीत ह्यासाठी सवर्णनांकडून आटोकाट प्रयत्न झाले . दलित , गोरगरीब , खालच्या जातीतल्या लोकांचा विकास नं होण्यात आणि ते मागास राहण्यात समाजाचा फार मोठा वाटा होता . In Fact समाजच ह्या लोकांच्या मागासलेपणाला कारणीभूत होता . त्यामुळे अश्या लोकांना पुढे आणण्यासाठी आरक्षण देणं समजू शकतं. पण मुस्लिम समाजाच्या बाबतीत असं झालं का ? मुस्लिमांनी ६०० वर्षे ह्या देशावर राज्य केलंय . मुस्लिम ह्या सवर्णापेक्षाही वरचढ होते . त्यांच्या समाजात ते शिक्षण घेवून पुढे जावू शकले असते . मुस्लिमांचा मागासलेपणा हा फक्त त्यांच्या चुकीच्या धार्मिक धोरणांमुळे आहे असं वाटतं . मुस्लिमांच्या सामाजिक , धार्मिक प्रथा अतिशय मागासलेल्या आहेत . मग केवळ मुस्लिम आहेत म्हणून आरक्षण देणं कितपत योग्य ठरतं ?

In reply to by तुडतुडी

सुबोध खरे 03/09/2015 - 20:18
तुडतुडी ताई मुसलमानांना राखीव जागा दिल्या तर कोणीही उद्या कागदोपत्री मुसलमान व्हायला तयार होईल. धर्म हा बदलता येतो म्हणून त्याला आरक्षण देता येत नाही हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बाकी आपल्या प्रतिसादाशी मी सहमत आहे.

एखादी गोष्ट लपवायला गेलात तर जास्त प्रसिद्ध होते. जातीचा विषय तसाच आहे. त्याबद्दल जास्त गाजावाजा न करता जर शिक्षण आणि व्यवहाराबद्दल प्रसार झाला तर जाती व्यवस्था आपल्या आपण नाहीशी होईल.

लिओ 04/09/2015 - 19:08
सध्याच्या सरकारला राज्यसभेत बहुमत कमी आहे. २०१८ च्या सुरवातीला अथवा शेवटी सध्याच्या सरकारला लोकसभेत व राज्यसभेत पुर्ण बहुमत मिळेल असे गृहीत धरले तर २०१८ मध्ये सरकार आरक्षणाबाबत खबीर भुमिका घेईल का ?

चर्चा वाचतो आहे. खरंच आरक्षणाबाबत काहीतरी ठोस व सकारात्मक निर्णय व्हायलाच पाहिजे . भिजत घोंगडं किती दिवस ठेवणार . आर्थिक , सामाजिक दरी कमी व्हावी म्हणून आरक्षण असा मूळ विचार ! पण सध्याच्या आरक्षण प्रणाली मुळे नेमकं याच्या विरूद्ध होत आहे.सरकारला व समाजाच्या सर्व घटकांना शांतपणे यावर विचार करून निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

यशोधरा 02/09/2015 - 03:06
. पण एकीकडे पै. अब्दुल कलाम आणि दुसरीकडे बिस्मिल्ला खांन सारखे सामान्यातून येऊन असामान्य होऊ शकले ते केवळ त्यांच्या अथक परीश्रमामुळे... पण या सर्व सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करत जेंव्हा संपूर्ण समाजाला राखीव जागांच्या नावाखाली वेठीला धरले जाते तेंव्हा देशाचे काय होते हा प्रश्न आहेच पण नक्की आपण समाजातला घटक म्हणून काय मिळवतो याचा व्यक्तीगत विचार करण्याची गरज आलेली आहे असे वाटते. आज देखील भारतीय समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना मदतीच्या हाताची गरज आहे आणि खर्‍या अर्थाने मदत झाली पाहीजे. इतक्या वर्षांनी जर आपण अजून जास्तच राखीव जागा मागत असलो तर नक्कीच काहीतरी चुकते आहे का असा प्रश्न पडतो..
अगदी सहमत.

बहुगुणी 02/09/2015 - 03:27
Insanity means doing the same thing over and over again and expecting different results. असे तर आपले होत नाही आहे ना? हा खरा कळीचा प्रश्न आहे. (माननीय उप-राष्ट्रपति श्री. अन्सारी यांनी केलेलं भाषण पूर्णत्वाने वाचायचं होतं. पण या शासकीय पानावरचा नेमका तोच दुवा ...August 31, 2015 : Remarks by Shri M. Hamid Ansari, Hon'ble Vice President of India at the Inauguration of the All India Majlis-E- Mushawarat Golden Jubilee in New Delhi on August 31, 2015 काम करत नाही असं दिसतंय....)

अर्धवटराव 02/09/2015 - 03:35
आरक्षणामुळे नेमका काय व किती फरक पडतो हे सर्वप्रथम तयासायला हवं. आर्थीक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण द्यावं तर सध्याची आरक्षण पद्धत ७५% तेच काम करत असावी. औद्योगीक क्षेत्र तर गुणवत्ता आणि मेहनत बघुन मोबदला देते. शिक्षण क्षेत्रात त्रास होतो, पण लेखात म्हटल्याप्रमाणे ज्याला शिकायचं आहे तो शिकतोच. सरकारी क्षेत्रात पदोन्नती वगैरे बाबतीत बराच फरक पडतो. पण तसंही ते क्षेत्रं आटत चाललं आहे. आणि स्पर्धा युगात त्यातही सुधारणा होईल..थोडी संथ पण होईल. मग राहिलं राजकारण. तिथे तर परफॉर्मन्स मस्ट होतोय आता. काम करायलाच लागेल. मग आरक्षणाचं एव्हढं आकर्षण का आहे ?

In reply to by अर्धवटराव

यशोधरा 02/09/2015 - 03:50
आर्थीक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण द्यावं तर सध्याची आरक्षण पद्धत ७५% तेच काम करत असावी. > खरच असं होत असावं का?

In reply to by अर्धवटराव

आर्थीक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण द्यावं तर सध्याची आरक्षण पद्धत ७५% तेच काम करत असावी. मला असे वाटत नाही. जर तसे असते तर आरक्षण विरोधात एवढा काक्षोभ निर्माण झाला नसता. हे प्रमाण ५०% पेक्षाही खाली असावं.

रमेश आठवले 02/09/2015 - 06:13
राष्ट्र्पति आणि उपराष्ट्रपती या पदावर असणार्यांनी राजकीय किंवा धार्मिक विषयावर आपली वैयक्तिक मते मांडू नयेत -असा एक संकेत आहे.

In reply to by रमेश आठवले

विकास 02/09/2015 - 16:47
तांत्रिक दृष्ट्या उपराष्ट्रपतींनी राजकीय अथवा धार्मिक गोष्टींवर मत मांडले आहे असे वाटत नाही. हा विषय सामाजीक आहे आणि तसा धरून त्यावर आपली मते मांडणे देखील गैर नाही. त्यांचे हे मत पटले नाही तर तो न पटण्याचा हक्क आणि तसे म्हणण्याचा हक्क देखील इतरांनी मान्य करायला हवा. म्हणजे उपराष्ट्रपतींबद्दल टिका कशाला वगैरे म्हणणे योग्य वाटत नाही. अर्थात जो पर्यंत पातळी सोडली जात नाही तो पर्यंत. येथे मी एक नक्की म्हणेन की मुस्लीम समाज मागासलेला आहे असे माझे देखील मत आहे. त्यासाठी सामाजीक उपाय पण होणे गरजेचे आहे. पण मागासलेपणावर (मग तो कुठलाही समाज असोत) राखीव जागा देणे अथवा विशेष हक्क देणे हे उत्तर आहे असे मला वाटत नाही. (विशेष हक्क हे affirmative action साठी मी वापरत आहे)

In reply to by विकास

रमेश आठवले 02/09/2015 - 21:13
फक्त मुस्लीम समाजातील काही वर्गाना खास सवलती देण्यास सांगणे, हे धर्म ध्यानात घेऊन दिलेले मत म्हणजे धार्मिक विषयात दखल देणे आहे असे मी मानतो.

सुनील 02/09/2015 - 08:58
व्यक्तिगत जीवनात जात-पात माना अथवा नका परंतु भारतात जातीव्यवस्था घट्ट आहे हे वास्तव आहे. त्याचबरोबर, सामाजिकदृष्ट्या सर्व जाती एकाच पातळीवर प्रगत नाहीत, हेदेखिल सत्यच आहे. तेव्हा, 'सर्वांना समान संधींची उपलब्धता' मिळण्यासाठी, जातीनिहाय आरक्षण ठेवण्यात गैर नाही. १) सामाजिकदृष्ट्या मागास जाती कोणत्या (सर्व धर्मांतील) हे ठरवण्यासाठीचे निकष काटेखोर असणे आवश्यक आहे. २) एकदा त्या जाती ठरल्या की त्यात बदल न करणे. ३) दर एका पिढी नंतर (सुमारे २५ वर्षे) पुन्हा अवलोकन करून आरक्षणाच्या टक्केवारीत घट करीत राहणे. ४) आरक्षण फक्त शैक्षणिक पातळीवरच मर्यादित ठेवणे. असे केले असते तर आज हा प्रश्न असा धगधगत राहिला नसता. पण ते झाले नाही...पण अजूनही होऊ शकेल. त्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती मात्र कुठल्याच राजकीय पक्षांत दिसत नाही.
भारतासारख्या देशात अधुनिक भारत होण्याआधीच जातीव्यवस्थेमुळे विषमता होतीच. त्याकरता राखीव जागा सुचवल्या गेल्या. आंबेडकरांनी हे केवळ १० वर्षेच चालेल या अटीवर त्याला पाठींबा दिला
हे खरे नाही. आंबेडकरांनी सुचवलेली दहा वर्षांची मर्यादा ही फक्त राजकीय आरक्षणापुरती (राखीव मतदारसंघ इ.) मर्यादित होती. अन्य आरक्षणांसाठी नव्हे.

In reply to by सुनील

विकास 03/09/2015 - 06:30
१-४ या सर्व मुद्यांशी सहमत. अर्थात त्यातच पुढे म्हणल्याप्रमाणे राजकीय इच्छाशक्ती कुठलाही राजकीय पक्ष दाखवेल असे वाटत नाही. त्यामुळे आता ते होणे अवघड आहे. आंबेडकरांचे म्हणणे नक्की काय होते हे शोधण्याचा प्रयत्न आधी देखील करत होतो पण त्यावेळेस नीट संदर्भ मिळाला नाही. अजूनही मिळालेला नाही... त्यामुळे आठवणीतून ते लिहील पण धागाप्रस्तावात म्हणल्याप्रमाणे, " १० वर्षात एखाद्या समाजाचे संपूर्ण भले होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या तशा राहील्या म्हणून बिघडले असे मला वाटत नाही. " - हा मुद्दा म्हणूनच मांडला.

पैसा 02/09/2015 - 09:15
आरक्षणाबद्दल बरेच काही लिहिता येईल आणि लिहिले जाईल. मात्र जाती आधारित आरक्षणामुळे आरक्षण घेणार्‍यांचेच जास्त नुकसान होते असे वाटते. निदान त्यांच्यापैकी ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेतलाय त्यांच्या मुलांनी तरी त्यातून बाहेर यायचा प्रयत्न करावा. नाहीतर त्या त्या जातीत पुन्हा प्रचंड आर्थिक आणि सामाजिक विषमता तयार होईल. गरीबांना शिक्षण हे आर्थिक मदत करून सरकारने उपलब्ध करून दिले पाहिजे. खर्‍या सुधारलेल्या जातींनी आरक्षण मागितले तरी ते सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. आणि समजा काही जुगाड करून दिलेच तर ओबीसी लोकांना कमी जागा राहतील. आता इंजिनिअरिंग क्षेत्रात भरपूर कॉलेजेस आहेत, शैक्षणिक कर्ज सोपे झाले आहे त्यामुळे खरे तर फक्त वैद्यकीय क्षेत्रातच आरक्षणामुळे एखाद्याची सीट गेली असे होऊ शकते. इंजिनिअरिंगमधे दुसरा काहीतरी पर्याय असतो. त्याचवेळी डोनेशन देऊन उलटे आर्थिक आरक्षणही चालू आहे. म्हणजे अति श्रीमंताना डोनेशन देऊन पेमेंट सीटचे आरक्षण सहज मिळते. जाती आधारित आरक्षण एकवेळ मान्य करता येईल. मात्र धर्मावर आधारित आरक्षण कधीही मान्य होण्यासारखे नाही. आपला देश अधिकृतपणे सेक्युलर असेल तर ते शक्यच नाही. शिवाय इतिहासापासून आपण काहीच शिकणार नाही आहोत का? एकाच देशात दुसरा देश तयार करण्याचा धोका यात दिसतो.

राही 02/09/2015 - 10:17
कालच्या (की आजच्या? नक्की नाही. नंतर नक्की लिहीन) टीओआय मध्ये बर्‍यापैकी गोषवारा आला आहे आणि तो समग्र वाचल्यावर त्यात फारसे काही आक्षेपार्ह वाटले नाही. मुस्लिमांच्या मागासलेपणाबाबत त्यांनी चार खडे बोलही मुस्लिमांना सुनावले आहेत. एकच वाक्य उचलून जंगी विरोध करणे योग्य नाही. शासकीय पानावरचा नेमका तोच दुवा काम करीत नाहीय. (बहुगुणी)

In reply to by राही

विकास 02/09/2015 - 16:41
मुस्लिमांच्या मागासलेपणाबाबत त्यांनी चार खडे बोलही मुस्लिमांना सुनावले आहेत. एकच वाक्य उचलून जंगी विरोध करणे योग्य नाही. हा धागा जंगी विरोध करायला काढला आहे असे मला वाटत नाही. तसा माझा उद्देश देखील नाही. पण जेंव्हा उपराष्ट्रपती पदावरील व्यक्ती धर्माधारीत विशेष हक्क मागू लागते, तेंव्हा ते काळजीचे कारण आहे असे नक्कीच वाटते. शेवटी पब्लीक जे सोपे असते तेव्हढेच लक्षात ठेवून त्याच्या मागे लागते/मागणी करते... म्हणून त्या अनुषंगाने मूळ प्रश्नावर चर्चा घडावी या हेतूने धागा काढला होता/आहे.

च्यायला योगा डे च्या निमित्ताने एक खासदार कोण ती गसाध्वी प्राची आहे म्हणे तिने सुद्धा अन्सारींची पिसे काढली होती "बेटी की शादी है क्या इनविटेशन की जरुरत है क्या" वगैरे बरळल्या होत्या त्या साध्वी (प्रोटोकॉल ची शष्प माहिती नसताना सुद्धा) आता उपराष्ट्रपती असलेल्या माणसाला निव्वळ नावामुळे अन प्रोटोकॉल पाळून ही इतके काही taunting झाले तर तो तरी काय बोलणार हो? besides वर म्हणल्याप्रमाणे त्याच्या एका वाक्यावर इतकी पिसे काढण्यासारखे मलाही काही वाटले नाही

कपिलमुनी 02/09/2015 - 13:57
'सब का साथ, सब का विकास' करायचा तर ही कारणे दूर करणे आवश्यक आहे हेच त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्याचबरोबर ही एका हाताने वाजणारी टाळी नाही हेही त्यांना ठाऊक आहे. आणि म्हणूनच त्यांनी जादिदियत (आधुनिकता) - म्हणजे हराम मानणाऱ्या, इज्तिहाद (बदलांशी जुळवून घेणे) - यास पाप मानणाऱ्या मुस्लिमांना कानपिचक्या दिल्या आहेत. विविधता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या तीन मितींमध्ये राहूनच मुस्लिमांना आपल्या समस्यांना उत्तरे शोधायची आहेत हे अन्सारी यांचे विधान येथे अधोरेखित करण्यासारखे आहे. मुस्लिमांच्या समस्या केवळ दारिद्रय़ वा अशिक्षितपणा यातून आलेल्या नाहीत. त्या मानसिकही आहेत. त्यातील बदलांसाठीची ही हाक आहे. आता असा बदललेला मुस्लीम समाज कोणाला नको आहे? तेव्हा अन्सारी यांच्या या भाषणाकडे कावीळ झालेल्या नजरेने पाहण्याऐवजी त्यावर किमान विचार होणे, देशासाठी फायद्याचे आहे.

प्यारे१ 02/09/2015 - 16:45
हल्ली भूषणास्पद काय नि दूषणास्पद काय हेच समजेनासं झालंय. सगळ्यांना दारिद्रयाचे डोहाळे लागलेले दिसत आहेत. बोल्ट ला रिटायर करून १००मीटर धावण्याच्या स्पर्धेत ठराविक लोकांना 15 सेकंदात तर काहींना उपस्थितीबद्दल विश्वविक्रमाची पत्रकं वाटण्याची शिफारस या ठिकाणी करावीशी वाटते आहे. ही नेमकी कसली होड़ आहे तेच समजत नाहीये!

dadadarekar 02/09/2015 - 17:21
त्यानी राखीव जागा मागितलेल्या आहेत का ? अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन म्हणजे रिजर्वेशन का ? .... मराठमोळा दादू

In reply to by dadadarekar

विकास 02/09/2015 - 18:33
तुम्हाला काय वाटतं अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन म्हणजे? ते स्पष्ट केलेत तर बरे होईल... मी वर म्हणल्याप्रमाणे त्याचा मी मराठीत भावार्थ "विशेष हक्क" असा केला आहे. विकीदुवा योग्य ठरवल्यासः Affirmative action or positive discrimination (known as employment equity in Canada, reservation in India and Nepal, and positive action in the UK) is the policy of favoring members of a disadvantaged group who suffer from discrimination within a culture. https://en.wikipedia.org/wiki/Affirmative_actionWikipedia

सुनील ह्यांचा प्रतिसाद उत्तम वाटला. माझा प्रतिसाद थोडा कडवट वाटेल काही जनाना. पण कितीही समानतेच्या गोष्टी केल्या तरी अजून भारतात जातीव्यवस्था मोठ्या प्रमाणात टिकून आहे हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. कोणत्याही पेपर मधली वर पाहिजे / वधू पाहिजे च्या जाहिराती पहा. लगेच लक्षात येईल. तसेच अजून बर्याच जातींना तथाकथित उच्च जातीतले लोक खूप त्रास देतात. (विशेषत: लहान गावांमध्ये). गावांमध्ये खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतल्या लोकांना अजूनही गावकुसाबाहेरच बर्याचदा हलाखित राहावे लागते. अशा लोकांमध्ये उच्च शिक्षणाचे, रोजगाराचे प्रमाण वाढून त्या देखील मुख्य प्रवाहात सामील व्हाव्यात ह्यासाठी आरक्षण असणे काही गैर नाही. काहीजण म्हणतील आरक्षणामुळे ६०% मार्क मिळवणारा खालच्या जातीतला विद्यार्थी चांगल्या संस्थेत प्रवेश घेतो आणी ९०% मार्क मिळवणारा खुल्या गटातला विद्यार्थी वंचित राहतो. पण बर्याचदा ह्या गावकुसाबाहेर राहणाऱ्या लोकांची परिस्थिती इतकी भयान असते कि एखादा उच्च जातीतला विद्यार्थी ज्याला बर्याच सुविधा उपलब्ध असतात; जर अशा स्थितीत राहिला तर त्याला पास होण्याची देखील मारामार पडेल. त्यामुळे केवळ मार्क बघण्यापेक्षा ते कशा परिस्थितीत मिळवले आहेत ते देखील बघणे महत्वाचे ठरते. आणी जरी ५०% जागा आरक्षणात गेल्या तरी उर्वरीत ५०% जागा खुल्या गटाला उपलब्ध आहेतच. त्यामुळे आरक्षणाने आमची संधी जाते असे म्हणण्यात मला तरी काहीच दम दिसत नाही. बाकी सुनील ह्यांनी जे ४ मुद्दे मांडले आहेत ते योग्य वाटले.

In reply to by अभिजीत अवलिया

आरक्षणाने आमची संधी जाते ह्यात दम आहे फक्त तो मान्य नाहीये. खरी गोची आहे कि चांगल्या संस्था योग्य प्रमाणात नसल्याने हि समस्या आहे. आणि हे मान्य नाहीये म्हणून सगळा गोंधळ आहे. इतकी प्रचंड लोकसंख्या आणि त्याला तुरळक अशी चांगली कॉलेजेस मग त्यात ५०-५५% आरक्षण म्हणून सगळी गडबड आहे. आयआयटी आणि डी वाय/भारती विद्यापीठ(खरे म्हणजे ह्याला विद्यापीठ म्हणणे म्हणजेच एक मोठा जोक आहे) ह्यात मिळणारे शिक्षण ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. शासन काय वाटेल ते निर्णय घेताय आणि स्वतःचे हात काढून घेताय. उगाचच आपले कायदे करायचे पण अंमलबजावणी करायचीच नाही. सगळ्या चांगल्या संस्थांची वाट लावायची. त्यापेक्षा अजून चांगल्या संस्था उभाराव्यात हे लक्षात येत नाही उलट भुक्कड संस्था उभारून लुबाडणे हेच मुख्य काम झाले आहे. ५०% आरक्षण असले तरी अशी जर का व्यवस्था तयार केली तर हा प्रश्न बर्याच प्रमाणात कमी होईल. पण हि अडचण समजण्याची इच्छा किंवा तेवढी झेप आहे का आपल्या पॉलिसि मेकर्स मध्ये?

In reply to by अभिजीत अवलिया

सुबोध खरे 03/09/2015 - 09:50
अभिजित शेट सर्व आरक्षणाला क्रिमी लेयर लावा म्हणजे वर्षाला ५ लाखापेक्षा जास्त पगार घेणाऱ्या( महिना ४०,०००/- पेक्षा जास्त पगार घेणारा माणूस वंचित कसा?) किंवा कुटुंबात १० एकर पेक्षा जास्त शेती असलेल्या लोकांच्या मुलांना राखीव जागा बंद करा. म्हणजे त्याच जातीतील खरोखर गरज असलेल्या( गावकुसाच्या बाहेर ई ई) मुलांना संधी मिळेल. आय ए एस अधिकारी असणार्या बापाच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात राखीव जागा आणी त्यानंतर भारतीय विदेश सेवेत राखीव जागा दिल्याने कुणाचे भले झाले आहे.नवरा आणी मुले अमेरिकन नागरिक, आदर्श मध्ये जागा( मुंबईत एक सरकारच्या कोट्यातून मिळालेली जागा असताना). होय मी देवयानी खोब्रागडे यांचे उदाहरण दिले आहे. यांना का म्हणून राखीव जागा द्यायची? यांची जागा त्यांच्या जातीतील एखाद्या खर्या गरीब मुलाला मिळाली असती तर त्याच्या कुटुंबाचा अंत्योदय झाला असता. येथे उद्याचा अंत होताना दिसतो. माझ्या मुलाला JEE मध्ये गुण कमी मिळाले म्हणून त्याला आय आय टी/ एन आय टी मध्ये जागा मिळाली नाही हे मान्य पण त्याचा मित्र त्याच्या अर्धे गुण मिळवतो पण विशिष्ट जातीत जन्माला आल्यामुळे आय आय टी त प्रवेश मिळवतो. त्याचा बाप महापालिकेत अभियंता आहे. वरकड उत्पन्न भरपूर. तीन बेडरूमचे राहते घर. मुंबइत इतर तीन घरे, टोयोटा कोरोलात फिरतो. अशा मुलाला राखीव जागा देऊन काय बोडक्याचा अंत्योदय होतो? माझ्या मुलाच्या मनात फसवले गेल्याची भावना आहे त्याचे निराकरण कसे करणार? त्यांच्या गटात अमेरिकेला गेले पाहिजे असे बोलणे आहे त्याला कसे थांबवणार. देशभक्ती वगैरे १९ वर्षाच्या मुलाला समजावणे सोपे नाही. म्हणूनच मी म्हणतो राखीव जागान क्रिमी लेयर लावा. पिंपळगाव खुर्द मध्ये जन्माला आलेला क्लास लावण्याची कुवत नसल्याने मागे राहिलेल्या मुलाला जागा दिली तर खरा फायदा.

In reply to by सुबोध खरे

dadadarekar 03/09/2015 - 10:20
पेमेंट सीट हेही श्रीमंतांसाठी असलेले आरक्षणच ना ? ते चालते मग हे का चालू नये ?

In reply to by dadadarekar

कानडा 03/09/2015 - 18:54
IIT आणि NIT (आणि महाराष्ट्रात तरी कुठल्याच Govt. Engg. college) मधे पेमेंट सीट्स नसतात हो.

In reply to by dadadarekar

सुबोध खरे 03/09/2015 - 20:03
@ दादा द रेकर हितेस भाय मारुतीच्या बेंबीत बोट घालायची सवय तुमची काही जात नाही. मग गार लागतं हे हि म्हणायचं. दोन वर्षांनी पैसे आले( कर्ज मिळाले,आखातात कमावले) तर तुम्हाला तुमच्या मुलाला पेमेंट सीट मिळू शकते. ती जन्माधिष्ठित नाही तर कर्माधिष्ठीत आहे.पण केवळ अमुक एका जातीत जन्माला आला म्हणून गडगंज असताना (किंवा खाल्ले असताना) सुद्धा राखीव जागा मिळावी यातच राखीव जागांचे अपयश स्पष्ट होते आहे. राहिली गोष्ट क्रिमी लेयरची त्याबद्दल तुम्ही कुठे बोलत नाही? जळजळ कुठे आहे ते दिसून येते आहे. जो क्रिमी लेयर मध्ये नाही तो नक्कीच जास्त लायक उमेदवार आहे याबद्दल सर्वसंमती आहे. (हो न्यायालयाची सुद्धा) म्हणूनच इतर मागासवर्गीयांसाठी(OBC) साठी क्रिमी लेयर आहे मी फक्त तो अनुसूचित जाती आणी जमातींनासुद्धा लावा असे म्हटले. श्रीमंतांचा आणी श्रीमंतीचा द्वेष करणे हा आपल्या कोन्ग्रेस/ कम्युनिस्ट संस्कृतीचा मिळालेला दळभद्री वारसा आहे.( लुळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी कट्टी गरिबी चांगली) रेल्वेचा वातानुकुलीत डबा परवडत नाही म्हणून रेल्वेला सगळे तृतीय दर्जाचे डबे लावा म्हणण्याची हि मनोवृत्ती आहे.यातून बाहेर पडा (आणी मानसिक गरीबीतूनही).

In reply to by सुबोध खरे

होबासराव 03/09/2015 - 12:49
मी सुद्धा हे भोगलय, १३ मार्काने मागे पडलो MPSC Gazzeted ला. २ रा अटेम्प्ट होता आणि वय वर्ष ३० झालो होतो त्यामुळे तोच शेवटचा होता. पण माझ्यापेक्षा बरेच कमी मार्क असुन सुद्धा माझे काहि मित्र सिलेक्ट झाले कारण ते आरक्षित कोटयात होते. काहि काहि तर आत्ता काहि वर्षापुर्वि सुद्धा सिलेक्ट झालेयत कारण त्यांना एज लिमिट ३८ आहे.

In reply to by सुबोध खरे

gogglya 03/09/2015 - 15:19
+१११११११११११ पुढील पिढ्यांसाठी आपण काय आदर्श ठेवतो आहोत हे सध्या चालु असलेल्या आरक्षणासंबंधीत अनेक घटना बघता निराशा येते. जर निव्वळ आर्थीक परिस्थीतीवर आरक्षण ठेवले तरी बरेच प्रश्न सुटण्यास मदत होउ शकेल. प्रश्न हा आहे की हे बदल कोण आणी कसे घडवुन आणणार?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

dadadarekar 03/09/2015 - 15:46
हिंदू धर्मानुसार , याला कर्मविपाक / प्रारब्ध असे म्हणतात ना ? म्हणजे होबासरावाने गेल्या जन्मी कुणाचा तरी शिक्षणाचा अधिकार नाकारला असणार म्हणून या जन्मात त्याला हे फळ मिळाले.

In reply to by dadadarekar

काळा पहाड 03/09/2015 - 23:04
बापरे, म्हणजे दादासाहेब मागच्या जन्मी तुम्हाला इथल्या सगळ्या मिपाकरांनी बेअक्कलपणे आणि निर्लज्जपणे बरेच खोटे आयडी धारण करून, खोटं नाटं लिहून आणि ट्रोलींग करून बराच त्रास दिलेला दिसतोय.

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब, आपले मुद्दे मान्य आहेत. पण त्याच बरोबर आपण म्हणता तसे उत्पन्नावर आधारीत आरक्षण ठेवणे थोडे कठीण वाटते. कारण माणसाची आर्थिक परिस्थिती नेहमी बदलत असते. एखादी व्यक्ती आज आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल पण उद्या त्याची नोकरी गेली तर? (जे खाजगी क्षेत्रात सहज शक्य आहे) किंवा काही कारणाने (जसे की धंद्यात नुकसान, नैसर्गिक आपत्ती) एखादा श्रीमंत माणूस कफल्लक झाला तर ? तसेच एखादा कफल्लक माणूस अचानक श्रीमंत देखील होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या आर्थिक परिस्थितीचा सतत track ठेवावा लागेल जे खूप कठीण काम आहे असे मला वाटते. प्रत्येकाने आपल्या आर्थिक स्थितीची खरी माहिती देणे आणी त्यावरून आरक्षण घेणे अथवा नाकारणे हा त्यावरचा उपाय आहे. पण स्वताहून आपली खरी आर्थिक परिस्थिती उघड करावी इतकी नैतिकता किती भारतीय लोकांमध्ये असेल हा देखील एक प्रश्न आहे.

In reply to by अभिजीत अवलिया

सुबोध खरे 03/09/2015 - 20:16
अभिजित शेट मी केंव्हा असे म्हणालो कि आर्थिक दृष्ट्या मागास वर्गीयांना आरक्षण द्या. ती पुढची पायरी आहे जेंव्हा प्रत्येक माणसाच्या उत्पन्नाचा खरा हिशेब ठेवणे सरकारला शक्य होईल. सध्या फक्त सर्व आरक्षणाला क्रिमी लेयर लावा. सरकारी नोकरी (आणी बढती जी आरक्षणाने मिळाली आहे) त्यात आपल्याला किती पगार मिळतो हे जगजाहीर असते तेंव्हा तेथे उत्पन्न लपविणे अशक्य आहे. असे लोक वगळा आणी उरलेल्या मागास्वर्गीयाना आरक्षण द्या यात ज्या जागा उरतील त्या गुणवत्ता वर्गात खुल्या करा. बस इतकेच. आजोबा आरक्षणातून डॉक्टर होऊन सरकारी नोकरीत वर चढले( आणी भरपूर माया केली) त्यावर मुलाने पण आरक्षण घेऊन डॉक्टरकि केली आणी बापाच्या वरकड पैश्यातून रुग्णालय बांधले अशा बापाच्या मुलाला अभियांत्रिकीचा प्रवेश अगदी कमी गुण असताना ( ते सुद्धा मुंबईत ३ लाख रुपयांचा क्लास लावून) मिळाला हेच आरक्षणाचे अपयश आहे. हि जागा जर एखाद्या त्याच जातीतील गरीब विद्यर्थ्याला ( ज्याला क्लास परवडत नाही) मिळाली असती तर तो खरा अंत्योदय ठरला असता. आरक्षणाने मागासवर्गीयात "जावई" निर्माण करुन ठेवले आहेत आणी त्यांनी आपल्याच जातीतील खर्या लायक लोकांना वंचित करून ठेवले आहे असे खेदाने म्हणावे लागते.

In reply to by सुबोध खरे

चिगो 04/09/2015 - 14:16
तीन-एक वर्षांपुर्वी एक धागा लिहीला होता. 'कोणाचा रे तू?' म्हणून.. त्यातही मी असेच विचार मांडले होते. मी 'ओबीसी' आहे. मला आरक्षणाचा फायदा मिळाला की नाही, ठाऊक नाही. (युपीएससी सांगत नाही च्यामारी..) पण तो माझ्या मुलांना नक्कीच मिळू नये आता. 'क्रिमीलेअर'चा निकष हा सर्वच आरक्षीत जातींना लावण्यात यावा. मी इथे मेघालयात करोडपती पाहतोय, ज्यांच्या मुला-बाळांना आरक्षीत सीट्स जाताहेत, 'आदीवासी' म्हणून. त्यांचा 'मागास'पणाचा मागमुसही नाही कुठेच. पण त्याचवेळी त्याच जातींतल्या खर्‍याखुर्‍या गरजू मुला-मुलींना आरक्षणाचा फायदा पोहचत नाही, कारण की सगळा मलिदा हे श्रीमंत, 'वेलकनेक्टेड' मागासवर्गीय (?) आदिवासीच घेतात. हेच बाकीच्या राज्यांमध्येपण होतंय. ही पहिली पायरी आहे आरक्षणात सुधारना घडवून आणण्याची..

मदनबाण 02/09/2015 - 19:46
आज देखील भारतीय समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना मदतीच्या हाताची गरज आहे आणि खर्‍या अर्थाने मदत झाली पाहीजे. +१०० मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Halke Gaadi Haako... { Folk Fusion by Neeraj Arya's Kabir Cafe - Official Video }

आज देखील भारतीय समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना मदतीच्या हाताची गरज आहे आणि खर्‍या अर्थाने मदत झाली पाहीजे. हे १०० टक्के खरे आहे. पण... आईन्स्टाईनच्या नावाने वापरले जाणारे एक वाक्य या निमित्ताने आठवते - Insanity means doing the same thing over and over again and expecting different results. असे तर आपले होत नाही आहे ना? यात आपण पी एच डी केलेली आहे, हे पण १०० टक्के खरे आहे. :(

तुडतुडी 03/09/2015 - 17:35
पूर्वीच्या काळी मागास जाती जमातींना अस्पृश्य वगेरे ठरवून त्यांना शिक्षण घेण्यास बंदी होती . हे लोक पुढे जाणार नाहीत ह्यासाठी सवर्णनांकडून आटोकाट प्रयत्न झाले . दलित , गोरगरीब , खालच्या जातीतल्या लोकांचा विकास नं होण्यात आणि ते मागास राहण्यात समाजाचा फार मोठा वाटा होता . In Fact समाजच ह्या लोकांच्या मागासलेपणाला कारणीभूत होता . त्यामुळे अश्या लोकांना पुढे आणण्यासाठी आरक्षण देणं समजू शकतं. पण मुस्लिम समाजाच्या बाबतीत असं झालं का ? मुस्लिमांनी ६०० वर्षे ह्या देशावर राज्य केलंय . मुस्लिम ह्या सवर्णापेक्षाही वरचढ होते . त्यांच्या समाजात ते शिक्षण घेवून पुढे जावू शकले असते . मुस्लिमांचा मागासलेपणा हा फक्त त्यांच्या चुकीच्या धार्मिक धोरणांमुळे आहे असं वाटतं . मुस्लिमांच्या सामाजिक , धार्मिक प्रथा अतिशय मागासलेल्या आहेत . मग केवळ मुस्लिम आहेत म्हणून आरक्षण देणं कितपत योग्य ठरतं ?

In reply to by तुडतुडी

सुबोध खरे 03/09/2015 - 20:18
तुडतुडी ताई मुसलमानांना राखीव जागा दिल्या तर कोणीही उद्या कागदोपत्री मुसलमान व्हायला तयार होईल. धर्म हा बदलता येतो म्हणून त्याला आरक्षण देता येत नाही हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बाकी आपल्या प्रतिसादाशी मी सहमत आहे.

एखादी गोष्ट लपवायला गेलात तर जास्त प्रसिद्ध होते. जातीचा विषय तसाच आहे. त्याबद्दल जास्त गाजावाजा न करता जर शिक्षण आणि व्यवहाराबद्दल प्रसार झाला तर जाती व्यवस्था आपल्या आपण नाहीशी होईल.

लिओ 04/09/2015 - 19:08
सध्याच्या सरकारला राज्यसभेत बहुमत कमी आहे. २०१८ च्या सुरवातीला अथवा शेवटी सध्याच्या सरकारला लोकसभेत व राज्यसभेत पुर्ण बहुमत मिळेल असे गृहीत धरले तर २०१८ मध्ये सरकार आरक्षणाबाबत खबीर भुमिका घेईल का ?

चर्चा वाचतो आहे. खरंच आरक्षणाबाबत काहीतरी ठोस व सकारात्मक निर्णय व्हायलाच पाहिजे . भिजत घोंगडं किती दिवस ठेवणार . आर्थिक , सामाजिक दरी कमी व्हावी म्हणून आरक्षण असा मूळ विचार ! पण सध्याच्या आरक्षण प्रणाली मुळे नेमकं याच्या विरूद्ध होत आहे.सरकारला व समाजाच्या सर्व घटकांना शांतपणे यावर विचार करून निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
ऑगस्टच्या मध्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून वादग्रस्त ठरणार्‍या मागण्या केल्या गेल्या. पहील्यांदा हार्दीक पटेल या विशीतल्या युवकाने पाटीदार पटेल समाजासाठी राखीव जागांची मागणी केली. नंतर काल म्हणजे ३१ ऑगस्टला मज्लीस-ए-मुशावरात च्या ५० व्या वर्धापन दिना निमित्त झालेल्या सोहळ्यात झालेल्या मा.उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी मुस्लीम समाजासाठी विशेष हक्कांची (affirmative action) मागणी केली अथवा सुचना केली. यात राजकारण असू शकेल का? माझ्या सारख्याला नक्की वाटते. दोन्ही घटनांमधे राजकारण करणारे समान नसले तरी उद्देश समान असू देखील शकतो, असे मला वाटते.

सुंदर पिचई आणि ऐंशीच्या दशकातली गरीबी...

संदीप डांगे ·

जेपी 23/08/2015 - 13:46
डॉ.खरेंनी 'लोकसत्ता' वाचणे सोडले. तुम्ही 'लोकमत' वाचणे सोडा. टक्याला 'संध्यानद' वाचणे सोडायला सांगु. मी 'एकमत' वाचणे सोडतो. मापं ना ' मटा ' सोडायला सांगु. एकुणच व्रुत्तपत्रे वाचणे सोडु.हाकानाका.

गॅरी ट्रुमन 23/08/2015 - 13:50
ऐंशीच्या दशकात जे विशीत होते त्यांच्याकडून ऐकायला आवडेल.
मी ८० च्या दशकात विशीमध्ये नव्हतो तरीही एक मुद्दा---
आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणारा गरिब मध्यमवर्गीय?
सुंदर पिचाईंविषयी मला विशेष काही माहिती नाही आणि ते खरोखरच गरीब कुटुंबातले होते की नाही हे पण मला माहित नाही. पण आय.आय.टी आणि स्टॅनफर्डमध्ये शिकणे हा गरीब नसल्याचे लक्षण आहे हे मला नक्कीच मान्य नाही. आय.आय.टी मध्ये शिक्षणासाठी कर्ज मिळते.आणि आय.आय.टी मध्ये चांगल्या ग्रेड आल्यास त्या आधारे स्टॅनफर्डमध्ये शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळू शकतो.तेव्हा या दोन आधारांवर कोणीही गरीब नव्हते हे सिध्द करता येण्याजोगा हा सक्षम मुद्दा नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

संदीप डांगे 23/08/2015 - 14:15
सुंदर पिचई यांच्या पार्श्वभूमीबद्दल सगळ्याच माध्यमांमधे अशीच माहीती उपलब्ध आहे. स्टॅनफर्डमधलं शिक्षण त्यांच्या घरच्या बचतीच्या पैशांवर झालं असं समजतं. शै़क्षणिक कर्ज, इतर सुविधा वैगेरे आजच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही असं माझं मत आहे. आयआयटीबद्दलतर आजच्या काळात जेवढा गवगवा आहे त्याच्या मानाने ८०च्या दशकात फक्त मोजक्या लोकांना त्याची माहीती होती. ही मोजकी मंडळी म्हणजे उच्चशिक्षित, सूखवस्तू कुटूंबे. ह्यांनाच कोचींगक्लासेसच्या फिया परवडतात. सुपर३० उगाच सूरू झाले नाही. आयआयटी व गरिबांचा प्रवेश यावर माध्यमांमधे बरीच चर्चा झाली आहे मागे. हजारात दहा अपवाद दाखवून सत्य नाकारता येणार नाही.

In reply to by संदीप डांगे

गॅरी ट्रुमन 23/08/2015 - 14:54
स्टॅनफर्डमधलं शिक्षण त्यांच्या घरच्या बचतीच्या पैशांवर झालं असं समजतं.
तसे असेल तर सुंदर पिचाई एकदम श्रीमंत म्हणायला हवेत. आजच्या काळात स्टॅनफर्डची फी आणि कॅलिफोर्नियात दोन वर्षे रहायचा खर्च याचा आकडा एखाद कोटीपर्यंत सहज जाईल.त्याच तुलनेत त्यावेळीही असणार असे धरायला हरकत नसावी.
शै़क्षणिक कर्ज, इतर सुविधा वैगेरे आजच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही असं माझं मत आहे.
अशा आघाडीच्या शिक्षणसंस्थांमध्ये शिकायला स्टेट बँक गेल्या अनेक वर्षांपासून विनातारण कर्ज देत आली आहे.असे कर्ज विनातारण आणि गॅरेंटरशिवाय कर्ज स्टेट बँकेची त्या संस्थेच्या आवारातलीच शाखा देते आणि केवळ अ‍ॅडमिशन लेटरवर कर्ज मिळू शकते.बँकेच्या इतर कुठल्याही शाखेत शिक्षणकर्ज घ्यायचे असेल तर मात्र तारण, गॅरेंटर इत्यादी प्रकार असतात.
आयआयटीबद्दलतर आजच्या काळात जेवढा गवगवा आहे त्याच्या मानाने ८०च्या दशकात फक्त मोजक्या लोकांना त्याची माहीती होती. ही मोजकी मंडळी म्हणजे उच्चशिक्षित, सूखवस्तू कुटूंबे. ह्यांनाच कोचींगक्लासेसच्या फिया परवडतात.
कोट्याला आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी आय.आय.टी जे.ई.ई साठी कोचिंग क्लासच्या फॅक्टर्‍या ८० च्या दशकातही होत्या का? आणि आय.आय.टी मध्ये कोणी विद्यार्थी असेल तर तो कोचिंग क्लास मधूनच गेला असेल आणि स्वतःचा स्वतः अभ्यास करून गेला नसेलच असे कशावरून?
हजारात दहा अपवाद दाखवून सत्य नाकारता येणार नाही.
इतकं मनावर नका घेऊ हो :)

In reply to by गॅरी ट्रुमन

संदीप डांगे 23/08/2015 - 15:03
इतकं मनावर नका घेऊ हो :)
नाही हो ;-) वडिल मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर असलेले अभियंता, घर, स्कूटर, इ. गोष्टी बाजूला ठेवून फक्त आयआयटी प्रवेश इतकाच निकष लावला तर गरीब श्रीमंत कोण हा प्रश्नच उरत नाही. चर्चेत एखाद्याचं विधान चुकीचंच कसं हे सिद्ध करायला सिलेक्टीव रीडींग पुरेसं असतं. मी कलेक्टीव अ‍ॅनालिसिस मांडत आहे. तुम्ही त्यातलं ज्यावर वाद घालता येईल तेवढंच वाक्य उचलून पिचई ला बेनेफिट ऑफ डाइट देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तो गरीब असूही शकतो असे म्हटलं आहे. पण इतर परिस्थिती त्या विधानाविरूद्ध आहे हे लक्षात घेतलेले नाही. तुम्ही आयआयटी बद्दल उल्लेख मनावर घेऊ नका. पण जेवढं वाचलं आहे त्यावरून आयआयटी ही श्रीमंत-उच्च्भ्रूंना अ‍ॅक्सेसेबल होती असं वाटतं. यासंबंधीत लिंक्स देतो सावकाश.

In reply to by संदीप डांगे

चिरोटा 24/08/2015 - 15:02
पण जेवढं वाचलं आहे त्यावरून आयआयटी ही श्रीमंत-उच्च्भ्रूंना अ‍ॅक्सेसेबल होती असं वाटतं ७० व ८०च्या दशकातल्या जे.ई.चे अनेक लोक पाहिलेत तर आय.आय.टी. मोठ्या शहरांतील सुशि़क्षित मध्यम्वर्गीयांना अ‍ॅक्सेसेबल होती असे म्हणता येते.क्लासेस प्रकार खूप कमी होता. अग्रवाल व ब्रिलियंट ट्युटोरियल्स हे प्रामुख्याने होते.ह्यांची फी पण वाजवी असायची(९० साली अग्रवाल-२३०० रुपये) बहुतांशी परीक्षा देणारे व पास होणारे हे मुंबई,पुणे,दिल्ली,चेन्नई,कोलकाता... अशा मोठ्या शहरांमधून असायचे. साधारण २ लाख परी़क्षार्थी व त्यातून २००० जागा,म्हणजे १:१०० असे गुणोत्तर.

मारवा 23/08/2015 - 14:22
मी अशीच मागे एकदा जपानच्या प्रिन्सेस नोरिको ची बातमी वाचली होती. त्यात ती राजघराण्याच्या बाहेर एका साध्या माणसाशी ( राजघराण्याच्या तुलनेत तसा नाही ) लग्न करणार होती. आता नविन जीवन राजघराण्याच्या बाहेर एका सामान्य माणसाबरोबर व्यतीत करावे लागेल या संघर्षाची कल्पना आल्याने तिने प्रिपरेशन करायला सुरुवात केली ती स्वतः स्वतःच्या कारने सुपरमार्केट पर्यंत गेली. तिने स्वतः ( हो स्वतःच्या हाताने काहि वस्तु खरेदी करुन कार्ट मध्ये टाकल्या) नंतर त्या कार्टीने तीने बिलींग केले. परत सर्व सामान स्वतः कारमध्ये टाकुन घरी गेली. असतो एकेकाचा गरीबीशी संघर्ष दुसरा कॉन्ट्रास्ट आपल्याकडे मुबलक पहायला मिळतो. एक महाश्वेतादेवींच्या मुलाखतीत वाचलेल आठवतय बिरसा मुंडा चा पत्ता सांगितला की साक्ष दिली पोलिसात नक्की आठवत नाही अस काहितरी एका आदिवासीने केल तर का कशाच्या बदल्यात तर त्याला दोन रुपये आणि पोट भरुन भात खायला दिला म्हणुन. त्यात त्या म्हणतात त्या आदिवासींसाठी आयुष्यात एकदा तरी पोट भरुन भात खायला मिळणे म्हणजे खुप च मोठी गोष्ट होती. दे आर सो पुअर यु नो ते सर्व बिचारे एका खराटा मारुती ८०० मध्ये पिकनीक ला जातात

यशोधरा 23/08/2015 - 14:27
लोकमत हा पत्रकारितेचा मापदंड नसावा बहुतेक. कोणत्या मासिकातील/ वर्तमानपत्रातील बातमीला कितपत महत्व द्यायचे हे आपण नक्कीच ठरवू शकतो. असो.

In reply to by यशोधरा

संदीप डांगे 23/08/2015 - 14:55
ताई, लोकमत व सुंदर पिचईचे हे फक्त एक उदाहरण दिलंय. अशा स्वरूपाच्या बातम्या विविध लोकांबद्दल विविध दर्जाच्या विविध माध्यमांतून येतंच असतात. माध्यमांमधून यशस्वी लोकांनी कसा खडतर प्रवास केलाय अशा कहान्या नेहमीच येतात. त्यांच्या प्रवासाचा खडतरपणा अधिक - लार्जर दॅन रीअल लाइफ- रंगवण्याच्या अहमहमिकेने त्या कधी कधी हास्यास्पद व बनावट होतात हेच पिचईच्या निमित्ताने सिद्ध झालं इतकंच.

In reply to by संदीप डांगे

यशोधरा 23/08/2015 - 16:23
अहो साहेब ठीके की. सुंदर पिचाई म्हणजे काही आयुष्य जगायचा मापदंड नव्हेत. आता ते दारिद्र्यरेषेखाली जगले नसतील पण म्हणून त्यांनी जे साध्य केलं त्याचं क्रेडिट कमी होतं का? बरं, ज्यांनी बातमी दिली आहे त्यांनी कितपत तपासून दिली आहे, तो एक अलाहिदा मुद्दा. आणि तसंही पिचईच्या खडतर प्रवासाची किती लोकांना पडली आहे, असं वाटतं तुम्हांला? लोक आता वाचतील, पुढच्या अर्ध्या तासात विसरतील. कोणत्याही बातमीचे हेच प्राक्तन आहे आणि असते.

gogglya 23/08/2015 - 15:18
'भारतीय मूळ' असलेल्या आणी सध्या परदेशी वास्तव्यास असलेल्या [यातील बहुतेक जण ग्रीन कार्ड मिळालेले किंवा मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेले] लोकांचे गुणगान करत राहणार आहोत, हा प्रश्न आहे. बाकी लहानपणीची गरीबी / श्रीमंती वगैरे चालु द्या...

चिरोटा 23/08/2015 - 15:53
अशी वर्णने वाचली की आम्ही जी गरीबी बघितली 'त्ये काय व्हतं मग?' असं विचारायला होतं बुवा.
खरे आहे.८०च्या दशकात्, फोन साठी प्रतिक्षायादी असायची.बहुतांशी लोकांकडे त्यामुळे फोन नसायचा.टी.व्ही. वा गाडीचेही तसेच.प्रस्थापित व्यवस्थेत 'नेत्रदीपक' यश मिळाले की थोडेसे गरीबीचे,'हालाखीच्या दिवसांचे' भांडवल करणे ही पद्धत आहे.एखादी कंपनी बर्यापैकी मोठी झाली की मग तिचे प्रवर्तक आमची कंपनी कशी 'गॅरेज स्टर्टअप' होती हे दिमाखाने सांगतात. त्या गॅरेजचे फोटो मग मोठ्या नियत्कालिकांत 'ते दिवस' शिर्षकाखाली छापून येतात. अनेक वेळा ही गॅरेजेस श्रीमंत वस्त्यांमध्ये असतात व त्या गॅरेजचा आकारही आपल्या १ बी.एच.के.पेक्षा मोठा असतो.

नंदन 23/08/2015 - 16:03
ब्लूमबर्ग.कॉमवर गेल्या वर्षी पिचाईंवर एक लेख/प्रोफाईल आला होता. त्यातल्या दुसर्‍या पानावर (दुवा) हे सारे स्कूटर - टेलिफोन - स्टॅनफर्ड इ. उल्लेख आहेत. तेदेखील पिचाईंनीच सांगितलेले दिसताहेत. (आता हा त्यांच्या नॉस्टॅल्जियाचा भाग किंवा वैट्ट, वैट्ट, दुष्ट अमेरिकन पत्रकारांनी तत्कालीन भारतीय मध्यमवर्गाला हिणवण्यासाठी रचलेले कारस्थान, यावर अजून एक वायफळाचा मळा पिकवता येईल.) तर अलीकडच्या बातम्यांत अनेक वृत्तपत्रांनी बातमी देताना या ब्लूमबर्गी लेखाकडे निर्देश केला. मी 'लोकमत'मधली बातमी वाचलेली नाही; पण तुमच्या कैफियतीवरून असं दिसतंय की बहुधा त्या पत्रकारूने असले दुवे/निर्देश देण्याच्या भानगडीत न पडता आपल्या मगदुराप्रमाणे थेट अनुवादाची पाटी टाकलेली असावी. त्यातही तपशीलाच्या चुका आहेतच. उदा.
Pichai excelled at school and won a coveted spot at the Indian Institute of Technology in Kharagpur, where he studied engineering. After graduating, he won an additional scholarship to Stanford University to study materials science and semiconductor physics. Pichai’s father tried to take out a loan to cover the cost of the plane ticket and other expenses. When it didn’t come through in time, he withdrew $1,000 from the family’s savings—more than his annual salary. “My dad and mom did what a lot of parents did at the time,” Pichai says. “They sacrificed a lot of their life and used a lot of their disposable income to make sure their children were educated.”

रेवती 23/08/2015 - 22:46
मीही बातमी पूर्ण वाचली/ऐकली नाही. बाकी नक्की किती खरं किती खोटं हे करण्यापेक्षा तो मनुष्य दोनवेळा खाऊन पिऊन सुखी असावा असा निष्कर्ष निघू शकेल, जे चांगलेच आहे. अर्धपोटी वगैरे कोणीच रहायला नकोय. आवश्यक ते पाटी, दप्तर, पुस्तकं मिळाली असावित हेही चांगलच आहे. आमच्या आजूबाजूला राहणार्‍या दोनेक जणांनी नक्की काय केलं म्हणजे आपली मुलं अशा पोझिशनला पोहोचतील? त्यांना आपण सुंदर पिचाई व सत्या नाडेला यांच्या जीवनावर माहिती द्यायला हवी का अशी चर्चा व्हॉटस अपवर केली असे नवरा म्हणत होता. पण तेवढेच! मग विषय संपला. त्या चर्चा करणार्‍यांचाही उत्साह संपला असावा कारण पुढे काही झाले नाही.

सुंदर पिचाई हे गरीब का श्रीमंत परिस्थितीत वाढले हे ठरवणे अधिक करून संदर्भावर अवलंबून आहे. भारतीय संदर्भात त्यांची परिस्थिती मध्यमवर्गीय म्हणता येईल तर अमेरिकन संदर्भात ती गरीब ठरेल. पण यापेक्षा अधिक महत्वाची आणि विचारणीय बाब अशी कि सत्य नाडेला[Microsoft] शिव नाडर [HCL Technologies] आणि सुंदर पिचाई [Google] हे तिघेही त्यांच्या अभूतपूर्व यशामुळे भारताच्या नवीन पिढीला आदर्श आणि मार्गदर्शक म्हणून ठरू शकतात.

In reply to by श्रीनिवास टिळक

असंका 24/08/2015 - 00:55
एक शंका आहे, कुणी प्लीज सांगेल का- एच सी एल ही माय्क्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्याबरोबरीने नाव घेण्याएवढी मोठी कंपनी आहे का ? की सत्यम शिवम सुंदरम हे जुळतंय म्हणून फक्त?

In reply to by असंका

पगला गजोधर 24/08/2015 - 09:43
एच सी एल ही माय्क्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्याबरोबरीने नाव घेण्याएवढी मोठी कंपनी आहे का ? की सत्यम शिवम सुंदरम हे जुळतंय म्हणून फक्त?
हे मात्र १+ निरीक्षण आपले, कंफ्युज्ड(नसलेले), अकौंटंट साहेब

In reply to by श्रीनिवास टिळक

सत्या नाडेला व सुंदर पिचाई हे दोघेही जागतिक किर्तीच्या कंपन्यांत (अनुक्रमे मायक्रोसॉफ्ट व गुगल) बर्‍याच खालच्या पदावरून सुरुवात करून सिइओ पदापर्यंत पोचले. शिव नाडर एचसीएल कंपनीचे संस्थापक आहेत. वयानेही (७० वर्षे) ते इतर दोघांपेक्षा बरेच मोठे आहेत. सुंदर पिचाई यांची गुगलच्या सिइओपदी नियुक्ती झाल्यावर फेसबुकवर सत्या नाडेला व शिव नाडर यां दोघांच्या फोटोज बरोबर त्यांचा फोटो फिरवला जात होता. तुमचा प्रतिसाद त्या फेसबुक पोस्टवरून प्रेरित आहे का?

ते गरीब होते कि नाही ही बाब गौण आहे. ते आत्ता गरीब नाहीत , व जे काही मिळवले ते स्वतःच्या मेहनतीने ! ही बाब महत्त्वाची आहे. त्यांचे कर्तृत्व निश्चितच प्रेरणादायी आहे.

In reply to by उगा काहितरीच

द-बाहुबली 24/08/2015 - 01:14
ते आत्ता गरीब नाहीत , व जे काही मिळवले ते स्वतःच्या मेहनतीने ! ही बाब महत्त्वाची आहे. त्यांचे कर्तृत्व निश्चितच प्रेरणादायी आहे.
बरोबर. आणी सुंपिला गरीब म्हटल्याने जर एखाद्या गरीब व्यक्तीला वर उठण्याची जिद्द मिळत असेल तर अजुन सुरेख...

संदीप डांगे 24/08/2015 - 10:41
सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद! फार थोड्या लोकांना लेखाचा उद्देश आणि रोख नेमका कळला. कदाचित मलाच नीट लिहिता आले नाहीये. प्रश्न, सुंदर पिचई हा खरंच गरिब होता की नव्हता, आता काय आहे, कसा यशस्वी झाला वैगेरे नाहीच आहे. कुण्या गरिबाने श्रीमंतच होउ नये असे काही मी म्हटले नाही. सुंदर पिचईचे केवळ एक उदाहरण घेतले आहे. तसेही राहुलजींच्या मते गरिबी ही एक सापेक्ष मानसिकता आहे. ;-) असो. थोरामोठ्यांची कारकिर्द लिहितांना त्यांनी कसे गरिबीतून दिवस काढले याच्या कहान्या रंगवल्या जातात. त्यांना मिळणारा सॉफ्टकॉर्नर पाहून ज्यांनी फारसे गरिबीत दिवस काढले नाहीत तेही असला सॉफ्टकॉर्नर मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा हास्यास्पद कहान्या प्रसवतात. आम्ही फार गरिब होतो, आमच्या चौघांत मिळून एकच कार होती, एकच घर होते, तीनच वेळेला जेवत होतो, आठवड्यातून एकदाच मल्टीप्लेक्सला जात होतो, वर्षातून एकदाच फॉरेनट्रीपला जात होतो, आईकडे दहाच किलो सोन्याचे दागिने होते, आमची फक्त पाचशे एकर बागायती शेती होती. इत्यादी कहान्या तीस वर्षांनी काही मुले सांगतील कदाचित मुद्दा संदर्भाचा आहे. त्यातली विसंगती दाखवण्याचा प्रयत्न होता. त्याकाळाला आजच्या काळाप्रमाणे किंवा अमेरिकन दृष्टीकोणातून बघणे विसंगतीपूर्ण आहे व ते हास्यास्पद होते असे म्हणायचे होते. त्याकाळातले जनजीवन, समाजकारण, आर्थिक परिस्थितीतून उद्भवणारे प्रसंग इत्यादी बाबी आजच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे. कारण ऐंशीचे दशकातली टीनेजर मंडळी आणि ९५ नंतर जन्मलेली टीनेजर मंडळी यांच्या आकलनात फार फरक आहे. कष्ट, गरीबी, अभाव याचा जो काळ ऐंशीच्या दशकातल्या टीनेजरनी बघितला तो नंतरच्या पीढीने बघितलाच नाही. आज मोलकरणीचा मुलगाही स्मार्टफोनसाठी जीवघेणा हट्ट करतो, त्याला आईचे कष्ट, पैशाची अनुपलब्धता, इत्यादी गोष्टी समजतच नाहीत. इतरांकडे आहे मग माझ्याकडेही असले पाहिजे असाच अट्टाहास सर्वत्र दिसतो. ऐंशीच्या दशकात मुलांमधे ह्या भावना नव्हत्या. त्यामुळे त्याकाळात स्कूटरवर फिरलो, रि़क्षातून शाळेत जायचो, तीन खोल्यांचे घर ह्या गरिबी किंवा अभावाच्या गोष्टी नसून सुखवस्तूपणाच्या द्योतक आहेत. पण आजच्या काळात जर त्यांना गरिबीच्या, अभावाच्या प्रातिनिधिक म्हणून सादर केल्यात तर आजच्या पीढीला खरी गरिबी काय होती हे कळणारच नाही. माझा मुद्दा कळला असेल अशी अपेक्षा आहे. सुंदर पिचईकाकांबद्दल मला फक्त एकच वाटते. स्वत:ची कुंपनी काढली अस्ती तर अजून अभिमान वाटला असता. थांबतो. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली 24/08/2015 - 12:27
जेंव्हा घवघवीत यश हातात येते. त्या वेळी अशा व्यक्तीच्या नकारात्मक बाजुही गुणगान गायल्या प्रमाणे वाखाणल्या जातात(उदा. स्टीव जोब्स) व अपयश असेल तर तर सकारात्मक बाजुचीही निंदा केली जाते... कमी मिळकतीचे जिवन अत्यंत हालाखीचे दारिद्र्यावस्थेतले चितारले जाते... कोणाला चायवाला समजले जाते... कोणाला भिकारी... ये सब चलते रहतायं.सुंदरच्या गरीबीची वास्तवअवास्तव वर्णने वाचुन एका खर्‍या गरीबाला जर वर जाण्याची उर्मी अन दिशा मीळाली तरी ते सर्व न्याय ठरते. सो लेट्स से हिप हिप हिप हुर्रे फॉर बिइंग पुर सुंदर...
थोरामोठ्यांची कारकिर्द लिहितांना त्यांनी कसे गरिबीतून दिवस काढले याच्या कहान्या रंगवल्या जातात. त्यांना मिळणारा सॉफ्टकॉर्नर पाहून ज्यांनी फारसे गरिबीत दिवस काढले नाहीत तेही असला सॉफ्टकॉर्नर मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा हास्यास्पद कहान्या प्रसवतात.
:) येस. असे असतात खरे... पण ते फार दिशाभुल करु शक्तात असे वाटत नाही.
माझा मुद्दा कळला असेल अशी अपेक्षा आहे. सुंदर पिचईकाकांबद्दल मला फक्त एकच वाटते. स्वत:ची कुंपनी काढली अस्ती तर अजून अभिमान वाटला असता.
सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ झाला असता तर अजून अभिमान वाटला असता.

In reply to by द-बाहुबली

प्यारे१ 24/08/2015 - 12:34
>>>>>सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ झाला असता तर अजून अभिमान वाटला असता. ऑरे दादा, ई चोलबे ना. मिपावर सुन्दर धागे कुणी काढले असते मग???? डांगे अण्णा हलकं घ्या. गरीबी ही मानसिक अवस्था आहे या आदरणीय राहुलजी यांच्या मताशी सहमत असलेला

In reply to by द-बाहुबली

संदीप डांगे 24/08/2015 - 14:16
सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ झाला असता तर अजून अभिमान वाटला असता.
माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं तुम्हाला वैयक्तिक झोंबेल असं काय आहे माझ्या धाग्यात वा प्रतिसादात? मुद्देसूद बोलता येत नाही तेव्हा वैयक्तिकवर घसरणे मूर्खांची लक्षणे आहेत. तेव्हा सांभाळा. तुम्हाला अभिमान वाटो न वाटो याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मी माझ्या कंपनीचा फाउंडर, सीईओ, क्लर्क, चपराशी सगळं आहे आणि त्यातच मला अभिमान आहे. पण तुमचं काय?

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली 24/08/2015 - 15:14
माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं तुम्हाला वैयक्तिक झोंबेल असं काय आहे माझ्या धाग्यात वा प्रतिसादात? मुद्देसूद बोलता येत नाही तेव्हा वैयक्तिकवर घसरणे मूर्खांची लक्षणे आहेत. तेव्हा सांभाळा. तुम्हाला अभिमान वाटो न वाटो याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मी माझ्या कंपनीचा फाउंडर, सीईओ, क्लर्क, चपराशी सगळं आहे आणि त्यातच मला अभिमान आहे. पण तुमचं काय?
छान विचार. आपणही जेंव्हा एखाद्याबाबत बोलतो/धागे काढुन मत व्यक्त करतो (उदा. सुंदर पिचाइ) त्याबाबत वैयक्तीक होत नाही ना याची काळजी घ्यावी अन्यथा तेही मुर्खांचेच लक्षण असेल.

In reply to by द-बाहुबली

द-बाहुबली 24/08/2015 - 15:28
माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं तुम्हाला वैयक्तिक झोंबेल असं काय आहे माझ्या धाग्यात वा प्रतिसादात? मुद्देसूद बोलता येत नाही तेव्हा वैयक्तिकवर घसरणे मूर्खांची लक्षणे आहेत. तेव्हा सांभाळा.
तुम्ही जर गुगलचे सिएओ झालात तर मला तुमचा अभिमान वाटेल असे मी विधान केले आहे तर यात तुम्हाला झोंबण्यासारखे/ अथवा मुर्ख लक्षन काय आहे अथवा मुद्दा सोडुन काय आहे ? कारण मुद्दा कोणाला कोनीतरी कोणी बनल्यावर वाटणार अभिमान हाच मुद्दा आहे नाही का जर आपण वैयक्ती लिखाण करत नाही आहोत तर ? तुम्ही तुमचे कामधंदे सोडुन मिपाचे संपादक बनलात तरी मला अभिमान आहे हे विधानही अजिबात वैयक्तीक व मुद्दा सोडून नाही जर चर्चेचा मुद्दा अभिमान केंव्हा वाटावा हा असेल तर. आणी नसेल तर मुळात प्रथम तो कोणी घुसडला... शेवटी तुम्ही काय करावे हे सांगायचा मला अधिकार नाही पण तुम्ही गुगलचे सिइओ बनला असता तर मला जास्त अभिमान वाटले हे फक्त मी एक निरीक्षण नोंदवतो.

सुबोध खरे 24/08/2015 - 12:44
आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण १९८१ साली आय आय टी ची फी रुपये २५०/- सहामाही साठी होती. ( माझ्या भावाचा प्रवेश असल्याने माहिती आहे) आणि व्ही जे टी आय ची रुपये १८०/ - स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या बर्याच विद्यार्थ्यांना एक तर शिष्यवृत्ती असे किंवा शिक्षण कर्ज सहज मिळे ज्याचा हप्ता दोन वर्षानंतर सुरु होत असे जेंव्हा तो विद्यार्थी अमेरिकेत डॉलर मध्ये कमवू लागत असे. त्यामुळे या गोष्टी गरिबांना सुद्धा परवडत असत. बाकी सुंदर पिचई जनरल इलेक्ट्रीक मध्ये वरिष्ठ अभियंता पदावर असणारे वडील हे गरिब मध्यमवर्गीय नव्हे तर मध्य मध्यम वर्गीय किंवा उच्च मध्यम वर्गात गणले जाऊ शकतील. तेंव्हा गरिबांना उच्च शिक्षण परवडत असे का? आणि सुंदर पिचई गरीब होते का? या दोन गोष्टींची गल्लत नको

In reply to by सुबोध खरे

गॅरी ट्रुमन 24/08/2015 - 12:51
तेंव्हा गरिबांना उच्च शिक्षण परवडत असे का? आणि सुंदर पिचई गरीब होते का? या दोन गोष्टींची गल्लत नको
+१०००००.

In reply to by गॅरी ट्रुमन

असंका 24/08/2015 - 14:20
+१०००००? एक लाख? हा विषय एवढा महत्त्वाचा आहे तुमच्या दृष्टीने? एक लाख वेळा सांगताय की अशी अमुक एक गल्लत कुणी करू नका? आणि कुणी केलीये अशी गल्लत ? वरचे सगळे प्रतिसाद वाचल्यावर तुम्हीच अशी गल्लत केल्याचं दिसतंय...कारण धागाकर्त्याच्या लेखाचा विषय हा सुंदर पिचाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा हा नसून, त्यांच्याबद्दल आलेल्या लेखातली त्यांच्या नजरेला आलेली विसंगती हा होता. आणि तुम्ही मात्र ते गरीब असले तरी काही काही मार्गांनी त्यांना आणि एकंदरीतच गरीबांना कर्ज, शिष्यवृत्ती वगैरे मिळून असे शिक्षण घेणं शक्य असल्याचं मत मांडलं आहेत. म्हणजे गरीबांना उच्च शिक्षण परवडत असे हा मुद्दा आपणच तर आणला होतात चर्चेत?

In reply to by गॅरी ट्रुमन

अस्वस्थामा 24/08/2015 - 14:45
हो आहे. एनी प्रॉब्लेम?
ही ही ही.. बाकी क्लिंटन भौ अम्रिकेसारखेच मस्त अ‍ॅटिट्युड घेऊन वावरत असता हे भारीय. :)

तुडतुडी 24/08/2015 - 13:25
हो ना . आणि देशासाठी काहीही न करता परदेशात संपूर्ण योगदान देणार्यांचं एवढं कौतुक कशाला ? का तर फक्त भारतीय वंशाचा आहे म्हणून . इंग्लंड , अमेरिकेतल्या एखाद्या माणसाची नियुक्ती भारतातल्या उच्च पदावर झाली तर तिकडे त्याचं असं कौतुक होतं का ? त्याच्या गावाला केक बिक कापला जातो का ? बावळटपणा नुसता

In reply to by तुडतुडी

गॅरी ट्रुमन 24/08/2015 - 13:42
इंग्लंड , अमेरिकेतल्या एखाद्या माणसाची नियुक्ती भारतातल्या उच्च पदावर झाली तर तिकडे त्याचं असं कौतुक होतं का ?
असे काही लोक सांगू शकाल का?

In reply to by तुडतुडी

द-बाहुबली 24/08/2015 - 14:13
का तर फक्त भारतीय वंशाचा आहे म्हणून .
हो. काय त्रास आहे तुम्हाला ? इथे एक भारतीय म्हणून आत्मविश्वास नुकताच कुठे तरुणांमधे उभारु लागला आहे त्यांची स्वप्ने आत्ता कुठे विस्त्रुत (विस्तृत न्हवे ब्रॉड) होत आहेत मग हा सुर कशाला ? नाही दिलं भारताला योगदान... जमलं नाही, इछ्चा नाही असं नाही. म्हणून एक भारतिय म्हणून इतरांनी आपणही एखाद्या राक्षसी कंपनीचे सिइओ बनु शकतो याचा आत्मविश्वास साजरा करु नये का ? - भारताबद्दल प्रचंड अभिमान असलेला पण विषेश प्रेम नसलेला.

In reply to by द-बाहुबली

गॅरी ट्रुमन 24/08/2015 - 14:19
नाही दिलं भारताला योगदान... जमलं नाही, इछ्चा नाही असं नाही. म्हणून एक भारतिय म्हणून इतरांनी आपणही एखाद्या राक्षसी कंपनीचे सिइओ बनु शकतो याचा आत्मविश्वास साजरा करु नये का ?
योगदान अगदीच दिले नाही असे नाही. भारतासाठी योगदान भारतात राहूनच देता येते असे नाही.परदेशात चांगले काम करून भारत या नावाचा दबदबा निर्माण करायला हातभार लावणे हे पण भारतासाठीच योगदान आहे. अमेरिकेतील ज्यू लॉबीमुळे अमेरिका इसराएलला फार काही करू शकत नाही.तसा दबदबा जगभर भारतीयांचा व्हायला हवा. आणि हो आत्मविश्वास तर नक्कीच साजरा करायला हवा. - भारताबद्दल प्रचंड प्रेम असलेला पण विषेश अभिमान नसलेला (गॅरी ट्रुमन)

In reply to by गॅरी ट्रुमन

द-बाहुबली 24/08/2015 - 15:18
सहमत आहे. पण ही बाब लोकांना सामजावणे अवघड असते ज्यांना भारतातुन निघुन जाणार्‍या व्यक्ती देशाप्रती काहीच देणे ठेवत नाहीत असे मानतात. आणी स्वतःलाच त्यांच्यापासुन तोडुन घेतात.

इरसाल 24/08/2015 - 13:57
ज्यांच्या नावातच "पिचलेले" असावेत असा धडधडीत अर्थछटा प्रतित करणारा "पिचाई" शब्द येतोय त्याच्या गरीबीवर काय शिंतोडे उडवत आहात.(शिंतोडे उडवु र्‍हायले बे ?)

अरे होऊ द्या की गवगवा जरासा सुंदर पिचईंचा ! आतापर्यंत हातांच्या बोटावर मोजण्याइतकेच भारतीय लोक जगातल्या पहिल्या पाचात असलेल्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षपदापर्यंत पोचलेत. त्यात एका भारतियाची भर पडली ही काय अभिमानाची गोष्ट नाही ? शिवाय असा माणूस भारतातल्या निम्न/मध्यम वर्गातून काय अगदी सधन वर्गातून आला असला तरी जागतीक स्तरावर (आणि मुख्य म्हणजे अमेरिकन प्रणालीतून पुढे आलेल्यांशी) स्पर्धा करून ते पद मिळवणे ही विशेषच गोष्ट नाही का ? अश्या लोकांचे जरासे जास्त वाढवून वर्णन केले गेले (सुंदरचे तसे वर्णन झाले असा माझा अजिबात दावा नाही) तर ते इतर अनेक महत्वाकांक्षी भारतियांना प्रेरणादायक ठरून... "हे पण होऊ शकते" इतकी जरी त्यांच्या मनाची खात्री झाली तरी सुंदरचा विक्रम मोडणारा दुसरे सुंदर२,३,४,५ व्हायला मदतच होईल, नाही का? शिवाय, सम्राटांच्या, राजकीय नेत्यांच्या आणि औद्योगिक धुरीण यांच्या संबंधींच्या लोकवदंता (अनेक्डोट्स) हे साम्राज्ये, सत्तास्थाने आणि उद्योग अधिकाधिक वाढविण्यासाठी मोठे उपयोगी साधन आहे, हे व्यवस्थापनातले सर्वमान्य तत्व आहे. त्यामुळे, अश्या गोष्टी जोपर्यंत अंध व्यक्तीपूजेसाठी अथवा इतर काही गैरफायदा घेण्यासाठी वापरल्या जात नाहीत तोपर्यंत फायदेशीरच ठरतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुख्य म्हणजे, दर गल्लीबोळात आपण निकम्म्या भ्रष्ट नेत्यांच्या नावाच्या पाट्या आणि फ्लेक्स आपण रोज बघतोच आहोत ना ?... त्याला आपण विरोध करतो काय ? पिचईसारख्यांची एखाद्या वेळची थोडी वाढवून सांगितलेली स्तुतीही भारतीयांमध्ये काहीतरी सकारत्मकच फरक घडवेल. तिला उगी विरोध कशाला ?!

असंका 24/08/2015 - 14:42
थोडी वाढवून सांगितलेली
म्हणजे बदल करून सांगितलेली...
तिला उगी विरोध कशाला ?!
आहे अशी बातमी न सांगता लेखकाच्या मनाप्रमाणे केलेले बदल हे धोकादायकच. त्यात तुम्ही असे बदल हवेसे, असे बदल नकोसे हे नाही ठरवू शकत. कारण हितसंबंध हे परस्परावलंबी आणि परस्परविरोधी दोन्ही प्रकारचे असतात. या अनिश्चित जगात ज्या ज्या गोष्टींनी अनिश्चितता वाढते, तिला विरोध करायलाच हवा. त्याला "उगीच विरोध" म्हणणं योग्य नाही. बातमी वाचताना मला अशी शंका मनात यायला नको की या लेखकाने काही तरी बदलून लिहिलं आहे. त्याने अनिश्चितता निर्माण होइल.

In reply to by असंका

त्या प्रतिसादावर अगोदर... त्यामुळे, अश्या गोष्टी जोपर्यंत अंध व्यक्तीपूजेसाठी अथवा इतर काही गैरफायदा घेण्यासाठी वापरल्या जात नाहीत तोपर्यंत फायदेशीरच ठरतात. असे लिहिले आहे ! :)

संदीप डांगे 24/08/2015 - 19:31
सुंदर पिचईचं उदाहरण घेतलं म्हणून बर्‍याच लोकांना खटकलेलं दिसतंय. कुणाला काही स्वतःहूनच खटकवून घ्यायचं असेल तर माझा नाइलाज आहे. जणू पिचईबद्दल आकस ठेवूनच मी हा धागा लिहिलाय असं काहींच्या प्रतिसादात जाणवतंय. अनिवासी/मूळ भारतीयांच्या परदेशातल्या यशाने हुरळणारे व त्यांना नाके मुरडणारे असे बहुतेक दोन गट जालावर नेहमीच दिसतात. असे काही विषय दिसले की दोन्ही गट आपआपली हत्यारे परजून युद्धात उतरतांना बघितलेत. त्याबद्दल कुठे 'मोकळं' व्हायच्या कायम तयारीत असलेले हा धागा मिळायलाय तर पूर्वग्रहदूषित मनाने वाटेल ते टायपत सुटलेत. इथे नुसतं सुंदर पिचई एवढे दोन शब्द लिहिले असते तरी तेच झाले असते. अशा लोकांना धाग्याचा खरा उद्देश कळूनही ते जर आपल्याला वाटेल तो अर्थ काढत हुज्जत घालण्याच्याच प्रवृत्तीचे असतील तर त्याला माझा काही इलाज नाही. विवेकानंदांच्या धाग्यावर मारवा यांनी 'कमी महत्त्वाच्या भागावर फोकस करून पाहिजे तो अर्थ काढला' म्हणून बोंबाबोंब झाली. या धाग्यावर तरी काही लोक तेच करत आहेत. चर्चेचे मुद्दे/प्रश्न काय होते?
माध्यमांमधून खर्‍या गरिबीची अवहेलनाच होत नाहीये का? की कुणीही यशस्वी झाला की तो गरिबच होता हे अट्टाहासाने सांगितलं तरच त्याच्या यशाला उजळपणा येतो? कि लोकांना असलंच काही (रॅग्स टू रिचेस) वाचावंसं वाटतं म्हणून पत्रकार रंगवतात कहान्या? मुन्शीपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास केला वैगेरे सांगितले की फार रोम्यांटीक वाटतं.. नाही का? तुम्हाला काय वाटतं मंडळी...? ऐंशीच्या दशकात जे विशीत होते त्यांच्याकडून ऐकायला आवडेल.
माझ्या धाग्यात वा प्रतिसादात सुंदर पिचई वा त्यांच्या यशाबद्दल कुठलाही खोचक उल्लेख वा रोख नाही. माझा रोख केवळ आणि केवळ दोन काळातला फरक माध्यमांत कसा दाखवला जातो याचे उदाहरण देणे यावर होता. त्यावर काही माहिती मिळावी, त्याकाळातला मध्यमवर्ग, आताचा मध्यमवर्ग, बदलते राहणीमान, विचार यावर चर्चा व्हावी असा उद्देश होता. राहता राहिला तो सुंदर पिचई बद्दलच्या माझ्या वैयक्तिक मताचा प्रश्न, जो फारच क्षुल्लक आहे माझ्यासाठी. तर त्यांनी जे यश मिळवले त्याचा अभिमान आहेच, पण स्वतःची कंपनी उभारली असती तर हा अभिमान (माझ्या मनात असलेला, इतरांनीही तसेच वाटून घ्यावे असे नाही) द्विगुणित झाला असता. बरेच भारतीय मोठ्या विदेशी कंपन्यांत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आजकाल त्यात काही नवल-विशेष नाही. येणार्‍या भारतीय पिढ्यांसमोर असे नोकरपेशा आदर्श ठेवण्यापेक्षा स्टीव जॉब्स, बील गेट्स, झुकरबर्ग, बन्सल्स, मित्तल, इत्यादी 'समस्यांवर उपाय शोधून त्याचे व्यवसाय तयार करणार्‍या व जगाच्या व्यवहाराची भाषा बदलणार्या लोकांचे' आदर्श ठेवणे 'माझ्या वैयक्तिक मतानुसार' आवश्यक आहे. याचा अर्थ नोकर्‍या करणारे फक्त पाट्या टाकतात असे माझे मत आहे असे नाही. ज्याला जिथे योग्य संधी मिळते, मग भले ती नोकरीत असो, व्यवसायात असो, भारतात असो वा परदेशात असो, त्याने त्या संधीचे सोने केले तर मला आनंदच वाटेल. तिथे वादाचा मुद्दाच कुठे येतो? इथे कोण भारतीय, अभारतीय, इथे राहिले, तिकडे गेले, भारतासाठी काय केले वैगेरे प्रश्न माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाहीत. भारतीय कुठेही राहू दे, त्यांनी स्वतः काहीतरी निर्माण करावे, शोधावे, उद्योग उभारावे. एक भारतीय म्हणून मला त्याचा जास्त अभिमान वाटेल. त्यांनी किती गरिबीत दिवस काढले यावर रोख असल्यापेक्षा त्यांनी जगात काय बदल घडवले, काय योगदान दिले यावर चर्चा व्हाव्यात असे माझे मत आहे. माझ्या वैयक्तिक मताचा आदर नसणार्‍यांच्या व आधी भोचकपणा करून मग वेड पांघरून पेडगावला जाणार्‍या पळपुट्या शहाजोगी (पिचाइच्या स्वयंघोषित) वकिलांच्या वैयक्तिक प्रतिसादांना मी काडीची किंमत देत नाही. लेख व प्रतिसादांत माझी भूमिका/मतं मांडली आहे. याउपर योग्य त्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होत असेल तर स्वागत आहे.

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली 26/08/2015 - 19:24
माझ्या वैयक्तिक मताचा आदर नसणार्‍यांच्या व आधी भोचकपणा करून मग वेड पांघरून पेडगावला जाणार्‍या पळपुट्या शहाजोगी (पिचाइच्या स्वयंघोषित) वकिलांच्या वैयक्तिक प्रतिसादांना मी काडीची किंमत देत नाही.
विवेकानंदांच्या धाग्यावर मारवा यांनी 'कमी महत्त्वाच्या भागावर फोकस करून पाहिजे तो अर्थ काढला' म्हणून बोंबाबोंब झाली. या प्रतिसादात तरी असेच आपले कडुन घडले आहे. पण अर्थातच आपण त्याला किंमत देणार नाही असे (म्हणत) असल्याने आपण विरोधाभासी लिहता म्हणायची द्वीरुक्ती टाळतो. बाकी प्रतिसाद उल्लेखनीय.

पैसा 26/08/2015 - 22:13
"तीनच" खोल्यांचं घर होतं, 'स्कूटर'वरून चौघे फिरायचे, 'साधा' टेलिफोनही नव्हता (१९८५), तो आणि त्याच्या भावाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागायचं..
१९८५ साली गरीब? मी १९८७ साली बँकेत नोकरीला लागले तेव्हा माझा पगार महिना १०५० रुपये होता. घराचे कर्ज फक्त स्टाफला मिळत असे. त्याची लिमिट जास्तीत जास्त दीड लाख रुपये होती. त्यात साधारण २ लाख रुपये किंमतीचा फ्लॅट कसाबसा घेता यायचा. इतर पब्लिकला घराचे कर्ज जाम महाग असायचे. मुंबईत घर घेणे तेव्हाही दुरापास्त होते. डोंबिवली ठाणे वगैरे भागात रहाणारे लोक बहुधा वन रूम किचनचे लहानसे फ्लॅट घेत असत. चेन्नै हे मुंबईप्रमाणे मेट्रो असल्याने तिथे परिस्थिती वेगळी असेल असे वाटत नाही. तीन खोल्यांचे घर म्हणजे लैच मोठी उडी झाली. कोणाकडे बजाजची स्कूटर असलीच तर बहुधा सेकंड हँड असायची. सायकली फ्याशन म्हणून नव्हे तर गरज म्हणून वापरात होत्या. साधा टेलिफोन कोणाकडे असायचा? अगदी १९९० सालीसुद्धा टेलिफोन सहज मिळत नव्हते. बहुतेक १९९५ मधे आमच्याकडे टेलिफोन आला. आणि १९९८ ला डायल अप इंटरनेट. मात्र १९८५ साली आम्ही गरीब नक्कीच नव्हतो. भले श्रीमंत म्हणता येणार नाही, पण खाऊन पिऊन सुखी मध्यमवर्गीय. सुंदर पिचाईचे वर्णन गरीब घराचे नक्कीच नाही. त्या काळातले कोणत्याही प्रातिनिधिक मध्यमवर्गीय घराचे आहे. तीन खोल्यांचे घर म्हणजे बहुतेक उच्च मध्यमवर्गीय असावेत.

In reply to by पैसा

पैतै अशाच तंत्रकुशल बनल्या नाहीत. १९९८ साली फार कमी लोकांकडे इंटरनेट जोडणी असायची. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या शहरात एकच सायबर कॅफे होते. एका तासाला बहुधा ₹१२० की ₹१५० शुल्क होते. माझ्या घरी २००१ मध्ये संगणक घेतला. २००२ मध्ये इंटरनेट जोडणी काही दिवस घेतली होती. महाग पडत असल्याने काही महिन्यांनी काढून टाकली.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 26/08/2015 - 22:47
आधी डायल करा. मग वाट बघत बसा. गूगल सर्च पेज ओपन होईपर्यंत भाजीला फोडणी घालून यायचं. दुसरं पेज ओपन होईपर्यंत भाजी शिजायची. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला दिवसभर इंटरनेट फुकट असायचं आणि रात्री बहुतेक ११ नंतर. पण स्पीड काय विचारायचं नाही. जीमेल नंतर आली. आधी एमेसेन. माझा पहिला ईमेल आयडी @msn.com वाला आहे.

In reply to by पैसा

शब्दबम्बाळ 26/08/2015 - 23:03
टीईईईईई टू टुक टुक टुक.....टुक टुक टुक ट्याव ट्याव काय भारी आवाज यायचा डायल अपचा!! :D अस वाटायचं कि आपला कम्प्युटर बोलतोय आपल्याशी त्याच्या भाषेत... आपण खूप काहीतरी भारी शोध लावणारे आता अशी फिलिंग यायची मला तर! :)

In reply to by श्रीरंग_जोशी

रेवती 27/08/2015 - 22:27
आम्ही ९९ साली एक रुपाया प्रतिमिनिट असे इंटरनेट वापरले. नंतर ते ५०, ३०, २५ रूपयांपर्यंत कमी होत गेले.

In reply to by रेवती

असंका 27/08/2015 - 22:36
व्ही एस एन एल द्यायची डायल अप सेवा...त्यांचं ऑफीस लय कुठल्या कोपर्‍यात होतं पोलीस परेड ग्राउंडच्या तिकडे पुण्यात... काय शोधाशोध केली होती.... साई इंटरनेट की कायतरी नाव होतं त्यांचं. इंटरनेटचा पॅक वेगळा आणि फोनचं बिल वाढून यायचं ते वेगळं ...

In reply to by पैसा

गॅरी ट्रुमन 27/08/2015 - 10:30
चेन्नै हे मुंबईप्रमाणे मेट्रो असल्याने तिथे परिस्थिती वेगळी असेल असे वाटत नाही. तीन खोल्यांचे घर म्हणजे लैच मोठी उडी झाली.
वन बी.एच.के घरालाही तीन खोल्यांचेच घर म्हणता येईल.मी लहानपणी ठाण्याला होतो तेव्हा आमचेही वन बी.एच.के च घर होते. तीन खोल्यांचे घर म्हणजे तीन बेडरूमचे घर अशी कन्सेप्ट काही ठिकाणी सध्या वापरात आहे.ती त्या काळी होती असे वाटत नाही. अर्थातच पिचाई हे श्रीमंत नसले तरी खाऊन पिऊन सुखी मध्यमवर्गीय असे नक्कीच म्हणता येईल.

नमकिन 27/08/2015 - 12:09
स्थल, काल, कार्य, संपन्न, असे मुद्दे असुनही गाडी भरकटुन (वैचारिक चुंबकीय शक्ती) गेली कर्तुत्व विषयाकडे. कदाचित मूळ लेखन परदेशी भाषेत झाले असावे (परदेशी ठिकाणी) त्या अाधारे पुढील सर्व बेतलेले दिसत आहे, त्यात "ष्टोरी" छापन्याची घाई असणार, मग कुठला स्थलकाल अभ्यास! चालायचंच. स्पर्धा, दर्जा दुर्लक्षित.

शरभ 27/08/2015 - 13:16
एक माणूस म्हणून बघताना, अशा एखाद्या गोष्टीचा उदो उदो केला जावा का ? भारतीय आहेत म्हणुन.... अभिमान वाट्तोय. मराठी असते तर ......अत्याभिमान वाट्ला असता मराठी अमुक एक जातीचे असते तर्...उर फूटून आलं असतं आडनाव बंधू असते तर... अती होतय, आवरा....

In reply to by शरभ

पूर्वीच्या काळी जी मर्यादेत कवतिके व्हायची तेच बरे असे म्हणावे लागतेय असे ह्यांचे मत. सुंदर भारतीय म्हणून भारतीय खूष सुंदर चेन्नईचा म्हणून चेन्नईकर खूष. सुंदर तामिळ ब्राम्हण म्हणून अय्यर्,अय्यंगार खूष. सुंदर आय.आय.टी.चा म्हणून आय आय टी मेटॅलर्जीवाले खूष. सुंदर आय.टी.त म्हणून आमचे हिंजवडी,मगरपट्टावाले खूष. सुंदर एन.आर.आय. म्हणून आमचे अमेरिकन एन.आर.आय. खूष.

राही 27/08/2015 - 17:32
भारतातल्या मध्यमवर्गाच्या विस्तारीकरणाची सुरुवात बँकांच्या राष्ट्रीयीकरणापासून झाली असे मानता येईल. तोपर्यंत अर्थक्षेत्राशी कारकूनवर्गाचा फारसा संबंध नव्हता. राष्ट्रीयीकरणानंतर निमशहरी आणि शेतमालाच्या बाजारपेठांच्या गावातही सरकारी बँका सक्तीने का होईना, पोचल्या. शाखावृद्धीमुळे हजारोंना नोकर्‍या मिळाल्या. आर्थिक जगताचे एक अद्भुतरम्य दार सामान्य भारतीयांसाठी उघडले. परकीय चलन, मोठ्या कंपन्यांचा पतपुरवठा, त्यांचे व्यवहार, शेअर बाजार अशा कधी न ऐकलेल्या जगात मध्यमवर्ग डोकावू लागला. एक प्रकारे अलीकडच्या आय.टी. क्रांतीचेच ते एक मिनिरूप होते. त्यानंतर सुमारे दहा वर्षांनी एशिअन गेम्सच्या निमित्ताने टेलिविजनचे जाळे भारतात पसरले. हे गेम्स पाहाता यावे म्हणून दर दिवशी एक टीवी टॉवर या वेगाने सुमारे एकदीड वर्ष टॉवर (वसंत साठे यांच्या धडाडीमुळे) उभारले गेले. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नोकरीधंद्याच्या संधी वाढल्या. टीवीवरून संपन्न जगताची झलक सर्वसामान्यांना दिसली. कन्ज़्यूमर गुडसची मागणी आणि उत्पादन वाढले. यानंतर संगणकयुगाचा पाया घातला गेला. गावोगावी टेलिफोन एक्स्चेन्जिस पोचली. संपर्कक्रांतीची ती सुरुवात होती. शहरात डिजिटल युग अवतरले आणि त्यामुळे निकामी झालेली एक्स्चेन्जिस निमशहरी भागात धाडली गेली. या नंतर भारतीय मध्यमवर्गाने मागे वळून पाहिले नाही. साधारणपणे १९५० ते १९७५ पर्यंत गरीबी होती. लाल बहादुर शास्त्रींनी १९६५च्या युद्धादरम्यान भारतीयांनी वर्षभर एक दिवस उपास करावा म्हणजे ५५ कोटी जेवणे वाचतील असे आवाहन केले होते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. १९७१च्या पाक युद्धानंतर समारंभातल्या जेवणावळींवर निर्बंध आले होते. फक्त पन्नास माणसांना जेवण घालता येई. किती अन्न शिजले आहे ते तपासण्यासाठी पोलीस धाडी घालीत. मग एकावेळी फक्त पन्नास जणांचा स्वयंपाक शिजवण्याची शक्कल लोकांनी काढली. काहींनी तांदुळाऐवजी वर्‍यांचा भात वाढला. नंतर कृषिक्रांतीमुळे काळ्या बाजारातून साखर किंवा राशनचे धान्य घेण्याची गरज मध्यमवर्गाला राहिली नाही. चैनीच्या वस्तूंची खरेदी वाढली. पूर्वी फर्निचर म्हणजे एक गोद्रेज किंवा गद्रेचे कपाट, एक सिंगर मशीन, एक लोखंडी खाट आणि बसायला खुर्च्या इतक्याच वस्तू असत. दिवाळीला मोती साबण ही चैनीची परमावधी होती. बजाज स्कूटरसाठी पाच पाच वर्षांची प्रतीक्षायादी असे आणि डिलिवरीच्या वेळी तुफान काळाबाजार चाले. कित्येक तर ऑन पैसे मिळवण्यासाठी बुकिंग करून ठेवीत. मारुतीने स्कूटरची मिजास उतरवली. मराठी मध्यमवर्ग शेअर बाजारात १९७५-८० नंतर उतरला. उद्योगांच्या विस्तारीकरणामुळे खूप प्रायमरी ऑफर्स (आय.पी.ओ) असत. त्या वेळी दहावीस शेअर्स लागलेले लोक आज कोट्यवधीचे मालक असतील, जर त्यांनी ते विकले नसतील तर. या बरोबरच चाळ आणि वाडा संस्कृती लयाला जाऊन वन बी एच के संस्कृती आली. त्या काळचा उच्चमध्यमवर्ग उदयास आला. दारिद्य तेव्हाही होते, आताही आहे. पण दारिद्र्याच्या व्याख्येत फरक झाला आहे.

सुंदर पिचई एका थोरल्यामोठ्या कंपनीचे सी.इ.ओ. झाले
माझ्या उत्त्पन्नात काही फरक पडलाय का? मग मी ते वाढायसाठी अजुन कष्ट करु का सुंदर पिचईंचे गोडवे गात फिरु? हे गृहस्थ पुर्वी गरिब होते का सोन्याच्या पलंगावर झोपत होते ह्याची वायफळ चर्चा कशाला पाहिजे? त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं म्हणा आणि त्यातुन शिका ना ४ गोष्टी.

शरभ 28/08/2015 - 12:24
हा असला उदो उदो करुन काय मिळनारे? अहो, असेच एक भारतीय एका मोठ्या फर्मचे सी इ ओ झाल्यावर, भारतात किती तरी जॉब कट झाले. Employee वरुन vendor झालो, हा स्वानुभव आहे. त्यावेळी नोकरी जाउन बेकार झालो नाही हेच नशीब. तस्मात, ह्या लोकांकडून शिकावं आणि पुढे जावं हेच उत्तम. He deaserved it, its his own achievement, that's it.

जेपी 23/08/2015 - 13:46
डॉ.खरेंनी 'लोकसत्ता' वाचणे सोडले. तुम्ही 'लोकमत' वाचणे सोडा. टक्याला 'संध्यानद' वाचणे सोडायला सांगु. मी 'एकमत' वाचणे सोडतो. मापं ना ' मटा ' सोडायला सांगु. एकुणच व्रुत्तपत्रे वाचणे सोडु.हाकानाका.

गॅरी ट्रुमन 23/08/2015 - 13:50
ऐंशीच्या दशकात जे विशीत होते त्यांच्याकडून ऐकायला आवडेल.
मी ८० च्या दशकात विशीमध्ये नव्हतो तरीही एक मुद्दा---
आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणारा गरिब मध्यमवर्गीय?
सुंदर पिचाईंविषयी मला विशेष काही माहिती नाही आणि ते खरोखरच गरीब कुटुंबातले होते की नाही हे पण मला माहित नाही. पण आय.आय.टी आणि स्टॅनफर्डमध्ये शिकणे हा गरीब नसल्याचे लक्षण आहे हे मला नक्कीच मान्य नाही. आय.आय.टी मध्ये शिक्षणासाठी कर्ज मिळते.आणि आय.आय.टी मध्ये चांगल्या ग्रेड आल्यास त्या आधारे स्टॅनफर्डमध्ये शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळू शकतो.तेव्हा या दोन आधारांवर कोणीही गरीब नव्हते हे सिध्द करता येण्याजोगा हा सक्षम मुद्दा नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

संदीप डांगे 23/08/2015 - 14:15
सुंदर पिचई यांच्या पार्श्वभूमीबद्दल सगळ्याच माध्यमांमधे अशीच माहीती उपलब्ध आहे. स्टॅनफर्डमधलं शिक्षण त्यांच्या घरच्या बचतीच्या पैशांवर झालं असं समजतं. शै़क्षणिक कर्ज, इतर सुविधा वैगेरे आजच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही असं माझं मत आहे. आयआयटीबद्दलतर आजच्या काळात जेवढा गवगवा आहे त्याच्या मानाने ८०च्या दशकात फक्त मोजक्या लोकांना त्याची माहीती होती. ही मोजकी मंडळी म्हणजे उच्चशिक्षित, सूखवस्तू कुटूंबे. ह्यांनाच कोचींगक्लासेसच्या फिया परवडतात. सुपर३० उगाच सूरू झाले नाही. आयआयटी व गरिबांचा प्रवेश यावर माध्यमांमधे बरीच चर्चा झाली आहे मागे. हजारात दहा अपवाद दाखवून सत्य नाकारता येणार नाही.

In reply to by संदीप डांगे

गॅरी ट्रुमन 23/08/2015 - 14:54
स्टॅनफर्डमधलं शिक्षण त्यांच्या घरच्या बचतीच्या पैशांवर झालं असं समजतं.
तसे असेल तर सुंदर पिचाई एकदम श्रीमंत म्हणायला हवेत. आजच्या काळात स्टॅनफर्डची फी आणि कॅलिफोर्नियात दोन वर्षे रहायचा खर्च याचा आकडा एखाद कोटीपर्यंत सहज जाईल.त्याच तुलनेत त्यावेळीही असणार असे धरायला हरकत नसावी.
शै़क्षणिक कर्ज, इतर सुविधा वैगेरे आजच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही असं माझं मत आहे.
अशा आघाडीच्या शिक्षणसंस्थांमध्ये शिकायला स्टेट बँक गेल्या अनेक वर्षांपासून विनातारण कर्ज देत आली आहे.असे कर्ज विनातारण आणि गॅरेंटरशिवाय कर्ज स्टेट बँकेची त्या संस्थेच्या आवारातलीच शाखा देते आणि केवळ अ‍ॅडमिशन लेटरवर कर्ज मिळू शकते.बँकेच्या इतर कुठल्याही शाखेत शिक्षणकर्ज घ्यायचे असेल तर मात्र तारण, गॅरेंटर इत्यादी प्रकार असतात.
आयआयटीबद्दलतर आजच्या काळात जेवढा गवगवा आहे त्याच्या मानाने ८०च्या दशकात फक्त मोजक्या लोकांना त्याची माहीती होती. ही मोजकी मंडळी म्हणजे उच्चशिक्षित, सूखवस्तू कुटूंबे. ह्यांनाच कोचींगक्लासेसच्या फिया परवडतात.
कोट्याला आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी आय.आय.टी जे.ई.ई साठी कोचिंग क्लासच्या फॅक्टर्‍या ८० च्या दशकातही होत्या का? आणि आय.आय.टी मध्ये कोणी विद्यार्थी असेल तर तो कोचिंग क्लास मधूनच गेला असेल आणि स्वतःचा स्वतः अभ्यास करून गेला नसेलच असे कशावरून?
हजारात दहा अपवाद दाखवून सत्य नाकारता येणार नाही.
इतकं मनावर नका घेऊ हो :)

In reply to by गॅरी ट्रुमन

संदीप डांगे 23/08/2015 - 15:03
इतकं मनावर नका घेऊ हो :)
नाही हो ;-) वडिल मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर असलेले अभियंता, घर, स्कूटर, इ. गोष्टी बाजूला ठेवून फक्त आयआयटी प्रवेश इतकाच निकष लावला तर गरीब श्रीमंत कोण हा प्रश्नच उरत नाही. चर्चेत एखाद्याचं विधान चुकीचंच कसं हे सिद्ध करायला सिलेक्टीव रीडींग पुरेसं असतं. मी कलेक्टीव अ‍ॅनालिसिस मांडत आहे. तुम्ही त्यातलं ज्यावर वाद घालता येईल तेवढंच वाक्य उचलून पिचई ला बेनेफिट ऑफ डाइट देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तो गरीब असूही शकतो असे म्हटलं आहे. पण इतर परिस्थिती त्या विधानाविरूद्ध आहे हे लक्षात घेतलेले नाही. तुम्ही आयआयटी बद्दल उल्लेख मनावर घेऊ नका. पण जेवढं वाचलं आहे त्यावरून आयआयटी ही श्रीमंत-उच्च्भ्रूंना अ‍ॅक्सेसेबल होती असं वाटतं. यासंबंधीत लिंक्स देतो सावकाश.

In reply to by संदीप डांगे

चिरोटा 24/08/2015 - 15:02
पण जेवढं वाचलं आहे त्यावरून आयआयटी ही श्रीमंत-उच्च्भ्रूंना अ‍ॅक्सेसेबल होती असं वाटतं ७० व ८०च्या दशकातल्या जे.ई.चे अनेक लोक पाहिलेत तर आय.आय.टी. मोठ्या शहरांतील सुशि़क्षित मध्यम्वर्गीयांना अ‍ॅक्सेसेबल होती असे म्हणता येते.क्लासेस प्रकार खूप कमी होता. अग्रवाल व ब्रिलियंट ट्युटोरियल्स हे प्रामुख्याने होते.ह्यांची फी पण वाजवी असायची(९० साली अग्रवाल-२३०० रुपये) बहुतांशी परीक्षा देणारे व पास होणारे हे मुंबई,पुणे,दिल्ली,चेन्नई,कोलकाता... अशा मोठ्या शहरांमधून असायचे. साधारण २ लाख परी़क्षार्थी व त्यातून २००० जागा,म्हणजे १:१०० असे गुणोत्तर.

मारवा 23/08/2015 - 14:22
मी अशीच मागे एकदा जपानच्या प्रिन्सेस नोरिको ची बातमी वाचली होती. त्यात ती राजघराण्याच्या बाहेर एका साध्या माणसाशी ( राजघराण्याच्या तुलनेत तसा नाही ) लग्न करणार होती. आता नविन जीवन राजघराण्याच्या बाहेर एका सामान्य माणसाबरोबर व्यतीत करावे लागेल या संघर्षाची कल्पना आल्याने तिने प्रिपरेशन करायला सुरुवात केली ती स्वतः स्वतःच्या कारने सुपरमार्केट पर्यंत गेली. तिने स्वतः ( हो स्वतःच्या हाताने काहि वस्तु खरेदी करुन कार्ट मध्ये टाकल्या) नंतर त्या कार्टीने तीने बिलींग केले. परत सर्व सामान स्वतः कारमध्ये टाकुन घरी गेली. असतो एकेकाचा गरीबीशी संघर्ष दुसरा कॉन्ट्रास्ट आपल्याकडे मुबलक पहायला मिळतो. एक महाश्वेतादेवींच्या मुलाखतीत वाचलेल आठवतय बिरसा मुंडा चा पत्ता सांगितला की साक्ष दिली पोलिसात नक्की आठवत नाही अस काहितरी एका आदिवासीने केल तर का कशाच्या बदल्यात तर त्याला दोन रुपये आणि पोट भरुन भात खायला दिला म्हणुन. त्यात त्या म्हणतात त्या आदिवासींसाठी आयुष्यात एकदा तरी पोट भरुन भात खायला मिळणे म्हणजे खुप च मोठी गोष्ट होती. दे आर सो पुअर यु नो ते सर्व बिचारे एका खराटा मारुती ८०० मध्ये पिकनीक ला जातात

यशोधरा 23/08/2015 - 14:27
लोकमत हा पत्रकारितेचा मापदंड नसावा बहुतेक. कोणत्या मासिकातील/ वर्तमानपत्रातील बातमीला कितपत महत्व द्यायचे हे आपण नक्कीच ठरवू शकतो. असो.

In reply to by यशोधरा

संदीप डांगे 23/08/2015 - 14:55
ताई, लोकमत व सुंदर पिचईचे हे फक्त एक उदाहरण दिलंय. अशा स्वरूपाच्या बातम्या विविध लोकांबद्दल विविध दर्जाच्या विविध माध्यमांतून येतंच असतात. माध्यमांमधून यशस्वी लोकांनी कसा खडतर प्रवास केलाय अशा कहान्या नेहमीच येतात. त्यांच्या प्रवासाचा खडतरपणा अधिक - लार्जर दॅन रीअल लाइफ- रंगवण्याच्या अहमहमिकेने त्या कधी कधी हास्यास्पद व बनावट होतात हेच पिचईच्या निमित्ताने सिद्ध झालं इतकंच.

In reply to by संदीप डांगे

यशोधरा 23/08/2015 - 16:23
अहो साहेब ठीके की. सुंदर पिचाई म्हणजे काही आयुष्य जगायचा मापदंड नव्हेत. आता ते दारिद्र्यरेषेखाली जगले नसतील पण म्हणून त्यांनी जे साध्य केलं त्याचं क्रेडिट कमी होतं का? बरं, ज्यांनी बातमी दिली आहे त्यांनी कितपत तपासून दिली आहे, तो एक अलाहिदा मुद्दा. आणि तसंही पिचईच्या खडतर प्रवासाची किती लोकांना पडली आहे, असं वाटतं तुम्हांला? लोक आता वाचतील, पुढच्या अर्ध्या तासात विसरतील. कोणत्याही बातमीचे हेच प्राक्तन आहे आणि असते.

gogglya 23/08/2015 - 15:18
'भारतीय मूळ' असलेल्या आणी सध्या परदेशी वास्तव्यास असलेल्या [यातील बहुतेक जण ग्रीन कार्ड मिळालेले किंवा मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेले] लोकांचे गुणगान करत राहणार आहोत, हा प्रश्न आहे. बाकी लहानपणीची गरीबी / श्रीमंती वगैरे चालु द्या...

चिरोटा 23/08/2015 - 15:53
अशी वर्णने वाचली की आम्ही जी गरीबी बघितली 'त्ये काय व्हतं मग?' असं विचारायला होतं बुवा.
खरे आहे.८०च्या दशकात्, फोन साठी प्रतिक्षायादी असायची.बहुतांशी लोकांकडे त्यामुळे फोन नसायचा.टी.व्ही. वा गाडीचेही तसेच.प्रस्थापित व्यवस्थेत 'नेत्रदीपक' यश मिळाले की थोडेसे गरीबीचे,'हालाखीच्या दिवसांचे' भांडवल करणे ही पद्धत आहे.एखादी कंपनी बर्यापैकी मोठी झाली की मग तिचे प्रवर्तक आमची कंपनी कशी 'गॅरेज स्टर्टअप' होती हे दिमाखाने सांगतात. त्या गॅरेजचे फोटो मग मोठ्या नियत्कालिकांत 'ते दिवस' शिर्षकाखाली छापून येतात. अनेक वेळा ही गॅरेजेस श्रीमंत वस्त्यांमध्ये असतात व त्या गॅरेजचा आकारही आपल्या १ बी.एच.के.पेक्षा मोठा असतो.

नंदन 23/08/2015 - 16:03
ब्लूमबर्ग.कॉमवर गेल्या वर्षी पिचाईंवर एक लेख/प्रोफाईल आला होता. त्यातल्या दुसर्‍या पानावर (दुवा) हे सारे स्कूटर - टेलिफोन - स्टॅनफर्ड इ. उल्लेख आहेत. तेदेखील पिचाईंनीच सांगितलेले दिसताहेत. (आता हा त्यांच्या नॉस्टॅल्जियाचा भाग किंवा वैट्ट, वैट्ट, दुष्ट अमेरिकन पत्रकारांनी तत्कालीन भारतीय मध्यमवर्गाला हिणवण्यासाठी रचलेले कारस्थान, यावर अजून एक वायफळाचा मळा पिकवता येईल.) तर अलीकडच्या बातम्यांत अनेक वृत्तपत्रांनी बातमी देताना या ब्लूमबर्गी लेखाकडे निर्देश केला. मी 'लोकमत'मधली बातमी वाचलेली नाही; पण तुमच्या कैफियतीवरून असं दिसतंय की बहुधा त्या पत्रकारूने असले दुवे/निर्देश देण्याच्या भानगडीत न पडता आपल्या मगदुराप्रमाणे थेट अनुवादाची पाटी टाकलेली असावी. त्यातही तपशीलाच्या चुका आहेतच. उदा.
Pichai excelled at school and won a coveted spot at the Indian Institute of Technology in Kharagpur, where he studied engineering. After graduating, he won an additional scholarship to Stanford University to study materials science and semiconductor physics. Pichai’s father tried to take out a loan to cover the cost of the plane ticket and other expenses. When it didn’t come through in time, he withdrew $1,000 from the family’s savings—more than his annual salary. “My dad and mom did what a lot of parents did at the time,” Pichai says. “They sacrificed a lot of their life and used a lot of their disposable income to make sure their children were educated.”

रेवती 23/08/2015 - 22:46
मीही बातमी पूर्ण वाचली/ऐकली नाही. बाकी नक्की किती खरं किती खोटं हे करण्यापेक्षा तो मनुष्य दोनवेळा खाऊन पिऊन सुखी असावा असा निष्कर्ष निघू शकेल, जे चांगलेच आहे. अर्धपोटी वगैरे कोणीच रहायला नकोय. आवश्यक ते पाटी, दप्तर, पुस्तकं मिळाली असावित हेही चांगलच आहे. आमच्या आजूबाजूला राहणार्‍या दोनेक जणांनी नक्की काय केलं म्हणजे आपली मुलं अशा पोझिशनला पोहोचतील? त्यांना आपण सुंदर पिचाई व सत्या नाडेला यांच्या जीवनावर माहिती द्यायला हवी का अशी चर्चा व्हॉटस अपवर केली असे नवरा म्हणत होता. पण तेवढेच! मग विषय संपला. त्या चर्चा करणार्‍यांचाही उत्साह संपला असावा कारण पुढे काही झाले नाही.

सुंदर पिचाई हे गरीब का श्रीमंत परिस्थितीत वाढले हे ठरवणे अधिक करून संदर्भावर अवलंबून आहे. भारतीय संदर्भात त्यांची परिस्थिती मध्यमवर्गीय म्हणता येईल तर अमेरिकन संदर्भात ती गरीब ठरेल. पण यापेक्षा अधिक महत्वाची आणि विचारणीय बाब अशी कि सत्य नाडेला[Microsoft] शिव नाडर [HCL Technologies] आणि सुंदर पिचाई [Google] हे तिघेही त्यांच्या अभूतपूर्व यशामुळे भारताच्या नवीन पिढीला आदर्श आणि मार्गदर्शक म्हणून ठरू शकतात.

In reply to by श्रीनिवास टिळक

असंका 24/08/2015 - 00:55
एक शंका आहे, कुणी प्लीज सांगेल का- एच सी एल ही माय्क्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्याबरोबरीने नाव घेण्याएवढी मोठी कंपनी आहे का ? की सत्यम शिवम सुंदरम हे जुळतंय म्हणून फक्त?

In reply to by असंका

पगला गजोधर 24/08/2015 - 09:43
एच सी एल ही माय्क्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्याबरोबरीने नाव घेण्याएवढी मोठी कंपनी आहे का ? की सत्यम शिवम सुंदरम हे जुळतंय म्हणून फक्त?
हे मात्र १+ निरीक्षण आपले, कंफ्युज्ड(नसलेले), अकौंटंट साहेब

In reply to by श्रीनिवास टिळक

सत्या नाडेला व सुंदर पिचाई हे दोघेही जागतिक किर्तीच्या कंपन्यांत (अनुक्रमे मायक्रोसॉफ्ट व गुगल) बर्‍याच खालच्या पदावरून सुरुवात करून सिइओ पदापर्यंत पोचले. शिव नाडर एचसीएल कंपनीचे संस्थापक आहेत. वयानेही (७० वर्षे) ते इतर दोघांपेक्षा बरेच मोठे आहेत. सुंदर पिचाई यांची गुगलच्या सिइओपदी नियुक्ती झाल्यावर फेसबुकवर सत्या नाडेला व शिव नाडर यां दोघांच्या फोटोज बरोबर त्यांचा फोटो फिरवला जात होता. तुमचा प्रतिसाद त्या फेसबुक पोस्टवरून प्रेरित आहे का?

ते गरीब होते कि नाही ही बाब गौण आहे. ते आत्ता गरीब नाहीत , व जे काही मिळवले ते स्वतःच्या मेहनतीने ! ही बाब महत्त्वाची आहे. त्यांचे कर्तृत्व निश्चितच प्रेरणादायी आहे.

In reply to by उगा काहितरीच

द-बाहुबली 24/08/2015 - 01:14
ते आत्ता गरीब नाहीत , व जे काही मिळवले ते स्वतःच्या मेहनतीने ! ही बाब महत्त्वाची आहे. त्यांचे कर्तृत्व निश्चितच प्रेरणादायी आहे.
बरोबर. आणी सुंपिला गरीब म्हटल्याने जर एखाद्या गरीब व्यक्तीला वर उठण्याची जिद्द मिळत असेल तर अजुन सुरेख...

संदीप डांगे 24/08/2015 - 10:41
सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद! फार थोड्या लोकांना लेखाचा उद्देश आणि रोख नेमका कळला. कदाचित मलाच नीट लिहिता आले नाहीये. प्रश्न, सुंदर पिचई हा खरंच गरिब होता की नव्हता, आता काय आहे, कसा यशस्वी झाला वैगेरे नाहीच आहे. कुण्या गरिबाने श्रीमंतच होउ नये असे काही मी म्हटले नाही. सुंदर पिचईचे केवळ एक उदाहरण घेतले आहे. तसेही राहुलजींच्या मते गरिबी ही एक सापेक्ष मानसिकता आहे. ;-) असो. थोरामोठ्यांची कारकिर्द लिहितांना त्यांनी कसे गरिबीतून दिवस काढले याच्या कहान्या रंगवल्या जातात. त्यांना मिळणारा सॉफ्टकॉर्नर पाहून ज्यांनी फारसे गरिबीत दिवस काढले नाहीत तेही असला सॉफ्टकॉर्नर मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा हास्यास्पद कहान्या प्रसवतात. आम्ही फार गरिब होतो, आमच्या चौघांत मिळून एकच कार होती, एकच घर होते, तीनच वेळेला जेवत होतो, आठवड्यातून एकदाच मल्टीप्लेक्सला जात होतो, वर्षातून एकदाच फॉरेनट्रीपला जात होतो, आईकडे दहाच किलो सोन्याचे दागिने होते, आमची फक्त पाचशे एकर बागायती शेती होती. इत्यादी कहान्या तीस वर्षांनी काही मुले सांगतील कदाचित मुद्दा संदर्भाचा आहे. त्यातली विसंगती दाखवण्याचा प्रयत्न होता. त्याकाळाला आजच्या काळाप्रमाणे किंवा अमेरिकन दृष्टीकोणातून बघणे विसंगतीपूर्ण आहे व ते हास्यास्पद होते असे म्हणायचे होते. त्याकाळातले जनजीवन, समाजकारण, आर्थिक परिस्थितीतून उद्भवणारे प्रसंग इत्यादी बाबी आजच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे. कारण ऐंशीचे दशकातली टीनेजर मंडळी आणि ९५ नंतर जन्मलेली टीनेजर मंडळी यांच्या आकलनात फार फरक आहे. कष्ट, गरीबी, अभाव याचा जो काळ ऐंशीच्या दशकातल्या टीनेजरनी बघितला तो नंतरच्या पीढीने बघितलाच नाही. आज मोलकरणीचा मुलगाही स्मार्टफोनसाठी जीवघेणा हट्ट करतो, त्याला आईचे कष्ट, पैशाची अनुपलब्धता, इत्यादी गोष्टी समजतच नाहीत. इतरांकडे आहे मग माझ्याकडेही असले पाहिजे असाच अट्टाहास सर्वत्र दिसतो. ऐंशीच्या दशकात मुलांमधे ह्या भावना नव्हत्या. त्यामुळे त्याकाळात स्कूटरवर फिरलो, रि़क्षातून शाळेत जायचो, तीन खोल्यांचे घर ह्या गरिबी किंवा अभावाच्या गोष्टी नसून सुखवस्तूपणाच्या द्योतक आहेत. पण आजच्या काळात जर त्यांना गरिबीच्या, अभावाच्या प्रातिनिधिक म्हणून सादर केल्यात तर आजच्या पीढीला खरी गरिबी काय होती हे कळणारच नाही. माझा मुद्दा कळला असेल अशी अपेक्षा आहे. सुंदर पिचईकाकांबद्दल मला फक्त एकच वाटते. स्वत:ची कुंपनी काढली अस्ती तर अजून अभिमान वाटला असता. थांबतो. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली 24/08/2015 - 12:27
जेंव्हा घवघवीत यश हातात येते. त्या वेळी अशा व्यक्तीच्या नकारात्मक बाजुही गुणगान गायल्या प्रमाणे वाखाणल्या जातात(उदा. स्टीव जोब्स) व अपयश असेल तर तर सकारात्मक बाजुचीही निंदा केली जाते... कमी मिळकतीचे जिवन अत्यंत हालाखीचे दारिद्र्यावस्थेतले चितारले जाते... कोणाला चायवाला समजले जाते... कोणाला भिकारी... ये सब चलते रहतायं.सुंदरच्या गरीबीची वास्तवअवास्तव वर्णने वाचुन एका खर्‍या गरीबाला जर वर जाण्याची उर्मी अन दिशा मीळाली तरी ते सर्व न्याय ठरते. सो लेट्स से हिप हिप हिप हुर्रे फॉर बिइंग पुर सुंदर...
थोरामोठ्यांची कारकिर्द लिहितांना त्यांनी कसे गरिबीतून दिवस काढले याच्या कहान्या रंगवल्या जातात. त्यांना मिळणारा सॉफ्टकॉर्नर पाहून ज्यांनी फारसे गरिबीत दिवस काढले नाहीत तेही असला सॉफ्टकॉर्नर मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा हास्यास्पद कहान्या प्रसवतात.
:) येस. असे असतात खरे... पण ते फार दिशाभुल करु शक्तात असे वाटत नाही.
माझा मुद्दा कळला असेल अशी अपेक्षा आहे. सुंदर पिचईकाकांबद्दल मला फक्त एकच वाटते. स्वत:ची कुंपनी काढली अस्ती तर अजून अभिमान वाटला असता.
सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ झाला असता तर अजून अभिमान वाटला असता.

In reply to by द-बाहुबली

प्यारे१ 24/08/2015 - 12:34
>>>>>सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ झाला असता तर अजून अभिमान वाटला असता. ऑरे दादा, ई चोलबे ना. मिपावर सुन्दर धागे कुणी काढले असते मग???? डांगे अण्णा हलकं घ्या. गरीबी ही मानसिक अवस्था आहे या आदरणीय राहुलजी यांच्या मताशी सहमत असलेला

In reply to by द-बाहुबली

संदीप डांगे 24/08/2015 - 14:16
सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ झाला असता तर अजून अभिमान वाटला असता.
माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं तुम्हाला वैयक्तिक झोंबेल असं काय आहे माझ्या धाग्यात वा प्रतिसादात? मुद्देसूद बोलता येत नाही तेव्हा वैयक्तिकवर घसरणे मूर्खांची लक्षणे आहेत. तेव्हा सांभाळा. तुम्हाला अभिमान वाटो न वाटो याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मी माझ्या कंपनीचा फाउंडर, सीईओ, क्लर्क, चपराशी सगळं आहे आणि त्यातच मला अभिमान आहे. पण तुमचं काय?

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली 24/08/2015 - 15:14
माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं तुम्हाला वैयक्तिक झोंबेल असं काय आहे माझ्या धाग्यात वा प्रतिसादात? मुद्देसूद बोलता येत नाही तेव्हा वैयक्तिकवर घसरणे मूर्खांची लक्षणे आहेत. तेव्हा सांभाळा. तुम्हाला अभिमान वाटो न वाटो याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मी माझ्या कंपनीचा फाउंडर, सीईओ, क्लर्क, चपराशी सगळं आहे आणि त्यातच मला अभिमान आहे. पण तुमचं काय?
छान विचार. आपणही जेंव्हा एखाद्याबाबत बोलतो/धागे काढुन मत व्यक्त करतो (उदा. सुंदर पिचाइ) त्याबाबत वैयक्तीक होत नाही ना याची काळजी घ्यावी अन्यथा तेही मुर्खांचेच लक्षण असेल.

In reply to by द-बाहुबली

द-बाहुबली 24/08/2015 - 15:28
माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं तुम्हाला वैयक्तिक झोंबेल असं काय आहे माझ्या धाग्यात वा प्रतिसादात? मुद्देसूद बोलता येत नाही तेव्हा वैयक्तिकवर घसरणे मूर्खांची लक्षणे आहेत. तेव्हा सांभाळा.
तुम्ही जर गुगलचे सिएओ झालात तर मला तुमचा अभिमान वाटेल असे मी विधान केले आहे तर यात तुम्हाला झोंबण्यासारखे/ अथवा मुर्ख लक्षन काय आहे अथवा मुद्दा सोडुन काय आहे ? कारण मुद्दा कोणाला कोनीतरी कोणी बनल्यावर वाटणार अभिमान हाच मुद्दा आहे नाही का जर आपण वैयक्ती लिखाण करत नाही आहोत तर ? तुम्ही तुमचे कामधंदे सोडुन मिपाचे संपादक बनलात तरी मला अभिमान आहे हे विधानही अजिबात वैयक्तीक व मुद्दा सोडून नाही जर चर्चेचा मुद्दा अभिमान केंव्हा वाटावा हा असेल तर. आणी नसेल तर मुळात प्रथम तो कोणी घुसडला... शेवटी तुम्ही काय करावे हे सांगायचा मला अधिकार नाही पण तुम्ही गुगलचे सिइओ बनला असता तर मला जास्त अभिमान वाटले हे फक्त मी एक निरीक्षण नोंदवतो.

सुबोध खरे 24/08/2015 - 12:44
आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण १९८१ साली आय आय टी ची फी रुपये २५०/- सहामाही साठी होती. ( माझ्या भावाचा प्रवेश असल्याने माहिती आहे) आणि व्ही जे टी आय ची रुपये १८०/ - स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या बर्याच विद्यार्थ्यांना एक तर शिष्यवृत्ती असे किंवा शिक्षण कर्ज सहज मिळे ज्याचा हप्ता दोन वर्षानंतर सुरु होत असे जेंव्हा तो विद्यार्थी अमेरिकेत डॉलर मध्ये कमवू लागत असे. त्यामुळे या गोष्टी गरिबांना सुद्धा परवडत असत. बाकी सुंदर पिचई जनरल इलेक्ट्रीक मध्ये वरिष्ठ अभियंता पदावर असणारे वडील हे गरिब मध्यमवर्गीय नव्हे तर मध्य मध्यम वर्गीय किंवा उच्च मध्यम वर्गात गणले जाऊ शकतील. तेंव्हा गरिबांना उच्च शिक्षण परवडत असे का? आणि सुंदर पिचई गरीब होते का? या दोन गोष्टींची गल्लत नको

In reply to by सुबोध खरे

गॅरी ट्रुमन 24/08/2015 - 12:51
तेंव्हा गरिबांना उच्च शिक्षण परवडत असे का? आणि सुंदर पिचई गरीब होते का? या दोन गोष्टींची गल्लत नको
+१०००००.

In reply to by गॅरी ट्रुमन

असंका 24/08/2015 - 14:20
+१०००००? एक लाख? हा विषय एवढा महत्त्वाचा आहे तुमच्या दृष्टीने? एक लाख वेळा सांगताय की अशी अमुक एक गल्लत कुणी करू नका? आणि कुणी केलीये अशी गल्लत ? वरचे सगळे प्रतिसाद वाचल्यावर तुम्हीच अशी गल्लत केल्याचं दिसतंय...कारण धागाकर्त्याच्या लेखाचा विषय हा सुंदर पिचाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा हा नसून, त्यांच्याबद्दल आलेल्या लेखातली त्यांच्या नजरेला आलेली विसंगती हा होता. आणि तुम्ही मात्र ते गरीब असले तरी काही काही मार्गांनी त्यांना आणि एकंदरीतच गरीबांना कर्ज, शिष्यवृत्ती वगैरे मिळून असे शिक्षण घेणं शक्य असल्याचं मत मांडलं आहेत. म्हणजे गरीबांना उच्च शिक्षण परवडत असे हा मुद्दा आपणच तर आणला होतात चर्चेत?

In reply to by गॅरी ट्रुमन

अस्वस्थामा 24/08/2015 - 14:45
हो आहे. एनी प्रॉब्लेम?
ही ही ही.. बाकी क्लिंटन भौ अम्रिकेसारखेच मस्त अ‍ॅटिट्युड घेऊन वावरत असता हे भारीय. :)

तुडतुडी 24/08/2015 - 13:25
हो ना . आणि देशासाठी काहीही न करता परदेशात संपूर्ण योगदान देणार्यांचं एवढं कौतुक कशाला ? का तर फक्त भारतीय वंशाचा आहे म्हणून . इंग्लंड , अमेरिकेतल्या एखाद्या माणसाची नियुक्ती भारतातल्या उच्च पदावर झाली तर तिकडे त्याचं असं कौतुक होतं का ? त्याच्या गावाला केक बिक कापला जातो का ? बावळटपणा नुसता

In reply to by तुडतुडी

गॅरी ट्रुमन 24/08/2015 - 13:42
इंग्लंड , अमेरिकेतल्या एखाद्या माणसाची नियुक्ती भारतातल्या उच्च पदावर झाली तर तिकडे त्याचं असं कौतुक होतं का ?
असे काही लोक सांगू शकाल का?

In reply to by तुडतुडी

द-बाहुबली 24/08/2015 - 14:13
का तर फक्त भारतीय वंशाचा आहे म्हणून .
हो. काय त्रास आहे तुम्हाला ? इथे एक भारतीय म्हणून आत्मविश्वास नुकताच कुठे तरुणांमधे उभारु लागला आहे त्यांची स्वप्ने आत्ता कुठे विस्त्रुत (विस्तृत न्हवे ब्रॉड) होत आहेत मग हा सुर कशाला ? नाही दिलं भारताला योगदान... जमलं नाही, इछ्चा नाही असं नाही. म्हणून एक भारतिय म्हणून इतरांनी आपणही एखाद्या राक्षसी कंपनीचे सिइओ बनु शकतो याचा आत्मविश्वास साजरा करु नये का ? - भारताबद्दल प्रचंड अभिमान असलेला पण विषेश प्रेम नसलेला.

In reply to by द-बाहुबली

गॅरी ट्रुमन 24/08/2015 - 14:19
नाही दिलं भारताला योगदान... जमलं नाही, इछ्चा नाही असं नाही. म्हणून एक भारतिय म्हणून इतरांनी आपणही एखाद्या राक्षसी कंपनीचे सिइओ बनु शकतो याचा आत्मविश्वास साजरा करु नये का ?
योगदान अगदीच दिले नाही असे नाही. भारतासाठी योगदान भारतात राहूनच देता येते असे नाही.परदेशात चांगले काम करून भारत या नावाचा दबदबा निर्माण करायला हातभार लावणे हे पण भारतासाठीच योगदान आहे. अमेरिकेतील ज्यू लॉबीमुळे अमेरिका इसराएलला फार काही करू शकत नाही.तसा दबदबा जगभर भारतीयांचा व्हायला हवा. आणि हो आत्मविश्वास तर नक्कीच साजरा करायला हवा. - भारताबद्दल प्रचंड प्रेम असलेला पण विषेश अभिमान नसलेला (गॅरी ट्रुमन)

In reply to by गॅरी ट्रुमन

द-बाहुबली 24/08/2015 - 15:18
सहमत आहे. पण ही बाब लोकांना सामजावणे अवघड असते ज्यांना भारतातुन निघुन जाणार्‍या व्यक्ती देशाप्रती काहीच देणे ठेवत नाहीत असे मानतात. आणी स्वतःलाच त्यांच्यापासुन तोडुन घेतात.

इरसाल 24/08/2015 - 13:57
ज्यांच्या नावातच "पिचलेले" असावेत असा धडधडीत अर्थछटा प्रतित करणारा "पिचाई" शब्द येतोय त्याच्या गरीबीवर काय शिंतोडे उडवत आहात.(शिंतोडे उडवु र्‍हायले बे ?)

अरे होऊ द्या की गवगवा जरासा सुंदर पिचईंचा ! आतापर्यंत हातांच्या बोटावर मोजण्याइतकेच भारतीय लोक जगातल्या पहिल्या पाचात असलेल्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षपदापर्यंत पोचलेत. त्यात एका भारतियाची भर पडली ही काय अभिमानाची गोष्ट नाही ? शिवाय असा माणूस भारतातल्या निम्न/मध्यम वर्गातून काय अगदी सधन वर्गातून आला असला तरी जागतीक स्तरावर (आणि मुख्य म्हणजे अमेरिकन प्रणालीतून पुढे आलेल्यांशी) स्पर्धा करून ते पद मिळवणे ही विशेषच गोष्ट नाही का ? अश्या लोकांचे जरासे जास्त वाढवून वर्णन केले गेले (सुंदरचे तसे वर्णन झाले असा माझा अजिबात दावा नाही) तर ते इतर अनेक महत्वाकांक्षी भारतियांना प्रेरणादायक ठरून... "हे पण होऊ शकते" इतकी जरी त्यांच्या मनाची खात्री झाली तरी सुंदरचा विक्रम मोडणारा दुसरे सुंदर२,३,४,५ व्हायला मदतच होईल, नाही का? शिवाय, सम्राटांच्या, राजकीय नेत्यांच्या आणि औद्योगिक धुरीण यांच्या संबंधींच्या लोकवदंता (अनेक्डोट्स) हे साम्राज्ये, सत्तास्थाने आणि उद्योग अधिकाधिक वाढविण्यासाठी मोठे उपयोगी साधन आहे, हे व्यवस्थापनातले सर्वमान्य तत्व आहे. त्यामुळे, अश्या गोष्टी जोपर्यंत अंध व्यक्तीपूजेसाठी अथवा इतर काही गैरफायदा घेण्यासाठी वापरल्या जात नाहीत तोपर्यंत फायदेशीरच ठरतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुख्य म्हणजे, दर गल्लीबोळात आपण निकम्म्या भ्रष्ट नेत्यांच्या नावाच्या पाट्या आणि फ्लेक्स आपण रोज बघतोच आहोत ना ?... त्याला आपण विरोध करतो काय ? पिचईसारख्यांची एखाद्या वेळची थोडी वाढवून सांगितलेली स्तुतीही भारतीयांमध्ये काहीतरी सकारत्मकच फरक घडवेल. तिला उगी विरोध कशाला ?!

असंका 24/08/2015 - 14:42
थोडी वाढवून सांगितलेली
म्हणजे बदल करून सांगितलेली...
तिला उगी विरोध कशाला ?!
आहे अशी बातमी न सांगता लेखकाच्या मनाप्रमाणे केलेले बदल हे धोकादायकच. त्यात तुम्ही असे बदल हवेसे, असे बदल नकोसे हे नाही ठरवू शकत. कारण हितसंबंध हे परस्परावलंबी आणि परस्परविरोधी दोन्ही प्रकारचे असतात. या अनिश्चित जगात ज्या ज्या गोष्टींनी अनिश्चितता वाढते, तिला विरोध करायलाच हवा. त्याला "उगीच विरोध" म्हणणं योग्य नाही. बातमी वाचताना मला अशी शंका मनात यायला नको की या लेखकाने काही तरी बदलून लिहिलं आहे. त्याने अनिश्चितता निर्माण होइल.

In reply to by असंका

त्या प्रतिसादावर अगोदर... त्यामुळे, अश्या गोष्टी जोपर्यंत अंध व्यक्तीपूजेसाठी अथवा इतर काही गैरफायदा घेण्यासाठी वापरल्या जात नाहीत तोपर्यंत फायदेशीरच ठरतात. असे लिहिले आहे ! :)

संदीप डांगे 24/08/2015 - 19:31
सुंदर पिचईचं उदाहरण घेतलं म्हणून बर्‍याच लोकांना खटकलेलं दिसतंय. कुणाला काही स्वतःहूनच खटकवून घ्यायचं असेल तर माझा नाइलाज आहे. जणू पिचईबद्दल आकस ठेवूनच मी हा धागा लिहिलाय असं काहींच्या प्रतिसादात जाणवतंय. अनिवासी/मूळ भारतीयांच्या परदेशातल्या यशाने हुरळणारे व त्यांना नाके मुरडणारे असे बहुतेक दोन गट जालावर नेहमीच दिसतात. असे काही विषय दिसले की दोन्ही गट आपआपली हत्यारे परजून युद्धात उतरतांना बघितलेत. त्याबद्दल कुठे 'मोकळं' व्हायच्या कायम तयारीत असलेले हा धागा मिळायलाय तर पूर्वग्रहदूषित मनाने वाटेल ते टायपत सुटलेत. इथे नुसतं सुंदर पिचई एवढे दोन शब्द लिहिले असते तरी तेच झाले असते. अशा लोकांना धाग्याचा खरा उद्देश कळूनही ते जर आपल्याला वाटेल तो अर्थ काढत हुज्जत घालण्याच्याच प्रवृत्तीचे असतील तर त्याला माझा काही इलाज नाही. विवेकानंदांच्या धाग्यावर मारवा यांनी 'कमी महत्त्वाच्या भागावर फोकस करून पाहिजे तो अर्थ काढला' म्हणून बोंबाबोंब झाली. या धाग्यावर तरी काही लोक तेच करत आहेत. चर्चेचे मुद्दे/प्रश्न काय होते?
माध्यमांमधून खर्‍या गरिबीची अवहेलनाच होत नाहीये का? की कुणीही यशस्वी झाला की तो गरिबच होता हे अट्टाहासाने सांगितलं तरच त्याच्या यशाला उजळपणा येतो? कि लोकांना असलंच काही (रॅग्स टू रिचेस) वाचावंसं वाटतं म्हणून पत्रकार रंगवतात कहान्या? मुन्शीपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास केला वैगेरे सांगितले की फार रोम्यांटीक वाटतं.. नाही का? तुम्हाला काय वाटतं मंडळी...? ऐंशीच्या दशकात जे विशीत होते त्यांच्याकडून ऐकायला आवडेल.
माझ्या धाग्यात वा प्रतिसादात सुंदर पिचई वा त्यांच्या यशाबद्दल कुठलाही खोचक उल्लेख वा रोख नाही. माझा रोख केवळ आणि केवळ दोन काळातला फरक माध्यमांत कसा दाखवला जातो याचे उदाहरण देणे यावर होता. त्यावर काही माहिती मिळावी, त्याकाळातला मध्यमवर्ग, आताचा मध्यमवर्ग, बदलते राहणीमान, विचार यावर चर्चा व्हावी असा उद्देश होता. राहता राहिला तो सुंदर पिचई बद्दलच्या माझ्या वैयक्तिक मताचा प्रश्न, जो फारच क्षुल्लक आहे माझ्यासाठी. तर त्यांनी जे यश मिळवले त्याचा अभिमान आहेच, पण स्वतःची कंपनी उभारली असती तर हा अभिमान (माझ्या मनात असलेला, इतरांनीही तसेच वाटून घ्यावे असे नाही) द्विगुणित झाला असता. बरेच भारतीय मोठ्या विदेशी कंपन्यांत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आजकाल त्यात काही नवल-विशेष नाही. येणार्‍या भारतीय पिढ्यांसमोर असे नोकरपेशा आदर्श ठेवण्यापेक्षा स्टीव जॉब्स, बील गेट्स, झुकरबर्ग, बन्सल्स, मित्तल, इत्यादी 'समस्यांवर उपाय शोधून त्याचे व्यवसाय तयार करणार्‍या व जगाच्या व्यवहाराची भाषा बदलणार्या लोकांचे' आदर्श ठेवणे 'माझ्या वैयक्तिक मतानुसार' आवश्यक आहे. याचा अर्थ नोकर्‍या करणारे फक्त पाट्या टाकतात असे माझे मत आहे असे नाही. ज्याला जिथे योग्य संधी मिळते, मग भले ती नोकरीत असो, व्यवसायात असो, भारतात असो वा परदेशात असो, त्याने त्या संधीचे सोने केले तर मला आनंदच वाटेल. तिथे वादाचा मुद्दाच कुठे येतो? इथे कोण भारतीय, अभारतीय, इथे राहिले, तिकडे गेले, भारतासाठी काय केले वैगेरे प्रश्न माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाहीत. भारतीय कुठेही राहू दे, त्यांनी स्वतः काहीतरी निर्माण करावे, शोधावे, उद्योग उभारावे. एक भारतीय म्हणून मला त्याचा जास्त अभिमान वाटेल. त्यांनी किती गरिबीत दिवस काढले यावर रोख असल्यापेक्षा त्यांनी जगात काय बदल घडवले, काय योगदान दिले यावर चर्चा व्हाव्यात असे माझे मत आहे. माझ्या वैयक्तिक मताचा आदर नसणार्‍यांच्या व आधी भोचकपणा करून मग वेड पांघरून पेडगावला जाणार्‍या पळपुट्या शहाजोगी (पिचाइच्या स्वयंघोषित) वकिलांच्या वैयक्तिक प्रतिसादांना मी काडीची किंमत देत नाही. लेख व प्रतिसादांत माझी भूमिका/मतं मांडली आहे. याउपर योग्य त्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होत असेल तर स्वागत आहे.

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली 26/08/2015 - 19:24
माझ्या वैयक्तिक मताचा आदर नसणार्‍यांच्या व आधी भोचकपणा करून मग वेड पांघरून पेडगावला जाणार्‍या पळपुट्या शहाजोगी (पिचाइच्या स्वयंघोषित) वकिलांच्या वैयक्तिक प्रतिसादांना मी काडीची किंमत देत नाही.
विवेकानंदांच्या धाग्यावर मारवा यांनी 'कमी महत्त्वाच्या भागावर फोकस करून पाहिजे तो अर्थ काढला' म्हणून बोंबाबोंब झाली. या प्रतिसादात तरी असेच आपले कडुन घडले आहे. पण अर्थातच आपण त्याला किंमत देणार नाही असे (म्हणत) असल्याने आपण विरोधाभासी लिहता म्हणायची द्वीरुक्ती टाळतो. बाकी प्रतिसाद उल्लेखनीय.

पैसा 26/08/2015 - 22:13
"तीनच" खोल्यांचं घर होतं, 'स्कूटर'वरून चौघे फिरायचे, 'साधा' टेलिफोनही नव्हता (१९८५), तो आणि त्याच्या भावाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागायचं..
१९८५ साली गरीब? मी १९८७ साली बँकेत नोकरीला लागले तेव्हा माझा पगार महिना १०५० रुपये होता. घराचे कर्ज फक्त स्टाफला मिळत असे. त्याची लिमिट जास्तीत जास्त दीड लाख रुपये होती. त्यात साधारण २ लाख रुपये किंमतीचा फ्लॅट कसाबसा घेता यायचा. इतर पब्लिकला घराचे कर्ज जाम महाग असायचे. मुंबईत घर घेणे तेव्हाही दुरापास्त होते. डोंबिवली ठाणे वगैरे भागात रहाणारे लोक बहुधा वन रूम किचनचे लहानसे फ्लॅट घेत असत. चेन्नै हे मुंबईप्रमाणे मेट्रो असल्याने तिथे परिस्थिती वेगळी असेल असे वाटत नाही. तीन खोल्यांचे घर म्हणजे लैच मोठी उडी झाली. कोणाकडे बजाजची स्कूटर असलीच तर बहुधा सेकंड हँड असायची. सायकली फ्याशन म्हणून नव्हे तर गरज म्हणून वापरात होत्या. साधा टेलिफोन कोणाकडे असायचा? अगदी १९९० सालीसुद्धा टेलिफोन सहज मिळत नव्हते. बहुतेक १९९५ मधे आमच्याकडे टेलिफोन आला. आणि १९९८ ला डायल अप इंटरनेट. मात्र १९८५ साली आम्ही गरीब नक्कीच नव्हतो. भले श्रीमंत म्हणता येणार नाही, पण खाऊन पिऊन सुखी मध्यमवर्गीय. सुंदर पिचाईचे वर्णन गरीब घराचे नक्कीच नाही. त्या काळातले कोणत्याही प्रातिनिधिक मध्यमवर्गीय घराचे आहे. तीन खोल्यांचे घर म्हणजे बहुतेक उच्च मध्यमवर्गीय असावेत.

In reply to by पैसा

पैतै अशाच तंत्रकुशल बनल्या नाहीत. १९९८ साली फार कमी लोकांकडे इंटरनेट जोडणी असायची. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या शहरात एकच सायबर कॅफे होते. एका तासाला बहुधा ₹१२० की ₹१५० शुल्क होते. माझ्या घरी २००१ मध्ये संगणक घेतला. २००२ मध्ये इंटरनेट जोडणी काही दिवस घेतली होती. महाग पडत असल्याने काही महिन्यांनी काढून टाकली.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 26/08/2015 - 22:47
आधी डायल करा. मग वाट बघत बसा. गूगल सर्च पेज ओपन होईपर्यंत भाजीला फोडणी घालून यायचं. दुसरं पेज ओपन होईपर्यंत भाजी शिजायची. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला दिवसभर इंटरनेट फुकट असायचं आणि रात्री बहुतेक ११ नंतर. पण स्पीड काय विचारायचं नाही. जीमेल नंतर आली. आधी एमेसेन. माझा पहिला ईमेल आयडी @msn.com वाला आहे.

In reply to by पैसा

शब्दबम्बाळ 26/08/2015 - 23:03
टीईईईईई टू टुक टुक टुक.....टुक टुक टुक ट्याव ट्याव काय भारी आवाज यायचा डायल अपचा!! :D अस वाटायचं कि आपला कम्प्युटर बोलतोय आपल्याशी त्याच्या भाषेत... आपण खूप काहीतरी भारी शोध लावणारे आता अशी फिलिंग यायची मला तर! :)

In reply to by श्रीरंग_जोशी

रेवती 27/08/2015 - 22:27
आम्ही ९९ साली एक रुपाया प्रतिमिनिट असे इंटरनेट वापरले. नंतर ते ५०, ३०, २५ रूपयांपर्यंत कमी होत गेले.

In reply to by रेवती

असंका 27/08/2015 - 22:36
व्ही एस एन एल द्यायची डायल अप सेवा...त्यांचं ऑफीस लय कुठल्या कोपर्‍यात होतं पोलीस परेड ग्राउंडच्या तिकडे पुण्यात... काय शोधाशोध केली होती.... साई इंटरनेट की कायतरी नाव होतं त्यांचं. इंटरनेटचा पॅक वेगळा आणि फोनचं बिल वाढून यायचं ते वेगळं ...

In reply to by पैसा

गॅरी ट्रुमन 27/08/2015 - 10:30
चेन्नै हे मुंबईप्रमाणे मेट्रो असल्याने तिथे परिस्थिती वेगळी असेल असे वाटत नाही. तीन खोल्यांचे घर म्हणजे लैच मोठी उडी झाली.
वन बी.एच.के घरालाही तीन खोल्यांचेच घर म्हणता येईल.मी लहानपणी ठाण्याला होतो तेव्हा आमचेही वन बी.एच.के च घर होते. तीन खोल्यांचे घर म्हणजे तीन बेडरूमचे घर अशी कन्सेप्ट काही ठिकाणी सध्या वापरात आहे.ती त्या काळी होती असे वाटत नाही. अर्थातच पिचाई हे श्रीमंत नसले तरी खाऊन पिऊन सुखी मध्यमवर्गीय असे नक्कीच म्हणता येईल.

नमकिन 27/08/2015 - 12:09
स्थल, काल, कार्य, संपन्न, असे मुद्दे असुनही गाडी भरकटुन (वैचारिक चुंबकीय शक्ती) गेली कर्तुत्व विषयाकडे. कदाचित मूळ लेखन परदेशी भाषेत झाले असावे (परदेशी ठिकाणी) त्या अाधारे पुढील सर्व बेतलेले दिसत आहे, त्यात "ष्टोरी" छापन्याची घाई असणार, मग कुठला स्थलकाल अभ्यास! चालायचंच. स्पर्धा, दर्जा दुर्लक्षित.

शरभ 27/08/2015 - 13:16
एक माणूस म्हणून बघताना, अशा एखाद्या गोष्टीचा उदो उदो केला जावा का ? भारतीय आहेत म्हणुन.... अभिमान वाट्तोय. मराठी असते तर ......अत्याभिमान वाट्ला असता मराठी अमुक एक जातीचे असते तर्...उर फूटून आलं असतं आडनाव बंधू असते तर... अती होतय, आवरा....

In reply to by शरभ

पूर्वीच्या काळी जी मर्यादेत कवतिके व्हायची तेच बरे असे म्हणावे लागतेय असे ह्यांचे मत. सुंदर भारतीय म्हणून भारतीय खूष सुंदर चेन्नईचा म्हणून चेन्नईकर खूष. सुंदर तामिळ ब्राम्हण म्हणून अय्यर्,अय्यंगार खूष. सुंदर आय.आय.टी.चा म्हणून आय आय टी मेटॅलर्जीवाले खूष. सुंदर आय.टी.त म्हणून आमचे हिंजवडी,मगरपट्टावाले खूष. सुंदर एन.आर.आय. म्हणून आमचे अमेरिकन एन.आर.आय. खूष.

राही 27/08/2015 - 17:32
भारतातल्या मध्यमवर्गाच्या विस्तारीकरणाची सुरुवात बँकांच्या राष्ट्रीयीकरणापासून झाली असे मानता येईल. तोपर्यंत अर्थक्षेत्राशी कारकूनवर्गाचा फारसा संबंध नव्हता. राष्ट्रीयीकरणानंतर निमशहरी आणि शेतमालाच्या बाजारपेठांच्या गावातही सरकारी बँका सक्तीने का होईना, पोचल्या. शाखावृद्धीमुळे हजारोंना नोकर्‍या मिळाल्या. आर्थिक जगताचे एक अद्भुतरम्य दार सामान्य भारतीयांसाठी उघडले. परकीय चलन, मोठ्या कंपन्यांचा पतपुरवठा, त्यांचे व्यवहार, शेअर बाजार अशा कधी न ऐकलेल्या जगात मध्यमवर्ग डोकावू लागला. एक प्रकारे अलीकडच्या आय.टी. क्रांतीचेच ते एक मिनिरूप होते. त्यानंतर सुमारे दहा वर्षांनी एशिअन गेम्सच्या निमित्ताने टेलिविजनचे जाळे भारतात पसरले. हे गेम्स पाहाता यावे म्हणून दर दिवशी एक टीवी टॉवर या वेगाने सुमारे एकदीड वर्ष टॉवर (वसंत साठे यांच्या धडाडीमुळे) उभारले गेले. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नोकरीधंद्याच्या संधी वाढल्या. टीवीवरून संपन्न जगताची झलक सर्वसामान्यांना दिसली. कन्ज़्यूमर गुडसची मागणी आणि उत्पादन वाढले. यानंतर संगणकयुगाचा पाया घातला गेला. गावोगावी टेलिफोन एक्स्चेन्जिस पोचली. संपर्कक्रांतीची ती सुरुवात होती. शहरात डिजिटल युग अवतरले आणि त्यामुळे निकामी झालेली एक्स्चेन्जिस निमशहरी भागात धाडली गेली. या नंतर भारतीय मध्यमवर्गाने मागे वळून पाहिले नाही. साधारणपणे १९५० ते १९७५ पर्यंत गरीबी होती. लाल बहादुर शास्त्रींनी १९६५च्या युद्धादरम्यान भारतीयांनी वर्षभर एक दिवस उपास करावा म्हणजे ५५ कोटी जेवणे वाचतील असे आवाहन केले होते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. १९७१च्या पाक युद्धानंतर समारंभातल्या जेवणावळींवर निर्बंध आले होते. फक्त पन्नास माणसांना जेवण घालता येई. किती अन्न शिजले आहे ते तपासण्यासाठी पोलीस धाडी घालीत. मग एकावेळी फक्त पन्नास जणांचा स्वयंपाक शिजवण्याची शक्कल लोकांनी काढली. काहींनी तांदुळाऐवजी वर्‍यांचा भात वाढला. नंतर कृषिक्रांतीमुळे काळ्या बाजारातून साखर किंवा राशनचे धान्य घेण्याची गरज मध्यमवर्गाला राहिली नाही. चैनीच्या वस्तूंची खरेदी वाढली. पूर्वी फर्निचर म्हणजे एक गोद्रेज किंवा गद्रेचे कपाट, एक सिंगर मशीन, एक लोखंडी खाट आणि बसायला खुर्च्या इतक्याच वस्तू असत. दिवाळीला मोती साबण ही चैनीची परमावधी होती. बजाज स्कूटरसाठी पाच पाच वर्षांची प्रतीक्षायादी असे आणि डिलिवरीच्या वेळी तुफान काळाबाजार चाले. कित्येक तर ऑन पैसे मिळवण्यासाठी बुकिंग करून ठेवीत. मारुतीने स्कूटरची मिजास उतरवली. मराठी मध्यमवर्ग शेअर बाजारात १९७५-८० नंतर उतरला. उद्योगांच्या विस्तारीकरणामुळे खूप प्रायमरी ऑफर्स (आय.पी.ओ) असत. त्या वेळी दहावीस शेअर्स लागलेले लोक आज कोट्यवधीचे मालक असतील, जर त्यांनी ते विकले नसतील तर. या बरोबरच चाळ आणि वाडा संस्कृती लयाला जाऊन वन बी एच के संस्कृती आली. त्या काळचा उच्चमध्यमवर्ग उदयास आला. दारिद्य तेव्हाही होते, आताही आहे. पण दारिद्र्याच्या व्याख्येत फरक झाला आहे.

सुंदर पिचई एका थोरल्यामोठ्या कंपनीचे सी.इ.ओ. झाले
माझ्या उत्त्पन्नात काही फरक पडलाय का? मग मी ते वाढायसाठी अजुन कष्ट करु का सुंदर पिचईंचे गोडवे गात फिरु? हे गृहस्थ पुर्वी गरिब होते का सोन्याच्या पलंगावर झोपत होते ह्याची वायफळ चर्चा कशाला पाहिजे? त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं म्हणा आणि त्यातुन शिका ना ४ गोष्टी.

शरभ 28/08/2015 - 12:24
हा असला उदो उदो करुन काय मिळनारे? अहो, असेच एक भारतीय एका मोठ्या फर्मचे सी इ ओ झाल्यावर, भारतात किती तरी जॉब कट झाले. Employee वरुन vendor झालो, हा स्वानुभव आहे. त्यावेळी नोकरी जाउन बेकार झालो नाही हेच नशीब. तस्मात, ह्या लोकांकडून शिकावं आणि पुढे जावं हेच उत्तम. He deaserved it, its his own achievement, that's it.
सुंदर पिचईबद्दल लेख वाचला लोकमतमधे... आजकाल कुणीही यशस्वी झाला की तो कसा गरिबीत जगला याचं फारच चर्वितचर्वण करतात बॉ पत्तर्कार लोक. काय तर म्हणे "तीनच" खोल्यांचं घर होतं, 'स्कूटर'वरून चौघे फिरायचे, 'साधा' टेलिफोनही नव्हता (१९८५), तो आणि त्याच्या भावाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागायचं.. अरे काय राव गरिबाची चेष्टा करताय. हे ऐंशीच्या दशकातल्या एका साध्या गरिब मध्यमवर्गीय कुटूंबाचं वर्णन आहे का? आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणारा गरिब मध्यमवर्गीय?