Skip to main content

महाभारत व रामायणातील अतिशयोक्ती

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 26/10/2015 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते. 1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही. 2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला. 3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले. 4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. 5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली. 6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे. 7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला. 8. रावणाला दहा तोंडे होती. 9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 41094
प्रतिक्रिया 169

प्रतिक्रिया

रामायण, महाभारत आणि सर्व देशातील पौराणिक कथा या थोर कवींच्या कल्पनाविलासाचा परिपाक आहेत. यात आपल्या परीने मीही काही भर घातलेली आहेत. ते सर्व लेख खालील धाग्यात एकत्र सापडतील. ज्यांनी अद्याप वाचले नसतील त्यांचेसाठी दुवा देतो आहे: अजब महाभारत http://www.misalpav.com/node/32588

जाता जाता..... .. .. पांडवांचा जन्म - मंत्राने देवतेचे आवाहन केल्याने देवता येते,आणि डायरेक्ट बाळ हातात ठेऊन जाते,हे चूकीचे आहे. त्याचे असे आहे,मंत्राने देवतेचे आवाहन केल्यास ती देवता आवाहन करणार्याच्या अधीन होते,आता अधीन होणे म्हणजे काय? आणि कुंतीला तीन पुत्र का हवे होते?एक का नको? तीन पुत्र हवे होते तर त्यांची वये एकसारखी हवीत ना? मग युधिष्ठिर जेष्ठ त्यानंतर काही वर्षांनी भीम मग अर्जुन. मला काय म्हणायचे ते कळले का? मुलं डायरेक्ट हातात आली नाहीत,त्यांचा क्रमाने जन्म झाला गर्भधारणा होऊन. पुढे द्रौपदीनेही तोच आपल्या सासूचा वसा पुढे चालू ठेवला.

In reply to by याॅर्कर

पांडवांचा जन्म - मंत्राने देवतेचे आवाहन केल्याने देवता येते,आणि डायरेक्ट बाळ हातात ठेऊन जाते,हे चूकीचे आहे.>>> हे मलाही माहित आहे. कुंतीला यमापासून युद्धिष्टर, इंद्रापासून अर्जून, वायूपासून भीम. माद्रीला अश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेव झाले. देव म्हणजे मानवच पण त्यांनी चांगले काम केले म्हणून ते देव. द्रोपदीला मुले स्वत:च्या नवर्यापासून (पाच पांडव) पासून झाले. कुंती व माद्री सारखे नियाेग पद्धतीने नव्हे. संपुर्ण महाभारत व रामायण म्हणजे अतिशयोक्ती नाही काही गोष्टीत कल्पनाविस्तार आहे.

In reply to by हेमंत लाटकर

संपुर्ण महाभारत व रामायण म्हणजे अतिशयोक्ती नाही काही गोष्टीत कल्पनाविस्तार आहे. क्या रे कांचा बंदुक भि दिखाता है और पिछे भि हटता है. तुमच्या प्रश्णाचे उत्तर तुम्हिच दिले :)

In reply to by हेमंत लाटकर

द्रौपदीचं काय सांगूच नका तुम्ही,आणि ते कौमार्य टिकून राहते म्हणजे काय नेमके? पाच पुरूषांबरोबर संबंध आले कि ही नंतरची सारवासारव कि कौमार्य टिकण्याचा वरदान होतं म्हणे जन्मतः नियोग पद्धतीने झालेला युधिष्ठिर राजा कसा काय बनू शकतो? गादीवर अधिकार राजाच्या ज्येष्ठ पुत्राचा असतो(त्या काळी) आणि तो अधिकार धृतराष्ट्राचा त्यानंतर त्याच्या ज्येष्ठ पुत्राचा म्हणजे दुर्योधनचा.पण धृतराष्ट्र अंध असल्यामुळे तो केवळ कार्यकारी राजा असतो,राज्याभिषेक झालेला नसतो.भीष्मांच्या म्हणण्यानुसार त्याचा हक्क राहत नाही,कारण राजा अंध असू शकत नाही.मग पांडू गादीवर बसतो आणि भीष्म,विदूर इ.च्या मते पांडूनंतर तो हक्क युधिष्ठिराकडे जातो.पण हे पूर्ण चूकीचे आहे.खरा वारसदार धृतराष्ट्र असतो जरी अंध असला तरी, मग त्यानंतर दुर्योधन.आणि ते योग्यतेनुसार युवराजनियुक्तीसाठी रंगभूमी वगैरे ढोंग होतं. खरा अन्याय दुर्योधनबरोबर झालाय. आणि कर्णाला त्याची जात दाखवून अपमान करणारी स्त्री,आणि नंतर त्याच्याकडे त्या नजरेने(?) पाहणारी स्त्री सदाचारी,शीलवान असू शकत नाही. (जांभूळ आख्यायन माहित आहे का?)

In reply to by गणामास्तर

कृष्णदेव यादवाचा मुलगा रामदेवराय तर कृष्णाचा धाकटा भाऊ महादेवराय. कण्हदेवो कटकी आला संगे धाकुटा महादेव होता. कृष्णाच्या मृत्युनंतर रामदेवराय अल्पवयीन असल्याने धाकटा महादेव देवगिरीच्या सिंहासनावर आला. महादेवाच्या मृत्युनंतर रामदेवरायाला राज्य मिळण्याचे ऐवजी महादेवाचा मुलगा आमणदेवास मिळाले. तेव्हा रामदेवरायने उठाव करुन आमणदेवास पदच्युत केले व देवगिरी राजसिंहासनावर अभिषिक्त झाला. आमणदेवे डोळे काढीयले.

In reply to by याॅर्कर

नियोग पद्धतीने झालेला युधिष्ठिर राजा कसा काय बनू शकतो? धुतराष्ट्र, पन्डू, विदुर हे अंबिका व अंबालिकाला व्यासापासून नियोग पद्धतीनेच झाले. हिमालयात अजूनही काही आदिवासीत बहु पती पद्धत अस्तित्वात आहे. पाच पाडवात द्रोपदीमुळे फट पडू नये म्हणूम कुंतीने पाच भावात वाटून घ्या असे सांगितले.

In reply to by हेमंत लाटकर

त्यावेळी दुसरा पर्याय नव्हता,कारण सगळेच नियोग पद्धतीने झाले होते.पण इथे दुर्योधन हा पर्याय आहे ना? सभ्य समाजाची आदिवासींबरोबर तुलना होऊ शकते काय? बहु पती पद्धत त्यांच्यात आहे म्हणून काय हे पण तसेच? द्रौपदीमुळे भावांमध्ये फूट पडण्याइतके पांडव बायले होते काय? आणि ते व्यास पार्ट टाईम जाॅब करत होते काय?

In reply to by याॅर्कर

व्यास पार्ट टाईम जाॅब करत होते काय?
सत्यवतीने वंशविस्तारासाठी सुरवातीला भीष्माला विचारले पण भीष्माने नकार दिला म्हणून सत्यवतीने व्यासाला विचारले. व्यास म्हणजे सत्यवतीला लग्नाआधी पराशरापासून झालेला मुलगा. द्रोपदीला स्वयंवरात अर्जुणाने जिंकले. द्रोपदीचे सोंदर्य बघून युद्धिष्टरचे चित्त ढळले. पांडवामध्ये फुट पाडण्यासाठी दुर्याधनाचे प्रयन्त चालत. व्यास सत्यवतीला लग्नाआधी झालेला असुनही प्रसिद्ध झाले. कर्ण कुंतीला लग्नाआधी झाला पण त्याची सुतपुत्र म्हणून अवहेलना झाली.

In reply to by हेमंत लाटकर

आता सगळं महाभारत सांगता कि काय? . . . . . आपल्या विवेकबुद्धीस काही गोष्टी पटत नाहीत, बाकि महाभारत घडलेच नाही असे मी म्हणत नाही. कोणाच्या भावना दुखावण्याचा काहीही हेतु नाही,मी ही त्याच 'हिंदू'नामक कंपूतील एक जीव आहे.

In reply to by याॅर्कर

सभ्य समाजाची आदिवासींबरोबर तुलना होऊ शकते काय?
आदिवासींना उग्गाच बदनाम करू नका

आपल्या महान प्राचीन हिंदु देवदेवतांची,वेदपुराणांची धागाकर्ते अतिशयोक्ती म्हणुन जी खिल्ली उडवत आहेत त्याची निर्भत्सना करावी तेवढी कमी आहे. -जगबुडी

पुराणकथांवर विश्वास ठेवण्याआधी एकदा तरी त्या तर्कबुद्धीने वाचणे योग्य. नाही म्हणजे त्याला देवाधर्माची जोड आहे म्हणून त्यावर काही बोलायचेच नाही कि काय? याला "धार्मिक दहशतवाद" म्हणतात. . . . .____(एक दिव्य अलौकिक शक्ती आहे हे माननारा याॅर्कर)

4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. पन, तरीबी लालू, मुलायम, अखिलेश, पप्पू ... सारे यादव जित्ते र्‍हायले. काय ऊपेग? याहिले पव्हता यत व्हतं भवतेक.

हर हर..आमच्या टनाटनी धर्मातल्या चूका काढता काय!? परमेश्वर तुम्हाला उकळत्या तेलात फ्राय करो टना टन फ्राय!

In reply to by अत्रुप्त आत्मा

हर हर..आमच्या टनाटनी धर्मातल्या चूका काढता काय!?
शांती, कालसर्पयोग, नारायण नागबली केल्याने आयुष्यात येणार्या अडचणी व संकटे टळतात का?

In reply to by जातवेद

चित्रगुप्तकृत कालसर्पयोग केल्याने काहि टळतात म्हणे.
शांती,कालसर्पयोग,नारायण नागबली,ग्रहांचा जप हे काही खर नसतं. सर्व मनाची समाधानी व पुरोहिताला लाभ.

In reply to by हेमंत लाटकर

चित्रगुप्तकृत कालसर्पयोग नाही, 'कालसर्प'वियोग'. अर्थात याचा ज्योतीष वगैरेंशी काहीही संबंध नसून आहारात बदल करण्याशी आहे. याविषयी माहिती माझ्या खालील लेखात आहे: शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ? http://www.misalpav.com/node/33321

In reply to by हेमंत लाटकर

शांती,कालसर्पयोग,नारायण नागबली,ग्रहांचा जप हे काही खर नसतं. सर्व मनाची समाधानी व पुरोहिताला लाभ. सर आपण एकदम योग्य बोललात, रच्याकने कोकिळ्व्रता बद्दल आपले मत जाणुन घ्यायला आवडेल.

In reply to by होबासराव

केवळ टीआरपी हाच उद्द्येश असला तर मग स्वतःचे मत असायलाच पाहिजे असे नाही, वादग्रस्त होईल असा धागा/वाक्य (उर्फ काडी) पुरेशी असते. ;) :)

In reply to by हेमंत लाटकर

हेला, ३० वर्षांपूर्वी मिपा ही एक कपोलकल्पित कथाच होती. १९८५ साली कोणी जर म्हंटलं असतं की आजपासून काही वर्षांनी मिसळपाव नामे संकेतस्थळावर जगभरातले मराठी भाषिक जमून लेखी चर्चा करतील, तर त्याला लोकांनी वेड्यात काढला असता. किंवा विज्ञानकथालेखक म्हणून डोक्यावर तरी घेतला असता. तस्मात, आपल्या कक्षेबाहेरची माहिती असेल तर घाईघाईने निष्कर्ष काढू नये. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जगात कितीतरी गोष्टी आहेत की ज्या समोर असून आपल्याला त्याचं वैज्ञानिक स्पष्टीकरण देत येत नाही. तसेच अजून कितीतरी गोष्टी असतील की ज्या आपल्याला अजून माहित नसतील. त्यामुळे आपल्याला माहित नाही म्हणून ती गोष्ट जगात नव्हतीच अथवा नाहीच असं होऊ शकत नाही.

In reply to by ट्रेड मार्क

बऱ्याच गोष्टींचे वैज्ञानिक स्पष्टीकरण समजत नाही म्हणून त्या बऱ्याच गोष्टींना शेंदुर फासुन भक्ति करायलाच हवी असेही नाही न बॉस! चौकसपणा हा मुळ मानवी स्वाभाव आहे, अनुत्तरित प्रश्नांना उत्तरे मागायची नाहीत अन वरतुन "ही आपल्या बुद्धीची पातळी" म्हणून स्वतःच स्वतःला थांबवणे हेच असले तर आपला महान धर्म अन एकेश्वरवादी एकपुस्तकवादी धर्मांत अंतर ते काय उरेल?

In reply to by नाना स्कॉच

माझा प्रतिसाद गा. पै. ना अनुमोदन म्हणून आहे. त्यांच्या अथवा माझ्या प्रतिसादात कुठेही शेंदूर फासून भक्ती करण्याबाबत कुठलाही उल्लेख नाही. म्हणणे फक्त एवढेच आहे कि आत्ता आपल्याला माहित नाही म्हणून एखादी गोष्ट पूर्णपणे नाकारू शकत नाही. तुमच्या मनात शेंदूर फासून भक्तीविषयीचे विचार असतील तर त्याच्या समर्थनार्थ अथवा विरोधी कुठल्याच गोष्टीवर मी भाष्य केलेलं नाही. माणसाने चौकस असावेच, प्रश्न हे पडलेच आणी विचारलेच गेले पाहिजेत. परंतू फक्त मी करतो तोच विचार बरोबर आणि मला माहिती आहे तेवढेच सत्य हा हेका नसावा. ज्ञान मिळवण्यासाठी इतरांची मते पण स्वीकारता आली पाहिजेत. अवांतर - कुठल्याही दगडाला शेंदूर फासून देव मानण्याला माझाही विरोधच आहे. भक्तिभाव असणे/ नसणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक मामला आहे. कुठल्याही गोष्टीचे अवडंबर माजू नये. (आपला महान धर्म अन एकेश्वरवादी एकपुस्तकवादी धर्माविषयी टिपण्णी करण्याचे, या धाग्याचा काश्मीर होऊ नये म्हणून, मुद्दाम टाळले आहे.)

बाप मुलास , गाढवाच्या लेका तुला हजार वेळा सांगीतलंय अतियशयोक्ति करत जाऊ नको म्हणून आचार्य अत्रे एकदा एका सभेत आता हे विठ्ठलराव(गाडगीळ) म्हणतात आम्ही अतियशयोक्ति करतो, हे विठ्ठलराव काका साहेबांचे चिरंजीव, क्षणभर थांबून ,ही अतिशयोक्ति नव्हे ना १,३,५ हे प्रत्यक्षात घडू शकते रामायण ,महाभारत म्हणजे चांदो बातल्या गोष्टी न्हवेत याच भान ठेवावं कुसपटं काढणं हे सगळ्यात सोपं काम महाभारतातलया सारखा एखादाश्लोक अतियशयोक्ति असू दे त्यात रचून दाखवावा या धाग्यतून काय सिद्ध करायचे आहे

सर्वच प्रतिसाद वाचले. काही दिवसांपूर्वीच माझ्या मुलीने मला असेच काहीसे प्रश्न विचारले होते... महाभारता मधील अतिशायोक्तीवर. त्यावर मी तिला जे सांगितले ते इथे नमूद करते. आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराज खरेच होते. त्यांनी लहान वयापासून हिंदू राष्ट्राचा ध्यास घेतला आणि त्याप्रमाणे लढाया करून यश मिळवले. या इतिहासाला तशी फार वर्ष झाली नाहीत. तरीही त्यांच्या भोवती काही चमत्कार जोडले गेलेच की. जसे भवानी तलवार शिवाजी महाराजांना भवानी मातेने दिली. महाराजांचा मृत्यू देखील आता थोडा वादात आणि गुढतेत अडकला आहे. त्याचप्रमाणे कदाचित महाभारत लाखो करोडो वर्षांपूर्वी घडले ही असेल. आणि हळू हळू त्याबाबतीत देखील अतिशयोक्तीची जोड मिळाली असेल. कदाचित तो आपला इतिहास असेलही. त्याकाळातील मानव निसर्गाच्या जास्त जवळ असल्याने काही वेगळ्या शक्ती असतीलही त्याकाळच्या मानवात. आणि त्या शक्तीना जास्त भव्य दिव्य रूप पुढे दिल गेल असेल. कदाचित अजून लाख वर्षानंतर शिवाजी महाराज देखील महाभारताप्रमाणे दंत कथा होतील. आणि मग त्यावेळच्या अशाच कोणत्या तरी व्यनीवर त्यांच्या बद्दल काही खिल्ली उडवली जाईल आणि चर्चा होऊन विषय संपेल. कदाचित................................................

हा धागा लिहून मला महाभारत व रामायण या ग्रंथाची खिल्ली उडवायची नाही तर त्यातील काही गोष्टीतील अतिशयोक्ती सांगायची. उदा. कृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला.

का आय्डी हॅक झाला होता? असले पांचट धागे इतर धर्मांविरूद्ध काढण्याचे धाडस आहे काय तुमच्यात? उत्तर माहिती आहे. संपादक मंडळ असल्या टिआरपीछाप धाग्यांवर कारवाई का करत नाही? माझ्यालेखी हे धार्मिक भावना दुअखावणारे धागे आहेत. बरेच दिवसांपासून बघतोय दर २-३ दिवसांनी एक असला धागा येतोच येतो. नाहीतर काहीतरी करून असले विषय इतर धाग्यंवर जाणूनबुजून काढले जातात. आशा आहे की मिपाला धार्मिक भावना दुखवणारे संस्थळ अशी मान्यता मिळू नये वा अशी मिपा संमची इछापण नसावी. स्पष्ट लिहितोय पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असावी. बरेच धागे दुर्लक्षित केले पण आता नाही.

In reply to by अमृत

असे धागे इतर धर्मांविरूद्ध काढण्याचे धाडस आहे काय तुमच्यात?
इतर धर्माचे काय करायचे. आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथा व गोष्टी विषयी आपण बोलायचे.

In reply to by हेमंत लाटकर

इतर धर्माचे काय करायचे. आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथा व गोष्टी विषयी आपण बोलायचे.
आँ म्हणजे आपला तो धर्म आणी इतरांचा तो अधर्म वगैरे मानता की काय ? तसेही अनिश्ट गोष्टी धर्म-जात भेदभाव बघत नसतात. असो मला अंडे आधी निर्माण झाले हे पटत नाही तुम्हाला काय वाटते प्रथम कोंबडे निर्माण झाले असावे की अंडे ?

चला!! कोणीतरी परशु उचलला म्हणायचे एकदाचा! म्हणले फाउल होतोय का काय ह्या धाग्याचा!! मुळात धागाकर्त्याने कुठल्या विषयावर/धर्मावर धागा काढवा हा त्याच्स prerogative (मराठीत सांगा) आहे, तुमच्या भावना दुखावतात तर तुम्ही न वाचण्याचे ऑप्शन आहेच की तुमच्या हातात, शिवाय आमच्या वैयक्तिक मतानुसार "त्यांना सांगा की अगोदर" वाली वृत्तीच हिंदुत्वासाठी सर्वात विघातक आहे असे प्रांजलपणे वाटते.

आख्या महाभारत आणि रामायणातून फक्त नऊच मुद्दे मिळाले! आम्हाला विचारला असतं तर बसल्या बसल्या ३-४ डझन मुद्दे दिले असते की.

In reply to by दत्ता जोशी

आख्या महाभारत आणि रामायणातून फक्त नऊच मुद्दे मिळाले!
अजून बरेच काढता येतील. उदा. दाखल 9 च टाकले. पांडव शुर होते यात वाद नाही. महाभारत युद्ध जिंकण्यासाठी कृष्ण नीतीचा सुद्धा तेवढाच वाटा आहे. उदा. भीष्माला मारण्यासाठी शिखंडीला पुढे करणे. येथे भावना दुखवण्याचा काय प्रश्न आहे ही एक चर्चा आहे.

धागा पिसाट गर्दभ सुसाट खेळ नव्याने जुना जुना ======================= मूळ स्तोत्र

संदर्भ

टीआर्पीसाठी काही विषयः पुण्याला दुगाण्या.. अनिवांशींना देशप्रेमाचा काढा स्वतः सतत ख्वाडा आयटीवाल्यांना उगाच फायटी राजकारणातील गजकरण अर्थात खाजवून खरूज व्याकरणाचे शिकरण आणि बोलीभाषेचा ठेचा आध्यात्माची उशी आणि विज्ञानाची काशी

In reply to by नाखु

घुमून फिरून त्याच चौकात आले ना बे.... कोणाला काय बोलनार आपन तरी गरीब बापडे लोकं? इथल्ला माहौल च कै ठीक वाटू नाय ऱ्हायला. काय करावं गरीबांन् काय उमगत नाय.

In reply to by नाखु

धागा पिसाट गर्दभ सुसाट
तुमचा झाडपन हा धागा कोणत्या प्रकारात मोडतो.

In reply to by होबासराव

प्रतीसादातील संदर्भावर क्लीक करा बराच खजीना मिळेल. अवांतर : मध्यंतरी गायब होतात काय? दादुच्या एका धाग्यावर लै याद काढली आता दादू नाही आणि त्यो धागाबी न्हायी.

In reply to by टवाळ कार्टा

Really? Before we could miss, he came back. Daduji, please allow us to miss you. We will call you...... for sure.

In reply to by प्यारे१

प्यारे मिया तुम्ही पटकन कोणाच्या चड्डीलाच त्यांना न कळत हात घालता बुवा.

इतर सदस्यांच्या भावना दुखवू नयेत म्हणून . . मी याॅर्कर "चारो दिशाओ,धरती,आकाश को साक्षी मानकर यह प्रतिज्ञा करता हूँ कि,आज से कोई भी धार्मिक टिप्पणी नही करूंगा,जिससे किसी कि भावना को ठेच पहुंचे,ना ही मेरा कोई ड्युआयडी था, ना है,ना आगे जाकर बनेगा| यह मेरी अखंड प्रतिज्ञा है| (विजांचा कडकडाट अन् सोसाट्याचा वारा)

In reply to by याॅर्कर

(आणि मंदिरांच्या घंटा वाजल्या)

7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला.
शाळेत असताना साबणाचा वापर करुन पाण्याचे 'सरफेस टेंशन' कमी करणारा प्रयोग केला होता. त्यामुळे अशक्य वाटत नाही.
9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
हनूमानात अख्खा पर्वत उचलून उडाण्याची शक्ती होती, तर राम सेतू बांधायच्या भानगडीत कशाला पडला, बसवायचे होते सगळे सैन्य एखाद्या पर्वतावर, तो पर्वत उचलून केले असते उड्डान हनूमानाने लंकेकडे. कदाचीत रामाला ते कमीपणाचे वाटले असेल. मग बसला पाण्याची पातळी कमी करून ,दगड टाकून सेतू बांधायला. राम व त्याचे सैन्य सेतू बांधत असताना तिकडे रावणाला ह्याचा सुगावा कसा लागला नाही. आणि लागला असेल तर लंकेच्या किनार्‍यापर्यंत सेतू बांधेपर्यंत रावण हाताची घडी तोंडावर बोट ठेवून का बसला होता. किनार्‍यावर आपले सैनिक जमा करून रामाच्या सैन्यावर हल्ला का केला नाही.

1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही.
आपण हटयोग अभ्यासावा त्यात हे प्रकरण सामाविश्ट आहे. तुम्हीही तुमेच कौमार्य यापध्दतीने टिकवु शकाल, द्रौपदी नसलात तरी. अथवा पुरुष असाल तर समागम करुन/ विर्यपात झाल्यावर ते परत उलट शोशुन घेउ शकाल. या सर्व यौगीक क्रिया होत अगदी विपश्यनेप्रमाणेच प्रॅक्टीकल अन निव्वळ शारीराच्या अभ्यासाने साध्य. यात इश्वर-नामस्मरण यांची तशी आवश्यक्ता आहेच असे नाही. पण त्यामुळे अभ्यास चालु ठेवण्यास मानसीक बळ मिळते हे खरे आहे. बट नॉट मेंडेटॉरी अ‍ॅटोल. 2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला. होय. कसे ? यासाठी आपणास काही विद्यांचा भ्यास करावा लागेल पण तुम्हला भ्यास नको तर फंक्त शंकासमाधान हवयं तेवडीच आपली तुश्णा/ कुवत असल्याने वादासाठी वाद म्हणून इतर कोणीही त्यांचे पित्रूत्त्व कधीही स्विकारलेले नाही. अथवा कोणाधोब्याने तिच्या चारीत्र्यावर साँशयही घेतला नाही हे वाक्य आपली मती संतुष्ट करेल अशी अपेक्षा आहे. 3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले. मग दुसरे काय घडले असावे असे आपले मत आहे ? 4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. याबाबत माझा विषेश अभ्यास्/वाचन्/अनुभव नाही त्यामुले पास. 5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली. खरे आहे. तुम्ही परशु राम असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. 6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे. तुम्ही श्रीकृष्णावतार असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य, नकारात्मकता अजिबात बाळगुन जगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. 7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला. खरे आहे. तुम्ही राम असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. 8. रावणाला दहा तोंडे होती. खरे आहे. तुम्ही रावण असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. 9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला. १००% सत्य. आपणही हनुमान असता तर हे तुम्ही सुध्दा ते केले असते... तुम्ही हनुमान नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. हनुमान चालीसा वाचत रहा अनुभवही येइल.
नियोग पद्धतीने झालेला युधिष्ठिर राजा कसा काय बनू शकतो? गादीवर अधिकार राजाच्या ज्येष्ठ पुत्राचा असतो(त्या काळी) आणि तो अधिकार धृतराष्ट्राचा त्यानंतर त्याच्या ज्येष्ठ पुत्राचा म्हणजे दुर्योधनचा.पण धृतराष्ट्र अंध असल्यामुळे तो केवळ कार्यकारी राजा असतो,राज्याभिषेक झालेला नसतो.भीष्मांच्या म्हणण्यानुसार त्याचा हक्क राहत नाही,कारण राजा अंध असू शकत नाही.मग पांडू गादीवर बसतो आणि भीष्म,विदूर इ.च्या मते पांडूनंतर तो हक्क युधिष्ठिराकडे जातो.पण हे पूर्ण चूकीचे आहे.खरा वारसदार धृतराष्ट्र असतो जरी अंध असला तरी, मग त्यानंतर दुर्योधन.आणि ते योग्यतेनुसार युवराजनियुक्तीसाठी रंगभूमी वगैरे ढोंग होतं. खरा अन्याय दुर्योधनबरोबर झालाय. आणि कर्णाला त्याची जात दाखवून अपमान करणारी स्त्री,आणि नंतर त्याच्याकडे त्या नजरेने(?) पाहणारी स्त्री सदाचारी,शीलवान असू शकत नाही. (जांभूळ आख्यायन माहित आहे का?)
हे असले विचार होते म्हणूनच कौरवांना रट्टे पडले पांडवांकडुन. पण तुम्हाला आम्हला मात्र तेच वाचुन अथवा लिहुन फरक पडनार नाही कारण ना तुम्ही कौरव ना आम्ही पांडव.. त्यामुळे जे प्रत्यक्षात घडून गेले व कौरवांना रट्टे बसले त्याचे कदापी वैशम्य मनाशी बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा.

In reply to by द-बाहुबली

प्रतिक्रिया देवून वेळ दवडू नका, तठस्थ मनाने आयुष्य एंजाॅय करा. . . . . .बाकि, भारत-चीन युद्धात भारताने रट्टे खाल्ले म्हणायचे?