Skip to main content

पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर.

लेखक बबलु यांनी रविवार, 30/11/2008 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच आलेली म.टा. च्या संस्थळावरील मुख्यपृष्ठावरील बातमी... अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेले एक लाख सैन्य हलवून ते भारताच्या सीमाभागाजवळ तैनात करणे आवश्यक असल्याचे पाकिस्तानने नाटो आणि अमेरिकन लष्कराला कळवले आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3775546.cms

वाचने 4259
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

बघा हे पाकडे स्वसंरक्षणासाठी किती तत्पर आहेत ते !!!!! हिंदुस्तान फक्त चर्चा करत राहणार !!! मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

In reply to by मदनबाण

अहो आपण सुरुवात केली ना...सर्व राजकीय पक्षांनी राजकारण करायला सुरुवात केलीय..एक दुसरयावर आरोप प्रत्यारोप होतायेत..जेव्हा साले हे पाकडे भारतात घुसतील तेव्हा कुठे कदाचित आपल्या राजकारण्यांचे डोळे उघडतील .. नाहीतर आपली सामान्य जनता आहेच मरायला आणि बहादुर सैनिक आहेतच लढायला.. स्वप्निल

अरे,, त्यांना कितिही सैन्य आणूदे.... आपले जवान पुरुन उरतील. आपली आर्मी/नेव्ही/एअरफोर्स चिंधड्या उडवतील त्यांच्या.... .............. ..................पण....................... आपल्या "माननीय" नेतृत्वाने निर्णय तर घ्यायला हवा.... त्याचं काय ?

In reply to by बबलु

सहमत. आहे आपल्याकडे भवानी तलवार. एक घावात शत्रुला यमसदनी धाडेल / नेस्तोनाबुत करेल अशी. अरे, पण वेळेत म्यानातुन काढाल तर ना?? - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

वर सांगताय की भारतानी सुद्धा सीमेवर लष्करी हालचाल सुरु केली आहे म्हणुन.. स्वप्निल

आय बी एन लोकमत वर सांगताय की भारतानी सुद्धा सीमेवर लष्करी हालचाल सुरु केली आहे म्हणुन आनंद... चला कुठेतरी आशेचा एक किरण दिसतोय तर.. ....बबलु

आता चिदंबरम आणि मंडळी काय करतात ते बघू.

In reply to by बबलु

चिदंबरम काही करणार आहे ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे हे बघुन आनंद झाला.

पाकिस्तानची पश्चिम सरहद्द मोकळी करण्याचा पाकिस्तानी आतिरेक्यांचा डाव यशस्वी होतोय तर.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

अरे हो की!! मास्तर तुमच्या तर्कशुद्धतेला __/\__ काय डाव खेळला साल्यांनी.. भारत कसाहि वागला तरी ते त्यांना हवेच आहे. बुद्धीबळात काहिहि करून समोरच्याला हवी ती चाल करायला भाग पाडण्यासारखं आहे हे! :( -(गोंधळलेला) ऋषिकेश

हा पाकिस्तानी सैन्यदलाचा केवळ एक डाव आहे . ह्या निमिताने सीमेवर गंभीर परिस्थीती निर्माण केल्याचे भासवायचे. लोकनियुक्त सरकार पाकिस्तानात आले की, त्यांच्या सैन्यदलांना आवडत नाही. त्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी पाकि सैन्यदल मग उचापती सूरू करते. मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला किंवा सीमेवर सैन्याची जमवाजमव हे त्या उचापतींचेच भाग आहेत. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

हे युद्ध होऊदेच आता. खूप झालं. पाकची हालचाल ही अपेक्षितच होती... आता भारतानेही निर्णायक खेळी खेळावी. देवा.. आमच्या सोकॉल्ड नेतृत्वाला सद् बुद्धी दे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मित्रांनो ... पाकीस्तान फारच ..डिप्लोमॅटिक .. वागायला लागलाय .. ठिकाय मग .. पाकीस्तान (अमेरीकेस): भारताने आमच्यावर अणूबाँब टाकला. भारत : ऊप्स ... चान्द्र्यान पडलं वाटतं ... सॉरी .. नो ओफेंस ...

भारताच्या लोकसंख्येचा योग्य वापर करण्याचि हिच वेळ हाय -- परतेकान फकस्त एकदा बारडर वर जाउन
मुतल
तरि बास हाय मस्त आलिया पाकिस्तानला जिरवायला पाहीजे